Saturday, August 30, 2014

इतिहास-मागास

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल.

इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो.

अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.

अलीकडेच दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादी, पुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पडले. खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजे, तरच इतिहासाचे आकलन सम्म्रुद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते.

खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असते, मग जे सामोरे येईल ते किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.

वाचकांचाही द्रुष्टीकोन सहसा असाच जातीय परिप्रेक्षातीलच असल्याने व श्रद्धा वा समजुतींना नवीन पुराव्यांच्या परिप्रेक्षात चिकित्सकपणे व उदारपणे पाहण्याची मनोव्रुत्तीच नसल्याने इतिहासावरुन आपल्याकडे वारंवार वादंगे होत असतात.

डा. बाबासाहेबांच्या रिडल्समुळे असेच झंझावात महाराष्ट्रात उठले होते. राम आणि क्रुष्ण हे साक्षात इश्वरी अवतार असल्याने त्यांची चिकित्साच केली जावु शकत नाही असा पवित्रा सनातन्यांनी जसा घेतला तसाच श्रद्धाळु समाजानेही घेतला हे वाचकांच्या स्मरणात असेलच. खरे तर विद्वेषरहित चिकित्सेमुळे मानवी द्रुष्टीकोनाला नवीन आयाम मिळतात व आपलीच प्रगल्भता वाढत असते हे आपला समाज लक्षातच घेत नाही हे एक दुर्दैवच आहे.

आपला देश मागास आहे कारण आम्ही अजुनही इतिहास-मागास आहोत. आम्ही स्वजातींच्या-स्वप्रांताच्या पलिकडे जाऊन इतिहासाचा विचार करु शकत नाही. त्यामुळे खरे तर आम्हाला इतिहासच नाही. जी आहेत ती नुसती स्वभ्रम जोपासणारी मिथ्थके आहेत. त्यामुळे आम्ही आमच्याच इतिहासाबाबत नेहमीच संभ्रमात असतो.

आणि तरीही विगत गौरवाने आम्ही केवढे भारावलेले असतो...

मग तो कितीही खोटा आणि पोकळ का असेना!

57 comments:

  1. इतिहास असतो स्तुतिपाठक जेत्यांचा,
    आणि असतो निंदक पराजीतांचा!

    ReplyDelete
  2. इतिहास.....

    इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण मानावा लागेल. 'इति + ह् + आस' म्हणजे 'असे झाले', 'याप्रमाणे घडले'. ह्यात सर्व घडलेल्या गोष्टी आल्या आणि अर्थात त्या घडल्या तशाच सांगितल्या गेल्या, हेही इथे अभिप्रेत आहे. जे घडले ते सर्वच्या सर्व इतिहासाच्या कक्षेत न घेतल्यामुळे इतिहास म्हणजे भूतकालीन राजकारण, अशा प्रकारच्या संकुचित व्याख्या निर्माण होतात. एखाद्या कालखंडाचा इतिहास म्हणजे त्या काळातील मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा आढावा, असाच अर्थ झाला पाहिजे. आवश्यकतेप्रमाणे घटनांची निवड करता येते,केलीही जाते; मात्र अशा वेळी आपण ज्याचा आढावा घेत अहोत, तो भूतकालीन जीवनाचा केवळ एक भाग आहे, ह्याची स्पष्ट जाणीव ठेवावी लागते.

    इतिहासाच्या व्याख्येत 'असे असे झाले' असे मोघमपणे म्हटले, तरी काय झाले व कसे झाले हे सांगणारा अभ्यासक इतिहासकथनाच्या क्रियेत त्या घटनांकडे पाहण्याची आपली द्दष्टी थोडीबहुत आणणारच. काही अज्ञान, काही पूर्वग्रह व काही प्रमाणात भूतकालातील विचार व भावना समजण्याची माणसाची असमर्थता यांमुळे इतिहासलेखन हे खरोखरी अगदी जसे घडले तसेच्या तसे सांगितले, अशा स्वरूपाचे होणे शक्य नाही. तथापि आदर्श स्वरूपात इतिहास म्हणजे जे घडले ते जसेच्या तसे सांगणे व जेवढे सर्व सांगणे, असाच अर्थ करावा लागेल.

    माणूस जेव्हा इतिहासाचा विचार करतो, तेव्हा त्याचे लक्ष्य मानव हेच असते. माणसाप्रमाणे एखाद्या हत्तीला, वृक्षाला किंवा दगडालाही भूतकाळ आहेत. प्राणिशास्त्रज्ञाच्या दृष्टीने हत्तीचा इतिहास, वनस्पतीशास्त्रज्ञानाच्या दृष्टीने वृक्षाचा भूतकाळ आणि भूवैज्ञानिकाच्या दृष्टीने दगडाचे जुने स्वरूप ह्याही गोष्टी अर्थपूर्ण आहेत. तथापि जेव्हा इतिहास विषयाचा ती एक ज्ञानशाखा म्हणून विचार होतो, तेव्हा अभ्यासविषय म्हणून मनुष्यप्राणीच अभिप्रेत असतो. जीवनपद्धतीत प्रयत्‍नपूर्वक आणि जाणीवपूर्वक होत जाणारी स्थित्यंतरे ही फक्त मानवाच्या बाबतीत शक्य आहेत. अधिकाधिक सुखसमृद्धीसाठी मानव धडपडत असतो. ह्या उद्योगात जय असतात. पराजयही असतात. ह्या सर्व यशापयशांची कथा आणि चिकित्सा म्हणजे इतिहास.
    पुढे चालू.....

    ReplyDelete
  3. अभ्यासक आवश्यकतेनुसार प्रादेशिक किंवा सांस्कृतिक मर्यादा आखून घेतात आणि त्यांवरून इतिहासकथनाचे निरनिराळे प्रकार निश्चित होतात. राजकीय सत्तेच्या स्थानात आणि स्वरूपात जी स्थित्यंतरे होतात, तेवढीच सांगणारा तो राजकीय इतिहास; कुटुंब, विवाह इ. सामाजिक संस्थांच्या स्वरूपातील बदलांचा आढावा घेणारा तो सामाजिक इतिहास आणि शेती, उद्योगधंदे वगैरेंची प्रगती व परागती नोंदविणारा तो आर्थिक इतिहास होय. जीवनाच्या इतर अंगांची अनुषंगाने अगदी आवश्यक तेवढीच दखल घेऊन एखाद्या विशिष्ट बाबीपुरतीच मानवी जीवनाच्या वाटचालीची कथा सांगता येते. इतिहास वाङ्‌मयापुरता, कलेपुरता किंवा चित्रकला, संगीत अशा एखाद्या विशिष्ट कलेपुरताही मर्यादित होऊ शकतो. प्रादेशिक भूमिकेतून सबंध मानवी समाज एक कल्पून जगाचा किंवा मानवाचा इतिहास सांगितला जातो. आजच्या राष्ट्रीय सीमा, धर्मकल्पना किंवा सामाजिक भेद आहेत तसेच गृहीत धरून त्यांच्या भूतकाळाच्याही सुसंबद्ध हकिकती सांगण्याचे प्रयत्‍न होतात. भारताचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा इतिहास आणि ज्यू लोकांचा इतिहास ही अशा प्रकारांची काही उदाहरणे होत.

    इतिहासलेखनासाठी निवडलेला प्रदेश किंवा काळ हा इतिहासलेखकाच्या आणि त्याच्या वाचकांच्या विशिष्ट गरजेतून आणि विशिष्ट मनोभूमिकेतून निर्माण होत असतो. आजच्या संस्कृतीत राष्ट्र हे एक निष्ठास्थान आहे; राष्ट्रीयता हे एक मूल्य आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय इतिहासात रस निर्माण होतो. अशा इतिहासामागे सद्यःकालीन भावना हीच प्रबळ असते. पाकिस्तानचा भूतकाळ असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा पाकिस्तान म्हणून आज अस्तित्वात असलेला प्रदेश पायाभूत मानण्यात येतो आणि त्या प्रदेशात मानवसंस्कृतीच्या प्रारंभापासून आजतागायत जे जे घडले ते सर्व पाकिस्तानच्या इतिहासात जमा होते. १९४७ पूर्वी जेव्हा पाकिस्तान अस्तित्वात नव्हते, तेव्हा फक्त हिंदुस्थानाचा इतिहास सांगण्यात येत होता आणि पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली मोहें-जो-दडो संस्कृती हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले प्रकरण म्हणून वर्णिली जात होती. हिंदुस्थानच्या फाळणीने पाकिस्तान हे नाव राष्ट्र १९४७ मध्ये निर्माण झाले. ताबडतोब त्याला अतिप्राचिन इतिहास प्राप्त झाला. मोहें-जो-दडो हे गाव आणि तेथील उत्खनित प्रदेश पाकिस्तानी हद्दीत गेल्यामुळे ती संस्कृती म्हणजे पाकिस्तानचाच पूर्वेतिहास झाला आणि प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता ड्ब्ल्यू. एच्. व्हीलर हा मोहें-जो-दडोवरील आपल्या पुस्तकाला 'पाकिस्तानची पाच हजार वर्षे' असे नाव देऊन मोकळा झाला. ह्याच राष्ट्रीय भावनेतून इंग्‍लंडचा इतिहास, जर्मनीचा इतिहास, रशियाचा इतिहास आणि भारताचा इतिहास अशा प्रकारची इतिहासपुस्तके तयार होतात. ह्यांत इंग्‍लंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया वगैरे देशांच्या आजच्या चतुःसीमा लक्षात घेऊन ह्या प्रदेशांत पूर्वी होऊन गेलेले सर्व काही आपलाच वारसा म्हणून सांगितले जाते. एखादा देश आज स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात असला, तरी काही काळापूर्वी तशा राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेने तो अस्तित्वात नसेलही, हे लक्षात घेतले जात नाही.
    पुढे चालू.....

    ReplyDelete
  4. अभ्यासक आवश्यकतेनुसार प्रादेशिक किंवा सांस्कृतिक मर्यादा आखून घेतात आणि त्यांवरून इतिहासकथनाचे निरनिराळे प्रकार निश्चित होतात. राजकीय सत्तेच्या स्थानात आणि स्वरूपात जी स्थित्यंतरे होतात, तेवढीच सांगणारा तो राजकीय इतिहास; कुटुंब, विवाह इ. सामाजिक संस्थांच्या स्वरूपातील बदलांचा आढावा घेणारा तो सामाजिक इतिहास आणि शेती, उद्योगधंदे वगैरेंची प्रगती व परागती नोंदविणारा तो आर्थिक इतिहास होय. जीवनाच्या इतर अंगांची अनुषंगाने अगदी आवश्यक तेवढीच दखल घेऊन एखाद्या विशिष्ट बाबीपुरतीच मानवी जीवनाच्या वाटचालीची कथा सांगता येते. इतिहास वाङ्‌मयापुरता, कलेपुरता किंवा चित्रकला, संगीत अशा एखाद्या विशिष्ट कलेपुरताही मर्यादित होऊ शकतो. प्रादेशिक भूमिकेतून सबंध मानवी समाज एक कल्पून जगाचा किंवा मानवाचा इतिहास सांगितला जातो. आजच्या राष्ट्रीय सीमा, धर्मकल्पना किंवा सामाजिक भेद आहेत तसेच गृहीत धरून त्यांच्या भूतकाळाच्याही सुसंबद्ध हकिकती सांगण्याचे प्रयत्‍न होतात. भारताचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा इतिहास आणि ज्यू लोकांचा इतिहास ही अशा प्रकारांची काही उदाहरणे होत.

    इतिहासलेखनासाठी निवडलेला प्रदेश किंवा काळ हा इतिहासलेखकाच्या आणि त्याच्या वाचकांच्या विशिष्ट गरजेतून आणि विशिष्ट मनोभूमिकेतून निर्माण होत असतो. आजच्या संस्कृतीत राष्ट्र हे एक निष्ठास्थान आहे; राष्ट्रीयता हे एक मूल्य आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय इतिहासात रस निर्माण होतो. अशा इतिहासामागे सद्यःकालीन भावना हीच प्रबळ असते. पाकिस्तानचा भूतकाळ असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा पाकिस्तान म्हणून आज अस्तित्वात असलेला प्रदेश पायाभूत मानण्यात येतो आणि त्या प्रदेशात मानवसंस्कृतीच्या प्रारंभापासून आजतागायत जे जे घडले ते सर्व पाकिस्तानच्या इतिहासात जमा होते. १९४७ पूर्वी जेव्हा पाकिस्तान अस्तित्वात नव्हते, तेव्हा फक्त हिंदुस्थानाचा इतिहास सांगण्यात येत होता आणि पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली मोहें-जो-दडो संस्कृती हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले प्रकरण म्हणून वर्णिली जात होती. हिंदुस्थानच्या फाळणीने पाकिस्तान हे नाव राष्ट्र १९४७ मध्ये निर्माण झाले. ताबडतोब त्याला अतिप्राचिन इतिहास प्राप्त झाला. मोहें-जो-दडो हे गाव आणि तेथील उत्खनित प्रदेश पाकिस्तानी हद्दीत गेल्यामुळे ती संस्कृती म्हणजे पाकिस्तानचाच पूर्वेतिहास झाला आणि प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता ड्ब्ल्यू. एच्. व्हीलर हा मोहें-जो-दडोवरील आपल्या पुस्तकाला 'पाकिस्तानची पाच हजार वर्षे' असे नाव देऊन मोकळा झाला. ह्याच राष्ट्रीय भावनेतून इंग्‍लंडचा इतिहास, जर्मनीचा इतिहास, रशियाचा इतिहास आणि भारताचा इतिहास अशा प्रकारची इतिहासपुस्तके तयार होतात. ह्यांत इंग्‍लंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया वगैरे देशांच्या आजच्या चतुःसीमा लक्षात घेऊन ह्या प्रदेशांत पूर्वी होऊन गेलेले सर्व काही आपलाच वारसा म्हणून सांगितले जाते. एखादा देश आज स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात असला, तरी काही काळापूर्वी तशा राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेने तो अस्तित्वात नसेलही, हे लक्षात घेतले जात नाही.
    पुढे चालू.....

    ReplyDelete
  5. राष्ट्रीयत्वाप्रमाणेच इतरही काही सांप्रतच्या मूल्यांच्या व निष्ठांच्या मागोव्याने इतिहासकथन करण्याचे प्रकार होत असतात. ह्या निरनिराळ्या प्रकारच्या स्वाभिमानांच्या प्रेरणेतून जे इतिहास निर्माण होतात, त्यांचे स्वरूप बहुधा स्वाभिमानाने निश्चित केलेले असते; —भूतकालीन वस्तुस्थितीने नव्हे – हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून जातींचे इतिहास, धर्मांचे इतिहास, राष्ट्रांतर्गत लहान लहान प्रदेशांचेही इतिहास निर्माण होतात.

    विविध प्रकारांनी व विविध दृष्टिकोनांतून सांगितलेल्या भूतकालीन घडामोडींच्या हकिकतींप्रमाणे त्या हकिकती कशा मिळविल्या, कशा जुळविल्या, कशा सांगितल्या आणि कशासाठी सांगितल्या, ह्यासंबंधी विचार केला जातो. प्राचीन हत्यारे, इमारती, नाणी व इतर अनेक प्रकारचे अवशेष, पूर्वजांनी स्वतःविषयी कोरून किंवा लिहून ठेवलेली माहिती, ह्या सर्वांचा पद्धतशीर उपयोग करून प्रत्यक्ष इतिहालेखन करणे हे एक स्वतंत्र शास्त्र झाले आहे. ह्या योग्य तऱ्हेने जमविलेल्या इतिहाससाधनांचा अर्थ कसा लावावयाचा आणि इतिहासलेखनाला मानवी जीवनात काय स्थान द्यावयाचे, ह्यांबद्दलचे चिंतन गेली कित्येक शतके चाललेले आहे. इतिहास म्हणजे प्रत्यक्ष घडामोडी, ह्या कोणत्यातरी नियमांनी बद्ध असतात, मानवी समाज एका विशिष्ट दिशेने वाटचाल करीत आहे आणि पुढेही तो त्याच ठरलेल्या दिशेने चालत राहणार आहे, ह्यापासून तर इतिहासात एकामागून एक घडत जाणाऱ्या घटनांच्या मागे कोणतेही सूत्र नाही. असूच शकत नाही. ह्यापर्यंत अनेक विचार प्रकट केले गेले आहेत. अनुषंगाने इतिहासाच्या ज्ञानाचा माणसाला निश्चित उपयोग तरी काय, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून इतिहासावाचून माणसाचे क्षणभरही चालणार नाही येथपासून, तर इतिहास म्हणजे नुसती अडगळ आहे, येथपर्यंत सव प्रकारची उत्तरे देण्यात आलेली आहेत. कालगतीचा अर्थ लावण्याच्या किंवा त्यातील अर्थशून्यता सांगण्याच्या ह्या सर्व प्रयत्‍नांना स्थूलपणे इतिहासाचे तत्त्वज्ञान असे म्हटले जाते. इतिहासलेखनाच्या तंत्राचा ऊहापोह आणि इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा व उपयोगितेचा शोध हे इतिहासाध्ययनाचे प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांच्या आढाव्याइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचे असे भाग आहेत.

    इतिहासाच्या संबंधात निर्विवाद असलेली गोष्ट एकच. ती म्हणजे एकामागून एक होणारी स्थित्यंतरे. माणूस कापसाचे, रेशमाचे, लोकरीचे, टेरिलीनचे वस्त्र केव्हातरी वापरीत नव्हता. तो केव्हातरी ते वापरू लागला हे निश्चित. तसेच राजकीय जीवनात पूर्वी जगाच्या बहुतेक भागांत सर्वसत्ताधीश असे राजे राज्य करीत होते, तर आज जगाच्या बहुतेक सर्व भागांत लोकशाही पद्धतीचा राज्यकारभार चालू आहे. सामाजिक व्यवहारात जगातील अनेक समाजात पूर्वी बहुपत्‍नीकत्व होते, ते आता गेले आहे. आता हे स्थित्यंतर फक्त जीवनाच्या बाह्या स्वरूपातीलच आहे. एक सजीव प्राणी म्हणून भूक, तहान, लैंगिक भावना इ. मूलभूत विकार जे आहेत, ते कोणत्याही काळी कोणत्याही समाजात सारखेच असतात, असे म्हणता येईल. हे जरी मान्य केले, तरी आपल्या निरनिराळ्या भुका भागविण्याच्या, निरनिराळ्या इच्छा पुऱ्या करून घेण्याच्या माणसाच्या पद्धती बदलतात. बदल—बाह्य स्वरूपातील बदल म्हणा हवे तर-हे एक उघड दिसणारे आणि वादातीत असे सत्य आहे. काहीतरी असते ते नाहीसे होते किंवा त्याचे रूप तरी पालटते, काही नसलेल्या गोष्टी नव्याने येतात किंवा जुन्याच गोष्टी नव्या स्वरूपात अवतरतात. पण काहीना काही घडामोड ही चालूच अलते. ह्या घडामोडींचे अर्थ कसेही लावले, तरी घडामोड नावाचे सत्य मानायलाच पाहिजे. इतिहासाचा दुसरा कोणताही अर्थ लागो किंवा न लागो, इतिहास म्हणजे बदल, इतिहास म्हणजे स्थित्यंतर, हे मान्य करूनच पुढे त्या विषयासंबंधी अधिक ऊहापोह व्हावा.
    समाप्त.

    ReplyDelete
  6. Exclent information about History. Thanks Anonymous!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, मित्रा.

      Delete
  7. ही ३०० रामायणे कोणत्या आधाराबर निवडली गेली, त्यांच्या प्रती कितपत विश्र्वासार्ह आहेत याचा खुलासा झाल्याखेरीज मत देता याणार नाही.

    ReplyDelete
  8. जगात एकूण देश १९५ आहेत आणि लोकशाही राबवणारे आहेत १२५
    म्हणजे साधारण ६० % लोक लोकशाही उपभोगतात ,
    पण दुर्दैवाने ४०% लोक अजूनही लोकशाही अनुभवू शकत नाहीत
    आणि खरी लोकशाही म्हणजे काय ?
    भांडवलशाही म्हणजे लोकशाही नाही !
    आपण दिलेली माहिती कालातीत नाही , इतिहास जपण्याचा हट्ट कशापायी असतो ?
    आत्ताच्या अस्तित्वासाठी ? भीतीपोटी ?
    माणसाची प्रगती म्हणजे काय ?श्रेष्ठ प्रगती कोणती ?भौतिक का आध्यात्मिक ?
    इजिप्तशियन गेले आणि त्यांचे देव संपले - माया गेले ते आपापल्या देवन घेऊनच संपले !आज कशाच्याच पाउलखुणा नाहीत - रसरशीत जिवंत श्रद्धा कुठे आहेत का टिकून ?
    सर्व बाबतीत भेसळ आहे तशीच ती श्रद्धेच्या बाबतीतपण आहे !
    पूर्वी राजघराणी पुरोहित वर्गाला आश्रय देत असत , कारण त्यांना लोकजागृती नको होती ,
    आज समाजातील विप्र वर्गाला व्यापार उदिमासाठी श्रद्धा हव्या आहेत !
    इतिहासातून धडा घेत जर क्षणभंगुर आहे असे समाज मानू लागला तर ?
    नवीन देव निर्माण होतील ?साईबाबांची मंदिरे काय सांगतात ?

    ReplyDelete
  9. "वर्शिपिंग फाल्स गोड्स " हे अरुण शौरी यांचे पुस्तक मुळातच वाचनीय आहे !
    इतिहास आणि त्याचा अर्थ कसा ते उत्तम उदाहरण आहे
    आपण डॉ आंबेडकर यांना अवास्तव महत्व दिले आहे का ?
    डॉ आंबेडकर यांनी स्वतः स्वराज्यासाठी घेतला होता का ?
    असे जे प्रश्न त्यांनी निर्माण केले आहेत ते चिंतनीय आहेत !खालच्या जातींचे लांगुल चालन करण्यासाठी आपण डॉ आंबेडकर यांचे मिथक बनवले आहे !
    ते खरेच थोर होते का ? ते गांधीजींपासून अंतर ठेवून का वागत होते ?
    इतिहासाचा अभ्यास करताना आपण कशावर ठेवून भूतकाळ बघत असतो ते पण महत्वाचे आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. वर्शिपिंग फाल्स गोड्स " हे अरुण शौरी यांचे पुस्तक मुळातच वाचनीय आहे !
      इतिहास आणि त्याचा अर्थ कसा ते उत्तम उदाहरण आहे
      आपण डॉ आंबेडकर यांना अवास्तव महत्व दिले आहे का ?
      ----------------------> Pustak kase nasave yache he atyant yogy udaharan ahe. Tyachyat fakt Brahmani aakrosh ahe. Shoury chi bhumika nyayadhishachi nasun kharyache khote aani khotyache khare karanarya vakilachi aahe.

      Delete
    2. "वर्शिपिंग फाल्स गोड्स " ले.अरुण शौरी
      पुस्तक कसे नसावे! याचे हे पुस्तक अत्यंत योग्य उदाहरण आहे. त्याच्यात फक्त ब्राह्मणी आक्रोश आहे. सूर्यावर थुंकणाराची जी अवस्था होते तशी अवस्था अरुण शौरीची झाली आहे, थुंकी थुंकणाऱ्याच्याच तोंडावर / चेहऱ्यावर पडते. शौरीला पुस्तक रूपाने अनेकांनी प्रत्युत्तर दिलेली आहेत, ते एकदा वाचा! शौरीची भूमिका ही तटस्थ न्यायाधीशाची नसून खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणाऱ्या वकिलाची आहे.

      Delete
  10. नेहरू यांनी घटना समिती बनवताना डॉ आंबेडकर यांना अवास्तव महत्व दिले हे खरे आहे
    त्या समितीत अनेक मान्यवर होते ,पण प्रचार असा केला जातो की जणूकाही डॉ आंबेडकर यांनीच देशाला घटना दिली नाहीतर या देशाचे वाटोळे झाले असते -
    खरेतर अशातला काहीही भाग नाही ! ते महामानव तर अजिबात नव्हते
    डॉ . आंबेडकर यांनी स्वराज्याच्या चळवळीत अजिबात भाग घेतला नाही , मुख्यत्वे ते सुटाबुटात वावरणारे मानले जातात ,
    त्यांना सामाजिक चळवळीत भाग घेण्याची मूलतः आवड नव्हती - जसे म फुले यांचा ब्राह्मणाच्या लग्नात झालेला अपमान वयाच्या २६व्या वर्षी बरेच काही ब्राह्मण द्वेषाचे तत्वज्ञान शिकवून गेला तसेच डॉ आंबेडकर यांचे आहे - ते म गांधी यांच्या भजने आणि सर्वोदय इत्यादी गोष्टींबाबत तितकेसे खूष नसत म गांधीना त्यांनी मूक विरोधच केला असे म्हणावेसे वाटते !
    नेहरू यांनी खरेतर असले दलित चमचेगीरीचे राजकारण चालू केले
    नेहरू यांना इथल्या मातीतला खरा भारत समजलाच नाही - आंग्ल वातावरणात जोपासले गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व या मातीशी रुजलेच नाही तरीही शोमनशिप त्यांना चांगलीच जमत गेली , आणि हुकमी लोकप्रियता मिळण्यासाठी काय केले पाहिजे हे त्यांना म गांधी यांच्या कडून शिकायला मिळाले
    जनमानसाला कसे मोहित करायचे त्याची हातोटी त्यांना अवगत झाली आणि सोव्हिएत प्रभावाखाली त्यांनी देशाच्या उमेदीच्या काळातली पहिली १५ वर्षे अक्षरशः वाया घालवली
    चीनी सैनिकांनी आपल्या सैनिकांना मुस्काटात मारून हाकलून देई पावेतो ते स्वप्नातच वावरत होते आणि शेवटी हृदय विकाराने त्यांना गाठले हा इतिहास कसा सांगणार ? असा इतिहास दडपला जात असतो - आपले पहिले राष्ट्रीय नेतृत्व भोंगळ आणि बावळट होते हे कबूल करायची किती जणांची तयारी आहे ? परिणामतः आपले सर्व राजकारण अगदी चुकीच्या रेषेवर बेतले गेले आणि अनुनयाची सुरवात पं नेहरूंचेच पाप आहे ते आज पर्यंत मुलायम आणि त्यांचा
    मुलगा अखिलेश हे पोसत आहेत !
    भारतीय समाज हे सर्व पाप उघड्या डोळ्यांनी सहन करत होता आणि काळाचा महिमा असा की मोदींच्या रूपाने नव्या आशा दिसू लागताच जनमानसाने एक मूक क्रांती करून हे सर्व सिद्धांत फेकून दिले आणि मोकळा श्वास घेतला !

    ReplyDelete
  11. संजय सर , हा गोल्डन चान्स वाया घालवू नका , अहो , तुम्हीच म्हणता ना की महाभारत आधी झाले आणि रामायण नंतर झाले ?
    लढ बाप्पू !
    संजय , ढवळीकर म्हणतात की आर्य हे इथलेच ! दैनिक सकाळ ३१ ऑगस्ट २०१४ तुला हे पटते ?
    रामायणे ३०० आहेत ? मग तू गप्प कसा ?
    पेरियार इ व्ही रामास्वामी यांच्या बाबत पटकन टाक लिहून ! किती थोर माणूस होता तो
    त्यांचे कौतुक करायचे संजयच्या हातून कसे राहून गेले ? अजूनही बघ ! लढ बाप्पू !
    गणपती बद्दल राम गोपाल वर्मा इतके बोलला तरी हा चान्स तू सोडलास ! असे कसे रे करतोस संजय तू ?अशाने किती सुंदर सिद्धांत तुझ्या हातून निसटून जात आहेत
    अरे महाभारत हे रामायणाच्या आधी घडले हा तुझा सिद्धांत तर खल्लास करणारा आहे !
    इतिहास - हे असे असे घडले - सांग ना रे संजय
    - चला - संजय उवाच !

    ReplyDelete
  12. फ़्रॉंन्सिस बेकन यांचे मत इतिहास म्हणजे "मानवाला शहाणे बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय", तर हेन्री जॉन्सन म्हणतात इतिहास म्हणजे " जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होय" आणि" ज्या घटनांनी मानवी मनावर खोल ठसा उमटतो , अशा घटना म्हणजे इतिहास होय".इतिहासाची व्याख्या करताना प्रो.लेस्की म्हणतात, "इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय".

    ReplyDelete
  13. aamache avinaash aani saarang dave kuthe palaale ?
    dr ambedkar yanchya baddal itake kon lihit aahe ? aani sarang gapp ? avinaash tar sheput ghalun palalaa !
    kaay re avya ?

    ReplyDelete
  14. अरे बापरे ,
    इतके आंबेडकर यांच्या बद्दल लिहित आहेत आणि अविनाश शेपूट घालून कुठे लपला आहे !
    आणि सारंग दावे आणि साठे कुठे शेण खात आहेत ?
    गणपती हा तुमचा देव नाही न ?
    गणपतीचे राम गोपाल वर्माने किती मस्त वर्णन केले आहे - ज्याचे स्वतःचे डोके उडवले तरी हा देव काहीही करू शकला नाही , जो आपले रक्षण करत नाही तो लोकांचे काय रक्षण करणार ?
    अविनाश , किती मस्त लिहिलंय ! गणपतीला वर्गणी दिली का ? नाचणार का ? ढोल ताशे वाजवणार का ?
    सरकार किती खर्च करत आहे या उत्सवावर ,
    सारंग तू सरकारी खर्चाचा निषेध कर !

    ReplyDelete
  15. मोहजो दारो हराप्पा इथे गणपती होता का ?तेथील लोक हिंदू होते का ?चला या गणपतीने वैताग आणला आहे , आपण हरप्पण लोकांचा धर्म स्वीकारूया !
    शिवधर्म
    काय म्हणणे आहे रे अविनाश ?
    सारंग दवे - निषेध कर या गणपतीचा - असला कसला देव ?कसे खातो ? कसे जेवतो ?
    मोदकच का आवडतात ?आणि २१ च का ? सर्व ब्राह्मण लोकांचा नाटकीपणा आहे !
    हाणून पाडा हा उत्सव - पुढच्या वर्षी फक्त क्रॉस मैदान , शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर गणपती बसवायचे - उगीच डोक्याला ताप !चाल रे अविनाश ! लिही काहीतरी - कोणीतरी डॉ आंबेडकर यांच्या बद्दल लिहिले आहे त्याचा निषेध सुद्धा करत नाही तुम्ही - कमाल आहे !

    ReplyDelete
  16. आंबेडकर यांच्या बद्दल घातकी प्रचार करणार्या लोकांचा निषेध असो !

    ReplyDelete
  17. इतिहास आपल्या सोयीने लिहिताना ब्राह्मण वर्गाने त्यांना वार्यावर सोडले म्हणून त्यांना घोकंपट्टी करून घेताना सर्व बहुजनांचे हाल झाले बाबासाहेब पुरंधारे यांनी शिव्छात्रपती यांची राज्याभिषेकाची घोषणा , त्यात ब्राह्मण वर्गाचा उल्लेख करत भेदाभेद करणारी अशी केली
    गो ब्राह्मण प्रतिपालक अशी घोषणा नाही ते सर्वांनी समजून घ्यावे
    बाबा पुरंधरे यांना शिव्छात्रपती पुस्तक लिहिण्याबद्दल बंदी घालावी
    इतिहास समजून न घेता अफझलखान बद्दल चुकीचा उल्लेख केला आहे , तो मराठी मातीचा द्वेष करत नव्हता त्याच्या पदरी ब्राह्मण नोकरीला होते

    ReplyDelete
  18. शिवाजी महाराज अवघ्या ५० वर्षांचे असताना आपल्यातून गेले - हा पण एक घातपात आहे
    ब्राह्मणांच्या राजकारणाचे ते बळी ठरले नाहीतर त्यांनी औरंगजेबाचे हृदय परिवर्तन केले असते -
    शिवाजीला फौलाद खान याने पकडून ठेवले आणि औरंगजेब शिवाजी महाराजाना ठार मारणार होता हे लिखाण चुकीचे आहे - तो असे असे घडले असे सांगणारा इतिहास नाही - ब्राह्मणांनी हि कथा रचली आहे त्यांचा निषेध करत आम्ही संजय यांना विनंती करतो की आग्रा दरबार या बद्दल खरे ते स्पष्ट लिहावे - लोकांसमोर खरा इतिहास आलाच पाहिजे !

    ReplyDelete
  19. समीर घाटगे , पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येत खरा इतिहास मांडावा , अविनाश आणि सारंग दवे यांनी महत्वाची माहिती उजेडात आणावी ,म्हणजे खरा इतिहास बाल्वार्गाला समजेल
    समुद्रात स्मारक करणे ही शिवसेनेची बावळट कल्पना आहे ,इतक्या खर्चात एखादे धारण बांधून होईल आणि सरकारी पैसा योह्य कामासाठी वापरला जाईल
    सरदार सरोवर हि आपली खाजगी मालमत्ता आहे असे समजून मोदी तिथे अफाट खर्च करत मोठा पुतळा बसवणार आहेत - हि विकृती आहे ! हे थांबवले पाहिजे - अविनाश ठाणे , आणि सारंग दवे यांनी आंदोलन उभारत त्याला विरोध केला पाहिजे

    ReplyDelete
  20. Are Anonymous murkha dusaryanna andolan ubharayala lavanyas sanganya peksha bavalataa tuch ka andolan ubharat nahis! Besharam manasaa tula akkalach nahi kee Kay?

    ReplyDelete
  21. मला आंदोलन उभारावेसे वाटते ,पण आता वय आहे ८५ , या वयात मला धरायलाच दोघे जण लागतात , म्हणून मी फक्त सुचवायचे काम केले , माझे काही चुकले का ?मी प्रामाणिक पाने सुचवले त्याला इतके टोकाचे तिखट उत्तर दिले त्याचे वाईट वाटले
    एक सिनियर सिटीझन

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous September 3, 2014 at 8:15 AM
      Anonymous September 3, 2014 at 8:19 AM,
      Anonymous September 3, 2014 at 8:27 AM,
      Anonymous September 3, 2014 at 8:33 AM and
      Anonymous September 3, 2014 at 8:45 AM

      खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस 4-4, 5-5 कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!

      Delete
  22. अहो सिनियर सिटीझन ,
    तुमचे आधी अभिनंदन केले पाहिजे , कारण इतक्या वयात आपण विषय मांडू शकता , आपल्याला मत आहे हीच आनंदाची गोष्ट आहे आणि जमेची बाजू पण !परदेशात तर या वयात खूपच उत्साही लोक बघायला मिळतात ,आपले विचार अजिबात टोकाचे नाहीत , पण काही लोक अगदीच
    असभ्य पणे बोलत वागत असतात त्यामुळे त्यांच्या लिहिण्यामुळे आपण निराश होऊ नका !

    ReplyDelete
    Replies
    1. Khotaradya, tu toch ko. Bra. ahes. Tula mi purata olakhun aahe. Band Karl tuzi hi falatu karasthane, jara manasasarakha vag. Eka veli tint in charchar comments lihun Kay milavitos te tari sang!

      Delete
    2. @Anonymous September 3, 2014 at 8:19 AM,
      Anonymous September 3, 2014 at 8:27 AM,
      Anonymous September 3, 2014 at 8:33 AM and
      Anonymous September 3, 2014 at 8:45 AM

      खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!

      Delete
  23. अजिबात निराश होऊ नका
    अविनाश हा ठाण्याचा अत्यंत ज्वलंत कार्यकर्ता आहे आणि समीर दावे तर अतिशय उत्साही आहे त्यामुळे तुम्हाला त्रास करून घेण्याचे काहीच कारण नाही , आपण मांडलेले ब्राह्मण वर्गाबाद्दल्चे विचार योग्यच आहेत , आणि याला कुणीतरी ऐरणीवर घेणे अपेक्षित आहे , तुम्हाला या ब्लोगवर या अविनाश आणि सारंगची मते वाचून त्यांची आठवण झाली असल्यास काहीच गैर नाही
    सरकारी पैसा वापरून नेते लोक जो धिंगाणा घालत असतात आणि पुतळे उभारत असतात त्याबद्दल आपली मते आपण या वयात सुद्धा धीटपणे मांडली हे विशेष ! अभिनंदन !

    ReplyDelete
  24. माझे वय १८ वर्षाचे आहे आणि यंदा मी प्रथमच मतदान केले
    आपले आणि माझे विचार वयात इतका फरक असून एकसारखे आहेत याचे आश्चर्य वाटते खरेतर आमच्या सारख्यांनी आंदोलन करणे आवश्यक आहे पण आजकाल करियर आणि भविष्यकाळ यामुळे शहरातून काहीच वेळ मिळत नाही , अजून आणि त्यापेक्षा अजून असा हा न संपणारा प्रवास आहे - त्यामुळे अशी मते जरी जुळत असली तरी आम्ही फार काही करू शकत नाही - आजकाल दंडेलशाही इतकी वाढत चालली आहे , की कोणतीही रिस्क घेणे नको वाटते - आपल्या काळात आपण नक्कीच म गांधींच्या आंदोलनात भाग घेतला असेल !
    प्रतिक

    ReplyDelete
  25. किती फेकाफेकी चालली आहे ,
    आज ८५ वय असेल तर छोडो भारत या वेळी या आजोबांचे वय १३ वर्षाचे असणार -
    उगीच काहीही थापा मारत काहीबाही सांगत सुटण्यापेक्षा जर इमानदारीत आजच्या समस्यांचा विचार करत गेले तर योग्य नाही का ? आजोबा , आपण आजही सामाजिक जीवना बाबत जागरूक आहात हे मात्र विशेष ! आपण दादरा नगर हवेली मुक्तीसाठी काम केले का ? हैद्राबाद आंदोलनात भाग घेतला का ? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला का ?असे जागृत जीवन आपण जगाला असाल असे वाटते , नाहीतर आम्ही आपल्या या सर्व लोणकढी थापा आहेत असे समजू !

    ReplyDelete
  26. " खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"
    ही काय नवीन भानगड आहे ?
    कोण असे करेल उगाचच ?
    कोणी हा शोध लावला आहे की १च माणूस , आणि तेसुद्धा कोब्रा -सारखा लिहित असतो आणि तो काय करतो ?
    हा काही चांगला टाईम पास नाही - कुणी भाविश्य्वाला आहे का ? असे सांगणारा ? का प्लांचेट आहे असे सांगणारे की हा कुणीतरी कोब्रा आहे म्हणून ?
    आम्हालातरी सांगा कसे करायचे ते ?

    ReplyDelete
  27. " खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"
    ही काय नवीन भानगड आहे ?
    कोण असे करेल उगाचच ?
    कोणी हा शोध लावला आहे की १च माणूस , आणि तेसुद्धा कोब्रा -सारखा लिहित असतो आणि तो काय करतो ?
    हा काही चांगला टाईम पास नाही - कुणी भाविश्य्वाला आहे का ? असे सांगणारा ? का प्लांचेट आहे असे सांगणारे की हा कुणीतरी कोब्रा आहे म्हणून ?
    आम्हालातरी सांगा कसे करायचे ते ?
    शिवा भोकरे

    ReplyDelete
  28. " खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"
    हा प्रकारच भन्नाट आहे - कल्पना तर त्याहून भन्नाट !
    कोण असेल असे करणारे - कोब्रा तर नक्की नाही - कोब्रा असले चाळे करत नाहीत
    पण काय सुख मिळते असे करण्याने ?
    आनंद जोगळेकर

    ReplyDelete
  29. " खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"
    ८५ वर्षाच्या आजोबाना नेत येत असेल का ? देवाचे नाव घेण्य ऐवजी ते असे का करतील यात काहीच विनोद नाही आनंद नाही किंवा हि चेष्टा पण नाही
    कोणी रिकाम टेकडा असे करणार नाही - तो पत्ते खेळेल म्याच बघेल मालिका बघेल ,
    पण असे नक्की करणार नाही
    मग याचा दुसरा अर्थ असा निघतो की अशा कॉमेंट करणाराच वेडा आहे
    प्राची खाडे

    ReplyDelete
  30. " खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"
    याबद्दल इतक्या सुचना आल्या आहेत हे पाहून मूळ विषय बाजूलाच पडतो आहे ,
    असा जर कुणी लिहित असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे , अनुल्लेखाने मारणे ही
    उच्च अहिंसक हत्या आहे , सावरकरांना गांधीनी असेच मारले होते
    तसेच या माणसा बद्दल करणे योग्य ठरेल ,मुळात असे वाटत नाही की कुणीतरी एकाच माणूस हे करत असेल - हा विचारच विकृत वाटतो आहे !
    मूळ विषय इतका मार्मिक आहे ते सोडून असे करणे आणि फुकटची टीका करणे हे सुद्धा अक्कलशून्य पणाचे लक्षण आहे
    गोपाळ पेठकर

    ReplyDelete
  31. हे चर्वती चर्वण करण्यात इतक्या लोकांना इंटरेस्ट आहे हे पाहूनच आश्चर्य वाटू लागते
    हेच परिश्रम " इतिहास मागास " या विषयावर खर्च केले असते तर ?इतका सुंदर लेख आणि त्यावरची पहिली लांबच लांब प्रतिक्रिया अगदी ग्रेटच आहे - अगदी अप्रतिम - वाचनीय आणि संग्राह्य आहे अभ्यासपूर्ण प्रतिसाद कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण आहे - त्यानंतर कोब्रचा वाद अगदीच डोके फिरल्या सारखा घाणेरडा वाटतो
    आपल्याकडे आधी संशयाचे भूत निर्माण करत टीका करायची हा पण एक निरुद्योगीपणा चालतो आणि त्यातही कोब्रा लोकाना टार्गेट करणे सोपे आहे
    याचा जितका निषेध करावा तितका कमीच पडेल
    अनुराधा फडके

    ReplyDelete
  32. @Anonymous September 4, 2014 at 10:17 AM,
    Anonymous September 4, 2014 at 10:20 AM,
    Anonymous September 4, 2014 at 10:23 AM,
    Anonymous September 4, 2014 at 10:27 AM,
    Anonymous September 4, 2014 at 10:34 AM and
    Anonymous September 4, 2014 at 10:41 AM

    ह्या बामणाचे मानसिक संतुलन अक्षरशः बिघडले आहे. चित्पावन अर्थात कोकणस्थ ब्राह्मण कधी काळी सुधरतील हे अजिबात पटणारे नाही. याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे, असे वाटते! हा इतरांच्या खोट्या नावाने टिप्पण्या लिहित सुटतो अगदी बावळट माणसा सारखे! फक्त याच्या टिप्पण्याची वेळ पाहिली तरी हे सुज्ञांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. सलग एकसारखे लिहित सुटतो पिसाळल्यासारखे, ताबाच नाही स्वतः वर. रिकाम टेकडा कुठला? लिहिताना वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम द्यायचा असतो हे ही याला समजत नाही व याच्या पूर्ण खानदाणालासुद्धा माहित नसेल?

    ReplyDelete
  33. ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१

    तुकोबांनी ब्राह्मणांचा धर्मावरील विशेषाधिकारच नाकारला
    महाराष्ट्रातील त्या काळातील ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? तुकोबांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल का गेली? या प्रश्नांची उत्तरे तुकोबांच्या गाथ्यातच सापडतात. भारतात खोलवर रुजलला ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या पायावर उभा आहे. ब्राह्मण ही जात यात मोठी लाभधारक आहे. या ब्राह्मण धर्माच्या पायावरच तुकोबांनी घाव घातला. परंपरेने ब्राह्मणांना जातीनिष्ठ श्रेष्ठत्व दिले होते. ते तुकोबांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केवळ ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही, अशी घोषणा तुकोबांनी केली. इतकेच नव्हे, तर ब्राह्मण होण्याचा अधिकार कोणालाही आहे, अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. तुकोबा म्हणतात की, एखादा मनुष्य अंत्यजाच्या कुळात (सर्वांत हीन जातीत) जन्मला असेल, मात्र तो निस्सीम विठ्ठल भक्त असेल, तर त्याला ब्राह्मणच समजायला हवे. तुकोबांचा या संबंधीचा अभंग असा -
    ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।। रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।
    याच्या विरुद्ध बाजूने विचार मांडताना तुकोबा म्हणतात की, भक्तीहीन असलेल्या ब्राह्मणास अंत्यज मानावे. हा विचार अंत्यंत क्रांतीकारक आहे. ही क्रांती घडविण्यासाठी तुकोबांची वाणी विजेसारखी कडाडते. तुकोबा लिहितात -
    अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।
    त्याही पुढे जाऊन तुकोबा म्हणतात की, अशा भक्तीहीन ब्राह्मणाला जन्म देणारी स्त्री नक्कीच व्याभिचारी असली पाहिजे.
    हा हल्ला इतका घणाघाती आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांना ती पचणे कठीण झाले असणार.
    धार्मिक न्यायनिवाड्याचा अधिकार
    ब्राह्मणी परंपरेने धार्मिक न्याय-निवाडा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना दिला आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचे आणि ब्राह्मणत्व कोणाला नाकारायचे याचे अधिकार ब्राह्मणांच्या धर्मसभेला होते. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण्याचा हक्क पैठणच्या पंडितांनी नाकारला होता. धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना पतितसावित्रिक ठरवून मौंजीचा अधिकार नाकारला होता. धर्मपंडितांचा हा अधिकार जन्माधिष्ठित जातीवर आधारित आहे. ब्राह्मणाखेरीज इतर कोणत्याही जातीतील व्यक्तीला हा अधिकार नाही. मात्र कुणव्याच्या कुळात जन्मलेल्या तुकारामांनी ब्राह्मण जातीचा हा विशेषाधिकार धुडकावून लावला. इतकेच नव्हे, तर तो स्वत:च्या हाती घेऊन ब्राह्मण कोण याचा निवाडा करणारे अभंग रचले. ते अभंग महाराष्ट्रभर लोकप्रियही झाले. त्यामुळे ब्राह्मण चवताळून उठले. तुकोबांच्या हत्येमागील हे एक प्रमुख कारण आहे.

    ReplyDelete
  34. तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा न्यायनिवाडा करणारे असंख्य अभंग आहेत. त्यातील मोजके अभंग खाली देत आहोत. सोबत सुलभ अर्थही दिला आहे. हे अभंग देहू संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संबंधित अभंगाचा गाथ्यातील अनुक्रमांक दिला आहे.

    ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।
    रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।
    शांति क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।
    तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे । सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।
    (अभंग क्रमांक : १२३०)
    अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे.

    अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
    वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।
    ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।
    तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।
    (अभंग क्रमांक : १३४४)
    अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये.

    ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।
    जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।
    सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार । मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।
    तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।
    (अभंग क्रमांक : १२२९)
    अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.
    ..................................................................................................................

    ReplyDelete
  35. ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २
    तुकोबांनी ब्राह्मणांच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला
    हिंदू धर्मातील परंपरेने ब्राह्मणांना कोणतेही काम न करता बसून खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. ही व्यवस्था पूर्णतः भोंदूगिरीवर आधारलेली होती. तुकोबांनी या भोंदूगिरीला तीव्र विरोध केला. तुकोबांनी केलेला हा विरोध जनमानसाला पटला. तुकोबांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. ब्राह्मणांच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पाडणारे अभंग लोकांच्या तोंडी खेळू लागले. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा उद्योग धोक्यात आला. तसेच त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांविरुद्ध चवताळून उठले.
    ब्राह्मणांचा पोटापाण्याचा उद्योग त्यांच्या भोंदूगिरीवर अवलंबून होता. आजही काही प्रमाणात आहे. तुकोबांनी बाह्य देखाव्याला नेहमीच विरोध केला. ब्राह्मणी कर्मकांडात बाह्य देखाव्यालाच महत्त्व होते. इतकेच काय ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि कमरेचे सोवळे हा वेशही दिखाऊच होता. या वेशानुसा येणा-या आंतरिक शुद्धता ब्राह्मण पाळत नव्हते. या वेशाचा वापर केवळ दक्षिणा उकळण्यासाठी केला जात होता. बाह्य वेशाला पाहूनच लोक भूलतात आणि भोंदुगिरीचे शिकार होतात. उदा. रावण संन्याशाचा वेश परिधान करून आला, त्यामुळेच सीता लक्ष्मण रेषा ओलांडून त्याच्या तावडीत येऊ शकली. ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि सोवळे हा वेशही याच प्रकारचा होता. त्यामुळे तुकोबांनी "शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।" अशाा शब्दात शेंडी आणि जानवे तोडून फेकण्याचा सल्ला ब्राह्मणांना दिला.

    ब्राह्मणांच्या पैसे कमावण्याच्या उद्योगात पुराणे आणि पोथ्यांतील कथा सांगणे याचा मुख्यत्वाने समावेश होता. नुसती पुराणे सांगून आणि ऐकून काहीच होत नाही. माणसात आंतरिक बदल झाला पाहिजे, हे ओळखून तुकोबानी पुराण कथनावर प्रहार केला. तुकोबा म्हणतात :
    जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।
    गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।
    अशा पोथ्या-पुराणे सांगण्याच्या या उद्योगाला तुकोबांनी थेट "गाढव ओझ्या"ची उपमा दिली आहे. हा आघात प्रचंड मोठा होता.

    तीर्थस्थाने हा ब्राह्मणांच्या कमाईचा आणखी एक भाग. तीर्थावर विविध प्रकारची व्रते आणि विधि करायला सांगून ब्राह्मण गोरगरिब आणि अज्ञानी लोकांकडून पैसे उकळित असत. त्यावर तुकोबांनी प्रहार केला. तीर्थस्थानांवर जाऊ नका. तेथे दगडधोंड्यांशिवाय काहीच नाही. तीर्थांवर तुम्हाला देव भेटणारच नाही. देव हा संत-सज्जनांमध्ये आहे. संतसज्जनांच्या सहवासात राहा, तुम्हाला देवाचा साक्षात्कार आपोआप होईल, असा उपदेश तुकोबांनी केला. "तीर्थी धोंड पाणी । देव रोकडा सज्जनी ।।" हा तुकोबांचा अभंग जिज्ञासूंनी जरूर पाहावा.

    ब्राह्मण स्वतः श्रेष्ठ समजत. इतर जातीतील कोणाही व्यक्तीचा स्पर्शही त्यांना वज्र्य होता. त्यासाठी ब्राह्मणांनी सोवळ्या-ओवळ्याची चाल लोकांत लावून दिली. ब्राह्मणांच्या या कथित श्रेष्ठत्वास तुकोबांनी "सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।" या शब्दांत सुरुंग लावला. देवाचा अंगिकार जेणे केला, तो प्रत्येक जण सोवळा म्हणजेच पवित्र आहे, अशी घोषणा तुकोबांनी केली. ब्राह्मणांचे जाती श्रेष्ठत्व तुकोबांनी अशा प्रकारे एका फटक्यात नष्ट करून टाकले.

    तुकोबांच्या या उपदेशामुळे ब्राह्मणांचे पोटापाण्याचे खोटारडे उद्योग बंद पडू लागले. त्यांचे जाती श्रेष्ठत्व धोक्यात आले. एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांवर चवताळून उठले.

    ReplyDelete
  36. या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत. हे अभंग देहू संस्थानने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. मूळ गाथ्यात हे अभंग जिज्ञासूंना पाहता यावेत यासाठी त्यांचा गाथ्यातील क्रमांक अभंगाच्या शेवटी दिला आहे.

    शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
    त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।।
    बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
    शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
    तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।।
    (अभंग क्रमांक ३९१०)
    अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.

    जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।१।।
    गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।ध्रु।।
    तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ।।३।।
    (अभंग क्रमांक ४३६९)
    अर्थ - तू पंडीत होऊन पुराण सांगतो आहेस, पण आपण कोण आहोत याचीच ओळख तुला नाही. गाढवाचे ओझे असलेल्या पोथ्यांची पाने तू उलटत राहतोस, पण गुरुला माहिती असलेली कोणतीही खूण (आत्मज्ञान) तू जाणत नाहीस. कुणब्याचे तुकोबा कोणतेही शास्त्रमत जाणत नाहीत, पण ते पंढरीनाथास विसरत नाहीत. (विठोबाला शरण जाणे हीच खरी आत्मखुण आहे. )

    तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।१।।
    मिळालिया संत संग । समर्पिता भले अंग ।।ध्रु।।
    तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।।२।।
    तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।३।।
    (अभंग क्रमांक ११४)
    अर्थ - तीर्थ स्थळावर केवळ दगड आणि पाणी आहे. खरा देव सज्जन माणसांमध्येच आहे. तीर्थावर स्नान करून कोणाचेही अंग भले म्हणजे पवित्र होणार नाही. संतांची संगतीत समर्पित झाल्यानेच ते भले होईल. तीर्थावर भाव फळतो, म्हणजे तीर्थावरील ब्राह्मणाला दक्षिणेच्या रूपाने फळ मिळते. संतांच्या सहवासात मात्र अडाणीही योग्य वळणावर येतात. तुकोबा सांगतात की, संत संगतीने पाप आणि ताप जातो. याची प्रचितीही लगेच येते.

    सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।१।।
    येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ।।ध्रु।।
    चुकला हा भार । तयाचिच येर झार ।।२।।
    तुका म्हणे दास । जाला तया नाही नास ।।३।।
    (अभंग क्रमांक ४२२७)
    अर्थ - सोवळ्या ओवळ्याचे ढोंग पसरवू नकोस, कारण ज्याने देवाचा अंगिकार केला आहे, तो सोवळा झालेला आहे. इतरेजण (जे देवाचा अंगिकार करीत नाहीत असे) दुर्जन असून केवळ पोट पोसण्यासाठी भोजन करतात. जो देवाचा अंगिकार करीत नाही त्याला जन्ममृत्यूची येरझार अटळ आहे. तुकोबा म्हणतात की, जो विठ्ठलाचा दास होतो, त्याचा कधीही नाश होत नाही.
    ...................................................................................................................

    ReplyDelete
  37. ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग - ३
    वेद प्रणित मार्गावर प्रहार
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर ब्राह्मण चवताळून उठवण्यास आणखी एक प्रमुख कारण म्हणजे महाराजांनी वेद आणि स्मृतींनी प्रतिपादिलेल्या भेदभावकारक मार्गावर केलेला प्रहार होय. आधीच्या लेखांत म्हटल्यांप्रमाणे प्रत्यक्ष वेदांमध्ये भेदभावाला स्थान नसले तरी नंतरच्या स्मृती ग्रंथांनी वेदवाङ्मयास ब्राह्मणांच्या पायाशी आणून बांधले. ब्राह्मणांना फुकट बसून खाण्याची सोय आणि स्त्री-शुद्रांना फक्त ढोर मेहनत करण्याचे कर्तव्य, अशी व्यवस्था स्मृतींनी निर्माण केली. कलियुगात ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत, असा सिद्धांत ब्राह्मणांनी रुढ केला. त्यामुळे ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कुठलाही धार्मिक अधिकार उरला नाही. त्यांनी फक्त ब्राह्मणांची सेवा करायची. या विषारी व्यवस्थेविरुद्ध तुकोबांनी बंड पुकारले.

    वेदांचे करायचे काय?
    वेदप्रणित धर्माचा भारतीय जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, वेदांना नाकारणारे पंथ पाखांड ठरतात. उदा. वेदप्रमाण्य नाकारल्यामुळे महानुभाव पंथाला मधली अनेक शतके जवळपास अज्ञातवासात काढावी लागली. अशा परिस्थितीत वेदांचे करायचे काय? असा प्रश्न तुकोबांसमोर होता. तुकोबांनी वेदप्रमाण्यावर कोणतेही भाष्य न करता, भेदभावावर प्रहार केला. तसेच वेद वेद काय करता, खुद्द वेदांनीच विठ्ठलाची महती गायली आहे, असे सांगून ब्राह्मण धर्मावर कडी केली. ही मात्रा उत्तम लागू पडली. लोकांच्या झुंडी तुकोबांचा उपदेश ऐकायला येऊ लागल्या. तुकोबा त्यांना सांगत :
    वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला ।।
    विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।
    कर्मकांड सोडा. विठोबाला शरण जा आणि नामस्मरण करा. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, खुद्द वेदांनीच हे सांगितले आहे, असे तुकोबा या अर्भगात म्हणतात.
    तुकोबांच्या या मुत्सद्दीपणावर ब्राह्मण हडबडले. काय करावे, हे त्यांना कळेना. अशातच काही ब्राह्मण मंडळींनी तुकोबांचा अनुग्रह घेतला. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी प्रचार सुरू केला की, "नुसते भजन म्हटल्याने कुठे देव गवसतो का, त्यासाठी ब्राह्मणांच्या हस्ते अनुष्ठाने आणि इतर कर्मकांडे करणे आवश्यक आहे", असा प्रचार ब्राह्मणांनी सुरू केला. त्यावर तुकोबांनी ब्राह्मणांना थेट आव्हान देत म्हटले की,
    ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।
    तुकोबा म्हणतात, ब्राह्मणांना काहीच कळत नाही. नामस्मरणाने नक्की इश्वर भेटतो. नारायणाचे नाम घेणे हेच आचमन आणि संध्या होय. नित्य भजन हेच ब्रह्मकर्म होय.

    कोणत्याही प्रकारे अर्थ समजून न घेता, वेदमंत्रांची घोकमपट्टी करणाèया ब्राह्मणांना तुकोबांनी वेडगळ म्हटले. तुकोबा म्हणतात :
    वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।
    याच अर्भगात तुकोबांनी उच्छेद जाला मारगाचा असे म्हणून तुकोबांनी वेदमार्गाला पूर्ण पराभूत केले आहे.

    ब्राह्मणांच्या पोषाखीपणावर प्रहार
    कर्मकांडे नष्ट करायची असतील, तर ब्राह्मणांचे ब्राह्मणपणा ज्या बाबींवर अवलंबून आहे, त्यावर प्रहार करायला हवा, हे ओळखून तुकोबांनी शेंडी, जाणवे, सोवळे या बाह्य संकेतांवर जोरदार प्रहार केला. "शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।" या अभंगात तुकोबांनी केलेला प्रहार किती घातक होता, हे लक्षात येते. तुकोबा म्हणतात की, शेंडी आणि जाणवे यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील.शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तू खरा ब्राह्मण होशील.
    येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वेदप्रणित मार्गाचा उच्छेद करीत असताना तुकोबाराय नामस्मरणाचा सोपा पर्यायी मार्गही त्यासोबत देत आहेत.

    लेखात आलेले अभंग
    (या लेखात आलेल्या अभंग पंक्ती पुढील अभंगांतून घेतल्या आहेत. देहू संस्थानने छापलेल्या गाथ्यातून या अभंग संहिता घेतल्या आहेत. वाचकांच्या सोयीसाठी गाथ्यातील अभंग क्रमांक अभंगांच्या शेवटी दिले आहेत.)

    ReplyDelete
  38. ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।१।।
    लहान थोरासी करितो प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ।।ध्रु।।
    सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ।।२।।
    केशव नारायणा करिता आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ।।३।।
    नामे करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायी ।।४।।
    तुका म्हणे हे चि निर्वाणीचे शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगी ।।५।।
    (अभंग क्रमांक ४३५६)
    अर्थ : परब्रह्म हे नामामुळेच प्राप्त होते, हे वर्म ब्राह्मणाला कळत नाही. म्हणून माझी सर्व लहान थोरांस विनंती आहे की, त्यांनी नारायणाला मनी धरावे. श्रीपतीची आठवण मनात ठेवा ही माझी सर्वांना विनंती आहे. साधे पाणी पिताना केशव नारायणाची आठवण काढली की संध्या आणि स्नानादी कर्म होऊन जाते. भोजन करताना नामस्मरण केले की सर्व प्रकारची ब्रह्मकर्मे आपोआप पूर्ण होतात. तुकोबा सांगतात की, नामस्मरण हेच निर्वाणीचे शस्त्र आहे, म्हणून नामस्मरण करा.

    वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।१।।
    विठोबाचे नाम सुलभ सोपा रे । तरी एक सरे भवसिंधू ।।ध्रु।।
    जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ।।२।।
    तुका म्हणे विधी निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ।।३।।
    (अभंग क्रमांक ३१५)
    अर्थ - वेदांचे पठण करणा-यांनाही ते काय वाचित आहेत, हे कळत नाही. तसेच वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही इतरांना (स्त्री-शुद्रांना) नाही. वेद वाचण्यापेक्षा विठोबाचे नाम घेणे अधिक सुलभ आणि सोपे आहे. विठूनामाच्या स्मरणानेच भवसिंधू तरून जाता येईल. वेदांतील मंत्र-तंत्र जाणत्या लोकांनाही असाध्य आहेत, मग अज्ञानी लोकांची काय कथा? तुकोबा म्हणतात की, विठोबाच्या सोप्या नाम मार्गाने व्यर्थ विधिनिषेध सांगणारा वेदाचा मार्ग लोपला आहे. वेदाच्या मार्गाचा पूर्ण उच्छेदच झाला आहे.

    वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ।।१।।
    विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।ध्रु।।
    सकळ शास्त्रांचा विचार । अंति इतका चि निर्धार ।।२।।
    अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।३।।
    (अभंग क्रमांक ४०४९)
    अर्थ - वेदाने अनेक प्रकारची बडबड केली आहे. पण त्यातून त्याने एकच गोष्टशोधली. ती म्हणजे विठोबाला शरण जाणे आणि त्याचे नाम गाणे. सर्व शास्त्रांचा शेवटी हाच विचार आणि निर्धार आहे. तुकोबा सांगतात की, अठरा पुराणांत विठोबाला शरण जाणे हा एकच सिद्धांत आणि हेतू आहे.

    शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
    त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।।
    बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
    शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
    तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।।
    (अभंग क्रमांक ३९१०)
    अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.
    ........................................................................................................................

    ReplyDelete
  39. संत तुकाराम महाराज यांना वाचवायला स्वतः पांडुरंग का आला नाही ?असा प्रश्न मला पडतो
    ते नक्कीच पुण्यवान होते ,
    त्याचे उत्तर शोधायला गेले की मन म्हणते -
    देव असणेच शक्य नाही !
    कारण ते असते तर त्यांनी संत तुकारामांचे संरक्षण केले असते - खरे ना ?
    ब्राह्मण नीच होतेच , पण देवाने त्याना काहीच शासन केले नाही !ब्राह्मण प्रजेला लुबाडत होते पण
    देवानी ब्राह्मणाना काहीच शासन केले नाही - मग देव कसा असेल ?
    देव ही मानवनिर्मित कल्पना आहे हे नक्की !

    मुसलमान आले त्यांनी आपली मंदिरे पाडली , पण देव गाभाऱ्यातून आले नाहीत .
    ब्राह्मण शेफारले ते कोणामुळे - त्यांना राजाश्रय होता - आणि मुसलमान राजवट आली तरी त्यांनी हिंदूंच्या धार्मिक उतरंडीत दखल घेतली नाही - म्हणजेच हिंदू क्षत्रिय सरदार जहागीरदार यांनी एकप्रकारे ब्राह्मणाना संरक्षण दिले - आजही ३ % ब्राह्मणात पूजा अर्चा करणारे किती ?त्यावर जगणारे किती ? हा विचार केला तर सर्व समाजाच्या अगदी नगण्य असा वर्ग आज धार्मिक कृत्ये करतो आणि त्यावर आपले पोट भरतो - अनेक पिढ्या हा ब्राह्मण विरोध चालू आहे तरीही बहुजन समाज अजूनही या पुरोहित वर्गाला मानतो -
    आपण एक मोठ्ठी चूक करत आहोत - पुरोहित आणि ब्राह्मण असे वेगळे आहेत आणि ज्याना ज्याना वेद आणि श्रुती स्मृती याबद्दल राग आहे -त्यांचा राग हा पुरोहित वर्गावर आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच जातीय गैर समाज निर्माण होतात

    वेद काय आहे हे खुद्द ९० % ब्राह्मण लोकांनाच माहित नाही - कारण त्यांचा यावर विश्वासच नाही - त्यांनी आधुनिक जगाची आणि ज्ञानाची कास धरून त्यांनी आपला मार्ग निवडला आहे
    आज गेले अनेक वर्षे होम करणे आणि पूजा करणे याचे स्तोम सार्वजनिक गणपतीत वाढत आहे - त्याचा निषेध केला पाहिजे कारण आपण जर अनेक वर्षे या पुरोहित वर्गाविरुद्ध जनजागृतीचा प्रचार करत असाल तर आज सार्वजनिक रित्या गणपती उत्सवात अथर्वशीर्ष , होम , अभिषेक , तोरण बांधणे हे प्रकार कोणत्या जातीकडून केले जातात याचा आपण सर्व्हे केला तर काय दिसते ?

    आपण इतके मोठ्ठे लेख लिहित आहात तर , आपण साधे पोस्टर तयार करून मूकपणे सार्वजनिक गणपतीत या वेदाधीष्ठित पठणाचा जाहीर निषेध का करत नाही ?आज गणपती विसर्जन हौदात करा असा प्रचार चालतो - त्याच्या शेजारी कर्मठपणे वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करा असाही प्रचार शांततेने चालतो - दोन्हीही पक्ष शांततेने आपला प्रचार करत असतात - तसेच आपणही पोस्टर वापरून सार्वजनिक गणपतीत आराशित आणि एकूण वातावरणात कर्मठ विचारांची चिरफाड करू शकाल - दगडूशेठ लालबाग अशा मनाच्या गणपतीसमोर जे होमहवन चालते त्याला प्रोत्साहन देणारे कोण आहेत ?हे स्तोम का वाढत आहे ?याला पोसणारे कोण आहेत ?हे असेच सार्वजनिक बैठक लाभून विस्तारत गेले तर या वेदावर रचल्या गेलेल्या सामाजुतीना पसरवणारे कोण ?आज हजारो गृहिणी अथर्व्श्र्शाचे पारायण करतात त्याचा आपण जाहीर निषेध का करत नाही ?
    पुरोहित वर्ग हा नेहमीच लोचट असतो आणि धार्मिक बाबतीत अगदी पूर्ण आश्रिताञ्च्या सारखा वागणारा असतो - त्यामुळे त्यांचे महत्व वाढवायचे का कमी करायचे ते बहुजनांनी ठरवायचे आहे - आणि बहुजानानीच सार्वजनिक गणपती हे एक उत्तम व्यासपीठ मानून अशा गोष्टींचा जाहीर

    ReplyDelete
  40. हा विचार फारच विचार करायला लावणारा आहे
    जसा प्रत्येक मराठा हा आज काही रोज तलवार ढाल घेऊन बाहेर पडत नाही किंवा हिंसा हा काही आज जीवनाचा स्थायीभाव असू शकत नाही म्हणजेच मराठा वर्गाचे क्षत्रियत्व काळा प्रमाणे नवीन अर्थ घेत तगले आहे - काय आहे तो अर्थ ?
    जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे आक्रमक होत त्या समजुतींचा बुरखा फाडून सत्य समाजासमोर आणले पाहिजे - हा तो क्षात्रधर्म आहे - आज हजारो बहुजन समाज सार्वजनिक दगडूशेठ गणपती आणि लालबाग चा गणपती इथे होमहवन करण्यात पुढे दिसतो , हजारोनी नारळाची तोरणे बांधली जातात सहस्त्रावर्तने करण्यात बहुजन समाज स्वतःला धन्य मानतो - तसे नसेल तर आज इतक्या पहाटे हजारोनी स्त्रिया श्रद्धेने मंडपात जमणे शक्य नाही - त्या सर्वच नक्कीच ब्राह्मण नसतात !

    मुख्य विचार हा मांडायचा आहे की हजारो वर्षे पुरोहित वर्गाकडून जी समाजाची पिळवणूक होत आहे ती थांबली पाहिजे - पण तसे न घडता , या पाठनाना सार्वजनिक स्वरूप देण्यात एक विशिष्ठ वर्ग यशस्वी होत आहे ,पुणे फेस्टिव्हल किंवा अनेक नावाने आज परत परत कालबाह्य म्हणून एकीकडे हिणवली गेलेली मूल्येच डोक्यावर उचलून धरली जात आहेत - नवस बोलले जात आहेत -याला कोण आधार देत आहेत ? ब्राह्मण ? नक्कीच नाही !
    मग कोण ?
    सार्वजनिक मंडळांचे सूत्रधार ! त्यांचे संस्कार वर्ग घेतले पाहिजेत - आपल्याला सार्वजनिक जीवनात पुरोहीतवर्ग जर मागच्या दाराने प्रवेश मिळवू बघत असेल तर ते थांबवले पाहिजे !
    स्त्रियांचा यात फार मोठा हात असला पाहिजे !धार्मिक रुढींचे पालन किंवा उच्चाटण करण्यात खरेतर स्त्रियांचीच भूमिका निर्णायक असते , पण यातले काहीच घडत नाही -
    सर्व साधारणपणे हिंदू धर्मात सर्व पूजा अर्चा ही कौटुंबिक पातळीवर असते , देव हि कल्पना आपल्याकडे कुटुंब पातळीवर रुजते फुलते आणि बहरते , म्हणूनच आपले सर्व सन हे कौटुंबिक आहेत - कालबाह्य झाली तरी आजही वट पौर्णिमा ,हरतालका या कौतुम्बिकच मानल्या जातात , फक्त गणपती हा एकाच देव सार्वजनिक झाला आहे , आणि काही प्रमाणात , नवरात्र !
    त्यामुळे या सार्वजनिक समारंभात परत परत जर वेदाधीष्ठित विचार रुजणार असतील तर त्यांचे वेळीच उच्चाटन करणे हे जागृत सामाजिक जाण असलेल्या वर्गाचे मुख्य काम आहे - मग तो ब्राह्मण असो वा बहुजन !पण दुर्दैवाने यातले काहीच होताना दिसत नाही - संत तुकाराम यांची चर्चा करताना वसवसून ब्राह्मण वर्गावर टीका करणारा वर्ग दगडूशेठ गणपतीला तोरणे बाधण्यात सर्वात पुढे दिसतो आणि होमहवन करण्यात हातभार लावत असतो !
    आज समाजप्रबोधन हा विषय फक्त सावित्रीबाई आणि म फुले , अण्णाभाऊ साठे अशी नावे घेत थांबतो - त्यांच्या पुतळ्याच्या पुढे तो विचार चार पावलेही जात नाही - आणि १० - २० रुपयांच्या हारावर त्याची लोकप्रियता संपते ! हा काळाचा महिमा म्हणावा का ब्राह्मणी विचारांचा विजय मानावा तेच समजत नाही - शेकड्यांनी संपणारी नारळाची पोती आणि कंठशोष करत म्हटले जाणारे मंत्रोच्चार सार्वजनिक रूप घेत आधुनिकतेची कास धरणाऱ्या मराठी माणसास जणू खिजवत असतात असे वाटते - हे कसे घडत गेले त्यांना कोण पाठींबा देते ? त्याचा वेळीच बिमोड का होत नाही ?

    ReplyDelete
  41. इतिहास मागास या चर्चेत अनेकांनी भाग घेत आपली मते मांडली आहेत - त्यात संत तुकाराम यांच्या निमित्ताने ब्राह्मण वर्गावर हल्ला करायचा एक कार्यक्रम राबवला जात आहे असे दिसते , त्यासाठी निमित्त काहीही चालते अशी स्थिती आहे पुरोहित आणि ब्राह्मण अशी गफलत होत आहे हेपण समजून घेतले पाहिजे
    शेवटच्या २ प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत
    पुरोहित वर्गाला आजच्या काळात कोण आधार देत आहे ? हे अभ्यासले पाहिजे , कारण याच पुरोहित वर्गाने संत तुकारामांचा बळी घेतला , संत ज्ञानेश्वर आणि भावंडाना जगणे मुश्किल केले ,त्या पुरोहित वर्गाला सार्वजनिक गणपतीत फारच बरकतीचे दिवस येतात याचे रहस्य काय आहे ? शेवटून दुसऱ्या दिवशी केली जाणारी सत्यनारायणाची पूजा हि आवश्यक आहे का ?श्रावणात रिक्षावाले पूजा करतात ती काय दर्शवते ?

    अथर्वशीर्ष म्हटल्याने काय होते ?त्याचे मराठीत भाषांतर पाहिले तर अगदीच हास्यास्पद आहे आणि अथर्वशीर्ष जर वेदाना प्रमाण मानत असेल तर त्याची सार्वजनिक वाचनाची हौस का लोकप्रिय होत आहे ? खरेतर त्याचा निषेध झाला पाहिजे , पण नवरात्र आणि गणपती या उत्सवांच्या ईवेन्ट म्यानेजमेंट मधून या कल्पना वेगाने फोफावत गेल्या आणि पुरोहित वर्गाचे फावत गेले

    याचे उत्तर मला असे सुचते ते असे - लोकाना सुटसुटीत संस्कृत वाचनाची पाठांतराची अजूनही हौस आहे , जसे मुसलमान समाजात आज अरेबिक भाषेतून अल्लाची प्रार्थना करण्याची ओढ आहे तसेच तथाकथित हिंदू धर्मात आज संस्कृत पठणाची लोकप्रियता वाढते आहे

    मी ब्राह्मण हा शब्द मुद्दाम टाळत आहे कारण त्यामुळे अधिकच गैरसमज वाढतात , या सणांचे ओझे झालेला ब्राह्मण वर्गच माझ्या पहाण्यात जास्त आहे त्यांना सुखाची व्याख्या ठरवताना धर्म बुडाला का तरला याची फिकीर नसते हे सत्य आहे - याच ब्राह्मणांनी इंग्रज येताक्षणी त्यांची भाषा आणि बोलणे आत्मसात केले होते हे इथे विसरता कामा नये - मग या व्यतिरिक्त असा कोणता वर्ग आहे जो या सार्वजनिक उत्सवात पुरोहित वर्गाचे महत्व वाढवत नेत असतो ? त्याचे उत्तर आहे - या उत्सवाचे मुख्य जे जास्त करून बहुजन असतात तेच या गोष्टीना जबाबदार ठरतात -
    खरेतर हा सार्वजनिक उत्सवाच नाही !
    प्रत्यक्ष कार्य असे फार कमी झाले आहे आणि मिरवणे हा भाग जास्त होत गेला आहे , मोठमोठ्या कंपन्यांकडून या उत्सवाना लोकाश्रय म्हणण्यापेक्षा रेडीमेड पैशाचा पुरवठा होतो त्यामुळे सर्व सार्वजनिक जीवनातील उत्स्फूर्तता घटत जाउन सर्व गोष्टी पैशामुळे आयोजता येतात असे गणित तयार होत गेल्याने - संस्कृत पठण , होमहवन ,बाल वर्गाचे आणि स्त्रियांचे अथर्वशीर्ष पठण असे कार्यक्रम तयार झाले , नवस हि कल्पना खरेतर अंधश्रद्धा मानली पाहिजे पण त्याला अफाट जनाधार लाभत गेला , यातून परिणाम काय साधतो ?
    पूर्वीच्या कोणाही नेत्याला वा सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या व्यक्तीला आजचा गणेशोत्सव मान्य होईल का ? म फुले , लो टिळक याना आज काय वाटले असते ?

    ReplyDelete
    Replies
    1. हे सार्वजनिक गणेश उत्सवाला आलेले महाभयानक रूप पाहून बाळ गंगाधर टिळकाने तर ताबडतोब आत्महत्या केली असती!

      Delete
  42. तुकारामांच्या नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू.........

    तुकारामांनी आपल्या एका वचनात नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू गाठल्याचे आढळते.त्यांचे ईश्वराविषयक चिंतन किती विधायक होते, याचा निर्णायक पुरावा म्हणून या वचनाकडे पाहता येईल. देव आहे असे वाणीने वदवावे, पण मनामध्ये मात्र देव नाही असा अनुभव घ्यावा, या अर्थाने त्यांचे हे वचन भल्या भल्या भाष्यकारांना आव्हानही देईल आणि झुकांड्याही देईल, असे आहे. तुकाराम चार्वाकांसारखे आणि त्यांच्या इतके निरीश्वरवादी होते, असे या वचनाच्या आधारे मला मुळीच म्हणायचे नाही. तरीही त्यांच्या ईश्वर विषयक चिंतनात जात परंपरागत विचारांपेक्षा फार फार वेगळी आहे, एवढे मात्र नक्कीच म्हणणे भाग आहे.

    सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अशा ईश्वराचे अस्तित्व आवश्यक असले, तरी जो स्वतःच्या परिपक्व विवेकाच्या आधारे झुंजू शकतो, त्याला आपल्या या विवेकाखेरीज वेगळा असा कोणी ईश्वर प्रत्यक्षात अस्तिवात नसतो, हे स्वतःच्या मनात अनुभवता येते. पितळेच्या वा पाषाणाच्या मूर्तीत ईश्वर नाही, असे ते सांगतात, याचा अर्थही ते ईश्वराच्या स्वरूपाकडे फार वेगळ्या दृष्ठीने पाहतात, हाच आहे. देव नाही असा अनुभव मनात घ्यावा, या वचनाच्या उच्चाराद्वारे तुकारामांनी सत्याविषयीचे चिंतन तर अत्युच्च स्तरावर नेलेच, पण ते सत्य मांडताना उच्च कोटीचे धैर्यही प्रकट केले, असेच म्हटले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।। ४२२६.१

      Delete
    2. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
      तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
      मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
      ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥
      दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥
      तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥ ६॥ ३४७

      तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।। ११४.१

      देवाची पूजा हे भूताचे पाळण ।। ३८५४.१


      Delete
  43. अनानिमास सर , ९.३४ ए एम -
    आपण या विचारांबाबत अधिक दुजोरा देण्यासाठी आधी जसे तुकारामांचे अभंग संगतवार दिले आहेत तसे या विचारांशी जुळणारे अभंग आपण दिले तर आनंद वाटेल. आपण अतिशय महत्वाचा विचार गुंफला आहे ,आणि मला तरी अतिशय उत्सुकता लागून राहिली आहे कि चार्वाकाप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यानी पण कधी जर विचार केला असेल तर तो त्यांच्या अभंगातून तो नक्कीच प्रकटला असणारच !
    कृपया आपण त्याचा संदर्भ दिलात तर फार बरे होईल
    आधुनिक तत्त्ववेत्ते बर्त्रोंड रसेल यांचे विचार आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विचारही जुळत असतील - आपण तसा काही दाखला दिला तर फारच महत्वाचे ठरेल
    तसेच तुकाराम महाराज यांनी कधी कलाक्रीडा याबाबत आपली मते मांडलेली दिसत नाहीत , आपण याबाबत काही मार्गदर्शन कराल का ?
    आपण अतिशय मोलाचे भाष्य केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन !

    ReplyDelete
  44. खरेतर सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने आज आपण जे बघतो ते विचित्र आहे
    संत तुकाराम जर चार्वाका प्रमाणे इतके स्पष्ट होते तर त्यांच्या इतर भावूक अभंगांचा गवगवा का झाला , वारकरी पांडुरंग भक्तीत का अडकले हे कुणी सांगेल का ?
    वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे म्हणणाऱ्या संताना नेमके काय सांगायचे होते ?
    आजचा वारकरी संप्रदाय हा एक सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीय ताकद बनत आहे हे योग्य आहे का ?असे अनेक विचार मनात येतात
    मुळात मुसलमानी आक्रमणाची वावटळ घोंघावत असताना निवृत्तीचे तत्वज्ञान कसे रुजते ?
    पांडुरंग आणि त्याची निखळ भक्ती आणि मानसपूजा यात विचारांपेक्षा भावनांचेच
    प्राबल्य दिसते का ? परमेश्वराची आळवणी हे भक्तीचे तंत्र , किती भ्रष्ट कल्पना वाढीस लावत असेल त्याचा विचार कधी झाला आहे का ? सर्व भार जर पांडुरंगावर टाकून भजन कीर्तनात दंग होण्यात पुरुषार्थ असेल तर या सर्व " खेळ मंदियाला वाळवंटी काठी "या उक्तीचा अर्थ काय लावायचा ?
    आपण समर्थनार्थ संत तुकाराम यांना असे म्हणायचे नव्हते , तसे सांगायचे नव्हते असे म्हणत असतो - पण माझ्यामते अभंग रचना हि तत्व चिंतनातून किती आणि भावनेपोटी किती झाली याचाही अभ्यास झाला पाहिजे - हे मी संत तुकाराम आणि इतर संतांविषयी असलेल्या आदरापोटीच म्हणत आहे - कारण
    अनेक वेळेस त्यांच्या रचना अगदी प्रासंगिक वाटतात
    आता हेच बघाना - "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वहावा - " असे संत ठाम पणे म्हणतात याचा अर्थच ते वेद मानतात असा घ्यायचा का ? ते तर शक्य नाही , मग वेद प्रामाण्य या गोष्टीविषयी त्यांचे विचार क्रांतिकारक होते हेपण आपण बघतो , अशा वेळी वैचारिक गोंधळ वाढत जातो हे मात्र खरे !

    ReplyDelete
  45. संत तुकारामांचा चमत्कारांवर विश्वास नव्हता असे आपण म्हणता
    संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली असे आपण मानता का ? त्यांनी रेड्याच्या मुखारून वेद म्हणवले हे खरे आहे का ? संत तुकाराम यांचे याबाबत मत काय होते ?
    संत तुकाराम हे निष्ठुर विवेकवादी होते असे आपले मानणे आहे का ?त्यांच्या आयुष्यात सगळीकडे शिवाजी दिसू लागले हि सांगितली जाणारी कथा खरी आहे का ?
    शिवाजीकडे त्यांचे जाणेयेणे होते का ?किंवा शिवाजी त्यांच्याकडे जातयेत होता का ?

    ReplyDelete
  46. कोणाचेही आणि कसलेही चमत्कार हे अमान्य करण्याच्या लायकीचेच असतात. मग ते ज्ञानेश्वर असोत, की तुकाराम असोत, की रामदास असोत, की साईबाबा असोत, कोणीही विवेकनिष्ठ माणूस कदापि चमत्काराला मान्यता देणार नाही!

    ReplyDelete
  47. चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-

    कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
    तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
    दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
    नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
    नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
    नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
    नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
    नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
    नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
    नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
    नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
    आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
    नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...