Friday, November 29, 2019

शिक्षणाकडे पहायचा दृष्टीकोन



शिक्षण हे प्रगल्भ, विवेकी, कल्पक, उद्यमी आणि भविष्यवेधी नागरिक घडवण्यासाठी असते. मानवाच्या जीवनातील शारिरिक कष्ट कमी करुन त्याचे जीवन अधिकाधिक सुखकर कसे बनेल यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करणारे व त्यातून संपत्तीनिर्मिती व अर्थार्जन करणारे नागरिक निर्माण व्हावेत हा शिक्षणाचा व्यावहारिक उद्देश्य झाला. तो महत्वाचा आहेच. प्रत्येक व्यक्ती ही अंतत: भांडवलदारच असते. श्रम, बौद्धिक क्षमता, कल्पकता, ज्ञाननिर्मितीच्या क्षमता हे त्याचे प्राधान्यक्रमाचे भांडवल असते. या अमूर्त भांडवलाला प्रत्यक्ष म्हणजेच मुर्त भांडवलाची आवश्यकता असते हे काही प्रमाणातच खरे असते. मुर्त भांडवलाच्या अभावात अथवा कमतरतेतही ते निर्माण करता येऊ शकते. पण अमूर्त भांडवलाच्या अभावात मूर्त भांडवल उभे राहत नाही. भांडवल त्यालाच म्हणायचे जे अधिकाधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी पायाभूत ठरते. हे व्यावहारिक उद्देश्य झाले. पण त्याहीपलीकडॆ ज्यामुळे मानवी ज्ञानाच्या, विचारांच्या आणि जाणीवांच्या कक्षा रुंदावतील अशी निर्मिती करण्याची योग्यता असलेले नागरिकही निर्माण करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू झाला.

साधनस्त्रोत वा आर्थिक भांडवल व त्याची निर्मिती हे दुय्यम असते हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे. प्रगल्भ नागरिकांच्या अभावात आर्थिक भांडवल अथवा साधनसंपत्ती कितीही असली तरी संपत्तीची निर्मिती होणार नाही. संपत्ती येथे पुन्हा मूर्त आणि अमूर्त या आधारावर मोजली पाहिजे. ते मोजण्याचे मापदंड अथवा त्याचे (व्यवहारात निरुपयोगी असले तरी) एक चलन असले पाहिजे. त्याखेरीज आपण कोठे आहोत याचे भान येणार नाही हे निश्चयाने समजावून घ्यावे लागणार आहे.

आज जग पुढे आहे अथवा विकसीत आहे असे आपण मानतो ते आपल्या व्यावहारिक ज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे. पण या व्यावहारिक ज्ञानाचा जरी विचार केला तर त्यामागे मुलभूत ज्ञानाने/विज्ञानाने पुरवलेल्या भरभक्कम पायाचा आधार आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. शिवाय त्या मुलभूत ज्ञानाला उपयोजित ज्ञानात बदलवणा-या आणि मानवी जीवन सुखकर करणा-या असंख्य व्यक्तींनी योगदान दिले आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. व्यापारी/उद्यमी/सेवक वर्गाने ते सर्वसामान्यांपर्यंत ते ज्ञान उपयुक्त स्वरुपात पोहोचवले त्याचेही योगदान विसरता येणार नाही.

या सर्वांनी मिळून आजची व्यवस्था बनवली आहे. राज्यव्यवस्था त्यात कधी प्रोत्साहनात्मक तर कधी अवरोधात्मक भूमिका बजावते. किंबहुना भांडवल निर्मिती होणार की नाही हे शासकीय धोरण ठरवते. शासन कोणती विचारधारा पाळते यावर ते अवलंबून असते. म्हणजे शासनही कधी भांडवलदार बनून जाते तर कधी भांडवल निर्मितीला खिळ घालते.

पण प्रत्येक व्यक्ती भांडवलदार आहे आणि त्याची निर्मिती हे त्याच्या भांडवलाची उपज आहे हा विचार आम्हाला सुचलेला नाही. शिक्षण हे व्यक्तीच्या भांडवलात भर घालणारे असले पाहिजे हे आम्ही समजावून घेतलेले नाही. मूर्त भांडवल हेच श्रेष्ठ भांडवल आहे हे आम्ही ओळखलेले नाही. भांडवलाची अधिकाधिक निर्मिती प्रत्येक भांडवलदार म्हणजे प्रत्येक व्यक्ती करू शकते याची जाणीव नसल्याने आमची शिक्षणाची रचना फसलेली आहे.

मानवाच्या मनाच्या जाणीवा, विचार, ज्ञानाच्या कक्षा आणि दिशा रुंदावणारे नवे ज्ञान निर्माण करणारे, मूळ भांडवलाचे श्रोत निर्माण करणारे, व्यवहारात त्यांच्या निर्मितीला तसे दुय्यम स्थान असणारे दिशादर्ही, नवदिशानिर्माते समाजाला आवश्यक असतात. आज आम्ही ही निर्मिती समाजावरच ऐच्छिकपणे सोडून दिली आहे. भारतात तत्वज्ञान हा विषय सर्व महाविद्यालयांत शिकवला जातो. पण आम्ही किती नवतत्वज्ञान सांगणारे अथवा जुन्याच तत्वज्ञानाचा नवीन दिशादर्शी विकास करणारे तत्वज्ञ निर्माण केले हे पाहिले तर निराशाच पदरी येईल. तीच बाब शास्त्राची. तीच साहित्याची आणि कलांची. उलट अनेक जुन्या कला मरत चालल्या आहेत. नवीन निर्माण करने दुरच!

मानवी मन सृजनात्मक होण्याची प्रक्रिया जेथे अडखळू लागते, थांबते तेथे समाजाचा मृत्यू जवळ आलेला असतो. समाज झोंबीप्रमाणे उथळ भावनोद्रेकांत व्यस्त होऊ लागतो. येथेच मुर्त - अमूर्त भांडवलाची निर्मिती खुंटते आणि तो समाज वेगाने दिवाळखोरीकडॆ वाटचाल करू लागतो.

प्रत्येक व्यक्तीत एक विशिष्ट भांडवल दडलेले असते. ते बाहेर काढणे व त्यालाच विकसनशील बनवत त्यातील उच्च दशा गाठायला सहाय्य करणे हा शिक्षणचा मुलभूत उद्देश हवा. ज्या देशात अशा भांडवलदारांची अधिकाधिक निर्मिती होते तोच देश अथवा समाज ऐहिक आणि मानसिक भांडवलाने ख-या अर्थाने समृद्ध आणि प्रगत होऊ शकतो. आज जगात असा एकही देश नाही. काही बरे तर काही वाईट म्हणता येईल. पण आपण बौद्धिक भांडवलाचे चलनच बनवले नसल्याने ही भावनाही केवळ भावनात्म आहे असे म्हणता येईल. याची अनेक उदाहरणे देता येतील.

श्रम हे भांडवल आहेच पण त्या भांडवलाचीही बौद्धिक भांडवलासारखीच दशा आहे. त्याचे मूल्य काय आणि ते कसे ठरवायचे याचे उत्तर उपयोगितेनुसार दिले जाते. किंबहुना उपयोगितेचा सिद्धांत पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्याच वेळीस श्रमिकाला त्याच्या भांडवलाचे उन्नयन करण्यात कोणत्या सामाजिक/राजकीय/शैक्षणिक अडचणी आहेत यावर विचार झाला पाहिजे. उदाहणार्थ शेती-कामगारही श्रम-ज्ञान भांडवल वृद्धींगत करू शकतो. त्याला शाळेतच जायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पण तशीही व्यवस्था आमच्या शिक्षणपद्धतीत आहे काय हा एक प्रश्नच आहे. शिक्षणाच्या आणि दृष्टीकोनाच्या अभावात कोणतेही कौशल्य आणि व्यक्तीच्या भांडवलात भर पडणार नाही, याची उत्पाकता आणि उत्पन्न वाढणार नाही. त्याचे उपजत भांडवल, कोणत्याही क्षेत्रातील असले तरी ते अनुत्पादक किंवा तोट्याचे ठरणार हे उघड आहे. म्हणजेच व्यक्तीचे उपजत भांडवल वाढवत नाही, किंबहुना त्याचा संकोच करत शेवटी मारून टाकते ती शिक्षणव्यवस्था कुचकामी आहे हे उघड आहे.

यावर आपण विविधांगांनी चर्चा करणार आहोत. आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

Thursday, November 21, 2019

मनातल्या मनात!

मी सुखात आहे.
पांघरुणात तोंड खुपसून
मनसोक्त हसुही शकतो
आणि रडुही.
अगदी रागच् आला
तर आकांडतांडवही करु शकतो
किंवा मस्त डांसहीे करतो
मनातल्या मनात!
प्रिये,
बरे झाले
तू मुक्त झालीस
मी सुखात आहे
तुला श्रद्धांजलीही वाहता येते
मनातल्या मनात
पांघरुणात तोंड लपवून असतांना...
मी मूक्त स्वतंत्र आहे
मनातल्या मनात!

Wednesday, November 20, 2019

Sonawani's revolutionary caste theory


 Sanjay, unlike Dr. Babasaheb Ambedkar, argues that social inequality is not `inherent` in the caste system in India and it never existed on the basis of anyone`s occupation. He also argues that neither its origin, also is Vedic nor the `caste` is sub-division of `Varna`, because they are not equivalent, they are separate and distinct social orders.

Virtually, I am no authority on the topic of the book of Sanjay Sonawani, a Scholar of his own kind, who in spite of being a scholar is a social activist with social commitment, who believes in not only researching and depicting the past but deconstructing it in the interest of humanity in a humanitarian way which would lead to make the world itself, beautiful.
          I am hence interested in his present work only with this perspective, as a  layman & as an activist engaged in the Socio-cultural-literary movement over the last five decades.
          It is the caste system in this Geography called nation, which according to the great scholar & reformer Dr. Babasaheb Ambedkar, would not qualify itself as the `nation` unless it would annihilate the caste, a system which negated  the huge population to be the human with human dignity & equal rights and status.
                   It was the analysis of Dr.Babasaheb Ambedkar that the freedom would not qualify itself to be the freedom for the population whose right to education, religion, worship and free expression were denied for thousands of years, thereby denying human rights and placing them into the cage of the caste system & this nation would also not qualify itself to be the nation in absence of fraternity which is unattainable unless the caste system is fully abolished.
          Casteless & Classless, a society based on humanity alone is the dream  and object of Social Reformer Dr. Babasaheb Ambedkar, so also was the dream of Gautama Buddha, Mahatma Gandhi & the Saints & seers also who taught the same fraternity, crossing the caste & class lines. Abolition of this exploitative caste system which is the greatest barrier in achieving human dignity for the larger population in this social system hence is the agenda of all reform movements. But since it only is paying and paid in the past, all the dividends, politically, economically, socially, culturally to those whose vested interests are secured being at the helm of affairs of this system is well protected collectively, even by those who are in utmost need to abolish it, but would not do it.
          Many scholars have analysed this phenomenon including Dr. Dhurye, Dr. Babasaheb Ambedkar, in modern contemporary times. But the perspective of Sanjay Sonawani in his book differs from his predecessors. He has his own analysis with a new perspective to explain this phenomenon, reconstituting the origins of caste.
          Sanjay Sonawani do not subscribe the view that caste is an ancient phenomenon. In his opinion, the loss of mobility in the caste system cannot be ascribed to a particular authority or superior caste in the hegemony.
          His approach is to restore the egalitarian atmosphere which he believes existed in some period of history.          
          His basic premise is totally different than his predecessors who are inclined to eradication or annihilation of caste due to its exploitative nature and he has also opposed the previous scholar’s views. He is not inclined to hold any specific authority or caste as their imagined and enforced model: rather he argues that the system evolved due to socio-economic circumstances and reasons, which is a totally different analysis of his own, not borrowed on the basis of any established school of thought or theories of the origin of caste.
          Various known existing theories regarding the origin of caste in India ascribe phenomenon to various factors. The Racial theory explains need of seperate existence of Indo-Arayans, depicted through `Varna` for the higher class and `Dasa` or `Dasue` for lower strata.
          The Political theory has its presupposition that the caste system is a clever device invented by the Brahmins to keep them at the highest point of the ladder in the hierarchy. `Jati` according to them stand for sub-division of `Varna’`
          The Occupational theory explains and insists that the origin is found in nature & quality of work performed. Better professions performers were regarded as better & respectable than those engaged in so-called `dirty` professions.
          The Traditional theory ascribes the origin to the divinity.
          The Guild theory ascribe the origin to the `forces` and not to `divinity` or specific `higher` caste. According to this theory, it is the interaction of tribes, guilds & religion, which has the hereditary elements inbuilt.
          Religious theory views the caste originating from religious principles, custom’s, certain prohibitions, worshippers of particular  deity differentiating them from others, culminating the inclusive system in the `exclusion` of others, creating the feeling of `we` & `them`.
          The Evolutionary theory believes that the caste did not come into existence as creation of any specific group of people but is a result of a long process of social evolution & number of factors contributed to it, like hereditary occupation to keep the Brahmins as `pure` lack of control of the state power, belief in reincarnation and Karma, idea of sacramental, clash of cultures, races, colour prejudices, conquers, economic & administrative policies followed, static nature of society, rural social structure. However, the question remains whether social structure itself is a caste structure or it created circumstances for the evolution of caste. The caste system is not the Indian phenomenon alone. Medieval Europe`s feudal system also has the similar nature to certain extent. In India it took the ugly shape of untouchability.
         
          `Caste` in India today is not what it was once and assumed different forms. Still according to Sanjay Sonawani until the Hindus find their own roots they will never appreciate their glorious liberal past.
         
          Sanjay, unlike Dr. Babasaheb Ambedkar, argues that social inequality is not `inherent` in the caste system in India and it never existed on the basis of anyone`s occupation. He also argues that neither its origin, also is vedic nor the `caste` is sub-division of `Varna`, because they are not equivalent, they are separate and distinct social orders.
          His argument is that the `Varna` has order and religious sanction and inequality is its product, whereas the caste is a natural, flexible occupation-based system without any religious sanction.
          According to him the caste is non-religious phenomenon.  His analysis may resemble somewhat with Evolutionary theory but not exclusively is the extension of it.
          His appeal to respect castes as occupations that have together built this nation, may go well with Dr. Bhalchandra Nemade`s depictions but may not go well with the critics of Dr. Nemade like Dr.Nagnath Kottapalle and many others who follow Dr. Babasaheb Ambedkar`s analysis & doctrine of annihilation of caste, which  then would not qualify and allow this Geography & polity to stand as a nation, in absence of the element of fraternity in the caste system.
         
          Design of Sanjay Sonawani in this book  is to separate Hindu religion from the Vedic religion and give `Hinduness its original liberal face, which according to him has been contaminated with Vedic influence, may also go well with certain sections of society who belongs to Non-Vedic, `Avaidic` tradition. But his appeal of removing Vedic influence to find ancient roots to revert them to their `original liberal religion` may not find takers in the camp of modern Neo-Hindutva brand of religion, since it is very much rooted in Vedic influence itself. However, his argument that the original Hindu religion is liberal may go well with them also since it is their basic premise that Hindu is a liberal religion but not minus Vedic influence, but along with Vedic influence. This book may generate a debate in this direction.
          His contention that the Aryan race theory has damaged the socio-religious order needs more attention and deeper understanding of it with further inquiry, and much attention, particularly in light of the modern day's efforts to disapprove and disown that theory and the efforts to prove that Aryans did not come from outside and whatever is inherited in this Geography is originally Aryan.
          Sanjay Sonawani`s this book hence is of much importance which may further trigger the academic & scholarly debate on this subject.
          However, his thesis, that the decline of the `Sherani’ (Guild) system and socio-economic crises responsible for gradually converting originally the mobile occupational  communities i.e. castes into the compartmentalised caste system of today, if acknowledged and approved by the scholars in this field of knowledge carry potential which may reshape the present discourse on this subject.
         
          Sanjay Sonawani, is challenging our understanding and common views held by us regarding this phenomenon, which is  mostly based on the interpretation and analysis of caste by Dr. Babasaheb Ambedkar. Sonawani carries different view than these scholars and differs with their analysis of origin of the caste system.
          Sanjay Sonawani`s basic premise that Hinduism  and Vedic religion is not one and the same and they are distinct realities, is also the view held by many but those many are not scholars, hence there is no authenticity to such views yet.
          But now since a scholar like Sanjay Sonawani,  as I have been made known, has attempted to express this belief in a systematic  manner, it may generate a debate over it and the debate if held studiously, scientifically in an academic manner and not emotionally and empirically may throw some new light  and Sanjay Sonawani may prove himself to be a new torchbearer for the society, on this subject.
         
          Let us hope so.
                            
                                                   - Dr. Shripad Bhalchandra Joshi
                                                      

(Preface to "Origins of the Caste System)

Saturday, November 9, 2019

अयोध्या निकाल : कटू पर्वाचा अंत!


अयोध्या निकाल : कटू पर्वाचा अंत!

अयोध्या निकाल : कटू पर्वाचा अंत!

सर्वोच्च न्यायालयाने सलग वहिवाटीला सर्वाधिक महत्त्व देत आपला निकाल दिला आहे. मुस्लिमांना ते सिद्ध करता आलेले नाही. त्याच वेळीस कडव्या हिंदुत्ववाद्यांना हेही सांगणे आवश्यक आहे की निकाल आपल्या बाजूने लागला म्हणून उन्माद करण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने रामाचे अस्तित्व मान्य करणारा निकाल दिलेला नाही. ते न्यायालयाच्या कक्षेतही येत नाही.
अयोध्यतील वादग्रस्त जागेवरील हिंदुंचा मालकी हक्काचा दावा मुस्लिमांच्या दाव्यापेक्षा अधिक सक्षम पुराव्यांमुळे सिद्ध होतो असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इतिहास, पुरातत्व अवशेष, प्रवासवर्णने, काव्य इत्यादि पुराव्यांचा तसेच आजवरच्या दावे आणि त्यावरील निर्णयांचा आधार घेतला आहे. हे दावे मशीद होती ते ठिकाण रामाची जन्मभूमी आहे की नाही यासाठी नसून या २.७७ एकर जागा नेमकी कोणाची यासाठी होता.
बाबराने रामजन्मस्थान पाडून त्याजागी मशीद बांधली असा सर्वसाधारण समज असला तरी १५२८-२९ मध्ये मीर बाकी (अथवा मीर खान) या बाबराच्या सरदाराने हे कृत्य केले असे बाबरी मशीदीतीलच शिलालेखावरुन स्पष्ट दिसते. असे असले तरी या जागेची अथवा मशिदीची सनद किंवा मालकीहक्काचे कागदपत्र अगदी मीर बाकीचे वंशजही नंतर तत्कालीन सत्तांना सादर करू शकले नव्हते. त्यामुळे मुस्लिमांची बाजू येथेच कमकुवत झाली होती.
हिंदुंकडेही काही कागदोपत्री पुरावा होता अशातला भाग नव्हता. त्यामुळे या जागेत सलगपणे वहिवाट कोणाची या कायदेशीर मुद्द्यावर हा वाद बव्हंशी आधारित असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. अर्थात यात बहुसंख्यावाद प्रभावी ठरलेला नाही असे म्हणणेही धाडसाचे ठरेल.
बाबरी मशिदीच्या खाली वास्तू होती, मशीद रिकाम्या भूखंडावर बांधली गेलेली नाही. पण मशिदीखाली जे होते ते मंदिरच होते काय किंवा असल्यास कोणाचे होते हे पुरातत्व खात्याने स्पष्ट केलेले नाही हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेच नोंदवले आहे. शिवाय पुरातत्व खात्याला मशिदीखालील जमिनीत मिळालेले अवशेष किमान १२व्या शतकातील आहेत. मशीद तर १६व्या शतकातील. मग मधल्या ४०० वर्षांच्या काळात तेथे काय होते हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मशीद बांधतांना मंदिराचे अवशेष वापरले गेले असे निश्चयाने म्हणता येणार नाही. असे असले तरी ती जागा रामजन्मभूमीच अहे अशी श्रद्धा तेव्हाही होती आणि तेव्हाही हिंदू मशिदीच्या नजीकच राम चबुतरा बांधून पूजा करत होते. ते १८५७ पूर्वी मशिदीच्या मुख्य घुमटासमोरील आवारातही पूजा करत होते.
१५ मार्च १८५८ रोजी मंदिर-मशीद वादामुळे लॉर्ड कॅनिंगने ती जागा जप्त केली पण हिंदू-मुस्लिमांचे पूजा आणि नमाजाचे अधिकार कायम ठेवले. बदल एकच केलेला की दोन समुहांत संघर्ष पेटू नये म्हणून बाहेरचे आवार आणि आतले आवार यांच्या मध्ये एक भिंत उभी केली.
याचाच अर्थ हिंदुंचा तेथील पूजेचा अधिकार ब्रिटिशांनीही अमान्य केला नाही. हिंदुंची पूजा बाह्य आवारात सातत्याने सुरू राहिली असली तरी मशिदीत मात्र सातत्याने नमाज केली जात होते असे दिसत नाही. उलट १९४९ च्या संघर्षात हिंदुंनी मशिदीच्या मुख्य घुमटाखाली राममूर्ती स्थापित केल्यापासून तेथे नमाज करणे पूर्णपणे बंद करून टाकले.
त्यानंतरही न्यायालयात १९६१ पासून वाद दाखल झाला असला तरी ताबाहक्क मात्र हिंदुंकडेच राहिला. भारतीय कायद्यानुसार कोणी दुसऱ्याने ताब्यात घेतलेल्या स्थावर मालमत्तेवर त्याचीच मालकी प्रस्थापित होते. आणि भारतीय कायद्यानुसार देवता, कंपनी, ट्रस्ट आदि कायदेशीर व्यक्ती मानल्या जातात. त्यामुळे जर राम-प्रतिमेचे तेथे प्रदीर्घकाळ अस्तित्व असेल तर ती मालकी रामाकडेच जाईल. निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला गेला कारण वादग्रस्त जागेचा ताबा व व्यवस्थापन त्यांच्याकडे द्यावे यासाठी ते रामाचे कायदेशीर प्रतिनिधी / व्यवस्थापक असल्याचे सिद्ध करू शकले नाही.
दुसरा मुद्दा आहे तो कायदेशीर प्रवाहीपणाचा. म्हणजे ब्रिटिशांनी एकाद्या दाव्याबाबत किंवा मालमत्तेबाबत (जप्तीसकट) जी तत्कालीन कायद्यांनुसार निवाडे केले ते सार्वभौम भारतातही कायम मानले जातील अशी तरतूद घटनेचे कलम ३७२ (१) आणि २९६ नुसार आहे. ब्रिटिशांनी ही जागा १८५८ साली जप्त केली होती. याचा अर्थ ही जागा आज भारत सरकारच्याच जप्तीखाली आहे असाही एक अर्थ काढता येतो असे सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे सुचवले आहे व या आधारावरच ब्रिटिश न्यायालयांनी दिलेल्या या जागेसंबंधीच्या निकालांवरही भाष्य केले आहे. वादग्रस्त जागेचा ताबा सध्या केंद्र सरकारकडे देऊन ट्रस्ट स्थापन करून या ट्रस्टचे व्यवस्थापन कायदेशीरपणे ट्रस्टींकडे सोपवावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा ताबा कोणत्याही वादीकडे देण्यात आलेला नाही हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
पुरातत्वीय उत्खननात मशीदीच्या खाली कोणतीही वास्तू सापडली तरी त्यावरून आज कोणत्याही जागेची मालकी सांगता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्या जागेवर मालकी कोणाची हे सिद्ध करू शकणारा पुरावा म्हणजे वेळोवेळी आलेल्या सत्तांनी त्या मालकी हक्कास दिलेली मान्यता. त्यामुळे जमिनीखाली आधी काय होते या बाबीला कायदेशीर दृष्ट्या कसलाही अर्थ राहत नाही. त्यामुळे पुरातत्वीय पुराव्यांवर वाद घालत बसलेल्यांना हे कायदेशीर उत्तर दिले गेले व दाव्यांना ते पुरावे कसलाही आधार देऊ शकले नाहीत.
मुघल काळात हिंदू प्रार्थना स्थळांना जो उपद्रव पोहोचवण्यात आला आणि त्यातून जे दावे उद्भवले तेही भारतीय कायद्यांमार्फत सोडवत बसता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात बजावले आहे.
अयोध्येला १८५६ साली ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यानंतर मालमत्तेसंबंधी जेही दावे सुरू झाले ते आमच्या कार्यकक्षेच्या परिघात प्रवाहीपणाच्या नि:संदिग्ध घटनात्मक तरतुदीमुळे येतात, तत्पूर्वीचे नाही. ब्रिटिशांनी हिंदू व मुस्लिम या दोघांना वादग्रस्त जागेवर आपापल्या प्रार्थना करण्यास परवानगी दिली होती. म्हणजेच वादग्रस्त जागेवरील दोघांचाही अधिकार मान्य केला होता. पण हिंदूनी आपली पूजा-अर्चा जशी सातत्यपूर्ण ठेवली, राम प्रतिमा अखंडितपणे त्याच परिसरात राहिली, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सर्वाधिकपणे उचलून धरलेला मुद्दा आहे.
थोडक्यात वहिवाट ज्याची त्याची मालकी असे काहीसे घडल्याचे या प्रकरणात दिसते. जागेची कायदेशीर मालकी कोणाची हे पुराव्यांअभावात सिद्ध होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना न्यायालयांनी पुराव्यांबरोबरच त्यांच्या अभावातही विवेकाचा उपयोग कसा करावा यावरही व्यापक उहापोह केला आहे. मुस्लिमांचा दावा जागेचा ताबा काही काळ गमावल्याने फेटाळला गेला आहे याचे भान सर्वोच्च न्यायालयाला दिसते. त्यामुळेच मुस्लिमांना वेगळी पाच एकर जागा देण्यात यावी असा निकाल दिला आहे. पण यामुळे विवेकाचे तत्व पूर्वग्रहांनी प्रदूषित झाल्यासारखे कोणास वाटल्यास नवल नाही.
त्याच वेळीस सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त वास्तूची जागा केंद्र सरकारने  Acquisition of Certain Area at Ayodhya Act 1993 नुसार ताब्यात घेऊन विश्वस्त संस्थेची स्थापना करावी. या विश्वस्त संस्थेने आपले निर्णय, अंमलबजावणी कशी करेल हे त्या संस्थेचे कार्य असतांना या संस्थेने मंदिराचे बांधकाम व त्यासंबंधीत कार्येही पाहावीत असे सांगितले आहे. खरे तर वादग्रस्त जागेत काय करायचे हा या पुढच्या तीन महिन्यांत स्थापन होणाऱ्या या ट्रस्टने ठरवायची बाब असतांना त्यांच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप करून त्यांना मंदिर बांधावयाचा सर्वोच्च न्यायालयानेच देणे ही या निकालपत्रातील सर्वाधिक खटकणारी बाब आहे. वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते की नाही याबाबत हा दावा नसतांना, किंबहुना तो मुद्दाच चर्चा केली असली तरी दूर ठेवण्यात आला असतांना हा आदेश असे सुचवतो की तेथे मंदिरच होते हे मान्य असून तेथे मंदिरच बांधले गेले पाहिजे अशी सर्वोच्च न्यायालयाची इच्छा आहे. हा निकाल देतांना विवेकापेक्षा बहुसंख्यांकवादाचा प्रभाव पडला असणे शक्य आहे असे वाटते ते यामुळेच.
ट्रस्ट भले मंदिरच बांधेल, पण तो निर्णय ट्रस्टचा असला पाहिजे होता. न्यायालयाच्या मर्यादा आणि न्यायातील विवेकाचे स्थान यावर भविष्यात चर्चा होणे शक्य आहे.
हा निकाल देत असतांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घटना, कायदे, समाजव्यवस्था, श्रद्धांचे महत्त्व आणि सर्व श्रद्धांकडे कसे समभावाने पाहिले पाहिजे याचाही उहापोह केला आहे. तो अर्थात उद्बोधक आणि प्रशंसनीय आहे. सर्वोच्च न्यायालयाने सलग वहिवाटीला सर्वाधिक महत्त्व देत आपला निकाल दिला आहे. मुस्लिमांना ते सिद्ध करता आलेले नाही. न्यायालयीन निकाल पुराव्यांवर अवलंबून असतात. मुस्लिम सबळ पुरावे देऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आगपाखड करत न बसता तो नर्मपणे स्वीकारून पुढे भविष्याकडे वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे.
त्याच वेळीस कडव्या हिंदुत्ववाद्यांना हेही सांगणे आवश्यक आहे की निकाल आपल्या बाजूने लागला म्हणून उन्माद करण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने अविरत ताबा आणि वहिवाट या मुद्द्यावर निकाल दिलेला आहे, रामाचे अस्तित्व मान्य करणारा निकाल दिलेला नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. ते न्यायालयाच्या कक्षेतही येत नाही. जनांचा राम जनांच्या हृदयातच वसू द्यावा, त्याचे मनीमानसी वसलेले धवल चरित्र डागाळण्याचा प्रयत्न करू नये.
निकालावर कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या विविधांगी चर्चा मात्र होतच राहील. किंबहुना ती निकोपपणे, द्वेषरहितपणे करणे हे आपले घटनात्मक कर्तव्यही आहे. देश असाच प्रगल्भ होत जातो. बाबरी मशीद हा भारतीय राजकीय, सामाजिक, धार्मिक व्यवस्थेला हादरवणारे एक भीषण प्रकरण होते. ते आता विसरुयात आणि खराखुरा प्रागतिक भारत घडवूयात!
संजय सोनवणी, हे संशोधक आणि लेखक आहेत.

Sunday, November 3, 2019

अयोध्या- सांस्कृतीक सौहार्दाचा इतिहास!


Image result for ayodhya

अयोध्येचा वाद सर्वोच्च न्यायालयामार्फत मिटण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. अयोध्या उर्फ साकेत हे स्थान भारताच्या सांस्कृतीक इतिहासात काशीप्रमाणेच महत्वाचे राहिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयातील वाद हा अयोध्येतील बाबरी मशीदीच्या जागी पुर्वी मंदिर होते की नाही आणि असल्यास कोणत्या धर्मियांचे यावर लढला गेला. वैदिक/हिंदूव्यतीरिक्त अन्य धर्मियांनीही त्यावर आपला दावा केला असला तरी तो मुख्यत्वेकरुन हिंदू-मुस्लमानांमधील वाद आहे असे समजले गेले. सांस्कृतीक प्रवाहात एकच स्थळ अनेक धर्म-पंथांच्या दृष्टीने महत्वाचे बनून जाऊ शकते अथवा त्याच स्थळी कालौघात वेगवेगळ्या वास्तु निर्माण होऊ शकतात.

भारताचा सांस्कृतीक इतिहास पाहिला तर लक्षात येईल की रामकथेच्या पुर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाचे बनून गेले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ यांचा जन्म अयोध्येलाच झाला. एवढेच नव्हे तर अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ  या तीर्थंकरांचा जन्मही अयोध्या येथेच झाला. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्ध यांनी आठ वर्ष अयोध्या येथे वास्तव्य केले होते. ऋषभनाथ आणि अजितनाथ या ऐतिहासिक व्यक्ती होत्या असे मत डा. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि अनेक विद्वानांनी यजुर्वेदातील त्यांच्या उल्लेखावरून सिद्धही केले होते. असे असेल तर या तीर्थंकरांचा काळ निश्चयाने इसपू १००० पुर्वीचा आहे असे म्हणता येईल. म्हणजे अयोध्या ही एक बहुसांस्कृतीक नगरी म्हणून प्राचीन काळापासूनच पसिद्धीस आली होती असे आपणास म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून जैनांनी रामासही आपला मानले होते असेही आपल्याला दिसते. एकंदरीत जैन, बौद्ध धर्माच्या दृष्टीने अयोध्या महत्वाची राहिली आहे. सर्व जीवांना समान मानणा-या, स्वत:तील विकारांवर विजय मिळवू पाहणा-या आणि तसे तत्वज्ञान अव्याहतपणे मांडत राहिलेल्या समन (जिन) संस्कृतीचा विकास होण्यात अयोध्या नगरीचा मोठा वाटा आहे. आणि तोच तिचा वारसा आहे.

राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत यावर अनेक उत्खनने होऊनही आजही वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभुमीच अशीही भारतभर श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशीराची. पहिल्या शिव मंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इसपू दिडशेमधील. तत्पुर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व विपूल प्रमाणात मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही (उदा. शिवलिंग) सर्वत्र मिळतात. पण मंदिरे नाहीत कारण ती प्रथा उशीरा निर्माण झाली. अयोध्या येथील वादग्रस्त जागेवरील उत्खननांत अनेक अवशेष मिळाले असले तरी ते मंदिराचे आहेत की नाहीत यावर उभयपक्षी वाद आहे, आणि शिवाय ते पुरावे तेवढे प्राचीनही नाहीत. उलट पुरातत्वविद बी. बी. लाल यांनी १९७६ साली केलेल्या उत्खननात एक मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. कार्बन डेटींग नुसार ही प्रतिमा इसपू चवथे शतक एवढी प्राचीन निघाली. या स्थळी सापडलेली सर्वात प्राचीन प्रतिमा जैन आहे. किंबहुना जैन प्रतिमांतील भारतात आजवर मिळालेली ही सर्वात प्राचीन प्रतिमा आहे. तेथे जी विविध कालखंडातील नाणी, प्रतिमा मिळाल्या त्यांचा संबंध राम, सीता अथवा दशरथाशी असल्याचे कोणतेही सूचन मिळत नाही असा पुरातत्वविदांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरुन रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा मात्र निष्कर्ष काढता येत नाही. सध्याचा वाद खरे तर एका विशिष्ट स्थानावरील मालकीहक्काचा आहे. सांस्कृतीक वारसा नाकारण्याशी त्याचा काही संबंध नाही. खरे तर अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतीक सौहार्दाचा राहिला आहे. अगदी अठराव्या शतकापर्यंत ही परंपरा चालू राहिल्याचे दिसते.

अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येला राममंदिरासकट अजून चार मंदिरे बांधली तेंव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी या सुभेदाराचे राज्य होते. १७३६ मध्ये अयोध्येच्या सुभेदाराचा दिवान केसरी सिंग याने अयोध्येला जन्म घेतलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. मुस्लिम शासक असुनही ही मंदिरे उभारली गेली हा सांस्कृतीक सौहार्दाचा नमुना होता.  प्राचीन काळी येथे अनेक तात्विक वाद-विवाद लढले गेले असले तरी हिंसक संघर्षाचा इतिहास मात्र नाही. अयोध्या या नावाचा अर्थच आहे ’जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. या नगरीवर कोणा एका धर्माने "फक्त आमचीच" म्हणून दावा करणे या नगरीच्या सांस्कृतीक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर अथवा शहरावर आपला दावा केलेला नाही. बौद्धांनीही आपल्या दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो असेल तो असेल त्याचा सन्मान ठेवत सांस्कृतीक सौहार्दाच्या इतिहासाचे भान ठेवले पाहिजे.

-संजय सोनवणी  

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...