Tuesday, December 29, 2015

Last of the Wanderers


Last Of The Wanderers

हर्षवर्धन देशपांडे यांनी केलेले माझ्या "Last of the Wanderers" या कादंबरीचे परिक्षण

This is a fictional novel based on real events that happened around first century AD. These are interesting times in central Asia and event happening during this period had major influence on how Indian civilization morphed into what we have today. Greek kingdom in Bactria is on the decline and Buddhism in India is about reach its zenith. This is also the time when a large number of nomadic tribes such as Yuezhi in central Asia are about to give up their nomadic lifestyle and settle down to form villages and eventually kingdoms.
On the whole I found the novel thoroughly captivating. This is not a historical novel so author has taken creative permission to move around a few historical references to provide a fascinating insight into how and why the urbanization of central Asia might have started.
Western readers might find that reading this novel as a different experience. This is due to the fact that the author is from India and his writing comes with an Indian flavor. This is not something new, even someone like Salman Rushdie has unmistakable style that only be called Indian English. There are also a few gaps in the narrative which can be attributed to the faulty editing but fortunately they do not stand in the way to enjoy the book.
My major gripe with this novel is that this is the subject of an epic and not a short book. As far as I know no epic has been written based upon the happenings in this part of the world during this period of turmoil. I hope that in the future the author will come up with an epic novel based on the same story.
-Harshwardhan Deshpande

Saturday, December 26, 2015

एक सांगू....

एक सांगू
मला चित्रे काढायचीत
जमतील तशी
जमेल तसे गायचेय
संगीत द्यायचेय
अथांग स्वप्ने
कागदावर उतरवायचीत
कोणी ऐको न ऐको
पाहो न पाहो
वाचो न वाचो
मला मनमुक्त व्यक्त व्हायचेय
या आभाळाच्या सावलीत
घनगंभीर दर्याच्या काठी
दर्यात किंवा आभाळात
झोपडीत किंवा उजाड डोंगरमाथ्यावर
भटक्या माणसांसोबत
शेळ्या-मेंढ्यांसोबत
उन्मुक्तपणे
किंवा वाघ-सिंहाच्या
कोल्हे लांडग्यांच्या झुंडीत
जीव मुठीत घेऊन का होईना
जगायचय...
मला माझ्या तीळ तीळ तुटणा-या भावनांना
शब्द किंवा स्वर
किंवा चित्र द्यायचेय...
मला जगण्यावर प्रेम करायचय
मला थांबवू नका...
मला केवळ मी तुमच्या कळपातला कधीच नव्हतो
म्हणून मारू नका....
मला व्यक्त होऊद्यात...
हे विराट आकाश मला
त्याच्या अनंत पोकळीत
स्वत:च अदृष्य करत नाही
तोवर...
मी माझ्या
विराट मानवी समुदायाच्या
मांडीवर
मस्तक टेकत
शेवटचा श्वास घेत नाही तोवर...
मला मारू नका!

(मानवतेसाठी एक चिंतन!)


Thursday, December 24, 2015

बदलायचे आहे कि नाही?

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

जात्युच्छेदनाच्या चळवळी तर एक फार्स झाल्या आहेत. जातीअंत करायचा म्हणायचे आणि वक्त्यांच्या जाती जाहीरपणे सांगायच्या, कोणत्या जातींचे लोक जमलेत याचा उद्घोष करत टि-या बडवून घ्यायच्या. संघाचे लोकही असेच. आम्ही जातीपाती पाळत नाही म्हणतात आणि सर्वांच्या जातींची व्यवस्थित खबर ठेवतात. मंचावरुनही तसे उल्लेख करतात. जातीचे राजकारण नको असे मोठ्या तोंडाने लोक बोलतात आणि जातीच राजकारण करत आपल्याच जातीच्या नालायकांमागे ठाम उभे राहतात. महाराष्ट्रातून चळवळ मेली आहे हे मी ५ वर्षापुर्वीच घोषित केले होते. असल्या भाकड मनोवृत्तीचे नागरिक कसलीही सामाजिक चळवळ चालवू शकत नाहीत. यांना आजही जगण्यासाठी जातीचा आणि तिच्या खोट्या, वांझ अहंकारांचा व इतिहासाचा आधार लागतो. माणसाचे माणुसपण नेमके कशात आहे हे समजावून घेण्याची कुवत ज्या देशात नसते तो देश रसातळाला जाणार हे उघड आहे.

जाती तत्काळ नष्ट करता येत नाहीत तर किमान सर्व जातींना समान मानत त्यांचा सन्मान करायला काय हरकत आहे? प्रत्येक जात ही व्यवसायाने पडली आहे. प्रत्येकजातीने देशाच्या सांस्कृतिक व आर्थिक इतिहासात मोलाचे योगदान दिलेले आहे. या सर्वच जातींच्या सुकृतामुळे आज आम्ही येथवर आलो आहोत. आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जातीचे अहंकार का सुटत नाही? खिशात नाही आणा अन म्हणे बाजीराव म्हणा असला नपुंसक अभिमान काय कामाचा?

फुले-शाहू-आंबेडकरांचे नांव घेत जे चाललेय ते काही केल्या भुषणास्पद नाही. त्यांचे कार्य व विचार कणमात्रही पुढे नेता आले नाहीत कि त्यात भर घालता आलेली नाही. आजही सांस्कृतिक इतिहासाचे आकलन बालीश आहे. आजही तथाकथित चळवळीतले नेते "आर्य वंशीय बाहेरुनच आलेत." असे समजून त्यांच्या रणनित्या आखतात. समजा बाहेरुन आले तरी पाच हजार वर्षापुर्वी...एवढ्या जुन्या कालात्र समजा आले भारतात म्हटले तरी ते कोणत्या अंगाने परके/बाहेरचे राहतात याचा साधा विचार करायची अक्कल यांना कशी येत नाही?

संघवादी विद्वान हा तर वर्चस्वतावादाचा दांभिक व अज्ञानाचा कळस आहे. सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती कशी यावर अचाट/बेफाट आणि कास्लेही अकलेचे तारे तोडत त्यांचे काम चालू असते. आता तर पुरातत्व विभागही त्यांच्याच अखत्यारीत असल्याने उद्या काय "चमत्कार" ते घडवून आणतील याचा नेम नाही. बामसेफ/ब्रिगेडच्या ब्राह्मण द्वेष्ट्या भुमिकेने ब्राह्मण संघटित होत परशुरामाला "हिरो" बनवत वांझ शड्डू ठोकतात. तेही द्वेषाची धार वाढवायचाच प्रयत्न करतात. सनातनवाल्यांचा आचरट धार्मिक आणि खुनशीपणा कशातून येतो? या सर्वांवर कठोर अंकुश समाजाच असला पाहिजे...पण तो कोठे आहे?

वास्तवपुर्ण, तथ्यपुर्ण दृष्टीने आम्हाला जीवनाकडे पहायला कोणी शिकवलेच नाही. वांझ हरलेल्यापणाच्या गाथा सांगत कोणाचा तरी द्वेष करणारे एकीकडे बेफाम आहेत तर दुसरीकडे संस्कृतीच्या प्राचीन वैदिकपणाच्या अचाट काल्पनिककथा सांगत बसणारे जोमात आहेत. यांना जातीजातीत सोडा, पोटजातींतही समता आणता आलेली नाही. हे काय वैचारिक आणि आर्थिक प्रगती साधणार? अशांचे भवितव्य कशाच्या ना कशाच्या गुलामीत राहणे हेच असते.

खोटे अहंकार बाळगत कोणीही बदलू शकत नाही. उद्याचे सूर्य यांना अप्राप्यच राहणार. माणसांचे मुडदे पडत राहणार. दुस-या जातीत लग्न केले म्हणून कोवळ्या पोरांचे छळ होतच राहणार...ठारही मारले जाणार. वाळीत टाकण्याची एक जुनी पद्धत होती, ती आताहे वेगवेगळ्या थरांत , अगदी वैचारिक - साहित्यिक क्षेत्रातही कटाक्षाने पाळली जाते. अघोषित बंद्या पालल्या जातात. हा समाज निघृण आहे हे वास्तव मान्य करत जे काही थोडके लोक उरलेत त्यांना नैराश्य येत तेही हार मानतील अथवा परिस्थितीशरण होतील असे वातावरण आहे.

बदलायचे आहे कि नाही? 

इंद्रजीत कुलकर्णी व मेधा पाटील...

इंद्रजीत कुलकर्णी व मेधा पाटील...
कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य. हे घृणास्पद कृत्य केले ते मुलीच्याच भावंडांनी. सख्ख्या बहिणीचा आणि मेव्हण्याचा गळा त्यांनी कसा चिरला असेल? कोठून येतो हा निर्दय पाशवीपणा? या भयानक हत्याकांडाची विशेष चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. माझे मित्र प्रकाश पोळ यांनी लोकसत्तातून लिहिल्यामुळे वाहिनीवर चर्चा झाली. त्या चर्चेत माझे स्नेही प्रा. हरी नरके यांनीही महाराष्ट्रीय जातीयवादाचे मर्म उलगडून दाखवले. फेसबुकवर बोटचेप्या खंती आल्या पण त्यात यातील दाहकता समजण्याएवढा पाचपोच नव्हता. म्हणजेच जातीयवादाच्या केवढ्या गहन गर्तेत महाराष्ट्र सापडला आहे यावर मंथन (झालेच तर) करण्याची आवश्यकता आहे.
सांस्कृतिक/वैचारिक लढे, वादविवाद होत राहणे हे सुदृढ समाजाचे लक्षण म्हणता येईल, पण त्यात, असल्या वादांशी काडीइतकाही संबंध नसलेल्या, कोवळ्या जीवांच्या अजरामर प्रेमभावनेला, त्यांच्या सहजीवनाच्या स्वप्नांना अशा क्रूर पद्धतीने कायमचे नष्ट करु पाहणा-या विकृतींना स्थानच असू शकत नाही. दोषेंना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असल्या मागण्या ठीक आहेत. पण मुळात असल्या घटना घडणारच नाहीत यासाठी आपापल्या द्वेषबुद्ध्यांना नष्ट करणारी सामाजिक विचारधारा आम्हाला प्रभावशाली करता येत नसेल तर महाराष्ट्राचे धिंदवडे निघतच राहणार!
प्रकाश पोळांनी अत्यंत सत्य मांडलेय...मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून कथित पुरोगामी गप्प बसले काय? जी मुलगी मेली ती तर तशाच उच्च म्हणवल्या जाणा-या जातीतील...मारणारे तिचे सख्खे भाऊ. बहिणीने उच्च असो कि तथाकथित नीच जातीतील मुलाशी लग्न केलेच कसे या प्रश्नाने त्यांचा तिळपापड व्हावा व निर्दयतेने दोन हत्या व्हाव्यात आणि मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून हे तथाकथित पुरोगामी शांत बसले असतील तर मात्र या लोकांना "फुरोगामी" म्हणणारे निंदक, संघी, योग्यच आहेत असे म्हणावे लागेल. कारण त्यांची तीच लायकी आहे.
मी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करतो.

हे कोठवर चालणार?




अण्णाभाऊ साठे हे वंचितांच्या मूक अश्रूंना वादळी थैमानात बदलणारे, व्यवस्थेला झंझोडून काढणारे शाहीर, थोर साहित्यिक आणि विचारवंत. महाराष्ट्रावर त्यांचे अपरंपार ऋण आहे. पण ते मान्य करण्याइतकी कृतज्ञता महाराष्ट्रात नाही. त्यांची पणती सुवर्णा साठे ही ठाणे ग्रामीण पोलिसांत ड्युटीवर होती. वय वर्ष २३. ती ड्युटीवरुनच सुमारे दहा महिन्यंपुर्वी बेपत्ता झाली. तिची आई लीलाबाई यांना वाळवा येथील इस्पितळातून फोन आला कि त्यांची मुलगी वाळव्यात रस्त्यावर ८०% जळालेल्या अवस्थेत सापडली. तिच्या जगण्याचे चांसेस कमी असल्याने तातडीने येवून तिला भेटा असा निरोप मिळाला. त्या व अन्य नातेवाईक वाळव्याला पोहोचेपर्यंत सुवर्णाचे अंत्यविधीही पार पडले होते.

एकही नातेवाईक उपस्थित नसतांना अंत्यविधी कसे केले गेले हा प्रश्न शंकर कांबळे या साठे कुटुंबच्या मित्राने केला. त्यांना हाती मिळाले ते डेथ सर्टिफिकेट. मुलीच्या खुनामुळे धक्का बसलेले सुवर्णाचे वडील आणी आजी एकापाठोपाठ मरण पावले.

सुवर्णा ठाण्यावरून सुनील इंगळे नामक वाळवा येथील  एका तरुणासोबत वाळवा येथे आली होती. या दोघांचे प्रेमसंबंध असावेत व लग्नाच्या आश्वासनामुळेच ती वाळव्याला गेली असावी असे कांबळे म्हणतात. त्यांचा व लीलाबाइंचा संशय ईंगळेवर आहे. पण या प्रकरणतील दुर्दैव असे आहे कि पोलिसांनीच कसलाही तपास केला नाही. ठाण्याची एक मुलगी वाळव्याला जळालेल्या अवस्थेत कशी मिळाली? तिला कोणी जाळले? पोलिसांनी तिचे प्रेत नातेवाईकांकडे सुपुर्त का केले नाही? तपास निष्कर्ष न काढता कसा संपवला? लीलाबाई अलीकडेच थेट मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागायला गेल्या होत्या. पण आश्वासनाखेरीज पदरी काही पडलेले नाही.

एका महिला पोलिसाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू होतो आणि पोलिसच त्याचा तपास करत नसतील तर ही केवढी मोठी गंभीर बाब आहे हे आम्हाला समजायला हवे. या प्रकरणाचा तपास करण्यात वाळवा पोलिसांचे स्वारस्य नाही तर मग हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे. सुवर्णा ठाण्यावरून वाळव्याला कशी, कोणासोबत आली, नेमक्या कोणी व का तिला जाळले हे तपासातून समोर आलेच पाहिजे. दोषी कोणीही असो, त्याला जेरबंद केलेच पाहिजे. लिलाबाई म्हणतात कि सुनील इंगळे त्यांनाही धमक्या देत आहे. असे असेल तर पोलिस त्याच्यावर अद्याप कारवाई का करत नाहीत?

एक महिला पोलिस, त्यात अण्णाभाऊ साठेंची पणती....
तिच्या खून होतो...दहा महिने उलटुन जातात....कसलाही तपास नाही, कसलाही निष्कर्ष नाही....
हे उभ्या महाराष्ट्राला...पोलिस खात्याला शरमेने मान खाली घालावी असे कृत्य नव्हे काय?

Monday, December 21, 2015

मनुस्मृती : नवा प्रकाश


मनुस्मृतीतील शुद्रांवरील बंधने ही त्यांनी आपल्या सेवेत घेतलेल्या वैदिकबाह्य लोकांसाठी आहेत, सर्वांसाठी नाहीत, हे मनुस्मृतीचे परिशीलन करता लक्षात येते. ते कसे हे आपण प्रथम पाहू.

१) खुद्द मनुस्मृतीत वैदिक धर्माचा स्पष्ट उल्लेख असून हा यातील धर्माज्ञा वेदशास्त्र प्रमाण मानणा-या लोकांसाठी म्हणजे वैदिकांसाठी  आहेत असे पहिल्या अध्यायातच स्पष्ट करण्यात आले आहे. (मनू- १.२-१०)

२) देव-पितरांच्या कार्यात व श्राद्धात कोणाला प्रवेश नको याबाबत तिस-या अध्यायात आज्ञा असून शूद्र, मंदिरात पूजा करुन अर्जन करणारे, वैद्य, पशुपालक, मेंढपाळ, अभिनेते, नर्तक,  द्यूतगृहे चालवणारे, मांस व मद्य विक्रेते, सूत, तेली, शेतकरी, शिल्पी, दूतकार्य करणारे, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारे वगैरे व्यवसाय करणारे त्याज्ज्य म्हटले आहेत. (अध्याय ३. १५२-१६६)

३) चरितार्थासाठी देवपुजा करणा-यालाही या कर्मात सहभागाची बंदी आहे.

४) अध्याय ४.२१८ नुसार राजा, शूद्र, चर्मोद्योग करणारे, वैद्य, धोबी, रंगारी व वर वर्णित केलेल्या वर्ज्य जातींच्या हातचे खाऊ नये अशीही आज्ञा आहे.

वरील बाबी पाहिल्या तर लक्षात येते कि शूद्र आणि इतर व्यवसाय करणा-या जाती या स्पष्टपणे वेगळ्या मानल्या आहेत. सध्या या सर्व जाती (शेतकरी/मेंढपाळादि) शूद्रांत गणल्या जातात. पण तसे वास्तव दिसत नाही. अन्यथा शूद्राचा वेगळा उल्लेख केला नसता अथावा वरील जातींना स्पष्टपणे शूद्र म्हटले गेले असते. राजालाही यात वर्ज्य मानले आहे, याचा अर्थ हे विधान अवैदिक सत्ताधिशांबाबत आहे हे उघड आहे. म्हणजेच मनुस्मृतीला अभिप्रेत असलेले शूद्र हे केवळ वैदिक धर्मियांच्या व्यक्तिगत सेवेत घेतलेला वर्ग होता व दासदासींना ज्या हीणभावनेने मालक वागवत असत तीच हीनभावना त्यांच्याबाबत मनुस्मृतीने व्यक्त केली आहे.

मनुस्मृतीने मंदिरात पुजा करणा-यांना व पुजाकार्य करणा-यांनाही वर्ज्य ठरवलेले आहे. याचे प्रमूख कारण म्हणजे मंदिरे व पूजा हे वैदिक धर्मचे अंगच नव्हते तर ते वेदपुर्व शिवप्रधान धर्माचे अंग होते. मनुस्मृती वैदिक कर्मकांडांनीच भरलेली आहे. थोडक्यात ते दुस-या धर्माचे असल्याने वैदिकांच्या धर्मकार्यात त्यांना प्रवेश नसणे स्वाभाविकच आहे.

शिवाय हा धर्म मर्यादित लोकाचा होता. बहुसंख्य भारतीय वेदपुर्वच धर्म पाळत आलेले होते व आहेत. दोन धर्मांत स्पष्ट सीमारेखा होती हे मनुस्मृतीवरुनच दिसते.

दुसरे असे कि वैदिकांनी त्यांच्या सेवेत असलेल्या शूद्रांवर बंधने घातली याची कारणे वैदिक ज्या परिस्थितीत होते त्यात आहेत. वैदिक मंडळी उत्तर भारतात, विशेष करुन कुरु, मत्स्य, पांचालादि भागात वस्त्या करून राहत. त्यांच्या वस्त्याही बव्हंशी खेड्याप्रमानेच असून ते नगरांत राहत नव्हते हे मनुस्मृतीवरून स्पष्ट दिसते. त्यांना जीवनयापनासाठी कृषीकार्य, गृहकार्य, पशुपालनादि कार्ये करण्यासाठी सेवकांची गरज होतीच. असे सेवक/सेविका अनेकदा राजाकडून अथवा यजमानांकडून त्यांना दानात मिळत अथवा वेतनावर ठेवून घेतले जात. नित्य सहवासामुळे वैदिक स्त्रीया या वेगळ्या धर्माच्या पुरुषांशी किंवा वैदिक लोक या अवैदिक स्त्रीयांशी रतही होत असत. यातून जी संतती पैदा होई त्यामुळे वैदिक लोकांना तिला आपल्या धर्मात नेमके काय स्थान द्यायचे याबाबत गोंधळ उडने स्वाभाविक होते. त्यांना वस्तीवरून घालवून देनेही शक्य नव्हते कारण मग कार्ये कोण करणार? यामुळे वैदिकांनी मार्ग काढला तो असा, कि ते अशा सेवकवर्गावर, ज्यांना ते शूद्र म्हणत, बंधने लादत गेले. पण वि. का. राजवाडे म्हणतात की या बंधनांचा विशेष उपयोग झाला नाही. मनुस्मृतीनुसार असे दिसते कि प्रसंगी अशा शुद्रांच्या घरीही यज्ञयाग करणे वैदिकांना भाग पडे. (मनु-३.७८). अगदी त्यांच्यासाठी नांगरणी करणारे, त्यांची गुरे राखणारे, त्याचे न्हावी यांच्या हातचे अन्नही त्यांना चालत असे. (मनू: ४.२१८)

पाणिनीनुसार दोन प्रकारचे शूद्र होते, अनिर्वसित शूद्र आणि निर्वसित शूद्र. निर्वसित शूद्र म्हणजे जे आर्यांच्या (वैदिकांच्या) सेवेत नसलेले, स्वतंत्र धर्म व जीवनयापन करणारे व अनिर्वसित शूद्र म्हणजे आर्यांच्या सेवेत असणारे. यावरून हे स्पष्ट होईल कि मनुचे नियम हे अनिर्वसित शुद्रांबाबत होते, बाहेरच्या समाजाबाबत लागू नव्हते. म्हणूनच तथाकथित शूद्र नुसते राजे बनत नसत तर व्यापार/कृषी इत्यादि मार्गांनी धनाढ्यही होत असत.

वरील विवेचनाचे तात्पर्य हेच कि वैदिक धर्म स्वतंत्र होता, त्याचे धर्मनियम व कर्मकांडेही वेगळी होती आणि ते अल्पसंख्य असल्याने वर्णसंकर त्यांना परवडनारा नव्हता. त्यांना मंदिरे, पुजा य वेदपुर्व धर्मक्रियांचा तिटकारा होता. आपला धर्म कसाबसा प्राप्त स्थितीत शुद्ध ठेवत टिकवून ठेवायचा हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता व म्हणूनच ते त्यांचे धर्मनियम कडक करत राहिले. मनुस्मृतीत ब्राह्मणांच्या खाण्या-पिण्यापासून ते वेदाध्ययन करत गृहस्थीवर जी कडक बंधने घातली गेली तीही याच परिस्थितीतून असे म्हणता येते.

मनुस्मृती संपुर्ण हिंदू समाजासाठी लिहिली गेली या मताला खुद्द मनुस्मृतीच दुजोरा देत नाही हे अध्याय १.२ वरुनच स्पष्ट दिसते. वैदिक धर्मांतर्गतची सामाजिक/धार्मिक व राजकीय व्यवस्था लावण्यासाठेच तिचा जन्म झाला व तिचे स्थान तेवढेच आहे. हिंदूंशी (शैवप्रधान मुर्तीपुजकांशी) तिचा काहीही संबंध नाही. या स्मृतीतील आज्ञा वेदपूर्व शिवप्रधान धर्म पाळणा-यांनी मानलेल्याही दिसत नाही. त्या आज्ञा त्यांच्या धर्मासाठी नव्हत्याच तर कशा पाळल्या जाणार?

वैदिक धर्म हा संपुर्णपणे वेगळा असून वेदपुर्व शिव-शक्तीप्रधान धर्म पाळणा-यांचा त्याशी काहीही संबंध नाही हे लक्षात घेतले पाहिजे.


देव हवा कि नको?

पण काही लोकांना रक्तपात सुंदर वाटतो. अनेकांना देव किंवा अल्ला, आकाशातील बाप वा यह्वे रक्तपाताच्या घटना घडवून आणु शकतील अथवा तशी स्थिती उत्पन्न करतील म्हणून प्रिय वाटतात...जास्तच पुजनीय व विश्वसनीय वाटतात. देव विरुद्ध अल्ला किंवा यह्वे विरुद्ध अल्ला-देव वगैरे लढे तेच तय करुन ठेवतात. कोण एकमात्र आणि कोण एकमेव श्रेष्ठ हे यांचे एकमात्र श्रेष्ठ देव ठरवत नाहीत तर त्यांनीच म्हणे बनवलेली ही निष्प्राण प्रजा ठरवनार!

पण कोण श्रेष्ठ? कोणाचा मान्य देव श्रेष्ठ? ते एकमेव असतील तर एकमेव देवांतही बहुदेवतावाद आणनारे, म्हणजे हा देव श्रेष्ठ कि तो, महामुर्ख नव्हे काय? आणि जे बहुदेवता मानतात ते मरणाचे अधिकारी कसे? आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्या अल्ला, आकाशातील बाप, यह्वे, इंद्र, शिव वगैरेंना जर त्यांच्यात नेमके कोण खरे आणि एकमेव हे ठरवता येत नसेल तर ते ठरवणारे तुम्ही कोण? कोणत्या पुस्तकात लिहिले असेल तर ते कोणी लिहिले? आकाशातला बाप अथवा अल्ला अथवा परमेश्वर माणसाच्या हृदयावर माणुसकीचे अजरामर संगीत लिहित असतो...तो भाकड पुस्तके लिहित बसत नाही. कोणा एका माणसाला तो आपला संदेष्टा अथवा प्रेषीत बनवायला महामुर्खही नाही. मुर्ख माणसे असू शकतात....असलाच कोठे तर...तो परमेश्वर तरी नक्कीच मुर्ख नाही!

असली तर सारी माणसेच त्या परमेश्वराचे संदेष्टे आहेत. प्रत्येक माणूस हा प्रेषित आहे. प्रत्येक माणूस हा परमेश्वरही आहे. त्याचे जीवनगाणे आणि अनावर संघर्ष हेच ईश्वरी गीत आहे.

आणि सर्वांचे मिळून जे महागीत होते तेच खरे विश्वगीत आहे.

पण आमचे गीत नाही. पण आमचे सुस्वर संगीत नाही. पण मग आमचा कोणी ईश्वरही नाही. तुम्हा बेवकुफांना रानटी रान मोकळे द्यायला त्याला वेड लागलेले नाही. त्याने जे न लिहिता लिहिलेच आहे ते पुन्हा कोणा माणसाच्या (प्रेषित-अवतार वगैरे) माध्यमातून त्याने सांगितले हे मानणे जेवढा मुर्खपणा आहे त्यापेक्षा अधिक गाढवपणा त्या माध्यमालाही दैवत्व देण्यात आहे.

रक्तपात सुंदर वाटतो काहींना कारण त्यांना ईश्वराचे गीत माहित नसते. अमुकला मी मानतो आणि तोच खरा, तू ज्याला मानतो तो खोटा असे जो कोणताही धर्मग्रंथ सांगतो आणि त्यासाठी रक्तपाताचे आदेश देतो तो धर्म नसून अधर्म आहे. असे सांगणारे धर्मग्रंथ ईश्वराचाच घोर अवमान करत असतात. खरा देव आणि खोटे देव अशी वाटणी स्वार्थी माणसाला सोयीची असली तरी मुळात देव खराही नाही आणि खोटाही नाही. रक्तपात, द्वेष, लुटालुट इत्यादि अधम भावना बाळगणा-यांना देव असू कसा शकतो? असे सांगणरे "प्रेषित" अथवा "अवतार" अस्तित्वातच कसे येऊ शकतात? ते काही खरे नाही.

जगातले सारे धर्मग्रंथ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रक्तपातच शिकवतात ते धर्मासाठी नव्हे तर राजकारणासाठी. वर्चस्व निर्माण करण्यासाठी. परमेश्वराची संकल्पना या अमानवीपणासाठी नाही. संघर्ष धर्माचा नाही. संघर्ष यह्वे-अल्ला-आकाशातला बाप-देव यांच्यात नाही. तुम्ही नांवे तुमच्या सुमार बुद्धीने वेगवेगळी दिली असतील...पण ते एकच...एकाच मानवी अद्भूत संकल्पनेचे तरल पातळीवर वावरणारे रूप आहे!

संघर्ष हा कोणाचे वर्चस्व कोणत्या मानवी गटावर असणार यासाठी आहे. त्यासाठी हे पापी देवांनाही वेठीला धरतात. देवांनाच शस्त्र म्हणून वापरतात.

त्यांना रक्तपात सुंदर वाटतो. माणसे तडफडत मरतांना पाहतांना त्यांना आनंद वाटतो. खुनशीपणात त्यांना ओर्गाझम झाल्याचा विकृत आभास मिळतो. हे किंवा ते तोडण्यात त्यांना उन्माद चढतो. स्त्रीयांवर बलात्कार करण्यात या हिजड्यांचे पौरुष उफाळल्यागत विझते. माणसे जिंकतात...माणसे हरतात. माणसे बलात्कार करतात...माणसे बलात्कारित होतात...

आणि यांचे देव-अल्ला-आकाशातील बाप-यहवे वगैरे जेवढेही देव असतील तेही तेवढेच बलात्कारित होतात आणि तेही बलात्कारी होतात!

आम्हीच आमच्या देवांवर बलात्कार करतो किंवा त्यांना बलात्कारी करतो.

ईश्वर-अल्ला-यहवे वगैरे सुंदर संकल्पनांची निघृण विटंबना करतो....

आम्ही माणसातल्या माणसाची विटंबना करतो!

आम्हाला देव हवा कि नको हा प्रश्न उरत नसून देवांनाच आम्ही हवे आहोत कि नकोत हा प्रश्न विचारायला हवा!

Wednesday, December 16, 2015

परमेश्वर ही संकल्पना.....



ईश्वर आहे कि नाही हा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. बुद्धीवादी पातळीवर सदय असलेला, प्रार्थनांनी खूष होणारा, न केल्यास कोपणारा "भावनिक" परमेश्वर अस्तित्वात असणे शक्य नाही. तसा ईश्वर मानल्यास त्याला अतिमानवी रूप देणे सहज शक्य होते. मानवासारख्याच, पण अचाट लीला तो सहज करू शकतो. मानवासारखेच त्यालाही राग-लोभ असू शकतात. पुराकथा पाहिल्या तर त्यातील बव्हंशी सामान्यांचा देव हा असाच असतो. फार आध्यात्मिक झाले तर सर्व सृष्टीचा निर्माता, सर्व चराचरात भरलेला तरीही दशांगुळे व्यापून उरलेला अचिंत्य असा पण अंतिम मोक्षदाता असा परमेश्वर अस्तित्वात तात्विक पातळीवर येतो. असाही परमेश्वर अस्तित्वात असू शकेल अशी कल्पना करणे श्रद्धीय बुद्धीवादी मनुष्याला संयुक्तिक असले तरी ते तार्किक बुद्धीवादी पातळीवर ते मान्य करता येत नाही.

परंतू भावनात्मक पातळीवर, जी वास्तवच असते, अशा परमेश्वराचे अस्तित्व असणे, त्याचा आधार वाटणे अस्वाभाविक आहे काय? मनुष्य हा मुळात भावनिक प्राणी आहे आणि भावनिक विश्व हे वास्तव रखरखीत विश्वापेक्षा वेगळे व तरल असते. त्यात देव/ईश्वर असू शकतो. माणसं त्याला सखा-सवंगडी मानत, आपल्या संकटांचा भार त्याच्यावर टाकत वाट दाखवण्याची अथवा संकटमूक्त करण्याची अपेक्षा बाळगत आपल्या जीवनातील अनिश्चिततेला भावगम्य स्थिरता देवू पाहतात. हे मानवी भावनिक स्वभावाला साजेशेच आहे. शेवटी मनुष्याला स्वत: तो मनुष्यच वाट दाखवतो, पण त्या प्रेरणा ईश्वरविषयक जाणीवांतून अधिक टोकदार होतात हे सामान्य मानसशास्त्र आहे. संकटांशी झुंजतांना काहीतरी अलौकिक सोबत आहे ही जाणीव माणसाला बळ देवू शकते. ते वास्तवात नसले तरी भावनिक पातळीवर ते अस्तित्व प्रबळ असते म्हणून ते भावनेपुरते ते सत्यही असते.

प्रेम हीसुद्धा मग एक अमूर्त व सिद्ध न होऊ शकणारी गोष्ट आहे. पण प्रेमभावनेच्या बळावर मनुष्य अशक्यप्राय कार्ये करू शकतो हे सिद्ध झालेले आहे. "प्रेम" खोटे आहे असे म्हणने प्रेमभंग झालेल्यांसाठी म्हणणे ठीक असले तरी कशाचा तरी भंग झाला असेल तर ते वास्तव का नसेल? प्रेमभावना आणि ईश्वरविषयकच्या भावनेत साम्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.

पण ईश्वर आहे कि नाही हा खरा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. प्रत्येकाचा ईश्वर वेगळा. संकल्पना वेगळी. खरे तर जेवढी माणसे तेवढे ईश्वर. त्याच्याकडून अपेक्षाही वेगवेगळ्या. अशा स्थितीत ईश्वर ही संकल्पना एका व्याख्येत बसवता येणे हेही अशक्य आहे असे आपल्या लक्षात येईल!

ईश्वर नाकारणे नाकारणा-यांसाठी ठीक आहे. पण ते नेमके काय नाकारत आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे! मानवी मानसिकता सबल करण्यात ईश्वराविषयकची संकल्पना उपयुक्त ठरली आहे. धर्मांधांनी, ईश्वर संकल्पनेचा स्वार्थासाठी उपयोग करून घेत लोकांचे शोषण करणारे व करू दिले जाणारे हे निश्चितच दंडार्ह आहेत हे खरे. पण म्हणून संकल्पनेलाच कसे उध्वस्त करता येईल? प्रेम ही संकल्पना असंख्यदा दुरुपयोगिली जाते म्हणून प्रेमच नको अथवा ती खोटी आहे असे भावनामय माणूस कसे म्हणू शकेल? किंबहुना भावनायुक्त माणसाची ती अपरिहार्य निकड बनते. मग संकल्पनेला नांव काहीही दिले तरी काही फरक पडत नाही.

मुळात ईश्वर या संकल्पनेचा उगम अखिल मानवाच्या असुरक्षिततेच्या, अनिश्चिततेच्या आणि भयभीततेच्या पुराआदिम जाणीवांच्या विस्फोटातून निर्माण झाली आहे. किंबहुना आपल्या भयभीत मनाला सुरक्षेचे एक कवच म्हणून ती त्याने विकसीत केली आहे. माणसाचा ईश्वर म्हणजे स्वत:च्या काळोखावर/संकटांवर मात करणारा त्याच्याच मानसिकतेचा एक घटक. त्या घटकाला माणूस स्वत:पेक्षा वेगळा व श्रेष्ठ-शक्तीशाली मानतो. जीवनातील अनाकलनीय सृष्ट-दूष्ट घटना या त्याच्याच इच्छेमुळे होतात असेही तो मानतो. माणुस जितका असुरक्षीत होत जातो तितकीच ईश्वराची गरज त्याला जास्त भासते.

आदिम काळात मनुष्य जितका असुरक्षित होता किंबहुना तितकाच असुरक्षीत आजही आहे. न्याय/कायदेव्यवस्था/प्रशासन त्याला अजुनही पुरेशी सुरक्षा देवू शकलेली नाही. आर्थिक असुरक्षितता आणि अनिश्चितता तर त्याला सदैव ग्रासून असते. कोणताही निर्णय अंतिम परिणाम काय देईल हेही परिणाम दिसेपर्यंत त्याला सांगता येत नाही. त्याचे असे गणितही नाही कारण परिणामावर परिणाम करणा-या अनंत घटकांच्या परस्पर संबंधंचे भाकीत करणे जवळपास अशक्य होऊन जाते. हे जे काही अनाकलनीय आहे त्याचे निराकरण माणुस करू शकत नाही.

मानवी जीवनात वास्तवापलीकडेही वास्तवे असतात. कल्पनांपलीकडेही कल्पना असतात. मानवी शरीर गणिती-भौतिकी नियमांनी जावू शकते पण गणीतही शेवटी मानवनिर्मितच असते. मानवी आकलनाबाहेरही गणित उरतेच. नाहीतर त्यातही नवी संशोधने होत नवी प्रमेये मांडली गेली नसती. माणसाला समजलेले भौतिक विश्वही मानवी मर्यादेच्या आतच असते. आपण निरपेक्ष असू शकत नाही म्हणूणच आपण सापेक्षतेच्या चौकटीत वैश्विक नियम बांधतो. पण विश्व मानवी नियमांना बांधील असतेच असे नाही. म्हणून प्रश्न अनंत व उत्तरे थोडी अशी अवस्था असतेच. एक उत्तर सापडले कि त्यावरही नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सोडवायला माणुस अजून धावतो. किंबहुना ही धाव अजरामर आहे.

माणसाच्या या अजरामर कुतुहलाला व ते शमवण्यासाठी केलेल्या, करीत असलेल्या धडपडीला त्रिवार सलाम. मानवी विचारांच्याही चौकटी तोडता येतील तेंव्हाच वैश्विक सत्ये सापडू शकतील. तोवर त्यांना आपण केवळ "मानवी सत्ये" (जी अनिश्चित आहेत) म्हणू शकतो. त्यांना अंतिम सत्य म्हणता येणार नाही. विज्ञानातही अनेक मित्या, अनेक विश्वे, कृष्णविवरे, धनात्मक गुरुत्वाकर्षण अशा अनेक कल्पना विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. गणित सोडवण्यासाठे क्षणभर तरी ही गृहितके खरीच धरावी लागतात. ही आपली मर्यादा आहे. अज्ञानाच्या गहन कुहरात आपण आहोत आणि आपण प्रकाशाच्या शोधात आहोत.

हा शोध कशावर तरी श्रद्धा असल्याखेरीज कसा पुर्ण होईल? परमेश्वर हीसुद्धा एक संकल्पनाच आहे. जीवनाचा एक निराकार मानसिक आधार शोधणारी संकल्पना. म्हणून जेवढ्या व्यक्ती तेवढे ईश्वर.  निरपेक्ष स्थितीत ईश्वराचे मुळात अस्तित्वच नाही. ते वास्तव असू शकत नाही. तरीही ती जोवर माणसाला उपयुक्त आहे किंवा तिला सक्षम पर्याय मिळत नाही तोवर ईश्वरवादी सामान्य माणसांना "देवभोळे", "भोळसट", "अंधश्रद्ध" वगैरे म्हणत हीणवायचा काय अधिकार आहे? जोवर कोणाच्याही श्रद्धा स्वत:च्या व इतरांच्याही शरिरीक/मानसिक किंवा आर्थिक हानीचे कारण होत नाही तोवर त्या अंधश्रद्धा कशा?

ईश्वराची गरज जीवनातील अनिश्चिततेमुळे आहे. असुरक्षिततेमुळे आहे. आणि लोकांना उद्याची शाश्वती देता येईल अशी व्यवस्था आपण जोवर  आणत नाही तोवर लोकांचे देवभोळेपण जाईल ही आपली अंधश्रद्धा आहे. असुरक्षिततेचे प्रमाण आणि ईश्वरी अस्तित्वाची तीव्रता यात असा हा अन्योन्य संबंध आहे.

Monday, December 14, 2015

Psychology and the language!


There are many hypotheses about the origin of the language. However there so far is no agreement on any. Human is the only animal that has ability to speak. Without this gift human kind would have been in its primordial state even today. But what is origin of languages? There have been fierce disputes on this issue, so much so that in 1866 Linguistics Society of Paris had banned debate on this issue. Many have tried to search linguistic roots in remote mythologies, biblical is famous among others. Psychologists have suggested that the language is innate need of human being. But it doesn’t solve the question as to why this innate need emerged only in human being and not other animals? Some have tried to find its origin in human genetic structure. This is treated as hardest problem in science.


Without going in the various aspects of the debate and multiple theories, we will have an overview of this problem and try to find whether there can be any solution to this problem or not.

We have to agree with the supporters of Continuity theory that the languages didn’t originate all of sudden. It must have been a gradual process, from simple to complex. It is natural process and there is no reason to disagree with it. Some theories suggest that languages did not originate to establish dialogue with others but to express. Discontinuity theory suggests that the languages must have originated during the process of evolution as sudden event at some stage. Other theories relate origin of the languages with primordial utterances. Sounds are symbols and to understand that symbolism in any given language which forms or conveys certain meaning which is understood and reacted over in same sound symbolism is the language. But how human being achieved that ability to use sound symbols as a mean to convey remains as yet a mystery.

In human evolution, there are many stages. Some are missing links. It is not that it was unidirectional evolution. The process begins with hominids and halts with the modern human species. It is suggested that Neanderthal man has an ability to create complex sounds. Also it is suggested that there could have been interbreeding between Neanderthal man and Homo-sapiens. Whether Neanderthal man extinguished from the face of the earth as he could not compete with Homo-Sapiens or whether they mingled with each other is a question that is not satisfactorily solved.  If both the species had an ability to speak, we can infer, if they interbred, the gens of the language too got mixed to give way to the future linguistic structures.

The language is mostly spoken. It also is written in symbols to which certain sounds are denoted. But the first thing is sound. Human species have the larynx that has ability to produce complex sounds with the help of the tongue and mouth. We find no other animal have the larynx of such ability. Larynx too could have been evolved with the growing need of the human being.

Language always is in mind. When in mind it doesn’t have any symbol. It is constant flow of temporal feelings, thoughts and expressions. The language of mind could be far different, beyond our comprehension. They are later translated to us in the language we know. When needed we express it through the series of sounds, whether vocal or written.  So this is basic process of the languages.

It is assumed that the processing of the language is interdependent between various centers in the brain.  Not a single center is responsible for its origination and development. We can see that this doesn’t help us to solve the problem of origin.

We have to understand human being has an ability to give meaning to the visible world, sounds and psychological process, that is constant, symbolizes them. Let us also assume that the natural limitations to survive have been compensated with intellect. The primordial humans must have gone through the terrific conditions for survival. However we just cannot imagine now how he would have taken those circumstances to pave way through them to be able to control them. The explosion of linguistic qualities in human brain could be a sudden event that may have taken place at very early stage of evolution. It has been argued from fossil records that Neanderthal man had larynx that could produce sufficient sounds to make a speech. Cave paintings and artifacts shows that he was quite expressive. The argument he, Neanderthal man, must have some kind of primitive language.

Language couldn’t have emerged just out of imitation of babbling. The quality of human species is he has intense feelings and an urge to express. The similar expression patterns expressed through the sounds within a tribe could have made the first language. So thought and language could have the close relationship. The environment too has hand in the development of the language. I will show how the local geographies too are responsible for shaping up the language in different patterns. Early human being was nomad, true, but his roaming was in his known periphery of the geography. We have to understand the significance of geography with the language.  

Language was not certainly innate need of the human being. Innate need to him was survival against all odds. He selected his way of survival by making bands and coordinated efforts. There also are bands of other animals like foxes, antelopes and monkeys. They too have rudimentary sound-languages. They use it to caution others when danger is imminent. They utter differently when lovemaking or just responding to others. They have language of some rudimentary kind that is not comprehended by us. But they lack in developed vocal chords and so the brain capable enough to process the sounds further. Human species have crossed these borders in the process of evolution for his imminent need of survival.

Thus language is product of human psychology. The psychology is related with how the mind functions and mind is solely dependent on our brain to which we yet to understand fully. However language is a fact and we have to proceed with this fact.

The major question here is, if human species is unique and same, why there are over six thousand languages in the world? Why people of certain region speak some language and different in adjoining region? Why some sounds are missing in some languages whereas they are most prominent in the languages spoken in adjoining regions? For example some languages have retroflex’s and some are devoid of them.

Why there is not a single universal language if human species have everything in common? Why there are so many groups of the languages and several hundred branches of each group?

We will have to deal with this question more elaborately because some theories wide in circulation have misused the fact for supremacist political reasons, though it is not a good science.

To conclude here, we have to check it up first that  the psychology of human species that is instrumental in origination and control of the language. Psychology is overall functioning of the brain that is instrumental in deciding the priorities. And priorities of survival against all odds decide how to use the available integral resources causing further evolution through modifications. The evolution of the brain and associated organs must have been a process that must have taken toll of the millions in the rout to achieve the utmost possible qualities. It may have been continued process or discontinued or it could have been developed through interbreeding of the different human-like species of ancient times. We have no any concrete evidence as yet what did happen in those times, but the fact remains that we have language. Our psychology governs the language we speak. Our organs, such as larynx and jaws, decide how it would be uttered. With region to region we find these physical features do change along with others. Physical features are governed by the climate and geography of the people they live in over generations. Mexican accents would not be same as of the New Yorkers. The slightest difference in physiology would make noticeable difference in pronunciation patterns.

We have different languages classified in different families. We have the languages classified under one group and yet they are incomprehensible to the man who speaks the language belonging to the same group. In fact though there is universal man with all the similar characteristics there is no common language in the world.

We have to first account for such changes.

The fact is there are changes in the same languages with regions to regions, though they collectively are labeled as belonging to some language family. Every language for that matter is group of dialects. The group of the languages represents the languages those have some common morphological features. To be a part of any group of the languages geographical closeness is not warranted.  

And it is prominently claimed that the spread of some language is because of the population movement in remote past. It is claimed that Proto-Indo-European language speakers were settled at some place and for reasons unknown migrated in different directions and wherever they reached PIE did spread.  Though there is dispute over what the original homeland of PIE speakers was, there so far is no dispute over the spread of the language to form a distinct group.

Though I strongly object to this hypothesis on the scientific and logical grounds, for time being let us be with this theory taking it a fact for time being.

If some people, speaking some proto-language spread for reasons, wherever they went the basic structure of the languages spoken in the areas they settled must be the same. Linguistic biology is sometimes invoked while proposing this theory of IE group of the languages. If this considered true, I have following points:  

1)      The PIE languages, after spread, formed regional varieties. How the regional variety process would have taken place?

2)      Though unknown is the basic structure of the PIE language the affinities in the group languages is striking in some cases whereas vague in many. They painfully have to establish the relationship with artificial reconstructions of the proto-language.

3)      The differences are notable with region to region. Such as the IE’s spoken in European countries and in India in different regions.

4)      There are intermediary blocks where unrelated to surrounding group languages are spoken. Brahui, Munda etc. are the examples those are surrounded by IE language speakers. Their so called isolation or migration from some place is not an answer to this vital problem. If PIE language spread across the globe with a process why the same couldn’t have been applicable to such odd cases?

To sum up, even if we accept the group of language theory we find there are regional varieties, somewhere very striking somewhere vague. Not that the group languages are intelligible to all those who are part of that so called group. And this doesn’t solve a question, why there are regional varieties of the same language and why it did take separate path?

I think this is the major question linguistic scientists should give more attention. A most probable answer offered is, wherever PIE speakers went they mingled with local populations, borrowed and improvised their vocabularies and the language grew thereafter unique and yet biologically related with PIE language. If we consider this too is true, we have to assume that wherever PIE speakers went and subjugated local languages. They borrowed from them but kept their basic structure of their own language undisturbed. Because of the local languages PIE bred with it became different and yet it could maintain its own superiority.

But we must understand here that in disguise of PIE language expansion theory nothing new is told to us than what Aryan race Theory was telling. In a way we are stalled here. They are telling us the same story in different words. It doesn’t talk of psychology of the language. Rather it believes that the languages can be imposed, so much so that the native languages can lose their original basic structure. But the fact about IE languages is that they too then have lost their original structure, whatsoever hypothetically it was!

We need to look in to the problem of the languages from different point of view. The need arises because the present postulations are lame in their arguments and proofs. Spread of some language speaking people to effect group of the languages across the territories is an easy answer to a complicated question. It does not take into the consideration linguistic psychology. It runs away from the basic question, how some language that was so powerful to influence others could have been originated and among whom and where? The geography of the PIE language is as yet uncertain and hypothetical. There cannot be the proof from material remains of the culture as to what languages the people were speaking in those times. The available proofs, the language of Avesta, Rig Veda and the treaty of Bogazkoi or Horse Manuel of Kikkuli tells us far less if not more. Language and contents of Avesta and Rig Veda tells us just their geography being close and that language of Rig Veda, though close to the Avesta, is significantly modified later. The language of Bogazkoy treaty tells us that some deities and demons and numerics from the east were known to them. We cannot take it as a solid proof of Aryan Language expansion theory. It doesn’t tell us why in certain close geographies IE could not spread! Geographically the Semitic language speakers and Dravidian language speakers are very close and they have interactions from millenniums and yet we find there is no remarkable influence of IE languages on them.

To conclude this chapter we can sum up as:

1)      Language is psychological phenomenon supported by physical organs.

2)      Though genetically human being is same (The variation amounts for just 0.50%) the languages show variety of differences. There are over 6000 languages in the world distributed in several families.

3)      Local geological features govern the general psychology of the people that reflects in local culture and the language.  

Sunday, December 13, 2015

Restrictions on liberty or protection of the liberty?

Liberty not always is violated by the authorities, no matter whether they are political, religious or economic. There exist many other elements in the overall body of the society that too attempts endlessly to rob you from your individual liberty. Attempts of the parents to make their child “cultured” of their own estimate, force their ideas upon him which they have accumulated from the society and so-called heritage. In schools too kid is bombarded with the values those are thought to be superior over other societies, to make him nationalist, culturist and if possible religious citizen of best kind. The out sided forces are so much so that they in some or other way try to control your thinking process, politically or religiously which means restriction of the freedom of the individuals to think and act independently. If the process of enslaving the kid to make a good citizen out of him begins so early, what liberty would mean to him?

Just talking of political liberty or tyranny of majority may not be enough when we dream for real liberty. Conditioning of human mind from childhood by the parents and society is equally dangerous to the concept of liberty. If mind is conditioned notions of the liberty too will be conditioned and hence the liberty will always be tainted with the slavish sentiments. Talk on Liberty thus becomes just a fashion to enchant the intellectuals which rather prefers limited liberty, accepting some restrictions for the harmonious co-existence.

However, if closely investigated, we will find that our definitions of the liberty are problematic because they are made by the people those have grown up in the problematic conditions. Solutions to the problems they have faced or facing may seem liberty to them but it may not cover all the aspects of the liberty.

People are ultimately grown up in the environment where purposely their mind is conditioned right from childhood. Freedom from X or Y is felt when they counter them and decide X or Y are the obstructive to their freedom. To remove X or Y from their way they think leads them to the freedom. Freedom to them thus becomes political, economic or religious in nature. The institutions they think are hindrance in their way to their “free” action they think are tyrant. Any institution for that matter is always tyrant to some or other extent. The gravity of the felt tyranny changes with what the people feel about the institution. In a way concept of liberty becomes secondary because it does not come into existence in absence of tyranny, real or false.

Coming back to the starting point, why parents desire to make their child “cultured”? Culture in a way is collective subconscious activity of the people that reflects in people’s actions. The culture varies with time and geography. The cultural ethics and practices too vary, significantly, with people to people and region to region. Making a person “cultured” would mean making him able enough to cope up with the accepted social norms while aspiring for well being of his self, family and the society he lives in. He should not create any nuisance, treason or any harmful act that will cause disturbance in the smooth functioning of his society. The liberty too is set within the circle of such norms.  Liberty thus has the guidelines, many a times tending to go in contrast with the very concept of liberty.

This way liberty would mean one thing at front door and other, may be opposite, when at back door. Norms may change with society to society and time to time. There is nothing like absolute liberty in the world because no matter how the definition of the liberty is widened it always will be restricted by some guidelines, laws and institutional rules. Liberty to an American and Indian, that too depending on to which class, caste, sect or religion he belongs, would not mean the same, no matter how carefully it has defined. The words convey differently to the different people belonging to the different sections and the different environments they have grown up with. The conditioning of the mind, deliberate or not, decides what one may take the liberty as! The fact is the society is the first factor that begins encroachment on the liberty of its newcomer citizens. It begins with the restrictions. The restrictions of the law are secondary about which we mostly always are sensitive, but what our approach is towards the society?

Would this mean the liberty always be shadowed by some kind of self sanctioned slavery? Wouldn’t it mean that the liberty our thinkers are seeking is the liberty restricted by, whether less or more, laws? Why absolute liberty would be impossible, because absolute liberty may mean anarchy…lawlessness? Would it mean to have a society without any social obligations?

Politically liberty may mean anything depending upon the philosophies and understandings of the liberty they have under their arms. Leftist or rightists or socialists may claim how they desire to protect the liberty of the individuals, but indirectly it becomes enforcement of restrictions on the liberty. The government is not only law maker but a machinery to enforce them. Most of the time people feel that the laws no more protect their liberty; instead they restrict their freedom to think and act rationally. Direct and indirect restrictions even in libertarian social systems are so much so that the meaning of liberty has become more and more ambiguous and obscure. Liberty has become, in a way, dream song for a person who is governed by many forces against his will.

The questions will arise here that whether man is afraid of liberty, whether by nature he likes to be governed, does by nature he likes to govern others while being governed? Forces governing to the government could be abstract in nature, but they still do exist and even topple the governments at times. When people desire for the government of some nature that does only mean that they inherently need a government that can enforce power upon them to maintain law and order. And at other end people, individually, strive for the liberty! It is a kind of paradox, with which our society is shrouded.

We have to go to the roots of the human nature. Is liberty mere a hypothetical concept that everybody dreams for but do not want it in practice? Is liberty thought to be just for individual without his caring for the equal liberty of the other individuals? Is liberty a force that is applied to restrict others liberty and not protecting it?

Parents are at liberty as to how to nurture their kid. They are at liberty to mend their kid with teaching the values they feel best to their understanding. They may even plant their unfulfilled dreams in their kids mind, inspiring him to walk in that direction to achieve them. Parents have that liberty. But as far as kid is concerned, wont it be restriction on his liberty by imposed values and dreams? Would he be at his own liberty to make his own choice of the values and dreams? May be that he manages somehow to obtain his freedom, when grown up, but to what extent? The values taught at home and in school and in colleges keep on haunting the individuals for their life forcing him to define liberty in restricted sense.

However, liberty just is not a hypothetical concept, it has the practical implications. Hence it has to be dealt with utmost care. Also we will have to think whether restricted liberty is needed or protection to the individual liberty is expected from the governments. And the last and main question will be whether at all government is needed that somehow restricts the liberty or we need just an institution (not government) that will perform the role of protector of the liberty and nothing else?


(To be contd.) 

Friday, December 11, 2015

अश्वत्थामा भेटला.....

मध्यरात्र उलटून गेली होती. माझे लिहिणे सुरुच होते. दंगावुनच गेलो होतो मी माझ्या पात्रांत, घटनांत. पुढच्या संभावना लिहिता लिहिताच दृष्टीसमरुन तरळत होत्या. बाहेर निरव शांतता. क्वचित कधी पहारेक-याचा काठी आपटण्याचा आवाज. पण त्या आवाजाने मी कधीच डिस्टर्ब झालेलो नाही. उलट निरवतेच्या पाठीवरील सपकाराच वाटे तो. त्याखेरीज निरवताही कशी कूस बदलणार? 
कोणास ठाऊक, मला मृत्य्चे अनिवार कुतुहल आहे. माझ्या अनेक कादंब-या मृत्युचे गूढ उलगडायचा प्रयत्न करतात. हाती काही अंतिम असे लागले नाही तरी संभावना अनेक आहेतच की! त्या शोधायला मला खूप आवडते. कधी कधी मी निखळ तत्वज्ञानाच्या रस्त्याने चालतो तर कधी चमत्कृतीपुर्ण कथानकेही वापरतो. लोकांनाही आवडतात वाचायला. त्यांना त्या समजलेल्या असतातच असे नाही. अनेकदा तर असे होते कि लिहितांना जे माझ्या मनातही नव्हते ते गृहित धरून समिक्षकही समिक्षा करतात. हसू येते मला ते वाचून. पण चालायचेच. मनुष्याचे मन कशाबद्दल काय विचार करेल हे कधी उमजलय का कोणाला? 
मी लिहिणे थोडे थांबवले. अत्यंत वेगाने टायपत असल्याने बोटे दुखायला लागली होती. लिहित असलेला प्रसंग एका उंचीवर आला होता. त्याला अजून कसे उंचीवर नेता येईल? विचार करायलाही अवकाश हवा होता. 
मी थोडा मागे रेललो. लिहिलेले पुन्हा वाचले. मग पाणी प्यायलो. बाथरुममद्ध्ये गेलो. मुततांना मला एक भन्नाट कल्पना सुचली. दोन तीन ओळी उडवून आता जे सुचले ते जोडत नेले कि प्रसंगाची दाहकता, त्यातील मर्मभेदीपणा अजून वाढणार होता. मी बाहेर आलो. खुर्चीवर बसून की प्यड वेगाने बडवू लागलो.
तेवढ्यात डोअरबेल वाजली.
आधी लक्षच दिले नाही. टायपण्याचा वेगही कमी केला नाही. पण पुन्हा एकदा डोअरबेल वाजली.
मग लक्षात आले कि ही मध्यरात्र आहे आणि तरीही कोणी बेल वाजवतय. वाटलं, वाचमन असेल. मी नाईलाजाने डफडत...तळतळाट देत उठलो. काय असेल याचं काम? कधी असा येत नाही तो. काहीतरी गंभीर झालं असावं का? पण मग चेयरमनची नाहीतर सेक्रेटरीची बेल वाजवावी ना...मलाच कशाला ताप?
दार उघडलं. दुर्गंधीचा एक अस्पष्ट भपकारा आला. बाहेरचा दिवा पेटवला. धक्काच बसला. समोर वाचमन नव्हता. एक ओंगळ धोतर, का काय असेल ते, वस्त्र कमरेला गुंडाळलेला दाढी वाढलेला तरुण उभा होता...
आणि त्याच्या कपाळाभोवती एक रक्ताळलेले जीर्ण वस्त्र होते.
आणि त्याचा चेहरा वेदनांनी पिळवटलेला होता.
आणि त्याच्या नाकावरून रक्त ओघळत होते.
कोण आहे हा? 
कोणी मारलय का त्याला?
आणि येथे कसा आला हा? 
हा तर तसा शहराबाहेरचा भाग. 
रात्री कुत्रंही फिरकत नाही इकडे.
चोर वगैरे सोडून.
माझा घसा कोरडा पडला.
बरे तोही माझ्याकडॆ वेदनांनी ओथंबलेल्या डोळ्यांनी अपलक पहात होता. काही बोलत नव्हता. काही सांगत नव्हता कि मागत नव्हता. मी दार बंद करुन वाचमनला बोलावून या अभद्र माणसाला हाकलून द्यायचा निर्णय घेतला व दार लावू लागलो.
"मला आत येवू द्यात. मला काही नको. फक्त जरा तेल हवे आहे...माझ्या जखमेवर लावायला. बोलायला मिळाले तर बोलायलाही मला हवेच आहे." त्याच्या स्वरात आर्जवही नव्हते कि धमकीही नव्हती. एक सपाट पण शुद्ध आवाज. रात्रीच्या निरवतेच्या स्तब्ध तारेवर उमटलेले झंकार जसे.
"तुला वेड लागलंय. परक्या लोकांना एवढ्या रात्री कोण घरात घेइल? आणि मला काम आहे...जा तू..."
"मला तेल हवेय माझ्या जखमेवर लावायला. किती काळ गेला...कोणी देत नाही. गांवात नाही कि वस्तीवर नाही. शहरांत तर नाहीच नाही. मला फक्त तेल द्या...एखादे स्चचःअ फडके असेल तर तेही द्या. मला तुम्ही निराश करू नका...शेवटी तुम्ही माझ्यावर कादंबरी लिहिलिय..."
"तू...तू....तुम्ही " मी जवळपास ओरडलोच...
"होय. मी अश्वत्थामा!"

मी आनंदातिरेकाने बेशुद्धच पडलो असतो. 
मला काय प्रतिक्रिया द्यावी हेही सुचत नव्हतं. 
भानावर आलो. त्याचा हात हाती घेतला. विनम्रातिविनम्र स्वरात म्हणालो...."या आत या. मला क्षमा करा...मी ओळखलं नाही तुम्हाला. पण खरं म्हणजे तुम्ही आजही आहात यावर काडीएवढाही विश्वास नव्हता मला."
"पण असलो पाहिजे ही आशाही होती. नाही?"
"हो." मी शरमत म्हणालो. त्याला आत आनले. हालमधील दिवा लावला आणि त्याला सोफ्यावर बसवले. "आशाच काय तेवढी अजरामर आणि आपण मर्त्य. आज जीवंत वाटणारी सृष्टी उद्या आपल्या सभोवती नसणार...आपण कोठे असणार...प्रश्नच प्रश्न. थांबा हं एक मिनिट...आधी तेल आणतो. कि असं करु...माझ्याकडे जुन्या चिघळल्या जखमांवर लावायचे एक मलमही आहे. ते लावू कां? लवकर बरी होईल ती जखम..."
त्याने त्याच सनातन खंबीर खिन्नतेने मान हलवली. 
"नको. माझी जखम बरी होणारी नव्हे हे तुला माहितच आहे. बरे तेल लावल्यानेही वेदना कमी होतात असे आता काही राहिलेले नाही. वेदनांनी माझी साथ युगानुयुगांसाठी पकडली आहे. सवयच झाली आहे मला वेदनांची...इतकी कि जर यदाकदाचित त्या बंद झाल्या तर वेडा होईल मी! पण जखमेवर तेल लावत राहण्याची भ्रामक सवयही युगांची आहे. ती जात नाही. कपाळावरच्या जखमेवर स्वच्छ पट्टी नसली कि अस्वस्थ व्हायला होतं. तेलच आण. आणि स्वच्छ कापड. बघतोहेस ना किती जीर्ण झालंय ते? किती भटकलो. कोणी तेलही दिलं नाही कि कापडाची साधी पट्टीही. आता ही पट्टी जीर्ण चिंधी झालीय केंव्हाही अशीच गळून पडेल अशी."
मी पटकन किचनमद्धे गेलो. लाईट लावली. तेलाची किटली शोधायला जरा वेळ लागला. घरधनीन घरात नसेल तर अशा वेळी काय होतं याची चरफड झाली. मी बाहेर किटली घेऊनच आलो. आता स्वच्छ कापड. पण ब्यंडेजच लावले तर? फर्स्ट एड किट हालमधेच होतं. मी ते कपाटातून काढलं.
"ते नको." अश्वत्थामा म्हणाला. 
"का? हे अत्यंत स्वच्छ असतं...हायजिनिक...माफ करा...निर्जंतूक...हेच बरे राहील तुमच्या जखमेवर..."
"असेल. पण मला कापडच हवं"
"बरं" मी म्हणालो. पण असं कापड घरात कोठलं? मी बेडरुममद्ध्ये आलो. माझा एक शुब्र शर्ट होता...इस्त्री घालून ठेवलेला. मी तो बाहेर काढला. परत हालमद्ध्ये आलो. फर्स्ट एड किटमधील बारकी कात्री काढली आणि शर्टाचा पाठचा भाग कापून काढत त्याची अशा रितीने घडी केली कि अनेक काळ टिकेल.
"आपण जरा तुमची जुनी पट्टी काढू. जखम स्वच्छ करू. मग ही पट्टी मी बांधून देतो."
पण माझे बोलणे पुरे व्हायच्या आधीच त्याने आधीची जीर्ण पट्टी अक्षरशा उपसून काढली. आभाळावर रक्त ओकणारा सुर्य असावा तशी त्याची भळभळती जखम उघडी झाली. मी शहारून गेलो. हादरुन गेलो. येथेच याचा तेजस्वी मणी होता. तेज लोपले होते. नव्हे कृष्णाने ते उपसून, हिरावून घेतले होते. तेथे होती आता एक चिरवेदना देणारी जखम. मी शर्टाच्या उरलेल्या अवशेशांनी त्याचे चेह-यावरचे रक्त पुसू लागलो. मग जखमेपर्यंत गेलो...पण स्पर्ष करायची हिंम्मत होईना. वेदना होतील. मी थबकलेलो पाहून त्यानेच माझ्या हातातील कापड ओढून घेतले आणि स्वतंच्याच हातांनी खसखसून जखमही पुसली. असे करतांना त्याचा चेहरा वेदनांनी पिळवटत होता...पण कोणताही आर्त उद्गार त्याच्या ओठांतून बाहेर आला नाही. 
माझा चेहरा पिळवटला जात होता...जणू ती जखम माझ्याच शरीरावरची होती.
त्याने आपली जखमही पुसली. रक्ताचे नवे थेंब आपोआप सनातन शापासारखे पुन्हा जखमेवर उगवले. ते असेच अनंत काळ उगवत राहणार होते. त्याने हलक्या हातांनी ते टिपले. 
"पाण्याने चेहरी धुऊन घेऊयात...मी पाणी आणतो...कि चलता बाथरुममद्ध्ये?"
तो जरा रेलला होता. डोळे मिटून आपल्या वेदनांना गिळू पाहत होता. त्याच्या उघड्या छातीवरही साकळलेल्या-ताज्या रक्ताचे ओघळ होते. मी पटकन उठलो. बाथरुममधुन पाण्याची बादलीच आणली. दुसरा शर्ट काढला. तोही आणला. पाण्यात बुडवून त्याचे छाती, चेहरा स्वच्छ करू लागलो. एवढे सोपे नव्हते ते. कित्तेक वर्षांचे साकळले रक्त ते! याला अंघोळ घालायला हवी. मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या डोळ्यांतील भावना जणू त्याने वाचल्या होत्या. 
"स्नान नको. मी नेहमी स्वच्छ जलाशयांत स्नान करतो. पण आजकाल ते शोधायला फार पायपीट करावी लागते. असो. मी शोधेन एखादा तसा पाणवठा. तू खूप केलेस माझ्यासाठी. आता जरा तेल लाव जखमेवर आता. मग मी माझी पट्टी बांधतो." तो म्हणाला.
मी किटलीतून चमच्याने त्याच्या जखमेवर तेल ओतले. ओघळ वाहिले...पण त्याच्या चेह-यावरची वेदना विश्रांत होतांनाही दिसत होती. 
"आता बास...." तो म्हणाला. मी घडी केलेले शर्टाचे कापड उचलले आणि माझी मदत नाकारत जखम झाकत मस्तकाभोवती गुंडाळली आणि हलकेच गाठ मारली.
"आता जरा बरे वाटतेय. हा मला विसावा नाही. माझ्या वेदनांना विसावा आहे. त्यांनी तरी किती काळ आकांतत रहायचे? त्यांना विसावा हवा. मलाही हवा. वेदनांच्या निगूढ सावलीतील विसावा जरा बरा असतो. त्यांनाही कंटाळा आलेला असतो ना माझ्या सोबत रहायचा? त्या बिचा-या काय करणार शेवटी? हे माझे विधीलिखित कि वेदनांचे हे समजले नाही मला कधी."
माझ्या मनात अनंत प्रश्न उमदळत होते. 
मला सर्वांचे उत्तरे पाहिजे होती.
पण याला भुकही लागली असेल याची जाणीव झाली आणि मी भौतिक प्रश्न विचारला...
"तुम्हाला भूक लागली असेल. घरात आहे, वाढू का?"
त्याने माझ्याकडे पाहिले. वेदनामय हास्य केले. म्हणाला-
"मला भूक लागत नाही. पोटातील आतड्यांनी कधीच अन्न मागणे सोडून दिलेय. मागणी असते फक्त वेदनांची...तेल तेल आणि तेल...कोणत्या युगात आजही जगतात या वेदना कोणास ठाऊक!"
मी काही बोललो नाही. प्रश्नांचीही एक वेळ असते. आश्चर्याची भावना ओसरायचीही एक वेळ असते. समोर माझ्या चक्क अश्वत्थामा होता. मी त्याच्यावर वीस-बावीस वर्षांपुर्वी कादंबरीही लिहिली होती. प्रचंड गाजलेली. कादंबरी लिहितांना अश्वत्थाम्याची भळभळती जखम हे मी एक प्रतीक म्हणून घेतले होते. तेंव्हा मी एक जवान, अतिउत्साही आणि सर्वांनाच आव्हाने देत सुटलेला वेडा पीर होतो. आज पुलाखालून खूप पाणी गेले आहे. म्रूत्युबद्दल मी जोही काही विचार करतो ते मरण हे एक वास्तव आहे हे मान्य करुनच. त्यात भाकड पुराणकथांतील अश्वत्थाम्याच्या चिरंजीवित्वाला स्थान नाही. मी बुद्धीवादी झालोय. चिरंजिवित्व हे थोतांड आहे आणि मृत्यू हे वास्तव आहे हे मी मानय केलेच आहे...जरी माझी पात्रे ते मान्य करत नाहीत. 
कारण हे वास्तव आणि इच्छाजगातील द्वंद्व आहे. भावनिकता माझी इश्वर मान्य करते आणि माझा बुद्धीवाद तो मान्य करुच शकत नाही.
पण समोर अश्वत्थामा आहे.
म्हणजे त्याचे वेदनामयी चिरंजिवित्व हे वास्तव आहे.

वास्तव काय आहे?

भ्रम काय आहे?

वास्तव हे सत्यच असते काय?

भ्रम हेच सत्य असले तर?

काहीच सत्य नसेल तर?

मला माहित नाही. मी माझ्या विचारांच्या धुक्यातून शांत बसलेल्या अश्वत्थाम्याकडे पाहतो. मी स्वप्नात नाही हे मला चांगलेच माहित आहे कारण मी स्वप्नांवरच कथा लिहित होतो याची आठवण मला टक्क आहे आणि मी माझ्या कथेचा उत्कर्षबिंदू अजून उंचीला जावा यासाठी काय नवी कल्पना लढवली याची आठवणही ताजी आहे.
तेंव्हा ना मी स्वप्नात आहे ना मी भ्रमात आहे.
माझ्या समोर अश्वत्थामा आहे...
पुरातन काळातून आलेला. 
हे वास्तव आहे.
हा भ्रम आहे.
ही कल्पना आहे.
आणि तरीही अश्वत्थामा माझ्यासमोर आहे हे सत्य आहे.
पण ते जग कदापि मान्य करणार नाही.
याच्या सोबत सेल्फी घेऊयात का काही?
अवघे विश्व चकीत होईल.
खरेच?

लोक त्या फोटोला ’धुर्तपणे केलेली फालतू आणि खोटारडी प्रसिद्धी’ म्हणतील.
नकोच ते.

जे माझ्यापुरते आणि माझ्यासाठी आहे तेच सत्य. बाकीच्यांना ओरडून सांगण्यात काय अर्थ?

मी पुन्हा अश्वत्थाम्याकडे पाहिले. त्याच्या कपाळावर आताच बांधलेली पट्टी, जखम ज्या जागी होती, तिथे लालसर झालीय. त्याचा अनंत काळचा भुतकाळ याक्षणी माझे वर्तमान आहे आणि त्याची पुरातन वेदना आता मी भोगतो आहे.
"तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचेही होते..."
मी कसाबसा आठवून म्हणतो. 
"हं...खूप काळ झाला मी कोणाशीच बोललेलो नाहीय....माई तेल द्या तेल...एवढे सोडून...आणि त्यालाही आता काळ उलटला. कोणी तेल दिले नाही कि जखमेवर बांधायला कपड्याचा नवा तुकडा...कोणी माझ्यासाठी दारही उघडले नाही. भूत-पिशाच्च समजत...."
आणि त्याने वेदनांनी ओथंबलेला चेहरा जरा खाली झुकवला.  
मी आकांतमय झालो.
काय विचारावे त्याला? मनात प्रश्न उमदळताहेत आणि तरीही विचारावे वाटत नाही. सारे कुतुहलच जणू मरून गेलेय. अश्वत्थामा आहे. ती कल्पना नाही. महाभारत खरेच घडलेय. या माणसाने निद्रिस्त वीर खरेच मारलेत. पण किती काळ झाला त्याला? कल्पनाच वाटावी अशीच ती घटना. कादंबरीत मी ती अगदी जीव तोदून रंगवली होती. दुष्ट पांडव आणि सृष्ट कौरव आणि कर्णाप्रमाणेच दुर्योधनासाठी अखेरपर्यंत जीवापाड संघर्ष करणारा अश्वत्थामा.
तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या वेदनाळलेल्या चेह-यावर मंद स्मिताचा गुलाबही उलल्यासारखे मला वाटले. कि भास होता तो? 
"हे बघ...सारं घडलं आहे ते जसं लिहिलं गेलं तसच घडलं असं नाही. जे लिहिलं गेलं ते लिहिणा-याचं मत होतं...त्याला समजलेल्या घटनांचं आकलन होतं आणि काव्यात लिहितांना त्यानं आपल्या प्रतिभेनं त्या घटनांना अजून वेगळंच रूप दिलं. ज्या घटनांत मी स्वत: सामील होतो, मी स्वत: निर्णय घेतले आणि वागलो त्या घटनाही मला त्या वेळेस समजल्या होत्या तशाच होत्या असेही नाही. तसेच ज्याही कृत्या मी केल्या असे मला वाटते त्या कृत्याही जशा घडल्या असे मला वाटले तशाच घडल्या असेही नाही."
मी गोंधळलो.
"म्हणजे, व्यासांनी लिहिले ते खरे नाही? ते त्रिकालज्ञानी होते ना? ते खोटे कशाला लिहितील?"
"त्यांनी खोटे लिहिले असे मी कधी म्हणालो? त्यांना जे कळलं, त्यांनी त्याचं जसं आकलन केलं आणि काव्यमय शब्दांत प्रतिभेचे फुलोरे जोडत लिहिलं. त्यांच्या दृश्टीने त्यांनी जे आकलन केले व लिहिले ते खरेच आहे. त्यांनी लिहिलं. ते वाचून तुही तुज्या कल्पनाशक्तीचा वापर करत महाभारत उलटे पालटे करुन टाकलेच कि! दुर्योधनाला...कौरवांना सारे जग वाइट म्हणत असतांना तो वाईट कसा नव्हता हे महाभारतातील घटनांतुनच दाखवून दिलेसच कि! आता व्यास खरे कि तू खरा?"
"पण...पण कौरवांवर महाभारताने अन्याय केला. दुरोधनाने प्रजेशी कधी वाइट वर्तन केलं नाही. तो जुगारी नव्हता. कौरवांनी मिळून एकाच स्त्रीला फशी पाडून ल्तिच्याशी ग्न नाही केलं. त्याने कोणालाही कपटाने नाही मारलं. ते जाऊदे, गुरु व पितामहांना मारणारे खरे अपराधी कि ज्यांनी धर्मानेच वागायचे ठरवत मरण पत्करले ते पापी? व्यासांना कसला धर्म अभिप्रेत होता? अधर्मच कि!"
तो जरा रेलून बसला. वेदनांची लाट थोपवण्यासाठी क्षणभर डोळे मिटले. 
"हे तुझे आकलन. ते त्यांचे आकलन. त्यात मी माझ्या आकलनाची भर कशाला घालू? आणि धर्म म्हणजे तरी काय रे? माणसागणिक धर्माच्या व्याख्या बदलत जातात. रोजच...क्षणोक्षणी बदलत जातात. मग धर्म म्हणजे काय? कोणाचा धर्म आणि कोणत्या वेळचा त्याचा धर्म? असे काही नसते. म्हणजे धर्मच नसतो. पण तो असल्याचा...आणि आपल्याच बाजुचा असल्याचा भ्रम मात्र नक्कीच असतो."
"तुम्ही अजब बोलत आहात...पण तुम्ही हजारो वर्ष भटकताय भालावर वागवत नियतीचा निघृण शाप! तुम्हाला जास्त माहित. बोला तुम्ही...ऐकतो मी."
"हं...खूप काळ बोलावसं कोणाशीतरी असं वाटत होतं खरं. पण आता ती इच्छा अचानक मेलीय. काय बोलायचे? कशासाठी? स्वत:शीच बोलत आलोय अनंत काळ...एवढं कि बोलणंही असंबब्ध होऊन जावं. निरर्थक. काळाच्या पडद्यावर कसलाही ठसा न उमटवता विरून जातं. बोलणं. जे विरून जातं ते खरे कसे असेल? ज्या घटनाही विरुन जातात त्या तरी ख-या कशा? तर तू महाभारत उलटे-पालटे करून टकले. मला न्याय देण्याचा प्रयत्न केलास. घटना त्याच होत्या...पण तू त्याला तत्वज्ञानाची डूब देत सत्य-असत्याबाबत नवे प्रश्न निर्माण केले. महाभारत द्रौपदीसाठी नाही कि कौरवांच्या दुष्टपणामुळे नाही, द्रोणचार्यांंना दृपदाने जेथे अवमानित केले तेथेच पुढचे महाभारत घडणार हे अटळ झाले असेही तू लिहिलेस. असेलही तसे. नाहीतर दृपदाने द्रौपदी आणि धृष्टद्युम्नाला कशाला जन्म दिला असता? द्रौपदीला पाच भावांशी कसे लग्न करू दिले असते? तर्क तसा बरोबर आहे. काव्य लिहितंनाहे व्यासांनाही पाच भावांशी एका स्त्रीचा विवाह खटकत होताच. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पाच कथा बनवल्या...स्पष्टिकरण करण्यासाठी. हे ठीक आहे. पण खरेच तसे होते का? म्हणजे खरे मला माहित आहे असे नाही.  खरेच पाच जणांशी द्रौपदीने विवाह केला काय, हेही मला निश्चयाने सांगता येणार नाही. पण त्यांनी केला असे त्यावेळेस बाह्यात्कारी दिसत तरी होते तसे. पण दहा जणंशी जरी समज विवाह केला तरी ती दहा जणांची खरेच पत्नी झाली असे असते काय? म्हणजे प्रप्त कायदे व धर्मनियमांनी असूही शकेल. पंण माणसाचे मन या नियमांनीच बद्ध असते काय? द्रौपदीही तशीच बद्ध कशी असू शकेल? दिसणारी घटना, मनात चालणारी घटना आणि बाह्य व आंतरिक घटनांतील विभेद घटनेला नेमके काय स्वरुप देतील हे समजणे व त्याचे विश्लेशन करणे हा मानवी बुद्धीचा अपव्यय नाहे का? म्हणजे नेमके खरे काय हे केव:ळ बाह्य घटना ठरवणार काय?"
मी समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण समजत नव्हते हेही खरे आहे. असे असले तरी जे समजले होते तसेच त्याला म्हणायचे असेलच असेही नाही कारण शब्द सारेच म्हणने वाहून नेतात असेही नाही. भाषेची ती मर्यादा नाही काय?
मी मौन राहिलो.
मला ऐकायचे होते....हजारो वर्षांत अब्ज-खर्बावधी माणसे होऊन गेली, पण त्यांना लाभले नव्हते ते भाग्य मला मिळाले नव्हते काय?
"हे तुझे भाग्य नाही. मुळात ते नसतेच. अचानक एखादी अनपेक्षित व मनासारखी घटना घडली तर ती भाग्य वाटते एवढेच. बघ ना, मी इतकी वर्ष, कि शतके?, गेली, इतक्या दारे ठोठावली...नाही उघडले त्यांनी दार. तुही नसतेस उघडले तर मला वाईट वाटले नसते. पण ते दुर्दैवी नव्हते तसा तुही सुदैवी नाहीस. हे बघ तुला माझ्या जखमेकडे पाहून वाटतेय कि मी दुर्दैवी आहे. शापित आहे. तसे काही नाही. ज्यांना मृत्यू आहे तेही मग तसे दुर्दैवीच कि! समजा मी अजरामर असतो आणि ही जखम नसती तर मला तू दुर्दैवी म्हणाला नसतास. पण जखम नसली तरी जखम असतेच. अजरामराच्या किंवा मर्त्यांच्या काळजात, मस्तकात एक तरी भळभळती जखम असतेच! माझी जखम तर बहेरची आहे...कपाळावरची आहे. मी सुदैवी नाही का मग?" तो कसनुसा हसला. परत उसासा सोडत म्हणाला-
"मग व्यासही अमर आहेत असे म्हणतातच कि! अगदी माझे मातूल कृपही अमर आहेत असे म्हणतात. मला नाही मात्र ते कधीच दिसले. कोणालाच नाही दिसले. त्यांच्या आतल्या भळाळत्या जखमेवर तेल कसे लावणार, माझ्या लावले तसे?  ते जावू दे. त्यांना जखम, बाहेर असो कि आत, आहे कि नाही हे कोठे मला ठामपने माहित आहे? उगाचचची कल्पना ही कि आपल्याला असेल तसे तेथेही का नाही...माणुस विचित्र आहे खरा. देव-देवता तो मानसासारख्याच दिसत असतील, त्यांनाही पोरे-बाळे होत असतील...अशाच कल्पना करतो ना? आपल्याला पोरे होतात तशीच कोणा आदि-पित्यामुळे आदिमातेला गर्भ राहिला आणि ती सृष्टी प्रसवली अशी कल्पना नाही करत माणूस? माणसाच जग, त्याचे देव, त्याच्या सर्व झेपा त्याचा माणुसपणच्या मर्यादेतच असतात. त्याबाहेर नाही जावू शकत तो. आता हा मानवाला मिळलेला अटळ शाप आहे असे म्हणायचे काय?"
तो माझ्याकडे पाहतच बोलत होता. मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे मी ऐकत होतो. त्याच्या चेह-यावर आता वेदनाच्या कळवळाटाच्या आडून कसलेसे तेज झळकत होते. त्याची जखम रक्ताळली होती, जखमेवरचे कापड आता लालबुंद दिसत होते. 
"मला नेमके काय घडले हे जाणायचेय. प्लीज. कसेही असो...भले ते तुमचे दृष्टीकोन असतील...चालेल. शंभर टक्के सत्य समजू शकत नाही हे मान्य...पण नेमके काय झाले? म्हणजे ते युद्ध...भगवान कृष्ण...दुरोधनाचा मृत्यू....उत्तरेचा गर्भ...ही जखम..."
तो बरेच क्षण माझ्याकडे टक लावून पाहत राहिला. आता त्याचा चेहरा गंभीर होता. स्वत:च्या वेदनेची जाण जणू उरली नव्हती त्याला.
"मला फक्त माझे वेदना आठवते आणि ही वेदना अशी कि वेदनेला मुळीच विसरू देत नाही. मी काय घडले हे कशात हरवले हे माहित आहे?" 
मी निराशेने नकारार्थी मान हलवली.
"माझ्याशी घडलेल्या घटना, माझ्यापासून दुरस्थ घडलेल्या घटना, त्या घटनांनी कसे घडायला हवे होते त्या माझ्या वाटण्यातील घटना आणि ज्या घटना खरेच घडल्या कि नाहीत हे न समजता त्या जशा घडल्या असाव्यात असे जे मला वाटले त्या माझ्या अर्धकल्पित घटना...या सा-या जंजाळात ख-या घटनाच हरवून गेल्यात....त्यात या सतत अंतरीचा तळ ढवळून काढणा-या वेदना. असं समज तू लिहिलंस ना कादंबरीत ते जवळपास तसंच घडलं. त्यामागील प्रत्येकाचे खरे विचार भावना वेगळ्या असतील, सर्वच घटना व्यासांनीही लिहिल्या नसल्याने तुलाही माहित असण्याचे कारण नाही. तू त्या टाळल्यास किंवा रिकाम्या जागा भरायला तुझी कल्पना वापरलीस. आता या काळातील कल्पना त्या काळात कशा लागू होतील? तुला हस्तिनापुर काव्यात कसे आहे आणि प्रत्यक्षात कसे हे थोडेच माहित? बरे, कौरव शंभर नव्हते हे तू समजलास ते बरोबरच आहे. पण दुष्टांची संख्या जास्त दाखवल्याखेरीज नायकाचे महत्व ते काय राहणार? बरे, मी दुर्योधनाचा मित्र....मला नायक तो वाटला तरी तोही नायक नव्हताच! खरे तर कोणीच नायक नव्हता."
"कृष्णही नाही?"
तो हसला.
"ते जाऊदे. नायक अशी बाब मुळात अस्तित्वात असते काय? खलनायकाचेही तसेच! तोही कोठे अस्तित्वात असतो? कोणाला नायक ठरवायचे नि कोणाला खलनायक हे आधे कवि ठरवतात आणि मग त्यांना अनुसरणारे मुढ लोक. हा झगडा आहे. खरे तर आपल्या अंतरातला. तो बाहेरही होतो. स्वत:शी आणि इतरांशी...सतत लढत राहतो. प्रेमही या लढ्याचाच एक भाग नाही का?"
मला धक्का बसला होता, पण मी आतुरतेने त्याच्या बोलण्याची वाट पाहत राहिलो.
"हे बघ, वेदना झंझावातासारख्या उफाळताहेत....मला असह्य होते कधी कधी हे जगणे. असे वाटते कडेलोट करून घ्यावा. म्हणजे तसा प्रयत्न मी केला नाही असे नाहे. केला. पण वेदनेला मृत्यू असतो का कधी? ती अजरामरच असते. मी अमर नाही. अमर आहे माझी वेदना. ती आहे तोवर वेदनेसोबत फरफटत जाणे हीच आहे माझी नियती. हे बघ हे पहाड, हे घोंगावते वारे...हे मध्यम चंद्रप्रकाशात गुरफटून झोपलेले अरण्य....वेदनाच जणू थकून पहुडल्यात....हे विश्वच चिरवेदना आहे. वेदनेतुनच विश्वाचा जन्म झाला...माणसाचाही. मी अश्वत्थामा या सर्व वेदनांचे मुर्तिमंत रुपच नव्हे काय? मग मला कसा असेल मृत्यू?"
त्याचा चेहरा एकाएकी धुकट झाला होता. गार वा-याच्या झोताने माझ्या अंगावर शहारा आला. मी चमकून त्याच्या चेह-यावर खिळवलेली नजर वळवली. कोणता पहाड होता हा? हे अरण्य कसले होते? या आकाशात हा कसला चंद्र उगवला होता? काळ्या-निळ्या आभाळात हे कसले रंगित ठिपके विखुरले होते? माझा फ्ल्यट कोठे होता? मी कोठे होतो? हे काय होत होते?
मी पुन्हा पाहिले. अश्वत्थाम्याची धुसर आकृती त्या आभाळालाही जणू आव्हान देत उभी होती.
"होय. मी वेदना आहे आणि म्हणूनच अजरामर आहे. ते माझ्या मस्तकावरील मणी, उत्तरेच्या गर्भावर मी चालवलेले ब्रह्मास्त्र वगैरे सा-या कविच्या थापा."
"मग...मग ही जखम...?" मी त्या घोंगावणा-या वा-याला भेदून जाईल अशा आवाजात विचारलं.
"जखम?...हो आहे खरी. तेल मागणारी जखम. खरे तर सर्वच लोकांच्या आतल्या...बाहेरच्या वेदना आकांतत तेल मागत असतात. विसावा शोधत असतात. त्यांना एक प्रतीक हवे असते. त्यांनी ते माझ्यात पाहिले. आपल्या स्वत:च्या चिरवेदनेला एक समाधान शोधले. सर्वांची जखम मी माझ्या भाळा घेतली. रानोमाळी सैरावैरा फिरत दारोदारी तेल मागत राहिलो."
तो मौन झाला. 
मी आसमंतावर नजर फिरवली. खरेच सृष्टी चिरंतन वेदनांच्या निगूढ छायेत पहुडली होती...तरे तिचे आर्त उद्गार पाना-फांद्यांतून उसळत होते. मी तरी मृत्यूवर एवढे चिंतन का करतो? हृदयाच्या तळघरात मीही माझ्या वेदना गाडून ठेवल्यात नि त्या अधनं मधनं कासाविस करत आव्हान देत असतात म्हणून. मरणावर उत्तर शोधावे वाटते कि वेदनांवर उत्तर शोधावे वाटते? मृत्यू वेदना नाही...आनंद आहे...पण आनंद कोठे आहे? कि सर्वच फक्त वेदना? 
शोध वेदनेचा घ्यायचा कि मृत्युचा?
कि सारं खोटं?
मी आसमंतावर पुन्हा नजर फिरवली.
अश्वत्थाम्याकडे पाहिले.
ट्युबच्या प्रकाशात त्याच्या चेह-यावरील वेदना अधिकच गहि-या झालेल्या दिसल्या.
तो उठला. 
"उशीर झाला आहे. मला आता जायला हवं." 
"नको अश्वत्थाम्या..."
"मी तुझ्याजवळ आहेच कि...तुझ्या वेदनांच्या रुपात. जाता जाता एक सांगतो."
मी कुतुहलाने त्याच्याकडे पाहिले.
"तू एक प्रश्न उपस्थित करत अनुत्तरीत सोडून दिलास तुझ्या कादंबरीत..." तो दाराकडे चालता चालता म्हणाला.
"कोणता?"
त्याने दार उघडलं. बाहेर पाऊल ठेवत वळाला. म्हणाला,
"हेच... माझ्या आयुष्यात प्रेम करावं अशी स्त्री का आली नाही...म्हणजे तू संभावना दर्शवल्यास पण तुझा नायक मी...कदाचित मला जगावेगळा दाखवण्यासाठी तू तो अनुत्तरीतच सोडून दिलास."
"हो...नाही म्हणजे..."
"हे बघ मला आठवतं ते एकच सत्य...मी प्रेम केलं. आजही करतो."
मी अपार उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत राहिलो.
"कोण होती ती?"
त्याने मस्तकावरील पट्टी ठाकठीक केली. माझ्याकडे पाहिले. अस्फूट स्वरात म्हणाला...
"तीच कृष्णा...द्रौपदी..."
तो वळाला आणि पाहता पाहता निघुनही गेला. मी धावलो त्याच्यामागे.
पण तो नव्हता.
मागे उरली होती एक कधीच न शमणारी वेदना.
* * *

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...