Wednesday, March 27, 2019

A significant alternative view on the history of Hinduism

(Dr. Sanjeev Sabhlok has written this article, published in TOI, which analyses my theory on Hindu-Vedic religions and the caste system. Must read.


A significant alternative view on the history of Hinduism

March 27, 2019, 3:31 PM IST  in TOI Edit Page | India | TOI
I’m taking a short break from political and economic matters to discuss Hinduism. I don’t have any religion but have considerable interest in the history of religions.
Sanjay Sonawani, a Marathi writer has proposed a rather different view about Hinduism than the one propounded by Hindutva ideologues. His books, Origins of the Vedic Religion: And Indus-Ghaggar Civilisation and a recent book, The Origins of the Caste System: A New Perspective challenge commonly held views about the origin of Hinduism and caste. If his thesis is true, then it will have social and political impacts in India by reshaping the beliefs of hundreds of millions of people.
According to him, Hinduism is a jigsaw puzzle and current theories of Hinduism and caste don’t fit. The main theory is that the Vedic religion is the source of Hinduism but Sonawani believes it is not possible for the fire-worship and non-idol worshipping Vedic belief system to have suddenly morphed into fertility-occultism and idol worship. From Kedarnath, Kashi and Somnath across to Hampi, many Hindus follow an ancient Shaivite and fertility worship tradition which is fundamentally different to the Vedic religion. Sonawani believes that Khajuraho or Konark cannot have possibly arisen from Vedic thought. And of course, if the Vedas are indeed the source of the “common” variety of Hinduism, why are Vedic gods missing from places of Hindu worship?
Apparently some scholars have reconciled this problem by claiming that idol worship was added to Hinduism during the Purana era. This, however, does not reconcile with archaeological proofs about the remote ancestry of fertility worship. Also, the ritualistic practices of the Vedics are based on Vedic guidelines (Vedokta) while Hindus conduct their rituals with Puranokta (based on tantra).
Sonawani’s research shows that Hinduism and the Vedic religion are entirely distinct. Moreover, and this is likely to be even more important if true, he finds that jati (commonly but mistakenly associated with caste) is entirely unrelated to Hinduism, being a mere economic occupational category prevalent in ancient Indian society. He shows that jati was not rigid and its relative rigidity is only a thousand years old. He believes that this happened because of economic forces and opportunistic attempts by the Vedics during India’s medieval economic crisis to graft their varna system on jatis. If this is true, then jatiswould dissolve quickly once the Indian economy liberalizes and the poor get an opportunity to rise.
These are bold claims but have been tested widely in Maharashtra. Sonawani’s three editions in Marathi have received innumerable responses but no one has been able to refute his thesis. So it is time for the nation’s scholars to look into it and work out whether this proposal makes sense.
Sanjay Sonawani finds that the Vedic religion came into ancient India via a relatively few Vedic refugees from South Afghanistan. These refugees had fought numerous wars with their co-religionists (the Zoroastrians) and had been forced to flee. But entirely separately, for thousands of years, India had seen the evolution of an occupational jati system. The jatiswere mobile, being based on technical expertise and innovation. Occupational guilds were an expression of the economic clout of these jatis which remained dominant at least till the tenth century A.D. and also issued their own coins.
Socio-political and economic circumstances began to change for the worse from the tenth century, including a series of terrible famines and the take over of trade by new Muslim rulers, so the guilds finally collapsed. These crumbling guilds established defensive barriers to entry in order to minimize competition. These events led to the fabled self-reliant villages, where occupations become more and more hereditary.
In the meanwhile, the Vedics had, after almost two thousand years, managed to finally gain a small political foothold during the Gupta era through royal patronage. This gave them the opportunity to proselytize, with their first goal being to create and increase the number of Brahmins. They now had the resources to motivate priests of ancient Hindu temple to convert into Vedic Brahmins. Sonawani shows that Hinduism did not have any Brahmins and, in fact, till today a number of Hindu temples do not have any concept of Brahmin. By “upgrading” these priests, the Vedics were now able to take over many valuable Hindu assets and rewrite Hindu texts to introduce varna. Once the Vedics had managed to persuade Hindus to install them at the top of the pyramid, the rest was easy.
The economic collapse that took place a thousand years ago gave the newly converted mass of Vedic Brahmins the opportunity to link the by-now more rigid jati system with varna, by claiming that the poor economic condition of the “lower” jatis was the outcome of actions in their previous births. Caste assemblies inadvertently reinforced this message of segregation of jatis in their economic self-interest to shut out competition. At the same time, the Vedics launched a major attack on the ancient system of tantra, gradually causing the Hindus to suspect their own previous worldview. A sense of impurity and pollution was introduced into Hinduism, leading to the development of untouchability. Despite this, many Hindu rituals and idols continued to remain tantra-centric and a significant level of social and occupational mobility remained.
With the arrival of the British, the Brahmins gained a further opportunity to advance their Vedic agenda. The Brahmins were the first to explain Hinduism to the British. The British liked to think about Vedic supremacy and claimed that it came from the West. The magnitude of the seeming takeover of Hinduism by the Vedics seemed so significant that the British thought that this could only have occurred as a result of a major invasion. The Aryan Invasion Theory was therefore promoted and received a huge boost. The British began consciously preferring the “higher” varnas for administrative appointments and did not study of the tantra traditions and the religion of the common people outside the big towns.
They also started classifying Indian people into five different “races” and began looking for a racial link between jati and race – if true, this would further support their sense of superiority. In this conducive atmosphere, some Vedics began dreaming of a full-fledged revival of the Vedic religion – something even the Brahmins had ever thought of trying in the past.
With power in their hands, the modern caste “system” was now ready to be created. The British census provided a convenient tool. During the census, many jatis sought to “upgrade” their varna by changing caste names (today, of course, many jatis seek to reduce their official social status, it being more profitable to do so). In this manner, the superficial and half-baked British histories of India and Hinduism manage to obscure what had been widely known till their time – that Hindu and Vedic religions were distinct. Subsequent generations of Indian elites have grown up with this distorted British view, given also the fact that many Vedics managed during British times to launch pro-Veda movements.
This racist history of Hinduism had strong political implications. The elites from the “lower” jatis, who had been mis-educated through British interpretation of Indian history, now underwent an identity crisis. Many blamed Brahmins and the Manusmriti, having forgotten that they (the jatis) had themselves chosen to hunker down into a hereditary system a thousand years ago. Anti-Brahmin movements began and many caste conflicts became violent.
Sonawani’s research demonstrates that while Manusmriti is problematic in some ways, its intent and reach was extremely limited – only to the very few Vedics at his time. It had no role in humiliating the “lower” castes since it was never used against them. To grasp this Sonawani asks us to understand the origin of the Shudras. Shudra was the name of a tribe into whose lands the band of Vedic refugees first settled. The Vedics later broadened the use of this term to mean all non-Vedics. Manu notes the existence of many neighbouring Shudra kingdoms which shows their political and economic clout in comparison to the Vedic refugees. At the same time, the Vedics were able to hire a few low income Shudras as personal servants. It was to prevent the intermixing of the Vedics with these servants, something which was starting to occur, that Manu dictated his humiliating commands against the servants. These commands were not intended, nor could the feeble Vedics refugees possibly have applied them to the broader Shudras (the Hindus).
According to Sonawani, it is very clear that Vedic project to graft varna on egalitarian Hinduism did not quite work out as intended. The mapping of jatis to varna is a failed project. Many similar jatis have been mapped onto different varnas in different parts of India because of local economic conditions. Thus, a jati is touchable in one region of India but untouchable in others. This further proves that there is no link between jati and varna. The “caste system” is therefore, in Sonawani’s view, a figment of the imagination of historians who have been tutored in ignorant British interpretations of history.
Sonawani believes that Hinduism is entirely egalitarian and must be rescued from the embrace of casteist Vedic religion. He believes that underlying Hinduism is entirely consistent with liberalism.
I would like to see significant and urgent research on Sonawani’s thesis across the archaeological and history departments of various universities of India and the world.

Sunday, March 24, 2019

घोषणांच्या वर्षावात देश कर्जबाजारी!




बजेटचे सूप वाजले. या बजेटमुळे जी आर्थिक दुरवस्था ओढवू शकणार आहे त्यावर जेवढी साधक-बाधक चर्चा व्हायला हवी होती ती सुरूही झाली नाही तोवर पुलवामा घडले. मग झाले एअर स्ट्राइक्स. सारा देश शोक-संताप आणि देशभक्तीच्या अतोनात कल्लोळावर हेलकावे घेऊ लागला. भारतातील भावनिक लाटा जेवढ्या तातडीने उठतात तेवढ्याच तातडीने विरतातही. पुलवामाप्रकरणीही तेच झाले. तोवर निवडणूक, उमेदवार पळवापळवीसारख्या चर्चांना उधाण आले. "चौकीदार चोर हैं" या राहुल गांधींच्या घोषणेपासून प्रेरणा घेत लगेच "मैं चौकीदार" या प्रतिघोषणांचा महापूर सुरू झाला. या उन्मादी पण अनुत्पादक क्रिया-प्रतिक्रियांच्या नादात सुजाण म्हणवणाऱ्या २१ व्या शतकातील जनतेने आपल्या देशासमोर उभ्या ठाकलेल्या जवळपास सर्वच समस्यांकडे साफ दुर्लक्ष केले.

मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर सत्तेत आल्यापासून सतत अपयश येत राहिले. ते कसे हे आपण मागेही अनेक संदर्भात चर्चा करताना पाहिले आहे. घटता विकास दर, वाढती वित्तीय तूट आणि वित्तीय संस्थांनाच अनेक कारणांनी जवळपास कसे दिवाळखोर बनवले गेले हेही आपण पाहिले. शेवटी सरकारी वित्तीय संस्थांना सरकारला आर्थिक साहाय्य द्यावे लागले आणि तरीही ही समस्या मिटलेली नाही. या बजेटने उदारहस्ते अनेक लोकप्रिय घोषणा केल्या असल्या तरी त्यामुळे वित्तीय तूट वाढण्यापलीकडे अर्थव्यवस्थेवर विशेष सकारात्मक परिणाम कसा होणार नाही याचीही चर्चा आपण केली होती. ती चर्चा नकारात्मक नव्हती. टीकेसाठी टीका हा उद्देश तर मुळीच नव्हता. सरकारच्याच आकडेवाऱ्या पंतप्रधानांच्या दाव्यांना अनेकदा खोडून काढत आलेल्या आहेत. या वेळेसही तसेच घडले आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारचे कर्ज ५१% नी वाढले असून आता ते ८२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ही आकडेवारी केंद्र सरकारच्याच कर्जाबाबतच्या पाहणी अहवालाच्या आठव्या आवृत्तीत प्रसिद्ध झालेली आहे. ही माहिती कोणी विरोधी पक्षाने प्रसृत केलेली नाही, सरकारनेच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे याकडे आपल्याला एक नागरिक म्हणून अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अर्थात असे अहवाल जनता कधी वाचायच्या फंदात पडत नाही हे आता सरकारला माहीतही झाले आहे. त्यामुळे असत्याच्या बोलबाल्यापुढे सत्य झाकोळून जाते. डॉ. मनमोहन सिंग सत्तेवरून पायउतार झाले तेव्हा सरकारवरील कर्ज ५५ हजार कोटी रुपये होते. गेल्या साडेचार वर्षांत या कर्जात कमी होणे तर सोडाच, पण निम्म्याहून अधिक वाढ झालेली आहे. याचाच अर्थ प्रत्येक नागरिकावरचा बोजा वाढला आहे.

हे असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक शिस्तच नसल्याने वित्तीय तूट वाढत गेली, जमा रकमेपेक्षा खर्चच अधिक राहिला आणि उत्पन्न वाढवण्यासाठीचे अन्य मार्ग शिस्तबद्ध पद्धतीने न राबवल्यामुळे कर्ज काढून तुटीचा प्रश्न सोडवण्याचा सोपा पण अर्थव्यवस्थेला घातक मार्ग वापरला गेला. जीएसटीचे उत्पन्न सुरुवातीपासून एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिले, त्यात भर पडायला हवी होती, पण क्लिष्ट अंमलबजावणी आणि वारंवार बदल यामुळे हा कर लागू केल्यापासून एकदाही उद्दिष्ट पूर्ण होईल एवढे करसंकलन करता आले नाही. तूट मग कशी कमी होणार? या वर्षीची वित्तीय तूट वाढतच गेली आहे. उदाहरणार्थ यंदा संपूर्ण आर्थिक वर्षाची वित्तीय तूट ६.२४ लाख कोटी रु.च्या मर्यादेत ठेवण्याचा निश्चय मोदी सरकारने व्यक्त केला होता, पण केवळ पहिल्या आठ महिन्यांतच तुटीच्या रकमेने ७.१७ लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला. म्हणजेच आठ महिन्यांतच ११४% नी वित्तीय तुटीची मर्यादा ओलांडली. याचाच दुसरा अर्थ असा की, हे वित्तीय वर्ष संपत असताना सरकारच्या कर्जात अधिकची भर पडली असेल. शिवाय या कर्जावरील व्याजाचा बोजा पडतोच आहे ते वेगळे. हे काही आर्थिक सुदृढतेचे लक्षण नव्हे.

मोदी सरकारच्या काळात ही सरकारच्या कर्जात पडलेली अवाढव्य भर निर्माण कार्यांत खर्च होणार असती तर तिला आपण उत्पादक कर्ज तरी म्हणून शकलो असतो. पण मोदी सरकारने स्वत: घोषित केलेला बुलेट ट्रेनसहितच्या एकाही प्रकल्पाला अद्याप हातच घातलेला नाही. अनेक प्रकल्प असेच अर्धवट राबवले. मुद्रा लोन योजनेतील दिली गेलेली ७०% कर्जे बुडीत खात्यात गेली. घोषणा झाल्या, लोकांनी जयघोष केले, पण त्या योजनांचे तटस्थ मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला नाही. देश कर्जात बुडाला.

या स्थितीचा परिणाम असा झाला की, विदेशी गुंतवणुकीचा ओघ आटला. भांडवल बाजारातूनही काढता पाय घेतला. मुडीज या पतमानांकन संस्थेने भारताच्या जीडीपीबद्दल आधी व्यक्त केलेले अंदाज मागे घेतले आणि सरकारने घोषित केलेल्या विकास दरापेक्षा तब्बल ०.४% नी तो घटेल, असा नवा अंदाज गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच व्यक्त केला. ते होते न होते आता त्यात 'फिच' ही पतमानांकन संस्था सामील झाली आहे. 'फिच'ने भारताचा या आर्थिक वर्षातील विकास दराचा पूर्वी अंदाजित केलेला ७.८% हा विकास दर प्रत्यक्षात ७.२% एवढाच राहील, असा नवा अंदाज व्यक्त केला आहे, तर पुढच्या वर्षी (२०१९-२०) मध्ये हा विकास दर ६.८% एवढाच राहील, असे घोषित केले आहे. म्हणजेच विकास दरात यंदाही घट तर होणारच आहे, पण ती पुढच्या वर्षी आताच्याही पेक्षा जास्त असणार आहे.

हा विकास दर कमी होण्यामागे अर्थात फिचने कारणे दिली आहेत. सरकारी आणि गैरसरकारी वित्तीय संस्थांची अनावस्था, त्यामुळे बाजारात भांडवलाचा होणारा कमी पुरवठा, शेती क्षेत्राची पडझड अशी कारणे नोंदवलेली आहेत. भारतीय अर्थतज्ज्ञांना या स्थितीची पुरेपूर जाणीव आहे. फिचने त्यावर फक्त शिक्कामोर्तब केले, एवढाच फिचच्या सर्वेक्षणाचा अर्थ नाही. भारत हा गुंतवणुकीसाठी सध्या योग्य देश नाही, कारण तेथली अर्थव्यवस्था हव्या त्या वेगाने वाढत नाही, हा संदेश त्यातून जगभरात जाऊन भारतात येणारी गुंतवणूक अजूनही कमी तर होऊ शकेलच, पण भारताला बाह्य कर्जे उचलायची असली तर जादा व्याजदर मोजावा लागेल. शिवाय तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत नेमके काय चढउतार होणार आहेत याबाबत अंदाज वर्तवणे अशक्य असले तरी अन्य परिस्थितीमुळे आज देशातील वरकरणी आटोक्यात आलेला महागाई दर पुन्हा वाढू लागेल. म्हणजेच आता रिझर्व्ह बँकेने अवेळी घेतलेल्या व्याज कपातीच्या निर्णयाकडून पुन्हा व्याज दरवाढीकडे जाण्याचे सत्र सुरू होईल. म्हणजेच आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज दिशाहीन झालेली आहे, असे म्हणावे लागते.

मोदी सरकारकडे मुळात ठोस अर्थधोरणच नसल्याने ही दुरवस्था आली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यापासून महिलाशक्तीला स्वबळावर सबल करण्याचे धोरण राबवत देशाच्या आर्थिक प्रगतीला सकारात्मक दिशा देण्याचे काम झाले नाही, उदारीकरणाचे धोरण शेतीपर्यंत नेता आले नाही. हमीभावाच्या भूलथापांत उलट शेतकरी नागवलेच गेले. ते कंगाल राहिले म्हणजे देशाची ४०% जनता कंगाल करण्यात आली. मग देशाचा विकास दर कसा वाढेल? घोषणांच्या पावसाने अर्थव्यवस्था फुलत-फळत नाही याचे भान गमावल्याने सरकारवर नैतिक अंकुश ठेवायला कोणी उरले नाही. आज देश कर्जाच्या ओझ्याखाली चिरडला गेलेला आहे. विकास दरही घटताच राहणार अशी चिन्हे आहेत. अशा स्थितीत मग रोजगार वाढेल आणि शेतकऱ्यांचे हित होईल, अशी सुखद वाटणारी घोषणाबाजी कोणी करत असेल तर घोषणा देणारे आणि त्या ऐकत खपाटीला गेलेल्या पोटावर हात फिरवत खुश होणारे धन्य होत एवढेच म्हणावे लागेल!

(Published in Divya Marathi)

Sunday, March 10, 2019

रामजन्मभूमी : न्यायालयाचा सुज्ञ निर्णय




खरे म्हणजे न्यायालयाचे काम केवळ साक्षी-पुराव्यांवर चालते. भावनांना तेथे कसलेही स्थान नसते. पण बाबरी मशीद की रामजन्मभूमी? या दीर्घकाळ रेंगाळत असलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय खंडपीठाने मध्यस्थीसाठी तीन सदस्यांची मध्यस्थ समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. मध्यस्थी करत उभय पक्षात सर्वमान्य तडजोड घडवून या वादावर कायमचा तोडगा काढला जावा ही प्रामाणिक इच्छा सर्वोच्च न्यायालयाची आहे. समितीने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून दोन समाजातील तेढ कमी व्हावी आणि भळभळत्या जखमा बऱ्या होण्यास मदत करावी अशी सर्वोच्च न्यायालयाची अपेक्षा आहे. या पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कलीफुल्ला हे अध्यक्ष असतील, तर रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोघे सदस्य असतील. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत सुज्ञपणाचा आहे यात शंका नाही, पण या समितीचे काम किती तटस्थतेने चालते यावर मध्यस्थीचे काम कितपत यशस्वी होणार हे अवलंबून आहे.

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या येथील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. कारसेवेच्या निमित्ताने देशभर प्रचंड वातावरण तापवले गेले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर दंगलींचा उद्रेक झाला होता. या दंगलीतील हिंसाचार अंगावर काटे आणणारा होताच, पण पूर्वी कधीही न वापरले गेलेले दहशतवादी हल्ल्यांचे संकट साखळी बॉम्बस्फोटांमुळे कोसळले. यात शेकडो माणसे ठार झाली. रामजन्मभूमीचा आग्रह रामाबद्दलच्या प्रेमामुळे किती आणि राजकारणासाठी किती हा विषय नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. भारतीय जनता पक्ष या प्रश्नाचे उघड राजकारण करत आला आहे हे सर्वांना माहीतच आहे. किंबहुना प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात मंदिराचा विषय अपरिहार्यपणे असतोच. किंबहुना निवडणुका जिंकण्यासाठी रामाबद्दलच्या भावना भडकावल्या जातात हा आजवरचा इतिहास आहे. सर्वसामान्य हिंदूंना अयोध्येत राममंदिरात आणि सामान्य मुस्लिमांना त्या वापरात नसलेल्या आणि धार्मिक उन्मादात कोसळवल्या गेलेल्या मशिदीत खरेच कितपत रस आहे हा संशोधनाचा विषय आहे. किंबहुना हा वाद मिटवणे हा हेतू असल्याचेही कधी दिसले नसून स्फोटक किंवा भावनिक वक्तव्ये करण्यातच दोन्ही पक्षांनी, विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी धन्यता मानलेली दिसते.

२०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या वादाबाबत एक योजना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडली होती. या योजनेनुसार वादग्रस्त २.७७ एकर जागेचे तीन समसमान हिस्से करून मशीद असलेल्या भागाचा हिस्सा हिंदू महासभेकडे रामलल्लाच्या मंदिरासाठी, एक हिस्सा निर्मोही आखाड्याकडे राम चबुतरा आणि सीता रसोई असल्याचा दावा केला गेलेली जागा, तर उरलेला तिसरा हिस्सा सुन्नी वक्फ बोर्डाकडे सोपवण्यात यावा असे तीनसदस्सीय खंडपीठाने म्हटले होते. पण वादग्रस्त जागेवर मशिदीपूर्वी खरेच राम मंदिर होते की नाही याबाबत तिन्ही न्यायाधीशांत एकमत नव्हते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. पण जी योजना मांडली गेली होती तीत नाकारावे असे काही नव्हते. दोन वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी उभय पक्षांनी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढावा असा सल्ला दिला होता. पण त्याबाबतही पुढे काहीच घडले नाही.

आता ही मध्यस्थ समिती नेमली गेलीय, तिलाही निर्मोही आखाडा व सुन्नी वक्फ बोर्ड वगळता उत्तर प्रदेश सरकार ते हिंदू महासभेसहित अन्य हिंदूवाद्यांकडून आताच विरोध सुरू झाला आहे. पूर्वी झालेले मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे यातूनही काही निष्पन्न होईल असे वाटत नाही असे रामलल्लाचे वकील सी. एम. वैद्यनाथ यांनी न्यायालयासमोरच म्हटले. शिवाय या मध्यस्थ समितीवर जे सदस्य घेतले गेले आहेत त्यापैकी श्री श्री रविशंकर यांच्याबद्दल गंभीर आक्षेप आहेत. 'राम मंदिर झाले नाही तर भारताचा सिरिया होईल' असे चिथावणी देणारे वादग्रस्त विधान त्यांनी काही काळापूर्वीच केले होते. त्यामुळे ते या मध्यस्थता प्रक्रियेत कितपत तटस्थ राहतील यावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. या समितीचे अध्यक्ष एक मुस्लिम असल्याने अपेक्षेप्रमाणे हिंदुत्ववाद्यांचा त्यांच्यावर विश्वास नसणे हे ओघाने आलेच. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कायद्यापेक्षा भावनांना महत्त्व देत दोन्ही समाजांनी सुज्ञपणे डोके शांत ठेवून कायमस्वरूपी तोडगा काढत तडजोड करावी ही अपेक्षा कितपत पूर्ण होईल याबद्दल शंका येणे स्वाभाविक आहे.

राम मंदिर की मशीद? हा विवाद ऐतिहासिक तथ्यांवर किती आणि धार्मिक उन्मादासाठी किती हा विचार केला तर हे लक्षात येईल की, या प्रकरणात राजकारण हेच या दोन्ही मुद्द्यांवर मात करत आले आहे. त्यासाठी इतिहास आणि पुरातत्त्व खात्यालाही वेठीस धरण्यात आले आहे. किंबहुना हा वाद असाच चिघळत ठेवण्यात राजकारण्यांचा फायदा आहे हे उघड आहे. त्यामुळे काहीही तडजोड होऊ न देण्यातच कोणाचे जास्त हितसंबंध अडकलेले आहेत हे सर्वांना ठळकपणे माहीतच आहे. खरे तर धर्माचे राजकारण सर्वस्वी नाकारणे हे भारताच्या ईहवादी संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या दृष्टीने आवश्यक होते. पण तसे झालेले नाही. उलट धर्म हाच कळीचा मुद्दा बनवत सामाजिक शहाणपणाला तिलांजली देण्याचे काम घडत आले आहे. अन्यथा सोमनाथ मंदिराप्रमाणे हाही प्रश्न खूप आधीच शांततामय मार्गाने तडजोड होऊन सुटला असता आणि देश हिंसेच्या उद्रेकापासूनही वाचला असता. पण तसे झाले नाही. उन्मादात मशीद पाडली गेली. त्यामुळे दोन समाजांत दुही आणि अविश्वास वाढवण्यापलीकडे काहीही सकारात्मक झालेले नाही. यातून आपण कोणते राष्ट्रहित साधत आहोत हा प्रश्न ऊठसूट राष्ट्रभक्तीच्या गप्पा हाकत बसलेल्या हिंदुत्ववाद्यांना पडत नाही. मुस्लिम बाजूही त्यामुळे आक्रमक होत हिंदू बाजूच्या सूचनांना भीक न घालता आडमुठेपणा करते हाही या प्रकरणातला अनुभव आहे. साठ वर्षे चाललेल्या या दाव्याने समस्त भारतीय समाजमन ढवळून टाकले आहे. हिंसेचे उद्रेक भोगले आहेत तरीही शहाणपणा येत नसेल तर त्याला जबाबदार राजकीय आणि धर्मांध शक्तीच आहेत असे म्हणावे लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने मानवतेच्या भावनिक बाजू लक्षात घेऊन कायद्यापेक्षा दोन समाजातील वाद एकदाचा मिटावा आणि परस्परांत असलेली तेढ संपावी या प्रामाणिक हेतूने मध्यस्थता समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे तिन्ही सदस्य नि:पक्षपातीपणे कामकाज पाहतील आणि या प्रकरणातील वादी-प्रतिवादी बाजूही समंजसपणे वागतील आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढतील अशी आशा आहे. शेवटी सामाजिक शांततेसाठी आशावादी राहावेच लागते. मध्ययुगीन सूड आणि हिंसक भावनांना थारा देत या प्रकरणाकडे पाहिले तर मग हा प्रश्न या समितीमुळेही सुटणार नाही. या प्रश्नाचे केवळ राजकारण होत धार्मिक तेढ कायम ठेवली जाईल. त्यामुळे या प्रश्नावर अंतिम तोडगा काढत तो कायमस्वरूपी सोडवला जाणे आणि सामाजिक प्रगल्भता दाखवणे ही काळाची गरज आहे. मध्यस्थ समिती अत्यंत प्रगल्भतेने वागेल व कायमस्वरूपी तोडगा काढेल यासाठी तिला मन:पूर्वक शुभेच्छा आणि अत्यंत सुज्ञ निर्णय घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार!

(Published in Divya Marathi)

Wednesday, March 6, 2019

स्वत: प्रथम हिंदू व्हा!


सोनवणी सर, उत्तर द्या!
माझे मित्र प्रशांत आर्वे यांनी माझ्या हिंदू धर्म आणि वैदिक धर्म स्वतंत्र आहेत या सिद्धांतावर आक्षेप घेत एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी भारतात घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करत माझे मत हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कसे विघातक ठरू शकते हे दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. तो ‘साहित्य चपराक’च्या जानेवारीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला. या निमित्ताने सांस्कृतिक चर्चेला महाराष्ट्रात बहर येऊ पाहतो आहे हे निश्‍चितच सुखावह आहे. त्यांच्या आक्षेपांना सविस्तर उत्तर देणे हे महत्त्वाचे आहे कारण हे व असे आक्षेप माझ्यावर घेतले गेले आहेत. या सर्वांनाच एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न मी या प्रत्युत्तरात्मक लेखात करणार आहे. अनेकदा याविषयक माझे सर्व साहित्य न वाचताच माझ्यावर आक्षेप घेतले जातात, त्यामुळे आक्षेपात फोलपणा कसा येतो हेही या निमित्ताने वाचकांच्या समोर येण्यास मदत होईल अशी आशा मला आहे.
लेखाच्या सुरुवातीसच प्रशांत आर्वेंनी पोपच्या 1999 मधील विधानाचा आधार घेत एकविसाव्या शतकात आशिया आणि विशेषत: भारत आमचे लक्ष्य असणार आहेत हे विधान उद्धृत करुन द्रविडस्तानाची पुन्हा नव्याने मागणी, खलिस्तानवाद्यांचा पुन्हा उमटू लागलेला सूर वगैरे गोष्टी पोपच्याच विधानाचे प्रत्यक्ष उमटणारे पडसाद आहेत असे सुचवले आहे. ब्रिगेड आणि मूलनिवासीवाद्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन गढूळ केले, या घटनाही आकस्मित नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. कोरेगाव भीमा प्रकरणही एका व्यापक कटाचा भाग होता हे सिद्ध झाले आहे असाही त्यांचा दावा आहे. माझे मित्र असल्याने त्यांनी मीही पोपचा हस्तक आहे असे विधान वा आरोप केलेला नसला तरी माझा सिद्धांत पोपला सहायक ठरू शकेल अशी शंका त्यांना असल्याचे जाणवते. त्यांनी तसा सरळ आरोप केला असता तरी बिघडले नसते कारण माझ्यावरचा हाही आरोप नवा नाही.
मी ‘किस्त्रीम’च्या एका दिवाळी अंकात ‘आता एकच शंकराचार्य हवेत!’ असा एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. या लेखात मी सर्व हिंदू समाजाला एका सूत्रात बांधायचे असेल, हिंदूंना वर्ण, जातीभेद नष्ट करुन समतापूर्ण वातावरणात आणत सर्व हिंदू एकसमान ही भूमिका घेत धर्मगुरु या नात्याने वर्तमान सर्व सोळा शंकराचार्यांनी एकत्रित नवा धर्मादेश जारी करावा आणि सर्व धर्माधिकार (वेदोक्तासह) सर्व हिंदू समाजाला आहेत असे घोषित करावे अशी मांडणी केली होती. सर्व शंकराचार्यांना तीन-साडेतीनशे लोकांच्या सह्यांची पत्रेही पाठवली होती. त्याला एकानेही प्रत्युत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही हा भाग अलाहिदा. हा लेख खूप गाजला पण जानेवारी 2008 च्या किर्लोस्कर मासिकाच्या अंकात एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आणि ती होती संघाचे विचारवंत श्री. मा. गो. वैद्यांची. त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की मी ‘व्हॅटिकनचा हस्तक’ आहे आणि माझे समग्र प्रतिपादन फिजूल आहे. धर्मात समतेची मागणी फिजूल आहे वा ती करण्याचा मलाच अधिकार नाही असे बजावून सांगत मला व्हॅटिकनचा, म्हणजेच पोपचा हस्तक ठरवणे हा संघाच्या एका जबाबदार माणसाच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे असे म्हणावे लागेल कारण विषमतेच्या वैदिक मूलतत्त्वावर उभ्या असलेल्या आणि हिंदू नाव घेत वैदिक धर्माचेच प्रतिनिधित्व करणार्‍या संघाची समतावादी भूमिका कशी असणार? समरसता नावाखाली चातुर्वर्ण्याचेच गुणगाण गात मनुस्मृती कशी शास्त्रशुद्ध समाजरचना मांडते हे सातत्याने बजावून सांगणार्‍यांकडून समतेची काय अपेक्षा बाळगणार? असो. येथे सांगायचा मुद्दा एवढाच की मला ‘पोपचा हस्तक’ फार पूर्वी ठरवले गेलेले आहे.
किंबहुना, ज्यावेळीस वैदिक धर्मियांना अडचणींचे प्रसंग येतात तेव्हा-तेव्हा ते लोकांचे लक्ष परधर्मीयांकडे वळवत राहतात हे आता नवीन राहिलेले नाही. मुस्लिम आणि नंतर ख्रिस्ती याकडे बोट दाखवणे आणि अडचणीच्या विचारवंत अथवा अभ्यासकांना त्या धर्मियांचे आणि तेही नाही जमले तर कम्युनिस्टांचे हस्तक ठरवणे हा वैदिकवाद्यांचा हातखंडा खेळ आहे. ब्रिगेड आणि बामसेफ यांचा मी कडवा वैचारिक विरोधक आहे (आणि ते आर्वेंनाही मान्य आहे) पण ते परकी शक्तींचे हस्तक आहेत हा आरोप अत्यंत गंभीर असू शकेल याचीही नोंद घ्यायला हवी आणि जर असाच आरोप करायचाच झाला तर संघ (सनातन, विहिंप वगैरे) ज्युंचे (इस्त्राएलचे) किंवा मोसादचे हस्तक आहेत असा आरोप झाला तर संघाची प्रतिक्रिया काय असेल? कारण संघाचे ज्यु प्रेम सर्वविख्यात आहे! तेव्हा असले हेत्वारोप कामाला येत नाहीत. जे चूक असते ते सार्वकालिक चूकच असते, मग ते कोणीही असो.
दुसरा मुद्दा द्रविडस्तानाचा. अलीकडे ही मागणी पुन्हा एकवार डोके वर काढते आहे हे सत्यच आहे पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रथम या मागणीने डोके वर का काढले होते? आर्य सिद्धांताच्या आहारी जात, इंग्रजांचे पुरातन रक्तबांधव ठरवून घेण्याच्या नादात ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हे कोणी लिहिले? आर्यांची पाळेमुळे मध्य आशिया ते उत्तर ध्रुवापर्यंत शोधण्याचा अवाढव्य प्रयत्न तेव्हा आणि आजही कोण करत आहेत? आक्रमक आर्यांनी द्रविडांना उत्तरेतून दक्षिणेत हाकलले हा प्रचार कोण करत राहिले? आर्य भाषागट आणि द्रविडभाषा गट ही विभागणी कोण करत राहिले? या सिद्धांतांना पाठबळ पुरवण्यासाठी हजारो लेख आणि शेकडो पुस्तके लिहित कोण पाठबळ देत राहिले? मग तुमचा वंश वेगळा, भाषागट वेगळा आणि आम्ही वेगळे तर मग आमचा स्वतंत्र देश हवा अशी मागणी का होणार नाही? पांचट सिद्धांताच्या आधारावर स्वत:ला श्रेष्ठ म्हणवून घेण्याच्या नादात वैदिक आर्यांनी जो उत्पात मांडला याचे थोडे जरी उत्खनन आर्वेंनी केले असते तर विभाजनवादाचे पाप कोणाचे हा प्रश्‍न आर्वेंना आणि त्यांच्या समआक्षेपकारी मित्रांना पडला नसता आणि याला पोपला जबाबदार धरणे (किंवा एखाद्या मुल्लाला) हा वैचारिक वांझपणा आहे. आज द्रविडस्तानचा विषय वर येतो आहे त्याला भाजप सरकारने संगम काळातील पुरातत्वीय स्थानांच्या उत्खननात आणलेले राजकारण आहे हे आर्वेंनी समजून घ्यावे.
पुन्हा अलीकडे वैदिक आर्य हे मूळचे भारतातीलच (म्हणजे हरियानातील) हे सिद्ध करण्याची टुम आली आहे. श्रीकांत तलगेरी, कल्याणरमन ते डॉ. वसंत शिंदे अशी ही रांग आहे. मूलस्थान आणि तेही केवळ वैदिक आर्यांचे शोधण्याची आजही ही धडपड का? आणि अनार्यांनी आपल्या मूळांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तो अपराध का? वेदरचना करणारा समाज तो आर्य असे समजा गृहित धरले तरी वेदरचना करत यज्ञकेंद्रीत धर्म स्थापना करणारा आणि तो अवलंबणारा समाज म्हणजे एका विशिष्ट धर्माचा समाज असाच त्याचा अर्थ होतो आणि समजा एका भागातून (मग तो उत्तर ध्रुव असो की हरियाना) अन्यत्रही हा धर्म पसरला असेल तर ते काम केवळ धर्मांतरानेच होऊ शकते आणि जे धर्म बदलतात त्यांचा धर्मांतराआधी कोणत्यातरी प्रकारचा धर्म असतोच आणि सर्वच लोक धर्म बदलत नसतात. वैदिक धर्म उत्तरेतील काश्मीरमध्ये दहाव्या शतकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि जेव्हा गेला तेव्हा मर्यादित लोकात आणि तेही अर्धवट पद्धतीने पसरला. सर्व भारतात हीच स्थिती आहे आणि होती. बव्हंशी लोक आपल्या मूळ धर्मालाच चिकटून राहिले या वास्तवाचे काय करायचे?
प्रश्‍न असा आहे की जर धर्म एकच आहे तर मग सर्व हिंदुंची पाळेमुळे शोधण्याऐवजी वैदिक आर्यांचीच पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न का झाला? ज्या देवी-दैवतांचा वेदांशी संबंध नाही, ब्राह्मण ग्रंथ ते स्मृतींतही उल्लेख नाहीत, योग-पूजादि कर्मकांडांचा उल्लेखही नाही ते वेद हिंदू धर्माचे मूलस्त्रोत कसे असू शकतील हा प्रश्‍न जर पडत नसेल तर मला वाटते आपण गहन अज्ञानात आहात किंवा स्वकल्पित समजुतींमध्ये आकंठ बुडालेले आहात आणि कल्पित समजांना कसलेही औषध किंवा उत्तर असू शकत नाही.
प्रशांत आर्वे यांना वैदिक धर्म आणि हिंदू धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीची गंभीरपणे दखल घ्यायला भाग पाडले आहे. माझ्या समाजमाध्यमातील पानसरे हत्याप्रकरणी मी केलेले समीर गायकवाड या तरुणाबद्दलचे वैदिकवाद्यांनी हिंदुंना हाताशी धरुन घडवून आणलेला कट… अशा आशयाचे वाक्यही उद्धृत केले आहे. मी याबद्दल आर्वेंचे आभारच मानतो.
‘सनातन’ या नावातच वैदिक शब्द लपलेला आहे. सनातन वैदिक धर्म किंवा सनातन धर्म हे समानार्थी शब्द आहेत किंबहुना वैदिक धर्म किंवा वैदिक संस्कृती या नावाने पं. महादेव शास्त्री असोत की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, अशा शेकडो वैदिक विद्वानांनी निरलसपणे या शब्दाचा प्रयोग केला आहे पण ते स्वत: वैदिक असल्याने त्यांच्या मांडणीवर कोणी आक्षेप घेतल्याचे माझ्या पाहण्यात नाही पण अवैदिक (म्हणजेच हिंदू) असलेल्या सोनवणीने दुसरा अवैदिक (म्हणजेच हिंदू) गायकवाडबद्दल विधान केले तर ते मात्र आक्षेपार्ह ठरते… हा कोणता वैदिक न्याय आहे? सनातन धर्माशी माझा किंवा समीर गायकवाडसारख्या कोणाही हिंदुचा संबंध आलेला नाही पण हे वैदिक एकीकडे स्वत:ला वैदिकही (किंवा सनातनीही) म्हणवणार आणि वर नाक करून हिंदू म्हणवून घेत हिंदुंचा वापर आपले जेही असतील ते हेतू पुरे करायचा प्रयत्न करत असतील तर त्याला विरोध का करु नये? की मीही ‘सनातन की जय हो’ म्हणत झुंडीत सामील होत वैदिकांची अपरंपार प्रशंसा मिळवायची? मला येथे पडलेला प्रश्‍न हा की या सनातनविरुद्ध आपल्या लेखात आर्वेंनी कसलाही आक्षेप का नोंदवला नाही? की ही सोयीस्कर भूमिका आहे?
आर्वे आणि माझे इतर आक्षेपकर्ते मित्र येथे हे विसरत आहेत की ब्राह्मण पुरुषांची कत्तल करुन त्यांच्या स्त्रीयांना उपभोगावे अशा स्वरुपाची विधाने करणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करणार्‍या पाच जणात मी एक होतो. जाहीरपणे त्याबद्दल लिहिलेही आहे. शिव्या-धमक्यांतून गेलेलो आहे पण ती बाब समजा बिनमहत्त्वाची आहे. प्रश्‍न असा आहे की हीच न्यायबुद्धी आर्वे किंवा त्यांच्या मित्रांनी कधी दाखवली? येथे मी धर्मभेद केला नाही. अगदी बाबासाहेब पुरंदरेंबाबतही मी न्यायाच्या बाजूने उभा राहिलो… नशीब की आर्वे ते तरी मान्य करतात.

जेव्हा हनुमंत उपरे नामक गृहस्थ ओबीसींच्या बौद्ध धर्मांतराची व्यापक चळवळ चालवत होते तेव्हा मी एकमेव होतो ज्याने सर्व धोके पत्करत त्याला विरोध केला. सामूहिक धर्मांतर होऊ न देण्यात यशस्वीही झालो… तेव्हा हे स्वत:ला हिंदू समजणारे वैदिक आणि त्यांच्या संघासारख्या संघटना कोठे होत्या? ते गप्प बसले कारण धर्मांतर झाले असते तरी ते हिंदुंचे झाले असते, वैदिकांचे नाही… मग हिंदुंनी धर्मांतर केले तरी त्यांचे काय बिघडत होते? उपरेंबाबत जे झाले ते पूर्वीच बाबासाहेबांबद्दल झाले. त्यांनी धर्मांतराची घोषणा करुन, तब्बल वीस वर्ष वाट पाहूनही वैदिक धर्माचार्य अस्पृश्यांना स्पृश्यता द्यायला पुढे आला नाही. संघही बाबासाहेबांच्या बाजूने आला नाही. संघाचा तर्क हा आहे की बौद्ध-जैनादि धर्मही हिंदुच आहेत. ही बनचुकवेगिरी झाली कारण बौद्ध-जैनादि धर्म तसे मानत नाहीत. शिवाय हे धर्म हिंदू किंवा वैदिक धर्मतत्त्वांपेक्षा वेगळी स्वतंत्र तत्त्वे पाळत असतात. असे असूनही तेही हिंदुच म्हणून विरोध केला नाही हे स्पष्टीकरण संघाला तरी कसे पटू शकते हे कळायला वाव नाही. मुळात संघ हिंदुंचा प्रतिनिधी नाही हे वास्तव संघाच्याच धार्मिक विचारप्रणालीतूनच दिसते पण अनेकदा भाबडेपणाच्या आवरणाखाली संघ धादांत असत्य रेटत आला आहे पण बाबासाहेबांचे लाखो अनुयायांसह धर्मांतर झाले. जर हे सर्वच धर्म एक तर मग मुळात धर्मांतर का झाले आणि मुळात त्याची गरज का पडली याचे चिंतन करण्याची गरज संघाला पडली नाही कारण ते नुकसान वैदिकांचे नाही, हिंदुंचे झाले. संख्या वैदिकांची नाही तर हिंदुंची कमी झाली! मग ख्रिस्ती/इस्लाम धर्मांतरांबाबत गळे काढण्याचा नैतिक अधिकार कोणी दिला?
वैदिक धर्मीय आजही वैदिक महत्तेत रममाण आहेत. अजूनही ते वैदिक विमाने उडवण्यात मग्न आहेत. ते चुकूनही तेव्हा हिंदू विमाने, हिंदू संस्कृती, हिंदू कृषी किंवा हिंदू अर्थव्यवस्था असे शब्द वापरत नाहीत. त्यांना हिंदू शब्द आठवतो तेव्हाच जेव्हा हिंदुंना वापरुन घ्यायचे असते आणि याला इतिहास साक्षी आहे. किंबहुना वैदिक आणि हिंदू धर्म आणि संस्कृती हे दोन स्वतंत्र भाग आहेत, ते एकजीव, एकजिनसी कधीच नव्हते, आजही नाहीत याचा हा एक पुरावा आहे. आता त्यांच्या पुढील आक्षेपांकडे वळुयात!
प्रशांतजींचे म्हणणे असे आहे की पुरोगामी सिद्ध करण्याची धडपड करतो आहे, डाव्या-उजव्यात संतुलन साधण्याचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आहे. हा आरोप किंवा समज असू शकतो आणि त्याला काही इलाज नाही कारण मी स्वत:ला काहीही सिद्ध करण्याची आणि तीही धडपड करतो हे म्हणणे हास्यास्पद आहे हे माझे लेखन वाचूनच समजायला हवे. किंबहुना बव्हंशी पुरोगामी (सध्याचे) प्रतिगाम्यांप्रमाणेच माझ्या विरोधात आहेत आणि त्यातील कोणीही माझ्या बाजूचे व्हावेत यासाठी मी कधीही प्रयत्न केलेला नाही आणि मीही त्यांना पुरोगामी मानत नाही कारण माझ्या भविष्यवेधी परिवर्तनशीलता म्हणजे पुरोगामित्व या व्याख्येत ते बसत नाहीत. राहिले डाव्या-उजव्यांचे, माझा या बाबतीत एक लेख ‘चपराक’मध्ये मागेच प्रसिद्ध झाला आहे. तो वाचावा एवढेच मी सांगू शकतो!
आता त्यांचा मुख्य आक्षेप. वैदिक कोण? त्यांच्या मते आजतागायत त्यांना हे स्पष्ट झालेले नाही आणि मी गुळमुळीत उत्तर देतो. आता हा आरोप गुळमुळीत आहे असे सहज म्हणता येईल कारण त्यांच्या ह्या लेखी असलेल्या गुळमुळीत उत्तरातही वैदिक कोण हे त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर आहे. वैदिक धर्मशास्त्रानुसारच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे त्रैवर्णिक असलेले द्विजवर्णीय हे वैदिक धर्मीय होत. यांना वैदिक अथवा सनातन धर्मीय म्हटले जाते कारण त्यांनाच सनातन वेदांचा, वेदोक्त कर्मकांडांचा, संस्कारांचा जन्मजात अधिकार असतो.जे या वैदिक परिघाबाहेरचे आहेत ते हिंदू धर्मीय. त्यांचे कर्मकांड तंत्राधारित (किंवा पुराणोक्त) असते. हा धर्म पुरातन असून त्याचे अवशेष सिंधू काळापासून सर्वत्र मिळतात. या दोन धर्मात कर्मकांड ते उपासनापद्धती स्वतंत्र आहेत. उतरंडीची समाजरचना आणि स्त्री-पुरुषातील असमानता हा वैदिकधर्मिय समाजशास्त्राचा मुलभूत पाया असून त्याउलट हिंदू धर्मातील समतावादी स्थिती आहे. ती व्यवहारातही होती. हिंदुंनी आपली कर्मकांडे आपल्याच तंत्रोक्त किंवा पुराणोक्त पद्धतीने करावीत असा वैदिकांचा नेहमीच कटाक्ष राहिलेला आहे. वैदिकांच्या दृष्टीने हा शुद्रांचा धर्म आहे आणि तरीही आर्वे दावा करतात की वैदिक संस्कारांचे संचित एवढे मोठे आहे की वैदिक आणि हिंदू असे वेगळे करणे अनेकांना शक्य झालेले नाही.
वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म किंवा हिंदू धर्म म्हणजेच वैदिक धर्म अशी मांडणी करायची असेल तर सर्वांना समान धर्मतत्व आणि धर्माधिकार असायला हवेत हे ओघाने आलेच! सर्वच धर्मांतील पुरोहित वर्गाला विशेषाधिकार मिळतात हेही खरे आहे पण पुरोहित व्हायचेच असेल तर तसे व्हायला सर्वांना समान संधी असते. त्यामुळे वैदिकांना हिंदू धर्मामध्ये विशेषाधिकार आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध गरळ ओकली जाते हे म्हणणे तथ्यहीन आहे. शिवाय सर्वच वैदिक मंडळी पुरोहित पेशा अंगीकारतात असेही नाही आणि तरीही त्यांचा वैदिक वर्ण आणि वेदोक्ताधिकार अबाधित असतात या वास्तवाकडे आर्वेंनी लक्ष दिलेले दिसत नाही.
माझा रोख वैदिक नावाखाली केवळ ब्राह्मणांकडेच आहे असा आर्वेंचा समज झालेला दिसतो. कलीयुगात क्षत्रिय आणि वैश्य उरलेले नाहीत. (मग भले परशुरामामुळे असोत की नंदांमुळे) या पुराणकथेचा त्यांच्यावर पगडा असू शकतो पण आजही कागदोपत्री का होईना क्षत्रिय आणि वैश्य वर्णावर दावा सांगणारे किंवा खरेच वैदिकाधिकार असलेले उच्चवर्णीय भारतीय समाजात आहेत या वास्तवाचा विसर पडून कसे चालेल? की या वर्णांचे अस्तित्व वैदिक धर्मगुरुंनी (किंवा समाजाने) पुरते अमान्य करुन टाकले आहे? अमान्य केले असेल तर त्यांना त्यांनी धर्मबाह्य केले असेच म्हणावे लागेल. नसेल तर मग खरेच परशुरामाने किंवा नंदाने या वर्णांना समूळ नष्ट केले असे म्हणावे लागेल. आता हे नष्ट करण्यात एकीकडे वैदिक असलेला परशुरामही जबाबदार आहे असे म्हटले जाते आणि दुसरीकडे शूद्र (म्हणजे हिंदू) नंदालाही जबाबदार धरले जाते. आता नेमके काय आहे हे ठरवण्याची जबाबदारी वैदिक धर्मातील शीर्षस्थानी असलेल्या ब्राह्मणांनीच ठरवायचे आहे. माझा तो मुळात धर्मच नसल्याने व त्यासंबंधी मला (किंवा अन्य कोणाही हिंदुला) तो अधिकारही नसल्याने वैदिक कोण हे वैदिकांनीच ठरवायचे आहे. त्यात मी कसा हस्तक्षेप करू शकतो? माझ्याकडून तशी अपेक्षाही कशी केली जाऊ शकते? माझा रोख केवळ ब्राह्मणांवर असता तर मला सुदैवाने तो शब्द टाइप करता येतो, लिहिताही येतो. मग मी वैदिक शब्द वापरायची चलाख खेळी का करेल? वैदिक धर्माच्या व्याख्येत तीन वर्णांचे लोक येतात आणि स्वतंत्रधर्मिय म्हणून मी तिन्ही वर्णांचा एकत्र उल्लेख करणे हेच शास्त्रीय आहे. आता ब्राह्मणांनाच फक्त वैदिक शब्द खटकत असेल तर तो दोष कोणाचा?
आता पुरुषसूक्ताबद्दल. ते अत्यंत कुप्रसिद्ध आहे असा आर्वेंचाही निर्वाळा आहे. ते ऋग्वेदात प्रक्षिप्त आहे असा सर्वच विद्वानांचा निर्वाळा आहे. हे सूक्त वैदिक आर्य भारतात आल्यानंतर रचले गेले अशीही मान्यता आहे कारण या सूक्तात संपूर्ण ऋग्वेदात कोठेही न उल्लेखल्या गेलेल्या शुद्र या समाजाची नोंद आहे. त्यामुळे वैदिक आर्य नव्या लोकांच्या सान्निध्यात आल्यानंतर याची रचना करत ऋग्वेदाला ते जोडले गेले. शूद्र या शब्दाची कोणतीही व्युत्पत्ती मिळून आलेली नाही. ही एक सिंधू नदीच्या परिसरातील एक जमात (टोळी) होती याचे पुरावे मात्र उपलब्ध आहेत. या सूक्तात काही वाईट नसले तरी याच सूक्ताचा आधार घेत वैदिक विषमतावादी धर्मशास्त्रे रचली गेली. हे सूक्त प्रक्षिप्त आहे, कुप्रसिद्ध आहे तर हिंदू देवतांच्या पूजाकर्मात कोणत्याही हिंदू देवतेशी संबंधित नसलेले हे सूक्त जाणीवपूर्वक का म्हटले जाते? अगदी श्रीविठ्ठल ते शांतादुर्गेपर्यंत या सूक्ताचा अनिर्बंध वावर का असावा? हे सूक्त विषमतायुक्त समाजरचनेच्या सिद्धांताच पाया मानले जाते. त्याचा पूजा-अर्चनेशी काही संबंध नाही. मग नेमक्या याच कुप्रसिद्ध सूक्ताची निवड पूजा-अर्चेतही का केली याचा उलगडा होतो. हिंदू देवतांचाही अवमान करण्यासाठी व आपली वैदिक महत्ता जपण्यासाठी या सूक्ताची निवड पूजादि हिंदू कर्मकांडात केली गेली हे उघड आहे! हे धार्मिक पाखंड वैदिकांनी का केले? मला वाटते, प्रशांत आर्वे व अन्य आक्षेपक मित्रांना या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर द्यावे लागेल!
शुद्र आणि आर्य हे वेगळे, स्वतंत्रपणे जन्माला आले असे यजुर्वेदानेही स्पष्ट केले आहे. त्रैवर्णिकांचा बाहेर असलेला समाज (मग ते शक, हुण, कुशाण, औंड्र-पुंड्रादि समाज का असेनात) ते शुद्र होत असे मनुस्मृतीच म्हणते. शुद्र हे आधी एका टोळीचे नाव होते पण नंतर ते त्रैवर्णिक नसलेल्या सर्वांसाठीच वापरण्यात येवू लागले असे राज पृथी व वि. का. राजवाडेही म्हणतात. या नावांची टोळी सिंध प्रांतात अस्तित्वात होती याचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. भारतात सर्वत्र शुद्रच राहत असावेत हा समज वैदिकांचा. त्यांचा धर्म वैदिक असणे शक्यच नव्हते. थोडक्यात वैदिक धर्माच्या कक्षेबाहेरील समाजांना सरसकट शुद्र समजले गेले. अन्य धर्मीयांचा उपहास करण्याची प्रथा सर्वच धर्म पाळतात त्यामुळे वैदिकांनी शुद्रांना तुच्छ व असंस्कृत समजणे अत्यंत स्वाभाविक होते. बौद्धही वैदिकांना किती तुच्छ स्मजत याचे विवरण ह्यु-एन-त्संगाच्या भारत प्रवासवर्णनात आलेले आहेच. हिंदुंनाही ते तुच्छच लेखत! त्यामुळे वैदिकांनी हिंदुंना तुच्छ लेखले यात नवल वाटायचे काहीएक कारण नाही.
पण येथे लक्षात घ्यायची बाब म्हणजे शुद्रांची उत्पत्ती स्वतंत्र आहे, धर्म-देवी-देवता स्वतंत्र आहेत तर मग हे दोन धर्म एक कसे होऊ शकतात? की केवळ आपला आग्रह आहे म्हणून त्यांना एक मानावे? पण धार्मिक जीवन मात्र स्वतंत्रच ठेवावे? असे होऊ शकत नाही. कोणताही समाजशास्त्रज्ञ असले वेडगळ मत फेटाळून लावेल! कारण तसे एककाकारत्व कधीच नव्हते याचा अगदी अलीकडचा, म्हणजे सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील एक निवाडा प्रसिद्ध आहे. तो मी जसाच्या तसा देतो-
कसबे पेण परगणे साकसे येथील समस्त ब्राह्मण हुजूर येऊन निवेदन केले की, श्रीमंत कैलासवासी नारायणरावसाहेब यांचे कारकिर्दीत परभूंचे कर्माचरणाविशी सरकारांतून ठराव करून दिल्हा, त्याप्रमाणे त्यांणी वर्तावे, ते न करिता आपला धर्म सोडून मनस्वी वर्तणूक करून चोरून ब्रह्मकर्म करितात, येविशी त्यांस ताकीद होऊन बंदोबस्त जाहला पाहिजे म्हणोन; त्याजवरून मनास आणितां पेशजी कैलासवासी तीर्थरूप रावसाहेब यांचे वेळेस चौकशी होऊन परभूंचे वर्तणुकेविशी कलमांचा ठराव जाहला, त्याप्रमाणे त्यांणी सरकारांत कतबा लिहून दिल्हा, त्यांतील कलमे, बीतपशील
* वैदिक मंत्रेकरून कांहीच कर्म करणार नाही.
* वैदिक मंत्र जे येतील त्यांचा उच्चार करणार नाही.
* भाताचे पिंड करणार नाही.
* देवपूजादिक विहित कर्मे पुराणोक्त मंत्रेकरूनच करुं व ब्राह्मणभोजन आपले घरी करणार नाही.
* शालग्राम पूजा करणार नाही.
* ज्या देवास शूद्र जातात त्या देवास आह्मी जाऊ.
* ब्राह्मणांस दंडवत मोठ्याने म्हणत जाऊ व आपले जातींतही दंडवतच म्हणत जाऊ.
* वैदिक ब्राह्मण व आचारी व पाणक्ये व शागीर्द ब्राह्मण व ब्राह्मण बायका चाकरीस ठेवणार नाही व आपले घरीही ठेवणार नाही.
* आमचे जातीमध्ये आपले संतोषे पाट लावतील त्यांस आह्मी अडथळा करणार नाही.
येणेप्रमाणे नव कलमे लिहून दिल्ही असता, परभू आपले घरी चोरून ब्रह्मकर्मे करतात, यामुळे पेणकर ब्राह्मणांचा व त्यांचा कजिया वाढोन परभूंची घरची सर्व कर्मे बंद जाहाली, त्यास येविशीचा हल्लीचा विचार करितां, परभूंचे कर्माचरणाविशी पेशजी चौकशी होऊन कर्मे ठराऊन दिल्ही आहेत त्याप्रमाणे त्यांणी वर्तावे, तें न करितां आपला धर्म सोडून मनस्वी वर्तणूक करितात हे अनुचित, पेशजी कर्मे ठराऊन दिल्ही आहेत तीच योग्य, असे शिष्टसंमतें ठरोन पुणियांत परभूंची घरे असतील त्यांस निक्षून ताकीद करून सदरहू कलमांप्रमाणे वर्तवीत जाणे. यांत जो कोणी अन्यथा वर्तेल त्याचे बरे वजेने पारपत्य करून गुन्हेगारी घेत जाणे म्हणोन चिटणिसी.
सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी (निवडक उतारे ) अंक 3 रा :- संपादक – गणेश चिमणाजी वाड, काशिनाथ बाळकृष्ण मराठे. (प्रकाशक- डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रांसलेशन सोसायटी, पुणे, 1911, पृ. 287-292.)
प्रभु (म्हणजे चांद्रसेनी कायस्थ प्रभुंबाबतचा हा निवाडा आहे. त्यांनी वेदमंत्र (येत असले तरी) म्हणू नयेत, देवपुजादिक विधी पुराणोक्त मंत्रांनीच करु, वैदिक देव (शालीग्राम) पुजू नये, शुद्रांच्याच देवांना पुजावे, पाट लावण्याच्या त्यांच्या प्रथेला ब्राह्मण विरोध करणार नाहीत वगैरे कलमे असलेला हा निवाडा आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त विधी असणारे दोन स्वतंत्र धर्म आहेत व त्याचे उल्लंघन केल्यास त्यात शिक्षेची तरतूद आहे. या मजहरनाम्याच्या 196 नकला करुन संपूर्ण पेशवाईतील महत्त्वाच्या शहरांत वितरीत केल्या गेल्या होत्या. असे असूनही हिंदू व वैदिक धर्म एकच आहेत असे म्हणण्याचे धाडस कसे होऊ शकते हे मला पामराला समजत नाही.
प्रशांत आर्वे यांनी आपल्या लेखात मझ्या नावावर काही विधाने अक्षरश: ठोकून दिली आहेत. उदा. इसपू चौथ्या शतकात वेद निर्माण झाले आणि हा काळ बौद्धोत्तर आहे. मग वेदपूर्व काळात बुद्धाने आर्य-अनार्य या संज्ञा कशा वापरल्या? हा त्यांचा प्रश्न! पण हे असे अनैतिहासिक विधान मीच काय कोणत्याही जागतिक कीर्तीच्या कोणाही संशोधकाने कोठे लिहिले आहे याचा संदर्भ त्यांनीच दिला पाहिजे कारण ते वास्तव नाही आणि मी असे विधान कधीही केलेले नाही. सिंधु नदीच्या पलीकडे सारेच हिंदू राहतात हा समज वैदिकांचाच नाही तर सर्वच पाश्चात्य जगाचा होता. हिंदुस्तान, इंडिका, इंडिया ही नावे त्यातूनच आली. वैदिक लोक इंदू, सिंधू हेच शब्द वापरताना दिसतात पण भारतात वैदिक आले तेव्हा त्यांना शुद्र नावाची जमात भेटली आणि त्यांचे भारताबाबतचे मुळचे आकलन बदलले हे लक्षात घेतले पाहिजे.
राहिले आर्य आक्रमण सिद्धांताबद्दल. हा सिद्धांत बाष्कळ व वंशश्रेष्ठत्वतावाद जपण्यासाठी युरोपियनांनी जन्माला घातला हे खरेच आहे पण म्हणून आर्य भारतातीलच होते हाही सिद्धांत वेडगळपणाचा आहे. आर्य आक्रमण सिद्धांताला आधी बळच पुरवणारे या सिद्धांताचा का विरोध करु लागले हा खरा प्रश्न आहे. त्या मतपरिवर्तनामागे पुरावे व शास्त्रीय हेतू असता तर ते कदाचित स्वीकारार्हही झाले असते पण वैदिक धर्म भारतात जन्माला आला नाही याचे पुरावे खुद्द ऋग्वेदच देत असल्याने ते मत त्याज्ज्य ठरते. हा धर्म भारतात इसपू 1200 ते 1000 च्या दरम्यान विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या अत्यल्प वैदिकांनी आणला. नंतर त्यांनी या धर्माचे 27 प्रचारक नेमून धर्मप्रचार करत काही धर्मांतरे करवून घेतली. याच प्रकारे हा धर्म इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर उत्तरेकडून महाराष्ट्र ते तमिळनाडूपर्यंत पसरवला. त्यामुळे आजचे बव्हंशी वैदिक येथलेच धर्मांतरीत आहेत. मुलनिवासीवाल्यांचा सिद्धांत त्यामुळेच स्वीकारार्ह होत नाही. येथले वैदिक काही युरेशियातून आलेले नाहीत. येथलेच आहेत. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ जी.एस. घुर्येनी येथील धर्मांतरण प्रक्रियेवर मोठा प्रकाश टाकलेला आहेच! या धर्मांतरीत वैदिकांमुळे वैदिक धर्मातही स्थित्यंतरे घडून आली, स्मार्त-श्रौत हे पंथ पडले, पंचगौड आणि पंचद्रविड ही प्रादेशिक विभागणीही झाली. मूळ हिंदू धर्मत्त्वांचे संस्कार व अंश घेत वैदिक धर्मात प्रविष्ट झालेल्या धर्मांतरीतांमुळेच स्मार्त पंथ उदयाला आला. श्रौत मात्र मूळ वैदिक धर्मालाच चिकटून बसले.
मग या धर्मांतरीतांची कुलदैवते तेही येथीलच असल्याने मुळची हिंदुच राहणार हे उघड आहे. आजचे बव्हंशी धर्मांतरीत नवबौद्धही हिंदू कुलदैवते पाळतात. भारतातील धर्मांतरीत मुस्लिमांत अनेक हिंदू प्रथा बदल करुन का होईना टिकवल्या गेल्यात पण मूळ दैवते कायम ठेवताना त्या दैवतांची पूजा करताना त्यात वैदिक अंश घुसवत अधार्मिक कार्य केले गेले हे आर्वे विसरतात. अन्यथा पुरुषसुक्त किंवा हिंदू देवतांशी दुरान्वयानेही संबंध नसलेली मंत्रपुष्पांजली पुजेत का म्हटली गेली असती? त्यामुळे आमचीही कुलदैवते हिंदुंप्रमाणेच शिव-पार्वती, खंडोबा वगैरे आहेत म्हणून आम्हीही हिंदू ही पळवाट झाली. हिंदू पीरालाही जातो म्हणून तो मुसलमान होत नाही तसंच हिंदू दैवतांची पूजा केली त्यामुळे ते हिंदु होत नाहीत. ते हिंदू दैवतांची पूजा वैदिकपण आणि वैदिक माहात्म्य जपत करतात ही खरी समस्या आहे. किंबहुना त्यांचे पुजाविधीबाबतचे कर्मकांड स्वतंत्र आहे. हिंदू धर्माचा मूलस्त्रोत शिव आहे, वेद नव्हेत हे मान्य करण्याची हिंमतच वैदिकांत नाही एवढे वेदमाहात्म्य वैदिकांच्या रक्तात मुरलेले असते. शिव वेदबाह्य आहे हे सारीच वैदिक धर्मशास्त्रे ओरडून बजावत आलेली आहेत. वर्तमानातही संघप्रणित सरकार ज्या पद्धतीने वेदमाहात्म्य (अगदी सायंस कॉंग्रेसमध्येही) गात आहे त्यावरुनच हे लक्षात यावे. त्यामुळे आमचा धर्म वेगळा नाही हे जर वैदिक म्हणत असतील तर त्याकडे केवळ एक ढोंग किंवा भाबडी संकल्पना म्हणूनच पहावे लागते.
माझे मित्र प्रशांत आर्वे आणि अन्य मित्रांना शंका आहे की या सिद्धांताची प्रासंगिकता काय? खरे तर मी मांडतो तो सिद्धांत नसून भारतीय सांस्कृतिक इतिहासाचे अन्वेषन केल्यानंतर दिसणारे दोन स्वतंत्र धर्मप्रवाह हे एक वास्तव आहे. ते नसेल तर ते पुराव्यांनिशी खोडून काढले पाहिजे. केवळ हेत्वारोप करुन किंवा जी विधाने मी केलेलीच नाहीत ती माझ्या तोंडी टाकून उपयोग नाही. मी हे संशोधन कोणावरच्या राग-लोभापोटीही केलेले नाही. त्या संशोधनासाठी व्ह्यटिकन तर खूप दुरची बाब राहिली, कोणा हिंदुनेही कसलीही मदत केली नाही. उलट अडथळेच आणलेले आहेत. मी वैदिक-हिंदू वादामुळे माझे अकारण नुकसान करुन घेतले आहे, असे केले नसते तर मला खूप मान्यता व प्रतिष्ठा मिळाली असती असे सांगणारे तर अनेक आहेत पण संशोधन मुळात मान्यतेसाठी असते की सत्यशोधनासाठी हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर मला खूप आधी गवसले आहे. मी तर कोणत्याही अर्थाने वैदिक नाही. मग मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधनाचा प्रपंच केला आहे आणि हाती लागलेले जेही सत्य आहे ते माझ्या हिंदू बांधवांसमोर ठेवत त्यांना त्यांच्या धर्माचे आत्मभान देत एका भावनिक जोखडातून मुक्तता करण्याचा प्रयत्न आहे आणि तो का करु नये? जर वैदिक जोरोशोरोंमध्ये वैदिक माहात्म्याचा निरंतर जयघोष करत अगदी इतिहासातही ढवळाढवळ करत असतील तर का गप्प बसावे? मी गप्प बसणार्‍यातील तर नक्कीच नाही!
लेखाचा शेवट करताना प्रशांतजींनी काय काय नाकारणार हा भावनिक प्रश्न विचारला आहे. त्यात त्यांनी जे श्लोक उद्घृत केलेत ते वैदिक आहेत हा गैरसमज टाकावा एवढेच मी त्यांना म्हणेल. ‘सर्वेपि सुखिन:’ हे वचन जैन वाड्मयातील आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा औपनिषदिक विचार हिंदू आहे. ‘कृण्वंतो विश्वमार्यम’ हे वचन निश्चित वैदिक आहे अणि ते सर्व जगाला इस्लाम बनवू या विधानासारखेच आहे. कोणत्याही धर्मात सर्वस्वी काहीही त्याज्ज्य नसते अथवा सर्वच स्वीकारार्हही नसते. हिंदू धर्मही त्याला अपवाद नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. सर्वच धर्मांतील आदर्श तत्त्वे घेत एक विश्वधर्म बनावा आणि सर्व जगाचेच एक राष्ट्र बनवावे हा माझा 1998 पासूनचा सिद्धांत आणि विचारांचा मुख्य गाभा आहे पण त्या आदर्शाकडे वाट चालायची असेल तर विकृत वर्चस्वतावाद त्यागावा लागेल. शबरीमला प्रकरणी स्त्री-प्रवेशाला विरोध करण्याची मानसिकता नेमकी कोणात आहे हे पाहिले की वैदिक विचारधारेचा विरोध का आणि कशासाठी आहे हे लक्षात येईल. अपवाद असतात आणि तेच नियम बनवतात. अपवादांची संख्या वाढली तरच मूळ तत्त्वगाभा ढिसूळ होत नाहीसा होऊ शकतो. मला जर काही नाकारायचे असेल तर वर्चस्ववादी, विषमतामूलक तत्त्वज्ञान. या तत्त्वज्ञाचा मूलस्त्रोत वैदिक असल्याने मी त्याला नाकारणार हे उघड आहे. खरे तर सर्वांनीच नाकारावे असे मला वाटते.
पण तसा कोणताही प्रयत्न न करता नवसिद्धांतच समाजविघातक आहे अशी मांडणी करण्यात वेळ वाया घालवण्याला काय म्हणता येईल? भीती आहे तरी कशाची? सत्याची की कोणी विकृत संशोधनाचा गैरवापर करेल याची? मी हा विचार केलेला नाही असे नाही. मानवतावादी स्वतंत्रतावादाचा सिद्धांत मांडणारा मी स्वप्नातही कोणावरही सामाजिक अथवा धार्मिक अन्याय धर्माच्या नावावर व्हावा अशी कामना करणार नाही.
प्रशांतजी, माझी मांडणी विभाजनवादी नाही. विभाजन होतेच आणि आजही आहे. मी त्या विभाजनाची सैद्धांतिक मीमांसा केली आहे. ही जुन्या बाटलीतील नवी दारु नाही तर जुन्याच बाटलीतील जुनीच दारु आहे… वैदिक धर्म स्वतंत्र नाही अशी मांडणी कोणत्याही धर्मेतिहासाच्या अभ्यासकाने केलेली नाही आणि त्याला अगदी आजचे तलगेरीसहितचे संशोधकही अपवाद नाहीत. फक्त हे एक शूद्र असलेल्या हिंदू सोनवणीने पुन्हा अधिक खोलात जात सांगितल्यामुळे खटकत आहे, एवढेच!
समाज एक व्हायला हवा आणि सर्वांची वाटचाल इहवादी होत, समतेच्या महामार्गावरुन होत या देशाने एक उज्ज्वल शिखर गाठावे. प्रत्येक मनुष्य, स्त्री असो की पुरुष… यशस्वी व्हावा यासाठी त्याला खुले अवकाश मिळेल असे सामाजिक वातावरण निर्माण करावे ही माझ्या लेखनाची प्रासंगिकता आहे. वैदिकांनीही आपल्या असमानतेच्या वैदिक तत्त्वांना तिलांजली देत समताप्रधान हिंदू व्हावे ही माझ्या संशोधनाची प्रासंगिकता आहे. कधी काळी मुळचे हिंदुच असलेल्यांनी वैदिक धर्मात प्रवेश केला. त्यांनी घरवापसी करत हिंदू धर्मात यावे यासाठी हा प्रपंच आहे पण असे न करता पुन्हा पुन्हा वैदिक तत्त्वज्ञान उराशी जपत स्वत:ला हिंदू म्हणवत हिंदुंमध्ये मानसिक गोंधळ निर्माण केला तर त्याला सैद्धांतिक विरोध होणारच! वैदिक एकाच वेळेस दोन धर्माचे असू शकत नाही आणि हिंदुंना तर तीही सवलत नाही हे लक्षात घ्यावे लागेल.
जर खरेच या कार्यात सहभागी व्हायचे तर स्वत: प्रथम हिंदू व्हा असेच आवाहन मी करेन!

प्रशांत आर्वे यांचा लेख या लिंकमध्ये वाचा https://sanjaysonawani.blogspot.com/2019/01/blog-post_13.html

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...