Saturday, December 31, 2016

आपल्याला नेमके कोठे जायचे आहे?


Image result for futuristic


भविष्याचे कुतुहल नाही असा माणुस क्वचित असेल. भविष्यासाठी तरतूदीही माणुस करतो ते संभाव्य व अनपेक्षीत अनिष्टांचा सामना करण्यासाठी. सरकारची अथवा व्यक्तीची अंदाजपत्रकेही एक प्रकारे भविष्याचीच आर्थिक वाटचाल ठरवत असतात. अंदाजपत्रके अथवा बजेट अनेकदा कोलमडतातही. कधी कधी ती अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वीही होतात. अंदाजपत्रक म्हणजे भविष्यातील एका कालखंडात नेमके काय व कसे साध्य करायचे याचा आराखडा व त्यासाठी केल्या गेलेल्या तरतुदी. बजेटचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर आढावा घेण्याचीही पद्धत असतेच. आपल्याला काय साध्य करायचे होते आणि त्यातील किती खरोखर साध्य झाले, जे झाले नाही ते का झाले नाही याचे विश्लेषन यात अपेक्षित असते व त्यानुसार पुढचा मार्ग शोधला जातो. मानवी समाजानेही अशे उद्दिष्टे समोर ठेवत ती कशी सध्य करायची यावर उहापोह केला पाहिजे.

हा मार्ग ब-यापैकी वास्तव असतो. म्हणजे त्याला आजच्या स्थितीचा एक बेस असतो.  हा बेस ठरवण्यासाठी वापरले जाणारे मानदंड नेहमी बरोबरच असतात असे नाही. आजची स्थिती ठरवण्याचे नेमके मानदंड काय असावेत यावर विद्वान नेहमीच चर्चा करत असतात, प्रसंगी वादही घालत असतात. सुधारणांना नेहमीच वाव असतो हेही खरे. अनेकदा अनपेक्षित आरिष्टे अशा पद्धतीने अवतरतात कि अंदाजपत्रकांना काही अर्थ राहत नाही. ही आरिष्टे निसर्गनिमित्त असतील, मानवनिर्मित असतील किंवा अंमलबजावणीतील भोंगळपणामुळेही असतील. अचानक होणारी युद्धे, दंगली, कोणा एका दुस-याच राष्ट्राची अर्थव्यवस्था एकाएकी कोसळणे यामुळेही व्यक्ती व सरकारांची अंदाजपत्रके कोसळू शकतात. मानवी समाजाचीही उद्दिष्टे साध्य होतीलच असे नाही.

पण याचा अर्थ असा नसतो कि अंदाज बांधू नयेत. भविष्याचा वेध घेऊ नये. समग्र मानव जातीला अधिकाधिक स्वतंत्र, अर्थपुर्ण, निर्वैर आणि समाधानी जगण्याकडे जायचे असते. पण अधांतरी व ध्येय नसलेली स्वप्ने पाहून माणुस कोठेही कसा पोहोचेल? त्यासाठी वास्तवाचा पुरेसा आधार लागतोच. मानवजात आज कोठे आहे हे नेमके समजल्याखेरीज पुढची दिशा ठरवता येणे अशक्यच आहे हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल.

येथे भविष्य म्हणजे एखाद्या ज्योतिषाने कुंडली मांडुन ग्रह-तारे एखाद्याच्या वा राष्ट्राच्या जीवनावर परिणाम करतील असले पोकळ भविष्य आपल्याला निश्चितच अभिप्रेत नाही. आपल्याला येथे येणा-या पुढच्या पंचविसेक वर्षात मनुष्य प्रत्येक क्षेत्रात नेमका कोठे असेल याची संभाव्य दिशा तपासणे हा आपला हेतू तर आहेच पण ध्येयांमद्ध्ये आणखी काही भर घालता येऊ शकते काय हे पाहणेही आपला हेतू असणार आहे. मनुष्य समाजाने भुतकाळात अनेक ध्येये समोर ठेवली होतीच. मग ते तत्वज्ञ असतील, राजकीय धुरीण असतील अथवा शास्त्रज्ञ असतील. ती सर्व ध्येये अजुनही पुर्ण झाली असे म्हणता येणार नाही. अनेक तर आज विस्मरणात गेलेली आहेत. काही ध्येये अशीही होती कि अशी ध्येये कधीकाळी माणसाने ठरवली असतील हे आज खरे सुद्धा वाटणार नाही.

आज आपण एकविसाव्या शतकात आलो आहोत. अनेक क्षेत्रांत माणसाने अद्भुत अशी प्रगती केलेली आहे. असे असले तरी माणसासमोर हजारो वर्षांपुर्वी जे प्रश्न होते ते आजही नीटसे सुटले आहेत असे नाही. चुका सुधारत नव्या दुरुस्त्या तो अवश्य करत आला आहे, पण त्यांनी प्रश्न सोडवले आहेत कि जटील केले आहेत यावर ठामपणे काही सांगता येणे अशक्य आहे. सामाजिक व म्हणुनच राजकीय प्रश्न तर अधिकच जटिल बनलेले आपल्याला दिसतात. उदा. राज्यव्यवस्था नेमकी कशी असावी, अर्थव्यवस्थेचे नेमके प्रारूप कसे असावे, धर्माचे जीवनातील नेमके स्थान व आवश्यकता काय, राष्ट्रवादाची आवश्यकता आहे कि नाही, दहशतवादी प्रेरणा कोठून येतात, युद्धविहिन जागतिक व्यवस्था येऊ शकते काय, जातीसंस्थेचे अखेर काय होणार, गरीबीचे निर्मुलन शक्य आहे कि अशक्य, मानवी आरोग्याचे नेमके पुढे काय होणार, भविष्यात विविध क्षेत्रात कोणते नवे शोध लागून मानवी जीवन आमुलाग्र बदलू शकतील, कला माध्यमांत अजुन कोणती नवी प्रारुपे येतील वगैरे असंख्य प्रश्न आज आपल्यासमोर आहेतच. आपण त्यावर तात्पुरती उत्तरेही शोधतो. ही उत्तरे कधी कधी अंगलट कशी येऊ शकतात हे आपण काळा पैसा नष्ट करण्यासाठी योजलेल्या नोटबंदीमुळे कसा हाहा:कार उडाला यातून पाहू शकतो. जगभर असे घडत असते. अर्थव्यवस्था कधी वर तर कधी खाली असे हेलकावे घेत असते. असेच समग्र जीवनाला व्यापणा-या अनेकविध बाबींत असे होत असते.

 पण माणसाचा जीवनप्रवाह थांबत मात्र नाही. भविष्याचा वेध घेतलेला असो वा नसो, तो बदलत्या स्थितीशी जुळवून घेण्यात वाकबगार आहे हे समग्र इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल. त्यातल्या त्यात कोणत्याही स्थितीत आनंद उपभोगण्यासाठी सवड काढण्याची त्याची प्रवृत्ती चिरंतन आहे. पण दु:खांची स्थिती किमान करत न्यायचा प्रयत्न करणे हेही माणसाचे उत्तरदायित्व असते. त्यासाठीही तो झटतच असतो. वाद घालत असतो. हिरीरीने आपली मते मांडत असतो. आपलेच मत अंतिम कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न जसा धर्ममार्तंड करत आले आहेत तसाच प्रयत्न विद्वान, तत्वज्ञान्यांनीही केला आहेच. या मतामतांच्या गलबल्यात अखेर कोणते विचार तगतील हे आपण मानवी जीवनप्रवाहाच्या आलेखावरून तपासू शकतो व भविष्याचा वेध घेऊ शकतो.

आजचा मानवी समाज वाईट स्थितीत आहे असे निराशावादी मत मी व्यक्त करणार नाही. पण तो ध्येये ठरवत स्वप्रामाणिक रहात त्यासाठी प्रयत्न करत आला असता तर आजचे स्थिती अधिक चांगली व वेगळी असती हेही नमूद केले पाहिजे. आजच्या आहे त्या स्थितीतून आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे व आपल्या मनोवृत्तींमध्ये बदल घडवत त्यातल्या त्यात चांगले ध्येय जे असेल त्या दिशेने कसे प्रामाणिक प्रयत्न आपण करू शकू हेही पहायचे आहे.

वर्तमान युगात भारतीयांचा ज्ञान-विज्ञान-तत्वज्ञानातील एकुणातील वाटा नगण्य आहे. तो का आणि तो वाढवण्यासाठी आपण काय करू शकू हेही आपल्याला पहावे लागणार आहे. एकार्थाने पुढील पंचवीस वर्षात जीही काही प्रगती शक्य आहे त्यात आमचा वाटा कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची आकांक्षा निर्माण व्हावी हाही या लेखमालिकेचा हेतू आहे. वाचकांनी अवश्य प्रतिक्रिया द्याव्यात, चर्चा करावी, विचारांत भर घालावी ही अपेक्षा आहे.

-संजय सोनवणी

(प्रसिद्धी दै. संचार, १.१.२०१७)

Friday, December 30, 2016

एका नार्सिससने...


Image result


निश्चलनीकरणाच्या पहिल्या टप्प्याची मुदत संपली आहे. दुस-या टप्प्यात फक्त रिझर्व ब्यंकेत जुन्या नोटा बदलून मिळतील. पण त्यात होणारा भरणा विशेष असणार नाही. काळा पैसा किती उजेडात येणार हे आयकर विभाग किती सक्षमतेने आजवर झालेला सारा जुन्या नोटांचा भरणा तपासतो, कराअकारणी करतो व मुख्य म्हणजे प्रत्यक्ष करवसूली किती करतो यावर आता अवलंबून आहे. करवसुली वाटते तेवढी सोपी नसते. आयकर विभागाने काढलेल्या डिमांडवर स्पष्टीकरणे असतात, अपीलेही असतात. त्यामुळे  नोटीस काढली, डिमांड केली म्हणजे लगोलग करवसुली होईल असे नाही. ती वेळखाऊ प्रक्रिया आहे. महत्वाचे म्हणजे मी पुर्वीच म्हटल्याप्रमाने मुळात आयकर विभागाकडे अत्यंत अपुरे मनुष्यबळ आहे. त्यात भ्रष्टाचार होत किती प्रकरणे बाहेरच्या बाहेर निकालात निघतील याचा अंदाज भारतीय नागरिक करू शकतात. कारण हे होत आले आहे. आता तर सोन्याची खान उघडून देण्यात आली आहे.

निश्चलनामुळे झालेल्या लाभ व हानीचे गुणोत्तर अजून निघालेले नाही. नवीन नोटा छापायला, वितरित करायला, एटीएम यंत्रणेत दुरुस्त्या करण्यासाठी आलेला खर्च, कर्मचा-यांचा ओव्हरटाईम, अतिरिक्त द्यावे लागणारे व्याज वगैरेचा खर्च हा आपण प्रत्यक्ष मानू. नवीन नोटा जेवढ्या होत्या तेवव्ढ्याच छापल्या जाणार नाहीत, क्यशलेसचाच आग्रह धरला जाईल असेही मानून चालू. पण लाभात ४ ते ५ लाख कोटींची भर पडेल (म्हणजे तेवढा काळा पैसा मुळात ब्यंकांत भरलाच जाणार नाही) ही कल्पना फेल गेली आहे. करवसुलीतुन फारफार तर एक लाख कोटी मिळु शकतील व तेही पुढील दोन तीन वर्षांत. म्हणजेच लाभ-हानीचे हे डायरेक्ट प्रमाण निराशाजनक आहे असे दिसते.

 नि:श्चलनीकरणामुळे बाजारावर झालेला परिणाम मात्र भयंकर आहे. शेतीपासून ते अवजड उद्योगांपर्यंत याचे गंभीर परिणाम झालेले आहेत. येत्या तीमाही आकडेवा-या अधिक बोलक्या असतील. परंतू एकुण उत्पादनात क्षेत्रनिहाय २० ते ८०% एवढी घट झाली आहे हे याच महिन्यातील आकडेवा-यांवरून पाहता येते. पुढील तिमाहीत हा परिणाम जास्त गंभीर होत जानवण्याएवढा तीव्र होईल. कारण मागणीत लक्षणीय घट झाली आहे व हा ट्रेंड बदलण्याची पुढील सहा महिने शक्यता नाही. किंबहूना तो घटता राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रोजगारात घट, जीडीपीत घट असा होत विदेशी गुंतवणुकींनाही मार्ग बंद होण्यात होईल. या स्थितीला तोंड देण्याची कसलीही योजना अद्याप तरी नाही. नीति आयोगासमोर भाषण करतांना पंतप्रधानांनी रोजगार, कौशल्यविकास वगैरे बाबी छेडल्या आहेत. पण बोलण्याने या गोष्टी होत नसून ठोस योजना व तत्काळ अंमलबजावणीची आवश्यकता असते. तशी तयारी सरकारची अद्याप तरी नाही.

येणारे बजेट लोकानुनयी असेल असा अंदाज सारेच अर्थतज्ञ वर्तवत आहेत. आयकर कमी केला जाईल असाही अंदाज आहे. पण तसे करण्यासाठी करांचे नेटवर्क वाढवावे लागेल. अधिकाधिक लोक करदाते कसे बनतील हे पहावे लागेल. आहे त्या उत्पन्नावर पाणी सोडणे सरकारला परवडणारे नाही. म्हणजेच करांचे प्रमाण कमी करण्यातही अडथळे आहेत. अप्रत्यक्ष कर वाढवत तो समतोल साधण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. निश्चलनीकरणामुळे आपल्याला हे करता येईल हा सरकारचा अंदाज पुरता फेल गेलेला असल्याने काही नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता भासेल एवढे खरे. अन्यथा आहे तीच कररचना पुढेही चालू राहील असे म्हणावे लागेल. म्हणजे आर्थिक घडी सावरायला निश्चलनीकरण कामी न येता अडथळ्याचेच बनलेले आहे हे उघड आहे.

क्यशलेस व्यवहार हे एक सुविधा आहे. बाजारात व्यवहार होतांना माध्यम जे उपलब्ध आहे ते माणुस वापरतोच. त्यासाठे कोणी प्रचार करायची गरज नव्हती व नाही. कारण मुळात खर्च करायला पैसेच लागतात...मग ते ब्यंकेत असोत कि रोकड स्वरुपात. तेच नसतील तर काय उपयोग? शेवटी नागरिकांचे क्रयशक्ती महत्वाची असते. निश्चलनीकरणाने ती हिरावली गेली. ज्यांना शक्य होते ते आधीपासुनच डिजिटल व्यवहार करत होते. नाईलाजाने या काळात असे व्यवहार वाढले असले तरी ती सर्वांसाठी उपलब्ध असलेली, सुरक्षित व गतीमान सुविधा नाही. त्यामुळे क्यशलेसमुळे अर्थव्यवस्थेला काहीतरी उभारी मिळेल असे अपप्रचार जे करत आहेत त्यांच्या म्हणण्याला महत्व देण्याचे गरज नाही. महत्वाची असते ती नागरिकांची एकुणातील क्रयशक्ती व तिच्या जोरावरच अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असतो. पैसा हे माध्यम आहे, मग ते रोकड/डिजिटल अथवा वचनचिठ्ट्या असे कोणतेही वापरा. ते असले तरच व्यवहार होऊ शकतात, अन्यथा नाही.

भारत अधिकाधिक क्यशलेस होत गेला तर कर्जवितरण वाढू शकेल असाही एक तर्क आहे. हा तर्क वरकरणी कितीही चांगला वाटला तरी मुळात आधी होत्या त्या स्थितीतही ब्यंका नवी कर्जे द्यायला नाखूष का होत्या याचे उत्तर हे तर्कवादी देत नाहीत. मुळात छोटी व सुक्ष्मकर्जे द्यायला ब्यंका कधीच उत्सूक नसतात व नाहीत. मोठी कर्जे देण्यात त्यांना रस असतो हे खरे व लाखो कोटींचे प्रकल्प कर्जाअभावी आजही खोळंबले आहेत हेही खरे. पण याचे कारण बुडित कर्जांत आहे व ते प्रमाण नुसत वाढलेले नाही तर निश्चलनीकरणानंतर बुडितांचे ओझे किती वाढेल यावर कोण विचार करणार? कर्जवितरणात मुळात समतोल नव्हता व नाही. ब्यंकांवरील सरकारी अंकुश नष्ट कोण करणार? किती सरकारी ब्यंका नाबार्ड योजनांत कर्जवातप करतात? त्यात कर्जे वाढवली जातील हा आशावाद दुबळा अशासाठी आहेत की ब्यंका आधीच बुडित कर्जे व एनपीएमुळे गाळात रुतलेल्या आहेत. निश्चलनीकरणामुळे काही प्रमानात व त्यांनाच संजीवनी मिळेल हे खरे असले तरी तिही तात्पुरती असेल. अतिकर्ज हे उत्पादन मानले तर त्याचे अतिउत्पादन अर्थव्यवस्थेला कोणत्या खाईत नेते हे सबप्राईम प्रकरणात अमेरिकेने अनुभवलेले आहे. आपण त्यातून वाचू हा भोळसटपणा आहे.

यामुळे करचुकवीला आळा बसेल हाही भ्रम आहे. कोणतेही माध्यम असो करचुकवी होणे सहज शक्य असते. म्हणजेच काळा पैसा जन्माला येणारच. अनैतिक (ड्रग, खंडण्या, दहशतवादी कारवाया वगैरे) धंद्यांनाही यामुळे आळा बसू शकत नाही. भारतातील कोणतेही चलन न वापरताही माफिया ते धंदे करू शकतात. त्यामुळे क्यशलेस वा लेस-क्यश अशा कोणत्याही शब्दच्छलातून ही बाब पटवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अर्थव्यवस्थेला सकारात्मक फायदा नाही. जेथे गरजेचे आहे, शक्य आहे, सुरक्षित आहे तेथे हे व्यवहार होतील, वाढतीलही परंतू अमुकच पद्धतीने व्यवहार करा असा अधिनियम असू शकत नाही. त्यामुळे सरकारला आधी होते तेवढेच चलन बाजारात आणावेच लागेल. आपल्या नोटा छापण्यातील अकार्यक्षमतेला लपवण्यासाठी क्यशलेसची पुंगी वाजवायची गरज नाही.

मुख्य मुद्दा आहे तो नागरिकांची क्रयशक्ती, म्हणजेच उत्पन्न वाढवायचा. गेल्या दोन महिन्यांत ही क्रयशक्ती जबरदस्तीने जवळपास नष्ट करण्यात आली. असंघटित क्षेत्रात हाहा:कार उडाला. शेतकरी भुइसपाट झाले. त्यामुळे नवीन क्रयशक्ती श्रम व शेतीउत्पादनातून मिळवायची जीही काही आशा होती ती याच हंगामात नष्ट झाली आहे. पुढील हंगामात काय होईल व तोवर तगण्यासाठी लागणारी क्रयशक्ती हा घटक कोठून आणेल? खाजगी सावकारांची चलती वाढण्याचीच काय ती शक्यता यातून आहे. होता तो पैसा बव्हंशी आजही ब्यंकांत पडून आहे व नोटबदली अद्यापही सावरलेली नाही. मागणीत जोवर क्रयशक्ती किमान मुळपदावर येत नाही तोवर वाढ होणे शक्य नाही. उद्योगांनी आधीच आपले उत्पादन कमी करत नेलेलेच आहे. मग त्यात वाढ होत रोजगारही कसा वाढेल? हा एक अत्यंत चुकीचा तिढा पडलेला आहे व तो कसा सोडवायचा हे सरकारसमोरील आव्हान आहे.

निश्चलनीकरण का केले, काय विचार करुन केले हे प्रश्न विचारण्यात या क्षणी तरी अर्थ नाही. त्या प्रश्नाची उत्तरे काळच देईल. आज आपल्यासमोर जी परिस्थिती उभी आहे तीवरच विचार करत यातून मार्ग काय व कसा निघेल हे पहावे लागणार आहे. काळा पैसा व भ्रष्टाचार एवढेच मुद्दे सामान्यांना हुरळून टाकायला पुरेसे असतात. अण्णा हजारेंचे आंदोलन यशस्वी झाले त्याचे कारणही हेच आहे. भाजपला सत्तेवर आणण्यात तो घटक प्रभावी होताच. पण काळा पैसा कसा निर्माण होतो आणि त्याची जी कारणे आहेत त्यांच्यावर आघात करण्याची हिंम्मत समाजवादी सरकारे करणे शक्यच नव्हते. मोदींतही ती हिंमत नाही म्हणून हा निश्चलनीकरणाचा बालिश व अतित्रासदायक निर्णय घेतला गेला. अजून काही दिवसांत आलबेल होणार हे
सांगण्याच्या मुदती  रोज वाढतच चालल्या आहेत हे आपणच रोज पाहतो, ऐकतो आहोत.

प्प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचे प्रमाण आता आहे त्याच्या निम्म्यावर आनने व यंत्रणा सक्षम व उत्तरदायित्वाची जबाबदारी असलेली असावी हा काळ्या पैशांची निर्मिती थांबवण्याचा प्रभावी मार्ग आहे. गुंतागुंतीचे कायदे वगळत त्यात सुलभता आणावी, शेतक-यांना बंधनांत गुरफटवून गुदमरवणारे कायदे नष्ट करावेत, निवडणुकीतील सुधारापासुन ते बाबुशाहीच्या अतिरिक्त अधिकारांवर मर्यादा आणाव्यात व सर्व सरकारी मालकीचे उद्योग विकून त्यांचे खाजगीकरण करत अनावश्यक स्टाफ कमी करावा हे अधिक महत्वाचे होते व आहे. ही हिंमत मोदींमध्ये आहे काय?

 मी आधीही म्हणालो होतो कि काळा पैसा नष्ट न होता त्याचे फक्त पुनर्वितरण होईल. तसेच झालेलेही आहे. हे सारे करायला अर्थव्यवस्थेचाच बळी का दिला हा प्रश्न विचारण्यात अर्थही नाही. ज्यांचे गेले आहेत किंवा जातील ते पुन्हा ही दरी भरून काढायच्या कामांना आतापासुनच लागलेलेही आहेत. रेट वाढले आहेत. ज्यांची चांदी होत आहे त्यांच्यावर कारवाया करायला दुसरी यंत्रणाच नाही कारण तेच तर कोण चोर व कोण साव हे ठरवणार आहेत!

परिस्थितीत बदल पाहिजे होता काय? त्याचे उत्तर नक्कीच होकारार्थी आहे. पण आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी केल्याने सुधार तर सोडाच पण अवनतीच होते. या रोकड टंचाईने जो अपेक्षित नव्हता तो फायदा मात्र करून दिला आहे. तो म्हणजे गरजा किमान करुनही जगता येते, पैसे वाचतात हा एक असंख्यांना अनुभव दिला आहे. किमान गरजांचे जीवन चांगलेच असे माझेही म्हणणे आहेच. किंबहुना शाश्वत अर्थव्यवस्थेचा तो एक गाभा आहे. पण त्याच वेळीस हा स्वयंनिर्णय नसून बळजबरीने लादली गेलेली जीवनशैली आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. आज आहे त्या अर्थव्यवस्थेला किमान गरजांत जगायची सवय लागलेले नागरिक परवडणार नाहीत. ती कोसळुन पडायला वेळ लागणार नाही कारण मागणीचाच अभाव असेल. आताही नेमके तेच होत आहे. खुपशा लोकांच्या सवयी बदलू लागल्यात. त्या कायम राहतील असेही नाही. जे स्थिती अनुकूल होण्याचे वाट पाहत आहे ते ती येताच उसळी मारणर नाहीत असेही नाही. पण एकंदरीत मागणीचा प्यटर्न आहे त्याला धक्के बसू शकतात हेही येथे लक्षात घ्यावे लागेल. शेवटी खरेदीचीही एक मानसिकता असते व तिचे लंबक परिस्थिती दुस-या टोकाला नेवू शकतात.

ते काहीही असले तरी अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न होता व आहे तो सर्व नागरिकांची क्रयशक्ती वाढत तो सबळ कसा होईल हा. त्यासाठी शोषित वंचितांपासून सर्वांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात एक मुक्त स्पर्धक म्हणून आणत त्याला प्रगतीचा वाव देणे हा. त्यातुनच देशाची समग्र प्रगती होऊ शकते याचे भान मोदी सरकारला नाही. उलट निश्चलनीकरणाने जेही काही थोडेफार होत होते त्यालाही खिळ बसली आहे. म्हणूनच एकाही निर्णयात संगती व सातत्य नाही. बावरून गेलेल्या योद्ध्याने वाटेल तशी तलवार फिरवत शत्रू तर दुरच पण स्वत:चेच पाय छाटावेत असली दुर्घर अवस्था ओढवलेली आहे. भाषणे अथवा घोषणांना फारसा अर्थ नाही. काही लोकांना त्या भुलवू शकतात पण अर्थव्यवस्थेला उभारी येते ते प्रत्यक्ष सकारात्मक कृतीतून. बोलबच्चनगिरी करत भावनिक संवाद साधून नाही याचे भान आता तरी यायला हवे. अर्थात ही अत्यंत निरर्थक अपेक्षा आहे कारण अपनी अदा पे जो फिदा है, त्यांना कोणताही आरसा चालत नाही. शेवटी त्याचा नार्सिसस होतो. असे आज तरी झाल्याचे दिसत आहे!

Saturday, December 17, 2016

अतिरेकी मक्तेदारी

अतिरेकी मक्तेदारीवादी भांडवलशहा हळू हळू सर्वच क्षेत्रांचे स्वामित्व घेत चालले आहेत. किंबहुना सरकारे व जनताही नियंत्रित करणे हाच त्यांचा अंतिम हेतू आहे. स्पर्धा संपवण्यासाठी ते आज ज्या गतीने कार्यरत आहे ती गती पाहता जगात मोजकेच उद्योगसमूह राहतील जे जगावरच नियंत्रण आणतील अशी चिन्हे दिसत आहेत. जागतीक शेतीही यातुन सुटणार नाही. राजकीय नेते हे फक्त त्यांचे छुपे प्रवक्ते बव्हंशी बनलेलेच आहेत व उद्या ती प्रक्रिया किती उघड होईल याची चुणुक भारतीय पंतप्रधानांनी दाखवलेली आहे. ट्रंपही त्याला अपवाद नाही. असे अनेक राष्ट्रप्रमूख आज आहेत. हा त्यांचा दोष नसून जी व्यवस्था विकराळ होत सर्व मुल्ये गिळंकृत करत चालली आहे त्या व्यवस्थेचा आहे व याचे जन्मदाते मक्तेदारीयुक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने झपाटलेले उद्योगसमूह आहेत. नेता कोणताही असो त्याला जनतेच्या नव्हे तर यांच्या तालावर नाचण्याशिवाय व त्यांचीच उद्दिष्टे साकार करण्याखेरीज पर्याय नाही. विचारधारांना येथे काहीएक अर्थ राहत नाही. मानवी स्वातंत्र्याचा संकोच अपरिहार्य आहे. मानवतावादी स्वतंत्रतावाद ऐकून घेण्याच्या स्थितीत नागरिकही नसावेत, सामाजिक लादलेल्या विपन्नतेचेही समर्थन करणारे लोक वाढावेत म्हणजे त्यांचे ब्रेन कंडिशनिंग करण्यात ते यशस्वी होत आहेत व त्यांची संख्या वाढतच जाईल अशी चिन्हे आहेत.


एक दिवस, सारे उद्योगसमूह एका छत्राखाली आणण्याच्या आकांक्षेने झपाटलेला कोणतेही मार्ग वापरून जागतिक सत्तेचे नियंत्रण करू शकतो. हे अशक्य नाही. अर्थकारण नियंत्रित केले की मनांवरचे नियंत्रणही सहज होते हे त्यांना पक्के माहित आहे. हा एका अर्थाने आर्थिक साम्राज्यवाद आहे व त्याला राजकारणी आडवे येऊ शकत नाहीत एवढे ते दुर्बल होत चालले आहेत. या आर्थिक हुकुमशाहीशी कसे लढायचे हा आमच्यासमोरचा प्रधान विषय राहिला पाहिजे!

Friday, December 16, 2016

नोटबंदी यशस्वी होत नाहीहे....

भारतातील बरेचसे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन नोटबंदी यशस्वी होत नाहीहे असा एक सुर आहे. मुळात नोटबंदी आणली होती तीच काळा पैसा काढून घेण्यासाठी. म्हणजे अप्रामाणिक पैसा आहे आणि  बरेचसे नागरिक अप्रामाणिक आहेत हे हा निर्णय घेण्याआधी मोदींना माहितच होते. त्यांचा पक्षही अप्रामाणिकपणात मागे नाही हे सांगायला त्यांना कोणाची गरज नव्हती. गुजरातच्या विकासाचा जो ढोल बडवला तो किती प्रामाणिक होता हे सर्वांनाच माहीत आहे. एवढ्या घोषणा निवडुन आल्यानंतर केल्या त्याचे काय झाले, किती प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली हेही दिसतेच आहे. पन्नास दिवसात सारे लगोलग सुरळीत होणार आहे असे म्हणनारे कोणत्या नंदनवनात वावरत आहेत हेही दिसतेच आहे. मुळात अप्रामाणिक ज्यामुळे लोक होतात त्याच कारणांवर आघात करण्याऐवजी सर्वसामान्यांचे जीवन रसातळाला नेण्याचा यांना काय अधिकार आहे?
cashless अर्थव्यवस्था करू आणि जे तसे व्यवहार करतील त्यांना इनाम देवू ही घोषणा तावातावाने काहीतरी अलौकिक करत आहोत या थाटात करणे म्हणजे स्वत:ची (देशाची तर झालीच आहे) किती फसवणुक करायची याचेही तारतम्य हरपल्याचे निदर्शक आहे. बाजारपेठांतील विक्री घटत चालली आहे. कारखाने lay off किंवा कामबंदीचे दिवस वाढवत चालले आहेत. लघुउद्योगांना तर कोणी वाली नाही. अत्यावश्यक असल्याखेरीज कोणीही पेटीएम काय नि दुसरे काय, खरेदी करायला तयार नाही. काही लोकांची जबरदस्तीची बचत एकीकडे होत असली तरी दुसरीकडे ज्यांना घटत्या मागणीमुळे उत्पन्नाची साधनेच गमवावी लागत आहेत आणि त्यामुळे नेमके काय होते आहे याचे भान नाही.
सबप्राईम निस्तरायला अमेरिकेला ८ वर्ष लागली. भारताने त्यामुळे निर्माण झालेल्या मंदीला तोंड दिले. पण आता ही मंदीतली मंदी भारतीय अर्थव्यवस्थेला कोठे घेऊन जाईल आणि त्यातुन बाहेर पडायला किती काळ लागेल याचा अंदाज कोणी करू शकत नाही. अर्थव्यवस्थेला यातही उभारी देईल असे सकारात्मक निर्णयही होत नाहीत. यांचा सकारात्मक निर्णय काय तर १५००० बक्षीसे. यातून रोकडविरहित व्यवहार वाढतील हा भ्रम आहे. अर्थव्यवस्थेला उभारी तर अशक्यच आहे. चलन हे शेवटी विनिमयाचे साधन आहे, ते म्हणजे अर्थव्यवस्था नव्हे. पण आज तेही काढून घेतले आहे. म्हणजे आहे त्या मागणीलाही अर्थ रहात नाही कारण असुनही क्रयशक्ती नाही असल्या विचित्र स्थितीत आणुन ठेवले आहे. भविष्यात चलनपुरवठा सुरळीत झाला कि मागणीचे खरेदीत रुपांतर लगोलग चालु होईल असेही नाही. काळा पैसा ज्या कारणांनी निर्माण होतो ती दूर करण्यापेक्षा भविष्यात त्याला उभारीच येईल अशी लक्षणे आताच दिसत आहेत.
नव्या भ्रष्टाचाराच्या विपूल संध्या या चलनकल्लोळाने दिल्या आहेत. मी पुर्वीही म्हणालो होतो कि काळा पैसा यामुळे संपणार नाही, फक्त त्याचे पुनर्वितरण होईल व ज्यांना खड्डा पडलाय ते दुप्पट जोशात तो भरून काढायचा प्रयत्न करतील. भ्रष्टाचार व काळा पैसा आहे तेथेच राहील.
अडाणी-अंबानीच्या हितासाठी हा निर्णय घेतला गेला असेही आरोप होताहेत. तसे असेल तर भ्रष्टाचाराचा कळस खुद्द सरकारनेच गाठला आहे असे म्हणावे लागेल. आणि तसे जर नसेल तर काय विचार करून हा अर्धवट निर्णय घेतला हा प्रश्नही अनुत्तरीत राहील. मोदींचा हा चहा नासला आहे हे मान्य करत सकारात्मक पावले उचलायची दृष्टीही हे आत्ममग्न दाखवत नाहीहेत. अजुनही वेळ गेलेली नाही. अर्थव्यवस्था कोम्यात जायच्या बेतात आली आहे. वेळीच सावध व्हावे ही अपेक्षा सोडुन आपण आज तरी काही करू शकत नाही.

Monday, December 12, 2016

OBC Literary movement...Why?

In our country, the literature too seems clearly has been divided in the four categories. That is the literature of the so-called upper castes, dalits, tribal and OBC. The upper caste and Dalit literature is dominant though they are conflicting with each other and stands opposite in socio-cultural views. However, the OBC literature, though a recent concept, has very few takers even among the OBC authors and thinkers. There have been attempts to combine the both Dalit and OBC literature, but they have not been successful. The thinkers those are trying to promote the concept of the OBC literature also are confined to what the ideological base should this literary movement carry. 


Mahatma Phule and Dr. Ambedkar are the obvious idols to the thinkers those are in this attempt, but practically it is experienced that combining the both to create an ideology for the OBC hasn't worked out well. The reasons may be probed, however, let us first decide what the OBC literature means? For that let us ask few questions to ourselves.

1.    Can literature only written by OBC be OBC literature?
2.    Can the literature in which OBC characters and their strife is depicted and penned by the OBC be the OBC literature?
3.    Can the literature authored by anybody but depicting OBC characters and their life be the OBC literature?
4.    What is meant by the term literature?

Let us discuss the above questions.

-         Technically, any literature written by any OBC writer can become OBC literature. There is no dearth of OBC writers now in the country. There are many poets, playwrights, novelists and story writers of fame that belong to the OBC category. 

However, when we come to the second and third question, we can see clearly that the literature written by the OBC cannot become OBC literature because their characters, the ideologies and the social relationships depicted in their works are almost devoid of any OBC aspiration or their strife for the better tomorrow through their complexities of the life.

Then how it can become OBC literature?

The literature in which the OBC protagonists are portrayed on the backdrop of their social conditions, their aspirations, their strife, their sentiments, their driving forces and their achievements or failures are portrayed can be treated as the OBC literature. 

But what if the writer is not OBC? Can still it be called OBC literature? 

Technically it should because the literature in question will be all about OBCs and their social relationship with rest of the society.

What is literature? Literature is any form of the written or vocal expression in which human life is depicted in creative artistic manner. I exclude autobiographies from this term because it doesn’t fulfill the definition of the literature though it may embrace the some of the essential ingredients of the literature. Autobiographies do expose and explore the social conditions of certain groups those were unknown to the rest of the world. Dalit autobiographies are the fine example of this. However, this is not the case with the OBC though there are ample of autobiographies, but the expression limited to their own life without relating it to the vision as OBC and any contribution to the ideology, no matter what it is.  

The literature is almost devoid of the OBC protagonists and their life. Uddhav Shelke’s “Dhag” is an exception that I have come across. There could be other exceptions as well. In rest of the literature, there are OBC characters here and there but their role is subordinate and seems to be picked up randomly to suit the plot. 

Why this could have happened? 

The first thing comes to my mind is OBC community is still overburdened with the inferiority complex that makes him reluctant to choose protagonists from his own caste or from OBC community. They do not think the life of the OBC could be or is exciting enough that can provide charming plots to write novels or plays. Moreover, they try to look for so-called glorious plots where mighty people provide attractive characters those can be easily popularized or already popular. They also might be feeling that the readers may not welcome the book if it is on the backdrop of their community as no one would be interested for lack of appealing characters. However, an artist should be able to sense the appeal even in the simplest characters.

I know many OBC authors and poets but they hesitate to present themselves as OBC. Rather they desire upward mobility in the literary circles by adjusting their ideologies accordingly. Having own ideaology is quite rare among all the authors belonging to any camp. In lack of that, they mostly enter the Hindutva camp for they provide stage and fame through their numerous tentacle organizations/groups. Dalit literary movement, though that too has been slowed down recently, is more aggressive, full of Amebedkarite ideology,  cope up some OBC writers who are rebellious and are prone to the social change. In a way, OBC writers have no option to belong to this or that camp because they do not have their own. The OBC thus seldom can voice their own thoughts those are independent of the influence of both the camps. This is why the ideological construction of the OBC movement could not progress at all!

It may be asked whether there really is a need of an independent literary movement of OBC? Why divide literature on basis of the castes? I would like to ask, are the problems, aspirations, social conditions and the sufferings of OBC are as same as of the writers belonging to the other camps? There won't be any necessity of separate camps if the life of the OBC was portrayed enough with the unprejudiced psyche and human sympathy. This is not the case. 

It is said that the OBC community is a group of so many castes that it is impossible to incorporate them in a single voice. This is not true. The common link between every OBC caste is that they were all creators since Indus times, makers of the utilitarian innovative commodities those they had invented in the remote past and became the pillar of the economy since then by their immense contribution. Many castes are included in OBC category and some are excluded. However, the fact remains that all the Creator Communities belong to the OBC category, though legally they might be excluded or thrown in some other category for the constitutional criterion.

Hence Mandal Commissions or later categorization cannot limit the scope of OBC in a social sense.  It has to be broadened to some extent when we speak of OBC literature.

Most importantly OBC has not been cautious or even curious about searching their own roots. They either are dependent on the Vedic sources, foreign sources or on the Dalit sources. They do not have their own vision because they never tried to know their past better! They are unaware of their cultural history, rather they are least interested in it. They do not know even they were one who were the creators of the culture as well. 

Hence there is no independent research that can throw proper light on their existence and help to understand what they are! Rather they want to connect some or other way with either Kshatriya Race or Brahmin varna and eventually become subordinate to both the communities. OBC are religious but they are unaware of the fact that their deities and philosophies have been hijacked long ago. The rebellion OBC takes the opposite stance and joins the camp that trusts vehemently that those were the Brahmins who forced caste system on them. Both the claims are illogical, unhistorical and hence no independent ideology of the OBC ever could develop. Knowing the roots is the first step towards building an independent ideology. In absence of this the lack of the OBC literature was a natural outcome. The OBC literary meets have started from past decade but I do not find they have been addressing the root cause. 

Necessity

OBC or creator community is the largest in the country, no matter what religion they belong to today. The common factor is they all are a class of the innovative creators and builders of the economy and culture till the advent of the British Raj.  I call this class as the “Nirmankarta samaj”. Caste meant profession or occupation. There is no question of anybody forcing it to enslave them. The OBCs have seen glorious days right from Indus days till 11th century AD. There has been a drastic decline in their socio-economical conditions since then. Before that, they enjoyed all the privileges from the Royal courts and honor in the society as they had built powerful guilds of every manufacturing profession. But is there any novel that depicts, for example, invention of the iron, blacksmiths guild, their life and the challenges they overcame to excel? Is there no romance enough to portray for a good historical novel? 

Is history only belongs to the kings, the nobles and priests?

 With wake of the industrial revolution, gradually he lost his businesses and turned to the factories or farms as a labor for survival, forcibly abandoning his ancestral occupations. They were never provided with the viable alternatives for the survival. Isn’t there a chance to portray a socio-economic upheaval that drastically affected his life that not only changed his surroundings and the social relationships with his usual way of life in such a manner that he lost his honor and remained only struggler and sufferer? There are so many seeds that can become independent plots for the classic literature if we allow to sprout them. 

The need has arisen because there is no proper depiction of the OBC communities in the literature. As if they do not exist as a human being. Hence there is no reflection of their aspirations, their strife, dreams and philosophy in the literature. Even, there is no as yet proper research in their history and the changes they underwent through the ages. The cultural roots of the OBC are almost forgotten. The inferiority complex has forced them to build fictitious stories about the origin to counter Vedic explanation or he is forced to trust whatever is told to him without an opportunity to check the reality. So, OBC is the community that is totally confused and hence  OBC writer too does not dare much to portray OBC protagonists and their life.

In the modern era, only Mahatma Phule could dare the closed walls of the ignorance and the social oppression.  There has been no attempt to create any ideology out of Mahatma Phule’s works that could attract the writers to make it a part of their literary expressions. In fact, the identity crisis seems to be affecting the Nirmankartas and hence no firm and concrete vision is being developed. 

The tragedy is the creator community utterly have failed in creating literature out of their life.The OBC literature is needed to give new philosophy, the vision and the goal for OBCs life. The literature should be a mirror where any OBC can find his reflection and aspire for new heights. His present condition is terrifically bad as compared with other communities in India. He is almost voiceless, powerless and whatever achievements he embraces are out of his mountainous hard work. Most OBCs are a failure or enjoy the camps where they do not belong.  No matter whether it is literary, education, economic or political world.

And unless this class is empowered in all he will be left neglected forever. Literature, where one can relate and identify….feel his self is a base of the motivations.  Unfortunately, OBC has nothing to relate with in the literature.

OBC literary movement is to inspire OBC writers to change their stance and find material from their own community to do the creative work. The researchers should find time to search for the roots of the OBCs with the unbiased mind and find answers to the present predicament OBCs are facing. There could be many views but those can be debated over for the betterment of the society. 

One thing is clear, unless OBC stands strong and erect India never can become a true Superpower ever!

Sunday, December 11, 2016

Awake...the freedom is in danger!


There should be no hesitation in accepting the fact that the Chartered Accountants know very well the practical economics as they have to deal with all the aspects of the financial transactions their clients make and represent them before the authorities as a statutory auditor and certifier. 

The demonetization move of Mr. Modi is being criticized from all the quarters. This is democratic right of every citizen to react, no matter whether it is in support or in dissent. His voice cannot be suppressed as long he is not speaking out to cause riots or to incite the violence. 

Institute of Chartered Accountants of India has issued notices against the members those expressed their dissent against demonetization and has admonished all the members by a circular that if any member violates the code stern action will be initiated against him. 

Why the government should be afraid of the experts expressing their opinions? 

The similar circular has been issued to the Railway employees that they should not criticize the demonetization else they will have to be faced the stern action. Maybe, all government employees have been in receipt of such circulars. 

This is undemocratic, dictatorial step taken by the Modi government where people have been prohibited from their freedom to express their opinion. Tomorrow the government may issue such orders to media and then social media if this is not opposed vehemently to protect our fundamental right to speak. This is undeclared emergency in which democratic values are at stake.
All the citizens must raise their voice against such evil attempts to suppress their freedom. Already we are in the state of economic emergency where we are unable to use our own money. They have deprived us from our right to wealth, no matter for a short (but uncertain) period. One after one right is in danger and it demands our strong reaction to stop such attempts to crush our freedom!


I condemn these undemocratic circulars which are an indirect ban on the right to express!

Saturday, December 10, 2016

The Bhakts...Mr. Modi and the dooming economy!

Public memory is very short. People have forgotten what was promised by Mr. Narendra Modi before coming in the power and what he did immediately after coming in the power. First six months his ministers and sadhu-sadhvis kept people busy in giving boost to the meaningless discussions on governments attempt to introduce Vedic knowledge. technologies  and language in the education. The Vedic planes started flying in the scientific meets. Mr. Modi told blatantly before the medical professionals how plastic surgery was an ancient Indian invention. Intellectuals and common people were lost in that discussion, forgetting all other issues. A new creed, Bhakts, started admonishing the critics to give PM more time for prime minister has to repair the (imagery) immense damages of past 60 years and that what he was doing was to benefit the nation. They demanded first three months…then six months and now they demand whole term to show the results! The insanity of the half-baked Bhakts is reaching to the new heights every day! 


Hindutva agenda could not be forced ahead much despite all the efforts! Prime Minister recklessly started making new announcements. Svaccha Bharat Abhiyan was introduced and celebrated creating a new hype and a tax was imposed on the people. Where has gone Svaccha Bharat scheme? Much hyped Ganga cleaning saw thousand of crors washing away with its filthy water. Bullet Train proved to be a bogus dream as no further concrete step was taken. Then was introduced an event of “Smart City”. The cities those were announced for this program proved to be smarter than PM’s scheme and meager budget allocated. 

Then came Make in India, Stand up India, Digital India, Jan Dhan Yojana, Krishi Sinchan Yojna and so on. Every announcement followed a hysteric hype. People forgot to check what happened to the previous schemes. Neither Bhakts bothered to have track of their false defense. Such kind of defending Bhakt brigade is becoming a curse to this government. 

In the meaningless slogans, plans and discussions two and half years slipped by. There has been no significant action on any front, even defense. Situation in Kashmir deteriorated. Terrorists could walk in the heart of Army camp and kill the soldiers. To show he is not idle, the government made another event of surgical strike. It was insane to disclose secret army operations before the world. But Modi government did it. It was boasted by the Defense Minister that now Pakistan is trembling with fear…and to his surprise (and to our bad luck) the terrorists again entered Nagrota army camp and took lives of our soldiers. The Government did not feel it necessary to equip our soldiers those are on the boundary, with modern vigilance equipments!  In short, if we look at the outcome of the governments all the announcements we will be left in the depression.

And he, Mr. Modi, came forward with another spine breaking blunder of demonetization. He said that the decision is to remove black money, curb the corruption and counterfeit currency. Everybody welcomed this move.  But as days passed after making the currency illegal from the midnight of 8th November, it dawned on everybody that the government was not at all prepared to handle replacement of the old currency with new one. The most illogical part was he introduced 2000 bill first which anyway was useless as there could be no change available to the user in the market. The farmers and daily wages dependents were the first victims of this move. Farmers neither can sell their produce nor can buy seeds and fertilizers for the new farming season. The economy has brutally been crushed as most of the transaction came to the halt. It is feared by the economists that the burden of this loss is so immense that it may take years to recover fully. 

Mr. Modi, suddenly stopped speaking about black money and counterfeits as soon he realized the futility of his exercise and started another slogan-game of Cashless India, which never was the objective of his blunder at all. He might have realized what the stark realities he has to face after taking a mindless decision, but it seems he is in no mood to correct the things. To save economy from the coming doom he could have taken some positive steps to boost the morale of the people and so the economy.

It is a fact that most of the people have gone in the pessimistic mode and are trying to cope up with the disastrous situation by changing their lifestyle. They are managing their meager cash (or credit) to spend only on the necessities avoiding what they in usual conditions would have spent.  Another factor is bothering the people and that is uncertainty of the future. They do not know when and what another bombshell PM will explode with his announcements. The announcement about the gold was an unnecessary exercise.  That was old regulation. There was no necessity to impose fear among the common people. All these factors, such as changed lifestyle, habits, purchasing patterns etc. can cause a heavy blow to the usual economy. Economics is a human science, runs almost on the psychology of the consumers. This imminent danger is looming large and complete collapse is possible if the currency crisis is not sorted out within a fortnight at the most. But management skills of the Modi government are so poor that it could prove to be a false hope. And yes, FM is saying he needs at the least two quarters (six months) to normalize the currency situation. 

In this vast span of the time, it is very much possible that the usual demand pattern will change to need-based commodities. Trust in the banks and economy will evaporate. This is dangerous situation no one would like to fall in to! As an impact, this will be a heavy blow on the production and so the employment. It has to be ensured that nothing happens of this sort and the trust is restored by making the positive moves. For example either Mr. Modi can reduce the Income tax or abolish it forever by just keeping indirect taxes. Alternatively he can reduce the rates of proposed GST or present indirect taxes if he wants the present Income Tax system to be continued. Simultaneously, he can start implementing additional infrastructural projects thereby providing a booster to the economy and restore the normalcy. Somehow, Mr. Modi has to ensure that the trust of the people in the economy must be restored. 

Talking of the cashless economy is making fun of the people! Though the cashless transactions are bound to grow, still they will be very meager as compared to our overall economy! 

All the time PM cannot depend on his brainless Bhakts and lies of Arthakranti. Their mindless, illogical and mostly foolish defense is dangerous to the present government. This is not economic by any standard to boast of. Rather it is an unprecedented Man-made Economic Disaster that India ever has witnessed.  Mindlessly playing with the economy is unaffordable to the country and its citizens. Mr. Modi has to come out from his boastful cocoon and see the harsh realities people are facing. Last two and half years were unproductive and this demonetization move is taking India in the dark crevasse of economic doom that none should forget. I am sure the Indians did not vote him in for such suffering and destruction!
  
We all are aware now the objectives of this scheme utterly have failed. No black money issue is being sorted out because of this. The corruption is on new height. There is no enough staff with Income tax department to manage all the new assessments and prosecutions. Even there is not enough staff with Sales Tax and Excise Duty authorities to keep the check on every transaction. This scheme may make IT officials richer as they are gifted with an unforeseen opportunity by the government itself. The objectives those Mr. Modi talked about have already proven to be misleading, futile and day-dreaming. As a result economy is shattering. 



Only immediate positive moves can save everything from the outlined forthcoming imminent disasters. 

...जहां पे कोई भी बुरा न था!


Image result for qaiser khalid


"शउरे अस्त्र" हा कैसर खालिद यांचा कविता संग्रह. काव्यात उर्दुचे स्थान अत्यंत उंच दर्जाचे राहिले आहे. अमीर खुस्रो, मीर साहेब, मिर्झा गालीब ते मुनव्वर राणा यासारख्या शायरांनी/कवींनी मानवी जीवनाचे अद्भूत तत्वज्ञान आपल्या काव्यातून प्रकट केले. यामद्ध्ये युवा पिढीतील खालिद साहेबांच्या शायरीने अभिमानाने मिरवावे एवढी उंची गाठलेली आहे.


उर्दू शायरीच्या प्रेमात पडला नाही असा कोणी क्वचित असेल. इतके कि कोणत्याही भाषेतला वक्ता असो, बोलतांना तो एखादा उर्दू शेर सुनावणार नाही असे सहसा होत नाही. हीच उर्दु शायरीची जनमानसातील स्थानाची पावती अहे. हिंदी चित्रपटांतील उर्दू अथवा उर्दूमिश्रीत हिंदी गीतांनी ब-याचशा उर्दू शब्दाचे अर्थही भिन्नभाषकांना माहित असतात. त्यामुळे उर्दू शायरी समजावुन घेण्याला एवढी जड जात नाही. कैसर खालिदांच्या या संग्रहाच वैशिष्ट्य म्हणजे कठीण उर्दू शब्दांचे अर्थही तळटीपांत दिल्याने वाचकांचे काम सोपे होते. लयही समजते आणि अर्थपुर्णताही होते.


मानवी मनाचा अथांग शोध घेणे हे तत्वज्ञ कवीचे प्रधान वैशिष्ट्य असते. त्याच वेळीस प्रेम, मानवी संबंध, सामाजिक जाणीवा यांच्याशीचेही नितळ नाते अशाच तलगर्भी कवीचे असते. खालिद यांच्या शाय-या अशाच निरंतर शोधात निघालेल्या मनाचे दर्शन घडवतात हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.


मानवी जीवनाची शोकांतिका अभिव्यक्त करतांना शायर म्हणतो-


"कौन फिर वक्त के मारों को बचाने निकले
जब मसीहा ही यहां खून बहाने निकले"


"न मिल सकी कहीं घर से सिवा हमें वहशत
पलट के इसीलिये कदमों को घर ही जाना था"


"सबकी अपनी-अपनी दुनिया, हर इक अपने हाल में मस्त
लाशें हर सू ख्वाहिशे-दिल की बिखरी थी दफनाता कौन"


शायर मानवी मनाची स्पंदने टिपतो. कधी व्याकूळ होतो कधी घायाळ होतो. जगातील दांभिकतेचे डंख सतावतात तेंव्हा शायर म्हणतो-


"जब झूठ की रंगीनी सच्चाई को डस बैठी

तब हमने उसूल अपने ए यार बदल डाले"


या निराशांतही एक प्रचंड आशावाद आहे. किंबहुना आशा जीवनाची मात्रएक प्रेरणा आहे जी माणसाला पुढे जायला उद्युक्त करते. हा अजरामर आशावाद खालिद यांच्या शायरीतून तेजाने झळकतो. ते एका शायरीत म्हणतात-


"फिर बहा ले गई इक लहर नई, ख्वाबों को
फिर से हम ताजा घरोंदों को बनाने निकले"


सामाजिक जाणीवा जीवंत असणे प्रत्येक साहित्यिकाचे प्रधान लक्षण आहे असे मानले जाते. खालिद त्याला अपवाद नाहीत. अनेक कवितांतून त्यांची सामाजिक जाणीव अत्यंत काव्यात्मकतेने प्रकट होत राहते. एके ठिकाणी ते म्हणतात-


"और क्या होना था तहजीबों के टकराव से
कुछ लकीरें लिए नक्शे पे सियासत आई"


"आती है क्या कही से कोई भी नवीदे-सुबह
पढिए तो जख्म छपते हैं अखबार में बहुत"


शायर, इश्क आणि शायरी यातील नाते सर्व वाचक जाणतातच. खालिदांसारखा युवा शायर यात मागे कसा राहेल? त्यांचे नजाकत पहा-


"हिज्रो-विसाल तेरा, हुस्नो जमाल तेरा
है ’मीर’ की गजल सा ये खुद्दो खाल तेरा"


आणि याच शायरीत शायर म्हणतो-


"तू आफताबे-आलम बनकर यहां चमकता

होता अगर कहीं दिल भी विशाल तेरा"

तत्वज्ञ-कवी होणे सोपे नाही. खालिदांच्या शायरीत ठिकठिकाणी तत्वज्ञानाची पखरण झालेली पहायला मिळते.


"फिर लौटना है सबको उसी इक मकाम पर
हां उस जगह जहां पे कोई भी बुरा न था"


आणि


"यूं भी देता है पता होने का अपने कोई
कल जो अफलाक पे था आज छुपा खाक में है"


केवळ शायरीबरोबरची ही सफर नसते तर शायराच्या अंतस्थ हृदयात दडलेल्या कोलाहलाशी हितगूज असते. ती करायला "शउरे अस्त्र" वाचायला हवे. हा कवितासंग्रह सान्निध्य बुक्स (दिल्ली) यांनी प्रकाशित केला असून मूल्य रू. २२५/- आहे. महाराष्ट्राच्या  उर्दू अकादमीने त्यांना या कवितासंग्रहासाठी सन्मानित केले आहे. "दश्ते-जां" हाही संग्रह प्रकाशित झाला आहे. अनेक मुशायरेही त्यांनी गाजवले आहेत. यु ट्युबवर तुम्ही त्यांना पाहू व ऐकुही शकता.


मी कैसर खालिद यांना भविष्यातील वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा देतो!


Tuesday, December 6, 2016

"अर्थक्रांती"चा काय संबंध?

कररचना कशी असावी, विनिमयाचे माध्यम (म्हणजे वस्तूविनिमय, सोने/हिरे वा अन्य धातू, प्रमाणित कागदी चलन कि डिजिटल इ.) काय असावे, त्यावर सरकारचे नियंत्रण असावे कि नसावे या व आनुषंगिक बाबींबद्दल पुरातन काळापासून चर्चा होत आली आहे. भारतात एके काळी राजसत्ता नव्हे तर व्यापारी व व्यवसाय श्रेण्याच चलन (नाणी) काढत असत. नंतर हे काम राजसत्तेने हाती घेतले. आता सरकारे हे काम करतात. चलनाचे मूल्य काय असावे हेही सरकारच मध्यवर्ती ब्यंकेमार्फत ठरवते. हे कसे ठरवावे, नेमकी चलनव्यवस्था कशी असावी यावर जगभरातील अर्थतज्ञ विविधांगांनी चर्चा करत असतात.

पण महत्वाची बाब म्हणजे कररचना आणि विनिमयाचे माध्यम हा अर्थशास्त्राचा एक किरकोळ भाग आहे. मुख्य अर्थव्यवस्थेचा पाया नाही. पण हाच जणु काही अर्थरचनेचा प्रधान विषय आहे असे समजून काही अडानभवरे यालाच "अर्थक्रांती" समजतात. एवढेच नव्हे तर निश्चलनीकरणाचा निर्णय म्हणजे जणू काही अर्थक्रांती या स्वयंसेवी संघटनेने सुचवल्यामुळे झाला आहे व अर्थक्रांती येऊ घातली आहे असा काही लोक आवही आणतात तेंव्हा यांना अर्थशास्त्रातला "अ" तरी माहित आहे काय हा प्रश्न पडतो.

सर्व व्यवहार ब्यंकेतून व त्या व्यवहारांवर कर अशी ही कल्पना मुळात नवी नाही. जगभर ती चर्चीली गेली आहे. आस्ट्रेलिया, अर्जेंटिना सारख्या देशांनी ही पद्धत १९८२ पासुनच वापरायचा प्रयत्न केला होता पण नंतर ही पद्धत बंद करण्यात आली. कोणत्याही प्रगत राष्ट्राने मुळात ही पद्धत स्विकारली नाही. स्विकारण्याची शक्यता नाही कारण तिच्यात अनंत अडचणी आहेत. कमी मुल्याचेच चलन असावे हा आग्रह ठीक, पण सरकारने उलट दुप्पट मुल्याच्या नोटा काढल्या. हे तात्पुरते आहे, या नोटा बंद केल्या जातील असा युक्तिवाद काही अडाणभवरे करतात पण असे वारंवार चलन अर्थव्यवस्थेतून बाद करणे याला जागतिक स्तरावर केवळ मुर्खपणा समजला जातो. कोणतेही राष्ट्र असा मुर्खपणा करत नाही. थोडक्यात पुंगी दुस-याची आणि "जितं मया" म्हणत नाचतोय भलताच अशी या अर्थक्रांतीची गत आहे.

मी इच्छा असुनही आजवर लिहिले नव्हते पण स्वत:ला अर्थक्रांती संस्थेचे चमचे समजत असल्याप्रमाणे काही लोक मला अर्थशास्त्र शिकवायला निघाले म्हणून हे लिहिने भाग आहे. मी अर्थक्रांती संस्थेमार्फत निघणा-या "अर्थपूर्ण" या मासिकात ९-१० लेख शाश्वत अर्थव्यवस्थेबाबत लिहिलेले आहेत पण त्यांच्या प्रस्तावावर लिहिण्यासारखे मुळात काही नसल्याने त्यावर एकदाही लिहिले नाही. अर्थक्रांतीला देशात कशी कर व चलन रचना असावी याबाबत सिद्धांत मांडण्याचा व प्रचार प्रसार करण्याचा अधिकार अवश्य आहे. पण हे निश्चलनीकरण व अर्थक्रांतीच्या प्रस्तावाचा एकमेकाशी काडीइतकाही संबंध नाही हे मात्र लक्षात घ्यावे लागेल.

दोन्हींची वेगळी चर्चा होऊ शकते, एकत्र करण्याचे काही कारण नाही.

Sunday, December 4, 2016

राजन्य-क्षत्रीय व शूद्र : एका भ्रमाची कथा!


पुरातन भारताचा इतिहास लिहितांना विद्वानांनी, मग ते देशी असोत कि पाश्चात्य, अनेक चुकीच्या दृष्टीकोनामुळे अनेक चुका करुन ठेवल्या आहेत. पहिली महत्वाची चूक ही आहे कि त्यांनी अनेक आजची सामाजिक/धार्मिक व सांस्कृतिक गृहितके गतकाळावर लादली. मुळात आजची गृहितके मुळात निर्माणच का झाली यावर त्यांनी विचार केला नाही. त्यामुळे अनेक वास्तवे सामोरी असतांनाही मान्य गृहितकांनाच त्रिकालाबाधित सत्य मानल्यामुळे जेही काही विश्लेशन केले गेले, मांडण्या केल्या गेल्या, त्यातून भ्रम जोपासणे अथवा चुकीचे सिद्धांत मांडण्यापलीकडे काही साध्य झाले नाही व समाजालाही त्याचा विशेष उपयोग झाला नाही. वैदिक मांडणीला विरोध करणा-या विद्वानांनीही वैदिक चष्म्यातुनच गतकालाकडे पाहिल्याने त्यांचे तथाकथित क्रांतीकारक सिद्धांतही फोल ठरले व द्वेषाखेरीज समाजाच्या हाती काही लागले नाही. मुळात वैदिक विद्वानांचीही गफलत होऊ शकते अथवा वास्तव माहित असुनही काही कारणांमुळे ते उघड न करण्याच्या प्रवृत्तीमुळे अथवा स्वभ्रमित गृहितकांवरच अविवेकी श्रद्धा ठेवल्यामुळे सत्यदर्शन तुरळकच राहिले. ज्ञानाच्या सीमा विस्तारुनही या वृत्तीमुळे आपले ज्ञान हे परंपरागतच राहिले.

येथे आपल्याला आपल्या समाज मुळाचच आधी विचार केला पाहिजे. पुरुषसूक्त हे विषमतावादी वर्णव्यवस्थेचे जन्मदाते आहे असे सारेच विद्वान मानत आले  आहेत. सर्व विचारधारांनी या गृहितकाच्याच आधारावर आपली व्यूहरचना ठरवली आहे. खरे तर सर्वच विद्वानांना हे माहित आहे कि पुरुषसुक्तात क्षत्रीय हा शब्द येतच नसून राजन्य हा शब्द येतो. म्हणजे, वर्णरचना उतरंडीची आहे हे मान्य केले तर राजन्य हा दुस-या क्रमांकावर आहे. किंबहुना क्षत्रीय शब्दाला ऋग्वेदप्रणित (व नंतरच्याही मध्य-वैदिक साहित्यात) वर्णरचनेत स्थानच नाही आणि हे प्रत्येक विद्वानाला माहित आहे व होते.

शूद्र हे कोणा एका समाजाचे नांव नसून या नांवाची टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात, पार इसपू चवथ्या शतकापर्यंत तरी अस्तित्वात होती हेही सर्व विद्वानांना माहित होते व आहे. शूद्र टोळीसहित असंख्य वेगवेगळ्या नांवांच्या टोळ्या भारतभर पसरल्या होत्या हेही त्यांना माहित आहे. असे असुनही "शूद्र" या संकल्पनेचे स्पष्टीकरण करतांना या वास्तवाचा विचार केला गेला नाही ही एक वस्तुस्थिती आहे. 

ऋग्वेदात दहाव्या मंडलातील ९०वे सुक्त सोडता व त्यातही ऋचा क्र. १२ सोडता मुळात शूद्र शब्द संपुर्ण ऋग्वेदात कोठेही येत नाही. जर शूद्र नामक एक समाज होता, चवथा वर्ण अथवा एक समाजहिस्सा होता तर या समाजाशी वैदिक लोकांची पुर्वी कधीच भेट झाली कशी नव्हती? ऋग्वेदात दास-दस्यू,-पणी-पख्त-पर्शू इत्यादि समाज व टोळ्यांची नांवे मुबलक वेळेस येतात, कारण त्यांना ते लोक माहित होते. काहींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते तर काहींशी शत्रुत्वाचे. दास-दस्युंशी तर वैरच होते. असे असतांना यापैकी एकाही टोळीचा अथवा समाजाचा उल्लेख न येता शूद्र या अपरिचित टोळीचे नांव पुरुषसुक्तात कसे येते यावर पुर्वीच विचार व्हायला हवा होता.

गृहित असे धरले गेले कि आक्रमक आर्यांनी येथील लोकांना पराजित केले व या हरलेल्या लोकांना शूद्र असे नांव दिले व चवथ्या वर्णात सामावून घेतले. एकोणिसाव्या शतकात हा सिद्धांत त्यावेळच्या उपलब्ध अल्पज्ञानामुळे हा सिद्धांत पचनी पडणेही सोपे होते. पण तरीही समांतर साहित्य, महाभारत जरी पाहिले असते तर त्यातही शूद्र टोळीचा अन्य टोळ्यांसमवेत स्वतंत्र उल्लेख केला गेलेला आहे, तो का, हा प्रश्न पडायला हवा होता. नंतर आर्य आक्रमण सिद्धांत बाद झाला कारण त्याला पुष्टी देणारा एकही पुरावा समोर आला नाही. पण वैदिक धर्म भारतात आला हे तर वास्तव होते. मग ही घटना कशी घडली असावी यावर पुरेसे पुरावे उत्खनित व वैदिक साहित्याने दिलेले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. तीच बाब राजन्य या तथाकथित दुस-या वर्णाबाबत घडली. राजन्य जाऊन क्षत्रीय कसे उगवले असावेत यावरही विचार करण्याची गरज विद्वानांना भासली नाही. 

पुरुषसुक्तातील ती ऋचा अशी आहे-
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥

आधी आपण राजन्य या वर्गाचा विचार करू. (वर्ण म्हणनेही तसे धाडसी ठरेल कारण ऋग्वेदात, विशेषत: या सुक्तात वर्ण हा शब्द येत नाही.) पण आपण आधी राजन्य या वर्गाचा विचार करू कारण वदिक साहित्यातून स्मुतींतून राजन्य हा शब्द क्रमश: गायब होऊन त्याची जागा क्षत्रीयाने घेतलेली दिसते. असे का झाले यावर दिले जाणारे ढोबळ व अतार्किक उत्तर म्हणजे राजन्य व क्षत्रीय हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. पण खरे काय आहे हे आपण पाहुयात.

ऋग्वेद व अथर्ववेदात राजन्य ही संज्ञा राजकुळातील, म्हणजे राजाचे सगे-संबंधी (मग राजा आजी असेल वा माजी) यांना लावली गेली आहे. ऐतरेय ब्राह्मणात देवयज्ञात राजन्याने क्षत्रीयाला भाग घेण्यासाठी विनंती करावी असे म्हटले आहे. ब्राह्मण साहित्यात राजन्य व क्षत्रीयांत संघर्ष असल्याचे सुचन अनेक ठिकाणी केले गेलेले आहे. ऐतरेय ब्राह्मणापर्यंतच्या कालापर्यंत तरी राजन्य अस्तित्वात होते. (ऐ. ब्रा. १.५.२) कौशितकी उपनिषदही राजन्य व क्षत्रीयात फरक करते. ऋग्वेदात ९ वेळा क्षत्र हा शब्द येतो तर राजन्य अनेकदा. तेथेही दोन्ही एकच असल्याचे कसलेही सूचन नाही. शतपथ ब्राह्मणातही राजपूत्र, राजन्य व क्षत्रपुत्र हे शब्द येतात. येथेही राजन्य व क्षत्रीय वेगळे असल्याचे दाखवले आहे. 

राजन हा शब्द गणराज्य अथवा टोळी नायकाला वापरला जात होता. राजन हा निवडला गेलेला असे अथवा वंशपरंपरागत. त्याचे जे निकटचे संबंधी होते त्यांना राजन्य ही उपाधी होती व नवा राजन हा राजन्यांतुनच निवडला जात असे. पुरुषसुक्ताने केवळ या आणि याच वर्गाला समाजव्यवस्थेत दुसरे अथवा समांतर स्थान दिले आहे. क्षत्र अथवा क्षत्रीयाला नाही. 

क्षत्र या शब्दाचे अनेक अर्थ लावण्यात आले आहेत. क्षत्र म्हणजे शक्ती, जो दुस-यांना क्षती पोहोचवतो तो क्षत्र असा अर्थ जवळपास सर्वमान्य आहे. हा एक प्रकारे ऋग्वेदकालीन सरंजामदारांचा वर्ग होता. विश (खेडी व त्यातील राहणारे शेतकरी/पशुपालक) त्यांनी आपल्या अधीन केलेली असत व संरक्षणाच्या, विस्ताराच्या मोबदल्यात ते राजातर्फे करही गोळा करत. पण त्यांची संख्या अत्यल्प अशी होती. असे असले तरी वैदिक समाजात राजन्य व क्षत्र (क्षत्रीय शब्दही अपवादानेच ऋग्वेदात येतो.) हे दोन स्वतंत्र वर्ग होते हे वास्तव आहे. मनुस्मृतीत राजन्य व क्षत्रीय शब्द आलटुन पालटून येतात पण जेथे जेथे राजन्य शब्द येतो तेथे विवक्षित आज्ञा दिसतात ज्या क्षत्रीय शब्द येतो तेंव्हा वेगळ्या आहेत. पण मनुस्मृतीतील पुरुषसुक्तात राजन्याऐवजी क्षत्रीय शब्द वापरला गेला आहे. वेदप्रामाण्याची वासलात मनुस्मृतीच कशी लावते हेही येथे पाहण्यासारखे आहे. तरीही मनुस्मृतीतही राजन्य हा वेगळा गट असल्याचे दिसते.

मग प्रश्न असा पडेल कि असे असुनही पुरुषसुक्त फक्त राजन्यांचाच उल्लेख करते, क्षत्रीयाचा का नाही? नंतरच्या कालात क्षत्रीय शब्दाला मोठे वलय मिळाले असले तरी मुळात वैदिक वर्णव्यवस्थेत हा वर्गच सामील नाही. राजन्य हा वर्ग नंतरच्या काळात संपला असला तरी राजन्य शब्दाला हटवून क्षत्रीय शब्द तेथे टाकला गेला नाही. किंबहुना क्षत्रीय हा वर्णच नाही. असला तर राजन्य आहे. मग यामागे नेमकी काय कारणे आहेत हे शोधल्याखेरीज राजन्य व अस्तित्वात नसलेले शूद्रांचे बनवण्यात आलेले कोडे उलगडणार नाही. 

यासाठी प्रथम वैदिक धर्माचा प्रवास समजावून घ्यायला हवा. 

सर्व आर्य आक्रमणवादी/स्थलांतरवादी विद्वान हे मान्य करतात कि वैदिक आर्य हे अफगाणिस्तानातुन विविध टोळ्यांनी भारतात उतरले. आर्य आक्रमण अथवा स्थलांतर सिद्धांत फोल असला तरी ऋग्वेदाची रचना ही अफगाणिस्तानात झाली हे ऋग्वेदात येणा-या भुगोलातून व टोळ्यांच्या नांवांवरून स्पष्ट दिसते. वैदिक लोकांचे पारशी धर्माशी असलेले संघर्षही त्यात विस्ताराने नोंदले गेलेले आहेत. असे असले तरी दोन्ही धर्मात विरुद्धार्थाने साम्यही खूप आहे. पारशी धर्मातही यज्ञच मुख्य आहे, पण तो अहिंसक आहे. अवेस्त्यात जे देव आहेत ते ऋग्वेदात दुष्ट अर्थाने, पण समान नांवाने,  अवतरतात तर अवेस्त्यात जे दुष्ट आहेत ते वैदिक साहित्यात देव म्हणून येतात. अवेस्त्याचा भुगोल हा उत्तर अफगाणिस्तान (जुना बल्ख्स, आता ब्यक्ट्रिया) हा आहे तर ऋग्वेदाचा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान असून हेल्मंड (संस्कृत (सेतुमंत) नदीचे खोरे हा आहे. वैदिक सरस्वती नदी "हरस्वैती" या नांवाने आजही तेथेच वाहते आहे. (पर्शियन भाषेत स चा ह होतो.) या नदीच्याच परिसरात बव्हंशी वेद रचला गेला. दक्षीण अफगाणिस्तानचे नांव आताआतापर्यंत (ग्रीक रेकोर्डनुसार) "अरियाना" होते. धर्म-विभेदामुळे त्या प्रांतात राहणा-या व सीमाभागातील तुराणी (तुर्वश), पख्तून (पख्त), बलोची (भलानस), इत्यादि समाजांशी त्यांचे कधी वैर तर कधी अजून दुस-या शत्रुशी लढायची वेळ आली तर सख्य हा प्रकार ऋग्वेदात अनेकदा येतो. या नांवाच्या टोळ्या आजही अस्तित्वात आहेत. याचा अर्थ एवढाच कि या धर्माचा विकास हा दक्षीण अफगाणिस्तानात झाला. या धर्मियांचे विशेष्त: झरथुष्ट्राच्या धर्माशी वैर होतेच पण सोबतच यज्ञ न करणा-या, इंद्राला देवता न मानणा-या दास, दस्यू, पणी, पुरू अशा अन्य समाजांशीही वाद होते. दाशराज्ञ युद्ध यातुनच लढले गेले. 

हा धर्म भारतात कसा आला याची पुराकथा शतपथ ब्राह्मणाने जतन करुन ठेवलेली आहे ती अशी-

"सरस्वतीकाठी राहणा-या विदेघ माथवाने गौतम राहुगण या आपला पुरोहित व अग्नीसोबत पुर्वेकडे वाटचाल सुरु केली. उत्तरगिरीला (हिंदूकुश) पार करत नद्या कोरड्या करत व अरण्ये जाळत ते सदानीरा नामक नदीपर्यंत आले. विदेघ माथवाने अग्नीला विचारले कि आम्ही कोठे निवास करू तेंव्हा अग्नीने सांगितले कि या नदीच्या पुर्वेला निवास कर. तिथे नापीक, दलदल असलेल्या जमीनी होत्या. तेथे विदेघ माथवाने अग्नी स्थापन केला." (श.ब्रा. १.४.१, १४-१७).

वैदिक शैलीत लिहिल्या गेलेल्या या पुराकथेवरून विदेघ माथव नांवाचा कोणी एक राजा अथवा राजन्य आपल्या पुरोहित व अल्प-स्वल्प अनुयायांसह भारतात आला. त्याला त्याचा प्रदेश का सोडावा लागला याचे उल्लेख नसले तरी तशी राजकीय व धार्मिक परिस्थिती बनल्याने विदेघाला आपला प्रदेश सोडावा लागला हे उघड आहे. पारशी धर्माचे अनुयायीही मुस्लिमांचे अत्याचार वाढल्यानंतर भारतातच आश्रयार्थ आले होते. त्यापुर्वी ही वेळ पारशी लोकांमुळे वैदिकांवर आली होती असे दिसते. 

सदानीरा नदी म्हणजे नेपाळमधून वाहत येत गंगेला मिळनारी गंडकी नदी होय असे काही विद्वान मानतात. पण महाभारतातील कथांनुसार सदानीरा नदी  गंडकी नसून गंडकी व शरयुमधुन वाहनारी कोणतीतरी अज्ञात नदी असावी असे दिसते. अमरकोशानुसार तर सदानीरा नदी हे बंगालमधील वाहणा-या कर्तोया नदीचेच एक नांव आहे असे दिसते. खरे तर या नांवाची  एकही नदी नाही. सदानीरा म्हणजे "पाण्याने सदैव भरलेली नदी" व हे नांव कोणत्याही बारमाही नदीला लागू पडू शकते. वरील पुराकथेनुसार हा भाग दलदलीचा व नापीक होता असेही दिसते. 

आर्य आक्रमणवाद्यांनी कुरु प्रांतातुन पुर्वेकडे वैदिक धर्म पसरवायला निघालेल्या आक्रमकांशी या कथेचा संबंध जोडला. पण कुरु प्रांत वेदांत येत नाही तर उत्तरकालीन ब्राह्मण ग्रंथांत येतो.  शिवाय हे आर्यांचे "विजयी आक्रमण" असते तर त्यांना ओसाड, दलदलीच्या भागात वसती करावी लागली नसती. प्रत्यक्षात गंगेचे खोरेही हजारो वर्षांपासून मानवी वसत्यांनी गजबजलेले असल्याचे असंख्य पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. ते जेते असते तर निर्मनुष्य ठिकाणी वसती करायचे काही कारण नव्हते. शिवाय सरस्वती नदी भारतातीलच असे चुकीचे गृहितक घेतले गेले. भारतात सरस्वती होती तर ती कोणती याचे समाधानकारक उत्तर आजही विद्वान देवू शकलेले नाहीत. अफगाणिस्तानात मात्र ही नदी होती व आजही आहे. 

थोडक्यात काही वैदिक धर्मीय तत्कालीक परिस्थितीमुळे अफगाणिस्तानातील सरस्वती नदीचे खोरे सोडून, हिंदुकुश ओलांडत पश्चिमोत्तर भागात आले व स्थानिकांशी संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी स्वत:ला गैरसोयीची पण इतरांना त्रासही होणार नाही अशी जागा निवडली. तेथे वाहणा-या नदीचे स्थानिक नांव माहित नसल्याने तिला "सदानीरा" असे नांव दिले. त्यामुळे अशा नांवाची नदी सापडत नाही. तेथे वस्ती करून त्यांनी जेवढे स्मरणात आहे तेवढे वेदवाड्मय शिस्तबद्ध रितीने मांडत त्यात भरही घातली. दहावे मंदल, विशेष्त: पुरुषसूक्त ही येथे आल्यानंतरची रचना आहे हे विद्वानांना मान्य आहे. उदाहरणार्थ म्यक्समुल्लर म्हणतो, "या सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमद्ध्ये नाहीत व ऋग्वेदातही उल्लेखले गेलेले नाहीत. या सुक्ताची भाषाही अर्वाचीन आहे." (‘A History of Ancient Sanskrit Literature’, by F. Max Muller, Pub.: Williams and Norgate, , 1859, p. 557) थोदक्यात ऋग्वेदाचे संपादन व दहाव्या मंदलाचे बरेचसे लेखन हे भारतात आल्यावर झाले आहे.

पण नेमके कोठे व याच सुक्तात सर्वप्रथम शूद्र हा शब्द एक समाजघटक म्हणून का येतो या प्रश्नाचे उत्तर आपल्या समोरच आहे.
शूद्र नांवाची एक टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात रहात होती याबाबतचे अनेक पुरावे सुदैवाने उपलब्ध आहेत. अलेक्झांडरचा इतिहासकार डायोडोरस हा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या काळात त्याच्या सोबत होता. त्याने सिंध प्रांतातील सोद्राइंशी झालेल्या युद्धाचे व अलेक्झांडरने त्या प्रांतात एका नदीच्या काठी वसवलेल्या अलेक्झांड्रिया नगरीचे वर्णन करून ठेवले आहे. . (The Invasion of India by Alexander the Great-As described by Arrian, Q Curtius, Diodoros, Plutarch and Justin, edited by J. W. Mcrindle, page 354) सोद्राई हे नांव शूद्र शब्दाचा ग्रीक अपभ्रंश आहे हे सर्व विद्वान मानतात. अलेक्झांदरचे आक्रमण इसपू चवथ्या शतकात झाले हे सर्वविदित आहे त्यामुळे तोपर्यंत तरी ही जमात त्या भुभागात अस्तित्वात होती. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, "शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकात होती याबाबत शंका नाही."  (Sudras in Ancient India: A Social History of the Lower Order Down to Circa A.D. 600 by RS Sharma).
महाभारतात शूद्र टोळीचे नांव अभिरांसोबत तर वारंवार घेतले आहे. युधिष्ठिराच्या राज्यारोहण समारंभापुर्वी उत्तरेकडे दिग्विजयासाठी गेलेल्या नकुलाला शूद्र टोळी प्रमुखाने नजराने दिले. भारत युद्धात शूद्र जमात अभिरांसह दुरोधनाच्या बाजुने लढली. इतिहासकार ग्यानचंद चौहान म्हणतात कि अभिरांसोबतच शूद्र टोळीचे इतके उल्लेख मिळतात कि महाभारत काळापर्यंत सिंध प्रांतात ही टोळी अत्यंत भरभराटीला आलेली होती असे स्पष्ट दिसते. ( (Some Aspects of Early Indian Society, by Gian Chand Chauhan, page 54) 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे शुद्र हे सिंध प्रांतातील एका जमातीचे नांव होते. त्या प्रांतातच अनेक अन्यत्र अनेक स्वतंत्र नांव असलेल्या अभिर, शिबीसारख्या अनेक जमाती होत्या. प्रत्येक जमात अथवा गण स्वतंत्र नांवाने आपापल्या भुभागात भारतभर सुखनैव जगत होता.   

सिंध प्रांत हा अफगाणिस्तानाला सर्वात जवळ असल्याने भारतात आश्रयार्थ निघालेल्या वैदिक लोकांची भेट त्यांच्याशी झाली असणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्याच भागातील एका सदानीरा असे नांव दिलेल्या निर्मनुष्य जमीनीवर त्यांनी रहायला सुरुवात केली. आधी माहित असलेले दास-दस्यू वगैरे पन्नासएक समाज मागे सुटलेले होते. शुद्रांनी (शूद्र जमातीच्या लोकांनी) वैदिकांनी आपल्या भागात रहायला हरकत घेतलेली दिसत नाही याचे एकच कारण संभवते व ते म्हणजे वैदिक संख्येने कमी होते व ते भांडखोर जमातींपासून दुरच राहू इच्छित होते, त्यामुळेच त्यांचा प्रवास अरण्यांतुन होत दलदलीच्या प्रदेशात स्थाईक होण्यात झाला. शूद्र जमात आधी त्यांच्या माहितीतच नसल्याने त्यांचे नांव अफगाणिस्तानात रचलेल्या ऋग्वेदात येण्याचा प्रश्नच नव्हता.  आणि ज्या जमाती माहित होत्या त्या मागे सुटल्याने शूद्र जमातीशिवाय शांततामय जगण्यासाठी पर्यायही नव्हता.शिवाय त्यांना पुर्व व दक्षीणेकडील भुगोलही माहित नसल्याने अथवा त्यांच्याशी संबंधही न आल्याने हा सर्व भाग शूद्रांचाच आहे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.

आता आपण पुन्हा आपल्या मुळ प्रश्नाकडे वळुयात. राजन्य आणि शूद्र पुरुषसुक्तात का अवतरतात हे आपण पाहुयात.
१. शुद्रांच्या राज्यात त्यांना आपली पहिली वसाहत बनवावी लागली. येथे असतांना ते सर्वस्वी शुद्रांच्या सहकार्यावर अवलंबून होते. त्यांना अन्य प्रदेश व तेथील जमाती अद्याप माहित झालेल्या नव्हत्या. येथेच त्यांनी ऋग्वेदाची संगतवार पुनर्रचना करत नवीन भागही जोडला व अन्य वेदांचेही लेखन पुर्ण केले. किमान पाच-सहा पिढ्या त्यांना या भागात काढाव्या लागल्या.

२. पुरुषसूक्त हे वैदिक धर्मात वर्णव्यवस्था दृढ करण्यासाठी लिहिले गेले नाही. उत्तरकालात त्याचा गैरवापर वैदिकांनी केला असला तरी मुलचा तो उद्देश दिसत नाही. मुळात वर्ण हा शब्दच या सुक्तात अवतरत नाही. हे सुक्त भारतात आल्यानंतरचे आरंभकाळातील सुक्त आहे. हे संपुर्ण सुक्तही एकाच काळात रचले गेलेले नाही हेही स्पष्ट आहे. असे का हे पुढे स्पष्ट होईल.

३. या सुक्तात राजन्य हा शब्द अवतरतो. याचे कारण स्पष्टपणे हे आहे कि भारतात आलेल्या विदेघ माथव व त्याच्या निकतवर्तीय संबंधींची संख्या कर्मठ वैदिक ब्राह्मणाखालोखाल मोठी होती. अनेक वैश्यही त्यांच्या सोबत आलेले असावेत. संख्या राजन्यांची मोठी असल्याने त्यांची गणना या सुक्तात होणे स्वाभाविक होते. क्षत्रीयांचे नांव घेण्याचे काही कारणच नव्हते. कोणताही समाज नव्या ठिकाणी कायम राहण्याच्या इच्छेने येतो तेंव्हा त्यांच्यात अंतर्गत पुनर्रचना होते हा जागतिक अनुभव आहे. जुन्या चालीरिती नवीन प्रदेशात सोडाव्या लागतात तर नवीन धराव्या लागतात. वैदिक साहित्यात, प्रसंगी ऋग्वेदाशी विसंगत बाबी नंतरच्या वैदिक साहित्यात येतात याचे कारण हेच आहे. वैदिक धर्मात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र या रचनाबदलातुनच दिसून येते.

४. या सुक्तात शुद्रांना चवथे स्थान आहे अथवा सर्वात शेवटी नोंदवला गेला आहे ते अवमानार्थ नाही. आधी वैदिक धर्मियांची नोंद करणे स्वाभाविक आहे त्यामुळे त्यांची नोंद आधी आहे, एवढेच. एकुणातच त्यांना वर्तमानात ज्ञात असलेला व अन्य भुगोल व समाजाचे अज्ञान अथवा संपर्क नसल्याने व ज्यांच्या प्रदेशात आपण राहतो आहोत, सहकार्य घेत आहोत त्या समाजाची त्यांनी वैश्विक समाजात नोंद करणे स्वाभाविक आहे. ते भिन्न आनुवांशिकेचे, धर्माचे, राज्यव्यवस्थेचे आहेत याची जानही त्यांना होती व तीही पुरुषसूक्त व्यक्त करते. पुन्हा आपण त्या ऋचेकडे जावूयात.

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत 

विराट पुरुषाचे मुख हे ब्राह्मण झाले, बाहु हे क्षत्रीय झाले, मांड्या या वैश्य झाल्या तर शूद्र हे पायापासून जन्माला आले. येथे पाय हे शूद्र झालेले नाहीत. कारण ते त्या विराट पुरुषाच्या शरीराचे हिस्सेच नाहीत ही जाणीव त्यांना होती. त्यांची नोंद शेवटी केली गेली याचेही हेच कारण आहे. ज्या यज्ञात विराट पुरुषाचा बळी दिला तो उभा नव्हे तर आडवा. त्यामुळे शुद्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन परके, वैधर्मी, पण महत्वाचे असा दिसतो. ते वैदिक समाजव्यवस्थेचे भाग नाहीत ही जाणीव असल्याने  पाय हे शूद्र बनले नाहीत. त्यांची उत्पत्ती स्वतंत्र आहे हे त्यांना माहित आहे. अन्य जमाती भारतात असुनही त्यांचे नांव येत नाही कारण ते त्यांना माहितच नव्हते. किंबहुना अन्यत्र सर्व शुद्रच राहतात व शुद्रच राजे आहेत हा समज त्यांचा अगदी मनुस्मृतीच्या आरंभकाळापर्यंत होता हे मनुस्मृतीवरुनच स्पष्ट दिसते. 

५. वरील विधानाला यजुर्वेदातील “शूद्रार्यावसृज्येताम”  (यजुर्वेद १४/३०) हे विधान बळ देते. "शूद्र व आर्य यांना निर्माण करण्यात आले." याचा अर्थच असा होतो कि आर्य (म्हणजे वैदिक धर्मीय) व शूद्र यांची निर्मिती स्वतंत्रपणे झाली, हे दोन्ही वेगळे आहेत. येथेही अन्य जमातींचे नांव येत नाही कारण या ऋचेची रचना शुद्रांच्याच राज्यात झालेली आहे.

६. शुद्र जमातीच्या राज्यात वसाहती करून रहात असतांना त्यांना शेती, पशुपालनादि व्यवसाय चरितार्थासाठी करणे भाग होते. हे व्यवसाय करतांना मदतनीस म्हणून कर्मचा-यांची गरज भासने   स्वाभाविकच होते. आता कोण त्यांच्याकडे सेवक म्हणून राबनार? गरजू लोकांची समाजात कमतरता नसते. किंवा अधिक वेतनावर काम मिळनार असेल तर लोक सध्याचे उपजिविकेचे  साधन सोडून देतात. तसेच त्यांना जे सेववर्गातील लोक मिळाले ते स्वाभाविकच शूद्र जमातीतीलच गरजू लोक असनार. असा सेवकवर्ग वैदिक वसाहतींच्या जवळच स्वतंत्र वसाहतीत राहणार हे ओघाने आले. या काळात सेवकवर्गात नसलेल्या शुद्र राजासाठी अथवा शूद्र धनिकांसाठीही यज्ञ केले जात हेही महाभारत व मनुस्मृती नोंदवते. हे यज्ञ कृतज्ञतेपोटी अथवा दानदक्षीणेच्या प्राप्तीसाठी होत असत.

७. पुढे वेदांची पुनर्रचना, यज्ञविधींची मांडणी झाल्यानंतर वैदिकांनी शिष्य तयार करत काहींनी धर्मप्रचारार्थ पुर्वेकडे प्रस्थान ठेवले. यासाठे त्यांना पाच-सहा पिढ्या वाट पहावी लागले असणे संभवनीय आहे. वैदिक धर्मीयांना राजाश्रय देणारे पहिले राज्य कुरु होय असे ’द ऋग्वेदा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ग्रिफिथ म्हणतो व महाभारतातील एकंदरीत इतिहासावरुनही हीच बाब स्पष्ट होते. अद्यापही वैदिकांना बिहार व त्यापारची राज्ये व विंध्याच्या दक्षीणेला असलेले प्रदेश व तेथील जमाती माहित नव्हत्या. ऐतरेय ब्राह्मण दक्षीणेकडे पौंड्र, औंड्रादि पन्नास शूद्र राजे राज्य करतात असे ऐकीव माहितीवरून म्हटले आहे. शूद्र म्हणजे अन्यधर्मीय जमाती अशी त्यांची भावना शुद्र टोळीच्या सहवासात दिर्घकाल राहिल्याने झाली असल्यास नवल नाही. शूद्र हे अन्य धर्मियांसाठी एक प्रकारे संबोधन बनले. कारण नंतरच्या काळात (महाभारत काळापर्यंत) भारतात शूद्रच नव्हे तर वेगवेगळी नांवे असलेल्या असंख्य जमाती राहतात हे त्यांना समजले होते.

८.  नंतरच्या काळात कुरु राज्य हे त्यांचे धर्मप्रसाराचे प्रमुख केंद्र बनले. असे असले तरी कुरू राजांनी मात्र वैदिक धर्म स्विकारलेला दिसत नाही हे महाभारतावरून दिसून येते. पुरुरवा हा यज्ञविरोधी तर होताच पण त्याने अनेक यज्ञांचा नाश केला होता ही पुराकथा येथे लक्षात घ्यायला हवी. म्हणजेच राजाश्रय सर्वच कुरू वंशातील राजांनी चालू ठेवला असे दिसत नाही. नहुषाच्या काळात स्थानीय धर्म व वैदिक धर्मात संघर्ष उडाल्याचेही दिसते. 

९. या काळात वैदिक धर्मात भर पडली ती धर्मांतरांमुळे. कुरु नंतर पांचाल, मत्स्य, शुरसेन हे प्रांत व तेथील राजांनी या धर्माला उदार आश्रय दिला. याच्व्ह कालात राजन्य हे संबोधन क्रमश: गळत गेले कारण मुळ राजन्य आपले अस्तित्व कालौघात हरवत गेले. त्याजागी क्षत्रीय शब्दाभोवती वलय निर्माण करत येथील स्थानिक धर्मांतरीत राजांना व लढवैय्या समाजांना हे बिरुद बहाल केले गेले. तसेच वैश्यांचेही झाले. सामान्य शेतकरी व अन्य व्यावसायिकांना धर्मांतराचे काही कारणच नसल्याने फक्त धनाढ्य व्यापारी समाजांसाठी हे संबोधन राखून ठेवण्यात आले. हे संबोधन धर्मांतरितांनाच नव्हे तर वैदिक धर्माबाबत धर्मांतर केले नसले तरी त्याबाबत सहानुभुती असलेल्या, दान-दक्षीणा देणा-यांनाही स्वत:हून लावण्यात आले. त्यामुळेच पणींबाबत ऋग्वेदात द्वेषाचे भावना असुनही नंतरच्या काळात बुबू नामक धनाढ्य पणीसाठी यज्ञ करुन त्याची स्तुती करणा-या ऋचा रचण्यात आल्या. म्हणजेच राजन्य हा समाजवर्ग उरला नाही तर वैश्यांची व्याख्याच बदलली गेली. 

१०. विंध्याच्या दक्षीणेला हा धर्म बिहारमार्गे प्रचारित झाला तो सर्वात उशीरा. या काळात वैदिक धर्माला भरभराटीचे दिवस पहायला मिळाले. या काळात ब्राह्मण वर्णात जाऊ इच्छिणा-यांची संख्या अधिक होती. हा वर्ग आधीच्या स्थानिक धर्मातील पुरोहित वर्गच होता. राजाश्रय मिळेल त्या धर्माकडे कल असणे स्वाभाविक म्हणता येईल. जी. एस. घुर्ये हे प्रख्यात समाजेतिहासकारही ख-या खोट्या मार्गाने का होईना पण प्रतिष्ठा आणि अन्य लाभाच्या आशेने अनेक लोक पार आठव्या शतकापर्यंत या वर्णात जात होते असे आपल्या Caste and Race in India या ग्रंथात नमूद करतात. 

११. राजन्य हे संबोधन जाऊन क्षत्रीय जरी आले असले व त्याला दुसरा वर्ण म्हणायचे प्रथा असली तरी ते कधीच वास्तव नव्हते. थोडक्यात या वर्णाला वैदिक अधिष्ठानच नाही व नव्हते. नंतर हाही वर्ण वैश्यांप्रमाणेच बाद केला गेला हे वैदिक इतिहासच सांगतो हे वास्तव येथे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात हा वर्ण चलनात नव्हता व हा वर्ण घेतल्याने व्यावहारिक फायदेही नव्हते. 

१२. धर्मप्रसार करायला बाहेर पडलेल्या व त्या त्या प्रदेशात स्वतंत्र वसाहती करुन राहणा-या वैदिकांना जशी पुर्वी सेवकवर्गाची गर होती तशीच पुढेही राहिली. प्रथेप्रमाणे या सेवकवर्गाला, मग ते कोणत्याही जमातीचे असोत, शूद्र हा शब्द सवयीने सर्रास वापरला गेला. अशा सेवकांच्या वसाहती वैदिक गांवांशेजारीच असल्याने वैदिक स्री-पुरुष व तथाकथित शूद्र सेवक स्त्री-पुरुष यांच्यात अनैतिक संबंध व संततीही वाढल्याने अशा सेवकवर्गावर अनेक बंधने लादली गेली. पण त्यांचा काही उपयोग झाला नाही असे वि.का. राजवाडे राधामाधवविलासचंपुच्या प्रस्तावनेत म्हणतात. स्मृतींना अभिप्रेत असनारे शूद्र हे शूद्र टोळीचेही लोक नव्हते कि शूद्र नामक कोणत्या चवथ्या वर्णाशी संबंधितही लोक नव्हते पण सेवकवर्गासाठी वापरले गेलेले ते एक संबोधन होते. हे असेच आहे हे खुद्द मनुस्मृतीही सिद्ध करते. "शुद्रांच्या राज्यात निवास करू नये." अशी आज्ञाच मनू देतो.  मनुस्मृतीच शुद्रांवर एवढी बंधने लागु करत असतांना त्याच वेळीस शुद्र राजे कसे होऊ शकतील हा प्रश्न विद्वानांना पडला नाही. पाणिनीनुसार दोन प्रकारचे शूद्र होते, अनिर्वसित शूद्र आणि निर्वसित शूद्र. निर्वसित शूद्र म्हणजे जे आर्यांच्या (वैदिकांच्या) सेवेत नसलेले, स्वतंत्र धर्म व जीवनयापन करणारे व अनिर्वसित शूद्र म्हणजे आर्यांच्या सेवेत असणारे. यावरून हे स्पष्ट होईल कि मनुचे नियम हे अनिर्वसित शुद्रांबाबत होते, बाहेरच्या समाजाबाबत लागू नव्हते. म्हणूनच तथाकथित शूद्र नुसते राजे बनत नसत तर व्यापार/कृषी इत्यादि मार्गांनी धनाढ्यही होत असत. इतिहासात पाहिले तर नंद साम्राज्यानंतर अपवाद वगलता सर्वत्रच शूद्र राजे दिसतात तसेच व्यापारी ते शेतकरी व अन्य निर्माणकर्ते समाजघटकही दिसतात. शुद्रांसाठी यज्ञ करुन दक्षीणा घेणा-या ब्राह्मणला श्राद्धात त्याज्ज्य मानावे अशीही आज्ञा मनु देतो. याचाच अर्थ असा कि शुद्रही वाटले तर यज्ञ करुन घेत, पण ते सेवकवर्गापैकी शूद्र नव्हेत हे उघड आहे. 

१३. इतर टोळ्यांची नांवे माहित होण्यापुर्वी शूद्र टोळीनंतर वैदिकांचा परिचय झाला तो व्रात्यांशी. व्रात्यांच्या प्रदेशातही वैदिक बराच काळ राहिले असावेत असे दिसते. व्रात्य हे टोळीचे नांव नव्हे. हा पूर्व पंजाबमधील अनेक टोळ्या मिळून बनलेला समाज होता. यांच्याबाबतही वैदिक साहित्यात सुरुवातीला अत्यंत चांगले मत आढळून येते. असे असले तरी धर्म-भेदामुळे वैदिक जसे कुरू प्रांतात शिरले तेथे त्यांनी व्रात्यांची निंदा सुरु केली. शूद्र एका टोळीचे नांव असुनही हा शब्द जसा वैदिकेतर समाजासाठी सर्रास वापरला तसाच व्रात्य शब्दही हीनार्थीने संस्कारहीन वैदिकांनाही वापरला जाऊ लागला. व्रात्य स्वत:ला काय म्हणत होते हे मात्र नेमके सांगता येणार नाही. अर्थात यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत व व्रात्य म्हणवला जाणारा समाज नेमका काय व कसा होता हे समजावून घेणार आहोत. येथे लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच कि व्रात्य म्हटलेला समाज हा सिंधच्या पुर्वेस रहात होता व वैदिक व्रात्यांबाबत अवलंबून होते तोवर चांगले व अवलंबित्व संपल्यावर त्यांच्या जीवनशैलीचे निंदक बनले. 

१४. शूद्र हा शब्द मुळात सिंधमधील एका टोळीचे नांव होते हे आपण पाहिलेच. भुगोलाच्या व अन्य समाजांची नांवे माहित नसल्याने तेही शूद्रच संबोधले गेले. फक्त व्रात्यांचा अपवाद. पण हे समाजनाम अथवा टोळीनाम नव्हते. (इंडियाच्या शोधात असलेल्या युरोपियनांनी इंडोनेशिया, इंडीज असे देश ते रेड इंडियन समाज अशी नांवे ते इंडियन नसतांनाही केवळ अज्ञानामुळे वापरली व ती कायमही झाली हे जसे घडले तसेच येथेही घडले. हिंदुस्तान हे नांच सिंधु नदीच्या खो-यातील लोकांसाठी आधी वापरले जात होते ते पुढे संपुर्ण देशाचे नांव कसे बनले हेही आपण पाहिले आहे.)  म्हणजे ती शूद्र टोळी वगलता देशात शूद्र म्हनवणारा कोणताही समाजघटक अस्तित्वात नसतांना हे नांव अवैदिक धर्मसमाजांसाठी सर्रास वापरले गेले असे आपण पाहू शकतो. असे असले तरी वैदिक ज्यांना शूद्र म्हणत होते ते प्रत्यक्षात मात्र आपापल्या टोळीनांवांनी अथवा व्यवसाय नामांनीच स्वत:ची ओळख देत राहिले. हा सिलसिला पार अकराव्या शतकापर्यंत चालू राहिलयाचे आपल्याला दिसते. त्यांनी स्वत:ची ओळख शूद्र म्हणून ठेवली नाही कारण ते शुद्र जमातीचे लोकच नव्हते. वैदिकांच्या दृष्टीने मात्र जे वैदिक नाहीत ते शुद्र ही मुळातील संकल्पना होती ती कायम राहिली. 

१५.. क्षत्रीय शब्द हा पुराप्राकृत भाषांना नवा नव्हता. ऋग्वेदाच्या समकालीन अवेस्तात "क्षत्रैय्या" (सम्राट) व "क्षत्र" (प्रदेश) हे शब्द विपुलपणे येतात तसेच राजन्यही. (उदा. पहा झामयाद यष्ट-८८-९०). हाच शब्द क्षत्रप या रुपात शकांनी (सिथियनांनी) अगदी भारतात आल्यानंतरही वापरणे चालुच ठेवले. उत्तर भारतातील प्राकृत भाषाही याच भाषाकुळाशी/प्रवृत्तीशी संबंधित असल्याने येथे हाच शब्द खत्री, खतीय या रुपाने अस्तित्वात होताच. त्याचा संबंध शेतीमालक/जमीनदारांशी संबंधित असल्याने वैदिक क्षत्रीय शब्द व खतियांत नंतर गोंधळ होणे अथवा ते समानार्थी वाटणे स्वाभाविक आहे. राजन्य शब्दाऐवजी ऋग्वेदात केवळ ९ वेळा येणारा क्षत्र हा शब्द क्षत्रीय करणे वैदिकांना सोपे गेले असले तरी क्षत्रीय हा मुळात वर्णच नाही याचे भान आलेले अजुनही दिसत नाही. उलट त्याचे स्तोम एवढे आहे को जो तो उठतो व स्वत:ची जात क्षत्रीय वंशीय आहे असे म्हणत रहातो. इतिहास मात्र त्याला साथ देत नाही. उलट सोमवंशीय अथवा सुर्यवंशीय राजघराणी वैदिक अर्थाने क्षत्रीय मुळाची कधीच नव्हती हे वास्तव आहे व त्यासाठी भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. 

१६. क्षत्रीय व ब्राह्मणांत नंतरच्या काळात जे संघर्ष झालेत ते सर्व धर्मांतरितांतील आपापसातील संघर्ष आहेत. नवधर्मांतरीत क्षत्रीयांना ब्राह्मणांना वरचे स्थान देणे जड जात होते. बृहदारण्यकोपनिषद हे क्श्ढत्रीय आधी जन्माला आला आणि नंतर ब्राह्मण असे सांगते तर गौतम बुद्धही वर्णव्यवस्थेत खतियाचे स्थान सर्वात वरचे ठेवतो. थोदक्यात बुद्ध काळापर्यंत आदवी समाजरचना उभी बनल्याचे दिसते. असे असले तरी मुलात क्षत्रीय हा वर्णच नाही हेही भान सुटलेले दिसते. कौशितकी उपनिषद मात्र राजन्य व क्षत्रीय वेगळे आहेत असे स्पष्ट सांगते. 

म्हणजेच मुळात जे अस्तित्वात नाही त्याचे स्तोम माजवत, गोंधळ निर्माण करत अथवा बुद्धीभेद करत व करवून घेत स्वभ्रमांत भारतीय समाज अडकत जात नसलेल्या भेदभावांच्या गर्तेत कसा कोसळत गेला याचे हे एक विदारक चित्र आहे. विद्वानांनी वैदिक धर्माचा प्रवास कसा झाला व भारतात तो कसा पसरत गेला हा आलेख जरी नीट पाहिला असता तर गोंधळ सुटत एक स्वच्छ समाजचित्र समोर आले असते. मुळात हिंदू (अथवा आगमिक) धर्म व वैदिक धर्म वेगळे व दोहो धर्मांची व समाजव्यवस्थेची मुलतत्वे वेगळी हे माहित असुनही सोयिस्करपणे लक्षात घेतले न गेल्याने भारतीय समाजाची अक्षम्य हानी झाली आहे. क्षत्रियत्वाचे स्तोम जसे अकारण आहे तसेच शूद्र हा वैदिकांनी गुलाम केलेला अन्यायग्रस्त समाज हा भ्रमही अज्ञानदर्शक आहे. इतिहास त्याला साक्ष देत नाही हेच काय ते वास्तव आहे.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...