Monday, February 23, 2015

वैश्विक संस्कृतीचा माणुस !

अलीकडेच माझे मित्र सौरभ वैशंपायन यांनी आज जगभरचे जवळपास सर्वच वंश, धर्म, जाती यांच्यावर पोस्टींचा पाउस पाडत त्या-त्या धर्म-वंशातील ब-या-वाईटाबद्दल जे लिहायचे ते येथेच लिहा असे म्हटले होते. (त्यात वैदिक धर्म नव्हता असे मला वाटते...त्यांच्या पोस्टच इतक्या झाल्या कि सर्वच वाचता आल्या नाही.) असो.

यामागे उद्विगनता असली तरी हा विषय काढून वैशंपायन यांनी अशा स्वरुपाच्या चर्चांना वेगळेच वळण द्यायचा प्रयत्न केला आणि म्हणून ते कौतुकास पात्र आहेत. इंडो-युरोपियन भाषागटाच्या नांवाखाली युरोपियन वर्चस्वतावाद निर्माण करणारे काय आणि मग त्याला प्रत्युत्तर देण्यासठी सेमेटिक भाषागटवाल्यांचे सिद्धांत काय...., आर्य येथलेच म्हणणारे काय आणि ते बाहेरुन आले म्हणनारे काय, एकच गोष्ट सिद्ध करते, एनकेन प्रकारेन, प्रसंगी इतिहासाचे मुडदे पाडून, त्याला हवा तसा वाकवून एखाद्या जातीचे, धर्माचे, वंशाचे अथवा भाषागटाचे पुरातनत्व सिद्ध करणे आणि जागतिक संस्कृतीत आपलेच कसे योगदान थोर वगैरे आहे एवढेच नव्हे तर आम्हीच संस्कृत्यांचे निर्माते हे सिद्ध करत बसतात. कोणी नसलेल्या वंशाचा अभिमान बाळगतो किंवा कोणी आम्हीच भाषा देणारे असा गर्व बाळगतो. कोणी आम्हीच जगातल्या सर्व विज्ञानाचे जनक आहोत असा अभिमान बाळगतो किंवा कोणी आम्ही हरलेले पराजित म्हणत न्युनगंड बाळगत कोणाचा तरी द्वेष करतो.

थोडक्यात इतिहास हा कोणालातरी ग्रेट आणि कोणालातरी दुय्यम बनवण्यासाठी लिहिला जातो. पण इतिहास तसा असतो काय? तो भुतकाळातील संघर्षांचे तटस्थ चित्रण करण्यासाठी असतो कि वांझ अहंकार किंवा न्युनगंड जोपासण्यासाठी असतो? खरे तर जागतिक संस्कृतीचे निर्माते सर्वच आहेत. भाषा एकाएकी कोणी बनवत नसतो. ती विकसित होते ती अगणित मानवी समुदायांच्या एकत्रित प्रयत्नांतुन. जी-ती संस्कृती विकसीत होते ती त्या त्या प्रदेशातील सर्वांच्याच सहभागातुन. कोण कल्पक माणसाला नवी गोष्ट सुचते, सारे ती स्विकारतात, उपयुक्ततेमुळे आणि त्यात विकासच करतात. उपयुक्त संशोधने वेगाने पसरत जातात...एवढ्या कि हजारो वर्षांनंतर तुइचा मुळ कल्पक संशोधक कोण हे बापाजन्मातही सांगता यायचे नाही.

अहंकार आणि गर्वाने, विशेषत: युरोपियनांच्या, ही घृणास्पद लागण आता सर्वांतच होऊ लागली आहे. कोणी म्हणतो भारतीय संस्कृती वैदिकांपासून सुरु होते, ते अडाणी आहेत. कोणी म्हणतो एके काळी भारत बौद्धमय होता तो थापा मारत असतो. द्राविडियन म्हणतात, आम्हीच सिंधू संस्कृतीचे निर्माते. जो तो केवळ वर्चस्वतावादासाठी थापाच मारत असेल तर जैनांनी काय पाप केलेय? तेही पुढे सरसावतणारच कि! पण या भुलथापांच्या, सोयिस्कर इतिहासांच्या बाहेर येत वास्तव पाहिले पाहिजे.

वंश ही कल्पना नष्ट झाली तरी हे वर्चस्वतावादी जेनेटिक सायंसचा आधार घेतात. यातही एवढ्या कोलांटौड्या आहेत की कोणाचीही मती गुंग होऊन जावी. सायंस अंतिम असेल तर कोणालाही ते नाकारता येता कामा नये. म्हनजे ज्या कारणासाठी आज जेनेटिक्स वापरले जाते तो मार्गच सायंटिफिक नाही, म्हणुन निष्कर्शही सायंटिफिक नाहीत. बामशाद पासून आजतागायतपर्यंत भारतात जेवढी परिक्षणे नोंदवली गेलीत त्यांचे निष्कर्ष एकमेकांशी ताळमेळ घालत नाहीत. पण काही मुर्ख मुलनिवासीवाद सिद्ध करायला तो वापरतात तर काही लोक वैदिकवाद सिद्ध करायला वपरतात. युरोपियन तर यात सर्वात पुढे. कालकालपर्यंत इसपु २००० वर्षंपुर्वी पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-या अंड्रोनोवो संस्कृतीच्या लोकांना या भाषांचा प्रसार होण्याचे श्रेय देणारे आता जेनेटिक्सचाच आधार घेत युरोपियन संस्कृतीचा जन्म इसपू ७०००० वर्षांपुर्वीच कसा झाला हे सिद्ध करण्यासाठी वापरत. म्हणजे शास्त्रज्ञांतही एकमत नाही. मग किमान त्याला सध्या तरी सायंस का म्हणावे?

मी या सर्वांना अतोनात मुर्ख म्हणतो. हेतू शुद्ध ज्ञानाचा नसून आपाप्ल्या गटांचा वर्चस्वतावाद रेटण्यासाठी केला जातो आहे. बरे ते तरी खरे आहे काय? खरे तर भौतिक पुराव्यांनुसार सेमेटिक भाषागट हा जास्त पुरातन आहे, इंडोयुरोपियन नाही. पण मग ज्यू-मुस्लिमांना श्रेय द्यावे लागेल...ते कसे देणार? बरे इंडो-युरोपियन भाषागटाचे पुरातन अवशेष/पुरावे मुळातच नाहीत म्हनून त्यो अर्वाचीन असेही कसे ठरवणार? जागतिक इतिहासाला भगदाडे पाडण्याची ही जर प्रवृत्ती, तर एवढेसे महाराष्ट्र...या इतिहासात तर केवळ चिंध्याच शिल्लक राहणार कि! आम्हाला अजुन "शिवाजी कोण होता?" हा प्रश्न जर पडत असेल तर आम्ही त्यांचे नांव घेण्यअचेही अधिकारी कसे? जो तो त्यांच्याशी संबंध जोडतो. एकही जात अपवाद नाही. तेली-शिंपीच कसे नाही अजून आले पुढे सांगायला, कि महाराज आम्हीच बनवलेले तेल वापरत होते आणि आम्हीच शिवलेली देखणी वस्त्रे वापरत होते हे सांगायला? अरे ते वापरणारच आणि यांचीच वापरणार. महाराजांची तलवार असो कि कट्यार असो...कोणा लोहारानेच बनवली असणार...देवाने नक्कीच नाही हे आम्हाला समजत नाही. ते किल्ले, ते वाडॆ वडार-गवंड्यांनेच बांधले असणार हेही आम्हाला मान्य करायचे नसते. जगभरातील आज संस्कृती कळते ती खापरांमुळे, मृद्भांड्यांमुळे...म्हणजेच कुंभारांमुळे कळते हे आम्ही कधी मान्य केले? उलट ज्या भाषांचा प्रत्यक्ष पुरावा नाही त्याबाबत मात्र हेच पुरातत्वीय पुरावे दाखल्याला घेत टुक्कार वर्चस्वतावादाच्या गप्पा हाणणारे काही जगभरचे विद्वान अविद्वानच आहेत हे उघड नाही कि काय? बरे, भाषाही कोण बनवतात? लक्षात घ्या, भाषेच्या विकासाचा थेट संबंध शेती, अर्थव्यवस्था, प्रशासनव्यवस्था, व्यापार आणि प्रत्यक्ष वस्तूनिर्मितीशी आहे, म्हणजेच संपुर्ण मानवी समुदायाशी आहे. कोणा एका उपटसुंभ गटांशी नाही. धर्म आधे बनतो, पुरोहित सर्वात शेवटी येतात हा साधा समाजशास्त्रीय नियम आहे. आणि जो धर्म खुद्द पुरातत्वीय अवशेषांवरुनच समजतो...श्रद्धा समजतात...तरीही ते नाकारत आपापले सांस्कृतिक नसलेले घोडे दामटणारे इतिहासाकारही इतिहासाचे खुनी नव्हेत काय?

कोणताही समाज आभाळातुन पडलेला नाही. जागतिक समाजाच्या पुर्वजांने निरलसपणे शिकत, आपली प्रतिभा वापरत, चुका दुरुस्त करत आपली आजची जागतीक (पण विभागीय) संस्कृती उभी केली, आणि आम्ही त्याचे श्रेय घ्यायला हपापलेली माकडे झालोत याची लाज आम्हाला का वाटत नाही? उलट आम्हीच चुका करत जात नाही आहोत काय?

युरोपियनांपासून ते वैदिकांपर्यंत आपले मुळ दूर कोठेतरी शो्धायची ही बाष्कळ प्रेरणा कोणत्या चुतियाने निर्माण केली? बापजन्मात कोणाचे मुळस्थान सापडणार आहे काय? गेली किमान दीड लाख वर्ष माणूस येथुन तेथे अन्नाच्या शोधासाठी जगभर भटकत होता, टोळ्या शाखांत वाटल्या जात होत्या तर कोठे सम्मिलित होत होत्या...तर स्त्रीया सोडून टोळ्यांतले सारे  मारले जात होते. तो मुळात स्थिर झाला सनपुर्व १५००० ते १०००० या काळात. मग कसले मुळ?

आमचे, या पातकी माणसाचे मुळ, ही इवली पृथ्वी आहे.

कोणता एखादा खंड वा प्रांत नाही.

कोणता एक विशिष्ट वंश नाही कि कोणती टोळी नाही.

आमची संस्कृती आमच्या जागतिक पुर्वजांची देणगी आहे...आम्हीच तेवढे नालायक कि आम्ही ते आमच्या वैश्विक पुर्वजांचे श्रेय नाकारतो, कोणत्यातरी आमच्याच निकट जाती/धर्म/वंशाला द्यायचा प्रयत्न करतो.

म्हणूनच वाद आहेत, लढे आहेत, हिंसा आहे, युद्धे आहेत,

या सगळ्यात कोठेच नाही...

आणि तो म्हणजे या वैश्विक संस्कृतीचा माणुस !

Saturday, February 7, 2015

रोमांचकारी संघर्षाचा प्रवास

 Feb 8, 2015, 12.20AM IST
book2
- सागर भंडारे

अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात शशी भागवत यांच्या व्यतिरिक्त या कादंबरीप्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. या पार्श्वभूमीवर संजय सोनवणी लिखित 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी आहेच, पण त्या प्रकारात मानदंड ठरावी, अशी आहे. कारण आतापर्यंतच्या अद्भुतरम्य कादंब‍ऱ्या भारतीय रुपातल्या असल्या, तरी बहुतेकांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषांतील कादंब‍ऱ्यांवरुन घेतलेले होते. म्हणूनच कथानकाचा सांगाडा व जडणघडण संपूर्णपणे मराठी असलेली 'हिरण्यदुर्ग' ही मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणायली हवी.

सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरेतर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधकही असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो? अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव 'हिरण्यदुर्ग' असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड आहे. तरीही कादंबरीची सुरुवात होते, ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पाहत सुग्रास भोजन करुन मदनमंजि‍ऱ्यांच्या गोड सहवासात रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान... ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य? पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुस‍ऱ्या बाजूने ते दोघे बाहेर येतात. या दरम्यान धनगरांकडून मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्रदेखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत, हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमाल दोघांचाही थरकाप उडतो.

पुढे कादंबरीतील खलपुरुष पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणा‍ऱ्या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोमा कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तिमान पुलोमाही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोमा की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते? सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोमाच्या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात? शक्तीश्रीमहाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणा‍ऱ्या 'हिरण्यदुर्ग' या अद्भुतरम्य कादंबरीत मिळतात.

अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्कातंत्र प्रभावीपणे वापरणे, हे अतिशय कौशल्याचे काम असते आणि त्यात 'हिरण्यदुर्ग' कादंबरीचे लेखक संजय सोनवणी यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसतात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच 'हिरण्यदुर्ग'चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? 'हिरण्यदुर्ग' वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. ......... हिरण्यदुर्ग लेखक : संजय सोनवणी मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे पृष्ठं : ३५२ किंमत : ३५० रु.

 (महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये)

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/46157310.cms

Thursday, February 5, 2015

मराठी भाषा ..."अभिजात" भाषा

मराठी भाषा आता कोणत्याही क्षणी "अभिजात" भाषा म्हणून घोषित होईल. सर्व मराठी बांधवांना आनंद आणि अभिमानाचा हा क्षण असेल. ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी आनंदोत्सवच साजरा व्हायला हवा. माझे मित्र प्रा. हरी नरके यांचे यासाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी या समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे, प्रा.मैत्रेयी देशपांडे,प्रा.सुहास बहुलकर,प्रा. कल्याण काळे आणि प्रा.आनंद उबाळे यांच्या समवेत मराठी अभिजात कशी हे सिद्ध करण्यासाठी समन्वयक व संशोधक म्हणून मोलाचे कार्य तर बजावलेच पण मराठी जनमानसात याविषयी जागरणही  केले.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मराठी ही अभिजात ठरणारी एकमेव भाषा असेल जिच्या अभिजातपणाला विरोध करणारे अगणित मराठी बांधवच होते. या विरोधाचे कारण म्हणजे "मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे." असा ’लाडका’ सिद्धांत जपुन बसलेल्यांना संस्कृतची महत्ता घटलेले चालणार नव्हते.

पण मराठी ही स्वतंत्र भाषा आहे. तिचे पुरावे (लिखित) २२०० वर्ष एवढे जुने आहेत. त्याहीपुर्वी ती शेकडो वर्ष बोलली जात असणार आहे. संस्कृतचे लिखित पुरावे मात्र सन १६० च्या पलीकडे जात नाहीत. किंबहुना ती प्राकृतांतुनच ग्रांथिक कारणांसाठी विकसीत केलेली भाषा आहे. संस्कृतचे सौष्ठव आणि सौंदर्य निर्विवाद आहे. पण तीच मुळची भाषा असे वाटणा-या भाषा-विज्ञान अडाण्यांनी मराठीच्या अभिजाततेचा मार्ग रोखावा हे फारच खेदकारक आहे.

असो. आपली मायमराठी अभिजात घोषित होणार आहे. याचे काय फायदे हा प्रश्नच निरर्थक आहे. आपण बोलतो ती भाषा स्वतंत्र आहे, कोणाची बटीक नव्हती, दुय्यम नव्हती, हे सिद्ध होणे, समजणे याचे समाजशास्त्रीय अनंत फायदे अहेत. पहिला म्हणजे प्राकृताबद्दल निर्माण केला गेलेला न्यूनगंड दूर व्हायला मोलाची मदत होणार आहे. भाषिक न्यूनगंड निर्माण करणे हा वर्चस्ववाद्यांचा लाडका प्रयत्न असतो. आता मराठी आपले "अभिजात स्वातंत्र्य" अभिमानाने मिरवेल आणि भाषेला ज्ञानबा-तुकोबाकालीन वैभव पुन्हा मिळवेल ही अपेक्षा.

प्रा. नरके व त्यांच्या सर्व सहका-यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!


‘अभिजात मराठी’ उंबरठ्यावर

Feb 6, 2015, 03.24AM IST
म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीच्या महाराष्ट्राचा अहवाल साहित्य अकादमीने जसाच्या तसा स्वीकारून मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले, की लगेचच मराठीला अभिजात दर्जा मिळू शकणार आहे.

साहित्य अकादमीच्या मान्यतेमुळे 'अभिजात'तेच्या दिशेने मराठीने पुढचे पाऊल टाकल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने गुरुवारच्या (१२ फेब्रुवारी) अंकात प्रसिद्ध केले होते. साहित्य अकादमीने काही स्पष्टीकरणे मागविल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला होता. 'अभिजात दर्जा मिळण्यासाठीच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाराष्ट्राने केली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याचे साहित्य अकादमीने कळविले आहे,' अशी माहिती प्रा. हरी नरके यांनी दिली.

मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव आणि अहवाल तयार करण्यासाठीच्या समितीचे नरके सदस्य आहेत. प्रा. रंगनाथ पठारे या समितीचे अध्यक्ष होते. 'मराठी ही केवळ प्राचीन भाषा नाही, तर तिच्यात अत्युच्च दर्जाच्या साहित्याची निर्मितीही झाली आहे.

यासाठीचे आवश्यक पुरावे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतून मिळाले आहेत. त्याचा मोठा उपयोग झाला,' असे नरके यांनी नमूद केले. मराठीबाबतचा हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब करणेच आता बाकी आहे, असेही नरके यांनी नमूद केले.

Wednesday, February 4, 2015

Vedic and Indus-Ghaggar Culture



We have abundant physical proofs that show the peculiarities of Indus-Ghaggar valley society.  We have Rig Veda for a proof in which Vedic social structure, their deities, their economy and their general awareness of the surrounding world is described at places. Let us compare the IGVC (Indus-Ghaggar Valley Civilization) and Vedic culture from the available sources. 

1.      None of the Veda mentions the abundantly found remains of Phallic and Venus worship practices at the Indus sites. Had the Vedic people been the progenitors of the Indus culture, naturally being part of phallic worship, certainly would also have made mentions of it in The Rig Veda apart from their religious ritual Yajnya. Rather the Rig Veda seems to be hostile towards the phallic worshipers. The Rig Veda clearly makes distinction between sacrificers and non-sacrificers. (i.e. see RV 1.33) 

2.      No Indus seal depicts image of the fire sacrifice, which was soul of the Vedic civilization. Rather the images over the seals go contrary to the Vedic religious thought. 

3.      There is no slightest hint in the Rig Veda that the Vedics conducted trade with other civilizations. There is no mention of local or foreign trade-commerce or even cognates for trade or trade related activities in the Rig Veda. Abundant proofs are available from excavations in the IVC and other contemporary civilizations, from Iran to Mesopotamia, to prove IVC trade with them by sea as well as surface routs.

4.      The Vedic society was mainly pastoral as evidenced from the Vedic literature. The cattle were their treasured possession and most of the prayers are for the abundant growth of the same. They knew the Agriculture but it was their secondary occupation.  There is no cognate for “Plough” in Vedic Sanskrit but they used a loan word “Langal” from other languages for plough. However, the IVC was mostly agrarian, industrial and mercantile society as evidenced from the excavations, unlike the Vedics.  Rather the Vedics show great jealousy of the Panis who were expert traders.

5.      The Rig Veda has no mention of fired bricks, brick-paved roads, public baths or granaries that was integral part of almost every Indus settlement. However noted historian Ram Sharan Sharma states, “…And yet all these features can be expected if its culture were urban. Fired bricks are a striking feature of the Harappans, and no Bronze Age civilisation can boast of them on such a large scale. But this important construction material is unknown to the Rg Veda. In the great British archaeologist Mortimer Wheeler's view, there is no granary in the pre-classical world comparable in terms of specialist design and monumental dignity to the examples from the two Indus cities. But because of the absence of urbanism, the Vedic people did not need granaries, and consequently the Rg Veda has no term for granary.” (Indus and the Saraswati, Ram Sharan Sharma, article published online )
Had the Vedic Aryans be at the least part of the IVC, they would have cognates for the materials and structures in question.
6.      The Vedic society was horse centered as evidenced from its numerous mentions in the Rig Veda with one verse dedicated to him. (RV 1.171) Many personal names are horse and chariot oriented. It was earlier assumed that the horse was unknown to the Indians until the Aryan invaders introduced them. However, this is not true. There are abundant proofs of the horse bones found in the Indian subcontinent dating back to early phase of the Harappan settlements, although belonging to the different families of horse. (The Quest for the Origins of Vedic Culture: The Indo-Aryan Migration Debate, by Edwin Bryant, 2001.)
This means the IVC too was not unaware of the horses though it carried not much significance in their culture. The horse remains also are so few that renowned archeologist B. B. Lal, as quoted by Ram Sharan Sharma, says, "would like to have more and more examples."  

It is natural because the IGVC was mostly agrarian and manufacturing/trading society where bull carried more importance to plow the fields and pull the carts. This is obvious from the fact that the bull is depicted artistically on abundant seals whereas horse finds no place at all on any of the seal. Use of horses to them was scanty and hence carried no major significance in their culture. Obviously, horse images would be redundant for them. 

The Vedic Aryans were a mostly pastoral society and hence their life being horse-centered does not come as surprise. Even the life of modern day cattle herders is centered on horses. Abundant mentions of the horse with respect in the Rig Veda and the rite of horse-sacrifice proves the same. 

No place for the horses in the IGVC iconography does simply mean that the Horses carried negligible significance in their civilization unlike of the Vedic society. In fact this clearly suggests that the Rig Vedics had no connection whatsoever with Indus Valley civilization. Had it been the case horse would have found prominence in IGVC’s early and later iconography.

Moreover, the horse-chariot issue has unnecessarily been over-debated either by the supporters of the AIT/AMT or OIT propagandists for the sake of proving their futile baseless theories. Even if there was no slightest indication of presence of horse in IGVC, it wouldn’t prove for the lack of that knowledge they were subjugated by the people who knew horse and chariots, for there is no slightest proof that the decline of the IGVC was result of any vicious war won by the mighty invaders who had tamed the horses and used spoke-wheeled chariots! 

7.      The images of unicorn are abundantly found in IGVC on various seals. The one-horned animal, labeled as unicorn, could be rhinoceros known to the IGVC people. Dr. Ram Sharan Sharma opines, “…The term ganda or khadga is used for the rhinoceros in Sanskrit, and the term ekasrnga for both the unicorn and the rhinoceros, but none of these terms occurs in the Rg Veda.” 

8.      Vedic people seem to have been at constant wars from the Rig Vedic texts, using variety of arms and armors. At the Indus sites, the finds of arms are meager with no find of armors at all. The IVC cannot be regarded as a warring society the way the Vedic society was. Warring people would naturally have the warlike god, and we find him in the form of the Indra in Rig Veda who helps Vedic people win the wars. However, it is not justifiable to infer from the meager findings of the weapons that the Indus people were peace-loving people. Most probably, either the Indus civilization was unified under a single rule or had established cordial relations with every city-state, minimizing the war-like occasions. Yet it is clear that the IVC was a prospered civilization and the peace that follows in prosperous period was fairly enjoyed by the IVC. Rather, it appears from the Rig Veda that the Vedic people were seekers of the wealth and all the time were engaged in the wars for wealth-hunting, cattle being the treasured wealth to them. Tarkateertha Laxmanshastri Joshi states that Rig Vedic Aryans main professions seems to have been loot the cattle, food, lands of the Das, Dasyu and Panis. This condition certainly cannot be of the prosperous society. (Vaidik Sanskruticha Itihas, Tarkateertha Laxmanshastri Joshi.) 

9.      Students of the Indus civilization know very well about the abundant finds of variety of the seals bearing assorted motifs and script at every site. These finds exhibit their cultural beliefs and their awareness of the script. However, none of such practice finds mention in the Rig Veda. There is even no cognate for writing or script in the Rig Veda. Here the suggestion is not that the Vedics did not know the script; it simply is that there is no mention of the seal making, motifs on it and the script. Had the Vedics been progenitors of the Indus civilization, there would have been some mention of the widely held practice that involves not only religious beliefs but also the commercial beliefs of the IGVC. 

10.  Plenty of ornament and other goods manufacturing sites have unearthed at the IGVC sites. There is no mention in the Rig Veda of such manufacturing. Besides, there is no mention of harbors though Indus people had many of them, including artificial harbor like of Lothal. So much that scholars seriously doubt whether the Vedic Aryans even knew the sea or not. (The term Samudra in Rig Veda does not essentially mean the sea but it also means lake or pond at many instances.) 

11.  Though the Indus script could not be deciphered as yet in want of largest specimens or Rosetta stone, it is clear that they knew the art of writing. We do not find any term or cognate for writing or script in the Rig Veda. 

Had the Vedic people migrated from India to the West, as some scholars try to suggest, and if they were progenitors of the IVC, the major question arises why they did not carry the script along with them? If so-called indigenous Aryans, if supposed, left the Indian territories long before the IVC was founded, the whole premise of their theories do collapse because it would be ridiculous and unsupported argument. First of all therde is no proof whatsoever to prove the people those composed Rig Vedic hymns were Indian. 
The scholars cite examples of Buddhist migrations to Gandhar and elsewhere where they used extensively Indian Brahmi and Kharoshti scripts for writing. We do not find presence of the Indus script elsewhere in the western world. It means that the Vedic Aryans did not migrate from east to west (from India to Europe) nor were they acquainted with the Indus civilization to the extent Vedic scholars like to believe, forget their being progenitors of the IGVC. 

12.  The Rig Veda mentions destructions of several cities of Dasyus at the hands of Indra. These cities were made of stones (“Asmanmayi” RV 4.30.20) or of metal (“Ayasi”, RV 2.20.8, 4.26.3). We do not know for sure what Vedic people of Rig Vedic times meant by Ashman and Ayas, or to whose cities they were referring to because the Indus cities were built of fired bricks, not of the stones or metal of any kind thus does not fit in the Rig Vedic descriptions. In all probability they were talking about the BMAC sites, not Indus-Ghaggar. 

Dasas and Dasyus (Dahae and Dakhyu) were residents of ancient Iran. Therefore, in all probabilities, they could have been referring to the stone-cities of them. Possibly Ayas too was used alternatively for stone and metal for their hardness. Whatsoever might be the case, the Vedic people certainly did not reside in the walled cities or even towns; they were rather village dwellers and preferred to be so until the Brahmanic era. Fired bricks for fire altars came into the use in late Vedic times. (Vaidik Sanskruticha Itihas, Tarkateertha Laxmanshastri Joshi)  This clearly suggests there was not any link of the Vedics with the IVC; otherwise they would have known some civil practices of the IGVC. 

13.  Rig Veda doesn’t know cotton or it does not have any cognate for it. IGVC people were expert cotton weavers. The Rig Vedic people seem to have been using wool for clothing, but natural for the people living in extreme climatic conditions. 

14.  IGVC people were master architects. The drainage system and stepped Great Baths had central characteristic of the IGVC, however no such practice finds mention in the Rig Veda. 

These facts forced some indigenous Aryan theorists like Kazanas to place the Rig Vedic time prior to the emergence of the IGVC. ( Rig Veda is pre-Harappan, by Nicholas Kazanas, a paper published online)  However, we have seen in the previous chapter that in absence of the Rig Vedic Sarasvati River in Indian geography do not make their claim valid. Vedic scholars can stretch back Rig Veda’s period to the Ice Age if they want to (and many enthusiastic amateur scholars already have attempted it!) but the Rig Vedic texts and other parallel evidences does not correspond to their claim of its being so antique.   

Looking at the discrepancies that arise from the closer look at the Vedic culture mentioned in the Vedas and the physical finds of the Indus sites, it is impossible to even imagine that the progenitors of the Indus civilization were the Vedic Aryans. Even it is almost ridiculous to state that the Indus and the Vedic people came into any contact so much so to influence each other’s culture.

Sunday, February 1, 2015

"अस्मितांचे" गुलाम

सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्षात हरलेल्या जनसमुहांना पुन्हा आपले हरपलेले स्थान प्राप्त करण्यासाठी आपण का हरलो होतो या कारणांचा विचार करीत, नेमकेपणाने ती शोधत त्या त्रुटी दुर करत, आत्माभिमान न हरपता पुन्हा जोमाने प्रयत्न करावे लागतात. हरण्याची कारणे अनेकदा आक्रमक वा वर्चस्ववादी समाजाच्या बौद्धिक/शारीरिक/सामरिक शक्तीत नसून अनेकदा ती पराजिताच्या वा दबले गेलेल्यांच्या अक्षम्य मुर्खपणातही छ्पलेली असतात. परंतू आपण या आपल्या सामाजिक मुर्खपणाचे विश्लेषन, परिक्षण टाळतो आणि वर्चस्ववाद्यांच्या अथवा आक्रमकांच्या "दुष्टपणाबद्दल" त्यांचा द्वेष करत राहतो. संधी मिळाली कि कोणीही आक्रमक आणि वर्चस्ववादी बनू शकतो याचे मात्र आपल्याला अनेकदा भान नसते. त्यांचा द्वेष केल्याने आपण उलट मानसिक विकलांग आहोत हे सिद्ध करत असतो याचेही भान नसते. यामुळे आपण आक्रमक/वर्चस्वतावाद्यांना आपली सत्ता गाजवायची पुरेपूर सुट देत असतो याचेही भान नसते.

या मानसिक विकलांगांना "अस्मितां’चा फारच शौक असतो. मुसलमानांनी आमच्यावर सातशे वर्ष राज्य केले, हिंदुंना बाटवले, मंदिरे तोडली म्हणून त्यांचा द्वेष करणारे आपल्या अस्मिता त्या तोडलेल्या मंदिरांत शोधत "फिर बनायेंगे...वही बनायेंगे" च्या घोषणा देतात. "मुसलमानांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे..." असे खाजगीत तर हजारवेळा बोलतात. याचे कारण मुस्लिमांच्या सत्तेच्या प्रभावात आपण सातशे वर्ष काढली याचा सल असतो. पण एवढी सातशे वर्ष जर गुलामीच केली असेल तर तुमचे दोष नव्हते काय, असल्यास काय होते आणि ते दूर करायला तुम्ही काय प्रयत्न केले इत्यादि प्रश्नांवर कोणाला चर्चा नको असते. बरे , एक गुलामी गेली तर लगेच दुस-यांची कशी आली आणि ती का सहन केली हा प्रश्न तर फिजुलच. खरे म्हणजे आपण गुलामीलाच लायक होतो म्हणून गुलामी आली हे मान्य करायची आपली तयारी नसते. पण द्वेष म्हणजे द्वेष पसरवायचा, करत रहायचा धंदा मात्र या पराभुतांना जमतो...कारण ते मानसिक विकलांग आहेत.

आपल्या समाजाची समस्या येथेच संपत नाही. "हजारो वर्ष आम्हाला जातींच्या बंधनांत टाकून गुलाम केले." अशी दुसरी बोंब आपल्या समाजात आहेच. गुलाम केले गेले कि गुलामीच हवी होती म्हणून स्व-निर्मित गुलाम झालो यावर विचार मात्र कोणी करत नाही. कोणालातरी शत्रू ठरवत, दास्य लादणारा समाज समजत त्याचा द्वेष करणे हे मात्र अव्याहत चालू राहते. मानसिक विकलांगतेचे दर्शन घडत राहते. पण ती गुलामी समजा गुलामीच असेल तर ती का आली आणि ती नष्ट करायला आमच्याकडे काय योजना आहे यावर मात्र आम्ही मूग गिळून बसतो. थातूर-मातूर सोयीची उत्तरे फेकतो. पण द्वेषाचा केंद्रबिंदू काही केल्या बदलत मात्र नाही. यांनाही अस्मिता हव्या असतात. अस्मितांचे विचार, जयंत्या, पुण्यतिथ्या वगैरे निमित्ताने घोंगावतात, लगेच विझतातही. अस्मितांचे बौद्धिक भांडवल करत त्यात भर घालत मानसिक क्रांती घडवण्याचा विचार करण्यापेक्षा "अस्मितांचे" गुलाम होण्यात जास्तच धन्यता जर वाटत असेल तर आपण मुळात गुलामीप्रिय समाज आहोत हे आपल्याला मान्य केले पाहिजे.

जसे राममंदिर खरेच व्हावे असे काही नाही, पण उद्घोष तर हवा असा जो संघवाद्यांचा (आणि वैदिक शंकराचार्यांचाही) होरा आहे तसाच या अस्मितावाद्यांचा नाही कि काय? हे सोयीचे उद्घोष कोणत्या समाजाची प्रगती करत आलेयत?

द्वेष करणारे हे मानसिकदृष्ट्या नेहमीच दुभंगलेले राहतात हे वास्तव कधी लक्षात घेतले जात नाही. अस्मितांवरच्या टीकेने आम्ही फार म्हणजे फारच हळवे होवून जातो. भावना लगोलग दुखावल्या जातात. हमरीतुमरीवर येतो. हल्ले करायला निघतो. दुस-यांच्या अस्मिता कशा बदमाश आहेत हे सिद्ध करण्याचा चंग बांधला जातो. त्यासाठी हव्या तेवढ्या असत्याचा, हलकटपणाचा वापर करायलाही आमची हरकत नसते.

पण मानसिक गुलामांच्या भावना या प्रत्ययकारी असू शकत नाहीत कारण त्या शेवटी गुलामी मानसिकतेतून आलेल्या असतात. गुलामीतून बाहेर ज्यांना पडायचेय ते द्वेष करत नाहीत. ते त्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधतात. गुलामी त्यागतात. स्वतंत्र मार्ग चोखाळत आभाळावर आपल्या विचारवैभवाच्या पताका फडकवतात. त्यांना द्वेष करायची गरजच पडत नाही. किंबहुना त्यासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो. ते इतिहासाचे परिशिलन करतात. खरे काय आहे हे शोधतात. त्यातून त्यांना आपल्या चुका अधिक स्पष्टपणे कळाव्यात हे अभिप्रेत असते.

पण वर्चस्ववादी जसे इतिहासाची मोडतोड करत स्व-सोयीचा इतिहास मांडण्यात धन्यता मानतात तेवढेच गुलामही आपल्या गुलामीचा तेवढाच खोटा इतिहास मांडतात. यातून तुम्ही वर्चस्वतावाद्यांचा वैचारिक बिमोड करू शकत नाही. फार फार तर गुलामांच्या वर्चस्वतावादाचा याच संघर्षातून दुसरा धोका उभा राहील.

आणि आज स्थिती ही आहे कि आपल्याकडील उभय पक्षात गुलामी मनोवृत्तीचेच लोक आहेत आणि त्या सर्वांचा प्रयत्न "गुलामांच्या वर्चस्वतावादा" साठी आहे. या गुलामांच्या गुलामीचेही अनेक पदर असल्याने हा संघर्ष बहुरंगी होत एका विकृत विनोदी पातळीवर येवून पोहोचला आहे. यात सर्वच समाज वैचारिक निर्बुद्ध होत हिंसावादी बनत जाण्याचा धोका आपल्यासमोर उभा आहे.

द्वेष केल्याने ज्याचा द्वेष केला जातो त्याचे माहात्म्य व वर्चस्व आपण मनोमन मान्य करतो हेच सिद्ध होते. आपण द्वेष करतो म्हणजे आपल्या मानसिकतेत काहीतरी लोचा आहे हे समजले पाहिजे.

गुलामी नको आणि गुलाम करणेही नको. दोन्हीही माणसाच्या माणूसपणाला कलंक आहेत. आपापली बौद्धिक उंची, आपल्या दोषांवर प्रयत्नपुर्वक मात करत, कशी वाढवता येईल हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...