Sunday, April 29, 2012

वाघ्या...पुन्हा आणि पुन्हा वाघ्या!






"कुत्र्यासारखे एखाद्याच्या मागे लागणे" हा वाक्प्रचार सर्वपरिचितच आहे. पण एखाद्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या मागे हात धुवुन लागणे यासाठी काय नवा वाक्प्रचार बनवावा या गहन चिंतेत मी सापडलो आहे. या चिंतेचे निमित आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांनी कालच पुण्यात पत्रकार परिषदेत "रायगडावरील वाघ्याचा पुतळा ६ जुनपुर्वी हटवा अन्यथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुतळा उध्वस्त करतील." असा इशारा त्यांनी दिला आहे. (संदर्भ. दै. सकाळ, दि.३० एप्रिल १२, प्रुष्ठ क्र.६, पुणे आव्रुत्ती) गेल्या वर्षीही याच सुमारास प्रवीणदादांनी हाच इशारा दिला होता. त्यावेळीस मी दै. लोकमतमद्ध्ये लेख लिहुन वाघ्या कुत्र्याचा इतिहास आणि तुकोजीराजे होळकरांची शिवस्मारक व वाघ्याच्या समाधीसाठी केलेली रु. ५०००/- ची आर्थिक मदत याचे पुराव्यासहित विश्लेषन केले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणुन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महादेव जानकर यांनी "वाघ्याच्या पुतळ्याला हात लावुन दाखवाच...!" असा प्रति-इशारा संभाजी ब्रिगेडला दिला होता. फलस्वरुप संभाजी ब्रिगेडला आपला "तोडफोड" प्रकल्प स्थगित करावा लागला होता.



या घटनेला तब्बल अकरा महिने उलटुन गेले आहेत. आता अचानक जाग आल्याप्रमाने "वाघ्या कुत्त्र्याला कसलाही ऐतिहासिक पुरावा नसुन हा पुतळा हटवण्यासाठी युवराज संभाजीराजे यांच्या नेत्रुत्वाखाली ब्रिगेडचे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार चालु आहे. सहा जुनपुर्वी हा पुतळा हटवावा ही आमची लोकशाही मार्गाने केलेली मागणी असुन शासनाने याबाबत टाळाटाळ केली तर आम्हालाच तो हटवावा लागेल" असे प्रवीणदादांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. खरे तर जर एवढे पुरावे होते तर गेल्या अकरा महिन्यात कोणते जनजागरण ब्रिगेडने केले हा प्रश्न उपस्थित होतो. समजा शासनदरबारी "लोकशाही" मार्गाने पुतळा हटाव मोहीम सुरु आहे तर मग सहा जुनची मर्यादा घालत, त्यापुर्वी हटवला नाही तर आम्ही उद्ध्वस्त करु, ही मागणी कोणत्या लोकशाहीत बसते? असा कोणता नवीन शोध लागला आहे कि ज्यामुळे वाघ्याचा पुतळा ज्या ठिकाणी आहे तेथे मुळात वाघ्याऐवजी सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची समाधी होती हे सिद्ध होते? कि आम्ही सांगु तोच इतिहास हा सनातनी फंडा य्यांच्याही मनात रुजला आहे...फोफावतो आहे?



शिव इतिहासात वाघ्या होता. लोकांनी पिढ्यानुपिढ्या दंतकथांच्या रुपात त्याची स्म्रुती जीवंत ठेवली. त्याचे शिवस्मारकासोबत स्मारक व्हावे या अपेक्षेने तुकोजीराजे होळकरांनी शिवस्मारक व वाघ्याच्या स्मारकाला आर्थिक मदत केली. शिवस्मारकाचे काम पुर्ण झाल्यावर उरलेल्या पैशांतुन हे स्मारक उभे राहिले. हे सारे ब्रिगेडच्या विचारवंत व इतिहासकारांना माहित आहेच. पण असे असुनही ते वाघ्याच्या स्मारकामागे हात धुवुन लागले आहेत याचे कारण म्हनजे पराकोटीचा ब्राह्मणद्वेष. ब्राह्मणांनी शिवरायांचा अवमान करण्यासाठी म्हणुन शिवस्मारकासमोर कुत्र्याचा पुतळा बांधला असा त्यांचा अजब तर्क आहे. पण शिवस्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेणारेही ब्राह्मणच होते...सातारकर वा कोल्हापुरकर काही केल्या स्वत:हुन पुढे आलेले नव्हते, त्याचे काय करायचे? म्हनजे इमानदार शिवप्रेमींचा व ज्या धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे त्यांचा अवमान करण्यासाठी ही तोडफोड मोहीम आहे, असेच नाही कि काय? कि हा सवंग प्रसिद्धीचा हव्यास आहे? तोडफोड, जाळपोळ असला अजेंडा घेत जी ही विध्वंसक वाटचाल सुरु आहे त्यावर ब्रिगेडने आत्मचिंतन करायला हवे. बहुजनांचा एवढाच कळवळा आहे तर शेतकरी आत्महत्त्या, पीण्याच्या पाण्याचा प्रश्न, बहुजनांतील वाढती बेरोजगारी असे सामाजिक प्रश्न हाती घेण्याऐवजी तरुणांना खोटी महिती देत त्यांना भडकावत त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा अधिकार कोणी दिला हा प्रश्न या निमित्ताने उठतो.



याच पत्रकार परिषदेत त्यांनी मागणी केली आहे कि "स्वतंत्र महामंडळाच्या ताब्यात स्मारके व किल्ले द्यावेत. शिवछत्रपतींवरील नाटक, चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी त्यांचे परिक्षण करण्याचा अधिकारही या महामंडळाला देणे आवश्यक आहे." डा. आनंद यादव यांच्या संतसुर्य तुकाराम या कादंबरीवर वाद झाल्यानंतर ब-याच ह.भ.पं. नी "संतांवर लेखन करण्यापुर्वी वारकरी संप्रदायाची परवानगी घेतली पाहिजे व त्यांना दाखवल्याखेरीज प्रसिद्ध करता कामा नये." अशा अर्थाचा फतवा निघाला होता. मला वाटते ब्रिगेड हीच चुक करत आहे. शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवत त्यांचे पुरेपुर अपहरण करण्याचा हा कट आहे. त्यासाठी जो मार्ग वापरला जात आहे तो सांस्क्रुतिक दहशतवादाचाच एक भाग आहे. तमाम महाराष्ट्रीयांनी या प्रव्रुत्तीपासुन सावध राहण्याची गरज आहे.


(गेल्या वर्षी मी या विषयावर याच ब्लोगवरही लेखन केले होते त्याच्या लिंक्स:

http://sanjaysonawani.blogspot.in/2011/06/blog-post_03.html


http://sanjaysonawani.blogspot.in/2011/06/blog-post_12.html

http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html







 

 

पाणिनी नेमका कोण. कुठला व कधीचा? (भाग ३)



पाणिनीचे कुलनाम व व्यक्तिनाम


आपण पाणिनी संबधातील दंतकथा तसेच पाश्चात्य तद्न्यांची मते मागील भागात संक्षेपात पाहिली आहेत. त्यावरुन तरी पाणिनीची निश्चित अशी कालनिश्चिती करता आलेली नाही हेही आपण पाहिले आहे.

पाणिनीचा काळ जितक्या मागे नेता येतो तेवढा मगे नेण्यात भारतीय विद्वानांना अधिक रुची असल्याने त्यांनी पाणिनी हा सनपुर्व आठव्या शतकात वा त्याहीपुर्वी झाला असल्याचेच मत डा. वासुदेवशरण अग्रवालांसारख्या विद्वानांनी साधारणपणे मान्य केल्याचे दिसते. पाणिनीसारख्या महान व्याकरनकाराच्या काळाबाबत एवढा (किमान एक हजार वर्षांच्या काळाचा) गोंधळ असावा ही बाब नक्कीच भुषणावह नाही.
महत्वाची बाब म्हणजे पाणिनीचा व्याकरणकार म्हणुन वा अन्य कोणत्याही संदर्भातील उल्लेख ब्रुहत्कथा (कथासरित्सागर व ब्रुहत्कथामंजिरी) व ह्यु-एन-त्संग याच्या प्रवासवर्णनाखेरीज अन्य अभिजात म्हटल्या जाणा-या साहित्यात येत नाही ही सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कात्यायन, पतंजली, भट्टोजी दीक्षित यांनी पाणिनीच्याच व्याकरणाचा भाष्य/वार्तिकाच्या माध्यमातुन विस्तार केला असल्याने त्यांच्या लेखनात मात्र अपरिहार्यपणे पाणिनीचा उल्लेख मिळतो.

कात्यायन व पतंजलीचे मात्र तसे नाही. पतंजलीचा भर्तुर्हरीच्या "वाक्पदीय" ग्रंथाच्या प्रारंभीच्याच श्लोकात पतंजलीचा आदरपुर्वक निर्देश केला आहे. कात्यायनाचा उल्लेख स्कंदपुराणात आला आहे. (या पुराणात कात्यायनाच्या पित्याचे नांव याद्न्यवक्ल्य व पुत्राचे नांव "वररुची" असे दिले आहे, हे मी येथे नमुद करुन ठेवतो, कारण कात्यायनावरील पुढील लेखात यावर चर्चा करायची आहे.)

असे का झाले असावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मुळात भारतात पाणिनी नांवाच्या अन्य कोणी व्यक्ति झाल्याचे एकही उदाहरण नाही जसे ते आपल्याला अगदी कात्यायन-पतंजलि नांवाबाबतही दिसुन येते. प्रसिद्ध माणसांच्या नांवांवांच्या असख्य पुनराव्रुत्त्या झाल्या आहेत, पण "पाणिनी" या नांवाबाबत तसे झाल्याचे दिसुन येत नाही. पाणिनी हे गोत्रनाम असावे असे बौधायन म्हनतो. परंतु या नांवाचे गोत्रही अस्तित्वात नाही हे आपण "गोत्र-रन्तावली" या ग्रंथावरुनही स्पष्टपणे पाहु शकतो.

भट्टोजी दीक्षीतांनी दिलेली व्युत्पत्ती . "पणीचे पुरुषापत्य तो पाणिन व त्याचा नातु जो तो पाणिनी" अशी आहे. ही व्युत्पत्ती ग्राह्य धरायची तर "पणी" ही कोणी इतिहासप्रसिद्ध व्यक्ती असायला हवी, कि ज्यामुळे एक वंशनामच सुरु होईल...पण तसेही नाही.

मग पणी कोण ह प्रश्न उपस्थित होतो व पाणिनीचा काळ ठरवण्याआधी हे कोडे उलगडायला हवे असे मला वाटते.

आपल्याला "पणी" कोण हे शोधायला फार दुर जाण्याची खरे तर आवश्यकता नाही. पणी हे गोत्रनाम नसुन सिंधुकाळापासुन अस्तित्वात असलेल्या अवैदिक समाजसमुहाचे नाव होते. या समुहाला आर्येतर समुह मानले असुन हा समुह वैदिक समाजाचा अन्य असुरादि समुहांप्रमानेच शत्रु होता हे ऋग्वेदातील असंख्य ऋचांवरुन स्पष्ट होते. उदा.
"जही न्यत्त्रिणं पणिं हि ष: I-(. ६.५१.१४)
(खादाड, कंजुस व दुष्ट अशा पणींचा तुम्ही नाश करा.)

"परि त्रुंधि पणीनामारया ह्रुदया कवे I अथेमस्मभ्यं रंधय:I (. ६.५३.५)
(हे पुषा कवे, तु आपल्या आरीच्या टोकाने पणींची ह्रुदये टोचुन विंधुन काढ आणि अशा प्रकारे त्यांना तु आमच्या अधीन कर.)

वरील निर्देशांवरुन वैदिकजन पणींचा द्वेष करत होते, प्रखर शत्रुत्व पाळत होते हे स्पष्ट होते. ऋग्वेदातुनच मिलणा-या माहितीनुसार पणी हे व्यापारी व्रुत्तीचे होते. यास्काने आपल्या निरुक्तात "पणिर्वणिग्भवति" (पणी म्हणजे व्यापार करणारा...पणी म्हणजे वाणी अशी उकल केलेली आहे. "पण व वण" हे शब्द मुलात जलवाचक असल्याने त्यांचा सागरमार्गे व्यापार होत असे, असे अनुमान निघते. पणी हे बलाढ्य नगरांत रहात, ते धनाढ्य असुन विपुल पशुधन त्यांच्याकडे असे अशा अर्थाचे असंख्य उल्लेख पणींच्या संदर्भात मिळतात. ऋग्वेदात "पणी-सरमा"संवाद दहाव्या मंडलातील १०८व्या सुक्तात येतो. ऋग्वेद पणींना असुर संबोधले आहे. युरोपातील सागरी व्यापारातील बलाढ्य असा जो फोनिशियन समाज होता तो समाज भारतीय पणींचेच वंशज होत असेही मानण्यचा प्रघात आहे. पणी लोक लिंगपुजक होते हेही ऋग्वेदावरुन स्पष्ट दिसते असे डा. अ.स. आळतेकर यांचे स्पष्ट अनुमान आहे.

ऋग्वेदिक जन पुर्वी जरी पणींचा द्वेष करत असले तरी यद्न्य धर्माच्या अपकर्ष काळात त्यांना पणींकडुन दान घेण्याचीही वेळ आली होती. दानस्तुती सुक्तांत असे अनेक दाखले मिलतात. बुबु नांवाच्या गंगेकाठावरच्या उदारह्रुदयी पणीकुलाचा शिरोभागी असलेल्याने हजारो प्रकारची कल्याणकारी औदार्यव्रुत्ती दाखवली असे (६.४५.३१-३२) मद्धे आवर्जुन नमुदही केलेले आहे.

पणी वंशात जन्माला आला म्हणुन पाणिनी हीच व्युत्पत्ती वरील विवरणावरुन निघते आणि तीच स्वीकारार्ह अशी आहे कारण पाणिनी या नांवाची समाधानकारक व्युत्पत्ती देवु शकेल असा अन्य एकही पुरावा उपलब्ध नाही. म्हनजेच बौधायन म्हणतो त्याप्रमाणे पाणिनी हे गोत्रनाम नसुन वंश अथवा कुळनाम आहे. हे व्यक्तिनाम नाही. पणी लोक सिंधु नदीचे खोरे ते गंगेच्या खो-यापर्यंत पसरले होते हेही वरील पुराव्यांवरुन सिद्ध होते. पुढे हे देशभर पसरले असणे सहज शक्य आहे...कारण पणी लोक हे मुळचे व्यापारी व्रुत्तीचे लोक होते.
मग पाणिनीचे नांव काय?

पाणिनीला वाहीक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशा संद्न्या आहेत. या संद्न्यांत त्याचे कोठे व्यक्तिनाम सापडते काय हे आपण तपासुन पाहुयात.

वाहीक म्हणजे वाहीक (बाल्हीक) प्रदेशात राहणारा. वाहीक हा एके काळी गांधार प्रदेशाचा भाग होता. पाणिनी मुलचा त्या प्रदेशातील म्हणुन त्याला बाहीक म्हणने स्वाभाविक आहे, परंतु ते व्यक्तिनाम नाही.
दाक्षीपुत्र या संद्न्येवरुन पाणिनी दाक्षी/दक्षी या स्त्रीचा पुत्र असा अर्थ निघतो. यावरुन आपण पाणिनीच्या आईचे नांव दाक्षी होते असे म्हणु शकतो.

शालातुरीय म्हणजे शलातुर गांवचा निवासी. पाणिनी शलातुर येथे बराच काळ होता हे अष्टाध्यायीवरुनच स्पष्ट होते. पण यातुन व्यक्तिनामाचा बोध होत नाही.

मग शेवटचे उरते व ते म्हणजे "शालंकी".

या नांवाची व्युत्पत्ती लागत नाही असा विद्वानांचा निर्वाळा आहे. परंतु येथे हे लक्षात घ्यायला हवे कि भारतातील अनेक व्यक्तिनामांची व्युत्पत्ती साधता येत नाही. उदा. अत्री, गर्ग, वशिष्ठ, पुरु इ. व्यक्तिनामे ही प्राय: अर्थनिष्पादकच असतात असे नाही. पण तसे असले तरी शालंकी हा शब्द निरर्थक आहे असे मात्र म्हनता येत नाही.. "शाल+अंकि" म्हणजे शाल व्रुक्षांच्या सोबतीतील, वा शालांची गणना करणारा अशी या शब्दाची व्युत्पत्ती लागते. शालंकी शब्दाचे कठपुतळी...बाव्हले असेही अर्थ परिभाषाकोषत येतात.

शालंकी हे एके काळी व्यक्तीनाम म्हणुन प्रसिद्ध होते हेही खालील उदाहरणांवरुन स्पष्ट होईल...
शालंकी हे नंदीचे एक नांव आहे.
विश्वामित्राच्या १०० पुत्रंपैकी एकाचे नांव शालंकायन होते.
शालंकायनजा हे सत्यवतीचे एक नांव. तिच्या पित्याचे एक नांव शालंकायन असे होते.
शालंकायनी हा एक गोत्रप्रवर्तक ऋषीही मानला गेलेला आहे.
पाणिनीला "शालंकी" ही संद्न्या नसुन तेच त्याचे व्यक्तीनाम असावे असाच नि:श्कर्ष या विवेचनावरुन निघतो. गुजरातेतील सोळंकी घराणे या द्रुष्टीने पहायला हवे. व्यक्तिनामे कधी आडनांवे बनतात ही भारतीय परंपराही येथे लक्षात घ्यायला हवी.


(पाणिनीला दिलेल्या सर्व संद्न्या...ज्यांचा आपण वर विचार केला त्या कात्यायनाच्या वार्तिका व पतंजलीच्या महाभाष्यातील आहेत.)


आता आपल्याला पुढील भागात पाणिनीची कालनिश्चिती करायची आहे.





Friday, April 27, 2012

नक्षलवादी दहशतवादी नव्हेत...!



नक्षलवादी हे दहशतवादी नव्हेत. ते राष्ट्राचे शत्रु आहेत. त्यांनी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारलेले आहे. ते स्वत:ला भारताचे घटनात्मक दर्जा असलेले नागरीक समजत नाहीत. त्यांच निवडनुक प्रक्रियेवर, म्हणजेच थोडक्यात घटनेवर/संसदेवर विश्वास नाही. एका माजी दलम कमांडरच्या बायकोने ग्रामपंचायतीची निवडनुक लढवली म्हणुन तिच्या नव-याला भंडारा जिल्ल्ह्यात नुकतेच ठार मारले गेले. उदाहरणे असंख्य आहेत. २००८ ते २०११ या काळात नक्षलवाद्यांनी ३२४० जणांची हत्या केली. याउलट याच काळात पुर्वोत्तर भागात फुटीरतावाद्यांकडुन १०३४ तर जम्मु-काश्मीरमद्धे ४९६ लोक मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांत ठार झाले. यावरुन माओवाद्यांच्या सर्वकश युद्धाची भिषणता लक्षात यावी.माओवादयांनी युद्ध पुकारल्यापासुन आजवर जेवढे लोक ठार मारले गेले आहेत तेवढे भारत-पाकमधील दोन्ही युद्धांतही ठार मारले गेलेले नाहीत.


माओवाद्यांचे समर्थक तसेच माओवादी म्हणतात कि आदिवासींचा विकास, सामाजिक न्याय, जातीभेदातीत समाज-समता हीच माओवाद्यांची उद्दिष्ट्ये असुन ती साध्य करण्यासाठी बंदुक हेच माध्यम त्यांना मान्य आहे. सामान्य नागरिकांना ठार मारणे हे त्यांचे उद्दिष्ट नसुन सरकारी अधिकारी, पोलिस, आदिवासींचे शोषक भांडवलदार हेच त्यांचे प्रमुख शत्रु आहेत. आदिवासींचे शोषण हा एक पुरातन मुद्दा आहे.


औद्योगिकरणाच्या काळात वनक्षेत्रे घटु लागली, आदिवासींचे जंगलांवरील नैसर्गिक अधिकार कमी होत गेले, वन संरक्षण कायद्यांनी इतरांना मोकाट रान सोडले पण आदिवासींना मात्र वंचित केले गेले. बरीच खनिजद्रव्ये ही आदिवासींच्या दाट वनक्षेत्रांत असल्याने त्यांच्या प्राप्तीसाठी नुसती बेसुमार जंगलतोड झाली नाही तर आदिवासींच्या जीवनमरणाचा प्रश्न विस्थापनाने व भुकमारीने निर्माण केला. कुपोषण-आरोग्यसुविधा या व इतर अनेक आदिवासींच्या जीवघेण्या समस्या आहेत. प्राचीन काळापासुन भांडवलदारांनीही त्यांचे शोषण केले आहे.


हे सर्व खरे आहे. त्यामुळे हे सारे व्हावेत म्हणुन निघ्रुण हिंसाचार करणारे नक्षलवादी हिरो ठरत नाहीत. ते तसे नाहीत. सरकारच्या व आपल्याच नागरी समाजाच्या असंख्य चुका आहेत हे मान्य करुनही कोणत्याही पातळीवर माओवाद्यांना राष्ट्रीय मानता येत नाही. भले ते या देशाचे कथित पुत्र का असेनात. ते कसे हे आधी आपल्याला पहायला हवे.


माओवादी प्रतिनिधी कोणाचे?


भारतामद्धे माओवाद, साम्यवाद रुजावा यासाठी पुर्वी सोव्हिएट रशिया व चीनने सातत्याने प्रयत्न केला. पश्चिम बंगाल व काही प्रमाणात केरळ ही राज्ये जणु भारत सरकारने त्यांना तडजोड म्हणुन आंदनच देवुन टाकली होती. अर्थात लोकशाही प्रक्रियेचे बंधन मात्र तेवढे ठेवले. ते वरकरणी मान्य करत या पक्षांनी दोन्ही राज्यांवर प्रदिर्घ सत्ता गाजवल्या व छुपे हेतु पुढे अन्य शाखांमार्फत रेटायला सुरुवात केली. कम्युनिस्ट पार्टी ओफ ईंडिया (माओइस्ट) हा भुमीगत राहुन काम करणारा पक्ष. यावर बंदी आहे. पण त्यामुळे काहीएक फरक पडत नाही. अन्य कम्म्युनिस्ट पक्ष हे सातत्याने या पक्षाला, नक्षलवाद्यांना नुसती सहानुभुतीच नव्हे तर प्रत्यक्ष मदतही पुरवत आहेत. विनायक सेन यांचा नक्षलवाद्यांशी संबध असल्याच्या आरोपावर त्यांना अटक केली, न्यायालयाने शिक्षाही ठोठावली, तर या पक्षांनीच व देशभरातील भावनीक पण अडानी नौजवानांनी व मानवाधिकारवाद्यांनी विनायक सेनांच्या मुक्ततेसाठी जालांवरुन व माध्यमांतुन रान उठवत त्यांना सोडायला भाग पाडले. आताच्याच एका अपहरण नाट्यात नक्षलवाद्यांच्या मागण्या मान्य करायला लावत आमदाराची सुटका घडवुन आणण्यात सेन यांनीच पुढाकार घेतला. सेनांची भुमिका संशयास्पद आहे हे नक्कीच आहे. पण त्याबाबत बोलायचे साहस सहसा कोणात नसते. भारतातील साम्यवादी पक्ष हे पुर्वी रशिया-चीन व आता सोव्हिएट रशिया कोसळन्यानंतर चीन-अंकित राहिले आहेत. भारत चीन युद्धवेळी साम्यवाद्यांनी चीनचीच तळी जाहीरपणे धरली होती हा इतिहास पुन्हा एकदा उजाळुन काढावा लागणार आहे.


समजा या कम्युनिस्टांना वा माओवाद्यांना अदिवासींच्या उद्धाराची एवढी पर्वा आहे तर मग प्रश्न असा उपस्थित होतो कि जर १९७७ ते २०११ पर्यंत सतत ३४ वर्ष मार्क्सवादी कम्मुनिस्ट प. बंगालमद्धे सत्तेत आहेत, बंगालमद्धे अरण्यवासी आदिवासींची संख्या कमी नाही तर मग या काळात कम्युनिस्टांनी आपल्या राज्यातील आदिवासींचे काय भले केले? केले असते तर मिदनापुर व लालगढ सारख्या भागांतही माओइस्ट का हत्याकांडे करत आहेत? काय हेतु आहे? अर्थ स्पष्ट आहे, आदिवासींचा कळवळा हाच खरा हेतु असता तर प. बंगाल आणि केरळमधेलही आदिवासींचे प्रश्न सुटले असते वा ते किमान अन्य राज्यांतील आदिवासी जमातींपेक्षा उच्च स्तरीय जीवन तेथे जगु शकले असते, पण तसे चित्र नाही. किमान तेथे तरी माओवाद्यांनी हत्याकांडे केली नसती. याचाच अर्थ असा कि आदिवासींचे कल्याण हा त्यांचा कधीच हेतु नव्हता व नाही. असे असते तर केवळ "खब-या" ठरवत असंख्य आदिवासींची कत्तल माओवाद्यांनी केली नसती. सामाजिक विकासाला अडवले नसते.


दुसरी बाब आहे सामाजिक समतेची व जातीविरहित समाजाची. फुले-आंबेडकरांच्या देशाला कम्युनिस्टांच्या समतेची आणि जातीविरहित समाजरचनेची संकल्पना कशी मान्य होनार? मुळात तो खरा हेतु आहे काय? बरे, माओवादी हत्या करतात ते कोण आहेत? त्यांनी आजवर जे सरकारी-गैरसरकारी नागरिक व आदिवासी क्रुरपणे ठार मारले त्यात ९५% पेक्षा अधिक सामान्य व बहुजन समाजातीलच लोक नव्हेत तर मग कोण आहेत? सर्वसामान्य निरपराधांना ठार मारुन कोणत्या समतेच्या व जातीविरहिततेच्या गप्पा हे लोक मारत आहेत? ते सरकारी कर्मचारी/पोलिस/निमलष्करी दलांच्या जवानांना ठार मारतात कारण ते त्यांच्या द्रुष्टीने त्यांच्या शत्रु राष्ट्राचे, भारतीय सैनिक/हस्तक आहेत! सामाजिक क्रांतीचा नारा ही एक निव्वळ धुळफेक आहे. हे लोक भारतीय नाहीत. ते चीनचे भारतातीलचे नेमले गेलेले सैनिक आहेत. आदिवासींनी व्यापलेली घनदाट जंगले ही त्यांच्यासाठी कारवाया करण्यासाठी उपयुक्त आश्रयस्थाने असल्यने त्यानी तेथे आश्रय घेतला आहे, एवढेच. व म्हणुनच त्यात त्यांना भारत सरकारचा हस्तक्षेप कोणत्याही कारणासाठी नको आहे. आदिवासी हित हा काही त्यांचा कधीही अजेंडा नव्हता व नाही. अरण्ये हे त्यांचे किल्ले आहेत...हे लक्षात ठेवायला हवे.


आता तर नक्षलवादी पुणे, ठाणे सारख्या शहरांतही पकडले जावु लागले आहेत. प्रत्यक्षात त्यांची संख्या फार मोठी असावी असे स्पष्ट दिसते. शहरे व खेडी यातील वाढत्या सामाजिक/आर्थिक दरीमुळे निर्माण होणा-या असंतोषाचे भांडवल ते वापरणार यात शंका नाही. वाढत्या ग्रामीण बेरोजगारांना ते माओवादी कंपुत आदर्शवादाच्या तत्वद्न्यानाच्या जोरावर खेचु शकणार नाहीत असे नाही. तसेही गुन्हेगारी टोळ्यांत असेच तरुण घुसतात. येथे तर एक पोथीनिष्ठ तत्वद्न्यान आहे व ही अफुची गोळी पचवायला जास्त सोपी जावु शकते. हा धोका अध्याप नागरी व ग्रामीणही समाजाने लक्षात घेतलेला नाही ही तर अधिकच काळजी करण्यासारखी बाब आहे. जर माओवाद असाच फोफावत राहिला तर पुणे-मुंबईची गडचिरोली व्हायला वेळ लागणार नाही. किंबहुना त्या दिशेने वाटचाल होवु लागली आहे.


खरे हे आहे कि चीनने भारताशी सुरु ठेवलेले हे छुपे युद्ध आहे. त्यांना होनारा शस्त्रास्त्र पुरवठा, अर्थपुरवठा हा सारा चीनकडुन येतो. आसाम, अरुणाचल प्रदेश या सीमामार्गे ह पुरवठा सातत्याने होत आला आहे. उल्फाचा वापर या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. कलकत्ता येथुन या सामग्रीचे मध्यभारतात शिस्तबद्ध वितरण होते. (ही बाब अलीकडेच एप्रिल १२ मद्धे कलकत्ता येथे पकडलेल्या सदानल रामक्रुष्ण माओवाद्याने उघड केली.)


वरील थोडक्या विवेचनावरुन माओवाद हा दहशतवाद नसुन वा कोनत्याही प्रकारची सामाजिक क्रांतीवादी चळवळ नसुन भारताशी पुकारलेले युद्ध आहे व त्याची व्यापकता पाकिस्तानी दहशतवादापेक्षा भिषण आहे, हे लक्षात यावे. देशांतर्गत पाकिस्तानप्रणित मुस्लिम व सीमावर्ती पाकिस्तानी दहशतवाद यात फरक करावा लागतो. मुस्लिम दहशतवाद हा बव्हंशी हिंसक कारवायांपुरता मर्यादित आहे. तो बहुदा शहरांतच होतो. त्यांचे पकडले जाणेही तुलनेने सोपे व कमी धोकेदायक असते. सीमावर्ती दहशतवादाचा मुकाबला करायला खडे सैन्य आहे. ही बाब लक्षात न घेता भारतीय जनमानस मुस्लिम दहशतवाद्यांबाबत जेवढे संवेदनशील आहे तेवढे नक्षलवाद्यांच्या कारवायांबाबत नाही. अलीकडेच गढचिरोलीत १२ राखीव पोलिस दलाचे कर्मचारी ठार मारले गेले. परवाच दहा जणांचे अपहरण करुन त्यातील दोघांना ठार मारले. दंतेवाडा येथे एप्रिल १० मद्धे ७६ जवान भुईसुरंगाचा स्फोट करुन ठार मारण्यात आले. २००५ पासुन अवघ्या सात वर्षांत ५४३२ लोक माओवाद्यांनी ठार मारले. पण याबाबत एकाही भारतीयाने गळा काढलेला दिसत नाही. सरकारवर कठोर कारवाईचा दबाव आणला नाही. कसाबला मात्र रस्त्यावर येत जाहीर फाशी द्या म्हननारे सुजाण (?) नागरीक येथे काय करत असतात?


हा लढा दहशतवाद्यांशी नाही. त्यांच्याही शिस्तबद्ध प्रशिक्षीत अशाच सेना आहेत ज्या दहा-दहांच्या दलम (प्ल्यटुन) मद्धे वाटल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडे सर्वच अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व दळनवळणाची साधने आहेत. अरण्ये हीच त्यांची आश्रयस्थाने असुन आदिवासी हे त्यांचे जवळपास "होस्टेज" आहेत, ज्यामुळे धडक कारवाया होवु शकण्यात अडथळे येतात. त्यापेक्षा मोठी समस्या ही कि सामान्य पोलिस दले व राखीव पोलीस दले अशा प्रशिक्षीत सैन्याशी कधीही यशस्वी लढा देवु शकणार नाहीत. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, हत्यारे, वाहने, टेहळणीयंत्रे तर त्यांच्याकडे नाहीतच पण धड वाहनेही नाहीत.


लष्करी कारवाई हेच उत्तर!


माओवाद्यांवर लष्करी कारवाई करावी अशी क्षीण का होईना मागणी होत असते. कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन यांनी लगोलग इशारा दिला होता "माओवाद्यांविरुद्ध सैन्यदले वापरली तर ग्रुहयुद्ध होइल". (१० जाने. १०). रिटायर्ड ले. जन. डी. बी. शेकटकर म्हनतात "माओवाद्यांविरुद्ध सैन्याचा उपयोग म्हणजे आपल्या राजकीय व्यवस्थेचा पराभव.". आपले लष्करप्रमुख व्ही. के. सिंग म्हणतात..."माओवाद्यांविरुद्ध लष्कराचा वापर नको कारण तो प्रश्न कायदा-व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा आहे, तो पोलिसांनी हाताळायचा विषय असुन लष्कर फारतर पोलिस दलांना प्रशिक्षिण देण्याचेच कार्य करु शकेल. तसेच हा प्रश्न मुळात सामाजिक-आर्थिक असा असल्याने तो सरकारने आपापल्या पातळीवरच हाताळावा." (१४ जाने. २०११)


हा प्रश्न कोणीही नीट समजावुन घेतलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे. हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. जेथे मुळात अप्रत्यक्ष राज्यच माओवाद्यांच्या हातात आहे, असंख्य आदिवासी पाड्यांवर साधे शिक्षक-डाक्टर काय पोलिसही जाण्याची हिम्मत करु शकत नाहीत, तेथे काय सुव्यवस्था राखणार? आदिवासींची माओवाद्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिम्मत नाही. काढला तर खबरी म्हणुन जाहीरपणे क्रुर रित्या ठार मारण्यात येते. जेथे आपले राज्यच नाही तेथे कायदा-सुव्यवस्था कोण आणि कशी राबवणार? माओवाद्यांनी व्यापलेले प्रांत म्हणजे त्यांचीच सत्ता असलेले भारतीय भुभागावर निर्माण झालेले स्वतंत्र राष्ट्रच आहे...याबाबत शंका नसावी.


जन. सिंग यांचे मत म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे. हा प्रश्न आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक समस्यांमुळे निर्माण झाला असे जे मानतात ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. उलट आदिवासींसाठी ज्याही सरकारी कल्याणकारी योजना आहेत त्या या माओवाद्यांमुळेच त्यांच्यापर्यंत पोहोचु शकत नाहीत, हे कोण सांगणार? दुर्गम भागात हेच दुश्मन रस्ते बांधु देत नाहीत. कत्राटदारांना ठार मारतात. कारखानदारांना पळवुन लावतात. (हा अनुभव मी गडचिरोली येथे कारखाना काढला होता तेंव्हा प्रत्यक्ष घेतलेला आहे.) शाळा-इस्पितळे तर दुरची बाब राहिली. चीनला आदिवासींचा पुळका आलाच असता तर माओवाद्यांमार्फत त्यांनी विकासाची साधने पुरवली असती...पण ते तसे नाही. ते शस्त्रास्त्रे पुरवतात....सशस्त्र प्रशिक्षीत असे सैनिक तयार करतात. हे लोक पाकिस्तानी दहशतवाद्यांसारखे धर्मवेडे माथेफिरु नाहीत. तर ते अत्यंत सुशिक्षीत व पोथीनिष्ठ असे सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणारे थंड रक्ताचे ध्येयनिष्ठ असे लोक आहेत. चीन हा आपला शत्रु देश त्यांचा पाठिराखा आहे...म्हणुन ते सर्वात जास्त धोकेदायक आहेत.


ए.बी वर्धन यांची धमकी पाहिली तर लक्षात येईल कि साम्यवादी कोनत्याही पोथीला (लेनीन, मार्क्स वा माओ) बांधलेला असो, तो माओवाद्यांच्याच मागे उभा असतो. केंद्र सरकारवर त्यांचे दडपण आहे व त्यापुढे सरकारला झुकावे लागते हा आजवरचा इतिहास आहे.


नक्षलवादाला सहानुभुती म्हणजे राष्ट्रद्रोहच आहे. पोलिस दले त्यांच्याशी कधीही समर्थ लढा देवु शकणार नाहीत. कारण त्यांना तसे प्रशिक्षण नसते व जे उशिरा दिले जाते त्याचा परिणामकारक उपयोग होत नाही. पोलिसांतही त्यांचे खबरे आहेत (सामान्य पोलिस हे बव्हंशी स्थानिकच असतात) हाही एक मोठा अडचणीचा भाग आहे, त्यामुळे पोलिसी कारवाया अनेकदा फसलेल्या आहेत. दुसरे असे कि राज्य व केंद्र शासने अशा नक्षलग्रस्त भागात बदल्या करतात त्या शिक्षेसाठी वा एकदम पहिलीच पोस्टींग असेल तर. शिक्षेच्या बदलीवर आलेले लोक आल्या आल्या प्रथम दीर्घ रजा टाकतात व बदल्या करुन घेण्याच्या मागे लागतात. त्यामुळे हा प्रश्न सखोल समजवुन घेणे व योग्य त्या संरक्षक तसेच आक्रमक योजना आखणे शक्यच होत नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांना जेरीस आनत संपवणे ही पोलीस-प्रशासनाच्या द्रुष्टीने असंभाव्य बाब आहे.


मुळात नक्षलवादी हे देशशत्रुच असुन त्यांचा संपुर्ण खात्मा करण्याचे कार्य फक्त लष्करच करु शकते. हा काही आपल्या लोकांविरुद्धचा लढा नसुन भारताच्या शत्रुशी लढा आहे. त्यांनी भारताशी युद्ध पुकारुन आता जवळपास ४५ वर्ष झालीत. या प्रदिर्घ काळात जेवढे लोक मारले गेले तेवढे लोक दोन्ही भारत-पाक युद्धातही ठार झालेले नाहीत. या युद्धक्षेत्राचे लोण आता आठ राज्यांत मुळ धरुन बसले आहे. लवकरच ते सर्वत्रच शहरांत-गांवांत पसरण्याची चिन्हे आताच दिसु लागली आहेत. हा देशाच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा प्रश्न आहे हे सर्वांनी समजवुन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हा सर्वकश लढा भारतीय लष्करानेच हाती घेवून तो लढावा व या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या धोक्याला एकदाचे संपवुन टाकावे अशीच मागणी सुजाण नागरिकांनी सरकारकडे केली पाहिजे. अन्यथा...



-संजय सोनवणी















Thursday, April 26, 2012

पाणिनी नेमका कोण. कुठला व कधीचा? (भाग २)




पाणिनीचा नेमका काळ ठरवण्यासाठी पाश्चात्य विद्वानांनी भरपुर प्रयत्न केलेले आहेत. त्यात फ़्रेडरिक म्यक्समुल्लर, प्रो. वेबर, थियोडोर गोल्डस्टकर, जेम्स अल्विस हे प्रमुख आहेत. या विद्वानांच्या प्रकांड पांडित्याबद्दल शंका घेत येत नाही. परंतु दुर्दैवाने या विद्वानांचेही पाणिनीच्या काळाबाबत एकमत होवू शकलेले नाही. प्रो. वेबर हे पाणिनीचा काळ इसवी सन १४० हा मान्य करतात तर गोल्डस्टकर यांच्या मते पाणिनीचा काळ हा निश्चयाने बुद्धपुर्व, म्हणजे इसपु आठव्या शतकाच्या आसपास जावु शकतो. म्यक्समुल्लर हाच काळ सनपुर्व ४५० मानतात. ही मतांतरे होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य म्हणजे संस्क्रुत सहित्यात कालोल्लेख व तेही बरोबर असे जवळपास नाहीतच. त्यामुळे ग्रंथार्गत प्रमाणे व पुर्वाचार्यांचे केलेले नामोल्लेख यावरुन हे काळ अंदाजावे लागतात. दुसरे असे कि अनेक लेखकांची नांवे समान आहेत. उदा आपल्याला किमान तीन कात्यायन माहित आहेत. वार्तिका लिहिणारा कात्यायन व प्राक्रुत प्रकाश लिहिणारा वररुची हे एकच असे मानण्याचा जसा प्रघात आहे तसेच या दोन्ही वेगळ्या व्यक्ती आहेत असाहे मतप्रवाह आहे. शुल्बसुत्रे लिहिणारा, वार्तिका लिहिणारा आणि श्रौतसुत्रे लिहिणारा कात्यायन एकच कि ही वेगवेगळी तीन स्वतंत्र व वेगवेगळ्या काळात झालेली व्यक्तिमत्वे अहेत हाही विवाद आहे व प्रत्येक संशोधकाने आपले मत सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे. हीच बाब पतंजलीची. महाभाष्य लिहिणारा पतंजली, योगदर्शन लिहिणारा पतंजलि व आयुर्वेदाचार्य पतंजलि हेही वेगळे कि एकच याबाबतही विवाद आहेत. एवढेच नव्हे तर अनेक लेखकांनी आपल्या क्रुती पुर्वी होवून गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नांवावर खपवली गेल्याची अनेक उदाहरणे असल्याने असा विवाद उत्पन्न होणे स्वाभाविक आहे.


पाणिनीच्या काळाचा विचार करतांना पाणिनीला उत्तरकालीन वा पुरातन मानणा-या विद्वानांनी नेमका काय विचार केला आहे हे आपण आधी पाहुयात.


१. प्रो. अल्ब्रेख्त वेबर: उन्नाडी सुत्रांचा थेर कछ्छायानाने आपल्या "संधीकप्प" या इसपुच्या सहाव्या शतकातील पाली व्याकरणात उपयोग केला व नंतर पाणिनीने अष्टाध्यायीत उनाडी व्याकरणीय सुत्रे घेतली आहेत यावरुन पाणिनी हा कछ्छायनाच्या उत्तरकालीन ठरतो. पाणिनीच्या व्याकरणात "यवनानी" लिपीचा उल्लेख आहे, तसेच स्तुप, स्थविर, चीवर यांचाही उल्लेख आहे. ह्यु-एन-त्संगची कथा (जी मी आधी दिलेली आहे.) तिचा आधार घेत व कथासरित्सागरचा हवाला देत वेबर यांना पाणिनी हा बुद्धानंतर ५०० वर्षांनी झाला असावा असे अनुमान काढले आहे. म्हणजे हा काळ इसवी सन १४० हा येतो.



३. थियोडोर गोल्डस्टकर: यांनी आपल्या "Panini: His Place in Sanskrit Literature" या ग्रंथात पणिनीने आपल्या अष्टाध्यायीत शाक्यमुनीचा उल्लेख केलेला नाही. स्थविर, चीवर हे शब्द त्याने श्रमणांसाठी वापरले असून ती परंपरा बुद्धपुर्वकालीन आहे. स्तुप हा शब्द त्याने बुद्धिष्ट स्तुपांसाठी वापरला नसून वैदिक अर्थाचा "मातीचा ढीगारा" या अर्थाने वापरलेला असू शकतो. "यवन" हे भारताला प्राचीन काळापासुन माहित असुन पाणिनी हा मुळात गांधार देशातला असल्याने त्याचा यवनांशी व त्यांच्या लिपीशी परिचय असने स्वाभाविक आहे. यवन शब्द बुद्ध साहित्यातही येतो तसेच तो अशोकाच्या शीलालेखांतही येतो. त्यामुळे यवन शब्द आला म्हणुन त्याला बुद्धोत्तर कालात ढकलता येत नाही. पातंजलीच्या महाभाष्यात मौर्य राजाचा उल्लेख आलेला आहे. "यवनांनी अयोध्या जिंकले" अशा अर्थाचे एक विधान व्याकरणाचा एक नियम समजावुन सांगतांना केलेले आहे. ग्रीक राजा मिन्यंडर हा एकमेव ग्रीक राजा होता जो अयोध्येपर्यंत पोहोचला होता,. यावरुन पतंजली हा इसपु १८० मद्धे झाला असुन पाणिनी त्याच्याही आधी झाला असल्याने व स्थविर, चीवर, भिक्षुणी ज्या बुद्धकाळपुर्वीही अस्तित्वात होत्या व तो शाक्यमुनीचा उल्लेख करत नसल्याने पाणिनीचा काळ हा सनपुर्व आठवे शतक हा असू शकतो.



जवळपास ३२ विद्वानांनी आजवर विविधांगांनी पाणिनीचा काल थरवायचा प्रयत्न केला आहे. मी येथे फक्त जुन्यात जुना काळ कोणता दिला गेला आहे व अर्वाचीन काळ कोनता दिला आहे याबाबतची विवेचनेच येथे वाचकांच्या सोयीसाठी घेतली आहेत. अन्य विद्वानांनीही चर्चेसाठी वरीलच बव्हंशी मुद्दे घेतले असून प्रत्येकाने काढलेल्या काळात थोडफार फरक आहे. उदा. म्यक्समुल्लर पाणिनीचा काळ इसपु ३५० हा घेतात. असो. आपण या व त्या अनुषंगाने येणा-या मुद्द्यांवर चर्चा करुयात.



१. थेर कछ्छ्यायन हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. याने बुद्धाच्या आद्न्येवरुन पालीचे व्याकरण लिहिले. याचा काळ निश्चित असुन तो सरासरी इसपु. ६०० हा येतो. त्याचे "संधीकप्प: हे व्याकरण आठ अध्यायात रचले आहे. या व्याकरणावर आधारीत पुढे ४१ पाली व्याकरणे रचली गेली. या व्याकरणात कोठेही पाणिनीचा उल्लेख येत नाही, तसेच पाणिनीच्याही व्याकरणात शाक्यमुनीचा उल्लेख येत नाही. परंतु केवळ यावरुन कोणाचेही पौर्वापौर्य ठरवणे धाडसाचे आहे. कारण कछ्छ्यायन हा बुद्धाचा प्रमुख शिष्य होता तर पाणिनी हा वैधर्मी, म्हणजे शैव संप्रदायी होता. त्यामुळे एकमेकांचा उल्लेख न करणे हे स्वाभाविक असेच मानता येईल.

२. परंतु स्थविर, भिक्षुणी, स्तुप हे शब्द मात्र विचारात घ्यायला हवेत. हे खरे आहे कि बुद्धापुर्वीही श्रमण धर्म अस्तित्वात होता. त्यामुळे अष्टाध्यायीत स्थविर, चीवर, ई. शब्द डोकावले म्हणजे ती बुद्धाच्या समकालीन वा उत्तरकालीन रचना आहे असे मानता येत नाही.

परंतु स्तुपाचा उल्लेख झटकावुन लावता येत नाही. वैदिक संस्क्रुतानुसार स्तुप म्हणजे केवळ मातीचा ढीगारा. या शब्दाचा वैदिक वाड:मयात क्वचित उल्लेख आहे. परंतु व्याकरणात हा शब्द जेंव्हा येतो तेंव्हा तो बराच प्रचलित असला पाहिजे. त्यामुळे पाणिनी हा बुद्धोत्तर काळातील आहे असे म्हणता येवू शकते. परंतु हा ठाम निष्कर्ष देणारा पुरावा नव्हे. म्हणजे स्तुपांची निर्मिती बुद्धोत्तर काळात मोठ्या प्रमाणवर झाली असली तरी त्याआधी "स्तुप" ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती असे असेही विधान करता येत नाही. शिवाय "स्तुप" हा शब्द नवनिर्मित नाही हेही उघड आहे.

३. पाणिनी यवनानी लिपीचा उल्लेख करतो तसेच लिपिकार अशा शब्दाचाही प्रयोग करतो त्यावरुन पणिनीला लेखनाची कला माहित असावी असे गोल्डस्टकर यांचे मत आहे. त्याबाबत आपण नंतर विवेचन करु. पाणिनी हा गांधार देशातील शलातुर गांवचा (आधुनिक लाहोर) निवासी होता असे मानले जाते. ते खरे आहे असे मानले तर गांधार हा सीमावर्ती प्रदेश असल्याने त्याचा यवनांशे संबंध येणे स्वाभाविक आहे. जेम्स अल्विस यांच्या मते राजा दारियसच्या समकालात कधीतरी पाणिनी होवून गेला असावा. पर्शियनांनाही तेंव्हा यवनच संबोधले जात असे. पर्शियन लोकांना लेखनाची कला अवगत होती. इसपु सहाव्या शतकातील दारियसचा लेख प्रसिद्धच आहे. त्यामुळे पाणिनीचा परिचय यवनी लिपीशी होणे स्वाभाविक आहे असे मानता येउ शकते. परंतु याचा दुसरा अर्थ मग असा होतो कि भारतात कोनतीही लिपीच अस्तित्वात नव्हती...किंवा ज्या लिप्या होत्या त्या पाणिनीय संस्क्रुत लिप्यांकित करण्याएवढ्या समर्थ नव्हत्या. अल्विस यांच्या मते पाणिनीने आपले व्याकरण लिहुनच काढले असले पाहिजे. म्यक्स्मुल्लर या मताला दुजोरा देत नाही. त्याच्या मते भारतीयांना लिप्याच माहित नव्हत्या. असो.



यवनानी या शब्दावरुन जास्तच चर्चा झडली आहे हे मात्र खरे. यवन, यवनानी, योन हे शब्द पाली साहित्यात जसे येतात तसेच उत्तरकालात सिद्ध झालेल्या महाभारतातही येतात. त्यामुळे यवनी लिपीशी भारतीयांचा (व्यापार व भौगोलिक सन्निध्याच्या कारणाने) परिचय झाला असने स्वाभाविक मानता येते. त्यासाठी पाणिनीचा जन्म शलातुरलाच झाला असला पाहिजे असे मानण्याचे खरे तर कारण नाही. आणि ज्याही कोणत्या काळात पाणिनी झाल त्या काळात एतद्देशीय लिपीच नव्हती या मतातही अर्थ नाही. भारतीयांना लिपी ही सिंधु संस्क्रुतीच्या काळापासुन माहिती आहे. त्यामुळे "यवनानी" या शब्दावरुन पाणिनीचा काळ ठरवता येत नाही.



४. कथा सरित्सागरात येणारी कथा (मुळ ब्रुहत्कथा आज संपुर्ण उपलब्ध तर नाहीच पण त्यातील कथांचे ब-यापैकी संकलन सोमदेवाने इसच्या अकराव्या- बाराव्या शतकात केलेले आहे. त्यामुळे त्याने उल्लेखित केलेली कात्यायन-वररुचीची कथा नेमकी कधी लिहिली गेली याचा अदमास लागत नाही. मुळ ब्रुहत्कथा आज उपलब्धच नाही. त्यामुळे या कथेतील जरी वररुची तथा कात्यायन हा जरी सातवाहनाच्या समकालीन असला तरी प्राक्रुत प्रकाश लिहिणारा वररुची व वार्तिका लिहिणारा कात्यायन एकच व्यक्ती होत असे मानता येत नाही. या मताला एकही विद्वानाचे समर्थन नाही. सोमदेवाने आपल्या कथा संकलित करतांना वेगवेगळ्या व्यक्तींचे साधर्म्य कल्पिले व त्यांना एकच व्यक्ती मानले आहे असेच स्पष्ट दिसते.



५. पाणिनीचा काळ ठरवण्यासाठी विद्वानांनी कात्यायन व पतंजलि यांच्याही काळाची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पाणिनी व कात्यायन हे समकालीन होते काय हा मुख्य प्रश्न चर्चीला गेला आहे. कात्यायनाच्या वार्तिका म्हणजे पाणिनीचेच व्याकरण दुरुस्त करत त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कात्यायन हा पाणिनीनंतर झाला असावा असेही मत व्यक्त केले जाते. पतंजलीच्या महाभाष्यात अष्टाध्यायीबरोबरच वार्तिकांवरही भाष्य असल्याने तो अर्थातच उत्तरकालीन ठरतो. पतंजलीचा काळ हा इसपु १८० असावा हे गोल्डस्टकर यांचे मत आपण पाहिलेच आहे. येथे विचारात घ्यायची बाब अशी कि कथासरित्सागरानुसार कात्यायन व पाणिनी समकालीन होते. या कथेतील (शिवाचे वरदान) ही भाकडकथा वा वेबर म्हणतात तशी (Ghost story) जरी मानली तरी समकालीन व्यक्तींनी त्यांच्या लेखनावर टीका करणे वा त्याच्या विचाराचे पुढे प्रवाहन करणे अशक्य नाही. अर्थात हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा दोघे नुसते समकालीन नव्हेत तर निकट परिचित असायला हवेत. कथा सरित्सगरानुसार दोघे एकाच गुरुचे शिष्य होते. त्यामुळे त्या कथेतील दंतकथा वगळत पाणिनी व कात्यायन हे समकालीन होते असे म्हणता येते.



६. पातंजलीच्या महाभाष्यात मौर्य राजाचा उल्लेख येतो हे खरेच आहे. परंतु तो राजा नेमका कोण हे नांव येत नाही कारण व्याकरणाचा एक नियम निरुपित करण्यासाठी त्याने ते विधान सिद्ध केले आहे. त्यात कोनाचे नांव असण्याची आवश्यकता नाही. परंतु अल्विस मात्र त्यावरुन असे निश्चित क्रण्याचा प्रयत्न करतात कि शेवटच्या मौर्य राजाचा पतंजली हा समकालीन होता. (इसपु १८०) हा तर्क कुतर्क म्हणावा एवढा चुकीचा आहे. तेच विधान "यवनांनी अयोध्या जिंकली" या विधानाबाबत म्हणता येते, कारण मग पातंजलीने आपले नियम सिद्ध करण्यासाठी पुरातनही उदाहरणे घेतली आहेत. त्यावरुन पतंजलीलाही मग पुरातन ठरवावे लागेल. थोडक्यात पतंजलीने केलेले हे फक्त दोन ऐतिहासिक उल्लेख पतंजली त्यांच्या समकालीन होता हे सिद्ध करत नाही.



७. वेबर यांनी ज्या तर्कावर पाणिनीचा काळ सन १४० काढला आहे त्यावर तर अल्विस यांनी हल्लाच चढवला आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कारण युवान श्वांगने दिलेली पाणिनीची कथा, जी त्याने सहाव्या शतकात शलातुर येथे ऐकली, तिचा पाणिनीच्या कालनिश्चितीसाठी काही उपयोग नाही असे त्यांचे मत आहे. या संपुर्ण कथेचे परिशिलन केल्यानंतर माझेही मत तसेच बनले आहे. परंतु पाणिनी, जरी गांधार देशाचा मुलनिवासी नसला तरी त्याने बरच काळ तेथे व्यतीत केला असावा असे फारतर म्हणता येईल.



वरील विवेचनावरुन पाणिनीचा काळ नक्की होत नाही हे तर स्पष्ट आहे. परंतु ते खरेच अशक्य आहे काय? अशा कोणत्या बाबी आहेत ज्या या सर्वच विद्वानांच्या नजरेतुन सुटल्या आहेत?



होय. सुटल्या आहेत. कदाचित भारतीय संस्क्रुती व धर्मेतिहासाचे आकलन कमी पडल्याने तसे झालेले असु शकते. असो.

अष्टाध्यायीची समग्र रचना ज्या पाणिनीच्याच १४ शिवसुत्रांवर (यांनाच महेश्वर सुत्र असेही म्हणतात) आधारीत आहे त्याचा आरंभीचा श्लोक खालीलप्रमाणे आहे.

"न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारम I

उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम II



( शिवाच्या वैश्विक न्रुत्यानंतर सनकादि ऋषिंना आशिर्वाद देण्यासाठी शिवाने १४ वेळा डमरु वाजवला व त्यातुन जे विभिन्न ध्वनी उत्पन्न झाले त्याधारित हे शिवसुत्र आहे.)

१.अ इ उ ण्


२. ऋ ऌ क्


३. ए ओ ङ्


४. ऐ औ च्


५. ह य व र ट्


६. ल ण्


७. ञ म ङ ण न म्


८. झ भ ञ्


९. घ ढ ध ष्


१०. ज ब ग ड द श्


११. ख फ छ ठ थ च ट त व्


१२. क प य्


१३. श ष स र्


१४. ह ल्




हे ते १४ ध्वनी होत ज्याच्या आधारावर पाणिनीय व्याकरणाची रचना झाली आहे.

पणिनीचा काळ ठरवण्यासाठी व तो मुळचा कोठला होता हे शोधण्यासाठी हे सुत्र अत्यंत महत्वाचे आहे. ते कसे हे आपण पुढील प्रकरणात पाहुयात.








Tuesday, April 24, 2012

पाणिनी नेमका कोण. कुठला व कधीचा? (भाग १)




पाणिनी हा अभिजात संस्क्रुतचा पहिला व श्रेष्ठ व्याकरणकार मानला जातो. हा नेमका कोणत्या काळात झाला याबाबत मतभेद आहेत. एवढेच नव्हे तर पाणिनी हे गोत्रनाम आहे कि व्यक्तिनाम याबाबतही विद्वानांमद्धे एकमत नाही. बौधायनाच्या मते पणिने हे गोत्रनाम असावे. परंतु भट्टोजी दीक्षित यांच्या मते "पणीचे पुरुष अपत्य तो पाणिन तर त्याचा नातु तो पाणिनी." पाणिनीला वाहिक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशाही संद्न्या काही उत्तरकालीन वाड्मयात दिल्यचे आढलते. यावरुन पाणिनी हा वाहिक या गांधार देशातील प्रदेशात रहात होता व शालातुरीय हे नांव त्याच्या गांवावरुन पडले असावे असाही अंदाज आहे. शलातुर गांव सध्या लहुर नांवाने ओळखले जाते असाही विद्वानांचा कयास आहे.



इसवी सनाच्या सातव्या शतकात चिनी प्रवासी युवान श्वांग याने शलातुर गांवाला भेट दिली होती. त्याने तेथे पाणिनीविषयक ज्या दंतकथा ऐकल्या त्या अशा:



"अतिप्राचीन काळी सहित्याचा विस्तार मोठा होत. कालक्रमाने त्यांचा -हास झाला. देवांनी मग अवतार घेवून व्याकरण व साहित्य जन्माला घातले. पुढे व्याकरणाचा विस्तार होवू लागला व ते खुप वाढले म्हणुन ब्रह्मदेव व इंद्र यांनी लोकांच्या गरजेला अनुसरुन व्याकरणाचे काही नियम बनवले व शब्दांची रुपे स्थिर केली. पुढे वेगवेगळ्य व्याकरणकारांनी आपापल्या मतांना अनुसरुन वेगवेगळी व्याकरणे रचली. पण त्यांचे सर्वांना आकलन होईना त्याच काळात पाणिनीचा जन्म झाला. ईश्वरदेव नामक प्रकांड पंडिताच्या मार्गदर्शनाने त्याने प्रकांड अभ्यास करुन अष्टाध्यायी हा व्याकरणावरील ग्रंथ लिहिला व पाटलीपुत्र येथील नंद राजाकडे पाठवला."



ही दंतकथा असली तरी नंद राजाच्या नांवाच्या निर्देशामुळे इसपु ४५० (महापद्म नंद) ते सनपुर्व ३०० मधील धनानंद यापैकी तो कोणत्यातरी नंद वंशीय राजाच्या समकालीन असावा असा अंदाज बांधला गेलेला दिसतो.



कथासरित्सागर (मुळचे गुणाढ्याचे पैशाची भाषेत लिहिले गेलेले "ब्रुहत्कथा." ) या ग्रंथात येणारी माहिती खालीलप्रमाणे...



" हर्ष नावाच्या एका आचार्याकडे कात्यायन व पाणिनी शिकत होते. कात्यायन हा कुशाग्र बुद्धीचा तर पाणिनी हा मंदबुद्धीचा होता. यामुळे पाणिनी मागे पडे. याला कंटाळुन पाणिनी हिमालयात निघुन गेला. तेथे त्याने शिवाची घोर तपस्या केली. तपाने प्रसन्न होवून शिवने त्याला प्रतिभाशाली बुद्धी दिली. पाणिनीसमोर न्रुत्य करत शिवाने चौदा वेळा डमरु वाजवून जे ध्वनी निर्माण केले त्यांना अनुसरुन पाणिनीने चौदा प्रत्याहार सुत्रे लिहिली व त्यांनाच आधार घेत अष्टाध्यायीची निर्मिती केली." (कथासरित्सागर १.४)



ब्रुहत्कथेची निर्मिती ही गुणाढ्याने पैशाची या प्राक्रुत भाषेत सातवाहन काळात इसपु पहिले ते इसचे पहिले शतक या कालात कधीतरी केली याबाबत विद्वानांच्या मनात शंका नाही. हा ग्रंथ विंध्य पर्वतराजीत त्याने लिहिला. हा ग्रंथ महाभारतापेक्षा श्रेष्ट असुन मुळ ग्रंथ आज उपलब्ध नाही हा भारतीय साहित्यातील एक फार मोठा अनर्थ आहे असे मत आर्थर ब्यरिडेल कीथ यांनी आपल्या "A History of Indian Literature: Volume 3 -( Page 346) ग्रंथात नोंदवुन ठेवलेले आहे.

येथे मी ब्रुहत्कथेच्या निर्मितीच्या खोलात आताच न जाता, पाणिनीचा कालखंड ठरवण्यावर जास्त भर देवुयात.

वर आपण पाणिनीबाबतच्या दंतकथा पाहिल्या आहेत. स्वत: पाणिनी स्वत:बद्दल कोठेच माहिती देत नाही. पाणिनीबाबत आपल्याला दोनच मुळ स्त्रोत उपलब्ध आहेत ते म्हनजे युवान श्वांगने सातव्या शतकात ऐकलेल्या दंतकथा व इसपु पहिले ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कधीतरी लिहिली गेलेली ब्रुहत्कथा.

कात्यायन व वररुची हे एकच आहेत असे मानण्याचा प्रघात आहे. कात्यायन व पाणिनी एकाच काळातील होते कि वेगवेगळ्या हेही येथे तपासायला हवे.

कात्यायनाची "सर्वानुक्रमणि" ही वररुचीच्याही नांवावर आढलते असे प्रतिपादन फ्रेडरिक म्यक्सम्युल्लर या विद्वानाने आपल्या हिस्टरी ओफ अन्शंट संस्क्रुत लिटरेचर" या १८६० मद्धे प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात केले आहे. याच ग्रंथात म्यक्समुल्लर म्हणतात कि हेमचंद्रांनी आपल्या कोषात कात्यायन व वररुची ही एकाच व्यक्तीची नांवे आहेत. याच कात्यायनाने पाणिनीचे व्याकरण वर्तिका ग्रंथाच्या माध्यमातुन पुर्णही केले व पाणिनीचे दोष वगळत सुधारीत स्वरुपात जगासमोर ठेवले. वररुचीचे प्राक्रुतप्रकाश" हे प्राक्रुत भाषेचे व्याकरणही प्रसिद्ध आहे. किंबहुना प्राक्रुतप्रकाश हा ग्रंथ सिद्ध करुन मग वररुची तथा कात्यायनाने वार्तिका लिहिल्या असे दिसते.

येथे हे लक्षात घ्यायला हवे कि राजतंगिणिचा लेखक कल्हन कात्यायन व पाणिनी हे नंदाच्या समकालीन असल्याचे नमुद करतो.

येथे नंद हा नेमका कोणत्या राजघराण्याचा या प्रश्नात फारसे जावुन उपयोग नाही कारण समान नांवाचे अनेक राजे होवून गेले आहेत. परंतु कात्यायन तथा वररुची व पाणिनी समकालीन होते याबाबत म्यक्समुल्लरला तरी शंका नाही. आणि आपण वर पाहिलेल्या दंतकथा हीच बाब सुचीत करतात.



आता वररुची/ कात्यायन एकच आहेत याबाबत शंका नाही. वररुची तथा कात्यायन हा ब्रुहत्कथेतील महत्वाचे पात्र आहे. गुणाढ्य हा सातवाहनाच्या दरबारातील महत्वाचा कवि होता. त्याने आपला ग्रंथ पैशाची भाषेत सिद्ध केला. यालाही शैव पार्श्वभुमी आहे. या संदर्भातील दंतकथाही आपण पुढे लक्षात घेणारच आहोत. शिवाने पार्वतीला एकांतात सांगितलेली कोणीही न ऐकलेली कथा एका विद्याधराने ऐकली व ते शिवाला समजल्यावर त्याला जो शाप दिला त्यातुन त्याचा मानवी अवतार व त्याने या कथांचे पैशाची भाषेत केलेले रुपांतर अशी ही एकुणातील कथा आहे. पण त्याबद्दल आपण नंतर विचार करुयात.

आपण युवान श्वंगने सागितलेली दंतकथा पाहिलीच आहे. त्याच्या मतानुसार गांधार प्रांतातील शलातुर या गांवी पाणिनीचा जन्म झाला. ही दंतकथा श्वांगने सातव्या शतकात ऐकलेली आहे. म्हनजे तिला फारसे विश्वसनीय मानता येत नाही. पाणिनी जर इसपुच्या पाचव्या वा चवथ्या शतकात जन्माला आला होता असे ग्रुहित धरले तर किमान हजार वर्षांनी श्वांगने ही कथा ऐकलेली आहे. पाणिनी समजा पहिल्या शतकातील असला तरी त्याने ही कथा किमान सातशे वर्षांनी ऐकलेली आहे. भारतात दंतकथांची व स्थानमाहात्म्य वाढवण्याची एकुणातील प्रव्रुत्ती पाहिली तर जसे पांडव जवळपास सर्वच गांवांत येवुन गेल्याच्या दंतकथा असतात तशीच दंतकथा पाणीनीबाबत असंभाव्य म्हणता येत नाही.

त्यामुळे ब्रुहत्कथेतील कथा हीच जवळपास सत्याच्या जवळ जाणारी आहे असे म्हनता येते. कात्यायन व पाणिनी हे समकालीन असून पाणिनीच्या व्याकरणातील दोष कात्यायनाने दुर केले असे म्हणता येते. दुसरे असे कि, "एखाद्या भाषेचे व्याकरण रचण्याचा प्रयत्न करणे ही एक अयोग्य गोष्ट आहे. जी जीवंत भाषा असते तिचे वेगवान स्त्रोत हे ग्रंथांच्या बाहेरच आढळतात. गांवे, जनपदे, नगरे, राजदरबार, शासन व्यवहार, सैन्याची विविध क्षेत्रे, व्यापारी श्रेण्या व निगम, श्रमिकांच्या कर्मशाला ई. क्षेत्रांत नित्य नवे शब्द, लोकोक्ति व म्हणी, वक्यप्रयोग जन्माला येत असतात व ती तोंडो-तोंडी त्या-त्या प्रदेशात प्रसार पावत असतात. नवे व्याकरण लिहायचे असेल तर त्या सर्व शब्दांचा संग्रह करने आणि व्याकरणद्रुष्ट्या त्या सर्व शब्दांना नियमबद्ध करणे आवश्यक आहे. ( भारतीय संस्क्रुती कोश, संपादक पं. महादेव शास्त्री जोशी, खंड पाचवा प्रुष्ठ ५०३)



कात्यायन जर दक्षीण देशी विद्वान होता तर मग पाणिनी नेमका कोठला होता हेही येथे तपासुन पहाणे उचित ठरेल. पाणिनी हा गांधार प्रांतातील शलातुर गांवचा निवासी होता हे युवान श्वांगचे मत आपण पाहिले आहेच. प्रश्न असा पडतो कि त्या काळी (पहिले शतक असो कि इसपुचे पाचवे शतक) गांधार प्रांताची नेमकी भाषा काय होती? जोही ज्या प्रदेशात जन्म घेतो तेथील प्रचलित भाषा हीच प्रत्येकाची मात्रुभाषा असते. मग या प्रांताची या कोणत्याही निर्दिष्ट काळी नेमकी काय भाषा होती? समजा त्याकाळी या प्रदेशतील भाषा संस्क्रुतच होती तर आता तेथे ती भाषा अवशिष्ट तरी आहे काय?



प्रचीन बुद्धीष्ट ग्रंथ हे गांधार प्रांतातील प्राक्रुत भाषेला "गांधारी" भाषा असे उल्लेखतात. ही भाषा खरोश्टी लिपीत लिहिली जात असे. या प्रांतात बुद्धिझम इसपु ३०० च्या आसपासच पसरला होता. आजही या भाषेची अवशिष्ट रुपे हिंदको वा कोहिस्तानी या भाषांच्या रुपात अवशिष्ट आहेत. संस्क्रुताचे मात्र अस्तित्व नाही. समजा पाणिनी हा इसपु च्या चवथ्या वा पाचव्या शतकात जरी झाला असता तरी त्याने जे व्याकरण लिहिले असते ते अस्तित्वातील भाषेचे. समजा तेंव्हा संस्क्रुत हीच महत्वाची भाषा होती तर केवळ दोनशे वर्षांत संस्क्रुत त्या भागातुन कशी नामशेष झाली याचे उत्तर यातुन मिळत नाही. बरे, गांधारी भाषेची अवशिष्टे पाणिनीच्या व्याकरणात आहेत हेही खरे आहे. परंतु गांधार प्रांताला लागुन असलेल्या, व ऋग्वेद ज्या मुळ भाषेत लिहिला गेला होता त्या व्रचदा प्राक्रुताचा तो खरा प्रभाव आहे. सिंध प्रांत आणि गांधारच्या सीमा लागुन असल्याने अनेक भाषिक साधर्म्ये या भाषांत असणे स्वाभाविक आहे, जसे हे जगभर आढळते.

पाणिनी हा मुळचा गांधार प्रांततील असुच शकत नाही हे त्याच्याच शिवसुत्रांवरुन सिद्ध होते. शिवसुत्रांना महेश्वर सुत्रे असेही म्हणतात. उलट तो दक्षीणेतीलच होता व त्याचा काळ इसपुच्या पहिल्या शतकापार जावु शकत नाही हे सिद्ध होते. अर्थात त्याबाबत पुढील प्रकरणात.



-संजय सोनवणी.



Saturday, April 21, 2012

संस्कृत भाषा पुरातन?

 संस्कृत भाषा नुसती पुरातन नव्हे तर ती इंडो-युरोपियन भाषा समुदायाची जननी आहे. भारतातील द्राविडियन भाषागट वगळता अन्य सर्वच भाषा संस्क्रुतोद्भव आहेत.  संस्कृत ही साक्षात "देववाणी "असून ऋग्वेद म्हणजे परमेश्वराचे नि:श्वास आहेत...अशी आपली बराच काळ समजुत आहे हे खरे. परंतु तसे पुरावे आहेत काय? मुळात संस्कृत भाषा पुरातन आहे हा समज खरा आहे काय? ग्रीक व ल्यटीन भाषासुद्धा  संस्कृतमधुनच निर्माण झाली असे म्याक्समुल्लरने प्रथम मत प्रस्रुत केले व त्यांची सर्वच भाषाविदांनी री ओढली. यामागे म्यक्समुल्लरचा "आर्य" हे मध्य अशिया किंवा उरल प्रांतातुन क्रमश: टोळ्यां-टोळ्यांनी निर्गमीत झाले आणि काही टोळ्या युरोपात तर काही इराणमार्गे भारतात प्रवेशल्या असा तर्क होता. भारतात तेंव्हा ज्या दास-दस्यु ई.रानटी जमाती रहात होत्या त्यांना जिंकुन त्यांनी त्यांना चवथ्या, म्हणजे शुद्र वर्णात स्थान दिले असाही तर्क होता. परंतु सिंधु संस्क्रुतीचे अवशेष सापडल्यानंतर जोही काही वेदकाळ मानला जातो, त्याच्याही पुर्वी भारतात अत्यंत सम्रुद्ध व प्रगत संस्क्रुती अस्तित्वात होती हे प्रत्यक्ष भौतीक अवशेषांमुळेच सिद्ध झाल्याने आर्य सिंद्धांताला बधा येवू लागली. तरीही प्रथम आर्यांनीच सिंधु संस्क्रुती नष्ट केली व  लोकांना
दास केले असे म्हणत तेही अंगलट यायला लगल्यावर सिंधु संस्क्रुती वैदिकांनीच निर्माण केली असे तर्क डा. मधुकर ढवळीकरांसारखे विद्वान प्रस्रुत करु लागले. आर्य नांवाचा कोणताही वंश अस्तित्वात नव्हता व आक्रमक म्हणून येथे आले हेही खरे नाही हे आता असंख्य पुराव्यांवर सिद्ध झाले आहे. मग  संस्कृतचे काय? मुळ ऋग्वेद नेमका कोणत्या भाषेत लिहिला गेला होता? या प्रश्नांची उत्तरे येथे थोडक्यात तपासायची आहेत.

१. मुळात  संस्कृत म्हणजे संस्कारीत, बदलवलेली क्रुत्रीम भाषा तर प्राक्रुत म्हणजे मुळची, नैसर्गिक भाषा. आता हा अर्थ सरळ व स्पष्ट असल्याने प्राक्रुत भाषेवरच संस्कार करुन जी भाषा बनवली गेली तीच  संस्कृत
 हे उघड आहे. म्हणजे प्राक्रुत भाषा याच मुळच्या ठरतात.

२. प्रत्येक भाषा ही आपली प्रादेशीक ओळख देते. उदा. मागधी, अर्धमागधी, (मगध प्रांतातील भाषा) माहाराष्ट्री प्राक्रुत, शौरसेनी, तेलगु इ. एवढेच नव्हे तर ग्रीक, डोरियन, अक्काडियन, ल्यटिन (ल्यटियनन या प्रांतात बनली म्हणुन) पर्शियन...ई. परंतु  संस्कृत भाषेला असे प्रादेशिक संदर्भ नाहीत जसे ते पाली या भाषेलाही नाहीत. पालीला नाहीत कारण ती भाषा ग्रांथिक उपयोगासाठी प्रयत्नपुर्वक बनवली गेलेली सर्वात पहिली क्रुत्रीम ग्रांथिक भाषा आहे.  संस्कृतही तशीच क्रुत्रीम भाषा आहे. त्यामुळेच तिला्ही कसलेही प्रादेशिक संदर्भ नाहीत.

३. ग्रीक भाषेवर  संस्कृतमधील काही मोजक्या शब्दांतील किरकोळ साधर्म्यामुळे तिचा प्रभाव होता व त्यातुनच ग्रीक भाषेचा जन्म झाला असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु भाषाविद येथे हे विसरतात कि ग्रीक भाषेतील पहिला वाचला गेलेला लेख (लिखित) इसपु १७०० मधील आहे. ल्यटीन भाषेतील पहिला शिलालेख हा इसपु ६०० मधील आहे. इराणी भाषेची जननी  संस्कृत  आहे असेही मानण्याचा प्रघात आहे, परंतु या भाषेतीलही पहिला शिलालेख बेहुस्तिन येथील इसपु ५२२ मधील राजा दारियसचा आहे. सिंधु लिपी अद्याप वाचता आली नसली तरी त्यांही काळी लिपी होती याबाबत दुमत नाही. भारतात जुन्यात जुना (वाचला गेलेला) शिलालेख हा इसपु १००० मधील असुन तो व्रज (शौरसेनी) भाषेतील आहे. इसपु ३२२ पासुन पाली, अर्धमागधी, मागधी, तमिळ भाषेतील शिलालेखांची मात्र रेलचेल आहे. जर  संस्कृत  इंडो-युरोपियन समुदायातील असती तर तिचीच अपत्ये मानल्या गेलेल्या भाषांत मात्र पुरातन लेख आढळतात. पण  संस्कृत मात्र अर्वाचीन ठरते. हे असे का?

 ४. हे लेख लिहिले गेले कारण त्या भाषांना स्वत:ची लिपी होती हेही उघड आहे. आश्चर्याची गोष्ट अशी कि संस्क्रुत भाषेतील (तोही प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत..) शिलालेख गिरनारला सापडतो तो इसवी सनाच्या 165 चा. तोही ब्राह्मी लिपीतला, ज्यात तत्पुर्वीच इसपु १००० पासुन असंख्य प्राक्रुत शिलालेख कोरले गेलेले होते. सहाव्या शतकापासुन मात्र संस्क्रुत शिलालेखांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचा अर्थ असा आहे कि मुळात  संस्कृतला स्वत:ची कसलीही आणि कधीही लिपी नव्हती....भाषा पुरातन असती तर लिपी नक्कीच असती जशी ग्रीक, ल्यटीन, पर्शियन व भारतीय प्राक्रुत भाषांची होती. पैशाची भाषेत गुणाढ्याने "बृहत्कथा" लिहिले होते व त्यातील लाखभर पाने जाळली अशी कथा आहे...म्हणजे तो ग्रंथही मुळात लिखितच होता.

५. प्रत्यक्ष पुराव्यांवरुन सातवाहन काळापर्यंत तरी संस्क्रुत ही कोणाचीही दरबारी भाषा नव्हती हा इतिहास आहे. सर्व राजकारभार प्राक्रुतातुन चालत असे. इसच्या १५० पर्यंत एकही शिलालेख वा नाण्यांवरील मजकुर संस्कृतात नाही. साहित्यही संस्क्रुत भाषेत नाही.

६. चवथ्या शतकात साधलेल्या रामायणच्या संस्करणात सोडले तर खुद्द ऋग्वेद ते महाभारतात संस्क्रुत भाषेचे नांवही येत नाही. विपुल बौद्ध व जैन वाड्मयात कोठेही सम्स्क्रुत भाषेचे नांव येत नाही. पाणिनीला अभिजात सम्स्क्रुतचा श्रेश्ठ व्याकरणकार मानले जाते, परंतु इसवी सनाच्या तिस-या शतकात त्याने लिहिलेल्या अष्टाध्यायीतही संस्क्रुत हा शब्द येत नसुन तो ज्याचे व्याकरण लिहित होता त्याला "छंदस" व "भाषा" असे म्हनतो...संस्क्रुत नाही. सर्वात महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हणजे पाणिनी हा शैव होता. त्याच्या सुत्रांना महेश्वर सुत्रे अथवा शिव सुत्रे असेच म्हटले जाते. संस्क्रुतचा नंतरचा व्याकरणकार पतंजली हाही शैव होता.

७. दुस-या-तिस-या शतकापुर्वीचा एकही संस्क्रुत म्हणवणा-या भाषेतील एकही लेख, राजाद्न्या, ग्रंथ, काव्य वा महाकाव्य वा पुराण मिळत नाही. उलट जैन व बौद्ध साहित्याचे हस्तलिखित पुरावे हे किमान सनपुर्व चवथ्या शतकापासुन आढळतात. खुद्द ऋग्वेद इसवी सनाच्या सहाव्या शतकात तमिलनाडुमद्धे ग्रंथबद्ध केला गेला. वेद मौखिक परंपरेने जपले असे मान्य जरी करायचे म्हटले तरी अन्य कोनताही व्यवहार संस्क्रुतातुन का नोंदला गेला नाही? जर संस्क्रुत ही देशाची पुरातन भाषा होती व किमान ब्राह्मण-क्षत्रीय-वैश्य समाजाच्या नित्य बोलण्यातील व्यवहारातील भाषा होती...तर एकही तसा भौतीक पुरावा आजतागायत का मिळाला नाही? कारण ती भाषाच मुलात अस्तित्वात नव्हती.

८. ऋग्वेदाची भाषा ही "वैदिक संस्क्रुत" आहे असे मानण्याचा प्रघात आहे, कारण ती पानीनिच्या व्याकरणशी फारसा मेळ घालत नाही. उलट तिचा मेळ प्राक्रुत व्याकरण व भाषेशी जास्त बसतो आणि त्याचे कारण स्वाभाविक आहे. ऋग्वेद रचना ही सनपुर्व 1500 ते सनपुर्व 1000 पर्यंत सुरु होती, असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु या प्रदिर्घ कालावधीत भाषेत आपसुक जे कालौघात बदल घडत असतात (जशी चक्रधरांची---द्न्यानेश्वरांची मराठी व आजची...) तसे काहीएक बदल ऋग्वेदात आढळत नाहीत. इंग्रजीतही आपण शेक्सपियरची इंग्रजी आणि आजची इंग्रजी हा भेद सहज पाहु शकतो. जगात असे कोनत्याही भाषेबाबत...अगदी ग्रीक वा ल्यटीनबाबतही घडलेले नाही. मग ऋग्वेदाची भाषा का बदलत नाही? याचे कारण असे कि मुळात वेद हे मुळात संस्क्रुतात रचलेच गेलेले नव्हते. असे असुनही सम्स्क्रुत पुरातन...देववाणी...असा भ्रम आपल्या डोक्यात बसला तो विल्ल्यम जोन्स व म्यक्समुल्लरमुळे. असा सिद्धांत मांडण्यात त्यांचे सांस्कृतिक व राजकीय
फायदे होते. पण येथील विद्वान मात्र फारच उत्तेजीत झाले. पण ते वरील प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाहीत हे उघड आहे.

आता प्रश्न पडतो तो असा कि नेमकी संस्क्रुत भाषा कधीची? मुळात या भाषेचे कसलेही भौतीक पुरावे इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नसल्याने तिचा जन्म याच काळच्या आसपास झाला असे ठामपणे म्हनता येते. म्हणजे ही भाषा अगदी पालीपेक्षाही किमान ५०० वर्षांनी अर्वाचीन ठरते. पाली भाषा ही बौद्ध धर्मीयांनी मागधी-अर्धमागधी व शौरसेनीतील शब्द-व्याकरण यांचा मेळ घालत ग्रांथिक कारणांसाठी बनवली हे मी आधीच म्हटले आहे. मग बौद्ध धर्माचा प्रसार पालीमुळे देशभरच नव्हे तर विदेशातही होत आहे हे पाहुन वैदिक धर्मियांनी पाली, व पालीपासून पुढे विकसीत झालेली संस्कृत वापरण्याचा निर्णय घेतला असावा. कारण मुळ वेद व ब्राह्मणे ज्या भाषेत लिहिली होती ती "जुन्या पर्शियनच्या निकटतम भाषेत. नंतर तो मिश्र प्राकृतात आणला गेला. आजचे वेद हे भाषेचे तिसरे रुप आहे, मुळचे नव्हे....याचे आता शेकडो पुरावे उपलब्ध झालेले आहेत.

पाणिनीने तिस-या शतकात संस्कृतला व्याकरणबद्ध केले. त्यानंतर अभिजात संस्कृतमधील साहित्याचा विस्फोट झाला. पाणिनी हा वैदिक नव्हे तर पणी समाजातील एक विद्वान. प्रचलित भाषांवर संस्कार करुनच बनवली गेलेली ही भाषा असल्याने त्या भाषेची स्वतंत्र लिपी असण्याचे कारण नव्हते.  त्यामुळे तमीळ ब्राह्मी, ब्राह्मी वा क्वचित खरोष्टी या प्रचलित लिप्या वापरात आणल्या. या भाषेला पहिला राजाश्रय मिळालेला दिसतो तो शक क्षत्रप रुद्रदामनाच्या काळात, कारण पहिला संस्क्रुतातील शिलालेख त्याचाच आहे! तो आधीच म्हटल्याप्रमाणे शुद्ध नव्हे तर मिश्र संस्कृतातील आहे.

मुळ ऋग्वेद जुन्या पर्शियनसदृष्य भाषेत होता. अवेस्त्याची भाषा व वैदिक भाषेतील साम्य विलक्षण आहे. असे असले तरी प्राकृताची अनेक रुपे वैदिक भाषेत दिसतात. वैदिक संस्कृत ही पाणिनीच्या संस्कृतपेक्षा सैल व व्यामिश्र त्यामुळेच झाली.  हे खुद्द ऋग्वेदातील शेष राहिलेल्या मुळ शब्दांवरुनच सिद्ध होते. उदा. सोम पवमान सुक्त. नंतर प्रारंभिक संस्कृतात अनुवाद करतांना ज्या मुळ अवेस्तन शब्दांचे अर्थ माहित नव्हते ते शब्द तसेच ठेवले गेले. त्यामुळे अगदी यास्क असो कि सायनाचार्य असो, त्यांनाही ऋग्वेदातील अनेक ऋचा/शब्दांचा अर्थ लावता आला नाही. तोवर पाणिनीचे व्याकरण तयार झाले. पण या सा-याचा देशभर प्रसार-प्रचार व्हायला अजुन दोन-तिनशे वर्ष लागली. पुढची तीन-चारशे वर्ष संस्कृतने राज्यव्यवहार ते साहित्यक्षेत्रात अधिराज्य गाजवले...इतके कि मुळ प्राकृत ग्रंथ संस्क्रुतात झपाट्याने अनुवादित झाले...यातुन कालिदास, भवभुतीसारखे मुळ प्राक्रुत नाटककारही सुटले नाहीत. पण मग पुन्हा ही भाषा हळु हळु लोप पावली ती पावलीच.

मग संस्क्रुत ही सर्व भाषांची जननी हा सिद्धांत का आला? याला खरे तर राजकीय कारणे आहेत. म्यक्समुल्लर हा जर्मन पंडित या सिद्धांताचा मुख्य पुरस्कर्ता ठरला. युरोपियन (ग्रीस आणि रोम वगळता) कोणाचाही इतिहास पाचव्या शतकापार जात नव्हता. त्यांनाही त्यांची सांस्क्रुतीक पाळेमुळे भक्कम करायची होती. आर्यभाषागट सिद्धांतामुळे मात्र त्यांचाही इतिहास पुरातन ठरु शकत होता. कारण आर्य भाषा बोलणारे कधीतरी एकत्र होते आणि ते क्रमश: युरोप ते भारतात पसरले व स्थानिकांना सुसंस्क्रुत केले. हे सिद्ध केले कि आर्यन वंशवादाचा राजकीय लाभ जसा जर्मनांना होनार होता तसाच इंग्रजांनाही. भारतातील ब्राह्मण हे आपसुक त्यांचे पुरातन "आर्यरक्ताचे बांधव" ठरणार होते...म्हणजेच एतद्देशियांवर सत्ता गाजवणारे पहिले आक्रमक. विष्णुशास्त्री चिपळुनकर तर जाहीरपणे इंग्रजांना पुरातन रक्तबांधव म्हणु लागले ते यामुळेच. लो. टिळकांनीही तोच कित्ता गिरवला व "आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ लिहुन मोकळेही झाले. (नंतर डा. नी. र. व-हाडपांडे
यांनी टिळकांच्या सिद्धांताला ऋग्वेदाचाच आश्रय घेत फेटाळुन लावला) पण यामुळे जसा युरोपियनांचा राजकीय/सांस्क्रुतीक फायदा झाला तसाच येथील वर्चस्ववादी वैदिकांचाही झाला व त्यांनी संस्क्रुतचा व आर्यवादाचा उद्घोष करायला सुरुवात केली. खरे तर या विदेशी प्राच्यविद्या संशोधकांनी सर्वात आधी प्राक्रुत भाषांकडेच लक्ष पुरवले असते तर संस्क्रुतचा फोलपणा व प्राचिनत्वावर तेंव्हाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते, व आजचा हा साम्स्क्रुतीक गोंधळ मुळात निर्मानच झाला नसता. ट्रम्प सारख्या व्याकरणकाराच्या मात्र ही बाब लक्षात आली होती. त्याने प्राक्रुत भाषा याच पुरातन असुन सम्स्क्रुतचा जन्म अत्यंत अर्वाचीन आहे हे सिंधी भाषेचे पहिले व्याकरण लिहितांना १९व्या शतकात मांडले होते. केतकरांनीही माहाराष्ट्री प्राक्रुतातुनच संस्क्रुतचा जन्म झाला हे त्यांच्या ज्ञानकोशात मांडले होते. पण लक्षात कोण घेतो?

लिप्यांकित भाषा व अलिप्यांकित भाषा यातील भेद लक्षात घेतला असता तर ग्रीक, ल्यटीन भाषांवरील प्रभाव हा प्राक्रुतामुळे आहे व ते सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेल्या व्यापारामुळे व सांस्क्रुतीक देवानघेवाणीमुळे आहे हे त्यांच्या सहज लक्षात आले असते. असो.

प्राक्रुत भाषा याच पुरातन असून संस्क्रुतचा इतिहास इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नाही हे मात्र सर्वच उपलब्ध पुराव्यांवरुन ठामपणे सिद्ध होते. थोडक्यात संस्क्रुत ही अत्यंत अर्वाचीन भाषा असुन तिला अभिजाततेचा दर्जा देणेही चुक आहे. या भाषेतील ऋग्वेदासहित सर्व वाड्मय हे मुळ कोणत्या ना कोणत्या प्राक्रुतातुन अनुवादित केलेले आहे. मग प्रत्यक्ष पुरावे असलेले कथासरित्सागर घ्या, सिंहासन बत्तीशी घ्या कि रामायण महाभारत घ्या. थोडक्यात संस्कृत ही अर्वाचीन भाषा आहे. ग्रांथिक कारणांसाठी वैदिक, बौद्ध, आगमीक व जैनांनी निर्माण केलेली आहे. ही संयुक्तपणे विकसीत केली गेलेली भाषा आहे. ही भाषा अभिजात नाही.


(माझा हा लेख रविवारच्या (22/4/12) नवशक्तीत प्रसिद्ध आहे.)

====संजय सोनवणी





 

Tuesday, April 17, 2012

"पानिपत असे घडले..." संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर या इतिहास संशोधकाचा "पानिपत असे घडले..." हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ १७ मे २०१२ रोजी ठाणे येथे प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथाला मी लिहिलेली ही प्रस्तावना.
================================================================

पानिपत युद्धाला यंदा २५१ वर्ष पुर्ण झालीत. हे युद्ध व त्यातील मराठ्यांचा पराजय हा मराठी मनाला लागलेला जिव्हारी घाव मानला जातो. या युद्धात महाराष्ट्रातील घरटी बांगडी फुटली असेही मानले जाते. या युद्धातील पराजयामुळे मराठी साम्राज्याला उतरती अवकळा लागली असेही मानले जाते. असे समजा असले तरी सन १९६१ मद्धे पानपतच्या २०० व्या स्म्रुतीदिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या त्र्यं.श. शेजवलकर यांच्या ऐतिहासिक संशोधनात्मक ग्रंथांव्यतिरिक्त किती ग्रंथ मराठीत प्रकाशित झाले याचा आढावा घेतला तर निराशाच पदरी पडेल. शेजवलकरांच्या ग्रंथापुर्वी ना. वि. बापटांची "पानिपतची मोहीम", भारताचार्य चिं. वि. वैद्य यांची "दुर्दैवी रंगु" आणि रियासतकार गो. स. सरदेसाई, वि. गो. दिघे, रा. वा नाडकर्णी इ. लेखकांचे काही मोजके लेख वगळता मराठीत या संग्रामाबाबत कसलेही सर्वांगीण विवेचन आढळत नाही, ही एक आश्चर्यकारक घटना आहे. वैद्यांची "दुर्दैवी रंगु" ही एका इंग्रज लेखकाच्या कादंबरीची मराठी आव्रुत्ती आहे व ती पुरेपुर रोम्यंटिसिझमने भरलेली आहे एवढेच. खरे तर पाश्चात्य देशात अशा दुर्दैवी युद्धाचे विविधांगांनी विचार करणारे लेखन झाले असते. वाटर्लू युद्धाबाबत असे शेकडो ग्रंथ फ्रांसिसी इतिहासकारांनी लिहिलेले आहेत.

कै. त्र्यं. शं. शेजवलकरानंतर १९८८ साली विश्वास पाटील यांनी आपल्या "पानिपत" या कादंबरीच्या माध्यमातुन पानिपतचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. आजमितीस या कादंबरीच्या किमान ३३ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि हे कादंबरीकाराचे नि:संशय यश आहे. मराठी बांधवांना पानिपतच्या शोकांतिकेचे अद्भुत आकर्षण आजही आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले. "पानिपत" कादंबरीच्या अखेरीस विश्वासरावांनी ६१ मराठी, दोन हिंदी, ४७ इंग्रजी संदर्भसाधनांची यादी दिलेली आहे. ही साधने प्रत्यक्ष तपासली असता माझे मत असे बनले आहे कि विश्वास पाटील यांनी शेजवलकरांच्याच ग्रंथाचा (पानिपत:१७६१) मुख्य आधार घेतला असुन बाकी दिलेली संदर्भसाधने वाचायचेही फारसे कष्ट घेतलेले दिसत नाहीत. घेतले असते तर त्यांचे प्रतिबिंब पडुन कादंबरी कदाचित वेगळी बनली असती. थोडक्यात विश्वास पाटील यांची कादंबरी म्हणजे बव्हंशी शेजवलकरांच्याच मांडणीचा कादंबरीमय विस्तार आहे.

खुद्द इतिहासकारांचा शेजवलकरांवर त्यांच्या "पानिपत: १७६१" वर आक्षेप असा आहे कि ते क-हाडे ब्राह्मण असल्याने त्यांचा कोकणस्थ...विशेषत: चित्पावनी ब्राह्मणांवर रोष होता व त्याचा अंश त्यांच्या याही ग्रंथात डोकावतो. हे खरेच आहे. शेजवलकरांचा ग्रंथ हा पक्षपाताने भरलेला आहे. त्यामुळे पानिपतचा इतिहास सांगतांना त्यांनी शाब्दिक कोलांट-उड्या मारलेल्या स्पष्ट दिसतात. उदा. सुरुवातीला भाऊसाहेब पेशव्यावर व त्याच्या योग्यतेवर टीका करणारे शेजवलकर आपल्याच ग्रंथाच्या उत्तरार्धात भाऊच्या प्रत्येक क्रुतीचे समर्थन करतांना दिसतात. हीच री विश्वास पाटील यांनीही ओढली आहे.

इतिहास हा भावनिक नसतो. तो प्रसंगी क्रुर, काटेरी आणि घटनांचे व त्यामागील कारणपरंपरेचे यथार्थ दर्शन घडवणारा असतो...असायलाच हवा. मग कोणाच्या रुष्टतेची वा खुशीची पर्वा नको. परंतु आपले इतिहासकार हे प्राय: भावनिक असल्याने व त्याला जातीय संदर्भ असल्याने पानिपत युद्धाची कारणमिमांसा तटस्थने कोणी केल्याचे उदाहरण नाही. अलीकडेच "पानिपतचा रणसंग्राम" हा सच्चिनानंद शेवडे यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला. पण तो अत्यंत जातीविशिष्ट द्रुष्टीकोनातुन लिहिला गेल्याचे अभिप्राय महाराष्ट्र टाईम्स सारख्या व्रुत्तपत्रात आल्याने, दखल घ्यावी असे नाविण्य त्यात काहीच नाही. उलट इतिहासाची मोडतोड आहे.

जर पानिपत युद्धातील पराजयामुळे एवढा हाहा:कार उडाला असा इतिहासकारांचाच अभिप्राय आहे तर त्या युद्धाची विविधांगी सखोल मीमांसा किमान माहाराष्ट्री इतिहासकार, विचारवंत वा कादंबरीकारांनी का केली नाही हा प्रश्न निर्माण होतो. इन मीन चार कादंब-या, एक-दोन नाटके...दोन इतिहास सांगणारे म्हणवणारे ग्रंथ आणि फुटकळ लेख सोडले तर पानिपतची सर्वांगिण चिकित्सा आजवर झालेली नव्हती. याला आपण आपल्याच इतिहासाबद्दलची अनास्था म्हणावे काय? असो.

खरे तर पानिपतचे सर्वांगिण आकलन करुन घेण्यात शेजवलकरांसहित सर्वच इतिहासकार आणि त्यानुकुल कादंब-या लिहिणारे रंजक लेखक कमी पडले एवढेच येथे नमुद करतो.

संजय क्षीरसागरांच्या या प्रस्तुत ग्रंथात असे वेगळे काय आहे कि मी शेजवलकरांसारख्या श्रेष्ठ इतिहासकारावरही टीका करत आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे. शेजवलकरांना जो जातीय अभिमान होता ज्यापोटी ते भाऊंवर तुटुन पडले आणि नंतर सावरुन घेण्याचा प्रयत्न केला तसे काही या इतिहासकाराने केलेले दिसुन येत नाही. या ग्रंथात अत्यंत तारतम्याने, शेकडो संदर्भ देत, पानिपत युद्धापर्यंतचा आणि नंतरचा प्रवास अत्यंत तटस्थतेने नोंदवत ज्याचे माप त्याच्या पदरी घातले आहे. भाऊवरील जेही आक्षेप इतिहासकारांनी घेतले आहेत, वा कादंबरीकारांनी ज्या आक्षेपांना रोम्यंटिक बनवले आहे, त्यांचा मुळातुन वेध घेत खरे आक्षेप कोणते आणि खोटे आक्षेप कोणते हेसुद्धा पुराव्यांनिशी स्पष्ट केले आहे.

पानिपत युद्धाबाबत अनुत्तरीत प्रश्न अनेक आहेत. त्याहीपेक्षा पानिपतपुर्व...अगदी भाऊ उत्तरेला जायला निघाला तेंव्हा उत्तरेत शिंदे-होळकर काय करत होते...? त्यांनी अब्दालीला कसे सळो कि पळो करुन सोडत तह करायला भाग कसे पाडले? खुद्द भाऊसाहेब पेशव्याला नानासाहेबांनी नेमके काय अधिकार दिले होते? पानिपतच्या पराजयाची नेमकी कारणे काय? पानिपत युद्धातील पराजयामुळे मराठ्यांचा उत्तरेतील प्रभाव खरेच नष्ट झाला काय? या व अशा असंख्य प्रश्नांवर ऐतिहासिक उपलब्ध साधनांच्या आधारे, माझ्या मते, आजतागायत कोणत्याही पानिपतविषयीच्या इतिहासकारांनी मांडणी केल्याचे दिसुन येत नाही. परंतु हा सर्व इतिहास व साधार विवेचन या ग्रंथात आलेले आहे. पानिपत येथील मुक्काम काळात आणि खुद्द पानिपत युद्ध ज्या १४ जानेवारी १७६१ रोजी घडले त्या दिवशीचा साद्यंत व्रुत्तांत ज्या पद्धतीने या तरुण इतिहासकाराने दिला आहे तो अत्यंत प्रशंसनीय असाच आहे. असा प्रयत्न अगदी शेजवलकरांनी वा अन्य कोणत्याही पानिपत इतिहासकाराने केलेला नाही. याबाबत प्रत्यक्ष पुरावे जवळपास अत्यल्प असले तरी त्या धामधुमीचे कालनिहाय वर्णन करत अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. उदाहरणार्थ. शिंदे व होळकर यांची गोलाचा लढाईत गोलाच्या पश्विम बाजुला, हुजुरातीपासुन किमान ३ किलोमीटर दूर नियुक्ती केली होती तर मग जनकोजी शिंदे आणि होळकरांचा महत्वाचा सरदार संताजी वाघ हे हुजुरातीत, एवढ्या धुमश्चक्क्रीतही एवढे अंतर ओलांडुन का आणि कसे आले? भाऊ आणि संताजी वाघ यांची प्रेते शेजारी सापडावी याचा नेमका अन्वयार्थ काय? होळकर खरेच आधीच निघुन गेले असते तर त्यांचाच सरदार संताजी वाघ भाऊसोबत कसा मेला?

प्रश्न एवढेच नाहीत. अनेक आहेत. संजय क्षीरसागर यांनी पानिपत युद्धाच्या संदर्भात जवळपास सर्वच प्रश्नांचा उपलब्ध पुराव्यांच्या प्रकाशात वेध घेतला आहे. तत्कालीन सर्वच पत्रे, बखरी, मराठी ते फारसी साधने यांतील ठिकठिकानी उद्घ्रुते देत, जरी अनेक साधनांत विसंगती असल्या तरी त्या टिपत त्याचेही विश्लेशन करत तर्कबुद्धीने आपले निष्कर्ष वाचकांसोबत ठेवले आहेत.

माझ्या मते आजवर पानिपतबाबत एवढा सखोल संशोधन मांडणारा ग्रंथ झालेला नाही. एकतर शेजवलकरंवर जसा जातीय द्रुष्टीकोणाचा आरोप झाला तसा प्रकार या ग्रंथात कोठेही आढळुन येत नाही. या संशोधकाने उपलब्ध साधनांतुन शक्य तेवढा प्रामाणिक अर्थच काढला आहे. आणि लेखकाचा नि:ष्कर्ष पटला नाही तरी त्यांनी ठाई-ठाई मुळ संदर्भासाधनांतील उद्घ्रुतेच दिली असल्याने प्रत्येक वाचक आपापले निष्कर्षही सहज काढु शकतो...इतिहासकाराच्या मतांशी असहमत राहण्याचा अधिकार राखु शकतो...

आणि यालाच इतिहासलेखन म्हणतात. मी या तरुण इतिहासकाराला शुभेच्छा देतो.
धन्यवाद.

-संजय सोनवणी

SPACE STRESS THEORY & CREATION OF THE UNIVERSE (3)

Why Space essentially is only element?


We have seen in previous chapters that the present theories about creation of the universe assume space abundant and matter finite at the event moment of the bang. Also we have seen the theories doesn’t explain origin of that matter, no matter how condensed it were with the forces held inside within.

I have also explained that space has qualities. In Quantum mechanics and also in quantum field theory it is well accepted that the matter “somehow” modifies the space around it. However it fails to explain if the space has no qualities of its own, is nothing but space, how it can be modified just because of the presence of the matter?

Neither theory explains origin of the matter and forces, though they are considered to be unified before creation of the universe and separated after Big Bang.

Super String theory, which we will be discussing later, is more complicated, raising more questions on its validity than answering any fundamental questions.


My theory proposes that pre-presence of matter and forces for creation of the universe is unwarranted.

Because the matter is nothing but the modified form of the space.

Space=matter

This is why there cannot be space abundant and matter finite. There can’t be available abundant space to consume rapid expansion of the universe. It is simply because the matter is always in proportion to the space.

All the forces (electro-magnetic, weak and strong nuclear and gravitation) are in fact pseudo forces. This may sound surprising. But these forces have been generated in the process of initial formation of the universe to keep balance in imbalance. However we shall discuss on this at later stage.



The space we are talking about when there was no single object to define geometry of the universe, I call it Primordial Non-Geometric space. We cannot compare the present space to the original space as present space, though seem vacant, is filled up with the forces. We experience that the space is vast and matter limited, no matter how far we peep into the depth of the faraway universe. Even if we examine any solid block of the matter, we shall find there is moreover space within the matter and if we cut the block to the atomic level we shall find there was almost space and no solid matter ever existed. Even within the atom, we come across pseudo particles; those in fact are not particles but modified spacelets of different qualities. My friend and physicist Randall Raus tells me that if we consider nucleus of an atom of the size of football, the electrons surrounding it will be about two thousand miles. So, we can see there is only space but in modified form that we see as matter.

Hence there couldn’t be any matter pre-existent as we can see clearly that matter is nothing but modified form of the space, coupled with the forces.

We also can see that the forces and matter (Modified Space) cannot be separated. In absence of matter there are no forces.

This needs to be understood. The big bang theory considers that the forces and matter were unified within the highly dense of almost zero size matter and after the bang the forces took separate paths. As to gravitation, being only negative force, several theories popped up to clarify its existence. Einstein in his General Theory of Relativity explained Gravitation in different manner…i.e. Space Time curvature. Here too Einstein considers space has some type of curvature coupled with Time that causes movements of the objects circulating masses of huge size. Here I wonder why Einstein, who too explains space being infinite and of no qualities of its own, could make this statement to explain gravitation? This was rather bold statement, but somehow assists to my theory that no matter in what context Einstein accepts space can be curved when coupled with Time.

To sum up present chapter, we can safely conclude that:

a. Space has innate qualities and matter is nothing but modified form of the space.
b. Hence Space=matter equation stands. This means Space and matter are finite, entangled with the forces to exhibit present of the Universe. There cannot be any space available to consume expansion of the universe. Hence the expansion of the universe derived by the scientists through mere observations is an optical illusion caused by the Gravitational Triangles. (On which I will be writing separate chapter.)
c. Forces are an outcome of the process of balancing betwen the space and modified space (positive+Negative) and they have no separate independent existence.
d. Universe is made of the space within the space and no mateer infact exists in the universe.


In next chapter we shall deal with how primordial space converted to the present universe? Did Time ever existed prior to the creation or whether it always was existant in different form? What is Time after all?

Please bear with me till I write next chapter. Meanwhile your valuable ideas shall be of a great help. Thanks.

Sunday, April 15, 2012

विठोजीराजे होळकरांची एवढी क्रुर हत्या का?

(आज १६ एप्रिल २०१२ रोजी विठोजीराजे होळकर या स्वातंत्र्यप्रेमी उठावकर्त्याला क्रुरपणे ठार मारल्याचा २११ वा बलिदान दिन...हे का आणि कसे झाले यावर प्रकाश टाकणारा हा लेख!)


अन्यायी-अत्याचारी राजव्यवस्थांविरुद्धचे उठाव जगाला नवे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही, प्रसंगी आप्तस्वकियांशीही संघर्ष करत मोगल राज्यव्यवस्थेविरुद्ध उठाव करुन स्वराज्याची स्थापना केली होती. सर्वच उठाव यशस्वी होत नाहीत. अयशस्वी बंडखोरांना पकडुन कैदेत टाकने अथवा ठार मारल्याच्या घटनाही अगणित आहेत. परंतु अशाच स्वातंत्र्यासाठी उठाव केलेल्या विठोजीराजे होळकर यांना मात्र जी क्रुरातिक्रुर शिक्षा दिली गेली तिला ग. ह. खरेंसारख्या इतिहास संशोधकानेही "अत्यंत नीच दर्जाचा खुनशी सुड" असे संबोधले आहे, कारण जगाच्या इतिहासात अशी शिक्षा कोनालाही दिली गेल्याचे उदाहरण नाही.

का दिली गेली अशी शिक्षा? काय पार्श्वभुमी आहे या शिक्षेची? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी थोडे इतिहासात जावे लागेल. तुकोजीराजे होळकरांच्या म्रुत्युनंतर होळकरांची सर्व संस्थाने हडपण्याचा दुसरा बाजीराव व दौलतराव शिंद्यांनी घाट घातला. त्याची सुरुवात म्हणुन दुसरे मल्हारराव होळकर या पराक्रमी वारसाची पुणे येथे मारेकरी घालुन १४ सप्टेंबर १७९७ रोजी पुणे येथे मल्हाररावांची हत्या केली गेली. विठोजीराजे व यशवंतराव होळकर या भावंडांना जीव वाचवण्यासाठी अक्षरश: पळुन जावे लागले. सारी होळकरी संस्थाने दौलतरावाने घशात घातल्याने ती पुन्हा जिंकुन घेण्याखेरीज यशवंतरावांसमोर पर्याय राहिला नाही. खानदेशात मुक्कामी असता खुद्द नाना फडनविसाने होळकर बंधुंना साकडे घातले कि बाजीरावाच्या नादानीने रयतेची रया गेली आहे. दौलतरावाचे पेंढारी सर्वत्र रयतेचीच लुट करत आहेत. सामान्य स्त्रीयांचीच काय सरदारांच्या बायकांची अब्रुही शनिवारवाड्यात लुटली जात आहे, तेंव्हा दुस-या बाजीरावास हटवुन अम्रुतरावास अथवा मनास येईल त्यास पेशवा करावे व रयतेला सुखाचे दिवस दाखवावेत. मराठेशाहीत खुद्द पेशवाच लुट करत होता.

स्वत: होळकरांनी हा अन्याय डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला असल्याने व त्या दोघा भावंडांच्या बायका व नवजात मुलेच नव्हे तर होळकरी गादीचा वारस अल्पवयीन खंडेरावही शिंद्यांच्या कैदेत असल्याने त्यांच्याही मनात बाजीरावाबद्दल चीड होतीच. परंतु आधी उत्तर हिंदुस्तान स्वतंत्र करायचा हे यशवंतरावांचे ध्येय असल्याने त्यांनी दक्षीणेची जबाबदारी विठोजीराजेंवर सोपवली. त्यानुसार विठोजीराजे अवघी तीन-चारशे स्वारांची फौज घेवुन पुण्याकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक असंतुष्ट छोटे-मोठे सरदारही सामील झाले. मग विठोजीराजेंनी एकामागुन एक पेशवे व शिंद्यांची ठाणी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कर्नाटक ते पार आंध्रापर्यंत धडका मारल्या. संपुर्ण महाराष्ट्र पेटला. खुद्द अम्रुतराव पेशव्यांनी विठोजीराजेंना सनदा लिहुन दिल्या. नाना फडनविसाचा मागुन पाठिंबा होताच. या प्रकाराने हबकलेल्या पेशव्याने नानाला अटक करुन मग बालक्रुष्ण बावनपागे या सरदारास प्रथम विठोजीराजेंवर पाठवले. परंतु खुद्द बावनपागेंचा बाजीरावाच्या अन्यायी वर्तनाचा रोष असल्याने ते विठोजीराजेंनाच सामील झाले. याशिवाय येसाजी रामक्रुष्ण, बाजीबा व क्रुष्णराव मोदी असे अनेक शिंद्यांचे सरदारही येवुन सामील झाले. या सर्वांचे नेत्रुत्व स्वीकारत विठोजीराजेंनी सोलापुर, करकुंभ, पंढरपुर अशी अनेक स्थाने त्यांनी मुक्त केली. दरम्यान बाजीरावाने सरदार पानशांना विठोजीराजांचे व त्यांना सामील सरदारांचे पारिपत्य करायला पाठवले. पण सोलापुर येथे विठोजीराजांनी पानशांचा पुर्ण पराभव केला. इतका कि पानशांना तोफखाना सोडुन पळुन जावे लागले. हीच गत बाळाजीपंत पटवर्धन या पेशव्याच्या सरदाराची झाली.
आता आपली पेशवाई रहात नाही हे लक्षात येताच बाजीरावाने १८०० च्या डिसेंबरमद्धेच इंग्रज रेसिडेंट क्लोजमार्फत इंग्रजांचे संरक्षण मिळवायचा प्रयत्न सुरु केला. हे समजल्यावर विठोजीराजे अजुनच चवताळले...त्यात नाना फडनविसाला बाजीरावाच्या छळामुळे म्रुत्यु झाला होता. त्याच्या विधवला कैदेत टाकुन त्याची सारी संपत्ती जप्त केली होती. सारी जनता व सरदारही नाराज झालेले होते.

अशात इंग्रजांशी पेशव्याने करार केला तर स्वराज्य बुडाले हे विठोजीराजांना समजत होते. यशवंतराव होळकरही या व्रुत्ताने अस्वस्थ झाले. त्यांच्या सल्ल्याने विठोजीराजे वेगाने पुण्याच्या दिशेने निघाले. बाजीराव हे व्रुत्त समजताच घाबरला. त्याने तातडीने नाना पुरंदरे, गणपतराव पानसे व बापु गोखले या मातब्बर सरदारांना सर्व फौजेनुसार विठोजीराजेंना अटकाव करण्यास पाठवले. मार्च १८०१ मद्धे जेजुरीजवळ उभयपक्षांमद्धे धमासान युद्ध झाले. या युद्धात विठोजीराजेंचा पराजय झाला. त्यांना अटक करुन पुण्यात आणण्यात आले. विठोजींना क्रुर शिक्षा द्यायचा दुस-या बाजीरावाचा बेत आहे हे समजताच नरसिंह विंचुरकर हे मातब्बर सरदार धावत बाजीरावास भेटण्यास आले व विठोजीराजांना मारु नये अशी विनवणी केली. पण रियासतकार सरदेसाई यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे..." परंतु व्यसनांध मनुष्याप्रमाणे बाजीरावाने विंचुरकरांचे म्हणणे झिडकारले...." बाजीराव त्याकाळी सर्वस्वी सर्जेराव घाटगे, बाळोबा कुंजीर व दौलतरावाच्या आहारी गेलेला होता. त्याने विठोजीराजेंना शिक्षा काय द्यायची याची विक्रुत आखणी करुन ठेवलेली होती.

अवघ्या सत्ताविस वर्षांच्या विठोजीराजेंना १६ एप्रिल १८०१ रोजी शनिवारवाड्यासमोर आणले गेले. बेड्या तोडल्या व अपमानित करत मार मार मारले. मग वेळुच्या फोकाने (कमचा) पाठीवर दोनशे फटके मारले. हे द्रुष्य त्यांची पत्नी व कोवळा मुलगा असहाय्यपणे पहात, वर नगारखान्यात बसलेल्या व या द्रुष्याची मौज घेणा-या बाजीरावाला, आक्रोश करत विठोजीराजांचा छळ करु नये अशा विनवण्या करत होती. पुणेकर हतबुद्ध होवुन हे द्रुष्य पहात होते...पण बाजीरावाला दया आली नाही. वेळुच्या फोकाने मारुन झाल्यावर विठोजीराजांना हत्तीच्या पायी बांधण्यात आले...संपुर्ण शनिवारवाड्याभोवती फरफटवत प्रदक्षणा घालण्यात आली. या द्रुष्याचा तत्कालीन एक लेख सांगतो कि एवढा मार बसुन वा फरफटवले जात असतांनाही विठोजीराजांनी कसलीही दयेची भीक मागितली नाही. पुन्हा शनिवारवाड्यासमोर आल्यानंतर जसा बाजीरावाने इशारा केला, हत्तीच्या पायाखाली त्यांचे मस्तक-शरीर चिरडुन त्यांना ठार मारण्यात आले.

ही विटंबना येथेच संपली नाही. आपल्या द्रुष्टीसुखासाठी बाजीरावाने विठोजीराजेंचे छिन्न-भिन्न प्रेत तसेच २४ तास शनिवारवाड्यासमोर उघड्यावर पडु दिले. खरे तर पेशवाईच्या अस्ताची ही म्रुत्युघंटा होती. विठोजीराजांचे क्रियाकर्म त्यांच्या कारभा-यांच्या विनवण्यानंतर करायला परवानगी मिळाली. पत्नीला सहगमन करण्याची परवानगी नाकारुन तिला पुन्हा कैदेत टाकण्यात आले. तिची व आपल्या पत्नीची मुक्तता नंतर यशवंतरावांनी केली.

का?

बाजीराव हा मुळात खुनी राघोबादादाचा पोरगा. राघोबादादाने कोवळ्या वयाच्या नारायणराव पेशव्याचा खुन घडवुन आणला. सवाई माधवराव वेडाच्या भरात आत्महत्या करुन मेला. बाजीरावाचे बालपण कैदेतच गेले...कारण बापाचे पाप. त्याला पेशवाई मिळाली ती दौलतराव शिंद्यांमुळे. दौलतरावही स्वार्थी. समानशीलेशु अशी युती जुळाली. बाजीरावाचा स्वभाव संशयी. तो विषयांध एवढा कि कोणा सरदाराची स्त्री त्याने सोडली नाही. त्याचा सासरा सर्जेराव घाटगेही त्याला स्त्रीया पुरवायचा धंदा करायचा.

अहिल्याबाईंवर चालुन जात त्यांची संस्थाने जिंकुन घ्यायचा अयशस्वी पराक्रम राघोबादादाने केला होताच. त्यांचा व नंतर तुकोजीराजेंचा म्रुत्यु झाल्यानंतर आता तरी होळकरी संस्थाने हडपता येतील हा बाजीराव व दौलतरावाचा होरा होता. त्यासाठी त्यांनी काशीराव या अत्यंत दुर्बळ वारसाला हाती धरत दुस-या मल्हाररावाची हत्या केली. यशवंतराव व विठोजीराजेंना आपण हा हा म्हणता नेस्तनाबुत करु याचा त्यांना विश्वास होता. पण तसे व्हायचे नव्हते. उत्तरेत यशवंतरावांनी शिंद्यांचा धुव्वा उडवायला सुरुवात केली तर इकडे विठोजीराजेंनी महाराष्ट्रात खुद्द पेशव्यावर संक्रांत आणली. शिंदे व पेशव्यांचे जवळपास अकरा सरदार विठोजीराजेंना मिळाले. त्यात नाना सारख्या मुत्सद्द्याचा त्यांना पाठिंबा. असे घडत राहिले तर आपली पेशवाई गेल्यात जमा आहे हे न समजण्याएवढा बाजीराव मुर्ख नव्हता. सन अठराशेत नानाचा त्याच्या छळानेच म्रुत्यु झाला असला तरी नानाचे समर्थक राज्यभर हयात होतेच व त्यांचा अप्रत्यक्ष/प्रत्यक्ष पाठिंबा विठोजीराजेंच्या उठावाला होताच!

विठोजी पराक्रमी आहे हे त्याने अनुभवले होतेच. त्याच्या सरदारांतही गळती सुरु झालेली होतीच. अशात त्याच्या सुदैवाने विठोजीराजे त्याच्या हाती लागल्यानंतर त्याने संपुर्ण उठाव चिरडण्यासाठी या क्रुर हत्येचा निर्णय बाळोबा कुंजराच्या सल्ल्याने घेतलेला दिसतो. पण हा निर्णय त्याला नव्हे...तर स्वराज्यालाच महाग पडला. त्याने अवघा महाराष्ट्र दुखावला. स्वराज्यावरचे लोकांचे प्रेम संपले. महारक्ख समाज तर बाजीरावाच्या भयंकर जाचाने तुटला होताच. यशवंतरावांसारख्या महामानी माणसाला दुखावले...यशवंतरावांनी बाजीरावाला पुण्यातुन पळुन जायला लावले. यशवंतराव दयाळु म्हणुन बाजीराव वाचला...अन्यथा बाजीरावाचा अंत यशवंतराव लीलया घडवुन आणु शकत होते...आणि त्यांना अटकाव करु शकेल अशी शक्ती त्यावेळी इंग्रजांहातीसुद्धा नव्हती...महारक्खांनी मग १८१८ च्या भीमा कोरेगांवच्या लढाईत त्याचा पुरेपुर सुड घेतला... पळपुटा बाजीराव पळत सुटला तो सुटलाच...नारायणरावाच्या भुताने शेवटी त्याला त्रस्त केले. कर्नल मनोहर माळगांवकर म्हनतात...एवढा क्रुर, सुडी, निघ्रुण प्रव्रुत्तीचा पेशवा मराठेशाहीला लाभावा हे मराठी साम्राज्याचे दुर्दैव होय...आणि ते खरेच आहे.

विठोजीराजांना क्रुरपणे मारण्याच्या बाजीरावाच्या या नादान क्रुतीमुळे स्वराज्य एका रयतेच्या हिताची चाड असना-या स्वातंत्र्यप्रेमी महावीरास मुकले. "तुकोजी होळकराचे तिन्ही मुलगे पराक्रमी असता त्यांचा उपयोग बाजीरावाने राष्ट्रकार्यासाठी केला नाही, हे पाहुन उद्वेग वाटतो..." हे रियासतकारांचे मत अत्यंत योग्य असेच आहे. आज या महावीराच्या २११व्या कटु स्म्रुतीदिनानिमित्त विठोजीराजे होळकरांना विनम्र अभिवादन.

-संजय सोनवणी




Saturday, April 14, 2012

मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास!


Image result for salt pans in mumbai


मीठ हा आज सर्वांना अतिपरिचयामुळे अत्यंत सामान्य वाटणारा पदार्थ...पण मीठाखेरीज माणुस जगू शकत नाही...त्यामुळेच मीठाचा शोध हा मानवी संस्क्रुतीतील सर्वात महत्वाचा क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपुर्वी जेंव्हा शिकारी मानव होता त्या काळात शरीरातील मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचे प्रथम रक्त पिवून शरीरातील मीठाची गरज भागवत असे अथवा लवणयुक्त माती खात असे. पुढे उपलब्ध असेल तेथील खनीज मीठ (सैंधव) वापरात आणले गेले. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असल्याने अर्थात ते प्रचंड महाग असे. एके काळी सोन्यापेक्षाही अधिक किंमत मीठाला मिळत असे. मीठामुळे जगात अनेक युद्धे झालेली आहेत. साम्राज्ये बनली आहेत गडगडली आहेत. जगातील सर्वात प्राचीन व्यापार हा मीठाचा होता. मीठ उपलब्ध असलेल्या प्रदेशांवर स्वामित्व स्थापित करण्यासाठी घनघोर युद्धे होत असत. आपल्याला आता सिल्क रुट्स माहित आहेत, पण जगातील व्यापारी मार्ग प्रचीन काळी साल्ट रुट्स (मीठमार्ग) म्हणुन ओळखले जात. रोममद्धे तर सैनिकांना पगार मीठाच्या रुपातच दिला जात असे, त्यामुळेच आजचा स्यलरी (salary) हा शब्दही मुळच्या salt पासुन तयार झाला आहे. मीठाने खाद्य संस्क्रुतीत क्रांती तर घडवलीच पण मानवी आरोग्यही सुद्रुढ व्हायला मोलाची मदत झाली. ज्याचे मीठ खाल्ले आहे त्याच्याशी बेईमानी करणे हा नैतीक गुन्हा मानला जावू लागला, एवढे मीठाचे सांस्क्रुतीक महत्व वाढले. धर्मकार्यातही मीठ हा महत्वाचा घटक बनला. इतकेच नव्हे तर भुता-खेतांना, अभद्र प्रकारांना टाळण्यासाठीच्या तांत्रिक विधींमद्धेही मीठाला महत्वाचे स्थान मिळाले. मीठामुळे मांस-मासे ते नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी मोलाची मदत झली. म्रुतांचे ममीफिकेशन करत प्रदिर्घकाळ शरीररुपाने टिकवण्यासाठीही मीठाचा उपयोग झाला. एका अर्थाने मानवी संस्क्रुती ही मीठाच्या शोधामुळे आमुलाग्र बदलली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

मीठ हा नेहमीच जागतीक राजकीय इतिहास व्यापुन राहिला आहे. इंग्रज सरकारला हादरवून सोडनारा भारतातील महात्मा गांधींचा मीठाचा सत्याग्रह कोण विसरेल? मीठावर कर बसवला म्हणुनच! मीठ हे मानवी संस्क्रुतीच्या अत्यंत प्राथमिक काळात कर बसवले गेलेले एकमेव उत्पादन आहे. मीठांच्या खानींवर व मीठागरांवर देखरेख करायला "लवणाध्यक्षा" ची नेमनुक कशी करावी याबाबत कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही निर्देष आहेत. चीनमद्धे इसपुच्या तिस-या सहस्त्रकातील मीठावरील व्यापार, कर, मीठाचे प्रकार याबाबत सर्वात प्राचीन लेख मिळतो. याचे कारण म्हणजे मीठ हे त्या काळात गरजेपेक्षा कमी उपलब्ध होते आणि ज्याचे मीठावर स्वामित्व त्याचे साम्राज्य अशी परिस्थिती होती.

भारतात फार पुर्वी हिमालयाच्या भागात नैसर्गिक खानींतुन मिळनारे मीठ तेवढे माहित होते. पुढे समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवायचा शोध इसपुच्या ५००० वर्षापुर्वी लागला असे गुजरातेतील ढोलवीरा येथे झालेल्या उत्खननातुन दिसते. समुद्राच्या (सिंधु) पाण्यापासुन निर्माण केले गेले ते सैंधव असे असंख्य उल्लेख आपल्याला आपल्या पुरातन साहित्यांतुन आढळतात. अर्थात समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवण्याचा शोध मत्स्यमारी करणा-या लोकांनीच लावला. जमीनीवर आलेले समुद्राचे खारे पाणी वाळले कि मीठाची स्फटिके मिळतात आणि ते खाद्यसंस्क्रुतीत उपयुक्त ठरते हे निरिक्षण कामी आले आणि मीठाचीच शेती करण्याची पद्धत शोधली गेली.

भारतात मीठाचा अमोलिक, सर्व मानवी जीवनाला आवश्यक आणि उपकारक असा शोध कोलीय समाजाने लावला. सर्वप्रथम हा शोध लागला तो कच्छ प्रांतात, मग हळु हळु जेथे जेथे अनुकुल किनारे व वातावरण होते तेथे हा मीठशेतीचा उद्योग विस्तारत गेला. कोळी समाजातील जी कुटुंबे मीठशेतीकडे वळाली त्यातुनच आगरी समाजाचा उदय झाला. आगर या प्राक्रुत शब्दाचा सरळ अर्थ आहे बाग वा शेत. नारळी-पोफळींच्या बागांबरोबरच जेथे मीठ "पिकवले" जात होते त्याला अर्थातच मीठाची बाग... मीठागर म्हटले जाणे स्वाभाविक होते. या आगर शब्दातुनच "आगरी" या शब्दाचा उगम झाला असल्याचे स्पष्ट दिसते. याचाच दुसरा अर्थ असा कि कोळी व आगरी हे मुळचे एकच! कोळी व आगरींचे मुळचे ऐक्य सांगणारी एक पुराणकथाही येते. अगस्ती मुनीच्या आंगले आणि मांगले या दोन पुत्रांपासुन क्रमश: आगरी आणि कोळी समाज निर्माण झाले अशी ही कथा सांगते. त्यातील पुराणकारांचा मित्थकथा बनवण्याचा हव्यास सोडला तरी हे दोन समाज आधी एकाकार होते हे पुराणकारालाही माहित होते हे स्पष्ट होते अणि ते खरेही आहे.

कोळी समाज देशभर आढळतो. या समाजाचेही मुळ रुप काय हेही येथे पाहणे आवश्यक आहे. या समाजाचे मुळ हे "कोलीय" या भारतातील अतिप्राचीन अशा मानवगणाकडे जाते. भारतात प्राचीन कालापासुन अनेक मानव गण वावरत होते, त्यापैकी हा एक. हा पुरातन मानवी घटक देशभर विखुरलेला होता, भारतात कोलीय (कोलीयक) नांवाची अनेक गांवे नेपाळ, राजस्थान, झारखंड, ओरीसा ते केरळ-तमिळनाडुपर्यंत आढळतात व ती त्यांच्या देशव्यापी अस्तित्वाची कल्पना देतात. कोलीय हे फक्त मत्स्यमार नसुन ते वीणकर ते क्रुषिकार्यही करणारे होते. त्यातील समुद्रकिनारी वसलेल्यांनी सागरी मत्सोद्योगही होवू शकतो याचा अंदाज घेत पहिल्या नौका बांधल्या व सागरी मासेमारी सुरु केली. जाळ्यांचा शोध त्यांना उपयुक्त ठरला कारण ते कुशल वीणकरही होते. हे शोध त्यांच्या अन्नाच्या, भरणपोषणाच्या निकडीमुळेच लागले. पुढे काही शतकांतच प्रत्यक्षानुभवामुळे समुद्राच्या खारट पाण्यापासुन मीठाचे उत्पदन होवू शकते हा शोध लागला. या शोधांतुन नव्य अन्नोद्योग तर सुरु झालाच, पण त्यांच्याच नौकाशास्त्रातुन पुढे विदेश व्यापार सुरु झाला. अर्थात प्राथमिक निर्यात होणारे उत्पादन होते ते म्हनजे मीठ व खारवले गेलेले मांसान्न. पुढे त्यातुन बलाढ्य अशी भारतीय आरमारे सुद्धा उभी राहिली. मुळात हा समाज दर्यावर्दी असल्याने नौकानयनाच्या शोधाचे श्रेयही याच समाजाला द्यावे लागते. नौकानयनामुळे नुसते मीठच नव्हे तर अन्यही उत्पादने निर्यात होवू शकत होती. भारतात दहाव्या शतकापर्यंत जी सम्रुद्धी दिसते त्याचे मुलकारण या नौकानयनात साधल्या गेलेल्या प्रगतीत आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

सह्याद्रीच्या कड्यांतुन जे घाट निर्माण केले गेले ते पुरातन मीठमार्गच होते. वंजारी समाज या मार्गांनी मुख्यत्वाने मीठच जनावरांवर लादुन घाटावरील मीठाचे दुर्भिक्ष असणा-या प्रदेशात भटकत रहात मीठ पुरवत असत. या समाजाचाचेही भारतीय संस्क्रुतीला महान योगदान आहे.

सिंधु संस्क्रुतीपासुनच (इसपु ४२००) भारताचा जागतीक व्यापार सुरु झाला होता. लोथल या क्रुत्रीम बंदराची सिंधुकाळातील पुरातन निर्मिती हा कोलीय समाजाने निर्माण केलेला आश्चर्याचा अद्भुत असा नमुना आहे. कोकणातली चेउल सारखी अनेक प्राचीन बंदरे (इसपु २२३) आजही या समाजाच्या सागरव्यापाराची आणि विजिगिषु व्रुत्तीची साक्ष देतात. इजिप्त, सुमेर, अरबस्तान व अन्य युरोपीय देशांशी त्यांचा व्यापार होत होता. मीठ हे अर्थातच महत्वाचे उत्पादन होते व त्याच बरोबर अन्य भारतीय वस्तुही आपसुक निर्यात होवू शकल्या. यामागे कोळी-आग-यांची अपार कल्पकता होती. साहस होते. भारतातुन सोण्याचा धुर निघत होता असे आपण मानतो, जे सत्यही आहे, पण जर मुळात हे शोध लावलेच गेले नसते तर?

कोकणातील आरंभीच्या सत्ता याच समाजाच्या होत्या. कुडा-मांदाड येथील लेण्यातील शीलालेखात तत्कालीन स्थानिक सत्ताधा-यांचा उल्लेख येतो. ते आगरी कोळीच आहेत. इसवीच्या सहाव्या शतकात तर आगरी-कोळी  यांची कोकणावर संयुक्त सत्ता होती. (संदर्भ: बोंबे प्रेसिडेन्सी ग्यझेट-कोलाबा जिल्हा आणि एच. डी. सांकलिया) किंबहुना नंतरच्याही सत्ता यांच्या मदतीखेरीज या भुभागावर राज्यच करु शकल्या नाहीत असेच इतिहास सांगतो.

सातवाहन काळापासुन (इसपु २२०) महाराष्ट्राचे लष्करी आरमारही बलाढ्य बनल्याचे दिसते. यात खरा हातभार कोळी-आगरी लोकांचाच होता. हे आरमार एवढे बलाढ्य होते कि सातवाहनांनी आगरी-कोळी बांधवांच्या मदतीने श्रीलंकेचाही पराभव करत तेथवर सत्ता पोहोचवली. एवढेच नव्हे तर सातवाहनकालीन व आजच्या मराठीचे मुळ असलेल्या माहाराष्ट्री प्राक्रुताच्या मुळ रुपाला आगरी बांधवांनी आपल्या आगरी भाषेत कटाक्षाने जपलेले दिसते.

वैदिकांनी जरी पुढे सिंधुबंदी नामक अत्यंत अनिष्ट प्रकरण पुढे आणले असले तरी नौकानयन या समाजाने सुरुच ठेवलेले दिसते. त्याचाच उपयोग सोळाव्या शतकात छ. शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार उभारायला झाला. याचा दुसरा अर्थ असा कि हा समाज वैदिक संस्क्रुतीच्या प्रभावात कधीच आला नाही. त्यांनी समुद्रबंदीचा फतवा मान्य केला नाही. पुढे सरखेल कान्होजी आंग-यांच्या रुपाने इतिहासाला एक महानायक मिळाला. आगरी-कोळी समाजाचे आरमारी युद्धतंत्र त्यांच्या काळात कळसाला पोहोचले. समुद्राचीच संगत पुरातन कालापासुन असल्याने सागरी किल्ल्यांची संकल्पनाही याच समाजाने खुप आधी विकसीत केली होतीच. हे आधीचे सागरी किल्ले बनवले गेले ते सागरी चाच्यांना तोंड देण्यासाठी व व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांचा उपयोग स्वराज्याला केवढा झाला हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आजच्या सर्वच सागरी किल्ल्यांच्या निर्मितीचे खरे श्रेय आगरी-कोळी समाजालाच द्यावे लागते ते यामुळेच. पण पुढे नानासाहेब पेशव्याने आंग्र्यांचे आरमार बुडवण्याची घोडचुक केली आणि इंग्रज-पोर्तुगीजांना मोकळे रान मिळाले हा दुर्दैवी इतिहासही येथे विसरता येत नाही.

कोळी हे कोलीय या गणाचे लोक. हे कोलीय कोण होते, याचाही विचार येथे करायला हवा. कोलीय वंश जरी भगवान बुद्धांमुळे आज माहित असला तरी त्या वंशगटाचा उगम हा सिंधुपुर्व संस्क्रुतीतच आढळतो. व्यास-वाल्मिकी हे आद्य महाकवी याच कोलीय समाजाने दिले हेही येथे आवर्जुन नमुद करुन ठेवतो. सिंधुकालीन नौका (ज्या तशाच प्रकारे आजही सिंध प्रांतात बनतात) बनवण्याची रीत या कोलीय लोकांनीच शोधली. कोलीय वंश हा मुळचा शैव मात्रुसत्ताक पद्धती पाळनारा समाज होय. त्यांची स्वतंत्र गणराज्ये होती व ती त्यांच्या वंशाच्या नांवानेच ओळखली जात असत. मुळचे कोलीयच असल्याने व विशिष्ट भागांतच एकवटल्याने पुरातन मात्रुसत्ताक पद्धतीचे अंश आजही आगरी समाजाने जतन केले आहेत. अन्य समाजगटांपेक्षा वैदिक संस्क्रुतीचा पगडा दूर ठेवण्यात त्यांना यश आले ते त्यामुळेच! त्यांच्या देवता प्रामुख्याने मात्रुदेवताच असून (उदा. एकवीरा, मंबाई, गोराई, इ.) त्यांच्यात हुंडा देणे-घेणे पुर्णतया अमान्य आहे. एवढेच नव्हे तर समाजाची पंचायत ही फक्त देवीमंदिरासमोरच भरते. घरातील आर्थिक व्यवहार हे आजही सर्वस्वी स्त्रीयांच्याच हाती असतात. गणसत्ताक पद्धतीचेही त्यांनी अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपलेले वैशिष्ट्य असे कि आगरी खेड्यांत आगरी सोडुन अन्य माणुस औषधालाही सापडत नसे. आगरी पंचायतच सामाजिक निर्णय एकत्रीतपणे घेत असे. बाह्य सत्तांना त्यात जवळपास प्रवेशच नव्हता.

नदी-तळी येथील मासेमारी मानवाला पुरा-पाषाणयुगापासुन येत होती. पण समुद्रातील मासेमारी अत्यंत धाडसाची अशीच होती. ज्या  गणाने सामुद्रिक मासेमारीचा शोध लावला व अन्नाची गरज भागवु लागला तो सागरकिनारे हेच आपल्या वास्तव्याचे ठिकान ठरवणार हे उघड आहे. पुढे तोही उद्योग बनला. आणि मीठाचा शोध लागल्यानंतर जो भाग मीठशेतीस योग्य आहे तेथेच त्यांची वस्ती आढळणे स्वाभाविक असेच आहे. त्यामुळेच कि काय महाराष्ट्रात व गुजराथेतही (जेथेही मीठशेती करता येणे शक्य होते तेथे) त्यांच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरातत्वीय पुरावे आढळतात आणि तेथेच ते आजही एकवटलेले दिसतात. त्यामुळे महिकावतीच्या बखरीतील आगरी समाज हा बिंबराजाबरोबर मुंगी-पैठणवरुन आठशे वर्षांपुर्वी कोकनात आला ही कथा आपोआपच बाद होते. कारण मीठ बनवणे हा आगरी समाजाचा पुरातन कालापासुनचा व्यवसाय होता. बिंब राजाने कोकणात आक्रमण केल्यानंतर त्यांना सैनिक म्हणुन गरज संपल्यानंतर मीठागरे बनवून दिली व तेच आगरी हे मत कोणत्याही पुराव्यांवर टिकत नाही. ते मानले तर मीठाचा शोध तेराव्या शतकात बिंबराजाने लावला असे म्हनावे लागेल!

आगरी समाजाचे मानवी संस्क्रुतीवर फार मोठे उपकार आहेत. हा खरा संशोधक व निर्माणकर्ता समाज होय! मिठाचा इतिहास म्हनजे आगरी समाजाचा इतिहास होय...या समाजाचा इतिहास वैदिक संस्क्रुतीपेक्षाही पुरातन म्हणजे किमान सात हजार वर्ष एवढा प्राचीन आहे. सर्वांनीच त्यांचे मिठ खाल्ले आहे. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्क्रुती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो हे या निमित्ताने लक्षात यावे!

-----संजय सोनवणी




मरणालाही चिंता वाटे....!

मरणालाही चिंता वाटे
जीवनालाही भय वाटे
अशी खिन्नता दाटुन येते
आभाळही मग रड रड रडते....
पडते...झडते...का? नच कळते!


येथुन तेथे...तेथुन येथे
वारा घालत सुनसान हेलपाटे
दिसतील येथे...दिसतील तेथे
व्यर्थची आशा...हिरवी राने न कोठे
व्यर्थ उसासे...व्यर्थची अश्रु...
कधी न समजे जावू कोठे?

ज्यांच्या जखमा ओल्या ताज्या
भळभळ वाहत रक्ताश्रु त्यांच्या
पोटी जावे घेण्या त्यांना तर
पिसाट लाथा घ्याव्या अंगावर
कारण तु ना त्यांच्या जातीचा
ना पातीचा ना मातीचा...मग स्पर्श तुझा का?

स्नेहांनाही असली बंधने...?

उगाच म्हटले मोडुन टाकु...तोडुन टाकु
उदास भिंती दुष्ट मनांच्या
जरा दाखवू कसे तयापार
उज्वल विगत अन आशा अनावर
भवितव्याच्या
पण नकोच आहे तोडाया त्या
सीमाभिंती पराजित मनांच्या
त्या असण्यात तयांचे जर
असेल स्वहित स्वार्थ अनावर
तर मग कसले तुटते बंधन...?
तोडील तो तर शत्रु नसे मग?

पण का वेडेपण दिधले मजला
नकळे निशिदिन का हे पारायण
थिजली माती भिजली माती मज रक्ताने
पण अविरत धडका का नियतीसही पण?
मरणही बावरुन उभे बाजुला
थक्क असा तो या वेडाला
जीवन स्तंभित असे उभे कि
कवटाळु वाटे त्या मरणाला...
जीवन म्रुत्यु...म्रुत्यु जीवन
एककार ते असती निरंतर
विभिन्नतेतही!

तरी खिन्नता...उदासीनता
ना म्रुत्युची...ना जीवनाची
अशीच आपल्या अबोधतेची
हे का झाले...ते का नाही
अशाच मुर्ख प्रश्नपणांची
सर्व व्यर्थता दाटुन येते
या जगतातील मनुष्यपणांची!

मग का जगतो मी?
म्रुत्यु दुर का?
ये... म्रुत्यु... कवटाळी मजला...
हे अगत्य निमंत्रण...

Wednesday, April 11, 2012

माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे पुस्तक

(श्री सागर भंडारे यांनी माझ्या पुस्तकावर लिहिलेले हे समीक्षण....)

पुस्तक परिचय : महार कोण होते?
लेखक/लेखिका: सागर (Tue, 10/04/2012 - 14:26)


माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे पुस्तक : महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप
लेखक - श्री. संजय सोनवणी
किंमत : १०० रु.
प्रकाशक : पुष्प प्रकाशन

एवढ्यांतच "महार कोण होते?" हे सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक "श्री.संजय सोनवणी" यांनी लिहिलेले पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण केले. महार समाजाचा इतिहास सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाकडे कोणी पाहिले तर तो या पुस्तकावर मोठा अन्याय होईल. महार समाजाचा उगम घेता घेता लेखक श्री. संजय सोनवणी यांनी प्रत्यक्ष मानव संस्कृती कशी अस्तित्त्वात आली? जन्मावर आधारित जातीय व्यवस्था कशी अस्तित्त्वात आली? त्यातून शूद्र म्हणून हिणवले गेलेल्यांवर अमानवीय अत्याचार कसे झाले? कर्मकांडांच्या अवडंबरातून सत्ता केंद्रीत करुन बहुजनांचे शोषण कसे झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांच्या आधारे व अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने या पुस्तकातून दिलेली आहेत. म्हणूनच हा ग्रंथ केवळ महार समाजाचा न राहता त्याहीपलिकडे जाऊन अखिल मानव समाजाचा होतो. केवळ १०९ पानांच्या या अफाट आवाका असलेल्या पुस्तकाचे संशोधन लेखकाने प्रचंड मेहनतीने, अत्यंत तर्कशुद्ध व तळमळीने केल्याचे जाणवते, त्याबद्दल लेखक श्री. संजय सोनवणी हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या या अनमोल संशोधनाची दखल भविष्यातील कित्येक शतके घेतली जाईल. पुस्तकातील केवळ १०% एवढ्याच गोष्टी मी या परिक्षणात घेऊ शकलो आहे यावरुन पुस्तकाचा आवाका लक्षात यावा.
प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचे भान आणवून देणारे पुस्तक असे मी या पुस्तकाचे वर्णन करेन. खरे तर पुस्तकाच्या शीर्षकापासूनच या पुस्तकाच्या आत काय दडले असेल याचा अंदाज येतो. पण एका अज्ञात संशोधनाच्या खोलीत शिरत असल्याचा थरारही जाणवतो. साधारणपणे संशोधनग्रंथ म्हटला की त्यात आकडेवारी, प्रचलित समजूती, लेखकाने पूर्वग्रहाने केलेली मते असा भडीमार असतो. पण 'महार कोण होते?' चे लेखक या सर्व किचकट मांडणीला पूर्ण फाटा देत सर्वसामान्यांना सोप्या भाषेत हे संशोधन समजावून देण्यात अतिशय यशस्वी झालेले आहेत. म्हणूनच या ग्रंथाचे मोल अद्वितीय असे आहे.
महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप या नावावरुनच लेखक संजय सोनवणी वाचकांना महारांचा उगमापासूनचा शोध घेऊन त्यांची भविष्यकाळातील दिशा स्पष्ट करणार असल्याचे वाचकाच्या लक्षात येते. अवघ्या १०९ पानांच्या या पुस्तकात लेखकाच्या भूमिकेबरोबर एकूण आठ प्रकरणे आहेत. मूर्ती लहान पण आवाका मात्र प्रचंड असे सामर्थ्य या पुस्तकात आहे. एकेक प्रकरणाचा थोडक्यात आढावा घेऊन पाहूयात.
पुस्तकाचे वाचन करण्यापूर्वी कोणताही पूर्वग्रह मनात वाचकांनी ठेवू नये यासाठी लेखकाने खास छोटीशी भूमिका मांडली आहे. पुस्तकांतील क्रांतिकारी विचार समजून घेण्याच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. संजय सोनवणी म्हणतात की जन्माधारित जातीय व्यवस्थेच्या माध्यमातून एका जातीय चौकटीत ढकलण्यात ब्राह्मण वर्ग हा कारणीभूत होता. पण ते हेही अधोरेखित करतात की (सर्वच ब्राह्मण समाज नव्हे), पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक ब्राह्मणाने ही गोष्ट लक्षात घेतली की या पुस्तकातील विचार तो खुल्या मनाने पाहू शकेल. जातीय व्यवस्थेला आणणार्‍या पुरोहित व्यवस्थेचे दोष दाखवताना 'माणूस बदलतो यावर माझा पुरेपूर विश्वास आहे','हिंसा शारिरिक असते तशीच सांस्कृतिकही असते' असे व्यवस्थेवर तटस्थ दृष्टीकोनातून लेखकाने टिप्पणी केली आहे. हा सिद्धांत पुढे नेण्यासाठी त्यात त्रुटी आढळल्याच तर त्या लक्षात आणून देण्याचे आवाहनही लेखक खुल्या मनाने करतात. यावरुन लेखकाची भूमिका स्पष्ट व्हावी. आता एकेक प्रकरणाचा आढावा घेऊयात.

प्रकरण १:
यात लेखक ऋग्वेद काळापासून हिंदू धर्माचा वेध घेताना 'जन्माधारित वर्ण-जात ठरवणारी ही जगातील एकमेव धर्मव्यवस्था आहे' हेही कठोरपणे वाचकाच्या निदर्शनास आणून देतात. लेखकाने मते मांडण्यापूर्वी ऋग्वेदातील पुरुषसूक्त व त्याचा अर्थ दिला आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जसेच्या तसे दिले आहेत. त्यानंतर ऐतरेय ब्राह्मण व मनुस्मृती चे दाखले देऊन क्र. ११ व १२ या ऋचा पुरुषसूक्तातील बाकीच्या ऋचांपेक्षा कशा भिन्न आहेत व कालौघात या ऋचा नंतर त्यात जोडल्या गेल्या आहेत हे लेखकाने या प्रकरणात सिद्ध केले आहे. यासाठी लेखक आर.सी.दत्त यांचा दाखला देऊन मूळ ऋग्वेदात छेड्छाड केली गेल्याचे झरथ्रुष्टाच्या उदाहरणाने लेखक सप्रमाण सिद्ध करतात. तसेच व्यासांनी वेद संकलित केल्याचाही दाखला ते विचारात घेतात. ऋग्वेदातील इतर सर्व १०,००० पेक्षा अधिक ऋचांमध्ये कुठेही जन्मावर आधारित जातीय व्यवस्थेचे उल्लेख नसताना फक्त एका पुरुषसूक्ताच्या ११ व १२ व्या ऋचेत हा उल्लेख असल्याने लेखकाचे मत मान्य होण्यास वाचकाला अडचण पडत नाही.

प्रकरण २:
यात हिंदू हा शब्द कोठून आला याची लगेच पटणारी तार्कीक मीमांसा केली आहे. तसेच व्यक्तीप्रणीत धर्म आणि रुढ धर्म यांतील मूलभूत फरक लेखकाने अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला आहे. प्रत्यक्ष महाभारतातील दाखल्यापासून अनेक गोष्टींचा यात विचार केला आहे की ज्या कारणामुळे जन्माधारित जातीय व्यवस्था अस्तित्त्वात कशी आली याची भूमिका वाचकाच्या लक्षात यावी.

प्रकरण ३:
यात लेखकाने सृष्टीत सर्वात आधी कोण अस्तित्त्वात आले आणि कोणत्या क्रमाने अस्तित्त्वात आले याची तार्कीक फोड केली आहे. त्यासाठी पुरुषसूक्ताच्या आधाराने जन्माधारित वर्णव्यवस्था अस्तित्त्वात कशी आली यावर मंथन केले आहे. बाकीचा ऋग्वेद कुठेही वर्णव्यवस्था असल्याचे वा अत्यावश्यक असल्याचे सांगत नाही हे अधिक स्पष्ट करताना पुरातन मानवाची शिकारी मानवाकडे वाटचाल झाली त्यानंतर मानवाचे जे विचारी मनवात स्थित्यंतर झाले त्याकाळी धर्म अस्तित्त्वात तरी होता काय? हेही लेखक परखडपणे दाखवून देतात. 'आदिमानवाने प्रतिकूल निसर्गाशी संघर्ष करत असतानाच ज्या गूढांशी ज्या पद्धतीने वैचारिक सामना केला त्याला तोड नाही' हे एक शाश्वत सत्य लेखक या प्रकरणातून मांडत असताना धर्म म्हणजे काय? याची मानवाने निसर्गाशी तादात्म्य साधत कशी उकल केली हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. याच प्रकरणात नाग हा शब्द आपल्या जीवनात किती घट्ट्पणे रुळला आहे हे स्पष्ट करताना लेखक नगर, नागरिक, नागर हे शब्द उदाहरणादाखल देतो तेव्हा आपसूकच वाचकाच्या मनात प्रश्न उमटतो की, अरेच्च्या हे आपल्याला कसे माहिती नव्हते? या प्रकरणाच्या शेवटी लेखकाने मानवी विकासाचा मुद्देसूद क्रम दिला आहे, याचा उपयोग वाचकाला पुढील प्रकरणांतील गुह्य समजण्यात होते.

प्रकरण ४:
या प्रकरणात लेखकाने रक्षक संस्थेचा इतिहास सांगितला आहे. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींतून लेखकाने जे संशोधन समोर ठेवले आहे त्याला तोड नाही. लेखकाने थेट सातवाहनांच्या (इसवी सनाच्याही आधीच्या) काळापासून रक्षक संस्था कशी अस्तित्त्वात आली याचे पुरावे देता देता महार शब्द कसा निर्माण झाला याचाही वेध घेतला आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असलेल्या मॅगॅस्थेनिस या वकीलाने त्याकाळी केलेल्या नोंदींतून लेखकाने अतिशय परिश्रमाने माहितीचे सगळे तुकडे शोधून आपल्याला जोडून दाखवले आहेत. या अस्सल पुराव्यांतून रक्षक संस्थेचा इतिहास लेखकाने कसा शोधला ते अवश्य या प्रकरणात वाचा. जात कशी निर्माण झाली याचाही परामर्श लेखकाने या प्रकरणात घेतला आहे. रक्षक संस्थेच्या जबाबदार्‍या या प्रकरणांत नोंदवल्या आहेत.

प्रकरण ५:
महार समाजाला एक गौरव प्राप्त करुन देणारे असे हे अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे. या प्रकरणातून लेखकाने महार कोण होते? यावर अतिशय तर्कनिष्ठ मांडणी करुन त्यांच्या जबाबदार्‍या वाचकांच्या समोर मांडल्या आहेत. मागच्याच प्रकरणात लेखकाने रक्षक संस्थेचा इतिहास समोर ठेवला होता त्याची आठवण वाचकाला झाल्याशिवाय रहात नाही. वाचक मनातल्या मनात तुलना करत असतानाच लेखकाने हा तर्क पुढे अधिक स्पष्ट करुन महारांवर असलेल्या जबाबदार्‍यांचा वेध घेतला आहे. पण महारांना ज्या हीनतेच्या पातळीवर ढकलल्या गेले त्याबद्दल लेखक खंत व्यक्त करताना म्हणतो की - 'त्याचे जे दूरगामी परिणाम भारतीय मानसिकतेवर पडले ते दूर करायला अजून किती पिढ्या लागतील हे आज तरी सांगता येत नाही.'

प्रकरण ६:
या प्रकरणात महार शब्दाची उपपत्ती शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. इरावती कर्वे, शिवरामपंत भारदे, रॉबर्टसन, महात्मा फुले, रा.गो.भांडारकर अशा मान्यवर संशोधकांचे महार शब्दाबद्दलचे मत लेखकाने दिले आहे व त्याचे तर्कशुद्ध विश्लेषणही केले आहे. मनुस्मृती, इतर पुराणे, उपनिषदे, वेद अशा सर्वांचा सखोल अभ्यास करुन लेखकाने दाखवून दिले आहे की - 'जाती या विशिष्ट सेवा-उद्योगातील कौशल्यातून निर्माण झाल्या आहेत.' जन्माने कोळी असलेल्या व्यास व वाल्मीकी यांनी विश्वविख्यात काव्ये लिहिल्याचे दाखवून पुरातनकाळी जन्माधारित जातीय व्यवस्था नसल्याचे लेखक सप्रमाण दाखवून देतात. 'महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवय्या अशी राहिलेली आहे' हे आजच्या प्रगल्भ वाचकाला लेखक जाणवून देतात. महारांची वस्ती गावाबाहेर का? त्यांची कामे यांबरोबरच मरिआई या देवतेचे देखील तार्किक विश्लेषण लेखकाने केले आहे.

प्रकरण ७:
या प्रकरणातून लेखकाने महार समाजाची सामाजिक अवनती कशी आणि कधी झाली? यावर प्रकाश टाकला आहे. हा इतिहास कापवून टाकणारा असला तरी वाचकाने तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे त्यामुळे त्या अनुषंगाने अधिक सांगून वाचकाचा थरार घालवत नाही. तरी या प्रकरणात लेखकाने पुराणांनी घातलेल्या समुद्रबंदी, महामंदी, दुष्काळांची रांग, अस्पृश्यतेचा आरंभकाळ अशा अनेक अंगांनी सखोल विचार केला आहे. बेदरच्या महाराजाने १४ व्या शतकात विठ्या महाराला दिलेल्या सनदेच्या पुराव्याच्या आधारे काही समजूतींना आणि पूर्वग्रहांना अर्थ नव्हता हे देखील लेखकाने सिद्ध केले आहे.

प्रकरण ८:
यात लेखकाने वर्तमान व भवितव्य यावर अतिशय परखडपणे व तटस्थ असे अवलोकन करुन विचार महार समाजापुढे ठेवले आहेत. आजच्या समतेच्या जगात महार समाजाने पुढे कसे जायचे याचा एकंदरीत आराखडाच लेखकाने मांडला आहे व महार समाजाने व त्यांच्या नेत्यांनीच या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत असेही लेखक शेवटी दाखवून देतात.

या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन झाल्यावर अजून काही थोडक्यात सांगतो -
लेखकाने पहिली तीन प्रकरणे वैदिक कालापासूनच्या उत्खननास दिलेली आहेत. या तीन प्रकरणांतून पुरुषसूक्त कसे प्रक्षिप्त आहे हे लेखकाने सप्रमाण सिद्ध करुन त्याअनुषंगाने जन्माधारित जातीयतेची पाळेमुळे पुराणग्रंथांतून कशी रुजवली गेली. आणि त्याद्वारे फक्त महारांचेच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे अवमूल्यन कालौघात कसे झाले यादॄष्टीने ही तीन प्रकरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. अगदी अलिकडच्या काळापर्यंत महारांचे अवमूल्यन का आणि कसे झाले? हे समजून घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात कोठे झाली आणि नंतरच्या काळात ती वाढीस कशी लागली यावर प्रकाश पडल्याशिवाय महार कोण होते? या प्रश्नाचा विचार करुनही उपयोग नव्हता हे अगदी पटते. संशोधन प्रश्नाच्या अगदी मुळापासून कसे असावे हे या पुस्तकातून शिकायला मिळते.

पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर आजचे महार लाचारीचे जगणे सोडून अभिमानाने जगायला नक्कीच शिकतील असा विश्वास वाटतो. आणि महारेतरांना या पुस्तकामुळे महारांविषयी (असलीच तर) हीनत्त्वाची भावना समूळ नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल.
जाता जाता महार कोण होते? हा शोध हा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जातीय व्यवस्थेचा शोध खरेतर आहे. असे तटस्थ मूल्यांकन वाचकांना देताना लेखक श्री. संजय सोनवणी यांची श्री. हरि नरके यांना अर्पण केलेली अर्पणपत्रिका लेखकाच्या संवेदनशीलतेचा परिचय वाचकांना देतात.
परंपरागत समजुतींना धक्का देणारे आणि वारंवार वाचून चिंतन करावे असे 'महार कोण होते?' हे पुस्तक आहे असे आवर्जून म्हणेन. संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे महारांचा शोध घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. महार कोण होते या सिद्धांताची अत्यंत तर्कनिष्ठ आणि सप्रमाण अशी मांडणी श्री. सोनवणी यांनी केलेली आहे, त्यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. वाचकांनी खुल्या मनाने या पुस्तकाचे स्वागत करावे ही विनंती.

धन्यवाद,
-सागर

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...