Tuesday, May 31, 2011

हा घ्या वाघ्याचा शिवकालीन पुरावा!



इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिले आणि तिला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.

२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.

याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या "राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.

हे आमचे तिसरे पारतंत्र्य आहे!

जगाचा इतिहास हा असंख्य संक्रमणांनी भरलेला आहे. प्रत्येक संक्रमने ही मानवजातीला उपकारक होती तशीच अनुपकारकही ठरलेली आहेत. पण काय उपकारक आणि काय अनुपकारक यातील सनातन संघर्ष सातत्याने सुरू राहिलेला आहे असेही दिसते, आणि नेमके काय याचा निर्णय आजही मानवी समुदाय लावू शकलेला नाही. मग ही संक्रमणे धार्मिक असोत, अर्थव्यवस्थेतील असोत कि राजकिय.आणि तत्वद्न्यान आणि विद्न्यानातील असोत. प्रुथ्वीकेंद्रीत विश्वसिद्धांताने हजारो वर्ष मानवी समाजाला एक स्व दिला...पण हळु-हळु सुर्यकेंद्रित ते आता पुर्णतया अकेंद्रित सिद्धांताशी यावे लागल्याने मानवाचा अहंकार पुर्ण चुर झाला. आपण किमान २० अब्ज प्रकाशवर्ष एवढ्या कल्पनातीत विस्ताराच्या विश्वातील एक अत्यंत नगण्य-अदखलपात्र भाग आहोत हे नव-द्न्यान पचनी पडने अवघडही गेले आणि त्यातून एक अप्रत्यक्ष प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया उद्भवलेली दिसते ती म्हणजे इहवाद. हा पुरातन काळीही होताच. पण त्याचे पराकोटीचे विस्फोटन गत-शतकापासुन व्हायला लागले आणि आता त्याने एक टोक गाठले आहे.

हा आताचा जो इहवाद आहे तो चार्वाक वा ग्रीक तत्वद्न्यांनी मांडल्याप्रमाणे साधासरळ नाही. आधीचा इहवाद हा पारलोकिक जीवन नाकारत आहे तेच जीवन मुक्तपणे उपभोगण्याचा होता. कोणतीही गोष्ट इश्वरनिर्मित नसून ती एक भौतिक घटना आहे असे मानण्याचा होता. या इहवादातून शास्त्रे-विद्न्यानाची दारे उघडली गेली. परंतु आताचा इहवाद हा नव्या संक्रमनात आला आहे. या इहवादाला सत्ता आणि वर्चस्ववादाची भयंकर परिमाने मिळाली आहेत.

याचा अर्थ असा नव्हे कि सत्ता आणि वर्चस्ववाद पुर्वी नव्हता. धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता या नेहमीच सर्वच जागतीक समुदायांना व्यापुन उरलेल्या होत्याच. ब्रुनो सारख्या संशोधकाला जीवंत जाळुन मारणे आणि ग्यालिलियोला माफी मागायला लावणारी पोपसत्ता कोण विसरेल? आर्यभट्टाचा जगात सर्वप्रथम मांडला गेलेला सुर्य-केंद्रित विश्वाचा सिद्धांत येथीलच नंतरच्या मुखंड खगोलविदांनी अडगळीत फेकुन त्याचे विक्रुतीकरण केले हे कोण विसरेल? तेंव्हा हवे तेच सोयिस्कर स्विकारायचे, स्व-सिद्धांतांना विरोधी नाकारायचे ही परंपरा पुरातन आहे.

परंतु हे वर्चस्ववादी गट कधीतरी माघार घेतात. बायबलमधील विश्व ख्रिस्तपुर्व ४००० हजार वर्षांपुर्वी बनले हा सिद्धांत चर्चला जाहीरपणे मागे घ्यावा लागला. ही द्न्यानसत्तेचे धर्मसत्तेवरील एक महान विजयस्मारक आहे. भारतीय धर्मसत्ता हीच मुळात अद्यापीही तमोयुगात वावरत असल्याने या सत्तेने कधीही कालोपयोगी आणि विद्न्यानाधारित भुमिका घेतलीच नाही हेही एक वास्तव आहे. त्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच् आहे.

सर्वच समाज संक्रमणावस्थेतून जात असतात. हे संक्रमण उर्ध्वगामी असावे कि अधोगामी? अर्थात ते उर्ध्वगामी असावे आणि त्यासाठी सर्वच...म्हणजे धर्म-अर्थ ते राजकीय...घटक त्यासाठी प्रयत्नशील असावेत अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. संक्रमणात नेहमीच नवे-जुने विचारांत वाद होतच असतो. काही पुरातन मुल्ये किमान तोंडलावणीसाठी का होईना घेतच पुढे जावे लागते. एका अर्थाने -हासाकडुन -हासाकडे अशीच एक वाटचाल होत असते आणि त्याच संक्रमणावस्थेत या -हासाला उर्ध्वगामी प्रवाह देनारेही असतात आणि संपुर्ण -हास सहजी होत नाही.

ग्रीक संस्क्रुती लयाला गेली. रोमन संस्क्रुती आणि साम्राज्य लयाला गेले. हिटलरच्या आसुरी आकांक्षांचा अस्त झाला. जेथे कधी त्या साम्राज्यावरचा सुर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश साम्राज्याचे नुसते अध:पतन नव्हे तर ग्रेट ब्रिटन विखंडित झाला. आज अमेरिका जी महासत्ता आहे तेथील लोकांना खाण्यापिण्याचे-रोजगाराचे वांधे आहेत. हे संक्रमण असते. कोनतीही सत्ता चिरस्थायी नसते याचे हे बोलके उदाहरण आहे.

उद्या भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पहात आहे. पण महासत्ता म्हणजे नेमके काय याची व्याख्या कोणी केलेली मी अद्याप वाचलेली नाही. अर्थात्मक महासत्ता...द्न्यानात्मक महासत्ता...नैतिक महासत्ता...विद्न्यानात्मक महासत्ता...कि केवळ लोकसंख्यात्मक महासत्ता...? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. चीनला आपण लोकसंख्येत मागे टाकुन लोकसंख्यात्मक महासत्ता होणारच याबाबत फारसा संशय नाही. द्न्यानात्मक म्हनाल तर आजही भारतीय पुरातन द्न्यानाला पुजण्याचे जातीय काम अधिक आहे पण ते विकसीत करून जागतीक पातळीवर मांडण्याचे धैर्य/साहस/तळमळ कोणात दिसत नाही. विद्न्यानाचा प्रश्नच येत नाही कारण जगात आज भारताचे म्हणुन प्रस्थापित विद्न्यान सिद्धांत कोणी मांडलेलेच नाहीत. असतील तर ते उपसिद्धांत आहेत.

आणि हे होण्याचे एक कारण असे कि मुळात भारतीयांचा भारतीयांवर सहसा विश्वास नसतो. पासःचत्यांचाही खूप उशीरा बसतो. तोवर अनेक हाय खावुन मेलेले असतात. जोवर पास्चात्य लोक आपले शिक्कामोर्तब करत नाहीत तोवर त्या संशोधकांना कोणी हिंग लावून विचारत नाही.

म्हणजे आपले वर्तमानातील संक्रमण नेमके कोठे चालले आहे हा प्रश्न येथे उपस्थित होतो. जागतिकिकरणाला आपनच निमंत्रित केले...या जागतिकिकरणात आपला लोकसमुदाय नेमका कोठे बसतो...त्याची काय ससेहोलपट होत आहे याचे पुर्व-द्न्यान आपल्या सरकारांना होते काय? त्यांनी त्यासाठी कोनती वेगळी सैधांतिक आणि कवचात्मक रचना केली काय? भारतीय समाजातील अंगभुत दोष (धार्मिक असोत कि जातीय) नष्ट करण्यासाठी कोणतीही पावले उचललीत काय? कि ते वाढावेत यासाठी प्रछ्छंन्नपणे अनेक बाबी रानोमाळ मोकळ्या सोडल्या आहेत? एकमेकांना डसत, आपापसात भांडत ठेवत सत्ताकारण हेच महत्वाचे ध्येय राबवत अन्य सत्ता कदापि पुढे येवू नयेत कारण तसे घडले तर द्न्यानसत्ता ते विद्न्यानसत्ता त्यांनाच डसतील हे भय त्यामागे आहे?

अस्वस्थ समाज हा अस्तित्वात असतोच. फक्त कळत नाही त्याला कि नेमके काय आणि कशासाठी होते आहे. त्या अस्वस्थ समाजात जातीयतेचे...धर्मांचे विषारी सर्प सोडुन द्यायचे आणि इतिहासाचा दर्प सोडत आपापसात झुंझी लावुन देण्याचे उद्योग करत आपापले स्वर्थ साधन करायचे हे एक नव्य संक्रमण आजच्या भारतात होत आहे. अपवादात्मक निरुपद्रवी शत्रुंना कोठड्या दाखवायच्या आणि ख-या समाजविघातकांकडे "दुर्लक्ष" करायला सांगायचे हा धंदा आता पराकोटीच्या टोकाला पोहोचला आहे.

पण जे टोकाला जाते ते खाली पडणारच हा शास्त्राचा नियम आहे. शासनकर्ते हे काही आभाळातुन पडलेले नाहीत तेंव्हा त्यांनाही हाच नियम लागू होतो. जसा समाज तसे राज्यकर्ते हे चीनी तत्वद्न्याने फार पुर्वी सांगितले आहे. भारतीय...महाराष्ट्रीय समाजाला बदलावे लागेल...तरच खरे संक्रमण होइल. खालुन वर जाणारे संक्रमण (म्हणजे सामाजिक प्रेरणांतुन) हे चिरकालीन असते.
पण आमचे दुर्दैव हे आहे कि आजही आम्ही वरुन खाली येणा-या संक्रमणावर अवलंबुन आहोत.

हे आमचे तिसरे पारतंत्र्य आहे!

Saturday, May 28, 2011

आद्य शिवचरित्रकार केळुस्कर गुरुजी आणि होळकर

२० आगष्ट १८६० साली केळुस या वेंगुर्ले गावी जन्मलेल्या क्रुष्णराव अर्जुन केळुस्कर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत हे सहसा सामान्य वाचकांना माहित नसते. तत्पुर्वी महात्मा फुलेंचा महाराजांवरील पोवाडा आणि राजारामशस्त्री भागवतलिखित एक लहानसे चरित्र एवढेच काय ते मराठीत प्रसिद्ध झाले होते. तत्पुर्वीच लोक. टिळक १८९५ पासून शिवस्मारकासाठी देणग्या गोळा करण्याच्या प्रयत्नात होते व त्यातुनच एक समग्र शिवाजी महाराजांचे साक्षेपी, संशोधनात्मक असे चरित्रही प्रसिद्ध करण्याचा केसरीकारांचा उद्देश होता. परंतू तरीही महाराष्ट्रातील विद्वानांकडुन शिवचरित्र लिहिण्याचे काम झाले नाही.

याबद्दल "छत्रपती शिवाजी महाराज" या आपल्या ग्रंथाच्या १९०७ च्या प्रथमाव्रुत्तीच्या प्रस्तावनेत केळुस्कर गुरुजी म्हणतात-" मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करुन ठेवणा-या ह्या महाप्रतापशाली राष्ट्रीय वीराच्या अतुल पराक्रमांचे विस्त्रुत वर्णन स्वतंत्र चरित्रलेखनाच्या रुपाने करण्याच्या कामी महाराष्ट्रातील मोठमोठ्या विद्वान ग्रंथकारांकडुन आळस अथवा अनास्था का झाली हे कळत नाही. .............आधुनिक विद्याचारसंप्पंनतेच्या काळी स्वदेश,, स्वराज्य इत्यादिकांविषयी सदोदित विचार प्रकट करणा-या पंडितांकडुन नुसता तोंडाने अभिमान प्रकट करण्यापलीकडे काहीच होउ नये हे चमत्कारिक दिसते. दुस-यांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणा-या किंवा स्वदेशाचा नाश करण्यास प्रव्रुत्त होणा-या अनेक पुरुषांची चरित्रे मराठी भाषेत प्रसिद्ध व्हावीत, आणि ज्या प्रौढ्प्रताप वीरमणीने स्वदेशास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे सुयश संपादिले त्याचे सविस्तर चरित्र लिहिण्याची स्फुर्ती कोणासही होवू नये यास काय म्हणावे?"

या खंतीवरून शिवचरित्राबाबत केवढी अनास्था होती हे कळुन येते. कोणीही अन्य विद्वान पुढे न आल्याने १९०३ च्या दरम्यान केळुस्करांनी "छत्रपती शिवाजी महाराज" हे चरित्र लिहिण्यास घेतले. संशोधकाची शिस्त पाळत त्यांनी तत्कालीन उपलब्ध सारी कागदपत्त्रे, बखरी, पत्रव्यवहार तपासत त्यांनी मोठ्या कष्टाने प्रस्तुन चरित्र संपन्न केले. आपले संशोधन/चरित्र हे तरीही परिपुर्ण आहे, अंतिम आहे असा त्यांचा, ख-या इतिहाससंशोधकाप्रमाणे दावा नव्हता. त्यांनी याच प्रस्तावनेत स्पष्टपणे म्हटले आहे कि-

"(लेखकाला) ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे."

या चरित्रग्रंथाची पहिली आव्रुत्ती १९०७ साली मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध झाली. या आव्रुत्तीला शाहु महाराज यांनी मदत केली. कागल, बडोदा संस्थानांनी पारितोषिके दिली. वाचकांनीही या आव्रुत्तीचे उदार स्वागत केले. जवळपास ६०० प्रुष्ठांचा हा शिवेतिहास होता. यात केळुस्करांनी अत्यंत समतोल आणि प्रवाही भाषेत, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध पुरावे देत, घटनांचे विश्लेषन करत हा ग्रंथ सिद्ध केला आहे. इतिहास-चरित्र कसे लिहिले जावे याचा हा एक आदर्ष वस्तूपाठच होय. त्यामुळे विद्वत्जनांतही या ग्रंथास एक अपरंपार असे महत्व निर्माण झाले.

तत्पुर्वी केळुस्करांनी "फ्रांसचा जुना इतिहास", ग्रीक तत्वद्न्य "सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने" हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले तर होतेच पण गौतम बुद्ध आणि तुकाराम महाराजांचे विस्त्रुत चरित्रही लिहिलेले होते. डा. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम गौतम बुद्ध समजले आणि अनिवार आकर्षण निर्माण झाले ते केळुस्करांच्या गौतम बुद्धाच्या चरित्रामुळेच. याशिवाय त्यांनी "आध्यात्मिक द्न्यानरत्नावली" या १८९४ साली लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांनी सुरू केलेल्या मासिकात गीतेवर असंख्य ग्रंथांचा आधार घेत तत्वद्न्यानात्मक टीकाही लिहिली. पुढे ही टीका पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाली.

यावरून केळुस्करांचे प्रकांड पांडित्य आणि अविरत संशोधन सिद्ध होते. परंतु "छत्रपती शिवाजी महाराज" हे शिवचरित्र त्यांच्या प्रकांड जिद्न्यासेचे, साक्षेपी संशोधनाचे मुर्तीमंत प्रतीक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

हे चरित्र आधी हिंदी व गुजराती भाषेत अनुवादित होवुन प्रसिद्ध झाले. इंग्रजी आव्रुत्तीमुळे शिवरायांना जगभर पसरवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. शिवाय शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेवुन मुळ ग्रंथात सुधारणा करून नवी आव्रुत्तीही प्रसिद्ध करायला घेतली. मनोरंजनकार कै. का. र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण या उद्योगात त्यांना प्रचंड कर्ज झाले. दोन्ही ग्रंथ छापुन झाले खरे पण ते कर्जाच्या विळ्ख्यात अडकले. त्यांच्या मित्रांनी हे कर्ज फेडण्यासाठी धडपड सुरू केली.

ही वार्ता इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांच्या कानी गेली. त्यांनी तत्कालीन रु. २४०००/- (आज ही रक्कम ८० लाख रुपयांच्या आसपास जाईल) देवून केलूस्करांना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेवून जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या व शिवराय चरित्र जगभर पसरवले. याच होळकरांनी शिवस्मारकालाहे देणगी दिली व स्मारकावर खर्चलेल्या रक्कमेतुन शिल्लक राहिलेल्या धनातुन सध्या वादात अडकवला गेलेल्या वाघ्या कुत्राचेही स्मारक करवून घेतले. ज्या काळात एकही तोंडाळ शिवप्रेमी/वंशज केळुस्करांना वा स्मारकाला मदत करायला पुढे सरसावले नाही त्या काळात जवळपास आजच्या भाषेत कोटभर रुपये होलकरांनी खर्च केले यात त्यांचे शिवप्रेम दिसून येते. आताचे शिवप्रेमी मात्र तो वाघ्याचा पुतळा हतवण्याच्या मागे आहेत हा एक दुर्दैवविलास आहे असेच म्हणावे लागते.

या ग्रंथाच्या आजवर ७ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्या असुन एक आव्रुत्ती बामसेफनेही संपादित प्रसिद्ध केली आहे. वरदा प्रकाशनाने १९९१ ते २०१० या काळात ४ आवुत्त्या प्रसिद्ध केल्या असून मुळ स्वरुप जपले आहे.

परंतु प्रा, विलास खरात संपादित, मुलनिवासी पब्लिकेशन ट्रुस्ट प्रकाशित केळुस्करांच्या शिवचरित्राने मात्र अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत हेही येथे नमुद करणे आवश्यक आहे. कोणत्याही ग्रंथाची आव्रुत्ती प्रसिद्ध करतांना त्याचे मुळ नाव बदता कामा नये हा एक संकेत असतो तो येथे पार पाडला गेलेला नाही. "छत्रपती शिवाजी महाराज" या मुळ शिर्षकाचे नवे नामकरण "नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज" केले गेले आहे आणि हे सर्वच संकेतांना धुडकावुन लावणारे आहे. हे "नागवंशीय" का तर प्रा. खरात यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे नागवंशीय असल्याने सारे मराठा हेही नागवंशीय आहेत आणि ही बाब केळुस्कर गुरुजींनाही मान्य आहे. कारण का तर..."विजयादशमीचा सण मराठे लोक किती उत्साहाने आणि थाटाने पाळतात हे सर्वविदित आहे" असे केळुस्कर गुरुजींनी नोंदवले आहे....सारांश असा कि शिवाजी महाराज नागवंशीय होते...सबब सर्व मराठे मार्शल रेसचे आहेत. याला संपादन म्हणायचे असेल/संशोधन म्हणायचे असेल तर म्हणोत बापडे!

लेखक/संशोधक/तत्वद्न्यांना जात नसते. केळुस्कर गुरुजींबद्दल तत्कालीन विद्वानांना केवढा आदर होता हे वरदा प्रकाशनाच्या आव्रुत्तीत प्रसिद्ध झालेल्या (मुलनिवासीने वगळलेल्या) पुरुषोत्तम बाळक्रुष्ण कुलकर्णी यांनी करुन दिलेल्या १२-१०-१९३४ च्या लेखक परिचयातुन स्पष्ट होते. परंतु दुर्दैवाने शिवाजी महाराजांनाच जातींत अडकावु पाहणा-यांना आणि केळुस्करांच्या इतिहासलेखनपद्धतीकडे ढळढळीत दुर्लक्ष करत वाट्टेल ते खोटे रेटुन सांगणा-या, झटपट प्रसिद्धीसाठी हपापलेल्या नव्य इतिहासकारांसाठी (?) हे सांगावे लागत आहे कि केळुस्कर हे मराठा समातीलच होते. त्यांना स्वबांधवांनी कसलीही मदत केली नाही. त्यांचा इतिहास त्यांचे लेखन घरोघर पोहोचवले नाही. मदत केली ती होळकरांनी. शिवस्मारक आणि वाघ्याला उदार देणगी दिली ती होळकरांनी. हे ऋण मान्य न करता, केळुस्करांना त्यांचे उचित श्रेय मिळण्यासाठी कसलेही प्रयत्न न करणा-यांना, त्यांना जवळपास विस्म्रुतीत ढकलना-यांना इतिहास क्षमा करेल काय?

दलितांना वापरून घ्यायचे...

दलितांना वापरून घ्यायचे...उपयोग संपला कि चुरगाळुन फेकुन द्यायचे हा पुरातन अमानुष धंदा आजही सुरू आहे. सध्य:स्थितितील राजकारणातही त्याचे प्रतिबिंब आपण पाहू शकतो. या भोळ्या-भाबड्या, सामाजिक स्तरावर आजही समता नाकारलेल्यांना अजून संभ्रमीत करणा-या वर्गावर कोणी हिंदुत्ववादाचे गोमुत्र शिंपू पहातो तर कोणी बुद्धाचेच हिंदुत्वीकरण करतो.. आणि या शोषित घटकाचे विखंडीकरण, बुद्धीभेद आणि करुणेचा आव आणत दोस्ती करू इछ्छितो....तीही स्वस्वार्थासाठी...हाच एक निषेधार्ह भाग आहे या कथित हिंदुत्ववादी नव-तत्वद्न्यानाचा. कारण त्यामागे जणु काही आपण त्यांच्यावर फार मोठे उपकार करत आहोत ही छुपी का होईना भावना असते....आणि स्वयंघोषित करूणामयतेचे जीवंत पुतळे असे दाखवण्यात धन्यता वाटते. मुस्लिमांबरोबरच्या (त्यांच्या धर्मांतरापुर्वीच्या जाती माहित नसता...) इफ़्तार पार्ट्या जोषात येतात...पण दलित वस्त्यांवर जावून दलितांसोबत दोन घास खाणारे या देशात अति-अपवादात्मक असावेत हा विरोधाभास नाही का?

आठवले यांना हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांचा आधार घ्यावा वाटावा यामागे आठवलेंचे स्वार्थ आहेत कि हिंदुत्ववाद्यांचे याचे विश्लेषन करावेच लागेल. वर्चस्वतावाद हा हिंदुत्ववाद्यांचा प्राण आहे. दलितांना आजही पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नाही. ते द्यावे असा कोणत्याही...अगदी निधर्मी म्हनवणा-या पक्षांचाही इरादा नाही. यात दलित नेत्रुत्वाची ससेहोलपट होत आहे आणि दलित समाज दिवसेंदिवस दिग्भ्रमित केला जात आहे आणि असेच व्हावे असा या सर्वांचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. दलितांत जेवढ्या फुटी पडतील तेवढ्या यांना हव्याच आहेत कारण दलित ऐक्य नावाची बाब आस्तित्वातच येवू नये अशी ही खेळी आहे...आणि त्यातुन दलित नेत्रुत्वही दिग्भ्रमित करण्यात या वर्चस्ववादी पक्षांना-संघटनांना यश लाभत आहे...

माझ्या मते...राजकीय सत्ता कि सामाजिक सत्ता यात दलित नेत्रुत्वांना-दलितांना सुयोग्य निवड करावी लागणार आहे. माझ्या मते सामाजिक सत्ता हा दलितांचा पहिला अधिकार आहे. धर्म कोणता निवडायचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण शोषित-वंचित म्हणुन सर्वांची अभेद्य एकता आणि त्यावर मात करत हजारो वर्ष गमावलेली द्न्यानात्मक आणि समतात्मक सत्ता पुन्हा प्राप्त करणे हेच एकमेव ध्येय असायला हवे.

मला जाणीव आहे कि माझे कोट्यावधी दलित बांधव या विलक्षण संक्रमणातून जात आहेत आणि ते दिव्य यशे प्राप्तही करत आहेत. पराकोटीचा अन्याय होवूनही शस्त्रे उचलण्याचा वेडेप्णा त्यांनी कधीही, हजारो कारणे असतांनाही, केला नाही यातच त्यांनी मानवतेची महनीय मुल्ये किती जपली याचे सार आले. बाबासाहेबांनी जो मार्ग आखुन दिला त्याचे अनुसरण सर्वांनी केले. वेद-ब्राह्मणे, रामायण-महाभारताने...पुराणांनी सांगितलेल्या मार्गांवर लाथ मारत अहिंसेचे...समतेचे मानवतावादी तत्वद्न्यान स्वीकारत अन्यायी...न्रुशंस अशा व्यवस्थेला जाळा-कापा अशी भाषा न करता स्वत:चे मार्ग शोधले याबद्दल अखिल मानवतावादी आपल्याबद्दल क्रुतद्न्य आहेत...असायलाच हवे. नाहीतर ते आज हे वाचायलाही जीवंत नसते. जे सहज मिळते त्यअचे कौतुक नसते. आज या देशाला शांती मिळाली आहे ती केवळ सर्व शोषितांनी शस्त्र नव्हे तर शांती हे तत्वद्न्यान अंगिकारल्यामुळे. सारी मानवजात क्रुतद्न्यच असायला हवी.....

Wednesday, May 25, 2011

आता श्वानांमागोमाग प्राण्यांवरही संक्रांत!

अखिल विश्व श्वान संघटनेच्या पदाधिका-यांच्या तातडीच्या बैठकीनंतर त्याला जी अचाट प्रसिद्धी मिळाली त्यामुळे अन्य प्राणि-पक्षीजमात अस्वस्थ झाली. त्यांनीही अरण्यात आपासातील वैर-शत्रुत्व विसरून आपापल्या प्रतिनिधींची तातडीची बैठक भरवली. या परिषदेवर चिंतेचे आमाप सावट होते. प्रत्येक प्राणीजातीला आपापल्या भुमिका मांडायची संधी देण्यात आली. यात प्रामुख्याने बैल, उंदीर, गरुड, वाघ, सिंह, सर्प, हत्ती, मोर या प्राण्यांनी आपापल्या भीत्या व्यक्त केल्या. त्याचा थोडक्यात सारांश असा:

मानवी जमातीने प्राणी जगतावर सुड उगविण्याचे ठरवले दिसते आहे. आजवर उंदीर सुखनैव गणेशासोबत तर मोर कार्तिकेयाचे वाहन म्हणुन नांदत होता. वाघ-सिंह हे तर जगदंबेची वाहने. नंदी हे शिवाचे वाहन व त्याला शिवपिंडीसमोर नित्यादराचे स्थान. सर्पाचे शिवगळ्यात प्रिय स्थान. विष्णुची शय्या बनण्याचा मान शेष नागाला. त्याचे वाहन गरुड...हत्तीला सर्व मंदिर-शिल्पांत महत्वाचे स्थान. पण आता श्वानांमागोमाग या प्राण्यांवरही संक्रांत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे व त्यांची शिल्पे हटवण्यात येतील अशी भीति व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही देवचरित्त्रात मुळात एकाही प्राण्याचे स्थान नाही. ज्या पुराणांत हे प्राणी दैवत-जीवनात घुसवण्यात आले आहेत ती धादांत खोटी असून इतिहासाची मोडतोड आहे आणि ती त्या-त्या मुळच्या बहुजनीय दैवतांना बदनाम करण्यासाठी ब्राह्मणांनी घुसवली आहेत, त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय मानवी संघटनांनी घेतला आहे आणि त्यांचा निषेध करत आहोत असा ठराव शेवटी पारित करण्यात आला.

परंतू हा ठराव नेमका कोणाकडॆ पाठवावा आणि कोणामार्फत पाठवावा यावरचा निर्णय अद्याप झालेला नाही असे कळते.

ताजी बातमी: आताच हाती आलेल्या बातमीनुसार प्राणीजगताने आपापल्या संन्निध दैवतांनाच गार्हाणे घालायचे ठरवले पण आजकाल ही दैवतेही कोठे राहतात याबद्दल ते अनभिद्न्य असल्याने मिटल्या डोळ्याने इतिहासाचे शुद्धीकरण पाहण्याचा निर्णय झाला आहे.

Issue of canine statue or dog-eat-dog politics?

http://www.punemirror.in/article/2/2011052620110526063635920244512/Issue-of-canine-statue-or-dogeatdog-politics.html

Issue of canine statue or dog-eat-dog politics?
Sambhaji Brigade’s threat to raze statue of Shivaji’s pet dog in Raigad on June 6 perceived as move against community leaders



Devidas Deshpande

Posted On Thursday, May 26, 2011 at 06:36:22 AM



The capital city of Chhatrapati Shivaji is sullied by new caste politics. The Sambhaji Brigade on Wednesday demanded the removal of a dog’s statue from Raigad. On the other hand, intelligentsia and community leaders see this as a political move against them. In 1674, Shivaji's coronation took place in Raigad Fort where he also breathed his last in 1680.

The statue of the dog, Vaghya, his faithful pet, is built in front of Shivaji's grand memorial (samadhi) at the fort. Legend has it that Vaghya threw himself into the pyre during Shivaji's funeral. The memorial was built with a donation by Indore’s Prince Tukoji Holkar in 1906 who gave Rs 5,000 towards the dog's statue. Holkar belonged to the Dhangar (shepherds) community and members of this community believe the dog to be next to god.

Sambhaji Brigade’s state president, Pravin Gaikwad and district president, Vikas Pasalkar gave an ultimatum till June 6 (the day the Shivaji coronation ceremony is celebrated every year) to remove it failing which the Brigade's members will raze the statue.

“This memorial is that of one of Shivaji's queens. However, we don't have evidence to pinpoint whose memorial it is. But there is no proof of Vaghya the dog in historical documents and hence it is another attempt to twist historical facts,” they said. The Brigade is more upset because the dog’s statue is of the same height as Shivaji’s memorial.




The Maratha organization wants this dog statue removed before June 6 — the day Shivaji was coronated king

The demand has met with stiff opposition and led to resentment among non-Brahmin communities and academicians alike. Sanjay Sonawani, author of 62 books in Marathi, opined, “There is no evidence to suggest that this memorial belongs to Shivaji's queens.

Even if we accept that for the sake of argument, why were these organisations and the Maratha community silent for all these years? The two branches of Shivaji's clan, Satara and Kolhapur, never did anything to help build Shivaji's memorial. It was through the efforts of the Brahmins and Holkar, that the structure that we see today has come up. Destroying it will be negating the efforts of those who worked from 1915-1936 for these memorials.”

Sonawani opined that the Brigade is buoyed by their ‘victory’ in Dadoji statue issue and is now looking for their next target. “All the signs point to political game where other castes and communities are being marginalised. First, it was Maratha-Brahmin politics, now it is Maratha-Non-Maratha one,” he said. Raigad was the capital during Shivaji’s rule.

It was in use till 1818 when the Maratha empire under the Peshwas was usurped by the British. who destroyed the fort over a period of two days with artillery shells. It was neglected till 1879 when Mahatma Phule first visited the fort and cleaned Shivaji’s memorial site. Later, Lokmanya Tilak started a campaign to rebuild the memorial with donations from the public. Shivaji’s memorial was built in 1926 while the dog’s statue came up in 1936.

Professor Hari Narke, head of Mahatma Jotiba Phule chair in the University of Pune said that Krishnaji Keluskar was the first to write Shivaji's biography in Marathi as well as in English. He incurred huge debts at that time and it was Tukoji Holkar who helped him out. “Keluskar wrote in his book that people taking Shivaji's name (meaning Marathas) are not helping him.

But Holkar lent a hand,” said Narke. “Will it be correct to remove the statue after keeping mum for so long? Isn't this heralding politics against nomadic tribes and OBC,” he asked. Mahadev Jankar, National President of Rashtriya Samaj Party and Dhangar community leader, echoed same sentiment. He said that the community is watching events as they unfold.

Tuesday, May 24, 2011

इतिहासाची पुनर्रचना म्हणजे फक्त तोडफोड नव्हे.

१. बहुजनीय चळवळ सुरु होवून आता जवळपास १२५ वर्ष झाली आहेत. ब्राह्मणी-सावकारी व्यवस्था, वर्चस्व नाकारत स्वत:ची पाळेमुळे शोधणे आणि बहुजनांची प्रगती जाती-भेदातीत पायावर साध्य करणे हा तिचा हेतू होता. हा हेतू उदात्त आहे यात शंका असण्याचे कारण नाही. परंतु अलीकडे बहुजनीय चळवळ म्हणजे फक्त ब्राह्मणांना शिव्या देणे येथेच अडकली आहे. ब्राह्मणांना शिव्या दिल्याने कोणाचे पोट भरणार असेल तर त्यालाही हरकत नाही, पण तसे सामाजिक=समाजार्थिक वास्तव नाही. खरे तर बहुजनांना पुढची प्रगती साधायची असेल, ब्राह्मणी वर्चस्व खरोखर फेकून द्यायचे असेल तर ब्राह्मणातील "ब्र" सुद्धा न काढता द्न्यानाची व प्रगतीची नवी शिखरे ढुंढाळली पाहिजेत. त्यासाठी तरुणांत व्यापक प्रबोधन घडवून आणले पाहिजे. हे कार्य खरे चळवळीचे उद्दिष्ट असले पाहिजे.

२. इतिहासाचे पुनर्लेखन हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. ब्राह्मण इतिहासकार अपवाद वगळता ब्राह्मण-पुर्वग्रहाने भरलेला इतिहास लिहितात हे वास्तव आहे. मग तो सिंधु संस्क्रुतीचा कौरव-पांडवांचा...रामाचा वा...सातवाहनांचा असो कि झाशीच्या राणीचा. रामायण-महाभारत ते पुराणे या तर ब्राह्मणमाहात्म्यानेच भरलेल्या आहेत. श्रुती-स्म्रुतींची तर गोष्टच विचारायला नको. आजही मनुस्म्रुती ही समाजधारणेसाठी योग्य आहे असे विद्वान सांगतच असतात. परंतू याची प्रतिक्रिया म्हणुन जो पुर्वग्रहविरहित सत्येतिहास बहुजनीय संशोधकांनी मांडायला हवा तसे होत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे. झोकून देवून कठोर परिश्रम घेत एकेका विषयाला तडीस नेण्याऐवजी पुन्हा नवे पुर्वग्रहदुषित इतिहास लेखन झटपट करून पटापट प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास बहुजनीय संशोधकांना होतो आहे आणि ही चांगली बाब नाही. या संशोधनामागील हेतू निर्मळ नसतात तर केवळ ब्राह्मणांना शिव्या देणे हीच इतिकर्तव्यता त्यात सामावलेली दिसते. एवढेच नव्हे तर हे दुश्क्रुत्य करत असता आपण नकळत बहुजनांचाही इतिहास पुसत असतो याचे भान उरलेले नाही. याला इतिहासाचे शुद्धीकरण म्हणता येत नाही. उलट ते अनेकदा हास्यास्पद बनून जाते. खरे तर सत्येतिहासाच्या शोधासाठी खूप मोठा वाव आहे. पण त्यासाठी किती बहुजनीय ग्रंथालये, संशोधन संस्था आणि संशोधक आहेत हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावर बहुजनीयांनी साकल्याने विचार केला पाहिजे.

३. प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांनी वर्चस्व निर्माण केले असल्याने बहुजनीय प्रतिभेला वाव मिळत नाही हा आक्षेप घेतला जातो. बहुजनांना मुद्दाम डावलले जाते असेही म्हटले जाते. पण येथे एक प्रश्न असा उद्भवतो कि चळवळीने किती कलाकार घडवले, जोपासले? दुसरा प्रश्न असा कि त्यासाठी किती मंच उपलब्ध करुन दिले? आपण साहित्य-संस्क्रुती चलवळ घडवण्यात किती हातभार लावला? बहुजनीय साहित्य सम्मेलने ही जातीधारित आहेत. त्या-त्या जातीचेच लेखक (लायकी काहीही असो) अध्यक्ष म्हणुन निवडले जातात. हे बहुजनीय चळवळीचे अपयश नव्हे काय? जातीयवाद संपवायची भाषा करणारेच जातीयवाद अगदी खुलेपणे जपत असतील तर चलवळ ही बहुजनीय न होता त्या-त्या जातीच्या परिघापुरती-स्वार्थापुरती मर्यादित झाली आहे असेच म्हणावे लागेल. आणि हा फुले-आंबेडकर-शाहुवाद्यांचा-वादाचा पराभव आहे.

दुसरे असे कि द्न्यानलालसा आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यातुनच समाजाची प्रगती होते. एकीकडे शेतक-यांच्या आत्महत्त्या होतात. चळवळीने यावर काय समाजकार्य केले हा प्रश्न विचारला तर काहीही नाही असेच उत्तर समोर येते. शेतकरी हे बहुजन नाहीत काय? जात कोणतीही असो. अर्ध शिक्षित बेरोजगारांच्या फौजा गावोगावी निर्माण होत आहेत. त्यांना शेतीतही रस नाही आणि नोक-याही मिळत नाहीत. नैराश्याने घेरलेल्या या तरुणांना समोचित मार्गदर्शन करणे, छोट्या-मोठया व्यवसायांसाठी प्रेरीत करणे हे चळवळीचे कार्य नाही काय? अशा प्रबोधनासाठी चळवळी राबल्या तर सारेच त्यांचा आदर करतील...धन्यवाद देतील.

४. इतिहासाची पुनर्रचना म्हणजे फक्त तोडफोड नव्हे. तोडफोडींची भाषा झटपट प्रसिद्धी देते...दहशत निर्माण करते हे खरे आहे पण अशा भाषेचा अंतही लवकरच होतो कारण शेवटी उशीरा का होईना तिच्यावर प्रतिक्रिया यायला लागते. आणि त्यातून एक नकारात्मक भावना समाजात निर्माण होते...अगदी बहुजनीयांतही, याचे भान चळवळीने ठेवले पाहिजे. पण ते तसे असल्याचे दुर्दैवाने दिसत नाही. पराकोटीचा हिंदुत्ववाद हा आता विध्वंसक-दहशतवादीही होवू लागला आहे. या हिंदुत्ववादाच्या आहारी असंख्य बहुजनीय तरुण धर्माच्या नावावर जात आहेत. इस्लाम/ख्रिस्ती हे त्यांना शत्रू म्हणुन दाखवले जातात....त्या विखारी प्रचाराला ही तरुण पोरे बळी पडतात. त्यांना पेटवण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी भडकपणे सांगण्यात येतात. सनातन प्रभात हे एक त्याचे उदाहरण आहे. पण तसेच दुष्कार्य बहुजनीय संघटना करत असतील तर ते क्षम्य नाही. उलट अशा हिंसकतेकडे वाटचाल करू पाहणा-या समाजाला वैचारिकतेच्या पायावर, सत्य मांडत रोखण्याचे प्रयत्न करण्या ऐवजी बहुजनीय संघटनाही ब्राह्मणांबाबत तसाच विखार पसरवत असतील तर त्याचा निषेध करणे आणि त्यांच्यात आणि आपल्यात काहीएक फरक नाही असे म्हणने क्रमप्राप्त आहे. आणि तसेच असेल तर ब्राह्मण हा एकमेव शत्रू असे दर्शवण्याचा कसलाही अधिकार नाही कारण क्ट्टरतावादी ब्राह्मण आणि आपल्यात काहीएक फरक दाखवता येणार नाही. पण तसे होते आहे आणि हे बहुजनीय चळवळीचे घोर पतन आहे.

५. बहुजनांत पुर्वास्प्रुश्य, भटके-विमुक्त-आदिवासी येतात कि नाही असा प्रश्न काही विचारतात. हा प्रश्न एका साम्जेतिहासाच्या अर्थाने बरोबर आहे. कारण या शोषित-वंचित वर्गावर अन्याय-अत्याचार करण्यात बहुजनही अग्रेसरच राहिले आहेत. हे सारे ब्राह्मणी डोक्याचा आणि बहुजनीय मनगटांचा वापर करून झाले त्यामुळे मुख्य दोष ब्राह्मणांवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या चातुर्वर्ण्य पद्धतीवर जातो असा युक्तिवाद केला जातो....आणि आम्ही दोषमुक्त आहोत असा स्वयं-निकालही दिला जातो. पण ते पुर्णपणे खरे नाही. मानवताहीण-धर्मशरण आणि स्वार्थपरायण लोक नेहमीच शोषिताला पुर्णशोषित तर वंचिताला देशोधडीला लावण्याचे कार्य करण्यात अग्रेसर असतात. करुणेचा उदात्त क्षण या वर्गाला कधीही अनुभवता येत नाही. आला नाही. सारी पापे ब्राह्म्णांच्या बोकांडी टाकून पापक्षालन होत नसते. आजही या शोषित वंचितांचा वापर आपली मनगटशाही दाखब्वण्यासाठी होत असेल तर चळवळ कोठेतरी फसली आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. दलितांवरील अत्याचार आजही कमी झालेले नाहीत. आपल्यापेक्षा सामाजिक स्तरावरील कनिष्ठ वा गरीब वर्गावर हुकुमत गाजवण्याचे प्रयत्न जगभर होत असतात आणि आपण पुरोगामी म्हनवणारे त्यात अग्रेसर आहोत ही आपल्यालाच शरम वाटण्याची बाब आहे. या द्रुष्टीने बहुजनीय चळवळ सपशेल फसली आहे असेच म्हणावे लागते आणि त्यावर नि:पक्षपाती चिंतन करण्याची गरज आहे. ते होण्याची शक्यता मला फारच धुसर दिसते आहे.

६. अर्थात निराश व्हावे अशी स्थीति आहे असेही नाही. व्यक्तिगत पातळीवर असंख्य बहुजनीय तरूण खरोखर द्न्यन-विद्न्यान-अर्थ या क्षेत्रांत झपाट्याने पुढे येतच आहेत. प्रस्थापितांशी ते त्या बळावर टक्कर घेतच आहेत. त्यांचा तो व्यक्तिगत संघर्ष त्यांना नव्या दिशा शोधायला लावतच आहे. दुर्दैव एवढेच कि त्या संघर्षाला-वेदनांना साय होण्यासाठी बहुजनीय एकही संघटना पुढे आलेली नाही. किंबहुना तो त्यांच्या कार्यक्रमातच नाही. सध्यस्थीतित एवढेच म्हणावे लागते कि बहुजनीय ज्याही प्रगतीच्या वाटा क्रमत आहेत त्या त्यांच्या स्वयंप्रेरणांनी. त्यांना प्रेरीत करणारे इतिहासात होवून गेले. वर्तमानात उरले आहेत ते दिग्भ्रमित करणारे...अकारण (म्हणजे फक्त स्वकारण) त्यांच्याच वाटेत काटे पेरणारे...

चळवळींनी बदलायला हवे. सकारात्मक व्हायला हवे. तोडफोडीऐवजी नवनिर्मानाची आस धरायला हवी...मानवी जीवनाला नवा अर्थ देण्याची क्षमता असायला हवी...अर्थात त्यासाठी स्वता या संघटनांनाच बदलावे लागेल. विचारांची दिशा विध्वंसक नव्हे तर सकारात्मक बनवावी लागेल. तरच चळवळ व्यापक होईल आणि आदरणीय होईल यावर माझा विश्वास आहे.

(मी गतवर्षी अंबेजोगाई येथे दिलेल्या व नंतरच्या काही भाषणांचा हा सारांश. उपयोग होईल कि नाही माहित नाही...पण आपला एक प्रयत्न...)

Sunday, May 22, 2011

वाघ्या...पुन्हा...

वाघ्याचा विषय निघाल्यानंतर मी लिहिले. त्याला इतिहासाची डुब होती....ती माणसांच्या. माणसांचा इतिहास हा बव्हंशी क्रुतघ्नतेने भरला आहे हे आपण अनुभवतोच. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या पातळीवर क्रुतघ्न असतेच. अपवाद असतो...पण अपवादांनीच नियम सिद्ध होत असतात.

शिकारी-मानव पशुपालक झाला ही जागतीक इतिहासाला मिळालेली एक फार मोठी कलाटणी आहे. कुत्रा हा प्राणी तसा शिकारीच...कळप करून झूडीने शिकारी करणारा. पण पशूपालक मानवाने या प्राण्याला सर्वात आधी माणसाळवले. कुत्राला माणसाळवणे आणि त्याला आपल्या जीवनाचा नुसता रक्षक नव्हे तर त्याला देवत्व देणे हा मानवी क्रुतद्न्यतेचा एक महत्वाचा टप्पा आहे. महराष्ट्रातील पशुपालक धनगर-क्रुरुब समाजाने कुत्र्याला असेच देवत्व दिले. त्याची पुजा बांधली. आपल्याच आराध्य अशा पुर्वज-दैवत खंडोबाशी त्याची अखंड नाळ जुळवली. त्याला आपल्या भावविश्वात अनन्य साधारण असे स्थान दिले. धनी गावी जातोय असे दिसले कि मागोमाग मैलोंमैल धावणा-या प्रेमळ कुत्र्यांच्या कथा कमी नाहीत. धनी संकटात सापडला कि जीवाच्या बाजी लावणा-या कुत्रांच्या कथा कमी नाहीत. जीव देणारे कुत्रेही कमी नाहीत. मी वरुडे गावात मालक सर्पदंशाने मेला तेंव्हा कुत्राने अन्नत्याग करून जीव दिल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मी पाहिले आहे.

शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला याचे पुरावे नाहीत म्हणुन वाघ्या ही फक्त एक दंतकथा घ्यावी असे म्हणणे समजावून घेउयात. मुख्यत: माणसांचाच इतिहास हा पुरेसा लिहिला गेला नाही तर मुक्या प्राण्यांचा कोण लिहिणार? तानाजीच्या घोरपडीला कोणत्या इतिहासाचा आधार आहे? पण ती जनमानसातील एक श्रद्धा आहे आणि ती वेगळ्या अर्थाने घ्यावी लागते. ती जनसामान्यांच्या प्रतिभेचे एक आविश्करण म्हणुन पहावी लागते. कवि भुषण त्याच्या शिवकाव्यात अति-आलंकारिक लिहितो त्याला आपण इतिहास मानत नाही. पण म्हणुन आपण कवि भुषण हा अनैतिहासिक लिहिणारा कवि म्हणुन नाकारतही नाही. हा आपल्या मानव जातीचा दांभिकपना नव्हे काय?

पण येथेच थांबता येत नाही. वाघ्या होता कि नव्हता हा प्रश्न महत्वाचा नसून त्याच्या स्मारकाचा वाद का हा प्रश्न निर्माण होतो कारण जनमानसातील प्रांजळ भावना आणि दंतकथा यातील आंतरसंबंध समजावुन न घेता इतिहासात नाही ते तोडुन टाका या विध्वंसक प्रेरणा यामागे आहेत असे दिसते.

शिव-स्मारक व वाघ्याचे स्मारक तुकोजीराव होळकर यांच्या देणगीतुन झाले हे मी आधीच्या लेखात लिहिलेच आहे. गडकरींच्या राजसंन्यास या नाटकातील अचाट कल्पकतेतुन वाघ्या साकारला हे मत मान्य केले तरी त्याला दंतकथेचा आधार होताच. कोणताही लेखक कल्पनेने काहीही फुलवू शकतो...पण त्याला कोठेतरी ऐकिव का असेना माहितीचा अधार असतो. मी राजसंन्यास वाचलेले नाही. पण मला वाघ्याची कथा शिंगाडवाडीच्या धनगरांकडुन लहाणपणी ऐकायला मिळालेली आहे. म्हणजे ती जनमानसात रुजलेली कुत्र्याच्या इमानीपणाची कहानी होती. या धनगरांनी राजसंन्यास वाचले वा पाहिले असल्याची शक्यता नाही.

म्हणजे शिवस्मारक (समाधी) ते कुत्र्याचे स्मारक होळकर या धनगराने करावे आणि तेंव्हा सातारकर आणि कोल्हापुरकर चिडीचूप असावेत आणि आता आयजीच्या जीवावर बायजी उधार या न्यायाने ज्यांचा कसलाच या प्रकरणाशी संबंध नाही त्यांब्नी मात्र कांगावा करावा हे काहीतरी विचित्र आहे.

बरे...तुकोजीराव होळकरांचे शिवराय प्रेमींवर अन्य अनंत उपकार आहेत. श्री, क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली पहिले गद्य शिवचरित्र सिद्ध केले. पण या प्रकरणात त्यांना रु. २०,०००/- चे कर्ज झाले. हे कर्ज छत्रपतींच्या वारसदारांनी नव्हे तर खुद्द तुकोजी होळकरांनी फेडले...एवढेच नव्हे तर त्याचे अनेक भाषांत भाषांतर करवून घेवुन जवळपास ४५०० प्रती जगभरच्या ग्रंथालयांना पाठवल्या. हे कार्य करणारे मराठा नव्हे तर एक धनगर संस्थनिक होता याचे सोयिस्कर विस्मरण होते आहे.

येथे जातीचा प्रश्न नाही. असूही नये. प्रश्न आहे तो त्या समाजापोटीच्या क्रुतद्न्यतेचा. कुत्र्याच्या समाधीलाही पैसे दिले ते होळकरांनी. ते पैसे घेणारे आणि ते स्मारक बांधणारे अजुन वेगळ्या जातीचे असतील. पण त्यामागे शिवरायांचा अवमान व्हावा असे कोणाला तरी वाटेल काय?

वाघ्याचे स्मारक हटवणे हा अट्टाग्रह जो अचानक उफाळुन आला आहे त्यामागची कारणे आपणास वरील विवेचनात आढळतील. ज्यांनी शिवसमाधी जवळपास १०० वर्ष दुर्लक्षित ठेवली त्यांना याबद्दल बोलायचा मुळात अधिकारच नाही. ज्या धनगर संस्थानिकाने तीची नव-उभारणी केली आणि भले इतिहासात असो कि नसो- शिवरायांचा असो कि नसो-अशा धनगरांच्या प्रिय वाघ्या कुत्राची समाधी बनवली असेल तर ती आहे तशीच रहायला हवी. त्यावर बोट ठेवण्याचा अधिकार या नव-ब्राह्मणांना कोणीही दिलेला नाही. ती सईबाईंची मुळ समाधी होती कि पुतळाबाईंची...यावर वाद घालत रहा...कारण ती मुळ कोणाची हे तुम्हाला सांगता येतच नाही यातच सारे काही आले.

IN ADDTION: UPDATE:


सतीचे व्रुंदावन असते...मंदिरही बनली आहेत. राजस्थानमधील अलीकडचेच उदाहरणही सर्वद्न्यात आहेच. परंतु शिवरायांच्या सती गेलेल्या पुतळाबाईंचे व्रुंदवन वा मंदिर कोठेतरी रायगडावर असायला हवे. दुसरे असे कि समजा आताचा चौथरा हा पुतळाबाई वा सईबाईंचा आहे तर तो त्या पत्नी असल्याने शिवरायांच्या समाधीच्या बाजुला असायला हवा...समोर नव्हे.

पण सईबाईंची समाधी ही पद्मावती माची (राजगड) येथे पद्मावती देवीच्या मंदिरासमोर आहे. म्हणजे शिवस्मारकासमोरील चौथरा सईबाईंचा नाही हे नक्की सांगता येते. पद्मावतीचे मंदिर स्वता: शिवरायांनी बांधुन घेतले होते.

शिवमंदिरात शिवलिंगाच्या समोर नंदी असतो...तसेच येथेही आहे. पत्नीची समाधी असती तर ती बाजुला जोडीने असती.यावरही विचार करावा लागेल.

आणि आताच्या वाघ्याचा म्हनवला जाणारा चोव्थरा हे व्रुंदावन नाही हे तर नक्कि. व्रुंदावन वर निमुळते होत जाते. चौथ-या प्रमाणे नसते. म्हणजे हा चौथरा पुतळाबाईचे स्मारक असू शकणे अत्यंत अवघड आहे. आणि ती सईबाईंची समाधी असणे तर शक्यच नाही कारण ती राजगडावर आहे. जे समोर आहे ते वाघ्याचेच मुळचे स्मारक असले पाहिजे असे आता अधिक तीव्रतेने जाणवू लागले आहे. सत्यशोधन ही टप्प्या-टप्प्याने होणारी बाब आहे. अजून काहीतरी सामोरे येईल.

म्हणजे सईबाईंची समाधी कोठे आहे हे आता आपल्याला माहितच आहे. हा चौथरा आता पुतळाबाईचा आहे कि वाघ्याचा एवढाच प्रश्न उरतो. महाराणी सईबाईंचा म्रुत्यु १६५९ ला झाला. त्यांची समाधी आजही सर्वांना माहित आहे. जनस्मरणात आहे. प्रश्न असा पडतो कि शिव-निधनानंतर (१६८०) सती गेलेल्या पुतळाबाईंचे स्मारक कोणाच्याही स्मरणातून जाणे असंभाव्य आहे. सतीस्थान हे अंधश्रद्धाळु लोकांना जास्त प्रिय असते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे १८१८ ला ब्रिटिशांनी रायगड तोफांचा भडिमार करून उद्ध्वस्त केला असला तरी जनमानसातुन सतीचे स्मारक गेले नसते. पण तसे झालेले दिसत नाही.

पुतळाबाई शिवनिधनानंतर लगोलग सती गेल्या कि नंतर याबद्दल विवाद आहेच. सईबाई आणि सोयराबाई यांचे शिवजीवनात जेही काही स्थान आहे तेवढे अन्य पत्न्यांबद्दल नव्हते हेही आपण इतिहासात पाहू शकतो. पुतळाबाईंना अपत्य नसल्यामुळे त्यांना सती जाण्यास भाग पाडले गेले असल्याचा संशय या निमित्ताने उद्बवतो. तसे असले तरी त्यांचे व्रुंदावन वा मंदिर उभे करणे आवश्यक झाले असते. आणि झाले असते तर ते हिंदु समजुतींनुसार एक पुज्य ठिकाण बनले असते. त्या जागी वाघ्या कुत्र्याचे स्मारक बनणे असंभाव्य होते. सतीस्थानाचे पावित्र्य अगदी ब्राह्मनही बिघडवू शकण्याची धार्मिक शक्यता नाही. त्या काळातील धर्मप्रभावाचे माहात्म्य या संदर्भात तपासुन पहावे. त्यामुळे ब्राह्मणांनी होळकर म्हणा कि मराठ्यांचा अवमान करण्यासाठी पुतळाबाईंच्या चौथ-याठिकाणी कुत्राची समाधी बनवली याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे असे आरोप अद्न्यानमुलक आहेत असेच आता तरी म्हणावे लागते.

आता प्रश्न उद्भवतो तो हा कि मग पुतळाबाईंचे व्रुंदावन वा स्मारक वा मंदिर गेले कोठे? ते मुळात केले गेले होते कि नाही? त्यासाठी शिवरायांच्या दुर्दैवी म्रुत्युनंतरच्या ज्याही काही वेगवान राजकीय घटना घडल्या त्यांचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. संभाजीराजे हे जणु काही स्वराज्याचे शत्रू अहेत असेच वातावरण निर्माण करण्यात आले होते आणि त्यांना अटक करण्याचे हुकुम रवाना होते. र्रायगडाचे दरवाजे बंद होते आणि महाराजांचा म्रुत्यु लपवण्यात आला होता. लगोलग झालेल्या सताप्राप्तीच्या संघर्षात पुतळाबाई कोण स्मरणात ठेवणार? त्यात त्या निपुत्रिक...त्यामुळे तत्कालीन राजकारणात काही उपयोगाच्या नाहित असे वाटणे स्वाभाविक. असो. त्यांचे व्रुंदावन वा स्मारक मुळात त्या राजकीय धामधुमीत केले गेले कि नाही हा प्रश्न आहेच आणि केले गेले नसावेच असे वाटावे अशी स्थिती दिसते. कारण तो काळ अतिवेगवान राजकीय घडामोडींचा होता आणि शेवटी कोणाचे वर्चस्व याचा निकाल लावण्यासाठी होता.

मग प्रश्न असा उद्भवतो तो चौथरा कोणाचा? तो सती पुतळाबाईंचा असेल तर त्याची स्म्रुती अल्पावधीत कशी विस्मरणात गेली? तो नेमका कधी बांधला? त्या चौथ-याचे कार्बन डॆटींग करून पहायला काय हरकत आहे? वघ्याचा पुतळा नंतर वसवला हे आपणास माहितच आहे. तत्पुर्वी तो चौथरा कोणाचा हे कोणालाच माहित नव्हते असे म्हनने अनैतिहासिक आहे कारन जनस्म्रुती या अतिरंजित झाल्या तरी इतिहासाचे पदर बव्हंशी असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे जसे वाघ्या कुत्र्यचे संदर्भ तत्कालीन इतिहासात-बखरींत-पवाड्यांत मिळत नाहीत तसेच पुतळाबाईंच्या स्मारकाचेही मिळत नाहीत. हे स्मारक फक्त शंभुराजांच्च्या नव-कारकिर्दीत शक्य होते...ते केल्याचे उल्लेख शंभुराजांच्या इतिहासातही सापडत नाही. यावर अधिक विचारमंथनाची गरज आहे.

कादंब-यांच्या जन्मकथा: सव्यसाची

बाबरी मशीद पडली. दंगे उसळले. नंतर दाउद ग्यांगने देशभर विस्फोट करुन हजारों निरपराधांचा बळी घेतला. या प्रतिगामी शक्तिंच्या प्रबळ असण्याच्या काळात (हिंदुत्ववादी असोत कि मुस्लिम) देशात एक नवी अर्थ क्रांतीही घडत होती. भारत जागतिकिकरणाच्या लाटेत, नाईलाजाने का होईना) सामील होऊ लागला होता. एरवी ज्या वर्गाने उद्योगधंद्यात पडण्याचे स्वप्नही पाहिले नसते असा नव-उद्योजक वर्ग जोमाने पुढे येवू लागला. त्यात मीही होतो. देशात वेगाने आर्थिक बदल घडु लागले. मानवी जीवनाचा चेहरा-मोहरा झपाट्याने बदलू लागला. नव्या आशा-आकांक्षांची रुजुवात व्हायला लागली. मानवी संबंधांत बदल घडु लागले. गुन्हेगारी जगही पुर्वापार मटका-स्मगलिंगच्या पारंपारिक गुन्हेगारीतुन बाहेर पडत सुपारी किंग, खंडणी बहाद्दर ते परकीय शक्तींचे हस्तक होत देशद्रोही विघातक कार्यातही गुंतू लागले. मला स्वत:ला १९९८ साली खंडणी प्रकरणाला तोंड द्यावे लागले. मी खंदणीबहाद्दरांना गजाआड केले हे खरे, पण सर्वांनाच असे साहस दाखवायला जमत नाही. एक नवी समांतर काळी अर्थव्यवस्था झपाट्याने वाढू लागली. मी १९८३ ते ९० सालापर्यंत पत्रकार होतो. तेंव्हाची पत्रकारीय नीतिमुल्येही आता झपाट्याने बदलू लागली असे मी पाहू लागलो. एकुणात सर्वच समाज घुसळला जात होता. कोठे संभ्रम तर कोठे दु:साहसवाद.

हा बदल विलक्षण होता. सामाजिक दरी वाढवणारा होता आणी मला जागतिकीकरणाचा राग यायला लागला. देशांतर्गत खुले आर्थिक धोरण आधी स्वीकारुन, लायसेंस राज नष्ट करत देशांतर्गत स्पर्धा निर्माण करत मगच विदेशी कंपन्यांना परवानगी द्यायला हवी होती असे माझे मत बनले होते. आजवर देशांतर्गत लायसेन्स राजमुळे ख-या स्पर्धेत कधीच न उतरलेले उद्योजक एकाएकी मुक्त केले म्हणजे परकीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील हे अशक्यच होते. झालेही तसेच. भारतीय उद्योजकांनी सपाट्याने परकीय कंपन्यांशी संधान बांधत एक तर आपले उद्योग तरी विकले वा तांत्रिक-आर्थिक सहकार्य करार करत आपापले स्वातंत्र्य विकायला काढले. त्यातच पुढे शेयर बाजारात सट्टेबाजांनी या संधीचा कूफायदा घेतला त्यातुनच हर्षद मेहता प्रकरणही झाले.

या सर्व बाबी मी बारकाईने पहात होतो...चिंतन करत होतो. त्यातच राजकारणानेही वेगळे वळण घेतले होते. बाबरी मशीदीच्या पतनानंतर राजकीय समिकरणेही बदलली होती व जातीयवादी शक्ती सत्तेवर येऊ घातली होती.त्यांचेही तत्वज्ञान होते व त्या तत्वज्ञानाच्या प्रवाहात सामील होणारेही अगणित होते.

या सा-या परिवर्तनाचे, सामान्यांच्या या सा-यात होत असणा-या ससेहोलपटीचे चित्रण मला करावे वाटणे स्वाभाविक होते. मी या बदलाचा केंद्रबिंदू म्हणजे राजीवजींचे ह्त्त्या, जागतिकिकरणास सुरुवात आणि ते जातीयवादी शक्तींचा उद्रेक होत बाबरी मशिदीचे पतन एवढ्याच कालखंडात घ्यायचे ठरवून लेखन सुरू केले.

सुरुवात करतांना यात नेमकी किती पात्रे असतील, नायक कोण असेल असा कसलाही विचार मी केला नव्हता. जीवन मुजुमदार, नीलांबरी यापासुन सुरुवात करत मी जसजसा पुढे लिहित गेलो तसतशी असंख्य पात्रे आपसुक कथाक्रमात येत गेली. मानवी जीवनातील व्यक्तिगत संबंध आणि त्यावर परिस्थितीच्या दबावामुळे येणारे ताणतणाव दाखवत या सा-या कथेला मी राष्ट्रीय पार्श्वभूमी देत गेलो.

नीलांबरीचा बाप सव्यसाची हा अंडरवर्ल्डचा एक प्रमूख असावा हे काही पुर्वनिश्चित नव्हते. परंतु मला त्याही विश्वाची दखल घेत एका अवाढव्य उद्योगसमुहाच्या मालकाची पत्नी ही काळ्या जगाच्या सम्राटाचे मुलगी आहे हे दाखवणे कथौघात आवश्यक वाटले. आणि मी तेही नातेसंबंध चित्रित करत गेलो. यातील इन्स्पेक्टर बसू हे अत्यंत आव्हानात्मक पात्र असेच सुचले आणि त्याच्या माध्यमातून मला नुसती कथाच फुलवता आली नाही तर मानवी कारुण्याची अनेक रुपे दाखवता आली.

पण सर्वात महत्वाचे पात्र म्हणजे डेबु...एक साधा झोपडपट्टीतला गुंड... त्याची बायको आणि त्याची रखेली. या पात्रांच्या माध्यमातून मी एकून कथेला सुसंगत, पण वेगळेच विश्व चितारले.

ही कादंबरी लिहित असता मी दर वेळीस विचार करायचो...पुढच्या तरी प्रकरणात मी या कादंबरीचा खरा नायक सव्यसाचीला पुढे अणेल. पण जसजसे लिहित गेलो तसतसे मला त्याची आवश्यकता वाटेना झाली. सव्यसाची हे त्या काळाचे प्रतीक म्हणुनच ठेवायचे असा निर्णय मी घेतला. त्यामुळे संपुर्ण कादंबरीत प्रत्यक्षात हे पात्र कोठेच अवतरत नाही. पण त्यामुळे कादंबरीला वेगळेच परिमाण प्राप्त झाले हेही तेवढेच खरे. एक नवी प्रतिकात्मता मिळाली.

या कादंबरीत असंख्य व्यक्तित्वे आहेत. त्या अर्थाने या कादंबरीला नायक नाहीच. या कादंबरीत सर्वच स्तरांवरील पात्रे आहेत. आणि ती सर्वच कोणत्या ना कोणत्या पातळीवर जनसमाजाचे प्रतिनिधित्व करतात.

या कादंबरीचा शेवट हा मात्र माझा अत्यंत लाडका आहे कारण आपली पत्नी दुस-यापासून गरोदर आहे हे कळुनही हरलेला खचलेला जीवन मुजुमदार जेंव्हा हुगळीच्या काठी वैश्विक परिप्रेक्षात जीवनाचा...त्यातील अनिश्चिततेचा विचार करतो...चिंतन करतो आणि क्षमाशील बनतो...हा भाग लिहितांना आव्हानात्मक होता.

या कादंबरीतील अनेक प्रसंग मुळातच वाचावे असे आहेत.

ही कादंबरी मी कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर लिहिली. त्यासाठे मी आधी कलकत्त्याला जावून २ महिने राहिलो...तेथील गल्ल्याबोळ ते उच्चभ्रु अशा साल्ट लेक सिटी परिसरातही राहिलो. बंगाली रीतिरिवाज-संस्क्रुती समजावून घेतली. ते आवश्यकच होते.

का?

या प्रश्नाचे उतर तत्कालीन स्थितीत दडलेले आहे आणि ते नंतर जेंव्हा खुद्द दैनिक सामनात या कादंबरीचे परिक्षण आले त्यातही गर्भित आहे. सामनात म्हटले आहे कि लेखकाने खरे महाराष्ट्रातील कथानक कलकत्त्यात नेवून चतुराई केली आहे कारण त्यातील अनेक पात्रे महाराष्ट्रातील वास्तवाशी जुळतात...अन्यथा ही कादंबरी आणि ती छापणारा प्रेस जाळून टाकला गेला असता. आणि ते खरेही आहे. हिंदुत्ववादी मंडळी या कादंबरीवर खूप नाराज होती. त्यांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक धमक्याही दिल्या...पण बधणारा मी थोडाच?

ते महत्वाचे नाही. बंगाली संस्क्रुतीचे मला लहाणपणापासुनचे आकर्षण आहे. मी असंख्य बंगाली कादंब-या वाचल्या आहेत एवढेच नव्हे तर मी थोडीफार बंगाली शिकलेलोही आहे. शिल्पी नावाची एक बंगाली तरूणी माझे मैत्रीणही होती आणि तिचे नाव मला एवढे आवडायचे कि मी एका कादंबरीचे नावच "शिल्पी" असे केले होते.

असो. ही कादंबरी माझी आजवरची सर्वात मोठी कादंबरी. ५५० वरच्या पानांची. तिचे स्वागत चांगले झाले. दुसरी आव्रुत्ती वर्षभरात निघाली. असे भाग्य शक्यतो ऐतिहासिक कादंब-यांनाच महाराष्ट्रात मिळते. मराठी माणूस हा वर्तमान, वर्तमानातील प्रश्न याबाबत असंवेदनशील असतो....धड माहित नसलेल्या इतिहासाबाबतची त्याची संवेदनशिलता मात्र टोकाची असते हे आपण आजही पहात आहोतच.

तरीही या कादंबरीचे व्यापक समिक्षा झाली. वाचकांनी या कादंबरीचा दुसरा भाग लिहावा यासाठी गा-हाणी घातली. पण दुसरा भाग मी लिहायचा विचारही केला नाही कारण...दुसरे भाग हे दुय्यमच होतात...लेखक आपल्यच मानसपुत्रांच्या प्रेमात पडलेला असतो...शेवटी पहिल्या धारेची ती पहिल्या धारेची...

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5510253221764501349?BookName=Savyasachi

Saturday, May 21, 2011

पुंड्र-धनगर-वाघ्या आणि आम्ही...

महाराष्ट्राचा इतिहास अनेक जनसमुदायांनी घडवला आहे हे मी अनेक लेख-पुस्तकांतून माडला आहेच. येथे मी आज महाराष्ट्रातील आद्य वंशांबद्दल लिहिणार आहे आणि त्याचे वर्तमानाशी असलेले तादात्म्य दाखवत या आद्य वंशीयांशी कशी प्रतारणा होत आहे हे दाखवणार आहे.

पुंड्र आणि औंड्र (आणि मुतीब, शबर) हे महाराष्ट्राचे व दक्षीण भारताचे आद्य रहिवासी-राज्यकर्ते होते. या वंशांची माहिती आपल्याला सर्वप्रथम ऐतरेय ब्राह्मणा (इ.स. पु. ८००) मद्धे मिळते. हे मुळचे असूर वंशीय असून या समाजांचे मुळ पुरुष असूर बळीचे पुत्र होते असा निर्वाळा महाभारताने दिला आहे तर ऐतरेय ब्राह्मण या सरवच वंशांना शुद्र असे संबोधते. पुराणेही त्यांना शुद्रच संबोधतात.

औंड्र लोकांनी पश्चिम बंगाल, ऒडिसा आणि आंध्र (औंड्र चे आंध्र) प्रदेशात सत्ता स्तापत मुक्कम ठोकुन व्यापक शैव संस्क्रुती जोपासली. पुढे ते सातवाहनांच्या रुपात महाराष्ट्रातही आले. तो इतिहास आपल्याला माहितच आहे. पण तत्पुर्वीच पुंड्र लोक महाराष्ट्र ते पार तिरिवारुर पर्यंत पसरले होते. पुंड्रपूर (आजचे पंढरपुर) ही त्यांची येथील आद्य राजधानी होती. हेही शैवच होते हे आपण पंढरपुरच्या पुंड्रिकेश्वर तथा पुंडरिक या शिवमंदिरावरून पाहू शकतो.

हा पुंड्र समाज मुलत: पशुपालक समाज होता. त्यांचीच महाराष्ट्रावर आद्य सत्ता होती. त्याचे लिखित पुरावे आज अप्रत्यक्ष असले तरी आजच्या माहाराष्ट्रीय दैवत-संकल्पनांवरून पुंड्रांचे आस्तित्व केवढे व्यापक होते याचे पुरावे ठाई ठाई विखुरलेले आढळतात. पुढे ईसपु २०० च्या आसपास त्यांचेच नातेसंबंधी औंड्र महाराष्ट्रात सत्ता स्थापू लागले आणि पौंड्र काहीसे मागे पडले. औंड्रही मुख्यता: पशुपालक होते. पण या काळात बौद्ध धर्माचा उत्कर्ष होत असतांना पुंड्रही बौद्ध धर्माच्या कक्षेत गेले. त्यांचाच पुरातन राजा विट्ठल या काळात बुद्ध रुपी मानला जावू लागला.

याचे विस्त्रुत विवेचन मी "विट्ठलाचा नवा शोध" या प्रबंधात केले असल्याने येथे जास्त खोलात न जाता एवढेच सांगतो कि आज धनगर-गवळी व महादेव कोळी या समाजाची पाळेमुळे या पुंड्र व औंड्र समाजात आहेत. पंढरपुरच्या पुंड्रिकेश्वराची पुजा करण्याचा पहिला मान हा महादेव कोळ्यांना आहे तसेच महादेव कोळीही पशुपालक धनगर समाजाप्रमाणे खंडोबाचे अपरंपार भक्त आहेत.

महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात ते दक्षीण भारतात (कुरुब) धनगर समाज अवाढव्य आहे कारण हेच या प्रदेशाचे आध्य संस्थापक आणि राज्यकर्तेही होते. यात अहिरही आले. पण कालांतराने क्रुषी संस्क्रुती जशी सबळ होत गेली हे पशुपालक समाज दुय्यम झाले असले तरी कष्टाळुपणा आणि पुर्वज-व्यवसायाशी असलेल्या अनिवार आस्थेपोटी हा व्यवसाय बंद पडला नाही. खरे तर धनगर ही जात नसून एक जीवनपद्धती आहे आणि त्याचे प्रतिबिंब धनगरे दैवतांत दिसते. विट्ठल हा कुरूब-धनगरांचा देव हे मत डा. रा, चिं, ढेरे यांनी "श्रीविट्ठल एक महासमन्वय" या ग्रंथात व्यक्त केलेच आहे आणि माझेही त्याला अनुमोदन आहे. जेजुरीचा खंडोबा हाही धनगरांचेच मुळ दैवत आहे हे तर स्पष्टच आहे. विट्ठल आणि खंडोबा ही अवैदिक दैवते महाराष्ट्राचे कुलदैवते आहेत. यातच धनगरी (पुंड्र) सत्ता किती महनीय होती आणि त्यातुनच हा धर्म-महाराष्ट्र कसा घडला याचे दिग्दर्शन मिळते. परंतु इतिहासकारांनी हे श्रेय धनगर समाजाला नाकारले आहे (अपवाद वगळता) याचे वैशम्य वाटने स्वाभाविक आहे.


मराठा ही मुळात जात नसून महारास्ट्रातील सातवाहनोत्तर काळात अनेक सरंजामदारांतील वंशमिश्रणातून बनलेली जात आहे हे मी "मराठा कोण आहेत" या लेखात लिहिलेले आहेच. त्यामुळे त्याबद्दल येथे चर्चेत न जाता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.

पशुपालकाच्या जीवनात कुत्राचे स्थान फार महत्वाचे आहे. खंडोबा हा कुत्र्याशिवाय नसतो. वाघ्या-मुरळी ही त्याचीच लोकमानसात रुजलेली प्रतिके आहेत. कुत्रा हा नुसता संरक्षक मित्र नसून तो धनगर समाजाने दैवतासारखा मानला आहे. गुरू दत्त सुद्धा श्वानांखेरीज नाही. ही प्रतिके धनगरी आत्मश्रद्धेतून आलेली आहेत. जीवनव्यवस्थेतून आलेली आहेत. आणि त्याची परंपरा पुरातन आहे.

शौकासाठी धनगर (पुंड्र) कुत्रा पाळत नसून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो नुसता कुत्रा नसतो तर खंडोबाचा पाठीराखा असतो अशी श्रद्धा आहे. असंख्य लोक आजही कुत्रा पाळतात तो एकमेव जीवाभावाचा सखा आहे म्हणुन. माझ्या एका मित्राच्या कुत्र्याला क्यन्सरमुळे मारावे लागले तेंव्हा पोटचा मुलगा मेला असता तरी रडला नसता एवढा रडलेला मित्र मी पाहिला आहे.

मग धनगरांसाठी कुत्रा काय असतो याची कल्पना करता येते. अशा स्थितीत तुकोजी होळकरांनी देनगी देवून नुसती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लौकिक स्वरुपात आणली त्यांनीच महाराजांच्या स्म्रुतीशेष, दंतकथा बनलेल्या कुत्र्याची समाधीही पुनरुज्जीवित केली नसेल तरच नवल. येथे एक बाब लक्षात येते...या दुर्लक्षित शिव-समाधीच्या जीर्णोद्धारासाठी महाराजांचा एकही वंशज देणगी द्यायला समोर आला नाही. हे एक दुर्दैव आहे. आणि आता तुकोजींच्या देणगीतुन उभ्या वाघ्याचे स्मारक हटवा असे म्हटले जात आहे.

हा महाराष्ट्राच्या पुरातन सांस्क्रुतीक इतिहासाचा अवमान नाही काय? वाघ्याच्या स्मारकामुळे शिवरायांचा वा इतिहासाचा काय अवमान होतो? मी गोंधळुन गेलो आहे. हे काय चालले आहे आणि कोठे थांबणार हेच कळेनासे झाले आहे. इतिहास कोठे सुरू होतो आणि प्रांजळ जनमानसीय भावना कोठे सुरू होतात हे न कळताच फक्त भावना भडकावण्याचे कार्य जेंव्हा सुरू होते तेथेच विवेकाचा भीषण म्रुत्यू पहावा लागतो...आणि हे दुर्दैव अजून कितिवेळा येणार आहे हेच समजेनासे झाले आहे.

कादंब-यांच्या जन्मकथा: ऒडिसी

मी १९९० साली हैदराबाद येथे चेन्नई (तेंव्हा मद्रास) येथुन परत येत असताना एका दिवसासाठी थांबलो होतो. तेथे मला वेळ होता म्हणुन सालारजंग म्युझियम पहायला गेलो. तेथील अवाढव्य चित्रदालनात जगविख्यात चित्रकारांची चित्रे वा त्यांच्या बेमालुम प्रती होत्या. येथेच मी जगप्रसिद्ध सुंदरी क्लीओपात्राचा अर्ध-पुतळाही पाहिला...अर्थात तोवर माझी क्लीओपात्रावरील कादंबरी प्रसिद्धही झालेली होती, पण तिचे हे वेगळे दर्शन सुखावणारे होते हे खरेच. असो. मी चित्रदालनात विस्मित होऊन एकाहुन एक श्रेष्ठ चित्र-कलाक्रुती पहात असतांना मी एका चित्राशी येउन थांबलो...आणि पायच उचलेनात. ते चित्र स्त्री सौंदर्याचे करुणामय दर्शन घडवणारे होते. हे चित्र अरियाडनी या ग्रीक पुराकथेतील प्रियकराने त्यागलेल्या तरुणीचे आहे एवढेच चित्राखालील मजकुराने मला कळाले. पण एकंदरीत त्या चित्रातील करूण भावाने मला पछाडले.

तोवर मला ग्रीक पुराकथांशी साधी तोंडओळखही नव्हती. मी रेल्वेने पुण्याला येत असतांना त्यावरच विचार करत होतो. पुण्यात आल्यावर मी काही मित्रांना अरियादनीबद्दल माहिती आहे का असे विचारले. पण कोणालाच माहित नव्हते. ज्याअर्थी ही स्त्री एका जगप्रसिद्ध चित्राचा विषय बनली म्हणजे ती पुरा-प्रसिद्ध असणार हे तर उघडच होते. तेंव्हा इंटरनेट नामक म्हटले तर उपयुक्त आणि म्हटले तर भस्मासूर या तंत्रद्न्यानाचा आपल्याकडे गंधही नव्हता. मी ब्रिटिश लायब्ररीचा सदस्य होतोच. तेथे शोध घेता घेता मला ग्रीक पुराकथांवरील अपरंपार सामग्री मिळाली. अरियादनीला तिच्या प्रियकराने, थिसियसने एका निर्जन बेटावर त्यागल्याने दु:खसंतप्त अरियादनीच्या अंतरीची गुढे उलगडली.

मग लक्षात आले...ग्रीक पुराकथा आपल्याकडे माहितच नाहीत...पण तरीही ग्रीक पुरा-व्यक्ती मात्र प्रिय आहेत. असंख्य वास्तु-वस्तु ते सिनेमाग्रुहांची नावे ग्रीक पुराकथांमधीलच आहेत. पण त्यामागील इतिहास कोणालाच माहित नाही. यातुनच "ग्रीक संस्क्रुती कोश"  कल्पना माझ्या मनात रुजली. या कोशात सर्वच ग्रीक व्यक्तिरेखा, वास्तू, देवता, खलनायक, सांस्क्रुती, शास्त्र, तत्वद्न्यान ई सर्वच सामावले जावे हे मी मनावर घेतले. आणि एकदा एखादा विषय डोक्यात घुसला कि त्याचा फडशा पाडल्याखेरीज थांबायचे नाही हा माझा स्वभाव. मग काय...मी हात धुउन कोशपुर्तीसाठी मागे लागलो. अधिक माहितीसाठी पार दिल्ली येथील ग्रीक दुतावासाचीही मदत मिळवली.

कोश सुरू करण्याआधी मला पुराकथा ते प्राचीन इतिहास याचा अभ्यास करणे आधी क्रमप्राप्तच होते. आणि स्वाभाविकपणे भारतीय पुराकथा नि तत्वद्न्यान आणि ग्रीक पुराकथा नि तत्वद्न्यान यांची तुलनाही होतच होती. या अभ्यासाने मला फार वेगळी द्रुष्टी दिली. भारतीय पुराकथा या बव्हंशी अतिअवास्तववादी व भावनीक धर्मगंडाने व्यापल्या असून ग्रीक पुराकथा या तुलनेने अति-मानववादी आहेत हे लक्षाय्त येवू लागले. म्हणजे ग्रीक देवता या मानवी स्वभावाचे अतिरिक्त दैवतीकरण होते. राग-लोभ-मत्सर-कपट-स्वैराचार-ऐन वेळीस बाजू बदलने ईईई मानवी स्वभाव देवतांचेही होतेच. तत्वद्न्यानाबद्दल म्हणाल तर ग्रीक तत्वद्न्यान हे मुळात वास्तववादी आहे...भौतिकवादी...ईहवादी आहे तर भारतीय तत्वद्न्यान हे मुलत: भावनीक, पारलौकिकवादी आध्यात्मिक आहे. युरोपची शास्त्रीय जडन-घडन कशी झाली असेल हे मी समजू शकलो. पुर्व आणि पस्चिमेतील हा मानसशास्त्रीय फरक मला नवलाचा वाटला हेही खरे. आणि तो माझा पुढील संशोधनाचा विषयही बनला.

मी कोश लिहिण्याचे काम सुरू केले. कोष लिहिणे आणि तोही एक-हाती हे सोपे नसते. जवळपास ३०० नोंदी झाल्या तेंव्हा मी ऒडिसियस या पात्राजवळ आलो. ऒडीसी आणि इलियड ही महाकाव्ये पुन्हा वाचायला घेतली. तेंव्हा मीही जीवनातील एका विलक्षण टप्प्याजवळ होतो आणि अविरत संघर्ष सुरू होता. ओडीसियस पुन्हा वाचतांना मला माझ्या आणि ओडिसियसमधील स्वभाव साधर्म्याची जाण होवू लागली. अत्यंत चतूर, तत्कालीन जगातील सर्वात बुद्धीमान म्हणुन गणल्या गेलेल्या ओडीसियसच्या झालेली घोर फसवणुकी, त्यावरही त्याने केलेली मात आणि संकटांना निमंत्रीत करत रहात त्यांना पुन्हा पुन्हा निरस्त करण्याचा आत्मघातकी स्वभाव याची मला विलक्षण मोहिनी पडणे स्वाभाविकच होते.

मी ओडीसियसवर कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. कोश बाजुला ठेवला. कादंबरी म्हणुन माझे स्वातंत्र्य वापरत, ही कादंबरी फक्त ओडीसियसचीही होता कामा नये तर ट्रोय युद्धातून परतलेल्या अगमेम्निओन-आणि त्याच्या वाट्याला जयानंतर आलेली अभागी कसांड्रा, मनलेउस आणि जिच्यासाठी हा घोर संगर झाला ती त्याची बायको हेलन, अगमेम्नोनची सुडासाठी त्याच्या परत येण्याची वाट पहात असणारी त्याची पत्नी (आणि हेलनची थोरली बहीण) क्लायटेम्नेस्ट्रा...ही पात्रे मुळ कथांना विशेष धक्का न लावता मी माझ्या पद्धतीने आणि भारतीय तत्वद्न्यानाचे अवगुंठण घालत फुलवत नेली. ओडिसियसचे औदर्य, त्याचे जीवनाबद्दलची निर्माण होत आलेली वितुर्ष्णा याचे चित्रन करत तो जेंव्हा अजरामरतेची देवता, अजोड सौंदर्यवती क्यालिप्सोच्या मायाजाळात तात्पुरता सापडतो...आणि शेवटी अमरता नव्हे हवे ते मानवी जीवन या सिद्धांतापर्यंत येतो. हा सिद्धांत मांडतांना मी फारच भावूक झालो होतो. येथे मराठी व्रुत्तांत देता येत नाहीय...पण इंग्रजी अनुवादित याच कादंबरीचा मी तो थोडा अंश देतो...
Life without strife is meaningless. Life without mystery is worthless. Life without uncertainty is a poison. Life without pain is like a food devoid of spices. I want to live that life.
“True, Calypso, I want to go back to my people where I can find complete solace, no matter what dangers I may have to take upon me. True, that people lack in complete faith and devotion. I know they often turn to be treacherous when their instincts overpower them. But I can’t hate them because I know, though seldom, a lamp of humanity kindles in them. Look at my friend, Polymus, I don’t know in what condition he is, but he has been my honest companion in my strife. I love them despite all their lacunas. Being human is a scarce gift, but to gain that gift we humans wage a war against circumstances in an attempt to rise above ourselves. This makes me love the people. For this love of people I can go to any extent, commit any grave sin… to make them happy and content…and fulfilled.
“Human life is nothing but an unwritten saga of tragedies, frustrations, treacheries, agonies and strife. Calypso, you are a goddess. You never can understand this strife… struggle and a fulfillment over worthless victories. You simply cannot understand the lamps of hopes lit in every mortal heart! You cannot understand the agonies of defeat and the pain and the blazing torch we bear in our heart to defeat the pains.
“We walk over a thin rope of life, hung over the crevice of the death with expectations and hopes.
“You never can understand this!
“Yes- we hate. We get bloodthirsty sometimes. Many a times we do confront annihilation. But again we rise up with our ever-strong ambitions. We feel ashamed on our foolishness of the past and again are ready to repeat it with no awakening whatsoever.
“So ignorant and foolish often are we, Calypso! What provides some meaning to our life is our ignorance. Ignorance makes us curious. Ignorance makes us blind at the bare truths of the life. It is ignorance on whose foundations our civilisations are constructed. The moment complete knowledge will come to us our civilisation will cease to be.
“If we can see what is hidden in the secret stores of future like the burning sun, our life will come to a standstill. Our ambitious, fear and greed will vaporize, for there won’t be any place to go when the future is known and the life is infinite. Life will then become insipid, Calypso.
“We hope because we are ignorant. That is why we built the fortresses of confidence on uncertain grounds. That’s why we struggle to stand up through the turmoil of life. We suffer and we collapse with an irresistible urge to stand up again, to face inevitable and unknown. Without hopes our life would have become hell.
“Let me go back, Calypso. Life here is beautiful but unexciting. I am not used to live without strife and testing my follies over and over again. Love and peace are the islands of charm for me in the ocean of struggle. Struggle is foundation of our life. I am dead without its presence. What is the use of this happiness, O celestial beauty?
“I am a human and it is great to be human.”

ही कादंबरी इंग्रजीत http://sanjay-sonawani.blogspot.com/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असो.

मी ही कादंबरी अप्रत्यक्षपणे मलाच अर्पण केली. म्हणजे "माझ्यातही दडुन बसलाय एक ओडीसियस...संकटांना आव्हान देत...त्यालाच...". कदाचित हा माझा उर्मटपणा असेल पण तो मी केलाय.

या कादंबरीची विशेष समिक्षा झाली नाही कारण मुळात ग्रीक पुराकथा येथे कोणालाच माहित नाहीत. पण ही कादंबरी माझी अत्यंत लाडकी कादंबरी आहे कारण ती मानव आणि अपरिहार्य नियतीतील संघर्ष, मानवी भाव-भावना, नीतितत्वे केवढ्या बदलत्या असतात याचे एक अत्यंत वेगळे दर्शन मला घडवता आले...कारण जणु काही हेलन, अगमेम्नोन, मन्लेऊस, क्लायटेम्नेस्ट्रा आणि ओडिसियसच्या रुपांतुन मीच जगत होतो.

कादंबरी संपत येणे हे प्रत्येक लेखकाला व्यथित करणारे असते. या कादंबरीचा शेवट करतांना मात्र मी व्यथित नव्हतो...मी लिहिले...

Old Odysseus is not yet devoid of ambitions and curiosity. Still he is sailing through the raging ocean. He is still unbeatable by the storms and calamities that befall him like a punctual cycle of nature. His vane eyes are still transfixed on the distant horizon. He is tireless. What is it that he searches on the faint outline of the horizon? Helen? Penelope? Or that unknown beauty of eternity? In his soul remains the same agitated zeal. “I have to course ahead…just ahead...” He cannot stop. He cannot be defeated.
He doesn’t know to stop. Until the oar in his hand slips down, until the glow in his eyes is dead, he is determined to go ahead.
His journey is not momentary.
It is boundless… infinite.

मी या कादंबरीत मानव जातीचा परिस्तिस्थीवर सातत्याने मात करण्याच्या नैसर्गिक व्रुत्तीवर प्रकाश टाकत त्याच्या झुंझार व्रुत्तीला प्रकट केले आणि म्हणुनच ही कादंबरी मला प्रिय आहे.

Friday, May 20, 2011

ब्रेकिंग न्युज: आज अखिल वैश्विक श्वान संघटनेच्या

ब्रेकिंग न्युज: आज अखिल वैश्विक श्वान संघटनेच्या पदाधिका-यांची तातडीची बैठक भरली असून त्यात डोबरम्यान, अल्सेशियन ते देशी पाळीव ते भटक्या आणि लुतभ-या कुत्रांचे प्रतिनिधी सामील होते. यात एकमताने भुंकी-ठराव पारित केला गेला असून त्यात "जर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला नुसता हात जरी लावला तर तो डसला जाईल आणि भुंकून व चावून अखिल मानव नामक इमानहीण प्राण्यांना धडा शिकवला जाईल" असा इशारा देण्यात आलेला आहे. यासाठी हजारो बेकार-बेवारस अशा रस्त्यांवरील श्वानांना हाडके देवून विधानसभा ते संसदेवर भूकी नि चावरे मोर्चे काढण्यासाठी प्रेरीत केले गेले आहे. यामुळे घाबरून हे मानव म्हनवनारे थुंकी सरकार नमेल आणि आमच्या इतिहासातील गौरवशाली अशा वाघ्याची समाधी यावज्जीव राहील असा ठाम विश्वास "मी-इमानी" या श्वान-श्रेष्ठाने आपल्या भाषणात व्यक्त केला.

यावर भुंकाळीने अनुमोदन देत सर्व श्वान-श्रेष्ठ आता गुप्त चर्चेसाठी आपापल्या जातींच्या कुत्र-मेळाव्यांससठी रवाना झाले आहेत. यामुळे एकच वानवा निर्माण झाली आहे...आणि ती म्हनजे हाडकांची. पण आताच हाती आलेल्या व्रुत्तानुसार ही हाडके पाठवणारे विमान दिल्लीवरुन नुकतेच रवाना झाले आहे. वाशिंग्टन डी. सी. चा प्रतिनिधी कळवतो कि व्हाईट हाउस मधील प्रशिक्षित अशा ब्लड हाउंड कुत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून ते आता लगोलग पेंटागोन मधील अति-चाणाक्ष अशा आणि या कुत्रा-जमातीवरील हल्ल्याला तोंड देण्यासाठी अणुयुद्ध हा तर अंतिम पर्याय नाही ना...या विषयी चर्चा करायला रवाना होत आहेत.

या श्वान-प्रतिनिधीला संभाव्य विश्वयुद्धाचे पदधम वाजु लागले आहेत असे दिसते. यासाठी शांतताप्रेमी श्वानांनी आपापले भुंकणे काही काळासाठी बंद करावे आणि तेही न जमल्यास थोडेफार गुरगुरावे. हाडे येतच आहेत त्याची अखिल श्वानजमातीचे भवितव्य आणि दुष्मन मानवी समाज यावर कोणालाही ऐकू जानार नाही या गुरगुरीत चर्चा करावी असे या श्वान-प्रतिनिधीचे म्हनने आहे.

Thursday, May 19, 2011

विद्रोहींनी गुढीपाडवा, दिवाळी या सणांना विरोध करू नये

http://www.loksatta.com/daily/20090601/lsv17.htm


विद्रोहींनी गुढीपाडवा, दिवाळी या सणांना विरोध करू नये’
सातारा, ३१ मे/प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचा ७५ टक्के भाग वैदिक परंपरेने बळकावून ठेवला आहे. ही ब्राह्मणी वैदिकी

पुटे दूर करून पुनर्माडणी करण्याची गरज आहे. विद्रोहींनी उतावीळपणे, उथळपणे सगळेच नाकारण्याच्या उत्साहात गुढीपाडवा, दिवाळी सणाला विरोध करू नये, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
येथे पार पडलेल्या सहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनात डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकसाहित्य, संतसाहित्य व सत्यशोधकी साहित्यातील विद्रोही जाणिवा’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, की संयम, विवेकाने मूळ भूमिका समजावून न घेता विरोध करीत राहिल्यास आपल्याच माणसापासून तुटण्याची वेळ येईल. केरळमध्ये ‘ओणम’ सण साजरा होतो. तसाच आपल्याकडे दिवाळी सण आहे. त्यानंतर वैदिकांची एक महिन्यानंतर देवदिवाळी येते. दिवाळी हा बहुजनांचा सण आहे.
भारतीय संदर्भात विद्रोहाची संकल्पना सूत्ररूपाने स्पष्ट करताना डॉ. साळुंखे म्हणाले, की अन्याय शोषण करणाऱ्या घटकांना व प्रवृत्तींना विरोध हा विद्रोह आहे. वेद प्रामाण्याला विरोध करून चिकित्सा केल्याशिवाय व योग्य असल्याची खात्री पटल्याशिवाय काहीही स्वीकारणार नाही. फुलण्यापासून कुणाला वंचित ठेवणार नाही. ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याचा अधिकार नव्हता त्याविरुद्ध विद्रोह करून समान संधीसाठी आग्रह. मन, भावना शुद्ध ते खरे सोवळेपण समजून पुण्यप्राप्ती, मोक्ष, कर्मकांडांचा भाग अन्यायाचा समजून त्यास विरोध, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध व नैतिकतेचे नियम दोघांबाबत समान केले पाहिजेत, असा स्त्री-पुरुष समतेचा आग्रह म्हणजे विद्रोह, संत तुकाराम व गाडगेमहाराज यांच्याप्रमाणेच संत नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, महानुभाव चक्रधर स्वामी, म. फुले यांनी केवढा मोठा विद्रोह केला आहे हे समजून घेतले पाहिजे, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
लोकसाहित्यातील विद्रोही जाणिवा या विषयाची मांडणी करताना डॉ. कृष्णा इंगवले म्हणाले, की गुढीपाडवा हा मातृसत्ताक पद्धतीचा सण आहे. गुढी स्त्रीच्या गौरवाचे प्रतीक आहे, तर होळी हे यज्ञाचे विडंबन आहे.
कान्होपात्राची वेदना
‘नारी देवकरी तू जागरी, देवळाच्या मागे कान्होपात्रा भोगले’ ही ओवी म्हणजे कान्होपात्राची वेदनाच प्रकट झाली आहे. कान्होपात्राला भोगल्याचे बडव्यांचे पाप लपवण्यासाठीच तिचे मंदिर उभारण्यात आले असल्याचे डॉ. कृष्णा इंगवले यांनी सांगितले.
‘संतसाहित्यातील विद्रोही जाणिवा’ या विषयाची मांडणी डॉ. अरुण शिंदे यांनी केली. ते म्हणाले, सत्यशोधकी अन्वेषण वृत्ती स्वीकारली असती तर मराठी साहित्याने उंची गाठली असती. सत्यशोधकी साहित्य वंचित शोषित घटकाला आत्मभान व प्रेरणा देणारे आहे ते आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जवळचे आहे.
संजय सोनवणी म्हणाले, की पंढरपूरचे विठ्ठल दैवत विद्रोहाचे प्रतीक आहे. ते वैदिकांनी बळकावले आहे. समतेचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या संतांना समाजाने त्यांच्या त्यांच्या जातीत बंदिस्त करण्यात आले आहे.
‘सत्यशोधकी साहित्य परिवर्तनास दिशा देणारे’
सत्यशोधकी साहित्यच समग्र ग्रामीण परिवर्तनास दिशा देईल, असे प्रतिपादन प्रा. प्रवीण चव्हाण यांनी केले.
‘सत्यशोधकी साहित्यातील ग्रामीण परिवर्तनाचा विचार’ या विषयावरील परिसंवाद प्रा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते. सतीश जामोदकर, डॉ. छायाताई पोवार यांनी परिसंवादात भाग घेतला.
प्रा. प्रवीण चव्हाण म्हणाले, सत्यशोधक चळवळीने काँग्रेस पक्षाला ग्रामीण पाया मिळवून दिला. सत्यशोधकी सौंदर्यशास्त्राची परखड चिकित्सा करण्याची गरज आहे. ग्रामीण परिवर्तनासाठी झालेला भौतिक संघर्ष या चळवळीने केला आहे. क्षत्रियत्वाच्या धारणांची मर्यादा या चळवळीवर येतेय का? याचा विचार झाला पाहिजे. स्त्रीला, श्रमाला प्रतिष्ठा, सत्याला सापेक्ष असे समग्र परिवर्तनाची दिशा सत्यशोधकी साहित्य देईल.
प्रा. जी. ए. उगले यांची प्रकट मुलाखत डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. गजानन जाधव यांनी घेतली.

Wednesday, May 18, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर


Death Of The Primeminister ( Marathi )


Death Of The Prime Minister ( English )

ही कादंबरी मी जेंव्हा लिहिली तेंव्हा अवघ्या विशीत होतो. इंदिराजींची नुकतीच हत्त्या झाली होती. आपल्याकडे अफवा-बोलवा पसरवण्याचे प्रमाण कमी नाही आणि अनेकदा ते फ्यंटसीलाही लाजवेल एवढे कल्पक होते. जेंव्हा जक्कल-सुतारला फाशी दिली गेली त्यानंतर अफवा पसरली होती कि त्यांना फाशी दिलेलीच नाही उलट त्यांच्या अपार खुनशी बुद्धीमत्तेचा वापर करून घेण्यासाठी भारत सरकारने त्यांना पाकिस्तानात घुसवले आहे आणि तेथे त्यांच्याकरवी घातपात केले जाणार आहेत. फाशी दिली ही हुलच आहे. त्यावर विश्वास ठेवणारे कमी नव्हते आणि त्यात मीही एक होतो.

तर इंदिराजींची हत्त्या झाल्यानंतर अशीच अफवा पसरली कि आपली हत्त्या झाल्याचे नाटक इंदिराजींनी मुद्दाम केले असून ही विरोधक आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना शह  देण्याची चाल आहे. प्रत्यक्षात ज्या स्त्रीवर गोळ्या झाडल्या गेल्या त्या इंदिराजींच्या डमी होत्या. इंदिराजींच्य ३ डमी असून धोकेदायक ठिकाणी जातांना त्या या डमींचा वापर करत असत. होती कि नाही फ्यांटास्टिक अफवा.

तत्पुर्वी माझ्या काही सामाजिक कादंब-या प्रसिद्ध झाल्या होत्या. मला फ्यंटसी आणि थराराचे आकर्षण होतेच. मी या अफवेचा वापर करत मराठीतील पहिलीच (फक्त माझी नव्हे) राजकीय थरारकथा लिहिली. याचे नामकरण मी "जेंव्हा पंतप्रधान मारले जातात..." असे केले होते पण माझ्या मित्रांनी मला इंग्रजी टायटल द्यावे असे सुचवले आणि मग हे "डेथ ऑफ  द प्राइम मिनिस्टर" हे नामकरण सिद्ध झाले.

या कादंबरीने माझी ओळख थरार-कादंबरीकार अशी झाली. तिच्या पुढे अनेक आव्रुत्त्याही झाल्या. एवढेच नव्हे तर नंतर मी जवळपास २०-२२ राजकीय-आंतरराष्ट्रीय थरार कादंब-या लिहिल्या आणि त्याही खूप नावाजल्या गेल्या. काही इंग्रजीतही प्रसिद्ध झाल्या.


या प्रस्तूत कादंबरीचे इंग्रजी भाषांतर पुढे पत्रकार कामिल पारखे यांनी केले. तेही प्रसिद्ध झाले. तोवर इंग्रजीतील रहस्य-थरार-गुढ कादंब-यांची कथानके मराठी रुप घेऊन अवतरत होती. पण मराठी थरार कादंबरी इंग्रजीत जाण्याची ही पहिलीच घटना होती. याचे खूप कौतुक झाले. समिक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांनी यावर लोकप्रभामद्धे विस्तृत लेख लिहून दादही दिली. इंग्रजी व्रुत्तपत्त्रांनी मराठीचा लुडलुम अशी प्रशंसाही केली.

अर्थात या कादंबरीपुरता तरी मी एवढ्या प्रशंसेला लायक नव्हतो. आज वळुन पहातांना या कादंबरीतील त्रुटी ठळकपणे जाणवतात. मी तेंव्हा हिंदी व्रुत्तपत्त्रात काम करत असल्याने माझी मराठी बिघडल्याचे चित्र या कादंबरीत जाणवते. थरार शैली ज्या पद्धतीने विकसीत असायला हवी होती तसे यात नाही. अर्थात ही माझी पहिलीच थरार कादंबरी होती आणि राजकारणाचे सुक्ष्म धागे जेवढे मांडायला हवे होते त्यात मी अपयशी ठरलो. पुढे मी हळुहळु शिकत गेलो.

या कादंबरीने मराठीत जरी राजकीय थरारकथांचे नवे दालन उघडले गेले असले तरी सामंतांचा अपवाद वगळता त्यात लेखकांची फारशी भर पडली नाही.त्यामागे अनेक कारणे आहेत. मराठी समिक्षक अशा कादंब-याना मुळात साहित्य मानत नाहीत हे एक आणि बव्हंशी मराठी लेखकांचे मनोविश्व-अनुभवविश्व पराकोटीचे मर्यादित असते हेही एक.

पण वाचकांना आनंद देता आला हेही नसे थोडके!

त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?

इतिहास हा नेहमी जेत्यांच्याच द्रुष्टीकोनातून लिहिला जात असतो. ब्रिटिश द्रुष्टीकोनातील इतिहास आपण नाकारला आहे. आज कोणी ग्रांट डफ क्रुत इतिहास मानत नाही. ब्राह्मणांनी खोटा इतिहास रचला असा आरोप आहे, पण तो खोटा इतिहास ऐकतच तेंव्हाच्या आणि आताच्याही पीढ्या वाढत आहेत त्याचे काय करायचे? याच पीढ्यांनी या इतिहासकार ब्राह्मणांना आश्रय दिला होता त्याचे काय करायचे...कि खोटा इतिहास लिहवून घेण्यात त्यांचाच हातभार होता असे मानायचे?

ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेश्ठ असे स्म्रुतींनी सांगितले होते पण या स्म्रुती कोणत्या भारतीय राजाने पाळल्या? अनेक राजे शुद्र वर्णीय होते...(सातवाहन-नंद), काही वैश्य होते (गुप्त) काही ब्राह्मण होते (श्रुंग) काही नागवंशीय होते ( बिंबिसार)...ही अल्प पण महत्वाची उदाहरणे आहेत. आणि गम्मत म्हनजे क्षत्रिय वगळता राज्याधिकार कोणत्याही वर्णाला नाही...मग स्म्रुत्योक्त हा शब्द हा बदमाशीचा नाही काय?

समजा ब्राह्मनच राजा आहे...(इतिहासात होते) तर मग ब्राह्मण राजापेक्षा सामान्य ब्राह्मण कसा श्रेष्ठ होईल? ब्राह्मण राजा ब्राह्मणाच्याच आदेशाने कसा जाईल? अशा स्थितीत स्म्रुतींचे कायदे काय करतील? आणि क्षत्रिय तेंव्हा काय करत होते? गम्मत खरी अशी आहे कि हे सारे ऐतिहासिक वाद हे फक्त कोण कोणाचा मालक या सामंतशाहीतुन निर्माण झालेले आहेत. इतिहास त्या-त्या काळात राज्यकर्त्याच्या द्रुष्टीकोनातुनच लिहिला गेला आहे. मग तो कोणीही असो-कोणत्याही जाती-वर्णाचा असो. यात कालौघात लबाडी झालेली आहेच. धर्मपुरोहित या लबाडीत फक्त भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. उदा. ख्रिस्ती धर्म येशुने नव्हे तर त्याचा अनुयायी संत पालने प्रचलित केला. बुद्धाचा धर्म त्याच्याच अनुयायांनी त्यांच्या पद्धतीने प्रचलीत केला आणि असा गोंधळ माजवून दिला के बुद्धाला नेमके काय सांगायचे होते यावर तीनदा धर्मसंगती काही शतकांच्या अंतरातच भरवाव्या लागल्या. गीतेत मुळ नेमके काय होते हे आज सांगता येत नाही. रामायणातील बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त आहे हे आता सिद्ध झाले आहे. ऋग्वेदात अनेक प्रक्षित ऋचा आहेत. महाभारताबद्दल तर बोलायलाच नको कारण मुळ ८००० श्लोकांचे जय नावाचे काव्य लक्ष श्लोकांच्या संहितेत बदलले.

हे सारे ब्राह्मण हिताचे होते म्हणुन असे घडले असे जरी मान्य केले तरी त्यात राज्यकर्त्यांचा फायदा होताच कारण जो-तो क्रुष्ण, नल, लव-कुश, पांडवादि रक्तरेखेशी आपला संबंध जुळवू लागण्याच्या प्रयत्नात लागला. जेथे हे शक्य दिसत नाही तेथे तेथे प्रक्षिप्त श्लोक घुसडत त्या त्या पुर्वजांचे (खरे वा खोटे) माहात्म्य घुसवले गेले. भ्रुगू वंशीयांचे महाभारतातील अपरंपार माहात्म्य पाहून असे वाटते कि हे कौरव-पांडवांच्या संघर्षाची कहानी कमी पण भ्रुगुंमाहात्म्याचीच जास्त आहे. पुर्ण आदिपर्व हे भ्रुगु माहात्म्यानेच भरले आहे.

धर्मसत्ता ही वेगळी बाब आहे आणि इतिहास हा राज्यकर्त्यांच्या सोयीची बाब आहे. राज्यकर्त्यांचे अनेकदा अवास्तव उदातीकरण करत असता धर्मसत्ता आपलेही उदातीकरण केल्याखेरीज कसे राहील? त्यात कधीही कोणत्याही राज्यकर्त्याचे, मग तो कोणत्याही वर्णाचा असो, हस्तक्षेप असण्याचे कारणच असू शकत नाही. कारण सत्तेचे, अगदी पुरोहितही गुलाम असतात म्हणुनच ते राज्यकर्त्याला पार ईश्वरी अवतार ते प्रत्यक्ष ईंद्र अति-उदारपणे ठरवत त्यांचे मानसिक अभिमानात्मक समाधान करत त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लायकिपेक्षा वर उठवत स्वता:चे माहात्म्य सिद्ध करत असतील तर त्यांना दोष कोणत्या तोंडाने द्यावा?

रामायण-महाभारत ते अगदी ३-४०० वर्षांपुर्वेची महाकाव्ये पाहिली तर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

जोवर राजा श्रेस्ठच ठरवला जातो आहे आणि त्याची उत्पत्ती अत्यंत पवित्र अशा वंशातुन झाली आहे असा अहंकारात्मक भाव दिला जातो तोवर तो मुळ वंश ही पुरोहितांची अंतिम वर्चस्वता सिद्ध करणारी बाब आहे याकडे कोणत्याही राजवंशाने लक्ष दिलेले दिसत नाही.

आणि खोटा म्हणवला जाणारा इतिहास या राजकीय आणि धार्मिकांमधील युती आणि परस्पर वर्चस्वाच्या अनैतिक युतीतुन निर्माण झाला कि काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. आणि याला समर्थन देणारे अनेक पुरावे उपलब्धच आहेत.

ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला कारण त्याला येथील राज्यकर्ते जबाबदार नव्हते का हा प्रश्न अनेकांना अडचणीचा वाटु शकतो. आणि त्याउलट ब्राह्मण हे येथील मुळ राज्यकर्ते बदलताच...परकीय सत्ता येऊ लागताच अधिक जोमाने मुळ इतिहासाची मोडतोड करायला सिद्ध झाले कारण तसे करणे हे नव-राज्यकर्त्यांच्या हिताचे होते आणि त्यांचे हित होणे हे ब्राह्मणांच्या हिताचे होते, असे नव्हे काय?

हा एक कुट प्रश्न आहे आणि याबद्दल उभयपक्षी जबाबदार आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे. आज मराठा समाज बेधडक स्वरचित इतिहास कसल्याही पुराव्यांची तर्कसंगती न लावता सांगत आहे. यामागे पुर्वज प्रतिष्ठेची भारतीय पुरातन मानसिकता आहे. म्हणुन तर प्रत्येक जातीचे संत त्या त्या जातीत ख-या खोट्या दंतकथा निर्माण करत श्रेष्ठ ते जगद्गुरु बनवले जात आहेत. बौद्ध धर्माची खरी मुलतत्त्वे समजावून न घेता एक नवा अर्ध-कच्च इतिहास मांडला जातो आहे. यामागे तथागत बुद्धाची, त्याच्या महनीय तत्वांचेच आपण पायमल्ली करत आहोत हे काही समाज-घटकांना कळत नाही. रामाचा धड इतिहास माहित नाही पण "जय श्रीराम"वाले धडधडीत थापा मारत असतात वा असत्यावर विश्वास ठेवत असतात. एवढेच नव्हे तर त्यावर हिंसा माजवत असतात.

याचे कारण एक आणि एकच आहे ते म्हणजे भारतीय माणुस मुळात असत्यावर-भ्रमांवर-खोट्या आत्मप्रशंसेवर विश्वास ठेवणारा आहे. जगातही असे भरपूर आहेतच. पण जे महान संस्क्रुतीचे वारसदार समजतात. ते कोण वर्तक...थापा मारतात कि मायादि संस्क्रुत्यांचे आद्य जनक हिंदू...त्यावर विश्वास ठेवणा-या मुढांचीही कमतरता नाही...ते पार मंगळावर आत्मबलाने जावुन आले हे बेधडक सत्य (?) स्वीकारले जाते.

आणि येथे हे नवे सत्तेचे दलाल जिजाऊ महार होत्या (हे बहुदा प्रथम सम्राट नावाच्या दैनिकात आले होते आणि नंतर बाम्सेफ ने हे उचलले आणि त्यातुनच मराठा-महार युतीची प्रक्रिय सुरु झाली असावी...वा राजकीय कारणांसाठी या अभिनव (?) सिद्धांताचा उदय झाला असावा.)म्हणजे नवब्राह्मण येथेही आहेत. तेही सत्तेसाठीच आहेत. सुजीत कांबळे यांनी (आता तेही खरे कि खोटे हे मला माहित नाही...कारण फ़ेसबुकवरील लोक अत्यल्प विश्वासार्ह असतात.) जे प्रश्न उपस्थित केले ते महत्वाचे आहेतच पण त्याकडे अजून अधिक व्यापक परिप्रेक्षात पहावे लागणार आहेत. आजतागायतपर्यंत प्रेमविवाह वगळता ब्राह्मण वा मराठा वा अन्य कोणी जातीयाने खुषीने खालच्या जातीयांशी रोटी-बेटी व्यवहार केल्याचे उदाहरण नाही. आजही नाही. प्रेमविवाहही स्वीकारले गेलेले नाहीत...गेले तर जेंव्हा नाईलाज होतो तेंव्हा. हो...पण सत्ताधारी समाजाने सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी पार शक-हुण-कुशाण ते मुस्लिमांना आपल्या मुली देण्यात धन्यता मानली आहे ती सत्ता टिकवण्यासाठी. यावर बोलावे तेवढे कमीच आहे.

थोडक्यात, असे सारे असुनही राजपुत इतिहास थोर आहे, शिख इतिहास थोर आहे, इस्लामचाही इतिहास थोर आहे, अशोकाचाही इतिहास थोर आहे (अशोक हा खुनी होता...त्याने आपल्यच थोरला भाऊ कालाशोकाचा खुन करुन सत्ता मिळवली)...हाही थोर आणि तोही थोर...

यातील थोरांची चिकित्सा नाकारुन आणि सत्ताधार-यांना अनूकुल इतिहास लिहिण्याच्या नादातुन पुराणकार जेवढे भरकटत गेले तसे आताच्या सत्ताधा-यांना अनूकुल इतिहास लिहिण्याच्या नादात हे नव्य ब्राह्मण इतिहासकार एवढे भ्रकटत गेले आहेत कि पुराणकारांनी लाजेने मान खाली घालावी. इतिहासाची फाटलेली लक्तरे शिवून त्यांना पांघरण्याजोगी बनवायचे काम सोडा ती मानवतेच्या वेशीवर टांगायची महत्कार्ये सुरू केली. ब्राह्मणी इतिहासकारांकडुन अध:पतनाचे जे कार्य बाकी राहिले होते ते हे मर्द मराठा जातीचे म्हणवणारे काही विद्वान (?) इतिहासकार करत आहेत.

त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?

Thursday, May 12, 2011

त्यांना मी फक्त तालीबानी म्हणु शकतो...

मानवी स्वभाव हा खरोखरच अतूलनीय आहे. त्या स्वभावात स्रुजनापेक्षा विध्वंसकताच अधीक आहे. त्याची स्रुजने जीही काही इतिहासाने नोंदवली आहेत ती त्याच्या हिंस्त्रतेचे प्रतिमान म्हणुनच सिद्ध होतात. उदा. आदिमानवाचा इतिहास आपल्याला समजतो तो त्याच्या दगडी हत्यारांतुन आणि मारुन खाल्लेल्या प्राण्यांच्या अवशेषांतुन. जगाचा इतिहास हा बव्हंशी युद्धांचा, द्वेषाचा आणि विश्वासघातांचा आहे. करुणेचे-प्रेमाचे-स्नेहाचेही क्षण आहेतच पण ते वाळवंटात एखाद-दुसरे ओयासिस असावेत तसे. जे करुणेचे महामानव झाले ते ग्रंथांत बंदिस्त झाले. त्यांचे अंतही सुखद नव्हते. राम-लक्ष्मनाला शरयू नदीत प्राणार्पण करावे लागले, क्रुष्णाला यादवीत झालेला स्वकियांचा अंत पहात अत्यंत तिय्यम पद्धतीचा म्रुत्यु भोगावा लागला, येशु ख्रिस्ताला स्वकियांच्याच विश्वासघाताने क्रुसावर चढावे लागले. पण ते ग्रंथात नुसते बंदिस्त केले गेले नाहित तर त्यांच्याच नावावर हिंसेचे आगडोंब उठवले गेले. त्यांच्या वचनांवर, जीवनावर आणि तत्वद्न्यानावर अनुयायांची खरी प्रीति होती असे नसून आदिम मानवी हिंसक भावना कधी मेल्याच नाहीत असे यावरून दिसते. त्यामुळेच सर्वच महामानवांची नावे घेत द्वेष आणि हिंसा (मग ती वैचारीक असो कि शारीरिक...) याचे उद्रेक जगभर उसळत असतांना आजही आपल्याला दिसतात.

आजचेही वास्तव काय आहे? ओसामा बिन लादेन हे भुत अमेरिकेनेच उभे केले. रशियाला शह देण्याच्या नादात आपण एक नवा भस्मासूर उभा करत आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. (हीच चुक भारतात इंदिराजींनी भिंद्रानवालेच्या बाबतीत केली होती.) शेवटी काय झाले? हिंसा. वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त करून अमेरिकन दहशतवादाला लादेनने उत्तर दिले. आणि आता लादेनला ठार मारून आपली संपलेली इज्जत अमेरिकेने पुन्हा प्राप्त करून घेतली.

अशी असंख्य उदाहरणे देता येतील. प्रत्येक राष्ट्र, समाज, समुदाय कमीअधीक प्रमाणात दहशतवादी बनत आहेत. अहिंसक मार्ग वापरणारे (उदा. तिबेट) कसलाही वाली नसलेले शोषित बनले आहेत आणि उर्वरीत जगाला हिंसेचेच अविवेकी वेड असल्याने असे अहिंसक लोक आणि त्यांबद्दलची आपली कर्तव्ये याबद्दल मूक आहेत.

हिंसेचे, तोडफोडीचे, न्रुशंततेचे वेड असणारे प्रत्यही प्रत्येक समाजात अवशिष्ट असतात. त्यांना हवा असतो एक नेता जो त्यांच्या भावनांना वाट करून देईल. त्यांना पुरेपुर वापरून घेईल. त्यांना असे मालक हवेच असतात. कारण स्व-बुद्धी नावाची जी काही बाब असते ती ते वापरायला अक्षम असतात. आर्य वादाचा आधार घेत ज्यु द्वेषाची लाट निर्माण केली हिटलरने...आणि नसता अभिमान चेतवत सारा जर्मनी बेचिराख करून घेतला...स्वता:ही मेला. म्हणुन अमेरिका शहाणा होता असे नाही...त्यांनी जो जपानमद्धे विध्वंस घडवला तो मानवाची मान सर्वदा खालीच राहील या योग्यतेचा होता. कम्युनिस्टांनी मार्क्सचा समतेचा सिद्धांत कोणत्या विक्रुत पद्धतीने राबवला आणि म्हणुनच अवघ्या ८०-९० वर्षांत कम्युनिझम फाटे फोडत फोडत आता पार माओवादाच्या हिंसक दहशतवादावर आला आहे याचे वर्तमान जग साक्षी आहे.

भारतात धर्म आणि जातीव्यवस्था, भाषा आणि प्रांतवाद एन-केन प्रकारेन अशाच दहशतवाद्यांच्या हाती गेल्याचे चित्र आपल्याला दिसते. धर्म म्हणजे नेमके काय? या प्रश्नाची धड उकल आजतागायत झालेली नाही. religion आणि धर्म हे वेगळे शब्द आहेत याचे भान राहिले नाही. "तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" असा प्रश्न क्रुष्ण विचारतो तेंव्हा तो कर्ण हा कोणा वेगळ्या धर्माचा होता या अर्थाने विचारत नसून व्यक्तिगत नैतिकता हाच धर्म या अर्थाने विचारत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. समुहाच्या समान श्रध्हा-समान दैवते-दैवत कल्पना आणि धर्माने मान्य केलेले काही जीवन नीयम म्हणजे धर्म नव्हे...असला तर त्याला religion म्हणता येईल. धर्म हा व्यक्तीची नैतीक धारणा ज्या नीतितत्वांवर होते त्याशी निगडीत आहे. आणि या तत्वांत विभेद असणारच. येथे धर्म ही श्रद्धेची वस्तु नसुन व्यक्तिगत नैतिकतेची बाब आहे. समाजाच्या समान नैतिक संकल्पनांचा आविष्कार म्हणजे धर्म. समष्टीतील समान नैतीक संकल्प्ना म्हणजे धर्म. हा धर्म खालून वर जात असतो. religion हा वरून खाली येत असतो. म्हणजे "मी सांगतो म्हणुन हा धर्म आणि मी देतो ती धर्मतत्वे...आणि त्यांचे पालन हेच काय ते बंधनकारक." पारलौकिक जीवनाबद्दल (शिक्षा-वा पुरस्कार) यांचे आश्वासन द्यायलाही धर्म कमी करत नाहीत.

याला आपण वरुन खाली येणारा धर्म असे म्हणु शकतो. हा धर्म बव्हंशी आदेशात्मक असून मानवी विचार-स्वातंत्र्य येथे पुरेपुर नाकारले गेलेले असते. येथे व्यक्तीला महत्व नसून मानवी स्व-धर्मीय विचारी लोकांना महत्व असते आणि जे नसतात ते आपसूक शत्रु...काफिर...पाखंडी ठरत असतात. त्यांच्याविरुद्ध धर्मयुद्ध तरी करायचे असते वा क्रुसेड वा जिहाद...

आणि मानवी दुर्दैव हे आहे कि हाच आणि असाच भावनाविचार, जातीय असोत कि व्यावसायिक संघटना, करत जात मानवी जीवन अजून नव्या कचाट्यात पकडत जात असतात. येथे मानवी स्वातंत्र्याचा -हास तर होतोच पण त्याहीपेक्षा भीषण स्थिती म्हणजे एकुणातले मानवी सौहार्द हरपलेले असते.

विरोधी विचार कोणत्याही स्थितीत नको असतो...मनुश्य हा गुलामच असून गुलामी हेच त्याचे भविष्य आहे...मग ही गुलामी आर्थिक असो...राजकीय कि वैचारिक...भले तो अधिक लोकांचा मालक बनेल...आणि असे बिंबवणारेही कोणाचे तरी गुलामच असतात...आणि ही गुलामीची गोलाकार श्रुंखला आहे त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रकार आहे. मुलावर रागावलो कि मुलगा खेळणी तोडतो...नवरा बायकोवर राग काढतो...प्रत्येकाने आपापले गुलाम ठरवलेले आहेत आणि जेंव्हा आपण संघटना पक्ष आणि राष्ट्राचा विचार करतो तेंव्हा आपल्या गुलामीच्याच कक्षा वाढत गेलेल्या दिसतात...स्वातंत्र्याच्या नाहीत.

आणि हेच संपुर्ण मानवजातीचे अपयश आहे.

आपापल्या धर्माचे विरोधी संपवायचे तर प्रथम त्यांच्या धर्मातील त्रुटी दाखवा...त्यांच्या आराध्यांना बदनाम करा, तेही नाही जमले तर त्यांच्या समर्थकांविरुद्ध युद्ध करा...गुलाम करा आणि त्यांच्या सर्वच आराध्यांची विटंबणा करा. हा प्रकार सर्वच धर्मीयांनी सर्वच धर्मीयांबाबत दुर्दैवाने केला आहे. कधी हा वरचढ तर कधी तो वरचढ...एवढाच कालौघातील फरक आहे. परंतू मानवी प्रव्रुत्ती बदलल्या नाहीत याचे हे एक दिग्दर्शन आहे.

हिंदु धर्म नाकारणारे आणि नवा धर्म स्थापन करनारे आजही आहेत. मी ९वीत असतांना नवीन "जीवन-धर्म" स्थापन केला होता आणि चक्क तेंव्हाही मला ५-१० अनुयायी होतेच. कट्टर अनुयायी म्हणजे माझा जीवलग मित्र कै. प्रशांत पोखरकर. मी हिंदू नावाचा धर्मच आस्तित्वात नसल्याने मी हिंदू नाहीच असे लेखन आणि वर्तन पुर्वीच केले आहे. तसे पुस्तकही लिहिले आहे. मी पुरातन शैव धर्माचा आणि त्याच्या वर्तमानीय अस्तित्त्वाचा समर्थक आहे हे सर्वांना माहितच आहे.

आणि अलीकडेच नवा शिवधर्मही स्थापन झाला आहे. हा शिवधर्म म्हणजे नेमके काय आहे आणि धर्म म्हटले कि काही तरी नैतीक चौकट अपरिहार्यपणे येतेच तर मग ही नैतीक चौकट काय आहे आणि या धर्माचे नव्य कर्मकांड काय आहे हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या धर्माला शैव आणि शिव या शब्दांबाबत कय म्हणायचे आहे हाही प्रश्न आहेच. म्हणजे हा शिवाजी महाराज प्रस्तुत धर्म म्हनायचेय कि सिंधु संस्क्रुतीपुर्व अशा शैव धर्माबद्दल बोलायचेय? माझ्या अभ्यासाप्रमाणे शिवाजी महाराजांनी कोणताही धर्म प्रचलित केला नसुन माझ्या पुर्व-विवेचनानुसार व्यक्तिगत, कसल्याही प्रस्थापित धर्मसम्कल्पनांच्या आहारी न जाता व्यक्तिगत-नैतिक-धर्माचे नुसते पालन नव्हे तर खरा "स्व-धर्म" (individual ideaology) प्रचलित केला होता.

नवा धर्म स्थापन करणे म्हणजे पराकोटीची नैतीक, आध्यात्मिक, (आध्यातिमिक म्हणजे दैवी नव्हे..) उंची अभिप्रेत असते. पराकोटीची क्षमाशिलता आणि दयाबुद्धीची गरज असते. स्त्री-पुरुष, मग ते कोणत्याही जाती-जमातीतील-धर्मातील असोत, त्यांच्याकडे पाहण्याचा औदार्यभाव आवश्यक असतो. द्वेषाला धर्मभाव म्हणुन कधीही थारा असत नाही. माझ्या मते शिवरायांनी याच सर्व भावना यावजीव जपल्या. पण तो त्यांचा धर्म होता. religion नव्हे. आणि अन्य धर्मातील उच्च ते स्वीकारणे यालाही धर्मच म्हणतात, सुफी पंथाने ते कार्य जसे केले तसेच वारकरी संप्रदायानेही केले. पण शिवाजी महाराजांच्या नावाने धर्म नव्हे तर religion कोणी स्थापन करत असेल तर तत्वद्न्यानात्मक पातळीवरुन त्याचा विरोध करणे क्रमप्राप्त आहे.

कारण धार्मिक माणुस सहसा शिव्या देत नाही. तो विचारांना विचारांनीच उत्तर देतो असा माझा समज (कि गैरसमज म्हणा...) आहे आणि असेही असेल कदाचित कि असे लोक मुळात धार्मिकच नसतात...(मग ते भले परंपरेने आलेले असोत कि नव्य स्वीकारलेले.)

महामानव हे कधीच कोणत्याही जातीच्च्या-संप्रदायाच्या-धर्माच्या-राष्ट्रांच्या मालकीचे नसतात...ते सर्वांचेच असतात...

आणी महामानवच चिकित्सेला वारंवार आव्हान देत असतात.

ज्यांना चिकित्साच नको...

त्यांना मी फक्त तालीबानी म्हणु शकतो...
धन्यवाद.

Tuesday, May 10, 2011

शेती हा सन्माननीय उद्योग आहे!

मेहेरगढ येथील सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांनुसार भारतातील शेतीचा उगम इ.स. पुर्व किमान १०,००० वर्ष एवढा जातो. तो त्याहीपेक्षा पुरातन असला पाहिजे. सिंधु संस्क्रुतीत शेती ही अत्यंत भरभ्हराटीला आली होती. नद्यांचे प्रवाह बांध घालुन अडवणे, पाटांद्वारे पाणी शेतीला पुरवणे या कला सिंधु मानवाने साधल्या होत्या. त्यामुळेच वैभवशाली अशी ही संस्क्रुती नगररचना, उद्द्यमी आणि व्यापारातही प्रगत झाली. या संस्क्रुतीचा व्यापार पार अरब-सुमेरादि देशांपर्यंत पोचला होता. त्याला कारण होते शेतीचे भरभक्कम बळ आणि त्यामुळे आलेली सम्म्रुद्धी आणि त्यातुनच आलेली साहसी व्रुत्ती. ज्याही समाजाचा आर्थिक पाया भक्कम असतो अशाच समाजातून अधिक साहसी आणि धोके पत्करणारे निघत असतात हे सत्य येथे लक्षात घ्यायला हवे. याविरुद्ध ज्यालाही अत्यंत प्रतिकूल स्थितीला तोंड द्यावे लागते तेही असेच साहसी बनतात कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते.

परंतू भारतात औद्योगिकरणाच्या आणि नंतर जागतिकीकरणाच्या लाटेत शेती हा मुलभुत समाजाधार होता त्याचे महत्व कमी होत गेले. उद्योगांचे वाढले. ज्याला आपण उदात्तीकरणाची लाट म्हनतो तशी उद्योगांबाबत आली. उत्तम शेती पेक्षा उत्तम नोकरी हा फंडा आपण गिरवू लागलो. अर्थकारणाच्या दिशा बदलल्या...पण या बव्हंशी क्रुत्रीम असून त्याला ठोस वास्तवाचा आधार नाही हे आपण जाणीवपुर्वक विसरत गेलो वा आपल्याला ते विसरायला लावले गेले. खरे तर उद्योगधंदे दुय्यम आणि शेती श्रेष्ठ अशीच स्थीति होती आणि आहे पण बाह्य क्रुत्रीम चकचकाटाला आपण भुलत गेलो. जीवनशैलीत शहरी बदल घडवुन आणु लागलो आणि दुयामाला प्राधान्य देत मुलभुत सद्न्यांना पार वाळीत टाकून बसलो.

उदाहरणच घ्यायचे झाले तर एकामागोमाग लागलेल्या...जीवन सुखकर करतील (म्हणजे मानसाला आळशी...श्रमविरहित बनवतील) अशा शोधांमुळे आणि त्याआधारित उद्योगांमुळे नवीन उद्योग-कुशल श्रमिकांची फळी उभारली जावू लागली. त्यांची उत्पादने खरेदी करणारेही कोणत्या-ना कोणत्या उद्योगातील श्रमिकच...(फर तर काही बौद्धीक श्रमिक म्हणुयात.) असणार हे निश्चित केले गेले. म्हणजे श्रम थांबलेले नाही हे लक्षात घ्या. फक्त त्या-त्या श्रमांना कमी-अधिक दर्जा देवून त्याला सुवर्ण वर्ख चढवला गेला एवढेच. त्याच स्वांत-सुखात सुख शोधण्याचे कार्य शेतकरी-बारा बलुतेदारादि वर्गातुनच आलेल्या शिक्षितांनी सुरू केले. त्यांच्या व्यथा-वेदना-आकांक्षा-स्वप्नांची दिशाच बदलून गेली. त्यातुन एक वेगळीच समाजमानसिकता विकसित होत गेली. आपण वसाहतकालीन आणि उत्तर-वसाहतकालीन साहित्य तपासले तर ही बाब आपल्या लक्षात येइल.

शेतीकडे या नवमध्यमवर्गीयांचा पाहण्याचा द्रुष्टीकोन नुसता दुषित नव्हे तर हीनकस होत गेला. शेतकरी हा एक लक्ष देण्याच्या योग्यतेचा नाही असा घटक बनत गेला. ज्या गोष्टींची समाजाला कधी गरज भासली नव्हती अशा गोष्टींच्या मागे समाज धावू लागला. सर्वात जास्त उलाढाल होतात असे उद्योग वाढत गेले...पण त्यातून भवितव्याचा विनाश आपणच निर्माण करत आहोत याचे भान मात्र राहिलेले दिसत नाही.

औद्योगिकिकरण सर्वस्वी वाईट असा माझा दावा नाही पण यातून भारतीय शेतक-याची मनोवस्था कशी खालावत गेली यावर मला येथे प्रकाश टाकायचा आहे. शेती करणा-याला सामाजिक महत्वच हरपुन बसल्याने ज्या मानसिक न्युनगंडाला क्रमशा: सामोरे जात बळी व्हावे लागले इकडे मात्र कोणी लक्ष दिल्याचे आढळत नाही. बागाईतदार त्यातल्या त्यात भारी. पण एकूणातले त्यांचे प्रमाण किती? आणि तरीही त्यांना आपण शेतकेरी असल्याचा कितपत अभिमान? मग ते राजकारण-सहकारी साखरकारखाने ते सुतगिरण्यांच्या नादी लागले एवढेच नव्हे तर आज सरकारवरचा एक भार बनून बसले आहेत हे वास्तव काय सांगते?

शेतक-यांतुन असंख्य राजकारणी वर आले...पार क्रुषि-मन्त्रीही झाले...एक-दोन तर पंतप्रधानही झाले. पण शेतक-याला आत्मसन्मान देण्यासाठी त्यांनी काय केले? उलट सिनेमा, बिल्डर, कारखानदारांच्या संगतीतच राहणे त्यांनी पसंत केले...शेतकरी आणि अन्य घटक फक्त निवडनुकीपुरते महत्वाचे उरले...आश्वासनांच्या फैरी झेलण्यासाठी.

त्यामुळे शेती हा आणि हाच सर्व समाजाचा एकमात्र तारणहार आहे याकडे पराकोटीचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले.

शेतकरी हा ग्ल्यामरस नाही, तो दुय्यम समाजघटक आहे हे कुसत्य ठसवले गेले.

शेती हाही अन्य उद्योगांसारखाच एक उद्योग आहे आणि अन्य उद्योगांवर मंदी-महामंदी ते कुव्यवस्थापन यामुळे बंद पडणे, बेरोजगारांच्या झूडी वाढवणे अशी संकटे प्रत्यही असतात तशीच शेतीवर निसर्ग ते पुन्हा कुव्यवस्थापन अशी संकटे असतातच. संकटांची मात्रा कमी-अधिक परिस्थितीनुसार बदलते. पण औद्योगिक जग हे बव्हंशी शेतीवरच अवलंबुन असते. कारण शेतकरी हाही त्यांचा ग्राहकच असतो आणि तो थोडाथोडका नव्हे तर एकून लोकसंख्येच्या ६५% एवढा आहे. त्याची क्रयशक्ती वाढली तर हेही उद्योग वाढतील याचे भान यांना नाही.

शेतक-याचे दुर्दैव एवढेच कि तो विखुरलेला आहे. त्याला आपल्या एकुणातील शक्तीची जाणीवच नाही. किंबहुनआ ती होवू नये अशीच अर्थव्यवस्थेची आणि राजकारण्यांची इछ्छा आहे. त्यांना प्यकेजेस ते कर्ज-माफ्या-वीजबील माफ्या दिल्या कि त्यांना त्यांचे कर्तव्य झाले असे वाटते पण ते तसेही नाही...यातून जी एक शेतकरी-विचारमानसिकता बनत आहे ती कोणी पहात नाही...त्याबद्दल थोडे विवेचन महत्वाचे आहे ते असे:

शेतकरीय मानस-शास्त्र.

हे आपल्याला खालील टप्प्यांत पाहिले पाहिजे.

१. मानसिक न्युनगंड: शेती दुय्यम झाली असून खेड्यात राहणे हेच अवमानास्पद आहे, पण पर्याय दिसत नाही त्यातुन येणारी खिन्नता.
गावातुनच शहरात गेलेले जत्रा-यात्रा-लग्नांनिमित्त गावात येतात तेंव्हा त्यांना जोही काही अवाजवी सन्मान दिला जातो तो या न्युनगंडापोटी.
२. अनिस्चिततेचे मानसशास्त्र: शेतीव्यवहार हा निसर्गाच्या भुलीवर अवलंबुन आहे. बाजारभाव त्याच्या ताब्यात नाहीत. अन्य उद्यगांत तसे घडत नाही. त्यामुळे सातत्याने अनिष्चित अशा परिस्थितीच्या दडपनाखाली त्याला रहावे लागते.
३. पारंपारिक जोखडे: विवाह, जत्रा, धर्मकार्ये इ. साठी जो अतिरिक्त खर्च अभिप्रेत असतो तो एक तर त्याची शिल्लक खावून टाकतो वा कर्जबाजारी बनवतो. ही कर्जे शेतीच्या नावाखाली काढली जातात पण वापरली जातात ती अनुत्पादक कार्यांसाठी. ही खोटेपणाची भावना त्याचे मनोबल वाढवत नसून नकारार्थी मानसिकतेला जन्म देत असते.
४. अनुकरणाची भावना: द्न्यानाची, मार्गदर्शनाची केंद्रेच उपलब्ध नसल्याने तात्कालिक भावनिक अनुकरणात्मक लाटेवर स्वार झाल्याने आणि आशांच्या पर्वतावर आरुढ होत नंतर भीषण आर्थिक नुकसान झाल्याने येणारी विषादात्मक भावना.
५. राजकारण्यांच्या कछ्छपी लागत कर्जमाफ्या-वीजबील्माफ्या मिळवून जरी तात्पुरता संतोष मिळाला तरी सुप्त पातळी वरील फुकटेपणाची भावना.
६. शहरी वा नोकरवर्गावरचा सुप्त रोष: हा रोष केवळ जो काही वर्गीय विग्रह झालेला असतो त्यातून निर्माण होतो. हा बव्हंशी सुप्त असतो कारण राग कसा काढायचा याचे दिग्दर्शनच नसते. मतदानाचा अधिकार अनेकदा स्वत:च्या आर्थिक विकलांग परिस्थितीमुळे विकला जात असतो. पण यातून एक सुप्त रोष विकसीत होत जातो आणि त्याचा स्फोट होवु शकतो आणि तो कदाचित भविष्यातला सर्वात मोठा क्रांतीकारी स्फोट असेल याचे भान स्व-मग्न उर्वरीत जगाला उरलेले नाही ही त्यांचीही मानसिक समस्या आहे.
७. अविकसिततेचा रोष: उदा: शहरांत शक्यतो भारनियमन नाही...पण खेड्यांत मात्र १२ ते १६ तास भारनियमन. पाणी प्रथम शहरांना मग शेतीला. ही एक असंसदीय विषमता आहे. खेड्यांतुन आलेले राजकारणी एवढे क्रुपण का? हा प्रश्न शेतक-यांना पडत असला तरी अभिव्यक्तिचे त्यांच्याकडे साधन नसल्याने हा आवाज भ्रुणहत्येप्रमाणेच दडपला जातो. त्याचे उत्तर या सुसंस्र्कुत समजणा-या समाजाकडे आहे काय?

शेत-क-यांच्या आत्महत्यांबद्दलचे यशदा आणि टाटा इन्स्टिट्युट ओफ़ सोशल सायन्सेसचे रिपोर्ट मी अभ्यासले आहेत. ते वरकरणी निरिक्षणे नोंदवतात. सरकारला काही सुचना करतात. त्या वरवरच्या मलमपट्ट्या आहेत कारण मुळात शेतकर-यांनी आत्महत्या का केल्यात वा करत आहे याची मानसशास्त्रीय छाननी त्यांनी केलेली नाही. जेवड्या सवलतींची पंखुडॆ पडतील तेवढाच शेतकरी हा मनोविकलांग होत जाणार आहे. सवलती हव्यात जसे एस.इ.ज़ेड. ते मल्टिप्लेक्स घेतात...पण त्यात दयाबुद्धी दाखवण्याची गरज नाही. तो त्यांचा अधिकारच आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. तोही सन्मानपुर्वक...मतांच्या बदल्यात नको.

शेती हा सन्माननीय उद्योग आहे, नव्हे तोच जगाचा खरा तारक उद्य्योग आहे...जेही क्रुषिवल तो करत आहेत तेच खरे वंद्य अहेत हा संदेश सर्वत्र पोहोचायला हवा...पोहोचवायला हवा. हा उद्योग जगाची आई आहे...पोषणकर्ती आहे आणि जो पिकवतो तो सर्वांचा पोषणकर्ता आहे आणि त्याला उचित मोबदला देणे हे या नव्य-संस्क्रुतीचे कर्तव्य आहे ही भावना या नवजगीयांच्या मनात निर्माण करायला हवी. बरेचसे प्रश्न सुटतील अशी आशा आहे.

Sunday, May 8, 2011

शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच येत चालला आहे.

जर आपण आज शेतीकडे गांभिर्याने पाहिले नाही, शेती कशी शेतकर्यांना फयदेशीर होइल हे पाहिले नाही, तर भविष्यात "शेतीच" उरणार नाही. मग खाणार काय? मोटारी? सोफ़्ट्वेर कि रसायने कि वीज? जे जीवनाचे मुळ आहे तिकडे दुर्लक्ष, द्वेष (गावठी ना...) आणि सवलती दिल्या जातात त्याचा रोष...पण जर त्यांन त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव दिला पाहिजे हे समजत नाही. टाटा वा मारुतीने वा कोणत्याही टी. व्ही. कंपनीने आपल्या उत्पादनांचे भाव वाढवले तर कोणी बोंब मारत नाही...पण शेत्मालाचे भाव वाढले तर सारे गळे काढु लागतात. पण असे का होते यावर कोणी विचार करत नाही. पेट्रोलचे भाव वाढले तर ते पुन्हा कमी होण्याची क्वचित शक्यता आहे हे माहित असते...पण २-४ दिवस आदळ-आपट करत पुन्हा पंपावरच्या रांगा आणि वाहनखरेद्या थांबत नाहीत. पण शेतमालाच्या भावात चढ-उतार का होतो आणि त्याचा फायदा शेतक-याला कितपत होतो याचा विचार करण्याची शक्ती मध्मवर्ग ते उच्च वर्गी हरपून बसला आहे. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच येत चालला आहे.

यामुळेच शेतीकडे आजची सुशिक्षित पीढी आकर्षित होत नाही...एक कप चहाला आम्ही १५-२० रुपये मोजायला तयार असतो पण एक कोथींबिरेची जुडी १० रुपयाला झाली तर कासाविस होतो...सरकारला शिव्या घालतो...हा आमचा दांभिकपणा नव्हे का? जर उद्या शेतीच थांबली...आणि तशी सुरुवात झालेलीही आहे...तरुण शहरांकडे पळत आहेत आणि शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुलीही मिळणे अशक्य होवु लागले आहे. याचे परीणाम काय होणार आहेत हे आजच समजावुन घेतले पाहिजे...त्यात खूप भांडवलदार जमीनी खरेदीचा सपाटा लावत असल्याने क्रुषियोग्य जमीनही कमी होत आहे. (अर्थात हे फक्त पस्चिम महाराष्ट्रात घडतेय.) हे भांडवलदार (खरे तर राजकारणीच यात जास्त आहेत.) काय शेती करण्यासाठी जमीनी विकत घेत नाहीत हे उघड वास्तव आहे. आणि जमीनी विखुन मिळालेले पैसे कोठे गुंतवावे याचे मार्गदर्शन नसल्याने, शेतक-याला अन्य व्यवसायाचा सहसा कसलाही अनुभव नसल्याने हे "गुंठासम्राट" दारु, बाया आणि राजकारण यावर पैसे उडवण्यास सज्ज असतात. कित्तेक तरून मी एडस्ने मरतांना पाहिले आहे. पण याबद्दल कोणीही चकार शब्द काढायला तयार नाही. त्यांचे प्रबोधन व्हावे असे कोणाला वाटत नाही. हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

येथे प्रतिपाद्य मुद्दा हा आहे कि शेती तोट्यात का जाते? त्याची मला खालील कारणे दिसतात: (अन्यही आहेत पण ती पुढील लेखात.)

१. शेतक-यांची अनुकरणाची प्रव्रुत्ती...कांद्याचा भाव वाढतो आहे असे दिसले रे दिसले कि जो तो भसाभस कांदेच लावणार. मग एवढे उत्पादन होते कि मागणी पेक्षा पुरवठाच एवढा वाढतो कि शेतक-याचा उत्पादन खर्चही निघत नाही. जो कांदा काही महिन्यांपुर्वी सोण्याचा भाव मिळवत होता तोच कांदा अक्षरश: फेकुन द्यावा लागतो. हे एक उदाहरण झाले. असेच अन्य पीकांबाबतही होते हे आपण नेहमी पहातच असतो. हे असे होते कारण एकुणातील गरज लक्षात घेवुन जेवढ्या प्रमाणात लागवड व्हायला हवी तशी होत नाही आणि तसे नियंत्रणही आस्तित्वात नाही. नैसर्गिक धोके लक्षात घेवुन गरजेच्या १५ ते २०% एवढीच अधिक लागवड झाली तर बाजारभावाचा प्रश्न ब-यापैकी मिटु शकतो.

यासाठी आवश्यक ती आकडेवारी उपलब्ध असते का? असली तरी ती पुरेशी असते का? आणि समजा असली तरी मुळात सर्व उत्पादक एकून किती लागवड करत आहेत हे कोणाला माहित असते का?
याचे उत्तर नाही असेच आहे. खरे तर बियाण्यांच्या एकून खपावरच नियंत्रण असले तर? म्हणजे काही केल्या त्या-त्या विशिष्ट क्षेत्रांत विशिष्ट प्रमाणातच बियाणी उपलब्ध करायला हवीत म्हणजे अतिरिक्ततेचे आर्थिक ओझे कोणावरच पडणार नाही. शेतक-याला माल फेकून द्यावा लागणार नाही, उलट योग्य तो भाव मिळेल. किमान आज होते तशी परवड होणार नाही.

मान्सून चांगला गेला म्हणुन उत्पादन वाढले आणि म्हणुन भाव कोसळतात हा येथे अतिरेकी सिद्धांत होतो. मुळात काय उत्पादित करायचे, किती प्रमाणात करायचे याचे प्रोडक्ट मिक्स अनियोजित असल्याने भाव कोसळतात. सर्वच शेतमालाचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कोसळत नाहीत हे आपण लक्षात घेत नाही. मग मान्सून चांगला असो कि वाईट. कारण मान्सुन समजा वाईट गेला तर भाव चढे राहिल्याने एकुणातील गोळाबेरीज कायम रहाते. चांगल्या मान्सुनमुळे समजा उत्पादन वाढले तर भाव जरी कमी मिळाले तरी उत्पादनच वाढले असल्याने पुन्हा तेवढेच पैसे हाती येवू शकतात.

पण अनुकरण आणि एकून बाजारपेठेची गरज न समजावून घेता विशिष्ट पीकांचे प्रमाण वाढले तर मात्र दयनीय स्थिती निर्माण होते हे समजावून घेणे, शेतक-याला समजावून सांगणे आणि त्याच्या मनोव्रुत्तीतच एकुणात बदल घडवून आणने आवश्यक आहे.

मी अनेक प्रगतीशील शेतक-यांना विराण-खडकाळ माळांवरही लाभदायक शेती करतांना पाहिले आहे आणि मला त्या सर्वांचा सार्थ अभिमानही वाटतो. पण त्यांनी पारंपारिकतेचा त्याग केला, अभिनव कल्पना वापरल्या म्हणुनच ते यशस्वी ठरलेत हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

२. उस उत्पादक शेतकरी ही महाराष्ट्राची एक समस्या आहे. याने शेतक-यांना पैसा दिला हे खरे आहे पण त्यामुळेच ते ऐदी आणि निसर्गाचे भक्षक बनत चालले आहेत याकडे कोणाचे लक्ष नाही ही दुर्दैवाची बाब आहे. १६-१८ महिने...एकदा लागवड केल्यानंतर फक्त फायदेच उचलायचे, म्हणजे बाकी काळ अक्षरश: शेतीकडे फिरकायची विशेष गरज नाही. पाण्याचा एवढा अतिरिक्त मारा करायचा...(पाणी मुबलक आहे म्हणुन किंवा कोण विचारतो म्हणुन...) पण त्यामुळे अत्यंत सुपीक शेतजमीनी खारावत चालल्या आहेत आणि एकट्या सांगली जिल्ह्यात दरवर्षी २-३ हजार एकर जमीन खारावत चालली आहे...नापीक होत चालली आहे. एवढेच नव्हे तर उसाचा उतारा (एक किलो उसाला) जो ११ ते ११.५०% होता तो कमी होत होत आता ८-९% वर आला आहे. भावासाठी आंदोलने करण्यात झाला आहे शेतकरी पटाईत...पण ही गंभीर समस्या त्यांना समजत नाही आणि कोणी समजावून सांगत नाही.

याला कारण आहेत महाराष्ट्राचे राजकारणी...विशेशत: शुगर बेल्टमधले. शेतकरी ऐदी बनले त्याचा वापर यांना हुकमी मतपेढीसारखा तर होतोच पण राजकीय महत्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण करत आर्थिक वापर करुन घेता येतो. तो कसा यावर नंतर बोलूयात. पण येथे नमूद हे करायचे आहे कि या सा-यात शेवटी शेतकरी (ऊसौत्पादक) मरणार आहे. याचे भान आताच असणे गरजेचे आहे. आलटुन-पालटुन पीके घेतली नाहीत तर जमीनीचा कस कमी होतो. पाण्याचा अतिरिक्त वापर झाला तर जमीनी खारावतात...नापीक होतात...हे सम्जावून सांगण्याची गरज आहे. व्यापक प्रबोधनाची गरज आहे.

पण थोडे धन हाती आले रे आले कि अत्याधुनिक खादीचे शुभ्र कपडे घालत, गळ्यात -हातात सोण्याच्या साखळ्या घालत क्वालिस वा अन्य नेत्यांनी लोकप्रिय केलेल्या वाहनांतुन चमचे घेत महानेत्यांच्या दारात पडीक असलेले मी जेंव्हा पहातो तेंव्हा खिन्न होतो. आणि दुर्दैवाने हे मराठा समाजाचेच असतात हे एक दुर्दैव. राजकारणाची नैसर्गिक हाव हे त्यांच्या भवितव्यातील अध:पतनाचे कारण असनार आहे हे मला येथे नमुद करतांना त्यांनी राजकारण हा व्यवसाय करावा...चांगला आहे...पण त्यासाठी शेतक-यांचा-शेतीचा बळी देवू नये असे विनम्र आवाहन करायचे आहे. त्यासाठी शिवरायांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्वे तरी आठवावीत. शेतक-यांना आता ३ ते ४% दराने कर्ज द्यावे असे निर्णय झाले आहेत. ते शेतक-यांपर्यंत पोहोचेल तेंव्हा पोहोचेल...पण शिवरायांनी ०% दराने शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा कायदा केला होता, तसे ते शेतक-यांना मिळतही होते याचे विस्मरण शिवरायांच्या नावावर दुकाने चालवणा-यांना माहित नाही असे दिसते. असे यांचे शिवप्रेम.

आज शेतकरीच नाईलाज म्हणुन शेती करतोय...दुसरा पर्यायच नाही म्हणुन, ही एक विघातक मानसिकता बनु लागली आहे. त्याला आपल्या कार्यात रस निर्माण व्हावा, त्याला त्यासाठी उचित मोबदला मिळायला हवा ही जाण आणि भान राजकीय नेते विसरलेत हे खरे आहे पण उर्वरीत समाजाचे काहीच कर्तव्य नाही कि काय?

सर्वच क्रुषिवलांचे प्रबोधन व्हावे...त्यांना अनुदाने...सबसीड्या...कर्जमाफ्या इइइ बाबत भिकारी न बनवता त्यांचा रास्त आत्माभिमान-स्वाभिमान वाढवावा, त्यांना जागरूक शेतकरी बनवावे आणि देशाचा सर्वांगीण विकास साधावा असे स्वप्न पाहनारा नव्हे तर प्रत्यक्षात ते क्रुतीत उतरवणारा पंजाबराव देशमुखांसारख्या, बाबासाहेबांसारख्या दुरद्रुष्टीच्या आणि प्रसंगी कठोर होत त्याची अंम्मलबजावणे करण्याची नैतीक शक्ती असणा-या नव्य महामानवाच्या शोधात मी आहे.


तोवर अखिल सुजाण समाजानेच हे महानायकत्व स्वीकारायला हवे. प्रत्येकाला जमेल तसे आपापले योगदान द्यावे लागणार आहे. समाज हाच नेता आणि समाज हाच अनुयायी अशी एक प्रगल्भ व्यक्तित्ववाद्रहित संकल्पना राबवायला हवी आहे. ज्यामुळे मनुष्य स्थीर झाला त्याचे एकमेव कारण आहे ते शेती. जीही संस्क्रुती आणि धर्म आपण जपतो त्याचे निर्मितीकारण आहे शेती.

आणि तीच जर लयाला जाण्याच्या वाटेवर असेल आणि आपणच असंवेदनशील असू तर आपले भविष्य अंध:कारमय आहे हे समजून चालावे.

आपण किती नैतीक आहोत?

सर्वच मराठेतर समाजाला झंझोडुन जागे व्हावे लागणार आहे कारण त्यांचा गैरवापर केला जात आहे. ब्राह्मणांना शत्रू म्हणुन प्रोजेक्ट करत इतरांना फसवून एका झेंड्याखाली आनण्याची ही चाल आहे. येथे हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि जसे सारेच ब्राह्मण रा.स्व.संघवादी नाहीत तसेच सर्वच मराठे हेही मराठा सेवा संघवादी नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे सारेच दलितही आंबेडकरवादी नाहीत...पण सोयीचा बुरखा घेतात. त्यामुळे या सर्वच संघीयांचे आंतर्गत हितसंबंध तपासुन घ्यायची गरज आहे.

मराठी समाजापुढची आव्हाने वेगळी आहेत. समस्या दिवसेंदिवस विकराल होत चालल्या आहेत. जगण्याचा मुलभुत प्रश्न गहन होत चालला आहे. असंतुलित विकासामुळे, विकेंद्रीकरणाकडे लक्षच न दिल्याने महाराष्ट्र रसातळाला जावु लागला आहे. गुन्हेगारी, झुंडशाही, एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे शेतकरी-कामकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारांच्या संख्येत एकीकडे वाढ होतेय पण परप्रांतीय येवुन प्रत्येक क्षेत्रात याच भुमीत रोजगार मिळवताहेत...पुढे जात आहेत. म्हणजे याच संध्या मराठी माणसाला सहज उपलब्ध असतांनाही केवळ मानसिकतेमुळे त्यांनी त्या गमावल्या आहेत. मराठी माणसाची ही कुपमंडुक मानसिकता बदलण्यासाठी या संघीयांनी एक सामाजिक चळवळ म्हणुन प्रयत्न करणे अभिप्रेत होते. श्रमाची-उद्योगीपणाची-कोर्पोरेट होण्याची महत्ता गावो-गाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता होती. पण ख-या प्रश्नांकडे पहायचेच नाही असे ठरवून आणि इतरांचेही लक्ष त्या प्रश्नांकडे जाउ नये म्हणुन पण मंडळी फक्त द्वेष आणि द्वेष याचाच आधार घेत समाजाचे सर्वस्वी वाटोळे करायला निघाली आहे आणि त्याचा निषेध करणे क्रमप्राप्त आहे.

कारण यामागे सर्वस्वी सत्तेचे राजकारण आहे. प्रजा मेली तरी त्यांचे काहीएक जात नाही. पण प्रजाच नसली तर हे कोणावर राज्य करणार आहेत हे काही केल्या या बावळ्यांच्या लक्षात येत नाही. पण समाज टीकला पाहिजे एवढेच नव्हे तर त्याची द्न्यान-व्विद्न्यान-सांस्क्रुतीक-आर्थिक-सामाजिक प्रगती व्हायला हवी हे काही केल्या त्यांना समजत नाही उलट गेली ६-७ वर्ष महाराष्ट्रात द्वेशाचे राजकारण होते आहे. यांच्यामुळे रा.स्व. चा फायदा असा झाला कि जे अर्थद्रुष्ट्या प्रगत झाल्याने जातीय कोंदनाबाहेर चालले होते त्यांना (ब्राह्मणांना) भयग्रस्त यांनी केल्यामुळे ते पुन्हा ब्राह्मणवादी संघटनांकडे वळु लागले...देणग्या देवू लागले. पुर्वी ब्राह्मण समाजात उपजातींची स्वतंत्र सम्मेलने व्हायची...जशी देशस्थ...चित्पावन...ई....यांच्यामुळे ब्राह्मणही बहुभाषिक संयुक्त सम्मेलने भरवु लागले आणि जे रा.स्व. ला अभिप्रेत आहे त्या नवसनातनवादाची जाहीर चर्चा व्हायला लागली. त्याचे समर्थन व्हायला लागले. याबद्दल मी किर्लोस्कर मासिकात वारंवार निषेध करणारे लेख लिहिले आहेत. पण ही सनातनवादी प्रतिक्रिया उमटवण्यास भाग पाडणारे आणि अंतत: रा.स्व.संघचे इप्सित साध्य करायला मदत करणारे हेच नव-संघीय होते याचे विस्मरण करून चालणार नाही. याचा अर्थ या दोहोंची वैचारीक युती आहे असा होत नाही काय?

हेच सत्य दडपले जावे, कोणीही त्यावर बोलू नये...बोलला तर त्याला संपवा हा उद्योग हे नव-संघीय करत आहेत. माझे साहित्यिक, विचारवंत आणि विचारी मित्र म्हणतात कि "ज्यांचे तुमचे तळवे चाटायची लायकी नाही त्यांच्याशी वाद का घालता? तुमची वैचारीक उंचीच ज्यांच्याकडे नाही त्यांना झटकून टाका." तर माझे काही संतप्त मित्र म्हणतात..."ठोकायचे का त्यांना?"

माझे उत्तर असे आहे कि ही मंडळी आज जे विषारी विचार पेरत आहेत त्याचा वटव्रुक्ष होत वंशसंहार होण्याची वाट पहायची आहे काय? मुस्लिमांना-ख्रिस्चनांना कसे अमानुश पद्धतीने मारले गेले आहे हा इतिहास जुना नाही. त्याला किमान ७५ वर्षांची उत्तरोत्तर वर्धिष्णु वैचारीक परंपरा होतीच. हे नव-संघीय ८-१० वर्षांची बालके...अजून काही वर्षांनी ब्राह्मणांचा संहार करणार नाहीत या भ्रमात राहु नका. द्वेषाची वीषवल्ली फार झपाट्याने वाढते. प्रेम आणि शांतीची रोपे हजारो वर्षांपुर्वी रुजवली गेलीत पण ती अजुन खुरटतच वाढत आहेत...प्रत्येक शतकात त्याच्या फांद्या छातणारेच जास्त जन्माला येतात....हा विरोधाभास लक्षात घ्या हे माझे सर्वांना विनम्र आवाहन आहे.

"ठोकायचे का त्यांना?" याला माझे अर्थातच उत्तर आहे ते म्हनजे "नाही." हाणामा-या -शिवीगाळ हे काही केल्या समाजावरील अन्याय दूर व्हावा-प्रगती व्हावी अशा उद्देशाने काम करणा-यांचे काही केल्या उद्द्दिष्ट असू शकत नाही आणि संस्क्रुतीही. आपले काम हे आणि हेच आहे कि सर्वच समाजघटकांची सर्वांगीण उन्नती. मतभेदांसहचे सहजीवन. सत्य मान्य करण्याची मानसीक तयारी. जेही काही उदात आहे, सुंदर आहे, ते कोणत्याही जातीयाचे असो, त्याला अभिवादन करण्याची व्रुत्ती. चार पावले तुम्ही पुढे या चार पावले आम्हीही पुढे येतो असे करण्याची मनाची उंची.

शेवटी समाजात विभिन्न विचारप्रवाह राहणारच आहेत. ते नैसर्गिकही आहे. ते असायलाच हवे तेंव्हाच समाज पुढेही जात असतो. द्वेषामुळे प्रगत झालाय असा एकही समाज यच्चयावत विश्वात नाही...नव्हता आणि होणारही नाही. द्वेशपुर्ण विचारप्रवाहांशी सा-याच सुजाण समाजाने लढायचे असते आणि तीच त्या-त्या समाजाची नैतीक पात्रता सिद्ध करत असते.

आपण किती नैतीक आहोत याचा प्रत्येकाने विचार करावा ही विनंती.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...