Thursday, December 16, 2010

Was Sindhu culture entirely destroyed?

Popular myth is Sindhu culture was destroyed at the hands of nomadic Aryan invader tribes, those entered Indian subcontinent from Central Asia (or north pole), one after other. But as there is not a single proof of any violent battle in or around the remnants of sites those have been excavated, the theory had to be abandoned. It certainly depressed Aryanists. Even Rigveda itself, which is so-called most ancient religious text, does not approve this theory. Tilak tried to prove through some poetic verses of Rugveda that home of Aryans was in Arctic region, but this theory too has been failed on the grounds of physical proofs. Myth of Aryans is owed to Herman Yakobi and Maxmuller. But both were linguists and not anthropologists. Their principle thought was such a developed and mature language like “sanskrut” cannot have Indian origin. Hence the people those originated this language must have been foreigners.

Anyway, this is not the principle object of writing this article. However, when such theories were being proposed and supported by likes of Tilak, remains of Sindhu culture were yet to see sunlight. When one after other Sindhu sites (First excavations were in the terrains of Sindhu river, hence Sindhu culture…but the spread of the sites is in 5.50 lakh sq. km’s., ranging from Sindhu river, Hariyana, Punjab, Rajasthan to Maharashtra…this way it was and is real Indian culture).

Now there is no dispute that oldest settlement of Sindhu culture is as old as 3500 BC. If considered Rigvedic timeline, it doesn’t go back before 2500 BC. Most importantly Rugveda is composed during the era of King Sudasa and his successors by almost 350 Rishis of ten different clans. The composing of Rigveda is considered to be from 2500 BC till 1750 BC.

And last remnants of Sindhu sites (not culture, as per my say AS it was never destroyed completely.) dates back to same time, i.e. 1750 BC.

Is it co-incidence?


WHO WERE VAIDIKS?

If the Aryans were not invaders, didn’t attack, defeated and destroyed Sindhu settlements, then who were they, and what kind of relationship did they have with Sindhu people?
Scholars like Dr. M. K. Dhavalikar have now started to propose that in fact vaidik Aryans were founders of Sindhu culture. (see…”Aryanchya Shodhat by Dr. M.K. Dhavalikar.). Also it is proposed by them that the fireplaces those are found in excavations in Sindhu sites are nothing but the “Yadnyavedi’s”.
If accepted their propositions, the main question arises that what was the religion of Sindhu people before rise of Rigveda and Yadnyik rituals? The timeline of Rugveda doesn’t go back beyond 2500BC, no matter how stretched. And if Sindhu culture dates back to 3500 BC, it gives scope to many questions.


Does Rigveda support this theory?
No.
Rigveda admits that their enemies used to live in forts and fortified cities.
Rigveda admits that vaidik people used to live in huts and small villages called “Vish”.
Rigveda admits that vaidik people were herdsmen and not pro-agriculturists.
Being herdsmen, fire and animal-oriented sacrifice culture was normal to them.
Through their own lifestyle they developed their own religion.
This religion was originated during period of King Sudasa, and as his clan lost its supremacy in the course of time Rugvedic Rishi’s seem to pray and beg before Pani’s (Those were sudras for them) for donations (See (Anukramani…Rigveda)
To Rigvedik Rishis, all enemies of Sudasa clan are “Anarya’s”, including Ikshwaku (in this clan Rama took birth), Yadu (In this clan Krishna took birth), Matsya, Bhalanas, Anu, etc.
Rigvedik Rishis all the time pray that the fortified cities of their enemy be destroyed at the hands of Lord Indra.
They have been praying for the growth of their cattle…not agriculture.

AND SINDHU CULTURE

The remnants of the ancient sites prove that Sindhu people used to live in well organized/planned cities.
They were mainly agriculturists.
They used to cultivate farmlands by using water of Sindhu river having an artificial bunds on the water flows.
Sindhu people also were traders/sea farers and used to trade with foreign lands crossing sea through ships. (The artifacts of Indus civilization found in Mesopotemia etc. are the proofs.)
Sindhu people principally were idol worshippers, chiefly Lord Shiva, Vrushabha, unicorn and Mother Goddesses.
Yoga was invented by Sindhu people as various seals those have been found prove this fact.


I have given here quite a few points to describe there was principally great difference in both the cultures. Vaidik thought of civilization clearly is against civilized culture.
Sindhu culture was advanced in every way as compared to Vaidik culture. Vaidik culture was principally of herdsman culture whereas Sindhu culture was agriculturist.
Hence the claims that vaidik (or Aryans) destroyed Sindhu culture or they were creators of Sindhu culture can be refuted easily.

Then question arises why vaidik culture ended by 1750 BC and why we find last remains of Sindhu culture (settlements) in the same period of time?

MYTH OF SARASVATI

Here I would like to draw your attention towards sarasvati river which was highly revered river by Vaidik rishis. There have been hundreds of prayers in this rivers praise, unlike Sindhu or other. This is because vaidik people were settled in the planes of saraswati river. The myth that this river dried up near Vinshan, has now got supportive physical proofs. Wakankar and few others have proved that this was not a mythical river; it really did exist in ancient times. In 1750 BC (approx) because of earthquakes saraswati had to change the course and as repeated earthquakes river dried up as there remained no source of water. (Hakra, a dried up river now is identified with Saraswati.)
Considering this geological fact, which dried up a river, also must have made sever impact on the Sindhu cities those were all around epicenter of earth quake i.e. Saraswati River. Last remains of Sindhu culture are of approximately of same time period, i.e. 1750 BC.
Hence people, no matter whether Vaidik or Sindhu, were forced to abandon the cities and build new settlements elsewhere or in nearby safe regions. Since vaidiks used to live in huts, no remains of vaidik culture has been ever found.

Was Sindhu culture entirely destroyed?

No culture ever dies, no matter whatsoever calamities might befall. We can trace out remains of Sindhu culture even today:

1. The same type of ships and bullock carts are still in use in Sindhu region today those were found in excavations in the form of toy’s.
2. Yoga is still in the practice and is spreading, and first ever Yogic postures are found on abundant seals in Sindhu culture.
3. Thousands of “Vrushabh” (Bull) seals justify the tradition still continues.
4. The tree like Pimpal can be seen on various seals, and the same tree is considered Holy even today.
5. “saptmatruka” (may be symbol of week days.) can be seen on few seals.
6. Sindhu people were idol worshippers and we too even today are idol worshippers.
There can be many examples those we follw even today that can be related with faiths and style of Sindhu people.

What is lost of Sindhu people?

We have lost a strong legacy of Sindhu people, our forefathers which I would like to list as under:

1. We lost the great tradition of town planning.
2. We lost the great legacy of a trading community, adventure and commerce that was needed for constant prosperity.
3. We lost the tradition of scientific advance that had began by Sindhu people. The first dry-dock was built by Sindhu people at Lothal.
4. We lost the literacy of Sindhu people…Sindhu people had script and could write and it appears that people were educated.


WHAT VAIDIKS COULD PRESERVE AND WHAT THEY LOST?

Here I am not attempting to compare both the cultures those had independent values and lifestyle. But vaidik culture too didn’t vanish. They too have preserved their legacy to some extent.

1. By oral tradition they preserved Veda’s. (They didn’t know art of writing as Sindhu people did.)
2. Keeping ancient memories in mind they migrated almost all over India from the earth-quake stricken Saraswati region.
3. They preserved their Yadnyk ritualistic religion and spread in among others for almost 2000 years (till 2nd century AD.) But gradually it ended up.
4. Vaidiks wrote Purana’s, gave new dimensions, suitable to them, by way of adulteration to Mahabharata, Ramayana and Purana’s, that helped them inevitably in proving their own supremacy.
5. With smrutis, they established their supremacy over other people.

WHAT THEY LOST?

1. They lost their very religion and rituals in the course of time.
2. They could not prove supremacy of their Gods like Indra, Mitra, varuna etc. whom none worships today.
3. They lost their principle business of animal farming and entered in other businesses.
4. They lost their constant zeal of fighting against idol worshippers and had to become priests of idol worshipping classes.


Anyway, we have seen that though few cities of Sindhu people were destroyed because of natural calamities, flow of the culture didn’t stop there. It is ever flowing energetic force and we need to catch up with what we have lost in the course of the time.

To see images of Sindhu culture pls visit http://www.harappa.com/har/har0.html

Thursday, December 2, 2010

ही रिमझीम श्रावणाची

ही रिमझीम श्रावणाची
का तुझा डोळ्यांत?
ग सखे सांग मला
काय सलतय उरात?

आभाळाला पंख निळे
श्रुष्टीचे तेज नवे
ग सखे सांग मला...
काय तुझी वेदना?

सागराची गाज किती
गंभीरता ही नित्य नवी
ये सखे बाहुंत
घे नवी संवेदना

जीवनाचे रंग किती
जशी माझी तुझी प्रिती
ग सखे हास जरा...
तुझे अश्रु दे मला...
ही रिमझीम श्रावणाची...
का तुझा डोळ्यांत?

Sunday, November 28, 2010

"संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल": महावीर सांगलीकर

श्री महावीर सांगलीकर यानी लिहिलेले "संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल" हे प्रबंधात्मक पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. संस्क्रुत भाषा ही "देववाणी" आहे, जवळपास सर्वच युरोपिअन आणि भारतीय भाषांची जननी आहे असे साधारणता: मानण्याकडे कल आहे. एवढेच नव्हे तर कोंप्युटरसाठी (सोफ़्ट्वेअर) साठी संस्क्रुत भाषा हाच पर्याय आहे असे गेली २०-२५ वर्ष आपण ऐकत आलो आहोत. श्री सांगलीकर यांनी या समजांना तडा देणारे महत्वपुर्ण संशोधन केले आहे आणि अपवाद वगळता त्यांचा युक्तिवाद आणि पुरावे खोडुन काढता येणे अवघड आहे. हे मोलाचे कार्य करुन त्यांनी संस्क्रुत प्रेमींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे असे म्हणावे लागेल.

प्राक्रुत भाषा या मुळच्या बोली/लिखित आणि लिप्यांकित भाषा. त्या अनादि आहेत. मनुष्य बोलु लागला...भाषांचा निर्माता झाला ही फार मोठी क्रांती होती. पण संस्क्रुत भाषेला कधीच लिपी नव्हती कारण ती क्रुत्रीम भाषा होती आणि म्हणुनच ती शिकावी लागत असे आणि ती कधीच बोलीभाषा नव्हती, हे सांगलीकरांचे म्हनने विचारात घ्यावे लागते, कारण ते वास्तव आहे. वेद मुखोद्गत का करावे लागत कारण संस्क्रुतला कधीच लिपी नव्हती.

सांगलीकर म्हणतात कि बुद्ध-महावीरांनी संस्क्रुतचा उपयोग केला नाही. ते खरेच आहे...कारण ती कधीच जनभाषा नव्हती. ब्राह्मणही संस्क्रुतमद्धे बोलत असत याचे पुरावे नाहीत. ती फार तर प्रक्रुत भाषांना ग्रांथिक करण्यासाठी बनवली गेली वा वापरली गेली. एव-तेव ती क्रुत्रीम भाषा होती...जशी लटीन. वैदिक संस्क्रुत हे पाणिनीय संस्क्रुतपेक्षा पुरेपुर वेगळे आहे. पाणिनी हा ब्राहमण/वैदिक नव्हता...तर तो पणी समाजाचा होता. असे असले तरी पाणीनिमुळे, त्याने संस्क्रुत अधिक किचकट व बोजड करुन टाकल्यामुळे पाणिनी-उत्तर काळात संस्क्रुत ग्रांथिक भाषा म्हणुनही नामशेष झाली हे एक वास्तव आहे. सांगलीकरांनी अत्यंत अभ्यासपुर्ण पद्धतीने आपले विवेचन केले आहे आणि ते साधार आहे.

ग्रीक-युरोपेअन भाषांवर संस्क्रुतचा प्रभाव आहे असे मानले जाते...हा अहंगंड आहे. त्याचे कारण असे कि मुळात ग्रीक इतिहास हा ६-७ इ.स.पु. पार जात नाही. आर्य तर इ.स.पु. २५०० मद्ध्ये भारत आणि युरोपात घुसले असे आपले काही इतिहास तद्न्य मानतात. इंग्लंड आणि पार स्वत:ला आर्य समजणार्या जर्मनीचा इतिहास तर ६ व्या शतकापार जात नाही. हे ऐतिहासिक अंतर आजतागायत संस्क्रुत भाषाअभिमानी भरु शकलेले नाहीत. त्यांना ते कधीही शक्य होणार नाही. मग हे आर्य कोण होते आणि ते एवढ्या काळात (म्हणजे इ.स.पु. २५०० त भारतात आले, आणि इ.स.पु. ६०० मद्धे ग्रीस मद्धे गेले आणि इ.स. ६-७ व्या शतकात जेर्मनीत घुसले...मग हे कोठे मधला वेळ थांबले होते? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

संस्क्रुत ही क्रुत्रीम भाषा आहे, व्याकरणबद्ध आहे, आणि म्हणुनच ती शिकावी लागते...ती कोणाचीही कधीच मात्रुभाषा नव्हती तर एक ग्रांथिक भाषा होती हे सांगलीकरांचे मत बरोबरच आहे.

परंतु, सांगलीकर खंत व्यक्त करतात ती ही कि संस्क्रुतवादी संस्क्रुताळलेले प्राक्रुत शब्दच आणि तेच व्याकरणाचे नियम पाळा हा आग्रह म्हणजे संस्क्रुतवाद्यांचा भारतीय भाषेंवरचा हल्ला आहे. आणि ते बरोबरच आहे. प्रमाण भाषा हा एक वेडा आग्रह आहे कारण प्रमाण करावी अशी गोष्ट म्हणजे भाषा नव्हे...तर ती प्रवाहित असते आणि तीचे रुप बदलत असते. गथा सप्तसहीमधील मराठी ही आजची मराठी नाही, नामदेवांची मराठी ही आजची मराठी नाही, द्न्यानेश्वरांची मराठी ही आजची मराठी नाही...पण ही भाषा टिकली आहे कारण त्यात प्रवाहीपणा आहे. संस्क्रुतसारखा नियमबद्ध साचलेपणा नाही....म्हणुनच प्रक्रुत भाषा टिकल्या आहेत...संस्क्रुत कधीच म्रुत झाली आहे.

सांगलीकरांनी या प्रबंधात्मक पुस्तकामुळे एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहे कारण त्यामुळे भाषा आणि त्यांची उत्पत्ती याकडे पहाण्याचा नवा द्रुष्टीकोण मिळतो. हे पुस्तक अगदी संस्क्रुत प्रेमींनीही वाचावे अशी मी शिफारस करतो.

शैव संस्क्रुति...आपली संस्क्रुती

आपण ज्या संस्क्रुतीत जगत असतो, आणि ज्या संस्क्रुतीचा आपल्याला अभिमान वाटत असतो, ती नेमकी काय आहे, तीचा इतिहास किती पुरातन आहे, ती कालौघात कशी विकसीत होत गेली हे जानण्याचे कुतुहल प्रत्येकाच्या मनात असते.
आणि जी संस्क्रुती आपली आहे, जिचा अभिमान आहे ती पुढे कशी विकसीत करता येइल यासाठी प्रयत्न करणे, त्या संस्क्रुतीची महत्ता सर्वत्र पसरवणे हे प्रत्येक संस्क्रुतीतिल समाजाला आपले कर्तव्य वाटते.
जगाचा इतिहास हा एका परीने सांस्क्रुतीक संघर्षाचा इतिहास आहे असे स्पष्ट दिसते, कारण प्रत्येक संस्क्रुती आपापले श्रेश्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत ती इतेरांवर लादण्याचा प्रयत्न करत असते हेही इतिहासात आपल्याला दिसते. यातुन कधी ना कधी संघर्षे निर्माण होतो आणि तो अनेकदा हिंसक पातळीवर जातो हे आज आपण ज्यु विरुद्ध ख्रिस्ती, ख्रिस्ती विरुद्ध इस्लाम विरुद्ध अन्य धर्मांच्या रक्तरंजीत संघर्षातुन बघु शकतो. हा संघर्षे नुसता रक्तरंजीत असतो असेही नाही. कधी तो राजकीय गुलामी लादुन सांस्क्रुतीक वर्चस्वाचे प्रयत्न होतात तर कधी आर्थिक वर्चस्वातुन.
तर कधी ते लांड्या लबाड्या करत, खोटे श्रेय पदरात पाडुन घेत, जे स्वत:चे नाही ते स्वत:चेच कसे हे ठसवण्याचा अविरत प्रयत्न करत सांस्क्रुतीक वर्चस्व लादण्याचा प्रयत्न करत असतात.
भारतात यद्न्य संस्क्रुतीच्या, स्वत:ला आर्य समजणार्या भटांनी असाच उद्योग केला आहे.
त्यामुळे मुळात शैव असणार्या शैवजनांना (बहुजनांना) एवढे गोंधळात टाकले गेले कि आपण नेमके कोण हा प्रष्न पडावा.
आपण शुद्र कसे? आपण संस्क्रुतीचे निर्माते असुनही आपलेच सामाजिक स्थान एवड्या खालच्या दर्जाचे कसे हा प्रश्न पडावा अशी वेळ आली.
आपण आज पाळतो, आचारात आणतो तो धर्म, या तथाकथित धर्ममार्तंडांच्या स्वत:च्या धर्मापासुन वेगळा असतांनाही, तेच आपल्या धर्माचे पुरोहित झालेच कसे हा प्रश्नही या निमित्ताने उठतो.
आपल्या संस्क्रुतिची पाळेमुळे शोधने हे प्रत्येकाचे कर्तव्य बनुन जाते कारण ती मानवाची एक मुलभुत गरज असते. आपल्या संस्क्रुतीत भ्रश्ट काय आणि शुद्ध काय याचा धांडोळा घेणे गरजेचे बनुन जाते.
याला मी संस्क्रुती शुद्धीकरणाची मोहीम म्हणतो आणि ती कोणाचाही द्वेष न करता व्हावी ही अपेक्षा आहे.
शैवजनांना ही गरज भासली आहे कारण सांस्क्रुतीकतेच्या पातळीवर हा समाज जगातील सर्वात प्राचीन असला तरी त्याच संस्क्रुतीच्या महानायकांना बदनाम झालेले पाहुन पराकोटीच्या यातना होतात.
येथुन पुढे बहुजनांनी स्वत:ला "बहुजन म्हणने थांबवावे कारण तसे म्हणुन आपण स्वत:ची उदात्त शैव परंपरा वाळीत टाकत असतो.
आपण शैवजन हाच शब्द येथुन पुढे वापरणे संयुक्तिक राहील.

संस्क्रुत्यांचा कालपट:

पुरातन काळापासुन जगाच्या प्रत्येक विभगात कोनत्या ना कोणत्या प्रकारच्या संस्क्रुत्या विकसित झाल्याचे आपल्याला दिसुन येते. अगदी दुर रानावनात अरण्यांत राहणार्या आदिवासि जनांनीही आपापल्या स्वतंत्र आणि वैशिश्ट्यपुर्ण संस्क्रुत्या विकसीत केल्याचे आपल्याला दिसते. एवढेच नव्हे तर सुदुर महासागरांतील आता-आतापर्यंत तथाकथीत सभ्य जग पोहोचु न शकलेल्या इश्टर बेटांवरही एक संस्क्रुती नांदत होती हे आता सिद्ध झाले आहे.
मानव प्रजाती ही अन्य प्राणी जगतापेक्षा वेगळी आहे याचे कारण त्याला बुद्धी आहे असे आपण मानतो. ही एक बाब आहेच. बुद्धीच्या बळावर मानव जातीने आपले जीवन सुसह्य करण्याचा, प्राक्रुतीक सकंटांवर मात करण्याचा, जीवनाची, स्रुष्टीची, विश्वरचनेची रहस्ये उलगडण्याचा अविरत प्रयत्न केला आहे, आणि तो सतत चालुही राहील.
मानवाच्या या अथक प्रयत्नांतुनच संस्क्रुतीची सुरुवात झाली आहे आणि ती कालौघात सातत्याने विकसीत होत राहीली आहे.
शैव संस्क्रुती ही जगातील सर्वात प्राचीन आणि आजही टिकुन असणारी एकमेव संस्क्रुती आहे ही बाब लक्षात घ्या.
येथे संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे समजावुन घेणे आवश्यक आहे.

संस्क्रुती म्हणजे:

निसर्गावर मात करण्याच्या प्रक्रियेत मनुष्याने निर्माण केलेले धर्म, धर्मश्रद्धा, गरजेनुसार बनवलेल्या व विकसीत केलेल्या भाषा, निती-नीयम, समाजव्यवस्था, युद्धायमानता, साहित्य, कला, विद्न्यान, वास्तुकला, नगरर्चनाशास्त्र, तत्वद्न्यान आदींतुन होणारी अभिव्यक्ती यांचा एकुणातील मेळ म्हणजे संस्क्रुती.
मनुष्य स्वता:वर आणि सभोवतालच्या निसर्गावर संस्कार करत जी एकुणातील परिस्थिती निर्माण करतो ती संस्क्रुती होय. संस्क्रुती ही सातत्याने पुधे जात असते...एकतर अद्धपतनाकडे तरी वाटचाल करत असते वा वर्धिष्णु तरी रहात असते.
या थोडक्यातील व्याख्येवरुन आपण प्रत्येक संस्क्रुतीचे वेगळेपन पाहु शकतो. जाणु शकतो. पुढे आपण शैव संस्क्रुतीचा इतिहास पाहतांना या व्याख्येचा सर्वांगीन विचार करणारच आहोत, म्हणुन येथे एवढेच पुरे.
कोणती संस्क्रुती श्रेश्ठ व कोनती कनिष्ठ याची तुलना जरी केली जात असली तरी ती अन्याय्य असु शकते कारण श्रेष्ठ-कनिष्ठतेचे मानदंड हे सापेक्ष असतात. मानवी समाज हा नेहमीच स्वता:ला अधिकाधिक समाधान देइल अशा व्यवस्थेच्या शोधात असतो. जुने मापदंड, जर ते अडचनीचे वाटु लागले कि ते बदलण्याच्या प्रयत्नांत असतो. संस्क्रुती अशीच पुढे जात राहात असते. त्यात जेंव्हा साचलेपणा येउ लागतो तेंव्हा ती नष्ट होण्याचा धोकाही तेवढाच असतो. तसेच एखाद्या संस्क्रुतीत विजिगिषु व्रुत्तींचा शेवट होवु लागतो तेंव्हा ती संस्क्रुती आक्रमकांच्या पाशात अडकुन पडुन हळु हळु संपण्याचा धोकाही तेवढाच असतो.
जगात मानवी जीवनाच्या द्न्यात-अद्न्यात इतिहासात अगणीत स्वरुपाच्या संस्क्रुत्या उदयाला आल्याचे आपण जगाच्या सांस्क्रुतीक इतिहासात पाहु शकतो. यातील असंख्य संस्क्रुत्या कलौघात नष्ट झाल्या असल्याचेही आपल्याला दिसते. काही संस्क्रुत्या तर केवळ अवषेश सापडले म्हणुन आपल्याला माहीत आहेत. त्या संस्क्रुत्यांचे निर्माते कोण होते, त्यांचे सामाजीक जीवन, धर्मश्रद्धा नेमक्या काय होत्या याचे फ़क्त अनुमान काढता येते. त्या संस्क्रुत्या कलौघात कधी प्राक्रुतीक तर कधी मानवी युद्धादी कारणांनी नष्ट झाल्या असाव्यात. इश्टर बेटावर अवाधव्य मानवी शिरोप्रतिमा उभारणारे आले कोठुन आणि नंतर गेले कोठे हा प्रष्न जसा आजही अनुत्त्ररीत आहे तसाच महारष्ट्रात शीला-वर्तुळे बनवुन दफन करणारे भटके कोणत्या संस्क्रुतीचे होते हाही प्रष्न अनुत्तरीत आहे.
पण जगात एके काळी अवाढव्य, प्रगत असणार्या संस्क्रुत्याही कालौघात नष्ट झाल्या असल्याचे आपण पाहु शकतो.
उदाहरणच घ्यायचे तर आपण येथे इजिप्शियन, सुमेरिअन, अक्काड, ग्रीक, रोमन इ. संस्क्रुत्या विचारात घेवु शकतो. शैव संस्क्रुती खालोखाल आपल्याला द्न्यात असणारी प्राचीन संस्क्रुती म्हणजे इजिप्शिअन संस्क्रुती. या संस्क्रुतीच्या बलशाली असण्याचे पुरावे म्हणजे नुसते पिरामिड्स नव्हेत तर इजिप्शिअन राजांच्या वंशावळी आणि त्यांचा त्यांच्या माडलीक राजांशीचा पत्रव्यवहार, तहनामे आदि लेख आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु ही संस्क्रुती इ.स.पु. ५०० च्या आसपास संपुश्टात आली.
ग्रीक संस्क्रुती ही नगरराज्यांची राजकीय व्यवस्था निर्माण करणारी पहीली संस्क्रुती. होमर सारखा महाकवी जसा या संस्क्रुतीने दिला तसेच सोफोक्लीज, इस्खुलीज सारखे महान नाटककार दिले. थेलीज ते प्लेटो सारखे महान विचारवंत/तत्वद्न्यानी आणि जीवनाचा भौतिकवादी विचार करणारे प्रतिभाशाली असंख्य विचारवंत दिले. ही संस्क्रुतीही कालौघात नष्ट झाली.
एखादी संस्क्रुती नष्ट होते म्हणजे त्या संस्क्रुत्यांचे प्रभाव नश्ट होतात असे मानण्याचे काहीच कारण नाही. कधी कधी तर त्या वैचारीक का होइना पण पुढील नव्या संस्क्रुत्यांवर राज्य गाजवत असतात. ग्रीक संस्क्रुतीबद्दल तसेच म्हणता येइल. उदाहरणार्थ ग्रीकांच्या नियतीवादी/जडवादी तत्वद्न्यानाचा पराकोटीचा प्रभाव पाश्चिमात्य विचारपद्धती आणि तत्वद्न्यानावर पडला आहे. तसाच तो साहित्यावरही पडलेला आहे हे आपण जेम्स जाइसच्या "ओडीसी" या जगविख्यात कादंबरीवरुनही पाहु शकतो. एवढेच नव्हे तर भारतीय साहित्यावरही ग्रीक कलाक्रुतिंचा केवढा प्रभाव आहे हे आपण मराठीतील जी. ए. कुलकर्णी यांच्या नियतीवादी कथांतुनही पाहु शकतो. औषधी विद्न्यानातील वा कायद्यांतील असंख्य शब्द व परिभाषा आजही ग्रीक आहेत हेही एक वैशिश्ट्य आहे.
तरीही ही संस्क्रुती कालौघात नश्ट झाली हे सत्य नाकारता येत नाही. या संस्क्रुतिचा र्हास अंतर्गत कारणांनी झाला...पण त्यातुनच पुढे रोमन संस्क्रुतीचा उदय झाला. या संस्क्रुतीने तत्कालीन जगावर राज्य केले हेही आपल्याला विसरता येत नाही. या संस्क्रुतीचा उदय आणि अस्त कसा झाला याचा आढावा आपण "राइज न फ़ाल ओफ़ रोमन एम्पायर" या ग्रंथात पाहु शकतो.
एवढेच नव्हे तर ग्रीक संस्क्रुतीची वैष्यिस्ट्यपुर्ण बांधकाम पद्धत आजही भुरळ घालते. त्या पद्धती आजही राबवल्या जातात. अमेरिकेत झालेली अनेक बांधकामे त्याचे पुरावे आहेत. रोमन संस्क्रुतीबद्दलही तसेच म्हणता येइल.
थोडक्यात संस्क्रुती नष्ट होते ती पुर्णपने हे काही खरे नाही. ती कोणत्या-ना-कोणत्या रुपात नवीन संस्क्रुत्यांत, भले बीजरुपाने का असेना, अवशिष्ट राहाते असे म्हणने क्रमप्राप्त आहे.
आणि यातुनच एकुनातील मानवी संस्क्रुती बदल स्वीकारत पुढे जात रहाते.
हा स्वीकार स्वेस्चेने होतो असे नाही...परंतु ती कधी कधी मानवी समुदायांची अगतीकता असते हेही खरे. आणि या अगतिकतेच्या स्म्रुती मनुष्य जतन करण्याचा प्रयत्न करत असतो हेही आपल्या लक्षात येइल. त्यामुळे नवा धर्म जरी स्वीकारावा लागला तरी हे नवधर्मीय आपल्या पुरतन धर्माचे अवशेष आपल्या नव्या व्यवस्थेत कसे जपतात हेही पाहणे मनोरंजक ठरेल.
कोणत्याही संस्क्रुतीचा पुरेपुर विनाश झाला असे म्हनता येत नाही ते यामुळेच.
संस्क्रुत्या पुरातन काळात जन्माल्या आल्या त्या जवळपास स्वतंत्रपणे. म्हनजे त्यांवर इतर मानवी समुहांचा काहीच प्रभाव नव्हता असे नाही. उदाहरणार्थ शैव संस्क्रुतीचे लोक आफ़्रिका ते युरोपे पर्यंत व्यापार करत असल्याने, ग्रीक, खाल्डियन, अक्काड, सुमेरिअन, फिनिशियन, असीरियन संस्क्रुत्यांवर त्यांनी प्रभाव टाकला तसेच त्यांच्याकडील काही तत्वे आत्मसात केली. उदाहरणार्थ ग्रीकांनी नागपुजा ते गणीत अशा अनेकविध कल्पनांना शैव जनांकडुन आत्मसात केले.
सांस्क्रुतीक देवान-घेवान, स्वत:चे स्वत्व राखुन करायला पुरातन मानवी समाजाची हरकत नव्हती. त्या द्रुश्टीने त्याला आपण सहिश्णु मानव म्हणु शकतो. उदाहरणार्थ शैव संस्क्रुतीने भारतीय उपखंडातील इतर संस्क्रुत्या आपल्या विशाल जाणीवांत सामावुन तर घेतल्याच, पण तसे करतांना त्या संस्क्रुत्यांचे मान्दंड धर्मप्रतीकांत सामावुन घेत त्यांची पुर्व-प्रतिश्ठा कशी जपली हेही आपण पुढे पाहणार आहोत.
अर्थात ही सहिष्णुता आधुनिक मानवात होती किंवा आहे काय हा प्रष्न विचारला तर मत्र उत्तर थोडेसे निराशाजनक आहे. उदा. पिज़्ज़ारोने इन्का संस्क्रुतीचा असा अमानुष विनाष केला कि ती संस्क्रुती पुरेपुर नश्ट झाली. मानवी क्रौयाचे असे नमुनेही आपयाला भेटतात. आफ़्रिकेतील अनेक संस्क्रुत्या आजच्या आधुनिक काळात पद्धतशीरपणे नष्ट केल्या जात आहेत. भारतातील आदिवासी संस्क्रुत्याही याच परसांस्क्रुतीक आक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
बलीश्ठांची संस्क्रुती तीच काय ती श्रेष्ठ हा अहंगंड पुरातन काळापासुन मानवात आहे आणि त्या गंडाने संस्क्रुती-विकसनात हातभार लावण्याऐवजी हानीच केली आहे असे म्हनने क्रमप्राप्त आहे.

परंतु सांस्क्रुतीक आक्रित...

ही बलीष्ठता नेहमीच हिंसात्मक असते असे नव्हे. माणसे मारुनच, एखादा सांस्क्रुतीक समाज नष्ट करुनच वा राजकीय सत्ता लादुनच संस्क्रुत्या संपवण्याचा प्रयत्न होतो असे नव्हे तर अनेकदा त्या विशिष्ट संस्क्रुतीत घुसुन, चुपेपणे आपली संस्क्रुती त्या संस्क्रुतीत घुसवण्याचा, तीचे माहात्म्य लादण्याचा प्रयत्नही होत असतो हे मात्र अनेकदा लक्षात येत नाही. एकाच संस्क्रुतीच्या भौगोलीक परिप्रेक्षात ज्या संस्क्रुत्या नव्याने उदयाला येतात, संख्येच्या अभावाने जेंव्हा आपले माहात्म्य वाढवीता येत नाही, तेंव्हा बहुसंख्यांच्या संस्क्रुतीत घुसुन, त्यांचे माहात्म्य आधी मान्य करुन, त्यांच्या जीवन्श्रद्धा वरकरणी स्वीकारुन, पधतशीरपणे आपले सांस्क्रुतीक माहात्म्य लादण्याचा प्रयत्न केला जातो. हा एक विक्रुत, पराभुत मानसीकतेच्या, परंतु आपापले स्वातंत्र्यही जपु पाहणार्या सांस्क्रुतीक गटांचा प्रयत्न असतो. ही मंडळी जो सांस्क्रुतीक गोंधळ घालतात आणि आहे त्या संस्क्रुतीला तर विक्रुत बनवतातच पण स्वता:ची संस्क्रुतीही गढळवुन टाकतात.
आणि अशी अवाढव्य सांस्क्रुतीक विक्रुती फक्त भारतातच घडुन आली आहे, हे एक दुर्दैव. ही विक्रुत जमात आणि संस्क्रुती कोणती हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण अशा विक्रुतींमुळे एक संपुर्ण समाज कसा वेठीला धरला जातो आणि त्यात सर्वांचेच कसे नुकसान होते हा मुद्दा जास्त विचरणीय आहे.
प्रत्येक संस्क्रुतीचे स्वत:चे असे स्थान असते, वैषिश्ट्य असते. ते श्रेश्ठ कि कनिश्ठ हा भाग वेगळा, कारण तसे ठरवण्याचे मापदंड बदलते असु शकतात. पण स्वत:ची संस्क्रुती स्वतंत्रपणे जपता येत नाही, ते वेगळेपन स्वतंत्रपणे जपता येत नाही, किंबहुना बलाढ्य संस्क्रुतीच्या मेहरबानीखेरीज स्वतंत्र जगताही येत नाही, कारण जगन्यासाठी जे आर्थिक स्थैर्य हवे ते स्वतंत्रपणे निर्मान करता येत नाही, तेंव्हा त्या बलाढ्य संस्क्रुतीला कवटाळणे आणि मानसिकतेतील दडलेल्या वर्चस्व भावनेला संधी मिळेल तसे इतेरेजनांवर लादत जाणे ही एक विक्रुती आहे. ती भारतीय समाजाने गेली २ हजार वर्ष सहन केली आहे. आपली संस्क्रुती नेमकी काय हा प्रष्न उपस्थित व्हावा अशी वेळ या पर-सांस्क्रुतिकांनी आणली आहे. गंम्मत अशी की हेच लोक आता "आम्हीच तेवढे संस्क्रुती-रक्षक" असा आव आणत जी त्यांची संस्क्रुती आहे तिच इतरांचीही आहे असा खोटरडा आव आणत एक नवा साम्स्क्रुतीक खोटार-वाद जन्माला घालत आहेत आणि त्याला आपलेच स्वत्व, आपलीच संस्क्रुती माहीत नसणर्यांना आपल्या वेड्यात घेत आहेत.
अशी विक्रुती तुम्हाला जगाच्या अन्य सांस्क्रुतीक इतिहासात शोधुनही सापडनार नाही.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपली पाळे-मुळे शोधने ही एक अनावर जिद्न्यासा मानवी मनात असते. आपला नेमका धर्म कोणता? आपली संस्क्रुती कोणती? आपले तत्वद्न्यान कोणते?
आणि जे सांस्क्रुतीक वर्चस्व गाजवण्याच्या, आणि ते सांगतात तीच संस्क्रुती...तर ते सांगतात त्या संस्क्रुतीशी आपला नेमका संबंध काय हे शोधने गरजेचे बनुन जाते.
त्याखेरीज आपण कोण आहोत, आपला नेमका धर्म कोणता? आपला इतिहास काय? आज आम्ही असे का आहोत? आमची पाळेमुळे नेमकी कोठे आणि कशी रुजली आहेत हे कसे कळणार?
आमच्या श्रद्धा आणि सांस्क्रुतीक वर्चस्व गाजवु गाजवु पाहणर्याच्या श्रद्धा मग वेगळ्या का?
त्यांचे आचार-विचार, त्यांची धार्मिक कर्मकांडे, त्यांचे धर्मग्रंथ वेगळे का?
आणि असे असुनही तेच आमचे धर्म्पुरोहीत का?
प्रष्न खुप आहेत.
जे ग्रंथ इतरेजनांना वाचायची/ऐकायची धार्मिक परवानगीच नव्हती तर त्या ग्रंथांशी शैवजनांचा संबधच काय?
तो नव्हताच कारण ते ग्रंथ कधीच शैवजनांचे नव्हते. उलट शैवजनांना आपल्या संस्क्रुतीचे गुलाम करण्यासाठी त्या ग्रंथांचा वापर केला गेल्याचे आपल्याला स्पश्ट दिसते.
एवढेच नव्हे तर शैवजनांच्या धर्म-प्रतिकांना हेटाळुनही, त्यांच्या धर्मग्रंथांना (जे हजारो आहेत) पायतळी त्यांनी तुडवुनही, पुन्हा वर स्वत:ला शैव समजण्याचे क्रौर्यही त्यांनी दाखवले आहे. ते कसे हे आपण पुढे पाहणारच आहोत.
शैवांचे जे स्वतंत्र धर्मसाहित्य, तत्वद्न्यान होते तेही स्वता:चेच असे त्यांनी सांगायला सुरुवात केली. एक असत्य हजार वेळा सांगीतले कि ते खरे वाटु लागते हा गोबेल्स नीतिचा वापर त्यांनी यथेच्च केला...
त्याचा परिणाम असा झाला कि शैवजनच आपली संस्क्रुती आपली नसुन इतरांची देणगी आहे असे समजु लागले.
आपल्या संस्क्रुतीच्या सणांवर त्यांची कलमे करुन घेतली आणि ती सहनही केली गेली कारण आपली पाळेमुळे माहित करुन घेण्यासाठी जी सामाजीक व्यवस्था लागते तीचा पुरेपुर अभाव निर्माण केला गेला.
अशा प्रकारचे सांस्क्रुतीक हत्याकांड फक्त भारतात झाले.
याला आधुनिक जगात सांस्क्रुतीक दहशतवाद म्हणतात...
हे हत्याकांड करणारे मुळचे यद्न्यधर्मीय ब्राह्मण...
तर सांस्क्रुतीक द्रुष्ट्या ठार मारले गेलेले शैवजन होत.

त्यांचा स्वत:चा धर्म कधीच लोकव्यवहारांतुन नश्ट झाला.
आज कोणी ब्राह्मण यद्न्य करत नाही. यद्न्य करु शकतील असे ब्राह्मण आज शंभरही नाहीत.
कोणीही ब्राह्मण आपली कुलदेवता म्हणुन वैदिक इन्द्र, वरुण, मित्र, भारती इ. देवता सांगत नाहीत...उलट शिवपरिवारातीलच देवता त्यांच्या कुलदेवता आहेत. तेच कुलाचार आहेत. शैवच देवके आहेत. (देवक ही कल्पनाच मुळात वैदिक नाही.)
पण तरीही त्यांचा रुग्वैदिक धर्म आणि संस्क्रुती श्रेश्ठ असा आभास मात्र निर्माण केला गेला आहेच...
आम्ही अडानी-आदिवासी लोकांच्या शिवाला वैदिक रुद्राशी तादात्म्य साधुन त्याला "पवित्र" केले असाही युक्तिवाद आहेच...(पहा- भारतीय संस्क्रुती कोष, "शिव")
त्यामुळे शैव जन हजारो वर्ष आपलीच संस्क्रुती अव्याहत पाळत असता तिच्यावर वैदिक कलमे स्वीकारली गेली...
ज्यांनी रुग्वेदात ज्या शिवाला "शिस्नदेव" असे संबोधुन अपमान केला त्याच शिवाला "रुद्र" या यज्न-संस्क्रुतीतील देवतेचेच रुप आहे असे खोटे सांगायला सुरुवात करुन शिवाचे वैदिकीकरण करण्याचा चंग बांधला...पंढर्पुरच्या पुंड्र या अवैदिक समाजातील महान शिवभक्त जो विट्ठल त्याचेही असेच रुग्वेदिकरण केले गेले...
आणि ते तेथे पुरोहित म्हणुन बोकांडी बसले...
आपल्यालाच आपला इतिहास माहित नाही, संस्क्रुती माहित नाही तर मग दुसरे काय होणार?
त्यामुळे आपल्याला आपल्या पुरातन शैव संस्क्रुती म्हणजे नेमके काय? हा नेमका काय धर्म आहे? या संस्क्रुतीची बलस्थाने कोणती? वैगुण्ये कोणती? धर्मग्रंथ कोणते? आपले महान पुर्वज कोण होते? संस्क्रुती कशी बलढ्य होत गेली? त्यात हे लोक कधी घुसले? त्यांनी इतिहास कसा व का बदलला? रामायण व महाभारतासारख्या मुळच्या शैव महाकाव्यांत "ब्राह्मण-माहात्म्ये" का व कशी घुसवली?
अशा असंख्य प्रष्नांना उत्तरे देण्यासाठी हा लेख लिहीला गेला आहे.
सर्व शैवजन त्याचे स्वागत करतील, त्यावर मनन करतील व यज्नधर्मीयांना या धर्मातुन दुर सारुन खर्या शैव धर्माची कास धरतील ही अपेक्षा.


शैव धर्माचा उगम

जगातील सर्वात पुरातन आणि सतत वर्धिष्णु राहिलेली, आजही आचार-व्यवहारात टिकुन राहिलेली संस्क्रुती/धर्म म्हणजे शैव होय.
शैव धर्माचा उगम किमान १५,००० वर्षांपुर्वी झाला. याचे असंख्य पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. मनुष्य जेंव्हा भटका होता, शिकारी मानव होता तेंव्हापासुन त्याच्यामद्धे जन्म-मरण या सनातन रहस्याने, सत्याने चिंतन्शील केले. स्त्री ही जन्म देते त्याअर्थी तीच्यात काहीतरी गुढ शक्ती वास करत असाव्यात हा निश्कर्ष त्याने काढला. त्या वेळीस विवाहसंस्था अद्याप आकाराला आलेली नव्हती, कारण स्त्री मुलाला जन्म देते हे सत्य माहित असले तरी त्यात पुरुषाचा वाटा किती हे माहित नव्हते. त्यातुन सर्वप्रथम सुरु झाली ती मात्रुपुजा...पुरुष स्त्रीकडे शक्तीरुपात पाहु लागला. मात्रुत्वशक्तीची पुजा बांधणे यातुनच आद्य शैव धर्म आकाराला आला. आद्य "योनीपुजा" त्यातुनच आकाराला आली. मात्रुसत्ताक पद्धतीचा उगमही त्यातुनच झाला. ही शक्तीची प्रतिश्ठा होती.
यातुनच पुढे या आदिमानवाने पुढील झेप घेतली. मर्त्य मानवाला जशी एक स्त्री जन्म देते तशाच पद्धतीने अखिल विश्वाला, सर्व प्राणिमात्राला जन्म देणारी आदिमाताही असली पाहीजे ही ती कल्पना होय. ही आदिमाता अनंत शक्तिशाली असली पाहीजे आणि तीच सर्वांच्या जननाची, जीवनाची आणि म्रुत्युनंतरची कारणमात्र असली पाहिजे ही कल्पना विकसित झाली आणि या आदि-धर्माने पुढची पायरी गाठली.
शेतीचा शोध हा लावला तो स्त्रीयांनी. पुरुष शिकारीसाठी भटके तेंव्हा स्त्रीया तात्पुरत्या निवार्यांत राहत. बीज जमीनीवर पडले कि ते रुजुन रोपटे बनते...व्रुक्ष होतो हे निरिक्षन कामाला आले. त्यातील खाद्य काउ, अखाद्य काय हे अनुभवांतुन समजु लागले. आद्य शेतीचा उगम असा झाला. मानवी जीवनात अभुतपुर्व क्रांती घडली. भटका माणुस हळुहळु स्थीर झाला. शिकारी मानव हा क्रुषि-मानव बनला.
यातुनच सांस्क्रुतीक क्रांतीही घडली. तीने मानवी जीवन पुरेपुर बदलुन टाकले. शेतीमुळे समाज स्थिर झाला. भुमीतुन बीजरोपणाखेरीज रोपटे उगवत नाही...म्हणजे स्त्रीही पुरुषाखेरीज संतती प्रसवु शकत नाही हा साक्षात्कार मानवी समुदायाला झाला. त्यातुनच जसा भुमीवरील हक्क तसाच स्त्रीयांवरील हक्क ही संकल्पना उदयाला आली. त्यातुनच आद्य विवाहसंस्थेचा पाया रचला गेला.
यातुनच नवी सामाजीक, सांस्क्रुतीक क्रांती घडली. भुमी आणि स्त्री हे मानवी समाजाचे अद्भुत अंग बनले. स्त्री व भुमीसाठी लढने हे नित्याचे बनले.
यातुनच हळुहळु पुरुषसत्ताक पद्धतीचा उगम झाला. पुरुष हाही एक अपत्यजन्मातील नुसता महत्वाचा नव्हे तर मुख्य घटक आहे ही जाणीव त्यामागे होती. हा एक प्रकारचा सत्तापालट होता. आता फक्त योनीपुजा नव्हे तर त्याबरोबर लिन्ग्पुजाही होवु लागली...
कारण जशी विश्वाला जन्म देणारी आदिमाता आहे तसाच आदिमातेच्या शाश्वत गर्भातुन विश्वजन्माला कारण होणारा आदिपुरुष असला पाहिजे आणि या स्रुष्टीच्या जन्माला तो कारण असला पाहिजे ही प्रगल्भ आणि त्याचवेळीस श्रद्धापुर्ण जाणीव आदिम शैव धर्मात क्रांती घडवणारी ठरली.
पुरुषाने अशा प्रकारे वर्चस्व निर्माण केले असले तरी स्त्रीची/आदि-शक्तीची महत्ता मात्र मुळीच कमी झाली नाही...दोहोंमद्धे एकरुपत्व, अद्वैत कल्पुन पुढे शिव व शक्ती हे विभिन्न नव्हेत तर एकाच तत्वापासुन केवळ स्रुष्टीजन्मासाठी विभक्त झालेले उगल आहे अशा उदात्त पातळीवर शैव सिद्धांत पोहोचला.
हे हजारो वर्षांच्या मानवी जीवन प्रवासाच्या कालखंडात घडले. शैव तत्वद्न्यानाचा इतिहास हा एका अर्थाने मानवी प्रगल्भतेचा, जाणीवांच्या विकासाचा इतिहास आहे हे येथे लक्षात घेतले पाहीजे.
शैव धर्माचा/संस्क्रुतीचा उगम आपल्या देशात झाला याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि हा धर्म आपण आजतागायत टिकवला याचा आपल्याला सार्थ अभिमानही वाटला पाहिजे. आपण आपल्या अति-पुरातन पुर्वजांशी कसलीही प्रतारणा न करता, त्यांनी ज्या आदिम परंतु कुतुहल्ग्रस्त मनातुन ज्या संस्क्रुतीची सुरुवात करुन दिली ती हजारो वर्ष नुसती टिकवली नाही तर त्यात तत्वद्न्यानाची भर घालत तिचा विकास केला आहे. आजही आपण तोच धर्म, तीच संस्क्रुती पाळतो, पण इतेरेजनांनी "आम्हीच शिव-शक्ती" या अवैदिक, अडाण्यांच्या, रानटी लोकांच्या देवतांना वैदिक रुद्राशी तादात्म्य साधत पवित्र केले, अशा दाव्याला मान्य करुन आपल्या मुर्खपणावर शिक्का-मोर्तब करत असतो हे दुर्दैव आहे. खरे तर रुग्वैदिक रुद्राचा आणि शिवाचा काहीएक संबंध नाही, ते कसे हे आपण पुढे पाहणार आहोत. पण आपण शिवपुजा करतांना शतरुद्रीय जप करुन घेत आपण किती असांस्क्रुतीक शैव आहोत याचा नकळत पुरावा देत असतो.

शैवांचा द्न्यात इतिहास:

सिंधु नदीच्या खोर्यात प्रथम प्राचीन अवशेष सापडले म्हणुन तीला आपण सिंधु संस्क्रुति म्हनतो, पण ती प्रत्यक्षात "शैव संस्क्रुति" आहे. याचे कारण असे कि हरप्पा ते मेहेरगढ येथे ज्या असंख्य मुद्रा मिळाल्या आहेत त्यात योगिश्वर स्वरुपातील शिवमुद्रा जशा मिळाल्या आहेत तशाच मात्रुदेवता आदिमातेच्याही असंख्य मुद्रा मिळाल्या आहेत. एवढेच नव्हे तर शिवाचे जे "पशुपति" ( म्हनजे सर्व स्रुष्टीचा पिता) हे रुप शैवांनी आजही जपले, त्या पशुपति रुपाच्याही मुद्रा सापडल्या आहेत. एवढेच नव्हे तर पुरतन शिवलिन्गही या उत्खननांत सापडले आहे. तसेच, शैव संस्क्रुतिचा पुज्य असा जो व्रुषभ त्याच्याही अगणित मुद्रा मिळाल्या आहेत. फार कशाला, शैवांना अतिप्रिय असा जो पिंपळ व्रुक्ष याचे त्या काळातही पुजन होत होते असे दाखवणार्या मुद्राही मिळाल्या आहेत. त्याखेरीज शिवलिन्ग आणि मात्रुदेवतेच्या खुणा दर्शवणार्या शाळुंका आणि लिंग दर्शक प्रस्तरखंड हजारोंच्या संख्येत मिळाले आहेत.
हे शैव संस्क्रुतिचे प्राचीन अवशेष. त्यांचा काळ सरासरी इ.स.पु. ३७०० एवढा जातो. ही संस्क्रुति किती प्रगत होती हे अवशेषांवरुनच कळते. उत्क्रुश्ठ नगररचना, प्रगत नौकानयन शास्त्र, त्यांचा अरबस्तान ते ग्रीकांशीचा सागरमार्गे व्यापार, त्यांच्या कला, सौन्दर्यमान मुर्त्यांचे अवशेष आजही आपला पुरातन गौरव गात आहेत.
इ.स.पु. १७५० च्या आसपास सरस्वती नदीच्या खोर्यात वारंवार झालेल्या भुकंपांमुळे तत्कालीन अनेक नगरे नश्ट झाली. एवढेच नव्हे तर सरस्वती नदीसुद्धा विलुप्त झाली. याच नदीच्या काठी एक नवा धर्म स्थापन झाला होता. त्यालाच आपण आज यज्नधर्म म्हणतो. हा शैवांच्या पुरेपुर विरोधात होता. एका भटक्या, पशुपालक लोकांनी स्थापन केलेला हा धर्म. ही नदी नश्ट झाली तसा हा धर्मही संपला. या धर्माबद्दल पुढे.
भुकंपामुळे काही शहरे, वस्त्या नश्ट झाल्या म्हणुन हा शैव धर्म संपला नाही कारण तो उत्तेरेपासुन ते दक्षिणेपर्यंत कधीच पसरला होता. आजही त्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. उलट हा धर्म वाढतच राहिला. भारताच्या सीमा ओलांडुन दुरदेशी पोहोचला. ग्रीकांनी मात्रुपुजा व नागपुजा शैवांकडुन स्वीकारली. असीरिअन संस्क्रुती तर येथीलच असुर समाजाने तेथे जावुन विकसीत केली. शैवांतीलच पणी या व्यापारी समाजामुळे शैव संस्क्रुती व तिच्या द्न्यानाचा इतरत्र प्रसार झाला. अनेक शब्द त्या संस्क्रुत्यांनी शैवांच्या प्राक्रुत भाषेतुन घेतले. आणि त्याचे श्रेय मात्र आजचे स्वता:ला "आर्य" समजणारे ब्राह्मण घेतात हे एक दुर्दैव आहे हे आज़्पण लक्षात घेतले पाहिजे.

हे आर्य कोण होते?

शैव समाजाने क्रुषि क्रांती करुन एक स्थीर आणि बलाढ्य संस्क्रुती निर्माण केली. नद्यांना बांध घालुन, कालवे काढुन प्रगत शेती सुरु केली. स्वता:ला आर्य समजणारे मात्र अद्यापही (इ.स.पु. २५०० पर्यंत) भटके पशुपालक होते. ते भटके असल्याने भारतात नेमके कोठुन आले याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यांच्या मुळ स्थानाबद्दल अजुनही वाद आहे. ते शेती करत, पण ती आजही काही आदिवासी करतात तशी ती फिरती शेती होती. पशुपालन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे स्वभाविकपणे ते चरावु कुरणांच्या शोधात ते भटकत असत. पशु हीच त्यांची मुख्य संपत्ती, त्यामुळे पशुमांस त्यांना निषिद्ध नव्हते. पशुमांस भाजण्याच्या रोजच्या उद्योगातुन त्यांनी त्यांचा स्वतंत्र धर्म विकसीत केला. तोच यद्न्यधर्म होय. यद्न्यातील कर्मकांडे करण्यासाठी त्यांनी जे मंत्र तयार केले त्याचाच अवशिश्ट राहीलेला पुरातन भाग म्हणजे "रुग्वेद". त्यातुन आपल्याला त्यांच्या धार्मिक कर्मकांडाची व समाज जीवनाची माहिती मिळते.
हे लोक कुडाच्या झोपड्यात रहात. त्यांची गावे लहान असत. ब्राह्मण (ज्याला मंत्र रचता येतो तो, मग तो कोणीही असो.) विश (म्हनजे नागरजन,...व्यापारी- वैश्य नव्हे) आणि क्षत्र ( लढवैये) अशी त्यांची सामाजिक विभागनी होती. मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी सरधोपट व्याख्या होती, पण सारेच सर्व प्रकारचे काम करत असत. म्हणजे ब्राह्मणही युद्धात भाग घेत.
हे लोक मुळात टिकावु बांधकाम केलेल्या घरांत राहत नसल्याने आज जसे शैव (सिन्धु) संस्क्रुतीचे अवशेष सापडतात तसे त्यांचे अवशेष सापडत नाहीत. कारण शैवांसारखी नगररचना त्यांना अवगत नव्हती.
एवढेच नव्हे तर आर्य वंशाचे म्हणता येतील असे म्रुतदेहांचेही अवशेष मिळत नाहीत, कारण आर्य हा वंश म्हणुन कधीच आस्तित्वात नव्हता तर तो एक मिश्र समाज होता. उदाहरणार्थ रुग्वेदात ज्या वंशाचा वारंवार अभिमानास्पद उल्लेख केला आहे तो वंश, भ्रुगु, हा अवैदिक, अनार्य होता हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व धर्मानंद कोसंबी यांनी साधार सिद्ध केले आहे. फार काय यदु (ज्या वंशात क्रुष्णाचा जन्म झाला.) इक्श्वाकु ( ज्या वंशात रामाचा जन्म झाला) त्यांना रुग्वेद अनार्य मानतो हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
त्यांची वस्ती मुख्यता: सरस्वती नदीच्या काठावर होती. त्यांनी राजा सुदासाच्या नेत्रुत्वाखाली नजिकच्या शैवांशी अनेक वेळा युद्धे केली. कपटीपने नद्यांवर शैवांनी बांधलेले बांध, कालवे फोडले. कपटाने तर काही र्शैव राजांना ठार मारले. त्याचे पुरावे ठाइठाइ रुग्वेदात सापडतात. जसा सुदासाच्या वंशाचा अस्त झाला, तशी रुग्वेदरचनाही थांबली.

त्यांचा धर्म कोणता?

हे आर्य म्हनवणारे लोक अग्नीभोवतीचे जे धार्मिक कर्मकांड करत त्यातुन हा यद्न्य धर्म उगम पावला. या धर्माची वैषिश्ट्ये अशी:
अ. त्यांना मुर्तीपुजा मान्य नव्हती. यद्न्यात मांस वा वनस्पतीच्या (समीधा) आहुती देवुन ते इन्द्र, वरुण, मित्र, नासत्य इ. देवतांना "हवि" देत. या वेळी ते मंत्र म्हनत. हे मंत्र म्हनजे त्यांच्या अमुर्त देवतांना केलेली विविध आवाहने होत. त्यांत पशुधन वाढावे, शत्रुंचा नाश व्हावा इ. स्वरुपाच्या विनवण्या आहेत. या मंडळीला आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, इ. सिद्धांत मान्य नव्हते वा माहितही नव्हते.
ब. त्यांना मुळात मुर्तीपुजा मान्य नसल्याने त्यांनी कधीही त्यांच्या इन्द्र-वरुणाच्या मुर्त्या बनवल्या नाहीत. आजही तुम्हाला कोठेही या रुग्वैदिक देवतांची मंदिरे आढळनार नाहीत. असे असुनही "हिन्दु" धर्म हा वैदिक-सनातन धर्म आहे असे हे लोक बिनदिक्कतपणे सांगतात हे लक्षात ठेवने आवष्यक आहे.
क. त्यांना अमरतेचा शैव सिद्धांत मान्य नव्हता. त्यांचा देवाधिदेव जो इन्द्र, तोही अमर नाही., फ़क्त आयुष्य मोठे.
ड. रुग्वेदात जो धर्म समोर येतो तो स्थिर नसलेल्या लोकांचा धर्म आहे. ते स्वभाविकही आहे कारण जशी समाजव्यवस्था असते तसाच धर्म आणि धर्मतत्वे बनतात. तो मुलभुत मानवी स्वभाव आहे.त्यांचा धर्म अग्नीभोवती व त्यात दिल्या जाणार्या आहुतिंभोवती फिरतो कारण तेच त्यांचे सामाजिक वास्तव होते.
इ. आर्यांना संन्यास मान्य नव्हता. उलट जो संतती प्रसवत नाही त्याला उच्च गती मिळत नाही असा त्यांचा सिद्धांत होता. शैव धर्मातील "यती"चे (संन्यासी) दर्शन ते अशुभ मानत. महाभारतातही हा सिद्धांत जरत्कारु रुषिच्या कथेतुन मांडला आहे हे लक्षात घायला हवे. एवढेच नव्हे अर "योग" ही शैवांनी जगाला दिलेली देणगी आहे. शिवाच्या योगिश्वर स्वरुपातील मुद्रा सिन्धु खोर्यातील उत्खननात मिळाल्या आहेत.
फ़. आर्यांना पुजा मान्य नव्हती. मुर्तीपुजकांचा ते द्वेष करत असत. यद्न्यात आहुती देवुन देवतांना सतुष्ट करणे हेच त्यांचे प्रमुख धर्मिक कर्मकांड होते.
थोडक्यात आर्यांचा यद्न्यधर्म आणि शैव धर्मात मुलभुत फरक आहे. दोघांचे धार्मिक कर्मकांड आणि तत्वद्न्यान वेगळे आहे. आचार, विचार, नैतीक संकेत यातही पराकोटीचा फरक आहे. उदा: यजुर्वेदात जेथे अश्वमेधाचे वर्णन आहे तेथे सांकेतीक का होइना अश्व आणि राजपत्नीच्या संभोगाची अत्यंत अश्लील वर्णने आहेत. पशुपालकांना अश्व हा महत्वाचा, त्यामुळे त्याचे पौरुष आकर्षणाचा विषय तर क्रुषिसंस्क्रुतीच्या लोकांना व्रुषभ महत्वाचा असल्याने त्याचे महत्व अपार. प्रत्येक शिवमंदिरात व्रुषभाचे महत्व का, या प्रष्नाचे उत्तर या विवेचनात आहे.
कारण मुळात या दोन्ही संस्क्रुत्या वेगळ्या आहेत. धर्मतत्वे वेगळी आहेत. कर्मकांड वेगळे आहे. समाज व्यवस्था वेगळ्या आहेत. जीवनयापनाची साधने वेगळी आहेत. अर्थव्यवस्था वेगळ्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

वेद हेच प्राचीन वा:ड्मय?

"वेद" या शब्दाचा अर्थ आहे "जे सांगितले गेले, कथित केले गेले ते..." आर्यांचा खरा वेद एकच...तो म्हणजे रुग्वेद. साम्वेदात रुग्वेदातील रुचा कशा गायच्या याचे निर्देशन आहे. यजुर्वेदात विषिश्ट प्रयोजनांसाठी केल्या जानार्या यद्न्यांत कोनते मंत्र म्हणायचे याचे निर्देशन आहे. राजसुय, अश्वमेध, पुत्रकामेष्टी इ. यद्न्य प्रसंगी म्हणायचे मंत्र व विधी त्यात आहेत.
पण त्यांना प्राचीन काळी वेद म्हणत नसत. उद. त्यांना "रुक, साम, यजस.." असेच म्हणत. अथर्ववेद हा यद्न्यधर्मियांचा नव्हे, तो यद्न्य विरोधक भ्रुगु आणि अथर्वंगिरस यांनी लिहीला. वेद फ़क्त चार नव्हेत तर त्या काळी असुरवेद, पिशाच्चवेद, गन्धर्ववेद आणि सर्पवेद असे अजुनही वेद होते असे आपल्याला गोपथ ब्राह्मणावरुन कळते.
उपनिशदांपैकी मुख्य ५२ उपनिषदे अथर्ववेदांवर आधारीत आहेत आणि त्यात आत्म्याच्चे अजरामरत्व, त्यागाची महत्ता, योग आणि अद्वैताची महती गायली गेली आहे.
पण येथे लक्षात घायची महत्वाची गोष्ट अशी कि रुग्वेदाला "निगम" असे म्हटले जाते तर शैव तत्वद्नानाच्या ग्रंथांना "आगम" असे म्हटले जाते ही परंपरा आहे. निगम म्हणजे "नंतरचा" तर "आगम" म्हनजे "आधीचा".
अथर्व वेद व त्यावरील आधारित शैव उपनिषदे सर्वांत पुरातन आहेत. त्यांत शिव व शक्ती यांचे महीमान तर आहेच पण तत्वद्न्यानाची सर्वोच्च उंची त्यात गाठली गेली आहे. अथर्ववेदात यद्न्य नव्हे तंत्रशास्त्राला महत्व आहे. तन्त्र शास्त्रांतील अनेक सिद्धांत त्यात येतात. शैव हे मुळात क्रुषक असल्याने अथर्ववेदात भुमीसुक्त अपरिहार्यपणे आले आहे. उत्तम पीके यावीत, पाउस चांगला पडावा, यासाठीचे मन्त्रही अगणीत आहेत. १०८ उपनिषदांतील ५२ प्राचीन उपनिषदे ही अथर्ववेदाशी निगडीत आहेत. आणि हे कथीत "आर्य" इ.स.पु.५०० पर्यंत अथर्ववेदाला मुळात वेदच मानायला तयार नव्हते, हे येथे लक्षात घेणे आवष्यक आहे. याचे कारण म्हणजे अथर्ववेद हा मुळात यद्न्य धर्मीयांचा वेद नव्हे. इतर वेद कालौघात नष्ट झाले.

असे का?

असे का, याचे उत्तर साधे आहे, कारन हे दोन्ही धर्म मुळात भिन्न आहेत. दोहोंचे आचार, विचार, समाजजीवन आणि तत्वद्न्यान भिन्न आहे. शैव धर्मात क्रुषि व व्यापार संस्क्रुती महत्वाची. प्रतीकपुजा, मुर्तीपुजा महत्वाची, संन्यास व योग हे उच्च ध्येय, मोक्ष प्राप्ती ही सर्वोच्च कामना. आत्मा अमर आहे ही श्रद्धा. शिव व शक्ती हे एक अद्वैत आहे आणि केवळ विश्व निर्मितीसाठी ते विभक्त झाले आणि जीवांसाठी त्यातुनच त्रैत निर्माण झाले ही विद्न्याननिष्ट श्रद्धा.
या धर्माचा द्न्यात इतिहास किमान १० हजार वर्ष मागे जातो. यद्न्य धर्म ४५०० वर्षांपुर्वी जन्माला आला. पुढे हा धर्म यद्न्यातील किचकटपणामुळे आणि ते अत्यंत खर्चीक असल्याने बंद पडले. शेवटचा यद्न्य पुश्यमित्र श्रुंग याने २र्या शतकात केला. यद्न्यकर्म संपल्याने अनेक यद्न्यधर्मीय ब्राह्मण शैव धर्मात घुसले आणि वैदिक देवतांचे पुरोहीत बनले. ही घटना इ.स.पु. ५०० मद्धे घडली. असे घडु शकले याला कारण झाला बौद्ध धर्माचा उदय. असंख्य शैव राजे आणि लाखो सामान्य प्रजा बौद्ध धर्मात गेली. बौद्ध धर्माने जवळपास ९व्या शतकापर्यंत राज्य केले खरे पण आदि शंकराचार्यांमुळे (ते कट्टर शैव होते, वैदिक नव्हे.) बौद्ध धर्माची भारतातुन हकालपट्टी झाली. मुळ धर्मात परतणार्यांची मुळ स्म्रुती अंधुक झाली असल्याने, धर्मात जे स्थान मिळेत ते स्वीकारावे लागले. थोडक्यात त्यांना एकच एक जागा मिळाली ती म्हणजे "शुद्र"
ही भारतात घडलेली महत्वाची सामाजीक/धार्मीक घटना आहे हे लक्षात घेतले पाहीजे. या बौद्ध धर्माच्या प्रभावशाली काळात जी पुराणे लिहीली गेली त्यात धर्मेतिहास विक्रुत करण्यात आला. कलीयुगात आता फक्त दोनच वर्ण असुन कोणी क्षत्रीय वा वैश्य नाही असे बजावले गेले. सागरव्यापारात मुळचे तद्न्य असलेल्या शैवांवर समुद्रपर्यटन निषिद्ध करुन टाकले गेले. त्यामुळे भारताचा जगाशी असलेला संबध तुटला. जो आला तो फक्त आक्रमकांमुळे. आणि आक्रमकांनी सतत आघात केले ते सोमनाथावर...
शिवाला रुग्वैदिक रुद्राशी जोडन्यात आले. पणी लोकांचा सागराचा देव म्हणुन जो विष्णु (विष्णु मुळचा लिन्गपुजकांचाच देव, विष्णु या शब्दाचा अर्थ आहे "विस्तारीत होणारे लिन्ग." त्याला रुग्वेदातील एका अत्यंत दुय्यम अशा इन्द्रमित्र "विष्णु"शी नामसाधर्म्याचा उपयोग करुन घेत वैदिक ठरवुन टाकले. रुग्वैदिक विष्णुला साडेतीन रुचा आहेत. तेथे तो इन्द्राचा दुय्यम मित्र व सखा आहे. तो सागरशयनी नाही. लक्ष्मी त्याची पत्नी नाही. त्याचा शिवाशी दुरान्वयानेही संबंध नाही.
थोडक्यात शैव धर्मावर वैदिक कलमे केली गेली. बहुतेक विद्वान जवळपास हजार वर्ष बौद्ध धर्मात गेल्याने ते सोडलेल्या धर्माचा विचार करणे शक्य नव्हते...आणि जे उरले होते ते अतीसामान्य जन...त्यांना हे धर्मकारण कळने शक्य नव्हते असे पुराणांवरुनच स्पष्ट दिसते.
शेवटी शंकराचार्यांनी हिरीरीने बौद्ध धर्माचा पाडाव केला आणि शैव धर्माचे पुनरुज्जीवन केले. तुलनेने शैव धर्म दक्षीनेत सुरक्षीत राहीला होता, त्यामुळेच हे घडु शकले.
येथे हे लक्षात घ्यायला हवे की वैदिक आणि शैवजनांची भाषा थोडाफार फरक सोडला तर एकच होती. सामांन्यांची, बहुजनांची भाषा "प्राक्रुत" तर संस्कार करुन ग्रंथनिर्मितीसाठी जी भाषा वापरली जाइ ती "संस्क्रुत." जे जे संस्क्रुतात ते आर्यांचे हा एक मोठा गैरसमज आहे. तसे वास्तव नाही. प्राक्रुतातुन संस्क्रुत भाषा आली, संस्क्रुतातुन प्राक्रुत नव्हे हे लक्षात ठेवायला हवे. संस्क्रुत कधीच बोलीभाषा नव्हती. युरोपात १६व्या शतकापर्यंत ग्रंथलेखनासाठी सामान्यांना अनकलनीय लटीन भाषा वापरली जात होती हाही इतिहास समोर हवा.
भाषिक साधर्म्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. खुद्द "ब्राह्मण" या शब्दाचे उदाहरण घेउयात.
रुग्वैदिक अर्थाने "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण".
शैव अर्थाने "जो पुजा-अर्चा करतो, त्या अभिषेकादि कर्मकांडाचे पौरोहित्य करतो वा ज्याला ब्रह्माचे द्न्यान झाले आहे (येथे ब्रह्म म्हणजे विश्वाचे आदिकारण) तो ब्राह्मण"
एकाच शब्दाचे अर्थ समानभाषीक समाज-संस्क्रुती आणि धर्मपरंपरांनुसार बदलत असतात. कालौघातही अनेक शब्द मुळ अर्थ हरपुन बसतात आणि नवे अर्थ समोर येतात. लिंग या शब्दाचा अर्थ जसा आपण आज घेतो तसाच त्याचा अर्थ "चिन्ह" असाही आहे. १०० वर्षांपुर्वि "कारस्थानी माणुस" याचा अर्थ होता "लटपट्या-खटपट्या करुन कार्य साध्य करणारा". आता त्याच शब्दाचा अर्थ अपमानास्पद मानला जातो.
मुळात यद्न्य धर्म हा शैवांच्या संस्क्रुतीच्या अवती-भवती निर्मान झाल्याने त्यांची भाषा ही प्राक्रुतातुनच बनवली गेली. त्या भाषेतील शब्दांना नवे अर्थ दिले, एवढेच. जैन धर्मही अर्थ बदलुन मुळ भाषेतीलच शब्द वापरतो, बौद्धांचेही तसेच झाले. त्यामुळे त्याचे विशेष आस्चर्य वाटायचे कारण नाही.

सर्व ब्राह्मण रुग्वदिक नव्हेत:

याचाच महत्वाचा अर्थ म्हनजे भारतातील आजचे सर्वच ब्राह्मण यद्न्यधर्मीय नव्हेत. किंबहुना यद्न्यधर्मीय ब्राह्मण नामशेष झाले आहेत. आदि शंकराचार्य हे कट्टर शैव होते. त्यांचा जन्मच मुळी शिवाच्या क्रुपाप्रसादामुळे झाला होता अशी दंतकथा प्रसिद्ध आहेच. त्यांनी कधीच यद्न्य केला नाही. ते तंत्रशास्त्राचे अधिकारी होते. यांनी शिव आणि जगदंबेवर अप्रतीम स्तोत्रे लिहीली आहेत. त्यांनी जेही मठ स्थापन केले ती सर्वच पुरातन शैव स्थाने आहेत. नंतरचे शंकराचार्य मात्र काशी विद्वत्सभेच्या प्रभावात जावुन रुग्वैदिक बनली ही एक कटु वस्तुस्थीती आहे.
भारतातील जवळपास सर्वच ब्राह्मणांची कुलदैवते ही शिवपरिवारातीलच आहेत. कोणाचेही कुलदैवत इन्द्र-वरुन नाही. कोणी ब्राह्मण रुग्वैदिक ब्राह्मण खायचे तसे गोमांस भक्षण करत नाही. शैव हे मुळचे, आणि आजही क्रुषि संस्क्रुतीतले असल्याने जो गोवंश शेतीकामाला उपयुक्त असल्याने पुज्य मानत असल्याने त्यांनी त्याचे मांस त्याज्ज्य ठरवणे हे संयुक्तीकच आहे. यद्न्यधर्मीयांना तशी गरजच नव्हती.
असे असुनही ब्राह्मण आपले गोत्र मात्र त्रुग्वैदिक रुषिंशी नेवुन भिडवतात. खरे तर हा त्यांचा मानसीक दुभंगलेपना आहे. याला कारणीभुत झाली ती वैदिकांनी लिहिलेली पुराणे. त्यांत ब्राह्मण माहात्म्य अपरंपार वाढवुन, ब्राह्मण हेच वैदिक, इतेरेजन क्षुद्र असा अव्याहत प्रचार केल्याने कालौघात इतर ब्राह्मणांनाही आपणही मुळचे यद्न्यधर्मीय आहोत असे वाटु लागल्याचे दिसते. यामागे धार्मिक सत्ता टिकवणे, वाढवणे हेच कारण होते. एकीकडे शिवाला शिव्या देणार्या वेदांचेही पठन करायचे आणि दुसरीकडे त्याच शिवपरिवाराच्या देवतांचे पौरोहित्य करायचे असा दुभंग प्रकार त्यातुन घडला.
ब्राह्मण समाजाने यावर चिंतन करुन आपण नेमके कोणते ब्राह्मन हे ठरवायला हवे म्हनजे आजकालचा ब्राह्मण-ब्राम्हणेतर वाद संपेल. जर ब्राह्मण हे यद्न्यधर्मीय, रुग्वेदीक असतील तर त्यांनी आपली आजची शैव कुलदैवते आणि त्यांची पुजा सोडुन द्यावी आणि यद्न्यसंस्थेचे पुनरुज्जीवन करावे. कोणी कोनता धर्म मानायचा हा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याचा सन्मान केलाच पाहीजे.
तसे नसेल त्या यद्न्यीक संस्क्रुतीचे महिमान गाजवणे सोडुन द्यावे. मुस्लीमाने अभ्यासासाठी बायबल वाचने ठीक आहे, पण तो काही त्याचा धर्मग्रंथ नव्हे. त्या श्रद्धा त्याच्या नव्हेत. पण तो चर्चलाही जाइल, मशीदीतही जाइल आणि मुस्लिमांत मुस्लीम आणि ख्रिस्त्यांत ख्रित्स्चन राहु म्हणेल तर कधी ना कधी त्याची पंचाइत होणारच.

मुळात हिंदु नावाचा धर्मच आस्तित्वात नाही:

"हिंदु" हे येथील कोणत्याही धर्माचे कधीच नाव नव्हते. हा शब्द दिला तो प्रथम ग्रीकांनी. ते लोक "स" चा उच्चार "ह" असा करतात. ते पोहोचले होते फक्त सिंधु नदीच्या खोर्यापर्यंत. त्यांनी ते खोरे आणि त्यापार राहणार्या सर्वांना "हिंदु" असे संबोधले. म्हणजे त्यात जैन, बौद्ध इ.सर्वच आले. इ.स.पु. २०० पुर्वी कोणत्याही धर्मग्रंथांत हिन्दु हे नाव आढलत नाही. कारण त्या नावाचा धर्मच आस्तित्वात नाही.
प्राचीन म्हनता येतील असे दोन धर्म...एक यद्न्यधर्म तर दुसरा मुर्तीपुजक लोकाचा शैव धर्म. पण हिन्दु हे नाव स्वीकारल्याने या दोन्ही धर्माचे जे कडबोळे बनले त्याला आपण हिन्दु म्हनतो. प्रत्यक्षात हे दोन्ही धर्म मुलता: स्वतंत्र आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यात आज भारतात टिकुन राहीलेला एकमेव धर्म म्हणजे शैव धर्म.
देशात आज विभिन्न भाषा, लोकरीती असुनही भारत आज एक देश म्हणुन टिकुन आहे त्याचे कारण म्हनजे शैव धर्म. रामेश्वरपासुन ते कैलासापर्यंत, कामाक्षी पासुन ते सोमनाथापर्यंत सर्वत्र १२ ज्योतिर्लिंगे आणि १४ शक्तीपीठे विखुरली आहेत. एकही गाव-खेडे नाही जेथे शिवमंदिर वा शिवपरिवारातील देवता नाही. प्रत्येक घरांतील देव्हार्यात गनेश, शिव, जगदंबा असतेच. देशभर अक्षरश: लाखो शिवमंदिरे आहेत, ही वस्तुस्थीती काय दर्शवते?
याउलट यद्न्यसंस्था १८०० वर्षांपुर्वीच संपली आहे. तरीही तीचे कौतुक केले जाते व तीच भारतीय संस्क्रुतीची उगमधारा आहे असे सांगीतले जाते हा निव्वळ विपर्यास आहे.

प्राचीन शैव समाज:

पुरातन काळी भारतात अनेक समाज विविध भागांत एकवटले होते. त्यापैकी सर्वात अवाढव्य समाज होता असुर समाज. हा कट्टर शिवभक्त समाज होता हे आपण पुरांनांतील विपर्यस्त स्वरुपात का होइना पण पाहु शकतो. असुरांना पुराणांनी बदनाम केले हे खरेच आहे कारण याच समाजातील बव्हंशी मंदळीने बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण प्रत्यक्षात स्थीती वेगळी आहे. असुर हे खरेच दुश्ट व मायावी असते तर क्रुष्णाचा नातु अनिरिद्धाने बाणासुराच्या मुलीशी- उषेशी विवाह केला नसता. कंस हा क्रुष्णाचा मामा असुर होता. मगधाचा सम्राट जरासंघ हाही असुर. खुद्द भीमाने हिडिंबा या असुर मुलीशी तात्पुरता विवाह केला होता. . एवढेच काय पण सांख्य तत्वद्न्यानाचा जनक कपिलमुनी हा असुर वंशातील होता. उपनिषदांची निर्मिती ज्या राजा जनकाच्या सभेत झाली तो जनक असुर समाजाचाच होता. अशी असंख्य उदाहरणे आपण पाहु शकतो.
या समाजाखालोखाल मोठा समाज म्हणजे नाग समाज. नाग हे त्यांचे देवक म्हणुन या समाजाला नाग समाज म्हणतात. त्यांना नागपुजा प्रिय होती. उत्तर भारत ते महाराश्ट्रापर्यंत हा समाज विखुरला होता. त्यांची नागपुजा शैवजनांनी नागपंचमीच्या रुपात जपली तर आहेच पण सामाजीक ऐक्याचे प्रतीक म्हणुन शिवाच्या गळ्यातही त्याला स्थान मिळाले आहे. नागपुर, नागाव, इ. गावे आजही या समाजाचा इतिहास लेउन आहेत.
याखेरीज पुरातन शैव समाज म्हनजे औन्ड्र, पुंड्र, मुतीब, शिव, भलानस, मत्स्य, द्रह्यु, अनु, पणी यक्ष, किन्नर इ. होत.
पैकी औन्ड्र हे ओरिसा, आंध्र व काही प्रमाणात महारश्ट्रात पसरले. महारष्ट्रावर जवळ्पास ६५० वर्ष राज्य करणारे सातवाहन घराणे हे औन्ड्र वंशीय होते. आंध्र, ओरिसा ही राज्ये त्यांच्याच वंशनामावरुन बनलेली आहेत.
पुन्ड्र हे आजचा बंगाल, दक्षिण महराश्ट्र, कर्नातक व काही प्रमाणात तमिलनाडुमद्धे पसरले होते. पंढर्पुर ही त्यांची महाराशःट्रातील राजधानी होती. पुन्ड्रपुर वरुन पन्ढरपुर बनले आहे तर पुन्ड्रिकेश्वर हे एक शिवालय आहे...म्हणजे पुन्ड्र समाजाचे आराध्य म्हणुन "पुन्ड्रिकेश्वर" हे लक्षात घेतले पाहीजे. बंगालमद्धेही पुंड्रपुर आहे तसेच तिरुवारुरचे पर्यायी नावही पुन्ड्रपुर आहे हेही महत्वाचे आहे. (प्रस्तुत लेखकाचे "शोध विट्ठलाचा" हे पुस्तक अवश्य वाचा.)
शिव समाज हा शिवालीक टेकड्यांच्या प्रदेशात पसरला होता तर भलानस समाज बोलन खिंडीच्या प्रदेशात. मत्स्य समाज हा आजच्या राजस्थानात होता तर मुतीब हे सिन्धु नदीच्या खोर्यात होते. द्रह्यु समाज हा दक्षिणेत वसला होता. "द्रवीड" हे नाव मुळात द्रह्युंपासुन आले आहे.
पणी हे मुलता: व्यापारी होते.
यापैकी अनु, मत्स्य, अनु, भलानस या समाजांनी यद्न्यधर्मेयांशी युद्ध केल्याचे आपण रुग्वेदातील दाशरद्न्य प्रकरणात पाहु शकतो.
थोडक्यात हे समाज विभिन्न असले तरी त्यांचे आराध्य शिव हेच होते. त्यामुळेच या समाजात एकाकारता आली. समान आराध्य, समान कर्मकांड (पुजा), समान तंत्रशास्त्र, समान कुलदैवते, आदिघटकांनी सामाजीक ऐक्याला धोका होवु दिला नाही. हे सारे समाज कालौघात एकमेकांत मिसळुन गेले, परंतु परंपरा बदलल्या नाहीत.
परंतु अलीकडे वैदिकाभिमानी मंडळी विरुद्ध शैवजन असा संघर्ष सुरु आहे याचे कारण उपरोक्त विवेचनात आहे.

सर्व सण शैव सण:
आपण जेही सण वर्षभर साजरे करतो ते सारे शैव सण आहेत. नागपंचमी घ्या कि दिवाळी. मुळात दिवाळीला "यक्षरात्री" हे नाव होते. कुबेर हा यक्ष आहे व तो शिवाचा खजीनदार आहे असे आपण मानतो. त्याचे स्वागत करावे व धनसंम्रुद्धीची कामना करावी हा मुळ उद्देश. आजही आहे, पण त्याला लक्ष्मीपुजन हे नवे नाव दिले गेले आहे. बलीप्रतीपदा हा नववर्षाचा पहीला दिवस, आणि तो आहे महान असुरसम्राट बळीच्या नावाने. बळीराजा आजही आपल्या संस्क्रुतीने जपला...त्याचा कपटाने वध करणारा वामन नव्हे. संस्क्रुती सुप्त स्तरावर का होइना प्राचीन स्म्रुती कशा जतन करते हे आपल्या लक्षात येइल. नवरात्री ते दसरा हा सण जगन्माता जगदंबेचा आणि दसरा म्हणजे पुढील वर्षासाठी सुफलतेची कामना करणारा संकल्पपुर्तीचा दिवस. त्याचा रावण्वधाशी काही एक संबंध नाही. असता तर मग आधी नवरात्री का? त्याचा रावणवधाशी काय संबंध?
पण आपण हकनाक खोट्या मित्थककथांना बळी पडत आपली गतकाळाशी असलेली नाळ तोडतो आणि सांस्क्रुतीक अनर्थ घडवत असतो.
या सर्व सणांत एकही वैदिक सण आपण साजरा करत नाही. त्यांचे सण आहेत पण ते आज नश्ट झाले आहेत. उदा. इन्द्राच्या स्म्रुतीसाठी ते "इन्द्रमह" नावाचा एक सण साजरा करत असत पण तो सण इ.स. च्या २ र्या शतकातच बंद पडला. त्यांचा दुसरा सण म्हणजे "देव दिवाळी". शैवांच्या दिवाळीशी स्पर्धा म्हणुन हा सण निर्मान झाला. पण तो कोणी साजरा करत नाही. या व्यतिरिक्त वैदिकांचा असा कोणताही सण नाही. जे सण आहेत ते पुरेपुर शैव आहेत.
आता गरज आहे ती शैव धर्म शुद्ध करण्याची, खोट्या मित्थककथा झुगारण्याची. आपली खरी पाळे-मुळे शोधण्याची. आणि ती प्रक्रिया सुरु झाली आहे. दोन धर्माचे खोटे कडबोळे आम्हाला नको आहे. ्हवा आहे तो शुद्ध धर्म. शैव धर्म.
जो मुर्तीपुजा करतो तो शैव ही सोपी व्याख्या लक्षात ठेवा. शैव-वैश्णव हा झगडाच मुळात वैदिक विष्णुला थोपण्यासाठी होता. पण वैदिक विष्णु आणि आपण मानतो तो विष्णु हे मुळात संपुर्ण वेगळे आहेत. आपला विष्णु हा सागरशयनी, लक्ष्मी समवेत आहे. तो शेषनागावर शयन करत आहे...म्हणजे त्याचाही नाग संस्क्रुतीशी निकटचा संबंध आहे. पणी लोक समुद्रमार्गाने प्रवास करत असल्याने, सुरक्षीत नौकानयनासाठी त्यांनी शिव-सद्रुश्य देवता बनवली व ती म्हणजे विष्णु होय. वैदिक विष्णु मात्र अत्यंत दुय्यम स्वरुपाची देवता आहे आणि इन्द्राला प्रसंगी मदत करण्यापलीकडे त्याला काही कार्य नाही.

शैव संस्क्रुतीचा, धर्माचा धावता आढावा या लेखात घेतला आहे. आपले शैव मुळरुप कसे हे दाखवले आहे. आपण मुळात "हिंदु" नसुन, अगदी वैदिकाभिमानी ब्राह्मणसुद्धा (कारण त्यांचाही आचारधर्म शैवच आहे.) शैवधर्मीय आहोत. परकीयांनी दिलेले नाव हटवुन आपण आपल्या मुळ परंपरेशी नाळ द्रुढ केली पाहीजे.

-संजय सोनवणी
मो. ९८६०९९१२०५

Sunday, November 14, 2010

"बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?"

"बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?" या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यातील वक्त्यांची मनोगते बोलण्याच्या क्रमाने थोडक्यात खाली दिली आहेत.

संजय सोनवणी: "जातीव्यवस्थेचे निर्माते म्हणुन आपण ब्राह्मण समाजाला, मनुस्म्रुतीला दोष देतो, पण आजही बहुजनीय जातीअंत घडवु शकले नाहीत. फुले माळी समाजाचे, शाहु मराठ्यांचे तर आंबेडकर दलितांचे अशी वाटणी झाली आहे. याचा अर्थ मनुवाद जिंकला असे खेदाने म्हणावे लागत आहे. आजच्या बहुजनीय चळवळीसुद्धा जातींत वाटल्या गेल्या आहेत आणि याच संघटना बहुजनीय चलवळीचे मारेकरी बनु लागल्या आहेत.

ब्राह्मण समाजावर खोटा इतिहास लिहिल्याचा आरोप केला जातो पण अनेक चलवळीतील विचारवंतसुद्धा धड्धडीत खोटा इतिहास सांगु लागले आहेत. मुलनिवासी व आर्य या संद्न्या अवैद्न्यानिक आणि असत्य असतांनाही तरुणांमद्धे चुकीचे मत प्रसारित करुन त्याचा उपयोग द्वेष वाढवण्यासाठी होत आहे. "प्रुथ्वी नि:ब्राहमण करा" अशा घोषणा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात मुळात कोणी ना मुलनिवासी नाही आणि कोणी आर्यही नाही हे सत्य लपवले जात आहे. ब्राह्मणी संघटनाही मुस्लिमांना कापुन काढा असे सांगतात...त्याचे गुजरातमद्धे थोडे प्रयोगही झाले आहेत...हे योग्य नाही...

ब्राह्मण समाज फक्त त्यांचेच नेते-पुर्वज मोठे करतात असाही आरोप आहे, पण बहुजनीय तरी वेगळे काय करत आहेत?

धर्माचे थोतांड दुर करणे, जातीअंत करणे व बहुजनीयांना द्न्यान-विद्न्यान-तत्वद्न्यानात अग्रणी बनवणे, त्याची हा बहुजनीय चलवळीचा मुख्य उद्देष्य होता...पण आता तो फक्त ब्राह्मण द्वेषाशी येवुन थांबला आहे...आणि ब्राह्मण परस्पर विजेते ठरले आहेत... कारण बहुजनही "नव-मनुवाद" पाळत आहेत...उभय्पक्षी दोषी आहेत. ब्राह्मणी संघटणा मुस्लिम द्वेष शिकवतात तर आपले विचरवंत ब्राह्मण द्वेष पसरवत आहेत...मग वेगळेपण काय राहिले? असेच सुरु राहिले तर बहुजनीय चळवळ संपेल. भावनिक आधारावरील द्वेष्पुर्ण चळवळी कधीही यशस्वी होवु शकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे. पण ब्राह्मणांवर टीक केली तर ते जसे "ब्राह्मण्द्वेश्टा" असा शिक्का मारुन मोकळे होतात तसेच बहुजनीय चळवळीतील उणीवा प्रामाणिकपणे दाखवल्या बहुजनीय कार्यकर्ते-नेते-विचारवंत त्त्याची "भटाळलेला", "ब्राह्मणानी दत्तक घेतलेला" अशी हेटाळणी करतात...मग संतुलीत विद्वानांनी काय समरसता मंचावर जायचे?

बहुजन महत्मा बळीचा वारसा सांगतात...त्याची आजही पुजा करतात...परंतु ती महान संस्क्रुती आता विक्रुत करत बळीला पुन्हा पाताळात गाडण्यासाठी नवे "वामन" अवतार सिद्ध झाले आहेत आणि ही चिंतेची बाब आहे...यावर प्रखर आत्मचिंतन केले जावे.

प्रा. विलास वाघ: बहुजन म्हणजे नेमके कोण याचीच अजुन नीट व्याख्या नाही. या शब्दाचा अर्थ सोयीने लावला जातो. मराठे बहुजन आहेत का? ओ.बी. ची. बहुजन आहेत का? मग अस्प्रुश्य, भटके विमुक्त नेमके कोठे मोडतात याचा विचार नाही. मुस्लीम-जैनही सोयीने बहुजन ठरवले जातात. ही लबाडी असुन दलितांवर अत्याचार करण्यात ब्राह्मणांएवढेच मराठेही जबाबदार आहेत हे खैरलाजी प्रकरणावरुन स्पष्ट दिसते. गावोगावी दलितांवर अन्याय करणारे मराठेच आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आम्ही दलितांबाबत मराठे आणि ब्राह्मणांत फरक करु शकत नाही. जातीच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी "बहुजन" हा शब्द वापरला जात आहे.

बहुजनीय चळवळ भरकटलेली आहे आणि जोवर मुख्य मुद्द्यांवर एकमत होत नाही तोवर ती यशस्वी होणार नाही.

परशुराम वाडेकर: ब्राह्मणी व्यवस्था आणि भांडवलशाहीवादी व्यवस्था या दोन्ही चळवळीच्या मारेकरी आहेत, मानवजातीच्या शत्रु आहेत. त्यांना विरोध करणे आवष्यक आहे. जातीय अहंकाराची परिणती अंतता: सर्वविनाशात होइल आणि ते योग्य नाही. माझ्यासारख्या कर्यकर्त्याला नेहमी प्रष्न पडतो कि आपण कोठे जात आहोत? नेमके ध्येय काय आहे?

शुद्धोदन आहेर: बहुजनीय चळवळीने गौतम बुद्धाच्या सम्यक तत्वद्न्यानाचा उपयोग करायला हवा. "बहुजन" हा शब्द पहिल्यांदा गौतम बुद्धाने वापरला. जातीय/वांशिक अहंकारांमुळे इतिहासात विनाशच घडलेला दिसतो. आजही आपण तीच परंपरा चालु ठेवत असु तर ते सर्वविनाशक ठरेल. जाती नश्ट करण्याऐवजी त्या अधिक धारदार होत आहेत आणि त्यातच बहुजनीय चळवळीचे अपयश दडलेले आहे यावर चिंतन करावेच लागणार आहे. त्यातुन व्यापक मानवतावादी दिशा ठरवावी लागणार आहे. द्वेषाने आंधळे झालेले समाजाचे कसलेही नेत्रुत्व करु शकत नाहीत. सद्ध्या तीन छावण्या आहेत...एक चैत्यभुमीवरची, दुसरी रेशीमबागेतली तर तिसरी बहुजनीय. या सार्यां छावण्या असंबब्द्ध आणि हिरमोड करणार्या आहेत.

प्रा. हरी नरके: जेही ब्राह्मण नाहीत, ब्राह्मण्वादी नाहीत त्या सर्वांना बहुजन समजावे. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था याचे समर्थन करणारे सारेच बहुजनीय चळवळीचे मारेकरी आहेत. जे आजही द्न्यानबंदी घालुन समाजाला मर्यादित परीघात ठेवत आहेत तेही चळवळीचे मारेकरी आहेत. पण त्याहुनही मोठे मारेकरी आहेत बहुजनीय चळवळीचे नेत्रुत्व करणारे परशुराम खेडेकर, वामन मेश्राम किंवा श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे वैचारीक मतभेद मान्य न करता, लोकशाहीची तत्वे न मानता हुकुमशाहीची सारी वैशिष्ट्ये कायम ठेवणारे लोक. मी भांडारकर संस्थेवर सरकारी प्रतीनिधी म्हणुन आहे...असे असतांनाही त्यांनी नुकताच माझ्याविरुद्ध मी, डा. आ.ह. साळुंखे यांनी राजीनामा द्यावा असा ठराव केला. एकीकडे हेच लोक अशा संस्थांवर बहुजनीय विचारवंत का नाहीत असे विचारतात. हा दुटप्पीपणा आहे. "मुलनिवासी नायक" सारखे चिंधी व्रुत्तपत्र सातत्याने "मी भटाळलो आहे" अशी टीका करत आहे. मला काहीही न विचारता माझे म्हणणे काल्पनीकपणे छापले जात आहे. खेडेकरांनी तर माझा एक लेख स्वता:च्या नावाने छापला...पण साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. यांचे इतिहास संशोधन फक्त स्वर्थापुरते, अप्रगल्भ आहे आणि लोकांना भडकावणे आणि ब्राह्मणांना शिव्या देणे एवढ्यापुरते मर्यादित आहे. मी ब्राहमणी व्यवस्थेचा विरोध करतो...करत राहील पण म्हणुन कोणी सा-या ब्राह्मणांचाच द्वेष करा असे सांगेल तर ते मला मान्य नाही. आम्ही एकाकी वाटचाल करु...ब्राह्मणी छावणीत कधी जाणार नाही...पण असे हे लोक करत राहतील, खोटे रेटुन बोलत राहतील तर मात्र चळवळ संपेल. मी गेली २५ वर्ष एवढ्या तळमळीने फुले-आंबेडकरांवर रात्रंदिवस काम करीत असता, त्यांचे सारे साहित्य संशोधन करत प्रकाशित करत असता हेच लोक, माझेच संशोधन वापरत चळवळ करत असता सोयीचे मुद्दे घेतात आणि गैरसोयीचे टाकुन देतात याचे आश्चर्य वाटते. उदा: माझ्या प्रेतावर ब्राह्मणाची सावली पडु नये असे फुलेंनी म्रुत्युमत्रात लिहिले असे हे लोक सांगतात...पण प्रत्यक्षात त्यानी लिहिलेय कि "जोही कोणी ब्राह्मण स्प्रुष्य-अस्प्रुष्यता मानतो अशा ब्राह्मणाची माझ्या प्रेतावर सावली नको" असे म्हटले आहे. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्याचे "यशवंत" असे नांव ठेवले व सारी इस्टेट त्याला दिली हे सांगितले जात नाही. भांडारकरांचे फुलेंनी त्यांच्या एका पवाड्यात मदत झाल्याबद्दल आभार मानले आहेत तर खुद्द आंबेडकरांनीही भांडारकरांबद्दल व अन्य अनेक पुरोगामी ब्राह्मणांबद्दल आदरच व्यक्त केला आहे...असे असतांनाही "सब घोडे बारा टक्के" या न्यायाने सार-याच ब्राह्मणांना टार्गेट करणे मला मान्य नाही.

Monday, November 1, 2010

दीपावली हा सण मुळचा क्रुषिवल संस्क्रुतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे.

दीपावली हा सण मुळचा क्रुषिवल संस्क्रुतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. रावण हा त्याचा बंधु होता हे तर सर्वांना माहितच आहे. म्हणजेच हा सण "असुर" संस्क्रुतीचा सण होता आणि आहे...पण कालौघात त्यावरही वैदिक कलमे झाल्याने यक्ष (कुबेरपुजन) बाजुला पडुन वैदिक लक्ष्मिपुजन सुरु झाले...आणि ते आंधळ्यासारखे स्वीकारले गेले.
यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. यक्ष पुजा ही पुरातन आहे, एवढी कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवते हे मुळचे यक्ष आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे गाव शिवेबाहेर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा.
कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा राजाधिराज...एक क्रुषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत क्रुषिवल असुर संस्क्रुतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...पण वैदिक त्याला "बलीप्रतिपदा" असे मुद्दाम म्हनतात. वामनाने बळीस पाताळात गाडुन "बली" केले असा त्याचा सांस्क्रुतीक अन्वयार्थ. मग खरे तर ती "वामनप्रतिपदा" व्हायला हवी होती...पण तसे झाले नाही...थोडक्यात शैवजनांनी आपल्या सांस्क्रुतीक श्रद्धा जपल्या पण वैदिक कथानके डोक्यात घुसवुन घेतली. बळीला, ज्याला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याची मंदिरे नाहीत. पण बळीचे तसे नाही...तो आजही क्रुषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे.
वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण क्रुषिवल असुर संस्क्रुतीचीच निर्मिती आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच.
त्यामुळे माझे आवाहन आहे कि शैवजनांनी दीपोत्सव हा यक्षरात्री म्हाणुन साजरा करावा...कुबेराचे वंदन करत पुजा करावी...लक्ष्मीची नव्हे...आणि बळीप्रतिपदेस महात्मा बळीचे स्मरण करत...त्याचे वंदन करत नववर्ष बळीक्रुपेने सुखसम्रुद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी.
खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी...

Thursday, October 28, 2010

सखी स्वस्त झाल्या खारका

सखी स्वस्त झाल्या खारका
आता तरी खाशील का...खाशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...

बघतो तनु...झालीस धनु...
इतके सुकने हे बरे गं का?
खावुन जरा या खारका
हे वाळणे दुर करशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...

सुकला असे माझा खिसा
तु सुकणे पण बरे नव्हे
मजसाठी केले दिव्य किती..
भलतेच दिव्य मज मान्य नसे
भाव उगा विचारतेस का?
सखी स्वस्त झाल्या खारका....


(konitari FB var kharakaancha vishay kaadhala mhanun he ek vidamban...)

Tuesday, October 26, 2010

बहुजन नव्हे: शैवजन म्हणा!

आज जे स्वता:ला बहुजन समजताहेत त्यांना आपली सांस्क्रुतीक आणि धार्मिक पाळेमुळे अनेकदा माहित नसतात. भारतात सर्वात प्राचीन, सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेला धर्म म्हनजे मुर्तीपुजा प्रधान शैव धर्म. नमुचि, व्रुत्र, बळी, कपिल, जनक इ. महान पुर्वजांनी या संस्क्रुतीला घडवले. भारतत इ.स.पु. २५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला धर्म म्हणजे यद्न्यिक कर्मकांड असणारा वैदिक धर्म. या धर्माला मुर्तीपुजा मान्य नव्हती. ते शिवपुजेविरुद्ध होते. त्यांचा अत्मा, पुनर्जन्म, मोक्ष आदि शैव संकल्पनांवर विश्वास नव्हता. पुरे करुन राहण्याला त्यांचा विरोध होता. पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता तर शैवजन हे क्रुषीसंस्क्रुतीचे. देश-विदेशात व्यापार करणारे.

गौतम बुद्धाच्या उदयानंतर स्थिती पालटली. गौतम बुद्धाचा धर्म म्हनजे वैदिक धर्माची पुढची अवस्था होती...आणि तो शैवविरोधी होता. त्याने यद्न्ययागांचा तिरस्कार केला नाही..फक्त त्यातील पशुहिन्सेविरुद्ध प्रचार केला. त्याची "आर्य"सत्ये जगजाहीर आहेत. तोही वैदिकांप्रमाणेच आत्मा, पुनर्जन्मादि कल्पनांवर विश्वास ठेवत नव्हता. "वेद हे उत्तमच पण काही ब्राह्मणांनी त्यांचे विक्रुतीकरण केले एवढाच त्याचा आक्षेप होता.

पण या धर्मात वैदिकही घुसले पण त्याहुनही मोठ्या प्रमाणात शैवजन घुसले. येथेच शैव धर्माचा र्हास सुरु झाला. शैव परंपरा १००० वर्षांच्या काळात जवळपास विस्म्रुतीत गेल्या. वैदिकांनी या काळात असुर संस्क्रुतीचे जेही काही श्रेश्ठ होते ते पुरते बदनाम करुन टाकले. असुर, राक्षस, नाग, पणी, इ. मानवी समुह शिविवाचक बनले. (शिवी" हा शब्दही शिवाला बदनाम करण्यासठी वापरला गेला. पुढे भारतातुन बौद्ध धर्माचा पुरता नाश झाला...आणि जे आपल्या पुरतन धर्माकडे आले खरे पण त्यांना आत यायला एकच दरवाजा उरला...तो म्हणजे "शुद्र".

आणि याच काळात वैदिकांनी परकियांनी दिलेले नाव धर्माला चिकटवुन घेतले...ते म्हणजे "हिंदु". त्यापुर्वी असे नव्हते. हा आजचा "हिंदु" धर्म म्हनजे वैदिक आणि शैव या दोन विभिन्न धर्मधारांचे एक विक्रुत कडबोळे बनला आहे. शुद्रांना वेदबंदी होती कारण सरळ आहे ते कधी वैदिकच नव्हते. पण बौद्ध धर्मात जावुन त्यांनी स्वत:च्या परंपरेला खंडित केले हेही खरे. बौद्ध धर्म चांगला कि वाइट हा प्रश्न येथे नाही. पण बौद्ध धर्म नंतरच्या काळात अध:पतीत होत गेला हे खरे. नंतर जरी ते पुन्हा शैव उद्घोष करु लागले असले तरी वैदिकांनी त्यालाही "वैष्णव" पाचर ठोकली. विष्णु हा ऋग्वेदातील अत्यंत गौण देव...पण त्याला शिवाच्या बरोबरीला आणुन ठेवले आणि शैव-वैष्णव झगडा लावुन दिला. पण पौरोहित्याचा अधिकार बव्हंशी आपल्याच हाती ठेवला. एका अर्थाने ब्राह्मणांचेही हे अर्धवट धर्मांतर होते...म्हणजे मुर्तीपुजा वैदिक धर्माला मान्य नसुनही ते मुर्तीपुजक बनलेच पण स्वत:च्या वैदिक प्रथा-परंपराही पाळत बसले. त्यातुन जी विक्रुती निर्माण झाली त्यातुन ब्राह्मण समाजही अजुन सुटला नाही. आणि धर्मात परत आल्यावर बहुजनांनी मुर्तीपुजा पुन्हा स्वीकारली असली तरी मुळ तत्वधारा, तत्वद्न्यान ...जे त्यांच्या पुर्वजांचे होते...तो मधल्या प्रदिर्घ काळात तेच विसरला आणि गुलाम बनला. थोदक्यात बौद्ध धर्माने एक पुरातन संस्क्रुतीच दुषित करुन टाकली. बरे बौद्ध धर्मही टिकुन राहीला असता तरी हे सांस्क्रुतीक अभिसरण घडले नसते.

असो. हा इतिहास आहे. शैव परंपरा जेवीत करत नेत, वैदिकांनी ज्या-ज्या दैवतांचे अपहरण केले आहे त्यांना मुक्त करणे हे खरे शैवजनांचे ध्येय असले पाहिजे. त्याचवेळीस ती सांस्क्रुती, त्यातील उदात्तता आणि वैभव पुन्हा प्राप्त केले पाहिजे. स्वत:ला बहुजन न समजता अभिमानाने "शैवजन" म्हटले पाहिजे. ( याचा नव्या शिव धर्माशी काही एक संबंध नाही)

आम्हा बहुजनांना नेमके काय हवे आहे?

ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा मुळात नवा नाही. या वादातुन फुले, आंबेडकर, शाहु महाराज यांच्या वैचारिक आणि क्रुतीशील द्रुष्टीकोनातुन अनेक क्रांतिकारी सामाजिक बदल घडले. सर्वांनीच नसले तरी ते बव्हंशी समाजाने...राज्यघटनेनीही ते मान्य केले त्यातुन बहुजनांना प्रगतीचे दरवाजे उघडले. आजवर बंद असलेली शिक्षणाची द्वारे, अगदी स्त्रीयांसाठीही, उघडली. अनेक बहुजनांनी/दलितांनी त्यातुन उंच झेपा घेत जगाला चकित केले.
पण...
आज हा वाद ज्या पद्धतीने सुरु आहे तो बहुजन आणि दलितांना कोणत्या दिशेने घेवुन चालला आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वता:ला विचारायला पाहिजे. यातुन काहीतरी सकारात्मक निर्माण व्हावे, बहुजनांची आर्थिक उन्नती व्हावी हा या वादाचा हेतु आहे कि केवळ द्वेषमुलक भावना निर्माण करणे हा हेतु आहे?
ब्राह्मण्यवादी संघटना मुस्लिमांचे शिर्कान करावे या मताच्या आहेत व तसे प्रयत्न ते करत असतात. करतही राहातील. तसेच आता काही बहुजन धरती/देश नि:ब्राह्म्ण करा असे म्हनत आहेत...उद्या तेही तसे प्रयत्न करतील...मुद्दा हा आहे कि मग ज्या ब्राह्मण्वाद्यांचा तुम्ही तिरस्कार करता त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय? त्यांची संस्क्रुती तुम्हाला (मलाही) अमान्य जर आहे तर त्यांच्याच संस्क्रुतीचे पुन्हा अनुसरन करुन तुमची स्वत:ची संस्क्रुतीच नाही हे सिद्ध करण्याचा येडचापपणा का करता?

स्वत:ची संस्क्रुती शोधणे आणि तिचे प्रामाणिक अनुसरन करणे याला आपण आपापली संस्क्रुतीनिश्ठा म्हणु शकतो. तसे प्रयत्न केले जावेत. गतकाळातील चुकांबद्दल...मग त्या कोणाच्याही असोत...धि:कार केला जावा आणि त्या चुका पुन्हा होणार नहीत यासाठी प्रयत्न करावा...यालाच आपण सामाजिकता म्हनतो. पण ज्यांचा तुम्ही द्वेश करता त्यांच्याप्रमणेच वागु लागलात आणि गरळ ओकु लागलात तर ते चुकिचे होइल. आणि त्यातुन काहीएक साध्य होणार नाही...

माझा एक कट्टर ब्राह्मण वाचक माझा मुस्लिमांच्या योगदानाबद्दलचा लेख वाचुन मला म्हणाला: सारे मुसलमान मारुन टाकले पाहिजेत. मी म्हणालो...ओ.के. मी पुढे होतो...पण एक सांगा १८ कोटी मुसलमानांना मारायचे कसे आणि सर्वांना मारुन टाकले तर गाडायचे कोठे येवढे सांगा. तो निरुतर झाला. हिटलरला सर्वसत्ताधीश असुन सारे ज्यु मारता आले नाहीत, तर आता बहुजन सर्व ब्राह्म्णांना कसे मारणार हे मला सांगा.

आणि हीच तुमची संस्क्रुती आहे का?

मला वाटते हा वाद एका मुर्खपणाच्या टोकाला नेला जात आहे. त्यामागे कोणाचे काय स्वर्थ आहेत ते त्यांचे त्यांना माहित. पण यामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही...सुटनार नाही हेही तेवढेच खरे.

बव्हंशी ब्राह्मण समाज वा नेत्रुत्व हे अडेल्तट्टु आहे. ते दादोजी हा शिवरायांचा बाप होता आणि रामदास हा गुरु होता ही पाल्हाळ अपवाद वगळता चालुच ठेवणार. त्याला प्रतिवाद कसा करावा याचाच बहुजनांत संभ्रम आहे. याला दुसरे कारण असे कि मुळात बहुजनीय विचारवंतांची (आताच्या) भाषाच भरकटलेली आहे आणि त्यामागे "संशोधन" वा शिवरायांप्रती आदर हे खरे कारण नसुन राजकारण झाले आहे. तरुणांची टालकी फिरवता येतात...ते फिरवतात...त्यात खरा रास्त संताप विरघळुन जातो याचे भान नाही.

ब्राह्मणांनी दादोजींचा पुतळा स्वता: हटवावा हे आव्हान मी जाहीरपणे केले होते. ददोजींबद्दल्ची खरी हकीकत मी फ़ेसबुकवर व ब्लोग वर मांदली होती आणि तो लेख पुण्यनगरीने प्रकाशितही केला होता. या क्षणापर्यंत त्या लेखात काही अनैतिहासिक आहे असे कोनता ब्राह्मण संशोधक सांगायला आलेला नाही. खरे तर ब्राह्मणांना काही संस्क्रुती असेल तर स्वत: पुढे येवुन तो पुतळा आजही हटवावा...पण ब्राह्म्न समाजही हटलेला आहे आणि बहुजन तो पुतळा हतवुन मुरारपंत जगदेवाचा पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवतांनाचा पुतळा बनवण्याच्या विचारात नाहित.

मग हवे काय आहे?

फक्त द्वेष...

पण हे एक उदाहरण झाले. अशी अनेक आहेत. आर्यवादाचा निकाल अजुनही कोणी लावत नाही. ब्राह्मण विचारवंत परस्परविरोधी आणि अनैतिहासिक वतवट करतात...बहुजन खालच्या पातळीवर येवुन त्याला प्रत्युत्तर देतात. पण मला वाटते ब्राह्मणांना महत्वच का देता? त्यांनी धर्म बिघडवला...जातीव्यवस्था निर्माण केली...भुतकाळात अनंत खोटी आख्याने रचुन आपल्याला भ्रमित केले...
हरकत नाही...आता तर ते सत्य आपल्याला समजले ना? ते लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, त्यंच्या मानसिकतेत बदल घडवण्याऐवजी, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेळ देण्याऐवजी ही "द्वेष मोहीम" का?
मग तरीही "मी मराठा", "मी बौद्ध" "मी ओ.बी.सी" सारख्या जातीयवादी भाषा का वापरता?

यामुळे तुम्हीही जातीयवादीच आहात हे सिद्ध होते आणि ज्या ब्राह्मणांविरुद्ध तुम्ही तथाकथित येल्गार पुकारला आहे...तेच जिन्कले आहेत असेच मला म्हणावे लागत आहे.

जर जातीव्यवस्था ब्राह्मणांची उपज आहे तर ती नष्ट करण्यातच बहुजनंचे अन्तिम ध्येय असले पाहिजे. ब्राह्मण-ब्राह्मण करत...त्यांना शिव्या देत बसल्याने जर बहुजनांचे कल्याण होणार असेल तर चला तेच करत राहु...पण तो आपलाच पराभव असणार आहे. गतकाळात त्यांनी आपल्याला नागवले ही तक्रार असेल ती तेवढापुरती ठीकही आहे...पण आता आपण स्वत:च नंगे व्य्हायला लागलो आहोत त्याची जबाबदारी फक्त आपल्यावरच राहणार आहे. स्वत:च्या नालायक्या लपवण्यासाठी ब्राह्मणी संस्था मुसलमानांना टारगेट करतात...तुम्ही ब्राह्मणांना.

स्वत:ची संस्क्रुती आधी ओळखायला शिका...एवढेच सांगणे.

Thursday, October 14, 2010

ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा

ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्ह्मण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.

"ब्राह्मण" हा एके काळी फक्त वर्ण होता. "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण" ही ऋग्वेदाची व्याख्या आहे, मग त्याचा अन्य व्यवसाय काहीही असो. उपनिषदांच्या द्रुष्टीने पाहिले तर "ज्यालाही ब्रह्माचे द्न्यान आहे तो ब्राह्मण." महाभारतात युधिष्ठीराने " ज्याच्या अंगी द्न्यान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यद्न्यकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय."

वरील व्याख्या पाहिल्या तर वरील अर्थाने "संपुर्ण ब्राह्मण" म्हनता येइल असे मुळात किती ब्राह्मण आहेत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे "ब्राह्मण" आणि "ब्राह्मण्य" हा खरे तर कळीचा मुद्द बनण्याचे काहीएक कारण नाही. परंतु जन्माधारीत जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण हे ब्राह्मणच आहेत, परंतु त्यांचे वर्ण म्हणुन आजचे स्थान काय हाही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जात म्हणुन ब्राह्मण असणे आणि वर्ण म्हणुन ब्रह्मण असने यात मुलभुत फरक आहे आणि तो फरक खुद्द ब्रह्मण समाजालाच न समजल्याने हा घोटाळा झाला आहे.

पण ज्याअर्थी तो घोटाळा झाला आहे त्या अर्थी ब्राह्मणपक्षांची काहीतरी गफलत होते आहे.

म्हणजे वैदिक वर्णाधारित अर्थानेही आम्ही उच्च...आणि जात म्हणुनही उच्च असा काहितरी ग्रह झाला आहे.
ब्राह्मण हा वर्ग परंपरेने कथीत हिंदु धर्माचा "पुरोहित" मानला आहे. पण पुरोहित फक्त ब्राह्मणच आहेत असे नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. पण जर ब्राह्मण हा धार्मिक पुरोहितच असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात विभेद मानण्याचे कारण नाही. प्रत्येक धर्मियांना परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याच्यापर्यंत आपली कर्मकांडात्मक अर्चना पोहोचवण्यासाठी पुरोहितवर्गाची गरज भासते. हा समाजानेच त्या वर्गाला दिलेला अधिकार असतो. हे जगभर झाले आहे. त्यामुळे प्रसंगपरत्वे धर्मनियम बदलणे, अखिल धर्मियांच्या धार्मिक हिताची काळजी वाहणे हे पुरोहितांचे कर्तव्य असते तर त्या बदल्यात दान, दक्षिणा, देणग्या इ मार्गाने त्यान्च्या चरितार्थाची सोय लावणे व संरक्षण देणे ही उर्वरीत समाजाची जबाबदारी असते.
पुरोहित हा समाजाच्या नैतीकतेचा आदर्श मानला जाणे स्वाभावीकच होते आणि ते तसे झालेही. मनुस्म्रुती ते मिताक्षरीपर्यंत ब्राह्मणांवर जेवढे कठोर आचार-विचारादि नैतीक बंधने आहेत ती त्यामुळेच. ब्राह्मणाने शेती करणे, व्यापार करणे, शस्त्र हाती घेणे इ. निषिद्धे आहेत. असे करणारा ब्राह्मण तात्काळ धर्मबाह्य होइल अशी स्म्रुत्योक्त तरतुद आहे.

पण जर इतिहास पाहिला तर असे दिसते की ब्राह्मणांनीच या स्म्रुती धाब्यावर बसवल्या. महाभारतात द्रोणाचार्य, क्रुपाचार्य हे ब्राह्मण असुनही शस्त्र हाती घेउन युद्ध करतांना दिसतात आणि द्रोणाचर्यांच युद्धातील म्रुत्युस कोणी "ब्रह्महत्या" म्हनत नाही...कारण त्याने वर्ण बदलला आहे. २ -या शतकात पुष्यमित्र श्रुंग हा ब्रुहद्रथ राजाची हत्या करुन सत्ताधारी बनुन हजारो बौद्धानुयायांची कत्तल करतांना दिसतो. शेती ते व्यापार यात ब्राह्मण हिरिरेने पडलेले दिसतात. "सेवा" धर्म त्याज्य असुनही ते सेवकही बनलेले दिसतात. आता तर अनेक ब्राह्मण त्यांना धर्मोक्त अति-त्याज्य अशाही सेवा-व्यवसायांत आहेत.
स्म्रुतींचा आधार घेतला तर असे सर्व ब्राह्मण आज मुळात "ब्राह्मण" म्हनवुन घेण्यास पात्र नाहीत असे स्पष्ट दिसते. केवळ जन्माधारीत ब्राहमण्य म्हणजे "ब्राह्मण" अशी सोयिस्कर भुमिका ब्राह्मण समाजाने घेतली आहे. स्वत: एकाही धर्मनियमांचे पालन करत नसता इतरांनी मात्र ते केलेच पाहिजे आणि ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे, वेदांचा, वैदिक संस्क्रुतीचा अभिमान बाळगलाच पाहीजे, वैदिक धर्माचा सन्मान अवैदिकांनीही ठेवलाच पाहिजे अशा प्रकारची भुमिका काही ्ब्राह्मण विव्द्वान घेतात त्यातुनच या वादंगाचा जन्म झाला आहे. आणि तो अभिमान बाळगावा अशी अपेक्षा ठेवित, इतर दोन वैदिक वर्णांना जवळपास धर्मबाह्य करीत त्याच परधर्माचे पुरोहित म्हणून मिरवण्याची असांस्क्रुत भुमिका दिसते. थोडक्यात वर्णाश्रमाचे स्वत: कोनतेही नियम पाळायचे नाहीत आणि वर वैदिक संस्क्रुतीचा टेंभा मिरवीत सांस्क्रुतीक वर्चस्ववाद गाजवण्याचा प्रयत्न करायचा यालाच सध्या "ब्राह्मणवाद", माझ्या मते याला वैदिकवाद म्हणतात. वैदिकवाद म्हणून त्याचा ब्राह्मण्याशी संबंध नाही, कारण वैदिक असल्याची श्रेष्टा ते मनोभावे जपत असले तरी ब्राह्मण या वैदिक संज्ञेपासून, ज्या स्म्नृतींचा ते गौरव करतात त्या स्मृत्यांपासून त्यांचे व्यावहारिक आचरण कधीच तडीपार झालेले आहे.

वर्ण नव्हे फक्त जात

ब्राह्मण हा वर्ण आहे. पण आता ब्राह्मण वर्ण हा जवळपास ५५० उपजातींत वाटली गेलेली "जात" आहे. या जातींत आपापसात संघर्ष आणि मद-मत्सर आहेत. महाराष्ट्रापुरते पहिले तरी देशस्थ, क-हाडे, कोकनस्थ असे वाद आहेतच आणि त्याचा संसर्ग त्या-त्या ब्राह्मण उपजातीन्तील विद्वानांनाही लागलेला आहे. असे असले तरी या समाजाची स्वतंत्र सामाजिक वैशिश्ट्ये आहेत. हजारो वर्ष शिक्षणक्षेत्रात (भले घोकंपट्टी का असेना) राहिले आहेत. त्या जोरावर प्रतिष्ठा-संपत्ती प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांची अशी वैशिष्ट्यपुर्ण जीवनशैली आहे. आजचा मोठा मध्यमवर्ग-उच्च-मद्धय्मवर्ग याच समाजातुन आला आहे. जेही कोणी अन्य-जातीय प्रगती साधत या मध्यमवर्गात प्रवेश करतात ते स्वाभावीकपणे ब्राह्मणांच्या जीवनशैलीचे अनुकरण करतात वा करण्याचा प्रयत्न करतात. असे जगभर घडत असते. ब्राह्मण वर्ग आज अमेरिकन जीवनशैली हळुहळु स्वीकारु लागला आहे. इतर वर्गालाही त्याची लागन झाली आहे. सोविएट रशियात अशा वर्गाला निंदाजनक अर्थाने "बुर्झ्वा" म्हटले जायचे. आता येथे त्यालाच "ब्राह्मण्यग्रस्तता" असे म्हटले जाते. किंबहुना असे म्हणणार्यांना तोच अर्थ अभिप्रेत असावा. आणि परिवर्तनाला विरोध करु पाहणार्यांचा एक वर्ग समाजात असतोच आणि तो अशा वेगळ्या जीवनशैली जतन करणार्यांची हेटालणी करत असतो.

परंतु, प्रश्न असा आहे कि ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात भेद करता येइल काय?

ब्राह्मण ही जात मानली आणि केवळ एक जात म्हणुन तिच्याकडे पहायचे ठरवले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वैदिक अर्थाने वेगळे आहे असे म्हणता येइल. जो धर्माचा पुरोहीत आहे, जो समाजाच्या पारलौकिक हिताची काळजी वाहतो त्या ब्राह्मणात ब्राह्मण्य आहे असे म्हनता येइल. किंवा जीही कोणी व्यक्ति समाजास द्न्यान देण्यासाठी कटीबद्ध आहे, वा संस्क्रुतीत मोलाची भर घालत आहे अशा व्यक्तींतही ब्राह्मण्य आहे असे म्हणता येइल. त्या अर्थाने ब्राह्मण्य हे आदरार्थीच घ्यावे लागेल. खरे तर आजचे बव्हंशी ब्राह्मण असे धर्मोक्त/वेदोक्त ब्राह्मण्य पाळत नाहीत आणि तरीही श्रेश्ठत्वाच्या व वैदिक वर्चस्वतावादाच्या भावना बाळगतात म्हणुन ते निंदेस पात्र झाले आहेत असे म्हणावे लागेल.

थोडक्यात जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत.

ब्राह्मणांनी "द्न्यान" कोंडले असा एक ब्राह्मणांवर आरोप आहे. कै. नरहर कुरुंदकर या संदर्भात म्हणतात "ब्राह्मणांनी त्यांचे द्न्यान उधळुन वाटले असते तरी समाजाला त्याचा काही एक उपयोग नव्हता कारण मुळात ते द्न्यान समाजोपयोगी नव्हते." मी त्यांच्या मताशी सहमत आहे. त्या द्न्यानाचा उपयोग अन्य समाज सोडा, खुद्द त्यांनाही (ब्राह्मणांनाही) झाला नाही अन्यथा त्यांना इतरांच्या व्यवसाय-धंद्यांत पडावे लागले नसते. त्यामुळे एक जात म्हणुन उरलेला आणी तरीही वैदिक वर्णश्रेष्ठता जपणारा असा हा ब्राह्मण समाज आज एका विलक्षण टीका-गर्तेत अडकला आहे आणि तो गुंता सोडवणे एक मोठे आव्हान आहे.

ब्राह्मणंनी पौरोहित्य हाच आपला व्यवसाय ठेवणे आताच काय गेल्या हजारो वर्षांत शक्य नव्हते. ब्राह्म्णांची ५% लोकसंख्या ग्रुहीत धरली तर दर १९ मानसांमागे १ पुरोहित अशी वाटणी होते आणि मग त्यांचा उदरनिर्वाह लागणे अशक्य होते व आहे ही वस्तुस्थीती आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी प्रसंगपरत्वे व्यवसाय बदलले असले तरी ते योग्यच आहे. त्यांनी इतिहासात वंशपरंपरेने दरोडे घालण्याचेही उद्योग केले आहेत. सेनार्तने "बुंदेलखंडातील ब्राह्मण वंशपरंपरेने दरोडेही घालण्याचा उद्योग करत असत आणि त्यांना प्रतिश्ठाही होती." असे नमुद केले आहे. थोडक्यात जीवनयापनासाठी ब्राह्मणांनी जवळपास सर्वच क्षेत्रे निवडली असे स्पष्ट दिसते आणि त्यात चुकीचे काहीएक नाही.

परंतु असे करत असतांना "ब्राह्मण" असल्याचा अहंकार, श्रेष्ठत्वाचा अहंकार त्यांना अभावानेच सोडता आला आहे असेही दिसते.

ब्राह्मण अल्पसंख्य?

आपण अल्पसंख्य आहोत असे ब्राह्मण समाजाचे एक दुखणे आहे. भारतातील जवळपास ४५०० जाती पाहिल्या आणि एकुन लोकसंख्येशी तुलना केली तर भारतातील प्रत्येक जात एकेकट्या पातळीवर अल्पसंख्य तर कधी अति-अत्यल्पसंख्य असल्याचे दिसेल. त्यामुळे आम्हीच अल्पसंख्य आहोत असे समजण्याचे ब्राह्मणांना मुळात काही कारण नाही. किंबहुना अशाच अल्पसंख्यांची एकुणातली गोळाबेरीज म्हणजे आजचा कथित हिंदु धर्म. पण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी संद्न्या लावली आणि इतर समाज विरुद्ध ब्राह्मण असे समीकरण मांडले तरच ब्राह्मण अल्प्संख्य ठरतात, पण ते वास्तव नाही. ती ब्राह्मण समाजाने स्वता: करुन घेतलेली वंचना आहे. वा त्यात त्यांचे काही राजकारण असेल. मायावतीने ब्राह्मण समाजाचा उपयोग करुन घेतला(?) हा अलीकडचाच इतिहास आहे आणि तसेच राजकारण महारष्ट्रात खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला हाही अलीकेडचाच इतिहास आहे. पुण्यात डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या पक्षाने तिकिट दिले यामागे तोच हेतु होता. येथे ते कथित सोशल इन्जिनीयरीन्ग सपशेल फसले.

पण मुळात ब्राह्मण समाज वापरला जावु शकत नाही, तो वापरला गेल्याचे दाखवुन वापरुनच घेणार हे मायावतींच्या लक्षात आलेले दिसत नाही.

असे का याचे उत्तर नजिकच्या स्वतंत्र्यपुर्व काळात ते आजवरच्या ब्राह्म्णी राजकिय ते कथित सामाजिक संघटणांच्या उद्दिश्टंत व प्रत्यक्ष कार्यात आहे. त्यांच्या कार्याचा फायदा सर्वच ब्राह्मणांना मिळाला आहे असे मात्र चित्र नाही. पण या संस्था/संघटना ब्राह्मण व पर्यायाने ब्राह्मणी (बुर्झ्वा) संस्क्रुतीचे अनुसरण करणार्यांवर प्रचार-प्रसार माध्यमांतुन वा कुज-बुज मोहिमेतुन खालील प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले आहेत...वा अनेकांना त्या प्रभावात खेचण्यासाठी जे प्रयत्न अविरत चालले आहेत ते असे...
अ. वैदिक संस्क्रुतीची श्रेश्ठता.
ब. मुस्लिम-ख्रिस्ती द्वेष.
क. प्रति-दहशतवादाचे माहात्म्य.
ड. गांधीवादाचा द्वेष.
इ. ब्राह्मण (वैदिक)निश्ठ हिंदुत्ववाद.

या सार्यात "ब्राह्मण्य" कोठेही बसत नाही हे उघड आहे. ब्राह्मण जातीचे (वर्णाचे नव्हे...वर्ण बदलता येतो...जात नव्हे...) पुरातन वर्चस्व पुन्हा अबाधित ठेवण्याचे हे कारस्थान आहे आणि त्याला ब्राह्मण्य म्हणजे नेमके काय हे न समजणारा ब्राह्मण सामाजच कारणीभुत आहे. वैदिक संस्क्रुती लयाला जावुन २००० वर्ष झाली, पण वैदिक धर्ममहत्ता कायम राहिली. गेल्या दीड पावनेदोन शतकांत तिला हादरे बसु लागले व ब्राह्मण संरक्षक कोशात गेला पण उचल खात तीचे पुनर्जीवन करण्याचा हा उद्योग आहे हेच या वैदिकवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या लक्षात येत नाही.... हिंदुंचे संघटन वैदिक नेतृत्वाखाली व त्या प्रभावाखाली व्हावे असे वाटणारे ब्राह्मण याला जबाबदार आहेत. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे, वर्ण आणि जात या दोन्हीही पुर्णतया विभिन्न बाबी आहेत हेच त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्शात असुनही वरकरणी वेगळे रुपडॆ धारण केले जाते. त्यामुळे त्यांच्या पापक्रुत्यांबद्दल अन्य जातीयाने थोडीतरी टीका केली तर त्याची रवानगी "ब्राह्मण्द्वेश्ट्यान्च्या" यादीत केली जाते.

आणि त्यामुळे अहंकार सुखव्रुद्धी होत असल्याने एकाच वेळेस वर्ण आणि जात, मग सामाजिक वर्तन कसलेही असो, दोन्ही उपभोगण्याचा हा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण तेच मुळात अवास्तव आणि अधार्मिक आणि असामाजिक आहे. प्रत्यक्षात वैदिक संहितांनीही असली कोणतीही बाब मान्यच केलेली नाही. त्यामुळे आता जे "ब्राह्मण्य" टीकेचे कारण झाले आहे ते "वर्णीय व जातीय वर्चस्वाचे" आहे...

त्यामुळे हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवादाचे (वैदिकवादाचे) पुनरुजीवन अशी व्याख्या कोणी मान्य करु शकत नाही, कारण जात म्हणुन ब्राह्मणाना समाजाने शिरावर घेण्याचे काहीएक कारण नाही...कारण तीही आता अन्य जातींप्रमाणे एक जात आहे...आणि त्यापलिकडे त्यांचे वेगळे...आस्तित्व मानण्याचेही कारण नाही. त्याची महत्ता मानण्याचे कारण नाही कारण ही जातही अन्य जातींच्या, त्यांच्या वर्णानेच नाकारलेल्या व्यवसायांत घुसलेली आहे. याबद्दल ब्ब्राह्मणांना दोष देउ नये, पण त्याचवेळी वर्णाचे जन्मसिद्ध अधिकारही हवेत हा आग्राह कसा चालेल?

परंतु प्रयत्न त्या दिशेने होत असतात हे नाकारुन कसे चालेल?. आजच्या काळातही सती प्रथेचे उदात्तीकरण केले जाते, चातुर्वर्ण्यश्रेश्ठता जपण्याचे महत्व ठसवले जाते, वेदांमद्ध्ये सारे आधुनिक द्न्यान आहे असे वेडगळ दावे केले जातात, आणि या बाबींवर जो कोणी टीका करतो त्याला सरळ ब्रह्मणद्वेश्टा ठरवुन टाकले जाते.

"ब्राह्मणवाद" हा वरील अर्थाने मान्य होवु शकत नाही. ब्राह्मणांवर होणार्या जहरी टीकेमागे मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याबाबत झालेली गफलत आहे. बाह्मण्याचा अस्त घडवुन आणत फक्त जन्माधारीत ब्राह्मण असण्याचा अहंकार बाळगत ज्याही कोणी ब्राह्मण विद्वानांनी वैदिक ब्राह्मणत्व श्रेश्ठत्वाचे डंके पिटले त्यातुन निर्माण झालेली ही अवस्था आहे.

जातीचा अभिमान ब्राह्मणांनाच आहे असे नाही तर तो प्रत्येक जातीत मुरलेला आहे असेही चित्र आपल्याला दिसेल. जाती म्हणुन ते योग्यही आहे. कारण प्रत्येक जातीने परस्परांची सेवाच केली आहे. ब्राह्मणाला मंत्र येतात, पौरोहित्य येते, तर कुम्भाराला, चांभाराला, शिंप्याला, तेल्यालाही किंवा ढोर-मातंगाला मानवी ऐहिक गरज पुर्तीची शक्ती आहे. त्या अर्थाने सर्वच जाती समान आहेत. पण त्या समान न मानण्याची कारणे वैदिक धर्मीय संकल्पनांत आहेत हे ब्राह्मणांनी लक्षात घेत पुढे यायला हवे. विषमतावादी सामाजिक तत्वज्ञान वैदिक धर्म देतो आणि तोच विषमतावादी विचार हिंदू समाजात घट्ट बसला आहे. त्यामुळे वैदिकत्व घेत श्रेष्त्वतावाद जपायचा कि ब्राह्मण ही अन्य जातींप्रमाणे एक हिंदू जात आहे असे समजत परस्पर जातीसन्मानाची भावना बाळगत, तसे वागत "सर्व जाती समान" या तत्वाप्रत येत सर्वच जातींचे एक दिवस विलयन होईल हे पहायला हवे.

मला ब्राह्मण चालेल- ब्राह्मण्य नको...हे म्हणण्यापेक्षा वैदिक वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार नको अथवा वैदिकवाद नको असे म्हणायला हवे. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात ब्राह्मण्याचे जन्मदातेही ब्राह्मण ठरतात. तेही वास्तव नाही. विषमतेची मुळे वैदिक तत्वज्ञानात आहेत. म्हणून ते तत्वज्ञान हिरीरीने प्रचारत बसण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाचा त्याग महत्वाचा ठरेल.


- संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Tuesday, October 12, 2010

राग त्यांना का?

जगामधे सध्या एक सिद्धांत चर्चीला जातो आहे आणि तो म्हनजे "थियरी ओफ़ ओदर्स". भारतात त्याचे "अभिजनांचा बहुजनांविषयीचा सिद्धांत" असे सुटसुटीत रुपांतर करता येइल. पण हा सिद्धांत येथे लागु पडत नाही कारण अभिजन म्हणजे ब्राह्मण आणि जे ब्राह्मणेतर आहेत ते म्हणजे बहुजन असा सर्वांचाच लाडका तर्क आहे आणि त्यावर आधारीत हा वाद आहे.

पण प्रथम आपण "अभिजन-बहुजन" या शब्दाची व्याख्या पाहू. "जे संस्क्रुती घडवतात, ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, तीत वेळोवेळी कालानुरुप दुरुस्त्या करतात, समाजासमोर नवनवे ध्येय/प्रेय आणि तशी उत्तुंग आदर्शे घडवतात ते अभिजन होत तर या संस्क्रुतीशी जुळते घेत त्याचे अनुसरण करतात ते बहुजन होत."

आता भारताच्या परिप्रेक्षात संस्क्रुती घडवणारे कोण होते याचा प्राचीन काळापासुन विचार करुयात.

अ. सिंधु संस्क्रुती...ही संस्क्रुती ब्राह्मण समाजाने घडवली नाही हे उघडच आहे आणि याच संस्क्रुतीची अव्याहत धारा देशात आजही वहात आहे.
ब. बळी, मौर्य, शिशुनाग, सातवाहन, वाकाटक, पुन्ड्र, पांड्य, हर्शवर्धन, अशोक, असे हजारो सम्राट जे संस्क्रुती सम्रुद्ध करत राहिले तेही ब्राह्मण नव्हते.
क. गौतम बुद्ध आणि महावीर हेही ब्राह्मण नव्हते. या उभयतांनी जगाला एक संस्क्रुती दिली.
ड. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला एक क्रांतीकारी संस्क्रुती दिली.
इ. १९व्या शतकात ब्राह्मण समाजाने शुद्र ठरवलेल्या, अगदी ब्राह्मण स्त्रीयांनाही आसरा देत, शिक्षणाचा हक्क देत रुढी-परंपरांवर लाथ मारणारे महात्मा फुले आणी सावित्रीबाइ फुले यांनी समाजाला एक नवे आत्मभान दिले.
फ. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वतंत्र्य मिळवुन तर दिलेच पण जगालाही प्रेरणा दिली. उर्मी दिली.

ही फार थोडकी उदाहरणे आहेत. यात संतांचा समावेश करा. मग लक्षात येइल कि संस्क्रुती घडवणारे कोण होते आणि त्या संस्क्रुतीचा पाठपुरावा करणारे कोण होते. ब्राह्मण समाजाने त्यांचा वैदिक धर्म सोडला कारण त्यांना पर्यायच राहीला नाही. कोणत्याही ब्राह्मणाचा इन्द्र, वरुण, मित्र इ. वैदिक देव कुळ्देवता नाही. ते आजही त्यांची पुजा करत नाहित...त्यांची मंदिरे नाहित...तथाकथित बहुजनांची दैवतेच ते भजतात, कुळदेवता मानतात...ाअणि तरीही वैदिक श्रेष्ठत्ववाद मिरवतात... त्यांना अभिजन कसे म्हणायचे? कारण ते आज तरी इतेरांची संस्क्रुती पाळत आहेत.

म्हणजे ज्या संस्क्रुतीचे निर्माते जे नाहीत ते अभिजन असु शकत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण-बहुजन असे लेबल लावुन घेवुन उगाचाच गळा काढण्यात अर्थ नाही. फार तर एवढेच म्हणता येइल कि आपल्या खर्या अर्थाने अभिजनीय असलेल्या संस्क्रुतीला आपण समजावुन घ्यायला चुकलो आहोत...आणि कारण नसतांना स्वता:ला "बहुजन" म्हणवत आहोत...हा मात्र खास अपराध आहे. ज्यांनी संस्क्रुतीच घडवली नाही, ती आधुनिकतेशी नाळ जोडत पुढे नेली नाही त्यांना अभिजन कसे म्हणायचे? आणि ज्यांनी संस्क्रुती न घदवता श्रेय घेणे एवढेच उद्दिष्ट ठरवले आहे त्यांना राग येण्याचे काही-एक कारण दिसत नाही.

Sunday, October 10, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते या भ्रमातुन महाराष्ट्राचे समाजमन ढवळुन काढनारी, संतप्त बनवनारी एक विक्रुत कहाणी जेम्स लेन या स्वता:ला इतिहासकार समजणार्या ग्रुहस्थाने प्रस्रुत केली. पण मुळात हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आलिलशामधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेन्व्हा निजामशाहीत होता. त्या काळी दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....दादोजी जरी पुढे शहाजी राजांतर्फे पुणे-सुपे प्रांताचेही कारभारी नियुक्त झाले असले तरी दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पुढे शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प सोडुन तसे प्रयत्न केले असले तरीही हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी पुढे १६५७ साली काबीज केला...
१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्याही सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.

दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते.

वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही...ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत.

शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजी आधीपासुनच आदिलशहातर्फे कोंडाना, दौन्ड आणि लातुर विभागाचा कारभारी म्हनुन काम पहातच होते. पुणे-सुपे प्रांत छोटा होता आणि त्याला फारसे महत्वही नव्हते. पुण्यावरुन मुरारपंत जगदेव या आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने गाढवाचा नांगर फिरवौन ते जवळपास नष्ट केले गेले होते. अशा स्थीतीत आदिलशहाच्या सेवेत यावे लागल्याने शहाजी महाराजांनी या प्रांतासाठी नवी नेमनुक करण्यापेक्षा त्याच विभागातील, आदिलशहाच्या विश्वासातील आणि अनुभवी प्रशासक मानसाला नेमणे स्वाभाविकच होते. एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे.

पण शिवापुर आमराइतील आंबा तोडला आणि त्याचा पश्चाताप होवुन त्यांनी शिवाजी महाराजांना हात तोडायची विनंती केली आणि ती शिवरायांनी मानली नाही म्हणुन त्यांनी अर्धा हात कापलेली बाराबंदी घालायला सुरुवात केली ही भाकडकथा इतिहासकारांना (?) (बाबासाहेब पुरंदरे यांना) निर्माण करावी लागली यावरुन या तथाकथित इतिहासकारांना द्न्यातीबांधवाचे काही पाप लपवायचे होते हे स्पष्ट होते.

येथे आपण तत्कालीन घडामोडी पाहुयात.

१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे तेंव्हा निजामशाहीत होते तर दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते.

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत बगलोर येथे घेवुन गेले. म्हणजेच १६३६ पर्यंत दादोजी आणि भोसले परिवाराचा काडीएवढाही संबंध नव्हता.

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे (सिंहगड) सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या ब्राहमण नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच ब्राह्मण कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी आपल्या पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे...


आता दादोजींचा हात का तोडला गेला आणि त्यांना वीष घेवुन आत्महत्या का करावी लागली याबद्दल:

सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.

यावरुन माझ्यासमोर आलेली ही हकिकत जी ऐतिहासिक निवाड्यांवरुन सिद्ध होते, हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. तसाच ते शहाजीराजांचा महसुल हडपत नसतील असे नाही. ही घटना १६४५ ची आहे. दादोजींनी वीषप्रयोग करुन एका स्व-बांधवाची हत्या केली आहे. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळाली असनारच आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे (कारण ब्रह्महत्या हे महापापात गणले जात होते...म्हणुन) आणि तदनंतर स्वत:च वीष घेवुन आत्महत्या करणे.

थोडक्यात दादोजी कोंड्देव हे कोनत्याही समाजाला आदर्श वाटावेत असे व्यक्तिमत्व दिसत नाही. ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. ते शहाजी राजांचे आपत्कालीन परिस्थितीत नेमले गेलेले कारभारी होते. ते एकाच वेळेस आदिलशहा आणि शहाजीराजांचे सेवक होते, ही दुहेरी निश्ठा कोणत्याही स्वाभिमानी माणसाला शोभणारी नव्हे. १६३६ पुर्वी शहाजीराजे आणि दादोजींची मैत्री असण्याचेही पुरावे नाहीत आणि तशी शक्यताही नाही. पुणे सर्वप्रथम (१६३०) मुरारपंत जोगदेवाने उद्द्वस्त केले त्याला जवळच सुभेदारी करणार्या दादोजींनी कसलाही विरोध केलेला दिसत नाही. त्याच उद्ध्वस्त गावात सोण्याचा नांगर चालवल्याचे श्रेय त्यांना देता येत नाही. त्यांनी एका ब्राह्मणाचाच खुन केला आहे असे इतिहासावरुन दिसते. हा खुन त्यांनी आपला भ्रष्ट आचार लपवण्यासाठी केला आणि त्याची शिक्षा त्यांना त्यांचे हुजुर आदिलशहाने दिली आणि त्याचीच परिणती त्यांच्या आत्महत्येत झाली असे एकुन घटनाक्रमावरुन दिसते. ते शिवरायांचे प्रेरकही नव्हते कारण ते सतत शहाजी राजांकडे शिवरायांच्या स्वरज्य प्रयत्नांबद्द्ल कागाळ्या करत असत. सिवरायांनी १६४६ साली तोरणा जिंकला...पण हयातीत कोंडाना किल्ला त्यांनी शिवरायांच्या हवाली केला नाही कारण ते आदिलशहाचेही निष्ठावंत सेवक होते. ते शिवरायांचे गुरु असु शकत नाहीत...नव्हते हेही पुराव्यांवरुनच सिद्ध होते.

अशा स्थितीत त्यांचे कोड आजही कोणी पुरवायचे हा ज्याचा त्याचा आणि ज्याच्या त्याच्या नैतिक जाणीवेंचा प्रश्न आहे. ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही हा जातीय अहंकार आता चालणार नाही. पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही.

Sunday, June 27, 2010

Mystery of Lord Vitthala solved!

But the fact remains that "Paundrank Vitthala" (who later became famous as "Pandurang Vitthala") was a historical figure belonging to the Pundra clan, which was declared by Vedics as Shudra and non-Vedik since ancient times. It is ironic that the same Vedics have become chief priests of Lord Vitthala…!

Lord Vitthala of Pandharpur has always been an enigma to scholars. The worship of Lord Vitthala dates back to a minimum of 11th century AD. It is believed that it is even more antique. The saints like Namdeo, Dnyaneshwar, and Tukaram believe that the idol of Lord Vitthala is as ancient as the universe is. The devotees of Lord Vitthala have been worshipping him as a manifestation of Lord Vishnu or Krishna. The Varkari (Devotees of Lord Vitthala) call themselves Vaishnava’s, the cult of Vishnu. Still, Lord Vitthala is an enigma because of the following reasons:

a. Lord Vitthala’s name is nowhere to be found in the list of Vishnu’s 1000 names or in his 24 reincarnations and the saints and devotees had and has this knowledge still he is called as “Vishnu who appeared on the banks of Chandrabhaga river, naked, stood arms akimbo.”. Same time Saints believe He is Krishna, in a pastoral attire, came to Pandharpur for the great devotee “Pundarik”, who was eternally busy in service of his parents. Also, there is another story told about the appearance of Krishna at Pandharpur. The story goes like this: As Rukmini, consort of Krishna saw Radha, a mythical lover of Krishna, sitting on his lap, she got angered. In a rage, she left Mathura and came in recluse at Pandharpur. To please her, Krishna, along with his pastoral mates came to Gopalpura, a village near Pandharpur, and in pastoral attire went alone to meet Rukmini. Another explanation of Krishna’s visit and his eternal abode at Pandharpur is told that Krishna visited Pandharpura to seduce a beautiful Princess named the Padma. All these stories appear to be concocted as there is no consistency in them. The real form of Vitthala remains a mystery.

b. Many scholars like Dr. Manikrao Dhanpalwar have tried to prove that this sacred place was originally Shaivait before it was converted to a Vaishnav shrine. This is because the actual temple of Devotee Pundarik is a Shiva temple. It is the belief of devotees that on the head of Lord Vitthala is Shiva linga. Many saints like even Dnyanehwar recognize Lord Vitthala as Shiva as well as Vishnu.

c. According to Dr. R.C.Dhere, Vitthala originally was a minor God of pastoral communities, named as Ital, who rose high as supreme God as his character was elevated in a Vaishnav form by the Sthalapurana’s (Local mythological scripts) According to him He was first elevated as Shaivait and in a later course, He was related with Vishnu and Krishna to adorn him a Vaishnav character.


Without going into much detail about various opinions of the scholars and imaginative forms that were seen by Saints in the intoxication of their devotion we can deduce that Lord Vitthala is the only God in Maharashtra whose origin cannot be traced in any mythological texts. There is no explanation for the word “Vitthala”. No origin of this word is found as yet. Some scholars have tried to prove that Vitthala is a local form of the Sanskrit word “Vishnu.” Some have tried to connect his name to the Kannada language word “Bittiga” or “Bittarasa.” But these explanations are lame as in Karnataka and even in Tamilnadu, there are temples those are called only aa Vitthala (or Vitthaleshvar) only, and not Bittiga.

The facts about present Pandharpura are as follows:

a. Pandharpura was known as Pundrik Kshetra since ancient times.
b. The city name Pandharpur is a corrupt form of the original Pundrikpur.
c. The mausoleum of Devotee Pundarik is in fact a Shiva temple, which can be still seen clearly. The temple was famous as “Pundrikeshwar” in the ancient past which is clearly stated in Pudma and Skanda Purana. Pundrikeshwar means “Lord of Pundrik or Pundariks”
d. The idols of so-called Krishna’s consorts are located at different temples. In fact, they have no relation with Lord Vitthal.


Looking at the above, instead of searching for Vitthal, I thought it better to find a historical link or lineage of Pundarik. This was so as the city is named after Pundarik, the Vitthala’s main and popular epithet is Panduranga which is clearly a corrupt form of Paundranka and the Shiva temple is called “Pundrikeshwar”

In Shaivait’s it is a practice that Lord Shiva is named either after a great devotee or society or builder of the temple. Lord of Asur Mahabal in Mahabaleshwar. Lord of Poona is Puneyshwar. The similar way “Pundrikeshwar” means lord of Pundrik.

The historians were busy finding historical Pundarik. There are various individuals named "Pundarik" in Hindu mythologies, but they could relate no one with Devotee Pundarik of Pandharpur.

Also, it is clear that there never was a devotee named Pundarik in any era for whom Lord Krishna appeared at Pandharpur. Historians completely agree with this fact. Also, they cannot explain why Krishna’s name was changed to Vitthala (as it would be impossible) and by which process, and why it could be so when Krishna is Krishna everywhere in India.

The Historians were misled because they didn’t see what was just standing before them. Or they didn’t want to see it for the reasons best known to them.

However, we can safely assume now that the place Pandharpur was historically known as Pundrikpur. (Kannada form "Pandarage" is clearly corrupted from the Kannad expression "Pudarike")The area was known as Pundrika Kshetra (region). Vitthala’s main epithet is "Paundrank"… for the sake of simplicity was converted to "Pandurang". This threefold labyrinth makes the whole thing clear.

HISTORICAL PUNDRA’S

Among many societies in ancient India were Pundras. The first reference to Pundra can be traced in Aitereya Brahmin, a sacred text explaining Rig Veda. There is a story of sage Vishwamitra. King Harishandra of his time had no child. He worshipped Lord Asura Varuna and begot a boon and in turn, he promised Varuna that he will sacrifice his son to him. He had a son, named Rohit. As his son, Rohit became younger, Harichandra started postponing Rohit's sacrifice for his love for Rohit. On this Varuna got angry and punished Harischandra with severe pains in the stomach. When Rohit came to know the reason, Rohit went to the sage Ajeegarta and bought his son Shunahshep as an alternate sacrifice. When Vishwamitra saw Shunahshep bound to the sacrificial pillar in a pitiable condition, Vishwamitra took mercy upon him and freed him. He named him as Devrata and asked his 101 sons to treat and respect him as their elder brother. The elder 50 sons denied accepting Devrata as their elder brother. On this Vishwamitra got enraged and cursed his fifty sons that “They shall become shudra and shall seek the shelter of Pundra’s, Aundra’s, Shabar and Mutibs, the shudra kings of southern India. In an alternative version, it is stated that his son went to the south and formed Pundra, Aundra, and other dynasties.

Another reference to Pundra we can find in Ramayana, in which, Bhargava Rama had subjugated Pundra.

In Jain Ramayana, the story goes like this. When Rama deserted Seeta, she was taken to the shelter by Pundrik king of Pundrapur, where Seeta delivered Luv & Kush.

Another ancient story tells us that Aundra’s and Pundra along with other clans belonged to the Lord of Asura, King Bali.

In Mahabharata, there are several stories related to Pundra. The kingdom of Pundra was located in the Northern part of Bengal and was powerful. They were allies of Emperor Jarasangha, an Asura King, to whom Krishna got crookedly killed at the hands of Bheema.

That time there ruled a king who called himself “Purushottama” and was said to be copied the attire of Krishna. People of his kingdom would call him “ Paundrank Vassudeo”. He opposed Krishna’s claim that He was an incarnation of Lord Vishnu. In later times, in a battle, Paundrank Vasudeo was killed at the hands of Krishna.

In the Mahabharat battle, Pundras were united to fight against Pandavas. After that annihilating war, many Pundras migrated toward the south and formed their kingdoms. Mahabharata too calls them Shudra’s, non-Vedik’s. Originally Pundra, Aundra, Vanga, Shabar, and Kalinga were sons of Great Asur King Bali, who is still worshipped throughout India. This does mean that the Pundra clan originated from Asur Bali. No wonder Pundra's were despised by the Vedik Brahmins.

Aundra established their kingdom in Odisha and Andhra. The nouns Odisha and Andhra are the later transformations of the original Aundra. Pundras were closely related to them. Pundras first capital was Pundranagara in the Pundrikvardhan kingdom, in North Bengal. At Mahasthangarh ruins of that ancient city have been found. Several branches of Pundra’s migrated to the south.

There are at least three known Pundrikpur’s in the south. Pandharpur (Originally Pundrikpur or Pundrapur) could be first settlement/kingdom of Pundra in south India, as this is a bordering city of Karnataka and is in Maharashtra. The ancient name of the city of Tiruvarur and Chidambaram too was known as Pundrikpur and they too are famous Shaivait pilgrimages. This does prove that the Pundras ruled some parts of the south as well along with their alleys Aundra. Satvahana’s, the first known dynasty of Maharashtra, that ruled from 2nd century BC till 3rd century AD belonged to the Aundra (Andhra) clan. Aundra’s too were Shiva worshippers and this fact is evident from the fact that Andhra Pradesh and even Maharashtra are crowded with ancient Shiva shrines.

It can be safely deduced that Pundra’s first settlement was at Pundrikpur (Pundrapur) alias Pandharpur. Pundras too were Shaivik, like most of Asura’s in mythological India. They established a temple and lingam of Shiva which naturally was called “Pundrikeshwara” (Lord of Pundrika’s.)

Hence it is clear that there was never existed an individual Brahmin devotee called Pundarik for whom Krishna or Vishnu rushed to this place. This is not at all a historical figure. In fact, Pundrika was an independent society, that worshipped Lord Shiva, and thus erected the Shiva temple calling it “Pundrikeshwar”, Lord of Pundras.

Now it will become clear, who Lord Vitthala is.

The main epithet of Vitthala is Pandurang. To date, the meaning of Pandurang was taken verbatim…Fair/white complexioned. Also, it was another name for Lord Shiva too. This baffled scholars as if Vitthala is a manifestation of Krishna, who is black in color and so Vishnu too is and as Vitthala is called as black, how come that he is called Pandurang (fair-complexioned) from ancient times? In fact, the old Puranik texts are known as “Pandurang Mahatmya” (Glory of Pandurang), not as Vitthal Mahatmya!

But now we know that the root of the noun Pandurang lay elsewhere. We now know that Pundra people referred to themselves as “Paundrank” (Pundra people) at least from Epical times. This solves the mystery of why Vitthal is called Pandurang (Root “Paundrank”). This only means that Vitthal himself was from the Pundra clan, a great devotee, and most probably the founder of Pundrikpur. Vitthal was his name; hence there is no need to find its origin elsewhere. Paundrank Vitthal remained Pandurang Vitthal throughout. The Vitthal idol must have been laid by his successors in his memories. There was a custom among Aundra Satvahana’s as well as in many other dynasties to have erected idols of their predecessor kings. Hence there is no wonder why the idol of Paundrank Vitthal was erected near the Pundrikeshwar Shiva temple.

It is told by the scholars that the first temple around the Vitthal idol was built during the 12th century when the Yadava dynasty ruled Maharashtra from Devgiri. Till then the idol stood in the wilderness of nature. Vitthal till then was a secondary God at Pandharpur. The main worshipping place still was famous as Pundrik kshetra or Pundrikeshwar.

How the idol of Pandrank king Vitthala could have been elevated as a manifestation of Vishnu or Krishna is another story. We should keep in mind that the Yadava dynasty related their bloodline to Lord Krishna. Pundras too were noted herdsmen from ancient times. The ancient enmity between Pundra’s and Yadava’s must have been forgotten by then or it was a distant, vague memory. The idol of Vitthala was and is dark black, head attire of a herdsman, and though not exactly the same but partially similar attributes of Krishna and Vishnu, such as conch and flower, in Vitthala’s hands, making it suitable to correlate Vitthala with Krishna and the same time with Vishnu. It suited the purpose of Yadava kings as the sanctity of the place was already known and was a pilgrimage. In all probability, to get huge donations from Yadava kings, the Brahmin community created a mythical God from a historical persona. They composed verses creating various stories to elevate Vitthala as a Vaishnav God. Yadava kings helped build the first temple. Later on, many southern kings donated villages as well as money to this temple. We can see that from known history and many inscriptions found at Pandharpur.

It is fact that in 12th-century memories of Pundra itself had become distant as they were seized to be rulers and had degraded to a pastoral, fishermen, and other shudra community. Still, they maintained their right to Puja of Pundrikeshwar. This fact is evident that till this date Mahadev Koli (Fishermen) community has the right to perform sacred rituals at Pundrikeshwar temple though Vitthala has been kidnapped by Vedics for the last 8 centuries.

Gradually by the 13th century, people started accepting a Vaishnav form of Vitthala. The Saints like Namdeo, Dnyaneshwar to Tukaram wove their life around Vitthala and saw in Vitthala a brother, father, friend, and a compassionate Lord who could bless them with ultimate salvation. Thus the cult of Vitthala spread so much so that He has become the main god in the pantheon of Hindu gods in Maharashtra.

But the fact remains that "Paundrank Vitthala" was a historical figure belonging to the Pundra clan, who was declared by Vedics as Shudra and non-Vedik in ancient history. It is ironic that the same Vedics have become chief priests of Lord Vitthala…!

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...