Sunday, November 29, 2015

मासिक धर्म...आणि धर्म!

वैदिक धर्मिय हे हिंदू धर्माचे ठेकेदार नाहीत. पण त्यांच्या धर्मातील अपप्रवृत्ती हिंदुंमध्ये पसरवत त्यांनी हिंदू धर्माचा मुळ गाभाच भ्रष्ट करण्याचा चंग बांधला आहे. याला थांबवत हिंदू धर्माच्या समताप्रधान, स्त्री-पुरुषच काय पण मासा-माणसांत भेद न मानणा-या मुळ धर्म गाभ्याकडे सर्व हिंदुंना वळावे लागेल. हिंदू मंदिरांत बंदी करायचीच झाली तर या भ्रष्ट वैदिकांवर घालावी लागेल!


शबरीमला या दक्षीणेतील विख्यात मंदिर सध्या चर्चेत आले आहे ते, "जोवर स्त्रीयाना त्या मासिक पाळीत आहेत कि नाही हे तपासण्याचे स्क्यनर बनत नाहीत तोवर मंदिरात स्त्रीयांना प्रवेश नाही." या वादग्रस्त विधानामुळे. हे विधान केले मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमूख प्रयार गोपालकृष्णन यांनी. ते पुढे असेही म्हणाले कि मासिक धर्म स्त्रीयांना अपवित्र करतो आणि पवित्र मंदिरांत त्यांना प्रवेश देता येणार नाही. यामुळे वादंग उठले असून निकिता आझाद या विस वर्षीय तरुणीने ""Happy to bleed" हे आंदोलन सुरू केले असून आजवर असंख्य स्त्रीयांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. स्त्रीयांचा मासिक धर्म हे वरकरणी कारण असून अय्यप्पा ब्रह्मचारी होते आणि शबरीमला येथे त्यांनी तप केले असल्याने स्त्रीदर्शनाने त्यांचा तपस्याभंग होऊ नये म्हणून (मेनकेने विश्वामित्राचा केला तसा) तेथे स्त्रीयांना प्रवेश नाही. यावर आपण अधिक चर्चा पुढे करुच, पण स्त्रीयांचा मासिक धर्म आणि त्यामुळे प्रार्थनास्थळ प्रवेशबंदी कोठे कोठे आहे हे पाहू.

Image result for menstruation ancient sculptures


भारतात सबरीमला, हाजी अली, जामा मशिद, पद्मनाभय्य मंदिर, पुष्कर येथील कार्तिकेय मंदिर, निजामुद्दिन दर्गा इत्यादि धर्मस्थळांत स्त्री प्रवेश बंदी आहे. अलीगढ विद्यापीठाच्या ग्रंथालयातही विद्यार्थिनींना बंदी आहे, पण त्याचे कारण मनोरंजक आहे. मुली ग्रंथालयात आल्या कि विद्यार्थी अभ्यासात लक्ष घालणार नाहीत म्हणून बंदी...हा असला विनोदी प्रकार आहे. मुस्लिम बंदी घालणारे म्हणतात कि शरियातच ही तरतूद आहे तर हिंदू म्हणतात...धर्मशास्त्रांतच हे लिहिलेले आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंद्या भारतात अनेक धर्मस्थळांत अंमलात आणल्या जातात हे आपणास माहितच आहे.

मासिक धर्मामुळे स्त्री अपवित्र होते अशी समजूत यामागे आहे हे उघड दिसते. वरकरणी कारणे काहीही सांगितलेली असोत. यातून आपण स्त्रीयांचाचा अधिक्षेप करतो, धर्माच्या नांवाखाली निसर्ग-धर्माला पायतळी तुडवतो याचे भान मात्र आपल्याला आलेले नाही. यासाठी आपल्याला पुरातन काळापासून स्त्री, तिची मासिक पाळी आणि तिचा अपत्यजन्म देवून मानवी वंश साखळी अबाधित ठेवण्याच्या सामर्थ्याबाबत कसकसे विचार बदलत गेले हे पाहणेही उद्बोधक तसेच मनोरंजकही आहे.

मनुष्य जेंव्हा नुकताच कोठे भुतलावर अवतरला होता व निसर्ग व अन्य पशुंच्या प्रकोपात कसाबसा जगायचा प्रयत्न करत होता त्या काळात स्त्रीयांकडे तो कोणत्या दृष्टीने पाहत होता?

तिचा मासिक धर्म, तिने अपत्ये प्रसवणे ही बाब त्या काळातील मानवासाठी अद्भूत चमत्काराहून कमी नव्हती. महिन्यातील काही दिवस स्त्रीया रज:स्त्राव करतात आणि पुर्ववत होतात किंवा गरोदर होऊन अपत्य प्रसवतात या तिच्या शक्तीला आदिमानवाने देवत्व दिले. जगभरात आधी सुरू झाली ती स्त्रीपुजा. योनीपुजा. हिंदू धर्माची सुरुवातच मुळात सृजनशक्तीच्या योनीपुजेतून झाली. तिच्यात यातुशक्ती असाव्यात व ती आपल्याला जशी उपकारक अहे तशीच अपायकारकही असू शकते यामुळे स्त्री हे त्याच्यादृष्टीने गुढ-भयाचा सम्मिश्र विषय बनला. त्याला तोवर अपत्य जन्मात आपलाही सहभाग असतो हे माहितच नव्हते. चंद्रकला आणि नियमित येणारा मासिक धर्म यामुळे त्यांनी अपत्य जन्माचा संबंध चंद्राशी लावला. आपण आता चंद्र हा स्त्रीचा भाऊ आहे असे मानतो, पण पुरातन समाज हा चंद्र अपत्यला जन्म घालतो (म्हणजे तिचा पती) असा लावला गेला. भारतातील "चंद्रवंश" ही समजूत त्यातुनच निघाली.

उत्खनने आणि पुरातन गुहाचित्रातून ५०-६० हजार वर्षापुर्वीच्या माणसाचे लिखित नसले तरी समजुतींचे वस्तु-चित्ररूप दर्शन घडवते. सिंधू संस्कृतीत मातृदेवतांचे व तिच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. स्त्रीयोनीतून निघालेल्या पिंपळाचे चित्रण स्त्रीच्या प्रसवक्षमतेचे कसे उदात्तीकरण होते हेही दर्शवते.  भारतात संभोगोत्सूक स्वरुपाची, शिर्षाच्या जागी कमळे असलेली पण ठळक योनी व स्तन दाखवणा-य मृण्मुद्रा आणि पाषाण शिल्पे विपूल प्रमानात तर आहेतच पण गांवदेवीच्या स्वरुपात जवळपास सर्व खेड्यांत स्त्रीमहत्तेचे अस्तित्व सापडते. किंबहुना मातृसत्ता आरंभीच्या काळत जगभरात पाळली जात होती असे पुरावे मिळतात. पुरातन काळात स्त्रीया पुरुषी कार्यात भाग घेतही असल्या तरी तो सीमित होता. किंबहुना तो सीमित ठेवला गेला तो या तिच्याकडे पाहण्याच्य गुढमिश्रीत श्रद्धाभावामुळे. बहुप्रसवा स्त्री ही टोळीचे वैभव मानली जात होती, कारण टोळीची लोकसंख्या त्यामुळेच वृद्धींगत होऊन टोळीसामर्थ्यही त्यामुळे वाढेल ही  भावना त्यामागे असणे स्वाभाविक आहे.

समाजेतिहास तज्ञ म्हणतात कि शेतीचा शोध स्त्रीने लावला. त्यात तथ्य आहे कारण तिला निरिक्षण करत फेकलेल्या बिया कशा उगवतात हे पाहण्याची अधिक संभावना होती. आधी सुरू झली ती फिरती शेती. नंतर मानूस जलाशय-नद्या-ओढे यांच्या काठी स्थिर शेती करू लागला. आधी स्त्री ही टोळेचे मालमत्ता असे. शेतीच्य शोधाने मालकीहक्क व वंशसातत्याची कल्पना आली. किबहुना स्त्री-स्वातंत्र्य लयाला घालवणारी ही घट्ना होती.

आपण शेतीत बीज पेरतो तेंव्हा पीक होते हे ज्ञान आपलाही अपत्यजन्मात सहभाग आहे कारण आपण आपले बीज योनीत पेरतो हे ज्ञान माणसाला झाले. वारसाहक्काच्या कल्पनेतून मग माणसाने विवाहसंस्थेला जन्म घातला. ही व्यवस्था सैल होती. बहुपतीकत्व जसे लागू होते तसे बहुपत्नीत्वही आरंभी लागू होते. महाभारतात आपण नियोग प्रथा, बहुपतीकत्वाचे अवशेष द्रौपदीच्या रुपात पाहू शकतो.

भारतात वैदिक धर्म उशीरा आला. तत्पुर्वीच हजारो वर्ष योनीपूजा भारतात प्रस्थापित झालेली होती. ऋतूस्त्राव तंत्रसाधनेतील महत्वपुर्ण भाग होता. त्याला अपवित्र मानण्याचा प्रश्नच नव्हता. पण पुरुषप्रधान वैदिकांनी स्त्रीयांना गौण लेखायला सुरुवात केली. वैदिक धर्म येण्यापुर्वी सिंधुपुर्व काळापासून भारतात ,लिंग आणि योनीपुजा सुरू होती याचे अवशेष आपल्याला प्राप्त आहेत. पुढे स्त्री-पुरुष यांत एकात्मता प्रस्थापित करत लिंग आणि योनी संयुक्त स्वरुपात शिवलिंग या प्रतीक रुपाने सुरु झाली. या धर्मात स्त्रीमाहात्म्य व समता याचा परिपाक या प्रतीकातून दिसतो. हिंदुंतील शैव-शाक्त संप्रदायांनीही शक्ती (स्त्री) तत्वालाच जगन्माता मानत तिची आराधना प्राधान्याने केली. तंत्रांची निर्मिती शिवाने केली अशी श्रद्धा आहे. प्रस्तूत लेखाच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे यात रज:स्वलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रज:स्त्रावाचा उपयोग यात्वात्मक क्रिया साधण्यासाठी केला जात असे. स्त्री रजोकालात अपवित्र नव्हे तर पवित्र व साधनेचे साधन मानली जात होती.

पुरातन काळी स्त्रीला किती महत्व होते हे आपण हिंदुंच्या अवशिष्ट राहिलेल्या परंपरांतून पाहू शकतो. शक्ती (स्त्री) ही पृथ्वी व अवकाश हे शिव तर पर्जन्य म्हणजे त्याचे वीर्य. या संगमातून पृत्वी सुफला होते अशी भावना होती. मानवी जीवनाचे आरोपण सृष्टीवर करणे हा मानवी स्वभाव आहे. सूर्य मृग नक्षत्रात गेल्यानंतरचे पहिले तीन दिवस हा पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ मानला जातो. या काळात नांगरणे, बी पेरणे वर्ज्य मानले जाते. चवथ्या दिवशी दगडांना स्नान घालून पृथ्वी सुफलनासाठी योग्य झाली असे मानले जाते.  अंबुवाची नांवाने हा उत्सव बंगाल, आसाम येथे व्यापक प्रमाणात तर अन्यत्र तुरळक प्रमाणात आजही साजरा होतो. आसाममद्ध्ये कामाख्या मंदिरातही हा देवीचा रजोदर्शन उत्सव साजरा होतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद असते. चवथ्या दिवशी देवीला स्नान घालण्यात येते व भक्तांना लाल कपड्याचे तुकडे  देवीच्या रजोदर्शनाचे प्रतीक म्हणून वाटले जातात. शबरीमलाच्या निषिद्धांच्या विपरित, खुद्द केरळमद्ध्येही पार्वती देवीच्या मंदिरात (चेंगान्नूर) पार्वतीच्या मासिक धर्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

याचा एक अर्थ असा कि रजोदर्शन हे काहीतरी अपवित्र आहे अशी भावना मुळात नव्हती. किंबुहना सुफलनतेत रजोदर्शन हे अटळ आहे, अपरिहार्य आहे आणि मानवाला वंशसातत्यासाठी आवश्यकच आहे अशी भावना होती असे दिसते. तीन दिवस स्त्रीला कामांपासून विश्रांती मिळावी म्हणू दूर बसणे हा तत्कालीन स्थितीत सुचलेला पर्याय सोडला तर स्त्री या काळात अस्पर्शीही होती असा आभसही मिळत नाही. उलट भारतातील ५२ शक्तीपीठे (सतीचे एकेक अवयव जेथे जेथे गळून पडले त्या स्थानांवर उभारलेली मंदिरे)  स्त्री हे नरकाचे द्वार आहे, पापयोनी आहेत अशी वैदिक धर्मशास्त्रांनी निर्माण केलेली निषिद्धे हिंदू पाळत नव्हते असे दिसते.

वैदिक धर्मातही आरंभकाळी स्त्रीकडे पहायचा दृष्टीकोण व्यापक व उदारच होता असे ऋग्वेदावरुनच दिसते. अनेक स्त्रीयांनी सुक्ते रचलेली आहेत. ऋग्वेदातील १.७९ हे सूक्त लोपामुद्रेने लिहिलेले असून ती तत्ववेत्ती होती हे स्पष्ट दिसते. वैदिक स्त्रीयांना उपनयनाचा, वेदांचा व यज्ञकर्मात भाग घेण्याचाही अधिकार होता. ऋग्वेदात कोठेही ऋतुमती स्त्री अपवित्र असते वगैरे उल्लेख नाही. अगदी मनुस्मृतीतही मासिक धर्मकाळात पुरुषाने स्त्रीशी संभोग करू नये याव्यतिरिक्त अशुचीबाबत कसलेही विधान केलेले नाही. परंतू तैत्तिरिय संहितेत नंतर काही भाग घुसवत एक मिथक निर्माण करण्यात आले. ते असे:

इंद्राने त्वष्ट्याचा पुत्र असलेल्या विश्वरुपाची तीन मस्तके उडवून ब्रह्महत्या केली. याबाबत निंदा होऊ लागल्यावर इंद्राने आपले १/३ पाप पृथ्वी व झाडंना दिले व उरलेले पाप स्विकारण्याची  त्याने स्त्रीयांच्या एका समुहला विनंती केली. त्यावर स्त्रीयांनी वर मागितला. रजोदर्शनाचा काळ संपल्यावर आम्हाला अपत्यप्राप्ती होऊ दे! मग इंद्राच्या पापाने रज:स्वला स्त्रीचे रुप घेतले. म्हणून रजस्वला स्त्रीबरोबर संभाषण करू नये, तिच्याजवळ बसू नये, तिच्या हातचे अन्न खाऊ नये कारण ती इंद्राच्या पापाचा रंग असलेले रक्त टाकत असते.

आता ही भाकडकथा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. अशा लबाड्या करण्यात वैदिकांचा कोणी हात धरणार नाही. इंद्राने आपले पाप त्यांना देईपर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती का? त्यांना रजोदर्शन होतच नव्हते का? आणि हे झाले एका स्त्री समुहाबाबत...अन्य स्त्रीयांचे काय? रजोदर्शन अमंगळ आहे हे सांगण्यासाठी कोणी मुढाने ही कथा बनवली आहे हे उघड आहे.

रजोदर्शनापुर्वी मुलीचे लग्न करावे असे मनु सांगतो. पण अन्य स्मृती त्याच्याही पुढे जातात आणि रज:स्वलेने तीन दिवस कसे वागावे याबाबत अगदी बारीक-सारीक नियम घालतात. तिने स्नान करु नये, केस विंचरू नये, दात घासू नयेत, तिन्ही दिवस हातात घेऊन अन्न खावे, कोणाला, अगदी रज:स्वलेने रज:स्वलेलाही स्पर्श करू नये, एकवस्त्रा असावे वगैरे. यातील एक जरी नियम जरी वैदिक स्त्रीने  मोडला तर तिला होणारा पुत्र चोर, रोगी, नपुंसक, वेडा वगैरे होतो अशी भिती दाखवायलाही हे वैदिक धर्मशास्त्रकार चुकलेले दिसत नाहीत.

 तैत्तिरिय ब्राह्मणात तिला या काळात याज्ञिक धर्मकृत्येही निषिद्ध सांगितली आहेत. हे नियम अर्थातच वैदिक स्त्रीयांनाच कटाक्षाने लागू केले गेले हे उघड आहे. ्स्त्रीयांचे उपनयनही थांबले आणि तिचा वेदाधिकारही काढला गेला तो स्मृतीकालातच. तत्पुर्वी वेदाध्ययन जरी केले गेले नसले तरी विवाहाआधी तिचे उपनयन करण्यात येत असे. पण तीही परंपरा नंतर वैदिकांनी का सोडली याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यांच्या स्त्रीया या सर्व पातकांचे द्वार बनल्या हे मात्र खरे. हिंदुंचा त्याच्याशी संबंधच नव्हता!

खरे म्हणजे हे वैदिक परंपरांच्याच विरोधात जाते. वेदाज्ञा म्हणाल तर याबाबत अशी एकही आज्ञा वेदांत मिळत नाही. म्हणजेच स्त्रीयांबाबतचे असे अन्यायी नियम करणे हेच मुळात वेदविरोधी होते, हे वैदिकांनी समजावून घेत मुळचे वैदिक स्त्री माहात्म्य पुन्हा प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता आहे.

इस्लाम

इस्लाममद्ध्ये (भारतात) काही ठिकाणी मशिद-दर्ग्यांत स्त्रीयांना प्रवेश नाही असे मी लेखारंभीच सांगितले आहे. हेही कुराणविरोधी आहे असे म्हणायला प्रत्यवाय नाही. कुराणनुसार स्त्रीयांना मशिदीत जाण्याचा, नमाज अदा करण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी स्त्रीयांसाठी मशिदीत वेगळी व्यवस्था असते. पण असे असले तरी स्त्रीयांनी घरीच नमाज पढावा यासाठी अधिक दक्षता बाळगली जाते व स्त्रीया मशिदींत मुळात जाण्याचा प्रयत्नही करत नाही असेही चित्र आहे. काही ठिकाणी तर बंदीच आहे. कुराणात पैगंबर म्हणतात, स्त्रीयांना कोणी मशीदीत जाण्यापासून रोखू शकत नाही. पण त्याला नंतरच्या धर्मशास्त्र्यांनी दिलेली जोड अशी कि "पण घर हीच त्यांच्या नमाजासाठी योग्य जागा आहे."

पैगंबरांनी स्त्रीयांबरोबर लहान मुले असतात व ते रडून नमाजात व्यत्यय आणतत म्हणून स्त्रीयांसाठी स्वतंत्र खोली व दरवाजा असावा असे म्हटले. असे असले तरी मासिक धर्मातील स्त्रीया व अपवित्र लोक यांच्यासाठी सामुदायिक नमाज पैगंबरांच्याच पत्नीमुळे, आयेशामुळे, नाकारला गेला असे इस्लामी पंडित सांगतात. अर्थात याला कुराणात दुजोरा मिळत नाही. हदिसने अनेक बाबींचा विपर्यास केला आहे हे स्पष्टच दिसते. कुराणवर विश्वास ठेवणा-या मुस्लिमांनी मुळ कुराणातच स्त्रीयांबाबतचे नियम पाहिले तर आपल्या वेडगळ समजुते टाकाव्या लागतील.

थोडक्यात धर्मांनी मुळातील बाबी व स्त्रीयांबाबतचा उदारमतवाद कसा धिक्कारला आहे हे आपण वैदिक व इस्लामबाबत पाहू शकतो. स्त्रीयांना दुय्यम स्थान देणे हा एकमेव हेतू त्यामागे होता यात शंकाच नाही. मुळ धर्मही बाजुला ठेवत स्वार्थासाठी, स्त्रीयांवरील व अन्यांवरील वर्चस्व गाजवण्यासाठी धर्मालाही तिलांजली दिली.

आज आपण आधुनिक काळात आहोत. समतेचे मुलतत्व आपण घटनात्मक पातळीवर स्विकारले आहे. त्यात स्त्री-पुरुष समता सर्वोपरी आहे. अनेक हिंदू धर्मातील वैदिक पुरोहितांनी हट्टाने वैदिक नसलेले, उत्तरकाळात बनवलेले, अगदी स्मृतींतही नसलेले अनेक नियम देवस्थान कायद्यांत घुसवले आहेत. धर्माच्या बाबतीत मुस्लिम सर्वस्वी मुल्ला काय अर्थ काढतो यावरच अधिक अवलंबून आहेत. खरे म्हणजे, अगदी धर्मात असले तरी, ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशात असले बाष्कळ नियम फेकून द्यायची गरज असतांना "धर्म’..धर्म" करत स्त्रीच्या निसर्ग धर्माचा अवमान करत आपण समस्त मानूसकीला काळिमा फासत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. मशिद असो कि मंदिर, यज्ञ असॊ को पुजा, स्त्रीला समान अधिकार हवेत. ते पाळायचे कि नाही, धर्मस्थली जायचे कि नाहे ही बाब व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. पण कोणी त्यांना जायचे असुनही आडकाठी करत असेल तर धर्मस्थळ कायदे, लिखित-अलिखित नियम, पंरपरादिंच्या नांवाखाली त्यांना रोखत असेल तर ते घटनात्मक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारावर गदा आणनारे आहे. असे कायदे अघटनात्मक असल्याने ते बेकायदेशिर आहेत.

स्त्रीयांनाच यात व्यापक प्रबोधनासाठी, स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मासिक धर्म अपवित्र नाही. ती वेडगळ समजूत आहे. पुरातन काळापासून या धर्माला प्रतिष्ठा होती. ती गमावली असेल तर ती पुन्हा मिळवायला हवी. आणि समस्त पुरुषांनीही डोळे उघडून पुरुषी वर्चस्वतावादाच्या सरंजामशाही मानसिकतेतून दूर होत आपल्याइतकेच्ध स्त्रीयांनाही स्वातंत्र्य आहे, त्या गुलाम नाहीत याचे भान ठेवले पाहिजे...!

Tuesday, November 24, 2015

Do we really want to end terrorism?



How terrorists get arsenal to cause havoc across the globe and how to stop these supplies first should be the focused line of action if at all the nations are serious to put final end on terrorism. War against terrorism is mere an illusion unless such supplies are not stopped. The terrorists and the nations sending army or air attacks on the terrorist camps would only mean benefits to the arm manufacturers, dealers, smugglers and funding agencies.

Terrorism has become a global problem, a sever threat to the humanity. Today Islam is blamed for all the incidents of the terrorism, Taliban is now replaced by ISIS…tomorrow some other organization will replace it. But chain of the terrorist activities won’t come to ultimate halt.

Paris attack made global headlines causing agony and fury across the globe. But Boko Haram remains mostly un-discussed as they are causing havoc in “less civilized” countries.  Actually, in 2015, every day world in some or other part of the world experienced ambush, bombings, kidnappings, inhuman killings and suicide attacks. After Paris incident world seemed suddenly awakened and has declared war against terrorism, especially ISIS.

ISIS is using mostly American origin arms, from automatic rifles to Rocket launchers. It is said that they have acquired those weapons from the Syrian-Iraqi army men, Saudi Arabia and China. There is well established chain of the supplies and its distribution. Britain is said to been arming Kurdish people to fight against ISIS. Getting hold of weapons by stealing is a myth. What about ceaseless supply of ammunition? They must be smuggled in. How Maoists of India get hold of arms and ammunition? It is well known fact that from China via North-Eastern states they are smuggled and distributed amongst Maoists. The facts and figures shows that India lost double the people so far than the people, including soldiers, died in Maoist attacks. US have been supplying arms in Iraq with a futile hope that they will be used against ISIS. Rather it has become a major source for ISIS to get modern weaponry.

Having fundamentalism (Muslim, Maoist or any other for that matter) major reason behind any act of the terrorism is the thing that does have ancient traits. The problem with us is, to fight out terrorism and stop killings of the innocents, the priority should have been to stop supply of the armaments to any such country/region, even for the lame reason that such people will fight out terrorist groups! For example US supplied arms to Iraqi army to wage war against ISIS. It is doubted that the some part of those arms, intended for Iraqi army reached in hands of ISIS. This is superficial truth. America (and its friends) and Russia have been arming the terrorist groups alternatively. Russian war against ISIS and now France and allies participating it a great joke on humanity.

The lobby of arm manufacturers is strong in US. Russia too possesses equal ability to produce arms. China too is in the race to increase supplies wherever possible. They use all means, even smuggling them, to the destination wherever possible trouble erupts.

Under the circumstances I would like to say that the war against terrorism is a lie. Warlords don’t wish at all that the terrorism should be eliminated from the face of the earth. Rather they are grooming the terrorists of the future by killing terrorists of the present!

 Blaming Islam for all terrorism is okay. May be tenets of Quran are responsible for it. But then which religious book is devoid of these terrorist elements? Gita too specifically is aimed to wage war against Adharma…killing of human beings is necessary to establish Dharma…says Krishna ultimately! Now there is no clear definition of what Dharma or Adharma is!  But Hindu’s don’t go on killing people in mass proportion, though there religion allows it! The only reason is Hindu’s have no easy access to the weapons. Or else they too could have waged bloody war against Muslims as RSS have been preaching since its inception!

What we need is, if at all we, the global citizens, are serious to have freedom to live and let live, if at all we are serious to end terrorism, first of all the arm supplies has to be banned to the people/groups or nations those are up to cause disruption of global peace.

I mean that the arm manufacturers and their supply chains must be kept under constant surveillance and should be punished heavily if at all they are found to be guilty in supply to wrong people. The nations too, those support terrorism, should be banned of any trade with them. Let them suffer in isolation.

And, under disguise of Superpower, global policing of any nation too is needed to be stopped at first priority. Superpower means an ability to enslave others, politically or economically. The world nations should be well aware of the risks in wooing so-called economic, political and nuclear powers.

If terrorist get easy hold of modern weaponry the day is not far away that they get hold of nuclear weapons too! Fanatics are ready to die as they are suicidal and what even if whole globe is destroyed after them? The risk is heavy….not at all affordable to human being and other species.

To me, war against terrorism can only be fought and ended with fruitful results only if the supply of the arms and ammunition is curbed with global consensus and the smugglers are set to heavy punishments.

This is not impossible if the world is really up to fight out terrorism. If not….ISIS will never end….it would produce another hundreds from their blood!

Blood of the humanity will be spilled forever and the dream of ultimate  freedom of humanity will never come true.


We have to make the choice…!

धर्मांची भ्रामकता!

सर्व धर्मांनी बदलायला पाहिजे. आधुनिक व्हायला पाहिजे. ज्यूंनी, ख्रिश्चनांनी, मुस्लिमांनी, बौद्ध-जैनांनी, वैदिक आणि हिंदुंनी...सर्वांनी बदलायला पाहिजे. सर्व धर्मशास्त्रे आणि जातीधर्मनियम त्यागायला पाहिजेत. जगात कोणताही धर्म महान नाही. प्रत्येक धर्म आपल्या भुगोल आणि वर्तमान परिस्थितीवर मात करायला जन्माला आला. अगणित धर्म नष्ट झाले आणि जेही उरलेत ते अनेक आज मुळच्या स्वरुपात नाहीत. परिस्थिती बदललेली आहे. त्यांची कालसापेक्षता आज निरर्थक झाली आहे.

धर्म प्राप्त परिस्थितीतील नीतिचौकटींचे आणि जगण्याचे साधन होता. त्यातील असंख्य धर्मनीतिनियम बाष्कळ होते, पण त्या त्य कालची परिस्थिती आणि स्वधार्मिक लोकांवरील नियंत्रणासाठे ते अनिर्बंध वापरले गेले. जशी राष्ट्र ही संकल्पना निरर्थक आहे तशीच धर्मही. राष्ट्र आणि धर्म केवळ आणि केवळ दुर्बलांवर अधिराज्य गाजवायच्या या सोयी होत्या...ते धर्म नव्हतेच...कारण धर्मांनीच, किंबहुना पागल धर्मनियंत्यांनीच धर्माच्या असण्याचा होता तो पाया खच्ची करून टाकला. पोट भरायचे, पेटण्याचे आणि पेटवण्याचे साधन बनवून टाकला. हा धर्म नाही. खरा धर्म प्रवाही असतो. त्या धर्मला कोणतीही इश्वरी आज्ञांची भंकस नियमावली नसते. एक साच्यातले इश्वरदत्त तत्वज्ञन नसते. धर्म काळाच्या गरजेनुसार बदलत जात असतो. कुराणात, बायबलात किंवा जुन्या करारात, किंवा वेदात-स्मृत्यांत अथवा तंत्रांत धर्म बंदिस्त नसतो. धर्म त्याहीपार व्यापक असतो.

व्यक्तिनिर्मित धर्म तर अधिक मुर्ख असतात कारण व्यक्ति त्याला भावलेले/पटलेले तत्वज्ञान सांगत असला व त्याला त्याच्या काळाच्या गरजेप्रमाणे काही लोक धर्मच मानू लागले असतील तर ते पुढच्या पिढ्यांना अवाक्षरनेही न बदलता कसे लागू असेल? खरे पाहता येशुने स्वत: कोणताही धर्म स्थापन केला नाही. बुद्धाने नाही कि महावीरानेही नाही. पैगंबर स्वत:ला प्रेषित समजतो...आब्राहमी परंपरेतील...पण तोही नवा धर्म सांगत नाही तर त्याला त्या काळी त्याच्या परिस्थितीत योग्य वाटले ते तत्वज्ञान सांगतो. पुन्हा सर्वांनीच सांगितलेले खरे तत्वज्ञान आपल्याला उपलब्ध नाही. त्यांच्या नांवावर किती धादांत असत्ये नंतरच्या अधार्मिक धर्ममार्तंडांनी खपवत खपवत केवळ स्वार्थी बनवत मुळ धर्माचे वाटोळे केले हेही आपण पाहू शकतो. माझेच प्रेषित/देअव/अवतार खरे बाकीचे खोटे हे भ्रम जोपासण्यात सर्व धर्मियांची अक्कल खर्ची पडलेली आहे. हे भ्रम उजेडात आननेही या अशा अधार्मिकांमुळे अशक्य बनून जाते.

सारे धर्मग्रंथ म्हणतात कि ते परमेश्वरी अथवा अल्लाहचे अथवा आकाशातल्या बापाचे शब्द आहेत. ही लबाडी तर आहेच पण अवेस्ता, वेद ते कुराण-बायबल हे नंतरच्या काळात कसे घालघुसडीने भरलेले आहेत हे आधुनिक विद्वानांनीच सिद्ध केले आहे. मुळ कुराण माहित नाही, आयतांचा खरा अर्थ काय यावर आजही मतभेद आहेत...मग हे आम्ही उराशी धरून का बसलो आहोत?

आज धर्म हे माणसाला लुटायचे, गुलाम करण्याचे सर्व धर्मातील धर्ममार्तंड ते राजकारणी लोकांचे, दहशतवाद्यांचे साधन झाले आहे. मणसांचे ते भ्रामक अस्मिता जपत इतरांचा द्वेष करण्याचे साधन झाले आहे. आपण, मनुष्यजात, कोणाहातचे साधन व्हायला जन्माला आलोत कि काय? आम्ही त्यांच्या हातच्या कठपुतळ्या आहोत कि काय? आज दहशतवादी सर्वच धर्मांत आहेत. स्वरूप वेगळे वेगळे दर्शवले जाते एवढेच. आम्ही स्वेच्छेने गुलाम बनत मानवी महनीय स्वातंत्र्याचीच संकल्पना पायतळी तुडवत नाहीत काय?

यात माणसं मरतात. धर्म मरतो. याचे भान आम्हाला कधी येणार? स्त्रीयांबाबत सर्वच धर्म अनुदार आहेत. माणसांबाबत सर्वच धर्म अनुदार आहेत. या पापाची फळे सर्वधर्मीय कशी भोगणार?

मी माझ्या "कल्की" कादंबरीत कल्की सर्वच धर्मस्थळे नष्ट करतो हे दाखवले होते. आज प्रत्येक माणसाने धर्मस्थळे नाकारली पाहिजेत. पंडत-मुल्ला-पाद्री वगैरे मध्यस्थांना नाकारत-लाथाडत पुढे जायला हवे. धर्माची गरज असेल तर ती विश्वधर्माची. आणि सर्वांना निर्माण करणारा कोणी असेलच तर त्याच्याशी श्रद्धा बाळगायला कोणा मंदिर, मसजिद, सिनेगाग, यज्ञ किंवा स्तुपांचीही गरज नाही. पुराकथांतील भाकडकथा केवळ आपल्याला मानसिक गुलाम करण्यासाठी रचल्या गेल्या. त्यांवर विश्वास आजही ठेवणे हा आपण गुलामीत राहण्याच्याच लायकीचे आहोत एवढेच सिद्ध करेल. मिथकांनीच आपल्याला मोहवून टाकत धर्म नांवाच्या मोहक कायाजालात फसवत आपले भावनिक/आर्थिक शोषण करत नागवले आहे.

धर्म हे माणसाला मणसापासून तोडायची साधने आहेत. हे पाप ज्यू, ख्रिस्ती, मुस्लिम, वैदिक, बौद्ध, जैन, हिंदू आणि इतर जेही धर्म असतील त्यांनी कमी-अधिक प्रमाणात केलेले आहे. ते स्वता:ही त्यातून स्वत:चा विनाश घडवत बसले व इतराचाही केला हाच आजतागायतचा इतिहास आहे.

थोडक्यात आजचेही जागतिक राजकारण टुक्कार धर्मांनीच प्रदुषित आहे. सहिष्णू शब्द बदनाम करण्याची चाल जोरात आहे. पुरोगामी हा शब्द शिवी बनवणारे जोमात आहेत. पण या मुर्खांना माहित नाहीय कि तेही सुपात आहेत.

सहिष्णू म्हणजे मानवता मानणारे. धर्मापार जात धर्मांची निरर्थकता सांगणारे. प्रासंगिक संघर्ष धर्माचे स्तोम माजवतात त्यांच्याशी होणे स्वाभाविक आहे. काही छुपे तर काहे उघड. काही लोक असुरक्षित फील करतात म्हणून नाइलाजाने त्यांना सर्वधर्मसमभाव वगैरे फालतू बाबी बोलाव्या लागत असतील तर तो असहिष्णू लोकांचा पराभव आहे. सहिष्णू म्हणजे फक्त एकच धर्म पाळनारे लोक...तो म्हणजे मानवता. तोच मानवाच्या जीवनाचा जगण्याचा धर्म आहे. तिकडे १२८ मेले म्हणून त्याचा सुड घेण्यासाठी इकडे हजारो निरपराधांसोबत पाच-पन्नास अपराध्यांना मारणे हा धर्म नोहे.

माणुस मारणे आणि माझा माणुस मेला म्हनून सुड घेणे या चक्रातून बाहेर पडण्यासाठी पहिले सारे धर्मग्रंथ आदिम मानसिकतेतून, तत्कालीन निकडितून लिहिले गेलेले, फेकावे लागतील. मानवेतिहासाच्या संदर्भाची साधने म्हणून वापरण्यापार त्यांची काहीएक लायकी नाही हे समजावून घ्यावे लागेल. कोणताही धर्म हा इश्वरप्रणित नसून सामान्य माणसानेच निर्माण केलेत हेही समजावून घ्यावे लागेल.

आणि माणूस हा आपापल्या परिस्थीतीचे अपत्य असतो...जसे धर्म आणि त्यांचे निर्माते! आपल्याला धर्मविहिन परिस्थिती निर्माण करावी लागेल. 

सारे काही पुर्वनियोजितच?

यच्चयावत विश्वात जेही काही घडते ते पुर्वनियोजित असते. जे घडणारच आहे, अटळच आहे त्यात मानवी प्रयत्नांनी, कितीही पराकाष्ठा केली तरी यत्किंचितही बदल होत नाही. किंबहुना वैश्विक यंत्रणेत मानवी प्रयत्नांना काहीच स्थान नाही.  माणसाला भावी घटनांची पुर्वचाहूल लागली व त्याने ते अटळ भाग्य टाळण्यासाठीही कितीही प्रयत्न केले तरीही काही उपयोग होत नाही. यालाच "नियती" असे म्हणतात. 

आपले मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्यवर ग्रीक नियतीवादाचा प्रचंड प्रभाव होता हे आपल्याला माहितच आहे. नियती अटळच असल्याने नियतीवादी साहित्य हे शोकांतिकांकडेच झुकते. किंबहुना नियतीवाद हा ग्रीकांनी जन्माला घातला असा सर्वसाधारण समज आहे. त्याला कारण घडले ते महान ग्रीक नाटककार इस्खुलस, सफोक्लीज व युरिपिडस सारख्या नाटककारांनी नियतीवादी शोकांतिका लिहिल्या. या शोकांतिका त्यांनी अर्थातच ग्रीक पुराणकथांतून घेत आपल्या प्रतिभेने त्यावर साज चढवले. फेट (मोयरा) ही माणसांची नियती लिहिणारी वा घडवणारी एक शक्ती असे हिसियड हा कवी  (इसपू आठवे शतक) मानित असे. पुढे त्यांचे मानवी स्वरुपात दैवतीकरण केले गेले. त्यानुसार या तीन देवता चरख्यावरुन मानवी नियतीचे धागे विणत असतात. त्यात वेदना, दुर्दैवे, मृत्यू, व अन्य अटळ घटनांचा समावेश असून माणसाचा मृत्यू जेंव्हा व्हायचा असतो तेंव्हा यापैकी एक देवता कात्रीने त्याचा धागा कापून टाकत असते असेही या मिथ्थ्यकथेत मानले गेले आहे. देवतांनाही नियतीच्या धाग्यानेच बांधलेले असते असे हा नियतीवाद मानतो.

"इडिपस रेक्स" हे सफोक्लीजचे सर्वात प्रभावशाली शोकांतीक नियतीवादी नाटक. इडिपस हे थीब्जचा राजा लायस व जोकास्टा यांचे अपत्य. त्याच्या जन्मानंतर भविष्य कळते कि हा मोठ झाल्यावर बापाला मारून आईशी संग करणार आहे. हे भविष्य समजताच लायस त्याला ठार मारायचे ठरवतो. त्याचे पाय बांधून त्याच्या गुढघ्यांत खिळे ठोकले जातात व त्याला जोकास्टाने स्वहस्ते मारावे असे लायस सांगतो. जोकास्टा लहाणग्याला मारू शकत नाही. ती मग ते काम आपल्या एका नोकराला सांगते. नोकर मुलाला घेऊन पर्वतशिखरावर जातो व तेथेच सोडून देतो. मुल आपोआप मरेल असे त्याला वाटते. पण एक मेंढपाळ त्या मुलाला पहातो, त्याचे बंध मुक्त करून आपल्या घरी घेऊन जातो व त्याचे नांव "इडिपस" (सुजलेल्या गुढघ्यांचा) ठेवतो. पुढचा त्याचा सांभाळ कोरिंथचा राजा पोलिबस स्वत:च्या मुलाप्रमाणे करतो. 

तरुणपणी इडिपसच्या कानावर अफवा येतात कि तो पोलिबसचा मुलगा नाही. खरे काय हे जाणायला तो डेल्फीच्या देवतेला आपले भविष्य विचारतो.   डेल्फीची देवता त्याला तो खरेच पोलिबसचा मुलगा आहे कि नाही हे न सांगता त्याच्याकडून स्वत:च्या मातेशी संग होणार आहे असे भविष्य वर्तवते. यामुळे इडिपस हादरुन जातो. पोलिबस व मेरोपे हेच आपले खरेखुरे जन्मदाते आहेत व आपल्या हातून अघटित घडू नये म्हणून तो कोरिंथ शहराचा त्याग करतो. 

तो रथातून थीब्जकडे जात असता लायस आपल्या लवाजम्यासह समोरून येत असतो. आधी कोण जाणार यावरुन झलेल्या वादात इडिपस राजा लायसला ठार मारतो. लायस आपला जन्मदाता आहे हे त्याला माहित नव्हते. पण नियतीचे अटळ शब्द खरे झाले. त्याच्या हातून पित्याची हत्या झाली. 

तेथून तो थीब्जला जातो. स्फिंक्सचे कोडे सोडवल्याने (व प्रजेला भयमुक्त केल्याने) त्याला राजपद मिळते आणि आता विधवा झालेली राणी जोकास्टाही. नियतीचे हेही विधान खरे ठरते. पुढे सत्य सामोरे आल्यावर जोकास्टा आत्महत्या करते तर इडिपस स्वत:चे डोळे फोडून घेतो.

माणसाचे वर्तन अज्ञाताने एवढे झाकोळले असते कि ज्या गोष्टी आपण सहज सहज जीवनात करतो त्या अटळ नियतीमुळेच घडत असतात याचे भान माणसांना नसते. कदाचित जगातील तत्वज्ञ व लेखकांना या नियतीवादाने भुरळ घातली असल्यास नवल नाही. 

ग्रीक नियतीवाद कसा असतो हे वरील एका नाटकाच्या ढोबळ कथानकावरुन लक्षात येईल. पण नियतीवाद फक्त ग्रीकांचीच उपज आहे हा समज करुन घेण्याचे कारण नाही. भारतात प्राचीन काळापासून, अगदी बुद्धपुर्व काळापासून  नियतीवादी तत्वज्ञानाची पाठराखन करणारा संप्रदाय होता. त्याचे नांव आजीवक! या पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येने होते. आजीवकांचे उल्लेख साहित्यात जसे येतात तसेच अशोकाच्या शिलालेखांतही. आजीवक हे वैदिक धर्माचे कट्टर विरोधक होते. बुद्ध आणि महावीर आजिवकांच्या संन्निध्यात आले होते. मंस्खली गोशाल हा त्या काळचा प्रख्यात नियतीवादी विद्वान होता. या पंथाचे तत्वज्ञान ग्रीक नियतीवादापेक्षा थोडे वेगळे होते. आजीवक म्हणत, सारेच जे घडणार आहे ते पुर्वनियोजित असल्याने आपण काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवी स्वतंत्र इच्छेला व प्रेरणांना त्यात स्थान नाही. बीजातच जसे झाड लपलेले असते तसेचे नियतीतच माणसाचे जीवन बद्ध आहे. नियती ही मानवी प्रयत्नाने बदलत नाही. जैन व बौद्ध साहित्यात त्यांना "अकर्मवादी" असे म्हटले आहे. वैदिकांच्या कर्मविपाक सिद्धांताला आजीवकांचा कट्टर विरोध होता. ते म्हणत कर्मातून दुसरे कर्म जन्मत नसून वेदना, संकटे , आनंद हे सारे नियतीमुळेच माणसाला अनुभवायला मिळते. त्यामुळे माणसाला स्वतंत्र प्रयत्न करण्याची संभावनाच राहत नाही. आणि तो तसे करत असला तरी तीही त्याची नियतीच असते. 

आजीवक संप्रदायाचे लोक त्यामुळेच संन्यस्त जीवन जगत. रानावनात फिरत. वस्त्रांचीही काळजी ते करत नसत. एका अर्थाने हा संप्रदाय नियतीशरण होता. सम्राट बिंदूसार आजीवक संप्रदायाचा पाठिराखा होता. अशोकानेही आजीवकांना आपल्या शिलालेखांत सन्मानाने उल्लेखलेले आहे. या संप्रदायाच्या तर्त्वज्ञानावर सांख्य व वैशेषिक तत्वज्ञानाचाही प्रभाव जाणवतो किंवा सांख्य व वैशेषिक हे याच संप्रदायातील तत्वज्ञ असु शकतील. 

परंतू बौद्ध व धर्माने वैशेशिकांचा अकर्मवाद स्विकारला नाही. जीवनात दु:ख आहे हे त्यंनी मान्य केले पण त्यावर मात करता येते, ते अटळ नाही अथवा नियतीने घडवलेले नाही असे या धर्मांनी सांगायला सुरुवात केली. पुढे हा पंथ हळू हळू विरत गेला व इसवी सनाच्या दुस-या-तिस-या शतकानंतर मात्र तो नामशेष झाला. असे झाले म्हणून नियतीवादाचा प्रभाव गेला नाही. "ठेविले अनंते तैसेची रहावे" असे जेंव्हा तुकोबा म्हणतात तेंव्हा त्यांचा निर्देश आजीवक तत्वज्ञानाकडेच असतो हेही लक्षात ग्य्ह्यावे लागते. नियतेवादात मानवी प्रयत्नांना स्थान नाही. "कर्ता-करविता परमेश्वर" हे आपण साधारणपणे नियमित ऐकत-बोलत आलेले विधानही नियतीवादीच आहे. 

जी. ए. कुलकर्णींचेच काय पुरातन काळातील भारतीय साहित्यकारांचे आजिवक तत्वज्ञानावर साहित्यकृती निर्माण कराव्यात याकडे लक्ष गेले नाही. किंबहुना सुखांतिका हाच भारतीय साहित्याचा गाभा राहिलेला आहे. रामाला शरयुत प्राणार्पण करावे लागते हा नियतीचाच संकेत. पण त्यातील शोकांतिका कोणी पाहिलेली नाही. या उलट ग्रीक साहित्यकारांनी नियतीवर आधारित अजरामर शोकांतिका निर्माण केल्या. 

आधुनिक काळात अनेक तत्वज्ञ नियतीवादावर चिंतन करत असतात. खंडण अथवा मंडन करत असतात. नियतीवाद मान्य करणे हे आजच्या काळात अंधश्रद्धाळूपणाचे लक्षण मानले जात असल्याने जाहिरपणे नियतीवाद मान्य करणा-यांची संख्या तशी थोडीच आहे.

येथे नशिब, भाग्य व नियती या वरकरणी समान वाटणा-या शब्दांतील फरकही समजावून घ्यायला पाहिजे. प्रत्येकाचे नशीब ठरलेले असते पण त्यात मानवी प्रयत्नांनी अथवा देवतांना प्रसन्न केल्याने बदलही घडून येतो. नियतीच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. सारे काही पुर्वनियोजितच असून त्यात मानवाला कसलाही हस्तक्षेप करण्याचे स्वातंत्र्य नाही. ते काहीही केल्याने बदलत नाही. थोडक्यात एका अर्थाने ईश्वरी सत्ता हीच सार्वभौम असून मानव हा नियतीच्या इशा-यावर चाललेले खेळणे आहे असे नियतीवाद मानतो. आणि असा निखळ नियतीवाद भारतात फक्त आजीवकांनी मानला. 

नित्शे, कांट, शोपेनहायमर इत्यादि तत्वज्ञांच्या नियतीविषयक चर्चेत जाण्यापेक्षा आपण नियती ही खरेच असू शकते काय याचा विचार करुयात.  नियती ही ईश्वरनिर्मित व कार्यान्वित संकल्पना आहे असे मान्य करण्याचे काही कारण नाही. कारण त्याला श्रद्धा सोडता अद्यापतरी कसलाही आधार नाही. श्रद्धेच्या आधारावर विश्व चालत नाही. पण हे विश्व तरी पुर्वनियोजित आहे काय?

विश्वनिर्मिती ही महाविस्फोटाने झाली असा समज सध्या प्रबळ आहे. त्याला आव्हान देणारे (अगदी माझाही) अनेक सिद्धांत आहेत. ज्या कारणाने महाविस्फोट घडला त्या कारणाचे समाधानकारक स्पष्टीकरण अद्याप देता आलेले नाही. ते कारण संघनित द्रव्यात होते कि बाहेर हेही सांगता आलेले नाही. महाविस्फोट एका विशिष्ट स्थीतीत झाला. जर अशी स्थिती निर्माण झाली असेल तर विश्वनिर्मिती हीही विश्वाची नियती होती काय असा प्रश्न उद्भवला तर नवल नाही. जे विश्व आपल्याला आज समजले आहे ते सुसंबब्ध असून त्यात कसलाही गोंधळ नाही. त्यामुळे ही सारी रचना पुर्वनियोजित पद्धतीने झाली असेल का असाही प्रश्न या संदर्भात विचारता येतो. याची कारणे वस्तुमानातच दडलेली असली, बाह्य अथवा त्रयस्थ नसली, तरीही एकुणात रचनेतच सुसूत्र योजनाबद्धता आहे हे तर वास्तव आहे. आणि जेंव्हाही पुर्वनियोजितता येते तेंव्हा तिथे नियती असते.

मानवी जनुके माणूस कसा घडणार याचा जैविक आराखडाच असतो असे म्हटल्यास वावगे नाही. मानवी स्वभाव, संस्कृती, भाषा, विचारसरण्यांची बीजे जनुकांतच असतात. मानवी वर्तनाचा वारसा आपल्याला आपल्या जनुकांतुनच मिळतो असे Human Behavious Genetics मद्धे मानले जाते व मानसशास्त्रात याचा आता मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. जनुके हा मानवी वर्तनशास्त्राच्या भविष्याचा आराखडा असतील तर जनुके आपली नियती काही प्रमाणात तरी घडवतात असे मानता येईल. यात अर्थातच जीवनातील घटनांचा समावेश नाही. कारण घटना या असंख्य घटनांच्या व्यामिश्र परिप्रेक्षात निर्माण होत जातात. पण सर्वच घटनांचे परस्परसंबंध मोजता येतील एवढे आपले गणित प्रगत नाही आणि एका घटनेच्या अभावात दुसरी घटना निर्माण होणार नाही हे मान्य केले तर प्रत्येक घटनेचे अनंत घटनांतील सहभाग, परिणाम आणि नव्या घटनांना जन्म हे जर चक्र असेल तर प्रत्येक घटना ही नवी नियती निर्माण करते असे म्हणावे लागेल. 

म्हणजे मग प्रत्येकाच्या नियतीचे परिमाण वेगळे होणे स्वाभाविक होत जाईल.  यात पुर्वनियोजन आहे कि नाही हे समजणे अवघड असले तरी प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अकल्पनीय घटना घडत असल्याने व त्यांचे स्पष्टीकरण समाधानकारकपणे मिळत नसल्याने नियती असते कि नसते, ती पुर्वनियोजित असते कि नसते याबाबत मोठा खल करता येईल. प्रत्येकाच्या दृष्टीने उत्तरेही वेगवेगळी येतील हेही नक्कीच आहे.

या संदर्भत शास्त्रज्ञ असलेले डा. एडवर्ड ओ. विल्सन यंचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. आपल्या "सोशल बायोलोजी : द न्यू सिंथेसिस" या ग्रंथात त्यांनी आगामी संकटाचे पुर्वसंकेत सजीवांना कळत असतात व त्यांचा संबंध जनुकांशी असतो असे म्हटले आहे. त्यांच्या मते जनुकांतच माणसाला संकटांची चाहूल घेण्याची उपजत यंत्रणा असते. या विधानाबद्दल त्यांना वैज्ञानिक जगातुन प्रचंड विरोध झाला होता. कारण यामुळे सर्व घटना नियत असतात व माणसाला त्याची या ना त्याप्रकारे चाहूल लागते हे मान्य केले कि नियतीवादही मान्य करावा लागतो. येथे हेही लक्षात घ्यायला हवे कि जर भविष्यात होणा-या घटनांचे पूर्वसंकेत मिळत असतील तर घटनाही पुर्वनियोजितच असण्याची संभावना आहे. अन्यथा पूर्वसंकेत मिळण्याची शक्यताच नाही. यालाच जुन्या लोकांनी नियती म्हटले असेल का?

असे असले तरी मी माझा अनुभव सांगतो. असे अनेक अनुभव आहेत. एक लक्षात घ्या, मी अंधश्रद्धाळू नाही. पण जे घडले आहे त्यातील अन्वयार्थ लावायला घाबरण्याइतपत मी दांभिकही नाही. 

घटना १९९५ मधील आहे. गडचिरोली येथे माझ्या कारखान्याचे उद्घाटन होऊन केवळ एक महिना उलटला होता. मी गडचिरोलीला त्यापुर्वीही अनेकदा माझी ११८ एन. ई. ही कार घेऊन स्वत: चालवत जायचो नि काम संपताच परत न थांबता परत यायचो. एप्रिल १९९६ मद्ध्ये मी असाच गडचिरोलीला कारखान्याला भेट देण्यास गेलो होतो. सोबत माझा कर्मचारीही होता. दोन दिवस तेथे थांबून परत निघणार होतो. पण का कोणासठाऊक सकाळपसून मला अस्वस्थ वाटत राहिले. कारने जाण्यात काही धोका आहे असे उगाच वाटत राहिले. खरे तर मी शंभरेक वेळा कारने गडचिरोलीला ये जा केली होती. पण अशी संवेदना कधीही झाली नव्हती. तरीही समजते तेवढी कार चेक केली. टायर तपासले. सारे ठीकठाक होते. तरीही मला एका टायरबद्दल शंका वाटत रहिली. पण डिकीत चांगला स्पेयर टायर होताच. नागपुरपर्यंत वाटेल काही पेट्रोल पंप आणि पंक्चरवाल्यांची दुकाने होती. कोठेतरी टायर बदलून घ्यायचा व अत्यंत सावकाश जायचे असे ठरवले व दुपारी निघालो. 

गंमत अशी झाली नेमक्या त्याच दिवशी नागपुरपर्यंत एकाही पंपावरचा टायरवाला उपस्थित नव्हता. यामुळे मीही चक्रावलो. मी कार नागपुरला एखाद्या ठिकाणी ठेवून बसने जायचा निर्नय घेतला. प्रसन्न ट्र्यव्हल्सची दोन तिकिटेही काढली व गराज शोधायच्या मागे लागलो. ते यासाठी कि ते कारही तपसून ठेवतील आणि पुन्हा येईपर्यंत कारही सुरक्षित राहिल. पण जवळपासच्या एकाही गराजवाल्याकडे जागा नसल्याने कार ठेवता आली नाही. नागपुरमधे कोनी परिचितही नव्हता कि सुरक्षित पार्किंगही. शेवटी तसेच पुढे जायचे ठरवावे लागले. 

नागपुरमधून बाहेर पडत असता एक टायरवाल्याचे टपरी दिसली. थांबलो. ११८ एन.ई. ची डिकी उघडायला स्वतंत्र चावी असे. टायरवाल्याने ती उघडायचा प्रयत्न केला तर चावीच तुटुन अडकून बसली. डिकी काही केल्या उघडेना. टायरवाल्याने सारे टायर तपासले. सारे ठीकठाक आहेत अशी ग्वाही दिली. हवाही चेक केली. तरीही चरफडत अत्यंत सावकाश निघालो. 

पुण्यापासून केवळ तीस किलोमिटरपर्यंत सुरक्षित पोहोचलो. आणि काय झाले हेच समजले नाही. एका सुमोने जोरदार धडक दिली...इतकी कि ११८ एन.ई. सारख्या कारची पुरती दामटी (१००% Loss) झाली. मी गंभीर जखमी झालो. बेशुद्ध पडलो. दोन दिवसांनंतर शुद्धीवर आलो तेच रुबी हालमद्ध्ये. डोक्यावर १७ टाके, उजवी बाजु कामातुन गेलेली. पायात प्लास्टर....

ज्यांनी अपघातग्रस्त दामडी झालेली कार पाहिली त्यांना या अपघातातून कोणी जीवंत राहिला असेल असे वाटत नव्हते. मी जखमी असलो तरी वाचलो. माझ्यासोबतच्या सहका-याला मात्र खरचटलेही नाही. 

यातून खूप विचार करुनही मला एक कोडे उलगडले नाही. मला चाहूल लागली होती हे खरे. मी संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येणे शक्य होते ते सर्व केले. पण तरीही जे व्हायचे ते झाले. हा अपघात होणे ही नियती होती काय? माझ्याकडे समाधानकारक स्पष्टिकरण नाही. प्रत्येकाच्या जीवनात अशा स्वरुपाच्या घटना घडत असतात. प्राण्यांना तर मानसापेक्षा आगामी संकटची चाहूल घेण्याची क्षमता असते हे आपल्यालाही माहित आहे. 

माणसाला स्वत:चे निर्णय घेण्याची व घटना घडवायचे अथवा त्या बदलायचे स्वातंत्र्य असते आणि नियती अथवा भाग्य त्यात कसलीही भुमिका बजावत नाही असे मानण्याकडे बुद्धीनिष्ठ तत्ववेत्ते व शास्त्रज्ञांचा भर असतो. मानवी स्वातंत्र्याचा विचार करता तसे स्वतंत्र्य त्याला असायला हवे असे मान्य करता येत असले तरी प्रश्न हा उद्भवतो कि माणूस ज्याला स्वतंत्र कृती म्हणतो तिही पुर्वनियोजितच असेल तर?

Chronicals of Higher Education या नियतकालिकात याच विषयावर सहा विद्वानांनी धमासान चर्चा केली होती. माणसाची स्वतंत्र इच्छा कि नियती यावर विविध मते न्युरोसायंस, तत्वज्ञान व समाजविज्ञान या अंगाने मांडली गेली. मानवी स्वतंत्र प्रेरना (फ़्री विल) हा भ्रम असून नियती हे वास्तव आहे हे सहापैकी चार विद्वानांनी मान्य केले. जेरी कोएन या शास्त्रज्ञाने मत मांडले कि, ज्याला आपण स्वतंत्र निर्णय म्हणतो तो म्हणजे अन्य काही नसून मेंदुतील मोलेक्युल्समधील जैव-विद्य़ुत-रसायनी प्रक्रियेचा शृंखलाबद्ध आविष्कार असतो. आणि ही प्रक्रिया प्रत्येकाच्या मेंदुत कशी घडेल हे जनुकांनीच पुर्वनियोजित केलेले असते. मानवी मेंदुतील निर्णयप्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी ती भौतिकशास्त्राच्या नियमांनीच आधीच बद्ध असते...पुर्वनियोजित असते, त्यामुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हाच एक भ्रम आहे.

परंतू हे झाले निर्णयांबद्दल अथवा माणसाच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या शक्यतांबाबत. निर्णय जर पुर्वनियोजितच असतील तर मानवी जीवनात घडणा-या जन्मापसून मृत्युपर्यंतच्या घटनाही मग पुर्वनियोजित असतील काय? दैववादी अथवा नियतीवादी असे मानतात हे खरे आहे. नियतीवाद्यांच्या तर्कांत काही भाबडेपणा असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या नियतीचे असणे, म्हणजे सारे काही पुर्वनियोजित असने असंभाव्य नाहे असे आपण विज्ञानाच्या पायावरही म्हणू शकतो हे आपण वर पाहिलेच आहे. संपुर्ण विश्व हेच मुळात जर पुर्वनियोजित असेल तर त्याचाच घटक असलेला माणूस त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. 

नियतीवाद मान्य केला कि भविषवेत्त्यांचे काय? त्यावरही मग विश्वास ठेवायचा कि काय असा प्रश्नही यातून निर्माण होईल. मुळात कोणी कोणाचे भविष्य पाहू शकतो ही संकल्पनाच अवैज्ञानिक आहे. ग्रह-ता-यांच्या स्थित्यांमुळे मानसाचे भविष्य घडत नाही. त्यांच्या चुंबकीय व गुरुत्वेय लहरींचा परिणाम अटळपणे जीवसृष्टीवर होतच असला तरी विश्वातील ता-यांची व आकाशगंगांची संख्या एवढी अचाट आहे कि त्यांच्या लहरींचा एकुणातील भविष्यावरचा परिणाम वर्तवता येणे अशक्यच आहे. 

मानवी जनुकांत माणसाची नियती असण्याची संभावना सर्वाधिक आहे हे आपण पाहिले. माणसाचा भवताल, माणसांचे परस्परसंबंध आणि जनुकीय प्रेरणा मिळत नियती घडवत असते असेही आपल्याला मानता येईल.  या वैश्विक आणि गुंतागुंतीच्या अगणित प्रभावांतून माणूस निर्णय घायला स्वतंत्र असतो असे विधान करता येत नाही हे उघड आहे. किंबहूना मुळात निर्णय घेण्याची वेळ व घटना याच पुर्वनियोजित असता व त्याचे परिणामही. अन्यथा मानवी जीवनात अनपेक्षित, अकल्पनिय अशअ सुखद अथवा दु:खद घटना घडल्या नसत्या.

नियतीवाद जर हा असा असेल तर देवांची भक्ती-पुजा करुन भले होईल अथवा न केल्याने वाईट होईल ही धर्मश्रद्धा कुचकामी आहे हेही आपल्या लक्षात येईल.

पण यावर तुमचा तर्क असा असू शकतो कि...

भक्ती-पुजा करणे हीच माझी नियती असेल तर?

असो! 

(Article published in मीडिया वॉच दिवाळी अंक २०१५. Editor- Mr. Avinash Dudhe)

Monday, November 23, 2015

सातवाहन



 आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. सिमुक (किंवा सिंधुक) सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्यापुर्वी ते काण्व राजांचे महाराष्ट्रातील मांडलिक असावेत असे पुराणे सुचवतात. डा. अजय मित्र शात्री यांच्या मते ते मौर्य घराण्याचे महाराष्ट्रातील राज्यपालही असू शकतील. ही सत्ता साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. महाराष्ट्राची आजच्या संस्कृतीचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही.

कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना "आंध्र" असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" (औंड्र...ओंडर...आंदर...मावळ) असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा "आंदर मावळ" शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.

आंध्रांच्या अनेक शाखा होत्या. काही ओडिसात, काही आंध्रात तर काही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वसल्या असाव्यात. आंध्र नांवामुळे सातवाहन कुळ हे मुळातील आंध्र प्रदेशातील असावे असा बहुतेक विद्वानांचा समज होता. पण पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्र जसा केलाय तसाच "आंध्र जातीय" असाही केला आहे. आंध्र जातीय म्हणजे आंध्र कुलीय, त्या प्रदेशातीलच मुळचा असा नव्हे असा तर्क काही विद्वानांनी दिला आहे. आणि असे असले तरी आपल्या प्रतिपादनात प्रत्यवाय येण्याचे कारण नाही कारण आंध्र प्रदेशही औंड्र समाजानेच शासित केलेला प्रदेश असल्याने व ओरिसातही त्यांचे वास्तव्य असल्याने एखादी शाखा प्राचीन काळीच महाराष्ट्रातही वसली असल्यास आश्चर्य नाही.

महाराष्ट्रात सातवाहन पुरातन काळापासून वसले असल्याचा पुरावा म्हणजे सातवाहनांचे आरंभीचे सारे शिलालेख हे जुन्नर, पैठण व नाशिक प्रांतातच सापडलेले आहेत. पौंड्र जसे बंगाल-ओरिसातही होते तसे ते महाराष्ट्रातही होते हे आपण श्री विठ्ठलाच्या संदर्भात पाहिलेलेच आहे. या औंड्र लोकांचे मुलस्थान ओडिसा असण्याची शक्यता अधिक आहे कारण यांना महाभारतात राजा बळीचे पुत्र म्हटलेले आहे. पशुपालक असल्याने त्यांचे दक्षीणेकडे पांगणे व नंतर त्या त्या भागात स्थायी होणे स्वाभाविक आहे. सनपुर्व चवथ्या -पाचव्या शतकानंतर ते सनपुर्व दुस-या शतकाच्या काळात महाराष्ट्र व आंध्रात मेंढपाळ लोकांचेच मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते. शेती अजून फारच प्राथमिक अवस्थेत होती व फक्त नद्यांच्या काठांवरच होत होती असे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. यासाठी आपल्याला महापाषाणयुगाचा आधार घ्यायला लागेल.

महापाषाणयुग

ताम्रपाषाण युगाच्या अस्ताच्या काळात (सनपूर्व १२००) महारष्ट्रात शुष्क हवामानाचा काळ सुरू झाला. पर्जन्यमान खूप घटले. आद्य शेतक-यांच्या ज्याही काही थोडक्या वसाहती होत्या त्याही निर्मनुष्य झाल्या. तरीही शेळ्या-मेंढ्या घेऊन निमभटके धनगर महाराष्ट्रात तग धरून राहिले. इसपू आठव्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात पाषाणयूग अवतरले. या काळाचे सर्व पुरावे मध्य भारत व दक्षीण भारतात मोठ्या प्रमानावर मिळून आलेले आहेत. खानदेश, विदर्भ व माराठवाड्यांतील पुरावे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या काळाला महापाषाणयुग म्हणण्याचे कारण म्हणजे या लोकांनी बांधलेली थडग्याभोवतीची मोठ्या शिळांची वर्तुळे. ही विशिष्ट प्रकारची दफनपद्धती होती. यात प्रेतास अथवा त्याच्या अस्थिंना खड्ड्यात पुरले जाई व सोबत अनेक मातीच्या भांड्यांतून मृतासाठी अन्नपाणी ठेवले जाई.  याखेरीज कु-हाडी, तलवारी, भाले, घोड्यांचे अलंकारही पुरले जात व थडग्याभोवती शिळांची वर्तुळाकार रचना करण्यात येई.

या शिलावर्तुळांच्या आसपास या लोकांच्या काही तात्पुरत्या वसाहतीही सापडलेल्या आहेत. नायकुंड येथे गोल झोपड्यांचे अवशेष मिळाले असून त्यामुळे महापाषाणयुगातील लोक गोल झोपड्यांमध्ये राहत असावेत असे मत अजय मित्र शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.. झोपडीच्या आतल्या बाजुस दोन मोठे खड्डे सापडले असून त्यात शेळ्या-मेंढ्या, हरिणांची अर्धवट जळकी हाडे सापडलेली आहेत. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते स्थिर लोकांची प्रवृत्ती ही आयताकृती घरे बांधण्याची असते तर अस्थिर-निमभटके लोक गोलाकार घरे बांधतात असे डा. म. के. ढवळीकर यांनी नोंदवलेले आहे. (महाराष्ट्र राज्य ग्यझेटियर; इतिहास-प्राचीन काळ, खंड १, पान १००)

शेळ्या-मेंढ्यांचे अवशेष आणि निमभटक्या लोकांना साजेशा गोलाकार झोपड्या सापडणे, घोड्यांचीही दफने सापडने यावरुन हे सिद्ध होईल कि सनपुर्व आठव्या शतकापासून महाराष्ट्रात धनगरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते तर स्थिर वसत्यांचे प्रमाण नगण्य होत गेले होते. ढवळीकर म्हणतात, "महापाषाणयुगीन लोक फक्त पावसाळ्यापुरते एका ठिकाणी वसती करुन राहत. उरलेल्या आठ महिन्यात मात्र भटके जीवन जगत असावेत. कारण उदरनिर्वाहासठी ते पशुपालन व मेंढपालनावर अवलंबून होते."

यावरुन हे स्पष्ट होते कि महाराष्ट्र तसेच आंध्र या काळात निमभटक्या मेंढपाळांनी व्यापलेला होता. नागर संस्कृतीने पुन्हा बस्तान बस्तान बसवायला सनपुर्व तिनशेपर्यंत वेळ घेतला असला तरी प्राबल्य हे मेंढपाळांचेच होते. त्यामुळे स्थानिक सत्ताही त्यांच्याच असणे स्वाभाविक आहे. दफनांची ही वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती त्यांनी प्राकृतिक उत्पातामुळे केली असली तरी ती नंतर त्यांनी सोडून दिली. पाषाणदैवते मात्र कायम राहिली.

सातवाहन नांव

सातवाहन हे नांव कसे व कोठून आले याबाबत विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नांवानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखांत या वंशाचे नांव सादवाहन, सदकनी असेही आले असे असून संस्कृत ग्रंथांत सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असेही आले असले तरी या नांवाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डा. अजयमित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसे म्हटले जाते तसे जे. प्रिझलुक्सी यांच्या मताप्रमाणे "सादम" या मुंड भाषेतील शब्दावरुन हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्त्या शोधायचा प्रयत्न राजवाडेंपासून के. गोपालाचारींनी केला असला तरी या नांवाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतात या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. इसवीसनापुर्वी मुळात संस्कृत भाषाच तयार झालेली नव्हती तर संस्कृतात त्याची उत्पत्ती सापडेल कशी? (पहा- भाषेचं मूळ-संजय सोनवणी) वा. वि. मिराशी म्हणतात कि, सातवाहन हेच मुळचे नांव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो. या वंशनामाच्या इतर व्युत्पत्त्या काल्पनिक आहेत. (सातवाहन आणि पश्चिमी छत्रप)

 सातवाहन या शब्दाचे मूळ आपल्याला प्राकृतातच व जसे आहे तसेच स्विकारावे लागते. सादकणीचे कृत्रीम रूप संस्कृतात सातकर्नी करुन "सात कानांचा असा अर्थही कसा चुकीचा होतो असे विद्वानांनीच मान्य केले आहे.  थोडक्यात सातवाहन या नांवाचा (जसा महाराष्ट्रातील अनेक आडनांवांचा आज अर्थ लागत नाही.) अर्थ शोधत बसणे निरर्थक आहे.

पण सर्वात मोठी कमाल डा. अजय मित्र शास्त्री व वा. वि. मिराशींनी केली आहे. त्यांनी सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न केला आहे. त्याचेही निराकरण येथे करणे गरजेचे आहे.

नाशिकच्या वासिष्टीपुत्र पुलुमावि याच्या शिलालेखात "एकबम्हण" आणि "खतियदपमानमदन" या शब्दांचा त्यांनी "गौतमीपुत्र सातकर्णी हा अनुपम अथवा अद्वितीय ब्राह्मण होता व त्याने क्षत्रियांचा गर्व व अभिमानाचे दमन केले होते." असा घेतला आहे. मिराशींनीही हाच कित्ता गिरवला आहे. सातवाहन ब्राह्मण असते तरी आम्हाला त्यावर आक्षेप नव्हता, पण जे नाही ते कसे स्विकारले जाणार?

पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे कि पुराणे सातवाहनांना स्पष्टपणे शूद्र म्हणतात. एवढे मोठे ब्राह्मण राजघराणे असते तर पुराणांनी त्यांना शूद्र म्हणण्याचे धादस केले नसते. उलट महाकाव्ये लिहिली असती. दुसरी बाब म्हणजे "औंड्र" (आंध्र) हे शुद्रच आहेत असे ऐतरेय ब्राह्मणानेही म्हटलेले आहे. महाभारतात त्यांना बळीराजाचे पुत्र म्हणजेच असूर म्हटले आहे. आरंभीच्या सातवाहनांचा नागवंशीयांशी रक्तसंबंध होता हे तिसरा सातवाहन राजा याच्या राणीच्या "नायनिका" (नागनिका) या नांवावरुनही स्पष्ट होते. एवढे सारे असतांना "एकबम्हण" या एकाच ठिकाणी येणा-या एकाच शब्दावरून त्यांना ब्राह्म्कण ठरवायचा प्रयत्न करणे याला मी वर्चस्ववाद करत सांस्कृतिक अपहरणाचा कट म्हणतो.

सातवाहन जर वैदिक असते तर सातवाहन या शब्दाचा वैदिक अर्थ लागला असता, पण तो तसा लागत नाही हे आपण पाहिले. ते वैदिक असते तर शिलालेखात त्यांच्या गोत्राचा उल्लेख अवश्य आलाच असता, पण तो येत नाही.

दुसरे असे डा. डी. आर. भांडारकर यांनी एकबम्म्हण या शब्दाचा अर्थ "ब्राह्मणांचा रक्षक" असा घेतला आहे. खतिय हा शब्द क्षत्रियांना उद्देशून नसून शक क्षत्रपांना उद्देशून आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. के. गोपालाचारीही या मताशी सहमत आहेत. इतिहासकार शैलेंद्र नाथ सेन आपल्या Ancient Indian History and Civilization ग्रंथात स्पष्टपणे म्हणतात कि सातवाहन राजे सहिष्णू असल्याने त्यांनी बुद्धिष्ट लेण्यांना जशी दाने केली तशीच ब्राह्मणी धर्मालाही आश्रय दिला व स्वत:ला एकबम्म्हण म्हणवून घेतले. (पान १७४)

गौतमीपुत्र सातवाहनाने नहपान या शक क्षत्रपाचा उच्छेद करुन गमावलेले साम्राज्य मिळवले होते. हे लक्षात घेता क्षत्रपांना (Xathroi) खतियांचा गर्व उतरवणारा असे सातवाहन म्हणत असतील तर या शब्दाचा अर्थ परशुरामाप्रमाणे क्षत्रियांचा गर्व उतरवणारा असा करुन मिराशी व शास्त्री आपला फुकाचा गर्व वाढवत आहेत हे उघड आहे. या संदर्भात माझा एक लेख महाराष्ट्र टाईम्समधे प्रकाशित झल्यावर रविकिरण साने यांनी सातवाहन ब्राह्मणच या अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. त्याला मी उत्तर दिले होते. म. टा. ने ते प्रसिधही केले. ते मी येथे त्तसेच्या तसे देत आहे, म्हणजे सांस्कृतिक लबाड्या आजही कशा सुरु आहेत हे तुमच्या लक्षात येईल!

"मटा’च्या १ एप्रिलच्या (२०१२) अंकात माझ्या "गौतमीपुत्राच्या विजयाची परंपरा" या लेखावरील श्री. रविकिरण साने यांचा "शककर्ते सातवाहन ब्राम्हणच!" हा प्रतिसाद वाचला. महत्वाचे सर्व पुरावे सोडुन द्यायचे आणि एका शिलालेखातील "एक बम्हण" (साने म्हणतात तसे एक ब्राह्मण" नव्हे. प्रत्त्येक प्राक्रुत शब्दाचे संस्क्रुतीकरण करण्याचा हा छंद बरा नव्हे. शिवाय या शब्दापुढील शिलालेखातील शब्द कालौघात तुटले आहेत त्यामुळे त्यापुढे मुळात काय लिहिले होते हे समजायला मार्ग नाही.) या शब्दाचा अर्थ फारतर "ब्राह्मणांचा संरक्षक" एवढाच घेता येतो, "आपण ब्राह्मण आहोत" असा नव्हे. तसाच घोळ सानेंनी "खतियदपमानदमन" या शब्दाबाबत घातला असून त्याचा अर्थ ते क्षत्रियांचे गर्वहरण करणारा असा लावतात. सातवाहनांनी गर्व उतरवला तो नहपान या शक क्षत्रपाचा पुर्ण पराजय करुन. "खतीय" शब्द येथे क्षत्रियासाठी येत नसून क्षत्रपांना उद्देशुन आहे व ते ऐतिहासिक वास्तवही आहे. 

साने अजुन पुढे जातात व ते म्हणतात  यद्न्य करण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच होता. त्यांचे म्हणने अर्धवट खरे आहे. मुळात ब्राह्मणांना राजसुय व अश्वमेध यद्न्य करण्याची परवानगी मनुस्म्रुती, याद्न्यवक्ल्य स्म्रुती, नारद स्म्रुती अशा अनेक स्म्रुतींनी दिलेलीच नाही. हे यद्न्य फक्य क्षत्रियांसाठीच राखुन ठेवलेले आहेत. बहुदा सानेंनी स्म्रुत्या कधी वाचल्या नसाव्यात, म्हणुन त्यांचा असा घोळ झाला असावा. त्यामुळे सातवाहन ब्राह्मण होते हा त्यांचा बालसुलभ अट्टाहास पुरा होवू शकत नाही. वास्तव हे आहे कि ऐतरेय ब्राह्मणाने औंड्र, पुंड्र, शबर, मुतीब, पुलिंद ई. पन्नास शुद्र जाती दक्षीणेत राज्य करतात असे स्पष्ट म्हटले आहे. महाभारतात याच जमातींना असुर राजा महाबळीचे पुत्र मानलेले आहे. हा समाज पशुपालकच होता. आजचे धनगर/कुरुब/गोपालक हे त्यांचेच वंशज. पेरिप्लसही त्यांचा उल्लेख "आंड्रेई" ( Andarae) असाच करतो. वायु पुराण, मत्स्य पुराण ते अन्य सर्वच पुराणे त्यांना "आंध्र" व काहींना "आंध्रभ्रुत्य" असेच म्हणतात. हे बहुदा सानेंनी पाहिले नसावे. जर सातवाहन ब्राह्मण असते तर पुराणकारांनी तसे स्पष्ट म्हटले असते व त्यांना डोक्यावर घेत महाकाव्येही लिहिली गेली असती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे आंध्र राजे (अर्थात औंड्र सातवाहन) हे वैदिक व्यवस्थेने शुद्रच (अवैदिक) मानले होते असे स्पष्ट दिसते.

दुसरे असे कि सातवाहनांचे नाणेघाट वगळता सर्वच्या सर्व शिलालेख बौद्ध लेण्यांत आहेत. मुळात जवळपास सर्वच लेण्यांची कामे सातवाहनांनीच सुरु केली, उदारपणे देणग्या दिल्या. मग खरे तर त्यांना आपण बौद्ध धर्मीयच ठरवायला पाहिजे. पण तसे कोणी म्हणत नाही. पण फक्त एका "एक बम्हण" शब्दावरुन सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवण्याचा जोर लावत प्रयत्न करायचा हे मात्र अनाकलनीय आहे. सत्य हे आहे कि तत्कालीन सर्वच राजे हे आजच्यासारखे जातीयवादी नव्हते. ते सर्वच धर्मांना उदारपणे सहाय्य करत. त्यामुळे त्यांनी असंख्य लेण्यांना, जैन धर्मियांना मदत केली तशीच वैदिकांच्या समाधानासाठी काही यद्न्यही केले, एवढाच त्याचा अर्थ होतो. "सालाहण" हा शब्द जसाचा तसा नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात आलेला आहे, त्यामुळे सानेंच्या अद्न्यानाधारित कुतर्कावर मी अधिक भाष्य करत नाही. एनकेन प्रकारेन इतिहासातील सर्वच महनीयांना एक तर मारुन मुटकुन ब्राह्मण ठरवायचे किंवा त्यांच्या बोकांडी ब्राह्मण बसवायचे असले असांस्क्रुतिक इतिहास विघातक उद्योग आता तरी बंद व्हावेत. 

आता त्यांनी संस्क्रुतबाबत काही अनैतिहासिक विधाने केली आहेत व ते त्यासाठी ऋग्वेदाच्या काळाचा दाखला देतात व संस्क्रुत भाषा पुरातन आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. संस्क्रुत भाषा ही मुळात प्राक्रुतावर संस्कार करत बनवली गेलेली क्रुत्रीम भाषा आहे याबाबत कोणाही विद्वानाचे दुमत नाही. म्हणजेच प्राक्रुत भाषा याच पुरातन ठरतात. प्राक्रुतचा अर्थच "मुळचा" असा आहे तर संस्क्रुतचा "संस्कारित". आता प्रश्न असा कि संस्क्रुत नेमकी बनली कधी? पहिली बाब म्हणजे संस्क्रुत म्हनता येईल अशा (प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत) भाषेतील पहिला शिलालेख मुळात शक छत्रप रुद्रदामनाच्या काळातील, म्हणजे इस. १६० चा आहे. तत्पुर्वीचे भारतभरचे व्रज, मागधी, पाली, माहाराष्ट्री प्राक्रुत, तमिळ ई भाषांतले शिलालेख इसपु 1000 पासुन आढळतात. संस्क्रुतचा एकही नाही. दुसरे असे कि संस्क्रुतमद्धे ताम्रपट, शिलालेख क्रमश: वाढण्याचे प्राबल्य हे इसच्या चवथ्या शतकानंतरचे आहे व हे सर्व लेख ब्राह्मी (क्वचित खरोष्टी) लिपीतील आहेत. संस्क्रुतची स्वत:ची अशी कधीही लिपी नव्हती. आजही नाही. आज जिला आपण देवनागरी म्हणतो ती मुळची नागरी लिपी असून तिला "देव" हा शब्द उत्तरकाळात चिकटवला गेलेला आहे. ऋग्वेद हा मुळ "पर्शियन" भाषेच्या पुरातन रुपात (अवेस्तन) लिहिला गेला होता. हा धर्म भारतात धर्मांतरांच्या माध्यमातून पसरला. ऋग्वेदाचा भुगोल व भाषेतील दुवे या मताशी मेळ खातात. पुढे बौद्ध धर्म वाढतोय हे लक्षात येताच पाली भाषेचे अनुकरण करत (पाली हीसुद्धा क्रुत्रीम भाषा आहे.) वैदिक संस्क्रुत भाषा क्रुत्रीमपणे सर्वच प्राक्रुत भाषांतील शब्द घेत (अगदी द्रवीडी भाषेतीलसुद्धा) बनवली गेली. उपलब्ध ऋग्वेदातील भाषा  ही पाणिनीय संस्क्रुतची पुर्वावस्था मानली जाते. पाणिनीने सरासरी इ.स. च्या तिस-या शतकात "अष्टाध्यायी" लिहुन संस्क्रुतचे नियमबद्ध व्याकरण बनवले. रामायण, महाभारत, ते सर्वच पुराणे ही पाणिनीच्या व्याकरणाचे नियम पाळत असल्याने त्यांची संस्क्रुत भाषेतील निर्मिती ही पाणिनीनंतरच्या काळातील आहे हेही उघड आहे. मुळ प्राक्रुत ग्रंथांचे संस्क्रुत भाषांतर नंतर केले गेले. आज आढळणारी सर्वच पुरातन मानली जाणारी महाकाव्ये अंतिम संस्कार होवुन तिस-या-चवथ्या शतकातच तयार झाली याबाबतही विद्वानांत कसलेही दुमत नाही. म्हणजेच ती मुळ अन्य प्राक्रुत भाषांत लिहिली गेलेली होती...जशी गाथा सप्तशती, लीलावती, कथासरित्सागर, सिंहासन बत्तीशी इ. दुसरे असे कि संस्क्रुत हा शब्द खुद्द ऋग्वेदापासुन ते तिस-या शतकापर्यंतच्या ग्रंथांत एकदाही येत नाही. तो येतो सर्वप्रथम रामायणात, ज्याचे अंतिम संस्करण चवथ्या शतकात झाले. पाणिनीही "छंदस"चे व्याकरण लिहित होता...तो स्वत:ही आपण संस्क्रुतचे व्याकरण लिहित आहोत असे म्हणत नाही...विपुल बौद्ध व जैन साहित्यातही "संस्क्रुत" हा शब्द येत नाही. 

मग ज्या भाषेला चवथ्या शतकापर्यंत स्वतंत्र नांवही नव्हते ती भाषा पुरातन कशी? असती तर अन्य प्राक्रुत साहित्य जसे आपापल्या भाषांचे अभिमानाने उल्लेख करते तसे संस्क्रुत साहित्यातही घडले असते. सत्य हे आहे कि बौद्धांनी धर्मप्रचारासाठी पाली विकसीत केल्यानंतर वैदिक समाजाने संस्क्रुत भाषा तयार करायला सुरुवात केली. संस्क्रुत ही नितांतसुंदर भाषा आहे हे खरे, पण तिचा काळ कसल्याही स्थितीत दुस-या शतकाच्या पलीकडे जावू शकेल असा एकही पुरावा उपलब्ध नाही. सानेंच्या तर्काने आणि व्रुथाभिमानाने संस्क्रुत साठ हजार काय, सहा अब्ज वर्षांपुर्वीही तयार झाली असू शकेल आणि असे म्हणायला काय जाते? ज्याचे पुरावेच अस्तित्वात नसतात त्याबद्दलच अशी विधाने असू शकतात.

थोडक्यात सातवाहन ब्राह्मण तर नव्हतेच आणि संस्क्रुतचा उदयही त्यांच्या काळात झालेला नव्हता."  

मला वाटते, वरील उत्तर सातवाहनांच्या मुळ स्वरुपावर प्रकाश टाकण्यासाठी पुरेसे आहे. याहून अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही.

सातवाहन सत्ता व महत्कार्य

 सिंधूक अत्य्हवा सिमुख सातवाहनाने काण्वांचे राज्यपालपद धुडकावत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपुर्व २२० मद्ध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याची "बृहत्कथा", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण "लीलावई" या काव्यग्रंथात आले आहे. महाराष्ट्रातील आजचे गिरिदुर्ग ही सातवाहनांचीच निर्मिती. रायगड हा मुळचा सातवाहनांनी बांधलेला किल्ला.


सातवाहन घराण्यात एकुण तीस राजे झाले. सातवाहन हे आगम (शैव) धर्म पाळत होते त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात "आगमाननिलया", म्हणजे आगम प्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नांवे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तीश्री, सिमुख (सं शिवमुख), शिवस्वाती अशी बव्हंशी शिव-शक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नांव येते. एक राणी तर नागणिका (नाग वंशीय) असल्याचेही दिसते.

एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय क्षत्रप नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

 नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.

 परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.'
 शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"

 एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.

 नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. (ज्या साली शकांचे हनन केले तेंव्हापासून सुरु होणारे संवत्सर) या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

हा महान वंश सन २२० पर्यंत सत्तेवर होता. जवळपास ४५० वर्ष या वंशाने राज्य चालवले. आजच्या महाराष्ट्राच्या संस्कतीची बीजे तर रोवलीच पण माहाराष्ट्री प्राकृत साहित्यात स्वत:ही मोलाची भर घालत आजच्या मराठीची पायाभरणी केली. महाराष्ट्र म्हणजे सातवाहन. सातवाहनांच्या काळत लोकांवर धार्मिक बंधने नव्हती. जातींची बंधने मुक्त होती. कोणीही कोणत्याही व्यवसायात जाऊ शके. स्त्री-पुरुषांतही केवढी समता होती हे हालाच्या गाथा सप्तशतीवरुन स्पष्ट दिसते. कररचना सौम्य होती. सातवाहनांनी एवढे किल्ले व नगरे उभारली पण स्वत:चे राहणीमान साधे ठेवले. जुन्नर व पैठण या त्यांच्या दोन राजधान्या. पैठणला त्यांनी जागतिक व्यापाराचे केंद्र बनवले. व्यापारी मार्ग बांधले. बंदरे उभारली. बलाढ्य आरमार उभारले. कुशाण सत्तेला विंध्यापाशीच थोपवून धरले. शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले. आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवाहनाचा भव्य अश्वारुढ पुतळा आहे...एवढेच!

Saturday, November 14, 2015

दहशतवादाच्या मूळ उद्गमाचे काय?


प्यरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

जगातील सर्व दहशतवादी संघटना आणि धर्मांध हिंसक मनोवृत्त्या पुर्णपणे चिरडल्याशिवाय असे नृशंस हल्ले थांबणार नाहीत!
ज्यांनीही अशा दहशतवादी संघटनांना स्वार्थापोटी वाढवले अशा राष्ट्रांचाही धिक्कार. जागतिक समुदायाने अशा राष्ट्रांचीही गय करू नये!

दहशतवादाचा भस्मासूर एवढा वाढण्यामागे प्यलेस्टाइनचे फाळणी करून इझ्राएलची निर्मिती केली व प्यलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला गेला नाही या मुळ कारणात आहे हे कधीतरी लक्षात घेण्याची गरज आहे. अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे हे मी अमेरिकन रेडियोवरुन दोन मुलाखतीतून २००२ साली म्हणालेलो आहे. चेन रिअक्शनमधून तो वाढत गेला. सद्दामला संपवायचे प्रयत्न केले, शेवटी धादांत खोटे आरोप ठेवत, युद्ध लादत त्याला जाहीरपणे फासावर लटकवले. जगाने ती मजा पाहिली. तो दहशतवादाचा कळस नव्हता काय?

सद्दाम हुसेन भरताचा मित्र होता. बांगला देशाला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकशी युद्ध सुरू केले तेंव्हा सर्व आखाते राष्ट्रने भारताला तेलपुरवठा बंद केला होता. अपवाद फक्त सद्दामच्या इराकचा. बांगला देश स्वतंत्र केल्यानंतर त्यला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणरा इराकच सद्दामच होता. आपण पटकन विसरून जातो. पण हे योग्य नाहे. आज इराक उध्वस्त झाला आहे. कोनी केले हे पाप? त्याविरुद्ध आम्ही कोणता आवाज उठवला?

लाखो इराकी-अफगाणी-इराणी निरपराध नागरिक आजवर जे मेले तो दहशतवाद केवढा भयंकर होता! फक्त तो सत्तेकडून झाला, खाजगी संघटनांकदून नाही म्हणून तो दहशतवादच नव्हता कि काय? त्या दहशतवादामागेही धार्मिक प्रेरणा नव्हत्याच कि काय? की सबल करतात तो न्याय आणि दुर्बळांनी प्रत्युत्तर दिले तर तो दहशतवाद? रशियाच्या फौजांशी लढता यावे म्हणून तालिबानला कोणी जन्म दिला?

सर्वप्रथम युरोपियन राष्ट्रांनी आणि अमेरिकेने आपली जागतिक दादागिरी बंद केली पाहिजे, शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांनाचा धंदा वाढायला मदत करणे बंद केले पाहिजे. आणि याकडे मुस्लिम दहशतवाद म्हणून बघत, त्यांच्या धर्मग्रंथांतील हिंसकतेचे तत्वज्ञान पुढे रेटायचे प्रयत्न करत न बसता आधी अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी काय पापे केलीत तेही पहावे व त्यांचाही खुल्या मनाने निषेध करावा. कुराणात जेवढी हिंसेची मुलतत्वे आहेत तेवढीच ती जुन्या करारात आहेत...अगदी नव्या करारातही हे सोयिस्करपणे विसरू नका. आज समजा अरबी राष्ट्रांत इस्लाम नसून ख्रिस्ती सोडून दुसरा कोनताही धर्म असता तरीही हीच स्थिती निर्माण झाली असती याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयसिस ही अमेरिका व इझ्राएलची देणगी आहे. जशी तालिबान अमेरिकेचीच उपज होती. निर्मात्यावरच अखेर उलटणे हा दहशतवादी संघटनांचा अलिखित नियम आहे हे आपण ट्विन-टोवरवरील हल्ल्याच्या संदर्भात पाहू शकतो. रशियाचाही विस्तारवाद अधून मधून डोके वर काढतोच. त्यांची आयसिसविरोधी कारवाई मानवतेच्या दृष्टीकोनातून आहे या भ्रमात जगाने राहू नये.

यात शेवटी मरणार आहेत ती सामान्य माणसे. मानवतेची मुलभूत तत्वे. अमेरिकेने त्यांची कधीच पर्वा केली नाही. कै. नरसिंह रावांनी अमेरिकेच्या संसदेत अमेरिकेला रेड इंडियनांच्या केलेल्या उच्छेदाबद्दल अमेरिकनांना झापत दहशतवादावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार हा प्रश्न विचारला होता. व्हिएतनाम कसे विसरता येईल? दहशतवादाच्या मुळाशी जायचे तर ती महासत्तेच्या राजकारणात आहेत, कोणा धर्मात नव्हेत. प्रत्येक राष्ट्राला सध्या जागतिक नाहीतर प्रादेशिक महासत्तेची स्वप्ने पडू लागलीत. माओवाद्यांच्या भारतातील हिंसाचारामागे चीन असतो. मरतात आमची माणसे. मारतातही आमचीच माणसे. पण हा दहशतवादच नव्हे काय? तेथे तर धर्मही नाही!

वर्चस्वतावाद हा नुसता जागतिक सत्तांच्या संदर्भात नाही. वर्चस्वतावाद अनेक प्रकारच्या दहशतवादांना जन्म घालतो. इतरांना गुलाम करणे, त्यांचे भौतिक स्वातंत्र्य हिरावने अथवा मारुनच टाकणे ही त्याची अपरिहार्य परिणती आहे. हे सगळे थांबवून मानवतेची श्रेष्ठ मुल्ये प्रस्थापित करायची असतील तर सर्वप्रथम ओबामांनीच पुढाकार घ्यावा व अमेरिकेने जगावर आपली सत्ता राबवण्यासाठीचे प्रयत्न बाजुला करावेत. हा माणूस ते करू शकतो. मगच दहशतवादाविरुद्धचा लढा हा मानवी पातळीवर येईल...हिंसकतेच्या नाही. सध्या सर्वच दहशतवादी (मग ती राष्ट्रे असोत कि राष्ट्रप्रणित संघटना) मानवता आणि मुल्यांबद्दल बोलण्याची योग्यता हरपून बसले आहेत. वर्चस्वतावादाने सर्वांना पछाडले आहे. प्रत्येकजण दुस-यावर कुरघोडी करण्याच्या नादात द्वेषाचा आधार घेतो आहे.

आज समोरासमोर युद्धे करायचा काळ संपला आहे हे जागतिक सत्तांच्या लक्षात आले आहे. दहशतवादी कारवाया या वेगवान व अधिक परिणामकारक ठरत असल्याने राजकीय सत्ता दहशतवादी गटांनाच हाताशी धरून या नाहीतर त्या देशात हिंसाचार घडवतात हा इतिहास व वर्तमान आहे. धर्माची लेबले त्यांना दिली कि विशिष्ट धर्मियांबाबतचा जागतिक नागरिकांचा द्वेष वाढतो व जे खरे या कृत्यांच्या पाठीशी आहेत त्यावर मात्र चर्चा होत नाही. आपल्याला दहशतवादी घटनांकडे पहायचा दृष्टीकोण बदलावा लागेल.

हे सगळे थांबायचे असेल तर राष्ट्रांनाच बदलावे लागेल. "महासत्ता" हे बिरुदच मुळात मानवी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांचे समर्थक पाहिले तर त्यात पाकचा कमी, अनेक राष्ट्रांचा हात दिसेल. हा सारा लढा जगावर स्वामित्व कोनाचे यासाठीचा आहे, त्याकडे तुकड्यातुकड्यात घडत जाणा-या अमानवीय हिंसेच्या घटनांतुन पाहून चालणार नाही!


Friday, November 13, 2015

टिपू सुलतानाबद्दल





टिपू सुलतानाबद्दल इतिहासातून जे दिसते ते असे:

१) १७८० मद्ध्ये पोल्लिलुरच्या युद्धात टिपूने इस्ट ईंडिया कंपनीच्या कर्नल बेलीचा निर्णायक पराभव करून युद्धात जवळपास २०० इंग्रज तर २८०० नेटिव्ह सैनिक ठार मारले. हा पराभव एवढा भिषण होता की बेलीला मदत करायला निघालेल्या सर मन्रोला आपला तोफखाना आहे तिथेच सोडून मद्रासला परत फिरावे लागले.

२) डिसेंबर १७८१ मद्ध्ये त्याने ब्रिटिशांकडून कित्तूर जिंकुन घेतले.

२) १७८२ मद्ध्ये कर्नल ब्रेथवेटचा तंजावरजवळ पराभव केला. टिपुने त्यांच्या सा-या तोफा ताब्यात घेतल्या व जिवित सर्व सैनिक व अधिका-यांना कैद केले. हा इंग्रजांचा भिषण पराभव मानला जातो.

४) ६ डिसेंबर १७८२ ला त्याचे वडिल हैदर अली वारले. टिपू हा म्हैसुरच्या गादीवर आरुढ झाला. यानंतर त्याने इंग्रजांना रोखण्यासाठे मराठे व मोगलांशी आघाडी बांधायचा प्रयत्न सुरु केला.

५) १७८३ मद्ध्ये इंग्रजांनी कोईमतूर जिंकून घेतले तर टिपुने त्यांच्यापासुन मंगलोर जिंकून घेतले. या दिर्घकाळ चाललेल्या युद्धात कोणाच्याही पदरी फारसे पडले नसले तरी मंगलोर तह झाल्याने टिपुची सरशी झाल्याचे मानले गेले व त्याचे महत्वही वाढले. या तहाने इस्ट इंडिया कंपनीचे दिवाळे वाजेल या भितीने या कंपनीचे शेयर्स लंडनमद्ध्ये कोसळले. या मंगलोर स्वारीनंतर टिपुने या भागातील सुमारे साठ हजार सिरियन ख्रिश्चनांना मुस्लिम बनवले असे ब्रिटिश रेकार्ड सांगते.

६) तंजावरच्या युद्धात टिपू व हैदर अलीने त्या प्रदेशात अनन्वित अत्याचार केले असे ब्रिटिश नोंदवतात. या दोघंनी तो प्रदेश दरिद्री करून सोडला. अर्थव्यवस्था कोसळवली. कल्लान (अथवा कल्लार) या जमातीच्या लोकांनीही याच काळात स्थितीचा फायदा घेत या भागात खूप लुट केली होती हे मात्र सहसा सांगितले जात नाही.

७) हैदर अलीने सुरू केलेली सार्वजनिक बांधकमे (उदा. लालबाग) टिपुने पुर्ण करत अनेक रस्ते, नव्या वसाहती व सार्वजनिक इमारतींचे बांधकम हती घेतले. व्यापार वाढीसाठी प्रयत्न करत कर्नाटकाला एक औद्योगिक राज्य म्हनून उभे करायचे प्रयत्न सुरू केले. श्रीलंका, ओमान, फ्रांस ते इराणपर्यंत व्यापार पसरवला.

८) तो रोकेट तंत्रज्ञानाचा जनक तर मानला जातोच पण अनेक यांत्रिक क्लुप्त्या असलेल्या वस्तू त्यांने बनवून घेतल्या. त्यात ब्रिटिशावर आरुढ झालेला यांत्रिक संगीत-वाघही आहे. व्यवस्थापन, शेतसारा वगरेतही त्याने सुधारणा घडवल्या व म्हैसूर रेशीम उद्योग भरभराटीला आणला.

९) मराठे आणि हैदर अलीमद्ध्ये १७६७ पासून संघर्ष होताच. मराठ्यांनी त्याचा पराभवही केला होता. हैदर अलीला "नबाब" ही पदवी माधवराव पेशव्यानेच दिली होती. पण पुणे-म्हैसुरमधील करार उभयक्षी पाळला गेला नाही. टिपुने मराठ्यांचे दक्षीणेकडील किल्ले ताब्यात घेतले. याचा परिणाम म्हणून त्याच्यावर मराठ्यांची स्वारी झाली व तुंगभद्रेपर्यंतचा प्रांत १७८६ मद्ध्ये मराठ्यांच्य ताब्यात गेला. त्यांच्यत मग पुन्हा करार होऊन मराठ्यांना त्यांच्या पुर्वी ताब्यात असलेला प्रदेश देवून खंडनीही देण्याचे टिपुने मान्य केले.

१०) मोगल दरबार आणि निजामाशी त्याने आधी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण १७८८ मद्ध्ये बादशहाला आंधळे केले गेल्याने तोच दुर्बळ झाला, मराठ्यांकडुनही त्याला धोका दिसू लागला. इंग्रज त्याच्याविरुद्ध नव्या आघाड्या उघडायच्या प्रयत्नांत होतेच. निजामाशी त्याचे संबंध कधी चांगले तर कधी वाईट असे तळ्यात-मळ्यात राहिले. त्यानंतर त्याने झमानशहा दुर्रानी या अफगानी शासकाशी ब्रिटिश व मराठ्यांविरुद्ध मदत मागणारी पत्रे पाठवायला सुरुवात केली. पण दुर्रानी स्वत:च पर्शियनांशी संघर्षात गुंतला असल्याने त्याला मदत केली नाही. इस्तंबूल येथे वकिलात स्थापन करुन ओटोमन सुलतानला त्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सैनिकी तुकड्या पाठवायची विनंती केली. पण रशियाविरुद्धच्या युद्धात खुद्द ओटोमन साम्राज्यालाच ब्रिटिशांची गरज असल्याने तेथुनही त्याला मदत झाली नाही.

१०) १७८९ मद्ध्ये टिपुने मलबारवर स्वारी केली. पण त्रावणकोरने कडवा प्रतिकार केला. पुरांनीही टिपुला अडचणीत आणले. त्यात त्रावणकोरच्या राजाने इंग्रजांचे मदत मागितल्याने इंग्रजांनी श्रीरंगपटनमवर स्वारी केली. टिपू श्रीरंगपटनमच्या दिशेने रवाना झाला. पण मलबारमद्ध्ये मुळात टिपुला निर्णायक विजय मिळाल्याचे दिसत नाही. तरीही त्याने या स्वारीच्या काळात त्याने मलबारी प्रजेवर अनन्वित अत्याचार केल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. नायर या लढवैय्या जमातीवर विशेष करुन जास्त अत्याचार झाले. किमान चार लाख हिंदूंना मुस्लिम बनवल्याची माहिती स्वत: टिपुच आपल्या १९ जानेवारी १७९० च्या पत्रात देतो. येथेच तिसरे Anglo-Mysore युद्धाची सुरुवात झाली. लोर्ड कार्नवालिसने निजाम व माराठ्यांसोबत टिपुविरुद्ध आघाडी उघडली. १७९० मद्ध्ये कोईमतुर पर्यंत आघाडीने ताबा मिळवत आणला. १७९१ मद्ध्ये बंगलोरही त्यंच्या ताब्यात गेले व श्रीरंगपटनमच्या दिशेने प्रस्थान ठेवले. टिपुने या सर्व बाजुने घेरल्या गेलेल्या आघाड्यांपासून प्रतिकार करण्यासाठी दग्दभू धोरण स्विकारले. या धोरणामुळे कार्नवालिसने संत्रस्त होऊन बेंगलोरचा ताबा सोडला. पण मराठ्यांचे अन्यत्र हल्ले चालुच होते.

याच काळात (१७९१) परशुराम भाऊने म्हैसुर लुटत शृंगेरी मठावरही हल्ला चढवला. मठाची संपत्ती लुटली आणि आदि शंकराचार्यांच्या मंदिरालाही क्षती पोचवली. टिपुची शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना पाठवलेली कन्नड भाषेतील ३० पत्रे उपलब्ध आहेत. त्याने दिलेल्या देणग्यांचाही तपशिल उपलब्ध आहे.

या युद्धात पराभव दिसू लागताच टिपुने तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. अर्धे राज्य सोडून देण्याच्या व तीन कोटी रुपयांच्या खंडणीच्या अटीवर हा तह झाला. खंडणे जोवर देत नाहे तोवर आपले दोन मुलगे ओलीस म्हणून ठेवायलाही तो तयार झाला. पुढे त्याने दोन हप्त्यात ही रक्कम भरली व आपल्या मुलांना सोडवले.

११) शेवटी टिपुने १७९४ पासून फ्रेंचांशी संधान बांधायला सुरुवात केली. इंग्रज हे त्यांचेही शत्रू होते. त्यामुळे ही युती झाली तरच इंग्रजांशी लढता येईल असा त्याचा कयास असावा. नेपोलियन (तेंव्हा हा सम्राट बनला नव्हता) पण त्यानेही टिपुला १७९८ मद्ध्ये पत्र पाठवले व दोघांचा एकच शत्रु असल्याने आघाडी करायला मान्यता दिली. त्याने इंग्रजांशी लढायलाही, इजिप्त मोहिम संपल्यावर १५००० चे सैन्य टिपुला मदत करायला पाठवण्याचे ठरवले. पण हे पत्र मस्कत येथेच ब्रिटिश हेराच्या हाती लागले. ते टिपुपर्यंत पोहोचले नसले तरी नेपोलियन आणि टिपुमधील संभाव्य मैत्रीचा धोका दिसल्याने ते जास्तच काळजीत पडले व त्यांनी टिपुविरुद्ध आजवरची सर्वात मोठी मोहिम हाती घेतली.

१२) १७९९ मध्ये आर्थर वेलस्ली सहित तीन इंग्रज सेनाधिक-यांनी २६०००, निजामाचे १६,००० आणि मराठ्यांचे ७-८००० सैन्य श्रीरंगपटनवर चालून गेले. या युद्धात टिपुचा अंत झाला.

१३) टिपुने ७०० अय्यंगारांना दिवाळीच्या दिवशी निर्दयतेने मारले असे मानले जाते. मांद्यन अय्यंगार आजही दिवाळी त्यामुळे साजरी करत नाहेत असे म्हणतात. खरे तर इतिहासात कोठेही ही घटना अथवा तिची तारिख अथवा वर्ष नोंदले गेलेले नाही. डा. एम ए जयश्री व डा. एम ए नरसिंहन यांनी अलीकडेच एक पेपर प्रसिद्ध करून या दंतकथेवर, ज्याला इतिहासात कोठेही स्थान मिळालेले नाही, प्रकाश टाकला तेंव्हा टिपुवरील या आरोपाने उचल खाल्ली. या पेपरमध्ये उभय संशोधकांनी म्हटले आहे कि हे अय्यंगार म्हैसुरचे प्रधान तिरुमलैंगार यांचे नातेसंबंधी होते. हे घटना काल्पनिक नसून सत्य आहे. म्हैसुरची राणी लक्ष्मीअम्मा हिने आपले राज्य परत मिळवण्यासाठी हैदर अलीशी संघर्ष सुरु ठेवला. त्यासाठी १७६० मद्ध्ये तिने इंग्रजांशी संधान बांधायला सुरुवात केली. त्यात वोडेयार राजांचा माजी प्रधान तिरुमलैंगार (याचे नांव इतिहासात कोठेही येत नाही. हैदर अलीशी संघर्ष खंडेरावाने केला! त्याचा पराभव केल्यानंतरच हैदर अली शासक बनला!) याने तिला मदत केली म्हणून हे अय्यंगारांचे हत्याकांड टिपुने केले असे लेखकद्वय म्हणते. याबाबत इतिहासात कसलाही पुरावा नाही, हे प्रकरण दडवले गेले असाही आरोप आहे. आपण तरीही घटकाभर हे प्रकरण खरे मानुन चालू.

टिपुचा जन्म १७५० सालचा. वरील घटना १७६० किंवा ६१ ची. म्हणजे ही घटना घडली तेंव्हा टिपू १०-११ वर्षांचा होता. हे हत्याकांड त्याने कसे केले? शिवाय याच वर्षी हैदर अली स्वत:च्या अस्तित्वासाठी वोडियारांशी लढाया करत होता. वोडियारांचा सेनापती खंडेरावाचा पराभव केल्यानंतर हैदर अलीने म्हैसुरवर आपली सत्ता कायम केली व सर्वच विरोधकांना, त्यात खंडेराव व राजघराण्यातील लोकही आले, कैदेत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले.
अय्यंगार हत्याकांडाची घटना इतिहासात अथवा कोणत्याही साधनात नोंदली गेलेली नसून एका दंतकथेला काल्पनिक आवरणे चढवत का पेश करावे यावर वाचकांनीच वरील सर्व घटनाक्रमावरुन विचार करायचा आहे व टिपुचे मुल्यमापन करायचे आहे.

मराठी विश्वकोश टिपुचे मुल्यमापन करतांना म्हणतो, "काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता; परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे." इंग्रजांनी त्यांचे जेही शत्रू होते त्यांना बदनाम करण्याची संधी सोडली नाही. आणि त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे.

शासकाचा धर्म, त्याचे शत्रू आणि राज्यविस्ताराची धोरणे पाहुन तत्कालीन राजांचा विचार करावा लागतो. अन्यायाच्या व लुटालुटीच्या बाबतीत कोणी मागे नव्हते. धर्मांतराचा इतिहास खूप जुना आहे. तसाच सौहार्दाचाही इतिहास आहेच. शुजाने पानिपत युद्धानंतर स्वत: खंडण्या भरुन असंख्य हिंदू सैनिक व सरदार कैद्यांना सोडवले होते. अशी सौहार्दाची असंख्य उदाहरणे देता येतील. निजाम मुस्लिम असुनहे हातात हात घालून टिपुवर चालून जातच होता, ते सत्तेपायी. टिपुने सरसकट हिंदूंवर अत्याचार केलेले नाहीत. तशा नोंदी उपलब्ध नाहीत. ब्रिटिशांशी त्याचा संघर्ष सत्तेत ते स्पर्धक झाल्याने होता. त्यामुळे तो स्वातंत्र्य लढा होता असे काही म्हणतात तेही चुकीचे आहे. तो एक चांगला, प्रशासनावर पकड असलेल्या, काही प्रमानात सुधारणावाद जपणारा महत्वाकांक्षी योद्धा राजा होता एवढेच!

खरे तर शासनाने कोणत्याही विगतातील राजा-महाराजांच्या जयंत्या सरकारी पातळीवर साज-या करू नयेत. एका राज्याचा हिरो दुस-या राज्यांचा खलनायक असण्याचीच शक्यता अधिक. लोकांना त्यांनी कोणाचे उत्सव साजरे करायचेत याचे स्वातंत्र्य द्यावे. स्वत: त्यात पडू नये. टिपू मुस्लिम होता म्हणून हा वाद जास्त चिघळला हे तर वास्तवच अहे. धर्मांध शक्तींचे सध्याचे उमदळून येणेही तेवढेच विघातक आहे.


Tuesday, November 10, 2015

ही नरकासुराची कथा!

महात्मा बळीची कथा जशी धुसर करत नेली गेली तशीच नरकासुराचीसुद्धा गत आहे. नरकासुराची कथा अवतरते महाभारतात व नंतर विस्तृत स्वरुपात हरीवंशात. आधी आपण नरकासुराच्या उपलब्ध काहे कथांचा आढावा घेऊ!

भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने १६००० स्त्रीया (अथवा राजकन्यांना) पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णुकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांनाही वरदान दिले. नरकसुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला असेल याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?

कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. कृष्णाने पाठोपाठ गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षोहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापुर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला कि आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दिपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.

याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक पण थोडी वेगळी कथा येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.

नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रीयांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या स्त्रीया (किंवा राजकन्या) कोणाच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारंण नरकासुराने (हे कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा मुद्दाम बनवण्यात आली हे उघड आहे.

ही झाली पुराणकथा. शाप-वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. ते ऐतिहासिक मानता येत नाही.

कृष्णाचे म्हणावे तर आईच्या बाजुने तोही असुरच होता. पित्याची बाजू स्पष्ट होत नसली तरी तीही असुरच असण्याची शक्यता आहे. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व त्याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी त्याने तसे वरदानच मागितले होते अशा स्पष्टीकरण कथा बनवल्या गेल्यात हे उघड आहे.

प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या  दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत.

म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध जोडणे अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.

म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दिर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. म्हणजे तो पृथ्वीचा सम्राट नव्हता. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ . त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.

दुसरे असे कि व्रतराजामद्ध्ये नरकचतुर्दशी या काम्य व्रताची माहिती येते. हाही अत्यंत उत्तरकालीन व्रते सांगणारा ग्रंथ असला तरी यात नरक चतुर्दशीला नरकासुराच्या नांवाने दिवे लावत, व्रतकर्त्याच्या कुलात जेही कोणी अग्नीत दग्घ होऊन मेले असतील वा जे अदघ्धच राहिले असतील या सर्वांना परगती मिळो अशी प्रार्थना चूड पेटवून करावी असे म्हटले आहे. या व्रताची सांगता शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देवून करावी असेही म्हटले आहे. या व्रतात नरकासुराची कोणतीही कथा सामाविष्ट नाही.

नरकासूराचा संबंध "नरक" या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात "नरक" या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्कानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये "क" म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू "काश" धातुपासून अर्धांग का घेतले तर.)
नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक...म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले?

L Renou यांनी "वैदिक निऋतीतून निर्रया - निर्रका- नारक- नरक असा प्रवास झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. ("Language of the Nirukta" तळटीप -मंत्रीनी प्रसाद) पण ही व्युत्पत्ती निरर्थक अशीच आहे. निऋतीवरून नैऋत्य दिशेचे नांव आले असे म्हटले जाते पण नरकासुराच्या राज्याची दिशा ती नाही. तर या शब्दाची व्युत्पत्ती अनिश्चित असल्याचे "Pali-English Dictionary" (Thomas William Rhys Davids, William Stede) एवतेव नरक हा शब्द मुळचा वैदिक दिसत नाही तसेच त्याचा अर्थही आज घेतला जातो तसाच मुळचा असण्याची शक्यता नाही.

थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, अशी व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो...नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. 

Monday, November 9, 2015

Liberate yourself first!

From millenniums we have been taught to be a slave, either of religion, state or community! We have been so used to the slavery that we think being in slavery is our freedom. Politically too, no matter who are in the power, indigenous or foreign, we always were oppressed pawns! The degree of oppression varied but it didn’t vanish. We are told that there was golden age in remote past in India, but the social history contradicts this claim. It could be a golden age for some, not for the common people!


We the Indians believe that the conditions of present pitiable life are product of the sins committed in past life and thus faithfully have been living it without protests. The ruling or rich or religious classes, we thought, must have accumulated many righteous acts in their past life; hence protesting them too was a sin! Rather, not questioning the system was only righteous act that was expected from us! They used the tactic to make their life comfortable at the cost of common people!

This idea was greatest invention of India that helped tyrants to rule the masses incessantly without any need to wield the weapons or using the forces! The slavery was accepted as part of their destiny. There obviously was no need to search for optional political ideologies to strengthen the rule or oppose the rule. Priestly and political class worked hand in hand. The doctrine was rooted so much so that the people accepted most obediently the plight of their present life. Saints too were no exception. Nobody bothered for the salvation from the slavery of present material life. They all eyed on the salvation after death! There were protests long ago in the remote past to this evil thought, but they were systematically diluted in course of the time, so much so that they became distant unrealistic mythical memory!

Today, though we think we are free, our state of mind remains still unchanged. The political freedom too, which we think we have, is not the freedom in its true nature. Rather our freedom is an illusion! Our overall thinking process still works as same as it was working during the pre-independence era and in the times the feudal system had become basis of our society. It did happen simply because, since we never knew that we are been made volunteering slaves, and we loved it, there was no question to think of overthrowing the yokes of slavery forced upon us by our overall system.

Let us have a look at how the slavish mentalities still keep on haunting our life! To overthrow Vedic social system of inequality, we tried to find system of equality without abandoning the basic philosophy of inequality. Rather, what such people did was they changed their idols. They changed their scriptures and embraced the books written by the eminent personalities those were born in their caste! They changed their salutations. They nourished hatred against so-called upper class and other equivalents as well to establish their own supremacy. They too became propagandists the way so-called religious tyrants were. They too desperately fell in quest for searching of their own identities in remote past in some clans and clung to it. They also started to write the history that was suitable to their purpose. They did not think their idols of recent past too have become outdated as the knowledge and thoughts too keep on moving forth! The defeat of progressive movement was marked as soon they too followed the same rout, falsely thinking they were leading the path of freedom!

This was no different than what religious fanatics were doing! RSS all the time kept on harping of the tyranny of Islam rule thus teaching hatred to the people they thought are Hindu’s. They always spoke highly about the so-called Veda’s and infinite science loaded in it! They too embarked on a mission to rewrite history that could satiate their egos to boast of rich legacy of the past! The legacy of the only selective section of the Indian society!

In a way, we can say that this is a process of making people slaves of the past, slaves of the idols and slaves of the false identities! The master might have changed, but slavery did rule, same way as it were in the past, in different forms!

Religion, history and languages are the major tools in the hands of the people those want to be enslaved and to enslave people! Let us not forget, creating inferiority complex in some segments of the society is form of forcing slavery, no matter what mean is used! Inferiority does not allow any scope for equality! But, however, we find that all the sections of society, to establish their pseudo identities, are in quest of attaining and forcing the slavery of its worst kind!

The pity is slaves of the past try to find their self in false glory of the past. Indians have forgotten that the history did not take its course for their present convenience. History is history and it has to be evaluated without forcing present relevance’s and prejudices upon it!  History is not for anybodies convenience. But we are using the history as a tool. We are using languages too as a tool to boast of some section’s superiority over others! Language, to be brief, cannot be an invention of some isolated group of the people and taught to others. It is always a collective process. Still such philosophies are in wide circulation and commoners fall prey to them!

We need to liberate ourselves from such inhuman philosophies of the history and political sciences those are created to throw us in crevice of slavery! This is a quest in which slaves attempt desperately to make other slaves. But the fact remains, none is free. Falsehood doesn’t lead mankind anywhere. 

The problem is with our slavish mentality. Problem is with what we really think of the liberty. Problem is with our viewpoint as to how we look at our own life. Problem is with our lack of wisdom!

The process of liberation begins from We the individuals.  Unless we know what the liberty is in its real sense, mark it, we are destined to be eternal slaves of the circumstances. Many a time’s slavery is convenient because it gives false pleasure! But ultimately it swallows your freedom and forces you to be silent even if you might want to speak out sometime! Unless you are free from self-imposed slavish mentality, you will never find true political freedom!

What we aim at? We aim at the true freedom! We aim at true wisdom. We want to open the path of awakening of every self. Political freedom begins with the individual’s freedom. The freedom is from the religious tyranny, freedom from the clutches of falsely glorified history. Freedom from inferiority complex! Freedom to be an individual of own estimates.

This is all about liberty! Present politics is devoid of such liberty because they too want to use you as mere slave. They don’t want you to be an independent thinker. The independent voices are always suppressed. We don’t want our nation full of the people where individuality is at stake and risk!

When I say about liberty, I just mean to say, liberate yourself first, only then you can liberate the world around you!


वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...