Monday, February 28, 2011

कदमांची कुळकथा!

कर्नाटकातुन कदंब राजवंश इ.स. ३५० ते ५२५ पर्यंत राज्य करत होता हे सर्वांना माहितच आहे. त्यांच्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रही सामील होता. बनवासी नंतर हंगळ आणि गोव्यातही त्यांनी पाय रोवले. या कदंब राजवंशाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती अनेक शिलालेखांतुन मिळते. शिवशंकराचा स्वेद कदंब व्रुक्षावर पडला व त्यातुन त्रिलोचन कदंब (वा मयुरशर्मा) या आद्य राजपुरुषाचा जन्म झाला अशी पुराकथा येते. जन्मता:च त्याला तीन नेत्र आणि चार बाहु होते असेही ही पुराकथा सांगते. अन्यही काही पुराकथा आहेत, आणि त्याही शिव-पार्वतीपासुनच या वंशाचा जन्म झाला असे सांगतात.

या राजवंशातील मयुरशर्मा कदंबच्या नावामागे "शर्मा" हे पद असल्याने तो ब्राह्मण असला पाहिजे असे काही इतिहासतद्न्य मानतात. महाराष्ट्रातील अजय मित्र शास्त्री आणि वि. भि. कोलतेही ब्राह्मण मुळाचे समर्थक आहेत. पण हाच प्रकार त्यांनी खुद्द सातवाहनांबद्दलही केला आहे आणि ते अत्यंत चुकिचे आणि अनैतिहासिक कसे आहे हे मी अन्यत्र स्पष्ट केले आहे.

मयुरशर्म्यानंतरच्या सर्वच कदंब राजांनी मात्र "वर्मा" हे उपपद घेतले आहे व ते क्षत्रियवाचक आहे. (उदा. मयुरशर्म्याचा पुत्र कंगवर्मा). इतिहासात अनेक क्षत्रिय राजांनीही शर्मा हे उपपद लावल्याचे दिसते त्यामुळे शर्मा-वर्मा यातुन जात-वर्ण शोधणे चुकिचे आहे....तसेच ब्राह्मणाने राजपद धारण केले तरी आपला वर्ण सोडल्याचे एकही उदाहरण इतिहासात मिळत नाही. श्रुंग घराणे या द्रुष्टीने पहावे. थोडक्यात कदंब ब्राह्मण नव्हते...तसेच वर्णाश्रमधर्मानुसार क्षत्रियही नव्हते. ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासातील प्रत्येक महत्वाचा राजवंश हा ब्राह्मणच होता हे सिद्ध करण्याच्या नादात अनेक ऐतिहासिक सत्ये दडवली आहेत. त्यांचे म्हनने खरे असते तर आजचे सारे कदम ब्राह्मण असायला हवे होते किंवा काही ब्राह्मणांची आदनावे कदंब/कदम असायला हवी होती. पण तसे चित्र नाही.

कर्नाटकातील हे कदंब राजघराण्याशी आजच्या महाराष्ट्रातील कदमांशी सर्वस्वी पुर्णपणे संबंध जोडता येत नाही, हेही तेवढेच खरे, पण कदंब व्रुक्ष देवक माननार्या समाजातच कदंब राजवंश जन्माला आला, त्या अर्थी कदंब जनसमुहाची व्याप्ती फार मोठी होती हे स्पष्ट दिसते. कदम हे आडनाव "कदंब" या व्रुक्षाशी निगडीत आहे, हे स्पष्ट आहे. कदंब व्रुक्ष हा सिंधु काळापासुन पवित्र मानला गेला आहे. भारतातील अनेक पुरातन मानवी समुदायांचे हा व्रुक्ष देवक असुन तो अति पुजनीय मानला गेला आहे. भारतातील अनेक आडनावे ही देवक प्रथेतुनही निर्माण झाली आहेत हे येथे लक्षात ठेवायला हवे. खुद्द कर्नाटकात कदंबु नावाची एक लढवैय्या जमात आहे.

कदंब देवक असलेल्या, शिवापासुन आपली उत्पत्ती झाली असे मानणार्या मानवी समुदायाने आपले आडनाव "कदम" ठेवणे संयुक्तिकच आहे. पण सारेच कदंब कुलीन कदमच आडनाव लावतात असे नाही तर त्यातही कालौघात बदल घडलेले आहेत. काजळे, कळंब, भसे, हिरे ही काही उदाहरणे आहेत. हेही मुळचे कदंबच आहेत. हे बदल घडण्याची कारणे तत्कालीन समाजस्थितीत शोधावी लागतात.

कदम ही पुरातन काळापासुन एक लढवैय्या जमात राहिलेली आहे. अगदी पानिपत युद्धापर्यंत त्यांचा नावलौकिक कायम राहिलेला आहे. खानदेशातील कदमबांडे हेही याच जनसमुदायातील आहेत.

कदम मंडळी पुर्वी वर्णव्यवस्थेत नव्हती. ती कट्टर शैव असुन तुलजाभवानी, खंडोबा अशा अवैदिक देवतांचे भक्त राहीले आहेत...किंबहुना त्यांची कुळदैवतेही हीच आहेत. कदंब राजवंशातील काही राजांनी अश्वमेध यद्न्य केला आहे हेही खरे आहे, पण तत्कालीन परिस्थितीत राजे ब्राह्मणांसाठी य्द्न्यही करीत, विहारांनाही देनग्या देत आणि जैनांनाही मदत करत. यद्न्य केला म्हणुन त्यांना वैदिक ठरवले तर ते त्याच वेळीस बौद्धही होते आणि जैनही होते असे मान्य करावे लागते. त्यांना क्षत्रियत्व कधीच बहाल केले गेलेले दिसत नाही. (जसे भोसले कुळालाही केले गेले नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वैदिक नव्हे तर पुराणोक्त पद्धतीने झाला होता. संदर्भासाठी पहा ..."गागाभट्टीय" कारण गागाभट्टाने वरकरणी महाराजांना क्षत्रिय मानले असले तरी प्रत्यक्षात त्याची क्रुती ही त्यांना शुद्रच ठरवणारी होती. वेदोक्त राज्याभिषेक हा ऐतरेय ब्राह्मणातील विधींनुसार करावा लागतो...प्रत्यक्षात त्याने व्रात्यस्तोम विधी सोडला तर अन्य विधी पुराणोक्त पद्धतीनेच केले. यावरुन होणारा बोध म्हनजे कदम्ब वंशीयही ब्राह्मण तर सोडाच कधीच क्षत्रीयही मानले गेले नव्हते...आणि त्याचा काहीएक फरक पडत नाही...दैवायत्त कुले जन्म: मदायत्तंच पौरुषम" हेच काय ते खरे.

पुर्वोक्त एका लेखात मी आजचा मराठा समाज हा अनेक वंशांच्या मिश्रणातुन तयार झाला आहे असे म्हटले आहे. कदंब आणि अन्य राजघराण्यात विवाह झाले आहेत हे मी शिंद राजवंशाच्या संदर्भातही दाखवुन दिले आहे.

कदमही मुळचे उत्तरेचे आहेत काय असा प्रष्न (जसा शिंद वंशाच्या संदर्भात विचारला गेला आहे) पडणे स्वाभाविक आहे...पण ते वास्तव नाही. तसे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. पुराणकथा सर्वस्वी आहेत तशा स्वीकारता येत नाहीत. तत्कालीन बव्हंशी सम्राट उत्तरेकडचे असल्याने आपलेही मुळ उत्तरेकडे दाखवण्याच्या नादात ही गफलत झालेली दिसते.

या संदर्भात कोणाकडे अजुन काही उपयुक्त माहिती असल्यास अवश्य पाठवावी ही विनंती.
MOb: 9860991205

Saturday, February 26, 2011

शिंदे आडनावाचा इतिहास

सातवाहनांवर संशोधन सुरु असता मी नाणी, शिलालेख ते ताम्रपट सध्य अभ्यासत आहे. त्यातुन अनेकदा खुपच रोचक माहिती पुढे येते. काही आडनावांचेही मुळ समोर येत असुन जातीव्यवस्थेबाबतही काही उलगडे होत आहेत. यापैकी "शिंदे" ह्या आडनावाबद्दल:

आपल्याला महारष्ट्रातील बरेच राजवंश माहित नसतात. यापैकीच एक राजवंश म्हनजे "शिंद" राजवंश. या वंशाची सुरुवात सन ३३० च्या आसपास झाली. ते नागवंशी राजघराणे होते व या वंशातील राजे स्वता:स "फणींद्र" असे संबोधन लावत असत. फणींद्र म्हणजे सर्पांचा राजा. या शिंद राजघराण्याचा प्रथम उल्लेख प्रथम चंद्रवल्ली शिलालेखात येतो. सन ८०५ च्या नेसरी ताम्रपटातही येतो. नेसरी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. या घराण्याचे उल्लेख/इतिहास वर्णणारे अनेक शिलालेखही विविध ठिकाणी सापडले आहेत. यावरुन कळणारी माहिती अशी:

१. या घराण्याचा आद्य पुरुष अजानुबाहु शिंद असे असुन त्याचा जन्म सेंद्रक प्रदेशातील अहिछ्त्र गावी झाला.(अही म्हनजे नाग). सेंद्रक प्रदेश हा कर्नाटकातील म्हैसुर प्रांतात होता. त्याचे लग्न कदंब वंशातील राजकन्येशी होवुन त्याला तिच्यापासुन ३ मुले झाली. त्यांनीच शिंद राजवट महाराष्ट्रात येवुन सुरू केली.

२. या राजवंशाच्या तीन शाखा झाल्या व त्यांच्या द्न्यात असलेल्या राजधान्या जुन्नर, कर्हाटक (आजचे क-हाड), तसेच सिंदवाडी (बेल्लारी जिल्हा) येथे होत्या.

३. या राजघराण्याने जवळपास ३३० ते इ.स. १००० पर्यंत कधी स्वतंत्र तर कधी राष्ट्रकुटादि बलाढ्य राजांचे मांडलिक म्हणुन सत्ता गाजवली.

४. या राजांच्या ध्वजावर नागचिन्ह असुन ते स्वत:स नागवंशोद्भव म्हनवत.

५. हे सर्वच राजे कट्टर शिवभक्त असुन आपल्या वंशाची सुरुवात शिव आणि सिंधु नदीच्या मिलनातुन झाली असे मानत असत.

६. या शिंद राजांनी महाराष्ट्र ही आपली कर्मभुमी बनवली त्यामुळे बहुसंख्य शिंद महाराष्ट्रात आले असे दिसते.

७. महाराष्ट्रातील सर्वच शिंदे आडनावाची घराणी ही याच शिंद राजवंशाशी निगडीत आहेत असे मानता येते.

असे असले तरी, सर्वच शिंदे एकजातीसमुह म्हणुन राहीलेला दिसत नाही. सध्याचे मराठे, ओ.बी.सी. ते दलितांत शिंदे हे आडनाव आढळते. म्हणजे एकच वंश विविध जातींत वाटला गेल्याचे वरकरणी चित्र दिसते. त्यामागील कारणांचा विचार करणे अगत्याचे आहे कारण त्यामुळे जातीव्यवस्थेत एखाद्या वंशाचे कसे विभाजन घडु शकते हे लक्षात येइल.

१. इ.स. १००० पर्यंत तरी हा राजवंश कोणत्या-ना-कोणत्या स्वरुपात सत्तेत होता याचे पुरावे लेख, ताम्रपट ते शिलालेखांत आहे. सन ३३० ते १००० या काळात शिंद लोकांची जनसंख्या वाढणे अपरिहार्य आहे.
२. सर्वच राजे असु शकत नाहीत, त्यामुळे काही जमीनदार, वतनदार बनले असावेत.
३. कालौघात काही अन्य व्यवसायांत पडल्यामुळे त्या त्या व्यवसायांवरुन त्यांच्या वेगळ्या जाती बनणे सहज स्वाभाविक आहे.
४. सामाजिक कारणांमुळे, तत्कालीन रीतिरिवाज व धार्मिक कारणांमुळे जे जातीबहिष्क्रुत झाले त्यांना अपरिहार्यपणे शुद्रातिशुद्रात ढकलुन अस्प्रुष्य बनवल्यामुळे हीन व्यवसाय स्वीकारणे भाग पडल्याचे दिसते.
५. परंतु सारेच "शिंदे" मुळच्या एकाच वंशाशी निगडीत आहेत. नागवंशीय आहेत. शिंद वरुनच शिंदे हे नाव रुढ झाले हे उघड आहे कारण अन्य कोणत्याही प्रकारे या आडनावाची उपपत्ती लागत नाही.

Saturday, February 19, 2011

मी हिंदु का नाही?

प्रथम आपण "हिंदु" धर्माच्या आधुनिक काळात केल्या गेलेल्या व्यख्या पाहु. या व्याख्या
संबंधीतांच्या मतांचा सारांश आहे...तशी व्याख्या अद्याप कोणीही केलेली नाही.

१. जो वेदप्रामाण्य मानतो, भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवतो, श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त जीवनयापन करतो त्यास हिंदु म्हणावे." - लो. टिळक
२. जो हिंदुस्थानात रहातो, पुरातन संस्क्रुतीचा अभिमान बाळगतो, अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पहातो त्यास हिंदु समजावे- गोळवलकर गुरुजी.
३. हिंदु हा धर्म नसुन एक जीवनपद्धती आहे. - सुप्रीम कोर्ट
४. जे जैन, बौद्ध, मुस्लिम, शिख, ख्रिस्चन नाहीत ते सर्व हिंदु समजावेत. (ब्रिटिश राज कालीन व्याख्या.)

वरील व्याख्या पाहिल्या तर खालील गोंधळ निर्माण होतात. प्रथम आपण टिळकांची व्याख्या पाहुयात.
-वेदप्रामाण्य म्हणने ठीक आहे...पण वेद कोणतेही स्माजघटनेचे मार्गदर्शन करत नाही तर वेद म्हणजे यद्न्य प्रसंगी विविध देवतांना केलेया प्रार्थनांचा संग्रह आहे.
-वेद ऐकायला, वाचायला आम्हाला नसली तरी आमच्या पुर्वजांना बंदीच होती. म्हनजे ते आमचे धर्मग्रंथ असु शकत नाहीत.थोदक्यात वेदप्रामाण्य माननारा धर्म आमचा असुच शकत नाही.
-भगवद्गीतेकडे एक तत्वद्न्यान म्हणुन पहाणे ठीक आहे...पण धर्म्गरंथ म्हणुन त्याच्याकडे पहाता येत नाही. गीता नेमकी कोणत्या धर्मियांची निर्मिती आहे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण संस्क्रुतात असल्याने तोही १३व्या शतकापर्यंत बंदिस्तच होता.
-स्म्रुतीनी वैदिक वर्ग सोडता सार्यांचेच जीवन जनावराच्या पातळीवर नेवुन ठेवल्यामुळे, धार्मिक समानता नाकारल्यामुळे त्यावर वैदिक सोडुन कोणाची कधी श्रद्धा असण्याची शक्यताच नाही.

गोळवलकर गुरुजी जास्त व्यापक वाटतात...वरकरणी. कारण त्यांची व्याख्या मान्य केली कि मुस्लिम, ख्रिस्च्चन, बौद्ध, जैन, शिख हेही आपोआप हिंदु ठरतात. बौद्ध, जैन, शिख हे हिंदुच आहेत असा त्यांचा दावा आहे हेही खरे. पण ते वास्तव नाही. आदिवासींच्या धर्माचे काय? ते आपापला स्वतंत्र धर्म जपत आहेत...त्यांचे हिंदुत्वीकरन ते ख्रिस्तीकरन करण्याचे प्रयत्न होत आहेत. बरे पुरातन संस्क्रुतीचा अभिमान बाळगा तर मग नेमकी कोणाची संस्क्रुती? सिंधु संस्क्रुती, द्रवीड संस्क्रुती कि वैदिक संस्क्रुती? आदिवासी संस्क्रुती (जी खरी पुरातन आहे) कि या सर्व संस्क्रुत्यांतुन जी एक भेसळयुक्त संस्क्रुती निर्माण झाली आहे ती संस्क्रुती?

हिंदु हा धर्म नसुन एक जीवनपद्धती आहे ही सुप्रीम कोर्टाने केलेली व्याख्या अधिक भोंगळ आहे, कारण भारतात प्रत्येक जातीची, समुहाची स्वतंत्र अशी जीवनशैली आहे. त्याला धर्म म्हनायला गेलो तर हिंदु धर्मात असंख्य धर्म आहेत असे मानावे लागेल.

जे इतर धर्मात बसत नाहीत त्यांना हिंदु म्हनने ब्रिटिशांना सोयीचे होते...पण त्याला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही...नव्हता. कारण आदिवासींचे धर्म स्वतंत्र आहेत, देव-देवता-कर्मकांडॆ, श्रद्धा, जीवन-पद्धती स्वतंत्र आहे आणि त्याची स्वतंत्र नोंद ठेवायला हवी होती तसे केले गेलेले नाही.

म्हनजे येथे आपण एका तिठ्यावर येवुन थांबतो. येथे विचार करावा लागतो. प्रथम, धर्म म्हणजे काय हे पाहुयात.

" धर्म म्हनजे सर्वांसाठी समान धर्मग्रंथ, समान कर्मकांड, समान पुजनीय दैवत /दैवते आणि समान धर्माचार असतात त्याला धर्म म्हणावे."

आता बघा भारतात हिंदु म्हनवणार्या धर्मात किती धर्म आहेत:

१. वेदप्रामाण्य मानणारा, स्म्रुती-श्रुती-पुराणोक्त धर्म मानणारा एक वर्ग आहे. या वर्गाची वेदांवर श्रद्धा आहे, वैदिक कर्मकांडे ते फक्त स्वता:साठीच करतात, त्यांची धर्मसंस्कारही पुर्णतया स्वतंत्र आहेत...त्याला आपण वैदिक धर्म म्हणतो. वेदपठण शाळांत आजही वैदिकेतरांना प्रवेश मिळत नाही. या धर्माचे शंकराचार्य फक्त याच धर्मातील लोक असतात...इतरांना ती अनुमतीच नाही...कारण तो स्वतंत्र धर्म आहे आणि त्यात वावगे काही नाही...वावगे एवढेच आहे कि ते स्वता:ला अन्यधर्मियांत घुसडत स्वता:चाही धर्म जतन करत आहेत.
२. वेद-प्रामाण्य नसणारा मुर्तीपुजकांचा आगमिक धर्म. सिंधु संस्क्रुतीपासुन हा धर्म चालत आला असुन तो शैवप्रधान आहे. आगम म्हनजे आधीचा...वेदांना निगम म्हणतात...निगम म्हणजे नंतरचा. हा धर्म, त्याची पुजामय कर्मकांडे ही वैदिकांपेक्षा स्वतंत्र आहेत...वैदिकांना त्यांच्या धर्मानुसार मुर्तीपुजा मान्य नाही...करताही येत नाही. करत असतील तर ती स्वधर्माशी प्रतारणा आहे. मुळात पुजा हा शब्दच वैदिक संस्क्रुत भाषेतील नसुन द्रावीड भाषेतील आहे.
३, समण धर्म: या धर्माचा उदयही सिंधु काळातच झाला. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रहादि मुलभुत सिद्धांतावर आधारित ही स्वतंत्र विचारधारा होती ती पुढे २ धर्मांत बदलली...ते धर्म म्हणजे जैन व बौद्ध.
३. गोंड, मुंड, चेंचु, संथाल अशा हजारो आदिवासी जमाती या देशात लखो वर्षांपासुन रहात आहेत. त्यांच्या धर्मश्रद्धा, दैवते, सामाजिक आचार-विचार, विवाहप्रथा इ. स्वतंत्र आहेत आणि त्यांचा अन्य कोणत्याही सुसंस्क्रुत म्हनवणार्या नागरी धर्माशी काहीही संबंध नाही...

"हिंदु" शब्द स्वीकारणे हेच मुळात अनैतिहासिक आहे. अद्न्यानमुलक आहे.
आधुनिक काळात आमचे व्यवस्थेबाबत डोळे उघडु लागल्याने आणि आमची पाळे-मुळे वैदिक धर्म/संस्क्रुतीशी संबंधीत असणे शक्य नाही हे लक्षात आल्याने मग "आम्ही कोण?" हा अस्तित्वाचा प्रश्न, मुळांचा प्रश्न पडल्याने आमचे डोके आमच्या धडावर ठेवत हा शोध प्रपंच करावा लागला आहे. कोणता धर्म श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ ही चर्चा अभिप्रेत नसुन आम्ही कोण आहोत याचा शोध घेण्याची ही प्रक्रिया आहे.

याचा एकच अर्थ असा कि आमचा धर्म "हिंदु" तर नाहीच नाही...वैदिकही नाही. आमची कर्मकांडे, मुर्तीपुजा, जीवनशैली स्वतंत्र आहे...जीवनश्रद्धा स्वतंत्र आहेत...म्हणुन आमचा धर्मही शैवप्रधान असुन स्वतंत्र आहे. प्रत्येक आदिवासि जमातींचा धर्म स्वतंत्र आहे. सध्या एवढेच.

Tuesday, February 15, 2011

वांशिक/जातीय गंड किती निरर्थक!

महाभारतात युधिश्ठीर एके ठिकाणी म्हणतो, ज्याच्या अंगी "दान, दया, शील, विनय, द्न्यान आणि संयम आहे त्यालाच ब्राह्मण म्हणावे." मला वाटते युधिष्टीराची व्याख्या अधिक सत्याच्या जवळ जाणारी आहे. येथे तो जन्माधारीत जातींबद्दल बोलत नाहीये. त्याला मुळात विचारला गेलेला प्रश्न असा होता कि, सद्ध्या वर्णसंकर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने, क्षत्रीय ब्राह्मणीशी तर ब्राहमणी शुद्रांशी संबंध देवु लागल्या असल्याने ब्राह्मण कोणास म्हणावे? खुद्द भग्वद्गीतेत वर्ण संकर चर्चिला गेलेला आहे. कारण ती तत्कालीनच् नव्हे तर आजचीही स्थिती आहे...तरी आम्ही शुद्ध रक्ताचे...९६ कुळी-९२ कुळी ते भरद्वाज गोत्री ते वशिष्ठ गोत्री मानण्याचा अहंकारी स्वभाव आहे, पण ते वास्तव नाही. जिद्न्यासुंनी यंदाच्या यंदाच्या "रोहीणी" दिवाळी अंकातील माझा लेख अवश्य वाचावा...म्हणजे जातीअभिमान...वंशाभिमान हे केवढे मुर्खपणाचे आहेत हे लक्षात येइल.

प्रत्येक काळात कालसुसंगत महामानव जन्माला येतात. ते त्या-त्या काळातील समाजाला नवे आत्मभान देतात आणि तेच त्या त्या काळाचे गुरु-धर्मगुरु असतात. येथे धर्म हा शब्द युधिश्ठीर प्रयुक्त व्याखेशी वापरला आहे. कालचे महामानव आज उपयुक्त नाहीत, जसा राम आणि अगदी क्रुष्णही आज उपयुक्त नाहीत.,..अगदी गांधीही सर्वस्वी उपयुक्त नाहीत...ते महामानव त्या-त्या काळाचे अपत्य होते...त्यांचा उपयुक्तता नवीन काळानुसार तपासुन घेत त्यांत बदल घडवले गेले पहिजेत, पण प्रत्यक्षात मानवी समुदाय त्या-त्या नेत्यांना आपापल्या जातीय चष्म्यातुन पहात त्यांना अशा बंदिस्त काराग्रुहात टाकुन त्यांच्या भक्तीची नाटके करत तो विचारप्रवाह आज संयुक्तिक कि असंयुक्तिक याचा कसलाही विचार करत नाहीत. यातुन नवीन सामाजिक प्रक्षोभ निर्मान होत प्रत्येक्जण आपापल्या जातींतील महापुरुष, मग ते खरे असोत कि खोटे शोधु लागतात त्यातुन एक नवी सामाजिक वंचना निर्माण होत जते आणि मानवी समाजाची मानसिक प्रगति खुंटते याचे भान रहात नाही.

मानवी इतिहासात एक काळ असा होता जेंव्हा बंधु-भगिनी, मुल-आइ...मुलगी-बाप असा शरीरसंबंधांसाठी कोणताही विधीनिषेधच नव्हता...मनुष्य हा एक टोळीमानव होता आणि सर्व स्त्रीया सर्वांची मालमत्ता असे. त्या काळाला तर्कतीर्थ लक्ष्मण्शास्त्री जोशी यांनी "गोधर्म" असे सार्थ नाव दिले आहे. ब्रह्मदेवाने आपली मुलगी सरस्वतीपासुन ४ अपत्ये उत्पन्न केली ही पुराण कथा या आदिम काळावर प्रकाश टाकते आणि त्यात वावगे वाटण्याचे काहीच नाही...प्रत्येक काळाची एक व्यवस्था असते आणि जेन्व्हा त्यातील दोष समोर येतात तेंव्हा त्यांत बदल घडवण्याचा प्रयत्न होतो. नवी नीतीमुल्ये सांगितली जावु लागतात...परंतु जगातील सारीच मानवी जमात ही या "गोधर्म" अवस्थेतुन गेली असल्याने, असंख्य टोळ्यांत संकर होत गेला असल्याने वंश ही सद्न्याच मुळात बाद ठरते...मग जाती-अभिमानाचे मुळ -शुद्ध रक्ताचे कोणीही कसे असु शकतील? ती नंतर प्राप्त झालेली एक सामाजिक स्थिती आहे आणि त्याच परिप्रेक्षात या बाबींकडे पहयला हवे. कोणीही कनिष्ठ वा श्रेष्ठ असु शकत नाही. धर्मकारण. समाजकारण, अर्थकारण या परिवर्तीत राहणार्या परिस्थित्यांतुन समाजव्यवस्था बदलत, अभिसरण करत राहते.

पण "भारतीय/हिंदु संस्क्रुती" बद्दल मात्र एक गोंधळ आहे. हे जे सामाजिक अभिसरण घदणे अनुस्युत असते कि ज्यायोगे समाजाची सर्वांगीण उन्नती होते हे या संस्क्रुतीला कधीच समजले नाही...म्हणुन ती सातत्याने रसातळाला जात गेल्याचे आपल्याला दिसते. संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे तर सांगता येत नाही/धर्म म्हणजे काय हे सांगता येत नाही आणि आजचा वर्तमान कोणत्या नैतिक पायांवर असावा हे तर ठावुकच नाही...मग ते आज कोणती नीती असावी हे कोठुन सांगणार? कारण संस्क्रुतीचे नेमके मापदंड कोणते...हेच माहित नाही. त्यामुळे निर्माण होणारी ही एक अवस्था आहे. नव्या अर्थाने हा एक "गोधर्म" बनला आहे कि काय असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे.

धर्म हा समाजाच्या धारणेसाठी असतो...म्हणजे मनुष्यमात्राच्या ऐहिक, नैतीक, आर्थिक, सांस्क्रुतीक आणि पारलौकिक इछा आणि आकांक्षा याची परिपुर्ती करतो त्याला मी धर्म मानतो. व्यक्तिगत समज-अपसमजातुन धर्माविषयीची मते वेगळी असु शकतात. पण सारा समाज एकजीव होत एकमेकांसाठी, सर्व हितासाठी जेंव्हा कटीबद्ध असतो तेंव्हा तो-तो समाज धार्मिक आहे असे समजता येइल. अशा धर्माला नाव असलेच पाहिजे ही काही पुर्व अट नाही.

राहीली गोष्ट जातींची. भारतीय विवाह संस्थेतुन जातीव्यवस्था उगम पावली. जातीव्यवस्थेचे निर्माते ब्राह्मण आहेत हे आता समाजैतिहासिक पुरव्यानुसार अमान्य करता येते. फारतर ब्राह्मणांनी जातीव्यवस्थेला धार्मिक अधार दिले, कर्मकांडॆ दिली असे म्हनता येते. समव्यवसायिकांतच मुली देण्याची प्रथा जातीव्यवस्थेला कारक ठरली. (अधिक जाणण्यासाठी क्रुपया "रोहीणी" दिवाळी अंकातील माझा लेख वाचावा.) पुरोहितवर्ग समाजावर काय थोपु शकतो आणि काय नाही यावर विचार करणे आवष्यक आहे. पुढे मात्र पुरोहित वर्गाने (सारेच ब्रह्मण हे कधीच पुरोहित नव्हते.) धार्मिक विषमतेचे बीज रोवले आणि समाजात तुकडे-तुकडे पाडले हेही तेव्हढेच खरे आहे. एवढेच नव्हे तर पोथीनिष्ठ होत त्यांनी द्न्यानाची कवाडे सर्वच समाजासाठी बंद करुन टाकली...कारण वेदांपार काही असु शकते याची विचारप्रक्रियाच थांबवली गेली.
ती एक दुर्दैवी आणि समाजविघातक घटना होती...
पण आज जातीप्रमाणे कोणीही व्यवसाय वा सेवा करत नाही. एखादा दलित हा न्यायाधीशही असु शकतो आणि एखादा ब्राह्मन सामान्य कर्मचारी...कारण आजची अर्थव्यवस्था-मुल्य व्यवस्था वेगळी आहे आणि ती जागतीक झाली आहे. तिचे संदर्भच बदलले आहेत. त्यामुळे जातीनिष्ठ उच्च-निच्चता हीच मुळात सन्दर्भहीण झाली आहे. परंतु हे लक्षात घेतले जात नाही.
आज जेंव्हा काही ब्राह्म्ण मुस्लिम द्वेशाची भुमिका घेतात आणि काही बहुजन ब्राह्मण द्वेशाची भुमिका घेतात...हे मला संपुर्णपणे अमान्य आहे. विरोध प्रव्रुत्तींशी आहे. नवी आजच्या समाजाला उपयुक्त ठरेल अशी मुल्यव्यवस्था निर्माण करणे हे कर्तव्य आहे...जुन्याचा अभिमान दुराभिमानात बदलवने हे अनैसर्गिक आहे. आणि सध्याचे सारे विरोध हे "जातीद्वेशाने" ग्रस्त आहेत याला मी विरोध करतो. कोणीही जातीविरोधात वा कोणत्याही धर्माविरोधात असुच नये यासाठी हा अट्टहास आहे. पण धर्म शुद्ध करावा हे प्रयत्न तर असणारच...तेथे कोणाचाही अहंकार आडवा येत असेल आणि तो केवळ अमुक जातीचा म्हणुन कोण समर्थ करेल वा विरोध करेल तर धर्म कधीही हाती येणार नाही.
मराठा ते सर्वच जातीयांना जसा वंश्श्रेश्ठत्वाचा गंड आहे तसाच तो ब्राह्मणांनाही आहे. त्या भ्रामक गंडांतुन किती बाहेर पडलेत आणि स्वता:च निर्माण केलेल्या अन्यायी व्यवस्थेतुन जी दलित समाजाची पराकोटीची अवहेलना केली गेली त्याबद्दल खरोखर किती जणांना खेद वाटतो आणि त्यांच्यासाठी कोनते सामाजिक/धार्मिक न्यायाचे प्रयत्न केले हा प्रश्न जेही लोक सामाजिक न्याय आणि नीतिमुल्ल्यांची चर्चा करतात त्यांनी स्वता:ला विचारावा.

Monday, February 14, 2011

मराठा कोण आहेत?

 मराठा कोण आहेत?

मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नांना लगेच न भीडता मुळात "मराठा" या संज्ञेबद्दल चर्चा करणे हा या लेखाचा हेतु आहे. तसेच या चर्चेला अनेक पैलु आहेत. प्रथम आपण "मराठा" या शब्दाचे मूळ पाहुयात.

१. रामायण-महाभारतात ते "अश्मक", "कुंतल", दंडक", :गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, मल्लराष्ट्र अशा स्वरुपात महाराष्ट्राचे उल्लेख मिळतात. अशोकाच्या शिलालेखांपर्यंत व महावंसपर्यंत महारट्ठी हा शब्द तेत्पुर्वी दिसत नाही. मराठा एक जात असा उल्लेख पुराणामद्धेही अथवा कोणत्याही (अगदी बाराव्या शतकातील सुद्धा) स्मृतीमद्धे मिळत नाही.

२. महारट्ठी हा शब्दप्रयोग आपल्याला सातवाहन काळापासुन वापरला गेलेला दिसतो. अनेक इतिहासतज्ञ "महारठ्ठी" या शब्दाचा अर्थ "रथ चालक" ते रथी (रट्ठी) आणि या रथींचा स्वामी तो महारट्ठी असा लावतात. पण ते अयोग्य आहे. रट्ठी आणि रथी हे रुप केवळ शाब्दिक साम्य दाखवतात म्हणुन ते एक अर्थी आहेत असे मानता येत नाही. ...अर्थ वेगळे आहेत. रट्ठ म्हणजे प्रदेश असा खरा अर्थ आहे. महाराष्ट्र हा शब्द अनेक रट्ठांचा समुह आहे.

३. महारट्ठी हे सातवाहनकाळात एक पद होते. प्रत्येक रट्ठाचा (आजचा कलेक्टर) करसंकलन ते रक्षणात्मक कार्य करणारे राजनियुक्त प्रतिनिधी होते त्यांना महारट्ठी म्हटले जात होते. हे पद वंशपरांगत नव्हते तसेच सातवाहन काळापर्यंत त्यांच्या इतर रट्ठांत बदल्याही होत असत. स्वत: सातवाहनांनी कनकवीर या महारठीच्या मुलीशी विवाह केल्याचे दाखले आहेत.

४. महारट्ठी हे विशिष्ट जातीतुन निवडले जात असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. नाग, कदंब, पौन्ड्र, औन्ड्र, (पुंडे, उंडे ही आडनावे या द्रुष्टीने तपसता येतील.) यदु, अहिर, गुजर अशा अनेक तत्कालीन विभिन्न समाजसमुहांतुन त्यांची निवड झाल्याचे दिसते.

५. इ.स. च्या २३० मद्धे सातवाहनांची सत्ता कमजोर झाल्यानंतर हे महारट्ठी स्वतंत्र सरंजामदार बनले व काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. यात बादामीचे चालुक्य, राष्ट्र्कुट व यादव ही घराणी मोठी साम्राज्ये उभी राहीली. याच काळात महारठ्ठी हे पद वंशपरंपरागत झाले असावे कारण त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य व राजसत्तांची अपरिहार्य गरज.

६. राष्ट्रकुट हे घराणे मुळचे "रट्ठीकुत" असावे...राष्ट्रकुट हे कृत्रीम संस्कृतीकरण आहे हे उघड आहे.

७. राजकीय सत्ता अशा रितीने महारट्ठ्यांचा हाती गेल्याने (मग ती सरंजामदार/जहागिरदार म्हणुन का असेना) या संपुर्ण प्रदेशाला महारट्ठी असेच नाव पडले व त्याचे संस्कृतीकरण म्हणजे महाराष्ट्र. महारठ्ठी हे जसे पदनाम होते, तसेच अनेक रठ्ठांचा समूह म्हणून महारठ्ठ हे प्रदेशनाम बनल्याचे दिसते.

८. थोडक्यात इ.स.पु. ३०० मद्धेच महारट्ठी शब्द सर्वत्र प्रचलित झाला होता असे महावंस वरुनही दिसते.

९. मराठे राजपुत वंशाचे आहेत असे मानण्याचा एक प्रघात आहे. अनेक मराठा घराण्यांनी आपली वंशवेल प्रसिद्ध राजपुत घराण्याशी जुळवलेली दिसते.

१०. पण राजपुत हे मुळचे भारतीय नाहीत असे आता डा. आर. जी, भांडारकर, टोड इ. अनेक संशोधकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. बव्हंशी राजपूत हे मुळचे सिथियन वंशाचे असुन ते सनपुर्व पहिल्या शतकापासुन भारतात यायला सुरुवात झाली. त्यांनी सत्ता स्थापन केल्या आणि कालौघात येथील धर्मही स्वीकारला. धर्म स्वीकारला म्हनुन त्यांचे संबंध रामायण-महाभारतातील प्रसिद्ध व्यक्तिंशी नाळ जोडायला सुरुवात झाली. सुर्य-सोम या वंशापासुन आपली उत्पत्ती झाली असे दरबारी भाटांनी सांगायला सुरुवात केली. वसिष्ठाने अग्नीतुन क्षत्रियांची चार कुळे निर्माण केली ही कथा प्रथम पृथ्वीराज चौहानाचा भाट कवी चंद याने प्रथम "पृथ्वीराजरासो" मद्धे प्रसृत केली आहे. ही कथा राजपुतांनी लगेच उचलुन धरली. पण त्याला अन्य कोणताही आधार नाही.

११. महारट्ठी शब्द तत्पुर्वीच प्रचलीत होता हे मी स्पष्ट केले आहेच...म्हणजे राजपुतांपासुन मराठा जात बनली असे म्हणने चुकिचे व अनैतिहासिक ठरेल.

१२. तरुण संशोधिका क्रांती चमार यांचे मत आहे कि भोसले हे मुळचे सिसोदिया राजपुत आहेत व त्यासाठी त्यांनी राणा लक्ष्मणसिंहपासुन (सन १३०३ पासून) एक वंशावळ दिली आहे जी मालोजीराजे व विठोजी राजे यांच्यापर्यंत भिडते.

१३. डा. रा. चिं. ढेरे राजपुत मुळाशी सहमत नाहीत. (पहा शिखर शिंगनापुरचा शंभु महादेव.)

१४. राजपुत हेच येथील पुरातन वंशांशी आपली नाळ जुळवु लागले होते आणि ही प्रक्रिया ४-५ व्या शतकापर्यंत चालु राहिलेली दिसते. त्यामुळे केवळ मराठ्यांत यादव, जाधव, परमार, गुजर, अहिर, साळुंखे इ. आडनावे आहेत आणि त्यातील काही राजपुत घराण्यांशी जुळतात म्हणुन मराठे हे राजपुत कुलीन ठरवता येत नाही...कारण सिथियनांचे पुर्ण हिंदुत्वीकरण होण्याच्याही खुप आधी मराठा ही एक जात/शक्ती म्हणुन उदयाला आली होती हे वरील घटनाक्रमावरुन स्पष्ट दिसते. खुद्द राजपुतांनीही स्वता:ला सुर्यवंशी, चंद्रवंशी समजत यदुवंशाशीही संबंध जोडला, ते कार्य सत्तेत येताच महारट्ठी मंडळीने त्यांच्याही पुर्वी करुन टाकले होते.

१५.अहिर, गुजर, औन्ड्र, पौन्ड्र, यादव, नाग अशा अनेक मानवी गटांचा वावर महाराष्ट्रात पुरातन काळापासुन (ऐतरेय ब्राह्मणात व महाभारतात औन्ड्र/पौन्ड्र/अहिरांचे स्पष्ट उल्लेख आहेत. या जमाती शुद्र (अवैदिक) होत्या असेही सा स्पष्ट निर्देश आहे.)

१६.होयसळ, (या कानडी रुपाचे "होयसळे" मराठी रुप भोसले झाले असु शकते असे अनुमान आहे.) डा रा, चिं ढेरे यांनी होयसळ घराण्याचा महाराष्ट्रात आलेल्या बलियप्पाला भोसले घराण्याचा संस्थापक मानले आहे. शिखर शिंगनापुरचे मंदिर त्यानेच स्थापन केले अशा अर्थाचा शिलालेखही आहे.

१७. थोडक्यात मराठा (महारट्ठी) समाज हा विविध वंशांच्या मिश्रणातुन निर्माण झालेला समाज आहे. महारट्ठी हे पद पुढे जात बनला व त्यातुनच मुळच्या ९६ कुळ्या (ज्या मुळच्या सत्ताधारी होत्या) निर्माण झाल्या. अथवा महाराष्ट्र हा प्राचीन काळ्दी ९६ रठ्ठांत विभागला गेल्याने या कुळ्या निर्माण झाल्या. सत्तेत असल्याने इतर सत्ताधार्यांशी विवाहसंबंध जोडने स्वभाविक होते...त्यातुनच ही जात विकसीत होत गेली. अन्य वंशीयही अनेक जातींत पुढे विभक्त होत गेले. मराठ्यांची अनेक आडनावे ओ, बी.सी ते अन्य अति-वंचितांतही दिसतात ती यामुळेच, कारण वांशिक अर्थाने सर्वांचे मुळ त्या-त्या वंशाशी निगडीत आणि एकच होते.

१८. .खंडोबा, विट्ठल, रेणूका ही मुळची वैदिकांच्या दृष्टीने शूद्र स्वरुप असणारी दैवते सर्वच मराठे ते अन्यजातीयांची कुलदैवते आहेत तसेच पुरातन शैव अशी शिव, जगदम्बा हीसुद्धा कुलदैवते आहेत. राजपुत हेही शैव बनल्याने त्यांचे कुलदैवतही एकलिंगजी वा भवानी बनणे स्वाभाविक आहे. त्या आधारावर मराठ्यांना सर्वस्वी राजपुत ठरवता येत नाही. महाराष्ट्रावर काही सिथियन राजांनीही राज्य केलेले आहे, त्यामुळे काही महारठ्ठी सिथियन कुळाचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

१९. पुरणकारांनी महाराष्ट्रातील सर्वच समुदायांना शूद्र मानले असल्याने, ते कधीही वर्णाश्रम धर्मानुसार क्षत्रिय असु शकत नव्हते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी "क्षत्रिय" असल्याचे सिद्ध केले ते राजपुतांशी वंशावळ जोडुन, परंतु गागाभट्टाने प्रथम ती वंशावळ अमान्यच केली होती. नंतरही महाराजांना शुद्रच म्हटले वा समजले जात होते हे आपण महात्मा फुले यांनी रायगडावरील महाराजांची समाधी स्वच्छ करुन फुले वाहीली तेंव्हाीका ब्राह्मणाने ती फुले लाथाडुन "एका शुद्राला फुले वाहतोस..." असा कांगावा केल्याप्रकरणी पाहु शकतो. शाहु महाराजांचा वेदोक्त प्रकरणातही वैदिक धर्मियांनी त्यांना (म्हणजे पर्यायाने मराठ्यांना) क्षत्रिय मानलेच नव्हते, त्यांना अवैदिक म्हणजेच शूद्रच समजत होते हे स्पष्ट आहे.

थोडक्यात मराठा ही पुर्वी जात नव्हती. महारट्ठी पद हे कोणत्याही समाजगटातील योग्य माणसाला मिळत होते...पुढे हे पद वंशपरांगत बनल्याने तीचे जातीत रुपांतर झाले, कालौघात त्यांची संख्या वाढत गेली. म्हनजे आजचे मराठे तसे मि्श्रवंशीयच आहेत. सत्तेत असल्याने ते स्वता:ला उच्च जातीय/क्षत्रिय (म्हणजेच वैदिक) समजू लागले...पण तसे ते वास्तव नाही, कारण वैदिकांनी त्यांना कधीही आपल्या धर्मातील क्षत्रियत्व बहाल केलेले नाही.

त्यामुळे आज मराठा समाज (धनगर ते अनेक ओबीसीसुद्धा) दुर्दैवाने भ्रमित होत वैदिक अर्थाने उच्च वर्णीय स्वत:ला मानत असतील तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. त्याला कसलीही वैदिक मान्यता मुळातच नाही. वैदिक उच्च-नीचतेच्या तत्वज्ञानाच्या वृथा गारुडातून मूक्त होणे सर्वांनाच आवश्यक आहे.

Friday, February 11, 2011

आर्य हे एक मित्थक

(खरे तर या विषयावर मी "हिन्दु धर्माचे शैव रहस्य" हा ग्रंथ लिहिला आहे...पण अजुनही "आर्य" हा वादग्रस्त मुद्दा आहे असे दिसल्याने येथे मी त्यावर थोड्क्यात प्रकाश टाकतो.)

१. आर्य नावाचा कोणताही वंश भुतलावर कधीही अस्तित्वात नव्हता. "आर्य" हा शब्द रुग्वेदात फक्त ३४ रुचान्त ३६ वेळा येतो....आणि तो वैदिक धर्माचे पुरस्कर्त्या राजा सुदास आणि त्याच्या वंशजांना उद्देशुन वापरला गेला आहे. हा शब्द वंश्वाचक नाही.

२. रुग्वेदात वैदिक धर्मीय कोठुन बाहेरुन आल्याचा एकही उल्लेख नाही.
३, या कथित आर्यांनी येथील "मुलनिवासी" दास, दस्यु, असुर इ. जमातींना पराभुत केले व आपली संस्क्रुती लादळी असे दावे केले जातात. पण प्रत्यक्ष या वैदिकांच्या नावातच दास, दस्यु हे शब्द येतात...उदा. सुदास, त्रसदस्यु, दिवोदास इ. वैदिकांची सर्वश्रेश्ठ देवता वरुण याला वारंवार "असुर वरुण’ असे गौरवाने म्हटले आहे तसेच अग्नीलाही "असुर अग्नी" असे म्हटले आहे. म्हणजे वैदिकही कधीकाळी असुर/दास/दस्यु यांच्याशीच निगडीत होते. सुदासाच्या काळात यद्न्यधर्माची सुरुवात झाली...सिन्धु संस्क्रुतीमधील मुर्तिपुजा (लिंग्पुजा) त्यांनी सोदली आणि तसे अनेक उल्लेख रुग्वेदात येतात. शिवाची ते "शिस्न्देव" म्हणुन निर्भत्सना करतांना दिसतात...व्रुषाकपि (हनुमानाचे पुरातन सिन्धु रुप) वेदांत डोकावतो.
४. याचा अर्थ वैदिक आनि शैवजनांत जो विभेद होता तो धर्मिक स्वरुपाचा होता...वांशिक नव्हे.डा, बाबासाहेब आंबेड्करांनीही हेच मत मांडलेले आहे.
५. आजतअगायत आर्य बाहेरुन आल्याचा एकही भौतिक पुरावा कोठेही सापडलेला नाही.
६,. संस्क्रुत भाषा मुळची व त्यातुन प्राक्रुत भाषा निर्माण झाल्या हा एक गैरसमज आहे. प्राक्रुत भाषा ग्रांथिक कारणासाठी विकसित करुन जी परकोटीचे संक्षिप्तीकरण करता येइल अशा पधतीने संस्क्रुत बनवली गेली. ही कधीएही भारतातील बोलीभाषा नव्हती...संस्क्रुत ही शिकावीच लागत असे. फुलपाखरासाठी संस्क्रुतमद्धे प्रतिशब्दच नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत.
७. ग्रीक भाषेत काही संस्क्रुत/प्राक्रुत शब्द मिळतात...पण त्याचे कारण आर्य वैदिक नसुन सिंधु जनांचा जो विदेश व्यापार होत असे त्यातुन झालेली ही देवाण-घेवाण आहे.
८. हेर्मान याकोबी आणि माक्स-मुल्लर या जर्मन विद्वानांनी प्रथम इंडो-आर्यन ही संद्न्या आणली. हे भाषातद्न्य होते...वंशशास्त्रद्न्य नव्हते. रुग्वेदासारखी रचना करणारे या "अडाणी" देशातील मुळचे असु शकत नाही हा अहंगंडही होताच. त्यांना काय पुरावे मिळाले तर ग्रीक ल्यटीन भाषेत आढळणारे काही शब्द. यावरुन एकदम घाइचे निष्कर्ष त्यांनी काढ्ले. १५-१६ शब्द समान सापडतात म्हणजे युरोपियन आणि भारतातील ब्राह्मण एकाच वंशाचे आणि कोठल्या तरी मुळ प्रदेशातुन त्यांनी स्थलांतर केले असा निष्कर्ष त्यांनी काढला. पण त्यामधील धोका लक्षात आल्यावर माक्स-मुल्लरने आपला सिद्धांत मागे घेतला.
९. पण भारतीय ब्राह्मणानी तो सिद्धांत उचलुन धरला. इतका कि टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदा’ज" असा चक्क ग्रंथही सिद्ध केला. यामागे इंग्रज अनुनयाचे धोरण होते. कारण ब्राह्मण आणि इन्ग्रज एकवंशीय ठरत होते....ते ब्राह्मणाना जेवढे हवे होते तसेच इन्ग्रजांनाही. विश्णुशास्त्री चिप्ळुण्कर तर इन्ग्रजांना "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव..." असे म्हनत.
१०. यामुळे व्यक्तिगत अपवाद वगळले तर ब्राह्मणी संघटना स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या नाही. आर. एस. एस., हिंदु महासभा ही मुख्य उदाहरणे आहेत. सावरकर तर दुसर्या विष्वयुद्धात सैनिकांनी मोठ्या प्रमणावर भरती व्हावे असा प्रचार देशभर करत होते.
११. याची पुढील प्रतिक्रिया म्हणजे आर्य-द्रविड संघर्ष. दक्षीणेत पराकोटीची हिंसक आंदोलने झाली...हिंदी नाकारली गेली. आर्य जर बाहेरचे तर त्यांनी या देशातुन चालते व्हावे अशा स्वरुपाच्या चळवळी सुरु झाल्या...मुलनिवासी विरुद्ध परकिय ब्राह्मण असा संघर्ष पेटवण्यात आला. आजही तो आहेच...आणि तो इतका पराकोटीचा द्वेषमुलक आहे कि आर्य सिद्धांताला विरोध म्हणजे "भटाळला" अशा शिव्या खाणे.
१२. आजकाल मायकेल बाम्शाद याचा आधार घेत डी. एन. ए. चाचणीनुसार ब्राह्मण (खरे तर त्याने उच्च जातीय हा शब्द वापरला आहे...ज्यात क्शत्रिय-वैश्य सुद्धा येतात.) हे युरेशियन वंशाचे आहेत असे सांगीतले जात आहे. बामशादचे हे संशोधन २००१ मधील आहे. या निष्कर्षासाठी त्याने ६० नमुने तपासले आहेत असा त्याचा दावा आहे. २००४ मद्धे बाम्शाद काय म्हनतो ते पहा,: The success of many strategies for finding genetic variants that underlie complex traits depends on how genetic variation is distributed among human populations. This realization has intensified the investigation of genetic differences among groups, which are often defined by commonly used racial labels. Some scientists argue that race is an adequate proxy of ancestry, whereas others claim that race belies how genetic variation is apportioned. Resolving this controversy depends on understanding the complicated relationship between race, ancestry and the demographic history of humans. Recent discoveries are helping us to deconstruct this relationship, and provide better guidance to scientists and policy makers.

१३. २००६ साली national Institute of Biologicals या राष्ट्रीय संस्थेने ३२ आदिवासी जमाती आणि ४५ जातीन्चे सर्वेक्षण केले आणि हे सिद्ध केले कि युरोपियन रक्तसंबंध अभावानेच आढळतो.
१४. २००९ साली सेंटर फ़ोर सेल्युलर आणि मोलेक्युलर बायोलोजी (हैद्राबाद) या संस्थेने हार्वर्ड मेडिकल स्कुल इ. अशा तीन अमेरिकन संस्थांच्या सहाय्याने व्यापक सर्वेक्षण केले व त्यांचा निष्कर्ष असा होता कि भारतातील कोणत्याही जातींत जेनेटिक फरक नसुन त्या भारतातीलच मुळच्या आदिम जमातींतुन विकसीत झाल्या आहेत. आर्यन आक्रमण वा घुसखोरीशी काही संबंध नाही.
१५. द्न्यान पुढे जात असते. सिंधु संस्क्रुती उजेडात येण्यापुर्वी भारताचा इतिहास हा फक्त वैदिक काळापर्यंत मागे जात होता. १९२० साली ती उजेडात येताच सारी समिकरणे बदलली. २००१ साली बामशाद याने जे मत निरिक्षण मांडले ते अपुर्या अर्ध-विकसीत साध्नांवरुन. २००९ सालचा रिपोर्ट मात्र काही मडळी लक्षात घ्यायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे आणि त्यात मुलनिवासीवादीच आहेत असे नव्हे तर आर्य गंडाने बाधीत ब्राह्मणही आहेत.
१६. आर्य सिद्धांताने भारताचे पराकोटीचे वाटोळे केले आहे...आताच त्यापासुन बोध घ्यायला हवा नाहीतर भारतात एक वांशिक तणाव निर्माण होत त्याची परिणती सर्वविनाशात होइल.

मी येथे फार थोडक्यात मुद्दे मांडले आहेत...काही शंका असतील तर विचाराव्यात वा स्वतन्त्र संशोधन करावे. मी त्याचे स्वागतच करेल...पण द्वेषमुलक...फक्त सोयीचे संशोधन स्वीकारणे मला पुर्ण अमान्य आहे हेही क्रुपया लक्षात घ्यावे.

मग आदिमानवाचा टोळीवाद काय होता?

द्न्यान, तन्त्रद्न्यान आणि आर्थिक विकासाबरोबर मानवी बुद्धीही सामाजिक जाणीवांत समग्रपणे विकसीत होइल हा समाजशास्त्रद्न्यान्चा विश्वास खोटा ठरवण्याचा चंग युवा पिढीने बांधला आहे कि काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. इतिहासाचे विष्लेषन करणे, त्यावर वेगवेगळी मते असणे आणि त्यावर व्यापक चर्चा करत निरलसपणे पुढे जाणे वेगळे आणि आपापल्या जातीय नांग्या सरसावत अन्य जातियांवर/धर्मियांवर तुटुन पडणे, मानवताविरोधी बाबींचे निर्लज्जपणे समर्थन करत जातीय झुंडी बनवणे आता सर्रास झाले आहे असे दिसते. काय ऐकायचे आणि काय नाही हे मुळात पुर्वग्रहदुषित असल्याने त्यावरील प्रतिक्रिया या दम्भ आणि उन्मादपुर्ण झालेल्या दिसतात. यात ज्यांना खरोखर सामाजिक ऐक्याची अपेक्षा आहे अशांची पार दैना उडत असल्याचे दिसते.

असे समजु अजुन आपण पुरेसे प्रगल्भ झालेलो नाहीत...अजुनही आपण आदीमानवाच्या नैसर्गिक हिंसक प्रव्रुत्तींबाहेर आलेलो नाहित...तत्वद्न्य, सन्त, विचारवन्त आणि राजकीय/सामाजिक नेत्यांचा पुरेपुर पराभव झाला आहे...मानवता अपवाद वगळता आम्हाला स्पर्शु शकत नाही. कोनतीही टीका आम्हाला न्रुशंस बनवते...कारण आम्हाला नीट उत्तरे देता येत नाहीत...वा टीका सकारात्मक अर्थाने स्वीकारता येत नाही. उलट टीकेची उत्तरे देण्यासाठी एक नवी झुन्ड बनवली जाते आणि मानसिक विक्रुत्यांना वाट दिली जाते.

मग आदिमानवाचा टोळीवाद काय होता?

हा आणि चक्क असाच की!

ब्राह्मणी टोळ्यांचा द्वेष करणारे आहेत तसेच मराठी टोळ्यांचा द्वेष करणारे आहेत...दलितांचा द्वेष करणारे आहेत तसेच भटक्या विमुक्तांचा द्वेष करणारेही आहेत...कोणी इस्लामचा द्वेष करणार्या टोळ्या बनवतो तसेच ख्रिस्त्यांच्या द्वेशाधारावरील आधारितही टोळ्या आहेत.

हे एक नवे टोळीयुद्ध आहे आणि त्याची जणु काही अपरिहार्य अशी गरज आहे. पण अशी गरज भासणे हेच मुळात मनुष्य अध्याप प्रगल्भ झालेला नाही याचेच लक्षण नाही काय?

प्रत्येक टोळीची एक बाजु आहे. चुक असो कि बरोबर वा अर्धवट अशी भुमिका आहे. या भुमिका समजावुन घेण्याचे काम कोणी करायचे हा खरा प्रष्न आहे. या भुमिका सर्वांनाच एकप्रवाहात कशा आनता येतील यावर चिंतन कसे करायचे आणि कोणी...हाही एक प्रश्नच आहे. कारण प्रत्येक टोळी आपले सामर्थ्य आणि वंचना याच्या दुहाया देण्यात व्यस्त आहे. दुसर्याचे ऐकायची, काही मान्य करण्याची व पटवुन देण्याची तयारी जवळपास अद्रुश्य झाली आहे...

आम्ही सारेच आदिम काळात पोहोचलो आहोत...

तेथुन आम्ही परतण्याची कितपत शक्यता आहे?

Wednesday, February 9, 2011

आरक्षण: माझी काही मते

आरक्षण हा सध्या चळवळीतील एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. जातीनिहाय जनगणना हवी कि नको यावरही वितंड घातले जात आहे. मराठा समाज (जात?) हा कुणबी या संज्ञेत मोडतो असाही एक युक्तिवाद सध्या सुरु आहे. ओ. बी. सी. समाजाचे विचारवंत/नेते मराठ्यांना ओ. बी. सी. मध्ये सामावून घेण्यास तयार नाहीत. यामागे प्रत्येकाची विचारधारा असेल ती असो...माझी मते मी येथे नोंदवत आहे.

१. मी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाविरुद्ध आहे. आरक्षण पद्धतीने जाती-व्यवस्था अधिकच तीव्र होत जात आहे आणि सामाजिक स्वास्थ्य त्यामुळे अधिकाधिक धोक्यात येत असून परस्पर संशय/द्वेष वाढत जात आहे.
२. आरक्षणामुळे समाज उपेक्षित घटक सबळ होतील हा घटनाकारान्चा विश्वास समाजाने/राजकीय व्यवस्थेने खोटा ठरवला आहे. आज जेही उपेक्षित उच्च पदावर पोहोचलेले दिसतात त्यामागे आरक्षणापेक्षा त्यांची व्यक्तिगत योग्यता महत्वाची ठरलेली दिसते. आरक्षण ही तात्कालिक गरज असणे वेगळे आणि तो जन्मसिद्ध हक्कच आहे असे मानणे वेगळे. आरक्षणाची गरज आता संपली आहे.
३. जातेनिहाय आरक्षणे भारतीय समाजाने (हिंदू) आजवर भोगलीच आहेत. पूजा/पौरोहित्य हे जसे धर्मानेच ब्राह्मण समाजासाठी आरक्षित होते तसेच शिंपी, तेली, आदी १२ बळूतेदारही समाजव्यवस्थेत आरक्षण भोगतच होते...म्हणजे त्यांच्या व्यवसायात अन्य लोकाना प्रवेशच नव्हता.
४. पेशवाईच्या काळात दलित समाजावर पराकोटीचे अन्याय व्हायला सुरुवात झाली. त्याची परिणती म्हणजे याच समाजाने पराक्रम गाजवत पेश्वाइचा अंत घडवून आणला. त्यांची समतेची संधी पुरेपूर हिरावून घेण्यात आली. श्रुती-स्मृतींनी काहीही म्हटले असो, समाज व्यवस्थेत दलितांचा मोठा वाटा होता...आणि तो तत्कालीन कायद्यान्नीही मान्य केला होता. दामाजी पंताला मोठा दंड भरून सोडवणारा विठू महारच होता....विठ्ठल नव्हे.
५. वैदिकाभिमानी ब्राह्मणांनी सर्वांनाच शुद्र लेखत (मग ते राज्यकर्ते का असेनात...) एक दुष्ट परंपरा निर्माण करत समाज रचनेलाच सुरुंग लावला. इतरांच्या व्यवसायात (मग ते क्षात्र कर्म असो, व्यापार असो, कि सेवा कर्म आणि कृषिकर्म असो) ते जोरात घुसले...आणि इतरांना मात्र त्यांनी पारंपारिक व्यवसायच करावेत असे फर्मान काढले...आणि स्वता: मात्र पारंपारिक आरक्षणे (पूजा/धर्मकार्य/पौरोहित्य इ.) भोगत इतरांच्या व्यवसायांवरही डल्ला मारला.
६. या रीतीने पारंपारिक का होईना जेही काही आरक्षण होते ते संपत गेले.
७. त्यामुळेच घटनाकारांना नवीन परिप्रेक्षात आरक्षणाची गरज भासली कि ज्यायोगे समाजातून नष्ट झालेली समानता यावी. सर्वांनाच संध्या मिळाव्यात.
८. आर्थिक आधारावर आरक्षण असावे असा मतप्रवाह उच्च जातींतील लोकांनी प्रसृत केला आणि त्याविषयक रान उठवले. पण भारतीय माणूस हा मुळातच खोटा असल्याने आर्थिक आधार हा फुसका आहे...म्हणजे...मी स्वत: पहिले आहे कि जमीनदारांची मुलेसुद्धा नादारी दाखवत (कागदोपत्त्री) फी माफी मिळवत होते. म्हणजे प्रामाणिक लोकांचा अशा स्थितीत निभाव लागणे अशक्यच आहे.
९. ब्राह्मण ही जात आहे कि वर्ण याबाबत ब्राह्मणी नेत्यांनी आजवर मौन पाळले आहे. ती जात असेल तर त्या जातीतील अपरिहार्य उतरंड दाखवण्यात ते असमर्थ ठरले आहेत. आज ब्राह्मण समाजात ५५० पेक्षा अधिक जाती आहेत आणि श्रेष्ठ-कनिष्ठता त्यांच्यातही आहे. जर तो वर्ण असेल तर ते वर्णाश्रम धर्म जर पाळत नाहीत तर त्यांना ब्राह्मण वर्णीय समजता येत नाही.
१०. मराठा समाज सोयीप्रमाणे स्वता:ला ९६-९२ कुली समजतो आणि आता सोयीस्कर रीत्या आम्ही कुणबी आहोत असे प्रतिपादन करत आहे. माझे स्पष्ट मत असे आहे कि मराठा ही "जात" कधीच नव्हती. सातवाहन कालापासून महारत्ठी हा शब्द प्रचलित झाला आणि हा शब्द पदवाचक होता. जात- वाचक नव्हे. हे पद कोणालाही, लायक माणसाला मिळू शकत होते आणि ते वंश-परंपरात्मक नव्हते. उदा. सात्वाहानातील नागनिका या राणीचा पिता "महाराठ्ठी" होता (पद) पण तो नाग वंशाचा होता.
११. दलित समाजाला आजही आरक्षणाची गरज आहे काय? माझ्या मते नाही. त्यांत मराठा समाजही आरक्षण हवे असे प्रतिपादित करत असेल तर तेही चुकीचे आहे. ओ. बी. सीना तर मुळीच नाही. ओ. बी. सी. समाज हा सेवा आणि उद्योग यांत जातीय उतरंडीत का असेना, महत्वाचा आणि अर्थोत्पादक घटक होता. माळी समाज हा शेतकरीच, परंतु बागायती शेती करणारा...फुले/भाज्या पिकवणारा...तो ओ. बी. सी. कसा असू शकतो हा मला न कळणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न सोनार, शिंपी, इ.इ. यांच्याबद्दल विचारता येवू शकतो.
१२. मराठा समाज कोणत्या न कोणत्या पातळीवर सतीत होता हे अमान्य होवू शकत नाही. मग ते गाव पाटील असोत, जमीनदार असोत, सरंजामदार असोत कि कोणत्या ना कोणत्या सत्तेचे प्रतिनिधी असोत. त्यांनी सत्तेच्या राजकारणात मोठा रोल बजावला आहे. आजही तेच वास्तव आहे. आता असंख्य मराठे दारीद्र्यातील जिने जगात आहेत हेही वास्तव आहे आणि तसे नको हे मान्यच आहे. पण जातीनिहाय अहंकारात त्यांनीच स्वताची जर वात लावली असेल तर त्याला समाज कसा जबाबदार असेल? आजही जेही कोणी गुंठा सम्राट आहेत ते कोण आहेत? एड्स पासून ग्रस्त होणारे कोण आहेत? बारबालांना धनाढ्य करणारे कोण आहेत? महाराष्ट्रात आजही जी लोक-कला केंद्रे चालतात त्यांचे आश्रयदाते कोण आहेत? त्यांचे प्रबोधन कोणी करतांना मला तरी दिसत नाहीत. पण आरक्षण हवे आहे...जी भाकरच मुळात थोडकी आहे त्यात वाटा हवा आहे...हा सर्व परभुतान्चा खेळ आहे.
१३. आरक्षण आता विघातक आहे. ते कोणालाही नको. वंचितांची काळजी आहे म्हणून आरक्षण हवे हे म्हणणारे सारे खोटारडे आहेत...कारण वान्चीतांपर्यंत काहीच पोहोचले नाही...नाही तर कुनाब्यांनी आत्महत्या केल्या नसत्या...मेळघाटात आजही हजारो बालमृत्यू झाले नसते.
१४. जातीव्यावस्थेखेरीज भारतीय समाज jaguu शकत नाही हे सत्य मनुवाद्यांना आनंदाचे वाटू शकते, पण तेही सुपात आहेत.
१५. थोडक्यात मुळात आरक्षण रद्द व्हायला हवे...तरच सारे आपापली बुद्धी पणाला लावत पुढे जातील असे मला वाटते.

यावर व्यापक चर्चेची अपेक्शा आहेच.

Tuesday, February 8, 2011

चळ्वळीचा म्रुत्यु कसा होतो? (भाग २)

चळवळीन्चे अपyaश अनेकदा त्यान्च्या नेत्यान्च्या मानसिकतेतच दडलेले असते. अनुययन्ची फौज जमा झाली कि आपण सर्वमान्य आहोत असा भ्रम निर्माण होवु लागतो. थोडे यश मिळाले कि सत्तेची स्वप्ने पडु लागतात. त्यासाठी त्यांना अधिक अनुयायन्ची गरज भासु लागते आणि त्यासाठी ते हव्या त्या तड्जोडी करु लागतात. शिवसेना ही एके काळी चळवळच होती...नंतर ती राजकीय शक्ति बनली. अनेक युत्या केल्या...अजुनही होतील...आणि ती सन्घटना फुटली...आता तीही नवी युती करत आहे असे दिसतेय. असो...ते महत्वाचे नाही...पण चळवळ ही शुद्ध चळवळ न रहाता ती स्वता:च स्वता:चा अंत घडवत समाजाला दीर्घ काळासाठी फसवण्याची, भ्रामक स्वप्ने निर्माण करण्याची...दाखवण्याची आणि ती कधीच पूर्ण न करण्याची जी अभद्र परंपरा निर्माण करत जात चळवळीच्या मुलभूत सिद्धांतावरच घाला घालत स्व-मृत्यू घडवते ती प्रक्रिया चिंताजनक आहे.

मी येथे उदाहरणे देत बसत नाही. असंख्य उदाहरणे आहेत...पण त्या सार्यांचा मतितार्थ एकाच आहे तो हा कि सामाजिक नेते, मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, अपवाद वगळता, एकतर अनुयायीच त्यांना स्वर्थ्पुरक धोरणे राबवायला लावतात वा ते नेते स्वत:चे स्वार्थ साधण्यासाठी अनुयायांना राबवतात. याची परिणती साध्यापासून च्युत होण्यात होते आणि चळवळ संपते.

महाराष्ट्रात आजवर कमी चळवळी झाल्या नाहीत...पण यश-अपयश पाहिले तर त्या सर्वस्वी अयशस्वी ठरल्या आहेत असेच दिसून येईल. आज ज्या तथाकथित चळवळी सुरु आहेत त्यांचे भाग्यही विनाशात जाणे एवढेच आहे. कारण त्यांत खरोखर मानवी जीवनाचे कल्याण होणे हा उद्देश आहे काय हा खरा प्रश्न आहे. त्यांचे हेतू खरोखर समता, बंधुता, विचार-स्वातंत्र्य आणि वैश्विक परिप्रेक्ष यात मानवी जीवन आणणे हा हेतू आहे काय हा प्रश्न आहे...आणि दुर्दैवाने त्याची उत्तरे नकारार्थी आहेत.

विरोधात विचार/ कृती जातात तेंव्हा खून, हल्ले, बदनाम्या, बहिष्कार, धमक्या अशी असंख्य हत्यारे वापरत हेच चळवळीचे अध्वर्यू जो नंगानाच घालतात आणि काही बळी घेऊन दीर्घ काळात स्वता:च्या चळवळीचे बळी देवून मोकळे होतात...तेंव्हा अनुयायी मात्र पुरेपूर नागवले गेले असतात...जे शहाणे असतात ते प्राप्त स्थितीचा फायदा घेण्याच्या स्पर्धेत उतरलेले असतात...प्रामाणिक कार्यकर्ते मात्र पुरते नागवले गेलेले असतात.

चळवळ ही खरे तर नेते नव्हे तर अनुयायीच चालवत असतात. नेते फारतर वैचारिक पाठबळ देत असतात...व त्याचाही अभाव असतो तेंव्हा फक्त भावनिक बळावर अनुयायांना भडकावत असतात.

हे अनुयायांना काळात नाही आणि त्यातच त्यांची आणि चळवळीची शोकांतिका असते.

Monday, February 7, 2011

"मूलनिवासी नायक" : एक धादांत असत्य वृत्तपत्र

"मूलनिवासी नायक" : एक धादांत असत्य वृत्तपत्र

वृत्तपत्रे निपक्षपाती असावीत, घटनात्मक जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचक करत असतो. त्यात ती जर चळवळीशी संबधीत असतील तर त्यांची जबाबदारी अधिकच वाढते. पण या अपेक्षाना पुरेपूर छेद देणारे बहुजनीय चळवळीचे (भारत मुक्ती मोर्चा या संघटनेशी निगडीत) मुखपत्र "मूलनिवासी नायक" हे आहे. खोटे कसे छापावे, कोणास कसे टार्गेट करून पुरते बदनाम करावे याचा आदर्श नमुना म्हणजे हे वृत्तपत्र होय. हे मी अनुभवाने सांगू शकतो. माझा या संघटनेशी कसलाही संबंध नाही...पण जे अनुभव आहेत ते असे:

१. ह. मो. मराठे याना हाताशी धरून २५ लोकांची "बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?" यावर प्रा. हरी नरके यांनी "गुप्त चर्चा घडवून आणली असा आरोप ४ फेब्रुवारी ११ च्या अंकात केला आहे. प्रत्यक्षात हा परिसंवाद होता, नोव्हेंबर (2010) महिन्यात जाहीरपणे पत्रकार भवनात झाला होता, सर्वत्र स्थानिक कार्यक्रमात या कार्यक्रमाची माहिती आली होती आणि हा परिसंवाद घेणार्या संयोजकांपैकी मी एक होतो. या परिसंवादाच्या (after function) बातम्या सर्व वृत्तपत्त्रांत आल्या होत्या आणि त्याचा वृत्तांत माझ्या ब्लोग वर उपलब्ध केला होता...आजही तो कोणीही पाहू शकते. या कार्यक्रमाला srotyaanmaddhe सर्वच स्तरातील लोक उपस्थित होते आणि त्यात श्री. ह. मो. मराठे हेही होते. शंकर सारडा सारखे समीक्षकही होते. या कार्यक्रमातील वक्ते सर्व बहुजनीय होते. प्रा. नरके हे अध्यक्ष होते. But the heinous allegation is as if in alliance with Mr. H. M. marathe this secret meeting was organuized. Shame.

आता प्रा. नरके यांच्याशी त्यांचे काही व्यक्तिगत वाद झाले असतील म्हणून एवढ्या उशिरा त्या कार्यक्रमाची विपर्यस्त वूत्ते देणे याला काय म्हणावे? गुप्त कार्यक्रम आणि जाहीर कार्यक्रम यातील फरक ज्यांना काळात नाही त्यांनी मुळात लेखणी उचलावी कशाला हा प्रश्न उपस्थित होतो. श्री. ह. मो. मराठे srote mhanun कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात...त्यांची उपस्थिती खटकणारे हे कोण? mag त्यांना उपस्थित रहायला कोणी अडवले होते कि काय? KI swatache sodun itar vruttapatre vaachayche yaanee band kele aahe?

एवढेच नव्हे तर युराशियन ब्राह्मण नावाची कोणती तरी संकल्पना या वृत्तपत्त्राने शोधून काढली आहे. प्रत्त्येक बहुजनीय विचारवंतांनी त्यांच्या ताटाखालचे मांजर बनावे ani amhi mhanu tech tatvadnyaan mandave अशी विकृत महत्वाकांक्षा असल्याचे दिसते.

प्रा. नरके यांचे सर्वच विचार मला मान्य नाहीत हे मी स्पष्ट करतो. परंतु त्यांचे अलीकडेच उदगीर येथे एक भाषण झाले. Tehi kadhi tar 9 jan. 11 rojee. या भाषणाचा वृत्तांत मी itar vruttpatraant आधीच वाचला होता. या भाषणात प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या स्त्री/शेतकरी/ओ. बी. सी. यांच्या साठीचे अद्भुत योगदान वर्णिले आहे आणि तेही ज्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन निमित्त होते त्या संग्रहाच्याच संदर्भात...ही सी. डी. मी कालच पाहिली आणि मूलनिवासी नायक मधला वृत्तांत पाहिला...अशी वृत्तपत्रे...आणि तीही चळव्लींची...मला शरम वाटली. Most importantly Mulnivasi nayak published this defamatory news on 3rd Feb. 11...after almost one month...what kind of journalism...or was it done purposely? I am sure it was done purposely.

या संध्र्भातील बातमीचे शीर्षक असे दर्शवते कि प्रा. नरके यांचे गुरु नरहर कुरुंदकर....म्हणजे प्रा. नरके भटालले . प्रत्यक्षात मराठवाड्यात भाषण, कुरुंदकर हे मराठवाड्याचे गुरु असून मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे असे प्रा. नरके यांचे उद्गार, म्हणजे ज्यांना काही माहित नाही त्यांचे गैरसमज कोण करून देतोय? आणि कुरुन्द्करांबद्दल मुल्निवासीवाल्यांना आदर नाही (कारण ते पुरोगामी असले तरी ब्राह्मण) हे मी समजू शकतो...पण इतरांना आदर वाटू नये कि काय? ही कसली दडपशाही आहे? असेच गैर-लेखन करून त्यांनी याच भाषणाचा धादांत खोटा आधार घेत प्रा. नरके यांच्याविरुद्ध मातंग समाजाला भडकावण्याचे काम केले आहे. करत आहेत.

अशी चळवळ चालाव्नार्यांची मुखपत्रे असतील, ज्यातून फक्त द्वेष आणि खोटेपणा झळकत रहात असेल तर समाजाचे काय कल्याण होणार हा खरा प्रश्न आहे. बहुजनीय चळवळ हेच लोक गळा घोटून मारायला सज्ज आहेत. त्यांचे राजकीय, आर्थिक स्वार्थ असतील ते असोत, पण सामान्य तळागाळातील पिचलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी झिजवण्याऐवजी ती फक्त काही व्यक्ती, विचारवंत यांना संपवण्यासाठी वापरली जात आहे आणि मी त्याचा निषेध करतो. having difference of opinion is one thing, making counter arguments is also welcome, but publishing trash stories/editorials is certainly a shame on movement...


These croocked minded people have trampled the very journalistic values those were introduced by Mahatma Phule and Dr. Babasaheb Ambedkar and still boast of being followers of Phule and Babasaheb is a very sad part of todays status of movement...and I lament on it.

प्रा. नरके यांची मी वकिली करत नाहीय. जे सत्य आहे आणि मी प्रत्यक्ष अनुभवले आहे तेच सांगतो आहे. याची चल्वलीतील मंडळीने दाखल घ्यावी ही सध्या जरी अशक्य वाटली तरी अपेक्षा.

Sunday, February 6, 2011

पुसु नको कधी मला

पुसु नको कधी मला
हे का असे ते का तसे...?
पण जगत जा...जगत जा..
जगात या जमेल तसे!

जे कळे ना तुला
ते मला कळेल कसे?
फक्त जीवनगीत ते
लावी हृदयाला पिसे!

मृत्यूस जे न माहिती
जीवनासही अगम्य जे
ते गूढ गीत गऊनी
कोणास तू समजाविते?

ये जरा विसाव अता
या विनम्र सृष्टीसोबती
असू अशा एकांती कि
वेदना जिथे विसावती!

घेवुनी जीवन हाती तू
मृत्युसही हुलकाविते
घेवून वेदना मिठीत तू
मज क्षितीज दूरचे दावते

पण पुसू नको जे अगम्य ते
पुसूही नको जे गम्य ते
कि गम्य मी जिथे असे
अगम्यही होतो तिथे

त्या व्यर्थ सा-या वेदना
त्या व्यर्थ सा-या वंचना
घनतिमिर ओलांडूनी ये
तव प्रकाश माझ्या अंगना

पण पुसू नको मला कधी
इथेच का...तिथेच का?
हे असेच का ते तसेच का?
हे अश्रू का ते हास्य का?
अन तुझाच तेवता असा
तो मंद स्नेहल प्रकाश का?

Saturday, February 5, 2011

चळवळींचा मृत्यू कसा होतो?

प्राचीन काळापासून मानवी जीवनात/विचारांत/धर्म श्रद्धांत/राजकीय विचारांत परिवर्तन घडवून आनन्यासाठी अने चळवळी झाल्या आहेत. प्रस्थापित शैव सिद्धांताना आव्हान देण्यासाठी भारतात मूर्ती/प्रतिमा पूजा विरहित वैदिक धर्माचा उदय झाला. चार्वाकाने तर ईश्वराचे/वेदांचे अस्तित्व नाकारणारा अत्यंत भौतीकतावादी मुलभूत सिद्धांत मांडला. याच काळात इहवाद हाच मुळात विघातक असून, सर्व दुक्खांचे कारण असून त्याचा त्याग करून जन्म-मृत्युच्या चक्रातून बाहेर पडणे हेच ध्येय मानणारा श्रमण संप्रदाय पुढे आला. सत्य/अहिंसा/अस्तेय/ब्रह्मचर्य/ अपरिग्रह हे सिद्धांत श्रमण संस्कृतीने दिले. पुढे याचीच परिणती म्हणजे मस्खरी गोशाल, बौद्ध, महावीर हे क्रांतीकारी विचारवंत पुढे आले. मस्खारी गोशाल मागे पडला असला तरी गौतमाने व महावीराने श्रमण संस्कृतीतून दोन मोठ्या धर्मांची निर्मिती केली. कालौघात वैदिक तत्वज्ञान व वर्ण्व्यवस्था राहिली पण वैदिक कर्मकांडे आणि वैदिक दैवते मागे पडली. शैव पूजा कायम राहिली, पण पौरोहित्य वैदिकांच्या हाती गेले. बुद्ध धर्म मुळचे स्वरूप हरपून बसला आणि नंतर खुद्द बुद्धाच्याच मूर्ती बनू लागल्या. जैन धर्म तीन घटकांत वाटला गेला आणि मूळ तत्वद्न्यानाशी फारकत घेवून (काही तत्वे वगळता) आपले अस्तित्व टिकवता झाला. ही अत्यंत थोडकी उदाहरणे मी देत आहे.

राजकीय संदर्भात पाहिले तर नगर राज्यांची सिंधू कल्पना नंतर मागे पडली आणि गणराज्य संकल्पना पुढे आली. या संकल्पनेला आव्हान देणारा बिम्बिसाराचा पुत्र अजातशत्रू याने साम्राज्य ही संकल्पना पुढे आणली. पन अन्यायी राज्यव्यवस्थान्च्या विरोधात अनेक चळवळी झाल्या आहेत. मृच्च्हकतिक नाटकात त्याचे प्रतिबिंब दिसते. शिवाजी महाराजांचे उदाहरण माहीतच आहे. पण राज्य/साम्राज्ज्य ही संकल्पना भविष्यात इंग्रजांचे राज्य येईपर्यंत कायम राहिली. या व्यवस्थे विरुद्धही हिंसक/अहिंसक स्वरूपाच्या चळवळी झाल्या. स्वातंत्र्य मिळवून त्या काही प्रमाणात यशस्वी झाल्या.

धार्मिक असमतेच्या विरुद्ध मध्ययुगात अनेक चळवळी झाल्या. संतांच्या समतेच्या चळवळी आपल्यास माहीतच आहेत. त्या तर पुरेपूर अयशस्वी झाल्याचा इतिहास आहे.

आधुनिक काळातही ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादांच्या, अन्य वादान्सोबत अनेक चळवळी सुरूच आहेत. उदा. पर्यावरण वादी चळवळी. राजकीय चळवळी, इस्लामिक मुलतत्ववादी ते इस्लामिक पुरोगामी चळवळी. . इ.इ.इ.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे या चळवळी सर्वस्वी यशस्वी होतात का? चळवळींचे ध्येय साध्य होते काय? शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य होते काय? हे पडलेले प्रश्न. पुरातन काळापासून ज्याही काही चळवळी झाल्या, मग त्या धार्मिक असोत कि सामाजिक वा राजकीय, त्यांच्या मृत्यूची बीजे त्या-त्या चळवळींतील मुलभूत तत्वाद्न्यानातील दोष वा अनुयायांचे व्यक्तिगत स्वार्थ वा नेत्याचे तत्वज्ञान समजण्यातील अपयश यात पेरली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल. कोणत्या चळवळीचा हेतू काय यावर तिचे यशापयश अवलंबून असते असे म्हणता येणार नाही. बौद्ध चळवळ उदात्त असूनही ती अपयशी ठरली. करुणा/मानवता/समता ती चळवळ तेंव्हाही आणि आताही देवू शकत नाही. शिवाजी महाराजांचे अनुयायी फक्त काही काळ त्यांची धोरणे जपू शकले. आताची बहुजनीय चळवळ सम्यक/एकात्म तत्वद्न्यानाच्या अभावी गटांगळ्या खावू लागली आहे. आर. एस. एस. ची हिंदुत्ववादी चळवळ कोठे चालली आहे हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. थोडक्यात मानवी समाजाला पुढे नेण्या ऐवजी चळवळीच काही काळ यशस्वी होवूनही नेमक्या कोठे फसतात आणि मृत्यू डोहात डूबतात यावर संशोधन गरजेचे आहे.
मेलेल्या वा मृत्युपंथाला लागलेल्या वा नवेच सूत्र पकडत मूळ चळवळीपासून फारकत घेणार्या नव-चळवळी पुन्हा मृत्युपंथाला लागतात हा ज्ञात इतिहास आहे. शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर ही नावे घेत महाराष्ट्रातच किती परस्परविरोधी चळवळी आहेत हे आपल्याला माहीतच आहे. सनातन धर्माचे (वैदिक) नाव घेत, पुरातन संस्कृतीचे उत्थान करणे हेच ध्येय असे माननार्या चळवळीन्चीही कमतरता नव्हती आणि नाही.

पण या सार्यांत (कोणती योग्य आणि कोणती अयोग्य हे येथे मत न नोंदवता) मानवी आत्मा या चलवलीनी गमावला आहे असे म्हणावे वाटते. त्यामुळे आधुनिक समाजाचे (मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत) कितपत हित होणार आहे हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावर निरपेक्ष चिंतन करण्याची गरज वाटते.
चळवळी या मानवी समुदायाला वर्तमानाच्या सापेक्ष स्थिती पेक्षा अजून पुढे नेण्यासाठी असतात. वर्तमानातील अन्न्यायी
संदर्भ खोडून सम्यक ज्ञानमय समाज निर्मितीसाठी असतात. आज आपण पुरातन व्यवस्थांबाहेर आलो आहोत, पण मनोवृत्ती हिंसकच राहिल्या आहेत. त्या चळवळी यशस्वी कशा होवू देणार? आजवर सत्यार्थाने एकाही चळवळ यशस्वी झालेली नाही, नाहीतर आज महात्मा गांधीना शिव्या देणारे, त्याना नाकारणारे कसे असले असते? ते गांधींचे वा त्यांच्या तत्वद्न्यानाचे वा त्यांच्या अनुयायांचे अपयश आहे आणि हीच बाब प्रत्येक चळवळीच्या अध्वर्युन्ना लावता येईल.

आजच्या चळवळी ज्याही काही आहेत, मग त्या राजकीय असोत, सामाजिक असोत, कि धार्मिक...त्यांचीही मृत्यू घंटा वाजताना मला ऐकू येत आहे.
या चळवळींच्या नेत्या-अनुयायांना ऐकू येतेय काय?

Wednesday, February 2, 2011

AN INTRODUCTION TO SATVAHANA DYNASTY: FOUNDERS OF MAHARASHTRA

Modern Maharastra as we see today and inherit a rich culture that originates from Satvahana dynasty, is a matter of great proud to all of us Maharashtrian’s. In brief, in this article I would like to throw some light on the history of Satvahana’s and their great contribution towards Agamik (Shaivait) and Buddhist religion, art, literature and culture.


ORIGIN:

We have few sources to determine origin of Satvahana’s. Satvahana's belonged to Oundra (Andhra) clan. Purana’s have referred them as Andhra-bhrutya or just Andhra satvahana’s. The first mention of Oundra along with Pundra, Mutib, Pulind, Shabar etc. as rulers of southern part of Vindhya Mountain appears in "Aitareya Brahmana". Also according to reference from Mahabharata, they were (Oundra, Pundra etc.) sons of Great King Asur Bali. This means that This dynasty belonged to ancient Asura culture and the origins of this culture can be traced back to Sindhu Culture. It is not surprising that name of first satvahana King is named as “Sindhuk”. If this account is taken into consideration, it is clear that Oundra’s known history dates back to at least 3500 BC.

Oundra’s had established kingdoms in Odisa (Odisa name hails from Oundra), Andhara Pradesh (Andhra is corrupted form of Oundra) and some parts of Maharashtra. PUndra’s ruled from Pundrapur (Modern Pandharpur) and Tiruvarur in south, (Tiruvarur originally was known as Pundrapur) and also ruled west Bengal from the capital “Pundrikvardhan.”

SATVAHANA’S:

All Oundra’s, Pundra’s, Shabar and Mutib’s originally belonged to ancient Naga kula, part of Asura culture. Satvahan (Actually sadvahan…Satvahan is corrupt Sanskrit form of original Prakrut.) “Sadvahan” means horse rider. Megasthenese praised Satvahan's for their cavalry. Satvahana’s belonged to Oundra clan those were out of the periphery of Vaidik religion and were called Shudra’s.

Purana’s have given list of 30 Satvahana kings those ruled Maharastra, central India, Andhra, and some part of Odisa from 200 BC till 230 AD, almost 450 years. Prior to establishment of their own empire predecessors of Satvahana’s were feudal lords and ruled under supremacy of Mouryan empire, while their blood relations (Oundra’s) maintained their supremacy in respective regions like Andhra Pradesh.


RELIGION:

Satvahana’s were “abode of Agama’s.” (Ref : Nashik rock inscription by Goutamiputra Satkarni.). This does clearly mean that Satvahana’s were Shaivaits. Veda’s are called as Nigama’s (Later) and Shaiva’s as well Jain scriptures are called as Agama’s. Agama means ancient (previous) and Nigama means followed by…(later) composed in later times.

There has been dispute over the religious faiths of Satvahana’s. But the fact is evident from the names of the Satvahana kings that they followed Shaivait religion. Shivashree, Skand, Chand, Pulumavi (Skand), Shaktishri, Shivswati etc. are the names those clearly belong’s to Shaivait tradition. The name of the founder of Satvahan dynasty is “Shimukh.” (Actually Sindhuk”)…which resembles with Shivmukh or can be related with Sindhu origin. The most revered name is of a woman in Satvahan dynasty and that is “Nagnika”, and all scholars agree that she belonged to Naga kula.

Most importantly Satvahana’s were matriarchal. This is evident from the fact that Satvahan Kings used to bear Mothers name before their own…such as Goutamiputra Satkarni, Vedistree, Vaasishtheeputra Satkarni, Vashishtheeputra Shivasree Pulumavi, kousikiputra satkarni….etc. Needless to say this is clearly Asura tradition, that precedes patriarchal system of family. Jain Acharya Jinprabhu Suri too has stated that Satvahana’s bloodline originated from Naga Vansh.

Still scholar’s like Dr. Ajay Mitra Shastri tries to establish that Satvahana’s were Brahmins.

Satvahana’s were secular in every respect. They have heavily donated to Bouddha vihara’s, Stupa’s and for creation of Buddhist rock-cut caves. They had donated many villages to the Buddhist monks. Many Rock cut caves, from  nashik to Karle-Bhaje were carved during Satvahana period. In fact Cave sculptures were first introduced by Satvahana’s. Also they organized Yadnya’s too for vaidik Brahmins and had donated heavily to them. The inscription at Naneghat shows how heavily they had donated to the Vedic Brahmins for performing Yadnyas.

Satvahana’s married inter-religions, inter-regions…for example Hal Satvahan had married Lilavati, daughter of King of Cylone. (Sri Lanka) and one king married daughter of Rudradaman, a Shaka king.

(Satvahana Empire)

GREAT ACHEIVEMENTS:

Though Satvahana’s were feudal representatives in Maharashtra during Mouryan and Kanva period, bearing titles like Mahabhoj and Maharatthee. Junnar, Paithan and Amaravati were their alternative Capitals. Junnar was capital of Satvahan dynasty for longest period which was later shifted to Paithan.

Shimuk, (Sindhuk) is known as founder of the Satvahan dynasty who ruled the central India for over 23 years. He got this independence from Kanva dynasty of Bihar. Telangana region was his first choice from where he declared his freedom and occupied Vidarbha region in later times.

Satvahana’s in the times of Great of the Greatest king Goutamiputra Satvahana’s protected entire south India from the vicious advent of the Scythians. At that time he was ruling from present Junnar in Pune district. He had to wage wars with Indo-Greeks, Parada’s (Persians?) to bring back the peace in the country. He established his empire not only in present Maharashtra, but some part of Madhya Pradesh, Sourashtra, some part of Rajputana, and even the part of Andhra like Nagarjunkonda. He is credited by Purana’s for ruling all three oceans…he won every war and established his rule. He was almost ruler of entire south India and the situation continued to be same till next 150 years. Goutamiputra was a handsome and valiant man. He died in 90 AD. His victory over Sakas is still celebrated in form of the Gudi Padava. This festival is extant in the parts till date wherever he had ruled.

Last King from this glorious dynasty, noted by Purana’s was Pulomavi…(Skand) who ruled for only 7 years, from 212 to 218 AD.

Satvahana’s had great naval force. There are pictorial designs of then ships on various coins of those times. The sea-trade was with Arab’s, Romans, and Greeks. Their naval power was tremendous and had won over Sri Lanka using their naval fleets. They used to export muslin, cotton, honey etc. and used to import wine, gold, and lead from abroad. They established first sea-ports, almost 22, on both the sea-coasts.

There were almost 30 fortified cities and various forts built by Satvahana’s which is described by Greek Traveller Megasthenese. So, we can credit him with the first dynasty to identify importance of the forts.

ADMINISTRATION AND ORIGIN OF MARATHA’S

Satvahana’s were the kings believing in complete simplicity. The taxation was meager. They didn't built great palaces for themselves, but forts and fortified cities. The administration too was simple. They had divided the empire in provinces and in Rattha's (Modern districts.) The representative of Rattha would be called “Mahaaratthi” and the representative for provinces (group of Rattha’s) would be called as “Mahabhoj”. Maharatthaa post was not made ancestral…it was temporal and Maharatthi’s would be transferred from one Rattha to other. They were allowed to issue their own coins on behalf of the king, but had no role more than administration of respective Ratthas's and participating the wars if King summons them. Maharatthees could be from any caste. For example, legend is,  an ancestor of satvahana’s was potter, by business. So caste system was not rigid in Satvahana period. Even Brahmins had adapted businesses of traders, sea-fare and warriors. Many had converted to Buddhism and Jainism. Maharatthaa’s could be from any class, if proven ability to administrate. would be appointed as Maharaathhaa.

So like Kulkarni, Deshpande, Inamdar…Maharatthaa too was a title and not a caste. But being feudal lords they continued to bear the same title, even after end of Satvahana dynasty. It seems that they adapted the title "Maharatthaa" as a caste in later times. Mahabjoja’s, as they would be far less in numbers, we today do not know, what happened with that high level administrative class.Later rulers like Vakatakas and Rashtrakutas could be the successors Maharatthis of previous era. It is clear from history that Maharatthi, in later times became ancestral. Present Maratha's, in all probabilities, are successors of Maharatthis of those times.

CULTURE

Satvahana’s, as they ruled for over 450 years as kings, have left their inimitable impact on the Marathi people and their language of today. Satvahana King Hala wrote and compiled 700 folk songs those were written mostly by women from 200 BC till 200 AD, written in Prakrut Maharashtree, are even today a matter of inspiration to any modern poets. Not a single inscription out of about 400 is in Sanskrit for Sanskrit was still evolving. We get a specimen of rudimentary Sanskrit from karle-Bhaje Tank inbscription, which was inscribed by order of Saka princes that was married to Satvahana king.  Many literray works, rigght from Gunadhya's Kathasarisagar, Epic Lilavai, Gatha saptashati, Grammar Prakrit Prakash and so many others. Various forts, fortified cities spread all over Maharashtra, Shaivait temples; rock-cut Buddhist caves etc. till this date reminds us of their great legacy.

I have not enough words to express gratitude towards those secular kings of Satvahana dynasty. I shall write in depth on this in Marathi, very soon…a book…



वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...