Monday, March 26, 2012

ग्रेस येथेच आहेत....!

कवी मरत नसतात. ग्रेस येथेच आहेत. फक्त नव्या अनुभुतींची नव्हाळी पहायला मिळनार नाही एवढेच.

"कवि गेला तेंव्हा ग्रीष्माचा आक्रोश उमदळत होता...
चौकटीत अडकला तेंव्हा हताश सुर्य एक होता...
तो कवि होता म्हणुनी रडल्या कितीक अभागी जमीनी
त्या पायी झिजला होता तो एक महाकवी होता...
कवि गेला तेंव्हा...

तो गेला अन उगाचच अगोचर भावना अनावर झाल्या
तो म्हटला होता...मी आलो अन भावना भावोत्कट झाल्या
या भावांनी जगलो आणिक मेलो जसे माणिक प्रुथेसम
तो म्हटला होता मी धरल्या नाही गोष्टी आल्या-गेल्या"

ग्रेस गेले. ते गेले नाहीत. त्यांची मला आवडती कविता येथे थरथरत्या हातांनी टंकित करतो आहे...

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
कवी : ग्रेस

Saturday, March 24, 2012

संजय सोनवणी किती आहेत?

शिर्षक वाचुन गोंधळात पडु नका. हा प्रश्न मला गेली १५-२० वर्ष विचारला जातो आहे. थोडक्यात हा मुद्दा स्पष्ट करायचे म्हणजे...

१. थरारकथा लिहिणारा संजय सोनवणी कोणी वेगळाच असून ऐतिहासिक कादंब-या लिहिणारा संजय सोनवणी वेगळाच असला पाहिजे याबाबत...

२. ऐतिहासिक कादंब-या लिहिणारा संजय सोनवणी आणि वेद ते धर्म याची चिकित्सा करणारा सोनवणी एक असू शकत नाहीत...

३. गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक-अभिनेता असणारा हा कोण सोनवणी आहे?

४. नेटवर सर्च घेतला कि अनेक लिस्टेड-अन्लिस्टेड कंपन्यांचा मालक दिसनारा सोनवणी आणि हा सोनवणी यांच्यात नेमके काय नाते आहे?

५. एक संजय सोनवणी चित्रेही काढतो तो कोण आहे?

६. शेतक-यांबदल पुस्तक/लेख लिहिणारा सोनवणी आणि विश्वनिर्मितीचा सिद्धांत सांगनारा सोनवणी एक असुच शकत नाही...

७. आणि हा माणुस खाजगी गुप्तहेर संस्थाही चालवतो?

८. जेलमद्धे जावून आलेला सोनवणी विचारवंत सोनवणी असुच शकत नाही...

इइइइइइइइइइइ

छे...अशक्य...!

सोनवणी अनेक असले पाहिजेत...किवा सोनवणी अनेकांकडुन लिहुन घेत असले पाहिजेत...

यातील काय खरे?

हसु नका. खरोखरच अशा प्रश्नांचा व आरोपांचा सामना मी करत आलो आहे. माझ्या ब्लोगवरील विषयही एवढे व्यामिश्र आहेत कि गेल्याच महिन्यात जेंव्हा माझ्या "महार कोण होते?" या पुस्तकावर परिसंवाद झाला त्या कार्यक्रमाआधीच संयोजकांंपैकी एकाने मला विचारले..." साहेब, ब्लोगवर एवढे विषय...तुमच्याकडे लेखकांची टीम आहे काय?"

मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही. मी एवढेच म्हणालो..."एवढी दुर्दशा अजुन माझी झालेली नाही."

एक पुस्तक वाचुन मला फोन करणारे विचारतात...अहो ते अमुक पुस्तक लिहिणारे सोनवणी तुमचे कोण लागतात?...मी "मीच तो" म्हटलो कि त्यांचा विश्वास बसत नाही कारण दोन्ही पुस्तकांचे विषय पराकोटीच्या टोकाचे असतात.

असे का होते? मी लोकांना/वाचकांना दोष देत नाही. आपल्याकडे ब्रांडिंग करुन टाकणे वा करवून घेणे यात व आपापली दुकाने बनवायला भाग पाडनारे वा बनवणारे अशांचीच रेलचेल असते. जेंव्हा मी थरार कादंब-या लिहायचो तेंव्हा तुम्ही सामाजिक वा ऐतिहासिक कादंब-यांच्या फंदात पडु नका, वाचक गमावाल असे सांगणारे प्रकाशक आले तसे मी स्वत:ची प्रकाशन संस्था काढुन मोकळा झालो. मी एका क्षणाशी कधी थांबलो नाही. जे लिहिले वा व्यावसायिकही कर्म केले त्याच्या प्रेमात पडत तेथेच अदकुन राहिलो नाही. क्लीओपात्रा लिहिली कि मी शुन्य महाभारत लिहायला मोकळा झालो. मी नंतर माझी प्रकाशित पुस्तके कधीही शक्यतो (नवीन आव्रुत्ती निघण्याचा अपवाद वगळता) वाचत नाही. त्याबाबत बोलत रहात नाही. तो मला फालतु टाईमपास वाटतो. आजवर माझे शेकडो लेख प्रसिद्ध झाले असतील, पण माझ्याकडे त्यांची कात्रणेही जवळपास नाहीत. माझी नेमकी किती पुस्तके प्रकाशित झालीत याची यादी मी कधीही सांगु शकत नाही. कारण ती लिहिली, प्रसिद्ध झाली, आणि मी त्यांना तेथेच वाचकांच्या भरवशावर सोडुन दिली. माझ्या जवळपास प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते सात-आठ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्यात. मी त्यांचे कौतुक करत बसलो नाही. नवीन आणि नवीन या अथक शोधामागे लागत राहिलो. जे लिहिले ते मागे सोडुन दिले. त्यांचा गवगवा करत बसलो नाही...कारण त्यासाठी वेळ घालवणे मला मान्य नव्हते व नाही.

हा जीवनाचा अथक शोध आहे. संस्क्रुतीचा आहे तसाच मानवी मुल्ल्यांचा आहे,. त्याचे अगणित पदर आहेत. गुंते आहेत. नीच प्रव्रुत्तींशी संघर्ष आहे तसाच शोषितांचा आत्माभिमान जागवण्याचा स्वल्प प्रयत्नही आहे. विषय टोकाचे नसतात...ते कोठेतरी एका समानस्थळी एकच होतात...पण मानवी स्वभाव टोकाचा आहे...आणि तो त्यालाच धरुन बसतो.

मी तसे कधीच केले नाही. माझ्यातच अनेक माणसे दडलीत काय? तर तसेही नाही. मी काही मल्टिपल पर्सोनिलिटी डिसओर्डरचा शिकार नाही. माझ्यात सारा मानवी समुदाय, त्यांची सम्स्क्रुती आणि विचारधारा वास करते आहे. एका अर्थाने मी मानवी मनाचा एक सारांश आहे.

सोनवणी किती आहेत? निरर्थक प्रश्न आहे. खरा प्रश्न असा आहे कि सोनवणी किती असावेत? किती नसावेत?

कि हेही निरर्थक प्रश्न आहेत?

नाही. खरे तर मानवी जीवनात काहीही सार्थक नसते तसेच काहीही निरर्थकही नसते. प्रत्येक मानसात असंख्य विचार व संभावना दडलेल्या असतात. सर्व त्या संभावना वेळोवेळी व्यक्त करु शकत नाहीत एवढेच. परिस्थितींची दडपणेच एवढी असतात कि आपापल्या सर्वच आविष्कारांना अभिव्यक्त करता येतेच असे नाही. मी मात्र सर्वच अभिव्यक्ती मन:पुर्वक केल्या आणि तेथेच त्या सोडुनही दिल्या. अडकुन पडलो नाही. न लोभ ना खंत...

मी कोण आहे? को अहं? हा खरा प्रश्न. मी कोणीच नसतो तर मी हा नेहमीच एका संस्क्रुतीचा अपरिहार्य असा उद्गार असतो. हे प्रत्येक "मी" ला लागु आहे. काही उद्गार क्षीण असतात तर काही मध्यम...काही उग्र तर काही रडवेले...उदास...हताश...खिन्न...

आणि या सा-या उद्गारांचा जन्मदाता असतो अखिल समाज. हौस असते म्हणुन कोणी क्रांती करायला निघत नाही. व्यवस्थाच तशी निर्मिती करत असते. व्यवस्थाच व्यवस्थेला उभारत असते वा कोसळवत असते.

सोनवणी हे एक नांव आहे...परिस्थितीने दिलेले...तसे मला माझे काही स्वत:चे असे नांवच नाही...तसे ते कोणालाही नसते...आडनांव परंपरेतुन येते व नांव कोणीतरी पाळण्यात ठेवलेले असते. पण ते आपले आहे आणि ते कसे उभारायचे या भ्रमात आपण अनेकदा असतो. हेही अनेकदा आपल्या मुळावर येते. मला नांवाचा कसलाही अभिमान नाही. जातीचाही नाही. आणि मी जेही काही लिहितो त्याचाही नाही. माझ्यावर लिहिण्याची कोणी सक्ती केली नाही आणि करुही शकत नाही. मला वाटले...मी लिहिले...लिहिले आणि ते तेथेच सोडत नव्याच्या मागे गेलो...मला काही करावे वाटले...ते मी केले...केले आणि त्यात अडकलो नाही...परिणामांना मुक्तपणे सामोरा गेलो...जात राहील...

संजय सोनवणी किती?

खरे तर एकही अस्तित्वात नाही!

Thursday, March 22, 2012

गौतमीपुत्राचा विजयोत्सव...गुढीपाडवा!

गौतमीपुत्र सातकर्णी या महान सम्राटाने नहपानावर मिलवलेल्या विजयाचा दिवस म्हनजे गुढीपाडवा. माझ्या सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या शुभेच्छा! खालील लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्समद्धे प्रसिद्ध झाला आहे.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.

शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.

सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.

अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.

सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी.


Sanjay Sonawani 



मटा’च्या १ एप्रिलच्या अंकात माझ्या "गौतमीपुत्राच्या विजयाची परंपरा" या लेखावरील श्री. रविकिरण साने यांचा "शककर्ते सातवाहन ब्राम्हणच!" हा प्रतिसाद वाचला. महत्वाचे सर्व पुरावे सोडुन द्यायचे आणि एका शिलालेखातील "एक बम्मण" (साने म्हणतात तसे एक ब्राह्मण" नव्हे. प्रत्त्येक प्राक्रुत शब्दाचे संस्क्रुतीकरण करण्याचा हा छंद बरा नव्हे. शिवाय या शब्दापुढील शिलालेखातील शब्द कालौघात तुटले आहेत त्यामुळे त्यापुढे मुळात काय लिहिले होते हे समजायला मार्ग नाही.) या शब्दाचा अर्थ फारतर "ब्राह्मणांचा संरक्षक" एवढाच घेता येतो, "आपण ब्राह्मण आहोत" असा नव्हे. तसाच घोळ सानेंनी "खतियदपमानदमन" या शब्दाबाबत घातला असून त्याचा अर्थ ते क्षत्रियांचे गर्वहरण करणारा असा लावतात. सातवाहनांनी गर्व उतरवला तो नहपान या शक क्षत्रपाचा पुर्ण पराजय करुन. "खतीय" शब्द येथे क्षत्रियासाठी येत नसून क्षत्रपांना उद्देशुन आहे व ते ऐतिहासिक वास्तवही आहे. 

साने अजुन पुढे जातात व ते म्हणतात  यद्न्य करण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच होता. त्यांचे म्हणने अर्धवट खरे आहे. मुळात ब्राह्मणांना राजसुय व अश्वमेध यद्न्य करण्याची परवानगी मनुस्म्रुती, याद्न्यवक्ल्य स्म्रुती, नारद स्म्रुती अशा अनेक स्म्रुतींनी दिलेलीच नाही. हे यद्न्य फक्य क्षत्रियांसाठीच राखुन ठेवलेले आहेत. बहुदा सानेंनी स्म्रुत्या कधी वाचल्या नसाव्यात, म्हणुन त्यांचा असा घोळ झाला असावा. त्यामुळे सातवाहन ब्राह्मण होते हा त्यांचा बालसुलभ अट्टाहास पुरा होवू शकत नाही. वास्तव हे आहे कि ऐतरेय ब्राह्मणाने औंड्र, पुंड्र, शबर, मुतीब, पुलिंद ई. पन्नास शुद्र जाती दक्षीणेत राज्य करतात असे स्पष्ट म्हटले आहे. महाभारतात याच जमातींना असुर राजा महाबळीचे पुत्र मानलेले आहे. हा समाज पशुपालकच होता. आजचे धनगर/कुरुब/गोपालक हे त्यांचेच वंशज. मेगास्थेनीसही त्यांचा उल्लेख "आंड्रेई" ( Andarae) असाच करतो. वायु पुराण, मत्स्य पुराण ते अन्य सर्वच पुराणे त्यांना "आंध्र" व काहींना "आंध्रभ्रुत्य" असेच म्हणतात. हे बहुदा सानेंनी पाहिले नसावे. जर सातवाहन ब्राह्मण असते तर पुराणकारांनी तसे स्पष्ट म्हटले असते व त्यांना डोक्यावर घेत महाकाव्येही लिहिली गेली असती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे आंध्र राजे (अर्थात औंड्र सातवाहन) हे वैदिक व्यवस्थेने शुद्रच मानले होते असे स्पष्ट दिसते.

दुसरे असे कि सातवाहनांचे नाणेघाट वगळता सर्वच्या सर्व शिलालेख बौद्ध लेण्यांत आहेत. मुळात जवळपास सर्वच लेण्यांची कामे सातवाहनांनीच सुरु केली, उदारपणे देणग्या दिल्या. मग खरे तर त्यांना आपण बौद्ध धर्मीयच ठरवायला पाहिजे. पण तसे कोणी म्हणत नाही. पण फक्त एका "एक बम्मण" शब्दावरुन सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवण्याचा जोर लावत प्रयत्न करायचा हे मात्र अनाकलनीय आहे. सत्य हे आहे कि तत्कालीन सर्वच राजे हे आजच्यासारखे जातीयवादी नव्हते. ते सर्वच धर्मांना उदारपणे सहाय्य करत. त्यामुळे त्यांनी असंख्य लेण्यांना, जैन धर्मियांना मदत केली तशीच वैदिकांच्या समाधानासाठी काही यद्न्यही केले, एवढाच त्याचा अर्थ होतो. "सालाहण" हा शब्द जसाचा तसा नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात आलेला आहे, त्यामुळे सानेंच्या अद्न्यानाधारित कुतर्कावर मी अधिक भाष्य करत नाही. एनकेन प्रकारेन इतिहासातील सर्वच महनीयांना एक तर मारुन मुटकुन ब्राह्मण ठरवायचे किंवा त्यांच्या बोकांडी ब्राह्मण बसवायचे असले असांस्क्रुतिक इतिहास विघातक उद्योग आता तरी बंद व्हावेत. 

आता त्यांनी संस्क्रुतबाबत काही अनैतिहासिक विधाने केली आहेत व ते त्यासाठी ऋग्वेदाच्या काळाचा दाखला देतात व संस्क्रुत भाषा पुरातन आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. संस्क्रुत भाषा ही मुळात प्राक्रुतावर संस्कार करत बनवली गेलेली क्रुत्रीम भाषा आहे याबाबत कोणाही विद्वानाचे दुमत नाही. म्हणजेच प्राक्रुत भाषा याच पुरातन ठरतात. प्राक्रुतचा अर्थच "मुळचा" असा आहे तर संस्क्रुतचा "संस्कारित". आता प्रश्न असा कि संस्क्रुत नेमकी बनली कधी? पहिली बाब म्हणजे संस्क्रुत म्हनता येईल अशा (प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत) भाषेतील पहिला शिलालेख मुळात शक छत्रप रुद्रदामनाच्या काळातील, म्हणजे इस. १६० चा आहे. तत्पुर्वीचे भारतभरचे व्रज, मागधी, पाली, माहाराष्ट्री प्राक्रुत, तमिळ ई भाषांतले शिलालेख इसपु 1000 पासुन आढळतात. संस्क्रुतचा एकही नाही. दुसरे असे कि संस्क्रुतमद्धे ताम्रपट, शिलालेख क्रमश: वाढण्याचे प्राबल्य हे इसच्या तिस-या शतकानंतरचे आहे व हे सर्व लेख ब्राह्मी (क्वचित खरोष्टी) लिपीतील आहेत. संस्क्रुतची स्वत:ची अशी कधीही लिपी नव्हती. आजही नाही. आज जिला आपण देवनागरी म्हणतो ती मुळची नागरी लिपी असून तिला "देव" हा शब्द उत्तरकाळात चिकटवला गेलेला आहे. ऋग्वेद हा मुळ "व्रचदा सिंधी" या शौरसेनी प्राक्रुत भाषेच्या पुरातन रुपात लिहिला गेला होता. ऋग्वेदाचा भुगोल व भाषेतील दुवे या मताशी मेळ खातात. पुढे बौद्ध धर्म वाढतोय हे लक्षात येताच पाली भाषेचे अनुकरण करत (पाली हीसुद्धा क्रुत्रीम भाषा आहे.) वैदिक संस्क्रुत भाषा क्रुत्रीमपणे (सर्वांना समजावी यासाठी) सर्वच प्राक्रुत भाषांतील शब्द घेत (अगदी द्रवीडी भाषेतीलसुद्धा) बनवली गेली. मुळ ऋग्वेद हा संस्क्रुतात नव्हता याची असंख्य प्रमाणे खुद्द ऋग्वेदातच सापडतात. उपलब्ध ऋग्वेदातील भाषा  ही पाणिनीय संस्क्रुतची पुर्वावस्था मानली जाते. पाणिनीने सरासरी इ.स. च्या पहिल्या शतकात "अष्टाध्यायी" लिहुन संस्क्रुतचे नियमबद्ध व्याकरण बनवले. रामायण, महाभारत, ते सर्वच पुराणे ही पाणिनीच्या व्याकरणाचे नियम पाळत असल्याने त्यांची संस्क्रुत भाषेतील निर्मिती ही पाणिनीनंतरच्या काळातील आहे हेही उघड आहे. मुळ प्राक्रुत ग्रंथांचे संस्क्रुत भाषांतर नंतर केले गेले. आज आढळणारी सर्वच पुरातन मानली जाणारी महाकाव्ये अंतिम संस्कार होवुन तिस-या-चवथ्या शतकातच तयार झाली याबाबतही विद्वानांत कसलेही दुमत नाही. म्हणजेच ती मुळ अन्य प्राक्रुत भाषांत लिहिली गेलेली होती...जशी गाथा सप्तशती, लीलावती, कथासरित्सागर, सिंहासन बत्तीशी इ. दुसरे असे कि संस्क्रुत हा शब्द खुद्द ऋग्वेदापासुन ते तिस-या शतकापर्यंतच्या ग्रंथांत एकदाही येत नाही. तो येतो सर्वप्रथम रामायणात, ज्याचे अंतिम संस्करण चवथ्या शतकात झाले. पाणिनीही "छंदस"चे व्याकरण लिहित होता...तो स्वत:ही आपण संस्क्रुतचे व्याकरण लिहित आहोत असे म्हणत नाही...विपुल बौद्ध व जैन साहित्यातही "संस्क्रुत" हा शब्द येत नाही. 

मग ज्या भाषेला चवथ्या शतकापर्यंत स्वतंत्र नांवही नव्हते ती भाषा पुरातन कशी? असती तर अन्य प्राक्रुत साहित्य जसे आपापल्या भाषांचे अभिमानाने उल्लेख करते तसे संस्क्रुत साहित्यातही घडले असते. सत्य हे आहे कि बौद्धांनी धर्मप्रचारासाठी पाली विकसीत केल्यानंतर वैदिक समाजाने संस्क्रुत भाषा तयार करायला सुरुवात केली. संस्क्रुत ही नितांतसुंदर भाषा आहे हे खरे, पण तिचा काळ कसल्याही स्थितीत दुस-या शतकाच्या पलीकडे जावू शकेल असा एकही पुरावा उपलब्ध नाही. सानेंच्या तर्काने आणि व्रुथाभिमानाने संस्क्रुत साठ हजार काय, सहा अब्ज वर्षांपुर्वीही तयार झाली असू शकेल आणि असे म्हणायला काय जाते? ज्याचे पुरावेच अस्तित्वात नसतात त्याबद्दलच अशी विधाने असू शकतात.

थोडक्यात सातवाहन ब्राह्मण तर नव्हतेच आणि संस्क्रुतचा उदयही त्यांच्या काळात झालेला नव्हता. 



तुमचा शोध असाच सुरु राहो...

मी तसा अट्टल माणुसघाना माणुस आहे. मी सहसा कोणाला भेटायला जात नाही तसेच माझ्याकडेही सहसा कोणी आलेले मला चालत नाही. अगदी माझ्या क्लायंट्स्नाही प्रत्यक्ष भेटायलाही मी टाळाटाळ करतो. हे माझ्या नातेवाईकांबाबतही लागु आहे. भावा-बहीणींनाही वर्षातुन एक-दोनदा सोडले तर मी भेटत नाही. प्रत्यक्ष भेटींतले माझे मित्र हाताच्या बोटावर मोजता येतील असे...तेही क्वचित. हा माझ्या स्वभावातील मोठा दोष आहे. परंतु परवाचा दिवस अपवाद ठरला. फोनवरुन मैत्र निर्माण झालेले नवशक्तीचे संपादक श्री. सचीन परब यांना का नकळे भेटल्याशिवाय राहवेना. (तसे मी त्यांनाही ’भेटायला येतो’ सांगत २-३ वेळा चकमा दिला होताच.) प्रत्यक्ष भेटलो आणि आनंदाचे जे क्षण लाभले ते नोंदवल्याखेरीज राहवले नाही म्हणुन हा लेख.

नवशक्तीचे संपादक म्हनजे ब-यापैकी वयस्कर असतील असा माझा समज होता. पहिली बाब म्हणजे तो साफ धुळीला मिळाला...म्हणजे चक्क ते माझ्यापेक्षाही तरुण निघाले...वय वर्ष ३५. असले दणके सहजी सहन होत नाहीत. माझ्यासारख्या स्वत:ला तरुणांहुन तरुण समजणा-या अहंका-याला तर मुळीच नाही. त्यामुळे मी पांढ-या होवू लागलेल्या मिशांना झाकायचा प्रयत्न करत, संकोचत त्यांच्याशी संवाद साधला. संवाद कसला....पत्रकाराशी भेट म्हनजे आपण उत्तरे द्यायलाच बसलेलो परिक्षार्थी असतो याचीही जाण झाली. त्यांनी मलाच बोलते ठेवले. माझा जवळपास इतिहास खोदुन काढला. परंतु त्यांच्याशी त्या एक-दोन तासाच्या ( कि अधिक? वेळ कसा गेला हेच समजले नाही.) भेटीत त्यांच्यातील प्रखर जिद्न्यासा, आत्मविश्वास, नवनिर्मितीची ओढ आणि घटनांकडे पाहण्याचा समतोल द्रुष्टीकोन याची मात्र जाणीव झाली. आणि या सा-यात होता तो प्रसन्नतेचा, आत्मीयतेचा एरवी दुर्लभ असनारा शिडकावा.

खरे तर मी या भेटीपर्यंत त्यांचे काही वाचलेले नव्हते. त्यामुळे माझ्यावर त्या भेटीपर्यंत तरी कसलेही पुर्वग्रह सुद्धा नव्हते. परंतु ते ब्लोग लिहितात हे समजल्यावर मात्र मी शोधुन त्यांचा ब्लोग वाचायला घेतला. वाचकांनीही तो अवश्य वाचावा... http://parabsachin.blogspot.in/ "माझं आभाळ" हे या ब्लोगचं शिर्षक. आभाळासारखेच विचार त्यांनी तरुणाईच्या भाषेत मांडले आहेत. तुकाराम, शिवाजी महाराज, नामदेव यांच्याबाबत लिहितांना त्यांनी जो समतोल द्रुष्टीकोन बाळगत असतांनाही जे परखड विवेचन केले आहे ते वाचुन मला एक समानधर्मा भेटल्याचा आनंद झाला. (कदाचित असे म्हणने थोडे अयोग्यही असेल...मी कधी कधी फारच आक्रमक होतो...पण विचारप्रक्रिया समान असे मात्र नक्की म्हणता येईल.) चंद्रकांत वानखेडे यांच्या सत्कारानिमित्त त्यांनी जो "वेड्यांचा सत्कार होतो आहे." हा जो लेख लिहिला आहे ती शैली शि. म. परांजपेंच्या शैलीला प्रतिशैली असे म्हणता येईल. वाचकांनी प्रत्यक्ष ब्लोग वाचावा व आपले मत बनवावे.

त्यांच्या ब्लोग्स वरील अनेक प्रतिक्रिया मी वाचल्या. अनेकांनी त्यांनाही ब्राह्मण विरोधक ठरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वच्छ दिसले. मला ब्राह्मण बांधवांची नेमकी मानसीक समस्या काय आहे हेच नीट समजलेले नाही. मीही गेली दहा-बारा वर्ष याच मानसिकतेचा सामना करत आहे त्यामुळे परबांना नाही म्हटले तरी भावनीक त्रास होत असनार याची मला खात्री आहे. पुराव्यानिशी सत्य सांगणे हा या देशात गुन्हा झाला आहे कि काय असे वाटावे अशी दुर्दैवी स्थिती आहे. रामदासांना अतिभव्य करण्याच्या नादात आपण इतिहासाचा चेंदा-मेंदा करत आहोत याचे भान रामदासभक्तांना जसे नाही तसे ते पत्रकारितेलाही उरलेले नाही हे त्यांनी अत्यंत निर्भिडपणे मांडले आहे आणि ते सत्यही आहे. अनुयायीच नेत्यांचा अंतत: पराभव करतात हे सत्य रामदासांच्या बाबतीतही पहायला मिळते ते केवळ यामुळेच. त्यामुळे रामदासांची खरी तत्कालीन महत्ता मात्र झाकोळली जाते याचे भान या मुढांना नाही. त्यांची फक्त कीव करावी लागते. शिवाजी महाराजांवरील परबांचा लेख हा परखड वास्तवाची जाण करुन देनारा. महाराजांना हिंदुत्ववाद्यांनी मगरमीठी घालत त्यांच्या चरित्राची धुळधान उडवुन दिलेली आहेच. गोटिये नामक नव-ब्राह्मण शिवाजी महाराजांचे चक्क मंदिर बांधता झाला. मी डीएनए आणि लोकमत ते चित्रलेखातुन त्या अश्लाघ्य प्रयत्नांविर्रुद्ध लिहिले. काय झाले? मंदिर झाले...उद्घाटनही झाले. सचीनसाहेबांनीही महाराजांच्या तथाकथित गोब्राह्मनप्रतिपालक आणि मुस्लिम-विरोध ही हिंदुत्ववाद्यांना प्रिय असना-या चुकीच्या संकल्पनांबाबत स्पष्ट लिहिले तर ते ब्राह्मण विरोधक कसे होतात? ब्राह्मण बांधवांनी त्यांचे मस्तक तपासुन पाहण्याची गरज आहे. ज्यांचे ताळ्यावर आहे त्यांनी आपल्या वाट चुकलेल्या बांधवांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.

आणि एखाद्या ब्राह्मणाची चिकित्सा केली तर ती सर्वच ब्राह्मनांची निंदा असते या अहंवादी भावनेतुन बाहेर या ही विनंती आहे. जेंव्हा तुम्ही एखाद्या ब्राह्मनाची चिकित्सा केले कि चिकित्सा करणारा ब्राह्मण विरोधी अस्तो हे ठरवता तेंव्हा मग तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे असा निश्कर्ष निघणे स्वाभाविक आहे. सत्याचा सामना तुम्ही जेवड्या निर्धाराने कराल आणि सत्यशोधनात सहभागी व्हाल तेवढेच अखिल समाजावर उपकार होतील. अन्यथा तुमच्या दुगाण्या झेलण्यास आम्ही समर्थ आहोत याबाबत शंका बालगण्याचे कारण नाही!

असो.

या भेटीत माझा लाडका भाऊ वैभव छाया तर भेटलाच पण श्रीरंग गायकवाड यांचीही मनस्वी भेट झाली. हा दिवसच मला अनोखा होता. कारण परततांना माझी लाडकी बहिणाबाई म्हणजे प्रगती बानखेले तर म.टा. च्या कार्यालयात तर भेटल्याच पण ज्यांच्याशी मी नेहमी फोनवरच बोलायचो ते मुकुंद कुळेही भेटले. त्यांच्याशीही अल्प काळात मस्त गप्पा झाल्या...

आणि एक त्या दिवशी न ठरलेली अत्यंत अनपेक्षीत अशी एक भेटही झाली...पराग पाटील साहेबांशी...पण त्याबद्दल सविस्तर नंतर...कारण ती भेटही एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

सचीनजी, तुमच्यातील उर्जा, साहस आणि चिकित्सकता अशीच कायम ठेवा. याचीच आजच्या जगाला गरज आहे. तुमच्यापेक्षा मी १४ वर्षांनी मोठा आहे (हे सांगायला जरा लाजतोय हेही खरे आहे...) पण वयाने अक्कल येत नसते तर ती येते फक्त अथक जिद्न्यासेतुन आणि सत्याच्या अविरत शोधातुन. तुमचा शोध असाच सुरु राहो ही शुभेच्छा!

Friday, March 16, 2012

यांच्याशी संवाद होत नसतो...

यांच्याशी संवाद होत नसतो...

ज्यांना काहीच माहित नाही आणि माहित करुन घ्यायची इच्छा नाही...ज्यांना असे वाटते कि आपल्यालाच फक्त माहित आहे आणि बाकी अन्य सारे मुर्ख आहेत...ज्यांना असे वाटते कि बाकी सारे द्न्यानी आहेत आणि आपणच काय तेवढे अद्न्य आहोत...
अशांशी संवाद होवू शकत नाही!


फक्त अशांशी संवाद होवू शकतो...

ज्यांना आपण द्न्यानार्थी आहोत आणि द्न्यान हे प्रत्येकातच कोणत्या ना कोणत्या पातळीवर अस्तित्वात असते याची जाण असते...

ज्यांना द्न्यान आणि अद्न्यान यातील सीमारेषेची जाण असते...

अवघे जग जरी त्याला द्न्यानी मानत असले तरी जो स्वत:ला केवळ द्न्यानोपासक समजतो...

अद्न्याहुन अद्न्य समोर आला तरी त्याच्यातील सुप्त द्न्यानाला जो उघड करु इच्छितो...

अद्न्यानातच द्न्यान असते आणि द्न्यानातही अद्न्यान असते असे जो मानतो...आणि अद्न्यानाला द्न्यानात बदलवण्याचा जो प्रयत्न करतो...

त्यालाच द्न्यानी म्हणावे...
आणि अशाच लोकांत संवाद होवू शकतो...!

Tuesday, March 13, 2012

संपत्तीचे मुल्य हे नेहमीच अस्थिर असते!

मी काहीतरी काल्पनीक भय निर्माण करण्यासाठी आर्थिक अराजकाच्या नांदीचे संकेत देत नसुन एका वास्तवाची जाणीव करुन देण्यासाठी लिहित आहे. जेवढा उपभोग घेता येवू शकतो तेवढेच उत्पादन असावे हा शाश्वत अर्थव्यवस्थेचा पहिला नियम आहे. अति-उत्पादन करत ती उत्पादने खपवण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या गरजा निर्माण करत, काल्पनिक, आभासी प्रतिष्ठा संकल्पना निर्माण करत व्यक्ती-व्यक्तींतच एक खरेदी-स्पर्धा निर्माण केली जाते व समाजमानसिकताही त्याला बळ देते ती व्यक्तीनिष्ठ आर्थिक अराजकाची स्थिती असते. अति-उत्पादनामुळे वस्तु स्वस्त होतात हे काही काळासाठी बरोबरच आहे, परंतु एका विशिष्ट बिंदुपासुन हा समतोल ढळत जातो व उत्पादने पुन्हा महाग होण्याच्या दिशेने वाटचाल करु लागतात. कोणतेही उत्पादन शेवटी नैसर्गिक साधनस्त्रोतांच्या उपलब्धतेवर अवलंबुन असते व अति-उत्पादन व तेही एकुणातील गरजांपेक्षा अधिक होवू लागते तेंव्हा मर्यादित होत जाणा-या नैसर्गिक स्त्रोतांच्या प्रमानात इकडे भाववाढ होत जाणे अटळ असते. असे कधीच होणार नाही, काहीतरी नवे शोध लागतील हा आशावाद झाला.

अराजकाची स्थिती तशीही अस्तित्वात असतेच, फक्त तीची तीव्रता तेवढी जाणवत नाही, वा काहीतरी तात्पुरते उपाय करुन त्या स्थितीवर नियंत्रण आणता येते. परंतु ते काही एककांपुरते (म्हणजे एखादे औद्योगिक संस्थान वा एखाद-दुसरे राष्ट्र) मर्यादित असते तेंव्हाच शक्य आहे...अर्थात तरीही दमछाक होतेच. परंतु गेल्या २० वर्षांत ज्या प्रकारे प्रत्येक राष्ट्र/औद्योगिक संस्थान व पर्यायाने व्यक्तीघटकही जागतीक प्रवाहात असल्याने संपुर्ण जगच आर्थिक अराजकाच्या खाईत सापडणार नाही हाही एक आशावाद झाला. अराजकाचीच स्थिती चांगली असा एक भाव भांडवलशाहीवादींमद्धे आहे. परंतु, तो "अराजकवाद" हा अत्यंत आदर्शवादी अर्थतद्न्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. यात नियंत्रकांची अपेक्षा नाही. त्यात व्यापक प्रकारची कोणत्याही प्रशासनविरहित अशा मानवी जीवन (उत्पादनेही) सुंदर बनवणारी व्यवस्था आनण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न नवे नाही. उपनिषदांतही (जेथे राजा नसेल, कोणी शासित नसेल, अपराधच नसतील तर दंड कोठुन? प्रजाच प्रजेचे धारण करेल.) असाच मौलिक सिद्धांत मांडला गेलेला आहे, परंतु तो वास्तवात येणे अशक्य आहे. माझ्या द्रुष्टीने अराजक म्हनजे नियंत्रणाबाहेर गेलेली व कोनत्याही क्रुत्रीम उपायांनी सुरळीत न होवू शकणारी स्थिती.

आर्थिक अराजकाचे खालील प्रकार पडु शकतात. औद्योगिक संस्थानांतर्गतची आर्थिक अराजकता. स्वत:च्याच ओझ्याखाली काही संस्थाने कोसळुन पदतात. असे होण्यामागे भ्रष्ट प्रव्रुत्तीच असतात असा निष्कर्ष काढता येत नाही. एन्रोन असेल वा आता किंगफिशर असेल, आर्थिक अराजकतेतुन अशी पतने होतात. राष्ट्रांतर्गत आर्थिक अराजके ही जगाला नवीन नाहीत. रोम साम्राज्याच्या पतनामागे आर्थिक अराजक हे मोठ्या प्रमानावर जबाबदार होते हा इतिहास मी एकदा सांगितला आहेच. अलीकडे आपण अमेरिका-ग्रीस ई. देशांबाबत तसेच झाले असल्याचे दिसून येते.

असे का होते? अति-उत्पादन हेच या पतनांमागील मुख्य कारणे आहेत. "कर्ज" हेही एक आर्थिक उत्पादन (प्र्रोडक्ट) मानले तर त्याचेही अतिउत्पादन (फेडता न येणारी कर्जे घेणे) हा राष्ट्र, औद्योगिक संस्थाने व व्यक्तींनाही कोसळवणारा घटक असतो. अति-उत्पादनाच्या चक्रात ग्राहक निर्माण करावेच लागतात. ती उत्पादने विकत घेण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. त्यातुन लोक गरज नसलेल्या आभासी सुख देणा-या वस्तु विकत घेत सुटतात. उदा. आजच जनगणनेचा नि:ष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे, त्यानुसार ५३.२% लोकांकडे मोबाईल आहे, परंतु स्वच्छताग्रुहे मात्र फक्त ४६.९% घरांत आहेत. ३७.१% लोक हे एक खोलीच्या घरांत राहतात, व त्यात बव्हंशी झोपड्याच आहेत. म्हनजे नेमकी आपली गरज काय आहे हे व्यक्तींना नीट ठरवता येत नाही. किंबहुना ती ठरवण्यासाठी मुलात जी एकुणातील व्यवस्था असायला हवी तिचा असणारा अभाव आणि नेमके हेच आजच्या अर्थव्यवस्थेला अभिप्रेत असते. श्रमप्रतिष्ठा लयाला जात व्हाईटकोलर-कार्य-प्रतिष्ठा येणे हे काही आपोआप झालेले नाही. आजच्या अर्थसंस्क्रुतीची व तिने रुजवलेल्या आभासी संकल्पनांची ही अपरिहार्य परिणती आहे. यातुन भविष्यात फक्त अर्थव्यवस्था कोसळतील असे नाही तर दोन वर्गांत संघर्ष पेटेल याची चिन्हे आताच दिसु लागली आहेत.

जलस्त्रोतांचा अनिर्बंध वापर होत असल्याने व कसलेही नियोजन नसल्याने अर्धा मार्च नाही उलटला तोच पाणी कपात सुरु झली आहे. पाणी आधी पिण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी कि शेतीसाठी असा हा तिहेरी संघर्ष पुण्यात पेटला आहे. नवीन धरण काढायला जागा नाही. ग्रामीण भारत विरुद्ध शहरी भारत यातील मानसिकतेत पराकोटीची दरी पडत चालली आहे. माओवादी अलीकडे पुणे-मुंबईतही पकडले जावू लागले आहेत याचा भविष्यातील धोकाही लक्षात घ्यायला हवा. ते लोन खेड्यापाड्यांत पसरू शकते. कारण आर्थिक दबाव वाढत चालले आहेत. अर्थव्यवस्था जेंव्हा एकांगी दिशेने वातचाल करत जाते तेंव्हा असे घडणे अपरिहार्य असेच आहे.

माणसे जेंव्हा उत्पादनाला नियंत्रीत न करता उत्पादनांकडुनच नियंत्रीत होवू लागतात तेंव्हा जी स्थिती निर्माण होते तिला आर्थिक अराजक असे म्हनता येते. संपत्तीचे मुल्य हे नेहमीच अस्थिर असते हे आपण दैनंदिन व्यवहारात पाहतोच. परंतु ते मुल्य रसातळाला जावू शकते याचेही भान असले पाहिजे. उदा. १६३०च्या दुष्काळात एवढी अनवस्था झाली होती कि श्रीमंतांना शेरभर रत्नांच्या बदल्यात शेरभर कुळीथ महामुश्कीलीने मिळत. (परमानंदक्रुत शिवभारत) म्हनजेच संपत्तीचे मुल्य केवळ परिस्थितीवर अवलंबुन आहे. अति-उत्पादनाच्या हव्यासात, गरज नसलेल्या वस्तुंची मानसिक गरज निर्माण करत जेंव्हा त्याधारित आर्थिक फुगवटा निर्माण केला जातो तो मुळात शाश्वत असु शकत नाही व तो अंतत: आर्थिक दुष्काळाकडे घेवून जातो.

उत्पादन हे नेहमीच ग्राहकाला सशक्त करण्यासाठी असले पाहिजे, त्याला आभासी सुखात दंग करण्यासाठी नाही. क्रुत्रीम गरजांधारीत अर्थव्यवस्था आपल्याच विनाशाची (पर्यायाने सर्वच समाजाची) बीजे आपल्यात घेवुनच वावरत असते. तो कधी फोफावेल व सारे काही गिळंक्रुत करत जात जी अवस्था आणेल ती नक्कीच भयावह असेल याबाबत मला तरी शंका नाही.

Wednesday, March 7, 2012

आर्थिक अराजक कसे माजते?

जेंव्हा आर्थिक, नैसर्गिक आणि मानवी संसाधनांच्या गुंतवणुकी या जीवनावश्यकतेच्या उत्पादनक्षेत्रांत होण्याऐवजी मानवास क्रुत्रीम सुखाचा भ्रम देणा-या तंत्रद्न्यानांत/त्या अनुषंगिक उत्पादनांत व त्यांच्या विपनण व्यवस्थेवर विशिष्ट मर्यादेबाहेर होवू लागतात तेंव्हा आर्थिक अराजकाच्या दिशेने वाटचाल सुरु होते, जी आता सुरु झालीच आहे. खरे तर प्रत्त्येक अर्थव्यवस्थेने एक संतुलन साधले पाहिजे. गुंतवणुकीच्या स्त्रोतांचे विभाजन हे जीवनावश्यक आणि मानसिक गरजावश्यक असे संतुलित प्रमाणात व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षांतील एकुणातीलच जागतीक अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहिली तर गुंतवणुक ही अन्याय्य पद्धतीने तंत्रद्न्यानाधारित...आणि त्यातल्या त्यात व्हर्चुअल जगात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि शेती/पशुपालन यांसारख्या पायाभुत क्षेत्रांतुन क्रमशा: घटत चालली आहे असे चित्र आपल्याला दिसुन येईल.

तंत्रद्न्याने ही मानवी जीवन सुखकर होण्यासाठी विकसीत व्हायलाच हवीत. त्याआधारीत उत्पादने बाजारात यायलाच हवीत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्याचा वेग आणि पुरवठा आणि ते प्रत्येकाच्या गळी उतरवण्यासाठी वापरले जाणारे मानसिक आणि पर्यायाने आर्थिक गुलामी आणनारे तंत्र विघातक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. या तंत्रद्न्यानांनी मानवी उत्पादकता, सर्जनशीलता वाढवण्यात हातभार लावला असता तर वाईट वाटण्याचे कारण नव्हते. प्रत्यक्षात ही व्हर्चुअल तंत्रद्न्याने मानवी समुहाला एकत्र आनण्याऐवजी "एकाकी" करत चालली आहेत असेच दुर्दैवी चित्र दिसते आहे. सर्वाधिक गुंतवणुकही (आर्थिक व बौद्धीक संसाधनांची) याच क्षेत्रात होतांना दिसते आहे. आणि या तंत्रद्न्यानाचा विकसीत होण्याचा वेग एवढा अचाट झाला आहे कि २-३ वर्षांत जुने तंत्रद्न्यान शिळे होवु लागले आहे. प्रत्येक तंत्रद्न्य ही गती सांभाळु शकत नाही...पर्यायाने त्यांच्यावर अनेकदा बेका-या कोसळतात...वा ससेहोलपट होत तारुण्यातच आउटडेटेड होण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यातुन ज्या मानसिक समस्या निर्माण होतील व त्याचे एकुणात समाजावरही केवढे गंभीर परिणाम होतील यावर आताच अर्थशास्त्र-मानसतद्न्यांनी विचार करत मांडणी करायला हवी. तसेच आपण कोणत्या तंत्रद्न्यानांतील प्रगतीची कास बाळगायला हवी हे समजावुन घेत नव्या तंत्रद्न्यांनीही चिंतन करत आपली प्रतिभा वापरायला हवी. परंतु जेंव्हा हे समजेनासे होत वरकरणी आकर्षक वाटणा-या , अद्भुत आर्थिक फायदे देणा-या या क्षेत्रांचा मानवी जीवनावर अस प्रभाव आहे , संमोहन आहे कि भलेभलेही त्यातुन सुटत नाहीत.

पण येथे हा प्रश्न उद्भवतो कि या तंत्रद्न्यानांनी खरेच मानवी जीवन सुखकर होते आहे काय? ते खरेच आरामदायी होते आहे काय? कि नवे ताणतणाव हीच तंत्रद्न्याने व त्यांचा अनिर्बंध वापर करत मानवी जगाला नवीन संकटपरंपरेत नेत आहेत? या आधुनिक संसाधनांमुळे नैसर्गिक स्त्रोत कसे नष्ट होत प्रुथ्वीला एक नष्ट न होवु शकणा-या कच-याची कुंडी बनवतील, ही भिती क्षणभर दुर जरी ठेवली तरी मानवाची एकुणातील कार्यक्षमतेचा अंत घडवण्याच्या दिशेने आपण नेटाने वाटचाल करत आहोत. सोमवार ते शुक्रवार, आणि सकाळी दहा ते सहा-सात पर्यंतच फेसबुकी आणि ट्विटरवाले जास्त गर्दी करतात, याचा अर्थ एक आणि एकच निघतो तो म्हणजे ते आपली कार्यक्षमता ते ज्यांचे नोकर आहेत त्यांच्यासाठी पणाला न लावता व्यक्तिगत व बव्हंशी अनुत्पादक कार्यासाठी खर्च करत असतात. जेंव्हा कार्यकारी समुह आपली सर्जनशीलता व कार्यक्षमता अनुत्पादक कार्यांसाठी वाया घालवतो...त्याचाच एक अर्थ असा असतो कि तो समुह अर्थव्यवस्थेशी नकळत बेईमानी करत असतो. तंत्रज्ञानांचा उपयोग स्वक्षमता वाढवण्यासाठी करणे अभिप्रेत असता आणि त्यातून सर्जनशील अभिव्यक्ती, मग ती कार्यशैलीतील असो कि वौद्धिक क्षमतेतील, वाढत रहावी अशी अपेक्षा असता तसे कितपत घडते यावर आपल्याला विचार करावा लागेल.

प्रत्यक्षात नवीन शिकण्याची, तात्पुरत्या स्थैर्याचा भावनेतुन, जी नैसर्गिक उर्मी असायला हवी तीही गमावली जाते आहे. यातुन एक आर्थिक/मानसिक अराजक (अनार्ची) निर्माण होणार यात शंका असण्याचे कारण नाही.

तंत्रज्ञानाधिष्ठित, वरकरणी आकर्षक असलेल्या क्षेत्रांत एकुणातील गुंतवणुक झपाट्याने वाढत एकुण अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात ती कमाल पातळी गाठत आहे. या उलट शेती/पशुपालन हा मानवी जीवनाला मोठा आधार असलेला पुरातन उद्योग. परंतु जगभरातील किमान ४०% लोकसंख्या (भारतात ही ५५% आहे) जी शेती उद्योगात आहे, त्यातील एकुणातील बाह्य गुंतवणुकीचे प्रमाण मात्र १% पेक्षाही कमी आहे. जे आहेत ते फक्त अवाढव्य व्याजांनी कर्ज देनारे आहेत...गुंतवणुकदार नव्हेत. ब्यंकासुद्धा फक्त नगदी पीके घेणा-या मोठ्या शेतक-यांनाच कर्जे देतात. शेतकरी जी कर्जे घेतो ते बव्हंशी खाजगी सावकारांकडुन. ते व्याजदर हे वर्षाला किमान २४ ते ६०% एवढे असतात. त्यात बी-बीयाणी बनवणा-या कंपन्या त्यांचे शोषण करतात हे वेगळेच. म्हणजे अनेकदा ती महागडी बियाणी लागवड करुनही प्रसवतच नाहीत...उगवतच नाहीत. शेतकरी मेला तर आपण जगणार कसे हे ज्या अर्थव्यवस्थेला समजत नाही ती अर्थव्यवस्था अराजकाकडेच वाटचाल करणार हे एक प्रकारे विधीलिखितच आहे.

कारण हा शोषित समाज, जो ख-या जीवनव्यवस्थेचा आधार आहे तिकडे पुर्णतया दुर्लक्ष करणारी अर्थव्यवस्था याच वर्गाचा आपली हक्काची बाजारपेठ म्हणुन उपयो०ग करुन घेते, अनुपयुक्त उत्पादनेही गळी उतरवली जातात. पण याच बाजारपेठेतील घटकांची अर्थव्यवस्था सबल करण्यासाठी, त्यांची क्रयशक्ती कशी वाढेल यासाठी त्यात गुंतवणुकीचा मार्ग मात्र चोखाळत नाही, तेंव्हा जो क्रमश: एक रोष निर्माण होत चालला आहे तो विघातक ठरणार आहे. एक परंपरागत पण मानवोपयोगी अर्थव्यवस्था आणि दुसरी फोफावणारी, चमकदार पण तशी मानवी जीवनाला विघातक अशी असंतुलित अर्थव्यवस्था या संघर्षात ही नवी अर्थव्यवस्था कधी ना कधी कोसळणार हे उघड असले तरी तिचे कोसळणे हे असंख्य राष्ट्रांना कायमचे दरिद्र करुन सोडेल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. एकट्या ग्रीसमुळे जागतीक अर्थव्यवस्थांना झटका बसला होता आणि याचे कारणच मुळात पायाविहीन अर्थव्यवस्थेत आहे जे या नव्या जगाच्या मुळावर येत आहे.

आपण अत्त्यंत परस्परविरोधी मुल्ल्ये असना-या अर्थव्यवस्थेच्या काळात आलो आहोत. सर्वसाधारण समाजाचा ओढा या तंत्रयुगाच्या लाटेकडे पराकोटीचा आकर्षित झाला आहे...होत आहे कारण तेथील आर्थिक प्रगतीचा वेगही अचाट आहे. . जी मंडळी इंजिनियरींग, केमिकल्स वा मेडिकल शाखांत आहेत त्यांनाही मानसिक नैराश्य येवु शकेल अशी ही वरकरनी स्थिती असली तरी खरे नैराश्य याच उच्च व्हर्च्युअल तंत्रद्न्यान क्षेत्रात आहे. कारण तेथील बदलाचा वेग हा नुसता स्तिमित नव्हे तर भयभीत करणारा आहे. यातुन जे या बदलांशी वेगाने जुलवुन घेवू शकतात ते टिकतात. जे तो वेग सधत नाहीत त्यांची गच्छंती व आर्थिक अधोगती अटळ असते आणि त्याचाही वेग आता वाढु लागणार आहे. आणि हीच परिस्थिती ग्राहकांचीही आहे. एका नव्य तंत्रद्न्यानाशी ते जुळवुन घेतात न घेतात तोच नवे तंत्रद्न्यान येवुन आदळत असते. त्याचा मोह व्हावा अशी परिस्थिती मार्केटिंग तंत्रद्न्यानाने निर्माण केलेली असतेच. आपण जुनाट ठरु नये म्हणुन ते नवे तंरद्न्यान, मग वापर, वा गरज असो अथवा नसो, घेतले जाते. हा असा व्हर्चुअल अर्थनीतीचा फंडा आहे.

पण यातुन वरकरणी अर्थव्यवस्थेचे जे चित्र दिसु लागते ते मात्र भ्रामक असते. कारण गुंतवणुकीचे स्त्रोत हे शाश्वत विकासाच्या कामी न येथा भ्रामक मायाजालाच्या कारणी लागतात...पण तेच स्त्रोत हे अंतत: सामाजिक रचनेचाच पाया विस्कळीत करत आहेत हे लक्षात कोण आणि कधी घेणार?

दै. हिंदु मद्धे अलीकडेच शेतक-यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात एका सर्वेक्षणाचे व्रुत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार नगदी (उस, कापुस, द्राक्षे, हलद इ.) उत्पादने घेणा-या शेतक-यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण एकुण शेतकरी अत्महत्त्यांमद्धे ८०% आहे असे निरिक्षण नोंदवले होते. त्यात महाराष्ट्रातील शेतक-यांबद्दलचे निरिक्षण सामाविष्ट आहे कि नाही हे स्पष्ट नसले तरी ते सर्वेक्षण मान्य करता येत नाही. कोरडवाहु शेतक-यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे असे आपल्याला दिसेल. याचे एकमेव कारण म्हणजे पाण्याचे प्रादेशिक समन्यायी वितरण केले जात नाही. शेतीसाठीच उपयुक्त ठरतील अशी किफायतशिर बाजारपेठ ते कर्जवितरणाची हमी सरकार देत नाही. उर्वरित समाजाला या मुलभुत समस्येचे आकलन नाही. "शेती स्वेच्छेने करा" असा वावदुक सल्ला काही नेते आजकाल देऊ लागले आहेत. पण शेती स्वेच्छेने जी केली जाते ती फार फार तर उसासारख्या तशा जमीनीसच विघातक व पाणीपिऊ पीकांची. त्यातही भावाची मारामारी दरवर्षीची ठरलेली आहे. साखर कारखान्यांना प्यकेजेस देऊन सरकारी तिजोरी रिकामी होतेच आहे. आणि दुसरीकडॆ, केवळ असंघटित आहे म्हनून शोषला जाणारा शेतकरी सर्वात मोठ्या प्रमाणावर आहे पण त्याला प्रोत्साहन मिळेल, शेतीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा मिळतील अशी मात्र सोयच नाही. तो शेती दुसरा पर्यायच नाही म्हणून करत असेल तर त्याला दोष द्यायचा कसा? ही शेतीतीलच विषमतेची स्थिती अराजकाची नाही असे कोण म्हणेल?

आणि अधिकाधिक लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि ती उत्पादक कार्यांसाठीच गुंतवली जाईल असे जर आर्थिक धोरणच, सरकारचे आणि समाजाचेही, तर आर्थिक अराजकाची ती नांदी आहे असे समजून चालावे. 

शाश्वत अर्थव्यवस्था ही समतोल संस्कृती घडवण्यात हातभार लावते तर कृत्रीमतेच्या पायावर असंतुलित वितरणावर आधारीत अर्थव्यवस्था मात्र संस्कृतीच्याच नाशाला आणि सामाजिक स्वास्थ्याच्या अहिताला जबाबदार ठरत असते हे लक्षात ठेवायला हवे. मानसिक आंदोलनांवर अर्थशास्त्र चालु नये, पण सध्या तसे घडते आहे. प्रत्येक व्यक्ती आपले आर्थिक निर्णय हे भावनिक होत घेत चालले आहेत कारण तशाच आकर्षक माहितीचा सातत्याने त्यांच्यावर मारा होत आहे. वास्तवाकडे लक्ष वेधत समाजाला साक्षर करणे हा सध्याच्या माध्यमांचाही हेतुही नाही. आणि सरकारला यातील गांभिर्य अद्याप समजलेले नाही.

पण याच गतीने आपण जात राहिलो तर या अराजकाचे परिणाम एवढे भयंकर असतील कि सर्वप्रथम जागतीक "आर्थिक दुष्काळ" पडेल. आजच्या अन्य क्षेत्रांतील गुंतवणुकींचे मुल्य शुन्य झालेले असेल. कारण ती गुंतवणुकच शाश्वत नाही. शाश्वत अर्थव्यवस्थेच्या अभावाच्या अवस्थेत कोण टिकणार? या प्रश्नावर आताच चिंतन करायला हवे.
--संजय सोनवणी
९८६०९९१२०५

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.

भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षनाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषि मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वत: शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करुन महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरुन रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.

यशवंतरावांचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरु असला व एका मागोमाग एक अशा अठरा युद्धांत त्यांना पराजित करत राहिले असले तरी परिवाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अश्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात निवडीची मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या. यशवंतरावांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी कलकत्त्यावर इस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयावरच हल्ला करण्याचा बेत होता. पण दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने यशवंतरावांचा २८ आक्टोबर १८११ रोजी भानपुरा येथे अकाली म्रुत्यु झाला. त्यावेळीस भीमाबाईंच्या धाकट्य भावाचे, मल्हारराव तिसरा याचे वय होते फक्त सहा वर्ष. महाराणी तुळसाबाई या मल्हारराव (तिसरे) यांच्या रीजंट म्हणुन कारभार पहात असतांना भीमाबाई लष्करी फेररचनेत व्यस्त होत्या. यशवंतरावांच्या म्रुत्युमुळे होळकरी सम्स्थान ताब्यात घेता येईल या कल्पनेत इंग्रज रमाण होते व तसा प्रयत्नही करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. कारण तत्कालीन भारतात होळकरांचे लष्कर बलाढ्य मानले गेलेले होते. शेवटी इंग्रजांनी कपटनीतिचा आश्रय घेतला. गफुरखान या होळकरांच्या सेनानीला त्यांनी जाव-याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत फोडले. या घरभेद्याने १९ डिसेंबर १८१७ रोजी महाराणी तुळसाबाईंचा निर्दय खुन केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकुन दिले.

त्याच वेळीस भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) सर थोमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या ईंग्रज सैन्याचा सेनापतीशी मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपुर येथे होते. मल्हाररावाचे वय त्यासमयी फक्त बारा वर्षाचे होते तर भीमाबाईचे वय होते वीस. त्या घोडदळाचे नेत्रुत्व करत होत्या. २० डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.

या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले. इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पदला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे नोव्हेंबर १८५८ मद्धे भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले. पुढचे दुर्दैव हे कि ज्या अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिने संगर मांडला तिला भारतवासी चक्क विसरुन गेले. ती काही आपल्या संस्थानासाठी लढत नव्हती...ते शाबुतच होते...पण आम्हाला झाशीची राणी, जी फक्त आपल्या दत्तकविधानासाठी लढली, फक्त स्वत:च्या संस्थानासाठी लढली तिच्याबाबत आदर असला तरी गवगवा मात्र अचाट असतो ...पण ही आद्य स्वातंत्र्यवीर महिला मात्र माहित नसते.

आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने जगाने दखल घेतलेल्या या आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीला विनम्र अभिवादन करुयात, तिच्या स्म्रुती जतन करण्याचा प्रयत्न करुयात व भारतात अशा अगणित भीमाबाई जन्माला याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुयात!

------संजय सोनवणी

Thursday, March 1, 2012

ओबीसींनो, आर्थिक महासत्ता...द्न्यानसत्ता बना! (लेख ९)

ख-या अर्थसत्तेचे निर्माते तुम्हीच होता. तुम्हीच पुरातन काळापासुन मानवी समाजाला उपयुक्त असे शोध अत्यंत कल्पकतेने लावत गेला. समाजाचे जीवन सुखमय करण्याचा चंग बांधला. त्यातुनच एक अर्थव्यवस्था उभी राहिली. जागतीक व्यापार घडला. सर्वच निर्मानकर्त्यांचे त्यात योगदान होते. गेल्या एक हजार वर्षात तुमची आर्थिक घसरण झाली. सामाजिक दर्जा संपला. औद्योगिक क्रांतीने तुम्हाला अक्षरश: हतबल करुन सोडले. भिकारे बनवले. आत्मसन्मान संपला. उरला त्पो फक्त जातींचा वांझ अभिमान.
पण आज आपण जागतिकीकरणाच्या काळात आहोत. फक्त भांडवलदारच प्रगती करु शकतात हा सिद्धांत आता कालबाह्य झालेला आहे. कल्पक लोकांना कधी नव्हे एवढ्या संध्यांची रेलचेल आहे. भांडवलदारांनाही कल्पक लोकांची गरज आहे. "ठेविले अनंते तैसेची रहावे..." हा सिद्धांतच तुमच्या मुळावर आलेला आहे. अंथरुन पाहुन पाय पसरावे..." वा "बिकट वाट वहिवाट यशाची धोपट मार्गा सोडु नको..." हे उपदेश ऐकणे व ते आचरणात आनणे सर्वप्रथम बंद करा. काळ कोणताही असो, अर्थसत्ता ज्याच्या हाती तोच जग जिंकु शकतो,. आपण जग जिंकायला जन्मलेले आहोत आणि जिंकनारच अशीच भावना बाळगा आणि तशी पावले उचला.
नोकरच नव्हे...मालक व्हायची स्वप्ने पहा! कारण तेच तुमच्या रक्तात आहे...जीन्समद्धे आहे.
तुम्ही म्हणाल, सांगणे सोपे आहे, पण ते साध्य करायचे कसे? सोपे आहे, मुलात आपल्याला साध्य करायचे कि नाही एवढेच आधी ठरवावे लागते. त्यावरच ’हो’ कि ’नाही’ असा काथ्याकुट करण्यात जे मुर्ख वेळ दडवतात ते कोणत्याच निष्कर्षावर कधी येत नाहीत. पर्यायी ते होते तेथेच राहतात. काळ बदलला असला तरी मानवाच्या मुलभुत गरजांत बदल झालेला नाही. त्या गरजा हेरा आणि आधुनिकतेची जोड देत लहान मोठे व्यवसाय सुरु करा.
यावर विस्ताराने लिहिण्यासारखे खुप आहे पण येथे थोडक्यात मांडनी करतो.
धनगरांना मेंढरं घेत गांवगन्ना न फिरता थोडासा आधुनिक तंत्रद्न्यानाचा व व्यवस्थापनाचा मार्ग स्वीकारला तर आहे त्याच पुरातन धंद्यात राहुनच अफाट प्रगती साधता येवु शकते. मानवजात या भुतलावर आहे तोवर हा उद्योग जीवंत राहणार आहे. दलालांच्या नादी न लागता व्यवस्थापन सुधरवा, मी खात्रीने सांगतो, गांव सोडुन कोणी बाहेर पडणार नाही. यासाठी नाबार्डच्या अनेक योजना आहेत, पण त्याचे लाभार्थी धनगर नाहीत एवढेच! तुमचेच धंदे अन्य भांडवलदार बळकावत चालले आहेत, त्याचे भान कधी येणार? किती माळी आज फुलोत्पादनात आहेत आणि निर्यात करताहेत? किती माळ्यांनी ग्रीनहाउसेस टाकली आहेत? का? कोणी अडवले आहे काय?
हीच बाब शिंप्यांपासुन ते सोनारांना समजावुन घ्यावी लागणार आहे. जे धंदे औद्योगिकरणामुळे डुबलेले आहेत त्या जातींना आता नवीन व्यवसायांत घुसावे लागणार आहे. मग ते सेवा व्यवसाय असोत कि लघु ते मध्यम उत्पादन व्यवसाय. अन्न प्रक्रिया उद्योगाला भारतात आजही पराकोटीचा वाव आहे. अमेरिकेतील लोक येथे फुड्माल्स काढतात, आणि त्यांचे पदार्थ विकतात, तुम्हाला आपलीच खाद्य संस्क्रुती भांडवल म्हणुन मिलालेली असुनही त्यावर धन कमवायचा विचार डोक्यात का घुसत नाही? भाज्या-फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग तर आजही भारतात अल्पांशाने आहेत. अब्जावधी रुपयांचा शेतमाल दरवर्षी वाया जातो. गांवोगांवी त्यावर निर्जलीकरणाचे प्रकल्प काढता येवु शकतात. निर्यात करता येवू शकते. त्यासाठीसुद्धा सरकारी वित्तसहाय्याच्या योजना आहेत. त्यांचा लाभ घेत अर्थोन्नती कधी साधणार? चोरडियांनी लोणच्याचा उद्योग काढला. आज ते खुप मोठे झाले. घरोघर लोणची बनवणारे आज त्यांची व इतरांची लोणची विकत घेतात. तुम्हाला कोणी अडवले आहे?
हीच बाब अनेक जीवनोपयोगी वस्तु निर्मिती व सेवांबाबत राबवता येवू शकते. पण धैर्य हवे. श्रीमंत व्हायचा हव्यास हवा. पैसा हे तुमच्या लायकीचे एक प्रतीक आहे. तुमच्याकडे पैसा कमवण्याची अक्कल नसेल तर तुम्ही नालायक आहात असेच सरळ समजुन चाला.
सरकारी नोक-या हे एक म्रुगजळ आहे. प्रा. हरी नरके याबाबत नेहमीच उद्वेगाने बोलतात. केंद्रीय मंत्रालयांतील वरिष्ठ अधिका-यांत (जवळपास ७००० पैकी) फक्त २ ओबीसी आहेत, ही बाब शरम वाटण्यासारखी नाही कि काय? ज्यांची उद्यमशीलतेची मानसिकता नाही त्यांना नोक-या हाच पर्याय आहे. पण सरकार वर्षानुवर्षे ओबीसींचा कोटाच भरत नाही. त्याविरुद्ध आंदोलन करायला, रस्त्यावर उतरायला कोणी अडवले आहे कि काय? तुमचे न्याय्य हक्क तुम्हालाच मिळवण्याचा प्रयत्न करता येत नसेल, किमान स्वार्थासाठी का होईना संघटीत होता येत नसेल तर तुम्ही नालायक आहात असेच म्हणने क्रमप्राप्त आहे.
खाजगी विद्यापीठे हा एक भयंकर सैतान आता आपल्या डोक्यावर बसु घातलाय. खरे तर शिक्षण-आरोग्यसेवा ही जबाबदारी सरकारचीच आहे. ही जबाबदारी सरकार खाजगी क्षेत्राकडे ढकलत आहे. मग आम्ही कर तरी मग का भरावा? शेतसाराही का द्यावा? खाजगीकरण कोठे असावे आणि कोठे नसावे याची अक्कल ज्या सरकारकडे नाही त्यांनी लोकशाहीचे व संसदेचे गुणगान गावु नये. यामुळे कोट्यावधी लोक उच्च शिक्षणापासुन वंचित राहु शकतात हे वास्तव ध्यानात घ्यावे लागेल. खाजगी विद्यापीठ विधेयक लाथाडावेच लागनार आहे. अन्यथा पुर्ण असहकार पुकारावा लागेल. ती हिम्मत सर्वांना कंबर कसुन बांधावीच लागणार आहे, नाहीतर अर्थक्रांती सोडा द्न्यानक्रांतीही घडु शकणार नाही.
प्रत्येक उच्चवर्णीय जात ही स्वत:चे हित पाहण्यासाठी कटिबद्ध आहे व ते आपला अजेंडा लपवतही नाहीत. मग तुम्हालाच तुमचा अजेंडा लपवण्याची वा त्याबाबत उदासीन राहण्याची गरजच काय? "हे विश्वची माझे घर" हे ठीक आहे, पण ते तुमचेही असले तर पाहिजे कि नको? ज्या घरात तुम्हाला प्रवेशच नाही, तुमची कसलीही मालकीच नाही, अधिकारच नाही, तर या वल्गना करु नका. स्वत:चे घर निर्माण करा, मग हवे तर त्यात सर्वांना स्थान द्या!
तुम्हाला ते अशक्य नाही कारण पुरातन कालापासुन ते करुन दाखवलेच आहे. आता मनावर जमलेली पराभुततेची राख झटका आणि कंबर कसुन नवी अर्थसत्ता, द्न्यानसत्ता बना. मग नवी संस्क्रुती आपोआप निर्माण होईल. यातच देशाचे व सर्व समाजाचे हित आहे हे कदापि विसरु नका.

ओबीसींनो, हरामखोरांना हरामखोरीनेच उत्तर द्या! (लेख ८)

ओबीसींना कालजेयी व्हायचे असेल, जर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था आणि संस्क्रुतीचे नवनिर्माते बनायचे असेल, जर राज्य करायचे असेल तर त्यांना पुन्हा निर्माणकर्त्याच्याच भुमिकेत शिरावे लागणार आहे. त्यासाठी अत्यंत व्यापक स्वप्ने आणि पराकोटीच्या प्रयत्नांची गरज आहे. त्याही आधी सारे निर्मानकर्ते हे मुळचे एकच आहेत, धनगरापेक्षा वंजारी वा सोनारापेक्षा माळी वेगळा आहे या समजाला पुरेपुर तिलांजली द्यावी लागणार आहे.
हे कसे करायचे? मी यावर स्पष्ट विचार येथे मांडनार आहे. ते कदाचित धक्कादायक वाटतील, पण त्याला इलाज नाही. आपली मानसिकता त्याखेरीज बदलणार नाही.
ओबीसी सध्या किमान संख्येने ५२% आहेत. आताच्या जातवार जनगणनेनंतर अजुन चित्र स्पष्ट होईल. ते काहीही असले तरी जो समाजघटक संख्येने अर्ध्याहुन अधिक आहे तोच सत्तेचा चालक बनु शकतो. त्यात काहीएक अशक्य नाही. पण महाराष्ट्रात ओबीसींचा सध्या तरी एकच पक्ष आहे. त्याला बळ देता आले तर उत्तमच, नाही तर सर्वच पक्षांत शिरकाव करुन घ्या.
हा शिरकाव फुकटे कार्यकर्ते म्हणुन नव्हे तर पदाधिकारी म्हणुनच करा. पदे/तिकिटे मिळनार नसली तर लाथ मारा. संधी देईल अशाच पक्षात जा.
राजकारणात निर्लज्जता असावीच लागते. शब्द कठोर वाटला तर त्याला लवचिकता असा वाचा. सत्ता हातात येण्यासाठी कोणत्याही स्तरावर उतरायला कचरु नका. त्याचवेळीस ही सत्ता कोणासाठी आणि का मिळवायची आहे हेही विसरु नका. आजवरच्या सर्वच सत्ताधा-यांनी सत्तासंपादनासाठी अगदी हेच केले आहे. उगा शहाजोगपणा करण्यात अर्थ नाही.
दुस-यांना वापरायला शिका आणि आपल्याला कोणी वापरणार नाही याची काटेकोर काळजी घ्या.
सध्याच्या सत्ताधारी जमातींना सत्तेबाहेर हाकलण्यासाठी सर्व पिडीत समाजांची मदत घ्या आणि त्यांच्याशी न्यायाचे वर्तन करा.
स्वत:च्याच जातीचे धिंडोरे पिटवणे सर्वप्रथम बंद करा आणि शुद्रातीशुद्र मानले गेलेले सारेच एकमेव सत्ताकारणाचे ध्येय आहे आणि तेच निर्माणकर्त्यांची संपुर्ण सत्ता अस्तित्वात/वास्तवात आणु शकतात हे विसरु नका.
गांव पातळी ते राष्ट्र पातळीपर्यंत लहान-मोठ्या संघटना स्थापन करा, प्रबोधने करत रहा, सर्व ओबीसी संघटनांत संवाद ठेवा.
मतदान करतांना ओबीसी उमेदवार असेल किंवा ओबीसींनी ठरवलेला उमेदवार असेल तरच मतदान करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो वा अपक्ष असो. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाका.
जो पक्ष ओबीसींना किमान ५०% उमेदवा-या देत नाही त्या पक्षांवर बहिष्कार घाला. राजकीय पक्ष म्हनजे जर समाजाचा चेहरा असेल आणि तोच बहुसंख्यांना डावलत आपल्या सत्तीय मदांधता वाढवण्यासाठी तुमचा वापर करुन घेत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवुन द्या. त्यांची कितीही उदात्त भुमिका असली तरी त्यांना खड्ड्यात घाला. राजकारणात उदात्तता हे नाटकच असते आणि ते ओबामापासुन गांधी घराण्यातले असोत कि बीजेपीवाले असोत, करतच असतात. नाटकांना बळी पडणे आणि फालतु नौटंकी भाषणांनी प्रभावित होत माकड बनण्याची बेवकुफी करणे प्रथम बंद करा.
राजकारणासाठी पैसा लागतो हा एक समज आहे. हरामखोर नेत्यांची ती गरज असते हेही खरे आहे. लोक सर्वांकडुन पैसे घेतात आणि मत ज्याला द्यायचे त्यालाच देतात हे अलीकडच्या निवडनुकींनीही सिद्ध करुन दाखवले आहे. निर्मानकर्त्यांचे प्रबोधन करा, त्यासाठी लागेल तो खर्च अवश्य करा, पण त्यात सातत्य ठेवा. फक्त निवडनुकीच्या तोंडावर ओबीसी कळवळ्याच्या नौटंक्या करु नका.
साहसी बना. तुमचे हेतु दडवायची काहीएक गरज नाही. कोणाच्या दडपनांना बळी पडायची गरज नाही. त्यासाठी लढावु ओबीसींना तयार ठेवा. गुद्द्याचे उतर गुद्द्याने तर मुद्द्याचे उत्तर मुद्द्याने द्यायची तयारी ठेवा. आमच्या पाठीशी आमची माणसे आहेत व प्रसंगी ते धावुन येतात हे खेड्यापाड्यातील एखाददुसरे घर असना-या ओबीसी कुटुंबाला समजु द्या. त्याच वेळीस वैचारिक कोणताही मुद्दा कोणी उपस्थित करत असेल तर त्याला उत्तर द्यायची बौद्धिक शक्ती वापरा, आपली नसेल तर आपल्याच स्वबांधवांना मदतीस घ्या.
राजकारणातुन पैसे कमवा! खुशाल कमवा. पैसा हा आधुनिक युगातील सर्व समस्या सोडवण्याचा राजमार्ग आहे. तो आतापर्यंतच्या सत्ताधा-यांनी जर निर्लज्ज होत वापरलाच आहे तर आपण त्यात नैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत "मी नाही त्यातला" असे दाखवत पायावर कशाला कु-हाड मारुन घेता? मला स्वत:ला नैतिकतेने अपरंपार खड्ड्यात नेले आहे. आदर्शवाद हा बोलायला नेहमीच चांगला असतो पण आचरणात आणला कि कडेलोट पक्का असतो हे मी स्वानुभवाने सांगतो. त्यामुळे धनवान व्हाच आणि स्वबांधवांनाही धनवान होण्याचे मार्ग उपलब्ध करुन द्या.
तुम्ही जर बाजुला झाला तर एकही राजकीय पक्ष टिकुच शकत नाही. त्यांनी दिलेला/लादलेला एकही उमेदवार निवडुन येवुच शकत नाही. तुम्हाला डावलण्याची त्यांची शक्तीच नाही. ते डावलतात आणि तुम्ही मुर्खासारखे डावलुन घेता म्हणुन आणि म्हणुनच ते टिकुन आहेत, एवढेच.
हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रचारांना तर मुळीच बळी पडु नका. त्यांचा फार तर वापर करुन घ्या. हे हिंदुत्ववादी तुम्हाला शुद्रच समजतात आणि उपकारकर्त्याचा आव आणतात. तुम्हाला कोनाच्याही उपकारांची गरजच मुळात नाही कारण या धर्माचे निर्माते तुम्हीच आहात तेंव्हा तुम्ही आचरता तोच हिंदु धर्म आहे. तुम्हालाच तुमचा धर्म सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही.
तेंव्हा हिंदुत्ववादी नव्हे तर ओबीसीवादी बना. निर्मानकर्तेवादी बना. खरे हिंदु तुम्हीच आहात. तुम्ही आहात म्हणुनच या वा-या काय किंवा भिक्षुकांचे काय ते चालते. अर्ध्या चड्ड्या घालायचा उद्योग करु नका. उद्या तुमची अर्धी मानगुटही राहणार नाही. मेंदु शाबुत ठेवा...बौद्धिक गुलामी ठोकरुन लावा.
सत्ताकारण साधायचे आणि ओबीसींचे राज्य आणायचे तर तुम्हाला वरील मार्ग अनुसरावा लागेल. नैतीकतेचे ढोल बडवनारे सत्तेत येवु शकत नाहीत कारण तशी आजची व्यवस्था नाही. व्यवस्था बदलेल तेंव्हा व्युवनीतिही बदलावी लागेल.
हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीशी जेंव्हा सामना असतो तेंव्हा त्यांचीच नीति वापरत संघर्ष करावा लागतो. आताची सत्ताधारी जमात या लांडग्यांपेक्षा क्रुर आणि कोल्ह्यांपेक्षा चतुर आहे. नैतीकतेचे बुरखे घेवुन तुम्ही कधीही सत्तेच्या पटलावर आपले नांव कोरू शकत नाही हे कटु वास्तव आहे. हे लोक मुंडे-भुजबळ स्वार्थी नाहीत काय? असा प्रश्न विचारतात. मी म्हणतो त्यांना इतर जाणते राजे आणि त्यांचे अनुयायी काय करतात हे का दिसत नाही? त्यांची सामाजिक क्रुतघ्नता का दिसत नाही? नैतीक असण्याचा ठेका फक्त मुंडे, भुजबळांनीच का घ्यावा?
काही गरज नाही. हरामखोरांना उत्तर तोडीस तोड हरामखोरीनेच द्यावे लागते आणि ते आता दिलेच पाहिजे.
आणि माझ्या मते त्यालाच राजकारण म्हणतात!
नाहीतर रहा गुलाम....

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...