Wednesday, November 28, 2018

वैदिक आर्यांचा धर्म भारतात कसा आला?


Image result for aryan migration


आर्यांच्या आक्रमणामुळे येथे वैदिक धर्म व त्यांच्या भाषा पसरल्या असे आतापर्यंत मानले जात होते. जातीव्यवस्थाही आक्रमक आर्यांनी एतद्देशियांवर लादली हे मत तर लोकप्रिय होते. परंतू प्रत्यक्षात वैदिक आर्य येथे आक्रमक म्हणून नव्हे तर शरणर्थी म्हणून आले, त्यांनी येथीलच भाषा स्विकाराव्या लागल्या व येथल्या समृद्ध संस्कृतीतील देव-देव्ताहे स्विकारावुया लागल्या हे इतिहासाच्या अभ्यासावरुन स्पष्ट होते. 

अफगाणिस्तानात एकाच असूर संस्कृतीतून झरथुस्ट्री आणि वैदिक धर्म निर्माण झाले आणि पुढे त्यांच्यात वैरही निर्माण झाले हे आपल्याला अवेस्ता व ऋग्वेदाच्या तुलनात्मक अभ्यासावरुन समजते. झरथुस्ट्री धर्म प्रेषित स्थापित असल्याने त्याला एक शिस्त होती. विश्तास्पासारखा राजा आश्रयदाता म्हणून मिळाल्याने झरथुस्ट्री धर्माची वाढ होत गेली. अर्थात तुराण्यांसारखे या धर्माचे शत्रुही होते. तुराणी वैदिकांचे कधी मित्र तर कधी शत्रू म्हणून ऋग्वेदात अवतरतात. खरे म्हणजे प्राचीन इराणच्या विस्तिर्ण भुभागात असंख्य टोळ्या होत्या आणि त्यांचे एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष होते. या संघर्षाला राजकीय परिमाण जसे होते तसेच धार्मिकही होते. वैदिक धर्म जोवर असूरकेंद्रित होता तोवर झरथुस्ट्री धर्माशी त्यांचे वैर निर्माण होण्याचे कारण नव्हते. पण पुढे मात्र दोन धर्मश्रद्धांत संघर्ष निर्माण झाल्याने असुरकेंद्रीत वैदिक धर्माने देवकेंद्रीत व्हायला सुरुवात केली. वैदिक धर्माचे आश्रयदातेही बदलत राहिले त्यामुळे ऋग्वेदात धर्मश्रद्धांतील बदल दिसुन येतात. ऋग्वेदातील प्रसिद्ध दाशराज्ञ युद्धाच्या वेळेस तुत्सु जमातीचा नायक सुदास हा या धर्माचा आश्रयदाता होता असे आपल्याला दिसते. या युद्धात वैदिक धर्म विरोधी दहा टोळ्यांनी सुदासाविरुद्ध आघाडी उघडली होती. हे युद्ध ऋग्वेदात अनेक वेळा उल्लेखले गेले असून ते युद्ध झरथुस्ट्राच्या मृत्युनंतर व ऋग्वेद रचनेच्या मध्यकाळी झाले असावे असे अनुमान अंतर्गत पुराव्यांवरुन करता येते. 

या युद्धात अनु, पख्त, भलानस, द्रह्यु, पुरु, शिव, विषाणिन, पर्शु इत्यादि टोळ्या सुदासाविरुद्ध एकवटल्या होत्या. पुरुंनाही येथे यज्ञ न करणारे, इंद्राला न मानणारे म्हटलेले आहे. याचाच अर्थ असा की पुरु सुद्धा वैदिकांपासुन दूर गेले होते. या युद्धाची जागा परुष्णी नदी दिली असून ही नदी म्हणजे भारतातील रावी असावी असे आजवर मानले जात होते. पण अन्य जमातींचा भुगोल निश्चित असल्याने अनु (पार्थिया) व पर्शु (पर्शिया) हे अतीदुर पश्चिमेतील जमाती एका युद्धासाठी सिंधू नदी ओलांडुन जवळपास आठशे मैल प्रवास करतील अशी शक्यता नसल्याने ही नदी दक्षीण अफगाणिस्तानात्वीलच कोणतीतरी नदी असावी असे आता मानले जाते. शिवाय सुदास हा परुष्णी, रावीच्या काठावर राहणारा असता तर त्याचे इतक्या दुरच्या जमातींशी वैरही निर्माण होण्याचे संयुक्तिक कारण नव्हते. शिवाय या युद्धानंतर सुदास लगोलग शत्रुचा पाठलाग करीत अनु टोळीच्या वस्त्यांवर चालून गेला आणि त्यांच्या सात तटबंद्या इंद्राच्या मदतीने फोडल्या आणि खंडनी वसून केली असाही उल्लेख येतो. रावी नदीपासुन पार्थियापर्यंत सुदासाने एवढा प्रदीर्घ पाठलाग करणेही अशक्य आहे. या युद्धात सहभागी झालेल्या टोळ्या अफगाणिस्तान व निकटच्या सीमावर्ती प्रदेशातील राजांमध्ये झाले हे त्यातील सहभागी टोळ्यांवरुनच स्पष्ट होते. दुसरे असे की रावी हा परुष्णी नदीचा अपभ्रंशही नाही हेही उघड आहे. आर्य भारतातीलच होते हे सिद्ध करण्याच्या नादात भारतीय विद्वानांनी गफलती केल्या आहेत हे उघड आहे. 

येथे महत्वाची बाब ही की पुर्वी वैदिक धर्माला सहाय्य करणारे आणि वैदिक धर्म स्विकारलेलेही या युद्ध काळात वैदिक धर्माला सोडुन गेले होते. या युद्धात या दहा टोळ्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचा नायनाट झाला नाही किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरही करण्यात आले नाही. म्हणजेच वैदिक धर्माची व्याप्ती या युद्ध काळात मर्यादित झालेली दिसते. द्रुह्यु, पर्शु आणि पुरु टोळ्या एके काळी वैदिक धर्माचे सहायक होते. या नंतर त्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला. नंतर ते पुन्हा वैदिक धर्मात आलेले दिसत नाही कारण नंतरच्या ऋग्वेद आणि वैदिक साहित्यातून यातील टोळ्यांचे उल्लेख गायब झाल्याचे तर दिसतातच पण खुद्द पुरुंबाबतही अनादरच व्यक्त करण्यात आला आहे. 

याचा अर्थ असा होतो की दाशराज्ञ युद्धानंतर विजय मिळुनही वैदिक धर्माचा विस्तार झालेला नाही. शत्रुत्व उत्पन्न झालेल्या टोळ्या पराजयानंतर गप्प बसल्या असतील असेही नाही. नंतरच्या काळात सुदासानंतर वैदिक धर्माचे केंद्र पुन्हा बदललेले दिसते. ऋग्वेदाचा उत्तरार्ध भाग रचला जात असतांना सहदेव व सोमक हे पिता-पुत्र राजे होते असे दिसते. तेही भरतवंशाचे होते असे मानले जात असले तरी यातील काहींचाच संबंध एका कुळाशी जोडता येतो. नंतरच्या काळात वैदिक ऋषींना ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनच दाने स्विकारायची वेळ आलेली दानस्तुतींवरुन दिसते. 

याच वेळीस झरथुस्ट्री धर्माचे काय चालले होते हेही पाहुयात. झरथुस्ट्राने बल्ख (अवेस्तन ’बक्सोई’) प्रांताचा राजा विश्तास्पाच्या आश्रयाखाली आपल्या धर्माचा विकास केला होता. तुरिया (वैदिक तुर्वश, म्हणजेच तुरानी) लोकांतील हेयोना टोळीने त्यामुळे विश्तास्पाशी वैर घेतले. त्याचीच परिणती झरथुस्ट्राच्या अग्नीमंदिरात जाळून हत्या होण्यात झाली. ऋग्वेदानेही ही नोंद करुन ठेवली आहे. या काळात वैदिकांचे मित्र असलेले तुराणी नंतर मात्र वैदिकांचे हाडवैरी झालेले दिसतात हे दाशराज्ञ युद्ध प्रकरनात त्यांनी सुदासाविरुद्ध उभे ठाकले यावरुन दिसून येते. 

अवेस्त्याचा भुगोल नंतर बराच बदललेला दिसतो. झरथुस्ट्रानंतर जे अवेस्तन साहित्य आहे ते विपूल असले तरी इतिहाससुचक वर्णने त्यात नाहेत. परंतू त्यातील बदललेल्या भुगोलावरुन झरथुस्ट्री धर्माचा विस्तार समजून येतो. झामयाद यस्टमध्ये जो भुगोल विस्ताराने आला आहे तो सिस्टन प्रांताचा आहे. याच प्रांतातुन हेल्मंड (सरस्वती) नदी वाहते. तिच्या जलक्षेत्राची सखोल माहिती यात येते. ही नदी हमाऊन (ऋ. समुद्र) या तळ्यात विसर्जित होते. याशिवाय या नदीच्या परिसरात असलेले पर्वत व अन्य प्रदेशांचीही माहिती यात येते. हिंदुकुश पर्वत मध्याला, बाजुलाच एरिया, मार्जियाना, ड्रांगियाना आणि भारत-इराण सीमेवरील गांधारपर्यंत हा भुगोल यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की झामयाद यस्टच्या काळात झरथुस्ट्री धर्माने दक्षीण अफगाणिस्तानवरही, म्हणजेच वैदिकांच्या मुळ आश्रयस्थानावरही वर्चस्व मिळवले होते त्याशिवाय अन्य अवेस्त्यात न येनारी एवढी सखोल माहिती आली नसती. पुढे झरथुस्ट्री धर्माची व्याप्ती पर्शियापर्यंत झालेली दिसते. 

वैदिक धर्माचा उगम सिस्टन प्रांतातच व सरस्वती (हरहवती/हेल्मंड) नदीच्या परिसरातच झाला. सरस्वतीचे अतोनात गुणगाण गायले जायचे कारणही तेच आहे. याच प्रांतात नंतर झरथुस्ट्री धर्माचा जोर वाढल्याचे, किंबहुना बल्ख प्रांत ओलांडत तो धर्त्म दक्षीणेतही प्रबळ झामयाद यस्टवरुन सूचित होते. मग यावेळेस वैदिकांची अवस्था नेमकी काय होती? वैदिकांनी असूर (अहूर माझ्दा) धर्माला कसे तोंड दिले?

वैदिक धर्माला या काळात उतरती कळा लागली हे आपल्याला ऋग्वेदावरुन कळते. इतके की ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनही दाने स्विकारावी लागली. (ऋ. ६.४५.३१-३२) प्रबळ राजाश्रयाच्या अभावात कोणत्याही धर्माला उतरती कळा लागणे स्वाभाविक आहे. उत्तर अफगाणिस्तानापर्यंत मर्यादित असलेला झरथुस्ट्राच्या काळातील धर्म नंतर दक्षीणेकडेही स्थिर होत असल्याचे आपण झामयाद यस्टवरुन पाहिले. येथे नेमके काय झाले किंवा कोणत्या टोळ्यांनी झरथुस्ट्री धर्माचा अंगीकार केला हे स्पष्ट लिहिले नसले तरी नंतर पर्शु व तुर्वशांसहित अनेक टोळ्या या धर्मात गेल्या असा अंदाज बांधता येतो. अवेस्त्याची नंतरची रचना पर्शियन भाषेतीलच आहे. पर्शुंनीही राजाश्रय दिल्याखेरीज हे घडणे शक्य नाही.

ब्राह्मण ग्रंथांत देवासुर युद्धांच्या अनेक पुराकथा येतात. त्यातील मिथकीय अंश जरी दूर केला तरी देव (वैदिक) विरुद्ध असूर (झरथुस्ट्री) यांच्यामधील संघर्षाचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते. शतपथ ब्राह्मणात एक कथा येते ती अशी- देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५). या कथेतील वैदिक शैलीतील मिथकीय अंश दूर काढला तर हे लक्षात येते की देवांना (म्हणजे वैदिकांना) पराभव स्विकारावा लागल्याने भुमीहीन व्हावे लागले होते, असुरांना नाही. या कथेतील उत्तरार्धातील भाग हा केवळ मलमपट्टी या स्वरुपाचा आहे. मुळात ही देवासूर युद्धे संपुर्ण काल्पनिक नसून देवकेंद्रीत धर्म आणि असूरकेंद्रीत धर्म यातील संघर्षाचे सूचन करतात हे उघड आहे. देवांनी, कपटाने का होईना, पण शेवटी विजयच मिळवला असे दर्शवले जात असले तरी वास्तव तसे सांगत नाही. कारण पुढचा इतिहास त्या जयाच्या कथेला पूरक ठरत नाही, एवतेव त्या काल्पनिक ठरतात.

काही वैदिकांना सरस्वती नदीचा प्रदेश सोडून हिंदुकुश ओलांडत भारतात कसे यावे लागले याचीही स्मृती एका पुराकथेच्या रुपाने शतपथ ब्राह्मणाने जपून ठेवली आहे. किंबहुना वैदिकांच्या स्थलांतराची ही एकमेव कथा वैदिक साहित्यात येते व ही बाब लक्षणीय आहे. शतपथ ब्राह्मणात (श. ब्रा. १.४.१, १४-१७) येणारी ही कथा अशी-

"सरस्वती नदीच्या तीरावर राहणा-या विदेघ माथवाच्या मुखातून अग्नी पडल्यावर तो अग्नी पृथ्वीला (अरण्यांना) व नद्यांना जाळीत (कोरड्या करत) पुर्वेकडे निघाला. विदेघ माथव व त्याचा पुरोहित गौतम राहुगन त्या अग्नीच्या पाठोपाठ निघाले. तो अग्नी शेवटी उत्तरगिरीतुन वाहणा-या सदानीरा नदीजवळ आला. अग्नी या नदीला सुकवू शकला नाही. ब्राह्मणांनी ही नदी कधीही पुर्वी ओलांडलेली नव्हती. विदेघाने अग्नीस विचारले की मी कोठे राहु? तर अग्नीने उत्तर दिले की या नदीच्या पुर्वेकडे रहा. तेंव्हा सदानीरेच्या पुर्वेची जमीन दलदलीची व लागवडीखाली नव्हती." ही कथा सांगून याच्या शेवटी विदेहाचा राजा माधवाशी विदेघ माथवाचा संबंध जोडण्यात आला आहे. असे असेल तर मुळातच विदेह माधव असे नांव न घेता विदेघ माथव असे घ्यायचे कारण काय हा प्रश्न निर्माण होतो. उत्तरकाळात विदेह प्रांताशी विदेघमाथवाचा ओढून ताणून संबंध जुळवण्यासाठी पुराकथेचा उपयोग केला गेला आहे हे निश्चित  आहे. यात विदेघ हे प्रांताचे नांव नसून खुद्द माथवाचे पहिले नांव आहे. त्या वेळीस माथव हीच एखादी टोळी असू शकते. माथव हा शब्द मधुवरुन आलेला नाही यामुळे माधव व माथव याचा काहीएक संबंध नाही. 

या कथेतील वैदिक पुराकथनात्मक शैली लक्षात घेता समोर येणारी बाब ही की सरस्वती (हरहवती) नदीच्या काठावर कोणी विदेघ माथव नांवाचा राजा अथवा टोळीप्रमुख रहात होता व गौतम राहुगन हा त्याचा पुरोहित होता. त्यांनी सपरिवार एके दिवशी (अथवा रात्री) सरस्वती नदीचा किनारा सोडला व हिंदुकुश पर्वत (उत्तरगिरी म्हणजे हिमालय नव्हे. गिरी हा शब्द कमी उंचीच्या पर्वतांसाठी वापरला जातो. हिमालयाचा उल्लेख प्राचीन साहित्यात हिमवत अथवा हिमवन असाच येतो.) ओलांडत सिंधू नदीच्या पार हे लोक एका नदीजवळ आले. हा प्रदेश उजाड व दलदलीचा होता. या नदीच्या पुर्वेला त्यांनी वस्ती केली. येथवर कधीही यज्ञ (वैदिक धर्मीय) आलेला नव्हता हे कथेतच स्पष्ट आहे. 

आर्य आक्रमणवादी विद्वानांनी या कथेतून वैदिक आर्यांचा पंजाबातून पुर्वेकडे (विदेहाकडे) विस्तार झाल्याचा अर्थ काढला आहे. सदानीरा नदी म्हनजेच गंडकी असाही अनेक विद्वानांचा तर्क आहे. त्यांचा एकंदरीत मतितार्थ असत्यो की पंजाबमध्ये वेदरचना पुर्ण झाल्यानंतर वैदिक आर्यांनी पुर्वेकडे विस्तार सुरु केला. पंण असे असते तर मग गांधार वगळता खुद्द पंजाबमधीलच तत्कालीन राज्ये तसेच केकय, कुरु, पांचाल, मगध, कोसलादि राज्यांचा उल्लेख ऋग्वेदात एकदाही येत नाही. येतात ते उत्तरकालीन साहित्यात. ऋग्वेदात येणा-या सर्वच जमाती पश्चिमोत्तर भारत व प्राचीन इराणमधील आहेत. म्हणजे ऋग्वेदाचा भुगोल वेगळा होता व अन्य वेद ते ब्राह्मण ग्रंथांचा भुगोल वेगळा होता. वैदिक धर्म नंतर बिहार (मगधात) व अन्य प्रदेशांतही नंतर गेला हे खरेच आहे. पण नोंदले गेलेले पहिले स्थलांतर शतपथ ब्राह्मणात आहे व तेही पुरातन स्मृतीस्वरुपात आलेले आहे. त्यामुळे विद्वानांच्या तर्क-वितर्कांना कसलाही ठोस आधार नाही.  

जो घोळ त्यांनी कारण नसता सरस्वती नदीच्या मुळ स्थानाबद्दल घातला आहे तसाच गोंधळ गंडकीबाबत केल्याचे आपल्याला दिसून येते.  मुळात बिहारमधून वाहणारी गंडकी म्हणजे सदानीरा नव्हे. अमरकोशाचा अमरसिंह म्हणतो की सदानीरा हे बहुदा बंगालमधील कर्तोया नदीचे नांव असावे. म्हणजे तोही ठाम नाही. महाभारतातील हकीकत पाहिली तर जे वर्णन मिळते त्यावरुन शरयु व गंडकीमधूनच्या परिसरातुन वाहणारी ही कोणतीतरी नदी असावी असे दिसते. हे तर्क सोडले तर या नांवाची एकही नदी उत्तर भारतात नाही. वैदिकांना पूज्य असलेल्या सरस्वती नदीचे नांव घग्गर कसे होऊ शकेल हा जसा प्रश्न आहे तसाच गंडकीचे नांव सदानीरा कसे बनले हाही प्रश्न आहे कारण याला कालौघात झालेला अपभ्रंशही म्हणता येत नाही. एवतेव विदेहाचा आणि विदेघ माथवाचाही संबंध नाही. सदानीरा म्हनजे सतत पाणी असलेली नदी. हे वर्णन कोणत्याही नदीला लागु पडते. निर्मनुष्य भागातील दलदलीच्या भागात वस्ती करणा-या विदेघ माथवाने त्या नदीचे तात्पुरते नामकरण केले आणि नंतर ते विस्मरणातही गेले एवढेच फारफारतर या संदर्भात म्हणता येईल. त्यामुळे हा पंजाबमधुन बिहारकडे (मगध/विदेहाकडे) झालेला विस्तार नसून सरस्वती (द. अफगाणिस्तान) ते सिंधू नदीचे खोरे असा हा प्रवास आहे. हा प्रवास त्यांना शहरी वस्त्या टाळत अरण्यातून अनेक नद्या ओलांडत एका निर्मनुष्य भागात वस्ती केली. हा भाग दलदलीचा असला तरी सुरक्षित असल्याने त्यांना तात्पुरते का होईना तेथे राहण्यावाचून इलाज नव्हता.

मगधादि पुर्वेचे प्रदेश सनपूर्व तीन हजारपासून वस्त्यांनी गजबजलेले होते. याचे पुरावे पुरातत्वीय उत्खननांतून मिळालेले आहेत. गंगा-यमुना संगमाजवळील झुसी येथे इसपू सहा हजार वर्षापासुन वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिंधू संस्कृती व गंगेच्या खो-यातील लोकांचचा संपर्क असून परस्पर देवाणघेवानही होत होती असे फुल्लेर यांनी दाखवून दिलेले आहे.  याचाच अर्थ असा की पंजाबच्या पुर्वेला वैदिकांनी पहिल्या वसाहती बनवल्या या मताला काहीही अर्थ नाही. आणि दुसरे म्हणजे विस्तार करीत असतांना कोनाशी त्यांचे युद्ध झाल्याचेही सूचन नाही. याचा अर्थ एवढाच की लोकवस्त्या टाळत वैदिकांनी प्रवास केला खरा पण तो पंजाबमधून पुर्वेकडे नव्हे तर अफगाणिस्तानातील सरस्वतीच्या पुर्वेकडे भारतीय उपखंडात, सिंधु नदीच्याही पुर्वेकडे. उत्तर भारतातील मर्यादित प्रदेश त्यांना नंतर क्रमाक्रमाने माहित होत गेले आणि त्याचेही सूचन आपल्याला शतपथ ब्राह्मणात मिळते. खरे तर मगधात खूप उशीरापर्यंत वैदिकांना प्रवेशच मिळालेला नव्हता असे शतपथ ब्राह्मणानेच नोंदवलेले असल्याने विदेघ माथवाच्या कथेतून काढलेले आर्य आक्रमणवादी सिद्धांताचा पायाच निघून जातो हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

येथे हा प्रश्न निर्माण होतो की मुळात विदेघ माथव, त्याचा पुरोहित गौतम राहुगन आणि त्यांचा परिवार किंवा समस्त टोळी असे अचानक सरस्वती नदीच्या काठावरुन का निघाले असतील? या प्रश्नाचे उत्तर आपण अहुर माझ्द्याचा, म्हणजेच झरथुस्ट्र धर्माच्या विस्तारात पाहिले आहे. बव्हंशी वैदिक टोळ्यांनी स्वेच्छेने अथवा जबरदस्तीने झरथुस्ट्री धर्मात प्रवेश केला खरा पण जे कट्टर वैदिक होते त्यांनी मात्र धर्म जतनासाठी स्थलांतर करणे पसंत केले. अग्नी विदेघ माथवाच्या तोंडात होता (म्हणजे उघड नव्हता) हे शतपथ ब्राह्मणातील कथा हेच आपल्याला सांकेतीकपणे सांगते. म्हणजेच ही मंडळी झरथुस्ट्री लोकांपासुन लपून छ्पून अफगाणिस्तानातुन निघून गांधार (हिंदुकुश) ओलांडत भारतात आली हे यावरून सूचित होते. अशी कोणत्याही धर्माच्या आक्रमणानंतर अथवा छळानंतर धार्मिकांनी केलेली अनेक स्थलांतरे इतिहासाने नोंदवून ठेवलेली आहेत. त्यामुळे याच स्थलांतराचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देव-असूर युद्धात पराजय झाला असला तरी आत्मगौरव/अस्मिता जपण्यासाठी विजयच कसा झाला हे सांगितले गेलेले असले तरी ते ऐतिहासिक वास्तव दिसत नाही.

शुद्रांच्या राज्यात

आता, जेथे त्यांनी वास्तव्य केले तो प्रदेश कोणाचा होता हेही आपण उपलब्ध पुराव्यानुसार पाहुयात. वैदिकांचा हा पहिला थांबा शुद्रांच्या राज्यात असल्याचे पुरावे आपल्याला सुदैवाने उपलब्ध आहेत. सिंधू नदीच्या पुर्व भागात शुद्र टोळीचे राज्य होते. हे राज्य केवळ पुराणकथीय नसून ते वास्तवात अस्तित्वात होते. शूद्र नांवाची एक टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात रहात होती याबाबतचे अनेक पुरावे सुदैवाने उपलब्ध आहेत. अलेक्झांडरचा इतिहासकार डायोडोरस हा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या काळात त्याच्या सोबत होता. त्याने सिंध प्रांतातील सोद्राइंशी झालेल्या युद्धाचे व अलेक्झांडरने त्या प्रांतात एका नदीच्या काठी वसवलेल्या अलेक्झांड्रिया नगरीचे वर्णन करून ठेवले आहे. ५ सोद्राई हे नांव सुद्द ( नंतरचे संस्कृतीकरण शूद्र) शब्दाचा ग्रीक अपभ्रंश आहे हे सर्व विद्वान मानतात. अलेक्झांडरचे आक्रमण इसपू चवथ्या शतकात झाले हे सर्वविदित आहे त्यामुळे तोपर्यंत तरी ही जमात त्या भुभागात अस्तित्वात होती. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, "शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती याबाबत शंका नाही." 

महाभारतात शूद्र टोळीचे नांव अभिरांसोबत तर वारंवार घेतले आहे. युधिष्ठिराच्या राज्यारोहण समारंभापुर्वी उत्तरेकडे दिग्विजयासाठी गेलेल्या नकुलाला शूद्र टोळीप्रमुखाने नजराने दिले. भारत युद्धात शूद्र जमात अभिरांसह दुर्योधनाच्या बाजुने लढली. इतिहासकार ग्यानचंद चौहान म्हणतात कि अभिरांसोबतच शूद्र टोळीचे इतके उल्लेख मिळतात कि महाभारत काळापर्यंत सिंध प्रांतात ही टोळी अत्यंत भरभराटीला आलेली होती असे स्पष्ट दिसते.  शूद्र टोळीचे उल्लेख स्वतंत्रपणे मार्कंडेय व ब्रह्म पुराणातही आलेले आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे शुद्र हे सिंध प्रांतातील एका जमातीचे नांव होते. त्या प्रांतातच अनेक अन्यत्र अनेक स्वतंत्र नांव असलेल्या अभिर, शिबीसारख्या अनेक जमाती होत्या. प्रत्येक जमात अथवा गण स्वतंत्र नांवाने आपापल्या भुभागात भारतभर सुखनैव जगत होता. 

निर्मनुष्य भागात वस्ती केली असली तरी तो भाग कोणाच्या तरी राज्यात होता. शुद्र टोळीने त्यांना हाकलून लावायचा प्रयत्न केलेला दिसत नाही. शिवाय या राज्यात ते बराच काळ राहिले असावेत. ऋग्वेदाचा बराच भाग येथे आल्यावर रचला गेला. विदेघ माथवाने अज्ञातवासातील अनेक वैदिकांनाही तेथे बोलावले. यजुर्वेदासहित ऋग्वेदाची पुनर्रचना बव्हंशी येथेच झालेली दिसते. आसपास शुद्रच लोक असल्याने आणि त्यांच्याच मेहरबानीने जगावे लागत असल्याने शुद्र समाजाला आदरार्थी महत्व दिले जाणे स्वाभाविक होते. शूद्रांचा धर्म वेगळा आहे याचीही त्यांना जाणीव होती. असे असले तरी त्यांना खूष करायला त्यांच्यासाठीही यज्ञ केले गेल्याचे आपल्याला मनुस्मृतीवरुनच लक्षात येते. "ब्राह्मण देवांपासून उत्पन्न झाले तर शूद्र असुरांपासून निर्माण झाले" असे तैत्तिरिय ब्राह्मणाने (तै,. ब्रा. १-२.६.७) नोंदवून ठेवले. भारतातही असूर संस्कृती होतीच पण ती मुर्तीपुजकांची होती. 

यजुर्वदेही अशीच नोंद करतो. “शूद्रार्यावसृज्येताम”  (यजुर्वेद १४/३०) हे विधान बळ देते. "शूद्र व आर्य यांना निर्माण करण्यात आले." असे यात स्पष्ट म्हटलेले आहे. आर्य व शुद्र हे दोन वेगळे समाज आहेत व त्यांचे निर्मिती स्वतंत्रपणे खालेली आहे याचे स्पष्ट भान वैदिकांना आहे. एवढेच नव्हे तर यजुर्वेदात शुद्रांच्या कल्यानासाठीही प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत. (यजुर्वेद १८.४८, २०.१७, २६.२) याचा अर्थच असा होतो कि आर्य (म्हणजे वैदिक धर्मीय) व शूद्र यांची निर्मिती स्वतंत्रपणे झाली, हे दोन्ही वेगळे आहेत. येथेही अन्य जमातींची नांवे येत नाहीत कारण या ऋचांची रचना शुद्रांच्याच राज्यात झालेली होती. त्यांच्याच मेहरबानीवर अवलंबून असल्याने ते वेगळे आहेत हे माहित असतांनाही त्यांच्याही कल्याणासाठी प्रार्थना करणे स्वाभाविक होते. अद्याप अन्य जमातींशी वैदिकांचा परिचय झाला नव्हता. किंबहुना सिंधु नदीच्या पलिकडे सारे हिंदू राहतात असा समज जसा प्रचलित होता तसाच समज वैदिकांचाही शुद्रांबाबत झाला असल्यास नवल नाही. त्यामुळे पुढे वैदिकांनी अवैदिक भारतीयांसाठी शूद्र हे नांव सरसकटपणे वापरल्याचे आपल्याला दिसते आणि त्यातुनच मोठा सांस्कृतीक गोंधळ झाला हे एक कटू वास्तव आहे. 

अर्थात येथवर शुद्र आणि वैदिक आर्य यांचे संबंध चांगलेच होते. वैदिकांनी या काळात वेदाचे संकलन, पुनर्रचना व अधिकची भर घालत यज्ञसंस्था बळकट तर केलीच पण त्यांचे स्वसामाजिक पुनर्गथणही केले. अफगाणिस्तानात असतांना आवश्यक न भासलेली वर्णव्यवस्था त्यांना येथे निर्माण करावी लागली. पुरुषसुक्ताची रचनाही येथेच झाली. समस्त समाज पुरुषाचे कल्पना करतांना शुद्रांना वगळणे त्यांना शक्य नव्हते. त्यासाठी पुरुषसूक्त हाच महत्वाचा पुरावा आहे. 

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत 

विराट पुरुषाचे मुख हे ब्राह्मण झाले, बाहु हे क्षत्रीय झाले, मांड्या या वैश्य झाल्या तर शूद्र हे पायापासून जन्माला आले. येथे पाय हे शूद्र झालेले नाहीत. कारण ते त्या विराट पुरुषाच्या शरीराचे हिस्सेच नाहीत ही जाणीव त्यांना होती. त्यांची नोंद शेवटी केली गेली याचेही हेच कारण आहे. ज्या यज्ञात विराट पुरुषाचा बळी दिला तो उभा नव्हे तर आडवा. त्यामुळे शुद्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन परके, वैधर्मी, पण महत्वाचे असा दिसतो. ते वैदिक समाजव्यवस्थेचे भाग नाहीत ही जाणीव असल्याने  पाय हे शूद्र बनले नाहीत. त्यांची उत्पत्ती स्वतंत्र आहे हे त्यांना माहित आहे. अन्य जमाती भारतात असुनही त्यांचे नांव येत नाही कारण त्या त्यांना माहितच नव्हत्या. मनुस्मृतीच्या काळापर्यंत त्यांना विंध्याच्या पलीकडे दक्षीनेत कोण रहाते हेही माहित नव्हते. किंबहुना अन्यत्र सर्व शुद्रच राहतात व शुद्रच राजे आहेत हा समज त्यांचा अगदी मनुस्मृतीच्या आरंभकाळापर्यंत होता हे मनुस्मृतीवरुनच स्पष्ट दिसते. 

म्हणजेच शूद्रांच्याच राज्यात त्यांच्याच आश्रयाखाली रहात असतांना आणि ते आपल्या धर्माचे/संस्कृतीचे नाहीत पण प्रभावी समाजघटक आहेत असे पुरुषसुक्तच सांगत असतांना याकडे मात्र वर्चस्वतावादी आणि हीनगंडवाद्यांनी दुर्लक्ष केले. यजुर्वेद व तैत्तिरिय ब्राह्मणामधील नोंदीही तपासायचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत. शिवाय ऋग्वेदात दास, दस्यू, पर्शु, पख्त, पार्थियन अशा जवळपास ४८ टोळ्यांची नांवे येत असतांना या सुक्तात त्यांचे समाजघटक म्हणून नांव न येता, तोही केवळ एकदाच, “शूद्र” हा शब्दच एक वर्ग म्हणून केवळ पुरुषसुक्तातच का अवतरतो याकडेही विद्वानांनी लक्ष दिले नाही. त्या ४८ टोळ्या पार मागे सुटुन गेल्या होत्या आणि आता ते शुद्रांच्या सन्निध्यात आले होते म्हणून त्यांचे नांव आले हे येथे लक्षात घ्यायला हवे.  

शुद्र जमातीच्या राज्यात वसाहती करून रहात असतांना त्यांना शेती, पशुपालनादि व्यवसाय चरितार्थासाठी करणे भाग होते. हे व्यवसाय करतांना मदतनीस म्हणून कर्मचा-यांची गरज भासने   स्वाभाविकच होते. आता कोण त्यांच्याकडे सेवक म्हणून राबनार? गरजू लोकांची समाजात कमतरता नसते. किंवा अधिक वेतनावर काम मिळनार असेल तर लोक सध्याचे उपजिविकेचे  साधन सोडून देतात. तसेच त्यांना जे सेववर्गातील लोक मिळाले ते स्वाभाविकच शूद्र जमातीतीलच गरजू लोक असनार. असा सेवकवर्ग वैदिक वसाहतींच्या जवळच स्वतंत्र वसाहतीत राहणार हे ओघाने आले. या काळात सेवकवर्गात नसलेल्या शुद्र राजासाठी अथवा शूद्र धनिकांसाठीही यज्ञ केले जात हेही महाभारत व मनुस्मृती नोंदवते. हे यज्ञ कृतज्ञतेपोटी अथवा दानदक्षीणेच्या प्राप्तीसाठी होत असत. नंतर शुद्रांसाठी यज्ञ करणा-या पुरोहितांना हीण लेखले जाऊ लागले. येथे त्या तपशिलात न जाता एवढेच सांगतो की ऋग्वेदाची उर्वरीत रचना व पुनर्मांडणी शुद्रांच्याच राज्यात झाली. यजुर्वेद व ब्राह्मण ग्रंथांची रचनेस येथेच सुरुवात झाली. नंतर मात्र वैदिक येथुनही पुढे सरकलेले दिसतात व तो प्रवास आपल्याला पुढीलप्रमाणे पहाता येतो. 

महत्वाची बाब म्हणजे शूद्र या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत भाषेत लागत नाही. किंबहुना शूद्र या शब्दाचा कोणताही अर्थ सापडत नाही. प्राकृत "सुद्द" या शब्दाचा हा वैदिक अपभ्रंश आहे हे उघड आहे. वैदिकांनी अनेक शब्दांचे असे अपभ्रंश केले आहेत. उदा. म्लेंछ हा शब्द "मेलुहा" या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे दानी आणि थापरांनी दाखवुन दिलेले आहे. ‘मेलुहा हे राष्ट्र म्हणून वैदिकांना परकीयच होते. पुढे हा शब्द भारताबाहेरच्या परकीयांसाठी कायम राहिला असे आपल्याला दिसते. शिवाय ऋग्वेदाच्या भाषेवर नंतरही वारंवार संस्कार करण्यात आले. मुळची अवेस्त्याच्या निकट जाणारी भाषा बदलण्याच्या प्रयत्नांत मुळ पर्शियन नांवांचेही अपभ्रंश झाले. उदाहणार्थ अरजास्पचे वैदिक नामांतर ध्वनीबदल करत ऋजाश्व असे करण्यात आले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे वैदिक भाषा ही शुद्ध आहे वगैरे समज बाळगण्याचे काही कारण नाही. 
 
विदेघ माथवाच्या पुरोहिताने स्मरणात आहे तेवढा वेद सोबत आणला खरा पण सर्व त्यालाही माहित नव्हता कारण अनेक ऋषीकुलांत वेद विभाजला गेलेला होता. सर्वच ऋषीकुळात मैत्रीचे संबंध नव्हते. उदाहणार्थ विश्वामित्र व वसिष्ठाच्या घराण्यात वितुष्ट होते. या दोन ऋषी कुटुंबाच्या नांवाने दोन महत्वाची मंडले आहेत. ते एकमेकांची मंडले पाठ ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण संकलन आवश्यक असल्याने विदेघ माथव अथवा त्याच्या वंशजांनी प्रयत्नपूर्वक मिळेल तसा वेद गोळा केला. त्याची मंडले/सुक्ते यात विभागणी केली व जेथेही रिक्त जागा होत्या तेथे स्मरणातून भर घातली. दहावे मंडल हे सर्वात अर्वाचीन समजले जाते. ऋग्वेदातील नदीसूक्त व पुरुषसूक्त हे अर्वाचीन समजले जाते. असे असले तरी नदीसुक्ताआधी पुरुषसुक्ताची निर्मिती झाली हे उघड आहे. याचे कारण म्हणजे या सुक्तात शुद्रांचा जसा उल्लेख येतो तसेच दुसरा वर्ण म्हणजे राजन्याचा उल्लेख येतो. पुढे मात्र राजन्य हा वर्ण पुर्ण गळालेला दिसतो व क्षत्रीय हा दुसरा वर्ण समजण्याची प्रथा निर्माण झालेली दिसते. नदीसुक्तात भारतातील गंगा-यमुनेसारख्या पुर्वेकडील नद्यांची नांवे येतात म्हणजेच तोवर त्यांना ऐकून का होईना त्या नद्या माहित झालेल्या होत्या. ऋग्वेदात अन्यत्र कोठेही या नद्यांचा उल्लेख येत नाही कारण तेंव्हा ते भारतात प्रवेशलेलेच नव्हते. केवळ या सुक्तावरुन वैदिक आर्य हे मुळचे भारतातीलच होते हे मत टिकत नाही, कारण अन्यत्रच्या त्यांच्या अनुल्लेखाचे दुसरे कोनतेही स्पष्टीकरण विद्वानांकडे नाही. 

शिवाय येथे ऋग्वेदाची मुळची अवेस्ता सदृष्य भाषाही प्राकृत वळणे घेतांना दिसते. या भाषेवर शुद्रांच्या राज्यात बोलल्या जाणा-या प्राकृतचा प्रभाव आहे असे म्हटले तरी वावगे व अनैतिहासिक होणार नाही. ऋग्वेदातील मुळच्या रचनेत ध्वनीबदल केला गेल्याने वैदिक छंदही बदलले. उदाहरणार्थ म्यक्समुल्लर म्हणतो, "या सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमद्ध्ये नाहीत व ऋग्वेदातही अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. या सुक्ताची भाषाही अर्वाचीन आहे."  थोडक्यात ऋग्वेदाचे संपादन व दहाव्या मंडलाचे बरेचसे लेखन हे भारतात आल्यावर झाले आहे.तत्कालीन शुद्रांमध्ये प्रचलित असलेल्या तंत्रांचाही प्रभाव पडल्यामुळे विवाह, अंत्यसंस्कार, मरणोत्तर गती अशा संकल्पनाही ऋग्वेदात घुसल्या ज्या तत्पुर्वीच्या सुक्तांत पुर्णतया अदृष्य आहेत. ऋग्वेदाची पायाभूत भाषा प्राकृत असल्याची तर अनेक उदाहरणे आहेत. अवेस्ता-सदृष्य भाषेपासून वैदिकांना फारकत घेणे आवश्यक होते कारण त्यांना येथील भाषा-पर्यावरणात धर्म पसरवायचा होता. त्यामुळे वैदिक आधी व प्राकृत नंतर या भ्रमातून आजच्याही विद्वानांनी येणे आवश्यक आहे. 

लोहित. लभ, काल, लक्ष्मी, आज्य, विजय, एवम हे नवे शब्द दहाव्या मंडलात येतात. देवास:, सत्यास: अशा संस्कृत बहुवचनांऐवजी देवा:, सत्या: असे बहुवचनी प्रयोग अधिक वेळा यात आले आहेत. अनेक नवीन देवता या मंडलात अवतरतात त्या, उदा. मन्यू, श्रद्धा, लक्ष्मी, तार्क्ष्य ई., ऋग्वेदात या मंडलात अवतरतात. १० या देवता शुद्रांकडून वैदिकांनी उधार घेतल्या असल्याची शक्यताच अधिक आहे. भाषाप्रयोगासाहितचे हे त्या शूद्र टोळीचे वैदिकांवरील ऋण आहे. उलट वैदिकांचे घोर अज्ञान हे की तेंव्हा तोवर तरी उत्तर भारतात अजून कोणत्या टोळ्या रहात होत्या याचे भान अथवा ज्ञान नव्हते. ब्राह्मण ग्रंथांत मात्र क्रमश: त्यांचे भारताचे भौगोलिक ज्ञान काही प्रमाणात वाढलेले दिसते आणि इतर जमातींचीही नांवे येवू लागतात. 

शूद्र हे नांव त्यांनी भारतातीलच सर्व जमातींना सरसकट वापरल्याने व धर्मांतरितांनाच वैदिक वर्ण दिल्याने मोठा गोंधळ झाला असला तरी यासाठी आपण अन्य विद्वानांनी शूद्र कोण याबद्दल काय मत दिले आहे हे पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी. ११
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." वि. का. राजवाडॆ. १२  
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे वतीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर. १३ 

अंगविज्जा या पहिल्या शतकातील माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथातही त्रैवर्णिकांनाच आर्य धर्माचे म्हटले असून शुद्र, यवन, शक, कुशाण वगरे गट हे म्लेंच्छ होत असे म्हटलेले आहे.  मनुस्मृती व पातंजली महाभाष्यही (२.४.१०) अशीच मांडणी करते. याचा अर्थ स्पष्ट आहे की ती शुद्र टोळी व नंतर ज्यांनाही वैदिकांनी सरसकटपणे शूद्र म्हटले त्यांचा धर्म आर्य अथवा वैदिक अथवा सनातन धर्म नव्हता तर तंत्राधारित शिव-शक्तीप्रधान मुर्तीपूजकांचा धर्म होता. 

वैदिक विस्ताराची सुरुवात

वैदिकांचा भारतातील पहिला थांबा कुरु प्रदेश असावा व त्यांचा राजाश्रय त्यांना मिळाला असावा असे ग्रिफिथ सुचवतो. उपलब्ध पुरावे पाहता असलाच तर तो दुसरा थांबा होता. दोन -तीन पिढ्यानंतर शुद्रांच्या राज्यातून वैदिक धर्मीय पुर्वेकडे सरकू लागले. या दरम्यानच्या काळातच त्यांचा व्रात्यांशीही संपर्क आला असावा. याच काळात अनेक शूद्र ते व्रात्यही वैदिक धर्मात प्रवेशलेले दिसतात. त्यामुळेच काही नव्या देवतांचा समावेश ऋग्वेदाच्या अंतिम भागात झालेला दिसतो. कुरुंचा राजाश्रय मिळाल्याने त्यांना आपले ग्रांथिक कार्य पुर्ण करीत धर्माला शिस्तबद्ध स्वरुप देण्यास मदत झाली. येथे त्यांनी धर्मप्रसाराची मोहिम हाती घेण्यासाठी प्रसारकांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. भागवत व ब्रह्मांड पुराणात येणा-या कथांवरुन ही प्रक्रिया समजून घेता येते. या प्रक्रियेलाच वैदिक शाखा निर्मिती असे म्हणतात. सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक (शाखा) निर्माण झाले व त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. असे असले तरी अगस्तीवर तंत्रांचाही प्रभाव असावा असे दाक्षिणात्य परंपरेवरुन दिसते. तमिळ पुराकथांनी त्याला शिवाशी आणि श्रीविद्या तंत्रपरंपरेशी जोडले आहे.  

‘दाक्षिणात्यांनी वैदिक अगस्त्याचे हिंदुकरण कसे केले हे याचे एक वेगळेच उदाहरण आहे. असे असले तरी अगस्त्याने दक्षीणेत वैदिक धर्म व वर्णसंस्था पोहोचवण्यात यश मिळवले. दक्षीणेतील अगस्त्याचे आगमन हे इसपूच्या पहिल्या ते इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या दरम्यानचे आहे हे आपल्याला संगम साहित्यात तोवर कोठेही वैदिक तत्वही आढळत नसल्याने निश्चयाने म्हणता येते. 
वैदिक धर्म हिंसेने नव्हे तर काही घटकांतच अणि तोही प्रचार व धर्मांतराने पसरला. उपनयन विधी हा मुलचा धर्मांतराचा विधी होता असे स्पश्झ्ट आहे कारण हा विधी ऋग्वेदात कोठेही येत नाही. हा काळ सरासरी इसपू हजारच्या आसपासचा असावा असा अंदाज विद्वानांनी व्यक्त केला आहे. येथे हेही लक्षात घ्यायला हवे की कुरु-पांचालादि राज्यांमधे तेंव्हा महाभारतात येणा-या राजांचे दुरचे वंशज राज्य करीत होते. भारत कथा (म्हणजे युद्धादि प्रकरण) येथवर लोककाव्यांतच जीवंत होते. कुरु वंशाची वंशावळ धुसर झाल्याने फार पुढे वैदिकांनी महाभारताचे वैदिकीकरण करतांना अनेक वैदिक व्यक्तींची नांवे विस्मृत झालेल्या राजांच्या जागी टाकुन दिली त्यामुळे महाभारतात येणारी वंशावळ ही बरीच बनावट असल्याचेही आपल्याला दिसून येते. 

वैदिक धर्माचा प्राणगाभा म्हणजे यज्ञ होय. ब्राह्मण ग्रंथांनी आपल्या धर्माचे आकर्षण वाढवण्यासाठी यज्ञपद्धती अत्यंत काटेकोर व सामुहिक पद्धतीने चालणारी बनवली. यात काही यज्ञ तर बारा वर्षही चालत.  भारतातील भक्ती संकल्पनेशी परिचय झाल्याने मुर्तीपूजा जरी वैदिकांना त्याज्ज्य असली तरी त्यंनी अग्निचयन विधीच्या रुपाने अग्नीलाच काल्पनिक पुरुषरुपात पहायला व श्येन पक्ष्याच्या आकारात बनवायला सुरुवात केली. स्थानिकांच्या श्रद्धांचे असे वैदिकीकरण केल्याखेरीज धर्म प्रचार अशक्यच होता हे उघड आहे. तोवर विदेहापर्यंत पोहोचलेल्या वैदिक प्रचारकांना सामना करावा लागला तो प्रगल्भ व परिणत स्थितीत पोहोचलेल्या सांख्य विचारांचा. भारतीय सहिष्णुच असल्याने नव्या कल्पना न धिक्कारता त्यांच्याशी चर्चा करण्याचा, समजावून घेण्याचा प्रयत्न असे. विदेहात यज्ञ की ब्रह्म (वैदिक अर्थ मंत्र तर विश्वनिर्मितीचे गुढ तत्व हा औपनिषदिक अर्थ, यक्ष शब्दाचा पर्यायी शब्द.) या चर्चांतून अनेक उपनिषदे निर्माण झाली. ही वैदिकांनी नव्हे तर हिंदुंनी निर्माण केली. त्यात दोन तत्वांचा समेट करण्याचाही प्रयत्न दिसून येतो. वैदिकांनीही वेदमाहात्म्य सांगणारी उपनिषदे लिहिणे स्वाभाविक होते. आपल्याकडे ख्रिस्त्यांनी "ख्रिस्तपुराण" लिहिले तसेच हे होते. यात वैदिक धर्माचा विजय झाल्याचे दिसत नाही. उलट त्यांना अनेक अवैदिक तत्वधारांना स्विकारावे लागले. येथेच मुळचा वैदिक धर्म आणि नंतरचा वैदिक धर्म यात फरक पडायला सुरुवात झाली. 

मगध प्रांतात वैदिकांना दिर्घकाळ प्रवेश नव्हता हे आपण आधी पाहिलेलेच आहे. पण पुढे मात्र मगधातील प्रबळ राजांनी जरी वैदिकांना राजाश्रय दिला नसला तरी स्थानिक पुरोहित, धनाढ्य व्यक्ती व जमीनदारांत हा धर्म ब-यापैकी पसरल्याचे आपल्याला दिसते. सामुहिकपणे चालणारे व गुढतेचे वलय दिल्याने यज्ञ व वैदिकांची दैवी बनवली गेलेली वर्ण व्यवस्था याचा प्रभाव काही घटकांवर पडणे स्वाभाविक होते. राजा-रजवाड्यांनाही धर्म बदलला नसला तरी यज्ञही करवून घेण्यात व वैदिक पुरोहितांना दान-दक्षीणा देण्यात हात आखडता घेतला नाही. पण वैदिक देवतांची पुजाही स्विकारली नाही. भारतीय असुर राजांनी हिंदू देवी-देवतांचीच काय ती पूजा चालू ठेवली. पुजा व तंत्रेही व्यक्तीगत होती. सार्वजनिक मंदिरे बांधण्याची प्रथा आली नव्हती. घरातील देव्हारे एवढीच त्यांची पुजास्थळे होती. त्यामुळे हे यज्ञ एक प्रकारे आकर्षणाचा विषय बनल्यास नवल नाही. यज्ञांचे स्तोम मात्र फार वाढलेले दिसते. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जैन, बौद्ध व चार्वाक परंपरा वैदिक व्यवस्थेला ठामपणे विरोध करायला अवतरली. वैदिकांना विरोध मगधातुनच सुरु झाला कारण अन्यत्र या धर्माचे अस्तित्वच नव्हते. मागधी जनता प्रथमपासून धर्मांच्या बाबतीत सहिष्णू असल्याने या विरोधी परंपराही त्यांनी समजावून घेतल्या आणि वैदिक धर्माचा तेथुन जवळपास जो अस्त झाला तो पार शुंगांची अल्पकालीन का होईना सत्ता येईपर्यंत टिकून राहिला. नंतर काही प्रमानात काण्वांनी या धर्माला आश्रय दिला. दक्षीणेत सातवाहनांसाठी काही यज्ञ केले खरे पण सातवाहनांनी त्या धर्माला राजाश्रय दिला नाही. त्यांनी बौद्धांना जशी मदत केली तशीच वैदिकांनाही. त्यामुळे महाराष्ट्रातही वैदिक धर्माला हातपाय पसरायला बराच वेळ लागला. बलाढ्य गुप्तांनी चवथ्या शतकात मात्र संपुर्ण राजाश्रय दिल्याने या धर्माचा बोलबाला तर वाढलाच या धर्मात जाणा-या हिंदुंची संख्याही वाढली. 

 भारतातील वैदिक धर्मियांचा प्रवेश ते नंतर उत्तरेत झालेला विस्तार याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. वैदिक येण्यापुर्वीच हिंदुंचे तत्वज्ञान व धर्म पुर्ण स्थिरस्थावर होते. रामायण-महाभारताच्या कथा वैदिक येथे प्रवेशण्यापुर्वीच घडून गेल्या होत्या. सांख्य-वैशेषिक तत्वज्ञान परिणत अवस्थेस पोहोचले होते. मुर्तीपुजा व तांत्रिक विधीविधान व साधनापद्धती सर्वत्र स्थिर होती. मगधात यक्षपुजकांची संस्कृती असल्याने जैन व बौद्ध धर्मातही ती अपरिहार्यपणे आली. वैदिकांनी मात्र यक्षपुजेचा, किंबहुना यक्षांचाच निषेध केला तो केवळ धार्मिक द्वेषातून हे उघड आहे.  अगदी पहिल्या शतकातील गाथा सप्तशती व अंगविज्जेवरुन शिव, उमा, कार्तिकेय, वासुदेव, संकर्षण या देवतांची तत्कालीन लोकप्रियता दिसून येते. कनिष्काच्या राबटक शिलालेखातही त्याने अफगाणी युद्धदेवता "नाना" मुळे आपल्याला साम्राज्य मिळाले आहे असे नमूद करत उमा, अहूर माझ्दा, माझ्ज्दुन, कुमार (कार्तिकेय), महासेन, विशाख आणि मिहिर यांचाही आदरपुर्वक उल्लेख केला आहे. १८ इसपुच्व्हे सहावे शतक ते इसवी सनाच्या जवळपास दुस-या शतकापर्यंत भारतभर जी नाणी मिळालेली आहेत त्यावर तांत्रिक प्रतीक चिन्हे, शिव, गणेश ाणि मैत्रेय बुद्धाच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. एकही वैदिक देवता साधी उल्लेखलीही गेली नाही. अपवाद फक्त इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट शिलालेख व अयोध्य येथील शुंगांचा शिलालेख आहे. नाणेघाट शिलालेखात सर्वात आधी पांचरात्र या तांत्रिक संप्रदायाच्या देवतांनाच प्रथम अभिवादन केलेले आहे. त्यामुळे सातवाहनांनी काही यज्ञ करवून घेतले (किंवा वैदिकांनी स्वत:हुन त्याच्यासाठी यज्ञ केले) असले तरी वासुदेव, संकर्षणास आणि कार्तिकेयास सर्वप्रथम अभिवादन केले असल्याने सातवाहनांनी वैदिक धर्म स्विकारलेला नव्हता हे स्वयंस्पष्ट आहे.

म्हणजेच आधी आश्रीत म्हणून आलेले वैदिक, शुद्रांच्या राज्यातच बरेचसे वेदसंकलन, लेखन करणारे वैदिक आणि म्हणूनच शुद्रांना ते वेगळे आहेत हे माहित असुनही त्यांना महत्वाचे स्थान देणारे वैदिक हा प्रवास होत असतांना भारतात सर्वत्र तंत्राधारित शैवप्रधान धर्माचे प्राबल्य होते. हे प्राबल्य आजेही टिकून राहिलेले आहे. फरक एवढाच पडलाय की वेद हेच हिंदु धर्माचे मुख्य स्रोत आहेत हे मानण्याचा चुकीचा प्रघात पडलेला आहे. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगळा असल्याचे भानही हरपले आहे. वैदिकांमुळेच नंतर हिंदूमध्ये कसे गैरसमज पसरत गेले हा आपल्या सांस्कृतीक इतिहासाचा काळाकुट्ट टप्पा आहे. वैदिक वर्चस्वातुन बाहेर पडायला हवे पण ते हा इतिहास समजून घेतल्याखेरीज शक्य नाही. वैदिक येथे आले ते जेते म्हणून नव्हे तर शरणार्थी म्हणून आणि धर्म पसरला तो धर्मप्रचार व धर्मांतराने हे वास्तव समजावून घ्यायला हवे.
-संजय सोनवणी

(Publishd in Prutha Dwali issue)

Sunday, November 25, 2018

शबरीमलाला पुन्हा जाणारच! - तृप्ती देसाई



पुणे- केरळ प्रशासनाने मला कोची विमानतळावरुनच परतायला भाग पाडले असले तरी मी पुन्हा केरळला जाणार असून शबरीमला देवस्थानात प्रवेश करुन अय्यप्पाचे दर्शन घेणारच. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात स्त्रीयांना प्रवेश नाही असे कोणत्याही देवाने सांगितलेले नाही. घटनेने दिलेल्या मानवी स्वातंत्र्याच्या कक्षेत स्त्रीयांचे प्रार्थनास्वातंत्र्य परंपरेच्या नांवाखाली नाकारले जाणे हा केवळ न्यायालय व घटनेचा अवमान नाही तर खुद्द देवांचाही अवमान आहे असे मत शबरीमला आंदोलनात सहभागी असलेल्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. त्या आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या "शबरीमला: महिला स्वातंत्र्य आणि संविधान" या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होत्या. या परिसंवादात ज्येष्ठ लेखक-संशोधक संजय सोनवणी, युवा विचारवंत सतीश पानपत्ते, गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे व अनन्या कडले यांनी सहभाग घेतला.
केवळ केरळ प्रशासनाने पुकारलेल्या असहकाराच्या धोरणामुळे आपल्याला कोची विमानतळावरुनच कसे परतावे लागले याचे अनुभव सांगत देसाई म्हणाल्या की हा आस्थेचा विषय नसून त्या नांवाखाली राजकारणाचा विषय बनवला गेला आहे आणि संघाची पुरुषसत्ताकवादी सनातनी विचारधारा त्यामागे काम करत आहे. आपण या प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणारच असून आदिम हिंदू महासंघाने घेतलेल्या स्त्रीस्वातंत्र्यवादी भुमिकेचे त्यांनी स्वागत केले.
संजय सोनवणी म्हणाले की आठशे वर्षांपुर्वी ज्या दैवताचे अस्तित्वही नव्हते त्या देवाचे मार्केटिंग करण्यासाठी वैदिक पुरोहितांनी भाकडकथा रचत महिलाबंदी लादली आणि भोळ्या भाविकांनी ती स्विकारली. वैदिक अथवा हिंदू धर्मशास्त्रांत रजोदर्शनास अपवित्र अथवा त्या काळात अस्पृष्य मानले गेलेले नाही. हिंदू धर्मात प्रथमपासून स्त्रीयांना समतेचे स्थान आहे, पण ते पुरुषप्रधान वैदिक संस्कृतीच्या प्रभावात खालावले गेले आणि स्त्रीयांवर अतोनात बंधने लादली गेली. या वैदिक प्रभावातून मुक्त होत हिंदूंनी स्त्रीयांचे बरोबरीचे स्थान मान्य केले पाहिजे आणि त्यांच्या स्वातंत्र्याची महत्ता जपली पाहिजे.
सतीश पानपत्ते यांनी शबरीमला मंदीरांत महिलांना प्रवेश द्यावा या सुप्रिम कोर्टाच्या घटनात्मक भुमिकेचे स्वागत केले आणि म्हणाले की महिला स्वातंत्र्य हा केवळ सामान्य समजदारीचा विषय असून सामान्य धर्मस्थानांच्या कथित परंपरागत नियमांना संविधानिक मुल्ये व कायदे बाद ठरवत असतात. “परिवर्तनशील आणि कालसुसंगत हिंदूहितवाद” या प्रवाही विचारात आपण भेदभाव सोडुन बदल स्वीकारले पाहीजे. “सतिप्रथा, बालविवाह” या परंपराच होत्या पण आपण त्या सोडल्या! हा प्रवाहीपणा जतन झाला नाही तर हिंदू धर्माचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान होईल.
गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे, व अनन्या कडले यांनीही स्त्रीयांचे खालावलेले सामाजिक स्थान, त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लिंगभेदाच्या जाणीवांतून केला गेलेला संकोच आणि त्यातून होत असनारी घुसमट आपल्या भाषणांतुन व्यक्त केली. गणेश अटकाळे यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले.

Saturday, November 24, 2018

मराठा, धनगर नि मुस्लिम आरक्षण: सामाजिक संघर्षाची नांदी!


Image result for reservation agitations maharashtra



राज्य मागास आयोगाने "मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि म्हणून आरक्षणास पात्र आहे." अशा स्वरुपाचा अहवाल नुकताच दिला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या आयोगाच्या शिफारशी मान्य असल्याचे घोषित केले असले व तसे प्रतिज्ञापत्रही उच्च न्यायालयात दिले असले व राज्य सरकार संवैधानिक प्रक्रिया पुर्ण करुनच कायदेशीरदृष्ट्या टिकेल असा कायदा बनवणार असेही घोषित केले असले तरी मुलभुत समस्या जशाच्या तशा आहेत. त्यामुळे राज्य मागास आयोगाच्या सकारात्मक अहवालानंतरही मराठा आरक्षणाचे नेमके काय होणार हा प्रश्न कायमच आहे.

मराठा आरक्षण विरोधक यात घेऊ शकणारा पहिला आक्षेप म्हणजे मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवण्यासाठी आयोगाने नेमके कोणते निकष वापरले हा. एखादा सम,आज सामाजिक मागास आहे हे सिद्ध होण्यासाठी त्या समाजात असलेली गरीबी हा मुख्य निकष नसून त्या समाजाला राजकीय व प्रशासनीक प्रतिनिधित्व त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे की नाही हे तपासणे महत्वाचे होते. या निकषावर पाहू गेलो तर समाजशास्त्रज्ञ डॉ.सुहास पळशीकर यांनी नमूद केल्यानुसार १९६२-२००४ या कालावधीतील २४३० आमदारांपैकी ५५ टक्के म्हणजे १३३६ मराठा समाजाचे आहेत. ५४ टक्के शिक्षणसंस्था मराठा समाजाच्या आहेत. विद्यापीठांच्या व्यवस्थापनात ६०-७५ टक्के प्रतिनिधित्व मराठा समाजाकडे आहे. राज्यातील १०५ साखर कारखान्यांपैकी ८६ कारखाने मराठा समाजाकडे आहेत, तर ७१.४ सहकारी संस्थांवर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. ७५-९० टक्के जमीन मराठा समाजाच्या व्यक्तींकडे आहे, तर १ नोव्हेंबर १९५६ ते २०१४ पर्यंत झालेल्या १७ मुख्यमंत्र्यांपैकी १२ मराठा समाजाचे होते. आता हा निकष गृहित धरला तर मराठा समाज कसा मागास ठरु शकतो हा प्रश्न निर्माण होतो.

मराठा समाजातील ठरावीकच घराण्यांकडे सत्ता आहे पण बहुसंख्य मराठा समाज हा शेतजमीनीच्या तुकडीकरणामुळे आणि बेरोजगारीच्या समस्येने गांजला आहे त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा मराठा समाजाला लागू होत नाही असा आरक्षण समर्थकांचा दावा असतो. त्यांच्या दाव्याला आयोगाने समर्थनच दिले असल्याने अर्थात त्यांना समाधान वाटत असणे स्वाभाविक आहे. पण यामुले सामाजिक मागास असण्याची घटनात्मक व्याख्याच बाद होते त्याचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो. बरे, ही नवीन व्याख्या न्यायालयातही टिकत घटनात्मक ठरली तर एक नवाच पेच निर्माण होतो व तो म्हणजे या व्याख्येनुसार आजवर सर्वात प्रगत मानला गेलेला ब्राह्मण समाजही आम्ही सामाजिक मागास आहोत असा दावा करु शकतो. तशाही काही ब्राह्मण संघटनांनीही आरक्षणाच्या मागण्या केलेल्या आहेतच. त्यांना या अहवालामुळे बळ मिळू शकते हे ओघाने आलेच! शिवाय दारिद्रय हे सा्पेक्ष असते आणि आर्थिक स्थिती परिवर्तनीय असतात हे या आयोगाने लक्षात घेतले आहे की नाही हे अजुन स्पष्ट व्हायचे आहे. खरे तर आर्थिक दुर्बलांसाठी असंख्य शासकीय योजना आहेत. आरक्षण हे दारिद्र्यनिर्मुलनासाठी नाही हेही येथे आवर्जुन लक्षात घेतले पाहिजे.

असे असले तरी अहवाल सकारात्मक आला आहे, आयोगाने या मुद्द्यांवर विचार केला असेल किंवा सामाजिक मागासपनाचे निकष आपल्याच अखत्यारीत बदलले असुन ते घटनात्मक चौकटीत बसवण्याचा आत्मविश्वास राज्यारकारकडे असेल हे आपण गृहित जरी धरले तरी आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या व कायदा केला म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी करता येईल असे मात्र म्हणता येत नाही.

तसेची मराठा आरक्षणाच्या मागणीचे वादळ गेली दोन दशके घोंगावत आहे. मराठा तरुण आरक्षणाकडे डोळे लावून बसला असून आरक्षण मिळाले कि आपल्या सर्वच समस्या दूर होतील या भ्रमात नेण्यात मराठा आरक्षणवादी नेते यशस्वी झाले आहेत. केंद्र सरकारने जाट समाजाला ओबीसींत घेऊन आरक्षण दिल्यामुळे मराठा तरुणांची आशा अजून पल्लवीत झाल्या होत्या पण प्रत्यक्षात काय घडले याकडे फारसे लक्ष दिले गेले आहे असे नाही. मुलत आरक्षनाचा हा प्रवास केवळ राजकीय हेतुंनी प्रेरीत असून या  निमित्ताने मराठा तरुणांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे काय हा गंभीर सामाजिक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

या आयोगाने दुसरा निर्माण केलेला प्रश्न म्हणजे मराठा समाजाला ओबीसींमध्ये समावेश न करता "सामाजिक व शैक्षणिक मागास" असा नवा गट निर्माण करुन त्याअंतर्गत आरक्षण दिले जाईल ही घोषणा. ही घोषणा भ्रममूलक आहे कारण ओबीसी म्हणजेच "सामाजिक व शैक्षणिक मागास". त्यामुळे हा केवळ शब्दच्छल आहे हे उघड आहे. मराठा समाजास आरक्षण द्यायचेच असेल तर ते ओबीसी कोट्यातुनच द्यावे लागेल. ओबीसी नेत्यांचा याला विरोध आहे व तो व्यक्तही होतो आहे. पण मुलात मराठा समाजाला नेमके किती टक्के आरक्षण द्यायचे ही बाब अजुन गुलदस्यात आहे. राणे समितीने मराठा समाज एकुण लोकसंख्येच्या ३२% असल्याने त्याला १६% आरक्षण द्यावे असे म्हटले होते. आताही बहुदा १६% आरक्षण आपल्याला मिलेल असा अनेकांचा कयास आहे.

पण मुळात मराठ्यांची नेमकी लोकसंख्या किती हेच स्पष्ट नाही. ३२% संख्येत कुणबीही धरले असतील तर कुणब्यांना आरक्षण आहेच! मग १६% आरक्षणाचे लाभार्थी कोण असणार याची सांख्यिकी उपलब्ध करायचा सुसंगत प्रयत्न आजतागायत झालेला नाही. २०११ साली जातनिहाय जनगणना झाली पण तिची आकडेवारी आजतागायत घोषित केली गेलेली नाही व नजिकच्या भविष्यकाळात ती घोषित होण्याचीही शक्यता नाही. मग मराठा समाजाची नेमकी लोकसंख्या किती आणि आरक्षणाची टक्केवारी किती हाही प्रश्न अनुत्तरीत राहतो. पण आरक्षण देतांना या प्रश्नाला भिडावेच लागणार आहे. कारण कुणबी वगळता मराठा समाज ३२% असेल तर महाराष्ट्राची लोकसंख्या शंभर टक्क्यांची सीमा ओलांडुन जाते हे येथे लक्षात घ्यावे लागेल.

बरे, समजा मराठा समाजाची लोकसंख्या तेवढी असुन १६% आरक्षण आणि तेही ओबीसी कोट्यातुन द्यायचे झाले तर अजुन समस्या निर्माण होते. महाराष्ट्रात ओबीसींना १९% आरक्षण आहे. ५०%ची मर्यादा न ओलांडता मराठ्यांना आरक्षण द्यायचेच झाले तर ओबीसींचा वाटा घटनार, किंबहुना जवळपास संपुष्टात येणार हे उघड आहे. ओबीसी समाज हे होऊ न देण्याचा प्रयत्न करणार आणि त्याला घटनेची व न्यायसंस्थेची साथ मिळनार हे उघड आहे. मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे आरक्षणाची मर्यादा तमिलनाडुच्या धर्तीवर बदलण्याचा. मराठा आरक्षण घटनेच्या नवव्या सुचीत टाकले तर ते टिकेल असा दावा केला जातो. पण तेही तितकेसे खरे नाही कारण एप्रिल १९७३ नंतर जेही कायदे नवव्या सुचीत टाकलेले आहेत त्यांना न्यायालयांत आव्हान देण्याचा मार्ग खुला आहे. त्यामुले नवव्या सुचीची कवचकुंडले आता उपलब्ध नाहीत. शिवाय ती प्रक्रियाही संवैधानिकच आणि  किचकट असल्याने  ही बिकट वाट कशी चालायची हा राज्य सरकारपुढे व आरक्षण समर्थकांपुढे यक्षप्रश्न असेल.

नचिअप्पन समितीचा अहवाल मान्य केला तर सर्वच आरक्षणावरची टक्केवारीवरील मर्यादा उठेल असाही तर्क काही तज्ञ देतात, पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की या समितीच्या अहवाल संसदेने खूप पुर्वीच फेटाळला आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवणे म्हणजे आरक्षणच प्रभावहीन करणे हेच अनेक विद्वान लक्षात घेत नाहीत. खुल्या जागा पन्नास टक्के ठेवल्या आहेत त्या आरक्षित गटांतील उमेदवारांना खुल्या गटांतही स्पर्धा करण्याचे अवकाश शिल्लक ठेवत त्यांना वाव देण्यासाठी. आरक्षणाचा लाभ न घेऊ इच्छिना-यांना त्यांच्या क्षमतेची चाचपणी करण्यासाठी आणि हे सामाजिक न्यायाला धरुन आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवणे म्हणजे खुले अवकाश आकुंचित करत आपल्याच सामाजिक पायावर कु-हाड मारुन घेणे आणि संसद हे मान्य करण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. कारण जे अनारक्षित समाजघटक आहेत त्यांचेही अवकाश कमी होनारच असल्याने तेही याविरोधात आवाज उठवतील. किंबहुना आरक्षणच संपुष्टात आनण्यासाठी जी संघमोहिम सुरु आहे तिला उलट यामुळे अधिक बळ मिळेल कारण आरक्षनच निरर्थक होऊन जाईल.

आपण मराठा आरक्षणाबाबतचा इतिहास पहायला हवा. खरे तर कोणत्या जातीला कोणत्या गटात घ्यायचे, किती टक्के आरक्षण द्यायचे या बाबी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अखत्यारीत येतात. मराठा आरक्षणाची मागणी जुनी असून आजतागायत सहा वेळा राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशीच भुमिका घेतली आहे. तरीही मराठा आरक्षणवादी विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी, प्रसंगी आक्रमक होत, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका घेतली होती. त्याची फलश्रुती म्हणजे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक पाहणी समिती नेमली गेली होती. या समितीनेही आपला अहवाल मागील निवडणुकीच्या तोंडावर सादर केला होता आणि तो अहवाल स्वीकारण्यापुर्वी राज्य मागासवर्ग आयोग आणि कायदेतज्ञांकडे मत मागवण्यासाठी सोपवला गेला. इतक्या अल्पावधीत अहवालाचा सखोल अभ्यास करून दोन्हीकडून मत नोंदवले जाण्याची शक्यता नाही हे मंत्रीमंडळाला माहित नव्हते असे नाही. त्यात मुळात राणे समितीला संवैधानिक पायाच नसल्याने त्या अहवालाला तसे महत्वही नव्हते. त्यामुळे हा विषय ज्या मागास आयोगाने सहा वेळा मराठा आरक्षण नाकारले होते त्याच नव्या पुनर्गठित  आयोगाकडे हा विषय सोपवला गेला. या आयोगाने मात्र मराठा समाज आरक्षण पात्र आहे असे मान्य केले आहे. पण गेल्या वेळेसही आरक्षणाचे राजकारण केले गेले होते हे आपल्या लक्षात येईल. याही वेळेस निवडणुका तोंडावर आल्या असतांनाच या आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याची जी घाई केली जात आहे त्यामागे राजकारण आहे की समाजकारण हे नागरिक सहज समजावून घेऊ शकतात.

पण यामुळे ओबीसी व मराठा समाजात संघर्ष सुरु झाला हे एक सामाजिक वास्तव आहे. ओबीसी कोट्याला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल या म्हणण्यात तसे तथ्य नाही हे आपण वर पाहिलेच आहे. शिवाय "आम्हाला राजकीय आरक्षण नको, फक्त शैक्षणिक व नोक-यांत हवे" या म्हणण्याला काहीएक अर्थ नाही कारण आरक्षण असे तोडून देता येत नाही. तसे द्यायचेच झाले तर घटनादुरुस्ती करावी लागेल. आणि मराठा समाज ओबीसींत डेरेदाखल झाला तर ओबीसींचे राजकीय भवितव्य काय हाही एक गंभीर प्रश्न उभा राहतो. त्यामुळे सामाजिक संघर्ष कमी होणे तर दुरच तो अधिक पेटण्याची शंका येणे स्वाभाविक आहे आणि या सर्व अडथळ्यांतून व पेचांतुन सरकार व मराठा आरक्षणवादी कसा मार्ग काढनार हा प्रश्न आहे.


धनगर आरक्षण


मराठा आरक्षणाचा प्रश्न असा गुंतागुंतीचा झाला असतांना धनगर आरक्षणाचाही प्रश्न गुंतागुंतीचा बनवला गेला आहे. धनगरांना ओबीसींमधुन अनुसुचित जमातींत आपले असलेलेच हक्काचे घटनात्मक आरक्षण लागु करावे अशी धनगर समाजाही जुनी मागणी होती. पण राज्य सरकारला टाटा समाजविज्ञान संस्थेकडे धनगर हे खरेच आदिवासी आहेत की नाही अशी पाहणी करण्याचे काम सोपवले. खरे म्हणजे धनगर समाजाला ओबीसींअंतर्गत भटकी जमात म्हणत त्यांना वेगळे आरक्षण दिले गेले होते तेथेच धनगर ही "जमात" म्हणजे आदिवासी असल्याचे शासनाने मान्य केलेले होते. असे असतांना त्यांना मुळात ओबीसीमध्ये कसे ठेवले गेले हाच मुळ प्रश्न होता पण तिकडे कोणी लक्ष दिले नाही कारण धनगर समाज हा सामाजिक व राजकीय दृष्ट्या मुळात जागृत नाही. जे नेते आहेत ते बव्हंशी संधीसाधु अथवा विषयाची मांडनी कशी करायची याचीच दिशा नसल्याने त्यांनीही हा प्रश्न धसास लावला नाही अन्यथा टाटा समाजविज्ञान संस्थेला पाहणीचे काम दिले गेले तेंव्हाच गदारोळ उठला असता, पण तसे झालेले नाही. शिवाय राणे समितीला जसा संवैधानिक दर्जा नव्हता तसा टाटा समाजविज्ञानलाही नाही, त्यामुळे अहवाल काहीही असो, त्याचे संवैधानिक मूल्य शून्य आहे हे उघड आहे. खरे तर द्यायचेच होते तर हे काम अनुसूचित जाती/जमाती आयोगाकडे द्यायला हवे होते.

धनगर आरक्षणही राजकारणाचे हत्यार बनलेले आहे हे उघडच आहे. आपण याही आरक्षणाच्या इतिहासावर थोडक्यात नजर टाकुयात. धनगर म्हणजे मेंढपाळ ही आदिम आणि स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती, देवदैवते असलेली, नागरी समाजापासून दुर राहिलेली जमात आहे हे समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. ही जमात गांवगाड्यातील अथवा गांवकुसाबाहेरचीही नाही. तिचा अधिवास हा गांवगादा तसेच नागरी वस्त्यांहून दूर व बव्हंशी भटकंतीयुक्त राहिलेला आहे. अनुसुचित जमातींच्या सुचीत ओरान आदिवासींनंतर धनगड (मराठीत धनगर) असे नमुद आहे. पण इंग्रजी स्पेलिंगच अंतिम मानायच्या वसाहतकालीन निर्णयाचे शिकार झालेले धनगर आणि महाराष्ट्रात अस्तित्वातच नसलेली पण सुचीत नोंदली गेलेली जमात धनगड हा तिढा सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न ना राज्य सरकारने केला, ना अनुसुचित जाती/जमाती आयोगाने केला. हे लक्षात न घेता आता धनगर हे आदिवासी (म्हणजेच जमात) आहे की नाही याची पाहणी करायला टाटा संस्थेकडे काम द्यावे हा शासनाच्या सामाजिक अनास्थेचा कळस म्हणता येईल एवढा गंभीर आहे.

देवेंद्र फडणविस यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेचा अहवाल व आरक्षण द्यावे अशी शिफारस केंद्राकडे पाठवू असे घोषित करुन दुसरा निवडणुकीच्या राजकारणाचा डाव टाकला आहे. पण आम्हाला अनुसुचित जमातीचे आरक्षण आहेच पण भाषाशास्त्रीय समस्येने ते अडकून राहिले आहे त्यामुळे धनगरांना इंग्रजीत धनगड तर मराठीत धनगर अशी जमातप्रमाणपत्रे देण्यात यावीत असा अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीत काढावा अशी मागणी गोपीचंद पडळकरांसारखे आक्रमक नेते करत आहेत तर मधु शिंदेंसारखे न्यायालयातुनच हा तिढा सोडवण्यासाठी लढा लढत आहेत. पण हे सध्या तरी दुबळे प्रयत्न आहेत हे उघड आहे कारण धनगर नेत्यांचा रेटा किरकोळ आहे आणि मुळात धनगर नेत्यांमध्ये आपली मागणी कशी रेटावी याबाबत एकमत नाही. त्याच वेळीस धनगरांना अनुसुचित जमातीचे आरक्षण कसे मिळणार नाही हे प्रयत्न सध्याच्या अनुसुचित जमातींच्या यादीत असलेल्या जमाती एकवटून प्रयत्न करत आहेत, विरोध करत आहेत.

या सा-या संघर्षात मुख्य प्रश्न अनुत्तरीत राहतो तो वेगळाच आहे. धनगरांची ओळख काय? ते जर भटक्या जमातीत मोडतात तर मग त्यांचे आरक्षण ओबीसी कोट्याअंतर्गत कसे? खरे तर हा प्रश्न आगरी, कोळी, हलबा कोष्टी, वडार व अशा अनेक समाजांबद्दल विचारता येईल. स्वातंत्र्यानंतर आजतागायत समाजशास्त्रीय अध्ययन करुन विविध समाजांची घटनात्मक आयडेंटिटी ठरवता येत नसेल तर आमचे समाजशास्त्र नेमके काय करत आहे? की केवळ राजकीय दबाव, झुंडशाही करु शकतात त्याच समाजांचे ऐकले जाणार आहे? आरक्षण देणे ही एक बाब झाली, सामाजिक ओळख काय याचा संभ्रम बव्हंशी समाजांत असेल तर त्याचा निपटारा कसा करायचा हा एक फार महत्वाचा गंभीर प्रश्न समोर ठाकला आहे. हे सरकार (किंवा कोणतेही) धनगरांना अनुसुचित जमातीतील त्यांचे पुर्वीपासुन असलेले स्थान मान्य करत त्यांना ते लाभ देण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही ती यामुळेच.

मुस्लिम आरक्षण


आणि गेल्या सरकारने मुस्लिम समाजाला ५% आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मराठ्यांना आरक्षण दिले तर अजुन एक सामाजिक समतोल साधला गेला पाहिजे याच राजनीतीसाठी बहुदा ही घोषणा केली गेली होती. खरे तर मुस्लिम समाजातील मागास समाजांना ओबीसी, एसटीत आधीच आरक्षण आहे. मग हे नवे आरक्षण नेमके कोणाला आणि कोणत्या पायावर घोषित केले गेले या विषयावर महाराष्ट्रात कधी गंभीरपने चर्चाही झाली नाही. बरे, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेत नाही. देवेंद्र फडणविसांनी नुकतेच असे धर्माधारित आरक्षण देता येनार नाही असे घोषितही केले. मुस्लिम समाजातीत मागास आणि अती-मागास समाजांना आरक्षण मिळू शकते पण ते धर्माच्या आधारावर नाही. त्याला घटनात्मक पाठबळ नाही. त्यामुळे आधीच्या आघाडी सरकारने केलेली ५% मुस्लिम आरक्षणाची घोषणा केवळ राजकीय स्वरुपाची होती हे उघड आहे. सच्चर आयोगाच्या शिफारशींकडे मुस्मिल समाजाने अधिक लक्ष द्यायला हवे.

पण हे सारे झाले आरक्षणांच्या तिढ्याबाबत. आरक्षण हाच आपल्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे अशी भावना का निर्माण झाली आहे आवर मात्र आम्ही गांभिर्याने कधीच चर्चा करत नाही हे आमचे सामाजिक दुर्दैव आहे. मुळात आरक्षण हाच कोणत्याही घटकाचा सामाजिक विकासाचा एकमेव पर्याय वाटावा यातच आपले धोरणात्मक अपयश आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.  राजकीय नेत्यांनी केवळ स्वार्थासाठी आरक्षण हे हत्यार वापरले आहे हे उघड आहे. जणु काही आरक्षण दिल्याखेरीज कोणत्याही समाजाचे भले होऊ शकत नाही अशी मानसिकता रुजवण्यामद्धे राजकारण्यांनी हातभार लावला आहे असे आपल्या लक्षात येईल. यामुळे आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेले असे दोन गट उभ्या देशात पडले असून त्यांच्यातील सुप्त-जागृत संघर्ष हा एकुणातील समाजाचे स्वास्थ घालवत आहे हे वास्तव का दुर्लक्षिले जाते? यातून सामाजिक ऐक्याची भावना न बळावता समाजविघातकता वाढेल हा धोका वारंवार का पत्करला जातो?

आपली शिक्षणव्यवस्था मुळातच बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने आहेत. पदवीधर साक्षर होतो खरा पण जगण्याचे कसलेही कौशल्य विकसीत करू शकत नाही अशी आपली मागासलेली शिक्षणरचना आहे. येथून रोजगार मागनारेच व तेही सफेदपोश रोजगार मागणारे उत्पन्न केले जातात. रोजगार देण्याची क्षमता असनारे शिक्षित मात्र अत्यल्प असतात. श्रमप्रतिष्ठा, उद्यमकौशल्याचा विकास करण्यात आपण पुर्णतया अयशस्वी झालेलो आहोत. याबाबत विचारपुर्वक दिर्घकालीन धोरण आखत त्याची अंमलबजावणी व्हावी असा सूर कोठुनही उमटत नाही. आरक्षण हे जादुची कांडी वाटते व त्यामुळेच सर्व समाजांचे कल्याण होणार आहे असे चित्र राजकारणी/समाजकारणी/चळवळी उभे करत असतील तर आपण विनाशाकडे वाटचाल करत आहोत असेच म्हणावे लागेल.

आरक्षणाची सध्याची स्थिती ही समाजात नव्या विघातक संघर्षाची नांदी आहे. समाजनेते आणि राजकारण्यांनी वेळीच सावध व्हावे आणि सामाजिक न्यायालाच केंद्रबिंदू मानत आपापल्या व्यूहनीती ठरवाव्यात एवढेच साकडे आपण याक्षणी घालू शकतो.

-संजय सोनवणी

(Published in Dainik Aapala Mahanagar)

http://epaper.mymahanagar.com/viewpage.php?edn=Main&date=2018-11-25&edid=AAPLAMAHAN_MUM&pn=10

Sunday, November 18, 2018

रिझर्व्ह बँकेवर अंकुश आणण्याचे प्रयत्न


 

थर्ड आय : रिझर्व्ह बँकेलाच बुडवायची मोहीम? 




रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू झाल्याच्या अनेक बातम्या अलीकडे माध्यमांनी प्रकाशित केल्या आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या राखीव निधीतून उत्पादक कामांत गुंतवणूक करण्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये वळवायला सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने राखीव निधी असा वळवता येणार नाही असे सांगितल्यापासून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून टीका व्हायला लागल्यानंतर alt147सरकारने रिझर्व्ह बँकेकडे पैसे मागितलेच नाही, तर या केंद्रीय बँकेच्या आर्थिक ठेवींची व्यवस्था कशी करायची याबाबत चर्चा केली आहे,' अशा अर्थाचं ट्विट अर्थमंत्रालयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी केलं. पण ही निव्वळ सारवासारव असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. किंबहुना केंद्रीय बँकेची स्वायत्तताच धोक्यात येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

याचं कारण घडलं ते रिझर्व्ह बँकेचे अतिरिक्त संचालक एस. गुरुमूर्ती यांनी गेल्या आठवड्यात केलेलं भाषण. त्यात त्यांनी केंद्रीय बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या धोरणांवर जाहीर हल्ला चढवला. सरकारची केंद्रीय बँकेकडून राखीव निधी वळवण्याची मागणी त्यांनी वेगळ्या शब्दांत मांडत हल्लाबोल केला. केंद्रीय बँकेची अनुत्पादक कर्जांसाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीची धोरणेच चुकीची असून ती एकाच वेळी न करता पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने विभागून केली तर सरकारी बँकांवर आलेला बोजा कमी होईल व वित्त वितरणात वाढ होऊन मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या भाषेत ते रिझर्व्ह बँकेला आपल्या राखीव निधीचे प्रमाण कमी करायला सांगत. तो पैसा सरकारी बँकांकडे अधिक कर्जवितरणासाठी वळवायला सांगत आहेत. पण अनुत्पादक कर्जांच्या मुख्य समस्येचे करायचे तरी काय हे मात्र ते सांगत नाहीत. उलट राखीव निधीतून नवी कर्जे वाटली आणि त्यातही अनेक कर्जे अनुत्पादक झाली तर अर्थव्यवस्था कोणत्या कोंडीत सापडेल याचा विचारही त्यांना शिवलेला नाही हे उघड आहे. माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही मागे रिझर्व्ह बँक पैशाच्या अतिरिक्त साठ्यावर बसलेली आहे व एवढ्या राखीव निधीची गरज नाही, असेच प्रतिपादन केले होते. म्हणजे आता मोदी सरकारचा डोळा कशावर आहे हे लक्षात येईल. ही रिझर्व्ह बँकेलाच बुडवायची तर मोहीम नाही ना यावर आपल्याला विचार केला पाहिजे.

गुरुमूर्तींच्या या विधानाचे पडसाद आज (सोमवार दि. १९) होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत पडण्याची संभावना असल्याने ही बैठक वादळी होईल असा तज्ज्ञांचा कयास आहे. मुख्य मुद्दा आहे तो केंद्रीय बँकेच्या स्वायत्ततेवर होत असणाऱ्या हल्ल्याचा. सरकारची ही मागणी म्हणजे वित्तीय संस्थांच्या नियमनाबाबत असलेल्या केंद्रीय बँकेच्या अधिकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार सरकारलाही नाही कारण देशांतर्गतची वित्तीय शिस्त राखणे व सर्व प्रकारच्या वित्तीय संकटांना तोंड द्यायची तयारी ठेवणे व तसे नियमन करणे हे रिझर्व्ह बँकेचे मुख्य काम आहे तरीही गेल्या वर्षी गव्हर्नर ऊर्जित पटेलांच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारने आंतरिक लाभांशाच्या रूपात रिझर्व्ह बँकेकडून १० हजार कोटी रुपये घेतले होते. असे केल्याने रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद बिघडेल या ऊर्जित पटेलांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केले गेले. आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून संचालक बनलेल्या, आधीच वादग्रस्त असलेल्या, एस. गुरुमूर्तींच्या जाहीर हल्ल्याने स्थिती चिघळली आहे.

गुरुमूर्तींचे म्हणणे आहे की, नोटबंदी हा गेल्या सत्तर वर्षांनंतरचा जागतिकीकरणाच्या निर्णयानंतरचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करणारा निर्णय आहे. भारतीय बँका व खासगी वित्तीय संस्था गेल्या दोन वर्षांत अनुत्पादक कर्जांच्या ओझ्याने चिरडल्या गेल्या आहेत हेही त्यांना मान्य आहे. कारण केंद्र सरकारच्या मागणीचे खरे कारण तेच आहे. मध्यम व लघुउद्योग अडचणीत आल्याने बेरोजगारीचा विस्फोट झाला आहे हेही त्यांना मान्य आहे. पण या अडचणी नोटबंदीमुळे नव्हे, तर रिझर्व्ह बँकेच्या अनुत्पादक कर्जांसाठी एकाच वेळेस तरतूद करण्याच्या नियमामुळे आणि या नियमामुळे बँकांची रोकड सुलभता संपुष्टात येत असल्याने त्या नवीन कर्जे देऊ शकत नाहीत आणि ती द्यायची तर रिझर्व्ह बँकेने आपले नियम बदलले पाहिजेत. थोडक्यात, स्वत:चा राखीव निधी कमी केला पाहिजे असा त्यांचा अजब दावा आहे.

मुळात आधी आपण हे गुरुमूर्ती कोण आहेत हे पाहूयात. हे तेच गृहस्थ आहेत, ज्यांनी सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिल्यामुळे केरळमध्ये महापूर आला, असे हास्यास्पद विधान केले होते. पेशाने ते चार्टर्ड अकाउंटंट असले तरी त्यांना बँकिंगचा कसलाही अनुभव नाही. संघाच्या स्वदेशी जागरण मंचाचे ते खंदे कार्यकर्ते असून देशातील भांडवली वस्तूंची आयात थांबवल्याखेरीज अथवा त्यावर जबरदस्त कर आकारल्याखेरीज देशाला ऊर्जितावस्था येणार नाही असे मत ते अलीकडे हिरीरीने मांडत आले आहेत. मोदी सरकारकडे मुळात अर्थतज्ज्ञ तर सोडाच, अगदी अर्थसाक्षर लोकांचीही वाणवा असल्याने अशा अर्थव्यवहारांची जाण नसलेल्या व्यक्तीची रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून वर्णी लागली. आता ते गव्हर्नरांना रिझर्व्ह बँकेची धोरणे कशी असली पाहिजेत हे हुकूमशहाच्या थाटात सांगू लागले आहेत. हा केंद्रीय संस्थेच्या स्वायत्ततेचा भंग आहे आणि एकार्थाने अवमानही आहे हे भारतीय नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.

वास्तव हे आहे की निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्था मात्र गटांगळ्या खात आहे. नोटबंदीच्या अनर्थकारी निर्णयाने आणि जीएसटीच्या भोंगळ अंमलबजावणीमुळे छोटे-मोठे उत्पादकच नव्हे तर व्यावसायिकही बेजार झालेले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा विस्फोट झाला असून आजमितीला सव्वातीन कोटी तरुण रोजगारासाठी रांग लावून आहेत. पण प्रत्यक्षात वर्षाला लाखभरही नवीन रोजगार निर्माण झाले नाहीत. याची परिणती अशी की परदेशी गुंतवणुकीचा ओघ आटत चालला आहे. एका चुकीने एवढे अनर्थ केले असले तरी त्याची जबाबदारी घ्यायला मोदी सरकार तयार नाही. उलट सरकारी भाट नोटबंदीचे अंध समर्थन करत आहेत. अर्थव्यवस्थेच्या या निराशाजनक स्थितीत निवडणुकांना सामोरे जात लोकांच्या रोषाला बळी पडावे लागू नये म्हणून आता पण सरकारला रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवरच शेवटी डोळा ठेवावा लागला आहे आणि यातच सरकारच्या भयाण अपयशाची कबुली आहे. त्यात आपण असे करत असताना स्वायत्ततेला नख लावून लोकशाहीचा आता हाही आधारस्तंभ खिळखिळा करत आहोत याचे मात्र भान सरकारला नाही.

अनुत्पादक कर्जांची समस्या मुळात निर्माण झाली ती देशातील रोकडच रातोरात गायब झाल्याने व अर्थव्यवस्थेचे चक्र खिळल्याने हे आधी लक्षात घेतले पाहिजे. अनुत्पादक कर्जांसाठीची तरतूद एखादे कर्ज अनुत्पादक झाले की तत्काळ करावी की टप्प्याटप्प्याने करावी याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळची स्थिती पाहून घेणे अभिप्रेत असते. तसेच एखादे कर्ज अनुत्पादक झाले हे किती काळ ते व्याजही परत करू शकले नाही की ठरवायचे हा निर्णयही त्यांनीच घ्यायचा असतो. त्यांच्या या निर्णयप्रक्रियेत सरकार सल्ला देऊ शकत असले तरी ते हस्तक्षेप करू शकत नाही. नोटबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेला अंधारात ठेवून घेतला गेला. आता राखीव निधी सरकारचे राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी वळवला गेला तर तो अर्थव्यवस्थेसाठी अखेरचा आचका असेल. लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या संस्थांची स्वायत्तता अबाधित राहिली पाहिजे, नाहीतर लोकशाहीचे अस्तित्वही धोक्यात येईल हे आपण लक्षात ठेवले पाहिजे!

(Published in Divya Marathi)

Saturday, November 17, 2018

बापू-जवाहर संवाद

Image may contain: one or more people and people sitting

"बापू, नाझींची बाजू सध्या प्रबळ आहे. ते जिंकतील असे वातावरण आहे."
"ते आज तरी खरे आहे. पण हिंसक आणि हुकुमशाही वृत्ती जिंकू शकणार नाहीत असे मला आतला आवाज सांगतो."
"बापू, इतिहासात अनेकदा नृशंस प्रवृत्ती जिंकलेल्या आहेत. नाझीही जिंकतील कदाचित. काय सांगावे?"
"जवाहर, तुला काय वाटते?"
"नाझी जिंकले तर भारत त्यांच्या ताब्यात जाईल. हिटलर तसेही भारतीयांकडे कसे बघतो हे त्यानेच जाहीर म्हटले आहे."
"मला माहित आहे."
"पण आपल्याला वाईटात वाईट घडेल हे गृहित धरून काही पर्यायी योजना करायला हवी बापू!"
"तुला काय वाटते?"
" स्थिती अनिश्चित आहे. दोस्त जिंकले तरी ते हरल्यासारखेच असतील...त्यांची प्रचंड हानी होते आहे. त्यांचे साम्राज्य लयाला जाईल! आज नाहीतर उद्या."
"आणि नाझी जिंकले तर?"
"ते युद्धखर्च वसूल करण्यासाठी वसाहतींना प्रचंड लुटतील आणि आहे त्यापेक्षा भयंकर वंशवादी गुलामी आणतील!"
" त्यात आपण कोठे बसतो?"
"बापू, कोठेही नाही. मी हिटलरचे निमंत्रण नाकारले आणि मुसोलिनीची भेट टाळली. तुम्हाला मानवाला गुलाम करणारे वंशद्वेष्टे आवडत नाहीत हे मला माहित आहे."
"सुताचा धागा तुटला....थांब जवाहर....हं...आता बोल...तुला वंशवादी आवडत नाहीत...चुकीचे असले तरी लोकशाहीवादी आवडतात..बरोबर?"
"हो बापू!" 
"त्यांच्याशी लढता येते. अधिकार सनदशीर मार्गाने मागता येतात. ज्युंचा झाला तसा या काळया हिंदुंचाही वंशविच्छेद होवू शकतो...जर नाझी दोस्तांना हरवू शकले तर...बरोबर?"
"हो. मग इंग्रजांचे राज्य जावून त्यांचे येईल. शेवटी हा संघर्ष वसाहतवादासाठी आहे बापू!"
"बरोबर. आज ते जिंकत आहेत?"
"हो बापू!"
"समजा ते जिंकले तर त्यांच्या बाजुला आपले कोण आहे?"
"आज तरी कोणी नाही बापू...रासबिहारी आहेत...पण त्यांची शक्ती नगण्य आहे. ते तेवढे प्रभावी नाहीत."
"तुला असे वाटत नाही कि त्यांच्या बाजुलाही आपलाच भारतवादी माणूस हवा?"
"म्हणजे?"
"जवाहर...असे समज...नाझी जिंकनार. सध्याचे वातावरण तसेच आहेत. दोस्त मार खात आहेत. अमेरिका चूप आहे. माझा आतला आवाज सांगतो कि नाझी जिंकनार नाहीत. तरीही आपल्याकडे पर्याय पाहिजे! त्यांच्याही बाजुला आपला माणूस पाहिजे. म्हणजे ते जरी जिंकले तरी भारतीय सत्ता आपल्याच माणसाकडे येईल!"
"हे कसे शक्य आहे बापू?"
"सूत मस्त कातले जातेय. जवाहर..."
"ते मी पाहतोच आहे बापू!...पण या स्थितीवर उपाय काय?"
"काही नाही. पण आपल्याला स्वातंत्र्य कोणत्याही किमतीवर हवे. या महायुद्धात कोणतीही बाजू जिंकू शकते, आणि जवाहर आपण कोणाच्याही बाजुने नाही. युद्धखोरी मानवजातीला शाप आहे. पण समजा नाझी जिंकले तर काय याचा विचार आपण केला पाहिजे. ते जिंकले तर ब्रिटिश वसाहती आपोआप त्यांच्या वसाहती होतील. आणि आपण जसे शांततामय मार्गाने ब्रिटिशांशी लढू शकतो तसे यांच्याशी नाही लढू शकत."
"बरोबर बापु"
"मग त्यांचा बाजुने आपलाही माणूस पाहिजे. समजा ते जिंकले तरी आपल्या देशाची हानी होणार नाही!"
"पण मग लोकशाही कशी येईल बापू?"
"नाही येणार! पण त्या हुकुमशाहीचा प्रवर्तक आपलाच मानूस असेल तर ती हुकुमशाहीही मानवता केंद्रीत तरी असणार!"
"तुम्ही अतार्किक अव्यवहारीच बोलता बापू!"
"नाझी गटाकडे मी माझा सैनिक पाठवतो आहे जवाहर...धक्का बसल्यासारखा माझ्याकडे पाहू नकोस...तुला काय वाटले, दोस्त हरले तर काय या स्थितीचा मी विचार केलेला नाही? माझा पर्यायी सैनिक मी तयार ठेवला आहे!"
"कोण बापू?"
"सुभाष...."
"....तो तयार होईल?"
"जवाहर...देशासाठी तो काय करणार नाही? चल, जाऊ दे...आपल्याला फक्त वातावरण बनवायचय...बनवु...आणि हे बघ सुत आता तुटत नाहीय!"

Sunday, November 11, 2018

शनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

१० नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : १४ मिनिटं


पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे.

पेशवाईचा अस्त १८१८ साली झालाअसं साधारणपणे आपण समजतो. या घटनेला यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. पण पेशवाईचा अस्त म्हणजे कायहे नेमकं समजावून घेण्यासाठी पेशव्यांचा सार्वभौम राजकीय सत्ताधारी म्हणून अंमल नेमका कधीपासून संपलाहे पाहावं लागतं. पेशवाईचा अंतकाळ अत्यंत दुर्दैवी घटनांनी भरलेला आहे. 

दुसऱ्या बाजीरावाला पळपुटा बाजीराव’ अशी पदवी समाजानं कधीच बहाल करून टाकलीय. दुसऱ्या बाजीरावाचा वासनांध, मत्सरीखुनशी आणि तेवढाच भेकड स्वभाव इतिहासात नेहमीच चर्चेत राहिलाय. मराठेशाहीला उत्तुंग नेतृत्वाची गरज होतीनेमक्या त्याच काळात कचखाऊ,नेभळा आणि वासनांध पुरुष पेशवेपदी आल्यामुळं देशाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं.

नारायणराव पेशवा यांच्या खुनाचा आरोप असलेल्या रघुनाथराव पेशव्यांचा आनंदीबाईपासून झालेला पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव. सत्ताभिलाषी असलेले रघुनाथराव हे इंग्रजांना मिळाल्यानं पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं. दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झालातो रघुनाथराव आणि आनंदीबाई नजरकैदेत असताना. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत तो नजरकैदेतच वाढला. त्यानंतर त्याची सुटका झाल्यानं तोपर्यंत त्याला कोणतंही औपचारिक शिक्षण मिळालं नाही. तसंच राज्यकारभाराचेही कोणते धडे मिळाले नाही. शिवाय जनतेत त्याची प्रतिमा नेहमीच एका खुन्याचा मुलगा अशी राहिली.

सवाई माधवराव निपुत्रिक. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर पेशवाईची गादी कोणाकडे जाणार,असा संघर्ष निर्माण झाला. दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मदतीनं दुसऱ्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रं मिळाली. पण खरी सत्ता त्याच्या हाती नव्हतीच. तो दौलतराव शिंदेबाळोजी कुंजीर आणि सर्जेराव घाटगे यांच्या हातचं बाहुलं बनून राहिला. या साऱ्या वातावरणात त्याचा विषयांधलोभीमत्सरी आणि खुनशी स्वभाव उसळ्या घेत राहिला. त्याचं दर्शन शक्य तितकं त्यानं घडवलं.

त्याने त्याचे उपकारकर्ते नाना फडणवीस यांना कैदेत टाकलं. पेशव्यांचेच सरदार असलेल्या मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करून त्यानं दौलतरावांच्या सैन्याच्या हातून मल्हाररावांचा खून घडवला. हेतू होतातो दौलतराव शिंद्यांच्या घशात होळकरी प्रदेश घालून द्रव्य मिळवण्याचा. या खुनी हल्ल्यातून यशवंतराव आणि विठोजी होळकर कसेबसे सुटले. पण त्यांनी पेशव्यांची सत्ता धुडकावून लावत दौलतराव शिंदेंशी युद्धाचा डाव मांडला. होळकरी प्रांत सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला.

दुसऱ्या बाजीरावाला दौलतराव शिंदे यांचं वर्चस्व मनोमन मान्य होतंच असं नाही. पण सत्तेसाठी आपल्या विधवा सावत्र आयांशी युद्ध करू शकणारा दौलतराव आपल्याला जुमानेल,अशी शक्यता त्यालाही वाटत नव्हती. त्यामुळं १८०० पासूनच दुसऱ्या बाजीरावानं गुप्तपणे पुण्यातील इंग्रज वकीलाशी सलोख्याचं बोलणं चालू केलं. खरं म्हणजे सत्तेची सूत्रं त्याच्या हातून कधीच निसटलेली होती. तो केवळ नामधारी पेशवा होता. सत्तेची सूत्रं विखुरलेल्या अवस्थेत मराठशाही सरदारांच्या हाती गेली होती. त्यांच्यातही आपसी संघर्ष होतेच. दौलतरावांच्या आहारी गेलेल्या दुसऱ्या बाजीरावाला आपण आपल्याच बुडाला चुड लावत आहोत,याची कल्पना का आली नाहीकिंबहुना तो पाचपोच त्याच्यात नव्हताच.

यशवंतराव होळकरांनी ठेवलेल्या साध्या मागण्या ऐकण्याचंही औदार्य त्यानं दाखवलं नाही. त्याची परिणती अशी झाली कीयशवंतराव होळकरांनी शेवटी ६ जानेवारी १७९९ला राज्याभिषेक करून घेत सार्वभौमता घोषित केली. पेशवाईतील एक बुरुज अशा रीतीनं स्वतंत्र झाला. खुद्द नाना फडणवीस यांनी होळकर बंधूंना साकडं घातलं की बाजीरावाच्या नादानीनं रयतेची रया गेली आहे. दौलतरावांचे पेंढारी सर्वत्र रयतेचीच लूट करत आहेत. त्यामुळं तो बंदोबस्त करायला विठोजी होळकर पेशव्यांच्या प्रांतात उतरले. पण बाजीरावानं विठोजी होळकरांना कपटानं पकडून १६ एप्रिल १८०१ रोजी त्यांची शनिवारवाड्यासमोर हत्तीच्या पायी तुडवून क्रूर हत्या केली. त्याचीच परिणती पुढे हडपसरच्या युद्धात झाली.

२५ ऑक्टोबर १८०२ ला उत्तरेतून मराठ्यांचे प्रांत काबीज करत आलेल्या यशवंतराव होळकर आणि दौलतराव - दुसरा बाजीराव यांच्या फौजांमध्ये हडपसर इथं घनघोर युद्ध झालं. या युद्धात आपली हार होते आहेहे दुसऱ्या बाजीरावाच्या लक्षात येताच त्यानं पळ काढला. डोणजेमार्गे तो आधी रायगडावर आणि नंतर वसई इथं इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला. दुसऱ्या बाजीरावाला परत आणण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर यशवंतरावांनी साताऱ्याहून दुसऱ्या बाजीरावाचा सावत्रभाऊ अमृतरावासाठी पेशवाईची वस्त्रं आणून दिलीपण अमृतरावाची ती वस्त्रं स्वीकारण्याची हिम्मत झाली नाही. पण तरीही कारभार मात्र अमृतरावाच्याच हाती गेला.

वसईला गेलेल्या दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांशी १८०२ ला मांडलिकीचा तह केला. त्या तहानुसार पेशव्यांची सार्वभौमता कागदोपत्रीही राहिली नाही. त्या तहातील अटी होत्या - सहा हजारांची इंग्रजी फौज दुसऱ्या बाजीरावाच्या तैनातीत राहीलइंग्रजांच्या सल्ल्याखेरीज तो कोणताही करारमदार करू शकणार नाहीसव्वीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या जिल्ह्यांवर इंग्रजांचा अधिकार चालेलकोणाशीही परस्पर युद्ध घोषित करण्याचा अधिकार त्याला राहणार नाही.

थोडक्यात दुसऱ्या बाजीरावानं या तहामुळं आपलं संपूर्ण स्वातंत्र्य गमावलं. त्याची सार्वभौमता गेली. तो केवळ इंग्रजांचा एक मांडलिक उरला. दरम्यान तो पुण्याला येत नाहीहे स्पष्ट झाल्यावर अमृतरावानं यशवंतराव होळकरांशी एक करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी अमृतरावाला खालीलप्रमाणं मदत करायची होती.
१. रायगडावर कैदेत असलेल्या सवाई माधवरावांच्या पत्नीलायशोदाबाईंना मुक्त करून अमृतरावांचा मुलगा तिला दत्तक घ्यायला लावायचा आणि त्याच्यासाठी पेशवाईची वस्त्रे सातारकर छत्रपतींकडून देववायची.
२. या बालपेशव्याचा प्रतिनिधी म्हणून अमृतरावाने दौलतीचा कारभार पाहायचा.
३. अमृतरावाला यशवंतरावांनी पूर्ण संरक्षण द्यायचं आणि शिंद्यांचा बंदोबस्त करायचा.
या बदल्यात अमृरावानं यशवंतरावांना युद्धखर्च आणि हा वरकड खर्च यासाठी एक कोटी रुपये द्यायचे.

थोडक्यातआता दुसरा बाजीराव हा पेशवा नाही आणि स्वत: पेशवेपदाची वस्त्रंही स्वीकारायची मनोवस्था नाहीया स्थितीत असा मार्ग काढला गेला. दुसऱ्या बाजीरावाची सत्ता जातेययाचा कसलाही खेद पुण्यातून अथवा पेशव्यांचा अंमल असलेल्या प्रदेशातून उमटला नाही. कोणी विरोधही केला नाही. याचाच एक अर्थ असा कीदुसऱ्या बाजीरावाची सद्दी संपली आहेयाची जाणीव जनमानसाला झाली होती. ही स्थिती इंग्रजांच्या लक्षात येताच ते स्वत: दुसऱ्या बाजीरावाला घेऊन पुण्याला यायला निघाले.

हे समजताच अमृतरावानं पुण्यातून पळ काढला आणि जाता-जाता लुटालूट माजवत त्यानं ती लूट हत्तीउंट गाड्यांवर लादून नेलीती पाहता पुण्याचाच नव्हे तर नशिकपंचवटीराहुरी,चाकणवरही त्याने दरोडे टाकले. म्हणजे अमृतरावही काय लायकीचा माणूस होताहे सहज लक्षात येतं. प्रजेशी कोणालाच काही घेणं-देणं उरलेलं नव्हतं. खरंतर ही सुरवात शाहू महाराज गेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांपासूनच झाली होती. नानासाहेब पेशव्यांनी खुद्द छत्रपतींचा जामदारखाना लुटला होता. रमणेब्राह्मण भोजनं यातच पेशवे स्वतःचा वेळ आणि पैसा घालवत. आपल्यावरील कर्ज निवारण्यासाठी ते पानिपत युद्धाच्या वेळेसही मोहिमा काढण्यासाठी नाना सरदारांच्या मागे लागत.

खऱ्या अर्थानं राज्यविस्तार हा पेशव्यांचा हेतच नव्हता. लोभीपणा आणि खुनशी हाव यांनी पेशव्यांचा कब्जा घेतला होता. दुसऱ्या बाजीरावानं त्यावर विकृत कळस चढवला. तो तर धनिकांना चक्क शनिवारवाड्यात बोलावून त्यांच्याकडून पैसे काढल्याखेरीज सुटका करत नसे. तासन्‌तास उभं करणंकोरड्यांचे फटके देणेत्यांच्या बायकांनाही न सोडणं असले राज्यकर्त्याला न शोभणारे असभ्य प्रकार करत असे. शिवाय त्याचे पेंढारी पेशव्याच्याच प्रांतात मनमुक्त लूट करत हे वेगळंच.

थोडक्यात प्रजेचा अनिवार छळ सुरू होता. व्यवसाय, शेतीकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. त्यात पुण्यात अस्पृश्यांवर अमानवी बंधनं लादली गेली. म्हणजे त्यांनी मध्यान्हीच्या वेळेशिवाय शहरात यायचंच नाही. कारण काय तर त्यांची सावली कोणा ब्राह्मणावर पडली तर विटाळ होईल. शिवाय पाऊलखुणा पुसल्या जाव्यात म्हणून कमरेला झाडूतर थुंकायला गळ्यात मडकं असलंच पाहिजेअसा दंडक. सनातनी कट्टर वैदिकतेचं स्तोम वाढवण्याचं विकृत काम दुसऱ्या बाजीरावानं केलं.

त्याच्या कारकिर्दीत शनिवारवाडा नुसता कटकारस्थानांचं केंद्र बनला नव्हतातर त्याचं रुपांतर कुंटणखान्यात झालं होतं. त्याची विषयलालसा एवढी की सरदारांच्या बायकांनाही तो आपल्या शयनगृहात हरप्रयत्ने आणत असे. सर्जेराव घाटगे आणि बाळोबा कुंजीर त्यांना स्त्रिया मिळवून देण्याचं काम करत घाटग्यांबाबत तर जदुनाथ सरकार म्हणतात, ‘तो निव्वळ बायकांचा दलाल होता!’ यामुळं झालं असं की अनेक सरदार दुसऱ्या बाजीरावासाठी अधिकची लग्ने करत. त्या बायका त्याच्यासाठी राखून ठेवत. काही सरदारांनी पुणेच सोडलं. तर एका सरदाराच्या बाबतीत त्याच्याच बायकोला बाजीरावाकडे पाठवायचा प्रसंग उद्‌भवल्यावर त्यानं आत्महत्या केली.

म्हणजे प्रजेलाच लुटणंआपल्याच सरदारांच्या पत्नी विषय वासनेसाठी वापरणंते आपल्याच लोकांविरुद्ध कटकारस्थानं करणं, यामुळं पेशवाई आधीच लुळी-पांगळी झाली होती. त्याच्यामुळं यशवंतराव होळकरांनी त्याची साथ सोडून स्वतंत्र मार्ग पत्करला. तरीही त्याची खुनशी वृत्ती सुटली नाहीत्यामुळं हडपसरचं युद्ध होऊन यशवंतरावांहातीच पराभव स्वीकारत आपलं सार्वभौमत्व गहाण ठेवावं लागलं.

सार्वभौमता या अर्थानं पाहिलंतर पेशवाईचा अस्त ३१ डिसेंबर १८०२ रोजीच झालाअसं म्हणावं लागतं. १३ मे १८०३ ला इंग्रजांनी पुन्हा गादीवर बसवला गेलातो एक नामधारी पेशवा. अन्य सरदारांचं म्हणावं तर २३ सप्टेंबर १८०३ रोजी असई आणि नंतर आडगांव इथं वेलस्लीनं शिंदे आणि भोसलेंचा निर्णायक पराभव केला. या युद्धातील पराजयामुळं भोसलेंनी १७ डिसेंबर १८०३ ला देवगांव इथं तर शिंदेंनी ३० डिसेंबर १८०३ ला सुर्जी अंजनगांव इथं इंग्रजांशी तह केला. अशा रीतीनं मराठा राजमंडळ इंग्रजांच्या अंकित झालं. स्वत:चे अनेक प्रांत कायमचं गमवावं लागलं आणि संपूर्ण स्वातंत्र्य नष्ट झालं. पण या घटनेला पेशवाईचा अस्त’ म्हटलं जात नाहीते केवळ तांत्रिक कारणांनी.

कारण मांडलिक स्वरूपातही का होईनापेशवा आपल्या पदावर होता. दिल्लीचा बादशहाही अशाच तांत्रिक कारणांनी अजूनही दिल्लीचा शासक होता. खरा पण एकही आदेश तो इंग्रजांच्या सल्ल्याशिवाय काढू शकत नव्हता. भारतीय लोकांना नामधारी असली तरी एतद्देशियच केंद्रीय सत्ता लागतेहे त्यांना माहीत होते. किंबहुना तेही नाणी पाडताना एका बाजुला बादशाही छाप ठेवतच होते. पेशवेही त्याला अपवाद नव्हते. भारतात याला अपवाद होतेते फक्त यशवंतराव होळकर. त्यांनी स्वत:चीच दोन्ही बाजूला आपलीच मुद्रा असलेली स्वतंत्र नाणी पाडण्याचं धोरण सुरू केलं. याचा अर्थ भारतात वास्तव अर्थानं होळकर वगळता एकही सार्वभौम सत्ता उरली नव्हती आणि त्यांचा इंग्रजांशी विजयी संघर्ष सुरुच होता. पण भारतातील अन्य संस्थानं तोवर इंग्रजांचे मांडलिक बनून चुकली होती.

१८०२च्या मांडलिकत्वाच्या तहानंतर दुसरा अध्याय सुरू होतोतो म्हणजे मांडलिकानं मालकांपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांचा. वसईच्या अवमानकारक तहानं तसंही आता त्याला शांत बसावं लागत होतं. पण मत्सरी स्वभावामुळं त्यानं इंग्रजांच्याच मदतीनं पटवर्धन,रास्तेंसारख्या सरदारांचाही पाडाव करण्याचा व्यूह त्याने रचला. पण एल्फिस्टननं १८१२ साली पंढरपूरच्या तहान्वये पेशव्यांचा तो बेत हाणून पाडला. इतर काही करता येत नाही म्हणून त्याच्याच अखत्यारीत असलेल्या बाबींत त्यानं ढवळाढवळ सुरू केली.

छत्रपती प्रतापसिंहांना अपमानस्पद वागणूक देत राहाणंहे एक प्रकरण. छत्रपतींनाच कैदेत टाकण्याची मजल गाठणारा पेशवाअशी दु:ष्कीर्ती त्यानं प्राप्त केली. छत्रपतींच्या कागाळ्यांकडे आधी इंग्रजांनीही दुर्लक्षच केलं. त्या काळात स्वत: इंग्रजच आणि समस्त इंग्लंड अडचणीत असल्यानं त्यांना बंडाच्या डोकेदुख्या वाढवायच्या नव्हत्या. १८०५ पासूनच पेशवा त्र्यंबकजी डेंगळेच्या प्रभावाखाली येऊ लागला होता. त्यानं स्वत:हून किंवा बाजीरावाच्या सल्ल्यानं इंग्रजांविरुद्ध मांडलिक मराठा सरदारांच्या मदतीनं उठावाचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांत एक घटना घडली ती म्हणजे बडोदा संस्थानच्या गायकवाडांच्या पंतप्रधानपदी असलेल्या गंगाधरशास्त्री यांच्या खुनाची घटना!

गायकवाड आणि इंग्रजांत त्या काळात सख्य होते. १८१५ मध्ये गायकवाडांनी इंग्रजांसंदर्भातील काही मुद्द्यांची चर्चा करायला गंगाधरशास्त्र्यांना पुण्याला पाठवलं. त्यांची पुण्यात हत्या झाली. त्र्यंबकराव डेंगळे यांनी कट करून त्यांची हत्या केलीअसा इंग्रजांनी आरोप केला. गंगाधरशास्त्री आणि त्रिंबकजी प्रकरणानंतर पेशवा-छत्रपती प्रकरणी निश्चित भूमिका घेणं भाग असल्याचं एल्फिन्स्टनला कळून चुकलं. त्यानं पेशव्यांच्या अपरोक्ष छत्रपतींकडे आतून संधान बांधायला सुरवात केली. त्याची अंतिम परिणती छत्रपती प्रतापसिंहांनी इंग्रजांचा आश्रय घेण्यात झाली.

नंतर पेंढाऱ्यांशी युद्धाच्या बहाण्यानं माल्कमच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी संभाव्य बंडखोरी करू शकतीलअशा सर्वच रजवाड्यांशी एक प्रकारे छुपे युद्ध पुकारलं. इकडं इंग्रजांनी गंगाधरशास्त्र्यांच्या खुन्यालाम्हणजे त्र्यंबकरावाला आपल्या हाती सोपवण्याची मागणी सुरू केली. बाजीरावासमोर पर्याय राहिला नाही. पण यामुळं पेशव्याची उरली सुरली इभ्रत मातीला मिळाली.

१८१७ च्या सुरुवातीला दुसऱ्या बाजीरावानं मैदानात उतरत इंग्रजांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यापाशी विशेष शक्ती उरलेली नव्हती. त्याच्या बरोबर बाळोबा कुंजीर होतेच. त्याने पेंढाऱ्यांच्या प्रमुखांशी संधान बांधायला सुरुवात केली. होळकरांचा जुना एकनिष्ठ अमीर खानालाही वळवण्याचा प्रयत्न झाला. सैन्य उभारायला आणि किल्ले दुरुस्त करायला सुरुवात झाली. पेशव्यांची ही अखेरची फडफड आहेहे लक्षात येताच एल्फिस्टननंही त्याचे डाव आखले. पण तोवर नागपूरकर भोसल्यांनीही मांडलिकत्वाचा तह करून टाकला होता.

१३ जून १८१७ ला इंग्रजांनी पेशव्याला इंग्रजविरोधी कोणत्याही कारवाईत सामील होणार नाहीअसा तहही करवून घेतला. त्याने त्याच्या अखत्यारीत असलेला कोकणही इंग्रजांच्या स्वाधीन केला. पाच नोव्हेंबर १८१७ ला शिंदेंनीही ग्वाल्हेर इथं इंग्रजांचं संपूर्ण सार्वभौमत्व मान्य करणारा तह केला. एका अर्थानं बाजीरावाची संपूर्ण कोंडी केली गेली. तरीही दुसऱ्या बाजीरावानं आपल्या इंग्रज तैनाती फौजेलाच फोडण्याचे प्रयत्न सुरू केले.

बापू गोखलेचं दडपण दुसऱ्या बाजीरावावर जास्त येऊ लागले ते युद्ध सुरू करण्यासाठी. गारपीरला तेव्हा इंग्रज सैन्य फारसं नव्हतं. प्रथम पुण्यातील इंग्रजी फौजेचा धुव्वा उडवून मग मुंबईकडून येणाऱ्या फौजेशी लढावंहा बापूचा सल्ला बाजीरावानं मानला नाही. पण २ नोव्हेंबर १८१७ रोजी एका इंग्रजावर गणेशखिंडीजवळ हल्ला झाल्यानं मात्र घटनांना वेग आला. याचा बदला इंग्रज घेतील ही भीती होती. आणि तसंच झालं. पाच नोव्हेंबरला युद्धाला तोंड फुटलं. खडकीत इंग्रजांपेक्षा अधिक सैन्य असलेल्या पेशव्याला तेवढ्यापुरता तरी निर्णायक विजय मिळवणं सोपं होतं. पण बाजीरावानं तिथंही मोडता घातला.

त्यानं दुसऱ्या दिवशी निर्णायक हल्ला करण्याचा बापूचा बेत हाणून पाडला. पुण्यातील इंग्रजी सैन्य उखडण्याचं काम होणं शक्य असतानाही त्यानं तसं होऊ दिलं नाही. यामागे दुसऱ्या बाजीरावाची स्वार्थी आणि चंचल प्रवृत्ती कारण होती. एकीकडे इंग्रजांशी केलेला मांडलिकत्वाचा तह आणि दुसरीकडे आपले सरदार या कात्रीत तो बहुदा सापडला असावा.

तोवर जनरल स्मिथ पुण्याला सैन्य येऊन पोहोचला होता. आता गाठ त्याच्याशी होती. १६ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवडा इथं युद्धाला तोंड फुटलं. मराठी सैन्यानं जनरल स्मिथच्या पलटणांवर चढाई केली. गोखलेपुरंदरेरास्तेआपटेपटवर्धन मंडळींनी बऱ्यापैकी पराक्रम गाजवला. गोसाव्यांची फौजही प्राणपणानं लढली. दुसरा बाजीराव त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं युद्धाचा अंत काय होणारहे लक्षात येताच सासवडकडे रवाना झाला. बाकीच्या सरदारांनीही तोच मार्ग पत्करला. पुणे स्मिथच्या निर्वेधपणे हाती पडलं. दुसऱ्याच दिवशीम्हणजे १७ नोव्हेंबर रोजी इंग्रजांनी शनिवारवाड्याचा ताबा घेतला आणि बाळाजीपंत नातूच्या हस्ते जरीपटका उतरवून इंग्रजी ध्वज फडकावला.

युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकला याचा अर्थ इतकाच की मांडलिक म्हणता येईलअशीही पेशवाई शिल्लक राहिली नाही. मांडलिकाचे मर्यादित का होईना जे अधिकार असतातते संपूर्णपणे संपुष्टात आले. म्हणजेच १८०२ ला सुरू झालेल्या अस्ताचा हा शेवट होता. पुढं बाजीरावाला पकडणं आणि त्याचं काय करायचं ते पुनर्वसन करणं हा केवळ उपचाराचा भाग होता. या घटनेनंतर पेशवाई राजकीयदृष्ट्या संपुष्टात आली हे मात्र खरे.

या घटनेनंतर जनरल स्मिथ आणि पेशव्याच्या पाठलागाचा खेळ सुरू झाला. दुसरा बाजीराव पळतोय आणि स्मिथ त्याचा पाठलाग करतोयअसा जवळपास दीड महिन्याचा हा पाठशिवणीचा खेळ चालला. या पळाच्या दरम्यान १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावला शिरुरवरून पुण्याला निघालेल्या एका इंग्रज तुकडीशी पेशव्याच्या सैन्याची अपघाती गाठ पडली आणि चकमकही झाली. पण चकमकीचाही अंत पाहायला न थांबता दुसरा बाजीराव छत्रपतींना घेऊन पुढं निघून गेला. बापु गोखले त्या सैन्याला थोपवत निर्णायक लढाई न करता अंधार पडू लागताच घाईनं बाजीरावाला मिळायला पुढं निघून गेला. कारण त्यांना भय होतंते पाठलागावर असलेल्या जनरल स्मिथच्या बलाढ्य फौजेचे. भीमा कोरेगांवला निर्णायक लढाई करून मग पुढं जावं, हा निर्णय घेणं आत्मघात ठरला असता.

११ फेब्रुवारीला इंग्रजांनी एक जाहीरनामा काढला आणि गंगाधरशास्त्र्यांच्या खुनाचं खापर त्र्यंबकजी डेंगळेंवर तर त्यामागे दुसऱ्या बाजीरावाचं डोकं असल्याचं जाहीर करत जनतेला अभय देण्यात आलं. ४ एप्रिलला इंग्रजांनी छत्रपतींच्या हस्तेच दुसऱ्या बाजीरावाला पेशवे पदावरून हटवल्याचा आदेश काढला. त्याची परिणती दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांच्या स्वाधीन होण्यात झाली. पुण्याकडे कधीही न फिरकण्याची अट घालत आठ लाखांच्या वार्षिक तनख्यावर बिठूरला रवाना केलं.

दुसऱ्या बाजीरावाच्या व्यक्तिगत दृष्टीने हा त्याचा व्यक्तिगत अंत होतापण १८०२ ला वसईच्या तहान्वये त्यानं इंग्रजांचं मांडलिकत्व मान्य केलं तेव्हाच पेशवाईचा राजकीय सत्ता म्हणून अंत झाला होता. त्यामागं सर्वस्वी त्याचा विषयलंपटखुनशीमदांध आणि कारस्थानी स्वभाव होता. त्याच्या या मानसिकतेची आणि अस्थिर मनाची कारणं भलेही त्याच्या बालपणात दडलेली असतील. पण जे काही त्याच्या कारकिर्दीत घडले तो एक कलंक आहेयात वाद असू शकत नाही.

अशा पेशवाईचा अंत झाल्यानं प्रजेला दु:ख होण्याचं काही कारणच नव्हतं. उलट इंग्रजी अंमलाचा प्रजेनं सहर्ष स्वीकार केला. एका लुटारू, प्रजाहितविरोधी वागणाऱ्या पेशव्याचं पतन झाल्यानं प्रजेनं आनंदोत्सव साजरा केला असल्यास त्यात नवल नाही. काहींनी या आनंदप्रीत्यर्थ यज्ञही केले म्हणतात. पेशव्यांच्या भीषण पारतंत्र्यात राहण्यापेक्षा इंग्रज परकीय असले तरी त्यांच्या शासनाखाली राहणंप्रजेला हितकारी आणि सुखद वाटलं.

दुसरा बाजीराव हा एरवी उज्ज्वलतेनंविजिगिषु वृत्तीनं झळकणाऱ्या मराठी इतिहासातील एक काळेकुट्ट पर्व निर्माण करणारा अधम सत्ताधारी ठरला. दुर्दैव हे की त्याच्या काळातील त्याच्या सरदारांनीही त्याच्या वर्तनास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ दिली. तो काळ कोणत्या मोहात सापडला होताहे समजत नाही.

शनिवारवाडा पहिल्या बाजीरावानं ज्या स्वप्नाळू हिकमतीनं उभारला होतातिला दुसऱ्या बाजीरावानं आपल्या नालायकीनं उद्ध्वस्त केलं. त्यामुळे शनिवारवाडा हे एक अभद्र आणि अमंगळ ठिकाण बनलं. त्यामुळंच आपला शासक कोणाच्या अंकित व्हावाआपला ध्वज जाऊन परकीय ध्वज यावायाचं प्रजेला कसलंही दु:ख झालं नाही. पहिल्या बाजीरावाने उभारलेल्या पेशवाईची अखेर दुसऱ्या बाजीरावानं केली ती अशी!
(Published on http://kolaj.in/published_article.php?v=journey-of-the-end-of-the-Peshwas-200-years-agoWY5856831&fbclid=IwAR2uwVHg67Wj3_NDAJS0BQs-Vjvl40aXrDpKhyXSEpJYq8p_qANH8AEtGtU )

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...