Wednesday, May 30, 2012

माझ्या सर्व मित्रांना सविनय निमंत्रण




१ जुन २०१२ रोजी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे आघाडीचे विचारवंत प्रा. हरी नरके यांना पहिल्या महाराजा यशवंतराव होळकर सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. कोणताही जातीविद्वेष न ठेवता सर्व समाजाची पुरोगामी वैचारीक बैठक सम्म्रुद्ध व्हावी यासाठी ते गेली ३५ वर्ष अहोरात्र झटत आहेत. १ जुन रोजी ते वयाच्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हे औचित्य साधुन हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून जातीय विद्वेषाने बरबटु लागलेल्या महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आता कोणत्या मार्गाने पुढे न्यायचे यावरही त्यात विचारमंथनही होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डा. सुधाकर जाधवर असणार असून डा. सु. दा. तुपे यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह व मानपत्र प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्वश्री. शुद्धोदन आहेर, राजाराम पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित असणार आहेत.

हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशीव पेठ, खजीना विहीरीजवळ, पुणे येथे १ जुन १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास आपली उपस्थिती आम्हास नक्कीच नवे बळ देईल.

धन्यवाद.

आपला,

संजय सोनवंणी

Sunday, May 27, 2012

या वाताहतींना जबाबदार कोण?


महाराष्ट्राच्या सामाजिक अंतरंगात डोकावुन पाहिले तर पुर्वीपेक्षा आता फार मोठ्या प्रमाणावर बदल घडत असतांना दिसतील. जे समाज मुक होते, सत्ताधा-यांनी तोंडावर फेकलेले थोडे सत्तेचे वा धनाचे वा पुरस्कारांचे तुकडे झेलत जे चाललेय तसे चालु देत होते, ते आता आपला असंतोष अभिव्यक्त करु लागले आहेत...रस्त्यावर उतरु लागले आहेत.. ज्या जाती/जमाती अस्तित्वात आहेत हेही ज्या सफेदपोश समाजाला माहित नव्हते त्या आता माहित होवु लागल्या आहेत. ज्या जाती-जमातींबद्दल ऐकीव माहित्या होत्या त्या किती वरवरच्या होत्या याची जाणीव किमान सुबुद्ध म्हनवणा-या पण आपल्याच कोषात रममाण असणा-या प्रजेला होवु लागली असेल. अर्थात असे लोक अत्यल्प आहेत हेही खरे. गोवारी समाजाचे हिंसक आंदोलन झाले तोवर महाराष्ट्राला अशी जमात महाराष्ट्रात आहे याची किती जाणीव होती? टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाने कालच जळगांवला आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी रेल रोको केलेय. या आदिवासी जातींबद्दल आपल्याला कितपत माहिती असते? त्यांचे प्रश्न कितपत कळतात? आगरी-कोळ्यांची जी वाताहत झाली आहे, त्यांची रायगड जिल्ह्यातील मीठागरे राज्य सरकारच्या निंद्य वर्तनाने अक्षरशा ओस पडत, ज्या भागातुन आधी जगाला मीठ पुरवले जात असे तेथुन आता जिल्ह्याला पुरेल एवढेही मीठ उत्पादन घेता येत नाही याबाबत आपल्याला कितपत खबर असते? ढोर समाज आजही आत्मभानाच्या, आत्मप्रतिष्ठेच्या शोधात अस्वस्थ आहे, याची आपल्याला कितपत जाण असते? गोंधळी, मसनजोगी, डोंबा-यांसारख्या छोट्या जाती-जमातींबद्दल तर बोलायलाच नको. जेथे महाराष्ट्रातील एक मोठा व महाराष्ट्रातील आद्य वसाहतकार असलेला धनगर समाज आजही अस्तित्वाच्या प्रश्नाने धास्तावत जगत आहे. पण कधी ना कधी कोठेतरी असंतोषाची ठिणगी पडते. अन्याय सहन करण्यालाही एक मर्यादा असते. आपण ख-या स्वातंत्र्यात जगत नसुन एक प्रकारच्या नव्या राजकीय व आर्थिक पारतंत्र्यातच गेलो आहोत, संपुर्ण समाजाचा एक घटक या नात्याने जी न्याय्य समानतेची वर्तनुक मिळायला हवी ती मिळत नाही, न्याय्य हक्क डावलले जातात याची जाणीव जसजशी तीव्र होत जाते, तेंव्हा असे उद्रेक अधुन मधुन होत असतात. ते जसे होतात तसे ते दडपलेही जातात वा तोंडाला पाने पुसणारी आश्वासने देवून त्यांना थंडही केले जाते. मुळ प्रश्न काही केल्या सुटायचे नांव घेत नाही.

प्रत्येक जात/जमात स्वत:च्या प्रश्नांबाबत जागृत असते असा आपला समज असणे स्वाभाविक आहे. ज्याने त्याने आपापल्या जातींच्या प्रश्नांबाबत पाहुन घ्यावे अशी सहसा अन्य जातीयांची अपेक्षा व धारणा असते. अन्य जातीय आपापल्या प्रश्नांबाबत संघर्ष करायला उठतात तेंव्हा आपण धृतराष्ट्र झालेले असतो. पण सर्वाट वाईट म्हणजे,  अनेकदा खुप जाती-जमातींना आपले प्रश्न नेमके काय आहेत आणि ते कसे सोडवायचे याचीही जाण नसते...तसे प्रगल्भ नेतृत्वही अस्तित्वात नसते. समजा प्रश्न समजला तरी सोडवायचा कसा याबाबत अद्न्यान असले तर काय होते याचे एक उदाहरण धनगर समाजाबाबत देता येईल. या समाजातील काही कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात अनुसुचित जमातींत समावेश करावा म्हणुन रिट पिटिशन दाखल केले होते. परंतु जो वकील त्यांनी दिला तोच मुळात चुकीचा होता. त्याला या संदर्भातील घटनात्मक तरतुदीही माहित नव्हत्या. त्यापुळे प्रेयर (प्रार्थना) व मांडणीच चुकीची झाली. मग दुसरे काय होनार? केवळ तांत्रिक मुद्द्यावर याचिका दाखलच झाली नाही. मुद्दा असा आहे कि असेच अन्य जाती-जमातींबाबतही अनेकदा होते. भांडवलदारी चकचकीत जगातील वृत्तांकने करण्यात रममाण असणारी माध्यमे उद्रेक झाल्याखेरीज त्यांची दखलही घेत नाहीत हेही एक वास्तव आहे.

पण एकमेकांच्या प्रश्नांकडे पहायचेच नाही, पहायचेच ठरवले तर "चांगलेच" पाहुन घ्यायचे अशी समाजघातूक प्रवृत्ती सर्वच जाती-जमातींची असल्याने एकमेकांना हात देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अनेक जाती-जमातींचे अनेक प्रश्न खरे तर समान आहेत, पण जाती-जमातींमधील सोडा खुद्द पोट-जातीही एकमेकांना पाण्यात पहात असतील तर एकत्र येत ते सोडवणे दुरच रहाते व त्याचा लाभ सत्ताधारी जाती घेत राहणार हे उघड आहे. तसा ते घेतही आहेत. यामुळे पुरेसे प्रतिनिधित्व नाही. प्रतिनिधित्व नाही म्हणुन कोणी प्रश्न मांडायची व विधीवत मार्गाने सोडवून घेण्याची सोय नाही. प्रत्येक नेता आपापल्या जाती-पोटजातीत अडकुन पडलेला,  हे अडकणे काही त्या जाती-पोटजातीच्या कल्याणासाठी नसते तर आपापली व्होट ब्यंक सुस्थिर ठेवण्यापुरती असते. प्रश्न सुटले तर मग यांची किंमत ती काय राहणार असे उगाच त्यांना वाटत असावे. पण मुलभुतच प्रश्न सुटले नाहीत तर मग दैनंदिन जीवनात भेडसावणा-या प्रश्नांना कोण सोडवणार याचे भान नको काय? पण दुर्दैवाने ते नाही. त्यामुळे या राज्यातील ओबीसी, एस.सी, एस.टी, एन.टी वगैरेंचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत.

या समाजांन आरक्षण आहे. या आरक्षणाबद्दल अनारक्षित समाज घटक असुया बाळगतात. परंतु वास्तव जरा वेगळेच आहे. कोळी बांधवांनी काल केलेले आंदोलन हे जात प्रमानपत्र देण्याच्या जाचक अटींच्या विरोधातील होते. अनुसूचित जमातींवरच्या अटी खुपच जाचक आहेत. त्यामुळे असंख्य लोक मुळात जात प्रमानपत्रांपासुन वंचित राहतात. ओबीसींची परवड वेगळीच आहे. आरक्षणाचा लभ घ्यायचा तर Non Creamy layer प्रमाणपत्र लागते हे जवळपास ८०% ओबीसींना माहित नाही...मग ते कोठे मिळते...कोण देते हे माहित असने तर दुरचीच बाब आहे. अनेकांना तर Non Creamy layer Certificate म्हणजे Non criminal Certificate  असावे असे वाटते व ते पोलिचे स्टेशनवर रांगा लावतात. ही सुशिक्षितांची कथा आहे...मग गांव खेड्यांत काय होत असेल? त्यामुळेच कि काय आरक्षणाचा कोटा कधेच भरला जात नाही. २७% आरक्षण असलेल्या ओबीसींना फक्त ४.८% जागा आरक्षणात मिळालेल्या आहेत हे वास्तव वेगळे काय सांगते? अन्य अनुसुचित जाती-जमातींतील घटकांची अवस्था वेगळी नाही. थोडा फार फरक असेल..पण तो ज्या जाती जागरुक आहेत त्यांच्यापुरता मर्यादित आहे. यासाठी जे सर्वव्यापी प्रबोधन व्हायला हवे ते होत नाही. जी ती जात आपापल्या पायापुरती पाहते हे एक वास्तव आहे. यामुळे सारेच अद्न्यानात लोळतात आणि व्यवस्थेचे शिकार होतात.

यामुळेच कि काय महाराष्ट्रातील सत्ता एका विशिष्ट जातीच्या हाती एकवटलेली आहे. जवळपास ७०% सत्ता एकाच जातीच्या हाती असावी हेच मुळात लोकशाहीच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध आहे. येथे प्रश्न असुयेचा वा जातीद्वेषाचा नसुन अन्याय्य सत्ता वाटपाचा आहे. त्यात बोगस जाती सेर्टिफ़िकेट्स घेत निवडनुका लढवणा-या बहाद्दरांनी नाकात दम आणला आहे. या मंडळींना जाती प्रमानपत्रे एका रात्रीत मिळतात...आणि ख-या ओबीसी वा जाती-जमातींना किमान २-३ वर्ष प्रतीक्षा करावी लागते, हे वास्तव काय सांगते? ही कोनती लोकशाही आहे?

अन्य जाती जमातींचे ख-या प्रश्नांकडे लक्ष जावु नये म्हणुन कि काय या जातींच्या संघटनांनी "ब्राह्मण द्वेषाची" मोहीम चालवली असावी अशी मला रास्त शंका वाटते. भारतात ६०% मुले-मुली कुपोषित...का तर म्हणे युरेशियन ब्राह्मण जबाबदार...वाघ्या कुत्र्याचे स्मारक...ब्राह्मनांची चाल...वगैरे वगैरे...थोडक्यात प्रत्येक बाबींचे खापर ब्राह्मणांवर फोडायचे, बहुजनीय तरुणांना भलत्या दिशेकडे वळवायचे व आपला अजेंडा राबवत रहायचा... हेच धोरण पुढे रेटत आता तेच आरक्षणाच्या रांगेत उभे आहेत. कोणताही सुबुद्ध नागरीक मी वर मांडलेले जे काही प्रश्न आहेत त्याला ब्राह्मण जबाबदार आहेत असे कसे म्हणेल? हे पाप सत्ताधारी जातीचे आहे यात कोनाला शंका बाळगण्याचे कारण नाही. आरोग्य, शिक्षण, रस्ते इ. चे वेगाने खाजगीकरण जे सुरु आहे त्याचे लाभार्थी कोण आहेत? याचा फटका कोणाला बसतो आहे? यावर विचार कोन करणार? कि आर एस एस देतो मुस्लिम द्वेषाच्या अफुची गोळी तशीच ब्राह्मण द्वेषाची गोळी घेत आपल्या ख-या प्रगतीसाठी संघर्ष न करता फुकाच्या तोडफोड-शिवीगाळ उपक्रमांत आंधळेपणे सामील होनार आहात?

ब्राह्मणांशी जेही काही मतभेद आहेत ते धार्मिक व इतिहास लेखन संदर्भातील आहेत. ते वाद पुर्णतया वैचारिक व संशोधकीय स्वरुपाचे आहेत. आज आम्हाला जर आमचे न्याय्य हक्क मिळत नसतील तर त्याला मात्र सत्तेचा मद चढलेल्या, आमच्या विखुरलेपणाचा गैरफायदा घेणा-या सत्ताधारी जमातीच जबाबदार आहेत, हे विसरता कामा नये. १९५२ सालीच बाबासाहेबांनी हा धोका ओळखला होता. बेळगांव येथील भाषणात १९५२ साली ते म्हणाले होते, "चणा कोण खातो हे पहायचे आहे. आज मराठ्यांचा घोडा नवीन आहे...दुस-या वेळेस मराठे सर्वच चणे खातील. पुढे ब्राह्मणांना काहीच उरणार नाही व ते परत आपल्याकडे फिरतील..." मला वाटते ब्राह्मण द्वेषाचा अजेंडा केवळ बाबासाहेबांचे म्हनणे (ब्राह्मणांबाबत व ख-या बहुजनांबाबत) असत्य ठरवण्यासाठीच या मंडळीकडुन हिरीरीने राबवला जात असावा. आणि यामुळेच सारेच एकार्थाने शोषित या संद्न्येत जावुन बसले आहेत.

वेगवेगळ्या जाती-जमातींना आता आपापल्यापुरते पाहुन चालणार नाही. जे प्रश्न समान आहेत त्यासाठी तरी एकत्र येत एकत्र लढे द्यावे लागणार आहेत. एकमेकांचे प्रश्न समजावुन घेत त्यांच्याकडे डोळसपणे पहावे लागणार आहे, मदतीचे हात द्यावे लागणार आहेत. आपापसातील वैचारिक मतभेदांना नंतर मिटवता येईल...आधी न्याय्य सामाजिक हक्क सर्वांना कसे मिळतील हे पाहिले पाहिजे, तरच आपण स्वत:च्या पायावर ठामपणे उभे राहु शकु...भविष्य जरा तरी दमदार करु शकु. अशा अन्याय्य सत्ता उध्वस्त करुन टाकु शकु.

जातीनिहाय उद्रेक व आंदोलने यातुन विशेष काहीएक साध्य होणार नाही याची खुनगाठ बांधावी लागणार आहे.  असंतोष सर्वव्यापी झाला तरच यश मिळेल...अन्यथा कन्हत कुथत संताप गिळत खुरडावे लागणार आहे हे नक्की!

Friday, May 25, 2012

धनगरांनी या घोर फसवणुकीचे काय करायचे?


महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे असा आपला समज आहे. म्हणजे सरकारही पुरोगामी आले. परंतु हेच सरकार जेंव्हा विविध जाती-जमातींवर अन्याय करत केंद्र सरकार, न्यायालये, विविध आयोग यांच्या आदेशांनाही कसे धाब्यावर बसवते याचा उत्तम नमुना म्हणजे धनगरांवरील अन्याय. असाच अन्याय अनेक जाती-जमातींवर होत असुन त्यांना कोणीही वाली नाही असेच चित्र स्वातंत्र्योत्तर काळापासुन दिसते आहे.

जात आणि जमात यात मुलभुत फरक आहे. ज्यांनी आपल्या जीवनव्यवहारात पुरातनता जपली आहे, नागरशैलीपेक्षा वैशिष्ट्यपुर्ण व स्वतंत्र अशी जीवनशैली, रुढी-परंपरा आणि धार्मिक श्रद्धा आहेत अशा समाज घटकास "जमात" (Tribe) असे म्हणतात. यानुसार असे भटके-निमभटके मानवी समुह हे अनुसुचित जमातींमद्धे असावेत हा घटनाकारांचा दृष्टीकोन होता. देशभरात धनगर (मेंढपाळ) समाज हा जरी विविध नांवांनी ओळखला जात असला तरी त्यांचा समावेश हा अनुसुचित जमातींमद्धे केलेला आहे. असे असतांनाही महाराष्ट्र सरकारने मात्र याच समाजाला अनुसुचित जमातींमद्धे आजतागायत प्रवेशु दिलेले नाही. सबब या समाजाचा आर्थिक/सामाजिक व सांस्कृतिक विकास होवु शकलेला नाही. असेच धोरण राहिले तर या समाजाला फक्त नशीबावर हवाला ठेवून जगावे लागणार आहे.

या समाजाचा व्यवसाय समान असला तरी प्रत्येक प्रांतात भाषाभेदामुळे वेगवेगळी नांवे या समाजाला मिळालेली आहेत. बव्हंशी त्यांची गणना अनुसुचित जमातींत केलेली असुन फक्त बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तरांचलमद्धे त्यांची गणना अनुसुचित जातींमद्धे केलेली आहे. उदा. गुजराथमद्धे या समाजाला भारवाड म्हनतात तर कर्नाटकात व केरळात कुरुब, कुरमान. हिमाचल प्रदेशात यांना गड्डी म्हटले जाते तर तमिळनाडुत कोरमान व कुरुंबा. मध्यप्रदेशात या समाजाला कोठे धनगर तर कोठे धनगड असे संबोधले जाते.

भारतात भाषाभेदामुळे उच्चारपद्धतीत फरक पडतो. उदा. खडकीचे इंग्रजीत किरकी, जाखरचे जाखड होते तर यमुनाचे उच्चारण जमुना असेही होते. "र" चा "ड" असा कोठे केला जातो तर कोठे तो "ल" असाही होतो. ओरिसाला ओडीसा असेही उच्चारले जाते. याचे कारण म्हणजे प्रत्येक भाषेची स्वतंत्र अशी उच्चारशैली आहे. उदा. हिंदीत "ळ" हा शब्दच नाही. या विचित्र समस्येमुळे राज्य सरकारने गैरफायदा घेत महाराष्ट्रातील धनगर समाजाला अधांतरी लटकत ठेवले आहे. "आम्ही आहोत तरी कोण?" असा भिषण प्रश्न याच सरकारने त्यांच्यासमोर ठेवला आहे.

ओराव व धनगड या जमाती केंद्र सरकारने अनुसुचित जमातींमद्धे टाकल्या होत्या. मध्यप्रदेश सरकारने विशेष अध्यादेश जारी करुन "धनगड" हा शब्द "धनगर" असाही वाचण्यात यावा असा अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतर तेथील धनगरांची परवड नाहीशी झाली. धनगर, हाटकर धनगर या जमातींचा अनुसुचित जमातीत समावेश केला गेला. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या संदर्भात "धनगड व धनगर हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत असाच निर्णय दिला आहे. केंद्र सरकारच्या अधिसुचनेतही तीन वेळा असेच निर्णय दिले आहेत. कालेलकर आयोगाने व नंतर मंडल आयोगानेही अनुक्रमे  १९५५ व १९७९ साली धनगर व धनगड एकच होत असा अभिप्राय नोंदवला आहे.

आता महाराष्ट्र सरकारची बदमाशी पहा. महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींमद्धे ओराव व धनगड यांचा समावेश केला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ओराव जमातीचे फक्त एक कुटुंब १९९१ च्या जनगणनेत नोंदले आहे तर "धनगड" असे उच्चारली जाणारी/म्हनवणारी एकही जात-जमात महाराष्ट्रात नाही. तरीही धनगड व धनगर या वेगळ्या पृथक अशा जमाती आहेत असाच घोषा महाराष्ट्र सरकारने राज्याच्या स्थापनेपासुन लावलेला आहे.

दुसरी बाब अशी कि १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography on SC and ST and marginal tribes (पृष्ठ क्र. २९४)  वर धनगर (धनगड नव्हे) ही अनुसुचित जमात आहे असे प्रसिद्ध केलेले आहे. १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीतही अशीच नोंद आहे. याचीही दखल राज्य सरकारने घेतलेली नाही.

महाराष्ट्र सरकारने जनतेचा दबाव वाढल्यावर केंद्र सरकारला २६ मार्च १९७८ रोजी शिफारस केली होती कि धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींमद्धे करावा. पण गम्मत पहा, ९-२-८१ रोजी केंद्र सरकारने या संदर्भात आपल्या राज्य सरकारला पत्र लिहिले कि ७-३-८१ पुर्वी याबाबत आपले म्हणणे मांडा. महाराष्ट्र सरकारने उत्तरच दिले नाही. उलट ६-११-८१ रोजी महाराष्ट्र सरकारने आपला मुळ प्रस्तावच मागे घेतला. त्यामागील एकही कारण आजतागायत महाराष्ट्र सरकारने दिलेले नाही.

१९८९ मद्धे महालेखायुक्तांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींमद्धे सामाविष्ट करा असा सल्ला दिला तोही महाराष्ट्र सरकारने फेटाळुन लावला.

याच वर्षी (१९८९) खासदार सुर्यकांता पाटील यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींत का घेत नाही असा प्रश्न विचारला असता या खात्याचे तत्कालीन मंत्री श्री रामविलास पासवान यांनी धनगर आणि धनगड एकच असुन त्यांचा समावेश पुर्वीच अनुसुचित जमातींमधे केला असल्याचे निवेदन २२ डिसेंबर १९८९ रोजी संसदेत दिले. काय केले महाराष्ट्र सरकारने? काही नाही. याच वर्षी धनगर समाजाने राजीव गांधी महाराष्ट्र दौ-यावर आले असता धनगरांनी निदर्शने केली. राजीव गांधींनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले खरे, पण ते दिल्लीला जाताच विसरले असावेत.

शरद पवारांनी खास गेम केला. २५ मे १९९० रोजी त्यांनी धनगरांना नोम्यडिक ट्राइब्जमद्धे टाकले (भटके विमुक्त), साडेतीन टक्के आरक्षणात बांधले  आणि मुळ न्याय्य मागणीतील सारी हवाच काढुन घेतली. कोणत्या सर्वेक्षणाने, कोणत्या मानववंश शास्त्राने, कोणत्या इतिहासाने धनगरांना भटके विमुक्त ठरवले हा प्रश्नच मुळात आजतागायत उपस्थित केला गेलेला नाही. आता तो विचारावा लागणार आहे. आणि याच सरकारने "कुंबी आणि कुनबी मात्र एकच" असा निर्णय १९९४ साली घेतला. पण धनगड व धनगर एकच, या राज्यात धनगड नांवाची जमातच नाही, हिंदीत र चा उच्चार ड होतो हे लक्षात घेतले नाही. पण कुंबी आणि कुणबी मात्र एकच असा निर्णय घेण्यात मात्र तत्परता दाखवली. जे भाषाशास्त्र कुंबी व कुणबी यांच्याबाबत लावायला हे पुढे सरसावले त्यांना मात्र धनगरांबाबतची भाषाशास्त्रीय समस्या दिसली नाही, व ज्याबाबत वारंवार एवढी स्पष्टीकरणे झाली आहेत तीही ग्राह्य धरायची बुद्धी झाली नाही...ती का? यामागील कारणे वाचक समजु शकतात म्हणुन त्यावर मी भाष्य करत नाही.

२००२ मधे The Scheduled Castes and Scheduled Tribes Orders (Second Amendment) Bill आले. या बिलानुसार समान व्यवसाय पण जमात-जातीनामे वेगळी यांचा समावेश करण्याची तरतुद होती. तसे अनेक जमातींबाबत झालेही. महाराष्ट्र सरकारने मात्र आपला हट्ट सोडला नाही. धनगड व धनगर या वेगळ्या पुर्णतया स्वतंत्र जमाती आहेत अशीच भुमिका रेटली. त्यामुळे Standing Committee on labour and Welfare ने ताशेरा ओढला कि महाराष्ट्र सरकारने सुधारीत अनुसुचित जमातींच्या यादीत धनगरांचा समवेश करावा अशी शिफारसच केली नसल्याने त्यांचा समावेश सुधारीत यादीत झालेला नाही.

असो. याच स्वरुपाच्या घडामोडी पुढेही चालु राहिल्या आहेत. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे असा समज म्हणा कि गैरसमज, आपल्या मंत्र्यांचा व आमदारांचाही आहे. ते खरे नाही. वरील घटनाक्रम पाहिला असता आपल्या सर्वांच्याच लक्षात येईल कि महाराष्ट्र सरकार वेड्याचे सोंग घेत पेडगांवला चालले आहे. जी धनगड अथवा ओरा जमातच महाराष्ट्रात अस्तित्वात नाही ती मात्र अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर आहे. धनगड व धनगर एकच होत असे नि:ष्कर्ष सर्वच आयोगांनी, केंद्र सरकारने काढुनही महाराष्ट्र सरकार आपलाच हट्ट रेटत आले आहे. सरकारचे हे कृत्य असांसदीय, घटनेचा, उच्च्च न्यायालयांचा व केंद्र सरकारचा अवमान करणारे आहे यात शंका नाही.

असे का झाले यावरही विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील राजकारण हे विशिष्ट जातीयांच्या हाती एकवटु लागण्याची सुरुवात राज्याच्या स्थापनेपासुनच झाली आहे. राजकीय गणितांतच मुलात धनगरांना अनुसुचित जमातींमद्धे घेणे त्यांना व सध्या जे अनुसुचित जमातींत आहेत त्यांनाही अडचणीचे ठरणार असल्याने व धनगर समाज मुळात विखुरलेला असल्याने त्यांच्या तोंडाला पाने पुसत पुढे सरकण्याचे अनिवार कौशल्य दाखवले जात आहे. अशाच रितीने अन्यही जाती-जमातींवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अद्न्यानाचा, असंघटीतपणाचा फायदा घेतल्याचेच चित्र आपल्याला दिसेल.

येथे प्रश्न असा आहे कि केंद्रीय सत्तेच्याच निर्देशांना जुमानण्याचा अघटनात्मक अधिकार महाराष्ट्र सरकारला कोणी दिला? केंद्राच्या कोर्टवर चेंडु फेकुन आणि परत तोच मागे घेवुन उबवत बसायचे धोरण कशासाठी आहे? कालेलकर आयोग, मंडल आयोग जे स्पष्ट करतो ते नाकारण्याचा अधिकार यांना कोणी दिला? केंद्रीय सत्तेपेक्षा महाराष्ट्र राज्याची सत्ता मोठी कधीपासुन झाली?

येथे एक उदाहरण देतो. कर्नातकात धनगरांनाच कुरुब म्हणतात. तेथील सरकारने कुरुबांना अनुसुचित जमातीच्या यादीतुन वगळण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांना दुस-याच दिवशी फिरवावा लागला होता. यामागील कारण असे कि केंद्र सरकारने ज्या जमातींना अनुसुचित जमतींत घेतले आहे त्यांना वगळण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. (दै. हिंदु, दि. १५ आगस्ट २०००) कुरुब व धनगर एकच आहेत असे ज्येष्ठ संशोधक डा. रा. चिं. ढेरे यांनी वारंवार आपल्या ग्रंथात (उदा. श्रीविट्ठल: एक महासमन्वय) सिद्ध केलेले आहे. कर्नातक सरकार कुरुबांना आधीपासुनच अनुसुचित जमातेंमद्धे घेते व त्यांना वगळण्याचा निर्णयही मागे घ्यावा लागतो यात सारे काही आले. आणि आमचे राज्य सरकार मात्र केंद्राचा निर्णय अंमलात आणायचाच नाही असा निर्णय केवळ बाहुबळावर/सत्ताबळावर रेटत रहाते याला "हे सरकार शुद्धीवर आहे काय?" असाच प्रश्न विचारावा लागणार आहे.

घटनेने ज्याही समाजाला जेही अधिकार दिले असतील ते त्या-त्या समाजाला मिळणे बंधनकारक आहे. तो टाळणे हा एक अक्षम्य प्रकारचा गुन्हा असुन तो महाराष्ट्र सरकार करत आहे. या सरकारला जाब विचारणे त्यामुळेच क्रमप्राप्त आहे. धनगरांना त्यांचा न्याय्य वाटा मिळायलाच हवा याबाबत कोणत्याही सुबुद्ध नागरिकाच्या मनात शंका असु नये. राज्य सरकार सरळ सरळ धनगरांची फसवणुक करत असून त्यांना विकासाच्या गंगेपासुन दुर ठेवत आहे. आपण त्या गंगेपासुन असेच फसत दुर रहायचे कि आपला न्याय्य हक्क मिळवायचा याचा विचार याच समाज बांधवांना करावा लागणार आहे.

Monday, May 21, 2012

धनगरांचा वाली कोण?






आज सुखा-समाधानाने नांदत असलेल्या सर्वच जागतीक संस्कृत्यांचे व धर्मांचेही निर्माते म्हणजे पशुपालक समाज. भारतात त्यांना आपण धनगर, गवळी असे संबोधतो. ऋग्वेदाचे निर्माते हेही पशुपालकच होते. येशु ख्रिस्ताला प्रेमपुर्वक "मेंढपाळ" असेच म्हटले जाते. हजरत पैगंबरही पशुपालकच होते. अगदी महाभारत जरी पाहिले नंद ते विदर्भराज विराट असे अनेक राजे आणि खुद्द कृष्ण हे गवळीच होते. सातवाहन हे औंड्र वंशीय धनगरच. महाराष्ट्रातील गड-कोट, लेणी यांची संकल्पना व निर्मितीची सुरुवात केली ती सातवाहनांनीच. फार कशाला अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विट्ठल व खंडोबा हेही धनगरांचेच दैवतप्रतिष्ठा प्राप्त करुन बसलेले सम्राटच. होळकरांनी शुन्यातुन विश्व उभारत जी एक राष्ट्रीय भावना जोपासली तीही अद्वितीयच. हा समाज देशभर पसरलेला. कोठे त्यांना धनगर म्हणतात तर "र" चा "ड" उच्चार स्थानिक भाषाभेदाने होतो म्हणुन कोठे धनगड, कोठे गडरिया तर कोठे फक्त पाल....नांव काहीही असो...व्यवसाय एकच व तो म्हनजे शेळी-मेंढीपालन व तदनुषंगाने येणारे व्यवसाय...म्हणजे घोंगड्या बनवणे वा खाटिकपणा करने. या व्यवसायवाटणीमुळे या समाजात जवळपास २२ पोटजाती बनलेल्या आहेत. ते समजा हिंदु समाज रचनेत स्वाभाविक असले तरी वर्तमानात त्याचे संदर्भ हरवले असल्याने खरे तर या पोटजातींत काहीएक अर्थ उरलेला नाही, पण महाराष्ट्रात एकुण लोकसंख्येच्या जवळपास १५-१६% असणारा हा समाज आपापसातीलच विखुरलेपनामुळे अवनतीला जावुन पोहोचला आहे.

या अवनती नुसत्या शैक्षणिक नाहीत. आर्थिक नाहीत. नुसत्या राजकीय नाहीत. खरी समस्या आहे ती ही कि हा समाज आत्मभानच हरपुन बसला आहे. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक दारिद्र्यावर मात करता येते वा आहे ते जीवन सुखनैव कंठता येते. पण आत्मभानाचेच दारिद्र्य आलेला समाज कशावरही आणि कधीही मातही करु शकत नाही आणि सुखनैव, आहे त्या स्थितीतही, जगुही शकत नाही.

धनगर समाजाची नेमकी हीच अवस्था झाली आहे.



का व्हावे असे?



१. राजकीय विखुरलेपन: धनगर समाजाचे स्वत:चे असे राजकीय तत्वद्न्यान उरलेले नाही. कोणी आज शिवसेनेत असतो तर उद्या बीजेपीत. कोणी राष्ट्रवादीला आज गळामीठी घालतो तर तोच उद्या तो कोणत्याही पक्षात असु शकतो. कोणी आरेसेस मद्धे तर कोणी संभाजी ब्रिगेडमद्धे आपले कडवेपण अजमावतो. यामुळेच महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला खुद्द सर्व धनगरांचा पाठिंबा नाही. पोटजातींमुळे खुद्द मल्हाररावांचा जयंती कार्यक्रम सपशेल फसतो...का तर मल्हारराव वेगळ्या पोटजातीचे, कार्यक्रमाचे आयोजक त्याच पोटजातीचे...मग आम्हाला काय घेणे? असे असता मग यशवंतराव, विठोजीराव, भीमाबाईंची गत काय?

या प्रत्येक पोटजातींच्या संघटना आहेत. यांचे अलौकिक कार्य म्हनजे वधुवर मेळावे. जणू लग्ने जुळवणे एवढेच महत्कार्य आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रबोधन करणे हेही एक कार्य असते हेही भान या संघटनांना उरलेले नाही.

या राजकीय व सामाजिक विखुरलेपनामुळे यांच्या हाती काडीएवढीही सत्ता नाही. सामाजिक प्रभाव नाही. किंबहुना यांनी विखुरलेले राहणे सत्ताधारी गटांनाही गरजेचे आहे त्यामुळे त्यांना काय घेणे आहे? स्वत:लाच आपण कोनत्या खड्ड्यात चाललो आहोत हेच समजत नाही तर खंडोबारायाही यांना वाचवू शकत नाही.

२. आधुनिकतेची कास नाही: मला हे खेदाने नमुद करावे वाटते कि अनेक उपटसुंभ नेते या समाजात आहेत. सरकारकडे मागण्या करण्यात त्यांना आनंद वाटतो...पण एकही मागणी अभ्यासपुर्ण नसते...केली तर पाठपुरावा नसतो...जे करतात त्यांच्याही पाठीशी हे उभे रहात नाहीत. औरंगाबादचे देठे साहेब उतारवयातही शेकडो कागदपत्रे जमा करत महाराष्ट्रातील धनगरांना शेड्युल्ड ट्राइब्जमद्धे घ्यावे कारण मुळात तो केंद्र सरकारचा निर्णय आहे, असे सिद्ध करत एकाकी लढा देत आहेत. जेही धनगर आमदार सध्या आहेत त्यांनी या बाबत कसलाही प्रयत्न केलेला नाही. किंबहुना त्यांना या प्रश्नाचे महत्वच समजत नाही. धनगड हा शब्द धनगर असाच वाचावा असा केंद्र सरकारचाच अध्यादेश सांगतो...पण महाराष्ट्र सरकार तो मानायला तयार नाही. आपल्याच समाजाच्या घटनात्मक अधिकारांसाठी झगडावे ही बुद्धी यांच्या विद्यमान आमदारांना वा होतकरु वा विकावु नेत्यांना नाही. जर देशभर धनगर समाज हा एस. टी. मद्धेच आहे तर महाराष्ट्रात का नाही? यामागे विद्यमान सत्ताकेंद्रांची अडचण आहे, म्हणुन ते तांत्रिक मुद्द्यांवर या विषयाला टाळतात...टाळतात म्हनण्यापेक्षा आपली मागणी कशी सातत्याने पुढे न्यायची हेच या समाजाला माहित नसल्याने मग त्यांनाही काहीएक हालचाल करण्याची गरज पडत नाही.

३. धनगर समाजातील हजारो कुटुंबे अत्यंत हलाखीचे भटके जीवन जगत आहेत. आनंद कोकरेंसारखे अत्यंत उमदे, विचारी तरुणही जेंव्हा मी आपली मेंढरे या शेतातुन त्या शेतात घेऊन जात असतांना पहातो...दिडशे मेंढरे शेतात बसवली तर फक्त १०० रुपये दिवसाला मिळवतांना पहातो...काही गांवकरी त्यांच्याशी किती दुष्टतेने वागतात हे ऐकतो तेंव्हा मी अस्वस्थ होतो. लांडगे, तरस मेंढरांची शिकार करायला येतात तेंव्हा याच बहाद्दराने गोफणीच्या मा-याने त्यांचा कसा सामना केला हे ऐकतो तेंव्हा या बहाद्दराचे कवतुकच वाटते.

पण...जीवावरची संकटे झेलत, उन-वा-यात...धो-धो पावसात उघड्यावरचे जीवन जगतांना पाहुन मला यातना होतात.

आजकाल ब-याच समाजांच्या दयनीय स्थितींबद्दल लिहिले जाते, बोलले जाते...पण या समाजाच्या हलाखीचे विवेचन कोणी करतांना सापडनार नाही. आजचे धनगर श्रीमंतच आहेत असा भ्रम अनेकांत असल्याचे मी पाहतो, ऐकतो. हा भ्रम आहे, आजचे वास्तव नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

अनेक कायदे, औद्योगिक वसाहती स्थापत सरकारने चरावु कुरणेच नष्ट केलीत...वनखात्याने आपल्या जाचक नियमांनी मेंढरांना चरायला जागाच ठेवली नाही. रासायनिक खतांना चटावलेले शेतकरी शेतात मेंढरे बसवत सेंद्रीय खत मिळवण्यास फारसे उत्सुक नाहीत...हा व्यवसाय संकटात आला आहे. जगणे कठीण झाले आहे. भटकायचे मेंढरे घेवून, पण जायचे कोठे?

पण...

याच धनगरांना स्थिर मेंढीपालन कसे करावे, व्यवस्थापन कसे करावे हे कोण शिकवणार?

नाबार्डच्या अनेक योजना या व्यवसायासाठी आहेत...पण त्यांचा फायदा घेणारे व बुडवणारे लोक अन्यच आहेत...पण अर्धा टक्का धनगरांनीही या योजनांचा फायदा घेतला नाही...कारण अशा योजना आहेत हेच त्यांना माहित नाही. आणि त्या त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवतही नाही.

शेळी-मेंढी विकास महामंडळ अशा तत्सम नांवाचे एक कागदोपत्री महामंडळ आहे. हे नेमके काय करते? प्रश्न निरर्थक आहे कारण ते काहीच करत नाही. एखाद्या धनगर नेत्याची वर्णी अध्यक्षपदी लागली आणि अहिल्यादेवी वा मल्हाररावांचे नांव असले कि संपले...अशी वृती कसे यश देईल? या महामंडळाने व्यापक कार्य करावे, पशुपालन व्यवसायात आधुनिकता आणलीच पाहिजे असे प्रबोधन करत प्रशिक्षण देणे अभिप्रेत असतांनाही, मुळात निधीच नसल्याने काहीएक कार्य होत नाही. तसा पुरेसा निधी मिळावा यासाठे संघर्ष करत व खरोखर आहे त्या व्यवसायात बदल घडवुन अर्थक्रांती घडवुन आणावी अशी इच्छा वा दृष्टी जर या नेतृत्वातच नसेल तर अन्य समाजीय नेते काय म्हणुन यांच्या पाठीशी उभे राहतील?

जर असेच घडत राहिले तर हा मेंढपाळी पुरातन उद्योग अन्य बलाढ्य भांडवलदारांच्या हाती जाणार यात शंका नाही. खरे तर जगाच्या अंतापर्यंत हा उद्योग टिकणारच आहे, कारण त्याची गरज आहे. फक्त हा उद्योग धनगरांच्या हातुन निसटला असेल, कारण परंपरागत पद्धतीने ते कधीही या व्यवसायात टिकु शकणार नाहीत. अनेक कंपन्या सध्या आधुनिक पद्धतीने या व्यवसायात उतरु लागल्या आहेत. यात बोगस कंपन्यांचीच संख्या जास्त आहे. पण उद्या यात अवाढव्य भांडवलदार उतरणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रिलायंससारख्या कंपन्या जर भाजी-पाला विकण्याच्या धंद्यात पडु शकतात तर ते मांसाची गरज भागवण्यासाठी पशुपालनात उतरणार नाहीत हे म्हनणे तद्दन वेडेपणाचे लक्षण आहे.

थोडक्यात धनगर समाजाला अर्थक्रांती घडवायची असेल तर सर्वप्रथम पशुपालन परंपरागत पद्धतीने न करता आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत स्थिर पशुपालन करायला लागणार आहे. बाजारपेठेचे गुलाम न होता मांस व लोकरीची बाजारपेठच ताब्यात घ्यावी लागणार आहे. यात अवघड काहीच नाही. फारशा भांड्वलाचीही गरज नाही. लागणार आहे ती फक्त मानसीक तयारी.



मल्हारराव, यशवंतरावांनी शुन्यातुन साम्राज्ये उभी केली हा ताजा इतिहास आहे. ते यशस्वी झाले कारण धोके पत्करण्याचा, आधुनिकतेची कास धरण्याचा स्वभाव व दुरदृष्टी...

आज ती कोठे गेली आहे? त्यांचे नांव घेत जयंत्या-पुण्यतिथ्या साज-या तर करायच्या पण अनुकरण काहीएक करायचे नाही, त्यांच्यापासुन काही शिकायचे नाही, हीच वृत्ती राहिली तर या समाजाचे सर्वच आघाड्यांवर "पानिपत" होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.



जो समाज आपल्याच कोषात जगतो, गतकालीन वैभवातच फक्त रमतो, त्या समाजाला वर्तमानही नसतो आणि भविष्यही...हे माझ्या धनगर बांधवांनी समजावुन घ्यावे ही कळकळीची विनंती आहे.

उठा...जागे व्हा...आधुनिकतेच्या काळात पाय ठेवा...

भविष्य तुमचेच असेल!

फक्त तुम्हालाच तुमचे वाली व्हावे लागेल...



Wednesday, May 16, 2012

सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग: एक समीक्षा

माझे मित्र डा. मधुसुदन चेरेकर यांनी मला स्नेहपुर्वक सावरकरांवर शेषराव मोरे यांनी लिहिलेले दोन ग्रंथ (संक्षिप्त आवृत्या) आवर्जुन पाठवल्या व मी त्यावर लिहावे असे सुचवले. मी या माझ्या निकततम मित्राचा आभारी आहे. मी अत्यंत पुर्वग्रहरहित दृष्टीने त्यांनी पाठवलेले दोन्ही ग्रंथ आवर्जुन वाचले व आता त्यापैकी "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" या ग्रंथावर, व तेही दुस-यांदा वाचल्यानंतर लिहायला घेतो आहे.

पहिली बाब मी येथे स्पष्ट करु इच्छितो ती ही कि खुद्द सावरकरवाद्यांनाही सावरकरंची चिकित्सा कशी करायची हेच मुळात समजलेले दिसत नाही. सावरकरांच्या जीवनाचे खरे तर चार भाग पडतात. पहिला म्हणजे अंदमानपुर्व सावरकर, दुसरा म्हनजे अंदमानातील सावरकर, तिसरा म्हनजे अंदमानोत्तर सावरकर आणि चवथा म्हणजे गांधीहत्त्याकालोत्तर सावरकर. हे चारही सावरकर एक नसून एक व्यामिश्र संक्रमणांची एक मालिका आहे. या मालिकेने खुद्द सावरकरांचे जीवन ढवळुन निघाले असुन विरोधाभासी अनेक सावरकर समोर येतात व त्यांच्याकडे सलगपणे पाहणा-या शेषराव मोरेंसारख्या विद्वानांचीही गफलत होवून जाते. तशी ती या "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" या ग्रंथातही ठळकपणे दिसुन येते. आपल्याला मृत्योत्तर मोरेंसारखा एवढा चांगला वकील मिळेल याची सावरकरांनीही कल्पना केली नसावी.


या ग्रंथातील पहिल्याच प्रकरणातील (समाजाचा पाया विद्न्यान; धर्मशास्त्र नव्हे) डा. आंबेडकरांची जातीउच्चाटन करण्यासाठी धर्मशास्त्रेच कशी जबाबदार आहेत, सबब ती नष्तच कशी केली पाहिजेत ही मते नोंदवत मोरे असा युक्तिवाद करतात कि सावरकरही वेगळ्या भाषेत, म्हणजे "स्मृति-स्मृती-पुराणोक्त" प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजेत या शब्दांत सावरकर आंबेडकरांशी सहमती दर्शवतात. पोथीनिष्ठेऐअवजी विद्नानवादी धर्मच सावरकरांना अभिप्रेत आहे असेही अनेक युक्तिवाद मोरे करतात. पुढे मोरे असेही म्हनतात कि आंबेदकरांना अभिप्रेत असणारा "नवा धर्म" व सावरकरांना अभिप्रेत असणारा "विद्न्यानधर्म" याचा अर्थ प्रस्थापित वैदिक वा हिंदु धर्माचे उच्चाटन असाच आहे.....या हिंदु धर्माचा रुढ हिंदुधर्माशी नावाशिवाय कोणताच संबंध नाही.(पृष्ठ-९-१०-११)


जागतीक इतिहासात विद्न्यानाधारिक एकच धर्म निर्मण झाला होता व त्याचे नांव पायथागोरियन धर्म असे होते. गणित हेच मुलभुत धर्मतत्व आहे असा या धर्माचा दावा होता. अर्थात हा धर्म जन्मासोबतच संपला हे वेगळे. मुळात विद्न्यानाधारित "हिंदु" धर्म हेच एक भाकड मित्थक आहे. कोणताही धर्म, अगदी बौद्ध वा जैनही, विद्न्यानाधारित असु शकत नाहीत व नव्हते हे सावरकरांना वा त्यांच्या ज्येष्ठ वकीलांना माहित नसावे व सावरकरांना आंबेडकरांच्या पंक्तीत आणुन बसवण्याचा प्रयत्न करायचा एवढाच या प्रकरणाचा मतितार्थ आहे. असो. याच प्रकरणात मोरे अजुन एक धाडसी विधान करतात व ते हे कि, "सावरकर हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्वाचा संबंध समाजसुधारणेशी येत नाही. त्यांचे हिंदुत्व म्हनजे "हिंदुधर्म" नव्हे. हिंदुधर्माला जेवढी मान्य आहे तेवढीच समाजसुधारणा स्वीकारायची..." (पृष्ठ १४) खरे तर हे विधान स्वयंस्पष्ट आहे. सावरकरांना धर्ममर्यादेत बसेल एवढीच समाजसुधारणा अभिप्रेत होती हे याच विधानात स्पष्ट दिसत असतांना हेच मोरे पुढे म्हणतात कि "त्यांच्या समाजकारणाचा पाया बुद्धी वा उपयुक्ततावाद हा होता...हिंदुत्ववाद हा नव्हता." येथे एकतर मोरे यांची सावरकर समजण्यातील गफलत आहे किंवा सावरकरांचेच विचार परस्परविरुद्ध आहेत. माझ्या मते दुसरी शक्यता अधिक आहे. म्हणजे हिंदु धर्माच्याच चौकटीतील सुधारणा सावरकरांना हव्यात आणि असे म्हणतांना हिंदु धर्माची चौकट न मोडता बुद्धीवादी-उपयुक्ततावादी समाजकारण त्यांना अभिप्रेत होते हे मोरेंचे युक्तिवाद तद्दन भंपक आहेत हे उघड आहे. कारण "हिंदुत्व" तर हवे पण समाजकारणासाठी तेही नको..., हिंदु हे लोकांचे नांव आहे व हिंदु धर्माचा अर्थ "हिंदु लोकांनी स्थापलेले धर्म" असा घेतला पाहिजे, असे सावरकरांचे मत मोरे जेंव्हा आपल्या शैलीत सांगतात तेंव्हा दोन अर्थ होतात, पहिला म्हणजे मोरेंना सावरकर तरी समजलेले नाहीत किंवा सावरकर हे अत्यंत भोंगळ विचारांचे व धर्मेतिहास काडीएवढाही माहित नसलेले गृहस्थ होते. हिंदु लोकांनी स्थापलेला म्हनजेच ज्याला सावरकर "हिंदुभु" म्हणतात त्या भुमीत स्थापित धर्म...जैन, बौद्ध, शीख इ. याऐवजीचे हिंदु भुमीत स्थापन न झालेले धर्म हे परके व एवतेव त्यागणीय आहेत असाच मतितार्थ सावरकरांच्या म्हनण्यावरुन निघतो. याचाच दुसरा अर्थ असा कि त्यांना अशा "हिंदु" लोकांचे एकत्व या अहिंदु धर्मांशीच्या लढ्यासाठी आहे. त्यात समाजकारण नसुन निखळ धर्मकारण आहे. त्यामुळे सावरकर हे विद्न्याननिष्ठ धर्माचे कामना करत होते हा मोरेंचा नि:ष्कर्ष सरळ बाद होतो.


सावरकरांचे चातुर्वर्ण्यौच्चाटक व जात्युच्छेदक विचार हे कोनत्या कोणातुन मोरेंना उदार वाटतात हे त्यांनाच माहिती. त्यासाठी ते जे सावरकरांचे सात युक्तिवाद मांडतात. या युक्तिवादात (पृष्ठ १६-१९) बुद्धीवाद नसुन सरळ सरळ चातुर्वर्ण्याचीच भुमिका घेत, जुन्या काळातही त्यात दोष होते हे मान्य करत, पटवून देत, किमान रोटीबंदी व स्पर्शबंदी तरी आपण तोडु शकतो असा पुरोगामी आविर्भाव दिसतो. मोरे हे सांगायचे विसरतात कि हे सावरकरांनी कोणाला उद्देशुन आणि कधी लिहिले. सावरकरांचा उदात्त हेतु क्षणभर गृहित धरला तरी एक बाब येथे लक्षात घ्यावी लागते ती ही कि सावरकरांनी स्वत: कधीही यातील एकही बंदी मोडलेली नाही. (अस्पृष्यांसोबतचे सहभोजनादि कार्यक्रम स्तुत्य असले तरी ते म्हणजे धार्मिक जोखडे सर्वस्वी झुगारणारे कार्य नवे.) महात्मा फुलेंबाबत "त्यांनी अस्पृय्ष्यांसाठी स्वतंत्र शाळा मागितल्या पण सावरकरांनी त्यांच्यानंतर २५ वर्षांत अस्पृष्य व सवर्ण एकाच शाळेत बसवण्याचे यशस्वी आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यात घडवून आणले..." व्यक्तिपुजक चरित्रकार नेहमीच गोंधळ घालत असतात. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा माहितल्यानंतर पन्नास वर्षानंतरचे आहेत, फुलेंचा म्रुत्यु १८९० ला झाल्यानंतरची वर्ष मोजुन मोरे काय साधु इच्छितात? सावरकरांनी चातुर्वर्ण्यावर प्रहार केले हे सांगतांना ते विसरतात कि त्यांच्याच कालात आंबेदकर त्याहीपेक्षा त्वेषाने आणि पुराव्यांसह चातुर्वर्ण्यावर तुटुन पडलेले होते व आंबेडकरांना फुल्यांची पुर्वसुरी होतीच. परंतु तसे सावरकरांच्या धर्मविषयक विचारांशी साधर्म्य असनारे गांधीजी मात्र मोरेंच्या चर्चेत येत नाहीत. सावरकरांनी गांधीजींशी कसलाही वैचारिक वाद वा संवाद साधला असल्याची ते माहिती देत नाहीत. आंबेदकरांना मात्र वेठीला धरत ते सावरकर व आंबेदकर यांच्या विचारांतील तादात्म्य सांगण्याचा मात्र प्रयत्न करतात...हे अनाकलनीय अशासाठी आहे, कि हे दोन विचारप्रवाहच मुलात परस्परविरुद्ध आहेत. आता हे मोरेंच्या लक्षात आले नसेल तर त्यांची वकीली फुकट गेली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागते.


सावरकरांचे विद्न्यान हे मुलात विद्न्यान नसुन वैद्न्यानिक अंधश्रद्धा याच सदरात मोडतात. ते कसे हे आपण पाहु. अनुवंशशास्त्र तर त्यांनी पार मोडीत काढलेले दिसते. "आज हिंदुंमद्धे ज्या विविध जाती आहेत, त्यामद्धे एकच रक्त खेळत आहे." येथेवर समजा ते खरे बोलत आहेत, (हे एकच रक्त फक्त हिंदुच नव्हे तर सर्वच मानवी प्रजातींत आहे असे विधान असते तर ते थोडेफार वैद्न्यानिक झाले असते.) पण लगेचच पुढच्या वाक्यात ते म्हणतात..."जेव्हा चार वर्ण निर्माण झाले अगदी त्याच दिवसापासुन एकच रक्त सर्व हिंदुंत संकरित होत आले आहे." आता यांना "रक्तसंकर" नांवाची कोनती वैद्न्यानिक उपाधी निर्माण करायची आहे? काही वैद्न्यानिक शब्द वापरले म्हणुन ते विद्न्यान होत नसते याचे भान सावरकरवादी कसे सोडतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.


सावरकरांच्या स्त्रीविषयक मतांचा मी येथे परामर्ष घेत बसत नाही. कारण एकीकडे स्त्रीस्वातंत्र्य हवे म्हनत चुल आणि मुल हीसुद्धा राष्ट्रसेवाच आहे असे ते समजावुन सांगतात. म्हणजे तु पळ, पळु शकतोस, पण थांबलास तर तेही उत्तमच होय असे भोंगळ विधान करावे तसे त्यांचे स्त्रीस्वातंत्र्याबाबतचे विचार आहेत.


या पुस्तकात मोरेंनी सावरकरांचा जात्युच्छेदन, पतीतपावन मंदिर, अस्पृश्यांसह सहभोजनाच्या कार्यक्रमांचा आवर्जुन उल्लेख केला आहे. त्याबाबत मर्यादित परिप्रेक्षात का होईना, सावरकरांचे वर्तन अभिनंदनीय असेच आहे असे तत्कालीन कालसापेक्ष चौकटीत मान्य करावेच लागेल. परंतु त्यामुळे त्यांना युगप्रवर्तक समाजक्रांतीकारी अशी बिरुदावली बहाल करणे हे म्हणजे हास्यास्पद असेच आहे, कारण तोवर देशभर असंख्य गांधीअनुयायी ते समाजसुधारक संत अशी व याहुनही मोठी महत्कार्ये करतच होती. फुलेंनी त्याची सुरुवात ५०-६० वर्ष आधीच केलेली होती. परंतु आस्चर्याची बाब म्हनजे मोरे फुलेंचा उल्लेख अत्यंत अपवादात्मक करतात.


या पुस्तकातील मला जाणवलेले महत्वाचे मुद्दे म्हणजे, सावरकरांना हिंदु धर्मेतिहास मुळीच माहित नव्हता. किंबहुना हिंदु शब्दाची व्याख्या अत्यंत भोंगळ स्वरुपात त्यांनी केली जी त्यांच्याही अनुयायांनी ती मान्य केली नाही. वर्णव्यवस्था वा जातीव्यवस्थेच्या उगमाबाबत त्यांचे स्वत:चे असे कोनतेही ठाम मत वा संशोधन नव्हते, जसे बाबासाहेबांचे होते. "आपले सामाजिक बीज, रक्त, जातिजीवन नि परंपरा शुद्ध रहावी, संकराने विकृत होऊ नये यासाठी त्या त्या कालच्या हिंदुधर्मियांनी हिंदुराष्ट्राच्या हिताच्याच बुद्धीने ही जन्मजात जातिभेदाची प्रथा निर्मिली किंवा स्वयंप्रेरनेने निर्मु दिली..." (पृष्ठ ९५) हे विधान करणारे सावरकर विद्न्याननिष्ठ होते असे म्हननारे बहुदा स्वर्गीय नंदनवनात विहार करत असावेत. मुळात यांना हिंदु धर्म म्हणजे नेमके काय हे माहित नाही. हिंदु राष्ट्र नांचाची संकल्पना या देशात कधीही अस्तित्वात नव्हती हेही माहित नाही...तरीही ते इतिहासकार, विद्न्याननिष्ठ कसे ठरतात? खरे हेच आहे कि सावरकर हे चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थक होते, व त्याचे अंश त्यांच्या अनेक विधानांत दिसतात. उदा. पृष्ठ ९६ वरील "पाप सर्वांचे: उत्तरदायित्व सर्वांचे" या मथळ्याखालील विवेचन पहावे. यात चातुर्वर्ण्य ही ब्राह्मण वा क्षत्रियांचेच पाप नसुन सर्व वर्णीयांचेच आहे म्हणुन सर्वांनीच त्याचे उत्तरदायित्व घ्यायला हवे असा आशय आला आहे.


या पुस्तकातील असंख्य विधानांचा परामर्श घेता येइल परंतु मी येथे या पुस्तकाविषयीचे माझे आकलन थोडक्यात मांडु इच्छितो.


१. सावरकर विद्न्यानवादी नसुन "वृथा-विद्न्यानवादी" होते. त्यांच्या वैद्न्यानिक म्हणुन मानल्या जाना-या एकाही विधानात विद्न्यान नाही.

२. हिंदुत्व या शब्दाबद्दल त्यांनी कितीही शब्दच्छल केला असला तरी त्यांना एतद्देशीय निर्मित धर्मांसहितचे हिंदुत्व हवे होते, व तसे हवे असा आग्रह आजही आर एस एस सारख्या हिंदुत्ववादी संघटना धरत असतात. म्हनजे जैन, बौद्ध शीख म्हणजे हिंदुच होत हा हिंदुत्ववाद्यांचा दावा मुलात या कोणत्याही धर्माला कधीही मान्य नव्हता व आजही नाही. थोडक्यात सावरकरांना अभिप्रेत हिंदुत्व हेच मुळात स्वार्थनिहाय पायावर उभे होते, शाब्दिक अभिव्यक्ती कशी का असेना.

३. सावरकर हे कधीही सामाजिक क्रांतीकारक नव्हते. तसा आरोप त्यांच्यावर करने हाच मुळात त्यांच्यावरील अन्याय आहे. सावरकर हे मुलत: सशस्त्र क्रांती मार्ग अवलंबनारे राजकीय व्यक्ती होते. अंदमानोत्तर काळात त्यांच्यावर राजकीय बंधने आली म्हणुन त्यांनी काही सामाजिक कार्ये (चळवळी नव्हेत) केली हे मान्य करुनही मुळात त्यांचा पींड हा सामाजिक कार्याचा वा विचारवंताचा नव्हता असे म्हनता येते.

४. सावरकरांनी काही सामाजिक कार्य केले म्हणुन ते समाजक्रांतीकारक होते, हे मोरेंचे विधान अत्यंत धाडसी व कोणत्याही सम्यक बुद्धीच्या विचारवंताला साजेसे नाही. असली कोणतीही "समाजक्रांती" म्हणता येइल, जी अन्यांनी त्यांच्या पुर्वी केलीच नव्हती, अशी बाब मुळात सावरकरांच्या बाबतीत लागु पडत नाही. क्रांती ही उपजत असते, अनुकरणात्मक, मर्यादित व स्वसापेक्ष नसते. कारण सावरकरांच्या मर्यादा यातच त्यांच्या वैचारिक अपयशाचे गुढ लपलेले आहे, परंतु प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाने अभिनिवेशाच्या आहारी जात सावरकरांच्या कथित सामाजिक क्रांतीच्या भौगोलिक व कालीय चौकटी तपासुन पहाण्याचे कसब दाखवलेले नाही, हा त्यांच्या पुस्तकातील मोठाच दोष होय.

५. मुळात "सावरकर वाद" अस्तित्वात कधी होता काय आणि असल्यास त्याची नेमकी रुपरेखा काय याबाबत आजतागायत साधार विवेचन कोणी विद्वानाने केलेले नाही. खरे तर तसे कोणीतरी करायला हवे.

६. विशिष्ट भौगोलिक व जातीय मर्यादेपार सावरकर का जावु शकले नाहीत, यावरही मोरेंनी कसलीही चिकित्सा केलेली दिसत नाही.

७. सावरकरवाद समजा असला तरी त्याची तर्कशुद्ध व निर्भीड मांडनी करण्यात मोरेंना अपयश आलेले आहे. कोणत्याही कालातील संदर्भहीण विधाने, वक्तव्ये देत कोणताही वाद मांडता येत नसतो याचे मोरेंचे भान हरपले आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे सावरकरांच्या जीवनाचे चार कालखंड व प्रत्येक कालखंडातील त्यांची त्याच विशिष्ट विषयांसंदर्भातील विचार क्रमाने आले असते तर कदाचित सावरकर समजावुन घ्यायला मदत झाली असती. पण तसे न करता काळाच्या संदर्भचौकटी उधळत मोरेंनी आपले व सावरकरांचे विचार लादण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा प्रस्तुत ग्रंथ होय.


मला हा ग्रंथ प्रेमपुर्वक चेरेकर सरांनी पाठवला. मला माहित आहे कि त्यांना माझे वरील आकलन आवडणार नाही. परंतु मी एवढेच सांगेल कि मी कसलाही पुर्वग्रह न ठेवता वरील लेखन केले आहे.






Saturday, May 12, 2012

इतिहासाचा मर्मग्राही अभ्यासक...

"पानिपत असे घडले..." हा पानिपत युद्धाचा सर्वांगीण वेध घेणारा ग्रंथ १७ मे रोजी ठाणे येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने आज दै. नवशक्तीच्या "ऐसी अक्षरे" या रविवारीय पुरवणीत या ग्रंथाचे लेखक श्री. संजय क्षीरसागर यांची रुपाली पेठकर जोशी यांनी घेतलेली ही मुलाखत...या तरुण इतिहास संशोधकास व त्याच्या ग्रंथास मन:पुर्वक शुभेच्छा!

=========================================

पानिपतच्या युद्धात जेवढं लढणं कठीण होतं, तेवढंच आज या विषयावर लिहणंही कठीण आहे. कारण या इतिहासावरचे पूर्वसुरींचे गारूड आणि त्याला जोडलेली मराठी मनाची अस्मिता. पण या ग्रंथात लेखकानं अत्यंत तारतम्यानं, शेकडो संदर्भ देत, पानिपत युद्धापर्यंतचा आणि नंतरचा प्रवास अत्यंत तटस्थतेनं नोंदवत ज्याचं माप त्याच्या पदरी घातलं आहे. अशा या तरुण इतिहास लेखकाशी नवशक्तिच्या प्रतिनिधी रुपाली पेठकर यांनी साधलेला हा संवाद…



इतिहास हा माझ्या आवडीचा विषय असे म्हणणारा विद्यार्थी विरळाच. त्यातच अगदी शालेय जीवनात पानिपतच्या इतिहासाचा ध्यास घेतलेला विद्यार्थी म्हणजे शिक्षकांसाठीदेखील डोकेदुखी ठरावा. पण संजयला भेटून त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचं पानिपत असे घडले.. हे पुस्तक वाचलं की, ही एक नव्या इतिहासकाराची नांदी आहे असं वाटतं.



खरं तर इतिहासकार म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते भिंग लावून सतत कुठल्यातरी जुनाट पुस्तकातून पुरावे शोधत असलेली व्यक्तिमत्व. त्यातच जाड भिंगांचा चष्मा, वाढलेली दाढी, पोक्त वय आणि मीच काय तो याचा अभ्यासक अशी शेखी मिरवणारी व्यक्ती समोर येते. पण संजयकडे पाहिले की, 29 वर्षांचा हा उमदा तरूण असा इतिहासात कसा बरे शिरला याबाबत कतुहल वाटतं. अर्थात त्याच्याशी गप्पा मारल्या की, आपणही या इतिहासात कसे शिरतो हे कळतच नाही. खरं तर ऍट्रोपीसारख्या व्याधीमुळे व्हिल चेअरवर बसून जावे लागूनही या दुर्धर आजाराला न जुमानता पानिपतच्या इतिहास लेखनाचे शिवधनुष्य पेललेल्या संजयचं निश्चितच कौतुक करावंसं वाटतं.



न्यू इंग्लिशमध्ये शिक्षण झालेल्या संजयला लहानपणापासून चांदोबासारखे बालसाहित्य वाचायला आवडायचे तर अभ्यासातही इतिहास आवडीचा होता. परंतु इतिहासाची आवड नेमकी कधी निर्माण झाली हे सांगता येत नाही. किंबहुना पहिल्यांदा इतिहासाचे कोणते पुस्तक किंवा प्रकरण वाचले असे सांगणे म्हणजे, मी पहिल्यांदा काय जेवायला शिकलो, असे विचारण्यासारखे आहे.. असे त्याला वाटते. इतिहासाखेरीज अन्य अभ्यासात मी हुशार नक्कीच नव्हतो असेही तो मोकळ्या मनाने सांगतो.



इतिहास आवडायला लागतो तो ऐतिहासिक स्थळे पाहिल्यानंतर. पण संजयने मात्र फारशी ऐसिहासिक स्थळे बघितली नाही असे तो सांगतो. परंतु इतिहासाबाबतची त्याची जिज्ञासा आणि ज्ञान मात्र निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.



सातवीला असताच संजयला पानिपतच्या धडय़ाने वेड लावले होते. लहान वयातच त्याने विश्वास पाटील यांच्या कादंबरीसह पानिपतावरील अनेक पुस्तके वाचून काढली. यामुळेच पुढेही इतिहासत जे काही वाचनात येईल त्याची एका वहीत टिपणे करून ठेवण्याची सवय संजयला लागली. तसेच वाचनात येणारी पुस्तके, पत्रांतील उतारे, खलिते सगळेच त्याने जमा करण्यास सुरुवात केली. दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास हा विषय घेऊन त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मग काय `अभ्यासात प्राप्तते दृष्टी’ या उक्तीनुसार इतिहासात मुरत जाणार्या संजयची स्वतःचा दृष्टीकोन आणि मते तयार झाली. आता आपली मते कुठेतरी मांडावीशी वाटणे स्वाभाविक असते. संजयलाही तसे वाटले आणि त्याने 2009 मध्ये `पेशवेकालीन इतिहास’ या ब्लॉगच्या माध्यमातून पानिपतबाबतची आपली मते मांडण्यास सुरुवात केली. शेजवलकरांच्या मतांना काहीशी छेद देणारी ही मतं होती. त्यामुळे स्वतःची ओळख त्याने टाळली आणि केवळ निष्पक्षपाती चर्चा घडावी हाच उद्देश ठेवला. अपेक्षेप्रमाणे या ब्लॉगला प्रतिसादही प्रचंड मिळाला. म्हणता म्हणता एकूण 17 प्रकरणे संजयने ब्लॉगवर लिहली. दरम्यान ब्लॉगचे वाचक आणि `पुष्प प्रकाश’नचे संजय सोनवणी यांना हा ब्लॉग आवडला. त्यांनी संजयची प्रत्यक्षात भेट घेतली आणि `पुन्हा पानिपत’ घडणार हे निश्चित झालं.



लिखाणाचा कोणताही अनुभव नसलेला आणि भविष्यात असं काही विचारही न केलेल्या संजय क्षीरसागरला ही पुस्तक लिहण्याची कल्पना फारच अवास्तव वाटत होती. पण सोनवणींनी त्याचा पिच्छा पुरवला आणि अर्थात पुन्हा पानिपत घडलेच. यासाठी शाळेतील शिक्षकांपासून ते ठाणे महाविद्यालयातील ग्रंथपाल, ठाण्यातील प्राच्य विद्या अभ्यासालय ते पुण्यातील विविध संस्था, भाऊ आणि बहीण यांच्या मदतीने संजयने प्रचंड संदर्भ ग्रंथालय स्वतःकडे जमवलं आहे.



हे भलते अवघड असते



पुस्तक लिहणं हे तसं सोपं नाही. त्यात त्र्यं. शं. शेजवलकर, ना. वि बापट, चि. विं, वैद्य अशा प्रस्थापितांनी लिहलेल्याच पुस्तकाबाबत नवीन ‘ते ‘ांडणे, संदर्भांचे नवीन अर्थ लावून त्यांची सांगड घालून इतिहास नव्याने उलगडून दाखविणं म्हणजे नवलेखकांनी हातात जळता निखारा घेण्यासारखं. पण इतिहास ही कोणा एकटय़ाची ‘मक्तेदारी नाही. त्यामुळं यासगळ्यांची अनेक पुस्तकं, संदर्भ वाचूनही कोणाच्याही लिखाणाचं ओझं न बाळगता, त्या विषयात तटस्थ लेखन करणं कठीणच. पण भक्कम’ पुराव्यांमुळं संजयनं हे तटस्थ लेखन खूपच चांगल्या पद्धतीनं जमवून आणलं आहे.



भाऊ धारातिर्थीच पडले



भाऊ युद्धात मेले की नंतर याबाबत इतिहासातील पुराव्यांवरून वेगवेगळे निष्कर्ष निगतात. अनेकांच्या मते ते नंतर मेले. पण संजयच्या मते ते युद्धातच धारातिर्थी पडले. या मुद्यावरून आमच्या अनेक चर्चांच्या फैरी झडल्या अशी आठवण सोनावणी सांगतात. तर युद्ध कधी झाले, त्या दिवशी सूर्योदय केव्हा झाला होता, धुके होते की नव्हते, अशाही अनेक घटनांचा ऊहापोह संजयने साग्रसंगीत केला आहे. त्यामुळंच या युद्धाला एक जिवंतपणा प्राप्त झाला आहे.



इतिहास म्हणजे कादंबरी नव्हे



पुस्तक वाचकाभिमुख व्हावे यासाठी लेखक अनेकदा रंजकतेचा वापर करतात. पण यामुळं इतिहासाची कादंबरी होते. त्यामुळे इतिहास कठीण असला तरी रटाळ होऊ नये यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण संजयला मात्र तसे करावे लागलं नाही. कारण जे वाटलं, पटलं तेच त्यानं शब्दात मांडलं. कोणालाही जाणून बुजून टार्गेट केलं नाही. पण प्रस्थापितांविरोधी लिहिताना तो बावरलाही नाही. चर्चा, संशोधन आणि निष्कर्ष काढण्याची वेगळी दृष्टी हे संजयच्या कादंबरीची मुख्य वैशिष्टय़े आहेत.



हा शोध न संपणारा…



पानिपतच्या एवढय़ा मोठय़ा युद्धानंतर त्याबाबत कोणालाच काहीच लिहावेसे वाटले नाही. हे युद्ध म्हणजे मराठीजनांना आजही आपल्या अस्मितेची लढाई वाटते. त्यामुळे संजय सांगतात, की पानिपतातील अनेक प्रश्न पन्नास वर्षांपूर्वीही (जेव्हा शेजवलकरांनी पुस्तक लिहिले) अनुत्तरीत होती आणि आजही अनुत्तरीत आहेत. मला जे संदर्भ सापडले, पत्रे सापडली त्याचा अभ्यास करून मी पानिपत लिहिले. पण यापेक्षा कुठली वेगळी वाट अन्य कोणाला सापडली, अन्य निष्कर्ष सापडले तर तेही मला वाचायला तितकेच आवडतील.

-रुपाली पेठकर-जोशी

समलैंगिकता : विकृती कि प्रवृत्ती?






अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी समलिंगींच्या विवाहांबद्दलच्या विधानामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला असला तरी २००५ मद्धे जेंव्हा मानवेंद्र सिंग गोहील या राजपुत्राने आपल्या देशात प्रथमच आपण "गे" असल्याचे जाहीर केले तंव्हापासुन या विषयाला प्रथमच जाहीर तोंड फुटले. आता समलिंगी (सम-रती) आपल्या हक्कांसाठी आंदोलनेही करत आहेत. आंतरजालीय संस्थळांवर या विषयावर खडाजंग्या घडत आहेत. या विषयाच्या नैतीक, सांस्कृतीक, कायदेशीर, वैद्यकीय इ. पैलुंवर अथक चर्चा घडत आहेत. पुर्वी या विषयावर तोंड उघडणेही अशक्यप्राय होते. भारतात समलिंगी मंडळी आपण "तसे आहोत" हे सांगायची हिम्मत करत नव्हते. परंतु आता ते तोंड उघडु लागले आहेत, न्यायालयाचे दरवाजे आपल्या हक्कांसाठी ठोठावू लागले आहेत. जाहीरपणे मुलाखती देवु लागले आहेत...त्यामुळे संस्कृती रक्षकांचीही पंचाईत झाली आहे. भारतीय संस्कृती रसातळाला जात आहे असा त्यांचा आक्रोश आहे. समलैंगिकता ही विकृतीच असून समाजव्यवस्था यामुळे कोसलेल असा यांचा दावा असतो. त्याचवेळीस, अशा व्यक्तींची घृणा वाटली तरी त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातुन पहावे, त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी असे म्हणनाराही मोठा वर्ग आहे.



सामाजिक निषिद्धांत समलिंगी संबंध ठेवणे हे गंभीर पातक गणले गेले असले तरी भारतातील निषिद्ध संभोगाची परंपरा पुरातन आहे हे खुद्द धर्मशास्त्रे, पुराणकथा, महाकाव्ये, कामशास्त्रे, विविध शिल्पे (खजुराहो) व चित्रांमधुनही दिसून येते. निषिद्ध संभोगांत समलिंगी, अन्य-प्राणी संभोग, मुख वा पार्श्व-संभोग व क्लीबांशी केलेला संभोग प्रामुख्याने येतात. या सर्व प्रकारचे संबंध विपुल प्रमाणावर होते. मनुस्म्रुतीने स्त्रीने स्त्रीशी संभोग केला तर तिला चाबकाचे दहा फटके मारावेत व तिच्याकडुन दुप्पट वधुमुल्य वसुल करावे व समजा वयाने मोठ्या स्त्रीने कुमारिकेशी संबंध ठेवला तर तात्काळ तिचे केशवपन करुन तिची गाढवावरुन धिंड काढावी आणि हाताची बोटे कापुन टाकावी असे आदेश दिलेले आहेत. नारदस्मृतीही असेच निर्देश पुरुषांबाबत देते. असे नियम स्मृतीकारांना बनवावे लागले याचा अर्थ तो समाजातील एक प्रचलित भाग होता. आजपर्यंत तो अव्याहत चालु राहिला आहे, परंतु याबाबतीत गौप्य बाळगण्याच्या (लज्जेपोटी, समाजबहिष्कृततेच्या भयापोटी) प्रवृत्तीने काही जगजाहीर नाही म्हणुन याबाबत आपण फार सोवळे आहोत आणि पाश्चात्य जगच काय ते पापांच्या दलदलीत फसत चालले आहे असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही.



समलिंगी संबंध फक्त मानवप्राण्यांत आहेत असे नाही. जगातील बव्हंशी प्राणी-पक्षी व जलचर जगतातही द्वै-लिंगी संबंध (समलिंगी व विभिन्नलिंगी) ठेवले जातात. यात बदके, कबुतरे, पेंग्वीन, डाल्फिन, सिंह, हत्ती, रानरेडे, जिराफ सरडे, घोरपडी इ. सर्वच आले. अर्थात त्यामागील कार्यकारण भाव आणि मानवी कारणभाव यात फरक आहे हे नक्कीच. पण पशुजगतही या प्रकारच्या संबंधांपासुन मुक्त नाही. किंबहुना नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणारी गरज आहे.



ही विकृती आहे काय?



निसर्गत: प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच परंतु भोजनात मीठ असते तेवढ्याच प्रमाणात. त्यामुळेच मैत्री, स्नेह या सामाजिक भावना निर्माण होतात. परंतु या बाबतचे संतुलन ढळले कि समलिंगी संबंधांकडे वाटचाल होवू लागते. ही प्रवृत्ती (मी याला विकृती म्हणणार नाही) जन्मजात असते असा दावा अनेकदा केला जातो, पण ते सर्वस्वी खरे नाही. सम-रती बनण्यात अनेकदा कौटुंबिक, सामाजिक पर्यावरणामुळेही मानसिक बदल घडवण्यात हातभार लागतो व निसर्गत: तशी नसलेली व्यक्तीही समलिंगी बनु शकते. त्यासाठी आपण खालील काही कारणांवर चर्चा करुयात.



१. ज्या पालकांना मुलगाच हवा असतो पण मुलगीच झाली तर असे पालक अनेकदा मुलीला मुलासारखे कपडे घालणे, तशीच केशरचना करणे ई. उपद्व्याप करत असतात. मुलगा झाला, पण मुलगी हवी होती असे झाले तर त्याच्यावर मुलीचे संस्कार केले जातात. यातुन जी मानसिकता बालवयापासुनच निर्माण होत जाते ती विभिन्नलिंगियांबाबत आकर्षण वाटण्याऐवजी समलिंगियांबाबत आकर्षण निर्माण करते.

पालकांचे याबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. मुलाला मुलासारखेच व मुलीला मुलीसारखेच वाढु दिले पाहिजे. आता "नैसर्गिक" कलच जन्मता: वेगळा असला तर त्याचाही स्वीकार मोकळेपणाने केला पाहिजे. परंतु स्वत:च्या कर्माने समलिंगी निर्माण करण्यास हातभार लावणे हाच मुळात एक सामाजिक अपराध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

२. कळत्या वयात विभिन्न-लिंगिय व्यक्तीची अनुपलब्धता. मुले व मुली लग्नाच्या वयाच्या आधीच वयात आलेले असतात. सामाजिक दबाव, योनीशुचितेचा आजही असलेला प्रचंड प्रभाव, आपल्याकडील विचित्र कायदे यामुळे विभिन्न लिंगियांचाच बाबतीत आकर्षण असले तरी ते जेंव्हा अप्राप्य होते व शरीर वासना जिंकतात तेंव्हा वासनाशमनासाठी समलिंगियच एकमेकांना मदत करू लागतात. असे घडण्याचे प्रमाण खेड्यांत तर कल्पना करता येणार नाही एवढे प्रचंड आहे. यातील अनेकजण पुढे लग्न झाल्यावर हा नाद सोडुन देतात, काही बाय-सेक्श्युअल बनतात तर अत्यल्प मंडळी कायमस्वरुपी समलिंगी बनतात, कारण त्यातच आनंद मिळत असतो. ही विभक्ती किती काळ संबंध राहिले यावर अवलंबुन असते. अनेक मुली वा मुले केवळ ज्येष्ठांच्या बलात्काराने समलिंगी बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. होस्टेल्समद्धे राहणा-यांनी कधीतरी हा अनुभव (आवडो अथवा न आवडो) घेतलेलाच असतो, व तेथुनही समलिंगी निर्मितीचे लघुउद्योग चालु असतात..

कामशास्त्र ज्या देशात सर्वप्रथम लिहिले गेले त्या देशात सेक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजुनही विकृत आहे. मानवी कामवासना या मुळात नैसर्गिक आहेत. त्याचे शमन करण्याची सोय असायलाच हवी. वेश्या (अगदी पुरुषवेश्यांचीही) नीट आरोग्यदायी सोय असायला हवी, अथवा समाजातच तरुण तरुणींना पुरेशी मोकळीक द्यायला हवी. सातच्या आत घरात हा फंडा कालबाह्य झालेला आहे. पुर्वी गणिकांना समाजात जो सन्मान होता तो या मोकळ्या मनोवृत्तीमुळेच. तसेच वसंतोत्सवादि उत्सव खास तरुण-तरुणींकरताच राखुन ठेवलेले असत. त्यंत तरुण-तरुणींना मुक्त मोकळीक असे. पण हे उत्सव संस्कृती रक्षकांनी कधेच बंद पाडुन ताकले आहे. वेश्यांचे म्हणावे तर बव्हंशी एड्सचे-गुप्तरोगांचे आगर आहेत. त्यांना समाजात कसलाही दर्जा नाही. सर्वांना तेथे जायची हौस असतेच, पण कबुल करायची शरम वाटते...मग असे दुस-यांना सहजी शंका येणार नाही असे "कुतुहल" व वासना शमवण्याचे मार्ग शोधले जातात हेही लक्षात घेतले पाहिजे.

.३. दीर्घ पल्ल्याच्या शिक्षा भोगणारे कैदी बाय डिफाल्ट समलिंगी बनतात. त्यांच्या मादीची भुमिका करणा-याची स्त्रीसारखीच काळ्जी घेतात, अगदी लुगडी चोळीही हौसेने घालायला लावतात. येरवडा जेलमद्धे अचानक झडतीसत्र आले तेंव्हा दोनशेपेक्षाही अधिक साड्या मिळाल्या होत्या. महिला तुरुंगही यात मागे नाहीत. हीच मंडळी जेंव्हा मुक्त होवून बाहेर येते तेंव्हा अर्थातच ते पुर्णपणे समलिंगी बनलेले असतात.

अशा दीर्घमुदतीच्या सजा झालेल्या कैद्यांना कुटुंबियांना भेटता यावे यासाठी प्यरोलची तरतुद आहे. पण ती वर्ष दोन-वर्षांतुन मोठ्या मिन्नतवारीने मिळते. धनदांडगे कैदी इस्पितळात दाखल व्हायची सोय करुन आपली सोय करुन घेतात...त्यांचे ठीक आहे, पण मग अन्य कैद्यांची नैसर्गिक गरज मारण्याचा कोणता मानवी अधिकार आपल्या सुसंस्कृत समाजाला व कायद्याला आहे? पण तसे होते व समलिंगी आपसुक तयार होतात...कारण मनुष्य वासनाशमनाचा काहीतरी तोडगा काढतोच! मग ती सवय बनते. त्यापेक्षा नैसर्गिक मार्गानेच त्यांचे वासनाशमन होईल अशी व्यवस्था करता आली तर? मग ज्या संबंधांना आपण समाज-कुटुंबसंस्थेचे मारेकरी समजतो तसे संबंधच निर्माण होणार नाहीत.

४. शेळी, म्हैस व गायीशीही वासना न आवरता आल्याने संभोग करणारेही खुप महाभाग आहेत. खेड्यात याचे प्रमाण अर्थातच जास्त आहे व यात बहुतेक गुराखीच अधिक असतात. वर आधीच सांगितल्याप्रमाणे हा अनैसर्गिक संभोग असला तरी त्याचे कारण विकृती हे नसुन मादीची अनुपलब्धता आहे. स्त्रीयांना अश्वमेध प्रसंगी यद्न्यिय अश्वाशी संभोग करावा लागे, यावरुन स्त्रीयांतही ही अनैसर्गिक उर्मी येत असेल, शास्त्रकर्त्यांना ते माहित असल्याने अशी अनुमती असेलही...परंतु विद्यमान जगात तिचे शमन कसे होते हे मला माहित नाही.



थोडक्यात, निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे. त्यांनाही सन्मानाने जगायचा, आपले हक्क अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे व तो नाकारणे अमानवी आहे. अश रितीने निर्मान होणारे सम-रती हे तुलनेने अत्यल्प असतात. परंतु जे ६०-७०% समलिंगी निर्माण होतात ते आपल्याच सामाजिक विकृतींमुळे, आपल्या कर्मामुळे हेही लक्षात घ्यायला हवे. धर्म-संस्कृती या संकल्पना किती ताणायच्या हे आता आपल्याला ठरवावे लागणार आहे. कामवासना अत्यंत नैसर्गिक असून तिचे दमन विशिष्ट मर्यादेपार अशक्य असते व तिचा स्फोट हा असे संबंध निर्माण होण्यात होतो. अनेकजण मग बलात्कारही करतात. त्यामुळे याकडे अत्यंत मोकळ्या दृष्टीने पाहण्याची व तसे प्रबोधन करण्याची गरज आहे. निकोप कामजीवनाची सोय ज्या समाजात आहे त्या समाजात असे घडणार नाही अशी आशा आपण करु शकतो.

यावर प्रश्न असा उद्भवेल कि अमेरिकेत एवढे मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असुनही तिकडे अशांचे प्रमाण जास्त का? पण हा प्रश्न निरर्थक असाच आहे, कारण ते मुक्तपणे बोलतात, हक्कांसाठी लढतात म्हणुन ती संख्या मोठी वाटते. आपल्याकडे असे प्रमान अत्यंत नगण्य असे आहे, वास्तव हे आहे किमान दहा कोटी लोकांनी पौगंड ते युवावस्थेतील काळात हे अनुभव घेतलेले असतात...त्यातील कोटभर स्त्री-पुरुष आज किमान समलिंगी आहेत. लोकलाजेस्तव हे संबंध गुप्तच ठेवण्याची खबरदारी ते घेत असतात. पण ही संख्या काळजी करावी एवढी मोठी आहे, हे नक्कीच! त्यामुळे संस्कृती रक्षकांनाच प्रथम डोळे उघडुन या वास्तवाकडे गांभिर्याने पहात जरा समाजाला मोकळा श्वास घेवू दिला पाहिजे.

Friday, May 11, 2012

जेंव्हा पुरुष "सता" जात होते....



स्त्रीयांनी पतिनिधनानंतर सती जाण्याची (वा बळजबरीने घालवण्याची) रीत आपल्या देशात होती हे सर्वांनाच माहित आहे. परंतु दहाव्या शतकात निदान कोकणात तरी पुरुष स्वेच्छेने आत्मदहन करून प्राणत्याग करायचे हे मी आज अल मसुदी या अरबी प्रवाशाच्या "मिडोज ऑफ गोल्ड" या प्रवासवर्णनात वाचले आणि चकितच झालो. अर्थात ही आत्मदाह प्रथा पत्नी मेली म्हणुन जात नसून अक्षरशा स्वेच्छेने व्हायची.
मसुदीने चेऊलला सन ९१५-१६ च्यादरम्यान भेट दिली होती. त्यवेळी चेऊल बंदर अत्यंत प्रसिद्ध होते व चेऊल आयात-निर्यात व्यापाराचे फार मोठे केंद्र म्हणुन जगभर गाजत होते. कोकण भागात बराच फिरुन मसुदी मग सिंधला निघुन गेला. त्याने जवळपास १५ ग्रंथ लिहिले, पण त्यातील गाजलेला मी वर उल्लेख केलेला ग्रंथ. त्याने दिलेली माहिती अशी-
तो म्हणतो त्याने भेट दिली तेंव्हा कोकणात स्वत:ला (फक्त पुरुष) जाहीरपणे समारंभपुर्वक जाळुन घेण्याची प्रथा सर्व-सामान्य होती. ही बळीप्रथा नव्हती हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात स्वत:हून बळी जाण्यासाठी त्या व्यक्तीला राजाची अनुमती घ्यावी लागे. राजाने अनुमती दिल्यानंतर गांवात (वा नगरात) चिता रचली जाई. त्या व्यक्तीच्या मस्तकाचा गोटा करुन तुळशीच्या पानांचा मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवला जायचा. त्याची वस्त्रे या प्रसंगी रेशमाची असत. त्याची मग समारंभपुर्वक वाद्यांच्या घोषात मिरवणुक काढली जायची. त्याचे मित्र त्याच्या सोबत असत. मिरवणुक संपल्यानंतर तो पेटत्या चितेजवळ येई व स्वत:ला आगीत झोकुन देत असे. अशा प्रसंगी त्याला ऐन वेळीस भिती वाटली तर त्याचे मित्रच त्याला आगीत ढकलुन देत असत. (ही परवानगी त्याने आपल्या मित्रांना अधेच दिलेली असे.)
मसुदीने स्वत: प्रत्यक्ष पाहिलेला आत्मदहन प्रसंग तर अगदीच भिषण व अंगावर काटे आणनारा आहे. एका तरुणाची चिता पेटलेली असता, किंचितही भयभीत व अस्वस्थ न होता, त्या तरुणाने मित्राकडुन तलवार घेतली व आपले पोट फाडले, स्वत:च्या हाताने आपले यकृत ओढुन काढले व ते मित्राच्या हाती दिल्यानंतर त्याने आगीत उडी घेतली.
मसुदी पुढे अशी माहिती देतो कि जेंव्हा राजा (वा स्थानिक माडलिक) मरण पावायचा वा युद्धात ठार मारला जायचा तेंव्हा त्याचे अनेक निकटतम मित्रही असेच स्वेच्छेने राजाबरोबर आत्मदाह करायचे.
अल मसुदीच्या या माहितीला पुष्टी देणारी माहिती १८८३ च्या कोलाबा ग्यझेटियरमद्धे आलेली आहे. शहापुर (ठाणे) येथे मिळालेल्या एका स्मारकशिळेवर अनेक माणसे भडकलेल्या अग्नीत उड्या मारत असल्याचे दृष्य कोरलेले आहे व यामुळे मसूदीचे निरिक्षण व अनुभव बरोबर आहे असा नि:ष्कर्ष काढलेला आहे.
नवलाची बाब ही कि आपल्याकडे ही माहिती पुरवणरे एकही संदर्भ साधन नाही. कोणत्याही धर्मग्रंथात, पुराणात, स्थलपुराणांत ही माहिती मिळत नाही. ही प्रथा कशी सुरु झाली? कधी बंद पडली, यावर तर्कच बांधावा लागतो. पुढे मुस्लिम सत्ता कोकणात प्रस्थापित झाल्यानंतर ही चाल बंद पदली असावी असे दिसते. ही प्रथा देशभर होती कि फक्त कोकणात हेही आपल्याला समजायला मार्ग नाही. यामागे कोणत्या धार्मिक भावना होत्या, ही प्रथा कोकणात नेमक्या कोणत्या समाजात होती, हेही समजायचे साधन आज आपल्या हातात नाही. चेऊल येथे त्या काळी जवळपास दहा हजार मुस्लिम होते. शेकडो ग्रीक, हबशी लोकही स्थाईक झालेले होते. परंतु एकंदरीत या आत्मदाह करणा-या व्यक्तींचे वर्णन पहाता ते हिंदु असल्याचेच दिसते. मसुदीने भेट दिली तेंव्हा झंझा हा शिलाहार शाखेतील पाचवा वंशज राजा होता असे त्याने नमुद केले आहे. ही माहिती इतिहासाशी जुळते. असो.
अशी प्रथा होती हे मात्र या अरब प्रवाशामुळे आपल्याला माहित होते. बरे हा स्वेच्छेचा मामला होता. राजा मेल्यावर कोणी आत्मदाह करणे एकवेळ समजता येवू शकते...पण स्वेच्छेने, अन्य काही लौकिक कारण नसतांना एखाद्याने स्वत:ला समारंभपुर्वक जाळुन घेणे हे मात्र अजबच म्हणावे लागेल. राजे कोणत्या धर्मनियमाने अशी परवानगी देत असतील? ते अशा आत्मदाह प्रस्तावकाला नेमके काय विचार करुन परवानगी देत असतील वा नाकारत असतील? अगणित प्रश्न या निमित्ताने उठतात हे मात्र खरे.
येथे एक बाब नीट लक्षात घ्यायला हवी. इजिप्तमधील असोत कि भारतातील...राजाच्या शवाबरोबर बरोबर दास-दासी जीवंत गाडणे अथवा जाळणे ही सर्रास प्रथा होती. यात स्वेच्छा किती आणि जबरदस्ती किती हा विचार व्हायला हवा. कोकणातील या प्रथेत राजा/सामंताबरोबर येथे नोकर नव्हेत तर मित्र जाळुन घेत असत हा संदर्भ नीट लक्षात घ्यायला हवा. त्यातही समजा विशेष नाही...असे समजा हवे तर...पण स्वेच्छेने अगदी स्वतंत्रपणे, तीही राजाची परवानगी घेवुन पुरुष आत्मदहन करत असत. स्त्रीसत्ताक कालात (ग्रीक उदाहरण आहे हे) राणी दरवर्षासाठी एकाची पती म्हणुन निवड करी आणि वर्षांती त्याचा विधीपुर्वक बळी दिला जात असे व त्याचे मांस-रक्त शेतांत विखरुन फेकले जात असे. अर्थात हा एक प्रकारचा सुफलताविधी होता. (संदर्भ: महाभारताचे मुळ पश्चिम आशिया- अ.ज. करंदीकर) असे प्रकार पुरातन काळी जगभर होत असत. ऋग्वेदातही पुरुषमेध आहेच. शुन:स्चेपाची कथा सर्वांना माहित असेलच. परंतु ते "बळी" असत. प्रासाद, किल्ले, तळी बांधतानाही भारतात बळी दिले जात याचे अस्पष्ट का होईना उल्लेख आढळतात.
पण मसुदी जे सांगतोय त्यात रीतसर परवानगी घेवून समारंभपुर्वक (विधीपुर्वक नव्हे) तरुण आत्मदहन करत व ही चाल सर्रास होती असे मसुदी म्हणतो. त्यामुळेच ही स्वैच्छिक आत्मदहनाची चाल विचार करण्यासारखी बाब आहे. जीवनाला वैतागलेले वा देवी अथवा देवाला खुष करण्यासाठीची ही चाल वाटत नाही...अन्यथा असे आत्मदहन देवी-देवता मंदिरासमोर झाले असते...येथे रीतसर अनुमत्या घेतल्या जात होत्या...दिल्याही जात होत्या...व नंतरच असे आत्मदहनीय कार्यक्रम होत असत असे दिसते. याकडे आपल्याला म्हणुनच वेगळ्या दृष्टीने पहावे लागते.
अलेक्झांडरने आपल्या सोबत नेलेल्या कलानस (कल्याण?) या जैन साधूने शेवटी स्वेच्छेने आत्मदहन करून प्राणत्याग केला होता अशी माहिती ग्रीक इतिहासकार पुरवतात. ही इसपूच्या तीस-या शतकातील घटना आहे.
असो. आपल्याला आपला समाज-सांस्कृतिक इतिहास अजुन किती शोधायचा आहे हे मात्र या निमित्ताने लक्षात यायला हरकत नाही.
-संजय सोनवणी

Wednesday, May 9, 2012

जगातील आद्य व्याकरणकार कच्छायन


पाणिनीचा काळ हा आपण इसवी सनाचे दुसरे शतक ते दुसर्‍या शतकाचा मध्य असा सिद्ध केला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होईल कि मग भारतातील आद्य व्याकरण कोणी व कोणत्या भाषेचे लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे कच्छायन (कच्छायनो) हा आद्य व्याकरणकार असून गौतम बुद्धाच्या आदेशाने त्याने पाली भाषेचे व्याकरण लिहिले.कच्छायनाचा काळ गौतम बुद्धाच्या समकालीन असून तो इसपु. ६०० असा येतो.


स्वत: पाणिनीने आपल्या अष्टाध्यायीत आपला पुर्वसुरी म्हणून कच्छायनाचा आदरपुर्वक उल्लेख केलेला असून कच्छायनाने दिलेल्या अनेक नियमांची त्याने उसनवारी केली आहे. (A Pali Grammar on the basis of kacchaayana by Francis mason-page i, ii.) यावरुनही कच्छायनाची प्राचीनता लक्षात येते. डा. बुह्लेर यांनी कच्छायन हा ब्राह्मण नव्हता व तो शाक्यमुनीचा सर्वोत्तम शिष्य होता असे स्पष्टपणे नमूद करून ठेवले आहे.

गेल्या शतकापर्यंत कात्यायन व कच्छायन एकच असावेत असा भ्रम होता, परंतु पाली भाषेचे कच्छायनाच्या व्याकरणाचे ग्रंथ सीलोन व ब्रह्मदेशात सुस्थितीत मिळाल्याने हा भ्रम दूर झाला. याचे खरे श्रेय श्री. जी. टर्नर, जेम्स अल्विस व फ़्रांसिस मेसन या विद्वानांकडे जाते. १८५५ मद्धे जेम्स अल्विस यांना टर्नर श्रीलंका (तेंव्हाचे सीलोन) येथे व नंतर ब्रह्मदेशातही कच्छायनाचे व्याकरण भूर्जपत्रांवर लिहिलेले सापडले व ते त्यांनी १८५५ मध्ये कलकत्त्यावरुन प्रसिद्ध केले. पुढे या विद्वानांनी या व्याकरणाचे अनुवाद व आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही ग्रंथरुपाने प्रसिद्ध केले.असे असूनही आपल्या विद्वानांनी तिकडे लक्ष पुरवले नाही हा एक दोषच आहे असे दिसते. या ग्रंथांमुळे पाणिनी सांगितला जातो तेवढा पुरातन नाही हेही सिद्ध झाले. कच्छायनाचे व्याकरण आठ भागांत असून पाणिनीनेही आपल्या व्याकरणाचे आठ अध्याय केले यावरुनही कच्छायनाचे पाणिनीवरील ऋण दिसून येते. आपल्याकडे दुर्दैवाने हा व्याकरणकार कधी प्रसिद्धीस आला नाही. कात्यायन या नांवाच्या अनेक व्यक्ति झाल्या असून व्याकरणकार कात्यायन हा पाणिनीचा समकालीन होता हे आपण आधीच सिद्ध केलेले आहे व पाणिनी कच्छायनाचे ऋण मान्य करत असल्याने पालीचा व्याकरणकार कच्छायन हा कात्यायन असू शकत नाही हे उघड आहे. कच्छायनाने पालीचे (मागधीचे) व्याकरण बुद्धाच्या आदेशावरुन लिहिले व या व्याकरणाची सुरुवातच बुद्धाच्या एका वाक्याने होते. ते असे-

"अट्ठो अक्खरा सन्नतो..."

(अक्षरांमुळे भाव समजतो.)

येथे येणारा अक्खर हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. बुद्धाच्या वेळी लिहिण्याची कला अवगत होती हे यावरुन सिद्ध होते. म्यक्समुल्लर यांचा भारतीयांना लेखनाची कला अवगत नव्हती हा दावाही फेटाळला जातो. अल्विस यांनी त्यांच्या Introduction to Kachchayana's Grammar of the Pali Language या ग्रंथात आवर्जून नमूद केले आहे कि बुद्धकाळी लेखनाची चांगली प्रथा होती व स्त्रीयांनाही लिहिणे शिकवले जात असे.

कच्छायनाच्या व्याकरणातील रुपसिद्धी भागावरच्या टीकेत, अंगुत्तर निकाय व महावंस मध्ये कच्छायनाची जी माहिती मिळते ती अशी:

"महाकच्छायन हा कच्छो नामक ग्रुहस्थाचा मुलगा होता. तो गौतम बुद्धाचा प्रिय शिष्य होता. बुद्धाने त्याची निवड पाली भाषेचे पहिले व्याकरण लिहिण्यासाठी केली तर सारीपुत्राची निवड विदेशांत धर्मप्रसारासाठी केली. गौतम बुद्धाने मांडलेल्या विचारांत विविध ठिकाणच्या भाषाभेदांमुळे अर्थसंभ्रम निर्माण होवू नये म्हणून पालीचे व्याकरण तयार करण्याची आवश्यकता बुद्धाला वाटली होती. व "अक्षरांमुळे भाव सिद्ध होतो" हे बुद्धवचन केंद्रस्थानी ठेवत, या वचनापासूनच सुरुवात करत "निरुत्तिपिटको" हा व्याकरण ग्रंथ कच्छायनाने सिद्ध केला."

सर्वच संबंधित ग्रंथ व कच्छायनाच्या व्याकरणावरील टीकाकारांनीही कच्छायन हा "थेर" (स्थविर)होता, गौतम बुद्धाचा सर्वोत्कृष्ठ असा बुद्धीमान शिष्य होता हे मान्य केलेले असल्याने कच्छायनाचा काळ नि:संशयपणे बुद्धाच्या समकालीन जातो हे सिद्ध होते व पाश्चात्य पंडितांचाही हाच निर्वाळा आहे. त्याने आपल्या व्याकरणाची रचना नियम, वृत्ती व उदाहरणे अशा स्वरुपात सुत्ररुपानेच केली आहे. यामुळे सुत्रपद्धतीचा निर्माताही कच्छायनच ठरतो.


बौद्ध धर्म जगभरात जेथे जेथे गेला तेथे तेथे कच्छायनाचे व्याकरणही गेले. आज आपल्याला त्याचे व्याकरण उपलब्ध झाले आहे ते ब्रह्मदेश, नेपाळ, तिबेट व सीलोनमधुन. भारतातुन बौद्ध धर्माची पीछेहाट झाल्यानंतर हा ग्रंथही बहुदा नष्ट झाला असावा. म्हणजे अद्याप तरी एकही प्रत भारतात सापडलेली नाही. असो.

आता कच्छायन हा बुद्धाच्या समकालीन असल्याने त्याचा काळ इ.स.पूर्व सहावे शतक असा येतो. आता तोवर जगभरात कोणत्या भाषांची व्याकरणे लिहिली गेली होती? आपल्याला ज्ञात असलेले जगातील प्राचीन व्याकरण ग्रीक भाषेचे असुन र्‍हिनस व अरिस्टार्कस यांचे असून ते इ.स.पूर्व च्या तिसर्‍या शतकातील आहे. त्यामुळे कच्छायन हा नुसता भारतातील नव्हे तर जगातील आद्य व्याकरणकार ठरतो.

बुद्धाला व्याकरणाची गरज भासणे स्वाभाविक आहे. याचे कारण म्हणजे मिशनरी पद्धतीने धर्मप्रचार करायचा असेल तर त्याची मुळ वचने अन्य प्रदेशांत अर्थ हरपुन बसु नयेत असे त्याला वाटणे स्वाभाविक होते. याचा अर्थ अन्य प्राकृत भाषांची व्याकरणे अस्तित्वात नव्हतीच असे नाही. कच्छायनाने अन्य "सुत्तन" चा उल्लेख केलेलाच आहे. परंतु मागधीतील मूळचा उपदेश अन्य भागांतील भाषाभेदांमुळे नियमीत करण्यासाठी स्वतंत्र व्याकरणाची आवश्यकता होती व ती कच्छायनाने पूर्ण केली.

येथे हे लक्षात घ्यायला हवे कि जगातील पहिला व्यक्तिप्रणित धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. महावीराच्या जैन धर्माला आधीच्या २३ तीर्थंकरांची पार्श्वभूमी होती. बौद्ध धर्मातही उत्तरकालात पुर्वबौद्ध ही संकल्पना उधारीने आली असली तरी ती मूळ बौद्ध धर्माचे अंग नव्हती. आजच्या कथित हिंदू धर्माने "अवतार" संकल्पना जैन व बौद्धांकडूनच उधार घेतली आहे हेही एक वास्तव आहे. धर्मकल्पनांची उधार-उसनवारी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. उदा. इस्लाम धर्माने ज्यू धर्मातील अनेक संकल्पना जशाच्या तशा उचललेल्या आहेत.

सामान्यांना तशी व्याकरणाची गरज पडत नाही याचे कारण म्हणजे त्यांचे व्यवहार हे मर्यादित भौगोलिक परिप्रेक्षात असतात व संवादाचे कार्य निरलस चालुच असते. परंतु धर्मविस्तार व राज्यविस्तार हे हेतू असतात तेंव्हा भाषा प्रमाणित करावी लागते. याचमुळे वररुचीने सातवाहनांसाठी इ.स.पूर्व च्या पहिल्या शतकात "प्राकृत प्रकाश" हा ग्रंथ लिहुन माहाराष्ट्री प्राकृतला ग्रांथिक भाषा बनवण्याचे योगदान दिले. हालाची "गाथा सतसई" (उर्फ गाथा सप्तशती) वररुचीच्याच व्याकरणाचे नियम पाळते हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

ज्या कारणांमुळे बुद्धाला व सातवाहनांना आपापल्या भाषांचे व्याकरण असावे असे वाटले नेमक्या त्याच कारणांनी पुढे वैदिक धर्मियांनाही त्याची गरज भासली. ती कशी व केंव्हा याबाबत आपण पुढील लेखात चर्चा करुयात.



.

Tuesday, May 8, 2012

आपल्याला नेमके कोठे जायचे आहे?






आपण आजपासुनच्या पुढच्या पन्नास वर्षात नेमके कोठे पोहोचायचे आहे यावर आपण विचार करायला हवा. "हा भविष्य नांवाचा इतिहास आहे..." अशी कादंबरी मी गतवर्षी लिहायला घेतली होती. ती पुर्ण होईल तेंव्हा होईल परंतु भविष्याचा वेध काही मापदंडांनुसार घेता येत असेल तर तो मी असा कल्पिला आहे. समजा आपण आजच सावध होत पुढच्या हाका ऐकल्या नाहीत तर ते भवितव्य अत्यंत अटळपणे आपल्याला चिकटणार आहे यात शंका बाळगायचे कारण नाही.



१. शेती, पशुपालन हा उद्योग शेतकरी, पशुपालकांच्या हातातुन पुरेपूर निसटुन अवाढव्य कंपन्यांच्या हाती जातील, तसे कायदेही बनतील. बहुमजली शेती ही कल्पना वास्तवात येईल. बहुमजली शेती करता येवू शकते याची प्रात्यक्षिके मी स्वता:च केलेली आहेत.

२. जगाचे नियंत्रण हे लोकनियुक्त सरकारांच्या हाती न रहाता बलाढ्य कंपन्या (ज्या चार-पाचच असतील) यांच्या हातात जाईल व कल्याणकारी राज्य ही संकल्पनाच नष्ट होईल.

३. याची प्रतिक्रिया म्हणुन माओवाद उफाळुन येईल व एकार्थाने अराजकाची परिस्थिती निर्माण होईल.

४. भारतापुरते बोलायचे तर पुढच्या पन्नास वर्षांत ब्राह्मण समाज हा देश सोडुन निघुन गेलेला असेल. त्यांना प्रतिक्षणी शिव्या घालणा-याची मोठीच पंचाईत होवून जाईल. पण मग ते आपला मोहरा अन्य सोबर पण धनाढ्य जातींकडे वळवतील आणि त्यांचे शिर्कान प्रत्यक्षपणे करण्याच्या मागे लागतील. यात झपाट्याने पुढे जाणारा दलित समाजच आज तरी असल्याने पुढच्या पन्नास वर्षांत ते सर्व क्षेत्रांत अग्रणी झालेले असतील. स्वाभाविकच द्वेषाची दिशा त्यांच्याकडे वळवणे सोपे जाईल.

५. खुरडत प्रगती करणारा ओबीसी समाज हा हत्यार म्हणुन वापरला जाईल.

६. सत्तांध जमाती भांडवदारांशी एकीकडे जुळवून घेत अप्रत्यक्षपणे अशा विखारी लढ्यांचे नेतृत्वही करतील. (जसे ते आजही करत आहेत. भविष्यात त्याची परिमाने वाढत जातील एवढेच!)

७. एके दिवशी या सत्तांधांचेच जाहीर खुन पडायला सुरुवात होईल. यांची घरेदारे पेटवायला सुरुवात होईल आणि याचे नेतृत्व कोणी व्यक्तिविशेष नव्हे तर साराच पिडीत समाज करेल.

८. भारतात प्रत्येक जात ही "टोळी धर्माचेच" अक्षरशा: पालन करत असल्याने नंतर हेच पिडीत जातीय एकमेकांचे गळे घोटायला सुरुवात करतील.



थोडक्यात जगाची लोकसंख्या कमी करायला अनिवार मदत करतील.



हे भवितव्य भीषण वातले, अगदी कवि-कल्पना जरी वाटली तरी त्या दिशेने आपण कशी वाटचाल करत आहोत याचे काही प्यरामीटर्स आहेत व ते असे:



१. सरकारे कंपन्यांच्या हातात जात आहेत...? होय. सेझ, बीटी, कामगारांवर संपबंदी आणि आताच प्रणब मुखर्जींनी एक वर्ष पुढे ढकललेला General Anti-avoidance Rule हा कायदा. कंपन्यांच्या दबावाखाली येत सरकार कसे नियम बनवते आणि रद्द वा स्थगितही करतेय याचे हे एक मामुली उदाहरण.

२. यंदा पावूस चांगला झाला होता. पाटबंधारे खात्याला अचाट निधी दिला होता व काही वेळा अन्य निधी या खात्याकडे वळवलाही होता. पण पंधरा हजारांवरची गांवे साध्या पिण्याच्या पाण्यासाठी तरसत आहेत. पुण्यात पाणीनियंत्रण आहे. म्हणजे भविष्यात पाणी ही यादवीची बाब होणार आहे हे नक्कीच आहे. सत्तांध पाणी जिरवण्याऐवजी निधी जिरवतात...त्यांच्या हव्यासाची फळे त्यांना नाही (पन्नास वर्षांनंतर ते थोडेच हयात असनार आहेत?) तरी ती आपल्याच पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहेत याची ही पुर्वचिन्हे आहेत.

३. माओवाद्यांमुळे चक्क आमदार ते अन्य लोकप्रतिनिधी आजच अरण्यांतील निवासस्थाने सोडत अन्यत्र पळत आहेत...हा वाद खेडोपाड्यांत-शहरांत पसरायला पन्नास वर्ष खुप म्हणजे खुप आहेत.

४. आजच जातीयवाद टोकाला जावून पोहोचला आहे. अगदी एखाद्याने डोके थंड ठेवत आपापल्या जातींवरील अन्यायाकडे वा विखारी टीकेकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तरी ते शक्य नाही अशी आपली सामाजिक स्थिती आहे. प्रत्येक जात अन्य जातींकडे संशयाने पहात आहे. आणि तसे घडावे यासाठी कोणती ना कोणती जात हातभार लावतच आहे. त्यामुळे प्रत्येक जात आपापल्या कोषात नाईलाजाने जात आहे.

५. आज लोक आपापले अधिकार मर्यादित परिप्रेक्षात मिळाले तरी काही प्रमाणात समंजसपणा दाखवत असले तरी असंतुष्टी नाही काय? तिचा उद्रेक पुढच्याच पिढीत होणार नाही याबाबत कोणी गाफील राहु नये. खरे तर आताच अनेक समाजघटकांत उद्रेकी परिस्थिती आहे. उदा. आज दबलेले, मूक असलेले आदिवासी, भटके-विमुक्त या पुढच्या पन्नास वर्षांत जेंव्हा सुबुद्ध होतील ते काय आवाज उठवल्याखेरीज राहतील?

६. माध्यमे ही नेहमीच भांडवलदारी व सत्ताधारी जमातींची हत्यारे असतात. आजही आहेत. सर्वसमावेषक वैचारिकतेचा उद्घोष त्यांना नेहमीच अडचणीचा असतो. हवे तसे जनमानस बनवण्यासाठी ते अविरत कार्यरत असतात. परंतु भविष्यात ते त्यांना जमेलच याची शक्यता नाही. खुद्द आज जे पत्रकार अशा वृत्तपत्रांत काम करतात त्यांचाच यावर विश्वास नाही. आजकाल चळवळीची म्हणुन जी वृत्तपत्रे निघतात ती तर एखाद-दुसरा अपवाद वगळला तर मुळातच विश्वासार्ह नाहीत. आणि हे आता वाचकांनाही समजु लागले आहे. एकच बातमी भिन्न विचारसरणीची वृत्तपत्रे अशा वेगळ्या पद्धतीने देतात वा ती बातमी सरळ गाळली जाते...हे आता वाचकांना समजु लागले आहे. भविष्यात प्रत्येक व्यक्ती हेच एक वृत्तपत्र बनेल व हा धंदा नष्ट होईल. थोडक्यात समाजनिष्थत्वाकडुन व्यक्तिनिष्ठेकडे परवास होईल. याची प्रचिती आजच हजारो सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन येते आहे. भविष्यात त्याच जीवंत राहतील. आज जो विकृत विखार दिसतो त्यात उत्तरोत्तर भरच पडत राहील एवढेच!



वरील व आताच्या मुद्द्यांत भर घालता येतील असे अगणित मुद्दे आहेत व यावरुन मी फारच नकारार्थी विचार करत आहे असे वाटणे स्वाभाविक आहे.



आज आपण जे चालले आहे तसे चालुद्यात, थोडे भांडा-थोडॆ वैचारिक व्हा, पण मर्यादेबाहेर...आपापले उद्योग सोडुन नको...अशीच भूमिका आपण ठेवली तर आपले भवितव्य वर सांगितल्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. थोडाफार फरक पडेल एवढेच! पण ते चांगले नसणार यात शंका बाळगायचे कारण नाही.



आमचा वर्तमान हा नेहमीच भवितव्याचा पाया असतो.



आमचा वर्तमान जर कलुषित असेल, विकृत असेल, तर भवितव्य आहे त्यापेक्षा विदारक व संहारकर्ते असेल यात काय संशय?



आमचे इतिहासाचे आकलन हे संदर्भहीण होत जातीय बनत असेल तर आमचा वर्तमान आम्हीच विकृत केला आहे.



मग आमचे भवितव्य उदात्त भव्य आणि मानवतावादी कसे असेल?



मला वाटते आजच आम्ही बदलायला सुरुवात केली पाहिजे. मानवी स्वभाव बदलांना अनुकुलच असतो. फक्त विचारांची दिशा सकारात्मक करायला हवी. आज असे सकारात्मक तरुण विचारवंत खूप आहेत. त्यातील काही आधी नकारार्थी असले तरी नंतर त्यांनीही आपला विचारौघ सकारात्मक केला आहे. काही नांवे घ्यायची तर सचीन परब, श्रीरंग गायकवाड, संजय क्षीरसागर, सागर भंडारे, प्रकाश पोळ, महावीर सांगलीकर, मधुकर रामटेके, श्रावण देवरे, गणेश अटकळे, शुद्धोदन आहेर, जयंत पवार, पराग पाटील, मुकुंद कुळे...प्रगती बाणखिले, डा. आनंद दाबक, डा. क्रांती गवळी, वैभव छाया ...किती नांवे घेवू? हे सारे चाळीशीच्या आतबाहेरचे. ही मंडळी आज ज्या पद्धतीने सम्यक मांडणी करत समाजाला एक दिग्दर्शन देत आहेत ती एक अद्भुत आणि पराकोटीचे स्वागत करावे अशी बाब आहे. अशा सर्वांचेच स्वागत आम्ही एक समाज म्हणुन कसे करतो, आम्ही विकृतांना प्राधान्य देतो कि खरे समाजहित कळवळ्याने मांडणा-यांना यावर आमचेच सामाजिक भवितव्य अवलंबुन आहे. यांना आम्ही एकाकी पाडु तर आम्ही वर लिहिलेले दुर्दांत भवितव्य वास्तवात आनण्याच्या पापातील सहभागी असू हे नक्कीच!

एक सांगतो...रडावे असे वाटले तरी अश्रु पुसणारेही अहेत. हे आपले भाग्यच आहे.

पण जर आपण डोळे बंद करुन द्वेषांध होणार असू तर डोळे पुसनारे नव्हेत तर गळे घोटणा-यांचीच संख्या अगणित असेल हे नक्कीच आहे!

धन्यवाद!

Monday, May 7, 2012

माझी वाघ्याबाबतची भुमिका






वाघ्यावर खरे तर भरपुर लिहुन झाले. एक लेख तर मीच डिलीट करून टाकला. म्हटलो पुरे झाले. कशाला वारंवार त्यावर लिहायचे? तो काही एवढ्या महत्वाचा विषय नाही. परंतू अनेक ठिकाणांवरुन मला अनेक फोन, काही ख-या नांवानी तर काही खोट्या नांवांनी सतत येत आहेत. त्यांचा मुख्य उद्देश असतो तो हा कि माझी नेमकी भुमिका काय आहे व का आहे, त्यामुळे मला माझी भुमिका मांडणारा हा लेख लिहिणे अपरिहार्य असेच झाले आहे.



१. माझा काही संभाजी ब्रिगेडशी वाद असल्याने मी वाघ्याविरोधात भुमिका घेत आहे काय? हा प्रश्न अत्यंत हास्यास्पद असाच आहे. मी कधीही या ब्रिगेडचा सदस्य वा समर्थक नव्हतो. माझ्या काही संशोधनांचा (उदा. दादोजी कोंडदेव) त्यांना उपयोग झाला व त्याबद्दल त्यांच्या पदाधिका-यांनी माझे आभारच मानले आहेत. ब्राह्मणांच्या कत्तली वगैरे भागाबाबत मी जाहीर विरोध केला आहे व त्याबद्दल शिव्या व धमक्यांच्या लाखोल्याही खाल्ल्या आहेत. मी स्तुती अथवा निंदेची कधीही पर्वा केली नव्हती व करणार नाही. मला जे सत्य वाटते तेच मी मांडले आहे.



२. मला धनगर विरुद्ध मराठा हा वाद पेटवायचा आहे काय? हा प्रश्न तर अत्यंत मुर्खपणाचा आहे. मला मराठा समाजाबद्दल कसलाही द्वेषभाव नाही वा धनगरांबाबत असायला हवी तेवढी आत्मियता नक्कीच आहे. माझा विरोध हा बहुजनवादी म्हणत मराठा अजेंडा पुढे रेटणा-या प्रव्रुत्तींबाबत आहे. माझ्या अनेक व्याख्यानांतुन मी धनगर समाजावरही सकारात्मक टीका केलेली आहे व करत राहील. किंबहुना सर्वच समाजघटक जोवत तारतम्याने वागतात तोवर मी त्यांचा समर्थकच असतो परंतु जेंव्हा कोणीही सरसकट द्वेष-तिरस्काराची भुमिका घेतो तेंव्हा तेंव्हा मी विरोधच केला आहे व करत राहील. अशा स्थितीत दोन समाजांत वाद पेटवण्यासाठी मी वाघ्याबाबत लिहितो हे म्हणणे तर्कदुष्ट आहे. वाघ्याबाबतचा वाद संभाजी ब्रिगेडने उकरुन काढला होता. मी नव्हे. यंदाही काही कारण नसतांना हा वाद उकरला गेला आहे. याबाबत मी लिहिणारच याची जाण या मंडळीला नसेल असे मला वाटत नाही.

३. वाघ्याचा पुतळा हा मुळात तुकोजीराजे होळकरांचाच अवमान आहे, असे विधान केले जाते. यामागील कथा अशी आहे कि जेंव्हा ग.वि. केतकर वगैरे मंडळी शिवस्मारकाच्या कामाला वित्त कमी पडु लागले तेंव्हा इंदोरला गेले परंतु तुकोजीराजे कशी त्यांची भेट टाळत होते, राणीसाहेबांचा लाडका कुत्रा मेल्याच्या सुतकाचे कसे निमित्त सांगत होते व शेवटी इंग्रज रागावतील म्हणुन शिवस्मारकासाठी म्हणुन न देता कुत्र्याच्या स्मारकासाठी म्हणुन त्यांनी पाच हजारांची मदत केली व शिवस्मारकाचे काम झाल्यानंतर उर्वरीत पैशांतुन कुत्र्याचा पुतळा बांधा असे सांगुन त्यांनी पलवाट काढली. ही कथा ज्याही कोणी महामुर्खाने लिहिली ती सरळ सरळ तुकोजीराजांचा अवमान करनारी आहे यात शंका नाही. तुकोजीराजेंनी जेंव्हा तत्पुर्वीच केळुस्कर गुरुजींच्या आद्य शिवचरित्राला तत्कालीन २४ हजार रुपयांची मदत केली व कर्जमुक्त केले, पुण्यातील शिवाजी महाराजांच्या नांवे नुसते मिलिटरी स्कुल काढले नाही तर जगातील पहिला भव्य पुतळा ज्यांनी उभारला ते इंग्रजांची पर्वा करत होते असे लिहिणा-याच्या अक्कलेचे दिवाळे निघाले होते हे सत्यच आहे. पण वास्तव हेच आहे कि वाघ्याचेही स्मारक शिवस्मारकाचे काम पुर्ण झाल्यानंतरच उर्वरित पैशांत केले गेले. आता एका लेखकाने लिहिलेली विकृत कथा आणि वाघ्याचे स्मारक यात तुकोजीराजेंचा अवमान कोठे दिसतो? ही सरळ सरळ धनगरांना बनवण्यासाठीची सारवासारवी आहे.

४. मी भटांचा दलाल आहे काय? मस्त प्रश्न आहे. बुद्धी नाठल्यानंतरच असले प्रश्न निर्माण होवू शकतात. शिवाजी महाराजांचे स्मारक ब्राह्मनांनी केले ही खरी पोटदुखी आहे. हे स्मारक शोधले मुळात ते महात्मा फुले यांनी, हीही पोटदुखी आहे. मी भटांचा दलाल असल्याने वाघ्या ही त्यांनी निर्माण केलेल्या विकृतीचे समर्थन करत आहे असा त्यांचा (फोनकर्त्यांचा) दावा आहे. एवढा ब्राह्मणद्वेष बरा नव्हे हे त्यांना समजण्याची शक्यता नाही. यांनाच समाजात तेढ हवी आहे म्हणुन ते असले तोडफोड-जाळपोळ उपक्रम हिरिरीने पुढे रेटत असतात, विरोध करणा-यांना भटांचे दलाल ठरवले कि झाले. पण लोक एवढे मुर्ख नसतात हे द्न्यान होण्याची शक्यता दिसत नाही.

५. वाघ्याच्या स्मारकाच्या जागी राजघराण्यातील अन्य कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीची समाधी असली पाहिजे...असाही दावा माख्याकडे केला गेलेला आहे. माझे उत्त्र आधीही अनेकदा आले आहे. पण पुन्हा पुन्हा विचारतात म्हणुन पुन्हा सांगतो.अंदाजांवर इतिहास चालत नाही. तेथे सईबाईंची समाधी असु शकत नाही कारण ती राजगडावर आहेच. सईबाई महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जीवित होत्या या दाव्याला इतिहास संशोधन म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. बरे सईबाईंची नसेल तर पुतळाबाईंची असेल...अहो पण त्या सती गेल्या होत्या...सतीचे वृंदावन अथवा स्मारकशिळा असते. तशी स्मारकशिळा रायगडावर आहे. नाही? मग ती जागा सोयराबाईंची असेल...वा! काय अजब तर्क आहेत! सोयराबाईंना संभाजीराजांनी भिंतीत चिणुन मारले कि त्यांचा मृत्यु कैदेत झाला याबाबतच मुळात इतिहासकारांत मतैक्य नाही. तो मृत्यु कसाही झाला असला तरी संभाजी महाराज त्यांचे स्मारक करण्याची शक्यता शुण्य आहे. याबाबतचे कसलेही पुरावेही नाहीत. अगदी बखरींतही येत नाहीत. असे असतांना केवळ अंदाज बांधत वाघ्या ही गडकरींच्या विकृत प्रतिभेची उपज आहे हा दावा
कशासाठी?  परंतु गडकरींनी आपले नाटक लिहिण्यापुर्वीच १९०५ ला प्रसिद्ध झालेल्या चिं.ग. गोगटेंच्या पुस्तकात जी वाघ्याचीच दंतकथा आलेली आहे ती मात्र भिरकावुन द्यायची...हा मात्र अजब न्याय आहे. ज्याबाबतीत कसलाही पुरावा उपलब्ध नाही तो घोष करायचा आणि दंतकथेच्या स्वरुपात का होईना जी बाब जनमानसात रुढ होती तिल मात्र सरळ सरळ धुत्कारुन लावायचे याला काय म्हणावे? ब्राह्मनांनी जर शिवरायांचा अवमान करण्यासाठी वाघ्या बसवला तर मुळात त्यांना शिवस्मारकच उभारायची काय गरज होती?



असो. मी या फोनकर्त्यांना, ते खरे असोत कि खोटे, खालील पर्याय दिले आहेत...



१. शिवस्मारक ब्राह्मणांनी बांधले म्हणुन वाद असेल तर सर्वप्रथम ते आताचे ब्राह्मणी स्मारक सरळ उतरवा. नवीन हवे तसे बांधा.

२. वाघ्याचे स्मारक हे अनैतिहासिक असून तेथे जर महाराजांच्या कोणत्याही राणीची वा अन्य राजपुरुषाची समाधी होती हे म्हणायचे असेल तर प्रथम वाघ्याच्या चबुत-याखाली तिरका छेद घेत कुपनलिका पद्धतीचे उत्खनन करा व प्राप्त अवशेषांची डी.एन.ए. टेस्ट करा व कार्बन डेटींगही करा.

यातुन सत्य काय ते सामोरे येईल व ते सत्य नाकारण्याची हिम्मत सुबुद्ध मराठी माणुस करणार नाही याबाबत मला तरी विश्वास आहे.

या माझ्या उत्तरावर ते निरुत्तर होतात ही वस्तुस्थिती असली तरी ते वाघ्याला उध्वस्त करणारच नाहीत या भ्रमात कोणीही शिवप्रेमींनी राहु नये.



माझ्या मते वाघ्याचे ते यथोचित स्मारक आहे व एका इमानी कुत्र्याचे स्मारक महाराष्ट्रात एका पवित्र स्थळी असावे याचा प्रत्येकाला अभिमानच वाटला पाहिजे. ते उध्वस्त करणे म्हणजे शिकारी वृत्तीच्या हिंसक मंडळीच्या प्राणिद्वेषाची परिसीमा असेल असे मला तीव्रतेने वाटते. बाकी महाराष्ट्रीय सुद्न्य आहेतच.

धन्यवाद.

Sunday, May 6, 2012

भविष्याचे तत्वद्न्यान






भविष्याचे कुतुहल कोणात नसते? अगदी अंधश्रद्धानिर्मुलनवालेही आपापले भविष्य रोज पेपरांत वाचत असावेत असा माझा कयास आहे. मीही वाचत असतो. आपापले भवितव्य जाणुन घ्यावे हा माणसाला पुरातन काळापासुन जडलेला छंद आहे. जगातील कोणताही समाज या जिद्न्यासेतुन मुक्त नाही. वैद्न्यानिकही यापासुन मुक्त नाहीत. विश्वाचे भविष्य व त्याचा शेवट कसा असू शकेल यावर अनेक सिद्धांत मांडले जातातच कि! जगबुडी येणार ते बिग क्रंच होवून विश्व नाश पावणार अशा अनेक व्युत्पत्त्या विश्वाच्या भवितव्याबाबत दिल्या जातातच. भुतकाळ आहे तर भविष्य असनारच यावर अविश्वास ठेवणारा कोणीही मानवप्राणी माझ्या पाहण्यात वा ऐकिवात नाही. काल...आज व उद्या ही निसर्गाची मांडनी नित्य अनुभवास येत असतेच. "काल" हा स्मृतिगम्य असतो तर आज हा अनुभवगम्य असतो तर नंतर वा उद्या हा काल्पनिक असला तरी काळ या अद्न्यात पटलावर भविष्यही कोठेतरी असनारच हा विश्वास वाटणे तसे तर्कशुद्ध व स्वाभाविक आहे. आणि ते भवितव्य निश्चितच असते त्यामुळे ते आजच वर्तमानात जाणुन घेता आले तर किती बहार येईल असा तर्क मानवी बुद्धीचा असतो. आणि त्यासाठी भविष्यकथनाच्या सोयी पुरातन काळापासुन मानवाने लावल्या आहेत व त्याच्या एवढ्या शाखा आहेत कि आधुनिक विद्न्यानही गोंधळुन जावे.



असो.



व्यक्तीचे भविष्य असते हे ग्रुहित आपण मान्य करुयात...कारण ते पुर्वनियोजित असो अथवा नसो...भवितव्य हे वर्तमानात येतेच हा आपला नित्य अनुभव झाला. काळ हा भुतकाळाकडुन भविष्याकडे वाहतो कि भविष्यतुन येत भुतकाळात विलीन होतो हा तत्वद्न्यानाच्या क्षेत्रातील नेहमी चर्चिला गेलेला विषय आहे. मीही माझ्या "शुन्य महाभारत" या कादंबरीत आणि "नीतिशास्त्र" या ग्रंथात यावर पुष्कळ चर्चा केलेली आहे. "काळ" ही राशी वैद्न्यानिक व तत्वचिंतकांना नेहमीच कोड्यात टाकत आलेली आहे. असे असले तरी काळ या राशी अस्तित्वात आहे पण तिचा नेमका संबंध कोणत्या विश्वतत्वाशी जोडावा हा संभ्रम आजही मिटलेला नाही. आईन्स्टाईन काळ-अवकाश ऐक्य कल्पत या विषयाचा निर्वाह लावू पहातात, परंतु अवकाश आणि काळ यांचे गुणधर्म सर्वस्वी भिन्न असल्याने अवकाश व काळ या राशी एकरुप मानण्यात अडचण येते. ही अडचण म्हणजे "एक बिंदु ते दुस-या बिंदुतील अंतर क्रमण्यासाठी लागणारे संदर्भ-अवकाश म्हणजे काळ." ही व्याख्या कामी येत नाही. प्रकाशाला जो वेळ लागतो तो प्रकाशवेगाची जी स्थिरांक म्हणुन योजना केलेली आहे तो प्रकाशवेग अनेक संदर्भव्युहांतुन प्रवास करत असतांना वेगवेगळा असतो. जर मुळात प्रकाशवेगच स्थिर नसेल तर तो स्थिरांक म्हणुन ग्रुहित धरणे व म्हणजेच E=MC2 हा सिद्धांत मान्य करणे ही एक मोठीच चुक होवून बसते. येथे काळ आणि अवकाश यांच्यातील तादात्म्य गृहित धरल्याने या सिद्धांतात मोठाच दोष निर्माण होतो. तसेच प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे मुलकणच (वा अन्य फोर्सेस) अस्तित्वात नाहीत असाही आविर्भाव या सिद्धांतातुन निर्माण होतो.



पण ते खरे नाही. "अंतर" हे अवकाशामुळे निर्माण होते. उदा. पृथ्वी ते सुर्य यात जे अवकाश आहे त्यामुळे हे अंतर मोजता येते. प्रकाशवेगाची संदर्भ चौकट वापरली तर पृथ्वी ते सुर्य हे अंतर सात मिनिटांत ओलांडता येईल. पण समजा ताशी साठ हजार कि.मी. या वेगाने एखादे अवकाशअयान निघाले तर? तर काळाच्या व्याख्या बदलतात. भविष्यही बदलते. म्हणजे काळ ही राशी वेगाच्या संदर्भ चौकटीशी अपरिहार्यपने बांधली गेली आहे असेच आपल्याला दिसते.



आईन्स्टाईन यांनी याचमुळे कि काय प्रकाशवेगाने एखादी व्यक्ती गेली तर त्याचे घड्याळ कसे वर्तन करेल याबाबत व्यापक सापेक्षतावाद सिद्धांतात चर्चा केलेली आहे. पण ती खरी नाही. घड्याळ मंद पडु शकत नाही. कारण मुळात प्रकाशवेगाची सीमांत रेखा हीच काल्पनिक आहे. एकार्थाने ती कविकल्पना आहे. भौतिक सत्य नाही. प्रकाशवेग हा अनेक भौतिक संदर्भ चौकटींत बदलता असतो हेच काय ते वास्तव आहे.



पण अवकाश म्हणजे नेमके काय? दोन बिंदुंमधील पोकळी म्हणजे अवकाश ही व्याख्या साधारणतया केली जाते. पण बिंदुअंतर्गतच्या अवकाशाचे काय करायचे? उदा. लघुत्तम घटक अणु हा बिंदु मानला तर अणुचा गाभा म्हणजे न्युक्लीयस हा समजा फुटबालच्या आकाराचा आहे असे कल्पिले तर मग जे इलेक्ट्रोन्स अणुगर्भाभोवती फिरतात ते दोन हजार किमी एवढ्या दूर अंतरावर असतात. म्हनजे अणुच्या आतही निखळ अवकाशच असते.



मग काळ आणि अवकाश यांचा नेमका संबंध काय हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावर विचार करणे आवश्यक आहे. आईन्स्टाईन यांचे अवकाश-काल वक्र हा सिद्धांत येथे कामी येत नाही. गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी ही अवकाश-काल वक्राची कल्पना केलेली आहे व ती निखळ अशी गणिती कल्पनाच आहे. पण येथे एकच बाब लक्षात घ्यावी लागते ती ही कि अवकाश गुणविरहीत नाही एवढे तरी आईन्स्टाईन यांनी मान्य केलेले आहे. अवकाश जर गुणविरहीत असेल तर त्याचा वक्र कसा बनेल? पण त्रुटी ही आहे कि आईन्स्टाईन यांनी फक्त अवकाशच नव्हे तर अवकाश-काल असा वक्र गृहित धरला आहे आणि त्यांच्या सिद्धांतातील हे फार मोठे न्युन आहे. अवकाश हे गुणरहित नाही हे ठीक आहे व योग्य आहे. परंतु अवकाश-काल ही एकच एकत्रीत राशी गृहित धरली तर मात्र समस्या निर्माण होते व ती म्हणजे जर अवकाशाला "गुण" आहेत तसेच "काळ" या राशीलाही स्वतंत्र गुण आहेत...वा अवकाश व काळाचे गुणधर्म समान आहेत.



मुळात भवितव्य हे अवकाशाच्याच संदर्भ चौकटीत घडत असते. काळ ही राशी पुढुन मागे येते कि मागुन पुढे जाते हा वाद सध्या बाजुला ठेवला तरी तिचाही संदर्भ भवितव्याशी असतोच. म्हणजे अवकाशाच्या अस्तित्वाखेरीज मुळात भविष्य या संद्न्येला अर्थ रहात नाही. कारण कथित भुतकाळ काय...वर्तमान काय व भवितव्य काय...हे अवकाशाच्याच मर्यादेत असते. काळ पुढुन मागे येवो अथवा मागुन पुढे येवो...भवितव्य वर्तमानात येणे हे मात्र अनिवार्यच असते.



आता प्रश्न असा आहे कि भविष्य हे खरेच पुर्वनिर्धारित असते काय? या सृष्टीचा कोणी नियंता आहे काय कि ज्याने काय कसे घडायचे याचे पुर्वनिर्धारण करुन ठेवले आहे? वा असे आहे काय कि मुळात विश्व हेच कालनिबद्ध नसुन काळ ही राशीच मुळात अतार्किक आहे? म्हणजे भुतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ या राशीच अस्तित्वात नसुन मनुष्यप्राणी केवळ त्या सोयीसाठी वापरत आहे असे असू शकेल? काल, आज व उद्या ही त्रिगुणात्मक ढोबळ कालव्युह आपल्याला परिचित असतो. आपापल्या संदर्भ चौकटीत ते स्वाभाविकही आहे, परंतु याच संदर्भ चौकटीची व्यक्तीगत परिमानेही चकित करतील एवढी भिन्न टोकाची असतात. भौतिक घतनांबाबत ब-यापैकी भवितव्य वर्तवता येत हे आपल्याला माहितच आहे. उदा. ह्यलेचा धुमकेतु किती वर्षानंतर अवतरनार हे सांगता येते. पण अमुक एक उल्का प्रुथ्वीवर नक्की कोसळेल कि नाही हे मात्र सांगता येत नाही. आजवर याबाबतचे सर्वच अंदाज सफ चुकलेले आहेत. पावसाची अनुमानेही अशीच असंख्यवेळा खोटी ठरतात. म्हणजेच स्थुलतेकडुन आपण जसजसे सुक्ष्मात येवू लागतो तसतशी भविष्याबाबतची अनुमाने चुकत जातात.



असे घडते कारण सुक्ष्माकडे येत असतांना संदर्भचौकटींत वारेमाप वाढ होत जाते. कोणती संदर्भ चौकट मुलभुत पाया मानायची ही समस्या निर्माण होते. उदाहरण घ्यायचे तर आपण जी जन्मकुंडली मांडतो (पद्धत कोणतीही असो) त्यात ग्रह, राशी व नक्षत्रांचाच प्रामुख्याने विचार केलेला असतो. ग्रह-नक्षत्रांचा मानवी जीवनावर अथवा वर्तनावर परिणाम होत असेल काय? ढोबळमानाने त्याचे उत्तर होय असेच द्यावे लागते. मानवी मेंदु हाच मुळात जैव-विद्युती-तरंगांचा निर्माता असून या अगणित तरंगांचा समुच्चय म्हनजेच मन होय. आता ही तरंग निर्मिती स्वयंभू अशी नसुन तिच्यावर बाह्य तरंगांचा (विद्युत, गुरुत्व, भू-चुंबकीय, सौर-चुंबकीय, प्रकाश ई.) परिहार्य असा परिणाम होत असतो. हे तरंग ग्रहित करने व त्यानुसार त्या तरंगांचे स्व-साक्षेपीय उत्सर्जन होणे ही एक भौतिकी प्रक्रिया आहे जी अव्याहत चालु असते. या सर्व तरंगांचा परिणाम साधारण नसुन व्यक्तिसापेक्ष परिणाम वेगवेगळे असतात, याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मेंदुतील जैव-रासायनिक व खनिज घटकांचे वितरण वेगळे असते. त्यामुळे व्यक्तिगत प्रतिसादही साहजिकपणेच वेगवेगळे असतात. आता असे समजा कि एका विवक्षीत क्षणी व्यक्ति एखाद्या एकाकी स्तंभावर उभी आहे व तिला त्या ठिकाणावरुन अन्यत्र नेवु शकणारे हजारो दोरखंड शेकडो दिशांनी पसरलेले आहेत. अशा स्थितीत कोणत्या दोरखंडावरुन जायचे हा निर्णय व्यक्तीलाच करायचा आहे. त्याचा हा निर्णय हा कधीही ख-या अर्थाने व्यक्तिगत नसून त्याच्यावर प्रभाव टाकणा-या बाह्य व अंतर्गत प्रतिसादाचा एकुणातील परिणाम असतो व तो त्या क्षणीचा निर्नय हाच त्याचे भवितव्यही ठरवत असतो असे म्हटले तरी त्यास वावगे म्हणता येत नाही.



आधीच म्हटल्याप्रमाने स्थुलाचे भवितव्य वर्तवने सोपे असते कारण स्थुलाच्या सापेक्षतेतील संदर्भ चौकटी अत्यल्प असतात. सुक्ष्माकडे आपण जसे जातो तसतसे संदर्भ चौकटींचे प्रमाण वाढत जाते व नेमक्या कोणत्या चौकटीला प्रधान्य द्यावे हे समजणे अशक्यप्राय होवून जाते. आपण कुंडलीबद्दल बोलत होतो. आपली कुंडली हीच मुळात पुरेपुर शस्त्रीय पायावर नसते त्यामुळे तिचे वाचन हा अत्यंत ढोबळ दिशा देणारा असतो.



उदा. १. राहु-केतु हे ग्रह नाहीत. चंद्र तर उपग्रह आहे. पण कुंडलीत ते प्राधान्याने येतात. खरे तर त्यांचे भौतिक अस्तित्वच नसल्याने त्यांचा मानवी मनावर प्रभाव पडण्याची शक्यता शुण्य आहे.

२. सुर्य हा ग्रह नसुन तारा आहे, परंतु कुंडलीत मात्र त्याला ग्रहाप्रमाणेच वागवले असून तदनुरुप फले सांगितलेली असतात.

३. ग्रह, राशी व नक्षत्रे यांचे एकुणतील अंतर व त्यांचा मानवी जीवनावर पडनारा नेमका प्रभाव मोजण्याचे कोणतेही शास्त्र नाही. तसा अभ्यास नाही. वा तशी प्रायोगिक निरिक्षने करत हे शास्त्र निर्माण केले गेलेले नाही. सांगितलेली फले ही अक्षरश: अंदाजितच असतात. काही अंदाज खरे तर बहुतेक खोटेच ठरतात ते यामुळेच.

४. व्यक्ति जेथे निवास करत आहे तेथील सापेक्ष भु-गुरुत्व व भु-चुंबकत्वाचा या शास्त्रात मुळीच विचार केला गेलेला नाही.


थोडक्यात ज्याही कधीकाळी हे शास्त्र (?) निर्माण झाले त्या कालात जी अवकाशशास्त्रची अल्प-स्वल्प माहिती होती त्यावरच या शास्त्राची आजही मदार आहे. त्यात कोणीही नवीन संशोधन केलेले नाही. उलट जेवढे पुरातन ग्रंथ (उदा. नाडीग्रंथ) तेवढे ते अचुक असा अशास्त्रीय समज लोकांत व हे शास्त्र सांगणा-या तथाकथित लोकांत आहे. त्यामुळे या शास्त्राला ख-या शास्त्राचे स्वरुप कधीच आले नाही वा येण्याची शक्यताही नाही.


मग भवितव्याचे काय करायचे? ते असते कि नसते? नसेल तर विश्व हे अत्यंत विस्कळीतपणे चाललेले असून त्याला कसलीही निश्चिओत दिशा नाही असे म्हनावे लागते. "परमेश्वर जुगार खेळत असला पाहिजे" हे आईन्स्स्टाइन यांचेच म्हणणे खरे धरावे लागेल. आणि जर निश्चित असे भवितव्य असेल तर मग ते नेमके काय हे कळायचा एक वैश्विक घटक म्हणुन आपला नैसर्गिक अधिकार असला पाहिजे. कोणत्या भविष्याला चांगले व कोणत्याला वाईट म्हणायचे हे पुन्हा सापेक्ष परिणाम आहेत असे गृहित धरले तरी ते जर निश्चित असे असेल तर ते समजायला काही शास्त्र असु शकणार नाही काय?


माझ्या मते असू शकते. अवकाश अनंत नसून ते वस्तुमानच्या प्रमानातच, म्हणजे जर सीमित आहे तर काल हाही अनंत नसून तोही सीमित आहे व तोही वस्तुमानसापेक्षच आहे. काळ व अवकाश या दोन्ही स्वतंत्र राशी असून परस्पर निबद्ध आहेत. व्यक्ति हेही एक वस्तुमानच असल्याने त्याच्यातच तिन्ही काळ एकत्रीतपणे सामाविष्ट आहेत. त्यामुळे भुतकाळ व वर्तमानकाळ हे जर वास्तव आहे तर भविष्य हेही अर्थातच एक वास्तव आहे व ते कसे असनार याचा नेमकेपणा सर्व संदर्भ-चौकटींच्या परिप्रेक्षात ठरवता येवू शकतो...अर्थात त्यांचे नीट आकलन व शास्त्रीय पायावरच विश्लेषन असेल तरच!

Saturday, May 5, 2012

संजय सोनवणी: प्रकाशित साहित्य


संजय सोनवणी प्रकाशित साहित्य

 

1.म्रुत्युरेखा  

2.विश्वनाथ

3. अंतिम युद्ध  

4. ब्लडी आयलंड,

5.शिल्पी

6. रक्तराग

7. महाद्वार

8.अंतिम युद्ध

9.वार टाईम

10.पराभव

11. अपहरण

12.
धोका

१३. असुरवेद

१४. : थेंब...थेंब म्रुत्यु...(एड्सवरील भारतातील पहिली कादंबरी.)


१५. बिजींग कोन्स्पिरसी,

१६. रक्त हिटलरचे,,

१७. ब्ल्यकमेल,

१८. डेथ ओफ़ द प्राइममिनिस्टर ,

१९. गुड्बाय प्राइममिनिस्टर,

२०. आभाळात गेलेली माणसं

२१. अखेरचा सम्राट ,

२२, ...आणि पानिपत,

२३.क्लीओपात्रा 


२४. शुन्य महाभारत

२५. कल्की,

२६.यशोवर्मन

२७. सव्यसाची  

२८. काळोख  

२९.खिन्न रात्र  

३०. विकल्प  

३१. खळबळत्या सागरकाठी  

३२.अखेरचे वादळ

३३. अश्वत्थामा,

३४. ओडीसी

३१.फराओचा संदेश

३२. फराओच्या शोधात

३३. रक्तरंजित आर्यन

३४. स्पेस ब्राव्हो

३५. वैद्न्यानिक संशोधन: अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती


३६.  नीतिशास्त्र,

३७. ब्रह्मसुत्र रहस्य

३८.  हिंदु धर्माचे शैव रहस्य, (३ आवृत्त्या)

३९. विट्ठलाचा नवा शोध,

४०. भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर,

४१. महार कोण होते?,

४२. झंझावात

४३.भाषेचं मूळ

४४. आदमची गोष्ट
४५.  मुंबई २६/११...पुर्वी आणि नंतर, (दोन आवृत्त्या)

४६. प्रेम कसे करावे? (६ आवृत्त्या),

४७. सद्दाम हुसेन: एक झंझावात,

४८.  ब्राह्मण का झोडपले जातात? (२ आवृत्त्या),

४९.  कोर्पोरेट विलेज: एक गांव:एक कंपनी:एक व्यवस्थापन,

५०.  दहशतवादाची रुपे

५१. काव्य संग्रह: प्रवासी,

५२. पर्जन्यसुक्त,

५३. संतप्त सुर्य

५४. नाटक: मीच मांडीन खेळ माझा,

५५. राम नाम सत्य हे!,

५६. विक्रमादित्य,

५७. रात्र अशी अंधारी,

५८. गड्या तु माणुसच अजब आहेस.

५९. बाल/किशोर साहित्य: रानदेवीचा शाप,

६०.  साहसी विशाल,

६१.  रे बगळ्यांनो,

६२. सोन्याचा पर्वत

६३. दुष्ट जोनाथनचे रहस्य,

६४. रत्नजडीत खंजिराचे रहस्य,

६५. सैतान वज्रमुख,

६६. अंतराळात राजु माकड,

६७.  नरभक्षकांच्या बेटावर विजय.

६८. इन्ग्रजी: Death of the prime minister

६९. On the brink of Death

७०. The mattalions

७१. The Jungle

७२. Last of the wanderers

७३. The Awakening

७४. Raging Souls

७५. Heart of the Matter (full length play)

७६. Monsoon Sonata (Poetry)


७७. Origins of the Caste system

78. Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation

79. Land Determines: The Formations of the Group Languages

80. Lalitaditya: the Great Emperor of Kashmir

81.The  Beijing Conspiracy

82. जातीसंस्थेचा इतिहास

८३. मी मृत्युंजय मी संभाजी

८४. शिक्षण विचार

८५. काश्मीरचा सम्राट ललीतादित्य

८६. प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास

८७. धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास

८७. एक गांव: एक कंपनी “ एक व्यवस्थापन –कार्पोरेट व्हिलेज

८८.वाघ्याचे सत्य

८९. कुशाण  

९०. हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास

९१. पावनखिंड ३०३ (श्राव्य नाटक)


अन्य:

१) चित्रपट: अमानुष: एक थरार

अखेरचे वादळ (निर्माणाधीन)



२) संगीत: मनात माझ्या (गीत-संगीत-गायन), ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश), इट्स माय ड्रीम (संगीत-गीत)



संकीर्ण: किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत व दैनिकांत शेकडो लेख.

१०-१२ श्राव्य माध्यमातील कथा

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...