Thursday, October 28, 2010

सखी स्वस्त झाल्या खारका

सखी स्वस्त झाल्या खारका
आता तरी खाशील का...खाशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...

बघतो तनु...झालीस धनु...
इतके सुकने हे बरे गं का?
खावुन जरा या खारका
हे वाळणे दुर करशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...

सुकला असे माझा खिसा
तु सुकणे पण बरे नव्हे
मजसाठी केले दिव्य किती..
भलतेच दिव्य मज मान्य नसे
भाव उगा विचारतेस का?
सखी स्वस्त झाल्या खारका....


(konitari FB var kharakaancha vishay kaadhala mhanun he ek vidamban...)

Tuesday, October 26, 2010

बहुजन नव्हे: शैवजन म्हणा!

आज जे स्वता:ला बहुजन समजताहेत त्यांना आपली सांस्क्रुतीक आणि धार्मिक पाळेमुळे अनेकदा माहित नसतात. भारतात सर्वात प्राचीन, सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेला धर्म म्हनजे मुर्तीपुजा प्रधान शैव धर्म. नमुचि, व्रुत्र, बळी, कपिल, जनक इ. महान पुर्वजांनी या संस्क्रुतीला घडवले. भारतत इ.स.पु. २५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला धर्म म्हणजे यद्न्यिक कर्मकांड असणारा वैदिक धर्म. या धर्माला मुर्तीपुजा मान्य नव्हती. ते शिवपुजेविरुद्ध होते. त्यांचा अत्मा, पुनर्जन्म, मोक्ष आदि शैव संकल्पनांवर विश्वास नव्हता. पुरे करुन राहण्याला त्यांचा विरोध होता. पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता तर शैवजन हे क्रुषीसंस्क्रुतीचे. देश-विदेशात व्यापार करणारे.

गौतम बुद्धाच्या उदयानंतर स्थिती पालटली. गौतम बुद्धाचा धर्म म्हनजे वैदिक धर्माची पुढची अवस्था होती...आणि तो शैवविरोधी होता. त्याने यद्न्ययागांचा तिरस्कार केला नाही..फक्त त्यातील पशुहिन्सेविरुद्ध प्रचार केला. त्याची "आर्य"सत्ये जगजाहीर आहेत. तोही वैदिकांप्रमाणेच आत्मा, पुनर्जन्मादि कल्पनांवर विश्वास ठेवत नव्हता. "वेद हे उत्तमच पण काही ब्राह्मणांनी त्यांचे विक्रुतीकरण केले एवढाच त्याचा आक्षेप होता.

पण या धर्मात वैदिकही घुसले पण त्याहुनही मोठ्या प्रमाणात शैवजन घुसले. येथेच शैव धर्माचा र्हास सुरु झाला. शैव परंपरा १००० वर्षांच्या काळात जवळपास विस्म्रुतीत गेल्या. वैदिकांनी या काळात असुर संस्क्रुतीचे जेही काही श्रेश्ठ होते ते पुरते बदनाम करुन टाकले. असुर, राक्षस, नाग, पणी, इ. मानवी समुह शिविवाचक बनले. (शिवी" हा शब्दही शिवाला बदनाम करण्यासठी वापरला गेला. पुढे भारतातुन बौद्ध धर्माचा पुरता नाश झाला...आणि जे आपल्या पुरतन धर्माकडे आले खरे पण त्यांना आत यायला एकच दरवाजा उरला...तो म्हणजे "शुद्र".

आणि याच काळात वैदिकांनी परकियांनी दिलेले नाव धर्माला चिकटवुन घेतले...ते म्हणजे "हिंदु". त्यापुर्वी असे नव्हते. हा आजचा "हिंदु" धर्म म्हनजे वैदिक आणि शैव या दोन विभिन्न धर्मधारांचे एक विक्रुत कडबोळे बनला आहे. शुद्रांना वेदबंदी होती कारण सरळ आहे ते कधी वैदिकच नव्हते. पण बौद्ध धर्मात जावुन त्यांनी स्वत:च्या परंपरेला खंडित केले हेही खरे. बौद्ध धर्म चांगला कि वाइट हा प्रश्न येथे नाही. पण बौद्ध धर्म नंतरच्या काळात अध:पतीत होत गेला हे खरे. नंतर जरी ते पुन्हा शैव उद्घोष करु लागले असले तरी वैदिकांनी त्यालाही "वैष्णव" पाचर ठोकली. विष्णु हा ऋग्वेदातील अत्यंत गौण देव...पण त्याला शिवाच्या बरोबरीला आणुन ठेवले आणि शैव-वैष्णव झगडा लावुन दिला. पण पौरोहित्याचा अधिकार बव्हंशी आपल्याच हाती ठेवला. एका अर्थाने ब्राह्मणांचेही हे अर्धवट धर्मांतर होते...म्हणजे मुर्तीपुजा वैदिक धर्माला मान्य नसुनही ते मुर्तीपुजक बनलेच पण स्वत:च्या वैदिक प्रथा-परंपराही पाळत बसले. त्यातुन जी विक्रुती निर्माण झाली त्यातुन ब्राह्मण समाजही अजुन सुटला नाही. आणि धर्मात परत आल्यावर बहुजनांनी मुर्तीपुजा पुन्हा स्वीकारली असली तरी मुळ तत्वधारा, तत्वद्न्यान ...जे त्यांच्या पुर्वजांचे होते...तो मधल्या प्रदिर्घ काळात तेच विसरला आणि गुलाम बनला. थोदक्यात बौद्ध धर्माने एक पुरातन संस्क्रुतीच दुषित करुन टाकली. बरे बौद्ध धर्मही टिकुन राहीला असता तरी हे सांस्क्रुतीक अभिसरण घडले नसते.

असो. हा इतिहास आहे. शैव परंपरा जेवीत करत नेत, वैदिकांनी ज्या-ज्या दैवतांचे अपहरण केले आहे त्यांना मुक्त करणे हे खरे शैवजनांचे ध्येय असले पाहिजे. त्याचवेळीस ती सांस्क्रुती, त्यातील उदात्तता आणि वैभव पुन्हा प्राप्त केले पाहिजे. स्वत:ला बहुजन न समजता अभिमानाने "शैवजन" म्हटले पाहिजे. ( याचा नव्या शिव धर्माशी काही एक संबंध नाही)

आम्हा बहुजनांना नेमके काय हवे आहे?

ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा मुळात नवा नाही. या वादातुन फुले, आंबेडकर, शाहु महाराज यांच्या वैचारिक आणि क्रुतीशील द्रुष्टीकोनातुन अनेक क्रांतिकारी सामाजिक बदल घडले. सर्वांनीच नसले तरी ते बव्हंशी समाजाने...राज्यघटनेनीही ते मान्य केले त्यातुन बहुजनांना प्रगतीचे दरवाजे उघडले. आजवर बंद असलेली शिक्षणाची द्वारे, अगदी स्त्रीयांसाठीही, उघडली. अनेक बहुजनांनी/दलितांनी त्यातुन उंच झेपा घेत जगाला चकित केले.
पण...
आज हा वाद ज्या पद्धतीने सुरु आहे तो बहुजन आणि दलितांना कोणत्या दिशेने घेवुन चालला आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वता:ला विचारायला पाहिजे. यातुन काहीतरी सकारात्मक निर्माण व्हावे, बहुजनांची आर्थिक उन्नती व्हावी हा या वादाचा हेतु आहे कि केवळ द्वेषमुलक भावना निर्माण करणे हा हेतु आहे?
ब्राह्मण्यवादी संघटना मुस्लिमांचे शिर्कान करावे या मताच्या आहेत व तसे प्रयत्न ते करत असतात. करतही राहातील. तसेच आता काही बहुजन धरती/देश नि:ब्राह्म्ण करा असे म्हनत आहेत...उद्या तेही तसे प्रयत्न करतील...मुद्दा हा आहे कि मग ज्या ब्राह्मण्वाद्यांचा तुम्ही तिरस्कार करता त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय? त्यांची संस्क्रुती तुम्हाला (मलाही) अमान्य जर आहे तर त्यांच्याच संस्क्रुतीचे पुन्हा अनुसरन करुन तुमची स्वत:ची संस्क्रुतीच नाही हे सिद्ध करण्याचा येडचापपणा का करता?

स्वत:ची संस्क्रुती शोधणे आणि तिचे प्रामाणिक अनुसरन करणे याला आपण आपापली संस्क्रुतीनिश्ठा म्हणु शकतो. तसे प्रयत्न केले जावेत. गतकाळातील चुकांबद्दल...मग त्या कोणाच्याही असोत...धि:कार केला जावा आणि त्या चुका पुन्हा होणार नहीत यासाठी प्रयत्न करावा...यालाच आपण सामाजिकता म्हनतो. पण ज्यांचा तुम्ही द्वेश करता त्यांच्याप्रमणेच वागु लागलात आणि गरळ ओकु लागलात तर ते चुकिचे होइल. आणि त्यातुन काहीएक साध्य होणार नाही...

माझा एक कट्टर ब्राह्मण वाचक माझा मुस्लिमांच्या योगदानाबद्दलचा लेख वाचुन मला म्हणाला: सारे मुसलमान मारुन टाकले पाहिजेत. मी म्हणालो...ओ.के. मी पुढे होतो...पण एक सांगा १८ कोटी मुसलमानांना मारायचे कसे आणि सर्वांना मारुन टाकले तर गाडायचे कोठे येवढे सांगा. तो निरुतर झाला. हिटलरला सर्वसत्ताधीश असुन सारे ज्यु मारता आले नाहीत, तर आता बहुजन सर्व ब्राह्म्णांना कसे मारणार हे मला सांगा.

आणि हीच तुमची संस्क्रुती आहे का?

मला वाटते हा वाद एका मुर्खपणाच्या टोकाला नेला जात आहे. त्यामागे कोणाचे काय स्वर्थ आहेत ते त्यांचे त्यांना माहित. पण यामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही...सुटनार नाही हेही तेवढेच खरे.

बव्हंशी ब्राह्मण समाज वा नेत्रुत्व हे अडेल्तट्टु आहे. ते दादोजी हा शिवरायांचा बाप होता आणि रामदास हा गुरु होता ही पाल्हाळ अपवाद वगळता चालुच ठेवणार. त्याला प्रतिवाद कसा करावा याचाच बहुजनांत संभ्रम आहे. याला दुसरे कारण असे कि मुळात बहुजनीय विचारवंतांची (आताच्या) भाषाच भरकटलेली आहे आणि त्यामागे "संशोधन" वा शिवरायांप्रती आदर हे खरे कारण नसुन राजकारण झाले आहे. तरुणांची टालकी फिरवता येतात...ते फिरवतात...त्यात खरा रास्त संताप विरघळुन जातो याचे भान नाही.

ब्राह्मणांनी दादोजींचा पुतळा स्वता: हटवावा हे आव्हान मी जाहीरपणे केले होते. ददोजींबद्दल्ची खरी हकीकत मी फ़ेसबुकवर व ब्लोग वर मांदली होती आणि तो लेख पुण्यनगरीने प्रकाशितही केला होता. या क्षणापर्यंत त्या लेखात काही अनैतिहासिक आहे असे कोनता ब्राह्मण संशोधक सांगायला आलेला नाही. खरे तर ब्राह्मणांना काही संस्क्रुती असेल तर स्वत: पुढे येवुन तो पुतळा आजही हटवावा...पण ब्राह्म्न समाजही हटलेला आहे आणि बहुजन तो पुतळा हतवुन मुरारपंत जगदेवाचा पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवतांनाचा पुतळा बनवण्याच्या विचारात नाहित.

मग हवे काय आहे?

फक्त द्वेष...

पण हे एक उदाहरण झाले. अशी अनेक आहेत. आर्यवादाचा निकाल अजुनही कोणी लावत नाही. ब्राह्मण विचारवंत परस्परविरोधी आणि अनैतिहासिक वतवट करतात...बहुजन खालच्या पातळीवर येवुन त्याला प्रत्युत्तर देतात. पण मला वाटते ब्राह्मणांना महत्वच का देता? त्यांनी धर्म बिघडवला...जातीव्यवस्था निर्माण केली...भुतकाळात अनंत खोटी आख्याने रचुन आपल्याला भ्रमित केले...
हरकत नाही...आता तर ते सत्य आपल्याला समजले ना? ते लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, त्यंच्या मानसिकतेत बदल घडवण्याऐवजी, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेळ देण्याऐवजी ही "द्वेष मोहीम" का?
मग तरीही "मी मराठा", "मी बौद्ध" "मी ओ.बी.सी" सारख्या जातीयवादी भाषा का वापरता?

यामुळे तुम्हीही जातीयवादीच आहात हे सिद्ध होते आणि ज्या ब्राह्मणांविरुद्ध तुम्ही तथाकथित येल्गार पुकारला आहे...तेच जिन्कले आहेत असेच मला म्हणावे लागत आहे.

जर जातीव्यवस्था ब्राह्मणांची उपज आहे तर ती नष्ट करण्यातच बहुजनंचे अन्तिम ध्येय असले पाहिजे. ब्राह्मण-ब्राह्मण करत...त्यांना शिव्या देत बसल्याने जर बहुजनांचे कल्याण होणार असेल तर चला तेच करत राहु...पण तो आपलाच पराभव असणार आहे. गतकाळात त्यांनी आपल्याला नागवले ही तक्रार असेल ती तेवढापुरती ठीकही आहे...पण आता आपण स्वत:च नंगे व्य्हायला लागलो आहोत त्याची जबाबदारी फक्त आपल्यावरच राहणार आहे. स्वत:च्या नालायक्या लपवण्यासाठी ब्राह्मणी संस्था मुसलमानांना टारगेट करतात...तुम्ही ब्राह्मणांना.

स्वत:ची संस्क्रुती आधी ओळखायला शिका...एवढेच सांगणे.

Thursday, October 14, 2010

ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा

ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्ह्मण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.

"ब्राह्मण" हा एके काळी फक्त वर्ण होता. "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण" ही ऋग्वेदाची व्याख्या आहे, मग त्याचा अन्य व्यवसाय काहीही असो. उपनिषदांच्या द्रुष्टीने पाहिले तर "ज्यालाही ब्रह्माचे द्न्यान आहे तो ब्राह्मण." महाभारतात युधिष्ठीराने " ज्याच्या अंगी द्न्यान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यद्न्यकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय."

वरील व्याख्या पाहिल्या तर वरील अर्थाने "संपुर्ण ब्राह्मण" म्हनता येइल असे मुळात किती ब्राह्मण आहेत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे "ब्राह्मण" आणि "ब्राह्मण्य" हा खरे तर कळीचा मुद्द बनण्याचे काहीएक कारण नाही. परंतु जन्माधारीत जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण हे ब्राह्मणच आहेत, परंतु त्यांचे वर्ण म्हणुन आजचे स्थान काय हाही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जात म्हणुन ब्राह्मण असणे आणि वर्ण म्हणुन ब्रह्मण असने यात मुलभुत फरक आहे आणि तो फरक खुद्द ब्रह्मण समाजालाच न समजल्याने हा घोटाळा झाला आहे.

पण ज्याअर्थी तो घोटाळा झाला आहे त्या अर्थी ब्राह्मणपक्षांची काहीतरी गफलत होते आहे.

म्हणजे वैदिक वर्णाधारित अर्थानेही आम्ही उच्च...आणि जात म्हणुनही उच्च असा काहितरी ग्रह झाला आहे.
ब्राह्मण हा वर्ग परंपरेने कथीत हिंदु धर्माचा "पुरोहित" मानला आहे. पण पुरोहित फक्त ब्राह्मणच आहेत असे नाही हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. पण जर ब्राह्मण हा धार्मिक पुरोहितच असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात विभेद मानण्याचे कारण नाही. प्रत्येक धर्मियांना परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याच्यापर्यंत आपली कर्मकांडात्मक अर्चना पोहोचवण्यासाठी पुरोहितवर्गाची गरज भासते. हा समाजानेच त्या वर्गाला दिलेला अधिकार असतो. हे जगभर झाले आहे. त्यामुळे प्रसंगपरत्वे धर्मनियम बदलणे, अखिल धर्मियांच्या धार्मिक हिताची काळजी वाहणे हे पुरोहितांचे कर्तव्य असते तर त्या बदल्यात दान, दक्षिणा, देणग्या इ मार्गाने त्यान्च्या चरितार्थाची सोय लावणे व संरक्षण देणे ही उर्वरीत समाजाची जबाबदारी असते.
पुरोहित हा समाजाच्या नैतीकतेचा आदर्श मानला जाणे स्वाभावीकच होते आणि ते तसे झालेही. मनुस्म्रुती ते मिताक्षरीपर्यंत ब्राह्मणांवर जेवढे कठोर आचार-विचारादि नैतीक बंधने आहेत ती त्यामुळेच. ब्राह्मणाने शेती करणे, व्यापार करणे, शस्त्र हाती घेणे इ. निषिद्धे आहेत. असे करणारा ब्राह्मण तात्काळ धर्मबाह्य होइल अशी स्म्रुत्योक्त तरतुद आहे.

पण जर इतिहास पाहिला तर असे दिसते की ब्राह्मणांनीच या स्म्रुती धाब्यावर बसवल्या. महाभारतात द्रोणाचार्य, क्रुपाचार्य हे ब्राह्मण असुनही शस्त्र हाती घेउन युद्ध करतांना दिसतात आणि द्रोणाचर्यांच युद्धातील म्रुत्युस कोणी "ब्रह्महत्या" म्हनत नाही...कारण त्याने वर्ण बदलला आहे. २ -या शतकात पुष्यमित्र श्रुंग हा ब्रुहद्रथ राजाची हत्या करुन सत्ताधारी बनुन हजारो बौद्धानुयायांची कत्तल करतांना दिसतो. शेती ते व्यापार यात ब्राह्मण हिरिरेने पडलेले दिसतात. "सेवा" धर्म त्याज्य असुनही ते सेवकही बनलेले दिसतात. आता तर अनेक ब्राह्मण त्यांना धर्मोक्त अति-त्याज्य अशाही सेवा-व्यवसायांत आहेत.
स्म्रुतींचा आधार घेतला तर असे सर्व ब्राह्मण आज मुळात "ब्राह्मण" म्हनवुन घेण्यास पात्र नाहीत असे स्पष्ट दिसते. केवळ जन्माधारीत ब्राहमण्य म्हणजे "ब्राह्मण" अशी सोयिस्कर भुमिका ब्राह्मण समाजाने घेतली आहे. स्वत: एकाही धर्मनियमांचे पालन करत नसता इतरांनी मात्र ते केलेच पाहिजे आणि ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे, वेदांचा, वैदिक संस्क्रुतीचा अभिमान बाळगलाच पाहीजे, वैदिक धर्माचा सन्मान अवैदिकांनीही ठेवलाच पाहिजे अशा प्रकारची भुमिका काही ्ब्राह्मण विव्द्वान घेतात त्यातुनच या वादंगाचा जन्म झाला आहे. आणि तो अभिमान बाळगावा अशी अपेक्षा ठेवित, इतर दोन वैदिक वर्णांना जवळपास धर्मबाह्य करीत त्याच परधर्माचे पुरोहित म्हणून मिरवण्याची असांस्क्रुत भुमिका दिसते. थोडक्यात वर्णाश्रमाचे स्वत: कोनतेही नियम पाळायचे नाहीत आणि वर वैदिक संस्क्रुतीचा टेंभा मिरवीत सांस्क्रुतीक वर्चस्ववाद गाजवण्याचा प्रयत्न करायचा यालाच सध्या "ब्राह्मणवाद", माझ्या मते याला वैदिकवाद म्हणतात. वैदिकवाद म्हणून त्याचा ब्राह्मण्याशी संबंध नाही, कारण वैदिक असल्याची श्रेष्टा ते मनोभावे जपत असले तरी ब्राह्मण या वैदिक संज्ञेपासून, ज्या स्म्नृतींचा ते गौरव करतात त्या स्मृत्यांपासून त्यांचे व्यावहारिक आचरण कधीच तडीपार झालेले आहे.

वर्ण नव्हे फक्त जात

ब्राह्मण हा वर्ण आहे. पण आता ब्राह्मण वर्ण हा जवळपास ५५० उपजातींत वाटली गेलेली "जात" आहे. या जातींत आपापसात संघर्ष आणि मद-मत्सर आहेत. महाराष्ट्रापुरते पहिले तरी देशस्थ, क-हाडे, कोकनस्थ असे वाद आहेतच आणि त्याचा संसर्ग त्या-त्या ब्राह्मण उपजातीन्तील विद्वानांनाही लागलेला आहे. असे असले तरी या समाजाची स्वतंत्र सामाजिक वैशिश्ट्ये आहेत. हजारो वर्ष शिक्षणक्षेत्रात (भले घोकंपट्टी का असेना) राहिले आहेत. त्या जोरावर प्रतिष्ठा-संपत्ती प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांची अशी वैशिष्ट्यपुर्ण जीवनशैली आहे. आजचा मोठा मध्यमवर्ग-उच्च-मद्धय्मवर्ग याच समाजातुन आला आहे. जेही कोणी अन्य-जातीय प्रगती साधत या मध्यमवर्गात प्रवेश करतात ते स्वाभावीकपणे ब्राह्मणांच्या जीवनशैलीचे अनुकरण करतात वा करण्याचा प्रयत्न करतात. असे जगभर घडत असते. ब्राह्मण वर्ग आज अमेरिकन जीवनशैली हळुहळु स्वीकारु लागला आहे. इतर वर्गालाही त्याची लागन झाली आहे. सोविएट रशियात अशा वर्गाला निंदाजनक अर्थाने "बुर्झ्वा" म्हटले जायचे. आता येथे त्यालाच "ब्राह्मण्यग्रस्तता" असे म्हटले जाते. किंबहुना असे म्हणणार्यांना तोच अर्थ अभिप्रेत असावा. आणि परिवर्तनाला विरोध करु पाहणार्यांचा एक वर्ग समाजात असतोच आणि तो अशा वेगळ्या जीवनशैली जतन करणार्यांची हेटालणी करत असतो.

परंतु, प्रश्न असा आहे कि ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात भेद करता येइल काय?

ब्राह्मण ही जात मानली आणि केवळ एक जात म्हणुन तिच्याकडे पहायचे ठरवले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वैदिक अर्थाने वेगळे आहे असे म्हणता येइल. जो धर्माचा पुरोहीत आहे, जो समाजाच्या पारलौकिक हिताची काळजी वाहतो त्या ब्राह्मणात ब्राह्मण्य आहे असे म्हनता येइल. किंवा जीही कोणी व्यक्ति समाजास द्न्यान देण्यासाठी कटीबद्ध आहे, वा संस्क्रुतीत मोलाची भर घालत आहे अशा व्यक्तींतही ब्राह्मण्य आहे असे म्हणता येइल. त्या अर्थाने ब्राह्मण्य हे आदरार्थीच घ्यावे लागेल. खरे तर आजचे बव्हंशी ब्राह्मण असे धर्मोक्त/वेदोक्त ब्राह्मण्य पाळत नाहीत आणि तरीही श्रेश्ठत्वाच्या व वैदिक वर्चस्वतावादाच्या भावना बाळगतात म्हणुन ते निंदेस पात्र झाले आहेत असे म्हणावे लागेल.

थोडक्यात जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत.

ब्राह्मणांनी "द्न्यान" कोंडले असा एक ब्राह्मणांवर आरोप आहे. कै. नरहर कुरुंदकर या संदर्भात म्हणतात "ब्राह्मणांनी त्यांचे द्न्यान उधळुन वाटले असते तरी समाजाला त्याचा काही एक उपयोग नव्हता कारण मुळात ते द्न्यान समाजोपयोगी नव्हते." मी त्यांच्या मताशी सहमत आहे. त्या द्न्यानाचा उपयोग अन्य समाज सोडा, खुद्द त्यांनाही (ब्राह्मणांनाही) झाला नाही अन्यथा त्यांना इतरांच्या व्यवसाय-धंद्यांत पडावे लागले नसते. त्यामुळे एक जात म्हणुन उरलेला आणी तरीही वैदिक वर्णश्रेष्ठता जपणारा असा हा ब्राह्मण समाज आज एका विलक्षण टीका-गर्तेत अडकला आहे आणि तो गुंता सोडवणे एक मोठे आव्हान आहे.

ब्राह्मणंनी पौरोहित्य हाच आपला व्यवसाय ठेवणे आताच काय गेल्या हजारो वर्षांत शक्य नव्हते. ब्राह्म्णांची ५% लोकसंख्या ग्रुहीत धरली तर दर १९ मानसांमागे १ पुरोहित अशी वाटणी होते आणि मग त्यांचा उदरनिर्वाह लागणे अशक्य होते व आहे ही वस्तुस्थीती आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी प्रसंगपरत्वे व्यवसाय बदलले असले तरी ते योग्यच आहे. त्यांनी इतिहासात वंशपरंपरेने दरोडे घालण्याचेही उद्योग केले आहेत. सेनार्तने "बुंदेलखंडातील ब्राह्मण वंशपरंपरेने दरोडेही घालण्याचा उद्योग करत असत आणि त्यांना प्रतिश्ठाही होती." असे नमुद केले आहे. थोडक्यात जीवनयापनासाठी ब्राह्मणांनी जवळपास सर्वच क्षेत्रे निवडली असे स्पष्ट दिसते आणि त्यात चुकीचे काहीएक नाही.

परंतु असे करत असतांना "ब्राह्मण" असल्याचा अहंकार, श्रेष्ठत्वाचा अहंकार त्यांना अभावानेच सोडता आला आहे असेही दिसते.

ब्राह्मण अल्पसंख्य?

आपण अल्पसंख्य आहोत असे ब्राह्मण समाजाचे एक दुखणे आहे. भारतातील जवळपास ४५०० जाती पाहिल्या आणि एकुन लोकसंख्येशी तुलना केली तर भारतातील प्रत्येक जात एकेकट्या पातळीवर अल्पसंख्य तर कधी अति-अत्यल्पसंख्य असल्याचे दिसेल. त्यामुळे आम्हीच अल्पसंख्य आहोत असे समजण्याचे ब्राह्मणांना मुळात काही कारण नाही. किंबहुना अशाच अल्पसंख्यांची एकुणातली गोळाबेरीज म्हणजे आजचा कथित हिंदु धर्म. पण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी संद्न्या लावली आणि इतर समाज विरुद्ध ब्राह्मण असे समीकरण मांडले तरच ब्राह्मण अल्प्संख्य ठरतात, पण ते वास्तव नाही. ती ब्राह्मण समाजाने स्वता: करुन घेतलेली वंचना आहे. वा त्यात त्यांचे काही राजकारण असेल. मायावतीने ब्राह्मण समाजाचा उपयोग करुन घेतला(?) हा अलीकडचाच इतिहास आहे आणि तसेच राजकारण महारष्ट्रात खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला हाही अलीकेडचाच इतिहास आहे. पुण्यात डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या पक्षाने तिकिट दिले यामागे तोच हेतु होता. येथे ते कथित सोशल इन्जिनीयरीन्ग सपशेल फसले.

पण मुळात ब्राह्मण समाज वापरला जावु शकत नाही, तो वापरला गेल्याचे दाखवुन वापरुनच घेणार हे मायावतींच्या लक्षात आलेले दिसत नाही.

असे का याचे उत्तर नजिकच्या स्वतंत्र्यपुर्व काळात ते आजवरच्या ब्राह्म्णी राजकिय ते कथित सामाजिक संघटणांच्या उद्दिश्टंत व प्रत्यक्ष कार्यात आहे. त्यांच्या कार्याचा फायदा सर्वच ब्राह्मणांना मिळाला आहे असे मात्र चित्र नाही. पण या संस्था/संघटना ब्राह्मण व पर्यायाने ब्राह्मणी (बुर्झ्वा) संस्क्रुतीचे अनुसरण करणार्यांवर प्रचार-प्रसार माध्यमांतुन वा कुज-बुज मोहिमेतुन खालील प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले आहेत...वा अनेकांना त्या प्रभावात खेचण्यासाठी जे प्रयत्न अविरत चालले आहेत ते असे...
अ. वैदिक संस्क्रुतीची श्रेश्ठता.
ब. मुस्लिम-ख्रिस्ती द्वेष.
क. प्रति-दहशतवादाचे माहात्म्य.
ड. गांधीवादाचा द्वेष.
इ. ब्राह्मण (वैदिक)निश्ठ हिंदुत्ववाद.

या सार्यात "ब्राह्मण्य" कोठेही बसत नाही हे उघड आहे. ब्राह्मण जातीचे (वर्णाचे नव्हे...वर्ण बदलता येतो...जात नव्हे...) पुरातन वर्चस्व पुन्हा अबाधित ठेवण्याचे हे कारस्थान आहे आणि त्याला ब्राह्मण्य म्हणजे नेमके काय हे न समजणारा ब्राह्मण सामाजच कारणीभुत आहे. वैदिक संस्क्रुती लयाला जावुन २००० वर्ष झाली, पण वैदिक धर्ममहत्ता कायम राहिली. गेल्या दीड पावनेदोन शतकांत तिला हादरे बसु लागले व ब्राह्मण संरक्षक कोशात गेला पण उचल खात तीचे पुनर्जीवन करण्याचा हा उद्योग आहे हेच या वैदिकवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या लक्षात येत नाही.... हिंदुंचे संघटन वैदिक नेतृत्वाखाली व त्या प्रभावाखाली व्हावे असे वाटणारे ब्राह्मण याला जबाबदार आहेत. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे, वर्ण आणि जात या दोन्हीही पुर्णतया विभिन्न बाबी आहेत हेच त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्शात असुनही वरकरणी वेगळे रुपडॆ धारण केले जाते. त्यामुळे त्यांच्या पापक्रुत्यांबद्दल अन्य जातीयाने थोडीतरी टीका केली तर त्याची रवानगी "ब्राह्मण्द्वेश्ट्यान्च्या" यादीत केली जाते.

आणि त्यामुळे अहंकार सुखव्रुद्धी होत असल्याने एकाच वेळेस वर्ण आणि जात, मग सामाजिक वर्तन कसलेही असो, दोन्ही उपभोगण्याचा हा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण तेच मुळात अवास्तव आणि अधार्मिक आणि असामाजिक आहे. प्रत्यक्षात वैदिक संहितांनीही असली कोणतीही बाब मान्यच केलेली नाही. त्यामुळे आता जे "ब्राह्मण्य" टीकेचे कारण झाले आहे ते "वर्णीय व जातीय वर्चस्वाचे" आहे...

त्यामुळे हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवादाचे (वैदिकवादाचे) पुनरुजीवन अशी व्याख्या कोणी मान्य करु शकत नाही, कारण जात म्हणुन ब्राह्मणाना समाजाने शिरावर घेण्याचे काहीएक कारण नाही...कारण तीही आता अन्य जातींप्रमाणे एक जात आहे...आणि त्यापलिकडे त्यांचे वेगळे...आस्तित्व मानण्याचेही कारण नाही. त्याची महत्ता मानण्याचे कारण नाही कारण ही जातही अन्य जातींच्या, त्यांच्या वर्णानेच नाकारलेल्या व्यवसायांत घुसलेली आहे. याबद्दल ब्ब्राह्मणांना दोष देउ नये, पण त्याचवेळी वर्णाचे जन्मसिद्ध अधिकारही हवेत हा आग्राह कसा चालेल?

परंतु प्रयत्न त्या दिशेने होत असतात हे नाकारुन कसे चालेल?. आजच्या काळातही सती प्रथेचे उदात्तीकरण केले जाते, चातुर्वर्ण्यश्रेश्ठता जपण्याचे महत्व ठसवले जाते, वेदांमद्ध्ये सारे आधुनिक द्न्यान आहे असे वेडगळ दावे केले जातात, आणि या बाबींवर जो कोणी टीका करतो त्याला सरळ ब्रह्मणद्वेश्टा ठरवुन टाकले जाते.

"ब्राह्मणवाद" हा वरील अर्थाने मान्य होवु शकत नाही. ब्राह्मणांवर होणार्या जहरी टीकेमागे मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याबाबत झालेली गफलत आहे. बाह्मण्याचा अस्त घडवुन आणत फक्त जन्माधारीत ब्राह्मण असण्याचा अहंकार बाळगत ज्याही कोणी ब्राह्मण विद्वानांनी वैदिक ब्राह्मणत्व श्रेश्ठत्वाचे डंके पिटले त्यातुन निर्माण झालेली ही अवस्था आहे.

जातीचा अभिमान ब्राह्मणांनाच आहे असे नाही तर तो प्रत्येक जातीत मुरलेला आहे असेही चित्र आपल्याला दिसेल. जाती म्हणुन ते योग्यही आहे. कारण प्रत्येक जातीने परस्परांची सेवाच केली आहे. ब्राह्मणाला मंत्र येतात, पौरोहित्य येते, तर कुम्भाराला, चांभाराला, शिंप्याला, तेल्यालाही किंवा ढोर-मातंगाला मानवी ऐहिक गरज पुर्तीची शक्ती आहे. त्या अर्थाने सर्वच जाती समान आहेत. पण त्या समान न मानण्याची कारणे वैदिक धर्मीय संकल्पनांत आहेत हे ब्राह्मणांनी लक्षात घेत पुढे यायला हवे. विषमतावादी सामाजिक तत्वज्ञान वैदिक धर्म देतो आणि तोच विषमतावादी विचार हिंदू समाजात घट्ट बसला आहे. त्यामुळे वैदिकत्व घेत श्रेष्त्वतावाद जपायचा कि ब्राह्मण ही अन्य जातींप्रमाणे एक हिंदू जात आहे असे समजत परस्पर जातीसन्मानाची भावना बाळगत, तसे वागत "सर्व जाती समान" या तत्वाप्रत येत सर्वच जातींचे एक दिवस विलयन होईल हे पहायला हवे.

मला ब्राह्मण चालेल- ब्राह्मण्य नको...हे म्हणण्यापेक्षा वैदिक वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार नको अथवा वैदिकवाद नको असे म्हणायला हवे. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात ब्राह्मण्याचे जन्मदातेही ब्राह्मण ठरतात. तेही वास्तव नाही. विषमतेची मुळे वैदिक तत्वज्ञानात आहेत. म्हणून ते तत्वज्ञान हिरीरीने प्रचारत बसण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाचा त्याग महत्वाचा ठरेल.


- संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Tuesday, October 12, 2010

राग त्यांना का?

जगामधे सध्या एक सिद्धांत चर्चीला जातो आहे आणि तो म्हनजे "थियरी ओफ़ ओदर्स". भारतात त्याचे "अभिजनांचा बहुजनांविषयीचा सिद्धांत" असे सुटसुटीत रुपांतर करता येइल. पण हा सिद्धांत येथे लागु पडत नाही कारण अभिजन म्हणजे ब्राह्मण आणि जे ब्राह्मणेतर आहेत ते म्हणजे बहुजन असा सर्वांचाच लाडका तर्क आहे आणि त्यावर आधारीत हा वाद आहे.

पण प्रथम आपण "अभिजन-बहुजन" या शब्दाची व्याख्या पाहू. "जे संस्क्रुती घडवतात, ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, तीत वेळोवेळी कालानुरुप दुरुस्त्या करतात, समाजासमोर नवनवे ध्येय/प्रेय आणि तशी उत्तुंग आदर्शे घडवतात ते अभिजन होत तर या संस्क्रुतीशी जुळते घेत त्याचे अनुसरण करतात ते बहुजन होत."

आता भारताच्या परिप्रेक्षात संस्क्रुती घडवणारे कोण होते याचा प्राचीन काळापासुन विचार करुयात.

अ. सिंधु संस्क्रुती...ही संस्क्रुती ब्राह्मण समाजाने घडवली नाही हे उघडच आहे आणि याच संस्क्रुतीची अव्याहत धारा देशात आजही वहात आहे.
ब. बळी, मौर्य, शिशुनाग, सातवाहन, वाकाटक, पुन्ड्र, पांड्य, हर्शवर्धन, अशोक, असे हजारो सम्राट जे संस्क्रुती सम्रुद्ध करत राहिले तेही ब्राह्मण नव्हते.
क. गौतम बुद्ध आणि महावीर हेही ब्राह्मण नव्हते. या उभयतांनी जगाला एक संस्क्रुती दिली.
ड. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला एक क्रांतीकारी संस्क्रुती दिली.
इ. १९व्या शतकात ब्राह्मण समाजाने शुद्र ठरवलेल्या, अगदी ब्राह्मण स्त्रीयांनाही आसरा देत, शिक्षणाचा हक्क देत रुढी-परंपरांवर लाथ मारणारे महात्मा फुले आणी सावित्रीबाइ फुले यांनी समाजाला एक नवे आत्मभान दिले.
फ. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वतंत्र्य मिळवुन तर दिलेच पण जगालाही प्रेरणा दिली. उर्मी दिली.

ही फार थोडकी उदाहरणे आहेत. यात संतांचा समावेश करा. मग लक्षात येइल कि संस्क्रुती घडवणारे कोण होते आणि त्या संस्क्रुतीचा पाठपुरावा करणारे कोण होते. ब्राह्मण समाजाने त्यांचा वैदिक धर्म सोडला कारण त्यांना पर्यायच राहीला नाही. कोणत्याही ब्राह्मणाचा इन्द्र, वरुण, मित्र इ. वैदिक देव कुळ्देवता नाही. ते आजही त्यांची पुजा करत नाहित...त्यांची मंदिरे नाहित...तथाकथित बहुजनांची दैवतेच ते भजतात, कुळदेवता मानतात...ाअणि तरीही वैदिक श्रेष्ठत्ववाद मिरवतात... त्यांना अभिजन कसे म्हणायचे? कारण ते आज तरी इतेरांची संस्क्रुती पाळत आहेत.

म्हणजे ज्या संस्क्रुतीचे निर्माते जे नाहीत ते अभिजन असु शकत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण-बहुजन असे लेबल लावुन घेवुन उगाचाच गळा काढण्यात अर्थ नाही. फार तर एवढेच म्हणता येइल कि आपल्या खर्या अर्थाने अभिजनीय असलेल्या संस्क्रुतीला आपण समजावुन घ्यायला चुकलो आहोत...आणि कारण नसतांना स्वता:ला "बहुजन" म्हणवत आहोत...हा मात्र खास अपराध आहे. ज्यांनी संस्क्रुतीच घडवली नाही, ती आधुनिकतेशी नाळ जोडत पुढे नेली नाही त्यांना अभिजन कसे म्हणायचे? आणि ज्यांनी संस्क्रुती न घदवता श्रेय घेणे एवढेच उद्दिष्ट ठरवले आहे त्यांना राग येण्याचे काही-एक कारण दिसत नाही.

Sunday, October 10, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते या भ्रमातुन महाराष्ट्राचे समाजमन ढवळुन काढनारी, संतप्त बनवनारी एक विक्रुत कहाणी जेम्स लेन या स्वता:ला इतिहासकार समजणार्या ग्रुहस्थाने प्रस्रुत केली. पण मुळात हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आलिलशामधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेन्व्हा निजामशाहीत होता. त्या काळी दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....दादोजी जरी पुढे शहाजी राजांतर्फे पुणे-सुपे प्रांताचेही कारभारी नियुक्त झाले असले तरी दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पुढे शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प सोडुन तसे प्रयत्न केले असले तरीही हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी पुढे १६५७ साली काबीज केला...
१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्याही सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.

दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते.

वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही...ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत.

शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजी आधीपासुनच आदिलशहातर्फे कोंडाना, दौन्ड आणि लातुर विभागाचा कारभारी म्हनुन काम पहातच होते. पुणे-सुपे प्रांत छोटा होता आणि त्याला फारसे महत्वही नव्हते. पुण्यावरुन मुरारपंत जगदेव या आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने गाढवाचा नांगर फिरवौन ते जवळपास नष्ट केले गेले होते. अशा स्थीतीत आदिलशहाच्या सेवेत यावे लागल्याने शहाजी महाराजांनी या प्रांतासाठी नवी नेमनुक करण्यापेक्षा त्याच विभागातील, आदिलशहाच्या विश्वासातील आणि अनुभवी प्रशासक मानसाला नेमणे स्वाभाविकच होते. एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे.

पण शिवापुर आमराइतील आंबा तोडला आणि त्याचा पश्चाताप होवुन त्यांनी शिवाजी महाराजांना हात तोडायची विनंती केली आणि ती शिवरायांनी मानली नाही म्हणुन त्यांनी अर्धा हात कापलेली बाराबंदी घालायला सुरुवात केली ही भाकडकथा इतिहासकारांना (?) (बाबासाहेब पुरंदरे यांना) निर्माण करावी लागली यावरुन या तथाकथित इतिहासकारांना द्न्यातीबांधवाचे काही पाप लपवायचे होते हे स्पष्ट होते.

येथे आपण तत्कालीन घडामोडी पाहुयात.

१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे तेंव्हा निजामशाहीत होते तर दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते.

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत बगलोर येथे घेवुन गेले. म्हणजेच १६३६ पर्यंत दादोजी आणि भोसले परिवाराचा काडीएवढाही संबंध नव्हता.

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे (सिंहगड) सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या ब्राहमण नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच ब्राह्मण कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी आपल्या पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे...


आता दादोजींचा हात का तोडला गेला आणि त्यांना वीष घेवुन आत्महत्या का करावी लागली याबद्दल:

सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.

यावरुन माझ्यासमोर आलेली ही हकिकत जी ऐतिहासिक निवाड्यांवरुन सिद्ध होते, हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. तसाच ते शहाजीराजांचा महसुल हडपत नसतील असे नाही. ही घटना १६४५ ची आहे. दादोजींनी वीषप्रयोग करुन एका स्व-बांधवाची हत्या केली आहे. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळाली असनारच आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे (कारण ब्रह्महत्या हे महापापात गणले जात होते...म्हणुन) आणि तदनंतर स्वत:च वीष घेवुन आत्महत्या करणे.

थोडक्यात दादोजी कोंड्देव हे कोनत्याही समाजाला आदर्श वाटावेत असे व्यक्तिमत्व दिसत नाही. ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. ते शहाजी राजांचे आपत्कालीन परिस्थितीत नेमले गेलेले कारभारी होते. ते एकाच वेळेस आदिलशहा आणि शहाजीराजांचे सेवक होते, ही दुहेरी निश्ठा कोणत्याही स्वाभिमानी माणसाला शोभणारी नव्हे. १६३६ पुर्वी शहाजीराजे आणि दादोजींची मैत्री असण्याचेही पुरावे नाहीत आणि तशी शक्यताही नाही. पुणे सर्वप्रथम (१६३०) मुरारपंत जोगदेवाने उद्द्वस्त केले त्याला जवळच सुभेदारी करणार्या दादोजींनी कसलाही विरोध केलेला दिसत नाही. त्याच उद्ध्वस्त गावात सोण्याचा नांगर चालवल्याचे श्रेय त्यांना देता येत नाही. त्यांनी एका ब्राह्मणाचाच खुन केला आहे असे इतिहासावरुन दिसते. हा खुन त्यांनी आपला भ्रष्ट आचार लपवण्यासाठी केला आणि त्याची शिक्षा त्यांना त्यांचे हुजुर आदिलशहाने दिली आणि त्याचीच परिणती त्यांच्या आत्महत्येत झाली असे एकुन घटनाक्रमावरुन दिसते. ते शिवरायांचे प्रेरकही नव्हते कारण ते सतत शहाजी राजांकडे शिवरायांच्या स्वरज्य प्रयत्नांबद्द्ल कागाळ्या करत असत. सिवरायांनी १६४६ साली तोरणा जिंकला...पण हयातीत कोंडाना किल्ला त्यांनी शिवरायांच्या हवाली केला नाही कारण ते आदिलशहाचेही निष्ठावंत सेवक होते. ते शिवरायांचे गुरु असु शकत नाहीत...नव्हते हेही पुराव्यांवरुनच सिद्ध होते.

अशा स्थितीत त्यांचे कोड आजही कोणी पुरवायचे हा ज्याचा त्याचा आणि ज्याच्या त्याच्या नैतिक जाणीवेंचा प्रश्न आहे. ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही हा जातीय अहंकार आता चालणार नाही. पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...