Wednesday, December 28, 2011

महार कोण होते?- उद्गम-संक्रमण-झेप


माझे "महार कोण होते?- उद्गम-संक्रमण-झेप" हे पुस्तक प्रकाशित झाले असुन आता ते सर्वत्र उपलब्ध आहे.


वर्णव्यवस्था ज्या पुरुषसुक्तामुळे दैवी आणि जन्माधारीत बनली तेच मुळात ऋग्वेदात कसे प्रक्षिप्त आहे हेही यात सिद्ध केले आहे.

या पुस्तकात महारांचा गौरवशाली इतिहास सांगितला असुन महार शब्दाची नव्याने उपपत्ती मांडली असुन ती सर्वमान्य व्हावी अशीच आहे.

याशिवाय सध्याच्या संक्रमणवस्थेमुळे निर्माण झालेला संभ्रम दुर सारत अर्थसत्ता, राजकीय सत्ता, सांस्क्रुतीक फेरआखणी आणि वैचारीक सत्तेची महत्ता यात मांडली आहे.

सर्वच जातीसमुहांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे.

महार कोण होते?
उद्गम:संक्रमण:झेप

प्रुष्ठसंख्या-११२
मुल्य: रु. १००/-
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
एकमेव वितरक: भारत बुक हाउस,
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे-३०.
मो. ९८५०७८४२४६



Sunday, December 25, 2011

मुस्लीम आरक्षण: काही विचार

मुस्लिमांना साडेचार टक्के आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार दिसत आहे व त्यावर सध्या वादंगही होत आहे. प्रा. हरी नरके यांनी याबाबत तात्काळ लेख लिहुन ही चाल ओबीसींत फुट कशी पाडु इच्छिते यावर दै. सकाळमद्धे लिहिलेच आहेत. माझे विचार असे आहेत:

१. ओबीसी असणारे मुस्लिम फक्त भारतातच आहेत. इस्लामला खरे तर मुळात जातीप्रथा मान्य नाही. या ओबीसी मुस्लिमांनी आपण मुस्लिम नसल्याचे जाहीर कबुल करावे आणि आजवर ओबीसी मुस्लिम आहोत म्हणुन जे आरक्षण घेतच आहेत ते हिंदु म्हनवत खुशाल चालु ठेवावे...अन्यथा आहे तेही ओबीसी म्हणुनचे आरक्षण रद्द करण्यासाठी हिंदुंना आंदोलन करावे लागेल.

२. इस्लामची आर्थिक दिवाळखोरी ज्या धर्मांध मुल्ला-मौलवींमुळे होत आहे त्यांना धि:क्कारायची लायकी नसणा-यांनी धर्मही जपायचा आणि ज्या धर्मात मुळात जातीच असू शकत नाही त्या जातीही जपायच्या हा दुटप्पीपणा चालु शकत नाही. We have denounced Brahmin superiority...when and how you the people are going to refute Mulaa and maulavi's techeangs? Change or perish!

३. मुस्लीम ओबीसी हा शब्दच भ्रामक आहे. त्यांनी धर्म बदलला शेकडो वर्षांपुर्वी त्यांनी मुळ हिंदु जाती मात्र जपल्या ही त्यांची मानसिक दुभंग समस्या आहे. त्यांना ओबीसी म्हणुन कसलेही आरक्षण मिळता कामा नये.

४. आहे हे आरक्षणच आम्ही नाकारत आहोत, नवे कसे आणि कोण देनार याबाबत आम्हाला कठोर भुमिका घ्यावी लागणार आहे. ओबीसींचा गैरवापर करत त्यांच्याच ताटावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणा-यांचा जाहीर निषेध. हा निषेध उद्या व्यापक आंदोलनात बदलेल याची खात्री बाळगा!

५. मुस्लिमांच्या दैन्याची आणि त्यांच्या समस्यांची पुरेपुर जाणीव आहे म्हणुनच ओबीसी हे गतकालातील हिंदु बांधव म्हणुन त्यांचे २७ टक्क्यांतील आरक्षण आम्ही विनातक्रार स्वीकारले आहे. आता तेही आम्हाला नाकारावे लागेल. उदारता ही कोणी आणि किती दाखवायची याला एक सीमा असते. ती सीमा ओलांडायचे कार्य जे स्वत:ला अश्रफ मुस्लिम समजतात, अन्य मुस्लिमांना अजलाफ (हीण) समजतात, त्यांनी करणे म्हणजे एक नवा इस्लामी मनुवाद आहे. त्याचा धि:क्कार करणे क्रमप्राप्त आहे.

६. मतांसाठी कोंग्रेस कितीही खालच्या पातळीवर जावू शकते. हा पक्ष नव्हे तर समाजविघातक प्रणाल्या राबवत आपल्या आकांक्षा एन-केन-प्रकारेन साध्य करु इच्छिणा-या झुंडीचा समुदाय आहे हे आजवर वारंवार सिद्ध झाले आहे. त्याचा निषेध करणे क्रमप्राप्त आहे.

७. जातीप्रथा आणि त्यातील अन्याय्य समाजपद्धती हे फक्त हिंदु धर्माचे अंग आहे. ज्यांनी या अन्याय्य पद्धतीला लाथ मारुन दुसरा धर्म स्वीकारला आहे, आणि धर्म बदलुन २-५ पीढ्या उलटुन गेल्या आहेत त्यांनी आरक्षण मागणे हे अनैतीक आणि अन्यांना धर्मबदल करण्यास नकळत प्रोत्साहन देनारे आहे. मी या चालीचा स्पष्ट निषेध करतो.

८. इस्लामीयांच्या समस्या या त्यांच्या धर्मात त्यांनीच जोपासलेल्या अंध धार्मिक परंपरांत आहेत. बागबान, हजाम, ई. मुळच्या जाती त्यांनी शब्दश: बदल करुन चालु ठेवल्या म्हणुन ते ओबीसी होवु शकत नाहीत, कारण इस्लामला मुळात जातीप्रथा मान्य नाही आणि व्यवसायाधिष्ठित बागबानादि नांवे कायम राहिली म्हणुन ते ओबीसी होवू शकत नाहीत. अतैव त्यांना कसल्याही प्रकारचे आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. उलट आहे ते ओबीसी म्हणुनचे, तेही काढुन घेतले पाहिजे. वेगळे, तेही ओबीसी कोट्यातुन देणे ही तर दुरची बाब राहीली. धर्माच्या नांवाखाली आरक्षण देण्याची सोय मुळात घटनेतच नाही...

९. कोंग्रेसने असा राजकीय पेच टाकला आहे कि या घोषणेला विरोध करणा-यांची राजकीय पंचाईत होइल. ओबीसी राजकारण करणा-यांची तर अधिकच. पण हा प्रश्न मुळात राजकीय नसुन सामाजिक स्वास्थ्याचा आहे. दोन धर्मात उगा आग पेटवण्याचा आहे. ज्या ओबीसी मुस्लिमांना आधीच आरक्षण आहेच आणि ज्याला आजवर हिंदु ओबीसींनी आक्षेप घेतला नव्हता, तो घेण्याची जाग यामुळे आली आहे आणि त्याचे फलित काय हे येणारा काळच ठरवेल.

१०. हिंदु ओबीसी हे मुळात सामाजिक द्रुष्ट्या विखंडित आहेत...अक्षरश: काही हजार तुकड्यांत वाटले गेले आहेत, त्यांना राजकीय-सामाजिक आणि आर्थिक द्रुष्ट्या वारंवार वापरले जात आहे. पण ते कधीच एक होणार नाहीत या भ्रमात सरकार आहे. मी येथे स्पष्टपणे सांगतो कि ओबीसी (म्हनजे निर्माणकर्ता समाज) एक झाला तर यांची भंबेरी उडणार आहे. आणि हे आज ना उद्या होइलच. आज मात्र त्यांना अगदीच ग्रुहित धरले जात आहे आणि काहीतरी असंसदीय बाष्कळ घोषणा करत फुटीचे राजकारण केले जात आहे.

आणि हे शासनाच्या, वर्चस्ववाद्यांच्या अंगलट येईल हे मात्र नक्की!




Saturday, December 24, 2011

आपली खरी सांस्क्रुतीक ओळख काय?

रक्त नेहमी रक्ताची मागणी करते. द्वेषातून फक्त द्वेषच निर्माण होतो. एक झुंड निर्माण झाली कि तिला प्रत्युत्तर द्यायला तशीच झुंड उत्पन्न होते. अशात विवेकी आणि सामान्य लोकांचा आवाज हरवला जातो आणि या वा त्या झूंडशाहीचे साम्राज्य कायम रहाते. या द्वेषमुलक झूंडींच्या विरोधात आपला संयम आणि विवेक कायम ठेवत उभे राहुयात!

या वा त्या समाजाविरुद्ध तेच एकमेव शत्रू आहेत असा आव आणत द्वेषाच्या आधारावर झुंडी उभ्या राहतात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंसेचे/द्वेषाचे आगडोंब पेटवत सामान्य माणसाला दिग्भ्रमित केले जाते. विवेकी लोकांना दडपून टाकण्याचे प्रयत्न होतात. झुंडशाहीला झूंडशाही हे उत्तर नसते. पण परस्परविरोधी झूंडी आपसूक निर्माण होतात हे तर वास्तव आहे. विवेकी आवाज बुलंद करणे तर आपल्या हाती आहे? विवेकाची झूंड नसते तर ती पेटलेले वणवे विझवणारी स्न्हेहमय शक्ती असते...
येथे मला काही महत्वाचे मुद्दे मांडयचे आहेत.
१. महाराष्ट्रात बुद्धिझम १००% नसला तरी इ.स. पुर्व २०० ते जवळपास १३व्या शतकापर्यंत प्रभावशाली होता. एवढा कि संतही विठ्ठ्लाला बुद्ध स्वरूपात पहात होते. (श्रीविट्ठल: एक महासमन्वय-रा. चिं. ढेरे आणि विट्ठलाचा नवा शोध- संजय सोनवणी)
२. बौद्ध धर्मामुळे भारताची सैनिकी शक्ती कधीच कमी झाली नव्हती. अशोकाने वा त्याच्या वंशजांनी वा कोणत्याही बुद्ध राजाने सैन्यदले बरखास्त केलेली नव्हती. बुद्धाची अहिंसा मुळात कोणालाच समजलेली नाही. अशोकाचा नातू ब्रुहद्रथाची हत्या पुष्य़मित्र श्रुंगाने केली. हा ब्रुहद्रथाचा सेनापती होता हे वास्तव का लपवले जाते?


बौद्ध धर्मीयच नव्हेत तर जैन आणि सारे आजचेही शैव हे मुळात असूर संस्क्रुतीचेच होते. वैदिकांनी त्यांना कालौघात बदनाम केले असले तरी मुळ स्वरुप आजही शाबुत आहे. दसरा-दिवाळी ते नागपंचमी हे सारे उत्सव मुळचे शैव(असुर) संस्क्रुतीचे आहेत. वैदिक विष्णु आणि असुर विष्णु या नामसाधर्म्याचा फार मोठा गैरवापर झाला आहे. वैदिक विष्णु हा अत्यंत दुय्यम, इंद्रापेक्षाही छोटा देवता आहे. तो सागरशयनी नाही आणि लक्ष्मी त्याची पत्नीही नाही. आज महित असलेला विष्णु वेगळाच आहे. पण ही वैदिकांची चाल होती.

ही चाल येथेच थांबली नाही. बुद्धालाही त्यांनी चक्क विष्णुचा अवतार ठरवून टाकले. अलीकडेपर्यंत विष्णुचा दहावा अवतार म्हणुन खाली बुद्ध लिहीत आणि वर विट्ठलाचे चित्र असे. यामागचे कारण एकच आहे ते म्हनजे तत्कालीन महाराष्ट्रीय बौद्धधर्मियांत मानसिक गोंधळ उडवून देत त्यांना वैदिक शक्य नाही तर पौराणिक चाकोरीत आणुन बसवणे. आजही श्रुती-स्म्रुती हा धर्म फक्त वैदिकांचा असतो तर पुराणोक्त बहुजनांचा.

श्रुती-स्म्रुतींचे शिक्षण आज घेतले काय आणि नाही घेतले काय काय फरक पदतो? वेदाचार्य घैसास गुरुजींच्या शाळेत ब्राह्मणाव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मिळत नाही हे माहित आहे काय?. बुद्ध पुर्वाश्रमीचा वैदिक नव्हे तर शैव होता हेही आपणास माहित असणे अगत्याचे आहे. प्रस्थापित धर्माविरुद्धची प्रतिक्रांती म्हणुन शैव धर्मातील मुर्तीपुजा त्याने नाकारली आणि पुनर्जन्माचा सिद्धांतही त्याने नाकारला. वैदिक धर्मात कधीच मुर्तीपुजाही नव्हती आणि आत्मा वा पुनर्जन्माचा सिद्धांतही. क्रुपया ऋग्वेद वाचावा ही विनंती.
हा संघर्ष वांशिक नसून सांस्क्रुतीक होता. जोही भेद होता तो कालौघातील धार्मिक परिप्रेक्षातील होता. बाबासाहेब आंबेडकरांनीही हेच मत फार पुर्वी व्यक्त केले होते आणि आता सर्व पुरावे याच मताशी येवून ठेपतात. बुद्ध असो कि महावीर हे महानायक भारतीय संस्क्रुतीला व्यापक परिमाण देणारे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा आदर ठेवणे (चिकित्सा न नाकारता) आपले कर्तव्य आहे.

आणि एक विसरता कामा नये...धर्म पसरतो तो राज्यशक्तिंमुळे. जर पार अफगानिस्तानातील बामियान येथे अवाढव्य बुद्धमुर्ती कोरल्या गेल्या असतील तर राज्यकर्ते बौद्द्ध असले पाहिजेत. म्हणजेच आजचा रानटी वाटणारा अफगानिस्तानही एके काळी बौद्धांनी सत्तेत आणला असेल तर ते नेभळे होते असे कदापि म्हणता येत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे शैवप्रधान धर्म सोडला तर वैदिक धर्मच मुळात आत्मा आणि पुनर्जन्म मानत नाही, त्याचे काय? पुनर्जन्मादि प्रकरण तुमच्याच वैदिक धर्माच्या विरुद्ध जातेय त्याचे काय करणार? जे लोक श्रुती-स्म्रुतींचे हवाले गेली काही हजार वर्ष देत आहेत त्यांनी त्या श्रुती-स्म्रुती मुळातुन वाचायचे कष्ट घेतले आहेत काय? वेदांना संन्यास मान्य नाही. वेदांना पुनर्जन्म मान्य नाही. वेदांना आत्म्याचे स्वतंत्र आणि चिरकाळचे अस्तित्व मान्य नाही. वेदांना मुर्तीपुजा मान्य नाही. बौद्ध धर्मात मात्र संन्यास (परिव्रज्जा) मान्य आहे जी शैव धर्मात मान्यच होती. शैव धर्म हा मुत्र्तीपुजा प्रधान नव्हे तर प्रतीक-पुजा प्रधान होता. शिवलिंग हे प्रतीक आहे. शिव-पार्वती मुर्ती बनवणे हे शैव धर्मधारेचे मुळातील अंग नव्हते.

बौद्ध धर्माने एकीकडे वैदिक तत्वधारा स्वीकारली. दुसरीकडे बुद्धाच्या निब्बानानंतर शैवांतील प्रतीक पुजाही स्वीकारली.तिसरीकडे सांख्यांचा निरिश्वरवादही स्वीकारला व दु:ख हेच सर्व समस्यांचे मुळ आहे हे मतही काहीसा बदल करुन स्वीकारले. सांख्यांचे दु:ख हे मानवी दु:ख नसुन तीन मुलतत्वांतील असमतोलातुन निर्माण होणारा प्रक्षोभ या अर्थाने होते. बुद्धाने त्याला मानवी दु:खाशी जोडले. थोडक्यात बुद्ध धर्म हा त्या काळी प्रचलित असलेल्या विभिन्न विचारधारांतील काही नाकारत व काही स्वीकारत एक सम्यक विचारधारेला जन्म दिला आणि हे एक अलौकिक कार्य होते. बौद्ध धर्माला नावे ठेवतांना बरीचशी विधाने अभिनिवेशापोटी आणि अद्न्यानापोटी झालेली दिसत आहेत. यद्न्यातील पशु हिंसा सोडली तर वैदिक आणि बौद्ध धर्मात फारसा फरक नाही. आत्मा, पुनर्जन्म, मुर्तीपुजेस विरोध ई. बाबी समान आहेत. शैव धर्मातील प्रतीक पुजा बुद्ध धर्माने स्वीकारली, एवढेच नव्हे तर तंत्रशास्त्रेही उत्तरकाळात स्वीकारली.

अहिंसेबाबत सावरकर फार अन्याय्य टीका करतात. सन्यस्त खड्ग हे नाटक हे त्या अन्याय्य भुमिकेचे एक उदाहरण आहे. पण प्रत्यक्षात कोणत्याही बौद्ध राजाने सैन्यदले बरखास्त केलेली नाहीत. कनिष्काने, जो बौद्ध धर्मीय होता, ज्याच्या कारकीर्दीत एक धम्म्संगती भरली, त्याने चीनचा पराभव करून त्याच्या राजपुत्राला ओलीस म्हणुन काश्मीर येथे आणुन ठेवले होते हे कोणाला माहितच नसते. अशोकाचा नातू ब्रुहद्रथ हा सैन्याचे निरिक्षण करत असतांनाच त्याच्याच सेनापती पुष्यमित्र श्रुंगाने त्याची हत्या करून सत्ता बळकावली...म्हणजे ब्रुहद्रथाकडेही सैन्य होतेच...बरखस्त केले नव्हते आणि लढायचेच नसेल तर सैन्य कोठुन आले असते? आणि या बौद्ध राजांच्या कारकिर्दीत भारतावर एकही आक्रमण झाले नाही, जी झाली ती सीमा प्रांतांत आणि ती तेथेच थोपवली गेली...हे काही सन्यस्त खड्गाचे उदाहरण होत नाही. किंबहुना बुद्धाने जी अहिंसा सांगितली ती सबलाची अहिंसा सांगितली. भेकडाची नव्हे.

सातवाहनांनी बौद्ध धर्माला आश्रय दिला नाही असे काही विद्वान म्हनतात, आणि ते ब्राह्मणी धर्माचे श्रेष्ठ अनुयायी होते असे म्हनतात हेही चूक आहे. महाराष्ट्रातील बव्हंशी लेणी सातवाहन काळातच खोदली गेलीत. असंख्य विहार व स्तूप बांधले गेले. देण्ग्या दिल्या...गावे इनाम दिली. सातवाहन स्वत: बौद्ध धर्मीय नव्हते, पण त्यांनी जो समभाव दाखवला तो लक्षणीय आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्माचा प्रभाव असुनही त्यांनी तीन्ही सागरसीमा आपल्या अंकित ठेवल्या...एवढेच नव्हे तर श्रीलंकेवर स्वारी करुन त्यांनाही जिंकले आणि तेथील राजाच्या कन्येशी विवाहही केला.

म्हणजे भारतावर पारतंत्र्य आले ते बुद्ध धर्मीयांच्या अहिंसेमुळे हा दावा निकालात निघतो. खरे तर भारतावर परकीयांचे खरे राज्य सुरु झाले ते तेराव्या शतकापासुन. बुद्ध धर्म तर जवळपास आठव्या शतकापासुनच भारतातुन अस्तंगत व्हायला सुरुवात झाली होती. संपुर्ण देशावर सत्ता परकीयांनी निर्माण केली तेंव्हा जर बौद्ध धर्माचे अस्तित्वच जर नाममात्र झाले होते तर त्याबाबतचा दोष बुद्ध धर्माकडे कसा जातो?

बुद्धाने नाकारली ती प्राणीहिंसा...व्यर्थ यद्न्यीय हिंसा...अकारण केली जाणारे प्राणीहिंसा. पण बुद्धाची याबाबतची अनेक मते पटण्यासारखी नाहीत. कारण भिक्षेत कोणी मांसाहारी खाद्य वाढले तर ते स्वीकारावे हे बुद्धमत. म्हणजे आपण जी हिंसा केलेली नाही, अन्य कोणी तरी केली आहे, त्यापासुन खाद्य पदार्थ बनवला आहे तो स्वीकारायला हरकत नसने हे मत हे नैतीक गोंधळ आहे हे खरेच आहे. मी याला सम्यक भुमिका मानत नाही. " हिंसा मी करणार नाही, पण अन्य कोणीतरी करुन त्यापासुनचे पदार्थ वाढले तर ते मी नाकारणार नाही..." हे हिंसेचे अप्रत्यक्ष समर्थनच आहे.

गौतम बुद्धांचा अनेक विषयांवरील युक्तीवाद हा शाब्दिक खेळ आहे असे अनेक ठिकानी स्पष्ट दिसते. ज्या बाबींबाबत त्यांचे स्वत:चे काहीच मत नाही वा ते स्वीकारणे वा नाकारणे यातील युक्तीवाद टाळायचा आहे तेथे ते प्रश्नकर्त्यालाच प्रतिप्रश्न करत उत्तरे टाळतात. उदा. विश्वाचा निर्माता आहे कि नाही, आत्म्याचे अस्तित्व आहे कि नाही, दु:खाचा अंत स्वाभाविक आहे कि नाही, मेल्यानंतर माणसाचे काय होते?...अशा अनेक प्रश्नांवर बुद्ध मौन राहतात. त्यांच्या मते हे प्रश्नच मुळात गौण आणि अशिष्ट असुन त्यावरची तात्विक उत्तरे न देता केवळ युक्तीवादावर समोरच्याला निरुत्तर करण्यावर त्यांचा भर होता हे त्यांचे आज जे अवशिष्ट साहित्य आहे त्यावरुन दिसते.

अहिंसा हे काही जैन वा बौद्ध धर्माचे स्वयंशोधीत मुलतत्व नव्हे. जैनांनी या तत्वाचा अतिरेक केला तर बुद्धाने त्याला सम्यक स्वरुप दिले एवढेच. परंतु अहिंसा हे तत्व फार आधीच अस्तित्य्वात होतेच. हे तत्व मुळात आणले ते श्रमण संस्क्रुतीने. महावीर जसा स्वत:ला चोविसावा तीर्थंकर समजुन घेतो तशीच बुद्ध परंपरा बुद्धाआधीही अनेक बोधीसत्व होवुन गेले अशी भुमिका घेते. म्हणजे अवतार परंपरा बुद्ध धर्मानेही सोडली नाही, तात्विक संदर्भ काहीही असोत.

येथेच आपल्याला पौरात्य धर्म आणि पास्चिमात्य धर्मांतील मुलभुत मानसिक विभेद समजावुन घेता येईल. ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम हे धर्म मुलत: व्यक्तीवादी आणि अतिरेकी धर्म-आचारसंहितांना घट्ट कवटाळुन बसलेले दिसतात. वैदिक धर्माबाबत मी कितीही विरोधी असलो तरी हा धर्म त्या-त्या परिप्रेक्षात का होईना लोकशाही माननारा धर्म होता...अन्यथा त्या धर्माची रचना एक नव्हे तर किमान ३५० ऋषी करु शकतच नव्हते. शैवागमे ही किमान २००० पेक्षा अधिक पंडितांनी, तंत्रशास्त्रातील अधिका-यांनी रचली आहेत. बुद्ध धर्मातील आज उपलब्ध असलेले तत्वद्न्यान हे तर शेकडो बुद्ध धर्मीय पंडितांनी किमान ५ धर्म संगती भरवुन वारंवार रचलेले आहे.

वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ही महत्पापे सोडली तर तथाकथित हिंदु धर्मातही कोणाला पुजावे आणि कोणाला नाही, देव माना कि न माना...हे स्वातंत्र्य आहेच. आणि त्यांने जी पारतंत्र्ये लादली तीही ठोकरुन आपण लावतच आहोत.

धर्म जर कळीचा मुद्दा असेल तर भारतातील विध्यमान आणि विस्म्रुत धर्मांचा लेखाजोखा घेत आपल्याला आपली खरी सांस्क्रुतीक ओळख करुन घ्यायला लागेल.

Friday, December 23, 2011

हुकुमशाही प्रव्रुत्तींना या देशाने कधीही थारा दिलेला नाही!

भ्रष्ट माणसेच भ्रष्टाचाराविरोधात बोंब मारण्यात अग्रेसर असतात. सारे जग भ्रष्ट असुन आपणच काय ते एकमेव भ्रष्ट प्रव्रुत्तींचे बळी आहोत असा त्यांचा ठाम समज असतो. म्हनजे देणारा आणि घेणारा यांत नकळत एक फरक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अण्णा हजारे हे नेमके याच मनोव्रुत्तीचे बळी आहेत.

तेच नव्हे तर त्यांचे सहकारीसुद्धा!

दिल्लीची हवा मानवत नाही. मुंबईची हवा लय बेस. भाडे भरायचे नाही म्हणुन कोर्टात जातात. कोर्टाने फटकारले हे फार बरे झाले. उपोशनच करायचे तर राळेगण सिद्धीतील ते मंदिर काय वाईट होते? उपोशनाशी मतलब! पण प्रसिद्धीचा हव्यास फार. याला नैतीक भ्रष्टाचार हा शब्द योग्य नाही काय?

आमरण उपोषनाच्या बाता आम्ही ऐकुन कंटाळलो आहोत एवढेच काय ते खरे.

संसद, घटना यांच्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजनारे हे कोण? मेणबत्त्या घेवुन काही लाख लोक रस्त्यावर आले म्हणुन आपला अहंकार फुगवुन घेनारी ही बेडके, यांची स्वत:ची नैतीकता काय? आणि मेणबत्त्या पेटवुन रस्त्यावर जे मागे कधीतरी आले होते...ते आज कोठे आहेत? कोठे गायब झाले एकाएकी?

ते देणा-यांच्या बाजुचे होते कि घेणा-यांच्या? कि दोघांच्याही?

आणि म्हणे सक्षम लोकपाल आणा. सक्षम या शब्दाचा अर्थ तरी या लोकांना माहित आहे काय?

पोलिस, सी.बी.आय. ते संरक्षण खात्यातील लोक कोठुन येतात? ते येतात ते आपल्याच समाजातुन. राजकीय नेते येतात कोठुन? ते येतात ते आपल्याच समाजातुन. याचा जय त्याचा जय हे घोष लावणारे कोठुन येतात? आपल्याच समाजातुन. या भ्रष्ट एन.जी.ओ. आणि त्यांच्यातील देशद्रोही, जे येथील विकासाला खीळ घालतात...ते हरामखोर येतात कोठुन? याच समाजातुन. अण्णा हजारे सअरखे लोक जन्मतात कोठुन याच समाजातुन. ते काही समाजाचे बाप नाहीत. समाज त्यांनी घडवला नाही. समाजच समाजाला घदवत असतो आणि त्यासाठी कधी कधी अशी बुजगावनी लागतात. बुजगावन्यांनी स्वता:ला जनतेचा मसीहा समजणे हा त्यांच्या मानसिक विक्रुतीचा भाग असतो...ते वास्तव नसते.

या मानसाला असा भ्रम झालाय कि हा एकमेव शुद्ध चारित्र्याचा माणुस आहे आणि सारा देश भ्रष्ट आहे. हरकत नाही. योग्यच आहे असे समजुयात. पण मग हे लोकपाल आणि त्याचे अनुयायी काय आभाळातुन पडनार आहेत कि काय? ते भ्रष्ट निघाले तर काय अण्णा त्यांना फासावर लटकावणार आहेत? त्यांना माहित आहे असे ते करु शकत नाहीत. ती योग्यता आणि लायकीही नाही.

मानवी मनात मुळात भ्रष्टपना हा आदिम आहे. तो फक्त आर्तिकच नव्हे तर बव्हंशी नैतीक जाणीवा आणि नेणिवांत घुसलेला असतो. अहंकारी नैतीकता हा नैतीकतेच्या भ्रष्टाचाराचे भिषण उदाहरण असते आणि ते आर्थिक भ्रष्टाचारापेक्षाही नीचतम पातळीवर वावरत असते.

अण्णा हजारे महाभ्रष्ट ठरतात ते नैतीकतेच्या पातळीवर. त्यांना मुळात भ्रष्टाचाराची व्याख्याच समजलेली नाही. जी न समजलेली व्याख्या आहे ती मात्र उगा सक्षम लोकपालाच्या नांवाखाली लादायचा प्रयत्न करत आहेत. हा सर्वात मोठा भिषण नैतीक भ्रष्टाचार आहे.

हुकुमशाही प्रव्रुत्तींना या देशाने कधीही थारा दिलेला नाही. मग त्या इंदिरा गांधी का असेनात! किमान त्या लोकनियुक्त पंतप्रधान तरी होत्या. जो माणुस खुद्द रालेगण सिद्धीतुनही निवडुन येण्याची खात्री ज्यांना नाही, ते मारे अखंड लोकशाहीला आव्हान द्यायला उभे ठाकतात हा महाभयंकर विनोद हा देश मुकपणे पहात आहे. खरे तर अशा मानसाला सर्वप्रथम सर्व जनतेने विरोध केला पाहिजे. पण तसे होत नाही. लोकशाहीविरोधक गोट जे भारतात स्वातंत्र्यपुर्व काळापासुन नांदत आले आहेत त्यांचा हस्तक असलेल्या माणसापासुन वेगळी अपेक्षा काय बाळगणार?

जगात एक नियम आहे. जेवढे कायदे वाढतात तेवढा भ्रष्टाचार वाढतो. कायद्यांची संख्या, नियंत्रकांची संख्या जेवढी कमी तेवढे समाजाचे मन:स्वास्थ्य वाढत असते. पण हे महाभाग मात्र कायदे आणि नियंत्रक वाढवण्याच्या भानगडीत देशाचे अक्षम्य नुकसान करण्याचा देशद्रोही प्रयत्न करत आहेत हे निषेधार्ह आहे. भ्रष्टाचा नको हे खरेच आहे. आधी देनारे आहेत त्यांना कोणी थांबवायचे? त्यांना कोनती सजा देनार? कि फक्त घेणा-यांच्या विरोधात बोलनार? देनारेही तेवढेच दोषी असतात. देना-यांबद्दल जनजाग्रुती करा...त्यांचे स्वार्थ थांबवण्यासाठी आधे प्रयत्न करा आनी आहे त्या कायदा यंत्रणेचा पुरेपुर वापर करायचा प्रयत्न करा...

पण हे न सांगता...अण्ण्णा स्वत: देना-यांचीच बाजु घेत असल्याने घेणा-यांच्या विरोधात कायदा बनवणे वा विरोध करणे हा निखळ दांभिकपणा आहे...एवढेच.

आणि हा दांभिकपणा ओळखत लोकशाही मुल्यांबाबत जाग्रुत होत त्याला विरोध जर होणार नसेल तर मी म्हनतो हा देश एका नव्या असंसदीय हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे!



Monday, December 19, 2011

इतिहास फक्त वादळे निर्माण करण्यासाठी?

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.
अलीकडेच दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादी, पुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पडले. खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजे, तरच इतिहासाचे आकलन सम्म्रुद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते. खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असते, मग जे सामोरे येईल ते किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात. वाचकांचाही द्रुष्टीकोन सहसा असाच जातीय परिप्रेक्षातीलच असल्याने व श्रद्धा वा समजुतींना नवीन पुराव्यांच्या परिप्रेक्षात चिकित्सकपणे व उदारपणे पाहण्याची मनोव्रुत्तीच नसल्याने इतिहासावरुन आपल्याकडे वारंवार वादंगे होत असतात.
डा. बाबासाहेबांच्या रिडल्समुळे असेच झंझावात महाराष्ट्रात उठले होते. राम आणि क्रुष्ण हे साक्षात इश्वरी अवतार असल्याने त्यांची चिकित्साच केली जावु शकत नाही असा पवित्रा सनातन्यांनी जसा घेतला तसाच श्रद्धाळु समाजानेही घेतला हे वाचकांच्या स्मरणात असेलच. खरे तर विद्वेषरहित चिकित्सेमुळे मानवी द्रुष्टीकोनाला नवीन आयाम मिळतात व आपलीच प्रगल्भता वाढत असते हे आपला समाज लक्षातच घेत नाही हे एक दुर्दैवच आहे.
मानवी महानायकांचे उदात्तीकरण करणे, त्यांना देवत्व/विभुतीत्व देवू पहाणे हा एक विचित्र छंद महाराष्ट्राला जडलेला आहे. जेथे स्वजातीय अशा महानायकांत नसतात तेंव्हा स्वजातीयांतील दुय्यम व्यक्तींना महनीयत्व बहाल करण्यासाठी पुराव्यांची तोडफोड करणे हाही एक छंद इतिहासकारांना लागलेला आहे. याला कोणत्याही जातीचा माणुस वा इतिहासकारही बव्हंशी अपवाद नाही. आपल्या वंशाची नाळ रामायण-महाभारतकालीन महापुरुषांपर्यंत जोडण्याची परंपरा बहुतेक जातींत आहे, ती केवळ आपल्याही जातीची/कुळाची महत्ता ठसवण्यासाठीच!
ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांचा जो इतिहास लिहिला तो वर्चस्ववादी भावनेतुनच असल्याने त्यांचेही चित्रण लुटारु/बंडखोर असेच केले होते. पुढे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पवाडा लिहुन त्यांचा इतिहास सर्वप्रथम मांडला. पवाड्यात आपण सर्वस्वी इतिहास शोधु शकत नाही हे खरे असले तरी तो महाराजांना न्याय देण्याचा पहिला प्रयत्न होता. पुढे १९०५ साली केळुस्कर गुरुजींचे "छत्रपती शिवाजी महाराज" हे पहिले शिवचरित्र प्रसिद्ध झाले. परंतु साधनांची कमतरता आणि लोक-समजुतींचा पगडा यामुळे ते परिपुर्ण बनणे शक्यच नव्हते. त्यात संभाजी महाराजांबद्दल तत्कालीन प्रवाद जवळपास जसेच्या तसे आलेले आहेत. परंतु पुढे शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड संशोधन झाले. अजुनही सुरुच आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचा "Shivaji: His Life & Period" हा हजार पानी ग्रंथही लवकरच प्रसिद्ध होत आहे. संभाजी महाराजांबाबतही नवी संशोधने करत त्यांच्याबाबतचे सारे प्रवाद दुर सारत वा. सी. बेंद्रे आणि नंतर कमल गोखले यांनी त्यांचे प्रामाणिक चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज संभाजी महाराजांबद्दलचे अपसमज ब-यापैकी दुर झाले आहेत.
इंग्रजांचा धोका सर्वप्रथम ओळखुन त्यांच्याशी एकहाती झुंज देत, त्यांना अठराच्या अठरा युद्धांत पराजित करणा-या यशवंतराव होळकरांना आत्ता-आत्तापर्यंत महाराष्ट्र फक्त "पुणे जाळणारा-लुटणारा यशवंतराव" म्हणुन ओळखत होता. त्यांनी इंग्रजांशी केलेली-जिंकलेली दोन युद्धे तर जागतीक युद्धेतिहासात सामाविष्ट केली गेलेली आहेत, त्यांनी जी सर्वप्रथम राष्ट्रभावना निर्मण करण्याचा प्रयत्न केला तो तर पुर्णपणे दुर्लक्षिण्यात आला. पण आपल्याकडे जातीय द्रुष्टीकोन हा सर्वप्रथम येत असल्याने होळकरांचे प्रामाणिक चरित्र लिहिलेच गेलेले नव्हते. पण आता यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले होते ना लुटले होते हे सिद्ध झाले आहे. पण म्हणुन इतिहासकारांचा छुपा जातीय रोष अद्याप गेला आहे काय?
खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत कि कोणावरही अकारण अन्याय होवु नये तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर कठोर चिकित्सा करत आणले जावे.
पण मुळ इतिहास हा वर्चस्ववादी भुमिकेतुन लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोनाला बदनाम करुन ठेवायचे आणि कोणाला गडप करुन टाकायचे ही, एकार्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे "इतिहासविघातुक प्रव्रुत्ती" होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
शिवाजी महाराजांच्या ख-या इतिहासाला सामोरे आणले जात असतांना, स्वत:ला ज्येष्ठ-श्रेष्ठ म्हनवणारे आणि खरोखरीच ज्यांनी रात्रंदिवस राबुन अनमोल कार्य केले असनारे संशोधकही दुर्दैवाने या इतिहासविघातुक द्रुष्टीपासुन मुक्त राहिले नाहीत. जातीय अहंकाराचे फणे खरे तर उभारण्याचे आता तरी काहीएक कारण उरलेले नसावे. इतिहास अधिकाधिक, जरी सर्वस्वी नसला तरी, नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोनत्या ना कोनत्या रुपात असले पाहिजे या भावनेतुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या संत रामदास आणि दादोजी कोंडदेवांबाबत मात्र तसे गतशतकापासुन वारंवार घडते आहे आणि यामुळे अकारण जी वादळे निर्माण केली जातात त्यातुन आपल्या बहुतेक इतिहासकारांच्या मनाचा कोतेपणाच दिसुन येतो. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी मांडनी त्यांनी सहसा सोडली नाही. समजा गुरु नव्हते तरी त्यांचा स्वराज्य उभारणीत मोलाचा वाटा होता हा हेकाही सहसा सोडला जात नाही. समजा ते खरे असते आणि निर्विवाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पुर्वी न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजुनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या उत्तरकालीन वा बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला उत आनण्याचा प्रयत्न करत असतात.
श्री. गजानन भास्कर मेहंदळे यांनी शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे अलीकडच्याच एका मुलाखतीत मांडले आहे. ते म्हणतात कि "शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपुर्वीच लिहुन ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे कि दादोजी हे चांगले ग्रुहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करनारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणुस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होवुन गेलेल्या त्या व्यक्तिसाठी एवढा गहजब का?" पुढे ते अशीही पुस्ती जोडतात कि दादोजी गुरु होते असे पुरावे जसे नाहीत तसेच ते गुरु नव्हते असेही पुरावे नाहीत.
इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खुप शोक झाला असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
खरे पाहता, शिवाजी महाराजांना कोणीच गुरु नव्हता, पण दादोजी शहाजी राजे व शिवाजीराजांचे एकनिष्ठ व प्रामाणिक सेवक होते असे म्हनतांना, मुळात दादोजींची शहाजी राजांनी आपल्या चाकरीत नेमणुक केली होती असा एक तरी अस्सल पुरावा उपलब्ध आहे काय? तो कधीही सादर केला गेला आहे काय? तर त्याचे उत्तर आहे "नाही". "ते गुरु असल्याचे पुरावे नाहीत तसेच नसल्याचेही नाहीत" हे विधान हा शब्दछल आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. ज्या साधनांच्या आधारावर असे दावे केले जातात वा त्याच आधारावर जे दावे नाकारले जातात, जावु शकतात याचा अर्थ काय होतो? एवढाच कि या फक्त समजुती आहेत, जातीनिष्ठ पुर्वग्रहयुक्त आकलन आहे, त्यात नि:संदिग्धता नाही. एवतेव ते दावेच मुळात चुकीचे आहेत. अशी मांडणी करतांना मात्र त्याच साधनांतुन जे प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांना मात्र हेच लोक हातही घालत नाहीत. खरे हे आहे कि दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कोंडाना व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे, सुपे व शिरवळ प्रांताची जहागीर होती. सुभेदार-दीवाण हा नेहमी केंद्रीय सत्तेकडुनच नियुक्त केला जात असे, जहागिरदारास तसला अधिकारच नव्हता. सुभेदारावर महसुल जमा करणे, सरकारात भरणा करणे, सुभ्यातील जनतेची खुशहाली पाहणे, अधिकाधिक जमीनी लागवडीखाली आनणे अशी कामे असत. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. या सुभेदारीच्या क्षेत्रात शहाजी राजांचीही जहागीर होती. तत्कालीन स्थितीत जमीन-सा-यासंबंधीचे निवाडे केले जात ते मलिक अंबरने घालुन दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास सर्वत्र स्वीकारली गेली होती. (मलिक अंबर हा गनीमी काव्याचा जनकही मानला जातो.) त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे पुर्वीचे दादोजींचे निवाडे/महसुल पद्धत (खरे तर मलिक अंबरची महसुल पद्धत) पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवली एवढेच त्या चार पत्रांवरुन सिद्ध होते. पण यातुन ते शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक (कारभारी) होते व त्यांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते? सुभेदार कोठे कारभारी होतो काय?
दादोजींवर अन्य अनेक आक्षेप आहेत, परंतु त्यांचा प्रतिपाद्य विषयाशी संबंध नाही. दादोजी महान मानव असतील परंतु मुळात ते आदिलशहाचे म्रुत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने अदिलशहाने घोरपडे सरदारांना कोंडान्यावर चालुन जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहांत शासनच व्हायचे परंतु ब्रह्महत्त्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षण्याचे काय कारण? ते समजा असत्य आहेत तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करुन, तसे पुरावे सादर करुन त्यांचा निकाल का लावला जात नाही? काय हरकत आहे? "मग इतिहासात होवून गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडुन फेकण्यचे कारण काय?" असा प्रश्न श्री. मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्तही आहे, कारण दादोजी इतिहासात होवून गेले हे सत्यच आहे. पण मग समजा दादोजींच्या पुतळ्याचे तेथेच पुन्हा पुनर्वसन करायचे असेल तर मग त्यांचा आणि शिवाजी महाराज व शहाजी महाराजांचा नेमका संबंध काय हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपया हयातीत कोंडाना शिवाजी महाराजांना का मिळु दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. ते करता येत नसेल तर दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा अन्यत्र हवा तेथे स्वतंत्र पुतळा असु शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसुन त्या प्रदेशाचा, तोही अदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे त्यांला शिवेतिहासातील महत्वाची व्यक्ती असे कसे म्हटले जावु शकते?
१६३० साली महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला होता. इतका कि लोक म्रुत जनावरे आणि शेवटी तर म्रुत माणसांचेही मांस खावुन जगायचा प्रयत्न करत होते. गांवेच्या गांवे ओस पडली होती. सर्वत्र म्रुतांचे ढिगारे पडलेले दिसत. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे ह्रुदयद्रावक वर्णण व्ह्यन ट्विस्ट या डच व्यापा-याने लिहुन ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गांवे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरु केली ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण ही शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मद्धे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. ही पुनर्वसने तोवर जवळपास होवून गेली होती. त्यामुळे शहाजी राजांच्या आद्न्येने त्यांनी गांवे वसवली हा केला जाणारा दावाच निराधार ठरतो. या भिषण दुष्काळाबद्दल इतिहाससंशोधक का सहसा बोलत नाहीत हे येथे लक्षात यावे. त्यामुळे घटनाक्रमात अदलाबदल करुन काय साध्य केले जात आहे? याला इतिहास संशोधन म्हनतात का असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे.
ही अलीकडची उदाहरणे दिली आहेत ती अशासाठी कि मुळात इतिहासकारांवर, मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत, पक्षपाताचा आणि पुर्वग्रहांचा दोष येतो तो असा. असा इतिहास विश्वसनीय कसा असेल? इतिहासकाराच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मुल्यांकन त्याच्या द्रुष्टीकोनात, द्न्यानात व समजुतींत नवी भर टाकत असते. त्यातुन समाज-ऐक्याची वा दुहीची एक भावना निर्माण होत असते. ज्यांचा गौरव गावा वा ज्यांना अकारण मोठे केले गेले आहे त्यांचे वास्तव, मग ते कोनत्याही जाती-धर्मातील असोत, चित्रीत होणे खरे तर अभिप्रेत असते. पण मग आपण आधीच जातीय अस्मिता केवळ टोकदार नव्हेत तर काटेरी होत आहेत हे अनुभवत असतांना जर जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने केली, काही पुरावे चर्चेतही न घेता सोयिस्कर विधाने केली तर त्यांनी लिहिलेला इतिहास अविश्वसनीय होनार नाही काय?
थोडक्यात इतिहासात आपल्या जातीय अस्मिता जाग्या ठेवण्यासाठी कोणाचे तरी उत्थान करायचे वा कोनाचे तरी अवमुल्यन करायचे हे इतिहास संशोधनात सर्वतया चुकीचे आहे. बरे हा इतिहास विपर्यासाचा रोग नव्याने वर्चस्ववाद निर्माण करु पाहणा-यांनाही लागला आहे हे अधिकचे दुर्दैव. तेही हिरिरीने खोटा इतिहास बिनदिक्कतपणे सांगत फिरतात व काही समाजघटकातील तरुणांची माथी भडकावतात. इतिहास संशोधनामुळे जातीय ताणतणाव दुर करण्यापेक्षा ते वाढवण्यास हातभार लावणे हे कोणत्याही सुसंस्क्रुत समाजाला शोभनारे नाही. आपल्या जातींचे म्हणुन जे नायक-महानायक-अवतार ठरवलेलेच आहेत त्यांची चिकित्साही नाकारायची ही प्रव्रुत्तीही इतिहासविघातक आहे. या जातीय वर्चस्ववादाच्या लढाईत ख-या इतिहासाचा खुन पडतो आहे हे मात्र नक्की.
ख-या इतिहास संशोधनाला धोका आहे तो या वर्चस्ववादी मानसिकतेचा. शक्यतो आपल्या जातीतीलच महनिये तेवढी निवडायची, नसतील तर कोणाचे तरी उत्थान घडवुन आणायचे, अन्य जातीयांतील त्यांच्या आदरणीयांना घाणेरड्या भाषेत झोडपत रहायचे आणि ज्या जाती अद्याप आपला इतिहास लिहु शकत नाहीत त्यांच्या इतिहासाला हात न लावता त्याला कालांधारात फेकुन द्यायचे यातुन आपल्याला एक समग्र समाज म्हणुन गतकाळ कधीही ठळकपणे पाहता येणार नाही. इतिहास लेखनाची ही पद्धत नव्हे...शिस्त कितीही असेल!
असेच होत राहिले तर मग आपण कसले भवितव्य घडवणार?
यासाठी आपल्याला इतिहास संशोधनात दोन्ही टोकाच्या भुमिका वगळत, जी समतोल, चिकित्सक आणि सत्याचे दर्शन वा दिग्दर्शन करु शकेल, दोन्ही अतिरेकी टोके गाठणार नाही, अशा तिस-या भुमिकेची आवश्यकता आहे. यासाठी जातीय गंडांतुन बाहेर आलेल्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल हे नक्कीच. अन्यथा इतिहास हा फक्त वादळे निर्माण करत सामाजिक मन:स्वास्थ्य बिघडवण्यासाठीच असतो कि काय असा समज होईल. आणि त्यात इतिहास कोठेतरी हरवला जाईल. आणि ते काही केल्या समाजाच्या हिताचे नाही.

-संजय सोनवणी



Thursday, December 15, 2011

वर्तमान व भवितव्य

(माझे "महार कोण होते?" हे संशोधनात्मक पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत असुन त्यातील हे एक महत्वाचे प्रकरण.)

वर्तमान व भवितव्य

मागील प्रकरणांत आपण एकंदरीत वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यांच्या इतिहासाचे अवलोकन करत असतांना महार समाजाचा इतिहास पाहिला आहे. हा एक पराकोटीचा पराक्रमी, चाणाक्ष आणि बुद्धीवंत समाज होता हे उघड आहे आणि ज्या गतीने बाबासाहेबांच्या अलौकीक नेत्रुत्वानंतर हा समाज वेगाने प्रगती करत आहे ती अचंबीत करणारी आहे. ही प्रगती फक्त आर्थिक नव्हे तर द्न्यान-विद्न्यानाच्या क्षेत्रातही होते आहे. आजची नवीन पिढी तर अधिक सक्षम होत असुन उद्या हेच देशाचे/जगाचे भवितव्य घडवु शकतील अशा विलक्षण टेक ओफच्या तयारीत आहेत.
परंतु हे मला पुरेसे वाटत नाही, हेही मी येथे आवर्जुन नमुद करु इच्छितो. या गतशतकात बाबासाहेबांमुळे पराकोटीची जाग्रुती झालेला, नव-आत्मभान आलेला हा समाज "शिका-संघटीत व्हा व संघर्ष करा" या हाकेला प्रतिसाद देत शिकला-शिकतो आहे. संघर्ष तर पाचवीला पुजल्यासारखाच आहे. परंतु संघटन हे मात्र अत्यंत विस्कळीत आहे. माझे तरुण मित्र आयु. वैभव छाया यांच्या महाराष्ट्र टाइम्समधील चार डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या "नवा सुर्य कवेत घेतांना" या लेखात त्यांची याबाबतची भावना , द्रुष्टी आणि व्यथाही स्पष्टपणे ध्वनीत होते. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष हा फक्त दलितांसाठी काढला नव्हता. हा पक्ष सर्वच पिडितांच्या सामाजिक व राजकीय जाणीवांचा उद्गार असेल असेच त्यांना वातले असावे. पण बाबासाहेब हे फक्त पुर्वास्प्रुश्यांचे ठरवुन भारतीय जात्यंध पुन्हा मोकळे झाल्यामुळे मात्र रिपब्लिकन हाही दलितांचाच पक्ष बनला आणि अन्य सत्तांधांच्या इशा-यांवर नाचत-डोलत ४०-४५ भागांत विभागला गेला. "संघटीत व्हा" ही बाबासाहेबांची हाक त्यांनी सोयिस्करपणे विस्मरणात ढकलली असे मला नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
बाबासाहेबांनी अत्यंत विचारपुर्वक बौद्ध धर्म आपल्या सर्वच शोषित बांधवांसाठी निवडला. एका अर्थाने हे धर्मांतर नसुन काही हजार वर्ष जपलेल्या, स्वीकारलेल्या वा प्रभावाखाली असलेल्या धर्माकडे पुन्हा परतण्याचा प्रयत्न केला. तो काही प्रमानात यशस्वीही झाला. परंतु बौद्ध धर्माची मुलतत्वे, जी गौतम बुद्धाला व स्वत: बाबासाहेबांना अभिप्रेत होती त्या तत्वांना पायतळी तुदवण्याचे कार्य काही बाबासाहेबांचेच नांव घेणा-या जात्यंध संघटना करत असतात व एका परीने मनुस्म्रुतीचेच अप्रत्यक्ष अनुकरण करत असतात. संघटीत होणे हे अत्यावश्यक आहे हे खरे परंतु अशा व्यक्ती व संघटना त्यात अडथळे बनत आहेत.
ग्रामीण भागात अद्यापही लाखो बांधव सतत विषमतापुर्ण वागणुकच नव्हे तर अन्यायाच्या अविरत लाथा खात आहेत. खैरलांजी गाजले म्हणुन आपल्याला माहित आहे. पण असंख्य घटना नोंदल्याही जात नाहीत. त्यांना माध्यमे मुळात प्रसिद्धीही देत नाहीत. ओनर किलिंग्ज महाराष्ट्रातही होतात. पण माध्यमे त्याबाबत दुर्दैवाने मुक असतात. याबाबत संघटीत आवाज उठवला जात नाही. म्हनजेच बाबासाहेबांचे "संघटीत व्हा" हे विधान पायतळी तुडवले जाते आहे. गौतम बुद्धाने जी संघाची, म्हणजे संघटनेची, एकत्रीतपणाची, बंधुभावाची जी संकल्पना मांडली तीच पायतळी तुडवली जात नाही कि काय?
आज शिकलेला, वरिष्ठ पदावर गेलेला समाज बांधव हा आपल्याच समाजाशीची नाळ तोडत उच्चभ्रु समाजात मिसळण्याचा, त्याप्रमाणे वागण्याचा व त्यांची संस्क्रुती स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. हा एक मानवी स्वभाव आहे हे समजवुन घेतले तरी आपल्याहुन खाली असलेल्या, संघर्षरत असलेल्या बांधवाला हात देण्याचा प्रयत्न मात्र सहसा केला जात नाही.
गतशतकात विद्रोही चळवळीने अत्यंत महत्वाचे सांस्क्रुतीक कार्य केले. त्यातुन एक वेगळीच ज्वलंत अभिव्यक्ती सामोरी आली जी अखिल समाजाला हादरवणारी होती. विद्रोही साहित्य मात्र अपवाद सोडले तर आत्मचरित्रांतच अडकले. बाबुराव बागुल, उत्तम कांबळे यांनी या विद्रोहाला वेगळे आशय प्रदान केले असले तरी ते त्यांच्यापुरतेच मर्यादित का राहिले, यावरही विचारमंथन होण्याची गरज वाटते. वर्तमानात काव्याबाबत तर काही बोलण्याची सोय नाही. नामदेव ढसाळ व केशव मेश्रामांसारखे काही मोजके कवी खरेच आभाळावर रक्ताच्या शाईने वेदनांचे महाकाव्य लिहिणारे कवी. आज त्यांचीही वानवा आहे. विचारवंतांबद्दल बोलावे तर डा. रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर यांचा सन्माननीय अपवाद वगळला तर अभ्यसपुर्ण सखोल चिंतनाने मंडित सखोल आणि प्रगल्भ वैचारिकतेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य अभावानेच झालेले दिसते. बाबासाहेबांएवढी सैद्धांतीक, तात्विक आणि समाजशास्त्रीय मांडणीची अद्भुत उंची गाठता येणे शक्य नसले तरी त्या दिशेने कितपत प्रयत्न प्रामाणिकपणे झालेले आहेत, होत आहेत हा प्रश्न स्वत:लाच आपण विचारायला हवा. असे का व्हावे यावरही चिंतन करण्याची गरज आहे. चिकित्सेखेरीज कोणताही समाज व्यापक प्रगती करु शकत नाही. स्वसमाजियांनी व अन्यसमाजियांनी केलेल्या चिकित्सेकडे व्यापक परिप्रेक्षात पाहिले पाहिजे. चिकित्सेबाबत हळवे होणे वा तिचा भावनीक वा संतप्त अव्हेर करणे कोणत्याही समाजाला परवडणारे असु शकत नाही. अन्यथा बाबासाहेबांनी जो विचारस्वातंत्र्य आणि मानवी मुलभुत प्रेरणांना बुद्धीप्रामाण्यवादाला अंगिकारत अभिव्यक्त होण्याचा मार्ग दिला त्याचे काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
बाबासाहेबांनी २९ जुन १९२९ रोजी परळला दामोदर हालमद्धे भरलेल्या जाहीर सभेत म्हटले होते ते असे: ""आपण सर्व अस्प्रुश्यांनी सुसंघटीत झाले पाहिजे. मोठ्या दु:क्खाची गोष्ट ही की, आपल्यातील काही लोक "महार-महारेतर" असा वाद माजवितात! महार जरी महाडच्या चवदार तळ्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्याशी झगडले आणि तो तलाव आपलासा करुन घेतला तरी त्या तळ्यातील पाणी चांभारांना आणि मांगांना देखील पिता आले पाहिजे. .....आम्ही अस्प्रुष्य तेवढा एक समजतो." (बहिष्क्रुत भारत-१५ नोव्हेंबर १९२९.)
मला वाटते बाबासाहेबांचा हा विचार आजही समजावुन घेण्याची गरज आहे. पोथीनिष्ठतेत कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववादी अडकले आहेत तशाच सोयिस्कर पोथीनिष्ठतेत हा समाज अडकत तर चाललेला नाही ना यावरही वर्तमानातील युवा पिढ्यांकडुन अपेक्षा आहेत.
यापासुन सर्वच समाजाने सावध होत पुढचे मार्गक्रमण करायला हवे.
मला असे वाटते कि "निवडीचा संभ्रम" तर निर्माण झालेला नाहीय ना? ज्या हिंदुत्ववाद्यांना पराकोटीचा विरोध शोषित समाजातील विद्रोहींनी केला त्याच कंपुत त्यांचेच काही राजकीय नेते ते साहित्त्यिक मंडळीला सामील व्हावे लागणे याचा अर्थ काय होतो? यामागे व्यक्तिगत राजकीय स्वार्थ आहेत कि समाजाचे खरेखुरे कल्याण साधण्याची आस आहे? अलीकडे तरुण विचारवंत हा प्रश्न जाहीरपणे विचारु लागले आहेत. त्याला उत्तर देण्याची क्षमता या नेत्यांत आहे काय? बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्श्शाबाबत जी मुळ भुमिका मांडली तीच पायतळी तुडवण्याचा अर्थ काय होतो? आयु. वैभव छाया आपल्या एका लेखात या प्क्षबाबत बाबासाहेबांची भुमिका त्यांच्याच शब्दात मांडतात, ती अशी...

"अशा नव्या राजकिय पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. यासंदर्भात १० डिसेंबर १९५५ रोजी जनता पाक्षिकात बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक होती. ते म्हणाले की,
“ माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढण्याचा विचार आहे. भारतीय राज्यघटना खर्‍याखुर्‍या अर्थाने राबविण्यासाठी हा पक्ष काढण्यात येणार असून पक्षाचे मुख्य ध्येय्य समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव असे राहणार आहे. भारतातील सत्ताधारी काँग्रेसला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान पक्षांचे या नवीन पक्षांत एकत्रिकरण करण्यात येईल आणि अमेरिकन धर्तीवर हा पक्ष कार्य करीत राहील. भारतातील व्यापारी वर्गाने अमेरिकेतील व्यापारी वर्गाप्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षांस सहकार्य केल्यास दोन्ही पक्ष मजबूत पायांवर काम करू शकतील व त्यामुळे लोकशाहीच्या निरोगी वाढीस मोठा हातभार लागू शकेल.
"लहानसहान पक्षांजवळचे मामूली निधी, कार्यकर्त्यांची वाण ह्या गोष्टी लक्षात घेता सध्याच्या राजकीय वातावरणात अशा पक्षांना बिल्कूल भविष्यकाळ नाही. सरकारने व देशभक्तांनी अमेरिकेप्रमाणेच काँग्रेस व रिपब्लिकन पक्षांच्या वाढिस प्रोत्साहन द्यावे. उदाहरणादखल घ्यायचे झाल्यास, गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला काही हजार रुपये ही खर्च करता आले नाही. या उलट काँग्रेस पक्षाने कास्ट फेडरेशनचा पराभव करण्यासाठी अमाप पैसा खर्च केला.”
आता ही राजकीय भुमिका रिपब्लिकनांनी कशी व का सोडली हे त्यांनाच समाजबांधवांनी विचारायला हवे. एवढेच नव्हे तर त्यावर उत्तर शोधत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या ध्येयधोरणंवर कसे चालता येईल यावर व्यापक विचारमंथन करत पुढील राजकीय व्युहनीति ठरवायला हवी. बाबासाहेब म्हनाले होते, घरी जा आणि भिंतीवर आम्ही सत्ताधारी बनणार हे लिहुन ठेवा...परंतु प्रत्यक्षातील चित्र हे खेदजनक आहे हे नाईलाजाने नमुद करावे लागत आहे.
दि. ६ डिसेंबर २०११ च्या लोकसत्तात ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधू कांबळे म्हणतात:
"....उदाहरणार्थ, आंबेडकरोत्तर कालखंडात नेत्यांच्या आत्मकेंद्रित राजकारणामुळे रिपब्लिकन पक्षाचे विघटन झाले, राजकीय चळवळीला मरगळ आली, एक साचलेपण आले, त्याच वेळी आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेल्या तरुणांनी साहित्याच्या प्रांतात बंडखोरी करीत उडी घेतली. राजा ढाले यांच्या विद्रोही लेखनाने राजकीय व सामाजिक व्यवस्था ढवळून निघाली. त्यानंतर विद्रोही साहित्याची एक लाटच निर्माण झाली. वैचारिक लेखन, कथा-कादंबऱ्या, कविता यांचा खच्चून भरलेला दारूगोळा प्रस्थापित व्यवस्थेवर आदळत राहिला. त्यातूनच पुढे दलित पँथर नावाचे वादळ निर्माण झाले. या जहाल व आक्रमक चळवळीला नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, शंकरराव खरात, दया पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, वामन होवाळ, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. अरुण कांबळे, वामन निंबाळकर, लक्ष्मण माने, प्रेमानंद गज्वी, टेक्सास गायकवाड, भि. शि. शिंदे, दत्ता भगत, योगीराज वाघमारे, आदी लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार यांच्या समर्थ लेखणीने वैचारिक खाद्य पुरवले. अलीकडच्या काळात गौतमीपुत्र कांबळे, किशोर शांताबाई काळे, संजय पवार, आदी लेखक-विचारवंतांनी चळवळीला पूरक असे लेखन करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षांत नवे विषय, नवे आशय, नव्या जाणिवा घेऊन साहित्याची निर्मिती अभावानेच झाली. आंबेडकरी चळवळीचा वैचारिक दारूगोळाही कमी पडला आणि राजकारण एके राजकारण या एकाच आवर्तात आंबेडकरी चळवळ अडकली.
पुढे चार-पाच वर्षांत दलित पँथरचीही शकले झाली. नामदेव ढसाळ यांनी आपले वैयक्तिक राजकारण सांभाळण्यासाठी दलित पँथर ही नामधारी संघटना कायम ठेवली. राजा ढाले यांनी दलित पँथर या नावापासूनच फारकत घेतली. आंबेडकरी चळवळीला सक्षम नेतृत्व देण्यास ढाले-ढसाळही पुरे ठरू शकले नाहीत. काही प्रमाणात ढाले यांच्याकडे शिक्षित तरुण वर्ग आकर्षित झाला, परंतु त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून पूर्णपणे फारकत घेतली. कार्यकर्त्यांना राजकारणापासून अलिप्त राहणे अवघड झाले. कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला. ढाले यांनी पुढे येऊन रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु स्वच्छ व निष्कलंक चारित्र्याच्या चळवळीच्या नावाखाली त्यांनी राजकारणाला थारा दिला नाही. मात्र पुढे त्यांनी स्वत: दोनदा लोकसभेची निवडणूक लढविली. आपली संघटनाही त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बुहजन महासंघात विलीन केली. मात्र त्यातूनही ते आज बाहेर पडल्यासारखेच आहेत. कार्यकर्त्यांची मात्र पुरती कोंडी झाली. आंबेडकरी चळवळीला उर्जितावस्था प्राप्त क रून देण्यात राजा ढाले यांचे योगदान मात्र वादातीत आहे.
"दलित पँथरला फुटीने ग्रासले असतानाच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराने पुन्हा या चळवळीला एक वेगळे वळण मिळाले. त्यातच रामदास आठवले नेता म्हणून पुढे आले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचाही नामांतरवादी नेता म्हणून उदय झाला. तब्बल सोळा वर्षे आंबेडकरी चळवळ नामांतरासारख्या भावनिक प्रश्नात अडकली. शेवटी काय झाले, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले की विद्यापीठाची फाळणी झाली? विद्यापीठ नामांतराचा वर्धापन दिन साजरा करणाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा. याच कालखंडात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश केला. आंबेडकरी जनतेला पुन्हा एक आशा वाटू लागली. सुरुवातीला त्यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न घेऊन आंबेडकरी चळवळीला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्ह्य़ात बहुजनवादी राजकीय सत्तेचा पथदर्शी प्रयोग त्यांनी राबविला व तो यशस्वी झाला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडून वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या. बाबासाहेबांचा नातू, एक अभ्यासू व शहरी-ग्रामीण प्रश्नांची जाण असणारा नेता, अशी ही त्यांची प्रतिमा आंबेडकरी समाजाला आश्वासित करणारी होती. परंतु बुरुजाचा एक एक दगड निखळावा तसे त्यांचे सहकारी त्यांच्यापासून दुरावत गेले. कारणे काहीही असली तरी हा प्रयोग फक्त अकोल्यापुरताच मर्यादित राहिला. आंबेडकरांचे राजकारणही एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊ शकले नाही. भारिप बहुजन महासंघाचा जनाधारही आता कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. मध्यंतरी त्यांनी आंबेडकरी चळवळ संपली काय, असा प्रश्न विचारणारे पुस्तक प्रसिद्ध केले. हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारला आहे की जनतेला विचारला आहे, हे अजून कळायला मार्ग नाही. ज्यांच्याकडून सक्षम नेतृत्वाची अपेक्षा होती, त्यांनीच आंबेडकरी चळवळ संपली आहे काय, असा प्रश्न विचारणे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. या पुढे आता प्रकाश आंबेडकर वाढतील का किंवा चळवळ वाढवतील का, याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत.
"या सर्व राजकीय कोलाहलात रामदास आठवले सारी चळवळ आपल्याभोवती फिरवून घेण्यास यशस्वी ठरले. आठवले यांनी राजकीय चळवळीला एका वेगळ्याच वळणावर आणले. आठवले यांनी काँग्रेसबरोबरच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला. या पूर्वी रिपब्लिकन नेत्यांनी काँग्रेसबरोबर युती केली नव्हती असे नाही, परंतु आठवले यांचे राजकारण हे आंबेडकरी चळवळीचा स्वतंत्र बाणा हरवून बसले. वीस वर्षे त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. एक मतदारांची पिढी त्यांनी हातावर व घडाळ्यावर शिक्का मारणारी तयार केली. त्यांनी आरपीआयचे निवडणुकीत साधे खाते उघडण्याचीही तसदी घेतली नाही. आरपीआयचे मतदान किती आहे, हे कधी त्यांना वीस वर्षांत अजमवावे असे वाटले नाही. अर्थात त्याचा त्यांच्या खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद मिळण्यात कधी अडथळा आला नाही. मान ना मान मै तेरा मेहमान अशा पद्धतीने ते युती-आघाडय़ांचे राजकारण करू लागले. आता त्यांनी शिवसेना-भाजपबरोबर युती केली आहे. शिवसेनेचा आरक्षण, दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर, आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देणे याला विरोध आहे. त्याचे आठवले यांना काही देणे-घेणे नाही. आमची युती भ्रष्टाचार, महागाईच्या विरोधात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मग ते ज्या रिपब्लिकन पक्षाचे राजकारण करतात आणि ज्या पक्षाला बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्राच्या माध्यमातून वैचारिक पाया दिला आहे, त्याचे काय? अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमात आपण २०१४ मध्ये उपमुख्यमंत्री होणार, अशी अपेक्षा बोलून दाखविली. किती ही मोठी अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा? याचसाठी का हा शिवशक्ती-भीमशक्तीचा सारा अट्टहास, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. युती-आघाडय़ांशिवाय आठवले राजकारण करू शकत नाहीत आणि त्यांचे नेतृत्वही तरू शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यातून आंबेडकरी चळवळीला भक्कम नेतृत्व देण्यास त्यांच्याही मर्यादा उघड झाल्या आहेत.
नव्या नेतृत्वाच्या पिढीतही ज्यांनी आपले नाव कधी मागे पडू दिले नाही, त्या रिपब्लिकन पक्षाचे आणखी एक नेते रा. सू. गवई यांनी कायम काँग्रेसच्या साथीने सत्तेचे राजकारण केले. ही सत्ता फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली किंवा ठेवली असे म्हणता येईल. आमदार, खासदार, विधान परिषदेचे उपसभापती, सभापती, बिहार- केरळचे राज्यपाल असा त्यांचा काँग्रेसच्या मेहरबानीने राजकीय सत्तेचा प्रवास सुरू राहिला. आता त्यांनी राजकीय निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई त्यांच्या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. ते अनेकदा फक्त काँग्रेसच्याच व्यासपीठावर दिसतात. त्यांनी वारसा हक्कानेच काँग्रेसबरोबरची युती चालू ठेवली आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन मी काही इथे मागायला आलो नाही, असे सांगत असतानाच त्यांनी दडवलेले ताकाचे भांडे कधी उघडे पडते हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. "

मला वाटते वरील उतारा पुरेसा बोलका आहे आणि त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे काही लबाड लोकांमुळे आंबेडकरी जनतेत संभ्रम निर्माण झाला असुन नेमके काय निवडायचे याबाबत काही गोंधळ तर होत नाहीहे ना असा प्रश्न उठणे स्वाभाविक आहे? जातीचे नको विचारांचे बहुमत हेच सत्तेकडे नेणारे प्रमुख साधन असते. हा समाज एके काळी सर्वच समाजाचा एक अविभाज्ज्य घटक होता. एक स्वतंत्र बेट निर्माण करुन आणि तेही असंख्य (जवळपास ४४) तुकड्यांत वाटुन सत्तेचा मार्ग कसा क्रमिला जाईल? कधी कोन्ग्रेस तर कधी भाजपा वा कधी अन्य पक्ष स्वार्थासाठी फक्त काही लोकांना पदे देत संपुर्ण समाजालाच वापरुन द्यायची नीति पुढेही कायम ठेवायची की नाही यावरही विचारमंथनाची आवश्यकता आहे. तसे झाले नाही तर मागील पानावरुन पुढे अशीच अवस्था होत राहील, आणि ही काही विराट भवितव्यासाठीची व्यवस्था नाही. "अंध आणि स्वार्थी द्रुष्टी ठेवली तर सर्वच समाजाचा घात होईल..." असे अत्यंत तळमळीने बाबासाहेबांनी जळगांव येथील सभेत ८ आक्टोबर १९३६ रोजी म्हटले होते. मला वाटते अनेक नेते/विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या विधानाचा अर्थ समजावुन घेतलेला नाही. किंबहुना बाबसाहेबांच्या विपुल साहित्यांचे खंड जवळपास घरोघरी असतांना ते वाचायचे व समजावुन घ्यायचे कष्ट कितीजणांनी घेतले असतील याबाबत शंकाच आहे.
सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे आणि संक्रमणाच्या कालखंडात काही गफलती होवु शकतात हे मान्य जरी केले तरी तो काळ किती असावा यालाही मर्यादा असतात. समाज सातत्यपुर्ण फक्त संक्रमणाच्या स्थितीत राहु शकत नाही. कोठेतरी सामाजिक/आर्थिक आणि सांस्क्रुतीक स्थ्यै-याची स्थिती गाठावी लागले. या संक्रमण काळात महापुरुषांनी प्रस्थापित केलेल्या सिधांतांचे फक्त वांझ गुनगाण अभिप्रेत नसते तर त्या सिद्धांतांना प्रत्यक्ष वर्तनाने, नव्य संशोधनाने व विचारांनी बलकटी देण्याची आवश्यकता असते. असे झाले नाही तर हा संक्रमण काळ लांबत जातो....यावरही चिंतन करण्याची गरज आहे. खरे तर आताच्याच पीढीवर ही जबाबदारी आहे कि ही संक्रमणावस्था एका अंतिम स्थितीत आणावी. ती पुढील पीढीवर ढकलण्याचे अन्याय्य क्रुत्त्य घडु नये अशी अपेक्षा व्यक्त करत असतांनाच म्हणावेसे वाटते कि संक्रमनावस्थेची म्हणुन जी काही स्वार्थी फळे घ्यायला काही लोक सज्ज असतात त्यांना मात्र हा कालखंड लांबेल तेवढा चांगलाच असतो. त्यातच त्यांचे व्यक्तीगत स्वार्थ निहित असतात. अशा लोकांना, त्यांच्या मतांना व मत्तांना प्रतिरोध झाला नाही तर मात्र संक्रमणावस्था लांबत जाते आणि त्यातच दुरगामी समस्यांची मुळे रुजलेली असतात. सध्या तरी ही संक्रमणावस्था लांबावी असे घदण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत व त्याचे खंत वाटणे स्वाभाविक आहे.
उदा. जसे राजकारण्यांना शेतकरी दरीद्र रहाणे अधिक सोयिस्कर असते, झोपडपट्ट्यांचे निर्मुलन नकोच असते तसेच आपल्याच समाजबांधवांना सतत ब्रेनवाशिंग करत त्यांच्या ख-या आर्थिक, सामाजिक व सांस्क्रुतीक बदलाची भुमिका न घेता उलट त्यांना संभ्रमीत ठेवणे आणि आपली नेत्रुत्वे बळकट करणे हाही सोयीचा उद्योग असतो. त्याचा फटका मात्र बसतो तो जनसामान्यांना.
हा समाज अन्य समाजघटकांपेक्षा अधिक वेगाने शिकला याला कारण बाबासाहेबांची प्रेरणा होती. परंतु "केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही" असे बाबासाहेबांनीच धारवाड येथील सभेत २८ डिसेंबर १९२९ रोजी भाषणात म्हटले होते, याचे स्मरण या सर्वच समाजांतील नवशिक्षितांना करुन देणे आवश्यक नाही काय? यातच ख-या प्रगल्भ समाजाची घडन होत प्रगतीची शिखरे पादाक्रांत होतील याचे भान यायला हवे.
जागतीकीकरण आणि समस्या
जागतिकीकरणाच्या लाटेमुळे आणि त्यामुळे ज्या वेगाने समाजव्यवस्था बदलत आहेत त्यांचा फटका तसा सर्वांनाच बसतो आहे. वेगाने होत चाललेले खाजगीकरण, सरकारने अगदी शिक्षणक्षेत्रातुनही क्रमशा: अंग काढत जाणे याच्या भविष्यातील परिणामांची जाणीव काही तरुण विचारवंतांना आहे. यामुळे एक नवी वर्गव्यवस्था निर्माण होवू लागली आहे. भारतातील आधीच विध्यमान असलेली जातीय उतरंड आणि त्यातुन निर्माण झालेल्या मानसिकता आणि त्याच वेळीस निर्माण होत चाललेली ही नवी आर्थिक उतरंड यांचा सामना करण्याची योजना आज दुर्दैवाने कोणत्याही समाजघटकाकडे नाही. राजकीय लोकांना तसे प्रबोधन अडचणीचे ठरते. विचारवंतांची, मग भले ते कोणत्याही समाजातील असोत, या जातीय आणि जागतिकीकरणामुळे नव्याने निर्माण झालेल्या आर्थिक उतरंडींचा परस्पर संबंध आणि त्यातुन निर्माण होत जाणा-या समाज-मानसशास्त्रीय पेचाचे विश्लेषन आणि त्यावरील उत्तरे शोधण्यात घोर अपयश आलेले आहे असेही स्पष्ट दिसते. खरे तर एकीकडे सर्वच समाजाची एक व अविभक्त असण्याची निकड, दुसरीकडे जातीयतेच्या परंपरागत भावना आणि दुसरीकडे वर्तमान स्थितीतील जातीव्यवस्थेच्या पार जाणारी निर्माण होवु पाहणारी जागतीक अर्थव्यवस्था व तिचे आपल्या समाजातील जातीयशीच पुन्हा जुळवले जाणरे संबंध हा एक मोठा पेच असनार आहे, पण त्यातील समाज-सांस्क्रुतीकतेवर व अर्थस्थीतिवर होत असलेल्या या नव्य आक्रमनाची जाणीवच नाही असे चित्र दिसते. आंबेडकरी समाजाने यावरही सखोल चिंतन करावे व भविष्याबाबतची व्युहनीती राबवावी, तर एक विराट आर्थिक भवितव्य घडवता येईल.
या जगतीकीकरणामुळे मानवी संबंधांत वेगाने बदल घडु लागले आहेत. अगदी कुटुंबसंस्था ते पार पती-पत्नींतीलही संबंधांवर त्याचा परिणाम होवु लागला आहे. हे वाढते तानतणाव एकीकडे आणि जातीय परिप्रेक्षातील प्रत्यही बाढतच चाललेले तणाव एकीकडे अशी अवस्था आहे. अनेकजण "काय घेणे आहे मला या समस्यांशी?" असे प्रश्न विचारत बाजुला होत स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतात हेही खरे, परंतु दुर्दैवाने त्यांनाही अंतत: मानसीक संघर्षाच्या सीमेवर पोहोचावेच लागते असे आजचे चित्र आहे. भविष्यात काय असेल हे आतातरी सांगता येणे कठीण आहे. त्यासाठी एक वैचारीक, नैतीक आणि सामाजिक संवेदनांचा मुलभुत जाणीवपुर्वक विकास करंण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब २८ आक्टोबर १९५४ मधील एका ह्रुद्द्य भाषणात म्हणतात, विद्या, स्वाभिमान आणि शील ही माझी तीन दैवते आहेत. हे विधान अत्यंत महत्वाचे व प्रत्येकानेच आदर्शवत मानावे असे आहे. द्न्यानामुळेच मानवी मन संतुलन साधत बौद्धीक प्रगती करु शकते. किंबहुना खरा भौतीक विकासही विध्येच्या बळावरच होवु शकतो. शिक्षण म्हनजे द्न्यान नव्हे. स्वाभिमानामुळे जीवनाला एक मानसीक बळ मिलते जे सर्व संकटांवर मात करायला मदत करते. आणि शीलामुळे मनुष्य अकारणच्या स्पर्धेत न पडता खरा जीवनविकास घडवुन आणु शकतो.
शिक्षणाचे होत जाणारे खाजगीकरण व अलीकडेच त्यासंदर्भात पारित झालेले विधेयक हाही एक धोका आहे. त्याबाबत हवा तेवढा रोष व्यक्त झाल्याचे दिसत नाही. किंबहुना शिक्षणाचे खाजगीकरण म्हनजे सरकारने आपली कल्याणकारी राज्याची भुमिका सोडुन भांडवलदारांच्या हातात समाजाच्या भवितव्याची जबाबदारी सोपवणे असाच होतो याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
या परिस्थितीत नोक-या हाच आता भविष्यातील जीवनयापनाचा मार्ग राहील याची ग्वाही देता येत नाही. उद्योगधंदे व व्यवसायांकडे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वळावे लागेल असे चित्र दिसते. त्याबाबतही प्रबोधनाची आवश्यकता वाटते.
परंतु प्रबोधनाची, सामाजिक उत्थानाची म्हणुन जी चळवळ असते ती कोठेतरी वेगाने लोप पावत गेलेली आहे. ती द्वेषमुलक होत केवळ गतेतिहासातील अन्यायाबद्दल आक्रोश करत समाजाला दिशाहीन करत चालली आहे. गतकाळात पराकोटीचा अन्याय झाला आहे हे खरेच आहे. त्याबाबतची खंत, दु:ख आणि वेदना व त्याबाबतचा संतापही अत्यंत न्याय्य आहे. पण तेथेच जनांना थांबवुन, नित्य नवे संभ्रम निर्माण करुन त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग अवरुद्ध करणे हे कितपत योग्य आहे यावरही चिंतनाची गरज आहे.
मला असे वाटते कि हीच एक संभ्रमावस्था आहे. ज्या सत्ताधा-यांनी/धर्मवर्चस्वतावाद्यांनी शेकडो वर्ष नाडले त्यांच्याशीही काही युती करतात...करावी...पण त्याचा नेमका पाया कोणता याचे भान नसतांना? युती ही समानतेच्या पायावर कोणाशीही करावी. हरकत असण्याचे कारण नाही. पण वापरुन घेतले जाण्यासाठीची युती ही अवमानास्पद नाही काय? असो.
भविष्याचा वेध घेण्याचे सामर्थ्य असणारा समाज व व्यक्तीच इतिहास घडवतात. तेच असाध्यही साध्य करत नवीन धेयांची निर्मिती करत आपला काळ गतीशील/प्रगतीशील ठेवत असतात.
भविष्य तेच घडवतात ज्यांच्या अंतर्मनात एक चेतता वन्ही असतो जो अशक्य ते साध्य करण्यासाठी निरंतर प्रेरीत करत असतो. बाबासाहेब ही एक महाउर्जा आहे. बाबासाहेब हे फक्त एका समाजाचे नव्हते. त्यांना तसे मानणे ही एक न पटणारी बाब आहे.
सांस्क्रुतीक समस्या

बौद्ध धर्मामुळे भारत देश महान, अस्प्रुष्यांना बौद्ध धर्माशिवाय दुसरा कोनताही अभ्युदयाचा मार्ग नाही, असे बाबासाहेबांनी वारंवार सांगीतले होते. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धम्म स्वीकारला व समतेचा, बंधुभावाचा करुणामयी बुद्धाचा मार्ग पकडला. त्यांचे "बुद्ध आणि त्याचा धम्म" हा क्रांतीकारी ग्रंथही लिहिला. दुर्दैवाचा भाग असा कि अन्य अस्प्रुश्य जातींनी तर सोडाच परंतु खुद्द महार समाजातील जवळपास १५ ते २०% लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही असे अंदाज वर्तवण्यात येतात. असे का झाले असावे? बाबासाहेबांचा द्रुष्टीकोन व्यापक होता, सर्वच हिंदु धर्मातील लांछनास्पद विषमतेला धर्माच्याच आधारावर कायम ठेवणा-यांना प्रत्युत्तर म्हणुन सर्व शोशितांसह बौद्ध धर्म स्वीकारुन उत्तर देण्याचा होता. परंतु बाबासाहेबांची व्यापक द्रुष्टी पेलली गेलेली दिसत नाही.
खुद्द बाबासाहेबांनाही एकाच जातीच्या चौकटीत बंदिस्त केले गेल्यामुळे तर असे झाले नसेल? खरे तर आज सर्वच पुर्वास्प्रुष्य बौद्ध धर्मात असायला हवे होते. समतेचा आधार सर्वांना मिळाला असता. एवढेच नव्हे तर त्यातुन एक राष्ट्रीय स्तरावरची वेगळीच सांस्क्रुतीक क्रांती घडली असती. पण तसे झालेले नाही. प्रामुख्याने महार समाजच बौद्ध झाला. अन्य समाज मात्र या सांस्क्रुतीक क्रांतीपासुन दुरच राहिला.
धर्मांतर झाले म्हनजे लगोलग पुरातन श्रद्धा तोडता येतात असे नाही. ते मानवी मानसिकतेच्या विरोधात आहे, हे मत घटकाभर मान्य केले तरी धार्मिक संक्रमण, म्हणजे एका धर्मातुन अन्य धर्मात प्रवेश करतांना व नव्या संद्न्या ते श्रद्धा स्वीकारत असतांना, किती काळ असावे?
बाबासाहेबांनी ज्या २२ प्रतिद्न्या प्रत्त्येक बौद्ध बांधवाला दिलेल्या आहेत त्यात जे नाकारायला सांगितले आहे, त्यांना मानसिक पातळीवर कितपत नाकारले गेलेले आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रथम आपण त्या प्रतिद्न्या कोणत्या हे पाहुयात:
१) मी ब्रम्हा, विष्णु व महेश याना देव मानणार नाही व त्यांची पुजा करणार नाही।
२) मी राम व कृष्ण याना देवाचा पुनरजन्म मानत नाही व त्यांची पुजा ही करणार नाही।
३) मी गौरी गणपती व ईतर कुठल्याही देविला मानत नाही व पुजाही करणार नाही।
४) मी देवाचा पुनरजन्म मानत नाही।
५) मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही, हा एक अपप्रचार आहे।
६) मी श्राद्ध करणार नाही व पिंडदान करणार नाही।
७) मी बुद्धाच्या शिकवणुकीच्या विसंगत वागणार नाही
८) मी कुठलेही कार्य ब्राह्मणाच्या हस्ते करणार नाही
९) मी सगळ्या मानव जातिला समान मानतो.
१०) मी समानता प्रस्थापीत करण्यासाठी कटिबद्ध राहीन
११) मी बुद्धाने सांगितलेला अष्टप्रधान मार्गाचे पालन करेन।
१२) मी बुद्धाने सांगितलेल्या १० पारमितांचे पालन करेन।
१३) मी समस्त प्राणीमात्रावर प्रेम करेन व त्यांचे रक्षण करेन।
१४) मी चोरी करणार नाही।
१५) मी खोटे बोलणार नाही।
१६) मी वैषयीक अपराध करणार नाही।
१७) मी मद्यपान व इतर कुठेल्याही नशेचे सेवन करना नाही।
१८) मी अष्टांग मार्गाचे पालन करेन आणी दया, करुना व प्रेमाचे रोज आचरन करेन।
१९) मी मानव जातीच्या विकासात बाधा घालणा-या व जातिभेद करणा-या या हिंसक अशा हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे।
२०) मी फक्त बुद्धांच्या धम्मावर विश्वास ठेवतो।
२१) मी बौद्ध धम्माचा स्विकार करतो, अन हाच माझा पुनरजन्म आहे असे मानतो।
२२) मी अशी प्रतिज्ञा घेतो की, या नंतरचे माझे जीवन मी बुद्ध व त्यांचा धम्म यांच्या शिकवणुकी प्रमाणे जगणार॥

या वरील प्रतिद्न्यांतील पहिल्या सात प्रतिद्न्या नकारात्मक आहेत. म्हणजे हिंदु देव-देवतांना नाकारणा-या आहेत. याच देवदेवतांमुळे वा त्यांच्या अवतारांमुळे जातीव्यवस्था अन्याय्य आणि बंदिस्त करण्यात हिंदु धर्ममार्तंडांना अभुतपुर्व यश मिळाले होते हेही खरेच आहे त्यामुळे त्यांना नाकारणे अत्यंत योग्य आणि स्वाभाविक आहे.
याबाबत काही लोक टिका करतात कि बौद्धजन या प्रतिद्न्यांचे पालन करत नाहीत. त्यात काही तथ्य असु शकते हे काही खालील उदाहरणांवरुन लक्षात येईल.
१. मांढरदेवी येथे काळुबाईच्या यात्रेदरम्यान जी चेंगराचेंगरी झाली त्यात जवळपास एक हजार भाविक ठार झाले. या भाविकांत जवळपास ३०० भाविक बौद्ध धर्मीय होते. हा व्रुत्तांत दै. लोकसत्तामद्धे आयु दिनकर झिंबरे यांनीच लिहिलेला आहे. यात लग्नानंतर काळुबाईला कुलदैवत म्हणुन दर्शनाला जाणा-या एका कुटुंबाचाही समावेश होता.
२. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या देवीला बसमधुन दर्शनासाठी निघालेल्या बसचा अपघात झाला. त्यात ८० लोक ठार झाले. त्यांत जवळपास ४० लोक नवबौद्ध होते.
३. महागायक पदाला पोहोचलेला अभिजीत कोसंबी या गुणी गायकाने विजयी घोषित होताच कोल्हापुरच्या अंबाबाईला अभिषेक केला होता. एवढेच नव्हे तर गातांना कपाळावर बांधलेल्या पट्टीत अंबाबाईचा अंगारा असल्यानेच हे यश मिळाले असे त्याने व्रुत्तवाहिन्यांना मुलाखती देतांना सांगितले. त्याचे वडील बौद्ध धम्म परिषदेचे कोषाध्यक्ष होते.
४. अभिजीत सावंत हा सर्वात पहिला राष्ट्रीय स्तरावरचा महागायक. व्रुत्तवाहिन्या जेंव्हा त्याच्या घरी पोहोचल्या तेंव्हा त्यांना बाबासाहेब व सिद्धीविनायकाचा फोटो शेजारी-शेजारी दिसला. त्यावर विचारलेल्या प्रश्नात तो म्हणाला कि गणपती ही कलेची देवता आहे म्हणुन मी सिद्धी विनायकाला मानतो.
५. अनेक उच्चपदावर गेलेले समाजबांधव गणेशोत्सव ते नवरात्रोत्सवांना हजेरी लावतात. अनेकांच्या घरात देव्हारेही असतात. बाहेर मात्र हेच लोक बाबासाहेब आणि तथागत भगवान बुद्धाचा जयघोष करत असतात.
मला असे वाटते कि वरील उदाहरणे बोलकी आहेत. त्यातुन बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिद्न्यांचे सोयिस्कर विस्मरण दिसत नाही काय?
त्याहीपेक्षा महत्वाचे म्हनजे धम्म आणि बाबासाहेब आंबेडकरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात आलेले हे जनतेचेच अपयश नाही काय? याचा अर्थ धर्मप्रचारक ही संस्था अपयशी ठरते आहे असे येथे म्हणता येईल काय? बौद्ध धर्म सर्वच पुर्वास्प्रुश्यच नव्हे तर तथाकथित स्प्रुश्या जातींतही पसरवणे हे अनुयायांचे...चळवळवाल्यांचे एक महत्वाचे कार्य नव्हते काय? मला वाटते जुन्या श्रद्धा तोडत पर्यायी जीवनशैली देणे आणि त्याचा प्रसार सर्वत्र करणे हे कार्य अनुयायांचे असते. ख्रिस्ताचा धर्म ख्रिस्ताने नव्हे तर त्याच्या अनुयायांनी जगभर नेला. पुरातन काळात ज्यांनीही बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी आटोकाट प्रयत्न करत त्याला सातासमुद्रापार नेले. त्यातील तत्वे ते अक्षरश: जगले. माझे मित्र आयु. मधुकर रामटेके हे बाबासाहेबांना दुसरा बुद्ध मानतात. आणि ते खरेच आहे. पण मग त्यांनी दिलेल्या प्रतिद्न्यांचे विस्मरण कसे होते, यावरही चिंतनाची गरज आहे.
चळवळीची गरज आहे काय?
चलवळ क्षीण झाली आहे. त्यातील पुर्वीचा जोष आणि नवोन्मेश क्रमश: अस्तंगत झालेला आहे. कही घटक द्वेषाधारीत चळवळ चालवत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे खरे, पण त्यातही नवोन्मेशाचा पुरेपुर अभाव आहे. चळवळीच्या विचारवंतांतही जेवढे राजकीय नेत्यांत असतील तेवढेच मतभेद आहेत.
यावर एक प्रतिवाद असा आहे कि चळवळ समतेसाठी होती आणि ती आता ब-यापैकी अस्तित्वात आली असल्याने ती चालु रहावी याची गरज नाही. साध्य एकदा मिळाले कि कशासाठी चळवळ करायची?
दुसरा मतप्रवाह असा आहे कि मुळात समता अजुनही द्रुष्टीपथात नाही. काही टक्क्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळाले म्हनजे समता आली असे म्हनता येणार नाही. त्यामुळे चळवळीची अद्यापही जीवंत असण्याची गरज आहे.
मला असे वाटते कि दोन्ही पक्ष चुकीची भुमिका घेत आहेत.
पहिला पक्ष जो म्हणतो कि चळवळीची गरज नाही त्यांनी खालील मुद्द्यांकडे लक्ष द्यावे:
१. पुर्वीएवढी जातीयता समाजात राहिलेली नाही हे विधान अर्धसत्य असुन मनांतुन कोणाच्याही जात गेलेली नाही. किंबहुना जातीय अस्मिता कधी नव्हे एवढ्या टोकदार झालेल्या आहेत.
२. जे जातीय संघर्ष कमी झाल्याचे चित्र दिसते त्यात खरा हात बाबासाहेबांनीच बनवलेल्या राज्यघटनेचा आहे. परंतु भारतीय मानसिकता मात्र बदललेली नाही. त्यामुळे खरोखर जातीय संघर्ष संपुष्टात आला आहे काय? तो सुप्त पातळीवर वावरत असतांनाच कोनत्या ना कोणत्या निमित्ताने उफाळुन येत नाही कि काय, आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी सशक्त चळवळीचे अस्तित्व नको कि काय यावरही या पक्षाने विचार करायला हवा.
दुसरा पक्ष जे म्हनतो त्यावरही खालील आक्षेप नोंदवले जातात, ते असे:
१. समतेच्या अधिष्ठानासाठी चळवळीने आजवर नेमके काय केले आहे याचा लेखाजोखा कोण देनार?
२. ज्या टक्क्यांना सामाजिक/आर्थिक स्थैर्य मिळाले त्यांच्याकडुन चळवळीसाठी कितपत योगदान घेतले गेले वा घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला गेला? किंबहुना या सुस्थिर घटकाचा प्रबोधनात टक्का किती? नसेल तर का नाही?
३. स्वत:च्याच समाजातील विषमता दुर करणासाठी चळवळीने नेमके काय कार्य आजवर केले?
४. वर्तमान व भविष्यातील प्रश्नांना उतरे शोधत तसे प्रबोधन करण्याचा कितपत प्रयत्न झाला वा होत आहे?

उदाहरणार्थ महार समाजात साडेबारा जाती आहेत. आज जरी जवळपास ८०% लोक बौद्ध झाले असले तरी सर्वच बौद्ध समान न मानता रोटी-बेटी व्यवहार पोट-जातीआधारीत करतात असे एक सर्वेक्षण सांगते. असे का? खरे तर जातींचा अंत हेच अंतिम उद्दिष्ट बाबासाहेबांनी सामोरे ठेवले होते, असे असतांना हे वास्तव योग्य आहे काय?
दाखल्यावरील धर्म आणि प्रत्यक्षात स्वीकारलेला धर्म यात विभेद का केला जातो हे अनेक विचारवंतांना न उलगडलेले कोडे आहे. त्या कोड्याचा निर्वाह व्हायला हवा. जो स्वीकारला आहे तोच धर्म जन्मदाखल्यावर असने अभिमानास्पद कि जो त्यागला आहे त्या अन्याय्य धर्माची नोंद ठेवने हे अभिमानास्पद?
चळवळ आजही आवश्यक आहे असे मला का वाटते त्याची कारणे अशी:
१. चलवळ ही निरंतर घडनारी घतना आहे, फक्त तिची ध्येये आणि उद्दिश्ट्ये काळानुसार बदलत असतात. चळवळा समाजच ख-या अर्थाने प्रगती साधत असतो. त्यामुळे चलवळीची गरज संपली आहे असे म्हनता येत नाही. किंबहुना प्रत्त्येक समाजालाच सातत्यपुर्ण कालसापेक्ष चळवळींची आवश्यकता असते.
२. दुसरे म्हणजे आजही किमान ४०% नवबौद्ध समाज (यांत धर्मांतर न केलेलेही आले) दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांना जीवनयापनासाठी मजुरी/हमाली सारखी कामे करावी लागत आहेत. त्यांचे सर्वच स्तरांवर शोषण होत आहे. त्यांचे आर्थिक आणि मानसिक उत्थान होण्यासाठीही चळवळीची गरज आहे.
३. आजही नवबौद्धांच्या ब-याचशा धार्मिक/तात्विक प्रेरणा य विगतात सोडलेल्या धर्मांत आहेत. हा संभ्रम दुर करणे आणि त्यांना तथागताच्या प्रशांत प्रांगणात नेत देव-इश्वर-पुनर्जन्मादी दैववादी संकल्पनांच्या कक्षेतुन सोदवण्याची गरज आहे. कारण तसे केले गेले नाही तर ना धड हिंदु ना धड बौद्ध अशी स्थिती निर्माण होईल आणि मग त्याचे निराकारण कसे करायचे हा मुलभुत प्रश्न निर्माण होईल. हा एक वेगळाच धोका आहे.त्याची नोंद चळवलवाले ते तत्वद्न्यान्यांनी घ्यावी ही अपेक्षा आहे.
४. अर्थिक स्तरांवर आणि त्याच वेळीस सामाजिक स्तरांवर मानसिक अडथळे टाळत सर्वांनाच कोणत्या पद्धतीने विकासाच्या मार्गावर नेत, पुर्वीच्या शोषकांपेक्षाही अधिक प्रगती करायला खरेखुरे प्रोत्साहन देईल अशा नव-तत्वद्न्यानाच्या मांडणीची गरज आहे.
५. दुस-यांच्या हवेल्यांचा विचार करु नका, आपली झोपडी असेल तरीही तिला आधी मजबुत करा असा बाबासाहेबांच्या म्हनण्याचा सारांश आहे. याचाच दुसरा अर्थ असा कि आपली व्यक्तिगत मानसिकता जोवर सम्यक तत्वद्न्यानाच्या आधारावर मजबुत होत नाही तोवर या अन्याय्य व्यवस्थेच्या महालांना तोडण्याचे स्वप्न पाहणे बेकार आहे असेच अप्रत्यक्षपणे बाबासाहेब म्हणत आहेत. प्रत्येक समाजघटकाची मानसिकता अशी निर्मळ आणि सबळ करण्यासाठी चळवळीची गरज आहे.

भवितव्याची दिशा

प्रत्त्येक व्यक्तीचे, समाजघटकाचे आणि राष्ट्राचे भवितव्याविषयक काही खास विचार असतात, स्वप्ने असतात. त्या स्वप्नांना
साकार करण्यासाठी निश्चित अशा योजना असतात. धोरणे असतात. ती धोरणे वेगवेगळी असु शकतात. त्यावरुन नेमके काय धोरण असावे याबाबत वादही असतात. परंतु विकास आणि प्रगतीचे, स्वाभिमानानाने व्यक्ती, समाज वा राष्ट्र म्हणुन जगण्याचे, इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्याचे स्वप्न मात्र सर्वांत एक समान धागा असतो.
महार समाज हा एक लढवैय्या समाज होता व आहे हे आपण मागील प्रकरणांतुन पाहिलेच आहे. या समाजाचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली असुन सर्वच समाजांचे त्याने प्रामाणिकपणे जीव धोक्यात घालुन रक्षण केले आहे हेही आपण पाहिले आहे. हा समाज भावनाशील असुन स्वभावाने अत्यंत मायाळु असाच आहे. या समाजाचा अन्य समाजघटकांकडे पाहण्याचा आणि अन्य समाजघटकांचा या समाजाकडे पाहण्याच्या द्रुष्टीकोनात अर्थातच फरक आहे आणि याचे कारण म्हणजे या दोन समाजांत (धार्मिक व सत्ताधारी जाती एकीकडे तर अन्य सर्वच शुद्रातीशुद्र एकीकडे) शोषित आणि शोषक असा विभेद आहे. वैदिक वर्चस्ववादी संस्क्रुतीने आपल्या स्वार्थी प्रेरना जतन करण्यासाठी अखिल समाजाचा बळी चढवला आहे हा इतिहास आहेच. त्यासाठी इतिहासाची, धर्मेतिहासाची कशी मोडतोड केली आहे हेही आपण पाहिलेच आहे. याबाबतचा क्रोध आणि संतप्त उद्गार बहुजनीय चळवळीमधुन वारंवार उपटत असतात. परंतु या शोषकांना शिव्या घालत बसल्याने आपली प्रगती होणार नसुन ती आपली आपल्यालाच साध्य करावी लागणार आहे.
मला वाटते खरा अभ्युदय खालील मार्गांत आहे. ते असे:
१. राजकीय आणि आर्थिक सत्ता: मानवी समाजाच्या प्रगतीची दिशा ही आर्थिक आणि राजकीय सत्तेतच सामावलेली असते. जोवर या सत्ता मिलवता येत नाहीत तोवर खरी प्रगती साध्य करता येणार नाही.
२. सांस्क्रुतीक फेरमांडनी: संस्क्रुतीचे अर्थव्यवस्थेचे खरे निर्मानकर्ते आणि त्याचा फायदा घेणारे निरंकुश (अगदी आजच्या लोकशाहीतही) सत्ताधारी आणि धर्मवर्चस्ववादातुन पुन्हा राजकीय सत्ताच मिळवु पाहनारे यांत विभेद करावाच लागेल. समाजेतिहासाचा मी आधीच्या प्रकरणांत मांडलेला क्रम पुन्हा तुम्ही तपासुन घ्या. निर्माणकर्त्यांनीच त्यांची धर्मिक सोयीसठी निर्मिती केली आणि कानामागुन येत तेच तिखट झाले. सत्ताधारी जाती याच वर्गाच्या जीवावर जगल्या. आजही जगत आहेत. त्यामुळे संस्क्रुती मुळात कोणी निर्माण केली? जीवनोपयोगी शोध कोणी लावले? शस्त्रे कोणी बनवली, त्यासाठी कसे आणि कोनते लोह/पोलाद बनवावे याचे शोध कोणी लावले? अन्न आवश्यक पण जाती-पाटे वरवंटे कोणे शोधले आणि कष्ट घेत अव्याहत कोणे बनवले? ती नसती तर आज मानवी खाद्य संस्क्रुती काय असती? लेणी खोदायला कोणते क्षत्रीय वा ब्राह्मण आले होते? त्या महान कलाक्रुतींची सौदर्यपुर्ण निर्मिती करणा-या, वैद्न्यानिक द्रुष्टीकोन असणा-या त्या पाथरवट (वडारी) समाजाचे मानवी संस्क्रुतीवर गेली ५ हजार वर्ष उपकार आहेत. असेच आपण सुतार, तेली, कोळी-कोष्टी, अशा अठरापगड जातींबद्दल बोलु शकतो. त्यांना आज समाजव्यवस्थेने आणि नव्या अर्थव्यवस्थेने कोठे ढकलुन दिले आहे? या निर्मानकर्त्या लोकांवर आक्रमणे होवू नयेत, त्यांचे जीवित आणि वित्त सुरक्षीत रहावे यासाठी जीवाची बाजु कोणी लावली? त्या महारक्षकांची स्थिती अत्यंत केवीलवानी कोणी केली?
रोष स्वाभाविक आहे. पण हे सारेच मुळात निर्मानकर्ते आहेत तसेच लढावुही आहेत. भविष्यातील वाट ही हातात हात धरुनच पुढे गेली तर राजकीय सत्ता आणि मग सर्वांचेच ख-या अर्थाने विकसन संभाव्य आहे. "जातीचे नको...विचारांचे मताधिक्य हवे" हे बाबासाहेबांचे मत येथे नुसते उपयुक्त नाही तर ते अत्यंत व्यापक संदेश देते असेच मला येथे नमुद करावेसे वाटते.
आपली सांस्क्रुतीक पाळे-मुळे शोधत नव्याने सांस्क्रुतीक फेरआखनी करत आपल्याला भवितव्यातील नवसंस्क्रुतीचा एल्गार केला पाहिजे. जगभरात खालुन वरचा इतिहास" लिहिला जात आहे. आपल्यालाही सामान्य माणसांचा/जातीघटकांचा उज्ज्वल इतिहास, त्याचे संस्क्रुती घडवण्यातील योगदान सतत्याने संशोधन करत मांडले जायला हवे. त्यातुनच सर्व समाजांना आपापले आत्मभान मिळवता येइल. आजच्या विभक्तीकरणातील मुळचे एकाकारत्व पहावे लागणार आहे.
३. वैचारिक सत्ता: वैचारीक सत्ता जोवर प्रबळ होत नाही तोवर जातीअंत होणे शक्य नाही. विचारशील समाजच खरी सामाजिक क्रांती घडवुन आणु शकतो. नव्या विचारांचे सर्जन, संवर्धन आणि जोपासना हे कोणत्याही सुध्रुढ समाजाचे अव्यवच्छेदक लक्षण असते. ही वैचारीक सत्ता म्हणजे कोणाला तुच्छ वा हीन लेखण्यासाठी नसुन स्वतंत्रपणे प्रगल्भ उंची गाठणे व सर्वंच्याच कल्याणासाठी अभिप्रेत असते. भारतात युरोपात जशी मध्ययुगात कला ते साहित्य, अर्थव्यवस्था ई. क्षेत्रात फार मोठी वैचारीक क्रांती झाली. त्यामुळे जगाचा चेहरा-मोहरा बदलला. महात्मा फुले आणि डा. बाबासाहेब आंबेडकरांनी तशी वैचारीक क्रांती देशात घडवली...पण आपण तेथेच थंबलो आहोत. त्या वैचारिकतेचे संवर्धन आणि जोपासना करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. समता-बंधुता-स्वातंत्र्य या संकल्पना कागदावरच राहिल्यात कि काय असे वाटण्याची स्थिती आहे.
भवितव्य घडवलेच पाहिजे. तेही विराट. त्यातच राष्ट्राचा आणि शोषित समाजांचा अभ्युदय आहे.



Thursday, December 8, 2011

महार शब्दाची व्युत्पत्ती

आपल्याला येथे सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम शोधायचा आहे. यासाठी पुर्वी अनेक विद्वान व डा. इरावती कर्वेंसारख्या विदुषिंनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...पण यातुन महार हा शब्द कोठुन आला हे मात्र स्पष्ट होत नाही, महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.

"म्रुताहारी" (म्हणजे म्रुत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणुन) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: म्रुत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे म्रुताहारी बुद्ध धर्माच्या द्न्यात इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मुळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.

शिवरामपंत भारदे म्हणतात कि महारचे मुळ "मह-अर" म्हणजे अरण्यात पर्वतांच्या गुहेत राहणारा वा अरण्य वा गुहांचा नाईक हे आहे, म्हणुन त्याचे काम वाटाड्याचे ठरवले. महारांवर वाटाड्या ही अन्य अनेक महत्वाच्या कामाबरोबरच एक जबाबदारी होती. त्यमुळे ही व्युत्पत्तीही स्वीकारता येत नाही.

महाआहारी (खुप खाणारे) असणा-या लोकांना महार म्हणु लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रोबेर्टसन) मद्धे दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. उलट महार समाजाचे जेवढे कुपोशण झाले तेवढे अन्य कोणत्याही समाजाचे झाले नसेल.

म्रुतहर या शब्दापासुन महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा डा. रा. गो. भांडारकर यांनी केला आहे. पण पुन्हा म्रुत जनावरांना वाहुन नेणे ही जबाबदारी महार समाजावर त्यांच्या सामाजिक व आर्थिक अवमुल्यनानंतर आलेली आहे. त्यामुळे ही व्युत्पत्तीही टिकत नाही.

महात्मा फुले यांनी महा-अरी, म्हणजे आर्यांचा मोठा शत्रु अशी व्युत्पत्ती सुचवलेली आहे. परंतु प्रत्यक्षात महार लोक गाव-नगरांचे रक्षण करत असत, त्यामुळे ते शत्रु असु शकत नाहीत. शत्रुवर रक्षणाची महत्वाची जबाबदारी कोणीही टाकणे असंभाव्य आहे.

दुसरे असे कि महार एक जात म्हणुन कोनत्याही स्म्रुती/पुराणांमद्धे उल्लेखिलेली नाही. अस्प्रुष्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्म्रुत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्म्रुतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्प्रुष्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार व विष्णुस्म्रुतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्प्रुष्य आहे. त्यामुळे मुलात जन्मभुत अस्प्रुष्यता भारतात नेमकी कधी आणि का आली असे निश्चयाने सांगता येत नाही. परंतु अस्प्रुष्यतेचा उगम दहाव्या ते बाराव्या शतकातच शोधावा लगेल, कारण तत्पुर्वी चांडाळ वगळता अन्य कोणत्याही जातीला अस्प्रुष्य मानले गेलेले नाही.

वर्णसंकरातुन अस्प्रुष्य जातींचा विकास झाला हे मनुस्म्रुतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. जाती या विशिष्ट सेवा-उद्योगातील कौशल्यातुन निर्माण झालेल्या आहेत. आपल्या व्यवसायात अन्यांनी पडुन स्पर्धा निर्माण करु नये म्हणुन जातीव्यवस्था सैलतेकडुन बंदिस्ततेकडे गेली असेच आपल्याला समाजव्यवस्थेच्या एकंदरीत प्रवासातुन दिसते. याला कालौघात बदलत गेलेली आर्त्झिक, राजकीय आणि धार्मिक स्थिती आहे हे आपण मागील प्रकरणात पाहिलेच आहे.

मनुस्म्रुतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात, अगदी पुराणांतही महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल ई. भारतात अस्प्रुश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही. तसे असते तर उल्लेख आले असते. याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्म्रुतीकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्प्रुष्य बनवले गेलेले दिसते, त्याचेही विश्लेषन येथे आपल्याला करावयाचे आहे.
मग प्रश्न असा उद्भवतो कि "महार" ही मुळात (पुरातन काळी...सिंधुकाळी) जात होती काय?
महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक द्रुष्टीक्षेप टाकुयात. महारांमद्धे आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे ई. आडनावे आढळतात.

ही आडनावे महारांनी ते ज्यांच्या सेवा करत होते त्या उच्चवर्णीयांतुन उचलली असा दावा केला जातो, तो खरा नाही. कारण महार संपुर्ण गावांची रक्षकसेवा करत असत. तेंव्हा ते एखाद्या विशिष्ट घराण्याचे आडनांव उचलतील हे असंभवनीय आहे.

या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक पुरातन काळी कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतुन कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात विभाजन होत तुकडे पडत गेले.

त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातुन विकसीत झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महलक्ष्मी ई.) त्याचवेळीस या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्प्रुष्तेचा काळात अन्य मंदिरांत स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहु शकतो. धनगर समाजानेही आपली अस्प्रुष्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत आणि ती आज महत्ता मिळवुन बसलेली आहेत हा अनुभव आपण घेतो.

म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. समाजाच्या विकासाच्या ओघात त्या-त्या व्यवसाय-सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास वा नवीन शोध लागल्याने वा नव्या सेवांची गरज भासु लागल्याने तसतसे त्यात अन्य समाजघटकातील लोक त्या विशिष्ट व्यवसायाबाबत आवड व कौशल्य असल्यामुळे वा केवळ चरितार्थासाठी प्रवेश करतात. त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो. अशा रितीने असंख्य व्यवसाय कालौघात जगभरच निर्माण झालेले दिसतात, परंतु त्यांना आवडीनुसार कधीही पेशा बदलण्याचा जन्मदत्त अधिकार होता. एके काळी तो भारतातही होता.
उदाहरणार्थ जन्माने कोळी असलेल्या व्यासांनी व वाल्मिकींनी विश्वविख्यात महाकाव्ये लिहिली. इतरा दासीचा पुत्र असलेल्या ऐतरेयाने ऐतरेय ब्राह्मण लिहिले. कालिदास व शुद्रक या कथित शुद्रांनी महाकाव्ये ते विश्वविख्यात नाटके लिहिली. सातवाहनांना पुराणांनी शुद्र मानले होते. सातवाहन हे औंड्र (आंध्र हे प्राक्रुत रुप) या घराण्यातील असुन ऐतरेय ब्राह्मणात त्यांचा शुद्र मानले आहे. हा मुळचा पशुपालक समाज, परंतु त्यांना सत्ता स्थापन करण्यात, म्हणजेच क्षत्रियाचा मेशा निवडण्यात अडचण आली नाही हेही स्पष्ट होते.
आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत हे आपणास माहितच आहे. उदा. शिंपी, सोनार, न्हावी, कुंभ्रार ई.
म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारीत असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
त्यासाठी मी सुरुवातीलाच वर्णीत केलेला महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासुन घेवुयात.
अ. महार हे मुख्यत: ग्रामरक्षक होते...चो-या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपु शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भुमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या व गांवशीवेच्या सीमांबाबतचा वाद मिटत तर होताच पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इ.स. च्या पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व विदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातुन जातांना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे.
क. सरकारी खजीना (महसुल) प्रामाणिकपणे व सुरक्षित रित्त्या तालुक्याला पोहोचवण्याचे कामही तो करत असे.
ड. चोरांचा माग काढणे, पकडणे व मुद्देमाल परत मिळवणे.
ही झाली महारावरची मुख्य जबाबदारी. याशिवायही त्याला इतरही अनेक प्रशासकीय कामे करावी लागत असत. उदा. जन्मम्रुत्युच्या नोंदी ठेवणे, गांवात येना-या-जाणा-यांवर लक्ष ठेवणे, संशयिताला वेशीवरच अटकाव करणे इ.
परंतु त्याचे अत्यंत महत्वाचे कार्य होते ते म्हणजे रक्षकाचे हे आता स्पष्ट झाले असेल. म्हणजेच गावाचे/व्यापा-यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.

महारक्ख (महारक्षक) म्हणजेच आजचा महार समाज
या दोन मुद्द्यांवरुन मला स्पष्ट दिसते कि "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राक्रुत/पाली-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. आणि हीच सद्न्या महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोनतीही नाही हे जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुनच सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकिय अस्थिरता, धामधुम आणि कधी पुर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जीवंत राहुच शकत नव्हती.
यासाठी आपल्याला उपलब्ध पुराव्यांचा विचार करायचा आहे. महारक्षक व महारक्ख हे शब्द संस्क्रुत व पाली साहित्यात असंख्यदा येतो. महा धम्मरक्ख, महा लेखारक्ख (लेखागाराचे रक्षण करणारा) तसेच महा रक्ख अशा स्वरुपात आपल्याला या शब्दाचे उल्लेख मिळतात.
रक्ख या शब्दाचा इंग्रजी व पाली शब्दकोशात रक्ख म्हणजे रक्षण असाच दिलेला आहे.
महावंसमधील प्रकरण LXXIVI मद्धे रक्ख नामक सेनापतीच आहे.
श्रीलंकेतील ब्राह्मी शिलालेखांत (Inscriptions of Ceylone) रक्ख व महारक्ख हा शब्द वारंवार येतो. हा शब्द नगर/ग्राम व व्यक्तिगत रक्षक अशाच अर्थाने वापरला गेला आहे.
कालिदासाच्या रघुवंशात रक्षक व महारक्षक हे पदनाम वारंवार येते.
सम्राट अशोकाने महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार करायला पाठवले होते त्याचे नांव धम्म महारक्षित असे होते.

सातवाहन आणि महारक्ख

आजची मराठी ही सातवहनकालाच्या माहाराष्ट्री प्राक्रुताचे देणगी आहे. महाराष्ट्र हा महारट्ठ या शब्दापासुन बनलेला आहे. रट्ठ म्हणजे प्रांतांचे जे विभाग होते ते. या रट्ठांचे जे प्रमुख केंद्रवर्ती सत्तेकडुन नेमले जात त्यांना महारठी म्हणत. सिमुख सातवाहनाने अशाच महारठीच्या नागणिका या कन्येशी विवाह केला होता. या महारठींच्या तत्कालीन काळात बदल्याही होत असत. महारट्ठांचे कार्य हे आजच्या जिल्हाधिका-याप्रमाने असे. याच वर्गातुन मराठा समाजाचा उदय झाला असे उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. तिलाही पुढे एक जात बनवण्यात आली.
महाभोज हे एका परीने सामंत असत व ते अधिक रट्ठांवर नियंत्रण ठेवत. या महाभोजांची मात्र जात बनल्याचे आढळत नाही कारण त्यांची मुळातील अल्प संख्या.
महारक्ख हा मात्र व्यापक समाज होता. सातवाहन काळातही ग्रामे व नगरांभोवती सिंधु संस्क्रुतीप्रमाणेच कोट बांधण्याची प्रथा होती. स्वाभाविकच प्रत्त्येक ग्राम व नगराच्या कोटांची रक्षव्यवस्था पाहण्यासाठी रक्षकांची...रक्खांची नियुक्ती केली जात होती. या रक्खांच्या प्रमुखाला महारक्ख असे संबोधले जात होते. ग्रामसीमांचे रक्षण करण्यासाठीही रक्षक नेमले जात होते असे गाथासप्तशतीवरुनही दिसुन येते. महारक्ख या पदावरील व्यक्तींत बदल होत असल्याने जवळपास सर्वच रक्खांना पुढे महारक्ख हे पद कधीनाकधे उप्भोगायला मिळाले असल्याने ते व त्यांचा परिवारतील सर्वच महारक्ख बनले. असेच महारट्ठांबाबतही झालेले आपल्याला दिसते.
"महा" हा शब्द माहाराष्ट्री प्राक्रुतात तसेच पालीत असंख्यदा वापरला गेलेला आहे हेही एक विशेष. उदा. महावंस, महास्वामी, महारक्ख, महाबोधी, महासेना, महालेखारक्ख, महायान, महाविहार...इ. "महा" या शब्दातुन प्रमुख...मुख्य असा अर्थ प्रतीत होतो.
"रक्ख" हा शब्द पाली साहित्यात राक्षस या अर्थानेही वापरला गेल्याचे आपल्याला दिसते. परंतु त्यात आस्चर्य वातण्याचे काहीच कारण नाही. राक्षस या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात "रक्षति इति राक्षस:" (रक्षण करतो तो राक्षस.) भारतीय समाज हा असुर संस्क्रुतीतुनच विकसीत झालेला आहे. असुर शब्दाला जसे कालौघात बदनाम केले गेले तसेच राक्षस या शब्दालाही. हे कार्य पुराणकारांनी असुर संस्क्रुतीची महत्ता घटवत वैदिक अवगुंठण चढवण्याचा नादात केले आहे हे मी "असुर कोण होते?" या प्रदिर्घ प्रबंधात केलेले आहेच.
थोडक्यात एका मुळच्या बलाढ्य संस्क्रुतीला व त्यांचा युद्धायमान प्रेरणांना हतोत्साहित करण्यासाठी ही एक मोठी क्लुप्ती वापरली गेली असे स्पष्टपणे म्हनता येते.
थोडक्यात आजचा महार समाज हा ग्राम/नगर/व्यापा-यांच्या रक्षणासाठी अहोरात्र राबणा-या महारक्खांचा समुदाय आहे हे येथे सिद्ध होते.
कालौघात महारक्ख या शब्दाचा "क्ख) गळुन फक्त महार हा शब्द शिल्लक राहिला. असे असले तरी "महारकी करणे" (महारक्खी करणे) हा भाग उरलाच. आणि या समाजाचे कितीही अवमुल्यन केले गेले असले तरी, त्यांना कालौघात शुद्रातीशुद्रांत ढकलले गेले असले तरी त्यांच्या पुर्वांपार रक्षणाच्या मुळ जबाबदा-यांत कसलाही फरक स्वातंत्र्यपुर्व काळापर्यंत पडलेला दिसत नाही यावरुन महारक्ख म्हणजेच आजचे महार असे मला निर्विवादपणे म्हणता येते.
महार जमात ही नैसर्गिक रित्त्याच लढवैय्या आहे. ब्रिटिश त्यांना मार्शल रेस का म्हनत हे आता पुरेसे स्पष्ट व्हावे.
युद्धातील सैनिकाला फक्त युद्धकाळात लढावे लागे. परंतु महारक्खांना पुरातन काळापासुन रात्रंदिवस डोळ्यात तेल ग्घालुन गावशिवेचे व वेशीचे रक्षण करावे लागे, त्यामुळे अधिक दक्ष व पराक्रमी असण्याची मुलभुत आवश्यकता होतीच. आणि ती या समाजाने जपली.

उदय

महार समाजाचा उदय नेमका कधी झाला याचे भौतिक/लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. मुलता: ही प्रत्त्येक ग्रामस्तरावर व नगरस्तरावर रक्षण देणारी सेवासंस्था असल्याने तिच्या उदयाबद्दल फारसे लिखित पुरावे ठेवण्याची तत्कालीन समाजाला गरज भासली नसावी. शिवाय ही एक वैशिष्ट्यपुर्ण सेवा आहे. म्हणजे शांततेच्या काळात त्यांचे अस्तित्व असुनही ते जानवत नाही. आजही पोलिसांबाबत असेच घडते. त्यांच्या अस्तित्वामुळेच शांतता असते हे खरे पण त्याचे मुल्ल्य कळत नाही. अनागोंदी, परचक्र वा दरोडेखोरांचे हल्ले होतात व रक्षकांना प्राणपनाने लढावे लागते तेंव्हाच त्यांचे महत्व लक्षात येते. अशा लढवैय्यांच्या स्मारकशिला आपल्याला सर्वत्र आढळतात.
समाजेतिहासाचा प्रवाह कसा वाहतो याचा अंदाज घेतला तर जेंव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेंव्हाच हा समाज आपल्याच समाजातुन लढवैय्या व्यक्तींना नागर/ग्राम रक्षणासाठी नियुक्त करतो. त्याखेरीज समाजव्यवस्था शांतता आणि सुव्यवस्थेचे सुख उपभोगुच शकत नाही. त्यासाठी रक्षकयंत्रणा अत्यावश्यक ठरते.
युद्धातील सैनिक आणि नागर/ग्राम रक्षक यात मुलभुत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रु सैन्यावर तुटुन पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. त्याच्यात फक्त लढवैय्येपणाचा गुण पुरेसा नसतो तर अन्वेषनाची, हेरगिरीची तल्लख बुद्धीमत्ताही तवढीच आवश्यक असते ज्याची सैनिकांना गरज नाही. असे लोक आहे त्याच समाजातुन निवडुन, त्यांना प्रशिक्षित करुन नियुक्त केले जात होते. तेंव्हा ही जात जन्माधारीत नव्हती तर फक्त गुणाधारीत होती. पुढे जातीव्यवस्थेचा रोग या संस्क्रुतीला एकुणातच लागला तेंव्हा ही एक वंशपरंपरेने कर्तव्ये करत असतांनाच जात बनली. महाराष्ट्रात माहाराष्ट्री प्राक्रुतातुनच मराठीचा उदय झाल्याने महारक्खाचे महार हे संकःएपाने नांव बनले. इतर प्रांतात मात्र समान पेशाच्या जातींचा उगमही या पद्धतीने शोधता येईल असे मला वाटते.
शत्रुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासुनची आहे. सिंधु संस्क्रुतीच्च्या उदयाचा काळ हा किमान साडेसहा हजार वर्ष जुना आहे. तटबंदीयुक्त नगरे/ग्रामे आली कि त्यांच्या रक्षणाची, पहारे ठेवण्याची गरज आलीच. त्याच काळात रक्षकसंस्था उदयाला आली असे ठामपणे म्हनता येते. तसे पुरावेही "पोलिस अडमिनिस्ट्रेशन इन अन्शंट इंडिया" या ग्रंथात दिलेले आहेत.
यावरुन रक्षक संस्था ही तेवढीच म्हनजे किमान साडेसहा हजार वर्ष पुरातन आहे असे म्हनता येते.

कोटाबाहेर वसती का?
महार समाजाला गांवकुसाबाहेरचे वास्तव्य होते/आहे हे एक वास्तव आहे. ही वस्ती शक्यतो पुर्वेलाच असे हेही एक वास्तव आहे आणि बव्हंशी गांवकुसांची द्वारेही (वेस) पुर्वाभिमुखच असत हेही एक वास्तव आहे.
रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशीरा लागेल म्हणुन कधीतरी रक्षकांनी गाव/नगराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: क्रुषिप्रधान होती व शत्रु नगर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. त्यांना तात्काळ प्रतिकार केला जावा व हल्ला व हानी टाळण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केली गेली असावी. कारण शेते जाळत आत घुसण्याची शत्रु वा दरोडेखोरांची प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणा-या रक्षकांची वसती केली गेली असावी असे मला वाटते. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भुषवत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणुन ओळखली जावु लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती-स्म्रुती-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवुन ठेवले असेल याचे हेच कारण आहे कि परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मुलभुत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी द्न्यात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमने/पर-आक्रमने यात तर वाटेत येतील त्या गावांत लुटालुट- जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहुन गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जीवाचा धोका पत्करुन उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहीली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागलेले आहे.
२. महार समाज प्राय: गरीबच राहीला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालुन करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत द्न्यात इतिहासातही दिसत नाही.
३. जमीनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत एवढ्या त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मद्धेच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
५. महार समाजावर अस्प्रुष्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असुनही आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती क्रुतद्न्य असले पाहिजे हे लक्षात येइल.
त्याच वेळीस महारांचा इतिहास पुरातन व गौरवशाली असुन धर्ममार्तंडांनी (आणि अन्य समाजांनीही) त्यांना कितीही हीण सामाजिक दर्जावर नेवुन ठेवले असले, अत्यंत घ्रुणास्पद वागणुक दिली असली तरी त्यांचे देशाच्या इतिहासातील हे कार्य विसरणे हा क्रुतघ्नपणाच आहे याबाबत शंका बाळगु नये, बाळगलीच तर फक्त शरम. ज्यांच्या जीवावर निर्घोर झोपा काढल्या त्यांनाच अशी वागणुक देणे हे अमानवी तर होतेच पण त्याहीपेक्षा सारेच धर्माचे गौरवगान गात धर्मावरच कसे अविरत बलात्कार करत राहिले यातच या धर्मावनतीची बीजे होती...आणि म्हणुनच हा धर्म त्यागावा लागला हेही लक्षात ठेवले पाहिजे.


Sunday, December 4, 2011

रक्षक संस्थेचा इतिहास

महार कोण होते हे नीट समजावुन घ्यायचे असेल तर सर्वप्रथम नगर-ग्राम रक्षक संस्थेचा इतिहासही समजावुन घ्यायला हवा.
सैन्यदले ही राजकीय सीमांचे रक्षण करत असत. परचक्र आले वा आक्रमण करायचे असले तर युद्धात सैन्यच कामी येई. आद्य काळात खडे सैन्य अशी व्यवस्था नव्हती, तर लढु शकणारा प्रत्त्येक नागरिक युद्धात भाग घेत असे. एका अर्थाने ही एक पार्ट टाईम व्यवस्था होती. परंतु जसजसा राज्यांचा आकार वाढु लागला, तसतशी मात्र खड्या सैन्याची आवश्यकता भासु लागली. सैनिकी पेशा याच काळात, म्हणजे सनपुर्व २००० च्या आसपास पुर्णवेळ व्यवसाय बनला. यालाच आपण आद्य क्षत्रीय वर्ण म्हणु शकतो. तत्पुर्वी तो अस्तित्वात असण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही.

या काळात जनसंख्या वाढत गेली तसतशी नगरे व ग्रामांची संख्या वाढत गेली. नगरांना व ग्रामांना खालील धोके होते.

१. चो-या व दरोडे.
२. चोर-दरोडेखोरांकडुन वा आक्रमकांकडुन शेतीची व ग्रामे-नगरांची नासधुस-जाळपोळ.
३. गावाच्या वा नगराच्या हद्दीतुन जाणा-या येणा-यांकडुन निर्माण होवु शकणारा संभाव्य धोका.
४. नागरिकांनीच सारा/कर चुकवणे, लांड्यालबाड्या व फसवणुकी करणे तसेच राज्याच्या/ग्रामाच्या हितसंबंधांना धोका पोहोचवणे.

यासाठी नगरप्रमुख व ग्रामणी यांच्यावर ज्या जबाबदा-या टाकल्या जात असत त्या अशा.
१. गाव/नगरकुसाचे रक्षण.
२. ग्राम/नगर सीमांची अचुक माहिती ठेवणे.
३. ग्राम-नगरात येणा-या प्रत्त्येक बाहेरच्या माणसांची नोंद ठेवणे, आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर नजर ठेवणे.
४. ग्रामहद्दीतुन जाणा-या व्यापा-यांच्या रक्षणाची हमी घेणे. (जर त्या ग्राम/नगरहद्दीत व्यापा-याचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई ग्रामणीने करुन द्यायची असे.)
५. प्रवाशांना आवश्यकता भासली तर पुढील मार्ग दाखवण्यासाठी वाटाड्याची नियुक्ती करणे व त्याचे संरक्षण करणे.
६. नगर/गांवात चोरी/दरोडा वा हिंसक घटना घडली तर त्याचा तपास करणे. अपराध्याला दंडाधिका-यासमोर नेणे व आवश्यक पुरावे सादर करणे.
७. व्यक्तिगत मालकीच्या शेतीचा वा ग्रामसीमांबाबतचा तंटा सोडवणे व त्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी ठेवणे.

भारतातील नगरव्यवस्था व ग्रामव्यवस्था ही बव्हंशी स्वयंपुर्ण होती. ग्रामणी (वा गोप, म्हणजे आजचा पाटील) हा ग्रामाचा सर्वोपरी जबाबदार अधिकारी असे. त्यच्यावर केवळ वरीलच नव्हे तर ग्रामहद्दीतील नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद ठेवणे, त्यावर देखरेख करणे, सारा/कर जमा करणे व तो राजकोषात भरणे याही जबाबदा-या असत. त्याचा मोबदला म्हणुन राजाकडुन त्याला वतने दिली जात.

नगरांची प्रशासन पद्धती ही साधारणपणे ग्रानव्यवस्थेप्रमानेच होती. नगरप्रमुखाला नागरका, नगरपाल वा पुरमुख्य असे पद होते. सातवाहन काळात याच पदाला महारक्ख असे प्राक्रुत नाम होते. मेगास्थेनिसने याबाबत बरेच लिहुन ठेवले आहे. नागरकाची मुख्य जबाबदारी असे ती म्हणजे नगरात शांतता प्रस्थापित ठेवणे. मद्यालये, द्युतग्रुहे, गणिकालये यावर देखरेख ठेवणे, परकीय नागरिकांची येण्यजाण्याची नोंद ठेवणे आणि त्यांच्या हालचालींचा वेध घेणे, चो-या होणार नाहीत वा कोणाच्या वस्तु हरवल्या तर त्या शोधुन देणे, नगराच्या हद्दीत आलेल्या भटक्या समाजावर देखरेख ठेवणे ई. जबाबादा-या असत. एका अर्थाने आजचा पोलीस सुपरिटेंडेंट जे कार्य पहातो तेच कार्य हे करत असत.

अर्थात सर्वोच्च अधिकारी ग्रामणी वा नगरप्रमुख असला तरी तो स्वता: व्यक्तिशा: उपरोल्लिखित जबाबदा-या सांभाळणे शक्यच नव्हते. मेगास्थीनिज लिहितो त्याप्रमाणे नगर व ग्रामरक्षणासाठी रक्षक दले असत. कोटाचे, वेशीचे रक्षण, रात्री गस्त घालणे, हल्ला झाला तर प्रतिकार करणे व तशी माहिती नगरप्रमुख वा ग्रामणीस वेळीच देणे, व्यापारी तांडे वा प्रवाशांचे रक्षण करणे, चोर पकडणे इ. पोलीसी कामे रक्षकांनाच करावी लागत.

त्या कामांसाठी अर्थातच कुशल, चाणाक्ष, धोके पत्करणा-या आणि लढवैय्या लोकांची गरज होती. त्यांच्या अस्तित्वाखेरीज शांतता व सुव्यवस्था राखणे, प्रजेच्या वित्त-जीविताची रक्षा करणे असंभवच होते.

कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार अशा रक्षकांना नियमित रोख वेतन दिले जात असे व तसा आग्रहही आहे.

भारतीय धर्मशास्त्रात, ग्रीक व रोमन लोकांप्रमाणे देव व मनुष्य हातात हात घालुन कायदा-शांतता व सुव्यवस्था याची काळजी घेतात असे म्हटले आहे. या बाबतीत ऐतरेय ब्राह्मनामधील एक कथा रोचक आहे. मनुष्य आणि देवांनाही जेंव्हा प्रुथ्वीवर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करता आली नाही तेंव्हा प्रजापती (याच्यावर शांतता सुव्यवस्थेची वैश्विक जबाबदारी होती) रागावला व देवांना बोलावुन त्याने विचारले, "जर तुम्हीच जबाबदारीतुन अंग काढुन घेतले तर मानवजातीचे रक्षण कोण करील? मानवजातीचे रक्षण झाले नाही तर अराजक माजेल व लोक धर्मभ्रष्ट होतील." यावर देवही लाजले आणि म्हणाले कि अशी अराजकाची स्थिती राहु नये म्हणुन राजा आणि त्यासोबत रक्षक असतील.

मनुष्य हा मुळात स्खलनशील प्राणी असल्याने, परचक्रापेक्षा मोठा धोका हा अंतर्गत समाजविघातक व्रुत्ती व प्रव्रुत्तींचा होत्ता. या प्रव्रुत्तींमुळेच अराजकाचा धोका होता. त्यासाठी रक्षक संस्क्रुती सिंधुकाळापासुन अस्तित्वात आली हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. युद्धे हे काही सातत्यपुर्ण घटना नव्हती, तर अंतर्गत रक्षण ही त्याहुनही मोठी आणि दैनंदिन आवश्यकता होती. राजा हा नागरक ते ग्रामणी यांच्या मार्फत रक्षकदलांच्या मदतीने या अंतर्गत शांतता-सुव्यवस्थाची काळजी घेत असे.

म्रुच्छकटीक नाटकात आपण तत्कालीन अराजकाच्या स्थितीचाही अनुभव घेतो, व त्यातील रक्षकांच्या भुमिकाही पहातो. कालिदासाने कुमारसंभवमद्धे या रक्षकांना "रक्षक" असेच म्हटले असुन त्यांचा प्रमुख तो "महारक्षक" असे नोंदवले आहे, एवढेच मी येथे नोंदवुन ठेवतो. असे अनेक उल्लेख अभिजात नाटकांत जसा येतो तसाच बाणभट्टाच्या "कादंबरी"तही. महावंसमद्धे जसा येतो तसाच सिलोन (आता श्रीलंका) येथील काही शिलालेखांतुनही.

थोडक्यात "रक्षक" ही संपुर्ण समाजाला रक्षण देनारी, त्यांच्या जिवित व वित्ताच्या रक्षणाची खात्री देणारी अत्यंत महत्वाची संस्था होती. "रातंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे वाटावे अशा स्थितीत त्यांनी कुशलतेने, शौर्याने ग्राम व नगरांचे संरक्षण गेली किमान ६००० वर्ष केलेले आहे.

जात कशी बनते?

हिंदु धर्मात कोणीही, तो निर्मानकर्ता असो कि सेवा उद्योजक, जो वंशपरंपरेने व्यवसाय करतो, त्याची जात बनते. उदा. शिंपी ही जात भारतात सर्वात उशीरा बनली कारण कपडे शिवुन घालायची पद्धत किमान दुस-या शतकापर्यंत तरी नव्हती. पण जेंव्हा ६-७ व्या शतकात शिवलेले कपडे घालायची फ्यशन आली तेंव्हा कोठे या जातीचा उदय झाला.

रक्षक तर अत्यंत पुरातन सेवा व्यवसाय. यात नुसते सैनिकाचे गुण पुरेसे नव्हते तर एखाद्या गुप्तचराचे, पाठलाग करण्याचे, संभाव्य धोके टाळण्यासाठी आधीच पुर्वतयारी करण्याचे, सीमा...मग त्या व्यक्तिगत मालकीच्या शेतांच्या असोत कि गांवाचा...नगराच्या...त्याची अचुक नोंद ठेवणे...गुप्त वाटा व पंचक्रोशाची माहिती ठेवणे अशी विविध द्न्यानसंपदा ठेवणेही अत्यावश्यक होते.

हा व्यवसाय वंशपरंपरागत झाल्याने ती एक जात बनली एवढे आपण येथे निर्विवादपणे म्हणु शकतो. कारण कोणत्याही व्यवसायाची जात बनवणे हा हिंदु परंपरेचे अविभाज्य अंग आहे. या जातीला स्थानिक भाषाभेदामुळे वेगवेगळी नांवे असली तरी त्याचे मुळ एकाच लढवैय्या समाजात आहे.



Friday, December 2, 2011

गोतिये तर जेम्स लेनचा बाप निघाला...

"I am a Frenchman brought up in the ideals of liberty, equality, fraternity and to me it is absolutely irrelevant what caste Shivaji belonged to, who his father or guru was..."

हे आहे फ़्रांकोइस गोतिये यांच्या डी. एन.ए. मधील त्यांच्या २३ नोव्हेंबर २०११ रोजी प्रकाशित झालेल्या माझ्या लोकमतमधील लेखाच्या प्रत्युत्तरातील विधान. यातील "who his father was" हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांची जात (खरे तर वर्ण...शुद्र कि क्षत्रिय) कोणती याबाबत वाद होवु शकतो, किंबहुना इतिहासात तो वारंवार झाला आहे. शिवाजी महाराजांचे गुरु नेमके कोण, हा वाद आजही जीवित आहे. शिवाजी महाराजांचे वडील कोण ही बाब हे ग्रुहस्थ त्यांच्याच धावत्या विधानात irrelevent मानतात, याचा अर्थ शहाजी राजे हे महाराजांचे वडील होते कि नव्हते याबाबत हे ग्रुहस्थ लेनच्या धावत्या स्ट्रीट जोकप्रमाणे वाद आहे असेच सुचित करतात, असे होत नाही कि काय?

शिवाजी महाराजांची जात, वडील व गुरु कोण होते हे गोतियेच्या द्रुष्टीने संदर्भहीन आहे (irrelevent). या विधानाचा अर्थ एवढाच होतो कि गोतियेनेही महाराजांचे पित्रुत्व संशयाच्या भोव-यात आणले आहे. या विधानात पित्रुत्वाचा संदर्भ का घेतला? जात आणि गुरु याबाबत वाद मान्य होवु शकतो, त्याबाबतची विधाने irrelevent असु शकतात. पण पित्रुत्वाचा वाद या गोतियेने निर्माण केला आहे आणि तो अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कि कोणाच्या सहज लक्षातही येवु नये.

या मतिमंद हिंदुत्ववाद्याला आणि त्याच्या पाठीराख्यांना मला सांगायचे आहे ते हे कि, हा इशारा समजा वा नव्या सांस्क्रुतिक लढ्याची सुरुवात, शिवाजी महाराजांना देव वा विभुती बनवणारे मंदिर माझ्या जीवात जीव असेतोवर होवु देणार नाही. काल मला एका कट्टर हिंदुत्ववाद्याचा प्रदिर्घ फोन आला होता. शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो आणि त्यांचे किल्ले ही मंदिरे आहेत तर मग या मंदिराला आक्षेप कशाला घेताय? माझे उत्तर हे होते कि जर एवढाच पुळका आहे तर मंदिर उभारायचा खर्च किल्ल्यांच्या डागडुजीसाठी केला असता तर तुमचे शिवप्रेम कळाले असते.

माझे स्पष्ट मत आहे कि या देशात खरे शिवप्रेमी अस्तित्वात नाहीतच. सगळे भोट आहेत आणि वांझ शिवप्रेम जागवत आहेत. अरे मर्दांनो, जरा आपल्या बाह्या सरसावा, बुद्धी पणाला लावा...हे काय चालले आहे? ..असले कडवे बाटगे हिंदुत्ववादी या देशाला कलंक आहेत.




सह्याद्री बाणा: कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?

सह्याद्री बाणा: कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?

"I am a Frenchman brought up in the ideals of liberty, equality, fraternity and to me it is absolutely irrelevant what caste Shivaji belonged to, who his father or guru was"

Kaahi maathyaani ji pratikriya dili ahe tyaanee he gautier che mhanane neet vaachaave. He doesnt know who was Shivaji's father...and he doesnt care about it. cant you smell new lain in his statement? Of Guru, it's okay as there is disput who His Guru was...but about father? Shame on him...

Saturday, November 26, 2011

कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?

गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे."

खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?

मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.

त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे.
ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.

त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?

भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.

पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.

म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.
श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...