Tuesday, August 12, 2014

आम्ही माणूस आहोत...

आभाळ तुटून कोसळतय म्हणताय?
हरकत नाही
तुटू देत
आम्ही आमच्या अंगणात, शेतांत,
माळरानांत
त्या कोसळत्या
आभाळाचे कोसळलेले तुकडे वेचू
तेच आम्ही आमच्या अंगणांत
शेतांत
माळरानांत
पेरू...

त्यातून अनंत आभाळे
पुन्हा उगवू...
आमची कोसळलेली घरे
पुन्हा उभारू...

आम्ही माणूस आहोत...
विनाशातुनही सृजन करणारे!

No comments:

Post a Comment

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...