Saturday, January 31, 2015

युरोपियन - वैदिक कोलांटउड्या आणि भारतीय संस्कृती.

सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करण्यासाठी वैदिक आणि युरोपियन विद्वानांनी कसकशा कोलांटउड्या मारल्या याचा इतिहास मनोरंजक आहे.

सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडण्यापुर्वी:-

१. वसाहतवादी इंग्रजांना आणि राष्ट्रवादी जर्मनांना आपले वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करायचे होते आणि इतिहासही मागे न्यायचा होता.(युरोपचा इतिहास अन्य जागतिक संस्कृत्यांपेक्षा ब-यापैकी अर्वाचीन आहे, ग्रीसचा अपवाद.) विल्यम जोन्सपासुन ख-या अर्थाने ही सुरुवात झाली. ऋग्वेदाचा, त्यातील भाषा व ल्यटीनादि युरोपियन भाषांतील काही वरकरणी साधर्म्य पुर्वीच त्यांच्या लक्षात आलेले होते. म्यक्समुल्लरने वेद व अवेस्ता यातील आर्य/ऐर्या/अरियाना वगरे समान वाटलेल्या शब्दांतून आर्य वंश सिद्धांत प्रथम मांडला. निळ्या डोळ्याचे, सोनेरी केसाचे, उंच धिप्पाड गोरे आर्य आणि त्यांचे धडाडत आक्रमनासाठी धावणारे रथ याची युरोपवर एवढी मोहिनी पडली कि आपण आशिया-युरोपला संस्कृती देणारे, आर्यभाषांचे निर्माते आहोत असे वाटू लागले. अर्थात म्यक्समुल्लरच्या लक्षात यातील वांशिक धोका लक्षात आल्यावर "आर्य वंश" ही संज्ञा मागे घेतली आणि आपल्याला आर्य भाषा बोलण-या लोकांचा भाषिक गट असे म्हणायचे होते असे त्याने स्पष्टही केले. पण जो काही परिणाम व्हायचा होता तो झालाच.

२. भारतीय लोकांनी, विशेषता: वैदिकांनी, स्वाभाविकपणे ते आक्रमक आर्य म्हणजे आपलेच पुर्वज असा ग्रह करून घेतला. कारण हा शब्द वेदांतुनच आला होता. या सिद्धांताने सत्ताधारी ब्रिटिश आणि वैदिक एकाच मुळाचे ठरत होते. ते ब्रिटिशांच्या पथ्यावरच पडणारे असल्याने त्यांनी या सिद्धांताला खतपाणीच घातले. पुढे टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहून वेदांचे निर्माते हे मुळचे उत्तर ध्रुवाजवळ राहणारे होते हे ऋग्वेदातील प्रमाणांवरुन सिद्धही करुन दाखवले. तत्पुर्वी महात्मा फुल्यांनी याच सिद्धांताचा आधार घेत विदेशी आक्रमक आर्य आणि येथील शुद्राति-शूद्र मुलनिवासी अशी मांडणी करत वैदिक व्यवस्थेवर हल्ले चढवले.

३. जर्मनांनी मात्र जर्मन हेच मुळचे आर्य आणि जर्मनी हेच त्यांचे मुळ स्थान असून त्यांच्याच पुरातन पुर्वजांच्या एका शाखेने वेद लिहिले असे दावे सुरु केले. आर्यांच्या मुळ स्थानाबाबत युरोपात अनेक ग्रंथ लिहिले गेले. भारतातही काही वेगळे झाले नाही. या सिद्धांताचा प्रभावच तेवढा होता. पण यामुळे देशात वांशिकदृष्ट्या दोन तट पडले. भारतातील लोकसंख्येची रचनाही मानवशास्त्राच्या संशोधकांनी, रिस्ली वगैरे. विविध वांशिक आधारांवर केली गेली. (दुर्दैव म्हणजे आपण आजही तेच संदर्भ वापरत असतो.)

सिंधू संस्कृती सापडल्यानंतर:

१. १९२० साली सिंधू संस्कृतीचे अवशेष उजेडात यायला लागले. एवढी प्रगत आणि भव्य संस्कृती येथे असू शकेल याची कल्पनाही त्यावेळीस केली गेलेली नव्हती. उलट आर्य येण्यापुर्वी येथे आदिवासी, अडाणी, भाषाही धड न बोलणारे लोक राहत होते असा समज होता. पण उत्खनित पुरावेच येथील लोक अत्यंत पुढारलेले होते असे सरळ दाखवत असल्यानेअसल्याने ते नाकारताही येत नव्हते.

२. मग आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृते नष्ट केली व तेथील लोकांना हरवून दक्षीणेत हाकलले असा सिद्धांत पुढे आणला गेला. ऋग्वेदातील काही द्राविडी शब्द यासाठी आधार म्हणून वापरले गेले. यामुळे द्राविडी लोकांचा वेगळा राष्ट्रवाद उफाळला. उत्तरेतील भाषा आणि तेथील लोक हे त्यांच्या द्वेषाचे कारण बनले. स्वतंत्र द्राविडीस्थान मागण्यापर्यंत मजल गेली. तेथील राजकारण द्राविड्सेंट्रीक बनले. आजही ते तसेच आहे.

३. बहूजनांना सिंधू संस्कृतीचा मात्र मोठाच भावनिक आधार मिळाला. सिंधू संस्कृतीचे निर्माते बहुजन आणि ती नष्ट करणारे आक्रमक आर्य वंशीय असा हा सामाजिक संघर्ष बदलला.

४. वैदिक जनांना आपण या भुमीत परके ठरण्याचा धोका लगेच लक्षातही आला. गोळवलकर गुरुजींनी तर "पुरातन काळी उत्तर धृव वाराणशीला होता असे विधान करून आर्यही एतद्देशियच ठरवायचा प्रयत्न केला. पुढे डा, नि. र. व-हाडपांडे यांनी नवा ग्रंथ लिहून टिळकांचा सिद्धांत ऋग्वेदाच्याच आधारे रद्दबातल ठरवला व आर्यांचे मुळस्थान भारत आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

५. युरोपियन विद्वान आता "आर्य" हा वंश निदर्शक शब्द वापरायचे बंद झाले. पण त्यांनी इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत पुढे आणला. या सिद्धांतानुसार या इंडो-युरोपियन भाषाकुटुंबाचे पुर्वज पुरातन काळी कोणत्यातरी एकाच ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या लाटा क्रमश: भारत, इराण, अनातोलिया, ग्रीस ते युरोप अशा पसरल्या असे सांगितले जावू लागले. बरे मूळ स्थान कोणते या वादाचा निकाल अजुनही लागलेला नाही. दक्षीण रशियातील अंड्रोनोवो, सिन्थास्टा संस्कृती ते अनातोलिया अशी वेगवेगळी मुलस्थाने आजही धडाडीने भांडली जात आहेत. विशेष म्हणजे सारेच विद्वान तेच ते पुरावे वापरत सोयिस्कर अर्थ काढत असतात.

६.  १९७० नंतर उपग्रहीय छायाचित्रांमुळे आजची घग्गर ही एके काळी खूप मोठी होती असे जाणवू लागले. मग ती म्हणजेच ऋग्वेदातील हरवलेली सरस्वती नदी होय असे दावे केले जावू लागले. या दाव्यांमागे खरे कारण होते ते हे कि या नदीच्या काठांवर हजारापेक्षा अधिक सिंधू संस्कृतीची स्थाने सापडली आहेत, ती पाकिस्तानातील एकुण संख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहेत. घग्गरला सरस्वती बनवले कि आपोआप त्या संस्कृतीवरही वैदिक मालकी सांगता येणार होती. स्वाभाविकच अनेक विद्वान हरवलेली सरस्वती सापडली असे दावे करू लागले. खरे तर सर आरेल स्टीन यांनी १९४० च्या आसपास तसा दावा केला होता. पण त्यावेळी आक्रमक आर्यांच्या कैफात असले, आणि सिंधू संस्कृतीची प्रगल्भता न समजलेल्या वैदिकांच्या तेंव्हा लक्षात आले नाही. पण आता घग्गरच्या प्रत्यक्ष पात्रांत व उपनद्यांत जी भुशास्त्रीय आधुनिक तंत्रज्ञानांनी  जी परिक्षणे केली त्यावरून घग्गर ही कधीही मोठी बारमाही, ऋग्वेदात वर्णण केलेल्या सरस्वतीसारखी हिमालयातून - पहाडांतुन उसळ्या घेत, सर्व नद्यांपेक्षा मोठी नदी, "नदीतमे" नव्हती. ती पावसाळ्यावर अवलंबून असलेली एक सामान्य नदी होती. सनपुर्व १७५० मद्ध्ये जलवायुमान बदलल्याने ती पावसाळ्यापुरतीच वाहणारी नदी बनली आणि सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आपल्या वसाहतपद्धती बदलल्या
 हे सर्व भु-पर्यावरण-शास्त्रज्ञांनी व पुरातत्वविदांनी मान्य केले आहे. त्यामुळे सरस्वती म्हणजे घग्गर हा दावा सर्वस्वी निराधार ठरलेला आहे.

७. मायकेल ड्यनिनो (नांवावर जावू नका, पाश्चात्य असला तरी हा वयाच्या सतराव्या वर्षापासून हिंदू आहे.) यांनी The Lost River: On The Trail of the Sarasvati हे पुस्तकही लिहिले. आर्य येथीलच हा सिद्धांत बळावला. यात अनेक सामील झाले. त्यात महत्वाचे नांव म्हणजे श्रीकांत तलागेरी. यांनी वैदिक आर्य (तेही फक्त भरत टोळीचे व त्यातीलही पुरु गटाचे) ऋग्वेदाचे निर्माते आहेत आणि ते कसे भारतातून (हरियानातून) क्रमाक्रमाने इराणमद्ध्ये गेले व तेथून पुढे युरोपात कसे आर्य भाषा व संस्कृती नेली याचे विवेचन सुरु केले. इराणी लोकही त्यांच्या दृष्टीने भारतीयच, अनू टोळीचे लोक असा त्यांचा दावा.

८. आता युरोपियन विद्वान कसे गप्प बसतील विशेषत: मायकेल विट्झेल या हार्वर्ड विद्यापीठाच्या भाषाविद असलेल्या प्राध्यापकाने तलागेरी यांच्या सिद्धांतावर हल्लाच चढवला. तलागेरीही मग काय गप्प बसतात? त्यांनी दुप्पट आवेशाने त्यांच्यावर हल्ला चढवला. विशाल आगरवाल, कल्याणरमन ई. भारतीय विद्वान त्यांच्या मदतीला आले. एवढेच नव्हे तर कझानास हेही मदतीला धावले. अर्थात कझानास यांचा सिद्धांत तलागेरींसारखा नाही. त्यांचे मत असे कि आर्य हे सनपुर्व दीड नाही तर सनपुर्व तीन हजार वर्षांपुर्वी आले, ऋग्वेद हा सिंधू काळापुर्वीचा आहे आणि एवढ्या आधी आर्य भारतात आल्याने ते भारतीयच! अर्थात हे हल्ले फेसबुकवरील भांडणांत जेवढी मर्यादा सोडली जाते त्यापेक्षाही खालच्या पातळीवरचे होते.

९. आता सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य ठरवायचे म्हटल्यावर ऋग्वेदाचा पुर्वी मान्य असलेला इसपू १५०० हा काळही मागे नेणे गरजेचे होते. रथ आणि घोडॆ तर आर्यांचे प्रिय. सिंधू संस्कतीत त्यांचे अवशेष दुर्मिळातिदुर्मीळ...जे अल्प आहेत तेही उत्तर-सिंधू काळातील. मग आयडियाची आयडिया अशी वापरली गेली कि मानवी प्रतिभा थक्क होईल.

१०. आधी एस. आर. राव व बी बी लालांसारखे अर्किओलोजिस्टस सिंधू संस्कृतीला घोडे माहित होते, आ-यांची रथचक्रे माहित होती असा दावा करत होते. आता नवे विद्वान (उदा. विशाल आगरवाल, कल्याणरमण ई.) उलटा दावा करत आहेत. त्यांचे म्हणणे असे कि ऋग्वेदात कोठेही आ-यांच्या चाकांचा उल्लेख नाही. ते रथ होते कि साध्या गाड्या होत्या हेही स्पष्ट नाही. विट्झेल यांनी शतपथ ब्राह्मणात "श्याम-अयस" हा शब्द आला असल्याने, व हा शब्द लोखंडाचा वाचक असल्याने ते इसपू ५०० मद्ध्ये तयार झाले असावे असा दावा केला होता. गंमत म्हणजे "श्याम-अयस" चा अर्थ लोखंड होतच नाही, शतपथ ब्राह्मण  खूप आधी, म्हणजे लोहयुग येण्यापुर्वीच लिहिले गेले आहे असाही प्रतिदावा केला गेला.थोडक्यात ऋग्वेद हा सिंधु संस्कृतीपुर्व आहेअसे सिद्ध करायला कोलांटउड्या मारल्या गेल्या.

११. काही युरोपियन विद्वान मात्र या वादंगाकडे इकडे दुर्लक्ष करत उत्खनने आणि त्यातून समोर येणारे पुरावे पाहता आपली मते सुधारतही होते. यात एडविन ब्रायंट, केनोयेर, शाफर यांसारखे विद्वान अग्रणी म्हणता येतील. भारतात गेल्या सनपुव सात हजार वर्षांपासून शेती, गृहरचना, खाद्य पद्धती ई. मद्धे सातत्यपुर्ण प्रवाह दिसून येतो असे त्यांनी उत्खनित पुराव्यांवरून सिद्ध केले. त्यामुळे काही इंडो-युरोपियन विद्वानांची पंचाईत झाली असली तरी ते मोठ्या प्रमाणावर इंडो-युरोपियनांचे भारतात आगमन झाले नसले तरी "झिरपण्याच्या सिंद्धांता"प्रमाणे (ट्रिकल डाऊन थियरी) सातत्याने आगमन होत राहिले असले पाहिजे व त्यातूनच आर्य भाषा भारतात (उत्तरेत) पसरल्या असाव्यात अशी मांडणी चालुच ठेवली.

१२. भारतीय विद्वान उत्खनित पुरावे लक्षात घेत उलट आपली  "भारतीय आर्य" थियरी रेटतच राहिले. अर्थात त्यांनी अनेक बाबींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. भारतात जसे कोणते नवीन लोकांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले नाही तसेच ते भारताबाहेर भारतातून झाल्याचेही पुरावे नाहीत. जगभर मनुष्य जवळपास दहा हजार वर्षांपुर्वीच स्थायिक झाला होता याचे अनगिनत पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यामुळे वैदिक लोक भारतातून अफगाणिस्तानच्या मार्गाने युरोपापर्यंत फोचले, ऋग्वेद हा हरप्पापुर्व आहे वगैरे दावे युरोपियन विद्वानांनी हास्यास्पद ठरवले.

१३. बरे, अवेस्ता आणि खुद्द ऋग्वेदातील भुगोल हा ब-यापैकी समान आहे हे तर उघडच आहे. भाषा, संस्कृती, धर्म, देवासूर संकल्पना यात कल्पनातीत साम्य तर आहेच पण दोन्ही धर्मांना आपापसातील व्यक्तीही माहित होत्या हेही स्पष्ट आहे. यामुळे तलागेरी असे म्हणतात कि भारतीय पुरु आर्य जेंव्हा विस्तारासाठी इराणमद्ध्ये आले त्यापुर्वीच भारतीय अनू टोळीचे लोक तेथे वसलेले होते. ऋग्वेद जेंव्हा निम्म्याहून अधिक रचला गेला होता तेंव्हा अवेस्ताची रचना सुरु झाली. म्हणजे ऋग्वेद हा अवेस्तापुर्वच आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाच्या मंडलांची कालानुक्रमणिका सर्वस्वी नव्याने बनवली आहे. यासाठी जिज्ञासुंनी त्यांची “Rigveda: A Historical Analysis” व “The Rigveda and The Avesta: The final Evidence” ही पुस्तके अवश्य वाचावित.

१४. तलागेरींचे विधान चुकीचे अशासाठी आहे कि भारतातून सनपुर्व सात हजार वर्षांपासून जसे नवे लोक आलेले नाहीत तसेच अन्य भागांत विस्थापित झाल्याचे त्या-त्या भागात (इराण-अफगाणिस्तान ई.) कसलेही भौतिक पुरावे नाहीत. व्यापारानिमित्त सिंधू संस्कृतीचे लोक अन्यत्र (मेसोपोटेमिया-इजिप्तपर्यंत) जात होते तसेच तिकडचेही व्यापारी इकडे येत होते. ब्यक्ट्रिया-मार्जियाना अर्किओलोजिकल कोम्प्लेक्स नांवाने ओळखल्या जाणा-या उत्तर-पुर्व इराण, उत्तर अफगाणिस्तान वगैरे भागातील उत्खननांत सापडलेली ही संस्कृती. हिचा काळ सनपुर्व २३०० ते सनपुर्व १७०० एवढा आहे. तिथे सिंधू लिपी असलेली पण त्या संस्कृतीची स्वतंत्र रचना असलेल्या मुद्रा जशा सापडल्यात तशाच सिंधू संस्कृतीच्याही सापडल्या आहेत. अर्थ एवढाच कि त्या दोन्ही संस्कृत्या व्यापारी (व सांस्कृतिकही) आदान-प्रदान होत होते. असे आदानप्रदान जगभरच्या सर्वच संस्कृत्यांत झाले आहे.भारतात वैदिक धर्म कसा आला याचे पुरावे शतपथ ब्राह्मणाने दिलेले आहेत. पण घग्गर म्हणजेच सरस्वती या आग्रहापोटी तिकडेही दुर्लक्ष केले जाते आहे.

असे असुनही युरो-सेंट्रिक आणि वैदिक-सेंट्रिक विद्वान काही केल्या आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. यात सर्वस्वी युरोपियनांची व म्हणून कदाचित वैदिक विद्वानांची सांस्कृतिक वर्चस्ववादी मानसिकता आहे हे उघड आहे. मुळात संस्कृती व भाषा यांच्या निर्मितीचे श्रेय हडपण्याचे व मानसिक अधिराज्य गाजवत बसण्याचे दिवस संपले आहेत हे यांच्या लक्षात येत नाही. . संस्कृती, भाषा या आपल्या जगभरच्या पुरातन पुर्वजांची सामुहिक उभारणी आहे ज्या पायावर आजचा समाज उभा आहे. संस्कृत्यांचे उत्थान-पतन-त्यातुनच नवीन संस्कृत्यांचा उदय ही परंपरा जगभर राहिली आहे याचे भान वर्चस्वतावादी लोकांनी ठेवायला पाहिजे.

7 comments:

  1. Amit, are you mad? please stop your childish behaviour and behave like a mature one.

    ReplyDelete
    Replies
    1. I have asked a genuine question. Why should we accept lies of this self proclaimed scholar? Or should we follow blindly? Sanjay must provide proof or take back his false statements.

      Delete
  2. बाप्पा - मुलानो भांडू नका
    आप्पा - इतका सुरेख लेख लिहिला आहे , अमित बाळ , तुझा मुद्दा काय आहे ?
    बाप्पा - त्याची हुज्जत असते ती संजयच्या स्वयंघोषित इतिहासकार या पदाला
    आप्पा - ते मात्र संजयने सांगायला पाहिजे , तो कोणत्या बुद्रुक किंवा खुर्द विद्यापीठाचा आहे ते
    बाप्पा - इतके टोचून कशाला बोलतो आहेस ?कृष्ण सुदामा एकाच शाळेत होते
    पण पुढे काय झाले ?
    आप्पा - ते ठीक आहे रे , पण इतिहास ही काही २ किंवा ३ पेग नंतर सुचणारी बाब नाही
    बाप्पा -तू भलताच पेटला आहेस किंवा त्या अमितचा नातलग आहेस का ?आमचा विकास कसा थाडकन उडवून लावतो , अशी श्रद्धा पाहिजे , नाहीतर तुम्ही , वारा वाहेल तशी पाठ फिरवणारे - - -
    आप्पा -किती मन गुंगवून टाकणारा लेख लिहिला आहे , हे ३ पेगचे काम नाही
    बाप्पा - मग काय खम्ब्याचे काम आहे का ?
    आप्पा - नाही रे , प्रचंड अभ्यासाचे आणि चिंतनाचे काम आहे - तू नीट अभ्यास कर
    बाप्पा - काही नाही रे त्यांचे ठराविक ब्राह्मण विरोधाचे तुणतुणे सदा सर्वदा चालू असते
    आप्पा - संजय आणि ब्राह्मण विरोधी ? ते कसे काय ? तो तर अहिर आहे -
    बाप्पा - मी तर त्याला धनगर समजत होतो , हा अहिर भैरव गाणारा असेल माहित नव्हते
    हा सदा अतृप्त आत्मा आहे ,रूपकात्मक सांगायचे तर अश्वत्थामा - रुद्र , शक्तिपीठे , भैरव , यज्ञ याबद्दल याची मते किती विचित्र आहेत
    आप्पा - तुमचे इतिहासाचार्य राजवाडे काय कमी होते ? त्यामानाने सुखटणकर किती अर्पित भावनेने काम करत असत ,किती आकाशाइतके उत्तुंग कार्य - संजयाने तसे करून दाखवावे ,
    बाप्पा - ते पण खरेच आहे म्हणा - उगीच २५ -३० पाने छापून पुस्तक छापले म्हणून ओरडा करायचा - त्यात एखादे सदाशिवभाऊ सारख्या कारकुनी पेशव्यावर खरडायच म्हणजे ब्राह्मण पण खूष आणि मराठा पण चूप - आहे की नाही खुबी , कारण निळ्या टोपीला तर यातले काहीच माहित नसते - त्यांनी नुसते ६ डिसेंबर ला फुकट आगगाडीतून बोंबा मारायच्या आणि रात्री टाईट होऊन - आईशपत मस्त धमाल आली - इतकच त्यांचे डोके -
    बाप्पा - ते जाऊ दे , कितीतरी आले आणि गेले , कालपुरुष तसाच आहे
    आप्पा - हे मात्र खरे , सिकंदर , शिवाजी , विवेकानंद , अरविंद घोष , आले आणि गेले ==+
    बाप्पा - असे नाही म्हणता येत , गांधी गेले आणि गोडसेही गेला , असे म्हणून बघ , काय उत्तर मिळते = फ्रॉम द बोटम ऑफ युवर हार्ट ?

    ReplyDelete
  3. लेख छान आहे. असेच विचारांचे धक्के सोनवणी सर देत असतात. परंतू संबधित टीकाकार वाचन अभावाने हटटामुळे ममत्वामुळै उलटसूलट प्रतिक्रया देणारच . अनेक यापुर्वीच्या इतिहास संशोधकांकडून बरीच माहिती दडविली किवा उडवाउडवी करुन निर्दखल /अपप्रचारीत केली जाते.मात्र सोनवणी सरांना चांगलेच लक्षात आले आहे. काय करणार .तीपण हया समाजात राहून प्रत्येक गोष्ट बरी वाईट सांगून जीव धोक्यात घालणारी नव्हती. फक्त आता एकच कि त्यांनी मिळविलेल्या व साठवून ठेवलेल्या माहितीचा अन्वयार्थ् लावणे व सामाजिक जाणीवा भक्कम करण्याचा प्रयत्न / प्रबोधन करत राहणे हे शक्य आहे. अभय

    ReplyDelete
  4. आप्पा - बराच विचार करत होतो त्यावेळेस जाणवते की संजयाच्या लिहिण्याचा रोख काय असतो ?तर वैदिक आणि बहुजन ,उद्देश काय असेल तो असो ,त्यातून समाजाची काय आज पर्यंत प्रगती झाली ? तर काहीही नाही ,
    बाप्पा - मग संजयाने काय करायला हवे ?तू म्हणशील त्याने मुसलमान समाजाचा पर्दा फाश केला पाहिजे कारण ते त्यांच्या अल्ला विषयी काहीच ऐकून घेत नाहीत , संजयने जर सलमान रुश्दी सारखे लिखाण मनापासून वाचून त्यावर काही भाष्य करायला पाहिजे
    आप्पा - खरच किती सुसंगत आणि पुराव्यासह लिखाण केले आहे त्याने सैतानिक व्हर्सेस चे किती गुप्त इतिहास त्याने जगासमोर मांडला आहे !त्याला मारण्यासाठी किती मोठ्ठी रक्कम लावली होती
    नाहीतर आपले वैदिक , संजयला माहित आहे की हा हातखंडा प्रयोग आहे , कुणीही यावे आणि टप्पल मारून जावे अशी या वैदिकांची अवस्था आहे , पण तसे नाही , आज परिस्थिती फार वेगळी आहे
    बाप्पा - खरी काळाची गरज आहे ती भारतातून सलमान रुश्दी सारख्यांनी बिनधास्त चर्चा घडवून आणाव्यात आणि महम्मद खरा कोण होता ते जगास सांगावे , संजयाने साधे सलमान रुश्दिचे कौतुकही करू नये हे पण आश्चर्यच ! का असे वागावे , वैदिक धर्मातल्या चुका काढायचा ठेका त्याने घेतला आहे , तो स्वतः वैदिक नसून , पण कुराणातल्या चुका आणि भ्रष्ट्पणा तो खपवून घेतो ?

    ReplyDelete
  5. दिनेश शर्माजी ,
    सादर प्रणाम,
    इधर आप्पा बाप्पा नामसे ऐसा कहा गया है कि महम्मद पैगंबर के बारेमें सलमान रश्दी साहाब ने जो सातानिक व्हर्सेस किताबमे चर्चा की है उसका संदर्भ लेके संजय जी क्यो कुछ चर्चा करते ?
    संजय सहाबको मुसलमान लोगोंका तुष्टीकरण करनेकी आदत तो नही है
    और एक माजेकी बात मी बताना चाहता हुं
    संजय साब कभीभी स्पेसिफिक सावालाका स्पेसिफिक जवाब नही देते
    अस्सल इतिहासकार या चिंतन करनेवाले ऐसा कभीभी नही करते
    आप जैसे उच्च विचार लिखनेवले लोग जब लिखते है कि रा स्व संघ , विवेकानंद , स्वामी अरविंद म गांधी जैसे लोग आर्य हिंदुस्तानाके बाहारसे इधर आए इस विचाराका विरोध करते है तबभी संजायाजीमे इतनी तमीज नाही ही कि दिल खोलकर उसका स्वागत करे , इसलिये उनकी विचारोन्को सराहानेवाले लोगोन्की अपरीपाक्वतापर बुरा असर होता जा रहा है
    संजायाजीके वृत्तीमे निरोगी आदान प्रदानकी कमी महसूस होती है
    दलित और मागास समाजाको येह एक शाप ही , जबतक एसेम जोशी साने गुरुजी जैसे सुशिक्षित (ब्राह्मण ) वर्गाके पास नेतृत्व था तबतक यह बात नाही ठी लेकिन जबसे संजय जैसे लोग चीन्तानाकी धुरा साम्भाले बैठे है तबसे यह विखार दिखाई देता है
    इनसे कैसे सच्चे चिन्तनकि अपेक्षा करे?

    ReplyDelete
  6. So what are the proven facts today ? You have beautifully mentioned different theories but what is the recently proven fact ?

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...