Wednesday, May 16, 2012

सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग: एक समीक्षा

माझे मित्र डा. मधुसुदन चेरेकर यांनी मला स्नेहपुर्वक सावरकरांवर शेषराव मोरे यांनी लिहिलेले दोन ग्रंथ (संक्षिप्त आवृत्या) आवर्जुन पाठवल्या व मी त्यावर लिहावे असे सुचवले. मी या माझ्या निकततम मित्राचा आभारी आहे. मी अत्यंत पुर्वग्रहरहित दृष्टीने त्यांनी पाठवलेले दोन्ही ग्रंथ आवर्जुन वाचले व आता त्यापैकी "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" या ग्रंथावर, व तेही दुस-यांदा वाचल्यानंतर लिहायला घेतो आहे.

पहिली बाब मी येथे स्पष्ट करु इच्छितो ती ही कि खुद्द सावरकरवाद्यांनाही सावरकरंची चिकित्सा कशी करायची हेच मुळात समजलेले दिसत नाही. सावरकरांच्या जीवनाचे खरे तर चार भाग पडतात. पहिला म्हणजे अंदमानपुर्व सावरकर, दुसरा म्हनजे अंदमानातील सावरकर, तिसरा म्हनजे अंदमानोत्तर सावरकर आणि चवथा म्हणजे गांधीहत्त्याकालोत्तर सावरकर. हे चारही सावरकर एक नसून एक व्यामिश्र संक्रमणांची एक मालिका आहे. या मालिकेने खुद्द सावरकरांचे जीवन ढवळुन निघाले असुन विरोधाभासी अनेक सावरकर समोर येतात व त्यांच्याकडे सलगपणे पाहणा-या शेषराव मोरेंसारख्या विद्वानांचीही गफलत होवून जाते. तशी ती या "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" या ग्रंथातही ठळकपणे दिसुन येते. आपल्याला मृत्योत्तर मोरेंसारखा एवढा चांगला वकील मिळेल याची सावरकरांनीही कल्पना केली नसावी.


या ग्रंथातील पहिल्याच प्रकरणातील (समाजाचा पाया विद्न्यान; धर्मशास्त्र नव्हे) डा. आंबेडकरांची जातीउच्चाटन करण्यासाठी धर्मशास्त्रेच कशी जबाबदार आहेत, सबब ती नष्तच कशी केली पाहिजेत ही मते नोंदवत मोरे असा युक्तिवाद करतात कि सावरकरही वेगळ्या भाषेत, म्हणजे "स्मृति-स्मृती-पुराणोक्त" प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजेत या शब्दांत सावरकर आंबेडकरांशी सहमती दर्शवतात. पोथीनिष्ठेऐअवजी विद्नानवादी धर्मच सावरकरांना अभिप्रेत आहे असेही अनेक युक्तिवाद मोरे करतात. पुढे मोरे असेही म्हनतात कि आंबेदकरांना अभिप्रेत असणारा "नवा धर्म" व सावरकरांना अभिप्रेत असणारा "विद्न्यानधर्म" याचा अर्थ प्रस्थापित वैदिक वा हिंदु धर्माचे उच्चाटन असाच आहे.....या हिंदु धर्माचा रुढ हिंदुधर्माशी नावाशिवाय कोणताच संबंध नाही.(पृष्ठ-९-१०-११)


जागतीक इतिहासात विद्न्यानाधारिक एकच धर्म निर्मण झाला होता व त्याचे नांव पायथागोरियन धर्म असे होते. गणित हेच मुलभुत धर्मतत्व आहे असा या धर्माचा दावा होता. अर्थात हा धर्म जन्मासोबतच संपला हे वेगळे. मुळात विद्न्यानाधारित "हिंदु" धर्म हेच एक भाकड मित्थक आहे. कोणताही धर्म, अगदी बौद्ध वा जैनही, विद्न्यानाधारित असु शकत नाहीत व नव्हते हे सावरकरांना वा त्यांच्या ज्येष्ठ वकीलांना माहित नसावे व सावरकरांना आंबेडकरांच्या पंक्तीत आणुन बसवण्याचा प्रयत्न करायचा एवढाच या प्रकरणाचा मतितार्थ आहे. असो. याच प्रकरणात मोरे अजुन एक धाडसी विधान करतात व ते हे कि, "सावरकर हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्वाचा संबंध समाजसुधारणेशी येत नाही. त्यांचे हिंदुत्व म्हनजे "हिंदुधर्म" नव्हे. हिंदुधर्माला जेवढी मान्य आहे तेवढीच समाजसुधारणा स्वीकारायची..." (पृष्ठ १४) खरे तर हे विधान स्वयंस्पष्ट आहे. सावरकरांना धर्ममर्यादेत बसेल एवढीच समाजसुधारणा अभिप्रेत होती हे याच विधानात स्पष्ट दिसत असतांना हेच मोरे पुढे म्हणतात कि "त्यांच्या समाजकारणाचा पाया बुद्धी वा उपयुक्ततावाद हा होता...हिंदुत्ववाद हा नव्हता." येथे एकतर मोरे यांची सावरकर समजण्यातील गफलत आहे किंवा सावरकरांचेच विचार परस्परविरुद्ध आहेत. माझ्या मते दुसरी शक्यता अधिक आहे. म्हणजे हिंदु धर्माच्याच चौकटीतील सुधारणा सावरकरांना हव्यात आणि असे म्हणतांना हिंदु धर्माची चौकट न मोडता बुद्धीवादी-उपयुक्ततावादी समाजकारण त्यांना अभिप्रेत होते हे मोरेंचे युक्तिवाद तद्दन भंपक आहेत हे उघड आहे. कारण "हिंदुत्व" तर हवे पण समाजकारणासाठी तेही नको..., हिंदु हे लोकांचे नांव आहे व हिंदु धर्माचा अर्थ "हिंदु लोकांनी स्थापलेले धर्म" असा घेतला पाहिजे, असे सावरकरांचे मत मोरे जेंव्हा आपल्या शैलीत सांगतात तेंव्हा दोन अर्थ होतात, पहिला म्हणजे मोरेंना सावरकर तरी समजलेले नाहीत किंवा सावरकर हे अत्यंत भोंगळ विचारांचे व धर्मेतिहास काडीएवढाही माहित नसलेले गृहस्थ होते. हिंदु लोकांनी स्थापलेला म्हनजेच ज्याला सावरकर "हिंदुभु" म्हणतात त्या भुमीत स्थापित धर्म...जैन, बौद्ध, शीख इ. याऐवजीचे हिंदु भुमीत स्थापन न झालेले धर्म हे परके व एवतेव त्यागणीय आहेत असाच मतितार्थ सावरकरांच्या म्हनण्यावरुन निघतो. याचाच दुसरा अर्थ असा कि त्यांना अशा "हिंदु" लोकांचे एकत्व या अहिंदु धर्मांशीच्या लढ्यासाठी आहे. त्यात समाजकारण नसुन निखळ धर्मकारण आहे. त्यामुळे सावरकर हे विद्न्याननिष्ठ धर्माचे कामना करत होते हा मोरेंचा नि:ष्कर्ष सरळ बाद होतो.


सावरकरांचे चातुर्वर्ण्यौच्चाटक व जात्युच्छेदक विचार हे कोनत्या कोणातुन मोरेंना उदार वाटतात हे त्यांनाच माहिती. त्यासाठी ते जे सावरकरांचे सात युक्तिवाद मांडतात. या युक्तिवादात (पृष्ठ १६-१९) बुद्धीवाद नसुन सरळ सरळ चातुर्वर्ण्याचीच भुमिका घेत, जुन्या काळातही त्यात दोष होते हे मान्य करत, पटवून देत, किमान रोटीबंदी व स्पर्शबंदी तरी आपण तोडु शकतो असा पुरोगामी आविर्भाव दिसतो. मोरे हे सांगायचे विसरतात कि हे सावरकरांनी कोणाला उद्देशुन आणि कधी लिहिले. सावरकरांचा उदात्त हेतु क्षणभर गृहित धरला तरी एक बाब येथे लक्षात घ्यावी लागते ती ही कि सावरकरांनी स्वत: कधीही यातील एकही बंदी मोडलेली नाही. (अस्पृष्यांसोबतचे सहभोजनादि कार्यक्रम स्तुत्य असले तरी ते म्हणजे धार्मिक जोखडे सर्वस्वी झुगारणारे कार्य नवे.) महात्मा फुलेंबाबत "त्यांनी अस्पृय्ष्यांसाठी स्वतंत्र शाळा मागितल्या पण सावरकरांनी त्यांच्यानंतर २५ वर्षांत अस्पृष्य व सवर्ण एकाच शाळेत बसवण्याचे यशस्वी आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यात घडवून आणले..." व्यक्तिपुजक चरित्रकार नेहमीच गोंधळ घालत असतात. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा माहितल्यानंतर पन्नास वर्षानंतरचे आहेत, फुलेंचा म्रुत्यु १८९० ला झाल्यानंतरची वर्ष मोजुन मोरे काय साधु इच्छितात? सावरकरांनी चातुर्वर्ण्यावर प्रहार केले हे सांगतांना ते विसरतात कि त्यांच्याच कालात आंबेदकर त्याहीपेक्षा त्वेषाने आणि पुराव्यांसह चातुर्वर्ण्यावर तुटुन पडलेले होते व आंबेडकरांना फुल्यांची पुर्वसुरी होतीच. परंतु तसे सावरकरांच्या धर्मविषयक विचारांशी साधर्म्य असनारे गांधीजी मात्र मोरेंच्या चर्चेत येत नाहीत. सावरकरांनी गांधीजींशी कसलाही वैचारिक वाद वा संवाद साधला असल्याची ते माहिती देत नाहीत. आंबेदकरांना मात्र वेठीला धरत ते सावरकर व आंबेदकर यांच्या विचारांतील तादात्म्य सांगण्याचा मात्र प्रयत्न करतात...हे अनाकलनीय अशासाठी आहे, कि हे दोन विचारप्रवाहच मुलात परस्परविरुद्ध आहेत. आता हे मोरेंच्या लक्षात आले नसेल तर त्यांची वकीली फुकट गेली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागते.


सावरकरांचे विद्न्यान हे मुलात विद्न्यान नसुन वैद्न्यानिक अंधश्रद्धा याच सदरात मोडतात. ते कसे हे आपण पाहु. अनुवंशशास्त्र तर त्यांनी पार मोडीत काढलेले दिसते. "आज हिंदुंमद्धे ज्या विविध जाती आहेत, त्यामद्धे एकच रक्त खेळत आहे." येथेवर समजा ते खरे बोलत आहेत, (हे एकच रक्त फक्त हिंदुच नव्हे तर सर्वच मानवी प्रजातींत आहे असे विधान असते तर ते थोडेफार वैद्न्यानिक झाले असते.) पण लगेचच पुढच्या वाक्यात ते म्हणतात..."जेव्हा चार वर्ण निर्माण झाले अगदी त्याच दिवसापासुन एकच रक्त सर्व हिंदुंत संकरित होत आले आहे." आता यांना "रक्तसंकर" नांवाची कोनती वैद्न्यानिक उपाधी निर्माण करायची आहे? काही वैद्न्यानिक शब्द वापरले म्हणुन ते विद्न्यान होत नसते याचे भान सावरकरवादी कसे सोडतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.


सावरकरांच्या स्त्रीविषयक मतांचा मी येथे परामर्ष घेत बसत नाही. कारण एकीकडे स्त्रीस्वातंत्र्य हवे म्हनत चुल आणि मुल हीसुद्धा राष्ट्रसेवाच आहे असे ते समजावुन सांगतात. म्हणजे तु पळ, पळु शकतोस, पण थांबलास तर तेही उत्तमच होय असे भोंगळ विधान करावे तसे त्यांचे स्त्रीस्वातंत्र्याबाबतचे विचार आहेत.


या पुस्तकात मोरेंनी सावरकरांचा जात्युच्छेदन, पतीतपावन मंदिर, अस्पृश्यांसह सहभोजनाच्या कार्यक्रमांचा आवर्जुन उल्लेख केला आहे. त्याबाबत मर्यादित परिप्रेक्षात का होईना, सावरकरांचे वर्तन अभिनंदनीय असेच आहे असे तत्कालीन कालसापेक्ष चौकटीत मान्य करावेच लागेल. परंतु त्यामुळे त्यांना युगप्रवर्तक समाजक्रांतीकारी अशी बिरुदावली बहाल करणे हे म्हणजे हास्यास्पद असेच आहे, कारण तोवर देशभर असंख्य गांधीअनुयायी ते समाजसुधारक संत अशी व याहुनही मोठी महत्कार्ये करतच होती. फुलेंनी त्याची सुरुवात ५०-६० वर्ष आधीच केलेली होती. परंतु आस्चर्याची बाब म्हनजे मोरे फुलेंचा उल्लेख अत्यंत अपवादात्मक करतात.


या पुस्तकातील मला जाणवलेले महत्वाचे मुद्दे म्हणजे, सावरकरांना हिंदु धर्मेतिहास मुळीच माहित नव्हता. किंबहुना हिंदु शब्दाची व्याख्या अत्यंत भोंगळ स्वरुपात त्यांनी केली जी त्यांच्याही अनुयायांनी ती मान्य केली नाही. वर्णव्यवस्था वा जातीव्यवस्थेच्या उगमाबाबत त्यांचे स्वत:चे असे कोनतेही ठाम मत वा संशोधन नव्हते, जसे बाबासाहेबांचे होते. "आपले सामाजिक बीज, रक्त, जातिजीवन नि परंपरा शुद्ध रहावी, संकराने विकृत होऊ नये यासाठी त्या त्या कालच्या हिंदुधर्मियांनी हिंदुराष्ट्राच्या हिताच्याच बुद्धीने ही जन्मजात जातिभेदाची प्रथा निर्मिली किंवा स्वयंप्रेरनेने निर्मु दिली..." (पृष्ठ ९५) हे विधान करणारे सावरकर विद्न्याननिष्ठ होते असे म्हननारे बहुदा स्वर्गीय नंदनवनात विहार करत असावेत. मुळात यांना हिंदु धर्म म्हणजे नेमके काय हे माहित नाही. हिंदु राष्ट्र नांचाची संकल्पना या देशात कधीही अस्तित्वात नव्हती हेही माहित नाही...तरीही ते इतिहासकार, विद्न्याननिष्ठ कसे ठरतात? खरे हेच आहे कि सावरकर हे चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थक होते, व त्याचे अंश त्यांच्या अनेक विधानांत दिसतात. उदा. पृष्ठ ९६ वरील "पाप सर्वांचे: उत्तरदायित्व सर्वांचे" या मथळ्याखालील विवेचन पहावे. यात चातुर्वर्ण्य ही ब्राह्मण वा क्षत्रियांचेच पाप नसुन सर्व वर्णीयांचेच आहे म्हणुन सर्वांनीच त्याचे उत्तरदायित्व घ्यायला हवे असा आशय आला आहे.


या पुस्तकातील असंख्य विधानांचा परामर्श घेता येइल परंतु मी येथे या पुस्तकाविषयीचे माझे आकलन थोडक्यात मांडु इच्छितो.


१. सावरकर विद्न्यानवादी नसुन "वृथा-विद्न्यानवादी" होते. त्यांच्या वैद्न्यानिक म्हणुन मानल्या जाना-या एकाही विधानात विद्न्यान नाही.

२. हिंदुत्व या शब्दाबद्दल त्यांनी कितीही शब्दच्छल केला असला तरी त्यांना एतद्देशीय निर्मित धर्मांसहितचे हिंदुत्व हवे होते, व तसे हवे असा आग्रह आजही आर एस एस सारख्या हिंदुत्ववादी संघटना धरत असतात. म्हनजे जैन, बौद्ध शीख म्हणजे हिंदुच होत हा हिंदुत्ववाद्यांचा दावा मुलात या कोणत्याही धर्माला कधीही मान्य नव्हता व आजही नाही. थोडक्यात सावरकरांना अभिप्रेत हिंदुत्व हेच मुळात स्वार्थनिहाय पायावर उभे होते, शाब्दिक अभिव्यक्ती कशी का असेना.

३. सावरकर हे कधीही सामाजिक क्रांतीकारक नव्हते. तसा आरोप त्यांच्यावर करने हाच मुळात त्यांच्यावरील अन्याय आहे. सावरकर हे मुलत: सशस्त्र क्रांती मार्ग अवलंबनारे राजकीय व्यक्ती होते. अंदमानोत्तर काळात त्यांच्यावर राजकीय बंधने आली म्हणुन त्यांनी काही सामाजिक कार्ये (चळवळी नव्हेत) केली हे मान्य करुनही मुळात त्यांचा पींड हा सामाजिक कार्याचा वा विचारवंताचा नव्हता असे म्हनता येते.

४. सावरकरांनी काही सामाजिक कार्य केले म्हणुन ते समाजक्रांतीकारक होते, हे मोरेंचे विधान अत्यंत धाडसी व कोणत्याही सम्यक बुद्धीच्या विचारवंताला साजेसे नाही. असली कोणतीही "समाजक्रांती" म्हणता येइल, जी अन्यांनी त्यांच्या पुर्वी केलीच नव्हती, अशी बाब मुळात सावरकरांच्या बाबतीत लागु पडत नाही. क्रांती ही उपजत असते, अनुकरणात्मक, मर्यादित व स्वसापेक्ष नसते. कारण सावरकरांच्या मर्यादा यातच त्यांच्या वैचारिक अपयशाचे गुढ लपलेले आहे, परंतु प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाने अभिनिवेशाच्या आहारी जात सावरकरांच्या कथित सामाजिक क्रांतीच्या भौगोलिक व कालीय चौकटी तपासुन पहाण्याचे कसब दाखवलेले नाही, हा त्यांच्या पुस्तकातील मोठाच दोष होय.

५. मुळात "सावरकर वाद" अस्तित्वात कधी होता काय आणि असल्यास त्याची नेमकी रुपरेखा काय याबाबत आजतागायत साधार विवेचन कोणी विद्वानाने केलेले नाही. खरे तर तसे कोणीतरी करायला हवे.

६. विशिष्ट भौगोलिक व जातीय मर्यादेपार सावरकर का जावु शकले नाहीत, यावरही मोरेंनी कसलीही चिकित्सा केलेली दिसत नाही.

७. सावरकरवाद समजा असला तरी त्याची तर्कशुद्ध व निर्भीड मांडनी करण्यात मोरेंना अपयश आलेले आहे. कोणत्याही कालातील संदर्भहीण विधाने, वक्तव्ये देत कोणताही वाद मांडता येत नसतो याचे मोरेंचे भान हरपले आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे सावरकरांच्या जीवनाचे चार कालखंड व प्रत्येक कालखंडातील त्यांची त्याच विशिष्ट विषयांसंदर्भातील विचार क्रमाने आले असते तर कदाचित सावरकर समजावुन घ्यायला मदत झाली असती. पण तसे न करता काळाच्या संदर्भचौकटी उधळत मोरेंनी आपले व सावरकरांचे विचार लादण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा प्रस्तुत ग्रंथ होय.


मला हा ग्रंथ प्रेमपुर्वक चेरेकर सरांनी पाठवला. मला माहित आहे कि त्यांना माझे वरील आकलन आवडणार नाही. परंतु मी एवढेच सांगेल कि मी कसलाही पुर्वग्रह न ठेवता वरील लेखन केले आहे.






114 comments:

  1. " ३. सावरकर हे कधीही सामाजिक क्रांतीकारक नव्हते. तसा आरोप त्यांच्यावर करने हाच मुळात त्यांच्यावरील अन्याय आहे. सावरकर हे मुलत: सशस्त्र क्रांती मार्ग अवलंबनारे राजकीय व्यक्ती होते. अंदमानोत्तर काळात त्यांच्यावर राजकीय बंधने आली म्हणुन त्यांनी काही सामाजिक कार्ये (चळवळी नव्हेत) केली हे मान्य करुनही मुळात त्यांचा पींड हा सामाजिक कार्याचा वा विचारवंताचा नव्हता असे म्हनता येते. "

    मला एवढेच म्हणायचे आहे कि ते क्रांतिकारक होते हे आपण मान्य केल्यानंतर त्यांच्या समाजकारणावर बोलणे हे एकदम चुकीचे आहे.खरेतर सावरकरवाद म्हणजे त्यांच्या अनुयायांनी निर्माण केलेला आहे.सावरकरांचे जीवनच खरेतर वेगवेगळ्या खडतर अश्या घटनांनी भरलेले आहे कि त्यामुळे सामान्य माणूस त्यामुळे खुप भारावुन जातो.सावरकर काय किंवा गांधी आंबेडकर काय सर्व व्यक्ती ह्या खुप वेगळ्या आहेत त्यांचे मुळ कार्य हे खूपच मोठे आहे.पण म्हणून त्यांचे दैवतीकरण कोणत्याही मार्गाने करणे खरच चुकीचे वाटते. सध्या गाजत असलेला "आंबेडकरांवरील कार्टूनचा वाद आपण पाहू शकतो ". फक्त त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण त्यातील काही करू शकतो का हे पाहणे महत्वाचे आहे.

    तुमची समीक्षा हि एकदम परखड वाटते.त्यात कसलाही पूर्वग्रह नाही पण मधेमधेच तुमच्यातील सावरकरानवरचा रोष प्रकटतो असे मला वाटते.

    असो मी काही त्यातील खुप मोठा तज्ञ नाही पण तरीही माझ्या वकुबानुसार जे मला समजले ते मी इथे मांडत आहे.मी ना सावरकरांचे "माझी जन्मठेप" वाचले ना इतर दुसरी पुस्तके.

    ReplyDelete
    Replies
    1. Political revolutionary thoughts/actions and social revolutionary thoughts/actions are entirely different thinks. I have complete sympathy for Savarkar for his suffereings, but then he was not alone to suffer for the freedom of the country. Thanks.

      Delete
    2. सर आपली समीक्षा वाचायची नक्कीच मलापण उत्सुकता होती.आपण तटस्तपणे हे सर्व करत असतात ह्याबद्दल नक्कीच आनंद आहे.पण मला सावरकरानच्या देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा, किंवा समाजक्रांतीच्या कार्याशी नक्कीच प्रेरणा आणि अभिमान वाटत असतो जसा इतर क्रांतिकारकांच्या कार्याशी वाटायला पाहिजे तसा.आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी शंका घेणे म्हणजे त्यांच्यावर नक्कीच अन्याय कार्यासारखे आहे असे मला वाटत असते.कारण मागे सावरकरान विषयी आपली बरीच मते मी वाचली आहेत.आपल्याला अंदामान पूर्व सावरकर आवडतो आणि अंदमान नंतरच्या कार्याविषयी शंका उपस्थित होते.आपण अजून एक धाडसी विधान करतात कि सावरकर एक फक्त कवी म्हणून शोभतात.येथे मला आपल्या चीकीत्सेविषयी नक्कीच शंका उपस्थित होते.अजून जास्त लिहिणे नाही.लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल.

      Delete
  2. indeed,he was not alone,who sufferred,but he received punishment for 27.5 years[14yrs of andman and 13.5 yrs of sthanbaddhataa at ratnagiri] which was the longest period amongst all revolutionaries.In 1910 all three brothers in savarkar family were in jail,their property was seized and their wives had become supportless.i have not yet read another example of so musch sufferring for entire family in our history.

    ReplyDelete
  3. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.तुम्ही माझ्या विनंतीस मान देवून पुस्तके वाचलीत आणि ब्लोग लिहिलात याबद्दल आभारी आहे.अर्थातच मी तुम्ही मांडलेल्या कुठल्याच मताशी सध्या तरी सहमत नाही,पण तुमचे वेगळे मत असण्याचा अधिकार मला मान्य आहे.पुस्तके वाचल्याबद्दल आणि ब्लोग लिहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete
  4. उद्याचे काय सांगावे?मते बदलू शकतात.माझीही आणि तुमचीही.

    ReplyDelete
  5. मत्स्य प्रसवे न खगा
    प्रसवे खग ना जसा कुणा पशुला
    की,एक जाति पशुचि
    जन्म ना दे अन्य जातीच्या शिशुला
    मनुजी भेद ना तो!
    स्त्री असवर्णही गर्भधारणा परि ते!
    वर्णाच्या कवणाही पुरुषी
    संलग्न होऊनि धरिते
    आणि म्हणूनच निसर्ग हा आमच्या पोथीभेदातील जातींना जात म्हणून मानतच नाही.
    [समग्र सावरकर वांग्मय,खंड३,पृ.४६६]
    अर्थ-माशाच्या पोटी पक्षी येत नाही,पक्षाच्या पोटी पशु[चार पायांचे जनावर] येत नाही.कोणत्याही एका प्राण्याच्या पोटी दुसर्या प्रकारचा प्राणी येत नाही[गायीच्या पोटी घोडा किंवा घोड्याच्या पोटी म्हैस].हा भेद माणासांमाणसांमध्ये नाही कारण स्त्री कोणत्याही वर्णाची असली तरीही कोणत्याही वर्णाच्या पुरुषाकडून गर्भ धारणा करवून घेऊ शकते.[त्यामुळे सर्व मनुष्यांची जाती एकच आहे.]

    ReplyDelete
  6. सावरकरांचे विचार देशाला प्रकाश देतील-डा.आ.ह.साळुंखे
    by Madhusudan Cherekar on Friday, May 6, 2011 at 9:05am ·
    [परशुराम,पृ.क्र.२१३-२१५]
    रत्नागिरी येथे वि.दा.सावरकरांनी केलेल्याएका भाषणातील काही अंश मी येथे उद्धृत करू इच्छितो-
    "..चित्पावनांत जन्मलो म्हणून मला लवलेश अभिमान वाटत नाही.मला अभिमान वाटतो तो चित्पावन जातीत जन्मलेल्या थोर थोर विभुतींचाच तो काय..
    शेवटचे बाजीरावही त्याच चित्पावन कुळातील..पण मला महादजी शिद्यांचा अभिमान त्यांच्याहून दसपट अधिक वाटतो.
    दुसर्या बाजीरावाच्या जागी महादजी पेशवे होते तर किती बरे होते असे मला वाटते.
    ..
    बाष्कळ अहंकारी हिंदुविघातक कल्पनांस ब्राह्मणांनी स्वत:च तिलांजली देण्यास पुढे सरसावे..
    आम्ही केवळ जन्मानेच कोणासही उच्च किंवा नीच मानीत नाही अशी घोषणा करावी हेच मी ब्राह्मण्य समजतो.
    ..
    शेवटच्या बाजीरावासारखा खोटा मोठेपणा व भिकारडा अहंकार सांगू नका तर कर्णासारखे गर्जून उठा-
    सूतो वा सूतपुत्रो वायो वा को वा भवाह्यम/
    दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरूषं//
    "
    सावरकरांच्या अनेक विचारांशी माझे तीव्र मतभेद आहेत.पण येथे जे त्यांनी मांडले आहे ते संकुचित भूमिका नाकारून राष्ट्रहिताचा व्यापक विचार करणारे आहे.
    त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या विचाराचे संस्कार अंशत: जरी स्वीकारले,तरी या देशा ला खूप प्रकाश लाभेल असे मला वाटते.-Dr.a.h.salunkhe.

    ReplyDelete
  7. जर आपंणांस शक्य असेल तर सावरकरांचे संपूर्ण वांग्मय एकदा स्वत: मूळातूनच आपण वाचावे अशी प्रेमपूर्वक सूचना मी करेन.आज एवढेच.

    ReplyDelete
  8. सावरकरांचा उदात्त हेतु क्षणभर गृहित धरला तरी एक बाब येथे लक्षात घ्यावी लागते ती ही कि सावरकरांनी स्वत: कधीही यातील एकही बंदी मोडलेली नाही. हे तुमचे वाक्य वस्तुस्थितीला धरून आहे काय?अस्पृश्यांसोबत भोजन करून स्पर्शबंदी आणि रोटीबंदी तोडली,भंग्याच्या हाताने वेदोक्तपूजा करवून वेदोक्तबंदी तोडली.सावरकर लंडनला शिकायला गेले तेव्हा सिंधुबंदी तोडलेलीच होती.स्वत:महारकाम करून त्यांनी व्यवसायबंदीही मोडली होती.लहानपणी लग्न झाल्यामुळे ते स्वत: बेटीबंदी तोडू शकले नाहीत पण रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी १५ आंतरजातीय विवाह लावून दिले.तेव्हा वरील वाक्य तुम्ही नेमके कोणत्या आधारावर लिहिले हे समजणे अवघड आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. SANJAYJI AND LOT OF NEW HISTORIANS WRITE WITHOUT ANY PROPER KNOWLEDGE AND READING AND WITH OUT ANY PROOFS. IF U HATE SAVARKAR NO PROBLEM BUT ATLEAST WHILE WRITING U MUST CHECK ALL FACTS AS I ALREADY MENTION IN ONE OF MY EARLIER COMMENTS REGARDING THE CHANAKYA OR KOUTILYA , WHICH ACCORDING TO YOU NEVER EXIST AS PER THE Megasthenes BUT WHEN I COMMENT THAT THE SAME Megasthenes DIDN'T MENTION THE NAME MOURYA OR CHANDRAGUPTA THEN U DELETE MY POST. I MUST SAY THAT TO THROW A STONE IS VERY EASY THING BUT WHEN U LIVE IN GLASS HOUSE AND IF SAME STONE RETURNS BACK TO YOU . THEN???/

      Delete
  9. एकदा मी प्रसिद्ध अग्निहोत्र कार्यकर्ते,रत्नागिरीचे श्री म.द.पटवर्धन यांच्याबरोबर रत्नागिरीच्या बौद्धवाड्यात गेलो होतो.[इ.स.१९८३].
    सुदैवाने स्वा.सावरकरांच्या वेळचे काही लोक अजूनही हयात होते.
    त्यांतील खूप वृद्ध श्री नंदकुमारजी कांबळे मला म्हणाले,"स्वत: सावरकर आमच्या वस्तीत येत.
    एके दिवशी ते आले,माझा हात अत्यंत प्रेमळपणे आपल्या हातात घेऊन म्हणाले,’चल नंदू,आपण शाळेत जाऊ!’
    त्यांनी स्वत: मला शाळेत घातले.शिक्षकांना सांगितले:" नंदूला वेगळे बसवू नका.सर्व विद्यार्थांच्यातच बसवा.त्याला वेगळे बसविले तर मी शिक्षणाधिकार्याकडे तक्रार करीन."
    सावरकरांमुळेच मी मैट्रिक झालो.
    त्यांनी मला एक उपाहारगृह काढून दिले.
    पण अस्पृश्याच्या उपाहारगृहात कोण येणार?म्हणून सावरकर स्वत: येऊन चहा घेऊ लागले नि त्यामुळे उपाहारगृहात येणार्यांची संख्या वाढली.
    मला उपजीविकेचा व्यवसाय मिळाला."
    हे सारे ऐकताना मी भारावून गेलो होतो.
    त्यानंतर मी मधुकरराव पतवर्धन यांच्या सोबत प्रसिद्ध कार्यकर्ते श्री.साळवी मास्तर यांच्या घरी गेलो.
    संध्याकाळची वेळ.थकलेले व्रुद्ध साळवी मास्तर एका प्रतिमेला उदबत्तीने ओवाळत होते.कोणती प्रतिमा?म्हणून मी उत्सुकतेने पाहिले तर ती स्वा.सावरकरांची प्रतिमा होती.अत्यंत सद्गदित स्वरात ते म्हणाले.:-
    "अरे ,तो माझा देव होता रे!"
    [लेखक:सु.ह.जोशी]...सावरकरांनी एकही बंदी तोडली नाही हे वाक्य तुम्ही कशाच्या आधारावर केले हेच मला समजेनासे झाले आहे संजयजी,पूर्ण पुस्तक दोनदा वाचले असे तुमचे म्हणणे आहे.मग त्यांनी या बंद्या प्रत्यक्ष तोडल्याचे तुमच्या वाचनात कसे काय आले नाही याचेच आश्चर्य वाटते.मोरेंच्या पुस्तकातील पान क्र.१०७ ते १८७ या बंद्या सावरकरांनी प्रत्यक्ष स्वत: तोडल्याच्या उदाहरणांनी व्यापलेले आहेत.

    ReplyDelete
  10. भंग्याच्या पायावर ब्राह्मणांना डोके ठेवावयास लावणारे,भंग्यांसाठी वेदोक्ताचा आग्रह धरणारे,स्वत: ढोरे ओढण्याचे आणि सोलण्याचे महारकाम करण्यास सिद्ध झालेले,शाळांमध्ये दलित-सवर्णांच्या मुलांना एकत्र बसवणारे,"आम्ही केवळ जन्मानेच कोणासही उच्च किंवा नीच मानीत नाही अशी घोषणा करावी हेच मी ब्राह्मण्य समजतो."अशी घोषणा करणारे सावरकर केवळ "दोष सर्वांचा,उत्तरदायित्व सर्वांचे"असे म्हटल्यामुळे चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थक कसे काय ठरतात?सावरकरांचा"वज्रसूचि" हा ग्रंथ चातुर्वर्ण्याचे पूर्णपणे खंडण करणारा आहे.

    ReplyDelete
  11. http://www.savarkarsmarak.com/activityimages/Jatyucchedak%20Nibandha%20-II.pdf

    ReplyDelete
  12. संजयजी,आपणांस विनंती आहे की वर दिलेल्या लिंकमधील सावरकरांचे लेख काळजीपूर्वक वाचावेत आणि ते खरोखरच चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थक होते काय हे ठरवावे.

    ReplyDelete
  13. किंबहुना हिंदु शब्दाची व्याख्या अत्यंत भोंगळ स्वरुपात त्यांनी केली जी त्यांच्याही अनुयायांनी ती मान्य केली नाही. ..सावरकरांच्या हिंदु शब्दाच्या व्याख्येस आपल्या पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेबांनी "framed with care and caution" म्हटले आहे.या व्याख्येत बसणार्या सर्व समुदायांना आंबेडकरांनी राज्यघटनेच्या २५ व्या कलमात हिंदु म्हणून संबोधले आहे.स्वत:त्यांनी संसदेत बोलताना हे मान्य केले आहे की बौद्ध,जैन व शीख हे हिंदु कायद्याखालीच येतात.

    ReplyDelete
  14. सावरकरांच्या हिंदू व्याख्येविषयी बाबासाहेबांची मते.
    by Madhusudan Cherekar on Monday, January 23, 2012 at 8:11pm ·
    असिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका !
    पितृभुः पुण्यभूश्चैव स वै ‘हिंदू’ रीति स्मृतः !!
    सावरकरांनी रूढ केलेली ही व्याख्या
    भारतभूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणारा प्रतेक जण म्हणजे हिंदू..!!

    सावरकरांच्या याच व्याख्येला बाबासाहेबांनी This definition of the term Hindu has been framed with great care and caution असे म्हटले आहे.-dr.b.r.ambedkar,pakistan,partiii-chaptevii,partii.third edition,1946.या व्याखेत बसणार्या समुदायांचाच बाबासाहेबांनी हिंदु कोड बिलात समावेश केला आहे.
    राज्यघटनेत कलम २५,उपखंड३ मध्ये हिंदू या संद्न्येत बौद्ध,जैन व शीख यांचा समावेश केला आहे.
    बाबासाहेबांनी मुस्लीम जिल्हे बाजूला करून उर्वरित देशाचे नांव हिंदुस्तान ठेवावे असे म्हटले आहे-The Scheduled Districts shall be collectively designated as Pakistan and the rest of British India as Hindustan.[पकिस्तान,तिसरी आवृत्ती,१९४६]


    बाबासाहेब म्हणतात: This alternative of Mr. Savarkar to Pakistan has about it a frankness, boldness and definiteness which distinguishes it from the irregularity, vagueness and indefiniteness which characterizes the Congress declarations about minority rights. Mr. Savarkar's scheme has at least the merit of telling the Muslims, thus far and no further. The Muslims know where they are with regard to the Hindu Maha Sabha. On the other hand, with the Congress the Musalmans find themselves nowhere because the Congress has been treating the Muslims and the minority question as a game in diplomacy, if not in duplicity.

    जनता,१०फेब्रुवारी१९५१च्या अंकात बाबासाहेबांनी ६फेब्रुवारी १९५१ला संसदेत केलेले भाषण छापले आहे.बाबासाहेब म्हणतात-समाजशास्त्रदृष्ट्या हिंदु कायद्या खालीच हे सर्व पंथ येतात.बुद्धाचे नि वैदिक ब्राह्मणांचे मतभेद होते ते तरी तात्विक होते.त्याने धार्मिक निर्बंधशास्त्र कायमच ठेवले.स्वत:च्या अनुयायांसाठी नवा कायदा निर्माण केला नाही.महावीर व शीखांचे दहा गुरू यांचीही हीच गोष्ट आहे.

    ReplyDelete
  15. सर्व वर्णीयांनी उत्तरदायित्व घ्यावे आणि चातुर्वर्ण्य कायम ठेवावे असे जर सावरकर म्हणाले असते तर ते चातुर्वर्ण्याचे समर्थन ठरले असते.पण सर्वच वर्णांनी मिळून आता ते मोडावे असे सावरकर म्हणत आहेत.कारण रत्नागिरीत चांभार महारांना आणि महार भंग्यांना शिवून घेत नव्हते.त्यामुळे दोष सर्वांचा,उत्तरदायित्व सर्वांचे हे विधान आले आहे.महर्षी वि.रा.शिंदे आपल्या भारतीय अस्प्रुश्यतेचा प्रश्न या पुस्तकात पान १३६वर म्हणतात:-"महार,चांभार आणि मांग या तीन अस्पृश्य जाती एकमेकांना अगदी पाण्यात पाहत असतात.त्यांना शाळेत एकत्र बसवलेले चालेना..त्यापेक्षा शाळेत न येणेच त्यांनी पसंत केले."या पार्श्वभूमीवर त्याच काळात सावरकरांनी सर्व जातींच्या मुलांना एकत्र बसवण्याचे कार्य य्शस्वी करून दाखवले ही पूर्वी कुणीही न केलेलीच गोश्ट होती.त्यांच्यापूर्वीच्या समाजसुधारकांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा काढल्या होत्या.दलित-सवर्णांना एकत्र बसवण्याचे कार्य सावरकरांनीच सुरु केले.महर्षी शिंदे रत्नागिरीस आल्यानंतर म्हणाले,"माझे उर्वरित कार्य वीर विनायकच पुढे चालवेल.देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांना द्यावे."
    सावरकरांच्या आधी दलित आणि सवर्ण मुलांना शाळांमधून एकत्र बसवण्याचे कार्य जर महात्मा गांधी आणि डा.आंबेडकर यांनी केल्याचे संदर्भ आपणाकडे असतील तर आपण जरूर द्यावेत.मी ती पुस्तके विकत घेऊन वाचावयास तयार आहे.

    ReplyDelete
  16. पान ९६चा उल्लेख तुम्ही दिला आहे.आता पान ९७ पहा--"एकमेकांस हात देऊन या भेदासुरांच्या निर्दालनार्थ आपण सर्वांनीच एकवटून घावावर घाव घातला पाहिजे."त्यांना जर छुपे समर्थनच करायचे असते तर त्यांनी असे लिहिले असते काय? आणि रत्नागिरीत स्थानबद्धतेच्या कालात का होई ना चातुर्वर्ण्याविरुद्ध कार्य केले असते काय?राजर्षि शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार ब्राह्मणांनी दिला नाही तो एका भंग्याला सावरकरांनी देऊ केला.असे उदाहरण पूर्वी घडले असल्यास आपण मला जरूर संदर्भ द्यावा.

    ReplyDelete
  17. अस्पृष्यांसोबतचे सहभोजनादि कार्यक्रम स्तुत्य असले तरी ते म्हणजे धार्मिक जोखडे सर्वस्वी झुगारणारे कार्य नवे.)..सावरकरांनी स्वत:च्या मुलांच्या मुंजी केल्या नाहीत आणि मृत्यूनंतर विद्युतदाहिनीत स्वत:चा देह जाळण्यास सांगितले कुठल्याही विधीशिवाय..हे धार्मिक जोखड झुगारणेच होते.

    ReplyDelete
  18. १९२४ ते १९३७ या काळात सावरकरांचे हे कार्य झाले १९२४पूर्वी कोणत्याही समाजक्रांतिकारकाने खालील कार्ये केलेली असतील तर त्यांचे संदर्भ आपण मला द्यावेत:-
    १.शाळांमध्ये दलित-सवर्णांना एकत्र बसवण्याचे यशस्वी आंदोलन,ज्याची दखल मुंबई प्रांताच्या विधिमंडळातही घॆन्यात आली.
    २.विट्ठल मंदिराच्या गाभार्यात अस्पृष्यांचा प्रवेश/
    ३,भंग्याच्या पायावर ब्राह्मणांना डोके ठेवावयास लावणे.
    ४.भंग्याच्या हाताने वेदोक्त पूजा.
    ५.ब्राह्मण आणि भंगी स्त्रियांचे सहभोजन.
    माझ्या तरी वाचनात सावरकरांपूर्वी हे कार्य कुणीही केल्याचे आढळलेले नाही.तुम्हाला माहिती असल्यास कृपया पुस्तकांची नांवे सांगा.महर्षी वि.रा.शिंदे आणि माधवराव बागलांसारखे राजर्शि शाहूंचे अनुयायी सावरकरांचे कार्य पाहून चकित झाले.ही क्रांति नव्हे काय?

    ReplyDelete
  19. विशेषत:शाळा प्रवेशाचे आंदोलन आपण पुन्हा पुन्हा वाचा.[मोरंच्या पुस्तकात पान क्र.११९ ते १४१]आणी सावरकरांपूर्वी ते इतक्या यशस्वीरीत्या कुणी केले असल्याचे तुमच्या वाचनात असेल तर मला पुस्तकाचे नांव सांगा.मी वाट पाहत आहे.

    ReplyDelete
  20. बाबासाहेबांच्या जनता पत्रानेही या बाबतीत सावरकरांची स्तुती केली आहे.जनता:१मार्च१९३१,११ मे १९३१.[मोरेंच्या पुस्तकात पान क्र.११२ ते ११४.]

    ReplyDelete
  21. बाबासाहेब म्हणतात:-(1) The Shudras were one of the Aryan communities of the Solar race.
    (2) The Shudras ranked as the Kshatriya Varna in the Indo-Aryan Society.
    (3) There was a time when the Aryan Society recognized only three Vamas, namely. Brahmins, Kshatriyas and Vaishyas. The Shudras were not a separate Varna but a part of the Kshatriya Varna.
    (4) There was a continuous feud between the Shudra kings and the Brahmins, in which the Brahmins were subjected to many tyrannies and indignities.
    (5) As a result of the hatred towards the Shudras due to their tyrannies and oppressions, the Brahmins refused to invest the Shudras with the sacred thread.
    (6) Owing to the loss of the sacred thread the Shudras became socially degraded, fell below the rank of the Vaishyas and came to form the fourth Varna.सूर्यवंशी राजे असलेल्या शूद्रांनी ब्राह्मणांवर tyarnnies,indignities आणि oppressions लादले त्यामुळे ब्राह्मणांनी शूद्रांचा उपनयन संस्कार नाकारला आणि चौथा वर्ण निर्माण झाला.[बाबासाहेबांचे who were the shudras,page no.38c2,internet edition[part 2]]तेव्हा सावरकर पाप सर्वांचे,उत्तरदायित्व सर्वांचे म्हणत आहेत त्यात काय चूक आहे.ते चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थन कसे काय ठरते?ब्राह्मण सम्मेलनाची तुलना माकड सम्मेलनाशी सावरकरांनी केली आहे.भटशाहीवर बहिष्कार घाला असे सावरकर म्हणतात.शंकराचार्यांना त्यांच्या तोंडावर स्खलनशील म्हणतात.लग्नांमध्ये भट बोलावूच नयेत,लग्ने नैर्बंधिक[रजिस्टर्ड]पद्धतीनेच लावावीत असे सावरकर म्हणतात,"आज डाक्टर जातीपातीने न ठरता शिक्षणाने ठरतो,तसाच पुरोहितही जातीपातीने न ठरता शिक्षणाने ठरावा"[मोरंचे पुस्तक,पान२२०-२२१]असे म्हणणारे सावरकर केवळ उत्तरदायित्व सर्व वर्णांत वाटल्यामुळे चातुर्वर्ण्याचे छुपे समर्थक कसे काय ठरतात.मग शूद्रांनी पूर्वकाळात ब्राह्मणांवर जुलूम-अत्याचार केले असे म्हणणार्या बाबासाहेबांना तुम्ही काय म्हणाल?

    ReplyDelete
  22. हिंदुत्व या शब्दाबद्दल त्यांनी कितीही शब्दच्छल केला असला तरी त्यांना एतद्देशीय निर्मित धर्मांसहितचे हिंदुत्व हवे होते, असे तुम्ही म्हटले आहे.मंत्राचे काम जोड्याने होते,गाय माता असेल तर बैलाची,माणसाची नव्हे,विद्न्याननिष्ठा हाच आजचा हिंदूधर्म आहे असे म्हणणार्या सावरकरांना कोणत्या धर्मासहितचे हिंदुत्व हवे होते?वरील वाक्यातील धर्म या शब्दाने तुम्हाला कोणता अर्थ अभिप्रेत आहे.धर्म हवा असता तर सावरकरांनी मुलांच्या मुंजी लावल्या नसत्या का?सावरकरांचे विद्न्याननिष्ठ निबंध तुम्ही वाचले नाहीत काय?जहाज तारण्यासाठी सत्यनारायणाला धन्यवाद देण्यापेक्षा आधी जहाज का बुडवले असा जाब सत्यनारायणास विचारा असे म्हणणार्या सावरकरांना कोणता धर्म हवा होता असे आपल्याला वाटते?

    ReplyDelete
  23. कारण तोवर देशभर असंख्य गांधीअनुयायी ते समाजसुधारक संत अशी व याहुनही मोठी महत्कार्ये करतच होती. ..प्रिय संजयजी १९२४पूर्वी सहभोजन वगळता शाळांतून दलित-सवर्णांना एकत्र बसवणे,दलितांचा मंदिर-प्रवेश,भंग्यांना वेदोक्ताचा अधिकार अशी कार्ये कोणत्याही समाजसुधारकाने किंवा स्वत: महात्मा गांधींनी केल्याचे संदर्भ देऊ शकाल काय?

    ReplyDelete
  24. शेषराव मोरेंच्या पुस्तकातील सावरकरांच्या ज्या वाक्यांचे संदर्भ तुम्ही दिलेले आहेत,ते सर्व रत्नागिरी काळातीलच आहेत.तेव्हा त्यांनी इतर काळातील वाक्ये उचलून रत्नागिरी पर्वास जोडली आहेत हे म्हणणे उचित नाही.

    ReplyDelete
  25. या ब्लॉगच्या वाचकांनी माझाही ब्लोग एकदा वाचा आणि जॉईन करा -
    www.santosh-kale.blogspot.com

    ReplyDelete
  26. प्रिय संजयजी,तुमच्या सावरकर विषयक मतांमध्ये पूर्वीच्या टीकाकारांची मते आणि मदन पाटलांचा अकथित सावरकर सारखा डोकावताना दिसतो,त्यामुळे पूर्वग्रह न ठेवता वाचन खरेच झाले आहे काय असे वाटू लागते.सहभोजनामध्ये नवे काही नाही असे तुम्ही म्हणता,पण १८ अक्टोबर १९३६ च्या दलित बंधू मध्ये दलित नेते पां.ना.राजभोज यांनी लिहिले आहे की सावरकरांनी सहभोजनाची चळवळ सुरु केली.सावरकरांपूर्वी केवळ दोनच वेळा सहभोजनाचा कार्यक्रम झाला होता.या सहभोजनास चळवळीचे स्वरूप देण्याचे काम सावरकरांनी केले.बाबासाहेब आंबेडकरांनी देवीदास काम्बळे या मातंग तरुणास १९४१साली लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की चांभार अजूनही सहभोजनास तयार नाहीत.ही गोष्ट मुंबईची आहे.सावरकर तर १९२५पासूनच ब्राह्मण,चांभार,महार आणि भंगी यांना एकत्र बसवण्यात यशस्वी झाले होते.डा.य.दि.फडके यांनी म्हटले आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या विधिमंडळात सावरकरांना समाजकार्यासाठी भारतभर फिरूद्यावे असा ठराव मांडला होता.[शोध सावरकरांचा,पान क्र.७३]महर्षी शिंदे हे रत्नागिरीस जाऊन अनेक दिवस राहून सावरकरांचे कार्य प्रत्यक्ष पाहून आले होते.त्यांनी सावरकरांच्या समाजकार्यास मन:क्रांती आणि समाजक्रांती हे शब्द वापरले आहेत.[सत्यशोधक,दि.५.३.१९३३]महर्षी शिंदे यांचे या वृत्तपत्रात आलेले उद्गार पुढीलप्रमाणे आहेत:-"..येथे घडत असलेली सामाजिक क्रांति खरोखर अपूर्व आहे..हे दिवस पाहण्यासाठी मी जगलो हे ठीक झाले.अवघ्या सात वर्षात ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या स्वातंत्र्यवीराचा किती गौरव करू असे मला झाले आहे..ही सामाजिक क्रांतीची यशस्वी चळवळ पाहून इतका प्रसन्न झालो आहे की,देवाने माझे उरलेले आयुष्य सावरकरांना द्यावे.माझे अपुरे राहिलेले हेतु पुरवील तर हा वीरच पुरवील."१९३२साली भाई माधवराव बागल रत्नागिरीस गेले होते.ते म्हणाले," येथील प्रगती पाहून मी दिग्मूढ झालो.पुण्या-मुंबईसही सहभोजनासाठी पाचदहा स्त्रिया मिळणे कठीण जाते.कोल्हापूरात तर अजून एकदाही स्त्रियाम्चे सहभोजन शक्य झाले नाही.पण रत्नागिरीत आज शेकडो स्त्रिया सहभोजनात भाग घेतात याचे श्रेय सावरकरांना आहे.असा पुरुष आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेवून नाचलो असतो."भंग्याच्या पायावर ब्राह्मणांचे डोके या घटनेचा उल्लेख ३०-९-१९३१च्या टाईम्स आफ् इंडिया मध्ये आला आहे-"आजवर कधीही न पडलेली प्रथा पाडून सावरकरांनी महान क्रांती केली आहे." असे टाईम्स आफ् इंडीयाने म्हटले आहे.तुम्हाला मात्र सावरकरांचे हे समाजकार्य क्राम्तिकारक वाटत नाही कारण तुम्ही समग्र सावरकर वांग्मय मुळातून स्वत: वाचलेले नाही.अकथित सावरकर आणि इतर टीकाकारांचा प्रभाव तुमच्या मनावर आहे असे मला वाटते.

    ReplyDelete
  27. अतिशय चांगले विश्लेषण. चेरेकर साहेब उत्कृष्ट लिहितात यात वादच नाही. त्यांचे वाचनही दांडगे आहे. मात्र त्यांचे एकंदर लिखाण वा फेसबुकवरील विचार पाहता ते हिंदू/वैदिक/ब्राम्हणी विचारप्रणालीशी/धर्माशी किती इमान ठेवून आहेत याचे अत्यंत छान पद्धतीनी दर्शन घडते. शेवटी ब्राम्हणवर्ग कधीही काहीही चुकला नाही आणि तोच सर्वश्रेष्ठ आहे हेच खरे, नाही का?

    ReplyDelete
    Replies
    1. if brahmin write , he is wrong and u wrote 100% true. dear anand dalvi reply with knowledge not with caste.. if dr. cherekar write something which is wrong then please mention it, we all agree with the difference of opinion but only because he is a brahmin and u are giving such a cheap comment then there is no point to argue with u.

      Delete
  28. प्रिय चेरेकर सर, मी मदन पाटील यांचे पुस्तक वाचलेले नाही अथवा वाचण्याची इच्छाही नाही. मी येथे सावरकरांची समीक्षा केलेली नसुन मोरेंच्या पुस्तकाची समीक्षा केली आहे. सावरकर हे माझ्या अभ्यासाचे कधीही विषय नव्हते. जेवढी माहिती होती त्यावरुन मी मागे (हे विधान सागरभाऊसाठी) मला अंदमानपुर्व सावरकर आवडतात (आताही माझे मत जवळपास तसेच आहे.) त्यांच्यातील कवी मला नेहमेच मोहवीत आला आहे. अंदमानकाळात त्यांनी ज्या यातना साहिल्या त्याबद्दल मला नितांत दु:ख वाटत आलेले आहे. मी त्यांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल कधीही शंका घेतलेली नाही. त्या ख-या-खोट्या माफीनाम्यांबाबत मला मुलात रस नाही, परंतु सावरकरवादी मंडळी जेंव्हा खोट्याचा आश्रय घेत गांधींना बदनाम करु लागतात तेंव्हा अर्थातच मी संतप्त होतो व माझी भाषाही असभ्य बनते. मी व्यक्तिश: सावरकरांच्या गांधीहत्या कटातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाबद्दल त्यांच्यावर नाराज आहे, रूष्ट आहे यातही शंका नाही. (मीच नव्हे कोट्यावधी लोक तसे रुष्ट आहेत व सावरकर विचार सरसकट अमान्य केले जाण्याचे हेच महत्वाचे कारण आहे.) त्यांच्या विद्न्याननिष्ठेबद्दल मी लिहिलेच आहे...ती मिथ्या-विद्न्याननिष्ठा होती याबाबत मला शंका नाही, मोरेंनाही नसावी कारण त्यांनी बराच शब्दच्छल केलेला आहे. असो. ते आता महत्वाचे उरलेले नाही कारण त्या विचारांची कालसुसंगतता मुळात आज उरलेली नाही. असो. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. SANJAYJI, WAS READING YOUR BLOG AS IT CAME UP WHILE SEARCHING REFERENCES ON SAHA SONERI PANE.SIR, WHEN WE ANALYSE A HISTORICAL FIGURE WE NEED TO TAKE INTO ACCOUNT THE THEN EXISTING SOCIAL AND POLITICAL STRUCTURE,WHEN SAVARKAR TOOK THE SUBJECT OF UNTOUCHABILITY YOU MUST KEEP CERTAIN FACTS IN MIND1] HE AS A BRAHMIN2] IT WAS UNHEARD OF A BRAHMIN SITTING WITH UNTOUCHABLES [ THIS IS THE WORD DR AMBEDKAR USES OFTEN IN HIS WRITING]TO PARTAKE FOOD.3] HE WAS A TRUE RATIONALIST WHO DECLARED THAT COW IS A USEFUL ANIMAL BUT IF NEED ARISES ONE SHOULD NOT HESITATE TO EAT COW MEAT.HE DID THING WHICH WERE FAR AHEAD OF HIS TIME AND TRIED HIS LEVEL BEST TO UNITE ALL HINDUS BY REMOVING CASTE DISCRIMINATION. I HAVE MANY DIFFERENCES OF OPINION WITH MAHATMA PHULE AND DR AMBEDKAR BUT I WILL ALWAYS ADMIRE AND RESPECT THEM FOR THEIR GREAT WORK. THEY ALSO HAD THEIR WEAK POINTS BUT THEN NOBODY IS PERFECT. WE MUST ACCEPT THEM AS HUMAN BEINGS.WHY BE SELECTIVE IN FINDING FAULTS.PEOPLE OPPOSE SAVARKAR THOUGHTS NOT BECAUSE HIS SO CALLED INVOLVEMENT IN GANDHI HATYA BUT BECAUSE EITHER THEY ARE ANTI BRAHMIN OR PSEUDO SECULARISTS AND LIVE IN A GANDHIAN HYPOCRITICAL WORLD.DILIP ALONI

      Delete
  29. संजय सर आपली नाराजगी एकदम मान्य आहे.नथुराम गोडसेंच्या कृत्याचे मी पण समर्थन करणार नाही.कारण त्या कृत्यामुळे सावरकर अडचणीत आले आणि हिंदुत्व पण बदनाम झाले.झाले ते झाले .जास्त इतिहासात डोकावून पाहणे सुद्धा चांगले नाही.काही बऱ्या वाईट गोष्ठी आहेतच.

    ReplyDelete
  30. एकंदरीत मोरेंनी गांधीजींवर केलेल्या टीकेविषयी आपण नाराज आहात तर...तुम्हाला पुढे चर्चा करण्यात काहीच रस नाही असे दिसते.पण तरीही एक प्रश्न विचारावासा वाटतो,सावरकरांची विद्न्याननिष्ठा ही मिथ्या होती असे तुम्हाला का वाटते?

    ReplyDelete
  31. आनंद दळवी सर,आपला निष्कर्ष चुकीचा आहे.मी ब्राह्मणी/वैदिक/हिंदू धर्माचा अनुयायी नसून बुद्ध-धम्माचा अनुयायी आहे.ब्राह्मणांचे भरपूर चुकले आहे.हे मला मान्य आहे.

    ReplyDelete
  32. तुमच्या माहितीसाठी आणखी एक सांगतो,शेषराव मोरे हे सध्या महात्मा गांधींच्या बाजूने एक पुस्तक लिहीत आहेत.फाळणीच्या वेळी महात्मा गांधींनी घेतलेली भूमिका कशी बरोबर होती याविषयी ते लिहित आहेत.त्यांनी गोपाळ गोडसे यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसायला नकार दिल्यामुळे सावरकरवाद्यांनीही त्यांना वाळीत टाकले आहे.

    ReplyDelete
  33. परिवर्तन आणि स्थितिवाद यातील फरक नेमका लक्षात न आल्याने हिंदुत्ववाद्यांची आज ही परिस्थिती झाली आहे. भारताला जागृत करायचे असेल तर त्यासाठी आधी भारत समजून घेणे आवश्यक आहे हे ज्यांना कळत नाही, एकीकडे परकीय संस्कृतीचा विरोध करतांना स्वत:च परकीय संस्कृतीचा आधार घेत क्रांती घडवण्याच्या वल्गना जे करतात त्यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

    ReplyDelete
  34. डॊ.मेजर मधुसूदन चेरेकर,
    अतिशय सुंदर माहिती दिलीत. तुमच्या माहितीबद्दल एक सावरकरप्रेमी म्हणून माझ्या मनात तुमचे कायम आदराचे स्थान राहिल. धन्यवाद...!

    ReplyDelete
  35. प्रिय चेरेकर सर, मोरेंनी जेंव्हा १८५७ एक जिहाद लिहिले तेंव्हाच सावरकरी सिद्धांतांशी फारकत घेतली हे आपल्यालाही विदित असेलच. हिंदुत्ववादी लेखक त्यांच्यावर तुटुन पडले होते. आता ते गांधीवादावर लिहित असतील तर त्यांचे अभिनंदनच करायला हवे. फाळणी, ५५ कोटी इ. हिंदुत्ववाद्यांच्या गांधीद्वेषासाठी वापरल्या जाना-या पण गैरसमजातील लाडक्या संकल्पना आहेत. येथे मी हे स्पष्ट करु इच्छितो कि मी गांधीवादीही नाही. किंबहुना गांधीवाद असा वाद अस्तित्वात आहे हेही मला मान्य नाही. गांधी हे औपनिषदिक तत्वद्न्यानाला (वैदिक नव्हे) प्रत्यक्ष जगणारे त्या तत्वद्न्यानाचे आपल्या वर्तनाने जागतीक आदर्श निर्माण करणारे प्रमादशील पण एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. कोणतीही जात पाठीशी नसतांनाही त्यांना जी किर्ती लाभली, आजही त्यांचे जगभर भाकड कथा सांगणारे नव्हेत तर त्यांना कृतीत आनणारे अनुयायी आहेत हे वास्तव नकारता येत नाही. मोरेंनी गांधींच्या विरोधात प्रस्तुत समीक्षार्ह पुस्तकात टीका केली म्हणुन मी नाराज नाही तर खुद्द सावरकरांनी त्यांच्या हत्येचा कट रचला व नथुरामचा उपयोग करुन घेतला त्याबद्द्ल आहे. याबाबत कितीही सारवासारव केली तरी केवळ वल्लभभाई पटेल या छुप्या संघसमर्थकामुळे त्यांची शिक्षा टळली हे सत्य नाकारता येत नाही. खुनशी विचारांच्या माणसांच्या विद्वत्तेचा कितीही उदौदो केला तरी या देशात व्यर्थच आहे. ही भुमी मुळात संतांची, उदारहृदयी प्रजेची आहे. खुनी आणि कपटी लोकांची नाही. हा देश "देश" आहे तो केवळ या लोकांमुळे. सावरकरांसारख्यांमुळे नव्हे हे वास्तव जरा समजावून घ्यावे लागनार आहे. गांधी कोणी विशेष नव्हते तर या देशातील जनतेच्या समग्र मनोवृत्तीचे प्रतीकमात्र होते. म्हणुन ते महान ठरले. आणि म्हणुनच देशही महान ठरला.

    गांधी उपोषणाला बसले कि देश उपोषणाला बसे (वाचा राजा रावांचे "कांथापुरा"), सावरकर एवढे महान होते तर त्यांची कोनतीही चळवळ रत्नागिरीच्या सीमा का ओलांडु शकली नाही? जिद्न्यासु म्हनाले तेच खरे आहे, एकीकडे परकीय संस्कृतीचा उद्धार करत परकीयच पद्धतीने क्रांतीची भाषा करनारे सावरकर आणि एतद्देशीय याच मातीतल्या तत्वद्न्यानाचा मुलाधार घेत क्रांती करणारे गांधी यांच्यात कधीही तुलना होवु शकत नाही. एवतेव सावरकरांच्या कृतींचे, कथित चळवळींचे कोणाला कितीही कवतुक वाटत असले तरी ते जनमान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. दोन-चार ब्रिटिश अधिकारी मारले म्हणजे क्रांती होत नसते. त्यामुळे देश स्वतंत्र होत नसतो. फारतर तशा निरपराध तरुणांना फासावर लटकावल्याचे पाप पदरी पडते. सावरकरवाद्यांची मजल येथवर गेली आहे कि सुभाषबाबुंना लष्करी उठावाची प्रेरणा देनारे सावरकरच होते....येथे काहीही मत नोंदवायला मी असमर्थ आहे.
    सावरकर हे राष्ट्रप्रेमी होते हे सत्यच आहे. पण त्यांना क्रांतीची भाषा आणि साधन समजलेच नाही हा त्यांचा दोष आहे. त्यामुळेच त्यांचा हिंदुत्ववाद हा गोधळलेल्या मनाचे प्रतीक आहे. मी "सावरकरांचा बुद्धीवाद आणि हिंदुत्ववाद" या शेषराव मो-यांच्या पुस्तकावरही लवकरच लिहिणार असल्याने येथे हा विषय आटोपता घेतो.
    आंबेडकरांशी सावरकरांची तुलनाच होवु शकत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे कि मी आंबेडकरांच्या सर्वच विचारांशी सहमत आहे. उदा. शुद्र हे सुर्यवंशी होते, ब्रोकन म्यन थियरी इ.इ. त्यांचे सिद्धांत मीच माझ्या "महार कोण होते?" या पुस्तकात खोडुन काढले आहेत. परंतु आंबेडकरांची सैद्धांतिकता अभ्यासु व जिद्न्यासु पातळीवर होती तर सावरकर हे "मी म्हनतो तोच हिंदु धर्म व समाज" अशी अ-अभ्यासपुर्ण, असंशोधकीय वृत्तीची होती. त्यांचे "सहा सोनेरी पाने" हे पुस्तक अनेक भुलथापांनी भरलेले आहे हेही आपण थोडा जरी इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल. असो. मला चर्चेत रस नाही असा कृपया गैरसमज करुन घेवु नये ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. मोरेंनी गांधींच्या विरोधात प्रस्तुत समीक्षार्ह पुस्तकात टीका केली म्हणुन मी नाराज नाही तर खुद्द सावरकरांनी त्यांच्या हत्येचा कट रचला व नथुरामचा उपयोग करुन घेतला त्याबद्द्ल आहे. याबाबत कितीही सारवासारव केली तरी केवळ वल्लभभाई पटेल या छुप्या संघसमर्थकामुळे त्यांची शिक्षा टळली हे सत्य नाकारता येत नाही. खुनशी विचारांच्या माणसांच्या विद्वत्तेचा कितीही उदौदो केला तरी या देशात व्यर्थच आहे. ही भुमी मुळात संतांची, उदारहृदयी प्रजेची आहे. खुनी आणि कपटी लोकांची नाही. हा देश "देश" आहे तो केवळ या लोकांमुळे. सावरकरांसारख्यांमुळे नव्हे हे वास्तव जरा समजावून घ्यावे लागनार आहे. गांधी कोणी विशेष नव्हते तर या देशातील जनतेच्या समग्र मनोवृत्तीचे प्रतीकमात्र होते. म्हणुन ते महान ठरले. आणि म्हणुनच देशही महान ठरला.
      Dear Sanjayji why u are writing fase and very untrue statements about savarkar and vallabha bhai patel? if at all savarkar want to kill gandhi then he could have done it very early, why at 1948 when gandhiji was nearly 80 yrs? u are writing like BAMSAFE MESHRAM AND MOOLNIVASI NAYAK.

      Delete
  36. सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते,त्यामुळे त्यांची चळवळ रत्नागिरीच्या पलीकडे जाऊ शकली नाही.पण सावरकरांनी चळवळ सुरु केल्यानंतर महाराष्ट्रभर सहभोजनांचा धूमधडाका उडाला. रत्नागिरीतील काम पाहून महर्षी वि.रा शिंदे यांनी जे उद्गार काढले त्याविषयी आपले काय मत आहे? तुमच्या मनात सावरकरांची एक हत्यारा म्हणून प्रतिमा आहे.सुभाष-बाबूंनी स्वत:च जपानी नभोवाणीवरून बोलताना सावरकरांचे नांव घेतले होते.जपानी इतिहासकारांनीही त्याची नोंद घेतली आहे.असो प्रथम मला महर्षी वि.रा.शिंदे यांनी सावरकरांचे कार्य प्रत्यक्ष पाहून काढलेल्या उद्गारांविषयी सांगा.गांधीजी आणी बाबासाहेब यांच्याशी तुलना न करता तसेच १९४८साली सावरकरांनी काय केले हा पूर्वग्रह मनात न ठेवता,एक सामान्य माणूस म्हणून विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीने १९२४ ते १९३७ या व्यक्तीने रत्नागिरीत काय कार्य केले ते पहा.साडेसत्तावीस वर्षे इतकी प्रदीर्घ शिक्षा दुसर्या कोणत्या व्यक्तीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगली आहे?असा कोणता क्रांतिकारक आहे,ज्याला स्वातंत्र्यानंतरही तुरुंगात जावे लागले? बडगेची साक्ष वगळता सावरकरांच्या विरुद्ध गांधीजींच्या हत्येत सामील असल्याचा कोणताही पुरावा नाही.बाबासाहेबांनीही सावरकरांच्या वकीलांना आर्थिक मदत केली होती असे भोपटकर या सावरकरांच्या वकीलाने लिहून ठेवले आहे आणी सर्वोच्च न्यायालयाने बडगेची साक्ष अग्राह्य तर कपूर आयोगाने तीच साक्ष ग्राह्य ठरवली आहे.असो.प्रथम मला सावरकर या सामान्य माणसाने १९२४ ते १९३७ या काळात केलेल्या कार्यास महर्षी शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविषयी आपले मत सांगा.हे मत देताना कृपया गांधीजींची हत्या हा विषय बाजूला ठेवून प्रतिक्रिया द्या.तुम्ही म्हणाला होतात की सावरकरांचे समाजकार्य अभिनंदनीय असले तरी त्यात नवे काहीच नव्हते पण मी वर टाइम्स आफ् इंडिया,महर्षी शिंदे,पां.ना.राजभोज या समकालीनांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.तसेच काही विशिष्ट घटना दिनांकासह दिल्या आहेत ज्या सुधारणा सावरकरांपूर्वी घडल्या नव्हत्या.त्यावर आपले मत नोंदवा.मला फक्त रत्नागिरीपर्वाविषयी मत अपेक्षित आहे.कृपया त्यांच्या जीवनाचे इतर तीन भाग[हे तुम्हीच पाडलेले आहेत]याविषयी आपण नंतर बोलू.

    ReplyDelete
    Replies
    1. SANJAYJI ALWAYS TWISTED MATTER TO ANOTHER ROUTE WHEN THERE IS NO REPLY OR NO ANSWER AVAILABLE TO HIM... 1947 PARTITON HOW MANY INNOCENT HINDUS KILLED? DO YOU KNOW SANJAYJI? WHY THESE MEN AND WOMEN KILLED? ACCORDING TO YOU SAVARKAR WAS BEHIND TO KILL GANDHIJI, AND ACCORDING TO ME ALL CONGRESS PARTY INCLUNDING GANDHIJI WAS TO BLAME FOR KILLING HUNDREDS AND THOUSANDS OF PEOPLES AND SHLD APOLOGISE TO ALL COUNTRY.. HOW MANY WOMAN GANG RAPED? DO YOU KNOW SANJAYJI? WHOM TO BLAME? WHO WAS RESPONSIBLE TO THIS MASSACRE? STILL I RESPECT GANDHIJI,NEHRU AND OTHER CONGRESS LEADERS AT THAT TIME FOR THEIR WORK TOWARDS FREEDOM MOVEMENT..IF YOUR YARDSTICK OF LAW APPLIES THEN WHY THIS PARTITION CRIMINALS NOT PROSECUTED? I AM NOT FULLY AGREE WITH ALL SAVARKAR THOUGHTS . AND EVERYBODY INCLUDING GANDHI,AMBEDKAR,SAVARKAR OR JINNAH ALSO HAS THEIR OWN VIEWS , U CAN NOT ACCEPT ALL GANDHI ALL AMBEDKAR OR ALLSAVARKAR AND JINNA. BUT IF U BECAME PREJUDICED AND YOUR WRITING BECAME LIKE A HITLER NAZI THEN THERE IS A SERIOUS PROBLEM WITHIN YOUR BRAIN AND MIND.U ARE NOT GOING TO ACCEPT ANYBODY, THEN YOU ARE INDEPENDENT THINKER OR NEW THINKER HAS ARRIVED IN THE WORLD.

      Delete
  37. .सहभोजनामध्ये नवे काही नाही असे तुम्ही म्हणता,पण १८ अक्टोबर १९३६ च्या दलित बंधू मध्ये दलित नेते पां.ना.राजभोज यांनी लिहिले आहे की सावरकरांनी सहभोजनाची चळवळ सुरु केली.सावरकरांपूर्वी केवळ दोनच वेळा सहभोजनाचा कार्यक्रम झाला होता.या सहभोजनास चळवळीचे स्वरूप देण्याचे काम सावरकरांनी केले.बाबासाहेब आंबेडकरांनी देवीदास काम्बळे या मातंग तरुणास १९४१साली लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की चांभार अजूनही सहभोजनास तयार नाहीत.ही गोष्ट मुंबईची आहे.सावरकर तर १९२५पासूनच ब्राह्मण,चांभार,महार आणि भंगी यांना एकत्र बसवण्यात यशस्वी झाले होते.डा.य.दि.फडके यांनी म्हटले आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या विधिमंडळात सावरकरांना समाजकार्यासाठी भारतभर फिरूद्यावे असा ठराव मांडला होता.[शोध सावरकरांचा,पान क्र.७३]महर्षी शिंदे हे रत्नागिरीस जाऊन अनेक दिवस राहून सावरकरांचे कार्य प्रत्यक्ष पाहून आले होते.त्यांनी सावरकरांच्या समाजकार्यास मन:क्रांती आणि समाजक्रांती हे शब्द वापरले आहेत.[सत्यशोधक,दि.५.३.१९३३]महर्षी शिंदे यांचे या वृत्तपत्रात आलेले उद्गार पुढीलप्रमाणे आहेत:-"..येथे घडत असलेली सामाजिक क्रांति खरोखर अपूर्व आहे..हे दिवस पाहण्यासाठी मी जगलो हे ठीक झाले.अवघ्या सात वर्षात ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या स्वातंत्र्यवीराचा किती गौरव करू असे मला झाले आहे..ही सामाजिक क्रांतीची यशस्वी चळवळ पाहून इतका प्रसन्न झालो आहे की,देवाने माझे उरलेले आयुष्य सावरकरांना द्यावे.माझे अपुरे राहिलेले हेतु पुरवील तर हा वीरच पुरवील."१९३२साली भाई माधवराव बागल रत्नागिरीस गेले होते.ते म्हणाले," येथील प्रगती पाहून मी दिग्मूढ झालो.पुण्या-मुंबईसही सहभोजनासाठी पाचदहा स्त्रिया मिळणे कठीण जाते.कोल्हापूरात तर अजून एकदाही स्त्रियाम्चे सहभोजन शक्य झाले नाही.पण रत्नागिरीत आज शेकडो स्त्रिया सहभोजनात भाग घेतात याचे श्रेय सावरकरांना आहे.असा पुरुष आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेवून नाचलो असतो."भंग्याच्या पायावर ब्राह्मणांचे डोके या घटनेचा उल्लेख ३०-९-१९३१च्या टाईम्स आफ् इंडिया मध्ये आला आहे-"आजवर कधीही न पडलेली प्रथा पाडून सावरकरांनी महान क्रांती केली आहे." असे टाईम्स आफ् इंडीयाने म्हटले आहे.तुम्हाला मात्र सावरकरांचे हे समाजकार्य क्राम्तिकारक वाटत नाही

    ReplyDelete
  38. १९२४ ते १९३७ या काळात सावरकरांचे हे कार्य झाले १९२४पूर्वी कोणत्याही समाजक्रांतिकारकाने खालील कार्ये केलेली असतील तर त्यांचे संदर्भ आपण मला द्यावेत:-
    १.शाळांमध्ये दलित-सवर्णांना एकत्र बसवण्याचे यशस्वी आंदोलन,ज्याची दखल मुंबई प्रांताच्या विधिमंडळातही घॆन्यात आली.
    २.विट्ठल मंदिराच्या गाभार्यात अस्पृष्यांचा प्रवेश/
    ३,भंग्याच्या पायावर ब्राह्मणांना डोके ठेवावयास लावणे.
    ४.भंग्याच्या हाताने वेदोक्त पूजा.
    ५.ब्राह्मण आणि भंगी स्त्रियांचे सहभोजन.
    माझ्या तरी वाचनात सावरकरांपूर्वी हे कार्य कुणीही केल्याचे आढळलेले नाही.तुम्हाला माहिती असल्यास कृपया पुस्तकांची नांवे सांगा.महर्षी वि.रा.शिंदे आणि माधवराव बागलांसारखे राजर्शि शाहूंचे अनुयायी सावरकरांचे कार्य पाहून चकित झाले.ही क्रांति नव्हे काय?

    ReplyDelete
  39. प्रिय चेरेकर साहेब, मी एवतेव सावरकरांना अद्वितीय सामाजिक क्रांतिकारक मानायलाच हवे असा आपला रोख दिसतो. असो, खालील काही प्रश्न व माझी काही स्पष्टिकरने आहेत.

    १. आपण अस्पृष्याला सावरकरांनी चहाचे दुकान काढुन दिले व लोक त्यात जाईनात म्हणुन सावरकर स्वत: तेथे चहा पिवु लागले व म्हणुन ते दुकान चालु लागले असे लिहिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे हीच कथा शाहुंबद्दल सांगितली जाते. नेमके हे खरे कोणाबाबत घडले?
    २. सावरकरांना "स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी व कधी दिली? नेमकी कधीपासुन ती प्रचारात आली?
    ३. रत्नागिरीतील महार सावरकरांना प्रत्यक्ष कैवारी, पतीतपावन मानु लागले होते तर मग ही चलवळ रत्नागिरीच्या बाहेर का गेली नाही? सावरकरांवर स्थानबधता होती हे ठीक, पण म्हणुन त्यांच्या अनुयायांना ती अन्यत्र नेणे अशक्य नव्हते...पण तसे का झालेले आढळौन येत नाही?
    ४. एवढी सामाजिक क्रांती घडवल्यानंतर आंबेडकरांना धर्मांतरापासुन रोखणे किती सोपे होते. पण धर्मांतराची घोषणा करुनही तब्बल २० वर्ष वाट पाहुनही केवळ धर्मातील अस्पृष्यता नष्ट करा एवढी त्यांची मागणीही पुर्ण झाली नाही म्हणुन धर्मांतर घडले. सावरकरांनी असे घडु नये म्हणुन नेमके काय केले? तसे काही करुन दाखवले असते तर ते महान समाज व राष्ट्रक्रांतीकारक ठरले नसते काय?
    ५. महर्षि वि. रा. शिंदेंनी अस्पृष्यता निर्मुलनाचा जाहीरनामा काढला होता. त्यावर टिळकांनी सही केली नव्हती. सावरकरांनी तशी केली होती काय? किंवा स्वत: असा काही जाहीरनामा काढला होता काय?
    ६. पतीतपावन मंदिरात महार-भंग्यांना वेदोक्त पद्धतीने पुजा करण्याचा अधिकार दिला असे आपले म्हनने आहे. पण मग या मंडळींना वेद कोणी शिकवले? समजा पुजा सांगणारे वेगळे होते, पण वेदांत पुजा असते काय? पुजा वेदोक्त झाली कि पुराणोक्त?
    ७. असे कृत्य (महार-भंग्यांच्या पायावर डोके ठेवणे वगैरे...) फार पुर्वी, म्हणजे संत नामदेवांनी सातशे वर्षांपुर्वी करुन दाखवले होते, चोखा मेळा व त्याच्या घरातील अन्य ४ व्यक्तींना पार संतपदी नेवुन बसवण्यात मोलाची आघाडी घेतली होती. सावरकरांचे कार्य नामदेवांपेक्षा मोठे होते असे आपणास म्हणायचे आहे काय? वारकरी संप्रदायात किर्तनकाराच्या पायावर (तो कोणत्याही जातीचा/धर्माचा असो) डोके ठेवण्यात लोक धन्यताच मानत असतात, त्याचे श्रेय कोनाचे?

    असो, प्रश्न अनेक आहेत. सावरकरांचे सामाजिक कार्य मर्यादित परिप्रेक्षात अभिनंदनीय असेच आहे असे मी माझ्या समीक्षेत म्हटलेले आहेच. परंतु त्याला अलौकिकत्वाची झालर द्यायची असेल तर वरील प्रश्नांची अभिनिवेशाच्या आहारी न जाता उत्तरे द्यावीत ही विनंती.

    ReplyDelete
  40. राहुलजी, पहिली बाब अशी आहे कि आपण जे काही लिहित आहात ते गैरसमजातुन. मी तुमची एकही पोस्ट डीलिट केलेली नाही. तुमच्या दोन पोस्ट स्पुअममद्धेय जावुन बसल्याचे आता माझ्या निदर्शनास येताच त्या मी पब्लिश केल्या आहेत. मी कोणतीही पोस्ट मोनिटर करत नाही. चेरेकर साहेब माझे मित्र आहेत. आमचे सावरकरांबाबत मतभेद आजचे नाहीत. चेरेकरसाहेब सावरकरांबाबत खुप हळवे आहेत याची मला जाण आहे आणि त्यांच्या भावनांचा मी अनादर करत नाही.

    आता मी मेग्यस्थीनीसचा उल्लेख या संदर्भात कधी केला? आता तुम्ही केलाच आहे त सांगतो कि मेग्यस्थीनीस मुळात विश्वासार्ह नाही असे स्ट्राबोही म्हणतो. त्याचे सारे खरे मानले तर भारतात उलट्या पावलांच्या माणसांचे वा सोने उकरना-या मुंग्यांचेही उल्लेख खरे मानावे लागतील. असो. गांधींबद्दलची आपली विधाने अयोग्य आहेत एवढे मी येथे नमुद करतो. नथुरामने १९४४ पासुनच (पांचगणी येथे पहिला प्रयत्न) गांधींच्या खुनाचे प्रयत्न चालवले होते हे बहुदा आपणास माहित नसावे. तेंव्हा फाळणी वा ५५ कोटींचा प्रश्नच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे सावरकरांनी गांधींना मारायचेच असते तर पुर्वीच मारले असते या आपल्या विधानात पुरेपुर विसंगती आहे. असो. सावरकरांवर प्रेम करने म्हनजे त्यांचे सारे ते समर्थनीय मानने चुकीचे आहे. येथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावर चर्चा झडत नाहीहे. पण प्रत्येकाला येथे आपापले मत मांडायचा पुरेपुर अधिकार आहे. गांधी हत्येमागे ब्राह्मण-ब्राह्मनेतर हा मुख्य मुद्दा होताच...पण आज त्याची चर्चा करण्यात अर्थ नसुन सावरकरांनी या आगीत तत्कालीन परिस्थितीत भर टाकली एवढेच वास्तव स्वीकारण्याची (अथवा इच्छाच नसेल तर) नाकारण्याची मुभा आहेच. काही वाद असे असतात ज्यांना अंत नसतो. त्यापैकीच हा सावरकरवाद (जो माझ्या मते "वाद" नाही) आहे. असता तर कदाचित तो आज जगभरच्या काही ना काही तरी विद्यापीठंत अभ्यासक्रमांत असता. किमान भारतातल्या तरी. पण तसे वास्तव नाही. मोरेच सावरकरांकडुन गांधींकडे का वळतात हेही समजावुन घ्यायला हवे. फक्त त्यासाठी हळवेपणा सोडुन वास्तवतादर्शी दृष्टीने पहायला हवे. मी ना सावरकरांचा अभ्यासक आहे ना गांधींचा. पण झुकते माप मी गांधींनाच दिले आहे आणि देत राहील...कारण गांधी हे भारतीय मानसिकतेचे प्रतीक आहेत. उद्या कदाचित ते जागतीक मानसिकतेचेही प्रतीक बनतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.
    मी सावरकरांवर रुष्ट आहे असे म्हटले आहे. मी त्यांचा द्वेष करत असतो तर हा लेख लिहिलाही नसता. मला माझी संस्कृती कोनाचाही द्वेष करायला शिकवत नाही.
    धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. u love anybody but u cannot accept all thoughts and thinking of only one person . i just want the proof of ur statemnt regarding the sardar patel and savarkar's acquittal. otherwise its baseless allegation to tarnish savarkar and patel. नथुरामने १९४४ पासुनच (पांचगणी येथे पहिला प्रयत्न) गांधींच्या खुनाचे प्रयत्न चालवले होते हे बहुदा आपणास माहित नसावे. तेंव्हा फाळणी वा ५५ कोटींचा प्रश्नच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे सावरकरांनी गांधींना मारायचेच असते तर पुर्वीच मारले असते या आपल्या विधानात पुरेपुर विसंगती आहे. ya statement madhe visangati kay aahe? jar savarkarana gandhiji na marayache hotech tar te kadhich aaplya aanuyaye kadun kele aste. i know all about nathuram and also about the gandhi as history stundent and history lover. partition is one of my studied subject. u simply refuse to comment on that subject and i agree that u can disagree on my views on gandhiji as i disagree ur views on savarkar. i have studied savarkar,gandhi and nathuram also.nathuram shld not killed gandhiji , this is my personal opinion. i don't care for others. but what was the gain for the savarkar by killing only gandhiji? why not kill all other opponents also? all congress leaders at that time? its highly absurd writing that savarkar was behind the killing of gandhiji. savarkar was against british.why NOT gandhiji and congres leaders follow the abraham lincon who succesfully united the america and fought civil war but not bow down before the slavery supports? savarkar was against the appeasement policy of gandhiji and congress. and muslims cast their vote in favour of jinnah.due to this policy of gandhiji , savarkar predicted partition of india. at that time all laughed on him. all says this man wants to divide the nation. gandhiji in 1946/47 himself said that the partition will not occur and if it occurs then it will be on my dead body. the champion of truth and ahisa failed to keep his words , still world praises him and the same world like to talk peace and constantly engaged in war. this the irony of all peace talking saints and mahatma's like LORD BUDDHA , BHAGWAN MAHAVIR AND 20TH CENTURY'S SAINT GANDHIJI. SAVARKAR WAS NOT GIVEN THE DUES THAT OUR COUNTRY AND ALL OF US SHLD GIVE HIM . IF HE WAS BORN IN EUROPE OR AMERICA THEN HE WOULD HAVE BEEN CERTAINALY BECAME THE NATIONAL HERO , BUT IN OUR COUNTRY HE IS STILL UNTOUCHABLE AND HATED.
      AND ABOUT THE MR. MORE. HE IS A WRITER AND HE CAN CHOOSE ANY TOPIC TO WRITE. IF HE TURN TO GANDHIJI , ITS GOOD, BUT THE SAME MR. MORE WRITE ABOUT ISLAM,KHALIPAT , 1857 JIHAD ( AGAINST THE SAVARKAR VIEWS) . BUT HOW CAN U LABEL A WRITER ABOUT PARTICULAR PHILOSOPHY UNLESS AND UNTIL HE HIMSELF DECLARE SUCH THING.

      Delete
    2. आता मी मेग्यस्थीनीसचा उल्लेख या संदर्भात कधी केला? आता तुम्ही केलाच आहे त सांगतो कि मेग्यस्थीनीस मुळात विश्वासार्ह नाही असे स्ट्राबोही म्हणतो. त्याचे सारे खरे मानले तर भारतात उलट्या पावलांच्या माणसांचे वा सोने उकरना-या मुंग्यांचेही उल्लेख खरे मानावे लागतील IN YOUR ONE ARTICLE U WRITE ABOUT THE CHANAKYA OR KOUTILYA WITH THE REFERENCE OF MEGASTHENES THAT THE CHANAKYA WAS NOT MENTIONED BY HIM AND THEREFORE SUCH ENTITY DIDN'T EXIST, AND I WROTE THAT HE DIDN'T MENTION WORD MOURYA AND CHANDRAGUPTA , CAN WE ASSUME THE THE GREAT CHANDRAGUPTA DIDN'T EXIST AT ALL ? NOW U HIMSELF AGREE THE HE IS NOT TRUSTWORTHY..
      AND WHAT ABOUT THE PARTITION CRIMINALS? WHY WE ARE STILL NOT SAYING LOUDLY THAT THE CONGRESS PARTY AND ALL THE LEADERS INCLUDING GANDHIJI WERE RESPONSIBLE FOR THE PAIN AND AGONY OF THOUSANDS OF PEOPLES? I HAD MET LOT OF PEOPLES WHO SUFFERED HEAVILY DUE TO THE PARTITION AND ALL THEM CURSING CONGRESS AND GANDHIJI. WE THE INDIANS ARE MOST RELIGIOUS TOLERANCE PEOPLE, BUT WHATEVER HAPPENED WAS HAPPENED AND WHOM TO BLAME? SAVARKAR OR GANDHI? OR JINNAH?BUT WE WILL NOT BLAME JINNAH AS WE NEED MUSLIM VOTES IN INDIA. AND TO DIVERT THIS MAIN ISSUE WE SHIFT TO KILLING OF GANDHIJI. HI DHULPHEK AAHE. FOR EVERY ACTION THERE IS AND MUST BE A REASON, MAY BE A WRONG ONE, OTHERWISE GANDHIJI, DYNAMICAL IRON LADY INDIRAJI , THE CHARMING PRINCE OF INDIA RAJIVJI COULD NOT SUFFER TRAGIC DEATH. I AM TOTALLY AGAINST OF KILLING OF ANY BODY. BUT AS A NATION U MUST KILL YOUR ENEMY WITHOUT FLYING THE WHITE PIGEONS... SAVARKAR TEACH US TIT FOR TAT, NOTHING ELSE.SO I LIKE HIM FOR THIS VIEWS. HIS MANY OTHERS VIEWS ARE ALSO GOOD OR SOME VIEWS MAY NOT ACCEPTABLE TO MANY BUT HIS MAIN PRINCIPLE WAS TIT FOR TAT. PARDHARMASAHINUTA AANI DHARMANIRPEKSHATA YANI AAPLA KITI GHAT KELA AAHE HE SAVARKARCHE KOTHALEGHI PUSTAK NAHI VACHALE TARIHI JAR AAPAN ETRANI LIHLELA ETIHAS VACHALA TARI KALEL.

      Delete
    3. There were none partition criminals, if you know the definition of the very word "criminal" It was inevitable in the given circumstances. Savarakar was the first to propose two-nation theory. don't forget this. almost Hindu and Muslims were killed at each others hand during that sad period...just don't talk about killed Hindu's. Do not distort the facts in Hindutvavaadi way. Obnly because we are secular, we stabnd erect as a nation. Not pakistan or bangla desh for that matter.

      Delete
    4. Savarakar was the first to propose two-nation theory. sorry sanjayjee.savarkar talked about two-nation theory in 1937 and babasahe ambedkar in 1929.सर सय्यद अहमदखान यांनी १८८७ साली सर्वप्रथम द्विराष्ट्रवादाची कल्पना मांडली.त्यावेळी सावरकर ४ वर्षांचे होते आणि बाबासाहेबांचा जन्मही झाला नव्हता.
      १८जानेवारी १९२९ च्या बहिश्कृत भारत च्या अग्रलेखात बाबासाहेब म्हणतात:-भारतात हिंदू व मुस्लीम हे दोन समाज नसून दोन राष्ट्रे आहेत.
      ही वस्तुस्थिती सावरकरांनी तब्बल आठ वर्षांनी म्हणजे १९३७साली मान्य केली.
      हे सत्य माहित नसलेले लोक द्विराष्ट्रवादाच्या जनकत्वाचा आरोप सावरकरांवर लादतात.

      Delete
  41. हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू वर्चस्वाचे राजकारण... लेखक :- अभिजीत देशपांडे

    हिंदुत्ववाद म्हणजेच राष्ट्रवाद ही संघाची मध्यवर्ती आणि लाडकी विचारसरणी आहे. तिचा थोडक्यात आशय असा : ‘हिंदू हा केवळ एक उपासनापंथ नसून ती एक व्यापक-उद्दात-सहिष्णू-सर्वसमावेशक जीवनप्रणाली आहे. संस्कृती कशाशी खातात हे जगाला माहितही नव्हते, अशा काळात भारत मात्र सांस्कृतीकदृष्ट्या अत्यंत समृद्ध अवस्थेत होता. अनेक प्रकारच्या विचारसरणी इथे एकत्र नांदल्या. एकाकाळी येथे सोन्याचा धूर निघत होता, तत्वज्ञाने-कला-विज्ञाने विकसित अवस्थेत होती,पण आपण कालांतराने स्वत्व विसरलो. काही दोषही ही आपल्यात उत्पन्न झाले आणि अशाच काळात मुस्लीम आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले. आपले विचार-संस्कृती नष्ट करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. मन्दिरे फोडली, नगरे लुटली , ग्रंथ जाळले, लोकांचा छळ केला, राज्य प्राप्त केले. हिंदू कधीही कोणावर चालून गेला नाही.मुस्लीम ख्रिश्चन आदी धर्मांचा इतिहासच प्रत्यक्ष व छुप्या आक्रमणांचा आहे.हे आक्रमक धर्म आहेत.भारताला इस्लाममय करणे, ख्रिश्चन धर्मीय करणे हे त्यांचे ध्येय आहे.मदरसे मिशनरीजच्या माध्यमातून आजही त्यांच्या अशाच राज्यविघातक कारवाया चालू आहेत.मुस्लीम,ख्रिश्चन हे परकीय आक्रमक आहेत,तेव्हां त्यांच्या निष्ठा आजही परकीय आहेत.हिंदू ‘वनवासी’बांधवांना बळजबरीने –प्रलोभने दाखवून धर्मांतरित केले जात आहे.धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर,तेव्हां हा धोका वेळीच ओळखून हिंदुनी संघटीत होणे गरजेचे आहे.हिंदू सबळ झाल्याखेरीज हे प्रश्न सुटणार नाहीत.या देशात हिंदू बहुसंख्य असताना सरकारने मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंची सतत गळचेपीच केलेली आहे.धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लीमधार्जिणेपणाच आहे तेव्हां देशात हिंदू राजय अवतरल्याशिवाय हा देश जगात पुनश्च ते गौरवपद प्राप्त करू शकणार नाही.हिंदुत्ववाद हाच या देशाचा कणा आहे.

    हे सिधान्तन म्हणजेच हिंदुत्ववाद. यालाच ते ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही म्हणतात.रामजन्मभूमीसारखा प्रश्न केवळ धार्मिक न मानता त्याला राष्ट्रीय अस्मितेचे स्वरूप दिले जाते आणि राष्ट्रवादाच्या नावाने धार्मिक राजकारण केले जाते.हिंदुत्ववाद्यांचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ धर्म-राष्ट्र-शासन-संस्कृती आणि इतिहास यांच्याविषयीच्या अपुऱ्या एकांगी आकलनातून निपजला आहे. अथवा तो जाणीवपूर्वक बुद्धीभेदाचा प्रकार आहे.

    वरील सिद्धांतनात उघडच अनेक तार्किक गोंधळ आहेत. संस्कृती आणि धर्म या दोनीही शब्दांमागे ‘हिंदू’ हा शब्द ठेवून शाब्दिक लबाडी केली जाते.हिंदुत्वावरची श्रद्धा ही राष्ट्रनिष्ठेची पूर्वअट मानणारी आक्रमक वृत्ती आहे.

    इथे एक वेगळ्या संदर्भातले , पण समांतर उदाहरण आठवते. संघाच्या एका जेष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्या बौद्धीकात दिलेले हे उदाहरण आहे. एकदा एका संघ स्वयंसेवकाने गुरुजींना (संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना संघात ‘गुरुजी’ याच नावाने ओळखले जाते.संघाची वैचारिक (?) बैठक गुरुजीनीच घालून दिली संघाचे बहुतांश आजचे स्वरुपही त्यांच्याच विचारांचे फलित आहे. आक्रमकतेसह.) प्रश्न केला की हिंदू राष्ट्राविषयी कोणाकडे बोलायला गेले की काही लोक (हिंदुत्ववाद्यांची लाडकी शिवी वापरायची तर ‘तथाकथित बुद्धिवादी’ लोक) त्यातील ‘हिंदू’ या शब्दालाच आक्षेप घेतात. त्यांचे म्हणणे असते की भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे,तो फक्त हिंदूंचा नाही. हिंदू या शब्दाचे सोवळे असल्यागत ते पुढे काही ऐकूनच घेत नाहीत. यावर काय करायचे ?

    त्यावर गुरुजींनी दिलेले उत्तर मोठे मसालेवाईक आहे , ते म्हणाले ‘’अश्या लोकांसमोर चर्चेपुरता ‘भारत’ शब्दही वापरायला हरकत नाही,पण आपल्या मनात वर्तनात कार्यात मात्र ते ‘हिंदू राष्ट्र’च आहे व राहील हे कायम भान बाळगा.’’ धर्म-संस्कृती यातील गल्लत ती याप्रकारच्या धोरणीपणातुम आली असेल काय ? – मग त्याला गल्लत तरी कसे म्हणणार ? अशास्त्रीयता,अनैतिहासिकता,धोरणीपणा हे हिंदुत्ववादाचे आधार आहेत. इतिहास आणि वर्तमानाचे एकांगी चित्र उभे करून हिंदुत्ववाद्यांनी आपली विचारसरणी पसरविली आहे.

    इतिहास गौरव , अशास्त्रीय सिद्धांत , पूर्वग्रहदुषित दृष्टी आणि बहुसंख्याकवादाचे राजकारण हा पाया असलेला राष्ट्र-राज्यवाद ही हिंदुत्ववादाची महत्वाची लक्षणे आहेत. असा हा हिंदुत्ववाद ना धर्माची प्रतिष्ठापणा करणारा आहे ना, ना धर्माची सुधारणा करणारा..! संस्कृती म्हणजे त्यांच्या दृष्टीने फक्त इतिहास गौरव. संस्कृतीप्रणीत मानवी मूल्ये ही कोण एका धर्माची मक्तेदारी नसते,अथवा ती मग केवळ त्या संस्कृतीचीही राहत नाही.

    मानवकल्याणाचा विचार करणारी संस्कृती आक्रमक कशी काय असू शकेल ?

    तेव्हां हिंदुत्ववादी विचारसरणी ही धार्मिक असण्यापेक्षा राजकीयच अधिक आहे,हे स्पष्ट होते.सांस्कृतिक तर मुळीच नाही.थोडक्यात, हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू वर्चस्वाचे राजकारण...!!!

    ReplyDelete
  42. हिंदू धर्माची/शब्दाची संदिग्ध-भोंगळ व्याख्या लेखक अभिजीत देशपांडे


    ‘धर्मो धारयते प्रजाः’ ही संघवाल्यांची एक आवडती धर्मव्याख्या आहे. प्रजेच्या (समाजाच्या) धारणा म्हणजे धर्म, हा त्याचा आशय. धर्माची इतकी संदिग्ध,भोंगळ व्याख्या आजवर माझ्या पाहण्यात नाही.

    दुसरी व्याख्या ‘हिंदू’ या शब्दाची..

    असिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका !
    पितृभुः पुण्यभूश्चैव स वै ‘हिंदू’ रीति स्मृतः !!

    सावरकरांनी रूढ केलेली ही व्याख्यादेखील याच जातीची आहे.
    भारतभूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणारा प्रतेक जण म्हणजे हिंदू..!! या दोनही व्याख्या (किंवा संकल्पना) उघडपणेच अशास्त्रीय आहेत. निव्वळ भावनिक स्वरूपाच्या आहेत. भावनिकता हा निश्चितपणे धर्माचा एक आधार आहे, पण तो एकमेव नाही आणि याच व्याखेतून धर्म-राष्ट्र आणि राज्य या तीन संकल्पनांची सांगड हिंदुत्ववादयानि घातली आहे.

    एकीकडे भारताला पितृभूमी-पुण्यभूमी मानणारा प्रतेकजण म्हणजे हिंदू असे म्हणायचे आणि दुसरीकडे व्यवहारात मात्र निव्वळ उपासना पद्धती व रीतीरिवाजांवरून हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन असे उल्लेख करायचे, यात उघडपणेच एक ढोंगीपणा व दुटप्पीपणा आहे. शीख,जैन आणि बौद्ध हे हिंदू धर्मांतरगत असणारेच उपप्रवाह आहेत,असा अनैतिहासिक सिद्धांतही संघवाल्यांचा लाडका आहे. यातून संघवाले शिताफीने चार गोष्टी साधू पाहतात. एक म्हणजे, इतिहासातील संघर्ष दडवणे. दुसरे म्हणजे,’ तुम्ही आमचेच आहात’ असे म्हणून व्यापकतेचा आव आणणे.तिसरे: हे पंथ याच भूमीत जन्मलेले असल्याचे सांगून आपल्या राष्ट्रवादी संकल्पनेला बळकटी देणे आणि चौथे : या प्रकारात आपोआपच मुस्लीम आणि ख्रिश्चनाना दूर ठेवणे, त्यांना वगळणे. त्या सर्व गोष्टींतून हिंदुत्ववाद्यांनी (जाणीवपूर्वक) गोंधळ वाढवला आहे. तो त्यांच्या व्यापक धोरणाचाच भाग आहे. याप्रकारे हिंदुत्ववाद्यांची धर्माची संकल्पना कुठल्याही शास्त्रीय पायावर टिकू शकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय संजयजी,
      १.अस्पृश्याला हाटेल काधून देण्याची घटना दोघांच्याही आयुष्यात घडली आहे.१मे१९३३ला रत्नागिरीत हे उपाहारगृह सुरु झाले.
      २.आचार्य अत्रे यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटल्यापासून ती पदवी प्रचारात आली.साल बहुधा१९५२ असावे.पण १९३६साली महर्षी शिंदे यांनी धुरंधर वीर शब्द वापरला होता.वर धुरंधर ऐवजी स्वातंत्र्य टंकित झाले.क्षमस्व.
      ३.आपली चळवळ बाहेर नेणारे कार्यकर्ते सावरकरांना मिळाले नाहीत कारण ते एकतर स्वत:च्याच जातीविरुद्ध लढत होते आनि ज्यांच्यासाठी ते लढत होते त्यांना बाबासाहेबांचे नेतृत्व बाहेर मिळालेले होते.तरी सहभोजनाची चलवळ महाराष्ट्रभर पसरली होती.असे सावरकरांनीच डिसें१९३६च्या लेखात म्हतले आहे.त्याला कोल्हापूरचे बाळासाहेब पाटील,पुण्याचे राजभोज यांच्या लेखनाचा दुजोरा आहे.नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात सावरकरांचे भाऊ बाबासाहेबांसोबत लढले आणि महाडच्या सत्याग्रहात सावरकर अनुयायांनी कामगिरी बजावल्याची नोंद आंबेडकरांच्या जनता पत्रात आहे.पंजाब डिप्रेस्ड क्लास मिशनने सावरकरांना अध्यक्षपद दिले होते.
      ४.धर्मांतराच्या घोषनेनंतर आपण केलेली क्रांति पाहण्यासाठी सावरकरांनी बाबासाहेबांना लिहिलेले पत्र,महार बंधूंशी मोकळा विचारविनिमय इ.धर्मांतर रोखण्यासाठी लिहिलेले लेख समग्र सावरकर वांग्मयाच्या ३र्या खंडात आहेत.१९४२नंतर सावरकर आजारी पडले अणि त्यामुले सार्वजनिक कामातून बाहेर पडले.बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या वेळेस ते ७३वर्षांचे होते आणि नेहमीच आजारी राहत असत.
      ५.महर्षी शिंदेंच्या उपस्थितीतच सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळला.[५.३.१९३६]
      ६.भंग्यांना सावरकरांनी गायत्रीमंत्र शिकवले.पतितपावन मंदिरात ्शूद्रांच्या हाताने होम-हवन हे वेदोक्त विधी झाले.त्याचे पौरोहित्य मसूरकर महाराजांच्या आह्रमातील गणेश मोडक याने केले.
      ७.संत नामदेव हे सावरकरांपेक्षा मोठेच होते.पण ते चोखामेळ्याला विठ्ठलमंदिराच्या गाभार्यात नेऊ शकले नाहीत.२८नोव्हेंबरला सावरकरांनी अस्पृश्याम्ना विट्ठलमंदिराच्या गाभार्यात नेले.ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना होय.तसेच वारकरी संप्रदायातही १९३०पूर्वी ब्राह्मणाने भंग्याच्या पायावर डोके ठेवल्याची नोंद नाही.म्हणूनच टाइम्स आफ्ह इंडीया ने त्याला क्रांती म्हटले आहे.वारकरी संप्रदाय असे करीत असता तर बाबासाहेबांनी तोच स्वीकारला नसता काय?
      ८.अशा प्रकारे दलित-सवर्ण मुलांना एकाच वर्गात एकत्र बसवण्याचे आंदोलन १००% यशस्वी करून दाखवणारे सावरकर हेच पहिले होते.याची दखल सी के बोले या शिक्षणमंत्र्याने मुंबई विधीमंडलातही त्याकाळी घेतली होती.अस्प्रूश्यांना मंदिराच्या गाभार्यात नेणारेही सावरकर महारास्श्ट्रात पहिलेच.सहभोजनाला चळवळीचे स्वरूप सावरकरांनीच दिले हे दलित नेत्यांनीच लिहून ठेवले आहे.हे कार्य प्रत्यक्ष पाहिलेल्या म. शिंदेंच्या उद्गारात सावरकरांच्या कार्याला तीन वेळा क्रांती म्हटले आहे,टाइम्सलाही ती क्रांती वाटते.सत्यशोधक बाळासाहेब पाटील यांनी सावरकरांना सामाजिक बंडखोर म्हटले आहे,भाई माधवराव बागल हेही त्यांचे कार्य पाहून आश्चर्यचकित झाले होते.ब्राह्मण-भंगी स्त्रियांचे सहभोजन घडवून आणणारे सावरकर हे पहिलेच.प्रत्यक्श कार्य पाहून महर्षी शिंदे ज्या समाजकार्यास क्रांती म्हणाले ते आपणांस क्रांती वाटत नाही याविषयी मी काय बोलू?मला वाटते मी अभिनिवेशाशिवाय उत्तरे दिली आहेत.

      Delete
    2. prashanth,अभिजित देशपांडे हिंदूच्या ज्या व्याख्येला भॊम्गळ म्हणत आहेत त्याच व्याख्येला बाबासाहेबांनी फ़्रम्ड विथ केयर ऐण्ड कौशन म्हटले आहे आनी या व्याख्येत बसणार्या जैन बौद्ध आणि शीखांचा समावेश हिंदू या शब्दात राज्यघटनेच्या २५व्या कलमात केला आहे.तुम्ही एकीकडे म्हणता की तेच ते संदर्भ देणारे मला धूर्त वाटतात.तुम्ही अभिजित देशपांडेंचा संदर्भ कितव्यांदा देत आहात?मी तितक्याच वेळा बाबासाहेबांचा आणि राज्यघटनेचा संदर्भ दे ईन.

      Delete
    3. धर्मो धारयते प्रजाः’ ही संघवाल्यांची एक आवडती धर्मव्याख्या आहे. प्रजेच्या (समाजाच्या) धारणा म्हणजे धर्म, हा त्याचा आशय. धर्माची इतकी संदिग्ध,भोंगळ व्याख्या आजवर माझ्या पाहण्यात नाही.
      दुसरी व्याख्या ‘हिंदू’ या शब्दाची..

      असिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका !
      पितृभुः पुण्यभूश्चैव स वै ‘हिंदू’ रीति स्मृतः !!

      सावरकरांनी रूढ केलेली ही व्याख्यादेखील याच जातीची आहे.
      भारतभूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणारा प्रतेक जण म्हणजे हिंदू..!! या दोनही व्याख्या (किंवा संकल्पना) उघडपणेच अशास्त्रीय आहेत. निव्वळ भावनिक स्वरूपाच्या आहेत. भावनिकता हा निश्चितपणे धर्माचा एक आधार आहे, पण तो एकमेव नाही आणि याच व्याखेतून धर्म-राष्ट्र आणि राज्य या तीन संकल्पनांची सांगड हिंदुत्ववादयानि घातली आहे.
      for a moment we accept your views about the definition of religion then u must give proper and crystal clear definition of hindu ( as we now called ourselves) .
      each organisation mould the history and religion suitably to their motives. if u read indian marxist and socialist , u can find their views totally diff from RSS. when china in 1962 attack our country many left wing comrades welcome it. still we didn't hang them for the crime of treachery against nation. congress last 100 yrs preaching pseudo secularism. so we can't blame all oe only one. all are vague in one sense and right in another sense.

      Delete
    4. I agree with you Prashant jee, that the definition of Hindu is baseless and have been created to cheat on the people. Savarkar's definition of Hindutva is of that kind.

      Not to answer Cherekar Saheb's questions, I already have mentioned that the social noble deeds he did during his residence at ratnagiri and at nashik for some time, were a kind of "noble" foundation for future Hindutvavadi's. We do not know the bare realities actually what happened as there are many easily detectable lies. In my opinion Acharya Atre never called savarakar as Svatantryaveer. It mostly seems self declared certification.

      Any way, we shall discuss further on this issue. Thanks.

      Delete
    5. महार समाजात चोखोबांसारखे संत होऊन गेले . त्यामुळे त्यांच्या पायावर मस्तक ठेवल्याचे उदाहरण ज्ञात आहे . निदान वारीमध्ये तरी सर्व जन एकमेकांच्या पाया पडत होते . त्यात भंगी असतीलच . (नसण्याला काही ठोस युक्तिवाद दिसत नाही )
      या काळात आणि सावरकरांच्या काळात खूप फरक आहे . सावरकरांच्या काळात मंदिर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला होता . त्यामुळे जे वारकर्यांना जमले नाही ते सावरकरांना जमले म्हणणे अयोग्य होईल . उद्या या धर्तीवर ' जे सावित्री बाईंना जमले नाही ते महाविद्यालय काढण्याचे काम आजच्या संस्था चालकांना जमले ' असेही म्हणेल .
      सावरकरांनी पतित पावन असे वेगळे मंदिर काढण्या ऐवजी साने गुरुजींसारखा मोठ्या मंदिराच्या प्रवेश साठी लढा दिला असता तर बरे झाले असते . असा लढा साने गुरुजींनी दिला तेव्हा त्यात सावरकरांनी भाग घेतला नव्हता . शिवाय वेगळ्या काढलेल्या मंदिराला पतित पावन हे नाव देण्या मागची भूमिका काय होती ?
      अभय

      Delete
  43. विशेषत:शाळा प्रवेशाचे आंदोलन आपण पुन्हा पुन्हा वाचा.[मोरंच्या पुस्तकात पान क्र.११९ ते १४१]आणी सावरकरांपूर्वी ते इतक्या यशस्वीरीत्या कुणी केले असल्याचे तुमच्या वाचनात असेल तर मला पुस्तकाचे नांव सांगा.मी वाट पाहत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अस्पृश्याला हाटेल काढून दिल्याचा संदर्भ मोरेंच्या पुस्तकात पान क्र.२०२वर आहे.पान क्र.२०३वर शाहूराजांच्या प्रयोगाशी तुलनाही केलेली आहे.महर्षी शिंदेंचे उद्गार पान क्र.२१५वर दिले आहेत.इथेच अस्पृश्यतेचा पुतळा जाळल्याचीही घटना दिली आहे.सावरकरांच्या अनुयायांनी चळवळ रत्नागिरीबाहेर का चालवली नाही याचे विश्लेषण मोरे यांनी मनोगत मध्ये पान क्र.चार-पाचवर केले आहे.रत्नागिरीच्या बाहेर महाड येथील अनुयायांच्या कार्याचा उल्लेख पान क्र.११३वर,नाशिकच्या घटनांचा उल्लेख पान क्र.११४वर आहे.महाराष्ट्रभर सहभोजनांचा धूमधडाका हा उल्लेख पान क्र.२०५वर आहे.भंग्यांच्या गायत्रीपठणाचा उल्लेख पान क्र.१६६,शूद्रांच्या हस्ते वेदोक्त विधी पार पडल्याचा उल्लेख पान क्र.१७४-१७५वर आहे.भंग्याच्या पायावर ब्राह्मणाचे डोके,त्याला टाईम्स ने क्रांती म्हणणे आनी दलित नेत्यांनी केलेली या घटनेची स्तुती पान क्र.१७६वर आहे.अस्पृश्यांना मंदिराच्या गाभार्यात नेण्याची घटना पान क्र.१६२वर आहे.सावरकरांनी महारांप्रमाणे ढोरे ओढण्याचे आणि सोलण्याचे काम केल्याचा उल्लेख पान क्र.२२३ वर आहे.सहभोजनाची चळवळ सावरकरांनीच सुरु केली हा राजभोज यांचा अभिप्राय पान क्र.२११वर आहे.मोरे यांनी स्वत:च्या मनाचे काहीच लिहिलेले नाही.त्यांनी सर्व ठिकाणी मूळ संदर्भ पान क्रमांकासहित दिलेले आहेत.आपण मूळ संदर्भ तपासून शंका दूर करून घेऊ शकता.

      Delete
  44. सावरकरांनी आंबेडकरांना धाडलेल्या आमंत्रणाचा उल्लेख पान क्र.२०६वर आहे.पान क्र.२२७-२४५ या पानांवर मुस्लिमांच्या समाजप्रबोधनासाठी लिहिलेल्या लेखांची माहिती आहे.मुसलमानांसाठी समाजप्रबोधक लेख लिहिणारे दुसरे कोणते हिंदू समाजसुधारक आपणांस ठाऊक आहेत काय?

    ReplyDelete
  45. सु.ह.जोशी यांचे सावरकरांचे सामाजिक कार्य नावाचे एक पुस्तक आहे.त्यातील काही गोष्टी:-१.१९२६ साली रत्नागिरीत प्लेगची साथ आल्याने काही दिवससांठी सावरकरांना नाशिक जिल्ह्यात हलवले.तिथेही सावरकरांचे कार्य चालूच राहिले.येवल्याला "स्पृश्योद्धार" या विषयावर सावरकरांनी व्याख्यान दिले.अस्पृश्यता निर्मूलन हा अस्पृश्यांचा नसून स्पृश्यांचा उद्धार आहे,असे सावरकरांचे मत होते.या द्वारे स्पृश्य लोक आपले युगायुगांचे पातक फॆडत आहेत असे ते म्हणाले.
    २.११डिसेंबर १९३१ला पतितपावन मंदिरात धर्माजी महार[रामानंद संप्रदायी] यांचे कीर्तन झाले.ते म्हणाले,मी आजवर नाना देश हिंडलो,वार्या केल्या,पण देवाला आपल्या हातानं हार घालण्याचा योग आज इथेच काय तो लाभला."सोनवणी सर,पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्र.पण तिथेही अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी १९४९साली साने गुरुजींना उपोषण करावे लागले,त्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विचार करावा.
    ३.१९३८साली चाळीसगावात महार वस्तीत सावरकर गेले आणि भंग्याने आणलेले पाणी प्याले.हे पाणी पिण्याचे महारवस्तीत कुण्याही महाराने धाडस केले नाही.त्यामुळेच पाप सर्वांचे,उत्तरदायित्व सर्वांचे असे सावरकर म्हणतात.
    ४.रत्नागिरी येथे झालेल्या शंकराचार्याच्या सभेत भंग्याने शंकराचार्यांना हार घातला.

    ReplyDelete
    Replies
    1. वारकरी संप्रदाय असे करीत असता तर बाबासाहेबांनी तोच स्वीकारला नसता काय ?

      सोनवणी सर,पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्र.पण तिथेही अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी १९४९साली साने गुरुजींना उपोषण करावे लागले,त्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विचार करावा.
      ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
      मग बाबासाहेबांनी आंबेडकरांचे कार्य पाहून धर्मांतराचा निर्णय का रद्द केला नाही असेही विचारता येईल .
      पंढरपूर वारकरी संप्रदायाचे केंद्र असले तरी तिथे मंदिरात वारकर्यांना काहीही हक्क नव्हता . ते व्यवस्थापन वेगळ्या लोकांकडे होते व अजूनही काही प्रमाणात आहे .
      पंढरपूर सारख्या मुख्य , पुरातन मंदिरात हार घालता येणे आणि एखाद्या नवीन , खास याच कामासाठी उभारल्या गेलेल्या मंदिरात हार घालता येणे यात काही फरक आहे कि नाही ? सावरकरांनी मोठ्या खुबीने संघर्ष टाळल्याचे दिसते

      Delete
  46. तेच ते संदर्भ देणारे मला धूर्त वाटतात.तुम्ही अभिजित देशपांडेंचा संदर्भ कितव्यांदा देत आहात?

    मधूसुदनजी ध चा मा करीत आहात तुम्ही मी म्हणालो होतो कि ''बोगस संदर्भासहित स्पष्टीकरण देणारे मला धूर्त वाटतात व ते दादोजी या फालतू विषयास अनुसरून होत.

    अभिजीत देशपांडेचा संदर्भ मी इथे यासाठी देत आहे कारण त्यांच्या नावापुढे ''देशपांडे'' आहे ते संघातून बाहेर पडलेले आहेत. तसेच संजयजी फेसबुकवर नाहीयेत त्याच्याही वाचण्यात याव व इतरांच्याही

    ReplyDelete
    Replies
    1. प्रशांतजी, मी देशपांडेंचा लेख कही आठवड्यांपुर्वी कोनत्यातरी नियतकालिकात वाचला होता. हादरवुन सोडनारे ते अनुभव होते. हिंदुत्ववाद्यांच्य प्रत्येक कार्यक्रमावर/उपक्रमावर शंका घ्यावी एवढ्या लबाड्या ते करत असतात.

      Delete
    2. नक्की करतात ... तेच तर काम आहे त्यांच

      Delete
    3. हिंदुत्ववादी वनवासींना / आदिवासी लोकांना रामाच्या भाकड कथा सांगून भुलवत असतात त्यांचा व वैदिक धर्माचा काहीही संबंध ही नसताना त्यांना खोटी माहिती देऊन त्यांचा बुद्धिभेद करत असतात हे मला देशपांडेंकडूनच काळाल. जिथे जिथे हिंदुत्व रुजविण्यास ज्यादा स्कोप आहे तिथे तिथेच हे समाजकार्य करत असतात.हे मला प्रोफेसर देशपांडे यांच्या कडूनच समजलं.

      Delete
  47. हिंदु कोड बिल म्हनजे नेमके काय आहे हे माहित नसतांनाच बाबासाहेबांना (व पर्यायाने नेहरुंनाही) सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या मान्य होती हे म्हणने अजब तर्कट आहे. हिंदु कोड बिल हे धर्माबाबत नसुन फक्त विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तकविधान व अल्पवयीनांच्या पालकत्वासंबंधातील कायद्यांचा समुह आहे. या कायद्यात ज्यु, ख्रिस्चन, मुस्लिमांचा समावेश नाही, याचा अर्थ अन्य सारे हिंदु असा लावलेला नाही. तसे अभिप्रेतही नाही. जैन, बौद्ध, शिख हे धर्म जरी स्वतंत्र असले तरी प्राचीन कालापासुन एकाच मानवी समुदायांत त्यांचा उत्कर्ष झाला असल्याने या धर्मांत विवाह, वारसादि नियमांच्या बाबींत ब-यापैकी समानता आहे, त्यामुळे याबाबतचे कायदे एकत्र असने सोयीचेच होते. उलट एकपत्नीत्व, घटस्फोटादी बाबतीत नवीन कायदे केल्याने तत्कलिन हिंदुत्ववादीही या बिलाच्या विरोधातच होते. पुढे शिखांनीही विरोध केला होता. या बिलात जातींनुसार जेथे जेथे विसंगती/फरक आहेत तेथेतेथे त्या जातीच्या परंपरांनुसार सोय ठेवलेली आहे. या बिलाचा व सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा काडीएवढाही संबंध नाही. तरीही आरेसेसवाले नेमकी हीच ओरड करत असतात. यालाच मी खोटारडेपणा असे म्हणतो. यामुळेच सावरकरांसदर्भात अनेक बाबींवर शब्दश: विश्वास ठेवता येत नाही हे कृपया लक्षात घ्यावे. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी अत्रेंनी दिलेली नाही. क-हेच्या पाण्यात त्याचा उल्लेख नाही. कोनत्यातरी साप्ताहिकाने एका बातमीत तसा उल्लेख केला आणि ती पदवी हळुहळु लोकप्रिय करण्यात आली. दैनिकाचे नांव मला आठवत नाही. आठवले तर नक्की सांगेन. त्यामुळेच शाहुंनी केलेली महाराच्या होटेलात चहा पिण्याचा प्रसंग तसाच्या तसा सावरकरांच्याही जीवनात घडला ही रचलेली कथा आहे हे उघड आहे. त्यामुळेच मी माझ्या समीक्षेत तिला महत्व दिलेले नाही. अर्थात काही बाबी नक्कीच अभिनंदनीय आहेत आणि त्याबाबत सावरकरांचे कौतुक केलेच पाहिजे. त्यासाठी त्यांना असामान्य सामाजिक क्रांतीकारक असे म्हनता येणे दुरापास्त आहे एवढेच मी येथे नमुद करतो. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदू कोड बिलाविषयी मी भरपूर अभ्यास केलेला आहे साहेब.या कोड बिलातील हिंदुचा जसा धर्माशी संबंध नाही तसाच सावरकरांच्या हिंदुत्वाचाही धर्माशी संबंध नाही.सावरकरांनी हिंदु माणसाची व्याख्या केलेली आहे,हिंदु धर्माची नव्हे.त्यांच्या व्याख्येत जे समुदाय बसतात तेच हिंदु कोड बिलाच्याही हिंदु च्या व्याख्येत बसतात.आपल्या हिंदुत्व या ग्रंथात हिंदुत्व म्हणजे हिंदुधर्म नव्हे हे सावरकरांनी स्पष्ट सांगितले आहे.बाबासाहेबांनी आपल्या पाकिस्तान या ग्रंथात सावरकरांच्या हिंदुच्या व्याख्येस "framed with care and caution" म्हटले आहे.बाबासाहेबांचे वाक्य पुढीलप्रमाणे आहे-This definition of the term Hindu has been framed with great care and caution. It is designed to serve two purposes which Mr. Savarkar has in view. First, to exclude from it Muslims, Christians, Parsis and Jews by prescribing the recognition of India as a Holy Land as a qualification for being a Hindu. Secondly, to include Buddhists, Jains, Sikhs, etc., by not insisting upon belief in the sanctity of the Vedas as an element in the qualifications.नंतर हिंदु कोड बिल बनवताना नेमक्या याच समुदायांना हिंदु या संद्न्येखाली आणण्यात आले.इथे हिंदु धर्माचा संबंध नाही हे मला माहित आहे.सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथात "हिंदुत्व म्हणजे हिंदु धर्म नव्हे" नावाचा एक परिच्छेद आहे तो अवश्य वाचावा.बाबासाहेबांनी १५ आक्टोबर १९४९ साली व पुन्हा ६ फेब्रुवारी १९५१ रोजी हिंदु या संद्न्येत जैन बौद्ध शीख यांचा समावेश होत असल्याचे म्हटले आहे व घटनेच्या २५ व्या कलमात या सर्व लोकांच्या प्रार्थना स्थळात या संद्न्येत येणार्या सर्व लोकांना मज्जाव असता कामा नये असे म्हटले आहे."एकच मानवी समुदाय" असा शब्दप्रयोग आपण सोनवणीजी केला आहे.तोच अर्थ सावरकरांनाही अभिप्रेत होता.आणि बाबासाहेबांनाही.रा.स्व.संघाच्या हिंदुत्वाशी कृपा करून सावरकरांच्या हिंदुत्वाची गल्लत करू नका.

      Delete
  48. Perfect SanjayJee

    “Ambedkar is my Father in Economics. He is true celebrated champion of the underprivileged.He deserves more than what he has achieved today. However he was highly controversial figure in his home country,though it was not the reality. His contribution in the field of economics is marvelous and will be remembered forever..!”

    _______________________________

    ''When Hindutva Activists Tell us we are primarily Hindu, it is an invitation to forget our multicultural pursuit of dialoguing, politics and multicultural concern about tolerance and put ourselves in little box in terms of our religion... And I think the cultivation of a singular identity makes a major contribution to the disaffection, violence and terrorism that exist in the world today...!''

    -Dr Amartya Sen

    ReplyDelete
  49. सावरकरांनी काढलेल्या उपाहारगहाचा उल्लेख १९३४ साली सातार्याहून निघ्णार्या हंस या पुराणमतवादी पत्रामध्ये आलेला आहे.तेव्हा केवळ तशीच घटना शाहू राजांच्या जीवनात घडली म्हणून ती कृपया खोटी ठरवू नका.

    ReplyDelete
  50. आचार्य अत्रे यांनीच मला स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली हे सावरकरांनी स्वत:च श्री.पु.गोखले यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.ही मुलाखत सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकात मैजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केलेली आहे.केवळ कर्हेचे पाणीत उल्लेख नाही म्हणून ही गोश्ट खोटी कशी काय ठरते?आदेश विरुद्ध अत्रे या खटल्याचा उल्लेखही कर्हेचे पाणी त नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. याच अत्रेंनी सावरकरांवर एक व्यंग चित्रही काढले होते . सावरकरांनी इंग्रजांच्या बाजूने सैन्यात भारती व्हायचे आव्हान केले होते त्यानिमित्ताने . या विषयी बोलताना काही सावरकर प्रेमी व्यक्तींना अत्रे धरसोड वृत्तीचे वाटतात . गांधीजींना महात्मा हि पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती .
      सावरकरांचे कार्य मग ते देश भक्ती आणि त्यासाठी चा सशस्त्र लढा असो किंवा सामाजिक कार्य , दोन्ही ठराविक प्रदेशा बाहेर पोचले नाही . यासाठी ते परिस्थितीला दोष देतात . याच काळातल्या सुभाष चंद्र बोस आणि आंबेडकरांचे कार्य मात्र विस्तृत पातळीवर चालू होते . हेच खरे राष्ट्रीय नेते .

      अभय

      Delete
  51. अर्थात काही बाबी नक्कीच अभिनंदनीय आहेत आणि त्याबाबत सावरकरांचे कौतुक केलेच पाहिजे. या तुमच्या वाक्याबद्दल धन्यवाद.या अभिनंदनीय बाबींबद्दल सावरकरांचे आपण यापुढेही कौतुक करीत रहाल अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. काही बाबी नक्कीच अभिनंदनीय आहेत हे मी पण ठामपणे म्हणेन

      Delete
  52. रा.स्व.संघाचे हिंदुत्व आणि सावरकरांचे हिंदुत्व यात भरपूर अंतर आहे.

    ReplyDelete
  53. मी सावरकरांच्या सर्वच मतांशी सहमत नाही.विशेषत: सहा सोनेरी पाने मधील फार कमी मतांशी मी सहमत आहे.पण सावरकरांच्या समाजकार्यावर खूप अन्याय झाला आहे असे मला वाटते.तो दूर व्हावा असे वाटूनच मी ती पुस्तके तुम्हाला पाठवली होती.काही बाबी तरी तुम्हाला अभिनंदनीय वाटल्या यात समाधान आहे.जेव्हा केव्हा तुम्हाला रत्नागिरीस जाण्याचा योग ये ईल तेव्हा तुमचा तुम्हालाच अधिक उलगडा होईल.तसा योग लवकर येवो.

    ReplyDelete
  54. हिंदू कोड बिल आणि मनुस्मृती आणि बाबासाहेब:बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे.पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊन हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.
    दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-
    "ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.
    दोघांनीही मुलीचा चौथ्या हिस्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
    [मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
    स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
    अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
    बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे.नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला.आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही."[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]
    ११जानेवारी १९५० ला मुम्बईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा,घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा,स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्म्रुतीचा आधार घेतला आहे.दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]
    समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.
    [जनता,१०-२-१९५१]
    दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-"माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली.पण तसे म्हणणार्यांना माझे आव्व्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
    एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]
    बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
    अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-
    [मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
    स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
    अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.


    श्लोक १२९-यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा/तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत//
    अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?

    श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.श्लोक १३२-मुलच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.


    श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.


    श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.


    स्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.


    श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.


    श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.


    श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-१.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले.नवर्याने भेट म्हणून दिलेले.४.वडिलांनी दिलेली.५.आईने दिलेले.६.भावाने दिलेले.
    श्लोक१९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. हे मला माहिती आहे आणि मी सहमत आहे .

      Delete
  55. या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे.ते म्हणतात:-"बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठी आपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले."[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती,बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष,सोहनलाल शास्त्री,सम्यक प्रकाशन].

    ReplyDelete
  56. सोनवणी सर,माझा जितका सावरकरांचा अभ्यास आहे,तितकाच बाबासाहेबांचाही आहे,ते कुठपर्यंत जुळतात आणी कुठे विभक्त होतात हे मला नेमके ठाऊक आहे.

    ReplyDelete
  57. डा.मेजर मधुसूदन चेरेकर, आपला अभ्यास उत्तम आहे. त्याप्रमाणे घटना उल्लेख आणि विश्लेषणही उत्तम.

    ReplyDelete
  58. चेरेकर साहेब, मनुस्मृतीबाबतच्या विधानांशी मी सहमत आहे. त्यातील काही श्लोक वगळले तर ते एक उत्तम कायद्यांचे पुस्तक आहे व तत्कालीन समाजस्थितीचे व विचारपद्धतीचेही दिग्दर्शन करते. प्रत्यक्षात या स्म्रुतीवर किमान बाराव्या शतकापर्यंत कोणतीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. म्हणजे वर्णाश्रम धर्माविषयकचे सारे सिद्धांत कोणी पाळलेले दिसत नाहीत. ब्राह्मण, वैश्य ते शुद्र राजे झाल्याचे आपण पाहिलेले आहे, जे मनुस्मृतीनुसार शक्य नव्हते.

    आपण सावरकरांप्रती अत्यंत हळवे आहात याची मला जाणीव आहे. त्यामुळे कोठेही आपले मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व. सावरकरांकडे पाहतांना मद्धे एक भली थोरली भिंत आहे. कोणी सावरकर प्रेमी ती तोडु शकेल याची शक्यता नाही. त्यामुळे जेथवर त्यंचे मोठेपण मान्य करता येणे शक्य आहे तेथवर मी मान्य केलेच आहे. अर्थत चांगली चर्चा केल्याबद्दल व अनेक नवीन मौलिक माहित्या पुरवल्याबद्दल मी आपला नितांत आभारी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Savarakar was the first to propose two-nation theory. sorry sanjayjee.savarkar talked about two-nation theory in 1937 and babasahe ambedkar in 1929.सर सय्यद अहमदखान यांनी १८८७ साली सर्वप्रथम द्विराष्ट्रवादाची कल्पना मांडली.त्यावेळी सावरकर ४ वर्षांचे होते आणि बाबासाहेबांचा जन्मही झाला नव्हता.
      १८जानेवारी १९२९ च्या बहिश्कृत भारत च्या अग्रलेखात बाबासाहेब म्हणतात:-भारतात हिंदू व मुस्लीम हे दोन समाज नसून दोन राष्ट्रे आहेत.
      ही वस्तुस्थिती सावरकरांनी तब्बल आठ वर्षांनी म्हणजे १९३७साली मान्य केली.
      हे सत्य माहित नसलेले लोक द्विराष्ट्रवादाच्या जनकत्वाचा आरोप सावरकरांवर लादतात.

      Delete
  59. http://www.facebook.com/photo.php?fbid=2569772583531&set=t.100002244592943&type=3&theater

    ReplyDelete
  60. चेरेकर साहेब, समजा द्विराष्ट्र सिद्धांत कोणीही मांडला असला तरी तेच शेवटी होणार होते. फाळणी अटळ अशीच होती. गांधी शेवटपर्यंत फाळणीच्या विरोधातच होते, हे आपणास माहित असेलच. आंबेडकर हे अधिक दूरद्रुष्टीचे होते असेच म्हणावे लागेल. सावरकरांची हिंदु राष्ट्र वा हिंदुत्वाची व्याख्या नेहमीच पोकळ अशीच होती. आंबेडकर हे एक राजकारणीही होते व त्यांच्या भुमिका अनेकदा बदललेल्या दिसतात हेही उघड आहे. फाळणीची बीजे १८५७ च्या बंडातच लपलेली आहेत हे लक्षात घ्यायला हवे त्यामुळे सर सय्यद अहमदखान यांचे विधान त्या बीजांचे प्रकटीकरण आहे एवढेच! त्यात सावरकरांच्या मान्य-अमान्यतेचा प्रश्नच कोठे येतो? सावरकर हे मुळात कधीही राष्ट्रीय नेते नव्हते, हे सत्य मान्य करणे सावरकरवाद्यांना जड जाते. त्यांचा प्रभाव कोणत्याही राष्ट्रीय राजकीय, सामाजिक धोरणावर पडु शकत नव्हता. पडलाही नाही. नथुरामबाबत आंबेडकरांनी जर कसलेही प्रकट विधान केले नसेल तर ते उलट स्वाभाविक आहे असे मला वाटते. बाबासाहेबांनी त्याच्यावर विधान करावे एवढी योग्यता त्याची होती काय हा प्रश्न आहेच. राहिले सावरकर...त्यांची सर्व पार्श्वभुमी ज्यांना माहित होती त्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांनीही त्यांच्याबाबत विशेष प्रतिक्रिया नोंदवल्याचे दिसत नाही. सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या फार अचुक आहे असे बाबासाहेब जर म्हणाले असतील तर ती त्यांची गफलत आहे असेच म्हनावे लागेल. असिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका !
    पितृभुः पुण्यभूश्चैव स वै ‘हिंदू’ रीति स्मृतः " ही व्याख्या प्रादेशिक मानली तरी ती भावनीक आहे. ते वास्तव नाही. भारतात "मातृभु" हा शब्द राष्ट्रासाठी प्रचलित आहे, पितृभु हा शब्द पाश्चात्य राष्ट्रात सर्रास वापरला जातो. "आसिंधु-सिंधु" भारत मुळात एक राष्ट्र म्हणुन कधीच अस्तित्वात नव्हते हेही लक्षात घ्यावे लागते. ब्रिटिश ईंडियालाच वावदुकपणे "अखंड हिंदुस्तान" म्हनणारे व त्यावर मालकीहक्क सांगणारे आजही लोकांना हिंदुत्वाच्या नांवाखाली बनवत असतात. सावरकरही त्याला अपवाद नव्हते. या प्रदेशात राहनारे व या भुमीला पितृभु मानणारे सारे हिंदु असे मानणे मुलात अनैतिहासिक, असांस्कृतिक आहे, हे पुरातन कालापासुनचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. "हिंदु" आणि "हिंदुत्व" हे मुळात फसवे शब्द आहेत. या देशातील किमान ९०% लोक हिंदु नाहीत...धर्मानेही नाहीत कि प्रादेशिक अर्थानेही नाहीत. हिंदु नांवाची म्हणता येईल अशी प्रुथक संस्कृतीही अस्तित्वात नाही. असंख्य जाती-जमातींच्या स्वतंत्र सांस्क्रुतीक बेटांचा समुच्चय म्हणजे या उपखंडातील संस्कृती. तिला "हिंदु" या शब्दाच्या जाळ्यात बसवण्याचे प्रयोजन यशस्वी होण्यासारखे नाही. धर्म हे फक्त व तेही हजार ठिकाणी उसवलेले प्रावरण आहे...आत्मा वा अंतरंग नाही. (कथित धर्म मग हिंदु असो कि जैन वा बौद्ध) त्यामुळेच सावरकरांची व्याख्या समुळ चुकीची व दिशाभुल करणारी आहे. बाबासाहेबांनी ती मान्य केली असेल म्हणुन ती सर्वमान्य होईल वा व्हावी असे मानणेही चुकीचे आहे. बाबासाहेबांनी हिंदु कोड लिहिण्यासाठी मनुस्मृतीची वा अन्य स्मृतींची मदत घेणे अपरिहार्य होते म्हणुन तिची वा अन्य स्मृत्यांची श्रेष्ठता ठरत नाही. शिवाय त्यांना सनातन्यांच्या विरोधाला तोंड द्यायचे होते. अशा स्थितीत प्रासंगिक भलामनी अपरिहार्य असतात. त्यातुन नि:ष्कर्श काढणे घाईचे ठरते. असो.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  61. सावरकर हे देशभक्त किंवा सशस्त्र कांतिकारक असले तरी ते राष्ट्रीय नेते नव्हते.रत्नागिरीच्या काळापुरताच काय तो त्यांचा लोकसंपर्क आला हे मला मान्य आहे.तसेच हिंदु या शब्दाचा आग्रह धरल्यामुळेच त्यांना लोकप्रियतेस मुकावे लागले असे मला वाटते.त्यांचे बुद्धिनिष्ठेचे आणि विद्न्यानवादाचे विचार मांडताना हिंदू ऐवजी भारतीय शब्दाचा आग्रह धरला असता तर लोकांनी त्यांना उचलून धरले असते असे वाटते.पण मुस्लीम धर्मांधतेशी सामना करताना अधिकाधिक गैर-मुस्लिमांना एकत्र आणणारा शब्द म्हणून त्यांनी हिंदू शब्द जवळ केला आणि त्याला ते शेवटपर्यंत चिकटून राहिले.त्यांचे हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नव्हता हे लोकांच्या मनात ठसतच नाही ही एक शोकांतिका आहे.

    ReplyDelete
  62. भारतीय राज्यघटनेनेही धार्मिक स्थंळांच्या संदर्भात प्रवेशाविषयी बोलताना जैन,बौद्ध व शीख यांना हिंदू या संद्न्येत घेतले आहे.घटनेच्या २५व्या कलमात या समुदायांना एकमेकांच्या धार्मिक स्थळात जाण्यास मज्जाव असता कामा नये अशा आशयाचे विधान आहे.

    ReplyDelete
  63. लोकांना हिंदुत्वाच्या नांवाखाली बनवत असतात. सावरकरही त्याला अपवाद नव्हते. या प्रदेशात राहनारे व या भुमीला पितृभु मानणारे सारे हिंदु असे मानणे मुलात अनैतिहासिक, असांस्कृतिक आहे, हे पुरातन कालापासुनचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. "हिंदु" आणि "हिंदुत्व" हे मुळात फसवे शब्द आहेत.....हे सर्व करण्यामागे सावरकरांचा काही स्वार्थ होता असे आपल्याला वाटते काय?

    ReplyDelete
  64. नाही. सावरकरांचा यात काहीही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. हिंदुस्थानात राहतात, या भुमीला पित्रुभु मानतात ते सारे हिंदु ही व्याख्या करणे त्यांना भाग होते ते मुस्लिम विरोधी संघटन प्रबळ करण्यासाठी. अस्पृश्यता हा हिंदु एकत्वाच्या मार्गातील अडसर आहे याची जाण असल्याने त्यांनी तेही काम स्थानिक पातळीवर का होईना हाती घेतले. त्यामागे मानवतेचा कळवळा हे कारण नसुन हिंदु एकत्व साधणे हाच उद्देश होता. सारे, जात कोनतीही असो, कथित हिंदुच असल्याने, हिंदु संघटन हिंदुत्वाच्या नांवाखाली बांधणे सोपे जाईल असा त्यांचा होरा होता. हे हिंदु एकत्व त्यांना कोनत्या जातीच्या नेतृत्वाखालील हवे होते बरे? आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील कथित हिंदु एकता त्यांना चालली असती काय?

    ReplyDelete
    Replies
    1. ज्यांचे हेतू सरळ असतात त्यांना शब्दछल करावा लागत नाही. शिवाजी महाराजांना देखील 'हिंदवी स्वराज्यच' हवे होते. पण त्यांचे 'हिंदवी स्वराज्य' आणि सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' यातील फरक जनतेला नेमका कळतो. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या कार्याची कोणालाही जाहिरात करावी लागत नाही.

      Delete
  65. थोडक्यात बाबासाहेबांच्या वा तत्सम अस्पृष्य पण तोलामोलाच्या माणसाच्या मानसाचे नेतृत्व स्वत: व अन्य सनातन्यांना ते मानायला लावू शकत होते काय? तसा त्यांचा विचार तरी होता काय?

    ReplyDelete
  66. संजय सर सावरकर शेवटी एका महत्वाच्या मुद्द्यावर येतात ....माझे राष्ट्रीयत्व हि मानवराष्ट्रात विलीन पावेल जर मुसलमानत्व,ख्रिसचनत्व आपली त्वे सोडून द्यायला तयार होतील ज्यावेळेस इंग्लिशपण,जर्मनपण मनुष्यत्वात विलीन होईल....त्यावेळेस माझे हिंदुत्व हि मनुष्यत्वात विलीन होईल.

    ReplyDelete
  67. No offence, पण सावरकरंचे हे म्हनणे "सा-या जगाने दारु-सिगारेट सोडली तर मीही सोडुन देईल" अशा पद्धतीचे नाही काय? मुळात इतरांनी आपली "त्वे" सोडुन दिली तर इच्छा असो कि नसो हिंदुत्व हे सोडुन द्यावेच लागणार...इतरांनी आधी आपापली "त्वे" सोडुन द्यावीत, मग मी माझे सोडेल ही काही पुर्व-अट असु शकत नाही.

    ReplyDelete
  68. ****No offence, पण सावरकरंचे हे म्हनणे "सा-या जगाने दारु-सिगारेट सोडली तर मीही सोडुन देईल" अशा पद्धतीचे नाही काय? मुळात इतरांनी आपली "त्वे" सोडुन दिली तर इच्छा असो कि नसो हिंदुत्व हे सोडुन द्यावेच लागणार...इतरांनी आधी आपापली "त्वे" सोडुन द्यावीत, मग मी माझे सोडेल ही काही पुर्व-अट असु शकत नाही.****

    संजयजी,
    अजिबात नाही...
    "मी सोडून देईन".. आणि "हिंदुत्व देखील (आपोआप) विलीन होईल" ह्यांमध्ये फरक आहे.

    ReplyDelete
  69. अभिजीतजी, अर्थ तोच आहे. "आधी इतरांनी सोडुन द्यावीत"...पण इतरांनी आपापले "त्व" सोडले तर आपल्याकडे मुळात सोडण्यासारखे काही रहातच नाही. "आपोआप विलीन होईल" हे विधान शब्दच्छल आहे. मनुष्यत्व विरुद्ध हिंदुत्व अशी स्थिती असुच शकत नाही कारण एकही "त्व" शिल्लक राहिला तर मनुष्यत्व कोठुन येणार? पुन्हा त्यात "माझे हिंदुत्व".. ही मेख आहेच!

    ReplyDelete
  70. संजयजी,

    तुमच्याच म्हणण्यात माझा मुद्दा दडला आहे.

    Compare it with: "खाटकाला मी जर सांगितले कि तू गोहत्त्या सोडून दे, म्हणजे तुझ्याबद्दल माझा विरोध आपोआप मावळेल."

    And you'll know what I'm saying.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही अभिजीतजी, माझ्या म्हनण्यात तुमचा मुद्दा दडलेला नाहीहे. खाटीकाचे उदाहरण देवुन तुम्ही मुस्लिम, ज्यु, ख्रिस्ती, फ़्रांसिसी/जर्मनांना "खाटिक" या सदरात आणुन त्यांचा अवमान करत आहात. "तुम्ही हिंदुत्व सोडा तर आमचे मुस्लिमत्व/ख्रिस्तित्व मनुष्यत्वात विलीन होईल" असे अन्य म्हणाले तर मग तुमचे काय उत्तर असेल? हिंदुच तेवढे पुण्यवान आणि बाकी खाटिक ही तुलना योग्य आहे काय?

      Delete
  71. या देशात पुरातन काळापासून संस्कृती चालत आलेली आहे. (आपण ती एक मानत नाही.असो.) गेल्या काही शतकात झालेली आक्रमणे (कोणाची झाली हे सांगायची गरज नाही.ते शेंबड्या पोरालाही कळेल ज्यांनी कॉंग्रेसप्रणीत [राष्ट्रीय सभा नव्हे. हल्लीची काँग्रेस] अभ्यासक्रमातील इतिहास वाचला आहे.) ही परक्यांची होती हेही न समजण्याइतका मी मूर्ख नाही. आणि ती या पुरातन संस्कृती वर झाली.
    त्यामुळे ज्यावेळी देश , राष्ट्र ही संकल्पना भारतात अस्तित्वात आली जी राजेशाही मार्गाची नव्हती. त्यावेळी त्याकाळच्या मुल संस्कृतीचा विचार केलं गेला. आणि भारतातला जो राष्ट्रीय समाज आहे तो या संस्कृतीचा पाईक आहे त्याला "हिंदू" म्हटलं गेलं. [इतिहास संशोधन करणं हे केव्हाही चांगलं पण जे समोर ढळढळीत दिसतंय त्यावर पावलं उचलायला हवीत.] एक गोष्ट नमूद करावीशी वाटते हिंदुत्व हा ism कधीही नव्हता. हिंदुत्व म्हणजे HINDUNESS.
    स्वा. सावरकरांचा हिंदुत्वाचा हाच मुद्दा होता. यावर वर अनेकदा खल केलं गेलेला आहे. पण त्यात त्या-त्या वेळी आपण आंबेडकरांना सुद्धा चूक ठरवले आहे आपण. जर एखाद्या माणसाच्या विरोधात लिहायला गेलं तर फक्त विरोधातच लिहायचं. कितीही काहीही झालं तरी पूर्वग्रहदूषित वृत्ती आड येते. याला तुम्ही आम्ही कोणीही अपवाद नाही. कारण आपण (आदरार्थी सर्वनाम नाही.) सावरकरांसारखी महान माणसे नाही.
    ज्याप्रमाणे आपला म्हणण्याचा उद्देश स्वा.सावरकर वाट चुकलेले राष्ट्रभक्त आहेत असं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला गांधीजी म्हणाले ते पटतं का?- " महाराणा प्रताप व "शिवाजी राजे" हे वाट चुकलेले राष्ट्रभक्त आहेत."
    आपला संपूर्ण ब्लॉग नजरेखालून घातलाय. पण एकूणच पूर्वग्रहदूषित लेखन होत असल्याचे लक्षात आले आहे.
    आपला पूर्वग्रहदूषित सामान्य अकल्पनीय आणि अनोळखी माणूस
    -
    शुद्ध रक्त राजा.

    ReplyDelete
  72. Sawarkar was great man. I read his " Bharatiy itihasatil saha soneri pane" book. Now it is translated in English too. And it is said that if somebody is thinking to commit suicide for any reason then ask him to read his autobiography "mazi janmthep." That man will never commit suicide.

    This idiot sonawany, these fools sambhaji brigadiars will never know.The great Chandragupt Maury's guru was Chanakya. He was brahman. ok?

    All those living in Afaganistan, Pakistan, Bangladesh and India are Hindus were Hindus. They were forcibly converted.

    Worst religion is Islam. World will see. World is seeing. This idiot sonawany and sambhaji brigade wale will see very soon terror named Islam.

    visit "www.islamisbad.com"

    All terrorists are not muslims. All muslims are terrorists. If one who does not follow Mohammad is not muslim. What mohammad named insane, murderer,peadophile man did by himself is not followed then he is not muslim. He was worst terrorist. his followers are same. that is why all muslims are terrorists.
    sonawany is mad cocroach. sambhaji brigade people will watch there mother, sisters being fucked in open with their own eyes. It is written in there book by muhammad to do so with all his non followers.
    do not be fool.
    Jay Sawarkar.
    Jay Brahama.
    Jay Hindu

    ReplyDelete
  73. mad sanjay sonawany. i want you to read "www.islamisbad.com" and your comments later on.
    very soon u will start wearing cap with holes in it, no moustach, but beard and ur women folk wearing burka.

    ReplyDelete
  74. Jay Sawarkar.
    Jay Brahama.
    Jay Hindu.
    हे म्हणतांना लोक नेमके "जय शिवाजी" म्हणायला कसे विसरतात हे तो ब्रह्माच जाणे!

    ReplyDelete
  75. संजय सर
    प्रामाणिक समिक्षा आवडली
    सावरकरांबद्दल मलाही आदर आहे ते एक 'कवि' म्हणून
    बाकी उर्वरीत सावरकर निरुपयोगी आहेत,
    हे माझे मत आहे आणि त्यावर मी अत्यंत ठाम आहे

    आपण सावरकरांना चार ठोकळ्यांमध्ये पाहिलेय ते अत्यंत अचूक असे आहे
    त्यावेळी हिंदु- महार , अस्पृश्यांचे धर्मांतर होऊ नये
    आणि ते केवळ तथाकथीत उच्च हिंदुच्याच गुलामगिरीत रहावेत
    हा सावरकरांचा आग्रह होता, आणि त्यासाठीच त्यांची धडपड चालू होती
    सावरकरांचे हे वैज्ञानीक विचार ज्यांना फार मोलाचे वाटतात
    त्यांनी त्याची पारायणे करावित ,कवने गावीत
    मला त्यांचा हा अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार मान्यच आहे

    बाकी हिंदु म्हणजे यांव अन त्यांव
    आणि 'शुद्धता' पाळणार्‍या गलिच्छ लोकांची मला किव येते !!

    असो

    ReplyDelete
  76. sawarkarna samjnaya etpat akal ya soniwanila nahi

    ReplyDelete
  77. सावरकरांचा आत्मा अशांत का?

    प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का?
    प्लँचेट नावाचा शकून पाहण्याची एक पाश्चात्य पद्धती आहे. जादूटोण्यासारखा हा प्रकार असून तो मध्यरात्री केला जातो. प्लँचेटसाठी एका अशांत आत्म्याची गरज असते. या अशांत आत्म्याला आवाहन करून बोलावले जाते. त्याच्या मार्फत होय/नाही अशा दोन पर्यायांत प्रश्नांची उत्तरे मिळविली जातात. प्लँचेटसाठी संपूर्ण भारतात सावरकरांच्याच आत्म्याला आवाहन केले जाते. सावरकरांचा आत्मा येतो, असे प्लँचेट करणारे छातीठोकपणे सांगतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर सावरकरांचा आत्मा अशांत आहे, हे स्पष्ट होते. येथे प्रश्न असा पडतो की, सावरकरांचा आत्मा अशांत का?
    सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
    या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडेसे इतिहासात डोकवावे लागेल. भारताची फाळणीचे पाप सावरकरांच्या डोक्यावर आहे. तसेच फाळणीमुळे मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक आणि बेघर झालेले, निर्वासित झालेले काही कोटी लोक यांचे तळतळाट सावकरांना लागले आहेत. हे पाप सावरकरांच्या आत्म्याला छळत आहे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळू शकलेली नाही. हिंदूत्वाच्या नावाने आपण एक खोटा सिद्धांत बनविला. त्या आधारे बहुजनांची पिळवणूक करण्याचा परवाना ब्राह्मणांना मिळवून दिला, याची बोचही सावरकरांच्या मनात खोलवर कुठे तरी असावी. पापांची जाणीव माणसाला मृत्यूसमयी होते, असे म्हणतात. या सर्व पापांची जाणीव सावरकरांना मृत्यूसमयी झाली. त्यामुळे त्यांच्या आत्मा अंतराळात भटकत आहे, असे प्लँचेट करणारे लोक मानतात.

    द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली देशाची फाळणी

    आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल. पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.


    महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
    फाळणीला विरोधच होता
    महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
    सावरकरांच्या डोक्यावर
    कोट्यवधी लोकांचे तळतळाट
    फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावकर नावाच्या एका भेकड माणसाने केले आहे.
    प्लँचेटवाले जे सांगतात त्यावर माझा काही विश्वास नाही. पण सावरकरानी काही कोटी लोकांचे तळतळाट घेतले आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे.

    अनिता पाटील, औरंगाबाद

    ReplyDelete
  78. सावरकर भ्रम आणि वास्तव

    सावरकर समर्थकांनी एकवेळ वाचावे असे पुस्तक.

    Authors: शमसुल इस्लाम

    Publication: सुगावा प्रकाशन

    Language: मराठी

    Category: सामाजिक

    Pages: 104
    Weight: 125 Gm
    Binding: Paperback

    ReplyDelete
  79. हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट

    -महावीर सांगलीकर

    दुस-या महायुद्धाच्या सुरवातीस रत्नागिरी येथे हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट झाली होती. सावरकर प्रेमी लोकांनाही माहीत नसलेल्या या भेटीचे पुरावे प्रसिद्ध फ्रेंच-रशियन शोध पत्रकार लई झूटोस्की यांनी शोधून काढले आहेत. या विषयावरील त्यांचा एक लेख फ्रेंच भाषेतील एका प्रख्यात नियतकालीकात प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांना या भेटीची सुरस कथा माहीत व्हावी यासाठी त्या फ्रेंच लेखाचा मराठी अनुवाद येथे देत आहे.

    सावरकर माफी मागून अंदमान मधून सुटल्यावर त्यांना रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. तेथे असताना इंग्रजांना दिलेल्या वचनाला जागून ते स्वस्थ बसून राहिले. पण हा त्यांचा डाव होता. इंग्रजांना चकवून त्यांनी जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्याशी गुप्त पत्रव्यवहार केला. एका महत्वाच्या पत्रात सावरकरांनी आपल्याकडे अणुस्फोटाचे आणि मिसाइलचे तंत्रज्ञान असून ते घेण्यासाठी हिटलरला स्वत: रत्नागिरीला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या आमंत्रणाला मान देवून हिटलर U-108 या पाणबुडीतून रत्नागिरीच्या किना-यावर अवतरला. सावरकरांनी आपल्या पत्रामधून केलेल्या सुचनेनुसार हिटलरने चक्क आपली मिशी काढून टाकली होती, डोक्याचे मुंडण केले होते, शेंडी राखली होती आणि धोतर-पंचा नेसला होता. त्यामुळे तो चक्क एखादा कोकणस्थ ब्राम्हण वाटत होता.

    त्याच्याबरोबर हिमलर, गोबेल्स, रोमेल वगैरे मंडळीही होती. त्यांनीही आपला वेश याच प्रकारचा केला होता. त्यामुळे सावरकरांच्या घरावरती नजर ठेवून असणा-या पोलिसांना कसलाही संशय आला नाही. नेहमी कार्यकर्ते भेटायला येतात तसे हे कोणी तरी असावेत असे पोलिसांना वाटले.

    सावरकर आणि या जर्मन मंडळीची एका बंद खोलीत गुप्त मीटिंग झाली. त्यावेळी सावरकर यांनी जर्मनांना सांगितले की तुम्ही आणि आम्ही आर्यवंशीय आहोत, त्यामुळे आपण एकमेकाचे भाऊ-भाऊ आहोत.

    या मीटिंगमध्ये सावरकरांनी वेदातील अणुबॉम्बचे तंत्रज्ञान हिटलरला भेट म्हणून दिले. अणुस्फोटाचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यांनी फडताळातून एक प्राचीन ग्रंथ काढला आणि एका शब्दाच्या अनुस्वारात लपवून ठेवलेला अणु अलगद बाहेर काढला. त्या अणुचा वैदिक पद्धतीने प्रत्यक्ष स्फोटही करून दाखवला. CONT...........

    ReplyDelete
  80. हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी रत्नागिरीत पाऊल ठेवले तेंव्हा बारीक पाऊस पडत होता. सावरकरांच्या घरापर्यंत ही मंडळी भिजत-भिजतच आली होती. त्यामुळे सावरकरांशी चर्चा करत असताना हिटलरला दोन-तीन वेळा शिंका आल्या. त्यावेळी सावरकर म्हणाले,

    "तुम्हाला शिंकाचा त्रास सारखा होत असेल तर मी एका आयुर्वेदिक काढ्याचा फॉर्म्युला देतो. अगदी प्राचीन आहे"

    त्यावर हिटलर म्हणाला, "तयार काढा नाही का तुमच्याकडे? आता घेतला तर बरे वाटेल थोडेसे"

    "नाही, लगेच घायची गरज नाही", सावरकर म्हणाले, "कारण आयुर्वेदिक औषधांचा परिणाम लगेच होत नाही. तुम्ही आता काढा घेतलात तर सहा महिन्यांनी तुमच्या शिंका बंद होतील".

    या भेटीत सावरकरांनी प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये असलेले मिसाइलचे तंत्रज्ञान ही हिटलरला उलगडून सांगितले. मिसाइल कशा प्रकारे काम करते ते सावरकरांनी हवेत कागदी बाण सोडून दाखवले. त्यानंतर सावरकर सगळ्यांना घेवून अंगणात आले, आणि त्यांच्या समक्ष आकाशात एक बाण सोडला, व हिटलरकडे पहात म्हणाले, "हा बाण थोड्याच वेळात जर्मनीत तुमच्या बंगल्याच्या आवारात पडेल". ते ऐकून सगळ्यांनी आश्चर्याने आपापल्या तोंडात बोटे घातली. गम्मत म्हणजे गोबेल्सचे बोट चुकून त्याच्या नाकात गेले होते.

    या प्रात्यक्षिकाच्या वेळी सावरकरांनी सांगितले, "मी इंग्लंडला शिक्षण घेत असताना पहिल्यांदा याचे प्रत्याक्षित केले होते. मी एक कागदी बाण अचूक ठिकाणी सोडला होता. अर्थात तो बाण संदेश वहनासाठी होता".

    सावरकरांनी दिलेल्या तंत्रज्ञानाचा हिटलरला मोठा उपयोग होणार होता. त्यामुळे खूष होवून त्याने सावरकरांना आपले स्वत:चे पिस्तूल भेट दिले. (पुढे हेच पिस्तूल सावरकरांनी नथुरामाला भेट दिले असण्याची शक्यता आहे).

    हिटलरने सावरकरांना आपल्या बरोबर जर्मनीला यायची विनंती केली. पण सावरकरांनी या गोष्टीस नकार दिला. मी रत्नागिरीत राहूनच देशकार्य करणार आहे असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले.

    या जर्मन मंडळींना मराठी येत नसल्याने आणि सावरकरांना जर्मन भाषा येत नसल्याने, संपूर्ण संभाषण संस्कृत भाषेत झाले.

    ही भेट दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर कांही आठवड्यातच झाली. ही भेट इतकी गुप्त होती की सावरकरांच्या एकाही साथीदाराला या भेटीची माहिती नव्हती, आणि नंतरही देण्यात आली नाही. सावरकरांनीही आपल्या कोणत्याच पुस्तकात आणि भाषणात या भेटीचा उल्लेख केलेला नाही.

    विशेष म्हणजे एवढ्या लांबून आलेल्या या जर्मन पाहुण्यांना सावरकरांनी जेवण तर राहोच पण साधे पाणी देखील विचारले नाही. या घटनेवरून हे दिसून येते की सावरकर आपली परंपरा आणि रीतीरिवाज यांचे कसोशीने पालन करत.

    हिटलरला अणुस्फोट आणि मिसाईल यांचे तंत्रज्ञान दिल्यावर सावरकरांना मोठे समाधान वाटले, कारण ते योग्य त्या ठिकाणी, म्हणजे शत्रूच्या शत्रूकडे पोहोचले होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग हिटलर ब्रिटीशांच्या विरुद्ध करणार आणि त्यामुळे ब्रिटीशांचा साम्राज्यसूर्य मावळणार याची सावरकरांना पूर्ण खात्री झाली. आपण ब्रिटिशांना उल्लू बनवले याचाही त्यांना खूप आनंद झाला होता.

    लई झूटोस्की यांनी हिटलर-सावरकर भेटीचा हा दावा दुसरे महायुद्ध संपल्यावर मिळालेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून केला आहे. याचा खरेपणा पडताळण्यासाठी आपणास ब्रिटीश कागदपत्रे काय म्हणतात हे बघावे लागेल.
    END.

    ReplyDelete
  81. बर बुवा ठरले तर. सावरकर एकदम वाईट. काय ते कार्य तुमच्या फुले आंबेडकर आणि शाहुनीच केले बाकी सारे जानवेवाले देशद्रोही मंदबुद्धी. हे आपण वारंवार सांगून आपला आणि इतरांचा वेळ का फुकट घालवता. आपल्या ब्लॉग खाली एक tag line टाका. सावरकर, टिळक आणि कोण कोण हे सारे वाईट देशद्रोही मनुवादी वगैरे वगैरे. संघाचा तर समूळ नायनाट केला पाहिजे. असो, तेच तेच तसेच लिहिण्याचा तुम्हाला कंटाळा कसा बुवा येत नाही.

    ReplyDelete
  82. हिंदू शब्दाचा अर्थ --- हिन + दू = स्वतःच्य हीन वागणुकीने दुसऱ्यांना दुषणे देणारा .

    ReplyDelete
  83. माझं आजवरच निरीक्षण असं आहे कि सावरकर हे सर्व बाबतीत महान आणी असामान्य होते (बुद्धीमत्ता ,निग्रही वृत्ती ,त्याग , देशप्रेम , राष्ट्र भक्ती , लेखक , कवी , विचारवंत .....असे बरेच पैलू ). पण मला त्यांची एक उणीव मला फार बोचते....ते म्हणजे त्यांना संघटना बांधणी जमली नाही...चांगले अनुयायी घडवणं जमल नाही.त्यामुळे त्यांचे विचार , त्यांची तत्वे ही खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचले नाहीत.हे जर त्यांच्या हातून झालं असतां इतिहास बदलला असता.....त्यांचे अनुयायी हे एका मर्यादेतले च होते.....कॉंग्रेस पक्षात गांधीनी एखादी योजना आखायची , सरदार पटेल यांनी ती योजना आकाराला येण्यासाठी योग्य ती संघटना उभी करायची ,नेहरूंनी आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहोचवायची असं टीम वर्क सावरकरांच्या वाटेलाआलं नाही....काही अंशी याला त्यांचा स्वभाव कारणी भूत होता....माझे एक स्नेही नेहमी सांगतात अस्सल सोन्याचा कधी दागिना बनू शकत नाही , थोडं तांबे त्यात मिसळाव लागत , तसं सावरकर हे शुद्ध सोनं असल्यामुळे त्याचा दागीना घडू शकला नाही हे या राष्ट्राचं घोर दुर्दैव....

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...