Tuesday, May 14, 2013

सुर्य प्यायलेला माणुस

स्वप्नांना
मला कधीच दोष द्यायचा
नव्हता
स्वप्ने पाहणे समजा
माझी नियती होती
स्वप्न कोसळतांना पाहणे हे समजा
माझे अटळ भाग्यच होते...
असेल...

कितीदा सांगाल मला?
आणि कितीदा ऐकू मी?

मला माझी नियती आणि भाग्य
अगदीच समजत नाही
असे का बरे वाटते?
मी रातांधळा नव्हे कि
चकवा लागल्याप्रमाणे 

रातभर गोल गोल फिरणारा नव्हे
जरी टाकु पहाल मला वारंवार चकव्यात!

लक्षात घ्या
हैवानी प्रेरणा पिवून माझ्या बांधवांना
पथभ्रष्ट करणा-या सैतानांनो...

मी सुर्य प्यायलेला माणुस आहे!

No comments:

Post a Comment

कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत उतरण्याचे धोके...

  मागील लेखात आपण भविष्यात सर्व शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात गेली आणि त्यांनी शेतीचे पूर्ण नियंत्रण घेतले, तर त्याचे काय परिणाम होऊ श...