Friday, September 12, 2014

वैदिक शेती ?

मी जेंव्हाही "वैदिक" शब्द वापरतो तेंव्हा मला माझे मित्र हिरिरीने "तुम्ही :हिंदू" समाजात फुट पाडता..." असा आरोप करत असतात. रा. स्व. संघ ही हिंदूंची नव्हे तर वैदिकांची संघटना आहे असे मी म्हणतो तेंव्हा संघिष्टांना खूप संताप येत असतो. पण प्रत्यक्षात तेच सत्य आहे हे वारंवार गेली दिडशे वर्ष वैदिक विद्वानच (व संघही) सिद्ध करत असतांना तिकडे सोयिस्कर डोळेझाक केली जाते हे एक वास्तव आहे. वैदिक धर्म स्वतंत्र धर्म असून शंकराचार्य हे त्यांचे धर्मगुरु असून संघ हा वैदिकांच्या रक्षणाचे कार्य करतो आणि हिंदूंचा त्यासाठी वापर करतो हे सत्य बहुजनांना समजेल तो सुदिन!

भाजप सरकार केंद्रात आले आणि वैदिक संस्कृती, वैदिक विज्ञान (जे अस्तित्वात नाही) आणि सरस्वती नदीचा बोलबाला चालू झाला आणि घग्गरलाच मारुन मुटकुन सरस्वती बनवण्याचाही उद्योग चालू झाला हे वास्तव आहे.

आता त्यात भर पडली आहे ती चक्क "वैदिक" शेतीची!

वैदिक लोक लबाड आणि धूर्त आहेत हे मी वारंवार म्हणालो आहे. प्रथम आपण शेतीकडे वळूयात. वैदिक लोक शेतकीत कधीही आघाडीवर नव्हते. ते मुलत: पशुपालक होते. त्यांच्या हजारो वर्ष पुर्वी शैव हिंदुंनी शेती नुसती शोधलीच नव्हती तर कृत्रीम कालवे काढून शेतीला पाणी देण्यापर्यंत मजल गाठली होती. ऋग्वेदात वैदिकांचे महान कार्य काय तर हे कालवे फोडून सिंधूजनांना त्रस्त करणे.

"दस्यू म्हणजे असुर यांची संस्कृती आर्यांपेक्षा उन्नत होती, असे ब्राह्मण ग्रंथांतील असुरांच्या कथांवरुन सूचित होते..." (वैदिक संस्कृतीचा इतिहास, लक्ष्मणशास्त्री जोशी) यातच पुढे जोशी म्हणतात, "आर्य (वैदिक) अर्धवट भटके व ग्रामीण संस्कृतीचे होते. सिंधू संस्कृती नागर होती. नगररचनेचे तंत्र आर्य नीट रीतीने सिंधू संस्कृतीच्या लोकांपासून कधीच शिकले नाहीत. आर्यांनी (वैदिकांनी) केलेल्या नगररचनेतील तंत्र सिंधू संस्कृतीच्यापेक्षा कमी दर्जाचे होते व आहे." (कंसातील शब्द माझे)

या वैदिकांचा मुख्य पेशा शेती हा तेंव्हाही नव्हता आणि आताही नाही. ते निमभटके असल्याने आदिवासींप्रमाणे फिरती शेती करत. पण जे काही संस्कृतात ते वैदिकांचे असे मानण्याचा घातकी प्रघात असल्याने व तो वैदिकांनीच जाणीवपुर्वक निर्माण केल्याने गतकाळातील कृषीवल संस्कृतीने शेतकीत जे काही विकसित केले त्याला जर आता "वैदिक" लेबल चिकटवले जात असेल तर फुटीचा आणि लबाड्यांचा हा धंदा कोण करत आहे हे लोकांनीच आता लक्षात घ्यावे. संस्कृत भाषेचे निर्मातेही वैदिक लोक नव्हेत याचे अगणित पुरावे उपलब्ध आहेत. उलट ज्यांचा द्वेष वैदिक करत त्या पणींपैकी पाणिनीनेच संस्कृतचे पहिले व्याकरण लिहिले हे या भाकड वैदिकांनी समजावून घेतले पाहिजे. (आणि हिंदू धर्मातून चालते व्हायला पाहिजे.)

हे जर हिंदू धर्माचे असते तर त्यांनी शेती काय आणि बाकी काही काय, त्यासाठी "हिंदू" शब्द वापरला असता...."वैदिक" नव्हे! परत वर तोंड करुन म्हणतात...आता सारे मिसळून गेलेत...कोठे राहिले वैदिक-अवैदिक? अरे लबाडांनो...

संघटनासाठी लोकांना मुर्ख बनवायला हिंदू आणि संस्कृतीला मात्र वैदिक...(बाहेर मिरवायला हिंदू...घरात वैदिक अशातला हा लबाडीचा प्रकार!)

आणि यातच यांची वैदिक चाल दिसून येते.

हा देश नेहमीच शैव हिंदुंचा होता आणि राहणार...या देशाला सांस्कृतिक-भाषिक विविधता असुनही अखंडता आहे ती देशभर विखुरलेल्या १२ जोतिर्लिंगांमुळे आणि ५२ शक्तीपीठांमुळे...आणि नगरे तर सोडाच पार वाड्या-वस्त्यांत विखुरलेल्या अगणित शिवलिंगांमुळे आणि शिवगणातील देव-देवतांमुळे....
कोठे आहे वैदिक?
वैदिकांचे स्वत:चे असे काहीच नसल्याने त्यांना अशा चो-या कराव्या लागल्या आहेत, दुस-यांची श्रेये लुबाडावी लागली आहेत हे लक्षात ठेवा!

सावध रहा....रात्र वै-याची...
नव्हे...
वैदिक सांस्कृतीक चोरांची आहे!
 

 ========(या लेखाचा संदर्भ: आज दै. लोकसत्तात प्रथम पृष्ठावर प्रसिद्ध झालेली "केंद्र सरकारचा नवा उपक्रम----कृषितज्ञांना वैदिक शेतीचे धडे" बातमी)

51 comments:

  1. हा कोब्रा म्हणजे एक करमणुकीचे साधनच बनला आहे! हा दोन्ही प्रकारच्या उलट-सुलट प्रतिक्रिया स्वतः च देत आहे! कधी डोक्यावर घेतो तर कधी एकदम जमिनीवरती आपटतो! सोनावनींनी याचे काय घोडे मारले आहे, यालाच ठावूक? ठीक आहे, आपले मनोरंजन होत आहे, हे ही नसे थोडके!

    ReplyDelete
  2. Sonawani tumhi aataparyant itke dhandhe kele, anek dukan thatali ek pan tumhala nit sambhalta aala nahi, itke experiment tar himesh reshmiya ne pan nahi kele bollywood madhe. publicity kayam thevnyastahi uthsut hindu chya nave bomblat astat. band kara he sgale ani ekach kutla tari business nit sambhala.

    ReplyDelete
  3. संजयजी
    आपण म्हणता की रिग्वेदात परालौकिक जीवनावर काही भाष्य नाही पण खाली दिलेले यमसुक्त पहा मंडल 10 सूक्त 14 अनुवादसहित।।
    य॒मो नो॑ गा॒तुं प्र॑थ॒मो वि॑वेद॒ नैषा गव्यू॑ति॒रप॑भर्त॒वा उ॑ ।
    यत्रा॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ परे॒युरे॒ना ज॑ज्ञा॒नाः प॒थ्याख्प् अनु॒ स्वाः ॥ २ ॥
    यमः नः गातुं प्रथमः विवेद न एषा गव्यूतिर् अप-भर्तवै ओं इति
    यत्र नः पूर्वे पितरः पराईयुः एना जजानाः पथ्याः अनु स्वाः ॥ २ ॥
    सर्वांत प्रमुख जो यम त्यालाच आमचा गगनमार्ग माहित आहे. ज्या ठिकाणीं आमचे पूर्वज वाडवडील परलोकी गेले, ज्या मार्गानुसार ते उत्पन्न झाले आणि जो आपला मार्ग ते अनुसरले व ज्या मार्गाने परलोकी गेले, तो मार्ग, ती आमची जागा कोणी हिरावून घेऊं शकणार नाही. २
    दुसरे काही प्रश्न असे..
    १) शैव धर्माचा धर्मग्रंथ कुठला ?
    २) वैदिक लोक हे पशुपालक होते शेतकरी नव्हते तर त्यांना पर्जन्याची इतकी चिंता का? वरुण देवासाठी शेकडो स्तुतीपर सुमने ऋग्वेदात आहेत. ती कशासाठी?
    ३) आपण आपल्या तुरुंगातील अनुभवांत म्हटले आहे कि आपल्याला हस्तरेषा ज्ञान आहे. मग आपल्याला ज्योतिष्य विषयक माहितीही असेल अशी अशा करतो. जन्मपात्रीकेप्रमाणे माणसांचे २ गण असतात, देव असुर आणि मनुष्य, तसेच ४ वर्ण असतात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. पूर्वी हे गण व वर्ण कटाक्षाने पालन केले जात. पण नवनवीन पिढ्यांचा जन्म होताना व लोकांच्या उदासीनतेमुळे लोक हे पाळेनासे झाले. त्यातच युद्धे, धर्मावरील अक्रमने यामुळे ह्या वेगवेगळ्या वर्णांच्या लोकांना फार थोड्या वेळात एकत्र करणे अवघड बनू लागल्याने जन्माधारित (म्हणजे जो गट प्रबळ आहे त्यांच्या) वर्णाप्रमाणे व गणाप्रमाणे पुढच्या पिढ्यांचे बनू लागले. आणि जातीसंस्था आणि वर्ण व्यवस्था अस्तित्वात आली. असे मला वाटते. आपली बरेचसे अंदाज आणि काही विधाने फार धाडसाची आहेत, पण तसे म्हणणे व पटणे पटवून घेणे थोडे अवघड वाटते. उदा. शैव व वैदिक धर्माचा कालखंड, कदाचित हे दोन्ही धर्म असंख्य वर्षे अस्तित्वात असतील पण पुरावे फारसे सापडत नाहीत. तसेच आपण म्हटल्याप्रमाणे, वैदिक हे मूर्तिपूजक नसल्याने तसेच ते भटके असल्याने त्यांच्या मूर्ती, राहण्याची पक्की घरे सापडण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही आपण करीत असलेला प्रयत्न स्तुत्य आहे. संशोधन आणि सत्यशोधन हे झालेच पाहिजे. तिसरे असे कि दोन वेगवेगळ्या संस्कृती एकाच जागी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. शिया सुन्निचेच उदाहरण घ्या. दोघांची पाळेमुळे एक असल्याशिवाय शिव व वैदिक एकत्र राहणे शक्य नव्हते असे वाटते.
    आपला शुभचिंतक
    अविनाश पाटसकर

    ReplyDelete
    Replies
    1. पाटसकरा ही काय वायफळ बडबड चालविली आहेस?
      अरे, पाटसकरा त्या यम आणि यमीच्या संवादाबद्दल जरा बोल! ऋग्वेद मंडल १०.१०.
      हीच का तुमची वैदिक संस्कृती? सख्ख्या भावाबरोबर असले चाळे?

      Delete
    2. निनावी तू का थयथायाट करतो आहेस.. आपल्याला पूर्ण कोमेंत वाचायची इच्छा नाही आणि सुटले बोंबलत.. अरे बालका मी शंका विचारतोय तू का असा पेटून उठतोस. संजय सर दोन्ही वैदिक वादमायांचा वापर करतात पण वेद थोठंद म्हणतात दुसरीकडे उपनिशिदात आल्याप्रमाणे म्हणतात कलियुगात क्षत्रिय नाहीत. मग हातात तलवारी घेऊन लढले ते कोण? शिवाय त्यांच्याच पदरी नोकर्या करतात. जे मारायला टायर असतात त्यांना समाजात महत्वाचे स्थान असणारच. वेद काहीही सांगोत पण सत्य ते सत्यच असते. दुसरे असे कि आर्य किवा कोणीतरी बाहेरून आले तेच श्रेष्ठ कसे? आलेच नाहीत हे तर पटत नाही कारण असतील शिते तर जमतील भुते प्रमाणे अनेक लोक बाहेरून आले. ज भटके बाहेरून आले पण गरीब होते ते धनगर वंजारी असे भटके बनले.. जे श्रीमंत होते ते पारशी वगैरे श्रीमंताच राहिले. असे का होऊ शकत नाही हि माझी बापाद्याची शंका आहे. आत्ता नाही का एकेकाळचे राज्यकर्ते मुस्लिम गरिबीत खितपत पडले आहेत.. असो चर्चा करायची इच्छा असल्यास पुढे बोलता येते. तुझ्याशी काय बोलान्र..

      Delete
    3. सत्य किती झोंबते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अरे मित्रा, मी तुझ्या सर्व टिप्पण्या वाचल्या आहेत, काळजी नसावी! थयथयाट-बोंबलने, पेटून उठणे असे काही नाही. असे करू नकोस थोड्या दमाने घे! आता तू मोठा झाला आहेस, कमावता झाला आहेस, स्वतः ला ज्योतिषाचार्य, वास्तुशात्र विशारद समजतोस ना! धंदा ही करतोस ना! मग असे वागून वैतागून कसे चालेल? पत्रिका पाहणे, ज्योतिष, वास्तुशात्र वगैरे सर्व थोतांड आहे असे म्हटल्यास तुझ्या..... कपाळात जातील, होय ना? हे सर्व अंधश्रद्धेचे प्रकार आहेत, हे लोकांना कळाले तर? असो, वैदिक धर्म सध्या अस्तित्वात आहे असे तुला वाटते काय? खरेतर तो कधीच नष्ट झाली आहे! प्राचीन भारतीय इतिहास हा अवैदिक विरुद्ध वैदिक असाच होत राहिला आहे. राम, कृष्ण, बुद्ध हे सर्व अवैदिक महापुरुष असून सुद्धा वैदिकांनी त्यांचे पुरते वैदिकीकरण केलेले आहे आणि विष्णूच्या अवतार यादीत सामावून घेतले. शिवाचा आणि त्या वैदिक रुद्राचा काडीचाही संबंध नसताना ओढून-ताणून दोन्ही एकच आहेत अशी संभ्रम कोणी पसरविला? त्याचा फायदा कोणाला झाला? याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही?

      Delete
    4. What is this?

      As to morality there is hardly any discussion about it in the Rig-Veda. Nor does the Rig-Veda contain elevating examples of moral life. Three illustrations of cases on the other side may well be given:
      First is the conversation between Yama and Yami who were brother
      and sister.
      "(Yami speaks). I invite my friend to friendship, having come over the vast and desert ocean may Vedhas, after reflecting, place in the earth the offspring (of thee) the father, endowed with excellent qualities."
      "(Yama speaks). Thy friend desires not this friendship, for although of one origin, she is of a different form; the hero sons of the great Asura (are) the upholders of heaven, enjoying vast renown."
      "(Yami speaks). The immortals take pleasure in (a union) like this which is forbidden to every mortal; let thy mind then concur with mine, and as the progenitor (of all) was the husband (of his daughter), do thou enjoy my person"
      "(Yama speaks). We have not done what was done formerly; for how can we who speak truth, utter now that which is untrue? Gandharva (the sun) was in the watery (firmament), and the water was his bride. She is our common parent, hence our near affinity."
      "(Yami speaks). The divine omniform generator Twashtri, the progenitor, made us two husband and wife, even in the womb; none frustrate his undertaking; earth and heaven are conscious of this our (union)."
      "(Yama speaks). Who knows anything of this (his) first day (of existence)? Who has beheld it? Who has here revealed it? The dwelling of Mitra and of Varuna is vast. What sayest thou, who punishest men with hell?"
      "(Yami speaks). The desire of Yama hath approached me Yami, to lie with him in the same bed; I will abandon my person as a wife to her husband; let us exert ourselves in union like the two wheels of a wagon."
      "(Yama speaks). The spies of the Gods, which wander upon earth, never stop, never close their eyes. Associate quickly, destructress with some other than with me, and exert yourselves in union, like the two wheels of a wagon."
      "(Yami speaks). To him (Yama) let every whorshipper sacrifice both day and night, on him let the eye of the Sun repeatedly rise; (for him may) the kindred pair (day and night unite) with heaven and earth. Yami will adhere to the non-affinity of Yama."

      Delete
    5. "(Yama speaks). The subsequent ages will come, when sisters will choose one who is not a brother (as a husband); therefore, auspicious one, choose another husband than me, and make thine arm a pillow for thy mate."
      "(Yami speaks). Is he a brother whose sister has no lord? Is she a sister (whose brother) misfortune approaches? Overcome by desire, I strongly urge this one request; unite thy person with mine."
      "(Yama speaks). I will not unite my person with thine; they call him who approaches a sister, a sinner. Enjoy pleasure with some other than me; thy brother, auspicious one, has no such desire."
      " (Yami speaks). Alas, Yama, thou art feeble; we understand not thy mind or thy heart. Some other female exbrances thee as a girth a horse, or as a creeper a tree."
      "(Yama speaks). Do thou, Yami, embrace another; and let another embrace thee as a creeper a tree; seek his affection, let him seek thine; and make a happy union."
      "May Agni, the destroyer of the Rakshasas consenting to our prayer, drive hence (the evil spirit) who (in the form of) sickness assails thine embryo, who, as the disease durnaman, assails thy womb."
      "May Agni concurring in our prayer, destroy the cannibal who, as sickness, assails thine embryo, who, as the disease durnaman, assails thy womb."
      " May we exterminate from hence (the evil spirit) who destroys the impregnating energy, the germ as it settles, the moving embryo, who seeks to destroy (the babe) when born."
      " May we exterminate from hence (the evil spirit), who separates thy thighs, who lies between husband and wife, who entering thy womb, devours (the seeds). May we exterminate from hence (the evil spirit), who in the form of brother, husband, or paramour, approaches thee, and seeks to destroy thy offspring."
      " May we exterminate from hence (the evil spirit) who, having beguiled thee by sleep or darkness, approaches thee, and seeks to destroy thy offspring."
      Take some of the Hymns or prayers that are to be found in the Rig-Veda.

      Delete
    6. हे हे हे काहीतरीच काय.. मला झोम्बायचे काहीही कारण नाही कारण तुला कुणी सांगितले कि तू जे सांगतो आहेस ते सत्य आहे म्हणून? मी कसलेच पैसे घेत नाही. पैसे कमावण्यासाठी मी काम करत नाही. आणि धंदा करत नाही. आहे असे म्हटल्यास तुझ्या..... कपाळात जातील, हे फालतू बोल तुझा झालेला तिळपापड दाखवतात. शिवाय मी काय बोलतोय याचे तुला काही तारतम नाही तू आपला तुझेच टुमणे पुढे लावत आहेत. तुला काही काम नसेल तर एखादा पिच्चर बघ. ज्या विषयातले आपल्याला काही काळात नाही तिथे दुसर्याचे उधार उसने घेऊन उगाच दिवाळी करू नकोस. कारण मी काही वैदिक ब्राम्हण नाही मी जातीने तेली आहे. त्यामुळे तू किती वैदिकांच्या नावाने बोम्बलला तरी मला काही देणेघेणे नाही. वेळ आली तर तेल लाऊन... हाम हां हा.. समजले ना. एकीकडे ते वैदिक कोण काय माहित नाही ते एक सांगतात इकडे हे संजय सर एक सांगतात म्हणून शंका विचारतोय तर तू आपला तेच तेच सांगतोय.

      Delete
    7. ह्या ब्लोगवर दुसर्याचे उधार उसने घेऊन दिवाळी करणारेच जास्त आहेत.. नुसत्या उंचच उंच उड्या.. माकडाची गोष्ट आठवते का? हनुमान एकदा पवात्याची बी दाबून उडवून दाखवतो आणि सगळी माकडे त्यापेक्षा उंच उडी मारायची स्पर्धा करायला लागतात. सगळ्या जेवणाचा सत्यानाश होतो. तसे झालेले आहे इथे.. मारा उड्या आणखी उंच.. वाट तुमचीच लागणार त्यात. शेवटी उपाशी राहणार तुम्हीच..

      Delete
    8. उगीच स्वतःला त्रास करून घेवू नकोस! किती राग-राग? संजय सोनवणी यांना तू शंका जरूर विचार, तो तुझा अधिकार आहेच, मात्र मित्रा असे खोटे बोलू नकोस म्हणजे कमावले! तुझी वेबसाईट मी पाहिली आहे, उगीच कृपया धंदा करीत नाहीस असे म्हणू नकोस! तू अविनाश पाटसकरच आहेस ना? {http://avinashpataskar.in} कृपया गैरसमज नसावा. त्यात काय घाबरण्या सारखे! उघडा पडतोस म्हणून सांगितले! बाकी चालू देत तुझे शंकांचे निरसन! माणूस फक्त जन्मानेच वैदिक असल्यास वैदिक आहे असे मानने चुकीचे आहे, माणूस कोणत्याही वर्णात/जातीत जन्मला असला मात्र विचाराने तो वैदिक असला तर त्याला आम्ही वैदिकच मानतो! संजय सोनवणी हे तुझ्या शंकांचे निरसन लवकरात लवकर करोत, हीच सदिच्छा!

      Delete
    9. मग तू कशाला भू भू भुकत होतास बेंबीच्या देठापासून.. तुला काय बिन पगारी भूकाय्च्या कामाला ठेवलाय का? पगारी ठेवला असेल तर तुझा पगार काय तू बोलतोस काय? संजय सरांनी उत्तर देवोत अगर न देवोत.. सुरुवात तू केलीस मला वायफळ बडबड शब्द वापरून.. आणि म्हणे आम्ही विचाराने तो वैदिक असला तर त्याला आम्ही वैदिकच मानतो । आता तूच राहिला होतास आमच्या ढून वर शिक्का मारायचा.. बरोबर आहे सध्या सरकारी ब्राम्हण देश चालवतात.. मारा बाबा शिक्के.. तुमचे राज्य आहे. गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ असे होऊ देऊ नकोस.. घरात पण असेच करतोस का रे बेम्बटया

      Delete
    10. अरे हरामखोर बामना! तू कितीही लपविलेस की तू बामन नाहीस म्हणून ते लपून राहू शकत नाहीरे. खोटारड्या स्वतः ला तेली म्हणवून घेतोस, मुर्खा तेल्यांसारखे मेहनतीची कामे तुला नाही रे जमणार! म्हणूनच हात बघायचे फडतूस काम करतोस! जरा शरम कर! म्हणतात ना "सर्व जग सुधारेल पण ही बामनाची जात कधीच सुधरणार नाही". महाखोटारड्या ज्योतिषाचा धंदा वगैरे काही करीत नाही म्हणतोस, तुझी अक्कल कोठे गहाण पडली आहे काय? पाटसकरा तुझे अभियंत्याचे शिक्षण पूर्ण वाया गेले रे! अन काय हे ज्योतिषाचे हलकट काम/बिना मेहनतीचे/अंधश्रद्धा वाढविणारे बुळगे काम तू करीत बसला आहेस? सुकाळीच्या! कुठ पर्यंत असा ......शेपूट घालून जगणार? सुधर लेकाच्या सुधर! पुण्यात शनिवार पेठेत राहतोस ना, तुझ्या सारखे असे नालायक लोकच तिथे राहत असतील, यात अजिबात शंका वाटत नाही. राग मानून घेवू नकोस! बघ सुधरता आले तर, नाहीतर आहेच 'येरे माझ्या मागल्या'? भो-भो करणारी तसेच लाथा मारणारी आवलाद तुझी, आमची नाही! हे विसरू नकोस!

      Delete
    11. हे बघ माणसा मला माझी जात लपवायची काहीही गरज वाटत नाही.. मी तेली आहे मी माझ्या जातीचे सेर्तीफिकॅत तुला पाठवतो तुझा इमेल दे.
      शिवाय मला माहित आहे कि तेली हे ओ बी सी आहेत त्यांचे तोंड लोक सकाळी सकाळी पाहत नसत. पण म्हणून मी आत्ता इतके हुरळून जात नाही. कि आपण सरकारी ब्राम्हण झालोत म्हणून.. हि तात्पुरती मलमपट्टी आहे. खरे विचार केला तर आपला एकूण समाज व धर्म का मागे राहिला यासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्यात काय अर्थ आहे. हे टीम वर्क असते. इस्लामिक विरुद्ध आपण अनेकदा हरलो, अनेक रोगराईला बळी पडलो हे असे का झाले तर एकमेकांकडे बोट दाखवून उपयोग नाही. तसेच सगळ्यांनी बम्नांवर घासार्ण्याचेही काही कारण नाही..ani तुम्ही तेच करत आहात हे हिटलर सारखे झाले ज्यू वाईट म्हणून त्यांना कापून काढा हे विचार.. अरे तसे नाहीये..bhale संजय सर काही सांगो त्यामागे मोठे राजकारण दडलेले असते. एकांडी लेख लिहिण्यात काही मज नाही,, आणि उपयोगही नाही,,

      Delete
    12. मी परदेशात 13 वर्षे रहउन भरपूर पैसे कमावालेट।। माला कही करायची गरज नहीं टी तुज्र बाघ

      Delete
    13. Vyavasthit lihita suddhaa yet nahi ya patasakar bamanala, var Kay lihile he tuze tula talri samajat ahe kay? Gapp bas tathakathit bamana?

      Delete
  4. punyavun nagarla jatana saravadi made thamba, tithe misalpav mast milto, ekda try kara.

    ReplyDelete
  5. सेमेटिक धर्म हे एकमेकांचे अनुकरण करूनच बनले आहेत हे स्पष्ट दिसते. तथापि त्यांना अंगीकारणारा वर्ग हा दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्याने व ते अडाणी (भटके, कमी पावसाच्या प्रदेशात राहणारे असल्याने) शिक्षणाच्या बाबत प्रगती झाली नाही. त्यांची भाषा क्लिष्ट आहे. त्यांच्या धर्माचे फारसे ज्ञान उपलब्ध नाही १-२ पुस्तकेच आहेत. तसे आपले नाही. आपल्याकडे मोठी विचारिक क्रांती होत आलेली आहे. इतके असले तरी एकमेकांच्या प्रथा ते भिन्न ठेवूनच आहेत. पण तसे वैदिक व शैवांचे नाही. त्य्नाच्यातील देवांना एकमेकांनी मान्यता दिलेली आहे. अन्त्येश्ठी व पितरांसाठी शिवाचीच उपासना केली जाते. याशिवाय शिव व वैष्णव यांचा झगडा हजारो वर्षे चालला होता. इतकेच काय लढाया झाल्या होत्या. पण नंतर ते दोघे एक मतावर आलेले दिसतात ते कसे याची उकल आपण करू शकलात तर आत्ता भांडायची गरज भासणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे कित्येक ब्राम्हण हे फक्त शिव उपासना करतात. शिवाय कित्येक राजाम्हाराजांनी विष्णूची उपासना केलेली आहे. मला असे वाटते कि ह्या दोन एकाच संस्कृत्या (धर्म) आहेत नंतर त्यात भेद बनत गेले. त्यादृष्टीने ऋग्वेद हा वैदिकांचा मूळ धर्मग्रंथ आहे असे वाटत नाही. तो फक्त पंचमहाभूते व निसर्ग देव यांच्या उपासनेसाठी बनवला गेला आहे. यापेक्षा वेगळे साहित्य त्यावेळी उपलब्ध होते. जसे लीलावती ग्रंथ, शिव स्वरोदय शास्त्र, अंग्शास्त्र वगैरे. पण ते काळाच्या ओघात अदृश्य झाले यापुढे जाऊन आपण जे दैवत उपसतो ते आपल्या प्रवृत्ती प्रमाणे असते. उदा साईबाबांना उपसणारे लोक कुठल्या मानसिकतेने उपासना करत असतील याचा विचार करावा. तिथे शिव व वैदिक हा प्रश्नच येत नाही. सध्याच्या घडीला त्यांना ते करू द्यावे. जे स्वीकार्य नाही ते आपोआपच मागे पडते. असे आपणच मागे म्हणालात. त्यामुळे वैदिक कर्मकांडे मागे पडली असावीत. पण सध्या शिव आणि वैदिक अश्या दोन्ही धर्माचे पालन करणारे लोक आहेत, त्यातल्या नेमक्या कशाने त्यांचे क्षेम चालले आहे हे त्यांनाही माहित नाही. त्यामुळे कोणते सोडावे व परिणाम काय होतील हे भय असणारच! आपण सांगू शकता का? जर एखाद्याचे खरच ऐहिक नुकसान झालेच तर जबाबदार कोण? तुम्ही लोकांना कितीही सांगितले तरी लोक त्यांच्या वृत्तीप्रमानेच देव पूजतात..kay करणार
    अविनाश पाटसकर

    ReplyDelete
  6. वैदिकांना फक्त वेदांचेच महत्व वाढवायचे होते तर त्यांनी इतर कर्मे का केली? आर्य चाणक्य हे पूर्णतः राजकीय व्यक्तिमत्व होते. शिवाजी आणि कित्येक इस्लामी राज्यकर्त्यांकडे ब्राम्हण मंत्री होते. योद्धे होते. त्यांना फक्त पौरोहित्यच करायचे होते व वेदांचे महत्व वाढवून उपजीविका करायची होती तर ते तेच करत बसले असते समाजाच्या प्रश्नांवर राजकारणात त्यांनी उडी घेतलीच नसती. त्यांनी शैवांची कामे केली नाही का? लढाई करण्याचा तर प्रश्नच येत नाही. धर्मकारण आणि राजकारण हे इतके एकमेकात घट्ट गुंतलेले असलेल्या काळात हे घडले.

    ReplyDelete
  7. संथ आणि शांत जीवन असले कि फाफटपसारा देव आणि धर्म वाढतात.. युद्धावर जाणारा जवान साईबाबांची उपासना करेल का? किंबहुना एकेश्वर्वादाचे हेच कारण आहे. त्यामुळे जसे आपले देव घडवण्यासाठी लोकांची वृत्ती कारणीभूत होती तशीच त्यावेळची परिस्थिती कारणीभूत होती. कोणी कोणावर लादण्याचा प्रश्न येताच नाही. संकट आल्यावर जशी प्राण्याची सर्व गात्रे एकत्र येतात तसेच समाजाचे होते. आणि शिवाजींच्या उदाहरणावरून हेच सिद्ध होते. कितीही विष्णूचे गुणगान गायले तरीही युद्धाच्या प्रसंगी शिवाचेच नाव हिंदू का घेतो? इतिहासाचा अभ्यास नुसता करून चालणार नाही वर्तमान हि विचारात घ्यावे लागेल. असो
    कळावे लोभ असावा, आपला ब्लॉग वाचून आनंद वाटला
    अविनाश पाटसकर

    ReplyDelete
  8. कृषी शास्त्रज्ञांना आता वैदिक शेतीचे धडे

    Loksataa : Published: Saturday, September 13, 2014

    आधुनिक शेतीचे धडे देणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांना आता सेंद्रिय, अध्यात्मिक व वैदिक शेतीचे धडे दिले जाणार आहेत. राजस्थानातील माऊंट अबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात उद्यापासून (शनिवार) ते प्रशिक्षण घेणार आहेत.
    देशातील सर्व कृषी विद्यापीठातून आधुनिक तंत्राचे कृषी शिक्षण दिले जाते. कृषी संशोधनही त्याच पद्धतीने चालते. संकरित, सुधारित शेती संशोधनाबरोबरच आता जनुक बदल, एरोपॉनिक , हायटेक संशोधन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून काही अध्यात्मिक गुरूंनी सेंद्रिय व वैदिक शेतीचे प्रयोग सुरू करून त्याचा प्रचार व प्रसार सुरू केला. कृषी शास्त्रज्ञांनी या पद्धतीची दखल घेतली नाही तसेच त्याला विरोध केला. काही प्रमाणात सेंद्रिय शेतीचा पुरस्कार शास्त्रज्ञांनी केला. त्यासंदर्भात राज्य सरकारने माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला होता. त्यांनी विविध शिफारशी केल्या आहेत. अनेक राज्य सरकारांनी त्यासंबंधी धोरण घेतले आहे. असे असताना आता केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मात्र वैदिक शेतीला प्रोत्साहन दिले जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
    राजस्थानातील माऊंट अबू येथे आयोजित केलेल्या वैदिक शेती प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचा आदेश भारतीय कृषी अनुसंधान परिषद व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दिला असून, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील संशोधन संचालकांना या प्रशिक्षणास उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दोन संचालक उपस्थित राहणार असून दोघांना शक्य झालेले नाही. वैदिक शेतीला शास्त्रज्ञांचा पाठिंबा नाही, त्यामुळे देशातील अनेक शास्त्रज्ञांनी विरोध दर्शविला. पण तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, सकारात्मक भूमिका घ्या, नंतर काय ते ठरवा असा सल्ला देण्यात आला. आधुनिक शेतीचे धडे देणाऱ्या संशोधकांनाच आता जुन्या जमान्यातील वैदिक शेतीचे धडे गिरवावे लागणार आहेत.

    ReplyDelete
  9. हिंदू धर्म स्व:तची सहिष्णू ओळख हरवत चाललायं - फली नरीमन

    एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

    Loksatta: Published: Saturday, September 13, 2014

    हिंदू धर्मावरील नितांत श्रद्धेमुळेच आपल्या हाती देशाच्या सत्तेची सूत्रे आली असल्याची समजूत देशातील काही हिंदू धर्मीयांनी करून घेतली आहे. सत्तेतील उच्चपदस्थही त्यांच्या या समजुतीला आव्हान देण्याचे धारिष्ट्य दाखवत नसल्याने हा समज आणखीनच दृढ होताना दिसत आहे. मात्र, त्यामुळे हिंदू धर्म स्वत:ची पारंपरिक सहन करण्याची क्षमता आणि सहिष्णू ओळख हरवत असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ वकील फली नरीमन यांनी केले. ते शुक्रवारी दिल्ली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या वार्षिक व्याख्यानमालेत बोलत होते. आपण केंद्रात बहुमताने सत्तेत आलेल्या सरकारचे स्वागत करतो. परंतु; बहुमताने सत्तेत आलेल्या सरकारी पक्षांच्या यापूर्वी आलेला अनुभवावरून, काहीशी भीतीदेखील वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. काही व्यक्ती किंवा समुहांकडून देशातील अल्पसंख्यांक समाजाविरुद्ध सातत्याने निंदात्मक कारवाया केल्या जातात. मात्र, बहुमताने सत्तेत आलेले सरकारी पक्ष असे प्रकार थांबविण्यासाठी काही करताना दिसत नसल्याचे परखड मत फली यांनी मांडले.

    ReplyDelete
  10. भारतातील प्राचीन वैदिक संस्कृती यज्ञ आणि पशुपालन या दोन पायांवर उभी होती. वैदिक स्वत:ला आर्य म्हणवून घेत. अग्नी हा मानवी सभ्यतेतील पहिला वैज्ञानिक शोध समजला जातो. अग्नीच्या शोधामुळे माणूस कच्चे मांस खाण्याऐवजी भाजून, शिजवून खाऊ लागला. मानवाच्या प्रगतीतील ही दुसरी अवस्था आहे. वैदिक संस्कृती याच टप्प्यात विकसित झाली. वैदिक आर्य अग्नीशिवाय जगूच शकत नव्हते. वैदिकांची संस्कृती अंत्यंत प्रगत आणि उन्नत होती, असे मानण्याची अंधश्रद्धा भारतात कित्येक शतकांपासून जोपासली हेतूत: गेली आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे, असा अपसमज शतकानुशतके प्रसृत केला गेला. काही हितसंबंधी पोटपूजक पुरोहित आणि इतिहासकारांनी हे पाप केले. वैदिक आर्य प्रगत नव्हे, तर मानवी प्रगतीच्या दुसरया टप्प्यावर जगत होते. ते भटके आणि पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. मांस खाण्यायोग्य करण्यासाठी वैदिक आर्यांना अग्नीची गरज होती. सासरी जाणारया मुलीसोबत अग्नीही दिला जात असे. वैदिक संस्कृतीने अग्नी सतत प्रज्वलित ठेवणे हे एक आद्य कर्तव्य ठरविले, त्यामागील कारण असे व्यवहारिक आहे. या व्यवहारिकतेतून अग्निहोत्राचा म्हणजेच यज्ञाचा जन्म झाला. यज्ञ संस्कृतीचा जन्म अशा प्रकारे वैदिकांच्या दैनंदिन गरजेतून झाला आहे. घरातील अग्नी विझला तर वैदिकशास्त्रात विविध प्रायश्चित्ते सांगितली आहेत.
    अग्नीसंबंधीचे काही शास्त्रादेश पुढील प्रमाणे:
    विवाहाग्निमग्रतोऽजस्त्रं नयन्ति ।।
    अर्थ : वधुवरांचे पुढे विवाहकाली सिद्ध झालेला अग्नी अजस्त्र न्यावा१. (अजस्त्र म्हणजे मोठ्या भांड्यातून. मोठ्या भांड्यातून यासाठी की मुलीला सासरी आणेपर्यंत तो विझता कामा नये.)
    पाणिग्रहणादि गृह्यं परिचरत्स्वयं
    पल्यपि वा पुत्र: कुमार्यन्तेसी वा ।।
    अर्थ : लग्न झाल्यापासून घरात अग्नीची सेवा स्वत: करावी. स्वत:ला शक्य नसल्यास पत्नीकडून, पुत्राकडून qकवा अविवाहित कन्येकडून करावी२.
    यदि तूपशाम्येत्पत्न्यूपवसेदित्येके ।।
    अर्थ : घरातील अग्नी जर विझला तर पत्नीने उपोषण करावे, असे ऋषींचे सांगणे आहे३.
    वरील शास्त्रादेश पाहिले असता वैदिक लोक पूर्णत: अग्नीवरच कसे अवलंबून होते, हे लक्षात येते. वैदिकांच्या हातातील अग्नी काढून घेतल्यास ते कच्चे मांस दातांनी तोडून खाणारया आदिमानवाच्या अवस्थेत जाऊन पडतील. ही वस्तुस्थिती एकदा समजून घेतली की, आर्यांच्या अफाट प्रगतीचा तसेच महान संस्कृतीचा भोपळा आपोआप फुटतो. अग्निशिवाय दुसरे कोणतेच वैज्ञानिक रहस्य वेदांना माहीत नाही. या पाश्र्वभूमीवर +वेदांकडे चला+ ही दयानंद सरस्वतींसारख्या वेदाभिमान्यांची हाक प्रगतीकडे नेण्याऐवजी उलट्या दिशेने मानवाच्या आदिम अवस्थेकडे नेणारी ठरते.

    ReplyDelete
  11. वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
    १ श्रौत यज्ञ
    २. स्मार्त यज्ञ
    स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
    यज्ञात बळी दिले जाणारे पशु
    यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१. बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२. ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
    ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
    वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो.

    ReplyDelete
  12. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
    आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
    न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
    अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.
    यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.

    ReplyDelete
  13. आपस्तंभ सूत्र काय म्हणते?
    आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
    धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०)
    अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)
    मनुस्मृतीतील पुरावे
    ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
    प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
    स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।।
    (मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
    याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
    न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
    (मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
    असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :

    ReplyDelete
  14. प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
    देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
    अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
    प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
    या वेदविहिता
    हिंसा न सा हिंसा प्रकीत्र्तिता ।।
    अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
    लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
    बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांनी गोमांस खाल्ले टार तुमच्या का पोटात दुखते तुम्हीही टेच करता त्यांची मर्जी मानत आले खाल्ले नहिटार नहीं खाल्ले

      Delete
  15. मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय. मधुपर्क म्हणजे आदरातिथ्य. आपले नातेवाईक, श्रेष्ठी जण, आदरणीय व्यक्ती इ. कोणीही घरी आले तरी आपण आजही आदरातिथ्य करतो. वैदिक आर्य संस्कृतीत आदरातिथ्य विधिपूर्वक करण्याची प्रथा होती. त्याचे विशिष्ट नियम आश्वलायनाचार्याने सांगितले आहेत. प्राचीन काळचा हा मधुपर्क आता मूळ रूपात दिसून येत नाही. तथापि, त्याचे अवशेष वैदिक वाङ्मयात तसेच अलिकडेपर्यंत रूढ असलेल्या चालिरितीत दिसून येते. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो.
    मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे मिश्रण अशी दिशाभूल करणारी माहिती ब्राह्मणवादी देत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की, मांसाशिवाय मधुपर्क होतच नाही. हे मांसही गायीचेच असले पाहिजे, असा स्पष्ट आदेश आश्वलायनाने दिला आहे. अश्वलायनाच्या गृह्यसूत्रात मधुपर्कावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. गृह्यसूत्राच्या पहिल्या अध्यात, २४ व्या खंडात हा सर्व भाग येतो. या खंडातले २, ३ आणि ४ क्रमांकाची सूत्रे सांगतात :
    सूत्र : स्नातकायोपस्थिताय ।।२।।
    सूत्र : राज्ञेच ।।३।।
    सूत्र : आचार्यश्वशुरपितृव्यमातुलानां च ।।४।।
    अर्थ : घरी आलेला स्नातक म्हणजेच विद्याध्यन करणारा विद्यार्थी, राजा, आचार्य म्हणजेच गुरू, सासरा, चुलता qकवा मामा यांना मधुपर्क पूजा द्यावी.
    गाय मारल्याशिवाय मधुपर्क पूर्ण होत नाही असा आदेश देणारी आश्वलायनाची ही पाहा काही सूत्रे :
    सूत्र : आचांतोदकाय गां वेदयंते ।।२३।।
    अर्थ : आचमन केलेल्याला गाय निवेदन करावी.
    सूत्र : हतो मे पाप्मा पाप्मा मे इत इति जपित्वोमकुरूतेति कारयिष्यन् ।।२४।।
    अर्थ : प्रतिग्रहकरत्याच्या मनात गाय मारण्याची इच्छा असेल तर +हतो मे पाप्मा पाप्मा मे हत: + हा मंत्र जपावा. +ओमकुरुत+ म्हणून गाय मारण्याची आज्ञा द्यावी.
    सूत्र : नामांसो मधुपर्को भवति भवति ।।२६।।
    अर्थ : मांसाखेरीज मधुपर्क होत नाही
    या सूत्रातील शेवटचे २६ क्रमांकाचे सूत्र अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे आहे. मांसाखेरीज मधुपर्क म्हणजेच पाहुणचार नाही, असा स्पष्ट शास्त्रादेश ब्राह्मणांसाठी देण्यात आला आहे. त्या आधीच्या २५ व्या सूत्रात गाय मारण्याची इच्छा नसल्यास उत्सर्ग करण्याची आज्ञा आहे. उत्सर्ग म्हणजे गाय महाजनांच्या खर्चाने चालणारया पांजरपोळात नेऊन सोडणे. एका अर्थाने तिला जीवदान देणे. २५ वे सूत्र म्हणते की, माता रुद्राणां दुहिता वसुनामिति जपित्वोमुत्सृजतेत्युत्स्त्रक्ष्यन् ।। याचा अर्थ असा की, गायीचा उत्सर्ग करण्याची इच्छा असल्यास +माता रुद्राणाम दुहिता+ या मंत्राचा जप करून ओमउत्सृजत असे म्हणून उत्सर्ग करण्यास सांगावे. २५ व्या सूत्रावरून आपला असा समज होतो की, गायीला सोडले म्हणजे वैदिक सभ्यतेत दयाधर्म यास स्थान आहे. पण तसे होत नाही. पुढचाच श्लोक सांगतो की, +नामांसो मधुपर्को भवति भवति+ या सूत्रावरील भाष्यकार सांगतात की, गाय पांजरपोळात सोडल्यानंतर दुसरे जनावर मारून त्याच्या मांसाने मधुपर्क करावा.

    ReplyDelete
  16. वैदिक धर्मात दयेला कोणताही थारा नाही. आज हिंदू म्हणवल्या जाणारया धर्मात जी काही भूतदया आहे, ती बौद्ध व जैनांच्या रेट्यामुळे आली आहे. शास्त्राच्या दृष्टीने सर्वाधिक मान्यताप्राप्त असलेल्या याज्ञवल्क्याच्या१ व्यहाराध्यायात पुढील श्लोक आहे :
    प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
    देवान पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
    त्या काळी म्हातारी जनावरे सांभाळणे अवघड होते. त्यामुळे त्यांचा प्रोक्षणविधि करून या जनावरांची तीन प्रकारे विल्हेवाट लावावी असे हा श्लोक सांगतो. हे तीन प्रकार असे १) ही जनावरे अनुस्तरणी करिता म्हणजे माणसाच्या अंत्यविधीसाठी, अगर श्राद्धासाठी वापरावी २) राजगवी म्हणजेच राजाच्या हवाली करावी. ३) खाण्यासाठी ठार मारावी. खाण्यासाठी प्राणी मारल्यास दोष लागत नाही. मांस भक्षण मद्यपान आणि स्त्रीशी संभोग केल्याने दोष लागत नाही, असे मनुने सांगितल्याचे आपण +गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!+ या प्रकरणात पहिलेच आहे२. याशिवाय वेदाने सांगितलेल्या कर्मासाठी प्राणी मारल्यास त्याला हत्या समजू नये, असा शास्त्रादेश असल्याचेही आपण याच प्रकरणात पाहिले आहे३ .
    बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेच्या रेट्यानंतर वैदिकांनी आपल्यात थोडेसे बदल करून हिंसा कमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, हिंसा पूर्णपणे संपविली नाही. यासंबंधी मनुस्मृती म्हटले आहे की :
    मधुपर्के च यज्ञेच पितृदैवतकर्मणि ।
    अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रवीन्मनु:
    अर्थ : मधुपर्क म्हणजे पाहुणचार, यज्ञ व श्राद्ध या विqधमध्येच पशु मारावेत. अन्यत्र ते मारू नयेत.
    याचाच अर्थ मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे सात्विक मिश्रण, असे जे सांगताना ब्राह्मण खोटे बोलत असतात. आश्वलायनाच्या गृह्यसूत्रातील हे सर्व नियम ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे ब्राह्मणांच्या लग्नसमारंभादि विधित पूर्वी गाय मारली जात होती, हे सिद्ध होते. गोमांसापासून बनविलेला मधुपर्काचा सोपा अर्थ म्हणजे गोमांसेचे सूप होय. हे ब्राह्मणांकडून श्रद्धापूर्वक प्राशन केले जात असे. मधुपर्काचे तीन भाग करून ते पिऊन घ्यावेत, असे आश्लायन सांगतो.
    आश्लायनाचे यासंबंधीचे सूत्र असे :
    विरोजो दोहोऽसीति प्रथमं प्राश्नीयात् । विराजो दोहमशीयेति द्वितीयम् । मयि दोह: पद्यायै विराज इति तृतियम् ।। खंड २४. सूत्र १६
    अर्थ : +विराजो दोहोसि+ हा मंत्र म्हणून पहिला भाग प्यावा. +विराजो दोहमशीय+ हा मंत्र म्हणून दुसरा भाग प्यावा. +मयि दोह: पद्यायै विराज:+ हा मंत्र म्हणून मधुपर्काचा तिसरा भाग प्यावा.
    गायीच्या मांसापासून बनविलेले हे सूप वैदिक ब्राह्मणांना अमृतासमान प्रिय होते. आश्वलायनाच्या पुढच्या सूत्रावरून हे स्पष्ट होते.
    अथाचमनीयेनान्वाचामति अमृताऽपिधानमसीति ।। खंड २४. सूत्र २०
    अर्थ : नंतर +अमृततापिधानमसि+ हा मंत्र म्हणून शेवटचे आचमन करावे.
    अहिंसावादी धर्माचा रेटा वाढल्यानंतर कालांतराने मधुपर्कामधून गाय बाद झाली. गायीच्या जागी बकरयाचा कल्प सांगितला गेला. म्हणजेच गायी ऐवजी बकरा कापून मधुपर्क गेला जाऊ लागला. संस्कारकौस्तुभ या ब्राह्मणी ग्रंथात +गोप्रतिनिधित्वेन छाग आलभ्यते+४ असे म्हटले आहे. याचाच अर्थ गायीचे प्रयोजन जाऊन बकरयाची योजना येथे केलेली दिसते. अहिंसावादाचा आणखी रेटा वाढल्यानंतर बकरा कापण्याची प्रथाही बंद झाली. आता ब्राह्मणांच्या लग्नात विहिणीस +भेट बकरा+ म्हणून एक रूपया दिला जातो. गायीचे प्रयोजन मात्र अजूनही प्रतिकात्मक स्वरूपात सुरूच आहे. विवाह प्रसंगी कणकेची गाय करून ती कापली जाते.
    या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मूळचा वैदिक धर्म हा गायीचे मांस खाणारया रानटी लोकांचा धर्म होता. बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेमुळे लोक या धर्मांकडे आकर्षित होऊ लागले तेव्हा वैदिकांनी आपल्या धर्मातील ही हिंसा बंद केली. म्हणजे मूळ वैदिक धर्म संपला स्वत:ला वैदिक म्हणवणारे वस्तुत: बौद्ध आणि जैन धर्माचेच पालन करीत असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. हे गाय न खाण्याचे फ़याद शैव लोकांमले आले

      Delete
  17. वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार लिहिले आहेत. यांतील बहुतेक संस्कारांचे वेळी गाय किंवा बैल मारण्याची प्रथा वैदिक धर्मात होती. आर्यलोकांना शेतीचे विशेष ज्ञान नव्हते. ते पशुपालक होते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. जे माणसाचे मुख्य अन्न असते, तेच त्याच्या धार्मिक विधित महत्त्वाचा भाग ठरते. हे नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे. त्यामुळेच वैदिक धर्मात अंत्यसंस्काराचे वेळी गाय मारण्याची प्रथा दिसून येते. सोळावा म्हणजेच शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार होय. यात गाय मारून ती प्रेतासोबत जाळली जात असे. प्रेतासोबत जाळल्या जाणारया गायीला वेदसाहित्यात अनुस्तरणी असे म्हणतात. व गाय मारून जाळण्याच्या विधिस अनुस्तरणीकर्म म्हणतात. प्रेतासोबत गाय कापण्यामागे मोठी अंधश्रद्धा दिसून येते. अग्निमध्ये जे हवन केले जाते, ते आपल्या पितरांना मिळते, अशी वैदिकांची मान्यता होती. मृत्यू पावलेल्या माणसाला स्वर्गाच्या प्रवासात खायला मिळावे म्हणून गाय मारून आणि जाळून त्याच्यासोबत दिली जात असे.
    अनुस्तरणीकर्माचा विधि ऋग्वेदात, शुक्लयजुर्वेदाच्या ३५ व्या अध्यायात, तैत्तिरीय आरण्यकात असेच इतर अनेक सूत्र ग्रंथांत आहे१. गाय मारून तिच्या मांसाचा पिंड देण्यात यावा. मारलेल्या गायीची वपा म्हणजेच चरबी काढून तिने प्रेताच्या मुखास तसेच सर्व शरीरास आच्छादून टाकावे नंतर प्रेतास अग्नि द्यावा, असे या ग्रंथांतील उल्लेख सांगतात. गाय उपलब्ध होणे शक्य नसेल तर बकरीचा कल्प खुद्द ऋगवेवादातच सांगितला आहे२. कल्प म्हणजे पर्याय. ऋगवेदातील या ऋचेचा आद्य (आद्य म्हणजे सुरुवात.) असा :
    अग्नेर्वर्भ परि गोभिव्र्ययस्व० - ऋगवेद. ७.६.२१.
    ऋगवेदातील हाच मंत्र तैत्तिरीयारण्यकात (६ प्रपाठक, १ ला अनुवाक) प्रतिपादिला आहे. याशिवाय कलिवर्जप्रकरणसंबंधात +अग्निहोत्रं गवालंभम्+ असे एक वाक्य प्रसिद्ध आहे. +गवालंभम+ या शब्दाची फोड गव म्हणजेच गाय आणि आलंभम् म्हणजेच आलंभन अर्थात गाय मारून उपयोगात आणणे अशी आहे. याचाच अर्थ वैदिक धर्माच्या अगदी प्रारंभकाळापासून अनुस्तरणीकर्म प्रचलित होते.
    गाय स्मशानात नेण्याची पद्धती
    प्रेत स्मशानात नेतानाच अनुस्तरणी गाय नेली जावी. अनुस्तरणी गायीच्या गळ्यात किंवा पायात एक दोरी अडकवून ती प्रेताच्या दंडास बांधावी व ती अशा प्रकारे प्रेतासोबत न्यावी. स्मशानात ती कापावी. तिची चरबी काढून प्रेताच्या चेहèयासह सर्वांगावर पोतारावी. गायीचे अवयव मृतदेहाच्या अवयांवर जसे० पायावर पाय हृदयावर हृदय इ. ठेवावे. नंतर प्रेतास अग्नी द्यावा, असा सर्व प्रमुख ब्राह्मणी ग्रंथांचा आदेश आहे.
    मी येथे ऋग्वेद, तैत्तिरीयारण्यक किंवा इतर ब्राह्मणी ग्रंथांतील तरतुदींपेक्षा आश्वलायनाचार्यांनी लिहिलेल्या गृह्यसूत्रातील तरतुदींचेच विवेचन करणार आहे. ऋगवेदातील तरतुदी या तत्कालीन सर्व वर्णांसाठी होत्या. किमान त्रैवर्णिकांसाठी तर होत्याच होत्या. परंतु आश्वलायनाचार्याच्या गृह्यसूत्रातील तरतुदी या केवळ आणि केवळ ऋगवेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून गोहत्याबंदीसाठी थयथयाट चालविला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन हे धर्म तसेच आदिवासी जमाती यांना टार्गेट करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांचा हा खटाटोप चालू आहे. हे उपदव्याप कसे निरर्थक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचे पूर्वजच गायी कापून खात होते, इतकेच नव्हे तर त्यांचे अंत्यसंस्कारांसारखे विधिही गायीच्या मांसाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हते, हे दाखवून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच आश्वलायन गृह्यसूत्राचा आधार पुढील विवेचनासाठी मी घेतला आहे.

    ReplyDelete
  18. या पहा ग्रंथांतील अघोरी तरतुदी
    आश्वलायनाचार्याने आपल्या गृह्यसूत्रात गाय मारण्याचा आणि जाळण्याचा विधि फार विस्ताराने लिहिला आहे. चौथ्या अध्यायात खंड १, २ आणि ३ मध्ये अनुस्तरणीकर्मविधि आला आहे. आश्वलायनाने म्हटले आहे. यासंबंधीची सूत्रे आणि त्यांचा अर्थ पुढे देत आहे.
    खंड २
    सूत्र : अनुस्तरणीम् ।।४।।
    अर्थ : ज्या मादी पशूने प्रेताचे आच्छादन करितात ती अनुस्तरणी करावी. (अनुस्तरणी करावी म्हणजे प्रेताबरोबर मारून जाळावी)
    सूत्र : गाम् ।।५।। अजां वैकवर्णार्मं ।।६।।
    अर्थ : गाय किंवा एक रंगी शेळी अनुस्तरणी करावी.
    सूत्र : कृष्णामेके ।।७।।
    अर्थ : काळी शेळीही अनुस्तरणी करता येऊ शकेल, असे काही ऋषींचे म्हणणे आहे.
    सूत्र : सव्ये बाहौ बद्ध्वाऽनुसंकालयन्ति ।।८।।
    अर्थ : पशुचा पुढला डावा पाय बांधून त्यास प्रेताचे मागे न्यावे.
    सूत्र : अन्वंचोऽमात्या अघोनिवीता: प्रवृत्तशिखा ज्येष्ठप्रथमा: कनिष्ठजघन्या: ।।९।।
    अर्थ : आणि त्या पशूचे मागून प्रेताच्या बांधवादिकांनी माळेसारखे जानवे करून व शेंड्या मोकळ्या सोडून ज्येष्ठ पुढे व धाकटे मागे या क्रमाने चालावे.
    खंड ३
    गाय मारल्यानंतर चे विधि पुढील प्रमाणे :
    सूत्र : अनुस्तरण्या वपामुत्खिद्य शिरो मुखं प्रच्छादयेदग्नेर्वर्म परि गोभिव्र्ययस्वेति ।।१९।।
    अर्थ : अनुस्तरणीची म्हणजेच मारलेल्या गायीची वपा म्हणजे चरबी काढून त्या चरबीने प्रेताचे शिर मुखसुद्धा झाकावे. हे कर्म करताना +अग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ).
    सूत्र : वृक्का ऊद्धृत्य पाण्योरादध्यादति द्रव सारमेयौ श्वानाविती दक्षिणे दक्षिणं सव्ये सव्यम् ।।२०।।
    अर्थ : वृक्क म्हणजे गायीच्या कुशीतील मांसाचे गोळे काढावे. प्रेताच्या उजव्या हातावर उजवा वृक्क व डाव्या हातावर डावा वृक्क ठेवावा. हा विधि करीत असताना +अति द्रव०+ (ऋ. ७।६।१५) ही ऋचा म्हणावी. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
    सूत्र : हृदये हृदयम ।।२१।।
    अर्थ : प्रेताच्या हृदयावर कापलेल्या गायीचे हृदय ठेवावे.
    सूत्र : सर्वां यथांग विनिक्षिप्य चर्मणा प्रच्छाद्येममग्ने चमसं मा वि जिव्हर इति प्रणीताप्रणयनमनुमंत्रयते ।।२४।।
    अर्थ : अनुस्तरणीचा म्हणजेच कापलेल्या गायीचा जो जो अवयव असेल तो तो प्रेताच्या त्या त्या अवयवावर ठेवावा. गायीचे कातडे प्रेतावर पांघरून प्रेत पूर्ण झाकून टाकावे. हा विधि करीत असताना +इममग्ने०+ (ऋ. ७।६।२१) हा मंत्र म्हणावा. (पुर्ण मंत्रासाठी पाहा संदर्भ)
    या पूढील खंडांत प्रेतास अग्नी देण्याचे विधि, अस्थिंची विल्हेवाट व सुतकादि प्रथांचे पालन या विषयी लिहिण्यात आलेले आहेत.
    दयानंद सरस्वती यांच्या +वेदांकडे चला+ या हाकेचे पालन करावयाचे झाल्यास आपल्याला अंत्यसंस्कारांसाठी गायी कापाव्या लागतील. हे आजच्या ब्राह्मणवाद्यांना चालणार आहे का? दयानंद सरस्वती प्रणित आर्यसमाज वेदांतील अनुस्तरणीविधीचे पालन करून अंत्य संस्कारांत गाय कापतो का? या प्रश्नांची उत्तरे हिंदूत्चाचा बुरखा पांघरलेल्या ब्राह्मणवाद्यांनी द्यायला हवीत.

    ReplyDelete
  19. वैदिक लोकांबद्दल तसेच त्यांच्या धर्माबद्दल अतिशय खरी आणि सुंदर माहिती!

    धन्यवाद! मित्रा!

    असेच लिहित रहा!

    ReplyDelete
  20. आपण हि उद्बोधक माहिती देऊन फारच कमाल केलीत पण हे सगळे आम्हाला माहित आहे. जर नवीन काहीतरी सांगा आता हेच बघा कि आपल्याकडे अघोर किवा तांत्रिक हा एक प्रकार आहे ते लोक माणसाचे मांस खातात, प्रेतांबरोबर संभोग करतात म्हणून ते सर्वमान्य होते असे होत नाही. वेदात दिलेले आहे ते सर्वमान्य होते असे आपण का समजता? ती बाहेरून आलेल्या आदिवासींची एखादी संस्कृती असू शकेल. आत्ताही नाही का आदिवासी लोक अग्नी पेटवून त्याभोवती नृत्ये करत!! त्यातले काही मंत्र सापडले म्हणून साप समजून भुई बदवाण्याला काय अर्थ. उगाचच द्वेष मूलक बुद्धी ठेवली कि सगळे असेच दिसू लागते. आता फक्त हे सांगा कि शैव धर्म काय ते सांगा? तो ब्राम्हणांचा धर्म का असू शकत नाही? त्याचे काही पुरावे नाहीत का? ते वैदिकांपासून पृथक करून दाखवू शकताल का? Avinash

    ReplyDelete
  21. असेच तुम्ही पारशी लोकांचे मृत्युसंस्कार सुद्धा वाचू शकता. ते प्रेताबरोबर ३ दिवस कुत्र्याला ठेवतात. नंतर काय काय गुंडाळतात. शेवटी त्यावर सूर्याचा प्रकाश अराश्याच्या माध्यमातून पाडतात व ते जाळतात.. ते पूर्ण जाळायला कित्येक दिवस लागतात जरा माहिती वाचा.

    ReplyDelete
    Replies
    1. pasrshi lok dead body gidhadana(vulture) la khayala detat.

      Delete
  22. मित्रांनो, मी महात्मा गांधी यांचे "हिंदू धर्म म्हणजे काय ?" हे पुस्तक वाचले. आणि मगच संजय सोनवणी यांचे हिंदू धर्माचे शैव रहस्य हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. असे मी मुद्दामून केले कारण काही लोक महात्मा गांधी यांना हिंदू धर्मामधील अडथला असे मानतात परंतु हे साफ चुकीचे आहे. महात्मा गांधी यांनी तत्कालीन परिस्थितीतही हिंदू धर्माची व्याख्या आणि जी व्याप्ती सांगितली आहे त्याला खरेच तोड नाही. परंतु त्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांना वैदिक धर्मामधील एका हिंसक व्यक्तीने मारले त्यांची हत्या केली. ते निन्दनियच आहे. मी नेहमी विचार करायचो कि महात्मा गांधीनी नेहमी समतेचा विचार केला, सहिष्णुतेचा विचार केला तर मग हिंदू धर्माविषयी त्यांचे मत काय आहे ? त्यांचे मत मला त्यांच्या "हिंदू धर्म म्हणजे काय ?" या पुस्तकात वाचायला मिळाले. त्याच पुस्तकात त्यांनी हिंदू धर्माची प्रचंड व्याप्ती असलेली व्याख्या दिलेली आहे. मुळात त्यांनी वैदिक तत्व असलेल्या चातुर्वर्ण ह्याला मात्र फाटा दिलेला आहे. त्याचा निषेध केलेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले आहे कि इतर सहिष्णू तत्वाच्या विचारात घेता हे (वर्णभेदाचे, अस्पृश्यतेचे) तत्वन्यान हिंदू धर्माचे असूच शकत नाही. परंतु हे तत्व हिंदू धर्मात आले कुठून याचा शोध मात्र त्यांनी घेतलेला दिसून येत नाही. असो.



    आता आपण संजय सोनवणी सरांनी लिहिलेल्या महत्वपूर्ण अशा "शैव धर्माचे हिंदू रहस्य" याविषयी बोलू. हिंदू धर्म म्हणजे भारत वर्षात सिंधू नदीकाठी असलेल्या हडप्पा संस्कृती पासूनची संस्कृती आहे. अतिशय प्राचीन अशी हि संस्कृती आहे ज्याचे अवशेष भारतात आजही सापडतात. त्या वेळी आपण एकाच धर्मात बांधले गेलो तो म्हणजे शैव धर्म होय ! हि संस्कृती अतिशय प्रगतशील होती. आणि तिची व्याप्ती संपूर्ण भारत वर्षात पसरली होती हेही तितकेच खरे आहे मित्रांनो. परंतु हाच तो शैव धर्म जो आजचा भारतीयांचा हिंदू धर्म आहे! म्हणजे आपल्या हिंदू धर्माला इतकी प्राचीन परंपरा आहे आणि इतिहासही आहे. ( कार्बन डेटिंग केलेले आजही अवशेष मिळत आहेत आणि मिळाले आहेत). शैव धर्मीय लोक मूर्ती पूजक होते. शैव धर्मीय लोक भगवान शंकरास मानत होते म्हणूनच ते लिंगाची पूजा करीत असत. आजही हजारो वर्षे पूर्वीचे शिवलिंग सापडत आहेत. हे याचेच पुरावे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला जायचा. स्त्रियांना आदिशक्तीचे प्रतिक मानले जायचे. (म्हणूनच भगवान शिव आणि पार्वती मत अर्धनारी-नटेश्वर च्या रुपात प्रकट झालेली दिसतात). आता आपण शिवपुत्र गणेश बद्दल पाहूयात. गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापासून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. अर्थात अवैदिकांचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. मूर्ती पूजा आपल्या शैव-हिंदू परंपरेतील आहे. आणि ती अजूनही आपण सर्व जपत आहोत.

    ReplyDelete
  23. आता आपण सनातन वैदिक धर्म पाहूयात. यांचे तत्वन्यान नेमके शैव धर्मियांच्या उलट होते. वैदिक धर्मीय लोक यज्ञ पूजा करीत होते. यज्ञामध्ये अनेक पशु बळी दिले जायचे. वैदिक धर्मीयांमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा देत असत.
    सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शैव-हिंदू धर्माचा बुरखा घालूनच वैदिक धर्मीय लोक किती तरी वर्षापासून वावरत आहेत. परंतु त्यांची वैदिक विधी मात्र सोडायला तयार नाहीत. यातून लोकांमध्ये गैरसमज पसरतात कि वैदिक लोकांची संस्कृती तीच शैव-हिंदू लोकांची. म्हणूनच खरा हिंदू धर्म म्हणजे काय ? हे लक्षात घेणे, त्याचा अभ्यास करणे अत्यंत आगत्याचे झालेले आहे.

    शैव धर्माविषयी म्हणजेच मूळ-हिंदू धर्माविषयी आपल्याला अधिक माहिती होते ते संजय सोनवणी लिखित "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकातून ! अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन लेखकाने या पुस्तकात मांडले आहे. प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचावे असे आहे.

    एक वेळ अवश्य वाचा हे पुस्तक. कारण शैव-हिंदू धर्म आपला पूर्वापार चालत आलेला धर्म आहे. आणि वैदिक धर्म जो या धर्माचे लचके तोडत आहे त्याला वेळीच आळा बसवला जावा.

    शंकर माने.

    ReplyDelete
  24. शिव धर्म हा पुरातन आहे. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीच्या वेळेस व त्याअगोदर हा धर्म होता.
    हा धर्म सनातन वैदिक धर्माच्या अगोदरचा आहे. भारतीय उपखंडात आर्यांचे आक्रमण झाल्याने येथील शिव संस्कृतीतील बहुजनांना त्यांच्यावर ज्ञान बंदी लावून कपटाने गुलामीत टाकले .या अज्ञान बहुजनांवर त्यांच्या सनातन वैदिक धर्माचे नियम लाऊन त्यांचे शोषण आज पर्यंत सुरूच आहे .ब्राम्हण येथील बहुजनांचे देव झाले. सनातन वैदिक धर्म हा ब्राम्हणांचा आहे. आमचा नाही. ब्राम्हणांचा व आमचा धर्म एक असता तर त्यांनी आम्हाला गुलामीत टाकले असते का?
    आमचे लोक जरी स्वतःला हिंदू म्हणत असले तारी हिंदू हा धर्मच नाही. ती ब्राम्हणाची गुलामगिरी आहे. शिव धर्म हा शिव संस्कृतीतल्या लोकांनी स्थापन केला आहे .म्हणजे त्याची मानवतेच्या व न्यायाच्या दृष्टीकोनातून रचना केली आहे. शिव धर्म हा देवांनी स्थापला नाही. सनातन वैदिक धर्म हा देवांनी [ब्राम्हणांनी] आमच्यावर लादलेला आहे {ब्राम्हण हे स्वतःला देव म्हणतात व दुसऱ्यांना दानव म्हणतात }.

    धन्यवाद.

    Hrishikesh Bibrale

    ReplyDelete
  25. फक्त ब्राम्हणांनी गुलामीत टाकले का क्षत्रियांनी सुद्धा.. आपले मराठे काय करत आले कित्येक हिंदू राजे इस्लामी राजवटीचे मंडलिक होते..पण त्यांच्याविरुद्ध हे बोलणार नाहीत.. दम लगतो.. आणि मग याचने वाचन कोण करणार उगाच काहीतरी!!

    ReplyDelete
  26. सध्या शिव आणि वैदिक अश्या दोन्ही धर्माचे पालन करणारे लोक आहेत, त्यातल्या नेमक्या कशाने त्यांचे क्षेम चालले आहे हे त्यांनाही माहित नाही. त्यामुळे कोणते सोडावे व परिणाम काय होतील हे भय असणारच. वैदिक परंपरांना लोक चिकटून राहण्याचे भय हेच कारण आहे. जोवर हे भय तुम्ही दूर करू शकत नाही तोवर वैदिक धर्माचे काहीही वाकडे कोणीही करू शकत नाही. असे अनेक धर्म देशात आले व गेले. पण जो पूर्वापार चालत आलेला मिश्र धर्म आहे तोच टिकून राहिला. ३००० वर्षे झाली पण काय बदल घडला? किती संत महात्मे सांगून गेले. या भयाचे काय करायचे ते सांगा..?
    Avinash Pataskar

    ReplyDelete
    Replies
    1. Vaidik sanskruti madhye badal zalela nahi he saf chukiche ahe. To dharm veloveli badalat ala ahe.

      Delete
  27. जे चांगले ते सगळे आमचे.. वा रे हुशार.. बाकी जे काही राहिले ते तुमचे.. आत्ता बहुपर्यायी उत्तरे मिली म्हणून हे सगळे..

    ReplyDelete
  28. वैदिक आणि अवैदिक शेती यावर काथ्याकुट करण्यापेक्षा कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्रात ६० वर्षे आणि राज्यात १५ वर्षे जो शेतकरी बनून धुमाकूळ घातला आणि धरणात मुतायची भाषा केली यावर संशोधन केले असते तर लावासा.. ७० हजार कोटींचा घोटाळा.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या. गप्प आबा आणि बाबा का? धोरण लकवा. बाईंच्या पदराला धरून कसे चालायचे. आणि निवडणुका आल्या कि बेडूक कसे डराव डराव करतात करतात ते सांगायचे. वर ह्यांनी अस्त्रोसिती ने केस करू म्हणून गाडीखालून चाललेल्या कुत्र्याच्या भूंक सदृश्य धमक्या द्यायच्या.. असले तत्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा. अरे आम्ही सुद्धा राहिलो दलित बनून. आणि भोगले सगळे. पण लाज वाटते असले भंपक विचार ऐकायची ज्याचा आजच्या दिवसात काहीच फायदा नाही

    ReplyDelete
  29. वरची प्रतिक्रिया खास मोडी ब्रिगेडच्या तेली बांधवाने दिलेली अने हे साभार. प्रस्तुत

    ReplyDelete
  30. Gapp bas tathakathit bamana!

    ReplyDelete
    Replies
    1. बोललो ना तू तुझे पोस्ट खोलून बस. मी जातीच्या सर्तीफिकेत ची सुरकांडी करून आत टाकतो. तुमचा A to Z इतिहास काही झाले तरी शेवटी बमानंवारच घसरतो हे असे का रे बाबा? म्हणजे आता जे गुंठामंत्री आहेत ते सगळे बामनाच ना. सगळे ठेके ते आपल्याच जात भाईना देतात ते वरच्या " ठेकेदारांचा पक्ष" या लेखात लिहिले आहे. तुम्ही उगाच इतिहास मारून मुटकून लिहायचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा कविता, आत्मचरित्र, ललित असले प्रकारच करा. नो उल्लू बनाविंग

      Delete
    2. गप्प बस बोल भिकाऱ्या..

      Delete
  31. महाखोटारड्या !! गप्प बस बोल भिकाऱ्या..
    हरामखोर बामना!!

    ReplyDelete
    Replies
    1. यम यामिच्या संवादाचे दुसर्याने टाकलेले हाडूक चघळताना जर विचार कर मुर्ख माणसा सगळ्याच धर्मात तसेच आहे, अडम आणि इव्ह, आदम आणि हव्वा हे एकाच जोडे पृथ्वीवर अवतरले. मग त्यांना होणारी मुले मुली एकमेकांचे नात्याने कोण? किवा वडिलांचे/ आईचे मुलामुलींशी नाते कोणते? मग पुढची पिढी जन्माला कशी आली? आता itar धर्माच्या खोलात शिरत नाही.. गप्प बस-भाड्याच्या paise nahit ani challa..

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...