Thursday, November 6, 2014

आपणही सुंदर होऊयात....!

केवळ बदलत्या नैसर्गिक पर्यावरणाने जागतीक संस्कृत्या, साम्राज्ये, अर्थव्यवस्था कशा देशोधडीला लावल्या आहेत याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल कि आम्ही अखिल मानवजात त्यातून काहीही शिकलेलो नाही.
समाजव्यवस्था आधी विकलांग होते ती जगण्याची साधने कमी झाली की...
तेंव्हाच पुरोहितशाही प्रबळ होत जाते कारण ती विकलांगांची मानसिक मागणी असते आणि संधीसाधुंची पर्वणी असते....
निसर्गापेक्षा माणुस प्रबळ असू शकत नाही हे आमच्याच अहंकारामुळे आम्हाला समजले नाही...
आणि जर देव प्रबळ असता तर आमचा स्वत: साक्षात देव आणि पुरोहितही भिकारी नसता हेही आम्हाला समजले नाही...
त्यांना भिकारी बनवायच्या नादात आमचा मानवी समाज इतिहासकाळापासून स्वत:चे भिकारपण छपवत गेला....
पर्यावरणाला मात्र तो तो निरंकुशपणे ओरबाडत राहिला. आता तर कळस झाला आहे.
भिकारीपणाला संपवा...ओरबाडेगिरीलाही संपवा...
आपण आपली पृथ्वी सुंदर करुयात....
आपणही सुंदर होऊयात....!

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...