Monday, May 27, 2013

शिक्षणव्यवस्थेची मूल्याधारित पुनर्रचना आवश्यक!


आपल्या गुणाधारित शिक्षणव्यवस्थेमुळे प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरते हे आपण पाहिले. या व्यवस्थेचा सर्वात मोठा दोष म्हणजे विद्यार्थी हा घोकंपट्टी करणारा भारवाही हमाल बनुन जातो व त्याची नैसर्गिक कौशल्ये/कल दुर्लक्षित राहतात. यातुनच नवनिर्मितीची क्षमता क्रमश: घटवली जाते. भारतियांत नवनिर्मितीची क्षमता नव्हती म्हणुन आपण ज्ञानविज्ञानात मागे पडलो ते पडलोच याबाबत आपण मागील लेखात चर्चा केली. भारतीय एकुणातीलच व्यवस्थेने नवनिर्माण क्षमतेचे मानसिक अपहरण केले होते हेही आपल्या सहज लक्षात येईल. दैववाद हे त्याचे कारण नसून प्रत्येक समाजघटकातील मुलांना आधी पोटार्थीच कसे बनवता येईल अशी शिक्षणपद्धती व मूल्यपद्धती जोपासली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल.

आपला पुरोहितवर्गही "भिक्षुक" म्हणुन अभिमानाने मिरवत असे तर इतरजण बालवयापासुनच परंपरागत धंद्यांत आंधळेपणे ढकलले जात असत. यात प्रत्येकात कोणत्या ना कोणत्या नवनिर्मितीची क्षमता असली तरी तशी संधी मिळणे अशक्यप्रायच होते! स्वतंत्र विचार करण्यासाठी अर्थव्यवस्था अनुकूल अथवा प्रतिकूल ठरू शकतात हे आपण जागतिक इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येईल. दहाव्या शतकानंतरची भारतीय अर्थव्यवस्था आणि तत्पुर्वीची अर्थव्यवस्था व नवनिर्मिती यात आपण तुलना केली तर हा मुद्दा सहज लक्षात येइल.

वर्तमान युगात आपल्या शिक्षणपद्धतीने खरे तर इतिहासापासून धडा घेत स्वतंत्र विचार करु शकणारी, नवनिर्मितीची प्रेरणा केंद्रीभुत ठेवत ज्ञानाधारित शिक्षणव्यवस्था अंगिकारणे आवश्यक होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट आपली शिक्षणव्यवस्था ही बेरोजगार निर्मितीचे मोठे कारखाने बनले. बेरोजगार शिक्षितांकडे दुसरे जगण्याचे कौशल्यच शिक्षणपद्धतीने दिले नसल्याने सुशिक्षितापेक्षा अशिक्षितांतच जगण्याची कौशल्ये अधिक आढळतात असे शिक्षणतज्ञच म्हणत असतील तर यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गुणाधारित शिक्षणपद्धती निर्मितीक्षमतेला मारक आहे हे उघड आहे. उदा. माझा कल वा आवड इतिहासाकडे आहे व मला गणितात अथवा विज्ञानात गती नाही. अशा परिस्थितीत मी गणित अथवा विज्ञान शिकणे व त्यात पास होणे अनिवार्य असावे काय? समजा मारुन मुटकून घोकंपट्टी करत मी त्यात पास जरी झालो तरी त्याचा, मला कसलेही आकलनच झाले नसल्याने, भावी जीवनात काही उपयोग आहे काय? मला सोडा त्या आकलनरहित अवस्थेत जेही विषय पास झालो त्यांत मी त्यात अधिकची भर घालत समाजाला उपयोगी बनू शकतो काय? यात माझे जी आवड, इतिहास, त्याचे काय होईल? इतर विषयांत पास होण्याच्या दडपणाखाली मला नाईलाजाने इतिहासाकडे दुर्लक्ष करावे लागणार नाही काय? म्हणजे ज्यात मला आवड आहे त्यात मला अधिकाधिक प्राविण्य (अगदी शिक्षणपद्धतीत दिलेल्या पाठ्यक्रमाबाहेर जात) मिळविण्याची संधी मिळणार आहे काय? त्या आवडीच्या विषयावर अधिक चिंतन मनन आणि नवा दृष्टीकोन स्वतंत्रपणे जोपासण्याची मला या पद्धतीत संधी आहे काय? या पद्धतीत माझा आणि शिक्षकांचा वेळ/परिश्रम व शासन (आणि माझे पालक) खर्च करत असल्याने तो खर्च ज्यात मला रस नाही त्यावर वाया घालविण्यासारखे नाही काय?

हे इतिहासाचे उदाहरण सर्वच विषयांबद्दल लागू आहे. पाठ्यक्रमाबाहेर असलेल्या पण जगण्याची साधने असलेल्या विषयांत...म्हणजे चित्रकला, लोहारकाम, कृषिशास्त्र, सुतारकाम इ. मद्धे एखाद्याला रुची असेल वा अंगभूत कौशल्य असेल तर ते कौशल्य प्राविण्यात बदलवत विद्यार्थ्याला त्यात तज्ञ बनवण्यासाठी अनुकूल अशी आपली शिक्षणव्यवस्था आहे काय?

एक अथवा दोन आवड असलेल्या विषयांतच संधी देत, पास होण्याची त्या विषयांची मर्यादा वाढवत अन्य विषयांतील गुण कितीही कमी अथवा जास्त असले तरी विद्यार्थ्याला पुढील वर्गात पाठवले तर काय अनर्थ होणार आहे काय?

हे प्रश्न अशासाठी विचारले कि यावर गंभीरपणे चिंतन करण्याची गरज आहे. यात असा प्रतिप्रश्न उपस्थित होवू शकतो तो हा कि विद्यार्थ्याचा नेमका कल कसा ठरवायचा? आज ज्या विषयाची आवड वाटते त्याची आवड पुढेही राहिलच हे कशावरुन?

तसेही आता सातवीपर्यंत विद्यार्थी पास होण्याचा तणाव नसल्याने निर्धास्त असतात. या सात वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याचा कल, आवड, जिज्ञासा नेमकी कोणत्या विषयात आहे हे शिक्षकांना (व पालकांनाही) समजणे अशक्य नाही. त्याला मानसशास्त्रीय चाचण्यांचीही जोड देता येवू शकते. याच काळात ज्यात कल वाटतो त्या विषयांत अधिकचे (अभ्यासक्रमाबाहेर जात) स्वातंत्र्यही देता येवू शकते. शेवटच्या परिक्षेत कल असलेल्या विषयांतील मार्कच गृहित धरुन त्याला त्याच विषयात (अथवा एकापेक्षा अधिक विषय असतील तर निवदसंधी देत) माध्यमिक, उच्चमाध्यमिक व पदवी शिक्षण दिले तर काय होइल?

याचा सर्वात मोठा फायदा हा होईल कि विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदवी वयातच एरवी आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशक्य आहे असे अधिकचे प्राविण्य मिळवू शकेल. तज्ञ बनू शकेल. त्यातुनच नवनिर्मितीला वाव मिळु शकतो आणि देशात विविध विषयांतील व त्यांच्या शाखा-उपशाखांतील पारंगत अशा तज्ञांच्या फौजा उभ्या राहू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

या पद्धतीचा होणारा संभाव्य पण सर्वात महत्वाचा फायदा असा कि विद्यार्थ्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन आपली बांधणी करता येणे सहज शक्य आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्येक विद्यार्थी हा मानसिक कुंठेतून अपरिहार्यपणे जात असतो. केवळ गरजेपोटी जेंव्हा नको ते विषयही अभ्यासावेच लागतात, अधिकाधिक गुण मिळवत इतरांशीच्या स्पर्धेत अविरत संघर्षायमान रहावे लागते तेंव्हा मानवी व्यक्तिमत्वाचे आकुंचन होत विकासशील नव्हे तर स्पर्धाधारित नागरिक निर्माण होणे अपरिहार्य आहे. यातुन जी समाजव्यवस्था (राजकीय/आर्थिक/बौद्धिक) आकाराला येते ती तशीच संकुचित व परस्परांकडे स्पर्धेच्या भावनेने पिडीत झाल्याने नकारात्मक असते. आणि नकारात्मक मनोवृत्तीच्या समाजात नवनिर्मिती कशी होणार? विद्यार्थीदशेतच काय शिकायचे आहे याचे विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल तर कोणत्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे नागरिक आम्ही घडवणार आहोत?

आज शिक्षण पुर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नोक-यांसाठी स्पर्धा परिक्षा का द्याव्या लागतात? याचाच अर्थ आधी जे काही शिकले, मेरिटचे गुण मिळवले ते निरर्थक होते असे आम्हीच मान्य करतो असे नव्हे काय? दोनशे जागांसाठी दोन लाख अर्ज हा सध्याचा सरासरी नोकरी मागणारे आणि उपलब्ध नोक-या यांतील अवाढव्य तफावत दर्शवत नाही काय? या परिक्षा, त्यांतील नेहमीचे गोंधळ व जीवघेणी स्पर्धा यातून आपण निकोप समाज घडवत नसून हिंस्त्र आणि स्वार्थप्रणित नागरिक घडवत असतो असे नव्हे काय? जीवनाची श्रेष्ठ मुल्ये या निरर्थक स्पर्धात्मकतेमुळे हरपतात व आज आपली जी भ्रष्ट व्यवस्था उभी राहिलेली आहे तिला आपली शिक्षणव्यवस्थाच कारणीभूत नव्हे काय?

या जगात स्कोप नाही असा विषय नाही. एखाद्या क्षेत्रात संध्यांची निर्माण होणारी लाट ही चिरकालिक नसून तात्पुरती असते. त्यामुळे जे अशा लाटांवर स्वार आधी होतात ते फायद्यात जात असले तरी नंतरच्या झुंडी मात्र क्रमश: कशा तोट्यात जावू लागतात हे आपण आय.टी. क्षेत्राबाबतही पाहू शकतो. बरे या झुंडी स्वत:चे असे काही नवयोगदान देण्याच्या स्थितीत असतात काय? याचे उत्तर जवळपास नाही असेच असते...कारण तसे प्राविण्य त्याच्याकडे नसतेच.अशा शिक्षनपद्धतीत फक्त नोक-या मागणारे अधिक असतात तर नोक-या निर्माण करु शकणारे अत्यल्प. या परिस्थितीत राष्ट्राचा अर्थविकास होणे कसे शक्य आहे? ज्ञानविकासाची मग बातच नको!

त्यामुळे आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीचा फेरविचार करणे अनिवार्य असे बनले आहे. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व त्याचे स्वत:चे असे विकसित होवू शकणारे स्वतंत्र ज्ञानविषय आहेत हे मानसशास्त्रीय भान आपल्याला येणे अत्यावश्यक आहे. त्याचे भान ठेवतच तशी शिक्षणपद्धती बनवली गेली पाहिजे. राबवली गेली पाहिजे!

अन्यथा भारत ज्ञानकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आजवर ज्या भिक्षुकी अवस्थेत आहे त्यात पुढेही विषेष फरक पडणार नाही. जाग येईल तोवर आपली साधनसंपत्ती जवळपास नष्ट झाली असेल व आर्थिक दृष्ट्या आपण पुन्हा अराजकाने हिंस्त्र बनलेल्या मध्ययुगात फेकले गेलेलो असू याचे भान आपल्याला वेळीच आले पाहिजे.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
Read This also...

And this also!

Saturday, May 18, 2013

नाथयोगिनी मुक्ताबाई!



संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण एवढीच ओळख मुक्ताबाइंची नाही. चारही भावंडांना वैदिक धर्मव्यवस्थेने झिडकारले. अत्यंत छळ केला. तत्कालीन समाजव्यवस्थेत नाथ संप्रदाय हा समतेचा संप्रदाय म्हणुन अत्यंत प्रसिद्ध होता. निवृत्तीनाथ हे मुक्ताईचे थोरले बंधू. त्यांनी वैदिक व्यवस्था आपल्याला जवळ करत नाही हे पाहुन गहिनीनाथांकडुन नाथपंथाची दीक्षा घेतली. निवृत्तीनाथ आपल्या भावंडांचेही गुरू बनले. योगासाधनेने चारही भावंडांनी आपले व्यक्तिमत्व तेजस्वी आणि आत्मज्ञानाने सम्रुद्ध बनवले. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहून नाथ तत्वज्ञानाला नवी झळाळी प्राप्त करुन दिली.

मुक्ताबाईंच जन्म १२७९ मधील. चार भावंडांत त्या सर्वात धाकट्या...आणि म्हणुन सर्वांच्या लाडक्याही. मुक्ताबाईंना अवघे एकोणिस वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु नाथ योगामुळे हे आयुष्य ज्ञानाने समृद्ध आणि अत्यंत सुखमय असे बनवण्यात मुक्ताबाई यशस्वी झाल्या. निवूत्ती-ज्ञाना-सोपानासारखे उत्तुंग आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे बंधु असतांनाही त्यांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व लोप पावू दिले नाही. सुशीला कुप्पुस्वामी म्हणतात, मुक्ताबाई हे एक प्रगल्भ आणि आत्मविश्वासाने भरलेले स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. स्त्री असुनही दीनवाना स्त्रीभाव तिच्या एकाही अभंगात आढळुन येत नाही. सगुण भक्तीपेक्षा निर्गुणाच्या प्रतीतीला तिने महत्व दिले आणि हाच तिच्या योगिनी असल्याचा महत्वाचा पुरावा आहे. चांगा वटेश्वरासारख्या तत्कालीन महान योग्यालाही ज्ञानोपदेश करनारी मुक्ताबाई ही यादवकाळातील एक अत्युच्च स्त्रीवैभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

"नाही सुख दु:ख...पापपुण्य नाही
नाही कर्म धर्म...कल्पना नाही
नाही मोक्ष...ना भावबंध नाही
म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही...सहजसिद्ध बोले मुक्ताई!

हा प्रबळ आत्मविश्वास मुक्ताईने नाथ परंपरेचे तत्वज्ञान केवढे पचवलेले होते याचे एक प्रतीक आहे. या भावंडांना वैदिक मंडळीकडुन अविरत छळ सोसावा लागला, पण मुक्ताईने कधी आपला तोल ढळु दिलेला दिसत नाही. ताटीचे अभंग मुक्ताईच्या कारुण्यशील वत्सल भगिनीच्या मनाचा एक आकांत आहेत...पण त्यात शरणागतता नाही. हीनदीन भावना नाही. आहे तो उत्कट आत्मविश्वास आणि सत्यावरील अगाध निष्ठा. आपल्या भावंडांचे तिने मातेच्या जबाबदारीने अपरंपार काळजी घेतली. नाथपरंपरेला साजेश्या पद्धतीने एका मागुन एक भावांनी समाध्या घेतल्यानंतर या विरक्त योगिनीला संसार निरर्थक वाटला असल्यास नवल नाही.

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी मुक्ताईंनी समाधी घेतली. एक नाथ योगिनी, कारुण्यसिंधू मुक्ताई भवसागराच्या पाशातुन मुक्त झाली. मुक्ताईचे आज फारफार तर पन्नास अभंग अवशिष्ट आहेत. पण त्यातुन मुक्ताईचे भव्य दीव्य व्यक्तिमत्व ठळकपणे उभे राहते. आज त्यांच्या समाधीदिनाला ७१६ वर्ष पुर्ण झालीत. या महायोगिनीस विनम्र अभिवादन!

थोर तत्वज्ञ-महाराणी अहिल्यादेवी होळकर!





राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असनारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो..." सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्याबाइंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!" प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. 

माल्कमच नव्हे तर असंख्य युरोपियन इतिहासकारांनी भले येथील राज्यकर्त्यांचे वाभाडे काढले असतील, पण अहिल्यादेवींवर लिहितांना   आपल्या आदरभावनेला मुक्तद्वार दिले आहे. डा. अनी बेझंट म्हणतात भारत देशाची खरी सुपुत्री म्हणजे अहिल्यदेवी होय, कारण ती नुसती प्रजहितपालक नव्हती तर राष्ट्राचे ऐक्य आणि राष्ट्रभावनेला जतन करत सर्वत्र आपल्या खाजगीतुन समाजकार्य करणारी एकमेव राष्ट्रमाता आहे. का अशी अगदी युरोपियनांचीही भावना अहिल्यादेवींबाबत बनली हेही आपल्याला समजावून घ्यायला हवे.

अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ सालचा. नगर जिल्ह्यातील चौंडी येथील. मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडनातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला. 


अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सास-याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता...आताही फारसा नाही...परंतू  मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.


१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. वारसाहक्काचा प्रश्न निर्माण करत संपुर्ण होळकरी संस्थान घशात घालण्याचे प्रयत्न पेशवे दरबारात सुरु झाले. अहिल्यादेवींनी सर्व कारस्थानांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्ध्या होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. राघोबादादा पेशव्याला हे संस्थान गिळायचे होते. अ
केपार झेंडे (जे त्यांनी नव्हे) फडकाविले असा दुराभिमान अशा या महान (?) योद्ध्याने अहिल्यादेवींवर स्वारी केली.   अहिल्यादेवींनी राघोबादादाचा माज उतरविला आणि माघार घ्यायला भाग पाडले.

अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते,, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, "सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती." अहिल्यादेवींनी शेतसारा असो कि शेतीसाठीचे पाणी वाटप...यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली. राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाविलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि "भिल्लाडी" ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला. जगातील हे पुन्हा पहिले उदाहरण आहे.


हैदराबादचा निजाम म्हणतो...""Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar." अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. अहिल्यादेवींना आम्ही करंट्या अभिमन्यांनी "एक धार्मिक महिला" असे त्यांचे रुप रंगवले आहे. त्या नक्कीच धार्मिक होत्या. महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणा-या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली. 


उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करनारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील. पण आम्ही करंटे आहोत. जातीय प्रेरणा आम्हाला लाजीरवाने कृत्य करायला भाग पाडतात. अहिल्यादेवी सर्वांच्या होत्या पण सर्व त्यांना मानायला कंजुसी करतात. महाराष्ट्र राज्य हे पुरोगाम्यांचे राज्य आहे असे चुकुन म्हटले जाते. या राज्यात एकाही विद्यापीठाला अहिल्यादेवींचे सोडा पण एकाही महिलेचे नांव नाही हा आमचा असला दांभिक पुरोगामीपणा आहे. या राज्यात जन्माला आलेल्या, कर्तुत्वशालीनी ज्ञानवर्धिनी अशा अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई झाल्या. आणि एकाही विद्यापीठाला या महनीय रष्ट्रमातांचे नांव नसावे असा करंटेपना फक्त आम्हीच दाखवू शकतो. सोलापुर विद्यापीठाला महाराणी अहिल्यादेवींचे नांव द्यावे अशी जनमागणी जोर धरत आहे. खरे तर मुळात अशा कोणत्याही मागणीची गरजच काय? पुरोगामी महाराष्ट्राने एव्हाना या नांवांनी अनेक प्रशासकीय, शैक्षणिक केंद्रांना अहिल्यादेवी आणि सावित्रीमाइंची नांवे देत त्यांची कर्तुत्वगाथा सन्मानित करायला हवी होती. आजही वेळ गेलेली नाही. सोलापुर विद्यापीठाला महराणी अहिल्यादेवींचे तर पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नांव त्वरित दिले गेले पाहिजे आणि त्यांच्या प्रेरणादायी कर्तुत्वाला सलाम केला पाहिजे. महिलांना बळ पुरवायचे असेल तर याला पर्याय नाही हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. 


तसे होणार नसेल तर हे सरकार जातीयवादी आहे असेच आम्हाला समजावे लागेल!



-संजय सोनवणी

















Tuesday, May 14, 2013

सुर्य प्यायलेला माणुस

स्वप्नांना
मला कधीच दोष द्यायचा
नव्हता
स्वप्ने पाहणे समजा
माझी नियती होती
स्वप्न कोसळतांना पाहणे हे समजा
माझे अटळ भाग्यच होते...
असेल...

कितीदा सांगाल मला?
आणि कितीदा ऐकू मी?

मला माझी नियती आणि भाग्य
अगदीच समजत नाही
असे का बरे वाटते?
मी रातांधळा नव्हे कि
चकवा लागल्याप्रमाणे 

रातभर गोल गोल फिरणारा नव्हे
जरी टाकु पहाल मला वारंवार चकव्यात!

लक्षात घ्या
हैवानी प्रेरणा पिवून माझ्या बांधवांना
पथभ्रष्ट करणा-या सैतानांनो...

मी सुर्य प्यायलेला माणुस आहे!

Monday, May 13, 2013

महासत्ता बनायचे तर ज्ञानसत्ता हवीच!

शाळा-कोलेजांत दिले जाणारे शिक्षण हे शिक्षण नसून काय शिकावे याचे विद्यार्थ्याला दिशादिग्दर्शन करणारे असावे असे इमर्सन या शिक्षणतज्ञाने अठराव्या शतकात म्हटले होते.  मला वाटते हा मुलभूत पाया आपल्या शिक्षणव्यवस्थेतून पुरता दुर्लक्षिला गेलेला आहे. लिहा-वाचायला शिकणे ही शिक्षणाची पहिली पायरी असली तरी विद्यार्थ्याचा एकुण कल लक्षात न घेता पहिली ते दहावी अभासक्रमातील सारेच विषय सर्वच विद्यार्थ्यांवर सरसकट थोपलेले असतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्याने अधिकाधिक गूण मिळवावेत एवढीच माफक अपेक्षा आपली शिक्षणव्यवस्था ठेवून असते. सर्वच विषयांत प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच रस असणे शक्य नसते. ज्यात रस आहे त्यात अभ्यासक्रमाबाहेर जात कुतुहल दाखवणे विद्यार्थ्याला शक्य असले तरी आपली शिक्षणपद्धती तसे करू देत नाही. किंबहूना कुतुहल वाढवणे हाच अभ्यासक्रमाचा हेतू असतो हेच लक्षात घेतले जात नाही.

त्यामुळे रस नाही असे विषय विद्यार्थी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात व तो म्हणजे पाठांतर...! ज्यांची स्मरनशक्ती चांगली आहे असे विद्यार्थी चमकतात तर उर्वरीत घोकंपट्टीच्या आधारावर सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. यात बव्हंशी विद्यार्थी शिक्षणातील रस गमावून बसतात व उरते एक औपचारिक, शिक्षण नव्हे तर शिक्षा वाटणारी शिक्षणप्रक्रिया. जे शिकावे वाटते, ज्यात अधिक प्राविण्य मिळवावे वाटते ते विषय बालवयातच मागे पडतात व विद्यार्थी हा शिक्षणाला कंटाळलेला पण नाईलाज म्हणुन शिकणारा असा घटक बनत जातो. या प्रक्रियेत पदवीपर्यंत पोहोचेपर्यंत अगणित विद्यार्थी शेवटी गळुन पडतात. तोवर शिक्षणाबद्दलचे विद्यार्थ्याचे मत हे "रोजगारार्थ शिक्षण" असेच बनून गेले असल्याने सहविद्यार्थीही त्याचे रोजगाराच्या जीवघेण्या शर्यतीतील महत्वाचे स्पर्धक बनलेले असतात. यातून जी असामाजिक मानसिकता बनते त्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा असे वाटत नाही.

पास होणे व पुढे जाणे या प्रक्रियेत पास होण्याला अनन्यसाधारण महत्व दिले जाते ते शिक्षक, पालक ते समाजाकडून. नापास होणारा विद्यार्थी हा कुचकामी असतो, बुद्धीहीन असतो असा समज आपण करुन घेत असतो तेंव्हा "बुद्धी"च्या व्याख्येबद्दल आपला सनातन गैरसमज असतो. दरवर्षी दहावी-बारावीनंतर नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या आपल्या समाजमानसाच्या मानसिक असंतुलनाचा अपरिहार्य भाग आहे.

बरे, हे शिकलेले, पदवीधर, ज्या शाखांमद्धे शिकतात त्यात किती प्राविण्य मिळवलेले असतात? जगण्यासाठीचे असे कोणते कौशल्य त्यांनी शिक्षनपद्धतीमुळे आत्मसात केलेले असते? तज्ञांच्या मते अशिशिक्षित व्यक्ती या उलट सुशिक्षितांपेक्षा जगण्याची साधने प्राप्त करण्यात अधिक कुशल असतात. सुशिक्षित बेरोजगार अशी जशी एक व्यापक अवस्था आहे तशी अशिक्षित बेरोजगार मिळणे अवघड आहे कारण किमान अशिक्षिताला जगण्याची साधने मिळवण्यासाठी सामाजिक लाज वाटत नाही. आज कोट्यावधी शिक्षीत बेरोजगार आपल्या पारंपारिक व्यवसायात पडु इच्छित नाहीत. शेतक-यांची मुले शेतीवर राबण्यात, आहे त्या शेतीकामाला विकसीत करण्यात कमीपणा मानतात. हीच बाब अन्य पारंपारिक व्यवसायांची. मग नवीन संध्या शोधणे, विकसीत करणे ही तर खुपच दुरची बाब झाली. याचे महत्वाचे कारण म्हणजे सफेदपोश नोक-यांचे आपल्या समाज व शिक्षणसंस्थांनी वाढवलेले अनिवार आकर्षण.

आणि यामुळेच आपली शिक्षणपद्धती ही निष्क्रीय, अनुत्पादक बेरोजगार निर्माण करणारी संस्था बनली आहे. कोणतीही व्यवस्था समस्त शिक्षीत समाजाला रोजगार देवू शकत नाही. रोजगार निर्माण करणारेही तेवढ्याच प्रमाणात (मग तो स्वयंरोजगार का असेना) कसे निर्माण होतील अशी शैक्षणिक रचना करावी लागते. श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा यांच्यात संतुलन साधावे लागते. पण गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशा पद्धतीने ज्ञान तर नाहीच नाही आणि श्रमप्रतिष्ठाही नाही अशा विचित्र परिस्थितीत आपली शिक्षणव्यवस्था अडकलेली आहे.

याची परिणती पहायला हवी. केंद्रीय श्रममंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतीय एकुण रोजागार क्षेत्रात फक्त ७% रोजगार संघटित क्षेत्र देते तर ५% असंघटित क्षेत्र देते. उर्वरीत रोजगार हा अजुनही स्वयंरोजगार व शेतीक्षेत्रावर अवलंबून आहे आणि हा शेतीरोजगार बव्हंशी अर्धवेळ स्वरुपाचा आहे. जरी सध्या खाजगी क्षेत्र वाढत असले तरी त्याच वेळीस शासकीय नोक-या कमी होत आहेत. एकुणात जेवढ्या प्रमाणात शिक्षितांची संख्या वाढत आहे त्याच्या व्यस्त प्रमानात रोजगाराच्या संध्या वाढत आहेत...म्हणजेच शेतीक्षेत्र हेच आजही रोजगाराचे प्रमूख माध्यम आहे. असे असतांनाही कृषी संसाधनांनाच रोजगाराच्या व्यापक व सक्षम संध्यांत परिवर्तीत करणे ही काळाची गरज असतांनाही मुळातच आपली शिक्षनपद्धती उलट्या दिशेने जात असल्याने तसे होण्याची संभावना दिसत नाही. बेरोजगारीचा हा विस्फोट ही शेवटी आपल्या शिक्षणपद्धतीची अपरिहार्य परिणती आहे.

ज्ञाननिष्ठा, तर्कनिष्ठा, कल्पनाशक्ती व निर्मितीक्षमता ही शिक्षणपद्धतीची चतु:सुत्री असायला हवी होती. आता तरी असायला हवी. पण आपले दुर्दैव हे आहे कि आपले अगदी विज्ञानाचे शिक्षण आणि धर्मशिक्षण यात फरक उरलेला नाही. धर्मशिक्षक जसे शंका व्यक्त करण्यावर बंदी घालतात तसेच आमचे विज्ञानशिक्षकही विद्यार्थ्याला शंका विचारायला बंदी घालतात. नैसर्गिक कुतुहलाची हत्या ही अशी होते. ज्ञानाची वाढ थांबते ती अशामुळे. अगदी चित्रकला शिकवनारे शिक्षकही रेखाटने व रंगभरणाच्या तांत्रीक बाजुंनाच महत्व देतात, सृजनाला नाही. प्रयोगशीलतेला नाही. चित्रकारितेतही जेथे "कुशल कामगार" निर्माण केले जातात तेथे चित्रकारांची आणि कला-अविकसीत रसिकांची काय गत असेल?

हा मुद्दा अशासाठी आहे कि प्रगल्भ समाज घडवण्याच्या कार्यात आपली शिक्षणपद्धती अत्यंत अपयशी ठरते आहे. डेसिडिरयस इ-यस्मस यांनी "शिक्षण हे ज्ञान, तर्कशुद्धता आणि अनुभव मिळवण्यासाठी दिले जावे..." असे म्हटले होते. युरोपात ज्ञानक्रांती झाली तिला आमचे एतद्देशीय विद्वान "भौतिक क्रांती म्हणुन त्याज्ज्य" असे आजही हीनवत असतात आणि आमच्या अस्तित्वात कधीही नसलेल्या आध्यात्मिक क्रांतीलाच सर्वोपरी मानत आपले मानसिक समाधान करुन घेत असतात. पण अगदी अध्यात्मही झाले तरी आध्यात्मिक तत्वज्ञानातही आम्ही नवव्या शतकातील शंकराचार्यांनंतर गेल्या बाराशे वर्षांत एका कणाचीही भर घालू शकलेलो नाही हे कोण सांगणार? .खरे तर माणसाला प्रगल्भ बनवत, जगण्यासाठी सक्षम बनवत, संधी निर्माण करत प्रत्येक क्षेत्रात अग्रगामी राहनारा समाजच खरा आध्यात्मिक असतो हे लक्षात घ्यायला हवे.

याउलट आमची समाजरचना ही लबाड, ढोंगी आणि पथभ्रष्टांची कशी आहे याचे चित्र शिक्षणव्यवस्थेतीलच (आर्थिक ते नैतीक) अपार भ्रष्टाचारातुन सहज पाहता येते...इतर क्षेत्रांबद्दल मग काय बोलावे? ज्या समाजात विद्यार्थी आणि शिक्षकही भ्रष्ट असतात, ज्यांच्या शिक्षणप्रेरणा या ज्ञानप्रेरणा नसून शैक्षणिक अडाणीपनातुन व पोटभरु वृत्तीतून निर्माण होतात त्या समाजाचे भवितव्य काय असू शकते?

पोट भरण्यासाठी व इतरांचेही पोट भरण्यासाठी सक्षम बनवणे, स्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच...किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. तसे आम्ही करत नाही आहोत. एका अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखाददुसरी उदाहरणे वगळता जागतीक ज्ञानसंपदेत भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही.

मग स्वत:चे व्यक्तिगत भवितव्य हे जर एका फक्त रोजगाराभिमुख स्पर्धकाचे असेल तर आम्ही कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करतो? महासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते कारण अर्थोत्पादन ही ज्ञानाचीच तार्किक व अंतिम परिणती असते. तिची परिमाणे वेगवेगळी असू शकतात. बापजाद्यांच्या जमीनी विकून अथवा दुस-यांच्या हडपुन अर्थोत्पादन होत नसते.  देशी नैसर्गिक साधनसामग्री उध्वस्त करुन, म्हणजे बाहेर विकून, अर्थोत्पादन होत नसते. उसशेती ज्याप्रमाने इतर उत्पादनांसाठी न्याय्य वाटा न देता जलसंपत्ती उधळते...तसे करुनही शाश्वत अर्थोत्पादन होत नसते. आपल्याला "अर्थ" कळाला नाही कारण आपली शिक्षणपद्धतीच मुळात अर्थाला समजण्यात अपेशी ठरलेली आहे!

(क्रमश:)

For previous article, pls click bellow..

http://sanjaysonawani.blogspot.in/2013/05/blog-post_11.html 

Saturday, May 11, 2013

क्षमा करा!


क्षमा करा,

पण आमच्या हृदयात रुतलेला काटा

आम्हीच हळुवारपणे काढायला हवा

त्या रक्तबंबाळ करणा-या

काट्यालाही चुंबत

वेदनांचे हुंकार गिळत

त्या बाभळीलाही

क्षमा करत

पुन्हा चालायची सुरुवात करत

आम्हालाच

अवकाशाच्या विराट प्रेरणा घ्यायला हव्यात!



खुरडत...रखडत

उपेक्षांचा विराणवारा सोसत

परकेपणाला उराशी सांभाळत

चाललेच पाहिजे आम्ही...

अशा प्राणप्रिय धरतीवरुन

असे कि

जणु जी नव्हतीच

कधीच आमची!



आम्हाला कधी आमची हृदयेच नव्हती...

नाही काय?

बघत होतोच कि ती टांगलेली

तिरड्यांवर लपलपत्या

अग्नीजिव्हांवर

जळती आणि पहात होतोच कि

कसे आम्ही हृदये हरवुनही

ह्रुदयशील झालो...

आणि

केला कि हो सन्मान....

हृदयहीनांचा...!

निर्मितीक्षमतेचा अभाव?




भारतात इंग्रज येण्यापुर्वी अथवा त्यांनी मेकालेप्रणित शिक्षणपद्धती अस्तित्वात आणन्यापुर्वी भारतात शिक्षणपद्धती कशा प्रकारची होती हेही आपल्याला समजावून घ्यायला हवे. भारतात संस्कृत, पर्शियन व अरेबिक भाषांतून शिक्षण देनारी महाविद्यालये व विद्यालये होती हे आपण मागील लेखात पाहिले आहे. यांची संख्या अर्थातच अत्यल्प अशी होती. या महाविद्यालयांतील शिक्षण हे बव्हंशी धार्मिक व पारंपारिक असे. या तीनही भाषांमधील ज्ञान हे अत्यंत प्राथमिक दर्जाचे आणि समकालीन विचारप्रवाहांना सामावून घेणारे अथवा त्याला पुढे नेणारे नव्हते. त्यामुळे शेकडो वर्ष जुने ज्ञान हेच काय ती येथील उपलब्धी होती. कलकत्ता, बनारससारख्या मोठ्या श्हरांतच ही अत्यल्पसंख्य महाविद्यालये होती. संस्कृतच्या पाठशाळही अशाच अत्यल्प होत्या.

येथील शिक्षणपद्धती ही मुळातच पाठांतराधारित होती. व्यावहारिक उपयुक्ततेपेक्षा धार्मिक कार्य करण्यास उपयुक्त अशा पुरोहितांची, पुराणपंडितांची अथवा ज्योतिष-न्यायशास्त्र्यांची निर्मिती करणे हाच काय तो त्यांचा प्रधान उद्देश्य होता. तेवढ्यापुरती ही महाविद्यालये यशस्वी होत होती हे मान्य केलेच पाहिजे. परंतू त्याच वेळेस हेही लक्षात घेतले पाहिजे कि अठराव्या शतकात या पदवीधरांना सामावून घेईल, म्हणजेच यथायोग्य रोजगार देईल अशी मात्र स्थिती नव्हती. १८२३ मद्धेच राजा राममोहन राय यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून ही महाविद्यालये पुर्णपणे बंद करून सरसकट आधुनिक इंग्रजी शिक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. १८३५ मद्ध्ये अशाच संस्कृत पाठशालेच्या विद्यार्थ्यांनी मेकालेची भेट घेवून बेरोजगारीचीच व्यथा मांडली होती.

या पाठशाला अथवा मदरसे भारताला नवीन नव्हते. शेकडो वर्ष त्या सुरुच होत्या. परंतू त्या का सुरू ठेवायच्या, त्यात काय बदल घडवायचे याची मात्र कोनत्याही धुरीणाने पर्वा केली नाही. याचे कारण म्हणजे मुस्लिम जेवढे परंपराप्रिय व कर्मठ होते तेवढेच वा त्यापेक्षा अधिक वैदिकधर्मीय कर्मठ होते. जुन्या ग्रंथांतील ज्ञान हे दैवी असून त्यात कसलाही फेरफर करण्याचा आपल्याला हक्क नाही ही समजूत दोन्ही प्रकारच्या शिक्षणपद्धतींत एवढी रुजलेली होती कि त्यापारचा विचार करण्याचा विचारही कोणी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे इंग्रज आल्यानंतर अपरिहार्य म्हणुन अनेक जण इंग्रजीही शिकले असले तरी त्याचा उपयोग रोजगारासाठी करणे एवढाच उद्देश्य राहिला. शिक्षण हे ज्ञानाच्या वर्धनासाठी व त्याचा एकजीव सुसंस्कृत व सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी असते हे कोणेही लक्षात घेतले नाही.

पण हे झाले महाविद्यालयांचे. त्यांची संख्या अत्यल्पच होती. पण मग प्राथमिक शिक्षण भारतात उपलब्ध होते कि नव्हते? ते फक्त वैदिकजनांसाठीच होते कि अन्य समाजांसाठीही होते? आजवर असा प्रचार केला गेला आहे कि वैदिकजन वगळता अन्य समाजांना शिक्षणाचा अधिकार नव्हता व ते शिक्षणापासून वंचित होते. पण ते खरे नाही. अर्थात येथे शिक्षण या शब्दाचा अर्थ लिखान-वाचन एवढ्यापुरताच मर्यादित आहे. शिक्षण म्हणजे नेमके काय हे भारतियांना अद्यापही कळालेले नाही तर तेंव्हा काय कळणार? असो.

ब्रिटिश राज्य येण्यापुर्वी भारतात, विशेषत: ग्रामीण भारतात नेमकी कशी शिक्षण पद्धती होती याबाबत आपल्या लोकांनी लिहून ठेवलेले नाही. परंतू माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने पेशवाई खालसा केल्यानंतर लगेच १८१८ मद्धेच एक अहवाल तयार केला. त्या अहवालात म्हटले आहे कि पेशवाईच्या काळात अनेक गांवांत-खेड्यांत प्राथमिक शाळा होत्या आणि ज्या कौशल्यांची सामान्य पातळीवरील प्रत्यक्ष जीवन व्यवहारात आवश्यकता होती ती कौशल्ये शिकण्यासाठी विद्यार्थी शाळेत जात.

याच प्रकारे इंग्रजांनी वेगवेगळ्या जिल्यांतील अधिका-यांकडुन १८२० ते १८३० या काळात शिक्षणाची व्यवस्था व परिस्थिती विषद करणारे अहवाल मागवले. त्यावरून दिसते कि;

१. जवळपास सर्वच गांवांत प्राथमिक शाळा होत्या.
२. या शाळांचा खर्च काही व्यक्ती करत असत. संपुर्ण गांव नव्हे. कसलीही शासकीय मदत या शाळांना मिळत नसे.
३. या शाळा एक-शिक्षकी असून विद्यार्थ्यांची संख्या १५ ते ३५ एवढी असे.
४. हे शिक्षक ब्राह्मण, प्रभू, भंडारी, कुणबी, वाणी, शिंपी या जातीतून येत.
५. शिक्षकाला दरमहा चर ते सहा रुपये नगदी अथवा वस्तूरुपात मिळत. यातील नगदी पैसे व वस्तू विद्यार्थ्यांच्या पालकांनी थोड्याथोड्या प्रमाणात दिलेली असत. (दोन आणे ते एक रुपया, ऐपतीप्रमाणे.)
६. दलित व स्त्रीया वगळता सर्व जातीतील विद्यार्थ्यांचा यात भरणा असे. (गुजराथेतील अहमदाबाद जिल्ह्याच्या अहवालानुसार एकुण २७०० विद्यार्थ्यांपैकी ११०० बनिया व ४०० ब्राह्मण होते.)

या व्यतिरिक्त हत्यारे चालवण्याचे शिक्षण, धार्मिक शिक्षण मल्लविद्या यांचेही शिक्षण स्वतंत्रपणे आपापल्या आवडीनुसर घेतले जात असे. ऐपत असनारे स्त्रीया-मुलांसाठी घरगुती शिक्षकाची सोय करत असत. ("अपूर्ण क्रांती"  रा. भा. पाटणकर (पृष्ठ १२०-१२१) 

यावरुन सिद्ध होणारी बाब म्हणजे शिक्षणव्यवस्था प्राथमिक स्वरुपातील का होईना सार्वत्रीक होती. शिकू इच्छिणा-या सर्वांनाच या शाळांत प्रवेश होता. शिक्षक हे ब्राह्मणच असत असेही नाही. या शाळांत जे शिक्षण दिले जाई ते लिहिणे, वाचणे, पत्रव्यवहार, व्यावहारीक गणित अशा स्वरुपाचे असे. मुले व्यावसायिक शिक्षण आपापल्या घरीच पालकांकडुन घेत असत. संस्कृत पाठशाळा मात्र फक्त ब्राह्मणांसाठीच असत.

येथे महत्वाचा हा मुद्दा येतो तो हा कि सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध नव्हते हा दावा जर खरा नाही तर, यात अधिक प्रगती साधावी असे येथील शासन व्यवस्था वा समाजनियंत्यांना का वाटले नाही? बरे ही वरील माहिती ही १८३० सालापर्यंतची असली तरी ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असली पाहिजे. ही परंपरा नसती तर अवैदिक संतांची परंपरा भारतात सुरुही झाली नसती हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असे असले तरी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो हा कि प्राथमिक शिक्षण मिळाल्यानंतर का होईना अध्यात्मीक रचनांपुढे जात अन्य वैचारिक/सैद्धांतिक व व्यवसायमुलक लेखन का झाले नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधल्याखेरीज आम्ही आमचा वर्तमान स्वच्छपणे पाहू शकणार नाही.

मार्च १८२४ मद्धे एल्फिस्टनने शिक्षणविभागाला सादर केलेल्या टिपणात प्रचलित शिक्षनपद्धती आपल्या (इंग्रजांच्या) ताब्यात घेत तिला आधुनिक सुसंगत स्वरुप देण्याची सुसंगत योजना मांडली व त्यानुसार भारतात रयत व शासन यांच्या संयुक्त सहभागातील शिक्षणपद्धती राबवण्यात आली. तोवर भारतात अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीचा विचारही झाला नव्हता.

निर्मितीक्षमतेचा अभाव?

भारतीय मानसिकतेत निर्मितीक्षमतेचा एकुणातच अभाव असावा असे वाटावे असे चित्र दिसते. शिक्षण निर्मितीक्षम, कल्पक आणि धोरणी नागरिक बनवण्यासाठी असते हा सिद्धांत पुढे आला तेंव्हा युरोपातील शिक्षणपद्धती या आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीपेक्षा फारशी अद्वितीय वगैरे नव्हती. बव्हंशी लोक लिहा-वाचायलाच शिकलेले असत. धर्म-तत्वज्ञानादि शाखांचे शिक्षण ल्यटीनमद्ध्येच दिले जात असे. अशी परिस्थिती असतांनाही निर्मितीक्षम प्रतिभाशाली निर्माण झालेच. त्यांनी धर्मसत्ता पुरती नाकारली. तेथेच त्यांच्या वैचारिकतेला मोकळे रान मिळाले आणि ज्ञान-विज्ञानाची क्रांती सुरू झाली.

धर्मसत्ता नाकारण्यासाठी एक डोळस तर्कबुद्धीचे गरज असते. ती केवळ शालेय वा उच्च शिक्षणाने येत नाही. वास्तवाचे भान आणि आकलन व त्यावर प्रतिक्रियास्वरुप विचारांच्या सुस्पष्ट मांडणीची गरज असते. ज्ञान हे अनावर कुतुहल आणि जिज्ञासेतून निर्माण होते. धर्मसत्ता हे नेहमीच मानवी समाजाला पुराणपंथी गारुडात ठेवण्यातच समाधान मानत असते व तसे अविरत प्रयत्न करत असते. हा जगभरचा संघर्ष आहे. त्यात युरोपाने धर्मसत्तेला यशस्वी आव्हान देत ज्ञानसत्तेला सर्वोपरी बनवले. अर्थात हाही प्रवास सोपा नव्हता. ब्रुनोसारख्या शास्त्रज्ञाला जीवंत जाळले गेले तर ग्यलिलिओला आजन्म कैद मिळाली. अगणित प्रागतिकांचा छळ झाला.

भारतात असे स्वतंत्रपणे का घडले नाही? येथे काही वाचकांना आर्यभट, भास्कराचार्य ते वराहमिहिर यांचे उदाहरण देण्याचा मोह होईल...पण त्याचा काहीएक उपयोग नाही कारण त्यांचीही परंपरा अर्धवट मद्धेच सोडुन देण्यात आले होती. काही मंडळीला मुस्लिम राजवट हे सोपे कारण सुचेल परंतू तेही खरे नाही कारण आक्रमणकाळ वगळला तर नंतर त्यांनीही शिक्षणव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचे दिसून येत नाही. शिक्षण या देशात कधीच सार्वत्रिक नव्हते हे खरे आहे पण शिकू इच्छिणा-यासाठी (काही समाजघटक वगळता) शिक्षण उपलब्ध होते. मुस्लिमांनी मदरसे/मकतब्यांमार्फत त्यांची शिक्षणपद्धती जशी अंमलात आणली तशीच एतद्देशियांची शिक्षण पद्धतीही सुरुच राहिली. असे असतांनाही स्वतंत्र विचारक प्रदीर्घ काळात आणि संपुर्ण देशातुन मुळात निर्माणच होवू नयेत असे का घडले असावे?

धर्माचा पगडा हे कारण द्यावे तर मग तो जगात कोणत्या राष्ट्रात कोणत्या समाजात नव्हता? प्रश्न पडु नयेत, कुतुहल वाटु नये व त्याचा पाठपुरावा करण्याचे इच्छाच असू नये असे असल्याखेरीज ज्ञाननिर्मितीबाबत निरिछ्छा निर्माण होणे शक्य नाही. सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीबाबत जाणीवा मृतवत असाव्यात तरच सामाजिक विचार जन्माला येनार नाहीत. ज्ञानयोगाबाबत आध्यात्मिक चर्चा बरीच असतांनाही ज्ञानाला अध्यात्म समजल्याने ज्ञान हा शब्द फक्त पारिभाषिक राहिला असेच म्हणने क्रमप्राप्त आहे. संतांची मांदियाळी बरीच असली तरी त्यांनीही सामाजिक जाणीवांचे भौतिक उन्नयन करण्याऐवजी आध्यात्मिक उन्नयनालाच महत्व दिले हेही उघडच आहे.

तत्कालीन शिक्षणपद्धतीत शिक्षण घेणारे आपापले जातिसापेक्ष व्यावसायिक शिक्षण घरीच मिळवत असत हे आपण वर पाहिलेच आहे. प्रचलित व्यवसायांत, व्यवसाय पद्धतीच्या अंगाने म्हणा कि उत्पादन पद्धतीच्या अंगाने, परंपरागत पद्धतींपेक्षा अधिकाधिक कार्यक्षम बनवाव्यात हा विचार व्यावसायिकांनाही सुचलेला दिसत नाही. तसे प्रयत्नही कोणी केलेले आढळुन येत नाहीत. ही स्थितीस्थापकता समाजमनावर असलेल्या अद्भुत आध्यात्मिक व धार्मिक गारुडामुळे आली होती असे म्हणावे तर राजरोसपणे राज्यकर्ते ते सरंजामदारशहा असामाजिक कृत्ये (जी अधार्मिक या संज्ञेत सहज मोडतात) देशभर सरसकटपणे आणि सातत्याने करत आलेली दिसतात. त्यामुळे आमच्या जिज्ञासा धार्मिक जाणीवांमुळे मेल्या होत्या असे म्हणुन चालणार नाही. आपला इतिहास म्हणुन आपल्याला तत्कालीन राजे-सरंजामदारांच्या कृत्यांचे उदात्तीकरण करण्याचा मोह होणे स्वाभाविक असले तरी तसे करणे आपल्याला आपल्या प्रश्नाचे वास्तवदर्शी उत्तर देणार नाही. 

आज आपण वर्तमानाकडे पाहिले तरी आपल्या लक्षात येईल कि भारतीय मानसिकतेत मध्ययुगीन मानसिकतेपेक्षा गुणात्मक वाढ झालेली दिसून येत नाही. पाश्चात्य शिक्षणपद्धतीमुळे व वर्तमानातील जागतिकीकरणामुळे जे आमच्यात बदल झालेले दिसतात ते बाह्यात्कारी आहेत व ते अपरिहार्यतेमुळे स्वीकारले गेले आहेत. त्यात आमचे स्वत:चे असे स्वतंत्र योगदान आढळुन येणार नाही. जे आहे ते अनुकरणात्मक योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

नवनिर्मितीच्या मानसिक जाणीवांचा अभाव हे एकमेव कारण या मानसिक कुंठांना असले पाहिजे असे मला वाटते. नवनिर्मितीच्या छंदाखेरीज ज्ञानाची निर्मिती होत नसते. ज्ञानाच्या निर्मितीखेरीज अर्थनिर्मिती असंभाव्य आहे. इंग्रजांची शिक्षणपद्धती सुरु झाल्यानंतर दादाभाई नवरोजी, नवरोजी बैयरामजी, जमशेदजी टाटा या तशा मध्यमवर्गीय अवस्थेतुनच येत शिकलेल्या तरुणांनी जागतीक बाजारात/उद्योगात तरुण वयात पाय ठेवला. तसे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या हिंदु विद्यार्थ्यांबाबत घडलेले दिसत नाही. उलट ते सुरक्षीत नोक-यांतच घुसतांना आणि काही अपवादात्मक तरुण पत्रकारिता/प्रकाशन/समाजकार्य अशा कार्याला लागलेले दिसतात. मुंबई चेंबर ओफ कोमर्स सुरु झाली तेंव्हा चार इंग्रज आणि तीन पारशी एवढेच चेंबरचे सदस्य होते.

"आम्हाला तशी उद्योगव्यवसायाची परंपराच नव्हती..." हे विधान येथे कुचकामी आहे कारण आधुनिक अर्थशास्त्रीय जगताच्या परिप्रेक्षात त्यात एकार्थाने सारेच नवे भागीदार होते व ते तेथेही प्रशिक्षणार्थीच होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. यथोचित साहसाचा अभाव हे आमच्या निर्मितीक्षमतेचे मारेकरी तर ठरले नसेल? स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्वत:ला सक्षम करण्याऐवजी आम्ही आजही जसे जागतीक बाजारपेठेत बव्हंशी सेवकभावनाप्रेरीत अथवा भिकारीच असतो तशीच मानसिकता तेंव्हाही नव्हती असे कसे म्हणता येईल?

याचाच दुसरा अर्थ असा होतो कि नवनिर्मितीची प्रेरणा भारतियांत नव्हती म्हणुन शिक्षणपद्धतीत बदल करण्याची इच्छा हजारो वर्ष झाली नाही. नवशिक्षितांनी त्या कामचलावू शिक्षणाचा उपयोग प्राप्त परिस्थितीत फक्त उदरभरणापुरता केला व बाह्य वास्तवांकडे डोळे मिटुन घेतले...कारण नवनिर्मितीची संभावनाच त्यांच्यात नव्हती.  नवनिर्मितीच्या प्रेरणांच्या अभावात आम्ही समाजोपयोगी असे कसलेही नवसिद्धांतन करु शकलो नाही आणि तसे करू शकलो नाही म्हणुन समाजमानसशास्त्राचीही कसलीही उत्क्रांती झाली नाही. आम्ही इंग्रजांनी शिक्षणपद्धती दिली, ती नोकरीच्या गरजांपोटी उचलली आणि आजही त्याच प्रेरणांनी शिक्षणार्थी आहोत.

आम्ही ज्ञानार्थी बनायची जी प्रक्रिया असते तीपासून वंचित राहिलो ते राहिलोच!

(क्रमश:)
See Also: http://sanjaysonawani.blogspot.in/2013/05/blog-post_6.html

Monday, May 6, 2013

ज्ञानाच्या भांडवलाची उभारणी का फसली?





मागील लेखात आपण भांडवलनिर्मितीत कसे अक्षम ठरलो आहोत यावर काही विचार केला होता. भांडवलनिर्मितीची सुरुवातच मुळात ज्ञाननिर्मितीतुन होत असते. किंबहुना ज्ञान हाच भांडवलाच्या निर्मितीचा मुलाधार असतो आणि आपले सध्याचे शिक्षण म्हनजे ज्ञान नव्हे हे आम्हाला आधी समजावून घ्यायला पाहिजे. किंबहुना आमची शिक्षणपद्धती हीच रोजगारनिर्मितीचे मुलभूत साधन मानली जात असल्याने ती भांडवल निर्माण करण्यात नव्हे तर एकुणातील राष्ट्रीय भांडवलाचे भक्षण करणारी पद्धत बनली आहे. आपली शिक्षणपद्धती एकार्थाने बेरोजगारांची संख्या वाढवण्याचे साधन बनली आहे हे आपण उपलब्ध नोक-या आणि नोक-या मागणा-यांची एकुणातील संख्या यातील पराकोटीचे व्यस्त प्रमाण पाहिले तर लक्षात येईल.

लोर्ड थोमस मेकाले हा भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया घालणारा आद्य पुरुष. त्या शिक्षणपद्धतीत आता १८० वर्षांनंतरही बाह्यात्कारी काही बदल सोडले तर आम्ही काहीएक बदल केला नाही. आपल्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करायचे असेल तर आधी आपल्याला मेकाले समजावून घ्यावा लागेल. मेकाले भारतात आला तो खरे तर इंडियन पिनल कोड लिहिण्यासाठी. (आजही ब-यापैकी प्रचलित असलेल्या इंडियन पिनल कोडचा तो शिल्पकार आहे.) तो भारतात आला जून १८३४ मद्ध्ये. त्याने २ फ़ेब्रुवारी १८३५ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लोर्ड विल्ल्यम बेंटिक यांना एक टिपण (Minutes)  सादर केले. हे टिपण म्हणजे भारताच्या शैक्षणिक पद्धतीचा पाया होय. खरे तर ईस्ट इंडिया कंपनीने डिसेंबर १८२३ पासुनच भारतात युरोपियन भाषा-शास्त्र आणि साहित्याचा प्रचार-प्रसार करणारी यंत्रणा बनवली होती तसेच संस्कृत, पर्शियन व अरेबिक महाविद्यालयांना अर्थिक मदत व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केलेली होती. जवळपास वार्षिक एक लक्ष रुपये कंपनी सरकार या भाषांवर खर्चत असे.

आता मेकाले आपल्या टिपणात काय म्हणतो ते आपण थोडक्यात समजावून घेवूयात. मेकाले म्हणतो संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषा या उपयुक्त ज्ञानाअभावी व्यर्थ आहेत. कंपनी सरकार दरवर्षी या भाषांतील पुस्तके छापण्यासाठी वीस हजार रुपये खर्च करते परंतु एक हजार रुपयांचीही पुस्तके विकली जात नाहीत, याचा अर्थ एतद्देशियांनाच त्या भाषांबद्दल आस्था अथवा ममत्व नाही. त्यामुळे या भाषांवर खर्च करणे हा न भरुण निघणारा तोटा (Dead Loss) आहे. संस्कृत, पर्शियन आणि अरेबिकमधील सारे ग्रंथ एकीकडे ठेवले आणि इंग्लंडमधील एका सामान्य ग्रंथालयातील पुस्तकांची जरी तुलना केली तर त्या ग्रंथालयाचेच पारडे वरचढ ठरेल. मिल्टनसारखा कवि, जोन लोकचे अधिभौतिकशास्त्र तर न्युटनचे भौतिकीशास्त्र याचा परिचय येथील लोकांना होणे आवश्यक आहे. मृत भाषांवर कंपनी सरकारने खर्च करू नये. येथील बोलीभाषा या साहित्यिक आणि वैज्ञानिक गुणांनी अत्यंत अपरिपक्व आहेत.

पुढे मेकाले म्हणतो, लोकांना ज्या भाषेतून शिकावे वाटते त्या भाषांत शिकवण्यासाठी आपण का खर्च करायचा? आणि त्याची आपल्याला उपयुक्तता काय? एतद्देशियांना इंग्रजीतच शिक्षण दिले गेले पाहिजे. तुलनेने कितीतरी पट बौद्धिक असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या अदानी प्रजेला आपल्याच भाषेत शिक्षण द्यायला हवे. संस्कृत, पर्शियन अथवा अरेबिकमद्धे कसलेही आधुनिक ज्ञान नसून इंग्रजी हीच येथील ज्ञानभाषा व म्हणुनच संपर्कभाषा बनवली पाहिजे. संस्कृत महविद्यालयांतून शिक्षण घेणा-यांना आज रोजगार उपलब्ध होत नाही हे वास्तवही लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात जरी येथील माणसे रक्त व वर्णाने भारतीय असले तरी त्यांच्या अभिरुची इंग्रजी बनल्या पाहिजेत.

मेकालेच्या या टिपणातुन ठळकपणे दिसनारी बाब म्हनजे त्याला भारतियांचे सांस्कृतीक ख्रिस्तीकरण अथवा पाश्चात्त्यिकरण करायचे होते. भारतीय संस्कृतीत एक इंग्रजी उप-संस्कृती त्याला निर्माण करायची होती जी इंग्रजांना येथे प्रशासन चालवायला सोपी तर जाईलच परंतू प्रशासकीय पातळीवर नोकरांचीही उपलब्धता होईल. असे लोक बंड अथवा क्रांतीची भाषा करणार नाहीत असा त्याचा होरा होता.

पण  भारतीय शिक्षणाचे पाश्चात्यिकरण करावे हे मत मांडणारी पहिली व्यक्ती मेकाले नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. राजा राममोहन राय यांनी मेकालेपुर्वी दहा वर्ष आधीच, म्हणजे ११ डिसेंबर १८२३ रोजी, इंग्रज सरकारला निवेदन पाठवून भारतात सर्वच संस्कृत, अरबी व पर्शियन विद्यालये बंद करून सरसकट इंग्रजी शिक्षण सुरू करावे अशी मागणी केली होती. मेकालेने त्यांच्या मागणीचा अधिक विस्तार केला एवढेच फार तर म्हणता येईल.

मेकालेला खंदा विरोधक भेटला तो जगप्रसिद्ध भाषाविद प्रिंसेपच्या रुपाने. प्रिंसेप यांनी मेकालेच्या धोरणाला कडाडुन विरोध केला. त्यांनी कोणतीही भाषा थोपणे अयोग्य व अनैतीक असल्याचे मत व्यक्त करत बोलीभाषा (मातृभाषा) याच शिक्षनाचे माध्यम बनायला हव्यात आणि त्यातुन उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जावू शकते असे नमूद केले. इंग्रजी ही स्वैच्छिक भाषा असावी. बोली भाषांना महत्व मिळाले तर संस्कृत-पर्शियन इ. भाषा आपोआप मागे पडतील असेही प्रिंसेप यांनी आपल्या निवेदनात आवर्जून नमूद केले.

लोर्ड बेंटिंक यांनी किरकोळ बदल करून मार्च ३५ मद्धेच अध्यादेश काढून नवीन शिक्षणपद्धतीचा एल्गार केला. या अध्यादेशानुसार जरी संस्कृत, पर्शियन व अरेबिक महाविद्यालये बंद करण्यात आली नसली तरी त्यांना वित्तदान व शिष्यवृत्त्या बंद केल्या. प्रिंसेपचा मतांचा आदर ठेवत बोलीभाषांना शिक्षणात स्थान देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतांनाच इंग्रजी ही मात्र सर्वेसर्वा भाषा बनवण्यात आली. संस्कृत-पर्शियनला डच्चू मिळला यात खेद वाटुन घेण्याचे कारण नाही कारण त्यातून मिळणारे तथाकथित ज्ञान हे धार्मिकच अधिक तर जेही काही अन्य ज्ञान होते ते कधीच कालबाह्य झालेले होते. बोलीभाषांना महत्व दिले गेले हे प्रिंसेप यांचे श्रेय आहे हे आवर्जून नमूद केलेच पाहिजे.

यातून जी शिक्षणव्यवस्था आकाराला आली ती साम्राज्यवादी धोरणाला पुरक असल्याने शिक्षणाचे मुलभूत तत्वज्ञान विसरले गेले. किंबहुना त्यावर फारसा विचार करण्याची गरजच कोनाला वाटली नाही. परंतू महात्मा गांधींनी मात्रुभाषेतील शिक्षण हेच सर्वोपरी आहे व पारंपारिक शिक्षणपद्धतीनुसारच मुलांना शिक्षण द्यायला हवे याचा आग्रह धरला. याला गुरुकुल पद्धती न म्हणता "ग्राम-गुरुकुल" पद्धती असे म्हणता येईल. म्हणजे शिक्षक एकच असेल...वरच्या यत्तांत जातील त्या विद्यार्थ्यांनी खालच्या यत्तांतील विद्यार्थ्यांनाही शिकवावे अशी ही पद्धत. म्हणजे विद्यार्थी हाच शिक्षकही बनवणारी ही पद्धत. आधुनिक भारतात यावर फारशी चर्चा नंतर कधी झाली नाही. पण आपंण पुढे अनेक शिक्षण-विचारांसोबत महात्माजींच्याही सिद्धांताचा विचार करुयात.

स्वातंत्र्यानंतर इंग्रजी आपोआप मागे पडेल असा महात्मा गांधींचा व कोंग्रेसचाही होरा होता. पण ते खोटे ठरले. भारतात इंग्रजी येणारे आणि न येणारे असे दोन देश निर्माण झाले असे शिक्षणतज्ञ डा. व्ही. के. माहेश्वरी म्हणतात ते खरेच आहे. इंग्रजी येणारे उच्चभ्रु तर न येणारे दुय्यम अशी सामाजिक विभागणी आपसूक झाली व त्यातून एक हीनगंड असणारा मोठा समाज तयार झाला. खरे तर भाषेला ज्ञानाशी जोडणे ही एक मोठी चूक होती. भाषा हे एक साधन आहे. तिलाच ज्ञानभाषेत परिवर्तीत करता येते याची जगभर अनेक उदाहरणे आहेत. आपण तशी इच्च्छाशक्ती कधी दर्शवली नाही. मेकालेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे भारतीय मानसिकतेवर इंग्रजीचे गारूड बसले ते बसले. इंग्रजी शिकू नये असे मला म्हणायचे नाही, पण तिला अपरिहार्य व सर्वोपरी मानणे ही एक चुक झाली हे आतातरी समजावून घ्यावे लागणार आहे.

आजही मातृभाषेत शिक्षण असावे कि नसावे यावर वादविवाद होत असतात. माझ्या मते या वादांत शिक्षणाचे तत्वज्ञान मात्र हरपले आहे. नोक-यांसाठी शिक्षण कि ज्ञानासाठी शिक्षण यावर खरे वाद व्हायला हवे होते. माहिती असने म्हणजे ज्ञान नसते. परंतू आपण माहितीलाच ज्ञान म्हनायची सवय लावली आहे. आपल्या शिक्षणपद्धतीत गुणाधारीत मुल्यांकण पद्धत असल्याने घोकंपट्टीला अवास्तव महत्व आले आहे. स्मरणशक्ती उत्तम असनारे आपल्या शिक्षणपद्धतीत सहज बाजी मारून जातात. ज्या समाजघटकांना परंपरागत पाठांतरांची परंपरा आहे ते समाजघटक या शिक्षणपद्धतीत व्यवस्थित तरुन जात असले तरी त्यामुळेच अगणित विद्यार्थी या स्पर्धेत टिकाव धरत नाहीत. प्राथमिक शिक्षणातुनच गळती होणा-यांचे संख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे हे वास्तव काय दर्शवते?

आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीबद्दलच मुळापासून आता विचार करावा लागणार आहे. ज्ञान हेच खरे भांडवल असते व तेच भांडवल उभारण्यात आम्ही कमी पडत असू तर आमचा देश महासत्ता होण्याचे दिवास्वप्न कधीही पाहू शकत नाही. मेकालेने प्रचलित केलेली शिक्षणपद्धती आणि तिचे तत्वज्ञान जर आमच्या हाडी-माशी आजही रुजलेले असेल तर ती आपल्याला गुलामी मानसिकतेतून बाहेर काढू शकत नाही. तिचा मुलात तसा उद्धेशही नव्हता. भारतीय सांस्कृतिकतेचे कंबरडे मोडत साम्राज्यशाहीला सुसंगत अशी नवसंस्कृती रुजवणे हा तिचा उद्देश्य होता आणि त्यात मेकाले यशस्वी झाला एवढेच म्हणता येईल. प्रिंसेप यांची तगमग आम्ही समजावून घेतली नाही हीसुद्धा एक दुर्दैवी बाब आहे.


(क्रमश:)
Visit this link also...
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/04/blog-post_30.html

Sunday, May 5, 2013

संकट आलंय म्हणून....


संकट आलंय म्हणून
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे, 
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय 
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?

संकटांच्या राशी 
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे 
 ओलावेदार
स्नेहमय 
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची 
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........

ग्रीष्मानंतर
 पावसाळा नियतच आहे!

Thursday, May 2, 2013

सरबजितसिंगचा मृत्यू...





सरबजितसिंगचा मृत्यू दुर्दैवी आहे. याबद्दल आपण खेद व्यक्त केलाच पाहिजे. याहीपेक्षा मोठा खेद याचा असला पाहिजे कि भारत सरकार, विशेषत: RAW  सारखे गुप्तहेर खाते "आपल्या" माणसांना विदेशात संरक्षण देण्यात अपयशी ठरत असते. सरबजितसिंग हेर नव्हता हा भारताचा दावा स्वाभाविक आहे. भारत देश कधी काळी अन्य देशात हेर पाठवून घातपाती वा गुप्त माहिती मिळविण्यासाठी कारवाया करु शकतो यावर भारतियांचाच विश्वास नाही. पण तसे वास्तव नसते हे आमच्या भाबड्यांनी समजावून घ्यायला हवे.

मी आजवर ४५-४६ आंतरराष्ट्रीय थरारकथा लिहित्ल्या आहेत. पाकिस्तानच्या संदर्भातील किमान तीन तरे मला याक्षणीच आठवतात. "अंतिम युद्ध" असो कि "War Time", यांत मी भारत सरकार हेर पाठवते खरे पण त्यांना संरक्षण देण्यात कुचकामी ठरते याचे कारण म्हणजे भारताच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय भुमिका हे कारण दिले होते व त्यामुळे भारतीय हेरांची ससेहोलपट कशी होते हे त्यातुन दाखवले होते. आणि त्या काल्पनिकांनाही वास्तवाचा आधार होता. सरबजितप्रकरणाने ते २० वर्षांनंतर पुन्हा अधोरेखित केले एवढेच!

सरबजित दारुच्या नशेत वाट चुकला, सीमा ओलांडली आणि पकडला गेला व त्याच्यावर लाहोर आणि फैसलाबादच्या विस्फोटमालिकांमद्धे हात असल्याचा आरोप ठेवत त्याला सरळ एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा ठोठावली गेली हा सरबजितसिंगवर आणि म्हणुन भारतीय नागरिकांवर अन्याय आहे हे म्हणणे भारतियांसाठी योग्यच आहे. मनजितसिंगलाच सरबजितसिंग समजून मिस्टकन आयडेंटिटी घडुन येवून सरबजितसिंगलाच फाशी मिळाली असा दावाही भावनिकतेला धरून आहे. पण मग त्या कथित "मनजितसिंग"चे काय झाले, तो कोण होता, तो कधीच का पकडला गेला नाही, आणि मग आता तो कोठे आहे हे प्रश्न आम्हाला न पडणे स्वाभाविक असेच आहे.

आम्हाला आतंरराष्ट्रीय हेरविश्व कसे चालते, Infiltrators कसे घुसवले जातात, बोगस व्यक्तित्वे कशी आकारास आणली जातात, सेक्स, दाम, दबाव कसे उच्चपदस्थांवर राबवले जातात याची कल्पनाही नसते. भारतात अशा अनेक घटना उजेडात येत असतात.पाकिस्तानचे भारतातील हेर म्हणुन भलेभले अडकलेले असल्याचे दिसते. पाकिस्तानला तेवढी अक्कल आहे आणि भारताला (आणि म्हणुन भारतियांना) मुळातच नाही असे समजण्याचे कारण काय आहे?

पण भारत कमी पडतो तो येथे कि आपल्या हेरांना संरक्षण देण्यात तो अपेशी ठरतो. हेर उजेडात आला कि कानावर हात ठेवतो. त्याच्या सुटकांच्या ज्या पर्यायी व्यवस्था असायला हव्यात त्याचा पुरता अभाव असतो. राजकीय पातळीवर तर बोलायलाच नको. असे असतांनाही सरबजितची फाशी जवळपास २२ वर्ष लांबली हे पाकिस्तानी कायदे पाहता भारताचे एक यशच मानावे लागेल. अफजलला फाशीला उशीर होतो म्हणुन गळे काढणा-या भारतियांनी ही एक तुलना करुन पहावी.

सरबजितसिंगला फाशी देणे अशक्यप्राय आहे एवढा दबाव असल्याने पाकिस्तानने काढलेली सोपी युक्ती म्हणजे कैद्यांकरवीच खुनी हल्ला चढवणे. खरे तर फाशीची शिक्षा झालेले कैदी अत्यंत स्वतंत्र अशा विभागात ठेवले जातात. तेथे दुस-याला मारणे सोडा स्वत:लाही मारता येणार नाही अशी व्यवस्था असते. थोडक्यात तेथे कसल्याही प्रकारचे विघातक हत्यार वा हत्यार म्हणुन वापरता येईल अशी वस्तू उपलब्ध असू शकत नाही.

 तरीही सरबजितवर खुनी हल्ला झाला हे वास्तव आहे. त्या हल्ल्यानंतर सरबजित तरीही काही दिवस मृत्युशी संघर्ष करत जीवित राहिला हे त्याचे नशीबच म्हणायला हवे. परंतू पाकिस्तान सरकारने हा खुन होवू दिला हेही एक वास्तव आहे. सरबजितसिंग हेर होता कि नव्हता? हेर आहे हे कोणाला कळने हे हेराचे सर्वात मोठे अपयश असते. सरबजितसिंग निर्विवादपणे भारताचा हस्तक अथवा हेर होता हे सरबजितसिंगच्या जबान्यांतून बाहेर आलेले नाही, याचा अर्थ हा तरुण देशप्रेमी होता हे निर्विवादपणे म्हणता येईल.  अफजलबाबत वा कसाबबाबत पाकिस्तानीही असेच म्हणत असतील हेही वास्तव आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपला हिरो हा दुस-या देशाचा व्हिलन असतो. राष्ट्रांतील संघर्षात देशप्रेमींची आहूती पडणे क्रमप्राप्त असते एवढेच काय ते वास्तव उरते. खरोखर सागरी सीमाभंग करणारे कोळी अथवा भरकटुन चुकुन शत्रूसीमांत घुसलेले शेतकरी अथवा पशुपालक सरबजितसिंगाचे विधिलिखित भाळी वागवत नसतात.

माझा प्रश्न हा आहे कि आपल्या "माणसां"ना संरक्षण देण्यात आपली हेरसंस्था कमी पडते कि नाही? याचे उत्तर होय असेच आहे. सरबजितसिंगच्या वकीलांनी ज्या भुमिका बदलल्या अथवा वकील्याही सोडल्या तेंव्हा हेरखात्याने सर्व शक्ती पणाला लावून किमान विधीसेवा पुरवायला हव्या होत्या...पण तेही झाले नाही. याचे कारण भारताच्या जागतिकीकरणानंतर बदललेल्या आंतरराष्ट्रीय भुमिकांतही आहे हेही वास्तव पहावे लागणार आहे. सरबजितसिंगची पाकिस्तानी सीमारक्षकदलांकडुन झालेली अटक १९९० सालची आहे. त्यानंतर बदललेली भारतीय राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था यांचीही सांगड घालता येवू शकते.


सरबजितसिंग हा पक्का भारतीय होता. आम्हा कच्च्यांपेक्षा खुपच श्रेष्ठ होता. त्याचा खुन करण्यात आला आहे हे वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. खुन्यांना अटक केली आहे...पण त्यांना खरेच शिक्षा होणार आहे काय? त्याचे उत्तर संशयास्पद आहे. सरबजितच्या मृत्युसोबतच आम्ही कच्चे भारतीय आगपाखड करुन मोकळे झालेले असू आणि नंतरचे काय त्याचा पाठपुरावा करायला विसरलेले असू.



ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...