Sunday, April 10, 2011

निर्जलीकरण: प्रक्रिया पद्धती (तोंडओळख)

जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येत्या २० वर्षांत अन्नाची गरज किमान ३०% नी वाढणार आहे असे तद्न्य सांगतात. भारताची लोकसंख्या १२० कोटीची सीमा पार पाडुन बसली आहे आणि जवळपास ३०% जनता ही आजच कुपोषित आहे....तर भविष्यात काय होईल? आणि याच वेळीस जर लक्षावधी टन शेतमाल वाया जात असेल तर तो एक अक्षम्य अपराध आहे. एवढेच नव्हे तर शेतक-यांचे जे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. आज दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्त्या करत आहेत याचे कारण म्हणजे शेती अर्थव्यवस्था शेतक-यांच्या ताब्यातुन निसटुन दलालांच्या हाती गेली आहे. यात शेतक-यांच्या चुकाही आहेतच...पण प्रस्तुत लेखाचा तो उद्देश नाही.

निर्जलीकरणाबाबत मी मागील लेखात तोंडओळख करुन दिली आहेच. त्यामुळे अधिक टिप्पणी न करता मी प्रतिपाद्य विषयाकडे वळतो.

निर्जलीकरण म्हणजे नेमके काय?

१. भाजीपाला हा नाशवंत असतो कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोम्यटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे.
२. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.
३. पुर्व-प्रक्रिया ते packaging हा झाला महत्वाचा टप्पा. यात भाज्यांच्या मगदुराप्रमाणे (त्यातील जलांश व एकूनातील घनता...) यानुसार प्रक्रियापद्धत पुर्वनियोजित करणे. ती राबवने आणि त्याचे अंतिम परोक्षण करून packaging करने.

आता आपण प्रक्रिया समजावून घेवुयात. त्याचे खालील टप्पे पडतात.

१. स्वछ्ता: ज्या भाज्या/फळभाज्या वा फळे निर्जलीकुत करायची आहेत त्या स्वछ धुवुन घेणे. यासाठी साधे प्रेशर स्प्रेयर्स वापरता येतात. (मांस-माशांसाठी वेगळी पद्धत आहे. ती मी नंतर स्पष्ट करेलच.)

२. कापणे: मुळे वा खराब भाग दुर करून प्रक्रियायोग्य मालाचे कटिंग/स्लायसिंग करने. त्याचा आकार काय ठेवायचा याचा निर्णय घेणे. समजा मुळ कोबीचा आकार वेगवेगळा असु शकतो. त्याचे एकसमान पद्धतीने कटिंग होणे आवश्यक असते.

३. ब्लांचिंग: मुळ पदार्थाचा मुळ रंग प्रक्रियेत हरपु नये, उलट तो अधिक उठावदार असावा यासाठी ही एक अत्यंत साधी पद्धत आहे. म्हनजे २ ते ५ मिनिट (पदार्थाच्या घनतेनुसार) उकळत्या पाण्यात बुडवुन काढने. जाळीदार ट्रे मद्धे ते ठेवुन सारे पाणी निथळुन जावू देणे. फळे ही नायट्रेट असिडच्या सौम्य द्रावणात बुडवुन ठेवावी लागतात.) वरील दोन्ही कार्ये मानवी श्रमाने करायची आहेत. आवश्यकता भासली तरच यांत्रिक साधनेही वापरता येतात.

४. निर्जलीकरण: निर्जलीकरण हे टनेल ड्रायर मद्धे करने सर्वोत्तम आहे. टनेल ड्रायर म्हणजे १० मीटर ते २० मीटर लांबीचा, क्षमतेनुसार वेगवेगळ्या रुंदीचा एक हवाबंद पण नित्य-प्रक्रिया करणारा महत्वाचा घटक आहे. या ड्रायरमद्धे स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा फिरता पट्टा असतो. या टनेलमद्धे उष्ण हवा मध्यम वेगाने वाहती ठेवायची असते. हवेची उष्नता नियंत्रकांमार्फत नियंत्रीत ठेवली जाते. (प्रत्येक प्रकारच्या पदार्थासाठी वेगळी उष्णता पुरवावी लागते.)

या बेल्टवर सरासरी १ ते २ इंच उंचीचा समांतर स्तर येईल अशा पद्धतीने कापलेल्या भाज्या पसरवायच्या असतात. बेल्ट सरकावण्याचे हे कार्य यांत्रिक वा मानवी असू शकते.

या टनेलमद्धुन जो उष्ण हवेचा प्रवाह आहे तो इलेकत्रिकल हीटर्स वा स्थानिक शेत-कच-याला जाळुन निर्माण करता येवू शकतो. पण ईलेक्ट्रिकल हीटर्स हे समतोल तापमान पुरवु शकत असल्याने तेच अधिक उपयुक्त ठरतात.

या टनेल ड्रायरला काचेच्या निरिक्षण खिडक्या असतात. तसेच वाळला जात असलेला माल खालीवर करणारे पट्टे असतात. रंग आणि टेक्स्चर या अनुभवाने आलेल्या बाबींनुसार मालाची वाळल्याची प्रत कळते. माल बाहेर येतांना त्याची सातत्याने पडताळणी करुन योग्य प्रमाणात निर्जलीकरण झाले आहे कि नाही...नसल्यास ते नंतर पुन्हा छोट्या ड्रायरमद्धे वा टनेल ड्रायरमद्धेच वेगात करुन घेता येते.

मालात कोणत्याही प्रकारचा अनुपयुक्त वा घातक (उदा. पिना, टाचण्या वा चुकीचा.) कोणताही पदार्थ नाही ना...याची खात्री करुन घावी लागते.

टनेलमधुन माल बाहेर आला कि तो नैसर्गिक तापमानाच असेल याची खात्री मुळात टनेळ ड्रायर बांधतांना करुन घेतली असल्याने हवेतील नैसर्गिक आद्रता माल पुन्हा शोषणार नाही याची खात्री असली तरी त्यावर लक्ष ठेवावे लागते.

५. बाहेर येनारा माल दर्जाची पातळी गाठत असेल तर तो लगोलग कारटन्स मद्धे प्याक करायचा असतो. म्हनजे वातावरणातील आद्रता शोषली जाणार नाही.

आता:

प्रत्येक शेतमालात नैसर्गिक जलाचे प्रमाण वेगवेगले असते. हे प्रमाण ५०% ते ९०% एवढे असू शकते. एवढेच नव्हे तर एकाच प्रकारच्या भाज्यांत त्यांच्या स्थिती=परिप्रेक्षात ते बदलते असु शकते...अगदी एकाच गावातील. एकाच शेतातील. यावर तोडणी कधी-कोणत्या क्रमाने झाली आहे वा अकाळी पावुस आला आहे वा आद्रता वाढली आहे...इ.इ.इ. घटक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ड्रायिंग प्रक्रिया सुरु करण्याआधी पदार्थांतील सरासरी जलांश माहित असणे गरजेचे आहेच पण त्यासाठी उपयुक्त अशी स्वस्त उपकरणे उपलब्ध आहेतच. त्यांचा काटेकोरपणे उपयोग करणे आवश्यक आहे.

५०% जलांश असणा-या भाज्यांना सरासरी ६० ते ८० डीग्री तापमानात वाळवण्यास पदार्थाच्या जाडीनुसार सरासरी ३ ते ६ तास लागतात. म्हणजे कोथींबीरीला ३ तास लागणार असतील तर फुलकोभीला ६ तास लागतील. जलांश वाढेल तसतसे हे प्रंआण वाढत जाते. त्याचे शास्त्रीय फार्म्युलेही मी नंतर देतोच आहे. त्यामुळे गोंधळ उडनार नाही.

एका गावात वा परिसरात सरासरी फळ-फुल-पालेभाज्या यांचे सरासरी उपलब्ध होवू शकनारे प्रमाण लक्षात घेवुनच प्लांटची क्षमता ठरवता येईल. हा प्लांट १२ महिने जरी नाही तरी किमान ८ ते १० महिने चालवता येईल अशाच प्रकारे डीझाईन करायला हवा. मी शोधलेल्या पद्धतीमुळे (म्हणजे जाळीदार बेल्ट आणि तोही टनेलच्या मध्यातुन प्रवास करणारा) यामुळे किमान ४०% उत्पादन क्षमता वाढते आणि हे सत्य मानेस्मान डीम्याग सारख्या जर्मन कंपनीने मान्य करुन तसे बदल त्यांच्याही डिझाईनमद्धे करुन घेतले आहेत.

हे फार सोपे आहे. यात कोणतीही रोकेट टेक्नोलोजी नाही. यातील गुंतवणुक अत्यंत लहाण आहे. सरकारी योजनाही दिमतीला आहेत. पण यातील आर्थिक बाजु मी तुम्हाला पुढील लेखात स्पष्ट करेलच...आणि मुख्य मुद्दा...हे सारी ठीक आहे...पण हा निर्जलीक्रुत माल विकायचा कोठे? काळजी करु नका...मी त्यावरही सविस्तर लिहितो. मला तुम्हाला सर्व टेक्निकल डिझाईन्सही द्यायचीच आहेत...ती मी वेगळ्या पद्धतीने अपलोड करतो...तुम्हीच व्हा तुमच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनाचे खरे शिल्पकार....माझी साथ आहेच.

2 comments:

  1. very good project. this will improve the income of small farmers. will you provide technical know how to new enterprener.

    ReplyDelete
  2. very informative article sir...thanks:)

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...