Saturday, April 9, 2011

निर्जलीकरण का?


भारतात निर्जलीकृत शेतमालाच्या प्रकल्पांची चर्चा सुरु झाली ती जागतिकीकरण आल्यावर. मलाही यात रस असल्याने मी नेदरलँड, इंग्लंड व अमेरिकेतील लहाण ते अवाढव्य प्रकल्पांना भेटी दिल्या. यात विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे भारतात वापरता येणार नाही हे माझ्या लक्षात आले. भारतातील कांदा निर्जलीकरणाचे प्रकल्प का यशस्वी झाले नाहीत तेही लक्षात आले. पण मुलभूत तंत्रद्न्यान मात्र समानच राहनार होते पण बाकीचे अनेक पॅरामीटर्स बदलावे लागणार होते. मी भारतात परत येऊन स्वतंत्रपणे एक पायलट प्लांट टाकला आणि त्यात जवळपास सहा महिने विविध प्रकारच्या भाज्या, फळे ते मासे यावर प्रयोग केले. ते अत्यंत यशस्वी झाले. त्या काळात मला काश्मिरमध्ये हा प्रकल्प नेण्याची कल्पना (माझ्या अनेक मित्रांच्या मते अवदसा) सुचली. यावर तिकडे खर्च केलेले पैसे तर गेले पण प्रकल्प झाला नाही. २००३ साली मी दुस-या अन्य कारणाने एवढ्या प्रचंड अडचणीत आलो की मला माझे होते ते अन्य ४-५ उद्योग बंद करावे लागले. पण निर्जलीकरण हा विषय कधीच मनातून गेला नाही. मी शक्य तेवढा या तंत्रज्ञानाचा प्रचार करतच राहिलो. शेतक-यांना संकटातून कायमचे मुक्ती देणे हे केवळ निर्जलीकरणाचे सोपे तंत्रद्न्यान वापरण्यावर अवलंबून आहे असे मला वाटते. जे मला माहित आहे ते दुस-यांना देण्यात मला आनंदच आहे.  

भारतामद्धे दरवर्षी ५८००० कोटी मुल्याच्या फळ-पालेभाज्या आणि फळे वाया जातात. हा झाला सरकारी आकडा..प्रत्यक्षात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने वाया जाण्याचे प्रमाण आहे. याला मुख्यत्वे कारण आहे प्रक्रिया उद्योगांचा आणि शीतग्रुहांचा अभाव. एकुण उत्पादनापैकी २-३% पेक्षा अधिक शेतमालावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया अनेक पद्धतीने होवू शकतात...पण त्या अत्यंत महागड्या असल्याने (उदा. डीप फ्रीझिंग) अंतत: त्याच्या किंमती अवास्तव वाढतात व त्याला हवी तशी बाजारपेठ मिळत नाही.

निर्जलीकरण ही सर्वांच्या परिचयाची, मानवाने हजारो वर्षांपुर्वी शोधलेली प्रक्रिया आहे. आपण रोज कितीतरी निर्जलीक्रुत पदार्थ आहारात रोज वापरत असतो. धने असोत कि हळद, सुके मासे असोत कि वाटान्यादी कडधान्ये. अर्थात ती उन्हात उघड्यावर वाळवलेली असतात. पण त्यामुळे ती हायजिनिकही नसतात. सुदैवाने भारतात सुर्यप्रकाशाची कमतरता नाही. पण वेळोवेळी होणारे वातारणीय बदल, अवकाळी पावुस इ. कारणांनी केवढे फटके बसतात हे आपण दरवर्षी बघत असतो त्यामुळे वाया जाणारा माल ही राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संपत्तीचा नाशच असतो. शिवाय साराच शेतमाल उन्हात वाळवता येत नाही.

क्रुत्रीम रित्या नियंत्रीत तापमानात अत्यंत आरोग्यदायी पद्धतीने शेतमालावर निर्जलीकरणाची प्रक्रिया करता येते हा शोध औद्योगीक क्रांतीनंतर कल्पक संशोधकांनी लावला आणि त्यातुन अवाढव्य पकल्प उभे राहीले. भारतात उन-वाळवणी सोडली तर नवे आर्थिक धोरण येईपर्यंत हे तंत्रद्न्यान आले नव्हते. अजुनही ते अत्यंत मर्यादित आहे. याचे खरे कारण म्हणजे त्यांनी युरोपियन तंत्रद्न्यान जसेच्या तसे येथे वापरण्याचा प्रयत्न केला. भारतातील वातावरणीय परिस्थीती, ठिकठिकाणचे बदलते वायुमान, हवेतील आद्रता, तापमान याचा विचारच केला नव्हतात त्यामुळे अनेक कारखाने बंद पडले. काहींचे हेतुही प्रामाणिक नव्हते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुळात अत्यंत साधे-सोपे असणारे हे तंत्रद्न्यान पुरस्क्रुत केले गेले नाही...सरकार यात मागे पडले.

शेतमालाचा विनाश तसाच चालु राहिला.

आणि आजही आपण बदललो नाही तर तो तसाच सुरू राहील.

निर्जलीकरणामुळे शेतमालाचे आयुष्य तर वाढतेच (किमान २ वर्ष) पण वजनही कमी झाल्याने वाहतुकीचा खर्च कमी होतो. चवीतही वाढ होत असल्याने ती जनसामांन्यात लवकर लोकप्रिय होवू शकतात. किंचीत खराब झालेला, बाजारात नेता येवु शकत नसलेलाहे माल प्रक्रियाक्रुत करता येवु शकतो.

आपण खालील पदार्थ निर्जलीक्रुत करु शकतो:

कोथिंबीर ते सर्व पालेभाज्या, फळभाज्या, टोम्यटो ते सर्व प्रकारची फळे, मांस- मासे इ.

प्रत्येक पदार्थासाठीच्या प्रक्रियेत ठोडाफार फरक असतो जे मी ते पुढील लेखत स्पष्ट करेलच. या प्राथमिक लेखाचा उद्धेश आहे तो असा:

१. शक्य तेवढ्या शेतमालावर गावोगावी छोट्या निर्जलीकरण प्रकल्पातुन प्रक्रिया करणे.
२. स्थानिक रोजगार वाढवणे.
३. एक पातेही/फळही फेकुन द्यावे लागनार नाही याची कालजी घेणे.
४. बाजारभाव आपसुक नियंत्रीत करणे. (बाजारभाव उत्पादन किंमतीपेक्षा कमी असले तर एक किलोही ताजा माल बाजारात न पाठवणे.)
५. प्रक्रियाक्रुत मालाचे विपणन करण्याची यंत्रणा उभारणे.
६. शेतमालाची एकुणातील मुल्यव्रुद्धी साधणे.

यातुन शेतक-यांना मोठेच आर्थिक बळ मिळेल. गावोगावी (वा ४-५ गावे मिळुन एक) असे प्रकल्प उभे झाले तर ,मोठी शेतकी क्रांती घडुन येवु शकते. हे तंत्रद्न्यान खरोखर खुप सोपे आहे. मोठ्या भांडवलाची गरज नाही. कुशल तंत्रद्न्यांची आवश्यकता नाही. ट्रेनिंग/तंत्रद्न्यान द्यायला मी तयार आहे. (कसलीही अपेक्षा नाही). हा प्लांट आपल्या नजीकच्या वर्कशोपमद्धे बांधुन घेता येईल...असे प्लांट बनवणा-या कंपन्याही आहेत...पण त्यांचे दर अवस्तव असतात.

पुढील लेखांत मी खालील माहिती देणार आहे:

१. प्रक्रिया पद्धती (विविध फळ-पालेभाज्यांसाठी.)
२. तंत्रद्न्यान
३. भारतीय व जागतीक बाजारपेठ
४. विपणन (मार्केटिंग)
५. कशी सुरुवात कराल?

आपल्याला जर खरी शेतकी क्रांती घडवायची असेल, शेतक-यांना दैन्यावस्थेतुन बाहेर काढायचे असेल तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. एक लक्षत घ्या निर्जलीक्रुत शेतमाल जगभर मागणीत आहे. असंख्य पदार्थ आपण रोज आहारात वापरत आलेलोच आहोत. निर्जलीकरण केल्याने मुळ चवीत कसलाही फरक पडत नसून उलट त्यात वाढच झालेली असते. नियंत्रीत वातावरणात उत्पादन केल्याने ताज्या मालापेक्षा हे निर्जलीक्रुत पदार्थ कैक पटीने आरोग्यदायी असतात. निर्जलीकरण म्हणजे अन्य काही नसून फळ-पालेभाज्यांतील अतिरिक्त जल आपण नियंत्रीत तापमानात काढुन घेत त्याचे आयुष्य वाढवत असतो. त्यात कसलेली अन्य द्रव्य मिसळावे लागत नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे शुद्ध रहात असते. दिवसा १ टन ते १० टन कच्च्या मालावर पर्क्रिया करता येईल असे लघु प्रकल्प अधिक यशदायी ठरतील.

पुढील लेख मी टाकत जातोच...दर्म्यान जेवढ्याही शंका असतील...विचारा.

6 comments:

  1. Sir, can u list down the food stuff that can be dehydrated which will be useful for agri-entrepreneur.
    Thanks for focusing on this issue.

    Raviraaj

    ReplyDelete
  2. Sir,
    I have my own workshop at Taloja MIDC. I am ready to fabricate such a plants. Kindly guide.

    Regards,
    Raviraaj

    ReplyDelete
  3. Sir,मी organic भाज्या, फळ ह्यामध्ये काम करतो.मला ह्या प्रोजेक्ट संबंधी माहिती हवी आहे..capital cost किती असेल तसेच इतर पूर्ण माहिती..waiting for ur reply

    ReplyDelete
  4. Sir नमस्कार ,
    साधारणतः 5 वर्षांपासून degydration बद्दल माहिती घेत आहे,आणि तुम्हि दिलेली माहिती फारच सुंदर आहे .
    मला कांदा प्रक्रीया उद्योग उभारायचा आहे तरी मला तुमच्यांशी भेटून बोलता येईल का?
    नाव: योगेश वामन मासुळे
    पत्ता :गाव सडगाव ता. जि. धुळे
    आत्ताचा पत्ता:7 अप्पा निवास ताई अर्चेड जवळ, पाषाण पुणे 21
    संपर्क:8698779768
    ई-मेल:yogeshmasule90@gmail.com

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...