विद्युल्लता
लखलखतात दशदिशांतून
रुद्रध्वनी उन्मळतो
आकाशगर्भातून
ऒंकारस्वर करीत
सोसाटत हवा वाहते अशी कि
धरतीने घातले आहे
लोटांगण
या शिवमय अवकाशास
जाण्यासाठी शरण!
मीही विनम्र
कणाकणाप्रमाणेच या चराचराच्या
व्रुक्षवेलींसारखा आणि
थबकलेल्या ...
ओथंबलेल्या
चिंब भिजल्या
क्षणांसारखा
अंतरात नाद अनाहत...
ॐ त्र्यंबकं यजामहे...
तोही भिजलेला
चिंब चिंब झालेला...
स्वर तो अविरत
या वेड्या
अनाहुत पावसासारखा...
आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!
पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
No comments:
Post a Comment