विद्युल्लता
लखलखतात दशदिशांतून
रुद्रध्वनी उन्मळतो
आकाशगर्भातून
ऒंकारस्वर करीत
सोसाटत हवा वाहते अशी कि
धरतीने घातले आहे
लोटांगण
या शिवमय अवकाशास
जाण्यासाठी शरण!
मीही विनम्र
कणाकणाप्रमाणेच या चराचराच्या
व्रुक्षवेलींसारखा आणि
थबकलेल्या ...
ओथंबलेल्या
चिंब भिजल्या
क्षणांसारखा
अंतरात नाद अनाहत...
ॐ त्र्यंबकं यजामहे...
तोही भिजलेला
चिंब चिंब झालेला...
स्वर तो अविरत
या वेड्या
अनाहुत पावसासारखा...
आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्र पुरोगामी होता कि प्रतिगामी?
प्रत्येक प्रदेशाची स्वता:ची अशी स्वता:ची संस्क्रुती असते. संस्क्रुतीत भाषा , साहित्य , कला , धर्मशास्त्र , युद्धशास्त्र , राजशास्त्र , अर्...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...
No comments:
Post a Comment