Monday, September 24, 2012

हवेत ते फक्त सहप्रवासी....

आपल्याला विश्व आपल्याशी जोडायचे असेल तर सर्वप्रथम आपण वैश्विकतेचे विनम्र पाईक व्हायला हवे. श्रेष्ठत्ववाद्यांना मिळाले तर मिळतात फक्त गुलाम...विश्ववाद्यांना मिळतात सहप्रवासी. अनुयायी मुळीच नकोत...हवेत ते फक्त सहप्रवासी. एकमेकांना समजावून घेत, हातात हात घेत एकमेकांचे अश्रू पुसत वा एकमेकांपासून अनिवार जिद्द घेत पुढचा काटेरी, तरीही सुखदायक वाटनारा मार्ग तुडवू शकतात तेच जगात खरी क्रांती घडवू शकतात. हा मार्ग भेकडांचा नव्हे तर शूरवीरांचा आहे. गुलाम (मग ते वैचारिक असोत, राजकीय असोत कि आर्थिक) बनवू पाहणारे नेहमीच भेकड असतात कारण त्यांचा मानवी मूल्यांवर कधीही विश्वास नसतो. भेकडांचे महाभेकड गुलाम व्हायचे कि वीरांचे सहप्रवासी हे आपणच ठरवायला हवे...किमान एवढेही स्वातंत्रय आपल्याला वापरता येणार नसेल तर आपण गुलामच व्ह्यायच्या लायकीचे आहोत हे पक्के समजुन चालावे!

2 comments:

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...