- आभाळ उतरले माझ्या इवल्या डोळ्यांत...
आभाळ भरले माझ्या इवल्या ह्रुदयात...
कण-कण देहाचा व्यापुन म्हणाले आभाळ
"चल वेड्या आली, आता झरण्याची वेळ!"
मी झरलो जेथे अथांग होती धरती
ती चुंबत मी विरत गेलो तिचीया गात्री
"ती आणि मी" हा अपार होता सोहोळा
अन मी उगवत होतो होवुन मृदूल त्रुणपाती...
तिच्या कुशीमधुनी, जगण्या जीवन गाणे...
आभाळ म्हणाले "वेड्या...यालाच म्हणती जगणे..."
Subscribe to:
Post Comments (Atom)
काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!
महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...
No comments:
Post a Comment