Saturday, February 22, 2014

वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म ?


वैदिक धर्म म्हणजे काय?

मी वैदिक/अवैदिक अथवा वैदिक धर्म आणि शैवधर्म अशी मांडणी करत असतांना अनेक मित्रांनी मला या दोहोंतील नेमका भेद सांगण्याचे आवाहन केले होते. खरे तर खालील लेख माझ्या ब्लोगवर गेली दोन वर्ष होता. पण अधिक स्पष्टिकरणासाठी त्यातच नेमकी भर घालत त्याची माहिती देत आहे.

सनातन वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म आहे अशी सर्वसाधारण सामाजिक मान्यता आहे, पण ते वास्तव नाही. हिंदू धर्माची व्याख्या न होऊ शकण्याच्या कारणांत वैदिक तत्व आडवे आल्याने ती होऊ शकलेली नाही आणि वैदिकांना हिंदू म्हणवून घेतल्याखेरीज वैदिक धर्मसत्ताही राबवता येत नाही त्यामुळे गोंधळ झाला आहे. खरे काय आहे हे समजावुन घेण्यासाठी मुळात वैदिक धर्म म्हणजे नेमके काय आहे हे माहीत असायला हवे. कोणताही धर्म वेगळा आहे हे ओळखण्याचे साधन म्हनजे:

१. मान्य धर्मग्रंथ
२. धार्मिक कर्मकांड
३. धार्मिक श्रद्धा
४. परलोकजीवनाविशयक कल्पना
५. मान्य जीवन मुल्ये
६. संस्थापक.

वैदिक धर्माची वरील मुद्द्यांवर चर्चा करुयात.

१. ऋग्वेद हा वैदिक धर्मियांचा महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या वेदात यज्ञप्रसंगी म्हणावयाचे मंत्र आहेत. वैदिकांचे सामाजिक, धार्मिक, विश्वोत्पत्तीशास्त्र यात सामाविष्ट आहे. त्याचबरोबर ब्राह्मणे, मनु ते अन्य स्मृती या धर्माचे नियमन करणारे धर्मग्रंथ आहेत. ऋग्वेदात काही सुक्तात इतिहासविषयकही अनेक ऋचा आहेत. सामवेद हा स्वतंत्र वेद नसुन ऋग्वेदातील ऋचा कशा गायच्या याचे दिग्दर्शन करणारा वेद आहे तर यजुर्वेद हा काही विशिश्ट यद्न्यांचे सांगोपांग वर्णन करणारा वेद आहे. अथर्ववेद हा चवथा वेद म्हणुन इ.स.पु. च्या ४थ्या शतकापर्यंत मान्य नव्हता. खरे तर अथर्ववेद हा मुळ वैदिक धर्माचा भाग नाही.

२. वैदिक धर्माचा उदय सरस्वती नदीच्या काठी राज्य करणार्या सुदास राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणजे वशिश्ठ होय. त्याचा काळ हा सरासरी इ.स.पु. १५०० वर्ष असा अंदाजिला गेला आहे. (माझ्या मते हा काळ इसपू आठवे ते नववे शतक एवढाच आहे.)

३. ऋग्वेदाची एकुण दहा मंडले असुन तो १० ऋषिकुळांतील ३५०च्या वर व्यक्तिंनी रचला आहे. ऋग्वेद रचना ही जवळपास २-३०० वर्ष सुरु होती. यात एकुण १०२८ सुक्ते आहेत.

४. यद्न्य हे वैदिक धर्माचे महत्वाचे कर्मकांड असुन यद्न्यात विविध द्रव्ये, मांस यांची आहुती देवुन इंद्र, मित्र, वरुण, नासत्यादि शेकडो देवतांना आवाहन करत त्यांच्याकडुन धन, पशुधन, दिर्घायुष्य, आरोग्यादिची मागणी करणार्या ऋचा म्हटल्या जातात. अनेक यद्न्य तर १२-१२ वर्ष चालणारे असत.

५. वैदिक धर्मियांच्या देवता अमर नसुन त्यांचे आयुष्य मानवापेक्षा खुप मोठे असते ही श्रद्धा. म्हणजे इंद्रसुद्ध मर्त्य्यच, कारण अमरतेची संकल्पना वैदिक धर्मात नाही. वैदिक देवता या बव्हंशी निसर्गाची प्रतीके आहेत. उदा. इंद्र हा पर्जन्याचे तर मित्र हा सुर्याचे प्रतीक आहे. परलोकाची संकल्पना वैदिक नाही.

६. वैदिक धर्मात मोक्षाची, आत्म्याची, पुनर्जन्माची संकल्पना नाही. तसेच संन्यास मान्य नाही. दीर्घायुरोग्य लाभो हीच अपेक्षा असंख्य ऋचांमधुन केली आहे. संततीहीण मनुष्य वैदिक समाजाला मान्य नव्हता...म्हणुनच संन्यासही मान्य नव्हता.

७. आश्रमव्यवस्था (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास) ऋग्वेदात नाही. ती प्रथा वैदिक नाही. असुर प्रल्हादाचा पुत्र कपिल मुनीने सर्वप्रथम आश्रम व्यवस्था प्रचलित केली. तिचा वैदिक धर्माशी संबंध नाही.

८. यद्न्यसंस्थेभोवतीच सारे वैदिक कर्मकांड फिरते.

९. वैदिक धर्मात मुर्ती वा मुर्तीपुजेला स्थान नाही. "पुजा" हा शब्द मुळचा द्राविड असुन त्याचा अर्थ होतो "माखणे", म्हणजे जल, तेल, सिंदुर वा प्रसंगी रक्ताने पुज्य मुर्तीला माखणे म्हनजे पुजा. पुढे तिचा अर्थ अधिक व्यापक झाला, पण पुजा ही वैदिक नाही.

१०. सोमरस प्राशण हा महत्वाचा धार्मिक विधी होय. ऋग्वेदाचे पहिले मंडल तर पुरेपुर सोमसुक्तांनी भरलेले आहे. सोम म्हनजे इफेड्रा ही नशा आननारी वनस्पती होते असे धर्मानंद कोसंबी यांनी म्हटले आहे. सोम म्हणजे भांगही असावी असेही एक मत आहे. सोमपान करुन नशा होत असे एवढे मात्र खरे.

११. वैदिक समाज हा पित्रुसत्ताक पद्धतीचा होता. स्त्रींयांना यद्न्यात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. एकही वैदिक मंत्र स्त्रीच्या नांवे नाही हे येथे नमुद केलेच पाहिजे.

१२. वैदिक धर्मात वर्णांतर सहज शक्य होते. म्हनजे क्षत्रिय ब्रह्मकर्म करु शके तर वैश्यही क्षत्र कर्म करु शके. याचे महत्वाचे कारण म्हणजे "ब्रम्ह" या शब्दाची ऋग्वैदिक व्याख्या. ऋग्वेदानुसार "ब्रह्म" म्हणजे "मंत्र". जोही मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी अत्यंत सुट्सुटीत व्याख्या आहे ही. थोडक्यात मुळ ऋग्वेदात वर्णव्यवस्था जन्माधारित नव्हती. पुरुष सुक्त हे प्रक्षिप्त आणि वर्णव्यवस्था सुद्ड्रुढ झाल्याच्या काळात ऋग्वेदात घुसवण्यात आलेले आहे.

१३. अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही. किंबहुना यद्न्यांचा पाया हा हिंसा हाच होता व आहे.

१४. संस्कार हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. गौतम धर्मसुत्रानुसार ४८ संस्कार दिले असले तरी ऋग्वेदात फक्त ३ संस्कार आहेत. पुढे वैदिक धर्मात फक्त १६ संस्कार महत्वाचे मानले जावु लागले ते असे-
गर्भादान, पुंसवन, सीमंतोन्न्यन, जातकर्म, नामकरण, निष्क्रम, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाहाग्नी स्वीकार व दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या ३ अग्नींचा संग्रह...म्हणजे अग्निहोत्र.

१५. कुलदैवत/देवता वैदिक धर्माला मान्य नाहीत. गोत्र/प्रवर या त्यांच्या संकल्पना.  शिव, पार्वती, गणपती, मारुती वा त्या परिवारातील मुर्ती-तांदळा स्वरुपात पुजल्या जाणा-या देवता अवैदिक असुन यद्न्यप्रसंगी या देवतांनी विघ्न आणु नयेत अशा अनेक प्रार्थना ऋग्वेदातच आहेत. शिवास "शिस्नदेव" असे हीणवण्यात आले असुन त्याला "स्मरारि" (म्हणजे यद्न्याचा विध्वंसक) अशी संद्न्या आहे. विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांसाठी विनायक हा "विघ्नकर्ता" होता...विघ्नहर्ता नव्हे. वैदिक धर्मात नसलेल्यांना "अयाजक" (यद्न्य न करणारे) असे संबोधुन त्यांची हेटाळणी केली आहे. तसेच वैखानस, समन, यती, संन्यासी अशा अवैदिक पंथीयांचीही निंदा केली आहे.

१६. या धर्माचा मुळ संस्थापक वशिष्ठ ऋषि असुन त्याच्या सोबतची अन्य ९ ऋषिकुले सहसंस्थापक मानता येतात. ही सारी ऋषिकुले सुदासाच्या काळात होती व जोवर सुदासाचा वंश चालु राहीला तोवर ऋग्वेद व अन्य वेदांची रचना होत राहीली.

१७. वेद हे मौखिक परंपरेने जतन करण्यात आले अशी एक श्रद्धा आहे. परंतु त्याबाबत शंका आहे. वेद विस्म्रुत झाले म्हणून अवशिष्ट वेद एकत्रीत करुन मग त्या संहितेचे वेदव्यासांनी चार भागांत विभाजन केले असे परंपरेने मानले जाते. हे वेदव्यास म्हणके महाभारतकार व्यास नव्हेत. मुळ वेद नेमके कोणत्या भाषेत होते यावर आता संशोधन सुरु आहे. मुळ वेदांची भाषा ही संस्क्रुत असणे शक्य नाही असे माझे मत आहे आणि त्याबाबत विपुल पुरावे सामोरे येत आहेत.

१८. गोत्र ही संकल्पना सर्वस्वी वैदिक धर्मियांची आहे.

१९. ऋग्वेदातील ऋचांमधून संततीची मागणी १३७ वेळा, अन्नाची २३७ वेळा, संरक्षणाची ४५० वेळा तर धनाची मागणी ७९० वेळा आली आहे. परलोकजीवनासाठी अथवा स्वर्गप्राप्तीसाठी एकही मागणी नाही. वैदिक धर्म सर्वस्वी इहवादी आहे.

२०. ओंकार हा ऋग्वेदात अथवा कोणत्याही वैदिक साहित्यात येत नाही. ऒंकाराला (जो आपण शिवासाठी वापरतो) जन्म शैवांनीच दिला आहे.
वरील माहिती अत्यंत थोडक्यात असुन महत्वाचे मुद्दे तेवढे दिले आहेत. सखोल माहिती ज्यांस हवी आहे त्यांनी मुळात वेद वाचलेलेच बरे.

आता वैदिक धर्म आणि आपल्या शैवप्रधान धर्मात जमीन आस्मानाचा फरक असल्याचे आपल्या लक्षात येईल. आजचा हिंदू धर्म हा वेदाधारितच नसल्याने वैदिक महत्ता, वेदमान्यता, स्मृतीमान्यता हे दांभिकतेचे स्तोम असल्याचे आपल्या लक्षात येईल.

पण तरीही हा धर्म आज पृथक रित्या अस्तित्वात आहे हे वास्तवही समजावून घ्यायला हवे. ते कसे हे थोडक्यात पाहुयात.

१. वर्णव्यवस्था हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. तीन वर्ण वगळता जेही बाकीचे आहेत ते शुद्र-अतिशुद्र असून वैदिक धर्मियांच्या दृष्टीतून व धर्मवचनांतून वेदबाह्य समाज अथवा विद्वानांच्याच मतांनुसार अनार्य आहेत.

२. जेही वर्णव्यवस्था पाळतात, वर्णाचे जन्मजात अधिकार भोगतात व त्यानुसार सामाजिक उतरंड ठरवतात ते वैदिक आहेत..

३. ज्यांनाही जन्मजात वेदांचा व वेदोक्त संस्कारांचा अधिकार आहे व जेही ते वेदोक्त संस्कार (उपनयनादि) करवुन घेण्यास जन्माधारित पात्र आहेत वा करवून घेतात ते वैदिक आहेत.

३. जेही समाज वैदिक धर्माचार्यांची पुर्वांपार मान्यता नसतांनाही स्वत:ला ब्राह्मण, क्षत्रीय अथवा वैश्य समजतात व वर्णव्यवस्थेची पाठराखन करतात ते छद्म-वैदिक धर्मिय आहेत.

४. पोटार्थी म्हणुन वैदिक असुनही शैव देवतांचे पौरोहित्य करतात ते द्वैधर्मिय (म्हणजे दोन धर्मांचे आणि म्हनून पाखंडी) असतात. हे लोक हिंदू धर्माला जास्त धोकेदायक आहेत. वैदिक धर्माला मुर्तीपूजा मान्य नाही आणि ते शिवपरिवाराच्या देवतांचे ऋग्वेदकालापासून ते पौराणिक काळापर्यंतचे कट्टर विरोधक होते.

५. उपनिषदे वैदिक धर्माचे अंग नाही. किंबहुना उपनिषदे ही वेद व यज्ञविरोधी आहेत...ती शिव-शक्तीचे महिमान गातात त्यामुळे  औपनिषदिक तत्वज्ञान वैदिक तर नाहीच पण  सांख्य, वैशेषिक आणि न्यायदर्शनेही वैदिक नाहीत.

६. तरीही वैदिक समाज या तत्वज्ञानावरही मालकी सांगतो आणि त्याच आधारावर आपला वर्चस्वतावाद निर्माण करतो या मुळे हिंदू धर्मात विषमतेची आणि न्युनगंडाची विषारी बीजे पेरली गेलेली आहेत. पण सर्व तत्वज्ञाने वैदिक नाहीत...ती शैव तत्वज्ञाने आहेत हे वास्तव समजावून घ्यायला हवे आणि आपल्या जन्मजात न्य़ुनगंडातून बाहेर यायला हवे.

७. समता हा शैव तत्वज्ञानाचा मुलाधार असून समतेचे तत्व पाळेल तोच शैव अथवा हिंदू...बाकी सारे वैदिक. मग तो जन्माने असो कि विचारांनी असो!

44 comments:

  1. उत्कृष्ट लेख !

    या संदर्भात जिज्ञासूंना सखोल माहिती हवी असल्यास वाचा:

    "हिंदू विरुद्ध वैदिक" हे श्री पार्थ पोळके यांचे पुस्तक.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. हिंदू धर्म
    भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या भारतातील वैविध्यपूर्ण पंथ,संप्रदाय,समाज आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते.इस्लामपूर्व काळातील भारतात वस्तूतः विवीध संप्रदाय, पंथ आणि दर्शनशास्त्र तत्वज्ञानाचे वैवीध्य होते. चार्वाक,सांख्य,न्याय,वैशेषिक,मिमांसा,वैदिक ही दर्शन शास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत आणि गुरू जनांनी सागीतल्याप्रमाणे कौटूंबिक पातळीवर जाती-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्ट आणि जीवनपद्धती स्विकारल्या जात सोबतच जैन आणि बौद्ध या धर्म तत्वज्ञानांचेही अस्तीत्व होतेच, इस्लामचा उदय भारतीय क्षीतिजावर झाल्या नंतर शीख धर्माची स्थापना झाली .वैदिकात शाक्त,स्मार्थ(शैव) व वैष्णव या मूख्य शाखा असत.निसर्गातील चर अचर आणि अनेकविध श्रद्धा संकल्पना आणि मुल्यांच्या पुजांची परंपरा ही सुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिश्ट्य ठरते.
    सम्राट अशोकाचे राज्य मोठे होते .मौर्य शासन कालीन पाठबळामुळे बौद्धधर्माचे प्राबल्य संपूर्ण भारतीय उपखंडा सोबतच दक्षीण आशियाच्या सिमा ओलांडून गेले. आदी शंकरांच्या काळात धार्मीक विवाद सत्रात वैदिकांनी अद्वैत मताचा मोठा पुरस्कार करत वाक पटूतेच्या बळावर वेद प्रामाण्याची मोठ्या प्रमाणा वर पुर्नस्थापना केली.आदी शंकराच्या नंतरच्या काळात भारतभर भक्ती संप्रदायाच्या चळवळींनी वैदीकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदीकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरले. भारतातील ही सर्व संस्कृती भारता बाहेरून आलेल्या इस्लाम धर्मिय व्यापऱ्यांना एक सारखीच दिसत असे आणि त्यांचा संपर्क सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत असल्यामुळे या संपूर्ण संस्कृतीस त्यांनी हिंदू धर्म हे नामाभिधान दिले.
    भारतीय धर्म संकल्पनेस मुख्यत्वे जीवनपद्धतीचा स्वीकार करताना नितीशास्त्र आणि न्यायशास्त्र यांची सांगड घालणे अभिप्रेत होते.भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैवीध्याचा स्वीकारास मुक्तता होती,मुर्तीपुजाही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता , त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्वज्ञान पाठीशी नसताना सुद्धा भारतातील मुर्तीपूजा हे ही भारतीय संस्कृतीचचे वैशीष्ट्यच नव्हे तर मुर्तीपुजेमुळे हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  3. ज्युडायिक धर्मांमध्ये मुर्तीपुजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मुर्तीपुजा ठळक पणे दिसणे यामुळॅ भारतीय दर्शनांच्या तात्वीक बाजुंशी परिचय न होताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदूधर्म आणि मुर्तीपुजक म्हणून ओळखले जाऊ लागले. मुर्तीपुजेच्या स्वातंत्र्याचे तात्वीक समर्थन मुख्यत्वे ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टिकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नातून केले गेले.मुर्तिपुजा ही वेदपूर्व काळापासून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. वैदीक दर्शन खरेतर मुर्तीपुजक नव्हते अग्नीपुजक होते त्यातही निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला ,वैदिकांचे तत्वज्ञानातील मुख्य विरोधी साख्यांचे दर्शन निरीश्वरवादी असताना सुद्धा द्वैत मताचे परिणामी पुरुष ~ स्वाभाविकतेतील (स्त्री-पुरुषातील पुरूष नव्हे) सगुणात्मकता स्विकारते,साख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधि स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे येते. पूर्व मिमांसा कर्मकांडाचे(याचा अर्थ मुर्ती पुजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते पण त्यांचे वेद प्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदीक ग्रंथात स्मर्थन नसेल किंवा एखाद्दा गोष्टीचा विरोध जरी असेल आणि प्रत्यक्ष परंपरेत असेल तर परंपरेचे समर्थनास सहसा वैदीकांनी महत्त्व दिले शिवाय ह्या परंपरा पालनांचे जाती निहायच नव्हे तर कुटूंब निहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मुर्ती आणि इतर पुजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असून सुद्धा जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर असे. .
    ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि सामुहीक प्रार्थना पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते.दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतात इश्वर संकल्पना सर्वत्र आहे पण सर्वव्यापी नाही म्हणजे असे कि प्राणि मात्र अचल वस्तूस इश्वर नियंत्रीत करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही,उलट भारतीय विचारधारेत इश्वर चराचरात अधिवासीत तर आहेचपण इश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तीगत श्रद्धा आणि व्यक्तीगत मुल्य यावर आधारीत व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य आढळते.सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणातून मुक्तता पितृ,मातृ,आणि गुरुननांच्या आज्ञांचे ,आणि व्यक्तिगत कर्तव्ये,व्यवसाय,कुटुंब, जातीसमुह, परंपरांचे जसेच्या तसे पालनाचा जीवन पद्धतीतून समतोल साधण्यास असलेले महत्त्व म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते.

    ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतीम असला तरी मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे.ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छित न्याय व्यवस्थेने इतदेशिय संस्कृतीस अनुसरून कायद्दांची आवश्यकता भासल्या नंतर भारतात राज्यकर्त्यांनी वस्तुतः कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला.ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्य तत्ववेत्त्यांनी वेदातील आर्य या शब्दाचा संबध मध्ययूरोपीयायी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषात साधर्म्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदीक लोक आणि धर्म एकुण हिंदूमधील एका प्रमूख जीवन पद्धतीचा आधार आणि एकुणच स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला , परंतु अलिकडील आधूनिक जनुकीय चाचंण्यामध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले.
    समाप्त.

    ReplyDelete
  4. वेद व वेदांगे
    भारतीय संस्कृतीचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद ह्या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या असा आहे. विद्या व कला ह्यांनाच आरंभी वेद ही संज्ञा होती आणि विविध विद्यांचा निर्देश `वेद’ ह्या संज्ञेने केला जात असे. उदा., आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, इतिहासवेद इत्यादी. वेदोत्तरकाली हा व्यापक अर्थ जाऊन ⇨ऋग्वेद, ⇨सामवेद, ⇨यजुर्वेद, ⇨ अथर्ववेद हे चारच वेद धर्मविद्या म्हणून स्वत: प्रमाण ठरले आणि ⇨ वेदकाल व वेदनिर्मितीचे स्थान ह्यांबद्दल विविध मते मांडण्यात आली.

    भारतीय तत्त्वज्ञानातील आस्तिक षड्‌दर्शनांपैकी एक असलेल्या ⇨पूर्वमीमांसा (इ. स. पू. सु. तिसरे शतक) ह्या दर्शनावरील ⇨जैमिनीप्रणीत ग्रंथात मांडण्यात आलेल्या मूलभूत सिद्धांतानुसार वेद हे स्वत:प्रमाण व अपौरूषेय आहेत. वेद हे अपौरूषेय आहेत ह्याचा अर्थ असा, की ते ईश्वराने किंवा माणसाने निर्माण केलेले नाहीत (`पुरुष’ ह्या शब्दाचा अर्थ ईश्वर वा माणूस असा आहे). पूर्वमीमांसेचे मूलभूत सिद्धांत असेही सांगतात, की ईश्वर हा मानवी बुद्धीने सिद्ध होत नाही; आणि ईश्वर वेदांच्या आधारे सिद्ध होतो असे म्हटले, तरी ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता व उपदेशक आहे; वेदांचा कर्ता नव्हे. धर्म म्हणजे मनुष्याचे कर्तव्य काय हे वेद सांगतात, त्याचप्रमाणे अधर्म म्हणजे काय, हेही ते सांगतात. धर्माचे वा अधर्माचे पारलौकिक फळ काय, हे मानवी बुद्धीस कळू शकत नसल्यामुळे धर्म वा अधर्म हा वेदांवाचून मानवी बुद्धीस कळत नाही. काही भारतीय तत्त्वज्ञाने–उदा., न्याय-वैशेषिक, वैष्णव, शैव इ.–वेद हे ईश्वरप्रणीत आहेत, असे म्हणतात. वेद ब्रह्माची नि:श्वसिते होत, असे बृहदारण्यकोपनिषदात सांगितले आहे (२.४.१०).

    आर्यनामक मानवगणांची धार्मिक प्रतीती व धार्मिक जीवन हे वेदांमध्ये मुख्यत: प्रतिबिंबित झालेले आहे. वेदांना धर्मग्रंथ म्हणून मिळालेले प्रामाण्य जगातल्या इतर कोणत्याही धर्मग्रंथांच्या प्रामाण्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आलेले आहे, असे दिसते. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेदांची रचना ज्या क्रमाने होत गेली, त्या क्रमाने हळुहळू ही सामाजिक संमती प्राप्त होत गेली. म्हणजे धार्मिक जीवनपद्धती प्रथम सिद्ध झाली व वेद हे त्या पद्धतीचे प्रतिबिंब म्हणून क्रमाने बनत गेले व पुढील पिढ्यांना प्रमाण झाले. सर्व समाजाची स्थिरावलेली मान्य परंपरा म्हणजे शिष्टाचार हा हिंदूंच्या धार्मिकतेचा आधार होय. वेदकाली जो प्रतिष्ठित समाज होता, त्याच्या धार्मिक जीवनपद्धतीचे वा शिष्टाचाराचे प्रतिबिंब वेदांमध्ये पडले. वेद हे `महाजन परिगृहीत’ म्हणून प्रमाण, असे प्राचीन हिंदू पंडित म्हणतात, ते ह्याच अर्थाने.

    वेद हे अनेक पिढ्यांनी निर्माण केलेले साहित्य आहे. ते साठत आणि वाढत गेलेले आहे. त्याचप्रमाणे एका पिढीने दुसऱ्या पिढीला तोंडी पढवून सु. तीन हजार वर्षे ते मोठ्या परिश्रमाने सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  5. वर निर्दिष्ट केलेल्या चार वेदांचे साहित्य चार प्रकारचे आहे : संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे.

    संहिता : संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. सामवेद हा गायनाच्या विविध शैलींचा संग्रह आहे. ह्या संहितेत ऋग्वेदातील बहुतेक पद्ममंत्रांचाच संग्रह आहे. यजुर्वेदात पद्यमंत्रांबरोबरच बरेचसे गद्यमंत्रही आहेत. यजुर्वेदाच्या मंत्रांमध्ये प्रार्थना, यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुतींचे `स्वाहा’ असे पद ज्या वाक्याच्या शेवटी येते, ते मंत्र, यज्ञातील विविध क्रियांचा निर्देश करणारे आणि यज्ञात म्हणावयाचे मंत्र आणि प्रार्थना वा आदेश बोधित करणारे मंत्र संगृहीत केले आहेत. अथर्ववेदातील बरेच मंत्र पद्यमय असून काही गद्यमय आहेत. बुद्धी, शौर्य, आरोग्य, रोगनिवारण, शत्रुनाश, युद्धविजय, राज्याभिषेक, गर्भाधन, नामकरण, विवाह, वशीकरण, राक्षसपिशाच इत्यादिकांपासून होणाऱ्या बाधांचे निवारण अशा प्रकारच्या उद्देशांनी वापरायचे मंत्र आहेत.

    प्रत्येक वेदाच्या शाखा आहेत. त्या शाखांच्या भिन्नभिन्न संहिता आहते. शाखाप्रवर्तक ऋषींनी प्रवृत्त केलेली त्या त्या वेदाची परंपरा म्हणजे शाखा होय. आज उपलब्ध असलेल्या एका एका वेदाच्या अनेक शाखांच्या संहिता पाहिल्या तर असे दिसून येते, की त्यांच्यामध्ये असलेले बहुतेक गद्य किंवा पद्य मंत्र सारखेच आहेत. मधूनमधून पाठभेद व काही थोडे अधिक मंत्र दिसतात. म्हणजे प्रत्येक मुख्य वेद एकच असतो. शाखाभेदाने त्या त्या वेदात पाठभेद व थोडेसे निराळे मंत्र एवढाच फरक राहिला. यजुर्वेदाच्या कृष्ण आणि शुक्ल अशा मुख्य शाखा आहेत. कृष्णयजुर्वेदाच्या संहितांमध्ये मंत्रांबरोबर, यज्ञांचे विवेचन करणार ब्राह्मणभाग अंतभूत आहे; तर शुक्लयजुर्वेदाच्या संहितांत फक्त मंत्रांचाच संग्रह केलेला आहे.

    ब्राह्मणे : ब्राह्मणे वा ब्राह्मणग्रंथ हे गद्य वाङ्‌मय आहे. विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण त्यांत असते. यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, प्रधान कर्मे व अंगभूत कर्मे ह्यांची विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने ह्यांत आलेली असतात. ह्या ब्राह्मण–वाङ्‌मयातील बराचसा भाग रुक्ष व सैल शैलीने भरलेला आहे. असे असले, तरी वैदिक संस्कृतीच्या अभ्यासकाला ह्या वाङ्‌मयाचे फार महत्त्व आहे. वेदांपासून संस्कृत भाषेच्या झालेल्या परिवर्तनाचा अखंड इतिहासही त्यामुळे समजतो. ऐतिहासिक भाषाशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून वैदिक संहितांचे संदर्भात ब्राह्मण-वाङ्‌मयाला महत्त्व आहे. [→ ब्राह्मणे].
    पुढे चालू...

    ReplyDelete
  6. आरण्यके : अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे `आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते.

    उपनिषदे : सामान्यत: जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ उपनिषदे म्हणून ओळखली जातात. अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, `उपनिषद’ ही संज्ञा आण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., `बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते. अगदी प्राचीन काळी `आरण्यक’ व ‘उपनिषद’ हे दोन्ही शब्द पर्यायशब्द असावेत. `गुरूच्या जवळ बसून शिकावयाची अध्यात्मविद्या’ हा उपनिषदाचा व्युत्पत्त्यर्थ आहे. तथापि उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. `वेदांचा अखेरचा भाग’ ह्या अर्थाने उपनिषदे ह्यांना `वेदान्त’ असेही म्हणतात. [→ आरण्यके व उपनिषदे].

    उपर्युक्त चार वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे ह्यांची माहिती मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदींच्या रूपाने यथास्थळी दिलेली आहे.

    वेदांगे : वेदांना पूर्ण प्रमाण आणि पवित्र मानणाऱ्या वैदिकांची अशी श्रद्धा होती, की वेदांतील विधिनिषेधांच्या पालनानेच आपल्या भावी पिढ्यांचे ऐहिक व पारलौकिक कल्याण होईल. त्यामुळे वेदांचे पठण पिढ्यान्‌पिढ्या चालू ठेवून वैदिक साहित्य जिवंत ठेवले गेले. त्याच कारणाने वेदांचे बौद्धिक चिंतन सुरू झाले व त्या चिंतनातून वैदिकांना बौद्धिक ज्ञानाचा पाया घालता आला. त्यातून वेदांगे निर्माण झाली. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद आणि ज्योतिष अशी एकूण सहा वेदांगे आहेत.

    शिक्षा : वेदमंत्रांचे उच्चारण शुद्ध व अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून रचण्यात आलेल्या शास्त्रांना `शिक्षा’ असे म्हणतात. काही प्राचीन शिक्षा-ग्रंथ आज उपलब्ध नसले, तरी ध्वनिशास्त्राविषयी मान्यताप्राप्त अशा सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या शाखेनुसार विचार करणारे ग्रंथ मिळतात. त्यांना प्रातिशाख्ये म्हणतात. [→ शिक्षा].

    कल्प : हा वेदांगास `कल्पसूत्रे’ असेही म्हणतात. कल्पसूत्रांमध्ये श्रोतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे ह्यांचा समावेश होतो. संहिता व ब्राह्मणग्रंथ ह्यांतील यज्ञसंस्थेचे सांगोपांग स्वरूप व्यवस्थित, एकत्र आणि विषयवारीने उपलब्ध करण्यासाठी श्रौतसूत्रे निर्माण झाली. काही श्रौतसूत्रांना–उदा., बौधायन, मानव, आपस्तंब व कात्यायन - `शुल्बसूत्र’ नावाचा अध्याय जोडलेला असतो. यज्ञकुंड, यज्ञवेदी, यज्ञमंडप तयार करताना घ्यावयाच्या मोजमापांचे गणित शुल्बसूत्रांत सांगितलेले असते. भारतीय भूमितीचे प्राथमिक स्वरूप शुल्बसूत्रांत दिसते. गृह्यसूत्रांत नामकरण, उपनयन, विवाह इ. सोळा संस्कार तसेच श्राद्धे ह्यांचे विधी सांगितले आहेत. आश्वलायन, शाखायन, बौधायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक इ. १७ गृह्यसूत्रे आज उपलब्ध आहेत. धर्मसूत्रांत त्रैवर्णिक समाजाचे आश्रमधर्म व लौकिक आचारधर्म म्हणजे कायदे व राजधर्म सांगितले आहेत. वर्णधर्म व आश्रमधर्म हे धर्मसूत्रांचे मुख्य विषय होत. मनू, याज्ञवल्क्य इत्यादींच्या स्मृतींच्या पूर्वी झालेले आणि मुख्यत: गद्यात्मक सूत्रशैलीत लिहिलेले हे ग्रंथ आहेत. [→ कल्पसूत्रे].
    पुढे चालू...

    ReplyDelete
  7. व्याकरण : वेदमंत्रांतील शब्द अपभ्रष्ट होऊ नयेत, तसेच संधी होऊन शब्दात बदल होत असल्यामुळे मूळ शब्द कसा आहे तो कळावा तसेच अर्थही कळावा ह्यांसाठी वैदिक मंत्रांचा पदपाठ तयार करण्यात आला. तो करताना व्याकरण अगोदरच तयार होते. पदपाठ तयार झाल्यानंतर संस्कृत भाषेत बदल झालेले होते. तेव्हा सबंध शिष्ट संस्कृतचे व्याकरण तयार झाले. अनेक व्याकरणे झाली. त्यांत ⇨पाणिनीचे व्याकरण श्रेष्ठ ठरले.

    निरुक्त : वेदांची भाषा कालांतराने समजणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ सांगण्याचे शास्त्र निर्माण झाले. तेच निरुक्त होय. वेदांतील शब्दांचे व धातूंचे संग्रह म्हणजे `निघंटू’ वा शब्दकोश. वैदिक समानार्थक व अनेकार्थक पदांचा वा धातूंचा जो सर्वप्राचीन उपलब्ध कोश आहे, त्याला निघंटू असे नाव आहे. ह्या कोशावर यास्काने लिहिलेले भाष्यही निरुक्त ह्या नावाने प्रसिद्ध आहे. [→ निघंटु-२;निरुक्त].

    छंद : छंद ह्या वेदांगाला `छंदोविचिती’ अशीही संज्ञा आहे. वेदांतील बरेच मंत्र छंदोबद्ध असून छंद हे वेदमंत्रांप्रमाणे वेदमंत्रांनी करावयाच्या यज्ञकर्माशीही निगडित आहेत. बाह्मणग्रंथांमध्ये छंदाच्या गूढ व अद्‌भूत सामर्थ्याची वर्णने येतात. ⇨पिंगल यांचा छंद: सूत्र हा ग्रंथ ह्या वेदांगाचा प्रतिनिधी मानला जातो. [→ छंदोरचना].

    ज्योतिष : वेदकाली ज्योतिष हे सहावे वेदांग तयार झाले होते. सत्तावीस नक्षत्रे, चंद्राच्या अवस्था, सूर्याचे संक्रमण, ऋतूंची परिवर्तने ह्या सर्वांचे पद्धतशीर परिगणन यज्ञाच्या निमित्ताने वैदिक ऋषीला काळजीपूर्वक करावे लागे. श्रौत व गृह्य कर्मांसाठी लागणारे पंचांग वैदिक काळी अस्तित्वात आले. सत्तावीस नक्षत्रांची आकाशातील मांडणी ही प्रथम वेदकाली वैदिकांनी शोधली. शुक्लयजुर्वेदात `नक्षत्रदर्श’ म्हणजे ज्योतिषी ह्याचा उल्लेख आलेला आहे. वेदांगज्योतिषाचे बरेच ग्रंथ लुप्त झाले असून लगध नामक आचाऱ्यांचा `ज्यौतिषम्‌’ (इ. स. पू. १४००) हा एकच लहानसा निबंध शिल्लक राहिला आहे. ह्या निबंधाचे ऋग्वेद शाखेत ३६ व यजुर्वेद शाखेत ४४ श्लोक मिळतात. यांतील अनेक श्लोक क्लिष्ट असून त्यांचा अर्थ नीट लागत नाही. त्यात ३६६ दिवसांचे वर्ष व पाच वर्षांचे एक युग होते, असे म्हटले आहे. उत्तरायण व दक्षिणायन केव्हा होते, ह्याचे गणित त्यात सांगितले आहे. लगध यांच्या कालखंडात गर्ग ह्या आचाऱ्यांनी केलेली गर्गसंहिता आज लुप्त झालेली असली, तरी तिच्यातील संदर्भ नंतरच्या ग्रंथांमध्ये घेतलेले आढळतात. ह्या आचार्य गर्गांचा महाभारतात ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून निर्देश केलेला आहे. पितामहसिद्धांत हा ग्रंथही ह्याच कालखंडात झाला. त्याचा सारांश ⇨वराहमिहिराने पंचसिद्धांतिकेत दिला आहे. वेदकालीन ज्योतिषनिबंध नष्ट का झाले, हे सांगणे कठीण आहे. तथापि त्याचे एक कारण दिसते, ते असे : इसवी सनानंतर पुराणांचा प्रसार झाला. पुराणांमध्ये अतिशयोक्ती करण्याची व साध्या माहितीला अद्‌भुत रूपे देण्याची प्रवृत्ती वाढली. परिणामत: वेदांगज्योतिषातील साधी व वास्तविक कालगणनापद्धती पुराणिकांनी सोडून दिली व अवास्तव कालगणनेत इतिहास सांगण्यासाठी युग व कल्प ह्यांच्या वर्षसंख्या फारच फुगवल्या. त्यामुळे वेदांगज्योतिष नष्ट झाले असावे, असा तर्क आहे.
    समाप्त.

    ReplyDelete
  8. वैदिक धर्म जिवंत आहे का?

    वैदिक धर्मियांनी भारतातील श्रमण धर्माला आणि त्याचे अनुयायी असणा-या नाग,असूर, राक्षस वगैरे मूळ निवासीयांना नेहमी विरोध केला. श्रमणांची शाखा असणा-या जैन धर्माला कमकुवत करण्यात आणि बौद्ध धर्म भारतातून हद्दपार करण्यात वैदिकांना तात्पुरते यश मिळाले, पण या संघर्षात खुद्द वैदिक धर्मच नष्ट झाला!

    या संघर्षात वैदिकांना आपले इंद्र, वरुण वगैरे मूळ देव सोडून द्यावे लागले,आणि शिव, गणपती, कृष्ण यासारखे अवैदिक देव स्वीकारावे लागले. (गंमत म्हणजे शिव, गणपती आणि कृष्ण हे वैदिकांचे कट्टर विरोधक होते!)वैदिक धर्मात मूर्तीपूजा नसतानाही वैदिकांना ती स्वीकारावी लागली. यज्ञात गाईन्चा बळी देणा-या, गोमांस खाणा-या वैदिकांना यज्ञ संस्था बंद करावी लागली, गोमांसच काय, कसलेही मांस खाणे त्यांना सोडून द्यावे लागले.


    क्षत्रियांनी लिहिलेली, वेदांचा अंत करणारी उपनिषिदे वेदांचाच भाग आहे अशा थापा मारून, गौतम बुद्धांना अवतार ठरवून, शैवांना वैदिक ठरवून वेदधर्म टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.

    आजच्या वैदिकांची स्थिती अशी आहे की त्यांना आपला धर्म लपवून ठेवावा लागतो, आणि 'आम्ही हिंदू आहोत' असे सांगावे लागते. वैदिक धर्म उघड रूपाने तरी पूर्ण नष्ट झाला आहे. याउलट बौद्ध धर्म जगभर पसरला, भारतातही त्याचे जोरदार पुनरागमन झाले. दुसरीकडे जैन धर्मही टिकून राहिला आणि आता तो पुन्हा फोफावत आहे.

    ReplyDelete
  9. प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता?

    आजचे बहुतेक बहुजन आपला धर्म हिंदू आहे असे समजतात. पण खरे पहाता हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही. शैव, जैन, बौद्ध, वैदिक यांना आपण धर्म म्हणू शकतो, कारण या धर्मांची व्याख्या करता येते, पण या तथाकथित हिंदू धर्माची धर्म या अर्थाने आजपर्यंत कोणीच व्याख्या करू शकले नाही. ज्या ग्रंथांना हिंदूचे धर्मग्रंथ मानले जाते, त्यापैकी एकाही ग्रंथात हिंदू या धर्माचा उल्लेखही नाही. मग ते वेद, उपनिषिदे, रामायण, महाभारत, वेगवेगळी पुराणे, किंवा अगदी अलिकडची ज्ञानेश्वरी असो.


    अशोकाच्या शिलालेखात समण (श्रमण) आणि बंभन (ब्राम्हण) या त्या काळातील दोन मुख्य धर्मांचे उल्लेख आहेत. यातील समण म्हणजे जैन व बौद्ध हे होत, तर बंभन हे वैदिक ब्राम्हण होत. बहुजन हे वैदिक ब्राम्हण या धर्माचे अनुयायी असण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्याकाळी त्यांचा धर्म जैन किंवा बौद्ध, अथवा त्या प्रकारचा अवैदिक (आजीवक वगैरे) असणार.

    आजही वैदिक ब्राम्हण बहुजनांना वैदिक समजत नाहीत. वैदिक ब्राम्हण जरी बहुजनांच्या घरी पूजा-पाठ व इतर धार्मिक विधी करायला जात असले, तरी हे सगळे विधी वैदिक पद्धतीने अजिबात होत नाहीत. बहुजनांसाठी ब्राम्हणांनी वेगळे पौराणिक विधी सुरु केले, पण आपल्या वैदिक पद्धतीचा वापर त्यांच्यासाठी कधीच केला नाही. हे पौराणिक विधी शुद्रांसाठीच असतात आणि वैदिक ब्राम्हण हे बहुजनांना शूद्रच मानतात. ही गोष्टही बहुजन हे प्राचीन काळी जैन अथवा बौद्ध होते हे सुचवते. कारण वेदविरोधी धर्माच्या अनुयायांना वैदिकांनी शूद्र ठरवून त्यांना कायमचे गुलाम केले हे भारताच्या धार्मिक इतिहासाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक संशोधकांनी दाखवून दिले आहे.

    एकाद्या बहुजनाच्या घरी पूजा सांगत असताना पूजा करणार्‍या गृहस्थास ब्राम्हण त्याचे गोत्र विचारतो. त्या गृहस्थास त्याचे गोत्र माहित नसतेच. मग तो ब्राम्हण त्या गृहस्थास कश्यप हे गोत्र चिकटवून देतो. त्याप्रमाणे मंत्रात कश्यप गोत्राचा उल्लेख करतो.

    असे का? तर महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचेही गोत्र कश्यप होते! म्हणजे ब्राम्हणांना बहुजनांचे मूळ धर्म जैन-बौद्ध आहेत हे चांगलेच माहित आहे हे दिसते. पण बहुजनांना हे कधी कळणार?

    ReplyDelete
  10. वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान

    उपनिषदे : अवैदिक परंपरेचा परिणाम
    आज भारतात वैदिक धर्म पूर्णत: बुडाला असून, अहिंसाधिष्ठित मूलनिवासी दयाधर्म विविध रूपांत दिसून येतो. महाराष्ट्रातील भक्तिपंथ हे या अहिंसाधिष्ठित मूलनिवासी परंपरेचे एक रूप होय. ब्राह्मणी परंपरेतील उपनिषदे ही वैदिक धर्मापेक्षा मूलनिवासी दयाधर्माला जवळची आहेत. उपनिषदांना वेदान्त म्हणतात. वेदान्त म्हणजेच वेदांचा अंत. उपषिदांत हिंसा वर्ज्य केली आहे. वैदिक धर्माचा मुख्य आधारच हिंसा होता.

    उपनिषदांनी वेदांचा मुख्य आधार तोडून वैदिक परंपरा संपविली, म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. बौद्ध आणि जैन धर्माचा भारतासह संपूर्ण आशिया खंडात प्रसार झाल्यानंतर ब्राह्मणांनी स्वत:च्या परंपरांचा त्याग करून दयाधर्मीय परंपरेचा स्वीकार केला. त्यातून उपनिषदांची निर्मिती झाली. अशा प्रकारे उपनिषदांचे कर्ते ब्राह्मण ऋषि असले तरी त्यातील विचार बिगरब्राह्मणी परंपरेतून घेण्यात आले असल्यामुळे उपनिषदांना अवैदिक दयाधर्म परंपरेत समाविष्ट करणेच अधिक श्रेयस्कर ठरेल.

    बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती
    बौद्ध आणि जैन धर्मामुळे भारतातील वैदिक परंपरेचा उच्छेद झाला. पुढे कुमारिल भट्ट व आद्य शंकराचार्यांनी वैदिक परंपरा स्थापित केली, तरी तिचा ‘यज्ञसंस्कृती' हा मूळ आत्मा हरवला होता. शंकराचार्यांनी एकप्रकारे बौद्धमताचा स्वीकार करून वैदिक धर्मात बदल केले. बौद्ध-जैन परंपरांचा हा आघात वैदिकांच्या प्रचंड जिव्हारी लागला. या परंपरांविषयी असंख्य कठोर वचने वैदिकांनी लिहून ठेवली आहेत. बौद्ध-जैन मंदिरांत वैदिकाने प्रवेश करू नये असे कडक निर्बंध घालणारे संस्कृत वचन असे :

    हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम् !२

    हे वाचन पाहता वैदिक आर्य ब्राह्मणांनी बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती घेतली होती असे दिसून येते.

    पशु हिंसेला प्रतिबंध
    वैदिक परंपरेत कर्म हे प्रधान असून त्या काळीही जाती होत्या. वैदिक हे वेदच प्रमाण मानीत. बौद्ध परंपरेत वेद, कर्म व जाती या तिन्ही गोष्टी दयाधर्माच्या विरुद्ध जाऊ लागल्या. त्यामुळे बौद्धांनी त्यांचा नि:पात केला. या संदर्भात मोठ मोठे वादविवाद झाले. (उत्तर काळात कुमारिल भट्टाने बौद्ध पंडितांसोबत घातलेले वादविवाद प्रसिद्धच आहेत.) ‘शेवटी दयाधर्माचा जय होऊन वैदिकांस नमावे लागले. प्रमाणं परमं श्रुति: (अर्थ : श्रुती म्हणजेच वेदवचन हेच प्रमाण) इत्यादि मताभिमानाची सूत्रे जाऊन त्या जागी अस्वग्र्यं लोकविद्धिष्टं (लोकांत जे रूढ आहे ते प्रमाण मानावे.) इत्यादि वचने लोकांमध्ये चालू झाली. यज्ञात पशु मारू नये याविषयी उत्तरकालीन वेदवाङ्मयात अनेक वचने सापडतात. ती सर्व बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे आलेली दिसतात. ऐतरेय आरण्यकातील हे एक वचन पाहा :

    पुरूषं वै देवा: पशुमालभन्त
    अमेध्या: पशवस्तस्मादेतेषां नाश्नीयात
    (द्वितीय पंचिका. आठवा खंड)
    अर्थ : पशुंतून मेध्य निघून तांदुळांत आले आहे. म्हणून पशूंनी यज्ञ न करता तांदुळांनी करावे.
    तैत्तिरीय आरण्यकाच्या १२ व्या अनुवाकात असाच उपदेश आढळून येतो.

    माता रुद्राणां० मा गामनागामदितिं वधिष्ट ।।ऋग्वेद ६-७-८
    या मंत्रात याज्ञिकांस असा उल्लेख उपदेश आहे की, तुम्ही गरीब गायीचा जीव घेऊ नका. गायीला माता म्हटल्याचा हा वेदवाङ्मयातील पहिला उल्लेख होय. कालांतराने गाय ही नुसतीच गोमाता न राहता तिच्यात ३३ कोटी देव घुसडविण्यात आले. बौद्धांच्या अहिंसा तत्त्वावर कडी करण्याच्या प्रयत्नात वैदिकांनी हे उपद्व्याप केले. त्यात वैदिक धर्माचा मूळ आत्मा मात्र हरवला. एकप्रकारे वैदिक धर्मच पराभूत झाला.
    देवा-धर्माच्या नावर हिंसा करणे हे माणूसपणाचे लक्षण नव्हे. अमानवी वैदिक ब्राह्मण आर्यांना भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांनी माणूस बनविले.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  11. जैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत......

    जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या विरोधासाठी निर्माण झाले असा कित्येकांचा समज आहे. पण जैन धर्माचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याने तो वैदिक धर्माच्या ही आधी अस्तित्वात होता, आणि सिंधू संकृती ही वैदिकांचा सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदाच्या रचनेच्या आधीपासून अस्तित्वात असल्याने वैदिक धर्माच्या विरोधासाठी जैन धर्माचा जन्म झाला असे म्हणणे चुकीचे ठरते. तीच गोष्ट बौद्ध धर्माची. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी वैदिक विरोधात केली असे कोणत्याही बौद्ध ग्रंथात, बुद्धचरित्रात लिहिलेले नाही.

    वैदिक धर्मातील यज्ञामध्ये होणारी पशुहिंसा जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मास मान्य नव्हती. त्यामुळे या दोन्ही धर्माच्या आचार्यांनी यज्ञातील पशुहिंसेला प्रचंड विरोध केला. पण याचा अर्थ असा होत नाही की जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातून जन्माला आले.

    जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातील बंडातून जन्माला आले असे म्हणणे म्हणजे या दोन्ही धर्माचे मूळ वैदिक धर्मात आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण वैदिक धर्म अस्तित्वात यायच्या अगोदर पासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती आणि जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म त्या श्रमण परंपरेच्या शाखा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

    जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी). पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे.

    महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

    त्यामुळे जैन आणि बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्या विरोधातून तयार झाले असे म्हणणे हे पूर्ण चुकीचे आहे. वैदिकांनी तसे म्हणणे स्वाभाविक आहे, कारण त्यांना त्यातून आपली प्राचीनता दाखवायची असते. पण सध्या अनेक बौद्ध विद्वान देखील वैदिकांच्या या म्हणण्याला उघड किंवा मूक पाठिंबा देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.

    ReplyDelete
  12. मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असे म्हणत नाही फक्त विचार करा. कारण आपल्या देशात विचार करायला बंदी आहे. इथे मी पहिल्यांदा नमूद करतो कि माझी जात हि "कुणबी" आहे. कृपया मला कॉमेंट मध्ये जात विचारू नका. हिंदू धर्म म्हणजे फक्त ब्राह्मण आणि दुसरे कोणी नाही …. एक लक्षात ठेवा मराठ्यानो ह्या ब्राह्मण समाजाने तुम्हाला तुमच्या फक्त "शाळेच्या दाखल्यावर" "हिंदू" हा शब्द टाकला आहे. बाकी हिंदू म्हणून तुम्हाला कुठेही थारा नाही. इतर कुठेही हिंदू म्हणून तुम्हाला तुमचा पुरावा सदर करता येत नाही. हिंदू या शब्दाचा अर्थ काय ? हिंदू हा धर्म नसून तो वैदिक धर्म आहे. वैदिक धर्म हा ब्राह्मण धर्म ज्या मध्ये बहुजनांना काही थारा नाही. वैदिक धर्म म्हणजे फक्त ब्राह्मण श्रेष्ठ बाकी सगळे नीच जातीचे. वैदिक धर्म हा अर्यानाचा धर्म. ब्राह्मण हे रामाची पूजा करत नाही कारण राम त्यांचा देव नाही. कारण राम हा वैदिक देव नाही. कारण ब्राह्मणाच्या घरी सगळी पूजा वैदिक धर्म नुसार होती. हा धर्म चालत नव्हता म्हणजेच लोकांना मान्य नव्हता म्हणून ब्राह्मणांनी हिंदू धर्म स्वीकारला पण आजही ब्राह्मण वैदिक धर्मानुसार पूजा करतात. हम सब हिंदू ही असे नारा लावणारे आपण पण आम्हाला आमचा हिंदू धर्म गुरु कोण असा प्रश केला तर आम्हाला डोके खाजवावे लागते. विचार करावा लागतो हिंदूचा धर्म गुरु कोण असेल. कधी समोर आले नाहीत. कधी कुठे हिंदू धर्माची सभा घेतली नाही. कुठे TV वर दिसले नाहीत मंग आहे तरी कोण हा धर्मगुरू ? हिंदू धर्माचे ग्रंथ कोणते ? किती जणांनी हिंदू ग्रंथ वाचले आहेत ? कोणाच्या घरी हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत ? हम सब हिंदू ही फक्त दंगलीच्या वेळेस वापरले जाते किवा निवडणुका आल्या वर वापरले जाते पण तुम्ही आणि ब्राह्मण एका ताटात कधीच जेवू शकत नाही कारण ब्राह्मण तुम्हाला शुद्र समजतात. जर आम्ही शुद्र आहे तर मंग आम्ही हिंदू कसे. आम्हाला देवाची पूजा करण्याचा अधिकार नाही, पूजा सांगण्याचा अधिकार नाही मंग आम्ही हिंदू कसे ? मंग आम्ही "हम सब एक है" कसे ? या देशात ३३ कोटी देव आहेत आणि भगवे कपडे घातलेले साधू किती असतील ते तर सांगताच येत नाहीत. प्रत्येक देवाने जर ३ माणसे सांभाळली तरी पुष्कळ होईल तरी पण आपला भारत देश हा गरीबच आहे. कुठे जातात हे देव ? काही कळत नाही. आपल्या भारतात भविष्य सांगणारे खूप ब्राह्मण आहेत. TV वर रोज सकाळी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतात आणि तोच TV संध्याकाळी बॉम्ब स्पोट झाला हे दाखवतात. मला एक कळत नाही सकाळी भविष्य सांगणाऱ्या साधूला संध्याकाळी बॉम्ब स्फोट होणार आहे हे कळत नाही का ? हा देश प्रगती पथा वर आहे का दुर्गती मार्गावर हेच कळत नाही आम्हा बहुजनांना. जर तुम्ही हिंदू आहेत तर हिंदू धर्मग्रंथ यादीमध्ये किती वेद, किती पुराणे आणि किती शास्त्रे आहेत सांगावे ?

    सचिन मोहिते, करमाळा

    ReplyDelete
  13. मला आज पर्यंत जे माहित आहे ते सांगून मला काही शंका आहेत त्या विचारते
    आम्ही वैदिक का शैव तेच माहित नाही आमच्या कडे घरात देव्हार्यात पूजेसाठी कृष्ण पंचायतन आहे
    लंगडा बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा हे लग्नाबरोबर आलेले देव देवता त्यांची माहेरचे देव म्हणून पूजा होते त्याबद्दल आपण सांगाल का ?आमच्याकडे महाशिवरात्र आणि आषाढी एकादशी आनंदाने आणि श्रध्देने पाळल्या जातात तसेच नवरात्र आणि गणपतिसुद्धा याबाबत काय सांगता येईल ?
    शेकडो वर्षे हे अनेक ठिकाणी चालू आहे ,मुख्य करून असे न केल्यास आपण धर्म मोडला असे मानले जाते आणि आईकडून इतर रीतीरिवाज सांगितले जातात कुटुंबाचे कुलदैवत , गावातले दैवत आणि धर्माचे दैवत अशी हि चढती पद्धत आहे
    पण आपण म्हणता तसे आम्हाला कधीच काही जाणवले नाही
    आमच्याकडे सोमवारी गुरुवारी मासे खात नसतात
    आम्ही साईबाबा आणि अक्कलकोट स्वामी याना मानतो आता ते शैव का वैदिक होते ते न्माहित नाही मग आम्ही काय करावे ते कोणी सांगेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. अंधश्रद्धाळू मोहिनी परकर.

      Delete
    2. देव मानणे हिच जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे हे संपूर्ण सत्य विचार या बिचाऱ्या लोकांच्या डोक्यात कधी शिरणार माहित नाही.

      अनघा.

      Delete
  14. हो हो संजय सोनावणी साहेब + आमचा पण हाच प्रश्न आहे - आम्ही तर तुमचे लिखाण वाचून एकदम आनंदात असतो ,किती छान आणि सोपे करून सांगत असता आपण आम्ही नेहमी ठरवतो की एकदाच फ़ायनल ठरवून टाकू आपण कोण ते पण पण बुद्धीच चालत नाही आम्ही शिवरात्र पाळतो ओम नमः शिवाय वर तर आमचा प्रचंड जीवच आहे आम्हाला १२ पैकी ८ ज्योतिर्लिंगाची यात्रा घडली आणि जीवन पवित्र झाले खरोखर आपण किती उत्तम मांडले आहे ,कारण आम्हालाही जाणवते आहे ,आम्ही पण मग नेमके कोण ? आम्हाला दोन्ही देव आवडतात राम कृष्ण हे तर आपण म्हणता त्या प्रमाणे क्षत्रीय पण आम्हाला वंदनीय , पूर्वी मी वाचले होते कि गणपती हा विघ्नकर्ता ,पण आता विघ्नहर्ता झाला आहे , तो पण वंदनीयच !
    सर्वच देव नतमस्तक भावना जागृत करतात, एखादा दर्गा किंवा पीर हा सुद्धा आपलाच वाटू लागतो ,आपल्याकडे खेडेगावातून अनेक ठिकाणी असा अनुभाव येतो ,अगदी ब्राह्मणाच्या घरातून पिराला चादर अर्पण करण्याचा रीतीरिवाज आहे आणि गणपतीची पालखी मुसलमानानी सुद्धा नेण्याचा परंपरागत मान आहे दंगली आणि दंगलीचे राजकारण हा विषयच वेगळा आहे
    तसे पाहिले तर एकही जात किंवा धर्म टाकावू नाही
    सर्व इथल्या मातीत रुजले ,वाढले
    अमेरिकेत काय घडले ,रेड इंडियन काही गोऱ्या लोकाना शिरजोर भारी नव्हते पण त्यांची सरसकट कत्तल झाली ,आपल्याकडे समाज सरमिसळ होताना समाजात सामाजिक नियमभंग झाल्यास फक्त जात पंचायतीकडून जातीबाह्य करत नवी जात निर्माण होत असेल असे वाटते ,त्याला शिक्षा म्हणून रोटी बेटी व्यवहार बंद करत त्याची नवी जात निर्माण करून सोय केली जात असे
    आपल्या राजपूत राजांनी मुसलमान सत्तेला सामोपचारानेच वागवत नेले पण दगाफटका होत त्यांचा पराभव झाला हा इतिहास आहे सत्तेत जरी गमावले तरी हिंदू ,त्याला शैव वैदिक काहीही म्हणा ,हे हिंदूच राहिले आणि बाटलेले मुसलमान आजही जाती त्याच ठेवत मुसलमान झाले हा एक सामाजिक चमत्कारच आहे त्याला काय म्हणायचे त्याला सदासर्वदा उच्च जाती जबाबदार आहेत का ? धर्मच बुडाल्यावर बाटून धर्मबाह्य झाल्यावर ब्राह्मण कसे काय मुसलमानी चांभाराला शिक्षा करेल ? तेच समाजात नाही ,तसेच ब्राह्मण आणि क्षत्रीय यांनी त्यावेळेस धाडस दाखवत बाटून धर्म बाह्य झालेल्यांना का परत आपल्या धर्मात घेतले नाही ,राजा जर राजा होता तर त्याने ब्राह्मणाना फटकारत का आपल्या अखत्यारीत मूळ धर्मात शुद्धीकरण करत परत आणले नाही ?
    याचाच एक अर्थ असा निघतो का की जात पंचायती ह्या ब्राह्मण वर्गापेक्षाही जास्त ताकतवान होत्या आणि आजही आहेत ?
    शैव आणि वैदिक हा भाग त्या मानाने दुसऱ्या स्थानावर आहे , परंतु पहिल्या स्थानावर आहे ती जात पंचायत आणि तिथे कुणाचे प्राबल्य आहे तर प्रत्येक जातीच्या म्होरक्याचे !ब्राह्मणांचे अजिबात नाही !राजस्थान , ओरिसा , मध्य प्रदेश , बिहार , युपी महाराष्ट्र इथे आजही त्या जात पंचायती वर कुणालाही , अगदी ब्राह्मणालाही शिरकाव नाही - त्यांच्यापेक्षा ब्राह्मण वर्चस्व गाजवू शकत नाही -
    शैव वैदिक वाद घालण्यापूर्वी हा मुद्दा पण विचार केला जावा

    ReplyDelete
    Replies
    1. Complete un-truth!!!!!!!!!!!

      Vinayak.

      Delete
  15. GREAT ARTICLE
    THOUGH A PEPEAT IT HAS AN ETERNAL VALUE

    ReplyDelete
  16. all religions are one and so is vaidik and shaiva
    all believe in GOD it is a fun and not a truth !
    and your problem seems to be linked to the history
    do you really believe that there is a shiva or vishnu in the sky , or HIMALAYA , come on ,
    you donot start the old story again and again , instead , tell the world ,
    that GOD is a FAKE
    In principal no Indian is now superior to the constitution of India the inaccuracy of the writing of the rules forced us to the constitutional amendments and the process is still incomplete
    We are not living in history so we should not go on taking references of old vedas and other things they are outdated and should be printed on TOILET PAPER

    I cannot understand why we are giving so much importance to the old writings because no one bothers to study them and every so called hindu or for that matter a person of any religion is no more serious about their ancestors opinion about world in a way religion is a history and to be used for a healing effect .

    ReplyDelete
  17. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!

    हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे, काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
    धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
    हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
    ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
    समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. “कृण्वंतो विश्वम आर्यम” अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी “अष्टपूत्र सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. “आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् “ असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.

    ReplyDelete
  18. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!

    हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे, काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
    धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
    हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
    ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
    समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. “कृण्वंतो विश्वम आर्यम” अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी “अष्टपूत्र सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. “आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् “ असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.

    ReplyDelete
  19. वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
    ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझे लेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत.
    शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
    कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैन विचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखाली त्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिक करून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली.

    ReplyDelete
  20. अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी
    पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला. याचाच दुसरा अर्थ असा झाला की, ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कोणताही वैध धार्मिक अधिकार राहिला नाही. ९७ टक्के समाजाने ३ टक्के ब्राह्मणांची सेवा करावी. ब्राह्मणांना दान द्यावे. ब्राह्मण भोजने घालावी. कोणताही धार्मिक विधी बाह्मणाच्या हस्तेच करावा, अशी बंधने समाजावर लादण्यात आली. ठराविक लोकांना फुकटच्या लाभाची मक्तेदारी देणारा हा जगातील एकमेव धर्म आहे. याला ब्राह्मणी धर्म म्हणू नये तर काय?
    अकबराची ब्राह्मण नवरत्ने
    कालांतराने या देशात इस्लामचे आगमन झाले. एतद्देशीय क्षत्रियांच्या हातातील सत्ता मुस्लिम राज्यकरत्यांच्या हातात गेली. त्यामुळे नव्याने तयार होणारया ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्याच्या स्थितीत क्षत्रिय नव्हते. कोणतीही परकीय सत्ता एतद्देशियांच्या सहाय्याशिवाय राज्य चालवू शकत नाही. समाजावर हुकुमत असलेल्या एखाद्या स्थानिक गटाची मदत राज्यकर्त्यांना लागत असते. इस्लामी राज्यकत्र्यांनाही अशी मदत हवी होती. ती तत्कालीन ब्राह्मणांनी पूर्ण केली. इस्लामी राज्यकत्र्यांच्या पदरी ब्राह्मण मंत्री असत. अफजलखानाचा मंत्री कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सर्वांना माहीतच आहे. अकबराच्या दरबारात ९ रत्ने होती असे म्हणतात. बिरबल, तानसेन यांच्यासकट ही नऊच्या नऊ रत्ने ब्राह्मण होती. ही सगळे रत्ने कालांतराने मुसलमान झाली. तानसेनाचे मूळ नाव तन्ना मिश्रा होते. तो मुसलमान झाल्यानंतर मियाँ तानसेन नावाने ओळखला जाऊ लागला. तानसेनाने तयार केलेल्या सर्व रागांच्या आधी मियाँ लावण्याची प्रथा आजही कायम आहेत. उदा. मियाँ मल्हार. भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम गायक वादकांचा वरचष्मा आहे. त्याचे कारणच हे आहे. तानसेन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारया इतर गायकांचे हे सगळे वंशज आहेत. या गायकीत इस्लाम नाही. सर्व चीजा भारतीय देवी देवतांचे गुणवर्णन करतात. अगदी पाकिस्तानी शास्त्रीय गायकही भारतीय देवी देवतांचे महिमा वर्णन असलेल्या चीजा गातात. या काळात ब्राह्मणांची धर्मावरील पकड आणखी मजबूत झाली.

    ReplyDelete
  21. इंग्रजी राजवटीतही तेच
    ब्राह्मणांच्या मदतीची ही परंपरा पुढे इंग्रजी राजवटीपर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीतील ९९.९९ टक्के एतद्देशीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी ब्राह्मण होते. या संपूर्ण काळात ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक ती रसद राज्यसत्तेकडून अशा प्रकारे मिळत गेली. त्यातून या देशात ब्राह्मणी धर्म अधिकाधिक मजबूत झाला.
    हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा
    प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. +मिलिंद पन्हो+ असे या ग्रंथाचे नाव. मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे. या संवादाच्या स्मृतीरूपाने डॉ. आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या परीसराला नागसेनवन असे नाव आहे.
    हिंदू हा शब्द इस्लामची देण
    लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.

    ReplyDelete
  22. इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण
    पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धर्माचा टक्का वाढला.
    हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
    धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
    आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. ख्रिश्चन, इस्लाम बौद्ध, जैन qकवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे.आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खरया अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणारया लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदूत्वादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे.

    ReplyDelete
  23. गांधी आणि नथुराम दोघांच्याही हाती गीता!
    ख्रिश्चनांचा मुख्य धर्मग्रंथ बायबल आहे. मुस्लिमांचा कुराण, तर शिखांचा गुरूग्रंथसाहिब आहे. हिंदू हा धर्म असेल, तर त्याचा धर्मग्रंथ कोणता? काही लोक म्हणतात की, गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे. चैतन्य, वैष्णवादी परंपरा गीतेला आपला मुख्य आधार मानतात. जसे- महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य आधार असलेली गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेला हिंदूंचा मुख्य ग्रंथ मानल्यास आपली फसगत थांबत नाही. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर गीता हाती घेऊन राजकारण, समाजकारण केले. गांधींच्या पुतळ्यांच्या हातातही गीता आहे. काव्यगत न्याय कसा असतो बघा, नथुराम गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या. गीतेला जर हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ मानायचे असेल, कोणाची गीता स्वीकारायची नथुरामची की गांधींची हा मोठा प्रश्न आहे.
    ************************************************************************************

    ReplyDelete
  24. BRAHMAN-BRAHMANETAR WAAD UKARUN KADHLYAMULE, AJ JO DALIT/

    OBC SATTET WATA MAGU LAGLA AHE TO GONDHALUN JAWA WA

    SARANJAM-DARANCHYA AWALADI NEHAMI SATTET RAHAWYA HA

    DAW AHE.

    SANJAY SONAWANI/SHRIMANT KOKATE/M D RAMTECHE ASE LEKHAK

    MHANJE RASHTRAWADI CONGRESSCHYA PILLAWALI AHET.

    SANJU-BABA TUMHI NUSATE LEKH LIHU NAKA JAR DHAMAK ASEL

    TAR ARVIND KEJARIWAL SARKHE KAHI KARUN DAKHAWA.

    APLYA OBC BANDHAWANSHI GADDARI KAUN SARANJAMYACHE DAS

    HOU NAKA.

    EK OBC TARUN.

    ReplyDelete
  25. EK OBC KHOTA AANI FAKT KHOTACH TARUN.

    VINAYAK.

    ReplyDelete
    Replies
    1. वरील विचार ओ.बी.सी. तरुणाचे असल्याची थोडीही शक्यता वाटत नाही.

      Delete
  26. विनायका ,
    मोदका,
    what do you want to say?
    आपको क्या कहना है ?
    तुम्हाला काय म्हणायचे आहे ? अगदी सर्वस्वी सर्वार्थाने खोटे ?
    अहो आपण जरा इकडे तिकडे कान आणि डोळे उघडे ठेवून फिरलात ना सर तर तुम्हाला दिसेल की जात पंचायत ची समाजावर किती जबरदस्त पकड आहे !बिहार युपी महाराष्ट्र सगळीकडे त्यांचा दरारा आहे ,उच्च शिक्षित लोकांचे बाजूला ठेवा पण जिथे अशिक्षित पणा आहे त्या खेडेगावातून तर आजही बातम्या येत असतात त्या आपण वाचत नाही का ?
    डॉ दाभोलकर कुणाविरोधी जास्त सक्रिय होते ?आज समाजात ब्राह्मण जादूटोणा करत रस्तोरस्ती हिंडत असतो का ?मग आपण नुसतेच टोटली अनट्रुथ असे म्हणून पुरणार नाही , चार शब्द अजून स्पष्ट लिहिले तर चर्चेत आपला सहभाग अजून सखोल होऊन नेमकेपणा येईल आणि चर्चा अधिक निकोप होत जाइल असे वाटते

    आपणास असे नाही का वाटत ?
    समीर घाटगे

    ReplyDelete
    Replies
    1. समीर घाटगे या खोट्या-नाट्या नावाने लिखाण करणाऱ्या खोडसाळ बामनाचा जाहीर धिक्कार करीत आहोत!

      संग्रामसिंह घाटगे, शाहूपुरी, कोल्हापूर.

      Delete
    2. संग्रामसिंह घाटगे हे आमचे काका ,त्यांना जाउन १ वर्ष होईल आता होळीत !
      पण हे नवे संग्रामसिंह कोण ते माहित नाही
      आपण कोल्हापुरात असता हे समजले पण नेमके शाहूपुरीत कुठे ते समजेल का ,
      शाहू टाकिजच्या बाहेर एक नऊवारी नेसलेली नटरंगी दिसते तिच्या बरोबर कानातला मळ काढणारा असतो तेच आपण का ?
      आमच्या घरीही काकी किंवा कुणालाच आपणा विषयी माहित नाही याचे आश्चर्य वाटते एकजण घरातून घालवून दिलेला संग्रामसिंह नावाचा भटार खान्यातला वाढपी होता पूर्वी पण ते आपण नक्कीच नसणार कारण त्यांनी वेषांतर करून देशांतर करत कोल्हापुरातून सातारला पलायन केले आणि आम्ही त्यांना शासनही केले होते हल्ली ते कोल्हापुरात कागद गोळा करत हिंडत असतात , ते तर आपण नाही न ?

      आम्ही ब्राह्मण नाही हे तर आपण भेटल्यावर मान्य कराल परंतु दरम्यान असे अविचारी उद्गार आमच्या घराण्याविषयी आपण बोलू नये असे सांगावेसे वाटते
      शेवटी आपण असलात तर अनौरसच असणार , कारण आमच्या घराण्यात आतातरी संग्रामसिंह कुणी नाही
      नमस्कार

      Delete
    3. @ Anonymous March 1, 2014 at 11:36 PM

      "संग्रामसिंह घाटगे हे आमचे काका ,त्यांना जाउन १ वर्ष होईल आता होळीत !"

      होय, ते तुझेच काका आहेत. होळीच्या वेळी जातात आणि धुलीवंदनला येतात. तांबडा आणि पांढरा रस्सा हादडायला. पाच दिवसांनी रंगपंचमीही खेळतात.शेण आणि चिखल उडवितात, काळे वंगण तोंडाला लावून हिंडत असतात, हे सुद्धा माहित नाही काय तुला?

      Delete
  27. संजय रावजी आणि समीर घाटगे जी ,
    मध्यंतरी समीर घाटगे ब्लोगवरून पसार झाले होते ,
    आजारी असतील ,
    पण आता दिसू लागले आहेत
    घाटगे काका , कशी तब्येत आहे ,जपा जरा , हल्ली मेतेसाहेब तुम्हाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुंडे साहेब त्याना मदत करणार आहेत ,म्हणजे मजा आहे तुमची !
    यंदाच्या इलेक्शनला राष्ट्रवादी आणि कमळ एकत्र येणार असे वाटते
    मग काय ५० टक्के आरक्षण मराठ्याना आणि उरलेले ५० टक्के इतर ओबीसी , कसा आपला ठराव वाटतो ?काय म्हणता ? संजय सोनावानिना राग येईल ? छे छे , त्यांना आवाज टाकायची सवयच आहे ,त्यांची धाव कुंपणा पर्यंत , ! दुसर्याचे पानिपत करणारे संपले , हे फक्त बडबडे !
    नाही का हो संजय रावजी ?

    ReplyDelete
  28. शुद्र काय आहेत ते माहित आहे. पण हा अति शुद्र शब्द कोठून आला? का भावना भडकवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी फुगवून लिहायचे?
    शुद्र या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का?

    ReplyDelete
  29. देशपांडे, किती हो अडाणी तुम्ही? अति शुद्र हा शब्दच तुम्हाला माहित नाही! बामनाकडून अजून काय अपेक्षा असणार? वर्ण बाह्य लोकांनाच अति शुद्र म्हटले जाते, जसे की अस्पृश्य समाज! चौथ्या वर्णाच्या सुद्धा पलीकडचे!

    अशोक

    ReplyDelete
    Replies
    1. अहो शोकराव(अ),
      अतिशूद्र हा शब्द कोणत्या धर्मग्रंथात आहे त्याचा संदर्भ द्या.आणि मग बोला.


      Delete
    2. गंभीर पणे चर्चेत भाग घेत असतील त्याना नामोहरम करण्यासाठी तुम्हाला पगारी ठेवले आहे का हो अशोकराव ? समजत नाही तर गप्प बसावे असे मी तुम्हाला किती वेळा सांगत आली आहे पण तुमच्या डोक्यात नुसती हाडच भरली आहेत , म्हणून मी तुम्हाला कुठे नेत नाही आणि फाटकापाशी बांधून ठेवते ,टाईम पासच करायचा असेल तर संजय सरांच्या फाटकापाशीच तुमची जागा आहे
      करा किती पाय वर करायचे असतील तितके !
      जा आता आजचा वडापाव खाउन घ्या आणि बसा त्या गेटबाहेर ,
      चला !

      Delete
    3. देशपांडे, तू तुझ्या आई-बाबांच्या तसेच वडिलधाऱ्या माणसांच्या नावाची अशीच मोड-तोड करत असशील, अजिबात शंका नाही. हे बरे नव्हे!
      अति शुद्र शब्दाबद्दल तुला प्राचीन धर्मग्रंथातील पुरावे हवे असल्यास वि. का राजवाडे लिखित "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास " ह्या पुस्तकात तुला असंख्य पुरावे सापडतील.
      अर्वाचीन पुरावे "महात्मा फुले समग्र वाड:मयात" पुष्कळ आहेत, ते एकदा वाचून काढ!

      अमृता विश्वरूप तू का मध्ये-मध्ये टिव-टिव करीत असतेस? टिटवी प्रमाणे?
      डोके सटकले नाही ना, पिसाळलेल्या कुत्रा प्रमाणे?

      अशोक

      Delete
    4. अशोकराव,
      तू मला अडाणी म्हणालास ते चालते होय आणि मी नावाची मोडतोड केली कि राग येतो.तू घरी पण आई वडिलांशी बोलत असताना अशीच भाषा वापरत असशील यात मला पण शंका नाही.
      बाकी मी तुला धर्मग्रंथाचे नाव विचारले कुठल्या पिवळ्या पुस्तकाचे नाही.
      प्रश्न नीट वाच उत्तर देण्यापूर्वी

      Delete
    5. @ Sandeep Deshpande

      लाचार, महामूर्ख माणसा तुला थोडीतरी अक्कल आहे कि नाही? तुझ्या डोक्यात भुसा किंवा दगड भरले असल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. वेडगळा हे पिवळी पुस्तके काय भानगड आहे ते सांगशील काय! हेकेखोर वात्रट माणसा अक्कल गहाण ठेवली आहेस काय? मी वर दिलेले संदर्भ न पाहताच कुत्रा टिंगल टवाळी करीत आहे! अरे महाअडाणी माणसा शुद्धीवर ये म्हणजे कमावले!

      अशोक

      Delete
  30. ऋग्वेदातील अनेक ऋषी हे क्षत्रिय आहेत त्यामुळे ऋग्वेद फक्त ब्राह्मणांचा नाही .(प्रथम कांड ऋषी विश्वामित्र )
    सुदास राजाचा आपण उल्लेख केलात पण दास हे शुद्राच्या नावापुढे लिहितात असे म्हणतात जर वैदिकांची परंपरा मानली तर शुद्र हे राजे कसे काय ??? व त्या शुद्र राजावर वेदमंत्र कोणी म्हटले ??? कारण परंपरेनुसार राज्याभिषेक झाल्याशिवाय राजा म्हणत नाहीत ???
    यज्ञ १०० -१०० वर्षेही चालत.
    शेकोटी पेटवून त्यात अनेक पदार्थ जळत बसणे म्हणजे यज्ञ नव्हे
    वैदिक देवता हे एक गूढच आहे उदा.अप्सरा = आप + सारा = पाऊस पडल्यामुळे सृष्टीत निर्माण होणारे चैतन्य , प्रसन्नता असा अर्थही दिलेला आहे.
    संततीहीण मनुष्य वैदिक समाजाला मान्य नव्हता...म्हणुनच संन्यासही मान्य नव्हता. तर मग आदी शंकराचार्यांचे तत्वद्यान वैदिकांनी कशे काय स्वीकारले???
    सोम रसात दूधही घालत असत .
    स्त्रींयांना यद्न्यात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. --- हे विधान साफ चुकीचे वाटते .

    अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही. किंबहुना यद्न्यांचा पाया हा हिंसा हाच होता व आहे. -- मुळात धर्म नितीमत्ता हि अहिन्सेपासूनच सुरु झाली म्हणून तर ऋषींनी कृषी म्हणजेच शेती कसायला सुरवात केली प्रत्येक आश्रमात शेती केली जात होती सहस्रार्जुनाने जमदग्नीच्या आश्रमातील गायी कापून खाल्ल्या म्हणून तर परशुरामाने त्याला संपवले . रेणुकामातेची पूजा आजही केली जाते ती का करतात याचे कारण मला आजतागायत कळाले नाही .

    विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत.--- साध्या सत्यनारायण पूजेत सुधा आपणास असेच वाटेल परंतु त्याच पूजेत गणपती दुर्गा वासतोष्पती व क्षेत्रपाल यांची पूजा करताना परत गणपती येतो.

    वेदांचे ४ भागात विभाजन झाले हे आपणास मान्य आहे पण मला तर असे वाटते महत्वाचा भाग गायब करून ४ निरर्थक तुकडे समाजापुढे ठेवले .

    वाशीष्टांना जर तुम्ही वैदिक धर्म प्रवर्तक मानता तर त्यांच्या आश्रमाविषयी काय माहिती मिळते ???

    तर महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचेही गोत्र कश्यप होते! म्हणजे ब्राम्हणांना बहुजनांचे मूळ धर्म जैन-बौद्ध आहेत हे चांगलेच माहित आहे हे दिसते.--- ब्राह्मणान मध्ये आजही कश्यप गोत्र आहे.

    ReplyDelete
  31. अमिबा पासून माकड निर्माण झाले. माकडाचा माणूस झाला. जगात सगळ्यांचे पूर्वज माकड. विषय संपला. एका अनु वर दुसरा अनु आपटला. सृष्टी निर्माण झाली. ते दोन अनु कुठून आले? कसे आले? त्या दोन अनु च्या आधी काय होते? हे शोधून काढ . भारतातले ब्राह्मण काय पूर्ण जग डोक्यावर घेऊन नाचेल. अर्थ हीन गोष्टीवर काय किहितो ? काय चर्चा करतो? कोण वाचतो? कुणाला वेळ आहे? कोण ब्राहमन? कोण हिंदू? कोण भारतीय? मुसलमान म्हणतो अल्ला हो अकबर. बाकी सगळे काफिर. आता? वर म्हणतो मुसलमान हो नाहीतर तलवारीने जीव घेतो. आता? गमत सांगू का? तू स्वता ला देवाचा अवतार जाहीर कर. बघ सर्व ब्राह्मण तुझी पूजा करायला सुरु करतात कि नाही ते. भारतात रहाणारे सर्व हिंदू. हा हिंदुस्तान आहे. नो जात नो पात. २०० कि मी अंतरावर तू स्वताला संजय सोनवणी ऐवजी संजय पुणेकर म्हणून ब्राह्मण म्हणून राहा ना तुला कोण काय करता ते बघू. कुणाला वेळ आहे? तू पेपर मध्ये डीक्लेर कर ना कि आज पासून तू ब्राह्मण झाला व येथून पुढे तुझे सर्व वंशज ब्राह्मण च. कोणी काही म्हणत नाही. आज लोकाना वेळ नाही. जसा माकडाचा माणूस झाला तसे आता ब्र्ह्मानाचे मानसं झाली. आता सगळे मानसच. वेळ नाही ना बाबा. कुणी वाचत पण नाही तू लिहितो ते. कुणाला कळत पण नाही काय किहितो ते. बर ह्या लिहिण्याचा उपयोग काय तेही कळत नाही. काय शैव काय वैष्णव? हिंदू बस. सगळे हिंदू. भारतात रहाणारे हिंदू. मुसलमान सुध्धा हिंदूच. धर्मांतर झाले ना बाबा. बाप हिंदू होता तर मुलगा हिंदूच ना? पण सगळ्याचे पूर्वज माकड. बापा माकड होता तर संतान माकड च ना? शोध लावा. नोबेल मिळावा. भारताचे नाव रोषण करा. बाबा इथे एवढी चर्चा तरी करू शकतो तू . कारण ब्राह्मणाचे राज्य आहे म्हूनण. सौदी अरेबियात वा पाकिस्तानात जाऊन त्याच्या देवा बद्दल बोलून लिहून बघ . शुक्रवारी मुंडी कापतात ना बाबा. बाबा ते बिग ब्यांग चे दोन अनु म्हणजे एक ब्रम्हा एक विष्णू. व टक्कर करणारी शक्ती म्हणजे शिव. वेळ म्हणजे दुर्गा. तुला कसे काळात नाही बाबा. अमिबा चा मासा झाला. मस्त्य अवतार. मास्याचा कासव झाला ना बाबा. कछय अवतार. कासवाचा डुक्कर झाला ना. वराह अवतार. डुकराचे माकड झाले. माकडाचा माणूस झाला. इथे कुठून आले ब्राह्मण? हिंदू? वा कोणीही? कसे काळात नाही रे तुला? म्हणून हॉलीवूड वाल्यांनी अवतार सिनेमा काढला. हुशार तो ब्राह्मण. शूर तो क्षत्री. व्यापारी तो वैश्य . काम करणार क्षुद्र ना बाबा. आता अंबानी बिल गेट्स कोण ? ब्राह्मण ना बाबा. कसे? त्याना तू हात लावू शकतो काय? नाही? का? अंग रक्षक असतात ना? आता मोठा नेता येतो . सगळे रस्ते बंद. सगळ्याना दु जा दूर जा म्हणतात. का? अरे ते ब्राह्मण ना बा? मुंबई च्या लोकल मध्ये? सगळे मानसं. ना ब्राह्मण ना ईतर. पहिले मुर्गी कि पहिले अंडा? ह्याचा तरी शोध घे ना बाबा. उगीच कशाला अर्थ हीन लिहितो? सगळे टेररीस्ट मुसलमान. सगळे मुसलमान टेररीस्ट असे अमेरिका म्हणते. अगदी बरोबर. भारतात राहणारे सगळे हिंदू. असे पाकिस्तान म्हणते. अगदी बरोबर. सायान्तिस्त हो. शोध लाव. भारताचे नाव मोठे कर. भारतात शून्याचा शोध लावला गेला. म्हणून जग आज आहे ते आहे. तू काही शोध लाव. नोबेल मिळव. मग तू ब्राह्मण . बाकी शुद्र. १२५ कोटी लोक. एक हि शोध लागत नाही. कुणी ब्राह्मण नाही कुणी दुसरा नाही. सांगितला ना. सगळ्याचे पूर्वज माकड होते, बस.

    ReplyDelete
    Replies
    1. एक नंबर आवडलं बुवा

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...