Monday, June 24, 2013

या मौनगुंफेत...

ते म्हणाले


केदारनाथवर लिहा...

एवढी आपत्ती आली

हजारोंची जान गेली

लाखोंची दुर्दशा झाली

का लिहिले नाही?

तुमचा देव खोटा नि तुम्हीही खोटे

म्हणुन बहुदा लिहिले नाही...



मी म्हटलो...ठीक आहे...

मौनगुंफेत माझ्याच

मी जरा बरा आहे...

वेदनांना आसरा

हाच भाव खरा आहे...

स्वत:त जे उतरले नाहीत

आपले अस्तित्व ढुंढाळले नाही

ज्यांना आत्मा आणि परमात्मा

समजलाच नाही

अशांचा हा नखरा आहे

शिव काय आणि

त्याची निर्मिती काय

आणि त्यांचा प्रपाती

विनाशक विध्वंस काय

मनुष्य काय त्याची

दयापात्र संतती नाय

तो करतो आपलेच संतुलन

निर्दय अदयतेने

जगणे काय

आणि मरणे काय

याशी नसतेच काही

घेणे-देणे त्याला

त्याच्यात तो आणि त्याच्यात सारे

हे समजायची यांची किंवा त्यांची

लायकीच काय?



मौनगुंफा अनादि आणि

अनवरत

आश्रय देत

एका कडेला जीवन

दुस-या कडेला मृत्यू



आणि मधोमध

अतिप्रिय

भेडसावणारे

अतिगहन

आणि मोहवणारे

ते कोणाला मृत्युदायी

तर कोणाला जीवनदायी

जीवनतांडव

स्वत:त निमग्न असलेले

विश्वव्यापी आणि

मौन

या मौनगुंफेत

जेथे कायमच्या वास्तवाला असतो मी...



मी खरा कि ते खरे

मी खोटा कि ते खोटे

हे प्रश्न उद्भवतच नाहीत

माझ्या मनात

कारण

म्रुत्युच्या काळमिठीत सारे...

कोणत्याही क्षणी

हे बुडबुडे जीवनाचे

संपणारे

घ्या बोलून

घ्या नाचून

सा-या घृणा-द्वेष-प्रेम-प्रार्थना-श्रद्धा

या तुमच्या उपजी

रहायचे तर रहा शरणागत त्यांनाच

तुमच्या अटळ भाग्याप्रमाणे

पण...

जमलेच कधी तर या

या मौनगुंफेत

जेथे जीवन आणि मृत्यू

एकत्र खेळतात

वांडग्या पोरांसारखे...

एकमेकांशी भांडत निरामयतेने

ते देत असतात धडे

प्रशांत तांडवमय मौनाचे

कधी सहज सहज

जगण्याचे

तर कधी

सहज सहज

मरण्याचे...



या मौनगुंफेत स्वागत आहे तुमचे...

येवू शकलात तर...

(नाहीतरी तुमचे बुडबुडी खेळ

पहातोच आहे मी

येथून

या मौनगुंफेतून...

तुमच्या जगण्यातील मरणाचे...)

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...