मी असा...मी तसा...मी कसाही काही असो...
हरेक क्षणांमद्धे मला पण तुच आणि तुच दिसो
सावळे गोमटे ध्यान जे तिश्ठले पंढरीत जैसे
वाट तुझी पाहण्याची युगांची तयारी असो
रात्रीची उसवुन शाल टेंभा पेटवुन उभा मी
की आजतरी या नभात तुझा मुख-चंद्रमा दिसो
राग नाही...खंत नाही...तु ये न ये मर्जी तुझी
वेदनांचे गाणे मला माझे मला लखलाभ असो!
----------------------------------
रात्र जेथे संपली....
रात्र जेथे संपली तो क्षण असा जो गोठला
उदयाची बात कोठे? सुर्यही जरा रेंगाळ्ला
येउ नको स्वप्नांत आता, विकली मी ती केंव्हाच कधी
उगा कशाला स्वप्नात येते? "येते" म्हणुन सांगायला?
पाहीले का ते महामुर अश्रु, वाहते जग पुरात ज्यांच्या?
ते अश्रु माझेच गड्यांनो, मीच हवे का सांगायला?
रात्र अशी..रात्र तशी...काय जाते दोष द्यायला?
तुच होती सर्व रात्री माझ्यासवे भोगायला...
मीही किती वेडा गड्यांनो, भान जगण्याचे विसरलो
कोणि सांगीतले होते मला, जगणे तिच्यातच पहायला?
Subscribe to:
Post Comments (Atom)
पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?
पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani · Pune · Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
ग्रेट....हल्वुन सोडनारी...
ReplyDelete