Saturday, May 21, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: ऒडिसी

मी १९९० साली हैदराबाद येथे चेन्नई (तेंव्हा मद्रास) येथुन परत येत असताना एका दिवसासाठी थांबलो होतो. तेथे मला वेळ होता म्हणुन सालारजंग म्युझियम पहायला गेलो. तेथील अवाढव्य चित्रदालनात जगविख्यात चित्रकारांची चित्रे वा त्यांच्या बेमालुम प्रती होत्या. येथेच मी जगप्रसिद्ध सुंदरी क्लीओपात्राचा अर्ध-पुतळाही पाहिला...अर्थात तोवर माझी क्लीओपात्रावरील कादंबरी प्रसिद्धही झालेली होती, पण तिचे हे वेगळे दर्शन सुखावणारे होते हे खरेच. असो. मी चित्रदालनात विस्मित होऊन एकाहुन एक श्रेष्ठ चित्र-कलाक्रुती पहात असतांना मी एका चित्राशी येउन थांबलो...आणि पायच उचलेनात. ते चित्र स्त्री सौंदर्याचे करुणामय दर्शन घडवणारे होते. हे चित्र अरियाडनी या ग्रीक पुराकथेतील प्रियकराने त्यागलेल्या तरुणीचे आहे एवढेच चित्राखालील मजकुराने मला कळाले. पण एकंदरीत त्या चित्रातील करूण भावाने मला पछाडले.

तोवर मला ग्रीक पुराकथांशी साधी तोंडओळखही नव्हती. मी रेल्वेने पुण्याला येत असतांना त्यावरच विचार करत होतो. पुण्यात आल्यावर मी काही मित्रांना अरियादनीबद्दल माहिती आहे का असे विचारले. पण कोणालाच माहित नव्हते. ज्याअर्थी ही स्त्री एका जगप्रसिद्ध चित्राचा विषय बनली म्हणजे ती पुरा-प्रसिद्ध असणार हे तर उघडच होते. तेंव्हा इंटरनेट नामक म्हटले तर उपयुक्त आणि म्हटले तर भस्मासूर या तंत्रद्न्यानाचा आपल्याकडे गंधही नव्हता. मी ब्रिटिश लायब्ररीचा सदस्य होतोच. तेथे शोध घेता घेता मला ग्रीक पुराकथांवरील अपरंपार सामग्री मिळाली. अरियादनीला तिच्या प्रियकराने, थिसियसने एका निर्जन बेटावर त्यागल्याने दु:खसंतप्त अरियादनीच्या अंतरीची गुढे उलगडली.

मग लक्षात आले...ग्रीक पुराकथा आपल्याकडे माहितच नाहीत...पण तरीही ग्रीक पुरा-व्यक्ती मात्र प्रिय आहेत. असंख्य वास्तु-वस्तु ते सिनेमाग्रुहांची नावे ग्रीक पुराकथांमधीलच आहेत. पण त्यामागील इतिहास कोणालाच माहित नाही. यातुनच "ग्रीक संस्क्रुती कोश"  कल्पना माझ्या मनात रुजली. या कोशात सर्वच ग्रीक व्यक्तिरेखा, वास्तू, देवता, खलनायक, सांस्क्रुती, शास्त्र, तत्वद्न्यान ई सर्वच सामावले जावे हे मी मनावर घेतले. आणि एकदा एखादा विषय डोक्यात घुसला कि त्याचा फडशा पाडल्याखेरीज थांबायचे नाही हा माझा स्वभाव. मग काय...मी हात धुउन कोशपुर्तीसाठी मागे लागलो. अधिक माहितीसाठी पार दिल्ली येथील ग्रीक दुतावासाचीही मदत मिळवली.

कोश सुरू करण्याआधी मला पुराकथा ते प्राचीन इतिहास याचा अभ्यास करणे आधी क्रमप्राप्तच होते. आणि स्वाभाविकपणे भारतीय पुराकथा नि तत्वद्न्यान आणि ग्रीक पुराकथा नि तत्वद्न्यान यांची तुलनाही होतच होती. या अभ्यासाने मला फार वेगळी द्रुष्टी दिली. भारतीय पुराकथा या बव्हंशी अतिअवास्तववादी व भावनीक धर्मगंडाने व्यापल्या असून ग्रीक पुराकथा या तुलनेने अति-मानववादी आहेत हे लक्षाय्त येवू लागले. म्हणजे ग्रीक देवता या मानवी स्वभावाचे अतिरिक्त दैवतीकरण होते. राग-लोभ-मत्सर-कपट-स्वैराचार-ऐन वेळीस बाजू बदलने ईईई मानवी स्वभाव देवतांचेही होतेच. तत्वद्न्यानाबद्दल म्हणाल तर ग्रीक तत्वद्न्यान हे मुळात वास्तववादी आहे...भौतिकवादी...ईहवादी आहे तर भारतीय तत्वद्न्यान हे मुलत: भावनीक, पारलौकिकवादी आध्यात्मिक आहे. युरोपची शास्त्रीय जडन-घडन कशी झाली असेल हे मी समजू शकलो. पुर्व आणि पस्चिमेतील हा मानसशास्त्रीय फरक मला नवलाचा वाटला हेही खरे. आणि तो माझा पुढील संशोधनाचा विषयही बनला.

मी कोश लिहिण्याचे काम सुरू केले. कोष लिहिणे आणि तोही एक-हाती हे सोपे नसते. जवळपास ३०० नोंदी झाल्या तेंव्हा मी ऒडिसियस या पात्राजवळ आलो. ऒडीसी आणि इलियड ही महाकाव्ये पुन्हा वाचायला घेतली. तेंव्हा मीही जीवनातील एका विलक्षण टप्प्याजवळ होतो आणि अविरत संघर्ष सुरू होता. ओडीसियस पुन्हा वाचतांना मला माझ्या आणि ओडिसियसमधील स्वभाव साधर्म्याची जाण होवू लागली. अत्यंत चतूर, तत्कालीन जगातील सर्वात बुद्धीमान म्हणुन गणल्या गेलेल्या ओडीसियसच्या झालेली घोर फसवणुकी, त्यावरही त्याने केलेली मात आणि संकटांना निमंत्रीत करत रहात त्यांना पुन्हा पुन्हा निरस्त करण्याचा आत्मघातकी स्वभाव याची मला विलक्षण मोहिनी पडणे स्वाभाविकच होते.

मी ओडीसियसवर कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. कोश बाजुला ठेवला. कादंबरी म्हणुन माझे स्वातंत्र्य वापरत, ही कादंबरी फक्त ओडीसियसचीही होता कामा नये तर ट्रोय युद्धातून परतलेल्या अगमेम्निओन-आणि त्याच्या वाट्याला जयानंतर आलेली अभागी कसांड्रा, मनलेउस आणि जिच्यासाठी हा घोर संगर झाला ती त्याची बायको हेलन, अगमेम्नोनची सुडासाठी त्याच्या परत येण्याची वाट पहात असणारी त्याची पत्नी (आणि हेलनची थोरली बहीण) क्लायटेम्नेस्ट्रा...ही पात्रे मुळ कथांना विशेष धक्का न लावता मी माझ्या पद्धतीने आणि भारतीय तत्वद्न्यानाचे अवगुंठण घालत फुलवत नेली. ओडिसियसचे औदर्य, त्याचे जीवनाबद्दलची निर्माण होत आलेली वितुर्ष्णा याचे चित्रन करत तो जेंव्हा अजरामरतेची देवता, अजोड सौंदर्यवती क्यालिप्सोच्या मायाजाळात तात्पुरता सापडतो...आणि शेवटी अमरता नव्हे हवे ते मानवी जीवन या सिद्धांतापर्यंत येतो. हा सिद्धांत मांडतांना मी फारच भावूक झालो होतो. येथे मराठी व्रुत्तांत देता येत नाहीय...पण इंग्रजी अनुवादित याच कादंबरीचा मी तो थोडा अंश देतो...
Life without strife is meaningless. Life without mystery is worthless. Life without uncertainty is a poison. Life without pain is like a food devoid of spices. I want to live that life.
“True, Calypso, I want to go back to my people where I can find complete solace, no matter what dangers I may have to take upon me. True, that people lack in complete faith and devotion. I know they often turn to be treacherous when their instincts overpower them. But I can’t hate them because I know, though seldom, a lamp of humanity kindles in them. Look at my friend, Polymus, I don’t know in what condition he is, but he has been my honest companion in my strife. I love them despite all their lacunas. Being human is a scarce gift, but to gain that gift we humans wage a war against circumstances in an attempt to rise above ourselves. This makes me love the people. For this love of people I can go to any extent, commit any grave sin… to make them happy and content…and fulfilled.
“Human life is nothing but an unwritten saga of tragedies, frustrations, treacheries, agonies and strife. Calypso, you are a goddess. You never can understand this strife… struggle and a fulfillment over worthless victories. You simply cannot understand the lamps of hopes lit in every mortal heart! You cannot understand the agonies of defeat and the pain and the blazing torch we bear in our heart to defeat the pains.
“We walk over a thin rope of life, hung over the crevice of the death with expectations and hopes.
“You never can understand this!
“Yes- we hate. We get bloodthirsty sometimes. Many a times we do confront annihilation. But again we rise up with our ever-strong ambitions. We feel ashamed on our foolishness of the past and again are ready to repeat it with no awakening whatsoever.
“So ignorant and foolish often are we, Calypso! What provides some meaning to our life is our ignorance. Ignorance makes us curious. Ignorance makes us blind at the bare truths of the life. It is ignorance on whose foundations our civilisations are constructed. The moment complete knowledge will come to us our civilisation will cease to be.
“If we can see what is hidden in the secret stores of future like the burning sun, our life will come to a standstill. Our ambitious, fear and greed will vaporize, for there won’t be any place to go when the future is known and the life is infinite. Life will then become insipid, Calypso.
“We hope because we are ignorant. That is why we built the fortresses of confidence on uncertain grounds. That’s why we struggle to stand up through the turmoil of life. We suffer and we collapse with an irresistible urge to stand up again, to face inevitable and unknown. Without hopes our life would have become hell.
“Let me go back, Calypso. Life here is beautiful but unexciting. I am not used to live without strife and testing my follies over and over again. Love and peace are the islands of charm for me in the ocean of struggle. Struggle is foundation of our life. I am dead without its presence. What is the use of this happiness, O celestial beauty?
“I am a human and it is great to be human.”

ही कादंबरी इंग्रजीत http://sanjay-sonawani.blogspot.com/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असो.

मी ही कादंबरी अप्रत्यक्षपणे मलाच अर्पण केली. म्हणजे "माझ्यातही दडुन बसलाय एक ओडीसियस...संकटांना आव्हान देत...त्यालाच...". कदाचित हा माझा उर्मटपणा असेल पण तो मी केलाय.

या कादंबरीची विशेष समिक्षा झाली नाही कारण मुळात ग्रीक पुराकथा येथे कोणालाच माहित नाहीत. पण ही कादंबरी माझी अत्यंत लाडकी कादंबरी आहे कारण ती मानव आणि अपरिहार्य नियतीतील संघर्ष, मानवी भाव-भावना, नीतितत्वे केवढ्या बदलत्या असतात याचे एक अत्यंत वेगळे दर्शन मला घडवता आले...कारण जणु काही हेलन, अगमेम्नोन, मन्लेऊस, क्लायटेम्नेस्ट्रा आणि ओडिसियसच्या रुपांतुन मीच जगत होतो.

कादंबरी संपत येणे हे प्रत्येक लेखकाला व्यथित करणारे असते. या कादंबरीचा शेवट करतांना मात्र मी व्यथित नव्हतो...मी लिहिले...

Old Odysseus is not yet devoid of ambitions and curiosity. Still he is sailing through the raging ocean. He is still unbeatable by the storms and calamities that befall him like a punctual cycle of nature. His vane eyes are still transfixed on the distant horizon. He is tireless. What is it that he searches on the faint outline of the horizon? Helen? Penelope? Or that unknown beauty of eternity? In his soul remains the same agitated zeal. “I have to course ahead…just ahead...” He cannot stop. He cannot be defeated.
He doesn’t know to stop. Until the oar in his hand slips down, until the glow in his eyes is dead, he is determined to go ahead.
His journey is not momentary.
It is boundless… infinite.

मी या कादंबरीत मानव जातीचा परिस्तिस्थीवर सातत्याने मात करण्याच्या नैसर्गिक व्रुत्तीवर प्रकाश टाकत त्याच्या झुंझार व्रुत्तीला प्रकट केले आणि म्हणुनच ही कादंबरी मला प्रिय आहे.

No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...